Friday 3 February 2023

खनिजे


मँगनिज 


भारतातील एकूण मँगनिज साठय़ापकी ४० टक्के साठा एकटय़ा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात मँगनिजचे प्रमुख साठे भंडारा, नागपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आढळतात.

०     भंडारा –  या जिल्ह्य़ात आढळणारे मँगनिजचे साठे हे गोंडाइट मालेच्या खडकाशी निगडित असून ते प्रामुख्याने तुमसर तालुक्यात आढळतात.

०     नागपुर – या जिल्ह्य़ात मँगनिज हे सावनेर तालुक्यात खापा या गावापासुन पूर्वेस रामटेक तालुक्यातून भंडारा जिल्ह्य़ातील भंडारा तालुक्यापर्यंत आढळतात. हा पट्टा पुढे मध्य प्रदेशात जातो. नागपूर जिल्ह्य़ात कांदी, मनसळ, रामडोंगरी, कोदेगाव, खापा या भागांत मँगनिजचे साठे आढळतात.

०    सिंधुदुर्ग – या जिल्हय़ात सावंतवाडी व वेंगुर्ला या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात मँगनिजचे साठे आढळतात. याशिवाय कणकवली तालुक्यातही मँगनिजचे साठे आढळतात.



लोहखनिज 


भारतातील एकूण लोहखनिजांच्या साठय़ांपकी २० टक्के लोहखनिजाचे साठे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात लोहखनिजाचे साठे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ांत आढळतात.

 पूर्व विदर्भात जलजन्य खडकात लोहखनिज आढळतात. यातील गडचिरोली जिल्ह्य़ात सुरजागड लोहखनिजाचे साठे चांगल्या प्रतीचे आहेत.

०     चंद्रपूर – चिमुर तालुक्यात िपपळगाव, भिसी, तसेच ब्रह्मपुरी तालुक्यात रत्नापूर व लोहारडोंगरी येथे लोहखनिजाच्या खाणी आहेत. 

०     गडचिरोली – गडचिरोली व देऊळगाव परिसर हा लोहखनिजासाठी प्रसिद्ध आहे. येथे उच्च प्रतीची लोहखनिजे आढळतात. 

०     गोंदिया – गोरेगाव तालुक्यात मॅग्नेटाइट प्रकारचे लोहखनिज आढळते. गोंदिया जिल्ह्य़ात अग्निजन्य खडकात लोहखनिज आढळते.

०     सिंधुदुर्ग – या जिल्हय़ात वेंगुर्ला तालुक्यात रेडी, आसोली येथे तर सावंतवाडी तालुक्यात काही ठिकाणी लोहखनिजाचे साठे आढळतात. रेडीनजीक टेकडय़ांत दोन किमी लांबीपर्यंत लोहखनिजाचे साठे आहेत. 

०     कोल्हापुर – या जिल्ह्य़ात शाहुवाडी व राधानगरी तालुक्यात लोहखनिजाचे साठे आढळतात.




बॉक्साइट 


याचा उपयोग प्रामुख्याने अ‍ॅल्युमिनियम निर्मितीसाठी केला जातो. भारतातील सुमारे २१ % बॉक्साइटचे उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रातील बॉक्साइटचे साठे उच्च प्रतीचे आहेत, ते कोल्हापुर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, सातारा व सांगली या जिल्ह्य़ांत आढळतात.

०     कोल्हापूर – या जिल्ह्य़ात शाहुवाडी, राधानगरी व चंदनगड तालुक्यात बॉक्साइटचे साठे आढळतात. येथील बॉक्साइटचा उपयोग इंडियन अ‍ॅल्युमिनियम कंपनीच्या बेळगाव येथे अ‍ॅल्युमिनियम कारखान्यात धातू निर्मितीसाठी उपयोगात आणले जाते.

० रायगड – या जिल्ह्य़ात बॉक्साइटचे साठे प्रामुख्याने     मुरुड,   रोहा व श्रीवर्धन या तालुक्यांत केंद्रित आहेत.

० ठाणे – या जिल्ह्य़ात सालसेट बेट व तुगार टेकडय़ांच्या प्रदेशात बॉक्साइटचे साठे आहेत. येथील साठे कनिष्ठ प्रकारचे आहेत. या क्षेत्रांच्या व्यतिरिक्त मुंबई उपनगर (बोरिवली, जोगेश्वरी, गोरेगाव), सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आंबोली घाटाच्या प्रदेशात तसेच रत्नागिरी जिल्ह्य़ात (दापोली व मंडणगड तालुक्यात) बॉक्साइटचे साठे आढळतात. बॉक्साइटचे साठे हे मुख्यत: जांभ्या खडकात आढळतात.

  

लोणार सरोवर एक रहस्य...!



🅾️बलढाणा जिल्ह्यातील लोणार विवर हे जागतिक आश्चर्य आहे. लोणार विवर एका अशनी च्या पृथ्वीवर आदळण्याने तयार झाले आहे. उल्का आणि अशनी मधील सगळ्यात मोठा फरक बघायचा तर लोणार ला भेट द्यावीच. प्रत्येक वर्षी १५,००० टन वजनाच्या उल्का पृथ्वीच्या वातावरण प्रवेश करतात. पण पृथ्वीच्या वातावरणात जळून नष्ट होतात. 


🅾️पण अनेक हजार वर्षात ह्या उल्कांचे अशनी मात्र लोणार सारखा एखादाच होतो. उल्का जेव्हा पृथ्वीवर आदळते तेव्हा त्याला अशनी अस म्हणतात. जवळपास ५२,००० वर्षापूर्वी असाच एक अंदाजे ६० मीटर जाडीचा आणि १०,००० टन वजनी अशनी लोणार इकडे पृथ्वीला धडकला. ह्या धडकण्याने जवळपास अंदाजे ६ मेगा टन शक्तीचा स्फोट झाला. आपल्याला ज्ञात असलेल्या हिरोशिमा-नागासाकी इथली शक्ती ०.२५ मेगा टन इतकीच होती. म्हणजे लोणार इथली धडक पूर्ण भूतलावर त्यावेळी जाणवली असेल असा शास्त्रज्ञाचा होरा आहे. इतक्या प्रचंड टक्करीमुळे पृथ्वी सुद्धा आपल्या व्यासात हलली असेल. अस सुद्धा काही शास्त्रज्ञ सांगतात. 


