Saturday 27 February 2021

रिअर ऍडमिरल एस. व्यंकटरमण यांनी गोव्याच्या नौदल युद्ध महाविद्यालयाचा कार्यभार स्वीकारला.



🔰रिअर ऍडमिरल एस. व्यंकटरमण, विशिष्ट सेवा पदक यांनी शुक्रवारी गोव्यात, भारतीय नौदलाच्या प्रतिष्ठित नौदल युद्ध महाविद्यालयाच्या प्रमुख म्हणून  कार्यभार स्वीकारला. रिअर ऍडमिरल संजय जसजीत सिंह , अति विशिष्ट सेवा पदक,एनएम यांच्याकडून ऍडमिरल यांनी नौदलाच्या सर्वोच्च प्रशिक्षण संस्थेचा कार्यभार स्वीकारला.

 

🔰रणनितीक आणि कार्यात्मक विचारांच्या संस्कृतीला चालना देण्याच्या दृष्टीने,संरक्षण नियोजन, सामरिक आणि  कार्यात्मक विषयांवर परदेशी सहभागींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी हे  नौदल युद्ध  महाविद्यालय  प्रशिक्षण आयोजित करते.


🔰रियर ऍडमिरल व्यंकटरमण हे राष्ट्रीय संरक्षण अकादमी खडकवासलाचे माजी विद्यार्थी आहेत. ते कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स युद्ध पद्धतीत तज्ञ आहेत.1 जानेवारी 1990 रोजी सेवेत रुजू झालेल्या व्यंकटरमण यांची भारतीय नौदलाच्या आघाडीच्या युद्धनौकांवर विविध ठिकाणी नियुक्ती झाली आहे.


🔰तयांच्या समुद्रातील कार्यकाळात आय एन एस तबार या विनाशिकेवर त्यांनी काम केले आहे. गोव्यात कार्यभार स्वीकारण्यापूर्वी ते नौदल मुख्यालयातील नौदल गुप्तहेर संचालनालयाचे प्रमुख होते.


🔰सरक्षण व्यवस्थापन महाविद्यालयातून व्यवस्थापन अभ्यासक्रमात संरक्षण आणि रणनितिक अभ्यासक्रमात  पदव्युत्तर पदवीसह अनेक पदव्युत्तर अभ्यासक्रम कार्यक्रम त्यांनी पूर्ण केले आहेत.

ग्रीन कार्ड’वरील बंदीचा निर्णय बायडेन यांच्याकडून रद्द.



🔰अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना साथीच्या काळात अनेक ग्रीन कार्ड अर्जदारांचा अमेरिकेतील प्रवेश रोखला होता, मात्र नवे अध्यक्ष जो बायडेन यांनी ट्रम्प यांचा हा धोरणात्मक निर्णय रद्द केल्याने आता अमेरिकेत एच-१बी व्हिसावर काम करणाऱ्या अनेक भारतीयांना बायडेन यांच्या निर्णयामुळे लाभ होणार आहे.


🔰गरीन कार्ड हे अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्यास मुभा असलेले अधिकृत कार्ड म्हणून ओळखले जाते. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय व्यावसायिक मुख्यत्वे एच-१बी व्हिसा घेऊन अमेरिकेत येतात. मात्र सध्याच्या इमिग्रेशन पद्धतीचा त्यांना मोठा फटका बसत होता.


🔰गरीन कार्ड अर्जदारांना देशात पुन्हा प्रवेश खुला करताना जो बायडेन यांनी म्हटले आहे की, माजी अध्यक्ष ट्रम्प यांच्या धोरणामुळे अमेरिकेच्या हिताची जपणूक होत नव्हती. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकेतील जे उद्योगसमूह जगभरातील गुणवत्तेचा वापर करून घेत होते त्यांचीही हानी होत होती, असेही बायडेन यांनी म्हटले आहे.

लव्ह जिहाद’ विरुद्ध गुजरातमध्ये लवकरच कायदा.



🔰हिंदू मुलींचे अपहरण आणि धर्मातर थांबवण्यासाठी आपले सरकार ‘लव्ह जिहाद’ विरुद्ध कायदा करेल, असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी गुरुवारी एका निवडणूक प्रचार सभेत सांगितले.


🔰राज्य विधानसभेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतचे विधेयक मांडण्याच्या इराद्याचा रुपाणी यांनी पंचमहाल जिल्ह्य़ातील गोध्रा येथे पुनरुच्चार केला. ‘लव्ह जिहाद’ म्हणजे हिंदू महिलांचे विवाहाच्या माध्यमातून धर्मातर करण्याच्या कथित कारस्थानाविरोधात मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातील भाजप सरकारांनी यापूर्वी कायदे केले आहेत.


🔰‘विधानसभेचे अधिवेशन १ मार्चपासून सुरू होत असून, लव्ह जिहादच्या विरोधात कठोर कायदा करण्याची माझ्या सरकारची इच्छा आहे. हिंदू मुलींच्या अपहरणाचे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. महिलांना प्रलोभन दाखवून त्यांचे धर्मातर करण्यात येते. असे प्रकार थांबवणे हा या नव्या कायद्याचा उद्देश आहे’, असे रुपाणी म्हणाले.


🔰राज्यात २८ फेब्रुवारीला होत असलेल्या नगरपालिका, तालुका व जिल्हा पंचायत निवडणुकांसाठी रुपाणी सध्या प्रचार करत आहेत. राज्यातील भाजप सरकार अशा प्रकारचा कायदा करणार असल्याचे त्यांनी १५ फेब्रुवारीला सर्वप्रथम जाहीर केले होते. भाजपचे आमदार शैलेश मेहता व पक्षाचे बडोद्याच्या खासदार रंजनाबेन भट्ट यांनी यापूर्वी उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशच्या धर्तीवर असा कायदा करण्याची मागणी केली होती.

इंधन दरवाढ हे धर्मसंकट; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य.



🔰केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी एका कार्यक्रमामध्ये इंधन दरवाढीसंदर्भात एक भाष्य केलं आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती कधी कमी होतील हे आपल्याला सांगता येणार नाही असं सीतारामन यांनी म्हटलं आहे. तसेच पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किंमती या धर्मसंकट असल्याचेही निर्मला यांनी म्हटलं आहे.


🔰अहमदाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये पेट्रोल, डिझेलच्या किंमती कधी कमी होणार यासंदर्भातील प्रश्नावर, “मला नाही संगता येणार ‘कधी’.. हे धर्मसंकट आहे,” असं उत्तर दिलं.


🔰“यावर केवळ उपकर आकारला जातो असं नाही. केंद्राकडून आकरले जाणारे उत्पादन शुल्क तसेच राज्यांकडून आकारला जाणारा व्हॅटही यामध्ये असतो. त्यामुळे यामधून महसूल मिळतो हे काही लपवण्यासारखी गोष्ट नाही. केवळ मलाच नाही तुम्ही कोणत्याही राज्याला विचारलं तरी यात महसूल आहे असं ते सांगतील,” असंही निर्मला यांनी म्हटलं.


🔰या इंधन दरवाढीवर मार्ग काढण्याचा एकमेव उपाय म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारांनी चर्चा करावी हा आहे, असंही निर्मला यांनी म्हटलं. “यासंदर्भात काहीतरी करणं गरजेचे आहे हे मला मान्य आहे. आम्हाला काय करणं शक्य आहे पाहुयात,” असंही निर्मला यांनी ग्राहकांना अधिक पैसे द्यावे लागू नयेत असं मत मांडताना म्हटलं आहे.

नेपाळचे पंतप्रधान ओली राजीनामा देण्यास अनुत्सुक.



🔰नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली हे लगेच राजीनामा देणार नाहीत, तर येत्या दोन आठवडय़ांत संसदेला सामोरे जाऊन सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करतील, असे ओली यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.


🔰ससदेचे २७५ सदस्यांचे कनिष्ठ सभागृह विसर्जित करण्याचा ओली सरकारचा निर्णय ‘घटनाविरोधी’ असल्याचा निर्णय सरन्यायाधीश चोलेंद्र शमशेर यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापीठाने मंगळवारी दिला होता. येत्या १३ दिवसांच्या आत सभागृहाचे अधिवेशन बोलवावे, असाही आदेश न्यायालयाने ओली यांना दिला होता.


🔰सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षात (एनसीपी) सत्तासंघर्ष सुरू असतानाच, पंतप्रधान ओली यांच्या शिफारशीवरून राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी २० डिसेंबरला ‘प्रतिनिधी सभा’ हे संसदेचे कनिष्ठ सभागृह विसर्जित करून ३० एप्रिल व १० मे रोजी नव्याने निवडणुका घेण्याची घोषणा केली होती. यामुळे देशात राजकीय संकट उद्भवले.


🔰दोन आठवडय़ांच्या आत अधिवेशन होणार असलेल्या संसदेला सामोरे जाऊन, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा ओली यांचा मनोदय आहे, अशी माहिती त्यांचे माध्यम सल्लागार सूर्य थापा यांनी दिली.

जागतिक स्पर्धेची अंतिम फेरी महत्त्वाची.



🔰महान अष्टपैलू कपिलदेव यांच्या १३१ कसोटींचा विक्रम मोडण्याचा अद्याप विचारही केला नसून सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताला पोहोचविण्याचे एकमेव ध्येय माझ्यासमोर आहे, अशी प्रतिक्रिया अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माने व्यक्त केली.


🔰मोटेरा येथील सरदार पटेल स्टेडियमवर भारत-इंग्लंड यांच्यातील गुलाबी चेंडूने खेळल्या जाणाऱ्या प्रकाशझोतातील तिसऱ्या कसोटीला बुधवारपासून प्रारंभ होणार आहे. इशांतच्या कारकीर्दीतील हा १००वा कसोटी सामना असणार आहे.


🔰कपिल यांच्यानंतर १०० कसोटी खेळणारा इशांत हा भारताचा दुसराच वेगवान गोलंदाज ठरणार आहे. त्याशिवाय कपिल यांच्या १३१ कसोटींचा विक्रम मोडण्याचीही संधी इशांतला आहे. याविषयी इशांत म्हणाला, ‘‘कपिल यांच्या विक्रमाविषयी मी अद्याप विचारही केलेला नाही. भारतासाठी १००वी कसोटी खेळण्याची संधी मिळणे, हीच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. सध्या मी ३२ वर्षांचा असून एकाच प्रकारात भारतासाठी खेळत असल्याने तंदुरुस्ती टिकवण्याबरोबरच जोपर्यंत स्वत:चे १०० टक्के योगदान देऊ शकेन, तोपर्यंत निवृत्तीचाही विचार करणार नाही.’’


🔰‘‘जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका फार महत्त्वपूर्ण असल्याने मी सध्या भारताला कशाप्रकारे जिंकवता येईल, याचाच विचार करत आहे. कारकीर्दीत मी एकदाही विश्वचषक खेळलो नाही. त्यामुळे आम्ही जर जागतिक स्पर्धा जिंकली, तर अन्य खेळाडू ज्याप्रमाणे विश्वचषक विजयाचा जल्लोष करतात त्याचप्रमाणे मीसुद्धा या जेतेपदाचा आनंद साजरा करेन,’’ असेही इशांतने सांगितले.

संरक्षण उत्पादन क्षमता वाढवण्यास भारत वचनबद्ध.


🔰भारताला पूर्वीच्या काळापासून शस्त्रे व लष्करी साधने बनवण्याचा अनुभव होता. स्वातंत्र्यानंतर देशाला ही क्षमता वाढवता आली नाही. परंतु आता आम्ही संरक्षण उत्पादन क्षमता वाढवण्यास वचनबद्ध आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.


🔰कद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींची योग्य अंमलबजावणी करण्याबाबतच्या एका वेबिनारमध्ये ते बोलत होते. सरकारला देश संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याची अपेक्षा आहे. स्वातंत्र्यापूर्वी आपल्याकडे शस्त्रे व लष्करी सामग्री निर्मितीच्या क्षमता होत्या.


🔰जागतिक महायुद्धांमध्येही भारताने मोठय़ा प्रमाणात शस्त्रांची निर्यात केली होती, पण स्वातंत्र्यानंतर अनेक कारणांनी संरक्षण उत्पादन क्षमतेत भारत मागे पडत गेला. आपल्याला अगदी लहान शस्त्रेही परदेशांकडून विकत घेण्याची वेळ आली. भारत हा शस्त्रांचा मोठा आयातदार देश बनला, पण ही अभिमानाची बाब नाही. भारतातील लोकांकडे संरक्षण उत्पादनाची क्षमता नाही असा भाग नाही, ते वाढवता येऊ शकते पण आधीच्या काळात शस्त्रांची आयात करण्यात आली.


🔰भारतात आता परिस्थिती बदलत असून संरक्षण सामग्री उत्पादन वाढवण्यास सरकार वचनबद्ध आहे. निर्यात उत्तेजन, परदेशी गुंतवणूक उदारीकरण याच्या माध्यमातून सरकारने संरक्षण उत्पादन वाढीस चालना दिली आहे. संरक्षणप्रमुख पद निर्माण करून भारताने संरक्षण उत्पादन खरेदी प्रक्रियेत समन्वय साधला आहे. त्यामुळे आता नवीन संरक्षण शस्त्र सामुग्रीची निर्मिती शक्य झाली आहे.

ब्रिक्स’ यजमानपदासाठी भारताला चीनचा पाठिंबा.



🔰ब्रिक्स शिखर परिषदेचे या वर्षीचे यजमानपद भारताने स्वीकारण्यास चीनने पाठिंबा दर्शविला असून पाच सदस्य असलेल्या देशांमधील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी भारतासमवेत काम करण्याची तयारीही दर्शविली आहे. पूर्व लडाखमधून भारत आणि चीन यांनी आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केल्यानंतर चीनने भारताला पाठिंबा दर्शविला आहे.


🔰भारताने २०२१ च्या ब्रिक्स शिखर परिषदेचे (ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका) अध्यक्षपद स्वीकारण्याचे गृहीत धरले असून त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी १९ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या सुषमा स्वराज भवनातील ब्रिक्स सचिवालयात भारताचे ब्रिक्स २०२१ संकेतस्थळ सुरू केले.


🔰यावर्षीच्या ब्रिक्स परिषदेचे यजमानपद भारताने स्वीकारण्याचे ठरविले आहे त्या बाबत विचारले असता चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी, भारताने ब्रिक्सचे यजमानपद स्वीकारण्यास चीनचा पाठिंबा असल्याचे, सांगितले.


🔰बरिक्स हा आता आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये सकारात्मक, स्थिर आणि रचनात्मक शक्ती आहे, असे ते म्हणाले. मात्र, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग शिखर परिषदेला उपस्थिती राहणार आहेत का, त्याबाबत वांग यांनी कोणतेही भाष्य केले नाही.

सर्वच भरती प्रक्रिया लोकसेवा आयोगामार्फत राबविण्याचा सरकारचा विचार



महाराष्ट्रातील विविध विभागातील रखडलेल्या नोकरभरती संदर्भात मोठी अपडेट समोर आली असून केवळ क्लासवन अधिकारीच नाही तर चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या नोकरभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत मार्फत घेण्याचा विचार राज्य सरकार करत असून यासाठी राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी यासंदर्भात विविध विभागांच्या सचिवांची बैठक बोलविली आहे.


सध्या आयोगामार्फत वर्ग एक आणि वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांचीच निवड केली जाते तर अराजपत्रित ब, क आणि ड संवर्गातील पदांची भरती दुय्यम सेवा निवड मंडळांमार्फत केली जात असून यापुढे ही भरती निवड मंडळांऐवजी  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याचा सरकाराच प्रस्ताव विचाराधीन असून कोणत्या संवर्गांची नोकरभरती आयोगामार्फत करता येईल, याची चाचपणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले असून त्या अनुषंगानेच फेब्रुवारी महिन्यातच मुख्य सचिव सदरील बैठक घेणार आहेत.


यापूर्वी दुय्यम सेवा निवड मंडळाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी वा विभागीय आयुक्त हे असतात आणि या दुय्यम निवड मंडळाला भरती प्रक्रियेत साहाय्य करण्यासाठी अलीकडेच तीन कंपन्यांची नव्याने नियुक्ती सामान्य प्रशासन विभागाने केली असली तरी मात्र विश्वासार्हता आणि पारदर्शकतेसाठी दुय्यम सेवा मंडळाच्या अखत्यारीतील निवड प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे समजते.

