Tuesday 9 August 2022

नक्की वाचा :- महत्त्वाच्या संस्था


1. G7 [Group of 7]

- स्थापना 1975

- अगोदर हा गट G8 म्हणून ओळखला जात होता, परंतु रशिया बाहेर पडला.

- सदस्य: फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, USA, कॅनडा


2. BRICS

- स्थापना: 2006

- सदस्य: ब्राझिल, रशिया, भारत, चीन, द. आफ्रिका 


3. Asian Development Bank [ADB]

- स्थापना: 19 डिसेंबर 1966

- मुख्यालय: Mandaluyong, Metro Manila फिलीपीन्स


4. SAARC [South Asian Association for Regional Cooperation]

- स्थापना: 16 जानेवारी 1987

- मुख्यालय: काठमांडू, नेपाळ 

- सदस्य: अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, मालदीव


MPSC मॅजिक ठोकळा


5. ASEAN [Association of South East Asian Nation]

- स्थापना: 8 ऑगस्ट 1967

- मुख्यालय: जकार्ता, इंडोनेशिया 

- सदस्य: ब्रुनेई, फिलीपीन्स, लाओस, थायलंड, व्हियतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, म्यानमार, कंबोडिया, सिंगापूर


6. BIMSTEC [Bay of Bengal Initiative for Multi Scetoral Technical & Economic Cooperation]

- स्थापना: 6 जून 1997

- मुख्यालय: ढाका, बांगलादेश

- सदस्य: बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, भूटान 


7. OPEC [Organization of Petroleum Exporting Countries]

- स्थापना: 1960

- मुख्यालय: व्हियन्ना, ऑस्ट्रिया

- सदस्य संख्या: 13


8. IBSA 

- स्थापना: 6 जून 2003

- मुख्यालय: Stafford ST, Abbotsford, Victoria 

- सदस्य: भारत, ब्राझिल, द. आफ्रिका

प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी शेवटच्या आठवड्यात नियोजन काय असावे?


 राज्यसेवा पूर्वसाठी इतिहासामध्ये विचारल्या जाणाऱ्या एकूण 15 प्रश्नांपैकी आठ ते नऊ प्रश्न हे प्राचीन व मध्ययुगीन भारतावर विचारले जातात.त्यामध्ये देखील 5 ते 6 प्रश्न प्राचीन व दोन-तीन प्रश्न मध्ययुगीन भारतावरती विचारले जातात.


 ♦️आता आपण प्राचीन व मध्ययुगीन भारतासाठी नक्की काय Strategy असायला पाहिजे याविषयी बघूयात.


1.राहिलेल्या 7 दिवसातील कमीत कमी आठ ते दहा तासांचा वेळ तुम्ही प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासाला द्यायला हवा.


त्यामध्ये देखील शेवटच्या दोन ते तीन दिवसांमध्ये हा टॉपिक वाचला तर जास्त फायदा होईल.कारण प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या facts खूप लवकर विसरून जातात.कोणी जर हा घटक Skip केला असेल तर अजूनही वेळ आहे हा टॉपिक करून घ्या.कारण Basic reading वरती देखील 4-5 प्रश्न बरोबर येऊ शकतात.


2. प्राचीन  भारतातील काही महत्त्वाच्या घटकांवर आयोग हमखास प्रश्न विचारत आहे. उदा.सिंधू खोरे संस्कृती,महाजनपदे, मौर्य कालखंड,गुप्त कालखंड,गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, वैदिक कालखंड etc.


या सर्व कालखंडातील आयोग व्यक्तीवर जास्त प्रश्न विचारताना दिसतो त्यामुळे व्यक्तींचा अंदाज घेऊन चांगला अभ्यास करा.या कालखंडातील संस्कृती,भाषा,लोकांची जीवन जगण्याची पद्धती,कला-संस्कृती याचा अंदाज घ्या.


3. मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर 2-3 प्रश्न विचारले जातात.यामध्ये मुघलांचे आगमन आणि भारतातील मुघल घराण्याची स्थापना, मुघलकालीन कला,साहित्य,संस्कृती इ अनुषंगाने अभ्यास करा.त्यानंतर दिल्ली सलतनत,भक्ती चळवळ, सुफी चळवळ, सीख धर्मीयातील विविध चळवळ या वरती आयोग प्रकर्षाने प्रश्न विचारतो.