🅾️इतक्या प्रचंड ऊर्जेमुळे १.८ किलोमीटर व्यासाच तसेच १३७ मीटर खोलीच एक विवर तयार झाल. ह्या टक्करी मधून झालेल्या उर्जेमुळे इथल तापमान १८०० डिग्री सेल्सियस पर्यंत गेल असेल. ह्यामुळे पूर्ण अशनी वितळून वायूत रुपांतर झाल असेल असा अंदाज आहे. 


🅾️लोणारच वैशिष्ठ इतकच नाही तर लोणार हे बसाल्ट दगड म्हणजेच अग्निजन्य खडकात तयार झालेलं जगातील एकमेव विवर आहे. आता कोणी विचार करेल कि ह्यात काय विशेष? तर अग्निजन्य खडक हा खडकातील सगळ्यात कठीण असा समाजला जातो. अश्या दगडात इतक खोल विवर तयार होण हेच एक आश्चर्य आहे. त्याशिवाय अग्निजन्य खडक हे चंद्र, मंगळ तसेच इतर ग्रहांवर आढळतात. त्यामुळे तिथे असलेल्या विवारांशी लोणारच्या विवराच कमालीच मिळते जुळते. चंद्रावरील तसेच मंगळावरील दगड, मातीच्या नमुन्यात व लोणार येथे मिळणाऱ्या दगड, मातीच्या नमुन्यात खूप साधर्म्य आहे. 


🅾️महणूनच क्युरोसिटी ह्या नासा च्या मंगळावरील मोहिमेआधी नासा चे वैज्ञानिक लोणार मध्ये तळ ठोकून होते. येतील दगडांच्या नमुन्याचा अभ्यास त्यांनी आपल्या यानात मंगळावर पाठवण्याआधी बंदिस्त केला. त्यायोगे ह्या दोन्ही वेगळ्या ग्रहांवरील अभ्यासातून जीवसृष्टीचा उगम शोधण्यात मदत होईल. 


🅾️लोणार अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते खाऱ्या पाण्याचे सरोवर. लोणार विवरात असलेल्या पाण्याची पी.एच. व्ह्यालू हि ११ च्या आसपास आहे (१०.७). समुद्राच्या पाण्याचा खारटपणा हा ९ च्या आसपास असतो. पण लोणार च्या आसपास कोणताही स्त्रोत नसताना इथल पाणी समुद्रापेक्षा खारट आहे. ह्यामुळे ह्या पाण्यात कोणतेच जलचर पाणी जिवंत राहू शकत नाही. इथल पाणी आरोग्याच्या दृष्टीने औषधी आहे. 


🅾️इथे अजून एक वेगळा अविष्कार बघयला मिळतो. इथल्या मातीत खूप लोखंड आहे. येथील दगडात म्याग्नेटीक प्रोपर्टी आहेत. शास्त्रज्ञाच्या मते अशनी च्या वितळण्यामुळे ह्या गोष्टी येथील परिसरात आढळून येतात. लोणार च्या परिसरात अनेक औषधी वनस्पती आहेत. इथल्या विवरामुळे पृथ्वीच्या इतर कोणत्याही भागात न आढळणाऱ्या आणि संशोधनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या गोष्टी इकडे आढळून येतात. 


🅾️इतके वर्षानंतर हि लोणार मध्ये अजूनही संशोधन चालू आहे. अजूनही सगळ्याच प्रश्नांची उत्तर शोधू शकलेले नाहीत. इथे असलेली मंदिरे, इथले खडक त्याचे गुणधर्म आणि लोणार सरोवर ह्यावर अजूनही खूप काही शोधायचं बाकी आहे. पण जीवसृष्टीच उगम स्थान आणि आपण कुठून आलो? अश्या वैश्विक प्रश्नांची उत्तर आपल्या गर्भात लपवलेल लोणार आज सरकारी अनास्था, ह्या सरोवराविषयी माहित नसलेली माहिती, अंधश्रधेने धावणारे लोक, कचरा टाकणारे, अंतिम कार्य सारखे विधी आणि इकडे येणाऱ्या अनेक प्रकारच्या दुषित पाण्याने इथली जैवविविधता धोक्यात येत आहे.


🅾️ जिकडे नासा अमेरिकेवरून मंगळावर जाण्याआधी वैज्ञानिकांना अभ्यास करण्यासाठी लोणार ला पाठवते. त्याच लोणार बद्दल उराशी मराठी अस्मिता बाळगणारे स्वताला भारतीय, मराठी म्हणवणारे सगळेच किती अनभिज्ञ आहेत हे बघून नक्कीच वाईट वाटल. 


🅾️रामायण, महाभारतात उल्लेख असणाऱ्या इतक्या प्रचंड कालावधीच प्रतिनिधित्व करणाऱ्या लोणार येथील ठेवा डोळ्यात बंदिस्त करताना स्तिमित तर झालोच पण जगातील एकमेव अश्या बसाल्ट लेक विवर समोर उभ राहून निसर्गाच्या ह्या अदाकारीला माझा कुर्निसात केला. 


🅾️अजूनही खूप काही लोणार इकडे बाकी आहे. जेव्हा जमेल, जस जमेल तेव्हा प्रत्येक भारतीयांनी आपल्या माजघरात असलेल्या लोणार ला भेट देऊन निसर्गाचा अविष्कार अनुभवयाला हवाच पण त्याचवेळी त्याच्या संवर्धनासाठी काही करता येत असेल तर त्याचा पुढाकार हि घ्यायला हवा. एक अमुल्य ठेवा आपल्या माजघरात आहे त्याच संवर्धन हे उद्याच्या पिढीसाठी मार्गदर्शक असेल.


मूलद्रव्य : लिथियम

🅾️सामान्य स्थितीमध्ये अर्थात कक्ष-तापमानाला सर्व स्थायूरूप मूलद्रव्यांमध्ये लिथियम सर्वात हलका धातू आहे. तो चांदीसारखा पांढरा परंतु मऊ असतो आणि चाकूने कापताही येतो. लिथियम साठवून ठेवणं फार कठीण. अति क्रियाशील असलेला हा धातू हवेत उघडा राहिला असता लगेच काळा पडतो व पृष्ठभागावर त्याचे ऑक्साइड तयार होते. म्हणूनच लिथियम पेट्रोलियम जेली लाऊन साठवला जातो. 


