Monday 23 March 2020

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेबांनी संपादित केलेल्या पदव्या :
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तब्बल ३२ पदव्या संपादित केल्या होत्या. यामध्ये बीए, एमए, पीएचडी (अर्थशास्त्र), एमएससी (Provincial Decentralization of Imperial Finance in British India), बॅरिस्टर इन लॉ, डीएससी (The Problem of the Rupee – Its origin and its solution), एलएलडी (HIS achievements, Leadership and authoring the constitution of India), डी.लिट. या काही महत्त्वाच्या पदव्या आहेत.

बाबासाहेबांनी लिहिलेले महत्त्वाचे ग्रंथ :
Caste in Hindu (1916), The problem of Rupee (1923), Annhilation of Caste (1935), Federation Versus Freedom (1939), Ranade, Gandhi and Ginnah (1943), Communal Deadlock and a Way to solve it (1945), What congress and Gandhi have done to the untouchables? (1945), Pakistan or Partition of India (1945), State and Minorities (1947), Maharashtra as a Linguistic state (1948), The untouchable (1948), Who were shudra (1945), Buddha and his Dhammas (1957). अशा 22 ग्रंथ आणि पुस्तकाचे लेखन त्य

वर्तमानपत्रे :
मूकनायक (१९२०), बहिष्कृत भारत (१९२७), समता (१९२८), जनता (१९३०), प्रबुद्ध भारत (१९५६, जनताचे नामांतर).

महत्वाचे सत्याग्रह / आंदोलने
महाडचे चवदार तळे सत्याग्रह, (२० मार्च १९२७), मनुस्मृती दहन (२५ डिसेंबर १९२७), शेतकऱ्यांची चळवळ (१९२८), पर्वती देवालय प्रवेश (१९२९), काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह (१९३१), पुणे करार (१९३२), येवला परिषद (१९३५), बौद्ध धर्मात प्रवेश (१४ ऑक्टोबर १९५६), बावीस प्रतिज्ञा.

बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या महत्वपूर्ण संस्था/संघटना
बहिष्कृत हितकारिणी सभा (१९२४), समता सैनिक दल (१९२७), स्वतंत्र मजूर पक्ष (१९३६), शेड्युल कास्ट फेडरेशन (१९४२), पिपल्स एज्युकेशन सोसायटी (१९४५), भारतीय बौद्ध महासभा (१९५५).

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या गाजलेल्या घोषणा
‘मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो, ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही’. ‘जे आपला इतिहास विसरतात ते कधीही इतिहास घडवू शकत नाहीत’
‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ ‘स्वातंत्र, समता, बंधुता शिकवणाराच धर्म मला प्रिय वाटतो’
‘जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असायला हवे’

बाबासाहेबांना मिळालेले पुरस्कार / सन्मान :
१९५५ मधील काठमांडू येथील जागतिक बौद्ध परिषदेत ‘बोधीसत्व’ ही उपाधी प्रदान, १९९० मध्ये ‘भारतरत्न’ हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला.

बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू :
चित्रकार : बी. आर. मडिलगेकर यांच्याकडून त्यांनी चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले होते. बाबासाहेबांना व्हायोलिन वाजवण्याचीही आवड होती.
पत्रकार : ‘ज्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो त्यासाठी वर्तमानपत्र त्यांचा आवाज होऊ शकते असे सांगणाऱ्या’ बाबासाहेबांचे नाव तत्कालीन ब्राह्मणेतर पत्रकारितेत अग्रस्थानी घेतले जाते.
राजकारणी : बाबासाहेब भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तसेच ते स्वतंत्र भारताचे पहिले मजूर मंत्रीही होते.
अर्थतज्ज्ञ : ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या त्यांच्या ग्रंथातून प्रेरणा घेऊन १९३५ साली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली.
तत्वज्ञ : स्वातंत्र, समता आणि बंधुता या तत्वांवर विश्वास ठाम विश्वास असणाऱ्या बाबासाहेबांनी हीच तत्वे राज्यघटनेत समाविष्ट केली.

