Saturday 14 September 2019

साहिबगंज मल्टी मोडल टर्मिनल

◾️पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडमध्ये भारताच्या दुसर्‍या मल्टी-मॉडेल टर्मिनलचे उद्घाटन

◾️टर्मिनलची क्षमता वर्षाकाठी 30 लाख टन आहे

◾️पीपीपी मोडमध्ये दुसर्‍या टप्प्यात क्षमता वाढीसाठी 666 कोटी डॉलर्सच्या गुंतवणूकीनंतर ते वार्षिक 54 54..8 लाख टनांपर्यंत वाढेल.

◾️पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 सप्टेंबर, 2019 रोजी झारखंडच्या साहिबगंज येथे बांधले गेलेले दुसरे मल्टी मॉडेल टर्मिनल देशाला समर्पित केले. हे टर्मिनल ₹ 200 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले . जल मार्ग विकास प्रकल्प (जेएमव्हीपी) अंतर्गत गंगा नदीवर बनविलेले टर्मिनल पूर्ण करण्यास दोन वर्षे लागली.

◾️नोव्हेंबर 2018 मध्ये पंतप्रधान मोदींनी वाराणसी येथे पहिले मल्टी मॉडेल टर्मिनल समर्पित केले.

🔶प्रकल्पाची प्रारंभ तारीख: 10 नोव्हेंबर, 2016

🔶प्रकल्पाची पूर्ण तारीख: सप्टेंबर, 2019

🔷 जेट्टी: लांबीची 270 एमएक्स रूंदी 25 मीटर बेरिंग आणि मूरिंग सुविधा

◾️साहिबगंज येथील मल्टी-मॉडेल टर्मिनल झारखंड आणि बिहारचे उद्योग जागतिक बाजारपेठेत उघडेल आणि जलमार्गाच्या मार्गाने भारत-नेपाळ मालवाहतूक जोडेल. 

◾️राजमहल परिसरातील स्थानिक खाणींपासून एनडब्ल्यू -१ च्या कडेला असलेल्या विविध औष्णिक उर्जा प्रकल्पांकडे देशांतर्गत कोळशाची वाहतूक करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. कोळसा, दगडी चिप्स, खते, सिमेंट आणि साखर याशिवाय टर्मिनलमधून इतर वस्तूंची वाहतूक केली जाण्याची शक्यता आहे.

◾️मल्टी-मॉडेल टर्मिनलमुळे सुमारे 600 लोकांचे थेट रोजगार आणि प्रदेशातील सुमारे 3000 लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळण्यास मदत होईल. नवीन मल्टि-मोडल टर्मिनलद्वारे साहिबगंज येथे रोड-रेल-नदी वाहतुकीचे अभिसरण, मध्य भागातील हा भाग कोलकाता, हल्दिया आणि पुढे बंगालच्या उपसागरास जोडेल. 

◾️साहिबगंज बांगलादेशमार्गे ईशान्य-राज्यांसह नदी-समुद्र मार्गाने जोडला जाईल. तो टर्मिनलची क्षमता वर्षाकाठी 30 लाख टन आहे. तो एक गुंतवणूक नंतर वार्षिक 54.8 लाख टन वाढू जाईल ₹ पीपीपी मोड अंतर्गत दुसरा टप्पा क्षमतेत वाढ 376 कोटी आहे. दुसर्‍या टप्प्यातील विकास पूर्णपणे खाजगी सवलतीतून केला जाईल. पुढे टर्मिनलच्या अनुषंगाने 5 335 एकर जागेवर फ्रेट गाव देखील प्रस्तावित आहे.

◾️जलमार्ग विकास प्रकल्पाचा एक भाग म्हणून एमएमटी बांधल्या जात आहेत. या गंगा नदीचा विस्तार वाराणसी ते हलदिया दरम्यान 1500-2000 टन वजनापर्यंत मोठ्या जहाजांच्या नेव्हिगेशनसाठी करणे आवश्यक आहे. नदी आणि सुरक्षित नेव्हिगेशनसाठी आवश्यक इतर सिस्टम स्थापित करणे.