🅾️अल्कली धातू असलेला हा लिथियम अग्निजन्य खडकांपासून माहीत झाला, मात्र इतर अल्कली धातू वनस्पतींपासून शोधले गेले. म्हणूनच या मूलद्रव्याला दगड अशा अर्थाने ‘लिथोस’ या ग्रीक शब्दावरून लिथियम हे नाव दिले गेले.

निसर्गात लिथियम मुक्त स्थितीत आढळत नाही; तो सामान्यपणे सर्व अग्निजन्य खडकांमध्ये आणि खनिजांच्या झऱ्यांमध्ये कमी-जास्त प्रमाणात आढळतो. स्पॉडय़ुमिन, पेटॅलाइट, लेपिडोलाइट, अ‍ॅम्ब्लियगोनाइट या खनिजांपासून लिथियम पुरेशा प्रमाणात मिळते. समुद्राच्या पाण्यात एक कोटी भागांत सुमारे एक भाग इतक्या अल्प प्रमाणात लिथियम आढळतो. नैसर्गिकरीत्या लिथियम (६) वलिथियम (७) ही लिथियमची दोन समस्थानिके आढळतात.


🅾️१७९० साली स्वीडनमधील युटो बेटावर जोस बोनिफॅशियो-द-अ‍ॅद्राल्दा-द-सिल्वा या रसायनशास्त्रज्ञाला पेटॅलाइट हे खनिज आढळून आले. आगीवर या खनिजाची भुकटी फवारली असता ज्योत भडक किरमिजी रंगाची होत असल्याचे त्यांना दिसले. १८१७ साली या खनिजाचे विश्लेषण करत असताना जोहान ऑगस्त आर्फव्हेडसन यांना लिथियम धातूचा शोध लागला. लिथियम हा सोडियमपेक्षा हलका असल्याचे त्यांच्या लक्षात आले, परंतु त्यांना लिथियम वेगळा करता आला नाही. १८२१ साली विल्यम ब्रँडे यांनी लिथियम ऑक्साइडचे विद्युत अपघटन करून अत्यंत कमी प्रमाणात लिथियम वेगळा केला. १८५५ साली रॉबर्ट बुन्सेन (बुन्सेन बर्नरचा जनक) आणि ऑगस्तस मॅथिसन यांनी वितळलेल्या लिथियम क्लोराइडचे विद्युत अपघटन करून ग्रॅममध्ये मोजता येईल, एवढा लिथियम वेगळा केला. १९२३ मध्ये लिथियम क्लोराइड व पोटॅशियम क्लोराइड या संयुगाच्या मिश्रणाचे विद्युत अपघटन करून लिथियमच्या व्यापारी उत्पादनाची पद्धत जर्मनीतील एका कंपनीने शोधून काढली.


राज्यसेवा प्रश्नसंच

 1)भारतीय नौदलात भारताची पहिली खोल सागरी बचाव वाहन (DSRVs) प्रणाली कोणत्या नौदल गोदीत समाविष्ट करण्यात आली?

विशाखापट्टणम

मुंबई

चेन्नई

कोयंबटूर

✅ ANSWER – 2


2)कोणत्या महिन्यात वार्षिक ‘जेमिनिड’ उल्कावर्षाव पाहायला मिळू शकते?

नोव्हेंबर

डिसेंबर

मार्च

सप्टेंबर

✅ ANSWER – 2


3)डिसेंबर 2018 मध्ये भारतीय चित्रपट व दूरदर्शन संस्था (FTII) याचे अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली?

ब्रिजेंद्रपाल सिंग

गुलशन ग्रोव्हर

गजेंद्र चौहान

नंदिता दास

✅ ANSWER – 1


4)भारताने कोणत्या देशासोबत द्वैपक्षीय वार्षिक हज 2019 करार केला?

संयुक्त अरब अमीरात (UAE)

अफगाणिस्तान

सौदी अरब

बहरीन

✅ ANSWER – 3


5)कोणत्या देशाने 12 डिसेंबर 2018 रोजी घराबाहेर धूम्रपान करण्यावर बंदी घातली?

फिनलँड

नॉर्वे

डेन्मार्क

स्वीडन

✅ ANSWER – 4


6)IMFच्या अनुसार 2018 साली जागतिक कर्ज किती आहे?

$ 182 लक्ष कोटी

$184 लक्ष कोटी

$ 186 लक्ष कोटी

$ 188 लक्ष कोटी

✅ ANSWER – 2


7)कोणत्या राज्याने केंद्र सरकारकडे महिला आरक्षण विधेयक अंमलात आणण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणारा ठराव मंजूर केला?

महाराष्ट्र

पश्चिम बंगाल

केरळ

पंजाब

✅ ANSWER – 4


8)कोण मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे?

सचिन पायलट

कमल नाथ

दिग्विजय सिंग

ज्योतिरादित्य सिंधिया

✅ ANSWER – 2


9)कोणत्या देशाने 100 रुपये पेक्षा जास्त मूल्य असलेल्या भारतीय चलनाचा वापर करु नये याविषयी जागरुकता निर्माण करण्याचे ठरविले?

अफगाणिस्तान

पाकिस्तान

नेपाळ

बांग्लादेश

✅ ANSWER – 3


10)देशात राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन कधी पाळला जातो?

12 डिसेंबर

14 डिसेंबर

15 डिसेंबर

13 डिसेंबर

✅ ANSWER – 2.


Q. 1)नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडलेल्या मिझोराम राज्याच्या विधानसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या ?

⚫️ भारतीय जनता पार्टी

⚪️ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस

🔴 राष्ट्रीय मिझो फ्रंट✅✅✅

🔵 अपक्ष


Q. 2)नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडलेल्या मध्यप्रदेश राज्याच्या विधानसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या ?

⚫️ भारतीय जनता पार्टी

⚪️ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस✅✅✅

🔴 बहुजन समाज पार्टी

🔵 समाजवादी पार्टी


Q. 3)नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडलेल्या राजस्थान राज्याच्या विधानसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या ?