बाबासाहेबांच्या कार्याबद्दल फारशा चर्चिल्या न गेलेल्या गोष्टी
दुसऱ्या महायुद्धानंतर भारताची आर्थिक घडी बसवण्यात बाबासाहेबांचे मोठे योगदान होते. त्यासाठी नेमलेल्या रिकन्स्ट्रक्शन कमिटी ऑफ काऊन्सिलचे (आरसीसी) सदस्य होते. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्यावर सिंचन आणि विजेच्या प्रश्नांबाबत जबाबदारी सोपवली होती., ‘दामोदर नदी खोरे’ आणि ‘सोने नदी खोरे’ प्रकल्प तसेच देशातील सर्वात मोठ्या ‘हिराकुड धरण’ प्रकल्पाचे काम बाबासाहेबांच्या अखत्यारित झाले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी)च्या स्थापनेत बाबासाहेबांचा मोठा वाटा होता. ‘जय भीम’ या घोषणेनंतर देशात ‘जय हिंद’ ही घोषणा सुरु झाली.

बाबासाहेबांचे लेखन
भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याने केले नाही एवढे प्रचंड लेखन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. पूर्ण झालेले एकूण २२ ग्रंथ आणि पुस्तिका, १० अपूर्ण राहिलेले ग्रंथ, १० निवेदने किंवा साक्षीपुरावे, १० शोधनिबंध, लेख आणि परीक्षणं इतके प्रचंड लिखाण डॉ. आंबेडकरांनी केले आहे. विशेष म्हणेज त्यांनी हे सर्व लिखाण इंग्रजीतून केलेले आहे.

सामान्यता आढळणाऱ्या ‘चिमणी’चा ‘IUCN रेड लिस्ट’मध्ये समावेश


आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (IUCN) यांच्या धोक्यात असलेल्या प्रजातीच्या (endangered species) यादीत म्हणजेच ‘रेड लिस्ट’मध्ये सामान्यता सर्वत्र आढळणाऱ्या ‘चिमणी’चा समावेश करण्यात आला आहे.

वाढत्या प्रदूषणामुळे, तपमानामुळे तसेच रासायनिक खते, ध्वनी प्रदूषण अश्या अनेक कारणांमुळे चिमणीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

20 मार्च 2020 रोजी “आय लव स्पॅरोज” या संकल्पनेखाली जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात आला.

IUCN विषयी

1948 साली स्थापना झालेली आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (International Union for Conservation of Nature -IUCN) ही संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) याची अधिकृत सल्लागार संस्था आहे. ही निसर्ग संवर्धनाच्या क्षेत्रात तसेच नैसर्गिक स्त्रोतांचा शाश्वत वापर या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली आंतरराष्ट्रीय संस्था आहे. या संस्थेचे मुख्यालय ग्लॅंड (स्विर्त्झलँड) या शहरात आहे.

TRIFEDचा “टेक फॉर ट्राइबल” उपक्रम

​​

आदिवासी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघाने (TRIFED) आदिवासी लोकांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याकरिता “टेक फॉर ट्राइबल” उपक्रम चलविलेला आहे.

प्रधानमंत्री वनधन योजनेच्या (PMVDY) अंतर्गत नोंदणीकृत आदिवासी वन उपज उत्पादकांमध्ये उद्योजकतेचे कौशल्य निर्माण करणे या उद्देशाने हा कार्यक्रम आहे.

ठळक बाबी

🔸सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने या उपक्रमास पाठिंबा दर्शविला आहे.

🔸लोकांना 30 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा कार्यक्रम सहा आठवडे चालणार असून त्यादरम्यान एकूण 12 सत्र घेतले जाणार आहे.

🔸TRIFED यांच्या वतीने 1200 वन धन विकास केंद्रांची उभारणी केली जात असून या योजनेत 28 राज्यांतून 3.6 लक्ष आदिवासी वन उत्पादकांची नोंदणी झालेली आहे. एका केंद्रामध्ये प्रत्येकी 20 लोकांसह 15 बचत गटांचा सहभाग असणार.

🔸या उपक्रमाच्या काही भागीदारांमध्ये IIM रांची, दीनदयाळ संशोधन संस्था, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, IIT कानपूर आणि द आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन या संस्थांचा समावेश आहे.

प्रधानमंत्री वन धन योजना 2018 या वर्षापासून 27 राज्यांमध्ये चालवली जात आहे.

आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (TRIFED) याची स्थापना 1987 साली झाली.

राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशन

🔰महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे जिथे कुपोषणाशी लढण्याचे कार्य मिशनसारखे राबवण्यात येत आहे आणि याच उद्देशाने राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशनची स्थापना करण्यात आली आहे. आरोग्य आणि पोषण मिशनचा पहिला टप्पा २००५ मध्ये आणि दुसरा टप्पा नोव्हेंबर २०११ मध्ये आखण्यात आला होता. या मिशनचे मुख्य उद्दिष्ट महाराष्ट्रातील कुपोषण समस्या कमी करणे असून त्यासाठी गर्भधारणेपासून पहिल्या १००० दिवस म्हणजेच वजा ९ ते २४ महिन्यांच्या कालावधीवर लक्ष केंद्रित केले जाते.

🔰राजमाता जिजाऊ मिशन  ही एक तांत्रिक आणि सल्लागार स्वायत्त संस्था असून संपूर्णत: युनिसेफच्या अर्थसाहाय्यावर चालते. याचा मुख्य हेतू  महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि आय सी डी एस आयुक्तालय यांच्या मध्ये संवाद आणि सहयोग घडवून आणणे हा आहे.

🔰महिला आणि बालक विकास विभाग आणि या मिशनच्या कार्यात कोणताही संभ्रम आणि पुनरावृत्ती होऊ नये याकरिता मिशनची भूमिका स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्याने अगदी विचारपूर्वक निर्णय घेतला की या मिशनला शासकीय अर्थसाहाय्य देण्यात येणार नाही आणि या मिशनतर्फे  कोणत्याही योजनांची थेट अमंलबजावणी करण्यात येणार नाही. यामुळे मिशनला स्वतंत्रपणे आणि स्वायत्तपणे कार्य करणे शक्य होते. या मिशनची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:

🔰पहिले १००० दिवसांचे अनन्य साधारण महत्व पटवून देणे.
एक ‘विचार गट’ म्हणून कार्य करणे  आणि शासनाला धोरण निश्चिती करण्याकरिता वास्तविक पुराव्यावर आधारीत सल्ला देणे.
कुपोषण कमी करण्याचे सामाइक उद्दिष्ट साध्य करण्याकरिता विविध विभांगात एककेंद्राभिमुखता/एकवाक्यता आणणे.

🔰या भूमिकेला अनुसरुन, या मिशनने विविध विभांगासाठी बहु-क्षेत्रीय कृती कार्यक्रम तयार केला आहे, ज्यात कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी विविध विभाग प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे कसे सहाय्य करू शकतात याचा आराखडा दिलेला आहे.

रक्तस्त्राव थांबविण्यासाठी भारतीय संशोधकांनी ‘स्टार्च’पासून एक पदार्थ विकसित केला

🔰 गंभीर दुखापतीनंतर, जीवघेणा रक्तस्त्राव तत्काळ थांबविणे महत्त्वाचे असते.

🔰यासाठी केल्या गेलेल्या एका प्रयत्नांमधून भारतीय संशोधकांनी एक असा पदार्थ विकसित केला आहे, ज्याद्वारे रक्त गोठवण्याची प्रक्रिया वाढते आणि रक्तस्त्राव थांबतो.

🔰मोहाली येथल्या इन्स्टिट्यूट ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी (INST) इथल्या संशोधकांनी स्टार्चपासून ‘हेमोस्टॅट’ पदार्थ तयार केला आहे.

🔰 जखमेवर जेल तयार करण्यासाठी एकत्रित केलेले जैविक विघटन होणारे सूक्ष्मकण विद्यमान उपलब्ध असलेल्या पर्यायांच्या तुलनेत पांच ते दहा पटीने अधिक सुधारणा देतात.

🔰डॉ. दीपा घोष याच्या नेतृत्वात असलेल्या चमूने हा पदार्थ विकसित केला आहे. हा पदार्थ स्वस्त दरात उपलब्ध होऊ शकतो.

राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रमाणपत्र धारकांना निमलष्करी दलाच्या परीक्षेत जादा गुण दिले जाणार

🔰 राष्ट्रीय छात्र सेनेत (NCC) देशातल्या अधिकाधिक युवांनी सहभागी व्हावे या हेतूने केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासाठी (CAPF) घेण्यात येणाऱ्या थेट भरती परीक्षेत राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रमाणपत्र धारकांना जादा (बोनस) गुण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

🔴ठळक बाबी

🔰 राष्ट्रीय छात्र सेनेचे “अ” प्रमाणपत्र मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 टक्के जादा गुण, ”ब” प्रमाणपत्र मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 3 टक्के जादा गुण तर “क” प्रमाणपत्र धारकांना 5 टक्के जादा गुण देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

🔰 उपनिरीक्षक आणि हवालदार पदांसाठी आगामी भरती परीक्षा देणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रमाणपत्र धारकांना या योजनेचा फायदा होणार आहे.