वन सर्वेक्षण अहवालातील महत्वाच्या बाबी



सर्वाधिक बांबू क्षेत्र असलेली पहिली चार राज्ये

             

               1. मध्य प्रदेश

               2.महाराष्ट्र

               3.अरुणाचल प्रदेश

               4. ओडिसा


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


कांदळवन क्षेत्र (mangrove cover) सर्वाधिक असलेली राज्ये


              1.पश्चिम बंगाल

              2.गुजरात

              3.अंदमान व निकोबार बेटे

              4.आंध्र प्रदेश

              5.महाराष्ट्र


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


कार्बन साठा सर्वाधिक असलेली राज्ये


               1. अरुणाचल प्रदेश

               2. मध्य प्रदेश

               3. छत्तीसगड

               4.महाराष्ट्र


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


सर्वाधिक वनक्षेत्र (क्षेत्रफळानुसार) असलेली राज्ये


              1. मध्य प्रदेश

              2.आंध्र प्रदेश

              3. छत्तीसगड

              4.ओडिसा

              5.महाराष्ट्र


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


सर्वाधिक वनक्षेत्र ( टक्केवारी नुसार) असलेली राज्ये


             1.मिझोराम

             2.अरुणाचल प्रदेश

             3.मेघालय




🔥 सर्वाधिक वेळा मिझोराम राज्यात वणवे निदर्शनास आले.(forest fire alert)

राज्य आणि राज्यसभा सदस्य संख्या


𝟏. अरूणाचल प्रदेश(𝐀𝐑 ) 𝟏              


 𝟐. आसाम (𝐀𝐒 ) 𝟕                             


 𝟑. आंध्र प्रदेश(𝐀𝐏 ) 𝟏𝟏                     


 𝟒. उत्तर प्रदेश(𝐔𝐏 ) 𝟑𝟏                     


 𝟓. उत्तराखंड(𝐔𝐓𝐊 ) 𝟑                     


 𝟔. ओडिशा(𝐎𝐑 ) 𝟏𝟎                        


 𝟕. कर्नाटक(𝐊𝐀𝐑 ) 𝟏𝟐                     


 𝟖. केरल(𝐊𝐑 ) 𝟗                              


 𝟗. गुजरात(𝐆𝐉 ) 𝟏𝟏                        


 𝟏𝟎. गोवा(𝐆𝐎𝐀 ) 𝟏                        


 𝟏𝟏. छत्तीसगढ़(𝐂𝐇𝐓 ) 𝟓                 


 𝟏𝟐. जम्मू-कश्मीर(𝐉 & 𝐊 ) 𝟒            


 𝟏𝟑. झारखंड(𝐉𝐇𝐊 ) 𝟔                   


 𝟏𝟒. तमिलनाडु(𝐓𝐍 ) 𝟏𝟖                 


 𝟏𝟓. त्रिपुरा(𝐓𝐑 ) 𝟏                         


 𝟏𝟔. तेलंगाना(𝐓𝐆 ) 𝟕                      


 𝟏𝟕. नागालैंड(𝐍𝐆 ) 𝟏                     


 𝟏𝟖. निर्वाचित सदस्य (𝐍𝐎𝐌. ) 𝟏𝟐               


💥 𝙎𝙃𝘼𝙍𝙀 & 𝙎𝙐𝙋𝙋𝙊𝙍𝙏 💥


 𝟏𝟗. पंजाब(𝐏𝐁 ) 𝟕                         


 𝟐𝟎. पुडुचेरी(𝐏𝐔𝐃 ) 𝟏                     


 𝟐𝟏. पश्चिमी बंगाल(𝐖𝐁 ) 𝟏𝟔            


 𝟐𝟐. बिहार(𝐁𝐑 ) 𝟏𝟔                       


 𝟐𝟑. मेघालय(𝐌𝐆𝐇 ) 𝟏                  


 𝟐𝟒. मणिपुर(𝐌𝐍 ) 𝟏                      


 𝟐𝟓. मध्य प्रदेश(𝐌𝐏 ) 𝟏𝟏                


 𝟐𝟔. महाराष्ट्र(𝐌𝐇 ) 𝟏𝟗                   


 𝟐𝟕. मिज़ोरम(𝐌𝐙 ) 𝟏                     


 𝟐𝟖. राजस्थान(𝐑𝐉 ) 𝟏𝟎                   


 𝟐𝟗. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र,दिल्ली(𝐃𝐋 ) 𝟑

 

𝟑𝟎. सिक्किम(𝐒𝐊 ) 𝟏                     


 𝟑𝟏. हरियाणा(𝐇𝐑 ) 𝟓                     


 𝟑𝟐. हिमाचल प्रदेश(𝐇𝐏 ) 𝟑


Total - 245 ✔️

चंद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी



◾️23 जुलै 1906 ते  27 फेब्रुवारी 1931


 ◾️ राम प्रसाद बिस्मिल च्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) या क्रांतिकारी संघटनेची हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली.


◾️ तयांना भगत सिंग यांचे गुरू मानले जाते व ते HSRA चे प्रमुख होते.


◾️सघटना:- कीर्ति किसान पार्टी, नवजवान किसान सभा


◾️1921 मध्ये म. गांधींच्या असहकार आंदोलनात 15 व्या वर्षी चंद्रशेखरने सहभाग घेतला होता. 


◾️तयासाठी त्याला अटक झाली होती. तेव्हा न्यायालयात चंद्रशेखरने आपले आडनाव 'आझाद' असल्याचे नोंदवले


◾️सायमन कमिनला विरोधादरम्यान लाठीहल्यात लाला लजपतराय यांचे निधन


◾️बदला म्हणुन लाहोर चा SP जेम्स स्कॉट ला मारण्याचा कट रचला


◾️या कटात भगतसिंग, जय गोपाल, राजगुरु, आझात होते


◾️जम्स स्कॉट एेवजी सॉंडर्स हा

 अधिकारी मारला गेला


◾️वशांतर करुन राजकोट मार्गे इलाहाबाद येथे दाखल झाले


◾️27 फेब 1931 रोजी अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्क येथे चंद्रशेखर आझाद व पोलिसांमध्ये गोळीबार झाला.

शेवटी स्वत:वर गोळी मारुन घेतली

२७ फेब्रुवारी - कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती


जन्म - २७ फेब्रुवारी १९१२ (पुणे)

स्मृती - १० मार्च १९९९ (नाशिक)


"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन्‌ आशा किनारा तुला पामराला' असे स्पष्टपणे सांगणारी अजरामर कविता लिहिणाऱ्या कविवर्य कुसुमाग्रजांची आज जयंती.


वि.वा.शिरवाडकर हे कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन करत. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्नवं असे त्यांचे वर्णन करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. 


कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस हा "मराठी भाषा दिवस" म्हणून साजरा केला जातो. मराठी साहित्यातील काव्य, कथा, नाटक या सर्व प्रकारात वैपुल्याने भर घालणाऱ्या आणि आपला ठसा उमटविणाऱ्या कुसुमाग्रजांचे मराठी कवितेत एक अढळ स्थान आहे. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. 


कुसुमाग्रज यांचे वडील शेतकरी होते. नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर सोबत, स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. 


कुसुमाग्रजांनी उठा उठा चिऊताई सारख्या किलबिल कविता लिहिल्या तशाच पृथ्वीचे प्रेमगीत सारख्या गहन कविताही लिहिल्या. ’काढ सखे गळ्यातले’ सारखे लडिवाळ शब्दही त्यांचे आणि ’जे भुक्त त्यांची राहते पोटात सारी संस्कृती’ हे स्पष्टोक्तीचे परखड बोलही त्यांचेच. 


या महान साहित्यिकाचा काव्यव्यासंग अथांग असला तरीही कुसुमाग्रजांचे नाव घेताच डोळ्यापुढे उभा राहतो तो एक ओजस्वी क्रांतिकवी आणि कानी ऐकू येतो गगनभेदी जयघोष, ’गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’. कवी कुसुमाग्रज हे खऱ्या अर्थाने ’क्रांतिकवी’. वयाच्या अवघ्या विशीत कुसुमाग्रजांनी अनेक तेजस्वी क्रांतिकाव्ये लिहिली. 


हुतात्मा चंद्रशेखर आझाद, हुतात्मा भगतसिंह, हुतात्मा राजगुरू, हुतात्मा सुखदेव,  हुतात्मा महावीरसिंह या सारखे महात्मे आपले दिव्य करून गेले. क्रांतिकारकारकांच्या बलिदानाची महती गाणारी क्रांतिगीते कुसुमाग्रजांनी लिहिली आणि त्या महात्म्यांची ध्येयगाथा जगाला सांगितली. जे काही ते क्रांतिकारक स्वतः सांगू शकले नव्हते मात्र करून गेले होते ते महान कार्य या क्रांतिकवीने घराघरात व मुखामुखात पोचवले. 


कुसुमाग्रजांचे विशाखा, समिधा, किनारा, हिमरेषा, मराठी माती, वादळवेल, रसयात्रा, छंदोमयी यासारखे कवितासंग्रह आणि नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, कौतेंय या सारख्या नाट्यकृतींचा अभ्यास अजूनही होत आहे. 


‘गर्जा जयजयकार’ सारखी कविता लिहून क्रांतिवीरांना स्फुरण देणाऱ्या कुसुमाग्रजांनी ‘काढ सखे गळ्यातले, चांदण्याचे तुझे हात’ सारखी कविताही लिहिली. ‘नटसम्राट’ मधून नाट्यरसिकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या आणि ‘कल्पनेच्या तीरावर’ सारख्या कादबंरीतून त्यांना खळखळून हसायलाही लावले. 


मा.कुसुमाग्रज यांचे १० मार्च १९९९ रोजी निधन झाले. 


मा.कुसुमाग्रज यांना आदरांजली !

बरिक्स देशांच्या गटाचे नेतृत्व या वर्षी भारताकडे.



🌞 ब्रिक्स देशांच्या गटाचे नेतृत्व या वर्षी भारताकडे असून तीन दिवसांच्या शेरपा बैठ्कीद्वारे भारताच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ आज सुरू झाला. 


🌞 पारपत्र आणि व्हिसा विभागाच्या सचिवांनी बैठकीचे अध्यक्षपद भूषवताना आगामी वर्षासाठीच्या कामांचा आराखडा सादर केला.


🌞 पढच्या दोन दिवसांमध्येही या बैठकीत सदस्य देशांबरोबर उपयुक्त चर्चा होईल, असं विश्वास परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले. 


🌞 बरिक्स हा गट जगभरात प्रभावी ठरत असून तो आणखी वाढवण्यासाठी यजमान असलेला भारत करणार असलेल्या प्रयत्नांना चीनचा पाठींबा असेल, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेनबिन यांनी म्हटलं आहे. 


🌞 चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे भारतात वर्षाच्या अखेरीस आयोजित होणाऱ्या ब्रिक्स परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

भारतीय निवडणूक आयोग



● स्थापना :- २५ जानेवारी १९५०

● मुख्यालय :- नवी दिल्ली

● मुख्यनिवडणूक आयुक्तांची निवड :- 

    राष्ट्रपती - सूनिल अरोरा

● हेल्पलाईन क्रमांक :- १९५०

● स्लोग्न :- देश का महा त्योहार

● पोर्टल :- eci.gov.in

● राज्यघटना भाग :- १५

● कलम :- 324

● आयोग संबधित कलम :- 

   ३२४ - ३२९

● ७३ वी घटना दुरुस्ती :- राज्य निवडणूक 

   आयोगाची स्थापना

● निवडणूक आयोगाची कामे :-

०१) मतदारसंघ आखणे

०२) मतदारयादी तयार करणे

०३) राजकीय पक्षांना मान्यता देणे 

       निवडणूक चिन्हे ठरवणे

०४) उमेदवारपत्रिका तपासणे

०५) निवडणुका पार पाडणे

०६) उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा 

       ताळमेळ लावणे

◆ ६१ वी घटना दुरुस्ती :- १९८८ , 

    मतदार वय २१ वरून १८ करण्यात 

   आले.

◆ अन्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक - 

     राष्ट्रपती - ३२४ (२) - या दोन 

     निवडणूक आयुक्तांना पदावरून 

     काढण्या साठी महाभियोग 

     चालवण्यात येत नाही.

◆ आयोग घटनात्मक, स्थायी, स्वायत्व

नोबेल पुरस्कार २०१९ विजेते



🏆 वद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार २०१९

👤 १) विलियम कैलीन (अमेरिका)

👤 २) ग्रेग सीमेंजा (अमेरिका)

👤 ३) पीटर रैटक्लिफ (ब्रिटन)


🏆 भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार २०१९

👤 १) जेम्स पीबल्स (अमेरिका)

👤 २) माइकल मेयर (स्वित्झर्लंड)

👤 ३) डिडियर क्वेलोज (स्वित्झर्लंड)


🏆 रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०१९ 

👤 १) जॉन बी गुडइनफ (अमेरिका)

👤 २) एम स्टेनली व्हिटिंगम (ब्रिटन)

👤 ३) अकीरा योशिनो (जपान)


🏆 साहित्यातील नोबेल पुरस्कार २०१९

🙎‍♀ १) ओल्गा टोकार्चुक (२०१८) : पोलंड

👤 २) पीटर हैंडका (२०१९) : ऑस्ट्रीया


🏆 शांततेतील नोबेल पुरस्कार २०१९

👤 १) एबे अहमद अली (प्रधानमंत्री : इथिओपिया)


🏆 अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०१९

👤 १) अभिजीत बैनर्जी (अमेरिका)

👤 २) माइकल क्रेमर (अमेरिका)

🙎‍♀ ३) एस्थर डुफ्लो (अमेरिका) .



 नोबेल पुरस्कार २०२० विजेते 👇


🏆 वद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार २०२० 

👤 १) हार्वे अल्टर (अमेरिका)

👤 २) मायकल होउगटन (ब्रिटन)

👤 ३) चार्ल्स राइस (अमेरिका)


🏆 भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०

👤 १) रॉजर पेनरोज (ब्रिटन)

👤 २) रेनहार्ड गेंजेल (जर्मनी)

🙎‍♀ ३) अॅण्ड्रीया गेज (अमेरिका)


🏆 रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२० 

🙎‍♀ १) इमॅन्यूअल शार्पेंची (जर्मनी)

🙎‍♀ २) जेनफिर डाउडना (अमेरिका)


🏆 साहित्यातील नोबेल पुरस्कार २०२० 

🙎‍♀ १) लुईस ग्लुक ( अमेरिका )


🏆 शांततेतील नोबेल पुरस्कार २०२० 

🌾 १) संयुक्त राष्ट्र अन्न सुरक्षा कार्यक्रम


🏆 अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०

👤 १) पॉल आर. मिलग्रोम (अमेरिका)

👤 २) रॉबर्ट बी. विल्सन (अमेरिका)

Friday 26 February 2021

जगातील महत्त्वाचे वाळवंट


👉 वाळवंट: वाळवंट म्हणजे लँडस्केपचा एक वांझ प्रदेश आहे जेथे पाऊस कमी पडतो आणि यामुळे, वनस्पती आणि प्राणी जीवनासाठी जगण्याची परिस्थिती प्रतिकूल असते.


🌐 1. खंड: अंटार्क्टिका


वाळवंट नाव: अंटार्टिक


🌐 2. खंड: आशिया, युरोप, उत्तर अमेरिका


वाळवंट नाव: आर्क्टिक वाळवंट


🌐 3. खंड: आशिया


वाळवंट नाव: कराकुम, थर वाळवंट, किझिलकुम, तकलामकण, अरबी, दष्ट-ए-कावीर, दशात-ए लुत, गोबी वाळवंट


🌐  4. खंड: आफ्रिका


वाळवंट नाव: कलहरी, नामिब, सहारा,


🌐 5. खंड: ऑस्ट्रेलिया


वाळवंट नाव: गिब्सन, ग्रेट सॅंडी, ग्रेट व्हिक्टोरिया, सिम्पसन, तनामी


🌐 6. खंड: युरोप


वाळवंट नाव: टॅबर्नस वाळवंट


🌐  7. खंड: उत्तर अमेरिका


वाळवंट नाव: ग्रेट बेसिन, मोजावे, सोनोरन


🌐  8. खंड: दक्षिण अमेरिका


वाळवंट नाव: एटाकामा, पॅटागोनियन

पहिल्या ४० तेजसमध्ये इस्रायली बनावटीचे रडार आहेत



🎓वल डन DRDO! ‘तेजस’ फायटर जेटमध्ये देशी ‘उत्तम’ रडार


स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाला बळकटी देणारी एक चांगली बातमी आहे. पुढच्या काही काळात इंडियन एअर फोर्समध्ये *१२३ 'तेजस' फायटर _विमानांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यातील ५_१ _टक्के 'तेजस'मध्ये स्वदेशी बनावटीची 'उत्तम' रडार यंत्रणा असेल. आधी निर्मिती करण्यात आलेल्या काही_ '_तेजस'मधील इस्रायली रडारच्या जागी, ही_ '_उत्तम' रडार यंत्रणा बसवण्यात येई_ल.


🌞इडियन एअर फोर्सला १२३ 'तेजस' फायटर जेट मिळणार आहे. त्यात ४० विमाने फायनल ऑपरेशनल क्लियरन्समध्ये आहेत. ८३ तेजस मार्क-१ए साठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयात ऑर्डर देण्यात आली आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमानांचे उत्पादन करत आहे. पहिल्या ४० तेजसमध्ये इस्रायली बनावटीचे रडार आहेत तर, ८३ तेजस मार्क-१ए AESA रडार यंत्रणा असेल.

"तेजस मार्क-१ए मध्ये उत्तम रडार यंत्रणा असेल. आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये उत्तमने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. HAL बरोबर आम्ही सामंजस्य करार केला आहे" असे डीआरडीओचे अध्यक्ष सतीश रेड्डी यांनी सांगतिले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. ८३ पैकी ६३ तेजस विमानात उत्तम रडार यंत्रणा असेल.