⚫️ भारतीय जनता पार्टी

⚪️ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस✅✅✅

🔴 बहुजन समाज पार्टी

🔵 समाजवादी पार्टी


Q. 4)नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडलेल्या छत्तीसगड राज्याच्या विधानसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या ?

⚫️ भारतीय जनता पार्टी

⚪️ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस✅✅✅

🔴 बहुजन समाज पार्टी

🔵 जनता कॉंग्रेस छत्तीसगड


Q. 5)मिस वर्ल्ड 2018 किताब कोणी पटकविला?

⚫️ वहेनेसा पोन्स डे लियॉन✅✅✅

⚪️ निकोलेन पिशापा

🔴 अनुकृती वासन

🔵 यापैकी नाही


Q. 6)देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

⚫️ कष्णमूर्ती सुब्रमण्यम✅✅✅

⚪️ कष्णकांत सुब्रमण्यम

🔴 कष्णप्रकाश सुब्रमण्यम

🔵 कष्णा सुब्रमण्यम


Q 7)सध्या चर्चेत असणारे शाहपूरकंडी धरण कोणत्या नदीवर आहे?

⚫️ रावी ✅✅✅

⚪️ बियास

🔴 सतलज

🔵 सिंधू


Q 8) 16 वे जागतिक मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात होणार आहे?

⚫️ वर्धा

⚪️ यवतमाळ

🔴 अमरावती

🔵 नागपूर✅✅✅


Q. 9)फोर्ब्स मासिकान जाहीर केलेल्या यादीनुसार जगातील सर्वांत शक्तिशाली महिला कोण?

⚫️ थरेसा मे 

⚪️ करिस्टिना लगार्ड

🔴 मरी बॉरा

🔵 अजेला मर्केल✅✅✅


Q. 10)अग्नी 5 क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती km आहे ?

⚫️ 4000 km

⚪️ 5000 km ✅✅✅

🔴 6000 km

🔵 7000 km



Q.मालदीवचे सातवे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे ?
⚪️इब्राहीम मोहम्मद सोलीह✅✅✅
⚫️एशथ रशीद 
🔴अब्दुल्ला यामीन 
🔵फझलीन सलीम

Q.आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राची (ISS) स्थापना कधी करण्यात आली ?
⚪️20 नोव्हेंबर 1998✅✅✅
⚫️21 नोव्हेंबर 1998
🔴20 नोव्हेंबर 1999
🔵21 नोव्हेंबर 1999

Q.इंटरपोलचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?
⚪️किम जोंग यांग  ✅✅✅
⚫️मग होंगवेई  
🔴अलेक्झांगर प्राँकोपचूक 
🔵यापैकी नाही

Q.जलयुक्त शिवार योजना 2018-19 मध्ये कोणत्या जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला ?
⚪️सातारा 
⚫️सांगली ✅✅✅
🔴कोल्हापूर 
🔵सिंधुदुर्ग


Q.1) 2011 च्या जणगणनेनुसार सर्वात जास्त लिंग गुणोत्तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळते ?
⚫️ सिंधुदुर्ग
⚪️ रत्नागिरी✅✅✅
🔴 रायगड
🔵 ठाणे

Q.2) 2011 च्या जणगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती ?
⚫️ 915
⚪️ 925✅✅✅
🔴 935
🔵 945

Q.3) मानव विकास निर्देशांक ठरवताना खालील पैकी कोणत्या निकषांचा विचार केला जातो ?
I. सरासरी राहणीमान
II. अपेक्षित आयुर्मान
III. शैक्षणिक कालावधी

⚫️ I, II बरोबर
⚪️ II, III बरोबर
🔴 I, III बरोबर
🔵 सर्व बरोबर✅✅✅

Q.4) अफगाणिस्तानला भारताच्या किती राज्यांची भू-सीमा लागलेली आहे ?
⚫️ 1✅✅✅
⚪️ 2
🔴 3
🔵 4

Q.5) पाकिस्तानला भारताच्या किती राज्यांची भू-सीमा लागलेली आहे ?
⚫️ 3
⚪️ 4✅✅✅
🔴 5
🔵 6

Q.6) चीनला भारताच्या किती राज्यांची भू-सीमा लागलेली आहे ?
⚫️ 3
⚪️ 4
🔴 5✅✅✅
🔵 6

Q.7) नेपाळला भारताच्या किती राज्यांची भू-सीमा लागलेली आहे ?
⚫️ 3
⚪️ 4
🔴 5✅✅✅
🔵 6

Q.8) भुतानला भारताच्या किती राज्यांची भू-सीमा लागलेली आहे ?
⚫️ 3
⚪️ 4✅✅✅
🔴 5
🔵 6

Q.9) म्यानमारला भारताच्या किती राज्यांची भू-सीमा लागलेली आहे ?
⚫️ 3
⚪️ 4✅✅✅
🔴 5
🔵 6

Q.10) बांग्लादेशला भारताच्या किती राज्यांची भू-सीमा लागलेली आहे ?
⚫️ 3
⚪️ 4
🔴 5✅✅✅
🔵 6

Q.11) भारतात अशी किती राज्ये आहेत ज्यांची भू-सीमा 3 देशांना लागलेली आहे ?
⚫️ 2
⚪️ 3
🔴 4✅✅✅
🔵 5

Q.12) 2011 च्या जणगणनेनुसार सर्वात कमी लिंग गुणोत्तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळते ?
⚫️ मबई शहर✅✅✅
⚪️ मबई उपनगर
🔴 बीड
🔵 ठाणे

Q.13) 2011 च्या जणगणने बाबत खालील विधानांचा विचार करा.

I. राज्यात गडचिरोली जिल्ह्यात सर्वात जास्त बाल लिंग गुणोत्तर आढळते.
II. राज्यात बीड जिल्ह्यात सर्वात जास्त बाल लिंग गुणोत्तर आढळते.
III. राज्यात गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर आढळते.
IV. राज्यात बीड जिल्ह्यात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर आढळते.