चंद्र मोहिमांमध्ये अमेरिका २६ तर रशिया १४ वेळा अपयशी

📌चांद्रयान-२ मोहिमेतंर्गत विक्रम लँडरला चंद्रावर उतरवण्यात भले भारताला अपयश आले असेल पण त्याने निराश होण्याचे कारण नाही. कारण अवकाश इतिहासात अपयशामध्ये पुढचे यश दडलेले असते.

📌अमेरिका, रशियासारखे देश अनेक प्रयत्नांनंतर चंद्रावर पोहोचण्यात यशस्वी ठरले आहेत. मोहिमेतील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या २.१ किलोमीटर अंतरावर असताना मार्गावरुन भरकटले.

📌भारतचं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात अपयशी ठरला आहे असे नाही तर अमेरिका, रशिया या देशांना देखील चांद्र मोहिमेत अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सुरुवातीच्या काळात चंद्र मोहिमांमध्ये यश मिळण्याचे प्रमाण खूप कमी होते. अमेरिकेला एकूण चंद्र मोहिमांपैकी २६ वेळा तर रशियाला १४ वेळा अपयशाचा सामना करावा लागला.

📌१९५० च्या दशकात चंद्राला स्पर्श करण्याची स्पर्धा सुरु झाली. त्याकाळात अमेरिका आणि रशिया या दोन महासत्ताच त्या स्पर्धेमध्ये होत्या. १९५० च्या दशकात एकूण १४ चंद्र मोहिमा झाल्या. त्यात अमेरिकेला सात पैकी एक तर रशियाला सात पैकी तीन मोहिमांमध्ये यश मिळाले.

📌सर्वप्रथम अमेरिकेने १७ ऑगस्ट १९५८ रोजी चंद्रावर जाण्याचा प्रयत्न केला. पण पायोनिअरचे प्रक्षेपण अपयशी ठरले. १९६४ साली अमेरिकेच्या रेंजर ७ मिशनच्यावेळी पहिल्यांदा चंद्राचा जवळून फोटो काढण्यात आला. रशियाची अवकाश संस्था यूएसएसआरच्या लुना ९ मोहिमेत जानेवारी १९६६ मध्ये पहिल्यांदा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात आले. त्यावेळी पहिल्यांदा चंद्राच्या पृष्ठभागाचा फोटो मिळाला.

📌या मिशननंतर पाच महिन्यांनी मे १९६६ मध्ये अमेरिकेने सुद्धा अशाच प्रकारची मोहिम यशस्वी केली. १९६९ साली अमेरिकेचे अपोलो ११ मिशन तर ऐतिहासिक ठरले. त्यावेळी पहिले मानवी पाऊल चंद्रावर पडले.

📌१९५८ ते १९७९ या काळात फक्त अमेरिका आणि रशियाने चंद्र मोहिमा केल्या. या २१ वर्षात दोन्ही देशांनी ९० चंद्र मोहिमा केल्या. १९८० ते ८९ या काळात चंद्रावर जाण्याची ही स्पर्धा थांबली. त्यानंतर जपान, युरोपियन युनियन, चीन, भारत आणि इस्रायलने चंद्रावर जाण्याचा प्रयत्न केला. २००९ ते २०१९ या काळात एकूण दहा चंद्र मोहिमा झाल्या.

चंद्र स्वाऱ्या

◾️गेल्या ६० वर्षांत आतापर्यंत १०९ चांद्रमोहिमा आखल्या गेल्या आहेत. त्यापैकी ६१ यशस्वी, तर ४८ मोहिमा अयशस्वी झाल्या आहेत.

◾️यातही सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अंतराळात माणसानं प्रवेश करण्यापूर्वी एका प्राण्यानं प्रवेश करून माणसांचा मार्ग मोकळा केला होता.