🌞डीआरडीओच्या बंगळुरुमधील LRDE प्रयोगशाळेने हे रडा*र विकसित केलेय. मोदी सरकार संरक्षण क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञान निर्मितीवर भर देत आहे. उत्तम रडारमुळे तेजसमध्ये स्वदेशी घटकांचे प्रमाण वाढणार आहे. तेजसच्या निर्मितीमध्ये ६२ ते ६५ टक्के स्वदेशी घटक वापरण्याचा HAL चा प्रयत्न आहे. उत्तम रडारमुळे HAL ला त्यांच्या उद्दिष्टात मदत होणार आहे. उत्तम रडारमध्ये एकाचवेळी वेगवेगळया लक्ष्यांना शोधण्याची तसेच उच्चप्रतीचे फोटो काढण्याची क्षमता आहे.

अवकाशात चीनशी ‘सामना’, भारताच्या DSA ने सुरु केलं ‘स्टार वॉर्स’ टेक्नोलॉजीवर काम.



👉सरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. दिवसेंदिवस डिफेन्स टेक्नोलॉजी अत्याधुनिक बनत चालली आहे. भविष्यात पारंपारिक युद्धाचे स्वरुप बदलणार असून अवकाशातून हे युद्ध लढले जाईल. त्या दृष्टीने भारताने आता स्वत:ला समर्थ बनवण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु केली आहे.


👉दोन वर्षांपूर्वी भारताने ‘मिशन शक्ती’च्या माध्यमातून जगाला आपल्याकडे असलेल्या उपग्रह विरोधी टेक्नोलॉजीची चुणूक दाखवली. वातावरणाच्या पलीकडे अवकाशातील उपग्रह सुद्धा आम्ही पाडू शकतो, हे भारताने या चाचणीतून दाखवून दिले. त्यापुढे जात आता भारताने डिफेन्स स्पेस एजन्सी स्थापन केली आहे. अवकाशातून धोका निर्माण झाल्यास, त्याचा सामना कसा करायचा, त्यासाठी नवीन टेक्नोलॉजीचा शोध घेण्यास डिफेन्स स्पेस एजन्सीने सुरुवात केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.


👉शत्रूपासून अवकाशातील आपली संपत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी स्वत:ला समर्थ बनवणे, हे DSA चे मुख्य लक्ष्य असणार आहे. प्रामुख्याने ही संस्था त्यासाठीच काम करेल. डीएसएने स्पेस सिच्युएशनल अवरेनेस म्हणजेच SSA च्या टेक्नोलॉजीसाठी वेगवेगळया कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले आहेत. यात अवकाशात आपल्यावर होणाऱ्या हल्ल्याची आगाऊ कल्पना देण्याबरोबरच शत्रुची अवकाशातील संपत्ती शोधून त्याचा माग काढण्याची टेक्नोलॉजी या SSA मध्ये असेल.

ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले उठाव



संन्याशाचा उठाव :  1765-1800 - बंगाल शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक

 

चुआरांचा उठाव : 1768 - बंगाल-मिजापूर जिल्हा जगन्नाथ घाला

 

हो जमातीचे बंड : 1820 - छोटा नागपूर व सिंगभूम

 

जमिनदारांचा उठाव : 1803 - ओडिशा जगबंधू

 

खोंडांचा उठाव : 1836 - पर्वतीय प्रदेश दोरा बिसाई

 

संथाळांचा उठाव : 1855 - कान्हू व सिंधू

 

खासींचा उठाव : 1824 - आसाम निरतसिंग

 

कुंकिंचा उठाव : 1826 - मणिपूर

 

🔹दक्षिण भारतातील उठाव  -


पाळेगारांचा उठाव : 1790 - मद्रास

 

म्हैसूरमधील शेतकर्‍यांचा उठाव : 1830 - म्हैसूर

 

विजयनगरचा उठाव : 1765 - विजयनगर

 

गोरखपूरच्या जमिनदारांचा उठाव : 1870 - गोरखपूर

 

रोहिलखंडातील उठाव : 1801 - रोहिलखंड

 

रामोश्यांचा उठाव : 1826 - महाराष्ट्र उमाजी नाईक व बापू त्र्यंबकजी सावंत

 

भिल्ल व कोळ्यांचा उठाव : 1824

 

केतूरच्या देसाईचा उठाव : 1824 - केतूर

 

फोंडा सावंतचा उठाव : 1838


भिल्लाचा उठाव : 1825- खानदेश

 

दख्खनचे दंगे : 1875- पुणे,सातारा,महाराष्ट्र शेतकरी

भारतातील पहिला समुद्राखालून बोगदा मुंबईत तयार केला जाणार.


🔥मबई महापालिकेच्या सागरी किनारा मार्गासाठी दोन महाबोगदे खणले जात आहे. अरबी समुद्राखालून 400 मीटरचे बोगदे तयार करण्यात येणार आहेत. हे बोगदे देशातील सर्वाधिक रुंदीचे बोगदे ठरणार आहेत.


🦋ठळक बाबी...


🔥कोस्टल रोडचा मार्ग गिरगाव चौपाटीखालून म्हणजे समुद्राखालून जाणार आहे. चौपाटीखाली दोन महाबोगदे तयार करण्यात येणार आहे.


🔥वांद्रे-वरळी सी-लिंकलाच पुढे जोडणारा हा मार्ग असेल, अशी संकल्पना होती. परंतु मुंबईत क्षितीज म्हणजे सी-लिंक अशी ओळख भविष्यात होऊ नये यासाठी हा मार्ग भुयारी पद्धतीने तयार करण्याचा निर्णय घेतला.


🔥दक्षिण मुंबईतील मरिन ड्राइव्ह ते उत्तर मुंबईत बोरीवलीपर्यंत कोस्टल रोडचा संपूर्ण प्रकल्प आहे. संपूर्ण प्रकल्प जुलै 2023 पर्यंत पूर्णत्वास येईल असा अंदाज आहे.


🔥बोगदा तयार करणाऱ्या यंत्राला 'मावळा' असे नाव देण्यात आले आहे. मरीन लाइन्स ते प्रियदर्शनी पार्कपर्यंत 1920 मीटर लांबीचे दोन बोगदे 'मावळा' यंत्रामधून तयार केले जाणार आहेत.

कोस्टल रोडची वैशिष्ट्य


🔥साडे सहा किलोमीटरचे बोगदे

आठ पदरी मार्ग, मार्गावर 4 इंटरचेंज

सिग्नल फ्री मार्ग.34 टक्के इंधनाची बचत होणार.L1650 वाहन पार्किंगची सोय.

माल आणण्यासाठी दोन जेट्टी उभारणार.

पुरपरिस्थितीमध्ये देखील हा मार्ग वापरता येणार.

घारापुरी लेणी - एलिफंटा लेणी


◾️ एलिफंटा लेण्यांच्या निर्मितीचा काळ हा साधारण इसवी सन ९०० ते १३००च्या दरम्यान असावा असा अंदाज आहे.


◾️ एका अखंड पाषाणात ही लेणी कोरण्यात आली आहेत. ज्या काळी पाश्चात्त्य देशांमध्ये मानवी वसाहतीचा मागमूससुद्धा नव्हता त्याकाळी आपल्या भारतीय पूर्वजांनी इतक्या दुर्गम भागात इतकी अफाट कलाकृती निर्माण केला याला कुठेच तोड नाही.


◾️या गावाचे प्राचीन नाव श्रीपुरी असे होते.


◾️कोकणातल्या मौर्य वंशाची घारापुरी ही राजधानीअसावीत्यानंतर चालुक्य, राष्ट्रकूट , यादव नि मोगल यांनी तिथे क्रमाने आपली सत्ता प्रस्थापित केली.सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले.


◾️शिवाजी महाराजांच्या काळात ते मराठ्यांनी हस्तगत केले नि सन १७७४ मध्ये त्यावर इंग्रजांनी आपले प्रभुत्व स्थापले


◾️  १९८७साली या लेण्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला गेला. 


◾️घारापूरी लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे प्रचंड आकाराचे एक शिल्प होते, त्यावरूनच या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले. 

वहर्नाक्युलर प्रेस ऍक्ट 1878



◾️वहॉइसरॉय:-लॉर्ड लिटन


◾️शीर्षक:-पौव्रात्य भाषांमधील प्रकाशनाच्या अधिक चांगल्या नियंत्रण साठी कायदा


♦️अटी


◾️जिल्हा मॅजिस्ट्रेट ला प्रिंटर व प्रकाशक सोबत बातम्या बाबत करार करता येत असत.


◾️मजिस्ट्रेट ला जामीन मागण्याची संमती देण्यात आली.


◾️जामीन जप्त करण्याचा अधिकार मॅजिस्ट्रेट ला दिला गेला.


◾️गन्हा दुसऱ्यांदा केला तर छापखाना साहित्य जप्त केले जाईल.


◾️मजिस्ट्रेट च्या कृती विरुद्ध कोणत्याही न्यायालयात अपील करता येणार नाही.


◾️दशी वृत्तपत्र यांनी मजकूर प्रूफ सादर केली तर कायद्यातून सुटका मिळेल


◾️अशी बंधने इंग्रजी वृत्तपत्र ला टाकण्यात आली नाही.


पुद्दुचेरीत राष्ट्रपती राजवट लागू; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी:-



📚पद्दुचेरीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पुद्दुचेरीमधील काँग्रेस सरकार  विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाण्यापूर्वीच कोसळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.


📚 विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. मात्र अल्पमतात असणारं मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी सरकार ठरावला सामोरं जाण्याआधीच कोसळलं.


📚काँग्रेस आणि द्रमुकच्या प्रत्येकी एक आमदाराच्या राजीनाम्याने ३३ सदस्य असलेल्या विधानसभेत सत्तारुढ काँग्रेस आघाडीचं संख्याबळ ११ पर्यंत घसरलं होतं. विरोधी आघाडीकडे १४ सदस्य, तर सात जागा रिक्त आहेत. यामुळे नारायणस्वामी यांच्या सरकारवर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली होती. पण विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्द न करता आल्याने काँग्रेसचं सरकार कोसळलं.


📚नारायणसामी सरकारचा ११ विरुद्ध ११ अशा मतांनी पराभव झाला. बहुमत ठराव सादर करण्यासाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. अधिवेशन सुरु होताच नारायणसामी यांनी बहुमतासाठी प्रस्ताव मांडला होता. पण काही वेळातच त्यांच्यासहित सत्ताधारी आमदारांनी सभात्याग केला.


📚 यानंतर अध्यक्षांनी काँग्रेस सरकार अल्पमतात असल्याचं जाहीर केलं. यानंतर मुख्यमंत्री नारायणसामी यांनी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा सोपवला

सरदार पटेल स्टेडियमचं नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम



◾️ जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असे अशी ओळख असलेल्या गुजरातच्या मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावं देण्यात आलं आहे. 


◾️ सटेडियमचं नामकरणं नरेंद्र मोदी स्टेडियम असं करण्यात आलं आहे. 


◾️ अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. 


◾️सामना खेळवण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं. 


◾️24 फेब्रुवारी 2020 रोजी याच स्टेडियममध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यानिमित्ताने नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. होतं. 


◾️मोटेरा स्टेडियमध्ये सर्व अत्याधुनिक प्रकारच्या सेवा उपलब्ध असून, 


◾️ या स्टेडियम आसन क्षमता 1 लाख 32 हजार इतकी झाली आहे.


गोंडी भाषेतून शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा गडचिरोलीत



 शाळेत रूक्ता उसेंडी ही विज्ञान, राजकुमारी कोराम ही कला शाखेतील पदवीधर तथा रिना आतला ही  विद्यार्थ्यांना गोंडी भाषेचे धडे जिल्ह्यतील शिक्षण क्षेत्रात एक ऐतिहासिक गोष्ट घडून आली आहे.


धानोरा तालुक्यातील मोहगाव येथे ग्रामसभेला प्राप्त अधिकारांचा वापर करून गोंडी भाषेतून शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा सुरू करण्यात आली आहे.


अंगणवाडी स्तरावरील १५ विद्यार्थ्यांची ही शाळा गोंडी बोलीतून आदिवासी विद्यार्थ्यांना गोटूलचे पारंपरिक संस्कार व शिक्षण देणारे केंद्र ठरणार आहे. शाळेत रूक्ता उसेंडी ही विज्ञान, राजकुमारी कोराम ही कला शाखेतील पदवीधर तथा रिना आतला ही विद्यार्थ्यांना गोंडी भाषेचे धडे देणार आहे. ‘पारंपरिक कोया ज्ञानबोध संस्कार गोटुल’ या नावाने धानोरा तालुक्यातील मोहगाव येथे संविधानाच्या पाचव्या अनुसूचीतील २४४ (१), ३५० (क) आणि १३ (३) (क) या कलमांमधील तरतुदीनुसार ग्रामसभेला प्राप्त अधिकारान्वये ही शाळा सुरू करण्यात आली.

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम: जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान



राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अहमदाबाद येथील मोटेरातल्या “नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम”चे उद्घाटन करण्यात आले. ते जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान आहे.


अहमदाबादचे मैदान आधी ‘मोटेरा स्टेडियम’ या नावाने ओळखले जात होते. संपूर्ण नूतनीकरणानंतर त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्याचा निर्णय गुजरात क्रिकेट असोसिएशनने घेतला.


▪️ठळक वैशिष्ट्ये


या मैदानामध्ये 1 लक्ष 32 हजार प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था आहे.

या मैदानामध्ये सहा लाल मातीच्या आणि पाच काळ्या मातीच्या अशा अकरा खेळपट्ट्या आहेत. 


मैदानामध्ये सॉइल ड्रेनेज सिस्टिम आहे. त्यामुळे पाऊस पडल्यास 30 मिनिटांच्या आत पाणी सुकून जाईल. त्यामुळे सामना रद्द करण्याची वेळ नव्या व्यवस्थेमुळे येणार नाही.


मैदानामध्ये 55 खोल्यांचा एक क्लब आहे. तसेच स्टेडियममध्ये 75 वातानुकूलित कॉर्पोरेट बॉक्स आहेत.


मैदानाच्या परिसरात तीन हजार कार आणि दहा हजार दुचाकीच्या पार्किंगसाठी विशेष व्यवस्था आहे.


नवे मैदान 800 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. हे स्टेडियम सरदार वल्लभभाई पटेल क्रिडा संकुलाचा एक भाग आहे. सरदार वल्लभभाई पटेल क्रिडा संकुलात जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदाना आहे.संपूर्ण क्रिडा संकुल 63 एकरपेक्षा जास्त भूखंडावर पसरले आहे.


मैदानाच्या जवळ फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, कबड्डी, बॉक्सिंग, लॉन टेनिस, रनिंग ट्रॅक, ऑलिंपकच्या दर्जाचा मोठा स्वीमिंग पूल तयार करण्यात आले आहे.

मुंबई सीमाशुल्क विभागाने 15 कोटी रुपयांच्या तस्करीच्या वस्तू जप्त केल्या


 

◻️मबईच्या सीमाशुल्क विभाग-III, ने  टपालमार्गे तस्करी केलेल्या आय-फोन, ड्रोन, ऍपल  घड्याळे आणि सिगारेटचा लक्षणीय  वाणिज्यिक  साठा जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करताना, बॅलर्ड इस्टेट मुंबईच्या (प्रतिबंधात्मक) आयुक्तालयाच्या शोध आणि गुप्तवार्ता विभागाने  खालील ठिकाणी एकत्रितपणे तस्करीविरोधी कारवाई केली.


1) एमआयडीसी पोस्ट ऑफिस, चकाला, अंधेरी, फॉरेन पोस्ट ऑफिस

2) विदेश डाक भवन, बॅलार्ड इस्टेट मुंबई

3) एअर पार्सल सॉर्टींग ऑफिस, विलेपार्ले (पू ), मुंबई.


◻️कार्यालयाने चकाला एमआयडीसी पोस्ट ऑफिस, चकाला, अंधेरी येथून 12 , विदेश डाक कार्यालय ,  बल्लार्ड इस्टेट मुंबई येथून  26 आणि  मुंबईतील एअर पार्सल सॉर्टिंग ऑफिस, विलेपार्ले (पू ), इथून 5 कन्साईनमेंट ताब्यात घेतल्या.  एकूण 1470 आय.फोन, 322 ऍपल  घड्याळे,  64 ड्रोन्स,  41 एअर पॉड्स , 1 391 सिगारेट स्लीव्ह आणि 36 ऑटो पार्ट्स यांचा समावेश आहे , ज्यांचे अंदाजे स्थानिक बाजार मूल्य  15 कोटी रुपये आहे.


◻️या वस्तूवर लागू होणारे सीमाशुल्क आणि आयजीएसटी कर टाळण्यासाठी  वस्तूंची माहिती  मूल्य आणि प्रमाण याबाबत  चुकीची माहिती देऊन टपालाद्वारे या वस्तू  तस्करीमुक्त करण्याचा  प्रयत्न केला गेला. तपासा दरम्यान, वरील कन्साईन्मेंटची  नावे व पत्ते  बनावट / डमी असल्याचे आढळले.

चंदीगडचे ‘कार्बन वॉच’ अॅप



चंदीगड केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने व्यक्तीकडून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचे मूल्यांकन करण्यासाठी एक यंत्रणा तयार केली आहे. असे करणारे ते भारतातील पहिले राज्य ठरले आहे.