⚫️ I, IIIबरोबर
⚪️ I, IV बरोबर✅✅✅
🔴 II, III बरोबर
🔵 II, IV बरोबर


1⃣ दिवसा डोंगरमाथ्याकडे वाहणाऱ्या वाऱ्याना काय म्हणतात.

पर्याय :- 
👇👇👇👇👇👇👇👇

1. डोंगरी वारे 
2. दारिय वारे ✅✅✅
3. स्थानिक वारे
4. या पैकी नाही 

2⃣ पथ्वीवर चंद्राचे आकर्षक हे.......

पर्याय :- 
👇👇👇👇👇👇👇

1. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणा इतके असते.
2. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणापेक्षा जास्त असते.✅✅✅
3. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणापेक्षा कमी असते.
4. या पैकी नाही 

3⃣ चकीचे विधान ओळखा.

1. हवेचे आकारमान तिच्यावरील वायू दाबाच्या व्यस्त प्रमाणात बदलते.
2. तापमान वाढविले असता हवेचे आकारमान वाढते.
3. हवेवरील दाब वाढविल्यास ती प्रसरण पावते.

पर्याय:- 
👇👇👇👇👇👇
1. फक्त 1
2. फक्त 2
3. फक्त 3 ✅✅✅
4. सर्व बरोबर

4⃣ गलिलिओ या शास्त्रज्ञाने तापमापकाचा शोध कोणत्या साली लावला.

पर्याय:- 
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
1. 1607✅✅✅
2. 1707
3. 1807
4. 1907

5⃣ महाराष्ट्रचा सुमारे 30% भाग हा कोणत्या अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेला आहे?

पर्याय:- 
👇👇👇👇👇👇
1. स्लेट
2. बेसाल्ट✅✅✅
3. टाईमस्टोन 
4. कार्टज

6⃣ गरुशिखर कोणत्या पर्वत रांगेत आहेत.

पर्याय 
👇👇👇👇👇👇👇
1. छोटा नागपूर 
2. अरवली ✅✅✅
3. माळवा 
4. विंध्य

7⃣ खालील विधानाचा विचार करा.
1. गोदावरीने महाराष्ट्र चे 49% खोरे व्यापले आहे.
2. कृष्णा नदीने महाराष्ट्र चे 25% खोरे व्यापले आहे.
3. कोकणातील नद्यांनी महाराष्ट्र चे 29% क्षेत्र व्यापले आहे.

पर्याय :- 
👇👇👇👇👇👇👇👇
1. फक्त 1 व 2 
2. फक्त 2 व 3
3. फक्त 1 व 3 ✅✅✅
4. फक्त 3

8⃣ राज्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा .

पर्याय :- 
👇👇👇👇👇👇👇👇
1. तापी - गोदावरी - सीन - भीमा - कृष्णा✅✅✅
2. गोदावरी - तापी - सीना - कृष्णा -  भीमा 
3. सीना - तापी - गोदावरी - भीमा कृष्णा
4. गोदावरी - कृष्णा - भीमा - तापी सीना

9⃣ कष्णा नादिवरती खालील पैकी कोणते धरण आहे? 

पर्याय :- 
👇👇👇👇👇👇👇
1. कोयना 
2. धोम ✅✅✅
3. चांदोली 
4. राधानगरी

1⃣0⃣ खालील पैकी कोणते शहर पर्जन्यछायेच्या प्रदेशात आहे? 

पर्याय :- 
1. अहमदनगर
2. पुणे 
3. सातारा 
4. वरील सर्व✅✅✅

Q.1) अंदमान-निकोबार बेटे कोणत्या खाडीने वेगळे केले आहेत ?

⚫️ आठ अक्षांश खाडी
⚪️ नऊ अक्षांश खाडी
🔴 दहा अक्षांश खाडी✅✅✅
🔵 अकरा अक्षांश खाडी

Q.2) रॉकी पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?

⚫️ माऊंट मॅकिन्ले✅✅✅
⚪️ माऊंट मिचेल
🔴 माऊंट अॅकन्काग्वा
🔵 माऊंट गोल्डहेपिकेन

Q.3) अॅप्लेशियन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?

⚫️ माऊंट मॅकिन्ले
⚪️ माऊंट मिचेल✅✅✅
🔴 माऊंट अॅकन्काग्वा
🔵 माऊंट गोल्डहेपिकेन

Q.4) अँडिज पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?

⚫️ माऊंट मॅकिन्ले
⚪️ माऊंट मिचेल
🔴 माऊंट अॅकन्काग्वा✅✅✅
🔵 माऊंट गोल्डहेपिकेन

Q.5) स्कँडिनेव्हियन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?

⚫️ माऊंट मॅकिन्ले
⚪️ माऊंट मिचेल
🔴 माऊंट अॅकन्काग्वा
🔵 माऊंट गोल्डहेपिकेन✅✅✅

Q.6) कॉकेशस पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?

⚫️ माऊंट एलब्रुस✅✅✅
⚪️ माऊंट ब्लँक
🔴 माऊंट किलोमांजारो
🔵 माऊंट कॉझिस्को


सराव प्रश्न


1) खालीलपैकी बरोबर जोडी ओळखा ?

A  भाई कोतवाल - आझाद दस्ता 

B  जनरल आवारी - लाल सेना 

C  उषा मेहता - आझाद रेडिओ 

D  इंदिरा गांधी - वानर सेना 


1⃣ A  B  C बरोबर 

2⃣ A  B बरोबर 

3⃣ C  D  बरोबर 

4⃣ सर्व बरोबर


Ans    -  4




2) १७ ऑक्टोबर १९४० रोजी विनोबा भावे यांनी...............येथे युध्दविरोधी भाषण केल्यामुळे ते पहिले वैयक्तिक सत्याग्रही ठरले.

1⃣ मबई

2⃣ वर्धा

3⃣ पवनार

4⃣ दांडी


Ans    -  3




3) -------- यांच्या पुढाकाराने 1918 साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी  'किसान सभा ' ही संघटना स्थापन केली. 

1⃣ एन. जी. रंगा 

2⃣ दीनबंधू 

3⃣ मा. गांधी 

4⃣ बाबा रामचंद्र 


Ans   -  4



4)  1936 साली अखिल भारतीय किसान सभा  एन. जी. रंगा यांच्या पुढाकाराने स्थापन झाली.खालील पैकी -------------- हे सभेचे अध्यक्ष होते. 