🔰 सर्व राज्य सरकारांनी त्यांच्या संबधित पोलीस दलांच्या प्रवेश परीक्षांमध्ये अशाच प्रकारच्या प्रोत्साहक योजना राबवाव्या अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.

🔰 सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात भरती होण्यासाठी उत्तमरीत्या प्रशिक्षित आणि शिस्तबद्ध तरुण अधिक प्रमाणात उपलब्ध होण्यास मदत होणार.

🔰 राष्ट्रीय छात्र सेना (National Cadet Corps -NCC) ही देशातल्या युवांना शिस्तबद्धता आणि राष्ट्रीय नागरिकत्व क्षेत्रात प्रोत्साहन देणारी भारतीय भुदल, नौदल आणि हवाई दल यांची एक तिहेरी सेवा संघटना आहे.

🔰 NCCची 1948 साली स्थापना झाली व त्याचे नवी दिल्लीत मुख्यालय आहे.

🔰 दरवर्षी NCC कडून मुलगी तसेच मुलग्यांसाठी पर्वतारोहणाच्या मोहिमा आयोजित करते.

महाराष्ट्र लॉकडाऊन : काय सुरु राहणार आणि काय बंद?

🔰कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज रात्री 12 वाजल्यापासून महाराष्ट्रात कलम 144 लागू करण्यात येणार आहे. तूर्तास 31 मार्चपर्यंत हा निर्णय घेत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आाहे.

🔰 काय बंद असेल?

● परदेशातून येणारी वाहतूक बंद.
● मालवाहतूक वगळता मुंबईची लोकलसेवा बंद.
● जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळळता इतर दुकानं बंद.
● अत्यावश्यक सेवांसाठीचा वापर वगळता बेस्ट बसमध्ये सामान्य नागरिकांचा प्रवास बंद.
● शाळा, महाविद्यालयं बंद.
● मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह बंद.
● मोठ्या प्रमाणावर कार्यालयं बंद. कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सेवा पुरवण्यात याव्यात.
● शासकीय कार्यालयांमध्य फक्त पाच टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती.

🔰काय सुरु असेल?

● जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरु.
● धान्य, किराणा मालाची दुकानं सुरु.
● भाजीपाला वाहतूक सुरु.
● औषधांची दुकानं सुरु.
● बँका, शेअर बाजार आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्था सुरु.
● वीजपुरवठा कार्यालयं सुरु.

🔰आजपासून 5 किंवा 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास मज्जाव घालण्यात आला आहे.

WHO ने जाहीर केलेली जागतिक आरोग्य आणीबाणी

🔰 2009 स्वाइन फ्लूमुळे

🔰 2014 पोलिओ साठी

🔰 2016झिका विषाणू साठी

🔰 2014 व 2019 इबोला विषाणूच्या प्रसारासाठी

🔰 2020 कोरोनो विषाणू साठी

Coronavirus: राजस्थान 'लॉकडाऊन', मुख्यमंत्री गेहलोत यांचे आदेश

🔰 करोनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये ३१ मार्चपर्यंत संपूर्ण 'लॉकडाऊन' पाळण्याचे आदेश मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिले आहेत. संपूर्ण लॉकडाऊन घोषित करणारं पहिलं राज्य राजस्थान हे पहिलं राज्य ठरलंय.

🔰 या लॉकडाऊन दरम्यान, भाज्या, दूध यांसारख्या अत्यावश्यक गोष्टींसोबत मेडिकल स्टोअर सुरू राहणार आहेत. याशिवाय कोणतेही दुकान सुरू राहणार नाहीत, असं स्पष्ट करण्यात आलंय. यापूर्वी काही राज्यांनी काही शहरांत लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. परंतु, राजस्थानमध्ये संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागू राहणार आहे.