♦️Booklist-


तुम्ही आतापर्यत ज्या booklist मधून read केलं आहे त्यामधून revise करा.


आणखी कोणी जास्त केलं नसेल तर फक्त 6,7 आणि 11 th चे Stateboard मधून Cover करून घ्या. एक optimum Level चे marks नक्कीच भेटतील.


♦️आता आता तुम्ही दोन जानेवारी साठी  प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाचे प्रश्न सोडवताना कोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत ते पाहुयात.


1. इतिहासाचे बरेच प्रश्न हे व्यक्तीविशेष म्हणजेच Personality based विचारले जातात. त्यामुळे शेवटचं revision घेताना व्यक्तींवर जास्त focus राहू द्या.अजून आयोग महत्वाच्या व्यक्तींवरतीच प्रश्न विचारतो त्यामुळे Options मध्ये तुम्हाला जर एखादी महत्त्वाची व्यक्ती दिसत असेल तर तेच उत्तर निवडले पाहिजेत.

उदा.2018 च्या Prelims ला अल्लाउद्दीन खिलजी वरती multistatement प्रश्न आला होता. त्यामध्ये अमीर खुसरो हा नामवंत कवी त्याच्या दरबारी होता हे वाक्य होते. आणि तेवढं वाक्य माहित असली की प्रश्न सुटेल.


2. इतिहासामध्ये उत्तरे ही most Inclusive पर्यायचीच असतात.2020 च्या परीक्षेमध्ये शहाजहाच्या दरबारातील चित्रकार विचारले होते. आणि ऑप्शन खूपच Narrow होते.म्हणजे फक्त ab, फक्त bc, फक्त cd आणि चौथा abd. अशा वेळी चौथा म्हणजे most inclusive Option उत्तर असते.

 

3. इतिहासामध्ये एक Timeline असते ती timeline perfect लक्षात आली पाहिजे. उदा.महाजनपदे, मौर्य आणि गुप्त या timeline मधील महत्त्वाच्या व्यक्ती आणि त्यांच्या सभोवतालच्या छोट्या गोष्टी जरी माहिती असलं तरी प्रश्न Tackle होतो.


4. प्राचीन व मध्ययुगीन भारतातील 8-9 प्रश्नांपैकी साधारणता दोन ते तीन प्रश्न हे जोड्या लावा यावरती असतात. पुढील पाच-सहा दिवस तुम्ही आयोगाचे 2017 पासून 2020 पर्यंत चे पेपर घेऊन  जोड्यांचे पॅटर्न व्यवस्थित बघा. त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन मध्ये काही कॉमन ऑप्शन्स दिसतील तीच उत्तरे बऱ्यापैकी असतात. किंवा प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहासामध्ये 1234 किंवा 4321 या जोड्यांचा पॅटर्न देखील चालतो.


5. प्राचीन व मध्ययुगीन भारताचे प्रश्न हे out of box असतात. पण त्यालादेखील logic लागू शकत. उदा.2019 मध्ये Achaemenid विजयानंत्तर कंभोज मध्ये कोणता उद्योग सुरु झाला असा प्रश्न होता. आपलं Confusion हे जहाजबांधणी व ब्लॅंकेट बनवणे यामध्ये होत. पण कंभोज हे शहर समुद्रकाठावर वसलेलं नव्हतं याचाच अर्थ तिथं जहाजबंधनी उद्योग सुरु होणे थोडे अवघड आहे.त्यामुळे ब्लॅंकेट बनवणे हा एकच पर्याय शिल्लक राहतो.


6. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रश्नातील Options संबंधीचा. तो कोणता? समजा एखाद्या प्रश्नातील Options मध्ये दोन पर्याय जर Close दिसत असतील तर तेच उत्तर असण्याची शक्यता जास्त असते.प्रश्न सोडवताना ही Technique तुम्ही निश्चितच वापरू शकता.


7. 2020 ला प्राचीन व मध्ययुगीन भारताचे प्रश्न थोडे tough होते हे मान्य आहे पण त्यामध्येदेखील आपण वरती सांगितल्याप्रणे वेगवेगळे method वापरून उत्तरापर्यंत पोहोचू शकलो असतो.


सर्वांना शुभेच्छा!