1⃣   एन. माधव

2⃣ सवामी सहजानंद सरस्वती 

3⃣ पडित नेहरू 

4⃣ बाबा रामचंद्र


Ans -   2




5) भारताची सागरी सीमा किती देशांशी संलग्न आहे? 

1⃣ 5

2⃣ 6

3⃣ 7

4⃣ 8


Ans-2 ( पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, बांग्लादेश, म्यानमार, इंडोनेशिया.)



6)  ------------ हा मासा फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. 

1⃣ लगफिश 

2⃣ ईल 

3⃣ दवमासा 

4⃣ कोणताही मासा फुफ्फुसाद्वारे श्वसन करत नाही.

 

Ans- 1




7) रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील होऊ घातलेला "नाणार प्रकल्प" कोणत्या देशाच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे?

1⃣ इराक

2⃣ इराण

3⃣ सौदी अरेबिया

4⃣ फरान्स


Ans -  3




8) सुभाषचंद्र बोस यांच्या the Indian struggle या पुस्तकाचा पहिला भाग खालीलपैकी कोणत्या देशात प्रथम प्रकाशित झाला.

1⃣ अमेरिका

2⃣ इग्लंड

3⃣ फरान्स

4⃣ जर्मनी


Ans -   2



9)  ---------- या व्यवसायाला भारत सरकारने NKM 16  या कार्यक्रमाद्वारे उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन दिले आहे.

1⃣ शती व्यवसाय 

2⃣ कक्कुटपालन 

3⃣ मत्स्यव्यवसाय 

4⃣ शळीपालन


Ans  -     3


मोपला उठाव कुठे घडून आला ?

अ) तेलंगाना

ब) मलबार

क) मराठवाडा

ड) बंगाल

================

 उत्तर....... पर्याय (ब) 

================ अहमदाबाद गिरणी कामगार संघटनेची स्थापना कोणी केली ?

अ) मृदुला साराभाई

ब) ना. म. जोशी

क) व्ही. व्ही. गिरी 

ड) मो. क. गांधी

================

 उत्तर....... पर्याय (ड) 

================

खालीलपैकी कोणत्या भारतीय नेत्याने हिटलरची भेट घेतली होती ?

अ) वि. दा. सावरकर

ब) रासबिहारी बोस

क) लोकमान्य टिळक

ड) सुभाषचंद्र बोस

================

 उत्तर....... पर्याय (ड) 

================

चलेजाव चळवळीच्या काळात पंडित नेहरू, अब्दुल कलाम आझाद, जी. बी. पंत यांना कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आले होते ?

अ) गोवळकोंड्याचा किल्ला

ब) ग्वाल्हेरचा किल्ला

क) शिवनेरी किल्ला

ड) अहमदनगरचा किल्ला

================

 उत्तर....... पर्याय (ड) 

================

 अक्षवृत्तापैकी पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

अ) अक्षवृत्ते वर्तुळाकार असतात

ब) अक्षवृत्ते एकमेकांना समांतर आहेत

क) अक्षवृत्ते समान लांबीची असतात

ड) अक्षवृत्ते समकेंद्री आहेत

================

 उत्तर....... पर्याय (क) 

================

पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे नाही ?

अ) उष्णकटीबंधात सूर्यकिरण कधीच लंबरूप पडत नाहीत

ब) समशीतोष्ण कटीबंधाला मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश असे म्हटले जाते 

क) शीतकटीबंधात सूर्यकिरण नेहमीच तिरपे पडतात

ड) एकही नाही 

================

 उत्तर....... पर्याय (ड) 

================

पुढीलपैकी कशाच्या आधारे पृथ्वीच्या वक्राकाराविषयी निष्कर्ष काढता येत नाही ?

अ) चंद्रग्रहण

ब) क्षितीज

क) सूर्यग्रहण

ड) यापैकी नाही

================

 उत्तर....... पर्याय (अ) 

================

 जिऑईड आकारामुळे काय घडत नाही ?

अ) गुरुत्वबलात बदल

ब) त्रिज्येत बदल

क) वजनात बदल

ड) वस्तुमानात बदल

================

 उत्तर....... पर्याय (ड) 

================

सभागृह (लोकसभा) तात्पुरते स्थगित कोण करते ?

अ) राष्ट्रपती

ब) सभापती

क) पंतप्रधान

ड) नागरिक

================

 उत्तर....... पर्याय (क) 

================

 अंतर्गत शांतता व बाह्यआक्रमण ह्या पासून राज्याचे रक्षण करणे हे कर्तव्य तर त्या संबंधातील कलम कोणते ?

अ) कलम ३५५

ब) कलम ३५६

क) कलम ३६०

ड) कलम ३६६

================

 उत्तर....... पर्याय (अ) 

================

राष्ट्रीय आणीबाणी बंद करावयाचा अधिकार (approval) कोणाला आहे ?

अ) लोकसभा

ब) राज्यसभा

क) दोन्ही

ड) एकही नाही 

================

 उत्तर....... पर्याय (ड) 

================

मार्गदर्शक तत्वे घटनेच्या कोणत्या भागात नमूद करण्यात आले आहेत ?

अ) भाग २

ब) भाग ३

क) भाग ४

ड) भाग ६

================

 उत्तर....... पर्याय (क) 

================

स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्कर प्रमुख कोण होते ?

अ) रॉय बुचर

ब) सॅम माणकेशो

क) जनरल थोरात

ड) के. एम. करिअप्पा

================

 उत्तर....... पर्याय (ड) 

================

डिसेंबर २०१५ मध्ये INS गोदावरीला निवृत्ती देण्यात आली. ही कोणत्या प्रकारची नौका होती ?

अ) पाणबुडी विरोधी नौका

ब) युद्धनौका

क) क्षेपणास्त्र वाहू नौका

ड) गस्तीनौका

================

 उत्तर....... पर्याय (ब) 

================

जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि पंजाब या तीन राज्यांना जोडणा-या केबल पुलाचे नाव काय ?

अ) नेहरू सेतू

ब) राम सेतू

क) इंदिरा गांधी सेतू

ड) अटल सेतू

================

 उत्तर....... पर्याय (ड) 

================


महाराष्ट्र सीमा



महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा -


१) मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया

२) कर्नाटक - कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.