भारताचा : क्षेत्रानुसार नदी खोऱ्यांचा

नदीखोरे    भारतातील क्षेत्रफळ चौकिमी.
--------------------------------------------------------
गंगा नदी खोरे  ★  ८,६१,४५२ (२६.२%)

गोदावरी खोरे  ★  ३,१२,८१२ (९.५१% )

कृष्णा खोरे    ★    २,५८,९४८ (७.८७%)

महानदी खोरे  ★  १,४१,६०० (४.३%)

नर्मदा खोरे    ★   ९८,७९५ (३.००५%)

कवेरी खोरे    ★ ८७,९०० (२.६७%)

--------------------------------------------------------

MSME मंत्रालय ‘प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ राबवित आहे

🔰पारंपारिक कारागीर आणि बेरोजगार तरुणांना मदत करण्यासाठी अकृषक क्षेत्रात सूक्ष्म उद्योगांची स्थापना करुन स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी

🚦सूक्ष्म,
🚦लघू व
🚦मध्यम उद्योग मंत्रालय (MSME)

🔰 ‘प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ (PMEGP) राबवित आहे.

🔰पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) याची 15 ऑगस्ट 2008 रोजी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी घोषणा केली होती.

🔰ही भारत सरकारची पत योजना आहे.

🔰राष्‍ट्रीय पातळीवर खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC) तर

🔰राज्‍य/जिल्हा पातळीवर KVIC चे राज्य कार्यालय, खादी व ग्रामोद्योग मंडळ (KVIB) आणि

🔰जिल्हा उद्योग केंद्र (DIC) या योजनेच्या अंमलबजावणीसाठीच्या मध्यवर्ती संस्था आहेत.

ISRO पुढच्या वर्षी 10 पृथ्वी निरीक्षक उपग्रहांसह 36 अंतराळ मोहिमा पूर्ण करणार

🔰 भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये 36 अंतराळ मोहिमांचे नियोजन केले आहे.

🔰 36 अंतराळ मोहिमांमध्ये 10 पृथ्वी निरीक्षक (Earth Observation) उपग्रह, 10 PSLV मोहिमा, 3 दळणवळण उपग्रह, 3 अंतराळ विज्ञान उपग्रह, 2 सुचालन (Navigation) उपग्रह, 1 तंत्रज्ञान प्रदर्शन मोहीम, 1 GSLV MK-III, 3 GSLV MK-II, 2 SSLV मोहिमा, 1 गगनयान (मानवरहित) मोहीम यांचा समावेश आहे.

🔴भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)

🔰 ISRO ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे आणि त्याचे बेंगळुरू (कर्नाटक) या शहरात मुख्यालय आहे.

🔰 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापना झालेल्या ISRO ने पूर्वीच्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) या संस्थेची जागा घेतली.

🔰 ही संस्था विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते. 

🔴संस्थेनी केलेली कार्ये -

🔰 19 एप्रिल 1975 रोजी भारताने सोवियत संघाच्या मदतीने आपला ‘आर्यभट्ट’ नावाचा पहिला उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केला.

🔰1980 साली पुर्णपणे स्वदेशी बनावटीच्या SLV-3 प्रक्षेपकाद्वारे ‘रोहिणी’ हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला.

🔰 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रयान-1’ मोहीम यशस्वी झाली.

🔰 ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला .

🔰 पहिल्याच प्रयत्नात आणि अगदी कमी खर्चात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.

🔰फेब्रुवारी 2017 मध्ये एकाचवेळी 7 देशांचे 104 उपग्रह अवकाशात सोडत रशियाचा 37 उपग्रहांचा विक्रम मोडीत काढला.

🔰 ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक (PSLV) आणि भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक (GSLV) विकसित केले.

🔰सॅटलाइट सुचालन प्रणाली ‘गगन’ आणि क्षेत्रीय सुचालन उपग्रह प्रणाली ‘IRNSS’ विकसित केले.

🔰 यानाला पुढे नेणारे अत्यावश्यक असलेले स्वदेशी ‘क्रायोजेनिक इंजन’ तयार केले.

🔴प्रक्षेपक

🔰 ISRO ने भारतीय उपग्रह प्रक्षेपण यानाचे काम 1970 साली सुरू केले.

🔰ह्या कामाचे नेतृत्व डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याकडे दिले गेले होते. अग्निबाणात सॉलिड प्रोपेलंट मोटारी वापरल्या जातात.

🔰 प्रथम प्रक्षेपण वर्ष 1979 मध्ये झाले.

🔰 ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक (PSLV) - ISRO चा शाश्वत प्रक्षेपक म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘धृवीय उपग्रह प्रक्षेपक (PSLV)’ याचा जागतिक अंतराळ स्पर्धेत भारताला आघाडी मिळवून देण्यास मोलाचा वाटा आहे.