▪️ठळक बाबी.


चंदीगड सरकारने ‘कार्बन वॉच’ नामक एक मोबाइल अॅप तयार केले आहे.

या अ‍ॅपच्या माध्यमातून चंडीगडच्या रहिवाशांना माहिती दिली जाणार आणि त्यांना कार्बन उत्सर्जनाबाबत जागरूक केले जाणार.


अ‍ॅप वेगवेगळ्या स्त्रोतांच्या वापराविषयी विस्तृत माहिती एकत्रित करतो आणि माहितीच्या आधारे कार्बन उत्सर्जनाची गणना करतो.

भारत आणि मॉरिशस यांनी व्यापक आर्थिक सहकार्य आणि भागीदारी करारावर स्वाक्षरी केली.



 मॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाठ, आणि भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर  यांच्या उपस्थितीत काल, भारत सरकारचे वाणिज्य सचिव डॉ. अनुप वाधवान आणि मॉरिशस सरकारचे राजदूत हॅमंडोयल दिल्लम यांनी पोर्ट लुईस येथे भारत-मॉरिशस व्यापक आर्थिक सहकार्य आणि भागीदारी करारावर (सीईसीपीए) स्वाक्षरी केली.


 सीईसीपीए हा आफ्रिकेमधील देशासोबत भारताने केलेला पहिला व्यापार करार आहे. हा करार  मर्यादित स्वरूपाचा असून यामध्ये वस्तूंचा व्यापार, वस्तूंच्या उगमाविषयीचे नियम, सेवांचा व्यापार, व्यापारातील तांत्रिक अडथळे (टीबीटी), सॅनिटरी आणि फायटोसॅनेटरी (एसपीएस) उपाय, तंटा निवारण, दूरसंचार, वित्तीय सेवा, सीमाशुल्क कार्यपद्धती आणि इतर क्षेत्रात सहकार्य यांचा समावेश असेल. 


 प्रभाव/फायदा: सीईसीपीएने उभय देशांमधील व्यापार प्रोत्साहित आणि सुधारित करण्यासाठी संस्थात्मक यंत्रणेची तरतूद केली आहे. भारत आणि मॉरिशस यांच्यातील सीईसीपीएमध्ये भारतासाठी 310 वस्तूंची निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली आहे, यामध्ये अन्नपदार्थ व पेये (80 लाईन), कृषी उत्पादने (25 लाईन ), वस्त्रोद्योग व कपडे (27 लाईन ),  धातू व धातूचे सामान (32 लाईन), इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू (13लाईन), प्लास्टिक आणि रसायने (20 लाईन), लाकूड आणि लाकडी वस्तू (15 लाईन) आणि इतर यांचा समावेश आहे. गोठविलेले मासे, विशिष्ठ साखर, बिस्किटे, ताजी फळे, फळांचा रस, बाटलीबंद पाणी, बिअर, अल्कोहोलिक पेय, साबण, पिशव्या, वैद्यकीय व शस्त्रक्रिया उपकरणे आणि कपड्यांसह मॉरिशसला आपल्या 615 उत्पादनांसाठी भारतीय बाजारपेठेत प्रवेश मिळणार असून याचा फयदा मॉरिशसला होईल.

जेवर विमानतळ आशियातलं सर्वात मोठं विमानतळ म्हणून विकसित करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचा प्रयत्न.


उत्तर प्रदेशातलं जेवर विमानतळ आशियातलं सर्वात मोठं विमानतळ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करत असून काल विधासभेत सादर झालेल्या २०२१-२२ या वर्षासाठीच्या अंदाज पत्रकात या विमानतळासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


या विमानतळावर एकंदर ६ धावपट्ट्या असणार आहेत. त्याचबरोबर अयोध्येमध्ये उभारल्या जात असलेल्या आंतर राष्ट्रीय विमानतळाला मर्यादा पुरूषोत्तम श्रीराम असं नाव दिलं जाणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात एकशे एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ


अलीगड, मुरादाबाद, मेरठ या सारख्या शहरांनाही लवकरच विमान सेवेद्वारा जोडण्यात येईल असं यांनी काल वार्ताहरांना सांगितलं. (http://www.simplifiedcart.com/)

करोनाच्या उद्रेकानंतर केंद्र सावध! महाराष्ट्रासह सहा राज्यात केंद्रीय पथकं.



तब्बल आठ ते दहा महिन्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच करोनाचं संकट पुन्हा उभं राहताना दिसत आहे. महाराष्ट्रासह देशातील सहा राज्यांमध्ये करोना बळावताना दिसत आहे. दररोज येणाऱ्या करोना रुग्णांच्या आकडेवारीत वाढ होत असल्याचं समोर आल्यानंतर केंद्र सरकारही सावध झालं आहे. करोना उद्रेक रोखण्यासाठी आणि उपाययोजनासाठी केंद्रानं पथकं नियुक्त केली असून, ही पथकं राज्यांना मदत करणार आहे.


महाराष्ट्रासह करोनाचं संक्रमण वाढलेल्या राज्यांमध्ये तातडीने उपाययोजना करण्यासाठी केंद्रानं तीन सदस्यीय पथकं नियुक्त केली आहेत. या पथकांमध्ये विविध तज्ज्ञांचा समावेश केलेला असून, ही पथकं राज्यांना करोना प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करणार आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सहसचिव पदावरील अधिकारी या पथकांचं नेतृत्व करणार असून, महाराष्ट्र, केरळ, गुजरात, पंजाब, कर्नाटक आणि जम्मू व काश्मीरमध्ये विशेष लक्ष देणार आहेत, आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

सीमावाद मागे सोडून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता


पूर्व लडाख सीमेवरुन भारत-चीन संबंधात निर्माण झालेला तणाव आता हळूहळू कमी होत आहे. लडाखच्या अतिक्रमण केलेल्या काही भागांमधून चिनी सैन्याने माघार घेतली असली, तरी अजूनही हा वाद पूर्णपणे मिटलेला नाही. तणाव कमी झाला असला, तरी वाद अजून पूर्णपणे मिटलेला नाही. एकूणच या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चीनने ब्रिक्स परिषद भारतात आयोजित करण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.


वेगवेगळया क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि ब्रिक्सच्या अन्य सदस्यांसह काम करण्याची इच्छा असल्याचे चीनने म्हटले आहे. पुढच्या काही महिन्यात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती सुधारली, तर यावर्षात ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येऊ शकतात.


चीनने नेहमीच ब्रिक्स परिषदेला महत्त्व दिले आहे. या माध्यमातून सहकार्य, संबंध दृढ करण्याचा प्रयत्न राहिला आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. “भारतात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेच्या आयोजनाला आमचा पाठिंबा आहे. भारत आणि अन्य देशांसोबत विविध क्षेत्रात संपर्क आणि सहकार्य बळकट करण्यासाठी काम करण्याची आमची इच्छा आहे” असे प्रवक्ते वँग वेनबिन म्हणाले. सीमेवरील परिस्थितीचा ब्रिक्स परिषदेवर परिणाम होणार का ? या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले.

हिटलर सत्तेत आल्यावर त्यानेही मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते”



जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम ठरलेल्या अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव दिल्यानंतर राजकारण तापायला सुरूवात झाली असून विरोधकांकडून भाजपाला आणि पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं जात आहे.


‘सरदार पटेल स्टेडियम’चे ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ असे नामकरण केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे. आव्हाड यांनी तर थेट जर्मनीचा हुकूमशाह हिटलरचा दाखला देत, “हिटलर सत्तेत आल्यानंतर त्यानेही मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते” अशा शब्दात हल्लाबोल केलाय.


“स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते व गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावाने मते मागून थकल्यावर त्यांच्या नावे असलेले गुजरातमधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतले…हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते”, असं ट्विट करत आव्हाड यांनी मोदींचं नाव न घेता त्यांची हिटलरसोबत तुलना केलीये.


दुसरीकडे, ‘सरदार पटेल यांच्या नावे असलेल्या स्टेडियमचं नाव बदलून ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ करण्यात आलं. हा सरदार पटेलांचा अपमान नाही का? सरदार पटेल यांच्या नावानं मतं मागणारी भाजप आता पटेल यांचा अपमान करत आहे. गुजराजची जनता सरदार पटेल यांचा अपमान सहन करणार नाही.


सरदार पटेलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध घातले होते म्हणून त्यांचा नाव हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी केली आहे. तर, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही, ‘नरेंद्र मोदींना मृत्यूनंतर आपल्याला कोणी लक्षात ठेवणार की नाही याबद्दल खात्री नसल्यानेच स्टेडियमला आपलं नाव दिलं, अशी खरमरीत टीका केली आहे.

आयुर्वेदाचे डॉक्टर शस्त्रक्रिया करण्याइतपत प्रशिक्षित



अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांनी दावा केल्याप्रमाणे मिक्सोपॅथी अशी कुठलीही संकल्पना अस्तित्वात नाही, पण आयुर्वेदाचे डॉक्टर्स शस्त्रक्रिया करण्याइतके प्रशिक्षित आहेत, असे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.


आयुर्वेद डॉक्टरांना वैद्यकीय शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्यामागची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, की आयुर्वेदाचे डॉक्टर्स शस्त्रक्रिया करण्याइतके प्रशिक्षित आहेत. ते अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांना मदत करू शकतात. नाईक यांना अपघातानंतर गोवा मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथून सोडण्यात आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.


आयुर्वेदाच्या डॉक्टरांना शस्त्रक्रियेस परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयावर इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए)  केलेल्या टीकेवर त्यांनी सांगितले, की भारतीय वैद्यकीय उपचार पद्धती ही अ‍ॅलोपथीच्या मदतीसाठी वापरली जात आहे. दोन्ही पद्धतीत स्पर्धा निर्माण करण्याचा सरकारचा हेतू नाही. या दोन्ही उपचार पद्धती एकमेकांना पूरक आहेत.


आयुर्वेदाचे डॉक्टरही शिकलेले आहेत. त्यांना शाल्यक शाखेत शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण दिलेले असते. अभ्यास पूर्ण केल्यानंतर आयुर्वेदाचे डॉक्टर एक वर्ष आंतरवासीयता करतील व त्यांना शस्त्रक्रिया करण्यातील आणखी सखोल बाबी समजतील. भारतीय उपचार पद्धती अनेक शतकांपासून लोकांपुढे आहे. त्याचे सूत्र तेव्हापासून बदललेले नाही, असेही त्यांनी सांगितले. (http://www.simplifiedcart.com/)

पतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रगती’ ही 36 वी पायाभूत सुविधाविषयक बैठक संपन्न.


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘प्रगती’ बैठकीचे 36 वे सत्र संपन्न झाले.


बैठकीत, आठ प्रकल्प, एक योजना व एका कार्यक्रमासंदर्भातील तक्रारी यासह दहा विषयांचा आढावा घेण्यात आला. 


आठ प्रकल्पांपैकी तीन प्रकल्प रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे, दोन रेल्वे मंत्रालयाचे, प्रत्येकी एक ऊर्जा मंत्रालय, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय आणि गृह मंत्रालयाचे होते. या आठ प्रकल्पांची एकूण किंमत 44,545 कोटी रुपये असून हे प्रकल्प पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, ओदिशा, झारखंड, सिक्कीम, उत्तरप्रदेश, मिझोराम, गुजरात, मध्यप्रदेश, बिहार आणि मेघालय  या राज्यांशी संबंधित आहेत.


पंतप्रधानांनी यावेळी काही प्रकल्पांच्या अंमलबजावणीमध्ये होणाऱ्या विलंबाबाबत  चिंता व्यक्त केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना सर्व प्रलंबित प्रश्न त्वरित निकाली काढण्याचे निर्देश दिले.बैठकी दरम्यान पंतप्रधानांनी सिंगल यूज प्लास्टिक निर्मूलनाच्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. 


तसेच पंतप्रधान ग्राम सडक योजनेशी संबंधित तक्रारींचा आढावाही घेण्यात आला. योग्य जागरूकता मोहिमेद्वारे लोकांना आणि विशेषत: तरुणांना सहभागी करून घेण्याच्या आवश्यकतेवर  पंतप्रधानांनी जोर दिला. 


पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत बांधल्या जाणाऱ्या रस्त्यांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना केले.प्रगती बैठकीच्या 35 व्या सत्रापर्यंत एकूण 13.60 लाख कोटी रुपये खर्चाच्या 290 प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला आहे. 

पिकांच्या आधारभूत किमतीत ऐतिहासिक वाढ



पिकांच्या किमान आधारभूत किमतीत सरकारने ऐतिहासिक वाढ केली असून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त सांगितले.


ते म्हणाले, की गेल्या सात वर्षांत शेतीमधील बदलांसाठी सरकारने अनेक निर्णय घेतले. त्यात, चांगल्या पाटबंधारे सुविधा, प्रगत तंत्रज्ञान, पीक विमा योजना, मृदा आरोग्यपत्रिका यांचा समावेश आहे. कृषी क्षेत्रातील मध्यस्थांची भूमिका दूर करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.


आपल्या शेतकऱ्यांची जिद्द व कष्टाची ताकद मोठी आहे. आमच्या सरकारने पिकांच्या किमान आधारभूत भावात ऐतिहासिक वाढ केली असून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत, असे मोदी म्हणाले. नमो अ‍ॅपवर या योजनेतील काही ऐतिहासिक क्षणांची झलक पाहायला मिळणार आहे.


पंतप्रधान मोदी यांनी किसान सम्मान योजना दोन वर्षांपूर्वी जाहीर केली होती, त्यात शेतकऱ्यांना वर्षांला सहा हजार रुपये मदत ही तीन हप्त्यांत देण्यात आली. ही मदत छोटय़ा व मध्यम शेतकऱ्यांसाठी होती. त्यातील रक्कम लाभार्थीच्या खात्यावर थेट जमा करण्यात आली.

Tuesday 23 February 2021

कप्यूटर : सामान्य ज्ञान




🔷 कम्प्यूटर एक इलेक्ट्रानिक मशीन है । इसका हिंदी नाम संगणक है ।


🔷आधुनिक कम्प्यूटर का पिता चार्ल्स बैवेज को कहते हैं ।


🔷कलक्यूलेटर का आविष्कार पास्कल ने किया था ।


🔷भारत मे निर्मित पहला कम्प्यूटर सिद्धार्थ था ।


🔷सबसे बडा कम्प्यूटर नेटवर्क इंटरनेट है ।


🔷भारत का प्रथम कम्प्यूटर बैंगलूर के प्रधान डाक घर मे लगाया गया ।


🔷इटरनेट का प्रथम प्रयोग अमेरिका के रक्षा अनुसंधान मे हुआ ।


🔷कम्प्यूटर मे प्रयुक्त होने वाला IC चिप्स सिलिकान का बना होता है ।


🔷भारत का सिलिकान वैली बैंगलोर को कहते हैं ।


कम्प्यूटर का मस्तिष्क सी.पी.यू. को कहते हैं ।


🔷कम्प्यूटर अपने परिणाम को भविष्य हेतु मैमोरी मे सुरक्षित रखता है ।


🔷IC का पूर्ण रूप इंटरग्रेटेड सर्किट होता है ।


🔷IBM का पूर्ण रूप इंटरनेशनल बिजनेस मशीन है ।


🔷WWW का पूर्ण रूप वर्ल्ड वाईड वेव है ।


🔷LAN का पूर्ण रूप लोकल एरिया नेटवर्क है ।


🔷WAN का पूर्ण रूप वाइड एरिया नेटवर्क है ।


🔷RAM का पूर्ण रूप रैंडम एक्सिस मेमोरी है ।


🔷ROM का पूर्ण रूप रिड ओनली मेमोरी है ।


🔷CD का पूर्ण रूप काम्पैक्ट डिस्क होता है ।


🔷VDU का पूर्ण रूप विजुअल डिस्प्ले यूनिट है ।


🔷HTML का पूर्ण रूप हायपर टेक्ट मार्कप लांग्वेज है ।


🔷HTTP का पूर्ण रूप हायपर टेक्ट ट्रांसफर प्रोटोकाल है ।


🔷ALU का पूर्ण रूप अर्थमेटिक लाजिकल यूनिट है ।


🔷CPU का पूर्ण रूप सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट है ।


🔷CU का पूर्ण रूप कंट्रोल यूनिट होता है ।


🔷COBOL का पूर्ण रूप कामन बिजनेस ओरिएंटेड लांग्वेज है ।


🔷DOS का पूर्ण रूप डिस्क आपरेटिंग सिस्टम है ।


🔷E MAIL का पूर्ण रूप इलेक्ट्रानिक मेल होता है ।


🔷FAX का पूर्ण रूप फार अवे झेरोक्स होता है ।


🔷कम्प्यूटर को बंद करने की प्रक्रिया को शट डाउन तथा चालू करने की प्रक्रिया को बुट अप कहते है ।