३) आंध्र प्रदेश- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड.

४) गुजरात - ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे.

५) दादरा, नगर-हवेली- ठाणे, नाशिक.

६) छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली.

७) गोवा- सिंधुदुर्ग.




 भारताचे प्रवेशद्वार- मुंबई

 भारताची आर्थिक राजधानी - मुंबई.

 महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा- मुंबई शहर

 महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार- रायगड

 महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा- रायगड

 मुंबईची परसबाग - नाशिक

 महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा- रत्नागिरी

 मुंबईचा गवळीवाडा- नाशिक

 द्राक्षांचा जिल्हा- नाशिक

 आदिवासींचा जिल्हा- नंदूरबार

 महाराष्ट्रातील कापसाचे शेत- जळगाव

 महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा- यवतमाळ

 संत्र्याचा जिल्हा- नागपूर

 महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ- अमरावती

 जंगलांचा जिल्हा- गडचिरोली

 महाराष्ट्रातील केळीच्या बागा- जळगाव

 साखर कारखान्यांचा जिल्हा- अहमदनगर

 महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार- सोलापूर

 महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा- कोल्हापूर

 


* महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.

* महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

* महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी  - नागपूर.

* महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३५.

* महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.

* महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.

* महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.

* महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.

* विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

* महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

* महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.

* महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.

* महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.

* महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे

* महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

* महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

* महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.

* महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.

* महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.

* भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.

* भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.

* महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.

* महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.

* भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.

* महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.

* पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.

* गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.

* प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात

घेतले जाते.

* गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.

* जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

* औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

* पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

* महाराष्ट्रातील नायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.

* कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.

* कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.

* कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.

* कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.

* विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.

* विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.

* महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.

* विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.

* संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.

* संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.

* राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.

* संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.

* ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.

* यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.

महादजी शिंदे



पेशवाईतील मुत्सद्दी. इ.स. १७३०-१२ फेब्रुवारी १७९४ रोजी त्यांचे निधन झाले. पुण्यात शिंदे छत्री नामक त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे.


महादजी शिंदे यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराज, बाजीराव यांच्यानंतर महान सेनानी म्हणून घेतले जाते. इंग्रजांकडून मानाने यांना द् ग्रेट मराठा असे म्हटले जात. पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले.


सैनिकी कारकीर्द


दक्षिण भारत


महादजी शिंदे वयाच्या दहाव्या वर्षापासूनच रणांगणावर आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली होई. १७४० च्या निजामा विरुद्धच्या लढाईत त्यांनी दत्ताजी शिंदे व त्रिंबक किन्नड यांना साथ दिली होती. १७४२ मध्ये बेळूर च्या लढाईत महादजीने भाग घेतला होता या लढाईत मराठ्यांनी निझामच्या सैन्याला परतावून लावले होते.


उत्तर भारत


१७४५ ते १७६१ दरम्यान ( जो मराठ्यांचा राज्य विस्तारातील सुवर्णकाळ मानला जातो) त्या काळात महादजी शिंदे यांनी जवळपास ५० लढायांचे नेतृत्व/ सहभाग घेतला, मालव, राजपुताना, बुंदेलखंड,१७४७, मारवाड १७४७ व हिम्मत नगर १७४८. ब्रिज, दोआब, रोहिलखंड, दिल्ली कुंजपुर तसेच पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिररीचा सहभाग होता. यातील महादजीची महत्त्वाच्या लढाया म्हणजे चंद्रावती गंज १७४६, फतेहाबाद १७४६ बडी साद्री


मल्हाराव होळकरांच्या साथीत शिंदे यांनी अनेक राजपूत संस्थाने मराठा साम्राज्याखाली आणली. रतन गढ, लालगढ, बिकानेर, लासवारी, लाखमगढ, कुंभेर, डीग ही मराठा साम्राज्याला जोडली गेली. तसेच जोधपूर व जयपूर ह्या मोठ्या राजपूत राज्यांनी मराठा वर्चस्व मान्य करून टाकले. मथुरा हे मुघल सत्ते खाली होते ते मराठा अख्यारीत आणून व येथील काही हिंदू मंदिरांचा जिर्णोद्धार करण्यात आला व मथुरेला संस्कृत शिक्षण केंद्र म्हणून शिंद्यांचा अधिपत्याखाली तयार झाले. जानेवारी १७५८ मध्ये महादजी यांनी ग्वाहलेर येथे शिंद्यांचे केंद्र म्हणून बनवले.


ग्वालहेरचे शासक


जयाप्पा शिंदे जे शिंदे घराण्याचे प्रमुख होते ते २५ जुलै १७५५ रोजी राजस्थानमधील नागौर येथील लढाईत मारले गेले, त्यानंतर दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे यांच्या कडे शिंदे घराण्याची सुत्रे आली. मराठ्यांच्या वाढत्या लष्करी वर्चस्वाला इस्लामी जिहादाचे उत्तर म्हणून लवकरच उत्तर भारतात अब्दाली विरुद्द मराठे असा मोठा सामना तयार झाला. बुरुडी घाटावरील लढाईत दत्ताजी शिंदेची नजीब कडून क्रुरपणे हत्या झाली. शिंद्यांनी अब्दालीविरुद्दच्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिररीने सहभाग घेतला होता. या लढाईत जनकोजी शिंदे मारला गेला, तसेच महादजी देखिल लढता लढता घायाळ झाले होते. मराठ्यांनी युद्धात पळ काढल्यानंतर महादजी यांनी यशस्वीपणे माघार घेतली, या लढाईत त्यांचा पाय लुळा पडला तो पुढील जन्मभर तसाच राहिला. पानिपतच्या लढाईनंतर साहजिकच शिंदे घराण्याची सुत्रे महादजी कडे आली. मराठे अब्दाली युद्धातील पराभवानंतर मराठा साम्राज्याचे विकेंद्रीकरण झाले व शिंदे हे स्वतंत्र मराठा सस्थानिक बनले व ग्वाहलेर हे त्यांचे संस्थान बनले.