◾️ हा प्राणी कोण होता माहीत आहे, ती होती रशियाच्या रस्त्यांवर फिरणारी एक भटकी कुत्री. तिचं नाव होतं लायका.

◾️रशियानं ३ नोव्हेंबर १९५७मध्ये आपल्या स्फुटनिक-२ यानातून तिला अंतराळात पाठवलं होतं.

◾️ त्यानंतर साधारण १९५०च्या दशकात पहिल्यांदा चंद्रावर स्वारी करायचं, असं माणसानं ठरवलं.

◾️त्या काळात अमेरिका आणि रशिया हीच बलाढ्य आणि पुढारलेली राष्ट्रं होती. साहजिकच त्यांनी चंद्रावर स्वाऱ्या करायला सुरुवात केली.

◾️ त्यानंतर आतापर्यंत १०९ मोहिमा झाल्या आहेत.

    💢 अमेरिका : १९६६ ते १९७२ दरम्यान 💢

◾️नासा ही अमेरिकेची अवकाश संस्था. अपोलो मोहिमेत फेब्रुवारी १९६६ ते डिसेंबर १९७२ या काळात तिनं १९ मोहिमा केल्या.

◾️ त्यापैकी १६ यशस्वी झाल्या.

◾️या मोहिमांमधून नील आर्मस्ट्राँग एल्विन ऑल्ड्रिनसह २४ अंतराळवीरही चंद्रावर जाऊन आले.

  💢 रशिया : १९५९ ते १९७६ दरम्यान💢

◾️रशियानं या १७ वर्षांत २४ चांद्रमोहिमा केल्या.

◾️यातील १५ यशस्वी झाल्या.

◾️लुना-१ ही पहिली मोहीम अयशस्वी झाल्यानंतर १३ सप्टेंबर १९५९ रोजी रशियाने लुना-२ मोहीम आखली. ती यशस्वी झाली. या मोहिमेत रशियानं चंद्रावरून नमुने आणले.

◾️तर नंतरच्या लुना-१७ आणि लुना-२१ मोहिमेत चंद्रावर रोव्हर उतरवण्यात रशियानं यश मिळवलं.

      💢 जपान : १९९० पासून 💢

◾️जपाननं २४ जानेवारी १९९० रोजी 'हितेन' ही पहिली चंद्रस्वारी केली.

◾️चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर काही काळात ऑर्बिटरचा जमिनीपासूनचा संपर्क तुटला.

◾️जपाननं आपली दुसरी मोहीम सेलेन १४ सप्टेंबर २००७ रोजी आखली.

◾️ या अवकाश यानाचे ऑर्बिटर, रिले उपग्रह आणि व्हीएलबीआय उपग्रह असे तीन भाग होते.

        💢 चीन : २००७ पासून 💢

◾️चीननं त्यांच्या चंद्र देवीच्या नावानं म्हणजेच, चँग नावानं चार टप्प्यांमध्ये रोबोटिक चांद्रमोहिमा आखल्या. त्या सर्व यशस्वी ठरल्या आहेत.

◾️चँग-१ आणि चँग-२ या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये ऑर्बिटर पाठवण्यात आले आणि चँग-३ आणि चँग-४ मध्ये लँडर होते.

◾️यात युतू १ आणि युतू २ नावाचे रोव्हरही होते.

💢भारत : २२ ऑक्टोबर २००८ पासून💢

◾️खरंतर २००८च्या आधीपासून भारताचा अंतराळ कार्यक्रम सुरू होता.

◾️भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा १९८४मध्ये अंतराळात जाऊन आले होते. पण चंद्रावर स्वारी २२ ऑक्टोबर २००८ रोजी झाली.

◾️श्रीहरीकोटा येथील पीएसएलव्ही सी-११ भारताचे चांद्रयान घेऊन उडाले.

◾️चंद्राच्या रासायनिक, खनिज आणि प्रकाश-भौमिकी मानचित्रणासाठी चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० किमी उंचीवरून चांद्रयान-१ परिभ्रमण करीत होते.