🔷मॉनिटर का अन्य नाम VDU है ।


🔷सटैंडर्ड की बोर्ड मे 101 बटन तथा 12 फंक्शन कीज होती हैं ।


🔷चम्बकीय डिस्क पर आयरन आक्साइड की परत होती है ।


🔷बाइनरी नम्बर प्रणाली मे 0 तथा 1 का प्रयोग होता है ।


🔷फलापी डिस्क की साइज 3.25” तथा 5.25” होती है ।


🔷कम्प्यूटर नेटवर्क से सम्पर्क जोडने की प्रक्रिया को ‘लाग इन’ तथा सम्पर्क तोडने को ‘लाग आउट’ कहते हैं ।


🔷आपरेटिंग सिस्टम मे RAM का प्रयोग किया जाता है ।


🔷कम्प्यूटर मे प्रोग्राम की सूची को मेंयू कहते हैं ।


🔷मोडेम टेलीफोन लाइन पर काम करता है ।


🔷कम्प्यूटर के डम्प होने का कारण वाइरस होता है ।


🔷कम्प्यूटर वाइरस एक डिस्ट्रकटिव प्रोग्राम होता है ।


🔷कम्प्यूटर का भौतिक बनावट हार्डवेयर कहलाता है ।


🔷हार्ड डिस्क की गति RPM. मे मापी जाती है ।


🔺 8 बिट = 1 बाइट

🔺 1024 बाइट = 1 किलो बाइट

🔺 1024 किलो बाइट = 1 MB

🔺 1024 MB = 1 GB


🔷 IBM (इंटर नेशनल बिजनेस मशीन) एक कम्प्यूटर कम्पनी है ।


🔷कम्प्यूटर का मुख्य पृष्ट डेस्क टाप कहलाता है ।


🔷कम्प्यूटर के क्षेत्र मे महान क्रांति 1960 ई. मे आयी ।


🔷DOS और WINDOWS एक प्रकार के आपरेटिंग सिस्टम हैं ।


🔷माउस,की बोर्ड, जायस्टिक, स्कैनर, तथा लाइट पेन इनपुट डिवाइस के उदाहरण हैं ।


🔷परिंटर, स्पीकर, तथा मानिटर आउटपुट डिवाइस हैं ।


🔷इटरनेट पर भेजा जाने वाला संदेश ई मेल कहलाता है ।


🔷उच्चस्तरीय भाषा से मशीनी भाषा मे रूपांतरण सोर्स प्रोग्राम द्वारा होता है ।


🔷अग्रेजी के समान उच्चस्तरीय भाषा कोबोल है ।


🔷परोग्राम हेतु विकसित प्रथम भाषा फोरट्रान है ।


🔷उच्चस्तरीय भाषा का अनुवाद निम्न स्तरीय भाषा मे कम्पाइलर करता है ।


🔷उच्चस्तरीय भाषा का विकास IBM ने किया ।


🔷फोरट्रान,कोबोल, बेसिक, अल्गोल, पास्कल आदि उच्चस्तरीय भाषाएं हैं ।


🔷मदर बोर्ड एक सर्किट बोर्ड है, इसमे सी.पी.यू. जोडे जाते हैं ।


🔷हार्ड डिस्क मे कम्प्यूटर प्रोग्रामों को स्टोर किया जाता है ।


🔷कम्प्यूटर तीन प्रकार के होते हैं- डिजिटल, एनालाँग, एवं हाइब्रिड


🔷असेम्बलर ,असेम्बली भाषा को यंत्र भाषा मे बदलता है


भारताची राज्यघटना – भारतीय संविधान



भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा (legal basis) आहे.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.


भारतीय संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे.


नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी 26 इ.स. 1950 पासून राज्यघटना अंमलात आली.


1950 साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे 1935 च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे.


ऑगस्ट 29, रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली.


अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी स्वीकारला गेला.


यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.


नागरिकत्व, निवडणूका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या.


संविधान संपूर्ण रूपानेजानेवारी 26, 1950 रोजी लागू झाले.


त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस ‘भारतीय प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो.


भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व 12 पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे.


मुख्य संविधानाचे 22 विभाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे.


सुरूवातीच्या 395 कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत.


सध्या राज्यघटनेत 447 कलमे असून भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते.


भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम (Sovereign) , समाजवादी (Socialist), धर्मनिरपेक्ष (Secular), लोकशाही (Democratic) प्रजासत्ताक(Republic) आहे.


मूळ उद्देशिकेत समाजवादी (Socialist) व धर्मनिरपेक्ष (Secular) हे शब्द नव्हते.


राज्यघटनेच्या 42 व्या दुरूस्तीद्वारे ते उद्देशिकेत घालण्यात आले.

General Knowledge and Current Affairs 2020



#1608 :अलीकडे भाज्यांचे किमान आधारभूत किंमत ठरविणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे?

(अ) पंजाब

(ब) कर्नाटक

(क) केरळ✔️✔️

(ड) उत्तर प्रदेश


#1609  : अलीकडे कोणत्या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता नरेश कनोडिया यांचे निधन झाले?

(अ) गुजराती✔️✔️

(ब) भोजपुरी

(क) पंजाबी

(ड) कन्नड


#1610  : महिलांच्या सुरक्षेसाठी कोणत्या सार्वजनिक परिवहन सेवेने 'मेरी सहेली' हा उपक्रम सुरू केला आहे?

(अ) Indian Railways✔️✔️

(ब) DMRC

(क) DTC

(ड) वरीलपैकी नाही 


#1611  :  कोणत्या देशाने ब्रह्मोस क्षेपणास्त्र सुखोई 30 MKI ची यशस्वीरीत्या चाचणी केली?

(अ) चीन

(ब) भारत✔️✔️

(क) नेपाळ

(ड) बांगलादेश 


#1615  :  खालीलपैकी भौगोलिकदृष्ट्या, भारतातील सर्वात जुनी पर्वत रांग कोणती?

(अ) हिमालय

(ब) विंध्याचल

(क) अरावली✔️✔️

(ड) सतपुरा


#1616 : "दलाल स्ट्रीट" कोठे आहे?

(अ) मुंबई✔️✔️

(ब) दिल्ली

(क) लंडन

(ड) न्यूयॉर्क


#1617  : छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती आहे?

(अ) रांची

(ब) भोपाळ

(क) रायपूर✔️✔️

(ड) देहरादून


#1618  :नाशिक मधील कोणत्या नदीच्या काठावर कुंभमेळा भरतो?

(अ) गंगा

(ब) सतलज

(क) महानदी  

(ड) गोदावरी✔️✔️


१. शांघाई सहयोग संघटन (SCO) - २०२० चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे ?

 A) किर्गिजस्तान 

 B) रशिया 

 C) चीन 

 D) भारत

Correct Answer D 

भारत 


२. शांघाई सहयोग संघटन मध्ये भारताने पूर्ण सदस्यत्व कधी स्वीकारले ? 

  A) ९ जून २०१६ 

 B) ९ जून २०१९ 

 C) ९ जून २०१७ 

 D) ९ जून २०१८

Correct Answer C

९ जून २०१७ 


३.सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस हा म्हणून __साजरा केला जातो?

  A) भारतीय प्रवासी दिन 

 B) राष्ट्रीय एकता दिन 

 C) राष्ट्रीय युवा दिन 

 D) राष्ट्रीय शांतता दिन

Correct Answer B 

राष्ट्रीय एकता दिन


४. " DPD" चे संक्षिप्त रुप काय आहे ?

  A) डायरेक्ट पोर्ट डिलीव्हरी 

 B) डूअर पोर्ट डिलीव्हरी 

 C) डायरेक्ट पार्सल डिलीव्हरी 

 D) डायरेक्ट पार्टी डिलीव्हरी

Correct Answer A 

डायरेक्ट पोर्ट डिलीव्हरी 


५. अमेरिकेच्या "स्टॅच्यू ऑफ लिबर्टी" ची उंची ९३ मीटर आहे तर, भारतातील स्टैच्यू ऑफ़ यूनिटी ची उंची किती मीटर आहे ? 

  A) १७२ 

 B) १९८ 

 C) १९० 

 D) १८२

Correct Answer D 

१८२ 


६. १९६२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाला सुवर्णपदक जिंकून देणारे महान फुटबॉल पटू यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय टपाल विभागाने तिकीट जारी केले? 

  A) चुनी गोस्वामी 

 B) गोशतो पॉल 

 C) तालिमेरेन आओ 

 D) वरीलपैकी सर्व

Correct Answer A 

चुनी गोस्वामी 


७. 'आयसीसी ' युवा (१९ वर्षाखालील ) विश्व चषक क्रिकेट-२०२० स्पर्धा कोठे होणार आहे ?

  A) इंग्लंड 

 B) द. आफ्रिका 

 C) ऑस्ट्रेलिया 

 D) वेस्ट इंडिज

Correct Answer B 

द. आफ्रिका 


८. " रायसीना डायलॉग " हा दोन दिवसीय कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला?

  A) मध्य प्रदेश 

 B) दिल्ली 

 C) हरियाणा 

 D) मुंबई

Correct Answer B 

दिल्ली 


९. शांघाई सहयोग संघटनेच्या आठ आश्चर्यमध्ये भारतातील कोणत्या स्थळांचा समावेश करण्यात आला?

  A) सुवर्ण मंदिर 

 B) नालंदा विद्यापीठ 

 C) ताज महाल 

 D) स्टैच्यू ऑफ़ यूनिटी

Correct Answer D 

स्टैच्यू ऑफ़ यूनिटी 


१०. शांघाई सहयोग संघटन चे मुख्यालय कोठे आहे ?

  A) इस्लामाबाद (पाकिस्तान) 

 B) मास्कोव (रशिया) 

 C) बीजिंग (चीन) 

 D) दिल्ली (भारत) 

Correct Answer C 

बीजिंग (चीन)


#1601  : भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नेणमुक केली आहे?

(अ) राजपाल सिंग

(ब) मिहिर शर्मा

(क) देवांश खंडेलवाल

(ड) यशवर्धन कुमार सिन्हा✔️✔️



#1595  :इंडिया एनर्जी फोरमच्या चौथ्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केले?

(अ) नरेंद्र मोदी✔️✔️

(ब) नितीन गडकरी

(क) अमित शहा

(ड) राजनाथ सिंह



#1596  : T -20 क्रिकेटमध्ये 1000 षटकार ठोकणारा जगातील पहिला फलंदाज बनला ठरला आहे?

(अ) जोनाथि रुडस

(ब) विराट कोहली 

(क) रोहीत शर्मा 

(ड) ख्रिस गेल✔️✔️


#1597  : केंद्र सरकारने सैनिक शाळांमधील ओबीसींसाठी किती टक्के आरक्षण जाहीर केले आहे?

(अ) 37 टक्के

(ब) 27 टक्के✔️✔️

(क) 57 टक्के

(ड) 28 टक्के


#1598  : जगातील जास्तीत जास्त प्लास्टिक कचर्‍याच्या निर्मितीमध्ये कोणता देश प्रथम स्थानावर पोहोचला आहे?

(अ) जपान

(ब) अमेरिका✔️✔️

(क) इंग्लंड

(ड) रशिया


#1599  : भारतीय सैन्याचे अध्यक्ष जनरल मुकुंद नरवणे यांना नेपाळ सैन्य कोणत्या सन्मानाने सन्मानित करेल?

(अ) शौर्य सन्मान

(ब) ब्रेव्हरी सन्मान

(क) सेवा सन्मान

(ड) महारथी सन्मान✔️✔️


#1600 : Bharat Pay ने आपल्या व्यासपीठावर कशाची घोषणा केली?

(अ) Silver gold

(ब) Digital Gold✔️✔️

(क) Diamond gold

(ड) Copper gold


#1490  : 22 ऑक्टोबर 2020 रोजी वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनने कोणती चॅम्पियनशिप जाहीर केली होती?

(अ) बॅडमिंटन एशिया टीम स्पर्धा

(ब) BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप

(क) जागतिक जुनिअर आईस हॉकी स्पर्धा

(ड) जागतिक जुनिअर बॅडमिंटन स्पर्धा✔️✔️


#1491 : "लाइफ इन मिनीचर" (Life in Miniature) प्रकल्प कोणी सुरू केला?

(अ) प्रल्हादसिंग पटेल✔️✔️

(ब) नरेंद्र सिंह तोमर

(क) पीयूष गोयल

(ड) रमेश पोखरियाल



#१४९२ :प्रधानमंत्री कृषी सिंचय योजनेंतर्गत भौगोलिक टॅगिंगसाठी मोबाइल अँपचे कोणाच्या हस्ते उदघाट्न केले?

(अ) मनोहर लाल खट्टर

(ब) रतनलाल कटारिया✔️✔️

(क) नरेंद्रसिंग तोमर

(ड) यापैकी काहीही नाही



#1492 : कोणत्या संस्थेने गोव्यातील सँड ड्यूने (Sand Dune Park) पार्कसाठी 3 कोटी रुपये मंजूर केले आहेत?

(अ) एडीबी

(ब) आयएमएफ

(क) जागतिक बँक✔️✔️

(ड) युनेस्को


#1494:  World's Best Employer 2020 मध्ये भारतीय PSUs एनटीपीसीचा क्रमांक किती आहे?

(अ) 1 ला✔️✔️

(बी) 2 रा

(सी) 3 रा

(ड) 7th वा


#1495  :नो मास्क नो सर्व्हिस पॉलिसी कोणत्या देशात सुरू केली गेली?

(अ) नेपाळ

(ब) भारत

(क) बांगलादेश✔️✔️

(ड) पाकिस्तान


#1495  : पोर्तुगीज ग्रँड प्रिक्स 2020 कोणी जिंकला?

(अ) वाल्टरी बोटास

(ब) लुईस हॅमिल्टन✔️✔️

(क) मॅक्स व्हर्स्टेपेन

(ड) यापैकी काहीही नाही


#1496 : International Stuttering Awareness Day कधी साजरा केला जातो?

(अ) 22 ऑक्टोबर✔️✔️

(ब) 20 ऑक्टोबर

(क) 21 ऑक्टोबर

(ड) 22 ऑक्टोबर


#1497  :औद्योगिक विष विज्ञान तंत्रज्ञान संशोधन केंद्र कोठे आहे?

(अ) देहरादून (उत्तराखंड)

(ब) लखनऊ (उत्तर प्रदेश) ✔️✔️

(क) नागपूर (महाराष्ट्र) 

(ड) म्हैसूर (कर्नाटक)


#1499  :राष्ट्रीय पर्यावरण संशोधन संस्था (National Environmental Research Institute) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

(अ) देहरादून

(ब) नवी दिल्ली 

(क) नागपूर ✔️✔️

(ड) जयपूर



#1499 : भारतीय संविधानातील कोणत्या कलमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  "भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा" असे म्हटले आहे?

(अ) अनुच्छेद 14

(ब) कलम 19

(क) कलम 356

(ड) कलम 32 ✔️✔️


#1713  : दिल्ली कॅपिटलसचा पराभव करून कोणता संघ IPL 2020 च्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ बनला आहे?

(अ) कलकत्ता नाईट्स 

(ब) राजस्थान रॉयल्स

(क) बंगळुरू

(ड) मुंबई इंडियन्स ✔️✔️



#1714  : देशात तिसर्‍या वेळी आयव्हरी कोस्टचे अध्यक्ष कोण बनले आहे?

(अ) शशी खन्ना

(ब) अल्सेन ओतारा ✔️✔️

(क) राहुल शर्मा

(ड) मोहित धीर



#1715  : नुकताच फ्रान्समध्ये पार पडलेल्या अलेक्सिस वेस्टिन आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय बॉक्सर अमित पंघाल व संजीत यांनी खालीलपैकी कोणते पदक जिंकले?

(अ) रौप्य पदक

(ब) कांस्यपदक

(क) सुवर्णपदक✔️✔️

(ड) यापैकी काहीही नाही



#1716  :The Poet Laureate of Mumbai LitFest 2020 पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(अ) जावेद अख्तर✔️✔️

(ब) शशी खन्ना

(क) राहुल शर्मा

(ड) मोहित धीर


#1717 : भारत आणि इटली दरम्यानच्या आभासी द्विपक्षीय शिखर परिषदेत 2020 ते 2025 या कालावधीत दोन्ही देशांनी कृती योजनेसाठी किती करार केले आहेत?

(अ) 45 करार

(ब) 15 करार✔️✔️

(क) 25 करार

(ड) 55 करार



#1803: 27 ऑक्टोबर रोजी जगभर कोणता दिवस साजरा केला जातो?

(अ) जागतिक ऑडिओ व्हिज्युअल हेरिटेज दिन

(ब) जागतिक वारसा दिन

(क) जागतिक ऑडिओ व्हिज्युअल दिन

(ड) जागतिक रोजगार दिन


#1804 : भारतीय क्रिकेट संघाचा नवीन पोशाख प्रायोजक (costume sponsor ) कोण बनला आहे?

(अ) Reliance

(ब) Unacademy

(क) Jio

(ड) MPL 


#1805: कोणत्या नेत्याच्या जयंतीनिमित्त झारखंड आपला स्थापना दिवस साजरा करतो?

(अ) जागरनाथ महतो

(ब) बन्ना गुप्ता

(क) बिरसा मुंडा

(ड) बादल पत्रलेख


#1806  : आर्यना सबलेन्काने कोणत्या खेळाडूला मागे टाकत डब्ल्यूटीए रँकिंगच्या पहिल्या 10 मध्ये प्रवेश केला आहे?