पानिपतच्या लढाईनंतरची कारकीर्द


पानिपतच्या लढाईतील विनाशानंतर महत्त्वाचे होते की मराठयांचे उत्तर भारतावरील वर्चस्व पुन्हा प्रस्थापीत करणे, १७७० मध्ये महादजीने भरतपूरच्या जाट राजा नवल सिंग याचा पराभव केला व मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले. १७७७ मध्ये पेशव्यांचे कोल्हापूर संस्थानाशी खटके उडाले होते यात महादजीने निर्णायक कामगीरी केली.


पहिले इंग्रज-मराठा युद्ध


1७७३ मध्ये नारायणराव पेशवे याचा खून झाला. व रघुनाथराव स्वयंघोषित पेशवा बनला. बाराभाईच्या कारभारानुसास नारायणरावचा मुलगा सवाई माधवराव पेशवा बनला व रघुनाथरावला पेशवे पदावरुन हटवले या बारभाई मध्ये महादजी व नाना फडणीसांची भूमिका महत्त्वाची होती. रघुनाथरावांना हा निर्णय पटला नाही व त्यांनी इंग्रजांची मदत घेण्याचे ठरवले.


वडगावची लढाई


१७७७ मध्ये नाना फडणीस यांनी कलकत्ता कौन्सिल बरोबर केलेला कराराचा भंग करत फ्रेंचाना पश्चिम किनारपट्टी वर बंदर उभारायची परवानगी दिली. ब्रिटीशांनी प्रत्युतरादाखल मुंबईवरुन सैन्य पाठवले. जानेवारी १७७९ मध्ये ३,९०० ब्रिटीश सैन्य कर्नल एगर्टन च्या नेतृत्वाखाली पुण्यावर चालून गेले. वाटेत रघुनाथरावांचे सैन्यही येउन मिळाले. मराठ्यांच्या सैन्य महादजी शिंदे व् तुकाजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली होते. ब्रिटीश सैन्याच्या वाटेत असंख्य अडथळे आणून त्यांचा चाल थंडावली व त्यांनी तळेगाव येथे तळ टाकला. महादजींनी वाटेतील सर्व रस्त्यामधील गावातील कुरणे जाळली विहरी विषमय करून टाकल्या, तसेच मुंबईकडून येणारी रसदही पूर्णपणे तोड्न टाकली. ब्रिटीश सैन्याचे अन्नपाण्याहून हाल होउ लागले. ब्रिटीशांनी माघार घेण्याचे ठरवले १२ जानेवारी १७७९ रोजी मध्य रात्री मराठ्यांनी ब्रिटीशांवर आक्रमण केले व सर्व बाबतीत चित करून वडगाव येथे शेवटी ब्रिटीश सैन्य महादजींना शरण आले.


१६ जानेवारी रोजी वडगावचा तह झाला. इस्ट इंडिया कंपनीने १७७३ पासुन मिळवलेला सर्व प्रांत परत करण्यात यावा असे ठरले. यात साष्टी, ठाणे व जवळपास सर्व गुजरात पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. महादजीने ब्रिटीशांना युद्दाचा खर्च म्हणून ४१,००० रुपये देखिल वसूल केले. रघुनाथरावाला मराठ्यांच्या हाती देण्यात यावे असे ठरले त्यानुसार १८ जानेवारी १७७९ रोजी रघुनाथराव व त्याचा सैन्याला पकडण्यात आले. तसेच महादजीने सखाराम बापूचा पराभव करून त्याला सिंहगडाच्या तुरुंगात रवानगी केली


सिप्री येथील हार


ब्रिटीश गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टींन यांनी वडगाव चा तह मुंबईच्या अधिकाऱ्यांना यावर सही करण्याची परवानगी नव्हती असा युक्तीवाद करत नामंजूर केला व शमलेले युद्ध पुन्हा सुरु करण्यास आदेश दिले, oकर्नल गोडार्ड यांनी ६००० ची फौज फेब्रुवारी १७७९ मध्ये घेउन अहमदाबाद काबीज केले व १७८० मध्ये भासीं बंगालमधून निघून कॅप्टन पॉपहॅम नी ग्वाहलेर काबीज केले. वॉरन हेस्टींग नी महादजी शिंदेंना अजून नामोहरम करण्यासाठी मेजर केमॅकला पाठवले. महादजी शिंद्यांच्या फौजेला गाठून हैराण केले फेब्रुवारी १७८१ मध्ये ब्रिटीशांनी सिप्री येथे महादजी शिंद्यांच्या सेनेचा पराभव केला. सिप्रीच्या पराभवानंतर देखिल महादजीने आपल्या आघाड्या शाबूत ठेवत ब्रिटीशांना आव्हान दिले. ब्रिटीशांच्या प्रमाणेच महादजीचे सैन्य संख्येने जास्त व ब्रिटीशांच्या शिस्तबद्द सैनिकांप्रमाणेच तुल्यबळ असल्याने महादजीवर पूर्णपणे मात करणे अवघड गेले, तसेच महादजीलाही ब्रिटीशांच्या आधुनिक युद्धतंत्रापुढे त्यांना अजून मात देणे अवघड गेले.


सालबाईचा तह १७ मे १७८२


महादजीच्या इंग्रजांकडून पराभव झाल्या नंतर महादजीने इंग्रजाबरोबर मुत्सदीने तहची बोलणी केली जो सालाबाईचा तह या नावाने ओळखला जातो. या तहानुसार इंग्रजांनी सवाई माधवरावला पेशवा म्हणून मान्यता दयावी व रघुनाथरावला वेतन द्यावे. या तहानुसार शिंद्यांना यमुनेच्या पश्चिमेकडील सर्व प्रांत परत मिळाला व उज्जैन मध्ये माघार घ्यावी लागली.


इंग्रजाशी तहानंतर इंग्रजांशी असलेल्या शस्त्र संधीचा उपयोग महादजीने चांगलाच उपयोग करून घेतला.


Latest post

महाराष्ट्राचा भूगोल

दख्खनवरील पठारे ------------------------------------------------------------ ----------------------- अ.क्र. पठार. जिल्हा. ------------------...