◾️ याच्या अवकाशयानात भारतासह संयुक्त राष्ट्रे, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, स्वीडन आणि बल्गेरियाची ११ उपकरणे होती.

प्रश्नसंच 15/9/2019

1) सध्याचे भारतीय हवाई दलाचे प्रमुख कोण आहेत?
✅ बी. एस. धानोआ

2) जपानचे चलन कोणते आहे?
✅ येन

3) भारतातील सर्वाधिक लांबी असलेल्या विद्युतीकृत रेल्वे बोगद्याची लांबी किती आहे?
✅ 6.6 किमी (आंध्रप्रदेश)

4) भारतीय लष्कराच्या उप-प्रमुखपदी सध्या कुणाची नियुक्ती केली आहे?
✅ लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरावणे

5) भारतीय असहकाराच्या सर्वोच्चपदी कमांडर कोण असतो?
✅ भारताचे राष्ट्रपती

6) 15 वर्षाखालील SAFF चषक 2019 फूटबॉल स्पर्धेचा विजेता कोणता देश ठरला?
✅  भारत

7)  कोणत्या खेळाडूने ‘वर्ल्ड स्किल्स 2019’ या स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले
✅ अश्वथा नारायण सनागवारापू

8) केंद्रीय चित्रपट प्रमाणीकरण मंडळाची (CBFC) ची स्थापना कधी झाली?
✅  सन 1951

9) भारतात सर्वाधिक उंचीवरील 'स्काय सायकलिंग ट्रॅक' कुठे आहे?
✅  मनाली

10) दिल्ली जिल्हा क्रिकेट संघाच्या वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
✅ अतुल वासन

U-19 आशिया कपः भारताची जेतेपदाला गवसणी

🅱 अत्यंत चुरशीच्या सामन्यात अथर्व अंकोलेकरने घेतलेल्या ५ बळींच्या जोरावर भारताने बांगलादेशला ५ धावांनी पराभूत करत १९ वर्षांखालील आशिया चषकाचे विजेतेपद मिळवले आहे.

🅱भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये अखेरचा सामना कोलंबो येथे रंगला होता.

🅱आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी १०६ धावांचे आव्हान ठेवले होते.

🅱 या सामन्यात बांगलादेश सहज विजय मिळवेल, असेच सर्वांना वाटले होते. मात्र, डावखुरा फिरकीपटू अथर्व अंकोलेकरने २८ धावांत टिपलेल्या ५ गड्यांमुळे भारताने जेतेपदावर नाव कोरले.

🅱बांगलादेशचा संपूर्ण संघ १०१ धावांवर बाद झाला.

🅱 दरम्यान, १९ वर्षांखालील भारतीय संघाची सुरुवात खराब झाली.

🅱नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय चुकीचा ठरला.

🅱अखेर भारताचा संपूर्ण संघ ३२.४ षटकामध्ये १०६ धावाच करू शकला.

प्रश्नसंच 14/9/2019

📌बॉम्बे रक्तगटाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान अचूक नाही?

i) ‘बॉम्बे रक्तगट’ सर्वप्रथम 1952 साली मुंबईत (तेव्हाचे बॉम्बे) डॉ वाय. एम. भेंडे यांनी शोधला.

ii) त्यात ‘अॅंटीजेन H’ घटक असतो.

iii) दक्षिण आशियामध्ये त्याची प्रकरणे सर्वाधिक आढळून येतात.

iv) त्यात H अँटीबॉडी हे घटक असतात.

(A) केवळ (i), (ii), (iii)
(B) केवळ (ii)✅✅✅
(C) केवळ (iv)
(D) केवळ (i) आणि (iv)

📌MPATGM याचे पूर्णनाव काय आहे?

(A) मल्टी पर्पज अँटी-टँक जिओ मिसाईल
(B) मॅन पोर्टेबल अँटी-टँक जिओ मिसाईल
(C) मल्टी पर्पज अँटी-टँक गाईडेड मिसाईल
(D) मॅन पोर्टेबल अँटी-टँक गाईडेड मिसाईल ✅✅✅

📌कोणत्या व्यक्तीने पंतप्रधानांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे?