(अ) व्हिक्टोरिया अझरेन्का

(ब) सिमोना हलेप

(क) सेरेना विल्यम्स

(ड) पेट्रा क्विटोवा


#1807  : 15 व्या पूर्व आशिया समिटमध्ये(the 15th East Asia Summit) भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले?

(अ) अमित अनिलचंद्र शाह

(ब) डॉ.एस. जयशंकर✔️✔️

(क) राजनाथ सिंह

(ड) नरेंद्र दामोदरदास मोदी


#1808 : कोणत्या एजन्सीने क्विक रिएक्शन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली?

(अ ) जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी

(ब) राष्ट्रीय वैमानिकी आणि अवकाश प्रशासन

(क) भारतीय अंतराळ संशोधन संस्था  

(ड) संरक्षण संशोधन आणि विकास संस्था✔️✔️


#1809 :  world Kindness day दिवसाची थीम काय आहे?

(अ) The Pains of Others

(ब) Kindness for Happiness

(क) Shear Happiness with Kindness

(ड) World We Make - Inspire Kindness.✔️✔️

वित्त आयोग व अध्यक्ष



🔰 पहिला वित्त आयोग

👤 अध्यक्ष : के. सी. नियोगी

⌛️ शिफारस कालावधी : १९५२-१९५७


🔰 दसरा वित्त आयोग 

👤 अध्यक्ष : के. सन्थानम् 

⌛️ शिफारस कालावधी : १९५७-१९६२


🔰 तिसरा वित्त आयोग 

👤 अध्यक्ष : ए. के. चन्दा

⌛️ शिफारस कालावधी : १९६०-१९६६


🔰 चौथा वित्त आयोग 

👤 अध्यक्ष : डॉ. पी. व्ही. राजमन्नार

⌛️ शिफारस कालावधी : १९६६-१९६९


🔰 पाचवा वित्त आयोग 

👤 अध्यक्ष : महावीर त्यागी

⌛️ शिफारस कालावधी : १९६९-१९७४


🔰 सहावा वित्त आयोग 

👤 अध्यक्ष : के. ब्रह्मानंद रेड्डी

⌛️ शिफारस कालावधी : १९७४-१९७९


🔰 सातवा वित्त आयोग 

👤 अध्यक्ष : जे. एम. शेलात 

⌛️ शिफारस कालावधी : १९७९-१९८४


🔰 आठवा वित्त आयोग 

👤 अध्यक्ष : यशवंतराव चव्हाण

⌛️ शिफारस कालावधी : १९८४-१९८९


🔰 नववा वित्त आयोग 

👤 अध्यक्ष : एन. के. पी. साळवे

⌛️ शिफारस कालावधी : १९८९-१९९४


🔰 दहावा वित्त आयोग 

👤 अध्यक्ष : के. सी. पंत

⌛️ शिफारस कालावधी : १९९५-२०००


🔰 अकरावा वित्त आयोग 

👤 अध्यक्ष : ए. एम. खुस्रो

⌛️ शिफारस कालावधी : २०००-२००५


🔰 बारावा वित्त आयोग 

👤 अध्यक्ष : डॉ. सी. रंगराजन 

⌛️ शिफारस कालावधी : २००५-२०१०


🔰 तरावा वित्त आयोग 

👤 अध्यक्ष : डॉ. विजय केळकर

⌛️ शिफारस कालावधी : २०१०-२०१५ 


🔰 चौदावा वित्त आयोग 

👤 अध्यक्ष : डॉ. वाय. व्ही. रेड्डी 

⌛️ शिफारस कालावधी : २०१५-२०२०


🔰 पधरावा वित्त आयोग 

👤 अध्यक्ष : एन. के. सिंह 

⌛️ शिफारस कालावधी : २०२०-२०२५ .


महाराष्ट्र राज्य विशेष



◾️कषेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात तिसरा क्रमांक लागतो


◾️ लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य


◾️ सथापना - 1 मे 1960


◾️ राजधानी - मुंबई


◾️ उपराजधानी - नागपूर


◾️ भाषा - मराठी


◾️ सर्वोच्च बिंदू - कळसूबाई शिखर


◾️ किनारपट्टी - 720 किमी अरबी समुद्राची


◾️जिल्हे -३६


◾️ लोकसभा सदस्य - 48


◾️ राज्यसभा सदस्य - 19


◾️ विधानसभा सदस्य - 288


◾️राज्य सीमा - गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा (केंद्रशासित प्रदेश), नगर- हवेली (केंद्रशासित प्रदेश)

राज्यांनी लसीकरणाचा वेग वाढवावा; केंद्र सरकारची सूचना



🔰महाराष्ट्रासह काही राज्यांत करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असताना लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना केंद्राने राज्यांना दिल्या असून अद्याप अनेक आरोग्य व आघाडीच्या कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली नसल्याचे म्हटले आहे.


🔰राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात  केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटले आहे की, आठवड्यातील लसीकरणाचे दिवस वाढवले पाहिजेत, किमान चार दिवस तरी लसीकरणाचे काम झाले पाहिजे तसेच त्यापुढील टप्प्यात पन्नाशीपुढील व्यक्तींचे लसीकरणही हाती घेण्याची गरज आहे. काही राज्यांनी आठवड्यातून दोन दिवस  लसीकरण सुरू ठेवले असून काही राज्यांत चार दिवस लसीकरणाचे काम केले जात आहे. कोविन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे पत्रात म्हटले आहे.


🔰१९  फेब्रुवारीच्या पत्रात म्हटले आहे की, आरोग्य व आघाडीच्या कर्मचाऱ्यांपैकी अनेकांना अजून लस मिळालेली नाही. त्यामुळे यात आठवड्यातील लसीकरणाचे दिवस वाढवण्याची गरज आहे. आतापर्यंत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या अनेक आढावा बैठका घेण्यात आल्या असून लसीकरण वाढवण्याची गरज त्यातून दिसून आली आहे. वयस्कर लोकांनाही तातडीने लस देणे सुरू करावे लागणार आहे.  मार्च २०२१ पासून सहआजार असलेल्या पन्नाशीवरील लोकांना लस देण्याचे काम सुरू करावे लागेल.


 🔰२१ फेब्रुवारीअखेर ११०८५१७३ लस मात्रा २३०८८८ सत्रात देण्यात आल्या असून त्यात ६३९१५४४ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा दिली आहे तर ९६०६४२ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. आघाडीच्या कर्मचाऱ्यांत ३७३२९८७ जणांना लशीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

नोव्हाक जोकोव्हिचनं ऑस्ट्रेलियन ओपनवर नाव कोरलं.



🔰नोव्हाक जोकोव्हिच हा ‘मेलबर्न पार्कचा राजा’ म्हणून ओळखला जातो. नऊ वेळा अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या जोकोव्हिचने एकदाही हार पत्करली नाही. रविवारी झालेल्या अंतिम फेरीत नोव्हाक जोकोव्हिचनं डॅनिल मेदवेदेवचा पराभव करत जतेपदावर नाव कोरलं आहे. जोकोव्हिच यानं मेदवेदेवचा 7-5 6-2 6-2 अशा फरकानं पराभव केला.


🔰चौथ्या मानांकित मेदवेदेवने अलीकडे पॅरिस मास्टर्स, एटीपी फायनल्स आणि एटीपी चषक जिंकले आहेत. मेदवेदेवला अमेरिकन खुल्या जेतेपदाने हुलकावणी दिली होती पुन्हा एकदा हुलकावणी दिली. तर जोकोव्हिचनं नवव्या ऑस्ट्रेलियन जेतेपद पटाकवलं आहे. मेदवेदेव हा मरात सॅफिननंतर (२००५) ऑस्ट्रेलियन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा रशियाचा पहिला टेनिसपटू ठरला आहे.


🔰अव्वल खेळाडूंविरुद्ध सहज विजय मिळवणाऱ्या मेदवेदेवने विजयाची मालिका अखंड राखली आहे. लंडनमध्ये मलाही त्याने सरळ सेटमध्ये पराभूत केले आहे. दमदार सव्‍‌र्हिस तसेच ताकदवान फोरहँड व बॅकहँड असलेल्या मेदवेदेने कामगिरीत प्रचंड सुधारणा केली आहे.

मंगळावर पाय ठेवण्याआधी.



🔰मगळ ग्रह हा पृथ्वीचा सहोदर मानला जातो, म्हणजे जेव्हा सौरमालेची निर्मिती झाली तेव्हापासून या ग्रहाशी पृथ्वीचे जवळचे नाते आहे. पत्रिकेत जरी मंगळ त्रासदायक वाटत असला तरी तो लोभसवाणा आहे. या ग्रहावर पूर्वी सूक्ष्म जीव असावेत या शक्यतेतून तेथे सातत्याने शोध घेतला जात आहे.


🔰सभाव्य अवकाश थांब्यावर पहिला सेल्फी - सध्या संयुक्त अरब अमिरात (होप), चीन (तियानवेन १) यांची मंगळयाने मंगळाच्या कक्षेत आहेत, तर अमेरिकेच्या नासा व युरोपीय अवकाश संस्थेची परसिव्हिरन्स ही बग्गीसारखी गाडी तेथे उतरण्यात यशस्वी झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी गाडी आहे. मंगळ हा इतर ग्रहांवरील मोहिमांसाठी थांबा (स्टॉप) ठरू शकतो अशीही एक कल्पना आहे. मंगळावर मानवी वसाहतींची कल्पनाचित्रेही तयार आहेत.


🔰अमेरिकेसाठी रोव्हर गाडी मंगळावर उतरवणे हे फार अवघड काम नाही हे खरे असले तरी, ही सर्वात मोठी गाडी असून तिच्या मदतीने तेथील विवरातील खडक गोळा करून ते पृथ्वीवर आणले जाणार आहेत, हे या मोहिमेचे वैशिष्ट्य आहे. शिवाय त्यावरील कॅमेरे प्रथमच रंगीत छायाचित्रे घेत असून रोव्हर गाडीने मंगळावरचा सेल्फीही काढून पाठवला आहे.

इंडिया टॉय फेयर 2021’: भारतातला पहिला राष्ट्रीय खेळणी मेळावा.



🔰भारतात प्रथमच, ‘इंडिया टॉय फेयर’ नामक पहिला राष्ट्रीय खेळणी मेळावा दि. 27 फेब्रुवारी ते 2 मार्च 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे.


🔰राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी यांच्या स्वनिर्मित खेळणीना राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी याद्वारे मिळणार आहे. तसेच राज्यस्तरीय खेळणी निर्मिती स्पर्धा यामध्ये ही सहभागी होता येणार आहे.


🔰कार्यक्रमात विविध विषयांवर आधारित 1000 पेक्षा जास्त स्टॉल पाहायला मिळणार. तसेच ज्ञानवर्धक चर्चासत्रे आणि वेबिनार देखील आयोजित केले जातील.


🔰कार्यक्रमात NCERT, SCERT, CBSE यासारख्या शैक्षणिक संस्था, IIT गांधीनगर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन आणि अहमदाबाद येथील चिल्ड्रेन युनिव्हर्सिटी यांच्या मदतीने मुलांना कल्पक खेळणे तयार करण्याविषयीचे प्रशिक्षण दिले जाणार.


🔴पार्श्वभूमी....


🔰भारतातले खेळण्यांच्या बाजारपेठेचे मूल्य सुमारे एक अब्ज अमेरिकी डॉलर आहे, परंतु 80 टक्के खेळणी आयात केली जातात. भारताला जागतिक खेळण्यांचे उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. देशांतर्गत खेळण्यांचे उद्योग आणि स्थानिक उत्पादकांनी न वापरलेल्या संसाधनांचा वापर करण्यासाठी एक परिसंस्था तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

कर्नाटकमध्ये द्वितीय ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’ खेळवले जातील.



🔰कर्नाटक राज्याच्या बेंगळुरु शहरात द्वितीय ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’ खेळवले जाण्याची घोषणा क्रिडा मंत्रालयाकडून करण्यात आली आहे.


🔴ठळक बाबी....


🔰कार्यक्रमाचे आयोजन ‘भारतीय विद्यापीठ संघ; यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहेत.


🔰25 वर्ष वयोगटाखालील 4,000 हून अधिक क्रिडापटू स्पर्धेत भाग घेणार आहेत, ज्यांची निवड राष्ट्रीय संघासाठी केली जाणार.खेळांच्या द्वितीय आवृत्तीत मल्लखांब आणि योगासन हे दोन नवीन क्रिडाप्रकार समाविष्ट करण्यात आले आहेत.


🔴‘खेलो इंडिया’ विषयी....


🔰एप्रिल 2016 मध्ये भारत सरकारने देशात क्रिडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘खेलो इंडिया’ या नवीन योजनेचा प्रारंभ केला. सुरुवातीच्या काळात या योजनेत मैदानी खेळ, वॉलीबॉल, कबड्डी, फुटबॉल, जूडो, हॉकी, बॉक्सिंग, टेबल टेनिस, बास्केट बॉल आणि कुस्ती या खेळांचा समावेश करण्यात आला होता आणि पुढे त्याची व्याप्ती इतर खेळांसाठी वाढविण्यात आली आहे.


🔰भारतीय क्रिडा शिष्यवृत्ती योजनेंतर्गत गुणवंत तरुण खेळाडूंची निवड करून त्यांना सलग 8 वर्षांसाठी प्रत्येकी 5 लक्ष रूपयांची वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते.


🔰ही स्पर्धा अगदी तळागळातील उत्कृष्ट खेळाडूंना समोर आणण्याच्या उद्देशाने आहे. यामध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केलेल्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्टता साध्य करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

जागतिक खवल्या मांजर दिन: 20 फेब्रुवारी 2021



🎗दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसरा शनिवार जगभरात “जागतिक खवल्या मांजर दिन” म्हणून साजरा करतात. यंदा, 20 फेब्रुवारी 2021 रोजी 10 वा जागतिक खवल्यामांजर दिन साजरा केला गेला.


🎗खवल्या मांजर या दुर्मिळ प्राण्याविषयी जागृती वाढविणे आणि संवर्धनाच्या प्रयत्नांना गती देणे हे या दिवसाचे उद्दीष्ट आहे.


🌺खवल्या मांजर विषयी....


🎗खवल्या मांजर (Pangolin) हा फॉलिडोटा वर्गातल्या मॅनिडी कुळातील मॅनिस प्रजातीतील सस्तन प्राणी आहे.


🎗हा आफ्रिका व आशिया इथल्या उष्ण कटिबंधीय भागांमध्ये आढळतो.


🎗जयाची त्वचा खवल्यांनी आच्छादलेली असते असा हा एकमेव सस्तन प्राणी आहे.

खवल्या मांजर निशाचर आहेत आणि त्यांच्या आहारात प्रामुख्याने मुंग्या आणि वाळवी असतात.


🎗खवल्या मांजर हा जगातील सर्वात जास्त अवैधरीत्या तस्करी होणारा सस्तन प्राणी आहे.खवल्या मांजराच्या आठ प्रजातींपैकी दोन (मनीस क्रॅसिकाडाटा आणि मनीस पेंटाटाक्टिला) भारतात आढळतात.

भारत-ऑस्ट्रेलिया चक्रीय अर्थव्यवस्था (I-ACE) हॅकाथॉन, 2021



🔰ऑस्ट्रेलिया आणि भारतातील प्रतिभावान विद्यार्थी आणि स्टार्टअप उद्योगांना अभिनव तंत्रज्ञानाच्या मदतीने सामायिक समस्या सोडवण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने “भारत-ऑस्ट्रेलिया चक्रीय अर्थव्यवस्था (I-ACE) हॅकाथॉन, 2021” आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन 18 फेब्रुवारी 2021 रोजी झाले. 


🔰‘चक्रीय अर्थव्यवस्था' मॉडेल, जे केवळ कचरा व्यवस्थापन करत नाही तर पुनर्वापर, पुनर्प्रक्रिया आणि जबाबदार उत्पादन जे नवीन उद्योग आणि रोजगारांच्या विकासात सहाय्य करू शकते, उत्सर्जन कमी करते आणि नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर वाढवते.


🅾️ठळक बाबी


🔰भारताच्या नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन (AIM) आणि ऑस्ट्रेलियाच्या कॉमनवेल्थ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशन (CSIRO) या संस्थांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.


🔰पकेजिंग कचरा कमी करणारे पॅकेजिंगमधील नावीन्यपूर्ण संशोधन, नासाडी टाळणारे अन्नपुरवठा साखळीतील नवसंशोधन, प्लास्टिक कचरा कमी करण्याच्या संधी निर्माण करणे आणि महत्वपूर्ण ऊर्जा धातू आणि ई-कचरा यांचा पुनर्वापर करणे, अश्या विविध विषयांवर हा कार्यक्रम केंद्रित केला गेला आहे.


🔰दोन्ही देशांकडून प्राप्त झालेल्या 1000 हून अधिक अर्जाची कठोर तपासणी प्रक्रिया झाली, त्यानंतर अव्वल 80 अर्जांची निवड द्विपक्षीय हॅकेथॉनसाठी केली गेली, ज्यामध्ये दोन्ही राष्ट्रांचे विद्यार्थी आणि स्टार्टअप उद्योगांना प्राधान्याने चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या अभिनव पद्धतींवर एकत्र काम करतील. निवड झालेल्या संघानी प्रासंगिक, नाविन्यपूर्ण, अंमलबजावणी योग्य, प्रभावी आणि जागतिक बाजारपेठेत व्यावसायीकरण करता येतील अशा कल्पक उपाययोजनांवर काम करणार आहे.