1 मे 1960 नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले जिल्हे


★ नवीन जिल्हा : मूळ जिल्हा : निर्मिती 


◆ सिंधुदुर्ग : रत्नागिरी : 1 मे 1981

◆ जालना : औरंगाबाद : 1 मे 1981

◆ लातूर : उस्मानाबाद : 16 ऑगस्ट 1982

◆ गडचिरोली : चंद्रपुर : 26 ऑगस्ट 1982

◆ मुंबई उपनगर : मुंबई शहर : 1990

◆ वाशीम : अकोला : 1 जुलै 1998 

◆ नंदुरबार : धुळे : 1 जुलै 1998

◆ हिंगोली : परभणी : 1 मे 1999

◆  गोंदिया : भंडारा : 1 मे 1999

◆ पालघर : ठाणे : 1 ऑगस्ट 2014

संयुक्त पूर्व परीक्षा

 नमस्कार मित्रांनो,


आज आपण शेवटच्या 60 दिवसांमध्ये संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी कशी करावी आणि 60 गुण कसे मिळवावेत याबाबत चर्चा करूयात..


⭕️ संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल पाहता आता सुरक्षित गुण किती असतील याबाबत कोणीच निश्चित सांगू शकत नाही. पहिल्या उत्तरतालिका नुसार किमान 60 गुण मिळवले तरच मुख्य परीक्षेला असण्याची खात्री राहणार आहे. सर्वांनी पूर्व परीक्षेला ठरवून 60 गुणांच्या वर स्कोर करण्याची आवश्यकता आहे.


⭕️ इतिहास -

मागील संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपर पाहता असे लक्षात येते की नेहमीच त्रास देणाऱ्या इतिहास या विषयाने विद्यार्थी मित्रांना भरपूर मदत केलेली आहे. 15 पैकी 14 गुण मिळवणारे बरेच विद्यार्थी मी स्वतः पाहिलेले आहेत त्यामुळे यंदा इतिहासामध्ये, जर पेपरचा दर्जा मागील प्रमाणेच राहिला तर, किमान 12 गुण मिळवणे अनिवार्य राहणार आहे. इतिहासाचे तयारी करण्यासाठी गाठाळ सर किंवा कठारे सर या दोघांपैकी एका चे पुस्तक आपण वापरू शकता. इतिहासामध्ये ज्ञान मिळवणे मर्यादीत असल्याने लॉजिक डेव्हलपमेंट आणि एलिमिनेशन टेक्निक्स खूप काम करतात.त्याबाबत आपण आवर्जून विचार करावा


⭕️भगोल-

बाबतीत,15 पैकी किमान 10 गुण मिळाले तर आपण पूर्व परीक्षा सहजासहजी पास होऊ शकतो.भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी सौदी सर किंवा खातीब सर किंवा दीपस्तंभ प्रकाशन यांचे पैकी कोणतेही एक महाराष्ट्राच्या भूगोल साठी वापरावे आणि भारताच्या भूगोलासाठी सौदी सरांचे पुस्तक वापरावे.


⭕️पॉलिटी-

 या विषयांमध्ये पूर्वी 10 पैकी 10 गुण मिळतात मात्र अभ्यासक्रमाचा आवाका व त्या तुलनेमध्ये कमी गुणांचा भारांक आणि आयोगाची प्रश्न विचारण्याची वाढत असलेली खोली पाहता सध्या आपणास 10 पैकी 7 ते 8 गुण मिळवणे आवश्यक असते. लक्ष्मीकांत सरांचे अथवा  कोळंबे सरांचे पुस्तक आपण यासाठी वापरू शकतो तसेच पंचायत राज या घटकावर येणाऱ्या 2 ते 3 प्रश्नांसाठी किशोर लवटे सरांचे पंचायत राज हे पुस्तक उपयुक्त ठरते. त्याचे वारंवार वाचन केले पाहिजे. शॉर्ट नोट्स बनवल्या पाहिजेत व त्याची वारंवार उजळणी झाली पाहिजे तरच प्रचंड डेटा आपल्या लक्षात राहू शकतो.


⭕️अर्थशास्त्र-

 येणाऱ्या प्रश्नांची काठिण्य पातळी सध्या कमी होत आहे म्हणजेच केवळ सर्वसामान्य अभ्यासावर आपण 15 पैकी 10 ते 12 गुण मिळवू शकतो. यासाठी देसले सर किंवा कोळंबे सर पैकी कोणतेही एक पुस्तक वाचण्यास पुरेसे ठरते. अर्थशास्त्राचे आयोगाचे मागील काही वर्षांचे प्रश्न पाहिल्यास आयोग कोणत्या घटकांवर किती आणि कसे प्रश्न विचारतो हे लक्षात येऊ शकते त्यामुळे पूर्वीच्या प्रश्नांना बिलकुल दुर्लक्षित करू नये.