(A) विनीत जैन
(B) जयदीप शंकर
(C) अजय कुमार
(D) पी. के. सिन्हा✅✅✅

📌कोणत्या व्यक्तीची पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) राजीव कुमार
(B) कलराज मिश्रा
(C) डॉ. प्रमोद कुमार मिश्रा✅✅✅
(D) विजय कुमार

📌‘टाइम्स हायर एज्युकेशन (THE) विश्व विद्यापीठ क्रमवारीता 2020’ या यादीत कोणत्या विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे?

(A) ऑक्सफोर्ड विद्यापीठ✅✅✅
(B) कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
(C) केंब्रिज विद्यापीठ
(D) मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

📌कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय दक्षिण-दक्षिण सहकार्य दिन’ पाळला जातो?

(A) 11 सप्टेंबर
(B) 12 सप्टेंबर✅✅✅
(C) 13 सप्टेंबर
(D) 10 सप्टेंबर

📌कोणत्या ठिकानांदरम्यान दक्षिण आशिया प्रदेशातली पहिली क्रॉस-बॉर्डर पेट्रोलियम प्रॉडक्ट पाइपलाइन आहे?

(A) मोतिहारी आणि अमलेखगंज✅✅✅
(B) सबा आणि सारवाक
(C) हजीरा आणि विजयपूर
(D) ताशकंद आणि बिश्केक

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा अमृत महोत्सव - प्रा. हरी नरके

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७४ वर्षांपुर्वी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. [ १३ सप्टेंबर १९४५] { काही पुस्तकांमध्ये ही स्थापना ८ जुलै १९४५ ला झाल्याचीही नोंद आहे} हे संस्थेचे अमृत महोत्सवी वर्ष.

● या संस्थेने आजवर अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले. अनेक मान्यवरांना संस्थेकडून खूप काही मिळाले.

● विशेषत: औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयातून दलित [आंबेडकरी] साहित्याचे शिल्पकार म्हणता येतील अशा दिग्गजांची जडणघडण झाली. संस्थेच्या नव्या शाखा निघाल्या. संस्थेचे आकारमान वाढले. विद्यार्थी तसे प्राध्यापकांची संख्या वाढली. उपक्रम वाढले. इमारती वाढल्या.

● डॉ. बाबासाहेबांनी ते एल्फिन्स्टन महाविद्यालयात शिकत असतानाच आपण शिक्षण संस्था काढायची, तिचे महाविद्यालय गुणवंत-नामवंत असेल अशी उभारणी करायची असे मनाशी ठरवले होते.

● बी.ए.च्या परिक्षेत त्यांच्या वर्गात पहिल्या आलेल्या गजेंद्रगडकरांनाच त्यांनी पुढे आपल्या महाविद्यालयात पहिले प्राचार्य म्हणून नियुक्त केले.

● समाजातील खूप नामवंत आणि गुणवंत असलेल्या व्यक्तींना आपल्या संस्थेत आवर्जून बोलावून घेतले.

● प्राचार्य म.भि.चिटणीस, प्राचार्य म.ना.वानखडे, मधू दंडवते, भालचंद्र फडके, रा.ग.जाधव, वा.ल.कुलकर्णी, मे.पु.रेगे, शां.शं.रेगे, स.गं.मालशे आदींची निवड करताना त्यांनी निवडलेली माणसं किती भली होती याची खात्री पटते.

● २० जुलै १९४२ रोजी डॉ. बाबासाहेब व्हॉईसरायच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाले. त्यांच्याकडे दहा मोठया खात्यांचा कार्यभार होता. त्यांनी अनुसुचित जातींसाठी केंद्रीय नोकर्‍यांमध्ये ८.३३ टक्के आरक्षणाची तरतूद करून घेतली.