🔰 PSLV हे ISRO चे अष्टपैलू प्रक्षेपण वाहक अग्निबाण आहे. PSLV कडून केल्या गेलेल्या प्रथम यशस्वी 36 प्रक्षेपणांनंतर, PSLV हे ISRO चे ‘वर्कहोर्स लाँच व्हेईकल’ म्हणून उदयास आले आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांसाठी उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी खुले करण्यात आले.

🔰 PSLV हे जगातल्या सर्वात विश्वसनीय प्रक्षेपकांपैकी एक आहे. PSLV-C37 ही PSLV-XL ची एक सुधारित संरचना आहे.

🔴PSLV ची वैशिष्ठ्ये - 

🔰 उंची 44 मीटर

🔰 व्यास 2.8 मीटर

🔰 स्टेज ची संख्या 4

🔰 वाहून नेण्याची क्षमता

 320 टन (XL)

🔰प्रकार

 3 (PSLV-G, PSLV - CA, PSLV - XL)

🔰प्रथम उड्डाण

 20 सप्टेंबर 1993

🔰 भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक (GSLV) - GSLV हे प्रामुख्याने पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेत उपग्रहाच्या INSAT वर्गातल्या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याकरिता विकसित केले गेले. 

🔰GSLV हे उपग्रहाच्या GSATमालिकेच्या प्रक्षेपणासाठी वापरले जात आहे. GSLV  मध्ये तीन टप्पे आहेत - घन इंधन वापरणारे रॉकेट मोटर स्टेज, अर्थ स्टोअरेबल लिकुइड स्टेज आणि क्रायोजेणीक स्टेज.

🔰 या वाहनाची 49.13 मीटर उंची आहे. GSLV चे प्रथम उड्डाण 18 एप्रिल 2001 रोजी केले गेले होते.

🔰2017 साली तयार करण्यात आलेले ‘जियोसिंक्रोनस सॅटलाइट लॉंच व्हेइकल मार्क-III’ (GSLV Mk-III) हे भारताने आतापर्यंत बनविलेले सर्वात भारी अग्निबाण आहे आणि हे सर्वाधिक वजनी उपग्रह प्रक्षेपित करण्यास सक्षम आहे. याला ‘फॅट बॉय’ असे टोपणनाव दिले गेले. त्याचे वजन जवळपास 640 टन आहे.

🔰हा अग्निबाण पृथ्वीच्या वातावरणाच्या खालच्या परिभ्रमन कक्षेत 8 टन वजनापर्यंतचे अंतराळ केंद्र पोहोचवण्यास सक्षम आहे.

भारतात राष्ट्रीय उद्याने नसलेले राज्य व केंद्रशासित प्रदेश

◾️ चंदीगड,
◾️ दादरा नगर हवेली,
◾️दमन व दीव ,
◾️लक्षद्वीप,
◾️पद्दुचेरी,
◾️ दिल्ली
याठिकाणी एकही राष्ट्रीय उद्यान नाही✍

🔰भारतामध्ये एकूण 104 राष्ट्रीय उद्याने आहेत

🔰 राष्ट्रीय उद्याने भारतातील 40500 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापली आहे

🔰देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या  1.23 टक्के  

🔰 भारतात सर्वाधिक राष्ट्रीय उद्याने ⛰⛰🏝

◾️ मध्य प्रदेश( 10 )
◾️अंदमान निकोबार (9) ,
◾️केरळ महाराष्ट्र उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल प्रत्येकी 6,
◾️आसाम कर्नाटक हिमाचल प्रदेश तामिळनाडू तेलंगणा प्रत्येकी 5

🔰 भारत सरकारने 1973 मध्ये व्याघ्र प्रकल्प सुरू केला सध्या भारतात 50 व्याघ्र प्रकल्प आहेत

◾️ त्यापैकी महाराष्ट्रात व्याघ्र प्रकल्प आहेत

◾️प्रत्येक चार वर्षांनी वाघांची 🐅🐅
जनगणना होते 2018 च्या व्याघ्र जनगणनेनुसार भारतात 2967 वाघ आहेत  त्यापैकी महाराष्ट्रात 312 वाघ आहेत

_____________________________

अरुणाचल प्रदेशात “केंद्रीय हिमालयी संस्कृती शिक्षण संस्था” याची स्थापना

- बौद्ध तत्वज्ञान, संस्कृती आणि कला यांचे शिक्षण आणि बौद्ध धर्माच्या विविध पैलूंवर संशोधन करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी अरुणाचल प्रदेशाच्या दाहुंग या शहरात भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने “केंद्रीय हिमालयी संस्कृती शिक्षण संस्था” (Central Institute of Himalayan Culture Studies -CIHCS) याची स्थापना केली.

- आधुनिक विद्यापीठाच्या प्रणालीद्वारे तिबेटी, चिनी, पाली, संस्कृत, जापानी आणि इतर आशियाई भाषांमध्ये जतन केलेल्या प्राचीन बौद्ध हस्तलिपी आणि ग्रंथांचे जतन करणे आणि ते डिजिटल करणे हा या संस्थेचा मुख्य हेतू आहे.

- संस्थेच्या कामकाजासाठी केंद्र सरकारकडून वित्तपूरवठा केला जाणार आहे. तसेच संस्कृती मंत्रालयाच्या योजनांच्या माध्यमातून संशोधनासाठी निधी पुरवला जाणार आहे.

- वर्तमानात, तिबेट हाऊस, नवी दिल्ली; लायब्ररी ऑफ तिबेटियन वर्क्स अ‍ॅन्ड आर्चीव्ह, धर्मशाला; नामग्याल तिबेटोलॉजी संस्था, सिक्कीम; बौद्ध सांस्कृतिक शिक्षण केंद्र, तवांग मठ, अरुणाचल प्रदेश; आंतरराष्ट्रीय बौद्ध संघ; आणि GRL मोनास्टिक स्कूल, बोमडिला, अरुणाचल प्रदेश या सहा संस्थांना बौद्ध संस्कृती आणि कलेच्या संवर्धनासाठी संस्कृती मंत्रालय वार्षिक अनुदान देखील देत आहे.

आयुष आरोग्य व निरोगीकरण केंद्रांचा राष्ट्रीय आयुष अभियानामध्ये समावेश करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

◾️केंद्रीय मंत्रिमंडळाने आयुष्मान भारत योजनेचा एक घटक असलेल्या आयुष आरोग्य व निरोगीकरण केंद्रांचा राष्ट्रीय आयुष आयभियानामध्ये समावेश करण्यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

◾️आर्थिक वर्ष 2019-20 ते 2023-24 या कालावधीसाठी आयुष केंद्रांच्या कारभारासाठी  3399.35 कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे, ज्यात 2209.58 कोटी रुपये केंद्र सरकारचा वाटा आणि 1189.77 कोटी रुपये राज्य सरकारचा वाटा असणार.

◾️अभियानाच्या अंतर्गत आयुष आरोग्य व निरोगीकरण केंद्र कार्यान्वित करण्यासाठी खालील उद्दिष्टे साध्य करावी लागणार -

◾️विद्यमान सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणालीसह एकत्रीकरणातून प्रतिबंधात्मक प्रोत्साहन, रोगनिवारक, पुनर्वसन आणि उपशामक आरोग्य सेवा यावर लक्ष केंद्रित करून आयुष तत्वे आणि पद्धतींवर आधारित समग्र निरोगीकरण आदर्श स्थापित करणे.

◾️गरजू लोकांना आयुष सेवा उपलब्ध करून माहितीही उपलब्ध करून देणे.

◾️आयुष सेवांमध्ये जीवनशैली, मृत्यू, योग, औषधी वनस्पती आणि आयुष प्रणालीच्या सामर्थ्यानुसार निवडलेल्या परिस्थितीसाठी औषधांची तरतूद याविषयी जनजागृती समाविष्ट आहे.

🔰पार्श्वभूमी

◾️आयुष (आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी / AYUSH) मंत्रालय आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत उप-आरोग्य केंद्रांपैकी 10 टक्के म्हणजेच 12,500 केंद्रे आयुष आरोग्य व निरोगीकरण केंद्रे म्हणून चालविणार असा निर्णय घेण्यात आला असून, ‘राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017’ यामध्ये एकात्मिक आरोग्य सेवांच्या बहुलवादी प्रणालीत आयुष प्रणालीच्या संभावित शक्यतांना मुख्य प्रवाहात नेण्याचे समर्थन केले आहे.

◾️भारत सरकारने फेब्रुवारी 2018 या महिन्यात निर्णय घेतला आहे की सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा देण्यासाठी विद्यमान उप-आरोग्य केंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रूपांतर करून दीड लक्ष आरोग्य व निरोगीकरण कल्याण केंद्रांची स्थापना केली जाणार

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...