⭕️विज्ञान -

हा घटक सर्वसामान्यपणे सर्वच जनतेला किचकट वाटणारा विषय आहे तसेच प्रश्नांचा दर्जा मध्ये आयोगाने सातत्य राखलेले नाही. त्यामुळे कधी अभ्यास करून कमी मार्क तर कधी अभ्यास न करता ही सरासरी मार्क मिळतात मात्र तरीही स्टेट बोर्ड इयत्ता 7 ते 10 वी च्या पुस्तकांवर आपली कमांड असायला हवी किंवा सचिन भस्के सरांच्या पुस्तकाच्या किमान 3 ते 4 उजळण्या व्हायला हव्यात. लक्षात ठेवा की जर विज्ञान विषय अवघड आला तर तो सर्वांसाठी अवघड असेल आणि सोपा ला करतो सर्वांसाठीच सोपा असेल त्यामुळे या विषयावर ती मेरीट ठरण्याची शक्यता फार कमी असते.


⭕️ चालू घडामोडी-

हा पूर्व परीक्षांमधील सर्वांत अनिश्चित विषय मला वाटतो.यासाठी आयोग नक्की कोणता source वापरतो हे निश्चित समजत नाही. मात्र असे असले तरीही 15 पैकी 8 प्रश्न प्रयत्नपूर्वक अभ्यास केल्याने सुटू शकतात. परिक्रमा हे मासिक किंवा अभिनव अथवा सिंपलिफाईड प्रकाशनाचे वार्षिकी यातून बऱ्याच अंशी घटना कव्हर होतात. त्या पुस्तकांच्या 2 ते 3 उजळण्या केल्यास किमान 7 ते 8 गुण पडण्यास हरकत नाही.


⭕️गणित बुद्धिमत्ता -

हा विषय पूर्व परीक्षांमधील मार्क देणारा विषय म्हणून ओळखला जातो मात्र काही विद्यार्थ्यांना हा विषय की  किचकट जातो मात्र दररोज सराव केल्यास या विषयाची भीती मनातून निघू शकते. आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिका पहा व आयोगाने कशा पद्धतीचे प्रश्न विचारले आहेत यावरून बाजारात सापडणारे कोणतेही एक पुस्तक घेऊन त्यातून दररोज दोन ते अडीच तास सराव अपेक्षित आहे.


⭕️अशाप्रकारे एकंदरीत आपण 60 गुणांची गोळाबेरीज परीक्षेपूर्वी जमा केली आणि त्यानुसार विषयांना वेळ वाटून दिला आणि उजळणी केली तर निश्‍चितपणे आपण संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये 60 पेक्षा जास्त गुण मिळवू शकतो. जितके जास्त गुण असतील तितकी पूर्व परीक्षा पास होण्याची खात्री अधिक असेल व त्यामुळे पूर्व परीक्षेचा निकाल पर्यंतचा वेळ वाट पाहण्यात जाणार नाही.

त्यामुळे वरील प्रमाणे अभ्यास करून अथवा आपल्या सोयीनुसार त्यामध्ये बदल करून 60 प्लस गुण मिळवणे आवश्यक ठरते.


❇️ अभ्यासासाठी अनेक अनेक शुभेच्छा.


सोळा महाजनपदाची प्राचीन आणि आधुनिक नावे


🔸काशी ➾ बनारस

🔹कोसल ➾ लखनौ

🔸मल्ल ➾ गोरखपुर

🔹वत्स ➾ अलाहाबाद

🔸चदी ➾ कानपूर

🔹करू ➾ दिल्ली

🔸पांचाल ➾ रोहिलखंड

🔹गांधार ➾ पेशावर

🔸कबोज ➾ गांधारजवळ

🔹मत्स्य ➾ जयपुर

🔸शरसेन ➾ मथुरा

🔹अश्मक ➾ औरंगाबाद-महाराष्ट्र

🔸अवंती➾ उज्जैन

🔹अग ➾  पूर्व-बिहार

🔸मगध ➾ दक्षिण बिहार

🔹वज्जी ➾ उत्तर बिहार


शेवटच्या दहा दिवसांमध्ये लढाईस सज्ज होऊया.