● लवकरच त्यांच्या लक्षात आले की, शिक्षणाअभावी अनुसुचित जातींमधून पात्र उमेदवार मिळायला अडचण येते. त्यांनी तातडीने शिक्षण संस्था उभारणीला सुरूवात केली.

● मंत्रालयासमोरच्या शासकीय बराकींमध्ये संस्थेचे वर्ग भरत असत. मुंबईत तेव्हा नोकरी करून शिकणार्‍या गरिब, होतकरू मुलांमुलींसाठी सकाळचे एकही महाविद्यालय नव्हते. ती उणीव बाबासाहेबांनी भरून काढली.

● फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि विनोदी लेखक बाळ गाडगीळ हे गरिब ब्राह्मण कुटुबांतले. गाडगीळ नोकरी करून शिकले ते बाबासाहेबांच्या या महाविद्यालयामुळे. यांनी आपले आत्मचरित्र बाबासाहेबांना अर्पण केलेले आहे.

● अशा असंख्य ज्ञात अज्ञातांच्या वाटचालीत पीपल्स एज्युकेशनने शिक्षणाची सावली दिली.

● बाबासाहेबांची आपला अफाट ग्रंथसंग्रह पीपल्सच्या ग्रंथालयांना दिला.

● पालीभाषा, बौद्ध संस्कृती, आधुनिक ज्ञानविज्ञान या बाबतीत ही संस्था अग्रेसर राहावी असे त्यांचे स्वप्न होते.

ब्रिटनचे ऑक्सफोर्ड विद्यापीठ सर्वोत्तम विद्यापीठ

लंडनच्या ‘टाइम्स’ या संस्थेच्यावतीने ‘टाइम्स हायर एज्युकेशन (THE) विश्व विद्यापीठ क्रमवारीता 2020’ प्रसिद्ध करण्यात आली आहे.

भारतीय विज्ञान संस्था (IISc), बेंगळुरू आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), रोपार या केवळ दोन भारतीय संस्थांनी या यादीत प्रथम 350 क्रमांकामध्ये जागा मिळविलेली आहे. मात्र या यादीत कोणत्याही भारतीय संस्थेला प्रथम 300 मध्ये जागा मिळविण्यात यश आलेले नाही. या दोन संस्थांनी समान गुणासह संयुक्तपणे क्रमांक ‘301-350’ या गटात जागा मिळविलेली आहे.

▪️प्रथम 10 सर्वोत्तम विद्यापीठे (अनुक्रमे) -

1) ऑक्सफोर्ड विद्यापीठ, ब्रिटन.
2) ऑक्सफोर्ड विद्यापीठ, कॅलिफोर्निया इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरिका)
3) केंब्रिज विद्यापीठ (ब्रिटन)
4) स्टॅनफोर्ड विद्यापीठ (अमेरिका)
5) मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरिका)
6) प्रिन्सटन विद्यापीठ (अमेरिका)
7) हार्वर्ड विद्यापीठ (अमेरिका)
8) येल विद्यापीठ (अमेरिका)
9) शिकागो विद्यापीठ (अमेरिका)
10) इम्पीरियल कॉलेज लंडन (ब्रिटन)

जागतिक क्रमवारीत भारताची उपस्थिती सुधारली असून गतवर्षी केवळ 49 संस्था यादीत समाविष्ट होत्या मात्र यंदा 56 संस्थांचा क्रमांक लागला आहे.

नवीन IIT इंदौर या संस्थेचे 351-400 गटात स्थान आहे, जेव्हा की जुन्या संस्था 401-500 गटात आढळून येत आहेत. पंजाब विद्यापीठ, चंदीगड 601-800 या गटात कायम असून IIT गांधीनगर नव्यानेच 501-600 या गटात प्रवेश केला आहे.

जागतिक क्रमवारीत समाविष्ट केल्या गेलेल्या भारतीय संस्थांच्या संख्येमुळे, भारत हा आशिया खंडात पाचव्या स्थानावर असून जापान आणि चीन अव्वल आहेत.

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...