पद्मपुरस्कार २०२१ : एकुण २९ महिलांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले



✅ पद्मभूषण

👩‍🦰 समित्रा महाजन : सार्वजनिक व्यवहार

👩‍🦰 क एस चित्रा : कला 


✅ पद्मश्री पुरस्कार 

👩‍🦰 पी अनिथा : खेळ

👩‍🦰 सधा सिंह : खेळ

👩‍🦰 मौमा दास : खेळ

👩‍🦰 अशू जमसेन्पा : खेळ

👩‍🦰 भरी बाई : कला

👩‍🦰 दलारी देवी : कला

👩‍🦰 राधे देवी : कला

👩‍🦰 पी जनी : कला

👩‍🦰 सजिदा खातून : कला

👩‍🦰 लाजवंती : कला

👩‍🦰 बॉम्बे जयश्री : कला

👩‍🦰 एन सुमथी : कला

👩‍🦰 एम जोगती : कला 

👩‍🦰 लाखिमी बरुआ : सामाजिक कार्य

👩‍🦰 बी सांगखूमी : सामाजिक कार्य

👩‍🦰 चट्नी देवी : सामाजिक कार्य

👩‍🦰 शांती देवी : सामाजिक कार्य

👩‍🦰 परकाश कौर : सामाजिक कार्य

👩‍🦰 नीरु कुमार : सामाजिक कार्य

👩‍🦰 आर बिरुबाला : सामाजिक कार्य

👩‍🦰 सिंधुताई सपकाळ : सामाजिक कार्य

👩‍🦰 रजनी बेक्टर : उद्योग

👩‍🦰 जसवंतीबेन पोपट : उद्योग

👩‍🦰 मदुला सिन्हा : साहित्य

👩‍🦰 उषा यादव : साहित्य

👩‍🦰 बिजया चक्रवर्ती : सार्वजनिक व्यवहार

👩

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विषयी काही महत्त्वाची माहिती



( अध्यक्ष विशेष )


1) काँग्रेस चे पहिले अध्यक्ष 

    - व्योमेश चंद्र बॅनर्जी ( 1985 )


2) काँग्रेस च्या पहिल्या महिला अध्यक्षा 

    - अॅनी बेझंट ( 1917 )


3) काँगेस चे पहिले मुस्लिम अध्यक्ष

    - बद्रुद्दिन तैयबजी( 1887 )


4) काँग्रेस चे पहिले पारशी अध्यक्ष

    - दादाभाई नौरोजी ( 1886)


5) काँग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष

    - पी. आनंद चार्लू ( 1891 )


6) काँगेस च्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा- सरोजिनी नायडू ( 1925 )


7) काँग्रेसचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष

    - सर नारायण गणेश चंदावरकर ( 1900)


8) काँग्रसचे सर्वात जास्त काळ राहिलेले अध्यक्ष - मौलाना आझाद ( 1940 - 1946)


9) ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन

    - फैजपूर ( 1936 )


10) काँग्रेसचे एकदाही अध्यक्षपद न मिळालेली महत्त्वाची व्यक्ती

    - बाल गंगाधर टिळक

चालू घडामोडी प्रश्न सराव



 ● ‘राष्ट्रीय फलोत्पादन मेळावा-2021’ या कार्यक्रमाचा विषय काय आहे?

*उत्तर* : स्टार्ट-अप आणि स्टँड-अप इंडियासाठी फलोत्पादन


● ‘चहा बागिचा धन पुरस्कार’ मेळावा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला?

*उत्तर* : गुवाहाटी (आसाम)


● ‘CoBRA’ या संज्ञेचे पूर्ण नाव काय आहे?

*उत्तर* : कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट अ‍ॅक्शन


● लहान मुलांसाठी ‘फेडफर्स्ट’ बचत खाता योजना कोणत्या बँकेने सादर केली?

*उत्तर* : फेडरल बँक


● जगातल्या सर्वात शक्तिशाली रेडिओ दूर्बिणीची स्थापना कोणती संस्था करणार आहे?

*उत्तर* : स्क्वेअर किलोमीटर अ‍ॅरे वेधशाळा (SKAO) परिषद


● जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) नेतृत्व करणाऱ्या कोणती व्यक्ती प्रथम महिला ठरणार?

*उत्तर* : नगोजी ओकोंजो-इव्हिला


● गूगल क्लाऊड कंपनीने भारतातल्या व्यवसायासाठी नवीन व्यवस्थापन संचालक म्हणून कोणाची नेमणूक केली?

*उत्तर* : बिक्रम सिंग बेदी


● प्रधानमंत्री मातृ वंदना योजने (PMMVY) ची अंमलबजावणी कोणते मंत्रालय करीत आहे?

*उत्तर* : महिला व बाल विकास मंत्रालय

विविध राज्यांचे नवीन नियुक्त झालेले मुख्य न्यायाधीश....





👤 ज के माहेश्वरी : सिक्कीम उच्च न्यायालय


👤 ए के गोस्वामी : आंध्रप्रदेश उच्च न्यायालय


👤 पकज मित्तल : जम्मू व कश्मीर आणि लदाख उच्च न्यायालय


🙎‍♀ हिमा कोहली : तेलंगणा उच्च न्यायालय


👤 मोहम्मद रफिक : मध्यप्रदेश उच्च न्यायालय


👤 आर एस चौहान : उत्तराखंड उच्च न्यायालय


👤 एस मुरलीधर : ओडिशा उच्च न्यायालय


👤 सजीब बँनर्जी : मद्रास उच्च न्यायालय 


👤 सधांशू धुलिया : गुवाहाटी उच्च न्यायालय .

लोकसभा निवडणूका : निवडून आलेल्या महिलांची संख्या (१९५१ ते २०१९)


👩 ०१ली : १९५१ : २२ महिला

👩 ०२री  : १९५७ : २२ महिला

👩 ०३री  : १९६२ : ३१ महिला

👩 ०४थी : १९६७ : २९ महिला

👩 ०५वी : १९७१ : २८ महिला

👩 ०६वी : १९७७ : १९ महिला

👩 ०७वी : १९८० : २८ महिला

👩 ०८वी : १९८४ : ४३ महिला

👩 ०९वी : १९८९ : २९ महिला

👩 १०वी : १९९१ : ३९ महिला

👩 ११वी : १९९६ : ४० महिला

👩 १२वी : १९९८ : ४३ महिला

👩 १३वी : १९९९ : ४९ महिला

👩 १४वी : २००४ : ४५ महिला

👩 १५वी : २००९ : ५९ महिला

👩 १६वी : २०१४ : ६६ महिला

👩 १७वी : २००९ : ७८ महिला .

घटनेतील महत्वाची कलमे


● घटना कलम क्रमांक 14 : कायद्यापुढे समानता


● घटना कलम क्रमांक 15 : भेदभाव नसावा


● घटना कलम क्रमांक 16 : समान संधी


● घटना कलम क्रमांक 17 : अस्पृश्यता निर्मूलन


● घटना कलम क्रमांक 18 : पदव्यांची समाप्ती


● घटना कलम क्रमांक 19 ते 22 : मूलभूत हक्क


● घटना कलम क्रमांक 21अ : प्राथमिक शिक्षण


● घटना कलम क्रमांक 24 : बालकामगार निर्मूलन


● घटना कलम क्रमांक 25 : धर्म स्वातंत्र्याचा अधिकार


● घटना कलम क्रमांक 26 : धार्मिक संस्था स्थापन करणे व चालवणे


● घटना कलम क्रमांक 28 : धार्मिक शिक्षण देण्यावर बंधी


● घटना कलम क्रमांक 29 : स्वतःभाषा व लिपी, संस्कृती जतन करणे


● घटना कलम क्रमांक 30 : अल्पसंख्यांक समाजाला शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार


● घटना कलम क्रमांक 40 : ग्राम पंचायतीची स्थापना


● घटना कलम क्रमांक 44 : समान नागरिक कायदा


● घटना कलम क्रमांक 45 : 6 ते 14 वयोगटातील मुळा मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण


● घटना कलम क्रमांक 46 : शैक्षणिक सवलत


● घटना कलम क्रमांक 352 : राष्ट्रीय आणीबाणी


● घटना कलम क्रमांक 356 : राज्य आणीबाणी


● घटना कलम क्रमांक 360 : आर्थिक आणीबाणी


● घटना कलम क्रमांक 368 : घटना दुरूस्ती


● घटना कलम क्रमांक 280 : वित्त आयोग


● घटना कलम क्रमांक 79 : भारतीय संसद


● घटना कलम क्रमांक 80 : राज्यसभा


● घटना कलम क्रमांक 81 : लोकसभा


● घटना कलम क्रमांक 110 : धनविधेयक


● घटना कलम क्रमांक 315 : लोकसेवा आयोग


● घटना कलम क्रमांक 324 : निर्वाचन आयोग


● घटना कलम क्रमांक 124 : सर्वोच्च न्यायालय


● घटना कलम क्रमांक 214 : उच्च न्यायालय .

Online Test Series

Saturday 20 February 2021

चालू घडामोडी प्रश्न उत्तरे



१. शांघाई सहयोग संघटन (SCO) - २०२० चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे ?

 A) किर्गिजस्तान 

 B) रशिया 

 C) चीन 

 D) भारत

Correct Answer D 

भारत 


२. शांघाई सहयोग संघटन मध्ये भारताने पूर्ण सदस्यत्व कधी स्वीकारले ? 

  A) ९ जून २०१६ 

 B) ९ जून २०१९ 

 C) ९ जून २०१७ 

 D) ९ जून २०१८

Correct Answer C

९ जून २०१७ 


३.सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस हा म्हणून __साजरा केला जातो?

  A) भारतीय प्रवासी दिन 

 B) राष्ट्रीय एकता दिन 

 C) राष्ट्रीय युवा दिन 

 D) राष्ट्रीय शांतता दिन

Correct Answer B 

राष्ट्रीय एकता दिन


४. " DPD" चे संक्षिप्त रुप काय आहे ?

  A) डायरेक्ट पोर्ट डिलीव्हरी 

 B) डूअर पोर्ट डिलीव्हरी 

 C) डायरेक्ट पार्सल डिलीव्हरी 

 D) डायरेक्ट पार्टी डिलीव्हरी

Correct Answer A 

डायरेक्ट पोर्ट डिलीव्हरी 


५. अमेरिकेच्या "स्टॅच्यू ऑफ लिबर्टी" ची उंची ९३ मीटर आहे तर, भारतातील स्टैच्यू ऑफ़ यूनिटी ची उंची किती मीटर आहे ? 

  A) १७२ 

 B) १९८ 

 C) १९० 

 D) १८२

Correct Answer D 

१८२ 


६. १९६२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाला सुवर्णपदक जिंकून देणारे महान फुटबॉल पटू यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय टपाल विभागाने तिकीट जारी केले? 

  A) चुनी गोस्वामी 

 B) गोशतो पॉल 

 C) तालिमेरेन आओ 

 D) वरीलपैकी सर्व

Correct Answer A 

चुनी गोस्वामी 


७. 'आयसीसी ' युवा (१९ वर्षाखालील ) विश्व चषक क्रिकेट-२०२० स्पर्धा कोठे होणार आहे ?

  A) इंग्लंड 

 B) द. आफ्रिका 

 C) ऑस्ट्रेलिया 

 D) वेस्ट इंडिज

Correct Answer B 

द. आफ्रिका 


८. " रायसीना डायलॉग " हा दोन दिवसीय कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला?

  A) मध्य प्रदेश 

 B) दिल्ली 

 C) हरियाणा 

 D) मुंबई

Correct Answer B 

दिल्ली 


९. शांघाई सहयोग संघटनेच्या आठ आश्चर्यमध्ये भारतातील कोणत्या स्थळांचा समावेश करण्यात आला?

  A) सुवर्ण मंदिर 

 B) नालंदा विद्यापीठ 

 C) ताज महाल 

 D) स्टैच्यू ऑफ़ यूनिटी

Correct Answer D 

स्टैच्यू ऑफ़ यूनिटी 


१०. शांघाई सहयोग संघटन चे मुख्यालय कोठे आहे ?

  A) इस्लामाबाद (पाकिस्तान) 

 B) मास्कोव (रशिया) 

 C) बीजिंग (चीन) 

 D) दिल्ली (भारत) 

Correct Answer C 

बीजिंग (चीन)

अजय मल्होत्रा यांची मानवाधिकार परिषदेच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली



• माजी भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी अजय मल्होत्रा   संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत.  


• या पदावर निवड झालेले ते पहिले भारतीय आहेत.  


• आपल्या सेवा कालावधीत त्यांनी बरीच महत्त्वाची पदे भूषवली आहेत.  ते रशियामध्ये भारताचे उच्चायुक्त राहिले आहेत.  त्यांनी केनियामधील नेरोबी इंडियन हाय कमिशनमध्येही काम केले आहे.  


• नोव्हेंबर 2013 मधे ते परराष्ट्र सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.


• केनिया आणि सेशल्ससारख्या देशांशी देशाचे संबंध दृढ करण्यासाठी अजय मल्होत्रा   यांनी 1979 1982 to या काळात नैरोबीच्या उच्च आयोगातही काम केले आहे.  


• 1985 मध्ये त्यांनी जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्राच्या स्थायी मिशनमध्ये सचिव म्हणूनही काम पाहिले.  येथे त्यांनी 1989 पर्यंत सेवा बजावली.


• ILO मध्येही त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.


• संयुक्त राष्ट्राची मानवाधिकार सल्लागार समिती ही परिषदेची “थिंक टँक” म्हणून काम करते.


संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद (UNHRC) 


• संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद, ही संस्था संयुक्त राष्ट्राचे एक अंग म्हणून एक आंतर-सरकारी संस्था म्हणून कार्यरत आहे.  


• स्थापना - 2006 साली संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाच्या जागी ही परिषद स्थापन केली गेली.  


• उद्देश - विविध देशांमध्ये मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे, त्यांचे संरक्षण करणे आणि उल्लंघन झाल्यास तोडगा काढणे हे या परिषदेचे उद्दीष्ट आहे.


• मुख्यालय -  जिनिव्हा (स्वित्झर्लंड)  

• सदस्य - 47, सदस्य भौगोलिक आधारावर  तीन वर्षांच्या कालावधीसाठी निवडले जातात केले आणि जास्तीत जास्त दोन टर्म असतात.


• गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पाकिस्तान पुन्हा यूएनएचआरसीचा सदस्य झाला असून आता तो  2023 पर्यंत सदस्य राहील तर 2021 पर्यंत भारत परिषदेचा सदस्य आहे.


• अलीकडेच फिजीचे राजदूत नाझत शमीम खान यांची संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचे (यूएनएचआरसी) अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

तरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) दशकातील पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले



पुरस्कार विजेत्यांची यादी

◆ दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू 

- विराट कोहली

◆ दशकातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू 

- एलिस पेरी

◆ दशकातील सर्वोतम कसोटी क्रिकेटपटू 

- स्टीव्ह स्मिथ

◆ दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू 

- विराट कोहली 

◆ दशकातील सर्वोत्तम ट्वेन्टी-२० क्रिकेटपटू 

- राशिद खान 

◆ दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय महिला क्रिकेटपटू 

- एलिस पेरी 

◆ दशकातील सर्वोत्तम दवेन्टी-२० महिला क्रिकेटपटू 

- एलिस पेरी 

◆ दशकातील सर्वोत्तम संलग्न क्रिकेटपटू  

- कायले कोएटझर 

◆ दशकातील सर्वोत्तम महिला संलग्न क्रिकेटपटू 

- कॅथरिन ब्राइस

◆ दशकातील सर्वोत्तम खेलभावनेचा पुरस्कार 

- महेंद्रसिंह

एक एप्रिलपासून मोबाइल युझर्सला कॉल आणि इंटरनेटसाठी मोजावे लागणार जास्त पैसे



🔰दशभरातील टेलीकॉम कंपन्यांनी येणाऱ्या महिन्यांमध्ये दरवाढ करण्याची तयारी सुरु केली आहे. या दरवाढीचा थेट फटका मोबाइल वापरणाऱ्यांना बसणार असून फोन कॉल तसेच इंटरनेटचेही दर यामुळे वाढणार आहेत. टेलीकॉम कंपन्या एक एप्रिल म्हणजेच नवीन आर्थिक वर्षापासून दरवाढ करण्याच्या विचारात आहेत.


🔰इनव्हेस्टमेंट इनफॉर्मेशन अ‍ॅण्ड क्रेडिट रेटिंग एजन्सीच्या (आयसीआरए) अहवालानुसार एक प्रिलपासून सुरु होणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये म्हणजेच २०२१-२२ मध्ये आपला नफा वाढवण्याच्या दृष्टीने कंपन्यांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही दरवाढ नक्की किती असेल यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.


🔰आयसीआरएच्या अहवालानुसार दरवाढ केल्याने आणि ग्राहकांना टू जी वरुन फोर जी सेवेकडे जाण्यासाठी प्रवृत्त केल्याने दर वापरकर्त्यामागील सरासरी नफा वाढण्याची कंपन्यांना अपेक्षा आहे. अर्थ्या वर्षात हा नफा जवळजवळ २२० कोटींपर्यंत जाऊ शकतो. त्याच्या पुढील दोन वर्षांमध्ये टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांचा नफा ११ ते १३ टक्के आणि आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ऑप्रेटिंग मार्जिनचा नफा ३८ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.


🔰करोना लॉकडाउन आणि त्यामुळे आलेल्या आर्थिक मंदीच्या वातारवणामध्येही टेलिकॉम क्षेत्राला विशेष फटका बसला नाही. उलट लॉकडाउनच्या कालावधीमध्ये इंटरनेटचा वापर वाढल्याने कंपन्यांना त्याचा आर्थिक फायदा झाला. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शाळा, व्हिडीओ कॉल्स यामुळे इंटरनेटचा वापर वाढल्याने लॉकडाउनमध्येही कंपन्यांची आर्थिक स्थिती आणखीन मजबूत झाली.

महाराष्ट्रात कॅरॅव्हॅन पर्यटन धोरणास ठाकरे सरकारची मंजुरी; जाणून घ्या कॅरॅव्हॅन पार्क म्हणजे काय



🔰पर्यटन धोरण- २०१६ मधील तरतूदीनुसार तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित पयर्टनाच्या दृष्टीने पर्यटक खाजगी वाहनाने प्रवासास प्राधान्य देत आहेत हे पाहता, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅरॅव्हॅन व कॅरॅव्हॅन पार्क या सुविधा पर्यटकांना उपलब्ध करुन देण्यासाठी कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण राबविण्यास मान्यता देण्यात आली.


🔰मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये या कॅराव्हॅन पर्यटन धोरणास मंजुरी देण्यात आली. या धोरणाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झाल्यास परदेशामध्ये एखाद्या ठराविक ठिकाणी मोठ्या संख्येने कॅरॅव्हॅन उभ्या करुन पर्यटक एकत्र जमतात तसेच चित्र लवकरच महाराष्ट्रात दिसू शकेल.


🔰करॅव्हॅन पार्क आणि कॅरॅव्हॅन असे दोन भाग या धोरणात असून यामुळे राज्यातील वैविध्यपूर्ण निसर्ग सौंदर्याचा लाभ सहजपणे पर्यटकांना घेता येईल. तसेच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी या धोरणांचा हातभार लागणार आहे. मुद्रांक शुल्कामध्ये सूट, राज्य वस्तु व सेवा कराचा परतावा, विद्युत शुल्कामध्ये सूट यासारखी प्रोत्साहने कॅरॅव्हॅन पार्क तसेच कॅरॅव्हॅन पर्यटनाकरीता लागू केल्या जाणार आहेत. पर्यटन संचालनालयाकडे कॅरॅव्हॅन व कॅरॅव्हॅन पार्कची नोंदणी आवश्यक असणार आहे.


🔰करॅव्हॅन व कॅरॅव्हॅन पार्क व्यावसायिकांना पर्यटन संचालनालयामार्फत मार्केटिंग, स्वच्छता, व्यवस्थापन यांचे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच त्यांची प्रसिध्दी देखील करण्यात येईल असं सरकारने स्पष्ट केलं आहे. या कॅरॅव्हॅन पार्क आणि कॅरॅव्हॅनवर आधारित पर्यटन संकल्पनेमुळे पर्यटकांना राहण्याची सुविधा तसेच खाजगी गुंतवणूकीसही प्रोत्साहन मिळेल. कौटुंबिक सहलींचे आयोजन, हॉटेल्स आणि रिसॉर्ट या पारंपरिक निवास व्यवस्थेपेक्षा वेगळा अनुभव, ना विकास क्षेत्राचा योग्य वापर, दुर्गम भागातील पर्यटनाला चालना देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे यामुळे शक्य होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

आसाममध्ये 'महाबाहु-ब्रह्मपुत्र’चा प्रारंभ.



🔰18 फेब्रुवारी 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममध्ये ‘महाबाहु-ब्रह्मपुत्र’ प्रकल्पाचा प्रारंभ केला.


🔰‘महाबाहु-ब्रह्मपुत्र’चा आरंभ प्रसंगी त्यांनी नेमाती-माजुली बेटे, उत्तर गुवाहाटी-दक्षिण गुवाहाटी आणि धुबरी-हातसिंगीमारी दरम्यानच्या रो-पॅक्स जहाज वाहतुकीचे उद्‌घाटन केले.


🔰आसाम आणि ईशान्येकडील अन्य भागात संपर्क हे मोठे आव्हान राहिले आहे. ‘महाबाहु-ब्रह्मपुत्रा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्राद्वारे बंदर विकासातून जल संपर्क सुविधा मजबूत केली जाणार आहे. सुरू करण्यात आलेल्या तीन रो-पॅक्स सेवांमुळे इतक्या मोठ्या स्तरावर रो पॅक्स सेवेशी जोडले गेलेले आसाम राज्य देशातील अग्रणी राज्य झाले आहे. यामुळे चार पर्यटन जेट्टीसह आसामसह ईशान्येकडील संपर्क सुविधेत लक्षणीय सुधारणा होईल.


🔰माजुली ते नेमाटी दरम्यान रो-पॅक्स सेवा असा एक मार्ग आहे, ज्यामुळे रस्ते प्रवासाचे सुमारे 425 किमीचे अंतर कमी होऊन ते फक्त 12 किमीपर्यंत येईल. या मार्गावर दोन जहाजे चालविण्यात येत आहेत, जी एका वेळेला 1600 प्रवासी आणि डझनभर वाहनांची वाहतूक करतात.


🔰गवाहाटीमध्ये सुरू झालेली अशाच प्रकारची सुविधा उत्तर आणि दक्षिण गुवाहाटीमधील अंतर 40 किमीवरून 3 किमीपर्यंत कमी करेल.

नर्चरिंग नेबरहुड्स चॅलेंज’ जाहीर.



💫18 फेब्रुवारी 2021 रोजी केंद्रीय 

गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या स्मार्ट सिटीज अभियानाने ‘नर्चरिंग नेबरहुड्स चॅलेंज’ समूहासाठी (आपल्या आजूबाजूचा परिसर विकास आव्हान) अंतर्गत 25 शहरांची अंतिम यादी जाहीर केली आहे.


💫‘नर्चरिंग नेबरहुड्स चॅलेंज’ समूहासाठी पुढील शहरे निवडली आहेत - आगरतळा, बंगळूरू, कोइंबतूर, धर्मशाला, इरोडे, हुबळी-धारवाड, हैदराबाद, इंदूर, जबलपूर, काकीनाडा, कोची, कोहिमा, कोटा, नागपूर, राजकोट, रांची, रोहतक, राउरकेला, सालेम, सूरत, तिरुवनंतपुरम, तिरुपुर, उज्जैन, वडोदरा आणि वरंगल.


💫तीन महिन्यांच्या अर्जाच्या कालावधीत, नर्चरिंग नेबरहुड्स चॅलेंज अंतर्गत 100 पेक्षा जास्त शहरे दूरस्थ किंवा वैयक्तिक चर्चा आणि ऑनलाइन क्षमता-निर्माण कार्यशाळांमध्ये सहभागी झाली. एकत्रितपणे, संपूर्ण देशभरात 300 पेक्षा जास्त पायलट प्रकल्प प्रस्तावित आहेत जे 0-5 वर्षे वयोगटातील 12 लाख मुलांचे जीवनमान सुधारतील.


🌈कार्यक्रमाविषयी.....


💫4 नोव्हेंबर 2020 रोजी सुरू करण्यात आलेल्या नर्चरिंग नेबरहुड्स चॅलेंजने सर्व स्मार्ट शहरे, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची राजधानी आणि 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांना यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले. 


💫या उपक्रमात, निवडलेल्या शहरांना त्यांचा प्रस्ताव, सज्जता आणि वचनबद्धतेच्या आधारे-लहान मुलांचे जीवनमान सुधारणारे प्रायोगिक प्रकल्प आणि स्थानिक समाधान विकसित करण्यासाठी आवश्यक ती तांत्रिक मदत आणि क्षमता-निर्मिती उपलब्ध करून दिली जाईल.


💫सर्वसमावेशक विकासाच्या मुख्य उद्देशांतर्गत, केंद्र सरकार सर्व असुरक्षित नागरिकांसाठी, विशेषत: लहान मुलांसाठी शहरी भागात संधी वाढविण्यासाठी वचनबद्ध आहे.


💫हा तीन वर्षात राबविला जाणारा उपक्रम आहे, सरकारच्या स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत मुलांचे बालपण केंद्रस्थानी ठेवून शेजारील परिसराचा विकास करण्यास मदत करणे हे याचे उद्दिष्ट आहे.

बर्नार्ड व्हॅन लीअर फाऊंडेशन आणि तांत्रिक भागीदार WRI इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


💫लहान मुलांच्या समृद्ध बालपणासाठी आरोग्यदायी शहरी वातावरण निर्माण करण्यासाठी शहरांना सहभागी करून या आव्हानाने स्थानिक पातळीवरील शेजारील परिसर विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. नागरिकांची गुणवत्ता वाढविणार्‍या स्थानिक क्षेत्रात सुटसुटीत, सर्वसमावेशक, लोकाभिमुख विकासासाठी शहर-व्यापी उपाययोजना वाढविण्यासाठी स्मार्ट सिटीज अभियानाच्या धोरणाशी हा दृष्टिकोन सुसंगत आहे.

सार्वत्रिक लसीकरणासाठी ‘सघन मिशन इंद्रधनुष 3.0’



🔰केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी 19 फेब्रुवारी 2021 रोजी ‘सघन मिशन इंद्रधनुष (IMI) 3.0’ या राष्ट्रव्यापी कार्यक्रमाचा प्रारंभ केला.


🔰कद्रीय मंत्र्यांनी IMI 3.0 पोर्टल देखील सुरू केले आणि IMI 3.0 यासाठी मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध केली तसेच अभियानाचा एक भाग म्हणून विकसित केलेल्या जनजागृती साहित्य / IEC पॅकेजचे अनावरण केले.


🅾️ठळक बाबी


🔰अभियान दोन फेऱ्यात होणार असून, पहिली फेरी 15 दिवसांसाठी 22 फेब्रुवारी 2021 पासून सुरू होणार आणि दुसरी फेरी 22 मार्च 2021 पासून सुरू होणार आहे.


🔰दशातील 29 राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील निवडक 250 जिल्हे / शहरी भागात त्यांचे आयोजन केले जाईल.


🔰कोविड-19 महामारीच्या काळात ज्या मुले आणि गर्भवती स्त्रियाना लस घेता आली नाही त्यांच्या लसीकरणावर या कार्यक्रमामध्ये भर दिला जाणार आहे. IMI 3.0 च्या दोन फेऱ्यांमध्ये त्यांची ओळख पटवली जाईल आणि त्यांना लस दिली जाईल.


🔰सथलांतरित क्षेत्रातील लाभार्थी आणि पोहोचण्यास कठीण अशा दुर्गम भागाकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.


🅾️भारत सरकारचे मिशन इंद्रधनुष


🔰2020 सालापर्यंत देशातील सर्व बालकांना लसीकरण कार्यक्रमांतर्गत आणण्यासाठी 15 डिसेंबर 2014 रोजी ‘मिशन इंद्रधनुष’ हे अभियान आरोग्य मंत्रालयाने सुरू केले. 2018 सालापर्यंत सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाच्या अंतर्गत दोन वर्षाखालील वयोगटातली मुले आणि गर्भवती स्त्रियांना उपलब्ध सर्व लसी प्रदान करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम होता.


🔰8 ऑक्टोबर 2017 रोजी गुजरातच्या वडनगरमध्ये ‘सघन मिशन इंद्रधनुष’ (Intensified Mission Indradhanush -IMI) या अभियानाला सुरुवात करण्यात आली. हा भारत सरकारचा एक प्रमुख लसीकरण कार्यक्रम आहे. यादरम्यान निवडक शहरी क्षेत्रांमध्ये आणि अन्य ठिकाणी, जेथे लसीकरण कमी प्रमाणात केले जाते, तेथे लक्ष केंद्रित केले गेले. या विशेष अभियानांतर्गत 90 टक्के क्षेत्रांना सामील केले जाईल.


🔰“सघन मिशन इंद्रधनुष” आतापर्यंत 690 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आले आहे आणि 3 कोटी 76 लक्ष 40 हजार मुले आणि 94 लक्ष 60 हजार गर्भवती महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे.

‘गो इलेक्ट्रिक’: विजेवर चालणाऱ्या वाहन व उपकरणांच्या लाभाबाबत जागृती मोहीम



🔰19 फेब्रुवारी 2021 रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘गो इलेक्ट्रिक’ नामक एका मोहिमेचा प्रारंभ केला गेला. शिवाय ई-मोबिलिटी इको सिस्टीमचा विकास दर्शवणाऱ्या गो इलेक्ट्रिक मोहिमेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.


🔰विजेवर चालणारी वाहने, अश्या वाहनांसाठी चार्जिंगची पायाभूत सुविधा आणि स्वयंपाकासाठी विजेवर चालणाऱ्या उपकरणांच्या लाभाबाबत जागृती करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे.


🅾️ठळक बाबी


🔰ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या एनर्जी इफिशियन्सी ब्युरोकडे (BEE) ही जागृती मोहीम राबवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आयातीचे 8 लक्ष कोटी रुपयांचा खर्च असलेल्या जीवाश्म इंधनासाठी ‘इलेक्ट्रिक वीज’ इंधन हा एक शाश्वत पर्याय आहे. पारंपरिक इंधनाशी तुलना करता वीज इंधन हे कमी खर्चिक, कार्बन उत्सर्जन कमी करणारे आणि स्वदेशी आहे.


🔰गो इलेक्ट्रिक मोहीम, येत्या काही वर्षात देशाचे आयातीवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी मदत करेल आणि स्वच्छ आणि हरित भविष्यासाठीही हे महत्वाचे पाऊल ठरेल.


🔰दशभरात जागृती निर्माण करण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहन निर्मात्यांचा आत्मविश्वास वृद्धिगत करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

नासाची ऐतिहासिक झेप! ‘पर्सिव्हरन्स रोव्हर’चे मंगळावर यशस्वी लँडिंग



🔰मंगळावर जीवसृष्टी अस्तित्वात होती की नाही?, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी अमेरिकेतील अंतराळ संस्था 'नासा'ने (National Aeronautics and Space Administrations) हाती घेतलेल्या मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. १८ फेब्रवारी रोजी पहाटे २.३० वाजता नासाच्या पर्सिव्हरन्स रोव्हरचं मंगळावर यशस्वी लँडिंग करण्यात आलं. जेजेरो क्रेटर (Jezero Crater) या मंगळावरील दुर्गम भागात हे रोव्हर उतरवण्यात आलं आहे.


🔰मगळावरील जीवसृष्टीच्या पाऊलखूणा शोधण्यासाठी पृथ्वीवरील पाठवण्यात आलेल्या पर्सिव्हरन्स रोव्हरनं यशस्वीपणे पाऊल टाकलं. नासाने सात महिन्यांपूर्वी मंगळावर पर्सिव्हरन्स रोव्हर पाठवला होता. १८ फेब्रुवारी रोजी पहाटे अडीच वाजता रोव्हरचं यशस्वीपणे लँडिंग करण्यात आलं. या रोव्हरच्या लँडिंगबरोबरच अमेरिका मंगळावर सर्वाधिक रोव्हर पाठवणारा पहिला देश ठरला आहे.


🔰नासाने मंगळावर पाठवलेल्या पर्सिव्हरन्स रोव्हरने जमिनीवर उतरताच पहिलं छायाचित्र पाठवलं असून, नासाने ट्विटरवर पोस्ट केलं आहे. मंगळवार जीवसृष्टी अस्तित्वात होती का? याचा शोध घेण्यासाठी नासानं पर्सिव्हरन्स रोव्हर पाठवलं असून, मंगळ ग्रहावरील अत्यंत दुर्गम भाग असलेल्या जेजेरो क्रेटरमध्ये (Jezero Crater) रोव्हर उतरवण्यात आलं आहे. जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी हे रोव्हर मंगळावरील माती आणि दगडांचे नमुने घेऊन येणार आहे.


🔰'पर्सिव्हवरन्स रोव्हर पुढील काही वर्ष मंगळावर राहणार आहे. या काळात जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचा खुणांचा शोध रोव्हर घेणार असून, मंगळावरून नमुने घेऊन पृथ्वीवर परत येऊल. ज्यामुळे भविष्यात माणसाचा मंगळावर जाण्याचा मार्ग खुला होईल,' असं नासानं म्हटलं आहे.

Latest post

ब्रिटिश काळातील शिक्षण प्रणाली

ब्रिटीशांच्या काळातील भारतातील (महाराष्ट्रातील शिक्षणपद्धती) : 1781 मतरशाची स्थापना – वॉरेन हेस्टिंग्ज अरबी आणि पारशी भाषेच्या अध्यायनासाठ...