 नमस्कार मित्रांनो,


 परीक्षा अगदी तोंडावर येऊन ठेपलेली आहे

 त्यामुळे आता घाई गडबड न करता, एकदम आत्मविश्‍वासाने आपल्याला परीक्षेला सामोरे जायचा आहे.

 त्यासाठी आजपासूनच एक गोष्ट लक्षात ठेवा

 की, माझं कसं होणार?,

 परीक्षा खूप अवघड असते,

 मी पास होईल का नाही??

 स्पर्धा खूप आहे,

 मी तर नुकताच अभ्यास सुरू केला आहे.


 असे बरेच प्रश्न मनात गोंधळ करून जातात

 त्यामुळे यावर एकच रामबाण उपाय तो म्हणजे

 ह्या कटकटी पासून दूर राहा.

 आणि फक्त आणि फक्त अभ्यास म्हणजे अभ्यास यावरच पूर्णता तुम्ही लक्ष दिले पाहिजे.


 आता आपण शेवटच्या दहा दिवसांमध्ये नेमकं काय केलं पाहिजे यावर सविस्तरपणे चर्चा करूया.


1. आता या स्टेजला नवीन पुस्तक हातात घेऊ नका जे काय आधी वाचले तेच पुन्हा पुन्हा रिविजन करा.


2. जर तुम्ही मायक्रो नोट्स शॉर्ट नोट्स काढल्या असतील तर त्याच रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा.


3 निगेटिव्ह लोकांपासून दूर रहा.


4. सी सॅट ला इथून पुढे जास्त वेळ दिला तरी हरकत नाही.


5. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुमची तब्येत आणि आरोग्य याकडे तुम्ही कदापिही दुर्लक्ष करू नका कारण की वर्षांची मेहनत ही आजारी पडून घालवू नका नियमित शेडूल ठेवा योग्य तो व्यायाम करा.


6. खाण्याकडे पण लक्ष द्या.

 जेवणाची वेळ यामध्ये बदल करू नका

 जागरण शक्यतो टाळा.

 वडापाव समोसा यासारखे जंक फूड किंवा पिझ्झा वगैरे असं पदार्थ खाणे टाळा.

 शक्यतो फूट प्लेट्स, पौष्टिक आहार घ्या.


7. टेन्शन तर सर्वांनाच येतो अगदी मलाही येतो

 मग एकच डायलॉग आठवायचा,

 बोले तो टेन्शन नही लेनेका मामू. 😁


8. शिस्तप्रिय बना, आणि शेडूल प्रॉपर पाळा

 उगीचच परीक्षा जवळ आली म्हणून 14 तास पण राहता सोळा तास करण्याच्या भानगडीत पडू नका.


9. कुठल्याही परिस्थितीत तणाव आला तर शांत राहण्याचा प्रयत्न करा.


10. दुसऱ्याला दाखवायचा आहे म्हणून स्वतःचा हुशारी पणा दाखवू नका.

 किंवा मला किती येत आहे त्याला येत नाही एखाद्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही म्हणून स्वतःचा कॉन्फिडन्स लूज होऊ देऊ नका.


11.शक्यतो वरील गोष्टी अमलात आणण्याचा प्रयत्न करा.


12.CSAT ला वेळ देता योग्य आहे पण g.s. कडेपण दुर्लक्ष नको.


13. कारण  सुद्धा तितकाच महत्त्वाचा विषय आहे तुम्हाला जर सत्तर ऐंशी मार्क पडले तर तुम्ही स्पर्धेत ना बाहेर पण होऊ शकतात त्यामुळे किमान शंभर चा टप्पा गाठण्याचा प्रयत्न करा.


14. कुठल्याही परिस्थितीत शांत राहण्याचा प्रयत्न करा.


15. पेपरच्या दिवशी नेमकं काय करायचं हे आपण पुढील भागात पाहू या.

 त्यामध्ये आपण पेपरच्या दिवशी स्वतःचं टेंपरामेंट कशा पद्धतीने मेंटेन ठेवायचं या गोष्टी आपण पाहणार आहोत..


 क्रमश..


Latest post

चालू घडामोडी :- 26 एप्रिल 2024

◆ दरवर्षी 26 एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिवस जगभरात साजरा केला जातो. ◆ बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार...