सराव प्रश्न संच

Q1. खालीलपैकी कोणत्या राज्यात तांब्याचा साठा सर्वात जास्त आहे?
(a) बिहार
(b) झारखंड
(c) कर्नाटकक
(d) राजस्थान✅

Q2. स्टॉक फार्मिंग म्हणजे काय?
(a) एकाच वेळी 2-3 पिकांची वाढ
(b) प्राण्यांची पैदास✅
(c) पीक फेरपालट
(d) वरीलपैकी कोणतेही नाही

Q3. हवेतून नायट्रोजन सोडविण्यास सक्षम असलेल्या पिकाचा प्रकार कोणता आहे?
(a) गहू
(b) शेंगा✅
(c) कॉफी
(d) रबर

Q4. ‘हरिजन सेवक संघ’ कोणी स्थापन केला होता?
(a) महात्मा गांधी✅
(b) डॉ. बी.आर. आंबेडकर
(c) जी डी बिर्ला
(d) स्वामी विवेकानंद

Q5. खालीलपैकी कोणते बेट लक्षद्वीप समूहातील नाही?
(a) कावरत्ती
(b) अमिनी
(c) मिनिकॉय
(d) नील✅

Q6. खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार जम्मू आणि काश्मीर राज्याचा आहे?
(a)बिडेसिया
(b) कर्म
(c) रौफ✅
(d) स्वांग

Q7. ‘पुसा, सिंधू, गंगा’ या कशाच्या जाती आहेत?
(a) गहू✅
(b) भात
(c) मसूर
(d) हरभरा

Q8. माजुली नदीचे बेट जे “भारतातील पहिले आणि एकमेव बेट जिल्हा” बनले आहे ते कोणत्या राज्यात आहे?
(a) हिमाचल प्रदेश
(b) जम्मू आणि काश्मीर
(c) कर्नाटक
(d) आसाम✅

Q9. मुस्लिम लीगच्या लाहोर अधिवेशनाचे (1940) अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?
(a) लियाकत अली खान
(b) चौधरी खालिक-उझ-जमान
(c) मोहम्मद अली जिना✅
(d) फातिमा जिना

Q10. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले खेळाडू कोण आहेत?
(a) ध्यानचंद
(b) लिएंडर पेस
(c) सचिन तेंडुलकर✅
(d) अभिनव बिंद्रा

Q.1) ब्रिक्स शिखर परिषद 2023 कोठे होणार आहे?
✅ - दक्षिण आफ्रिका 

Q.2) सिंगापूर मॅथ ऑलिम्पियाडमध्येराजा अनिरुद्ध श्रीराम या विद्यार्थ्याने कोणते पदक मिळवले आहे?
✅ – रौप्य

Q.3) भारतातील पहिली हायड्रोजनवर चालवणारी बस कोठे सूरू झाली आहे?
✅ - लडाख 

Q.4) UIDAI चे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
✅ - नीलकंठ मिश्रा

Q.5) दक्षिण पूर्व आशियातील सर्वात मोठ्या डिसॅलिनेशन प्रकल्पाची पायाभरणी कोठे करण्यात आली 
✅ –  तामिळनाडू 

Q.6) ‘डिजी यात्रा’ सुविधा मिळवणारे ईशान्येतील पहिले विमानतळ कोणते ठरले आहे?
✅ - गुवाहाटी विमानतळ

Q.7) निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आयकॉन म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
✅ - सचिन तेंडुलकर 

Q.8) जागतिक जल साप्ताह 2023 केव्हां साजरा केला जात आहे?
✅ - 20 ते 24 ऑगस्ट 

Q.9) 20 ते 31 ऑगस्ट या कालावधीत ओणम हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जाणार आहे?
✅ – केरळ 

Q.10) दरवर्षी कोणत्या दिवशी धर्म किंवा श्रद्धेवर आधारित हिंसाचाराच्या बळींचे स्मरण करणारा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो?
✅ - 22 ऑगस्ट

1. सम्राट अशोकाचे शिलालेख वाचणारे पहिले इंग्रज कोण होते?
उत्तर:- जेम्स प्रिन्सेप

2. महावीर स्वामींनी 'जैन संघ' कोठे स्थापन केला?
उत्तर :- पावपुरी

3. कोणत्या परदेशी राजदूताने स्वतःला 'भागवत' घोषित केले?
उत्तर :- हेलिओडोरस

4. वैदिक काळातील लोकांनी प्रथम कोणता धातू वापरला?
उत्तर :- तांबे

5. कोणता वेद गद्य आणि पद्य या दोन्हीमध्ये रचला आहे?
उत्तर :- यजुर्वेद

6. कोणत्या व्यक्तीला 'मुकुटाशिवाय राजा' म्हणतात?
उत्तर :- सुरेंद्रनाथ बॅनर्जी

7. हडप्पा काळात तांब्याचा रथ कोणत्या ठिकाणाहून सापडला?
उत्तर :- दायमाबाद (महाराष्ट्र)

8. महावीर स्वामींना 'यति' केव्हा म्हटले गेले?
उत्तरः घर सोडल्यानंतर

9. मोहेंजोदारोच्या स्नानगृहाच्या पश्चिमेला असलेला स्तूप कोणत्या काळात बांधला गेला?
उत्तर :- कुशाण काळ

10. हडप्पा संस्कृतीच्या कोणत्या प्राचीन स्थळाला 'सिंधचा बाग' किंवा 'मृतांचा टिळा' असे संबोधले जाते?
उत्तर :- मोहेंजोदारो

11. पहिला सूफी संत कोण होता, ज्याने स्वतःला अनहलाक घोषित केले?
उत्तर:- मन्सूर हलाज

12. “तलवारीच्या जोरावर हिंदुस्थान जिंकला” हे विधान कोणाचे आहे?
उत्तर :- लॉर्ड एल्गिन II

13. विष्णूच्या दहा अवतारांची माहिती कोणत्या पुराणात आहे?
उत्तर :- मत्स्य पुराण

14. बौद्ध धर्माच्या कोणत्या शाखेत मंत्र, हठयोग आणि तांत्रिक पद्धतींना महत्त्व दिले गेले आहे?
उत्तर :- वज्रयान

15. प्रसिद्ध 'विजयविठ्ठल मंदिर' कोठे आहे, ज्याचे 56 तक्षीत स्तंभ संगीतमय नोट्स उत्सर्जित करतात?
उत्तर:- हम्पी (कर्नाटक)

16. चित्तोडचा 'कीर्तीस्तंभ' कोणत्या शासकाने बांधला?
उत्तर :- राणा कुंभा

17. 'इंडिया डिवाइडेड' या पुस्तकाचे लेखक कोण होते?
उत्तर:- डॉ. राजेंद्र प्रसाद

18. शेरशाह नंतर आणि अकबराच्या आधी दिल्लीवर राज्य करणाऱ्या हिंदू राजाचे नाव काय होते?
उत्तर :- हेमू

19. 'आर्य' या शब्दाचा शाब्दिक अर्थ काय?
उत्तर :- सर्वोत्तम किंवा अभिजात

20. 'चरक संहिता' नावाचा ग्रंथ कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
उत्तर: चिकित्सा

महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नसंच

१) खालील पैकी कोणाचा अखिल भारतीय कांग्रेस पक्षाच्या स्थापनेत सहभाग होता ?
अ) श्री. डब्ल्यू . सी. बॅनर्जी
ब)  श्री. दिनशॉ वाच्छा
क) श्री. विल्यम वेडेरबर्न
ड) वरील सर्व.

२) खालीलपैकी कोणती संघटना कांग्रेस प्रणित नाही?
अ) कांग्रेस सेवा दल
ब)  युक्रांद
क) एन एस यू आय
ड) आय एन टी यू सी

३) कांग्रेस पक्षातील हाय कमांड म्हणजे खालीलपैकी कोण असते?
अ) पक्षाध्यक्ष
ब) पक्ष उपाध्यक्ष
क) कांग्रेस कार्यकारी समिती 
ड) यापैकी नाही

४) खालीलपैकी योग्य विधाने निवडा.
१) राष्ट्रीय कॉंग्रेस ही लोकशाही तत्वावर आधारित असलेली संघटना होती.
२) १८८५ साली राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाली.
३) राष्ट्रीय सभेवर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव असला तरी दुसऱ्या महायुद्धात भारताने इंग्रजांना मदत करावी या गांधीजींच्या निर्णयाविरुद्ध राष्ट्रीय सभेने ठराव संमत केला होता.

अ) फक्त १ व ३
ब) फक्त १ व २
क) फक्त २ व ३
ड) वरील सर्व 

५) कॉंग्रेसमधील जहाल व मवाळ गटातील प्रमुख पूरक असलेले पर्याय निवडा ? 
१) विचारसरणीत  भिन्नता 
२) आंदोलन मार्गातील भिन्नता 
३) मागण्यात  भिन्नता 
४) स्वराज्य व स्वातंत्र्य मुद्यावर मतभेद 

अ) १, ३ व ४
ब) २, ३ व ४
क) १, २ व ३
ड) १, २ व ४

६)  खालीलपैकी कोणते उद्दिष्ट कॉंग्रेसच्या स्थापनेशी संबंधित नाही ?
   
अ) भारतीय लोकाचा असंतोष कमी करणे.
ब) इंग्रज प्रशासनाच्या चुका दुरुस्त करणे 
क) विविध प्रश्नावर लोकमत तयार करणे 
ड) जहाल व मवाळामध्ये समन्वय प्रस्थापित करणे

७) भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर राष्ट्रीय सभा बरखास्त करण्यात यावी असे खालीलपैकी कोणाचे मत होते ?

अ) सी. राजगोपालाचारी  
ब) आचार्य कृपलानी 
क) महात्मा गांधी 
ड) जयप्रकाश नारायण 

८) खालीलपैकी कोणती योजना कांग्रेस कार्यकाळातील नाही ?
अ) मनरेगा
ब) किसान विकास पत्र
क) सुकन्या समृद्धी
ड) अन्न सुरक्षा

९) २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पूर्ण भारतात किती जागा मिळाल्या ?
अ) ४४ 
ब) ४८
क) ५२
ड) ६१

१०) खालीलपैकी कोणत्या कॉंग्रेस नेत्याने भारत देशाचे गृहमंत्रीपद भूषवले नाही?
अ) पी. चिदंबरम
ब) पी.व्ही. नरसिंहाराव
क) इंदिरा गांधी
ड) पृथ्वीराज चव्हाण 



1. 1869 साली महात्मा गांधींचा जन्म _____ ह्या ठिकाणी झाला.

A. सुरत
B. बडोदा
C. पोरबंदर 
D. नाताळ (दक्षिण आफ्रिका)

2. गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले ?

A. 1890
B. 1893 
C. 1896
D. 1899

3. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते ?

A. आफ्रिकन ओपिनियन
B. इंडियन ओपिनियन 
C. नाताळ काँग्रेस
D. ब्लॅक सॅल्युट

4. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली होती ?

A. साबरमती आश्रम
B. सेवाग्राम आश्रम
C. फिनिक्स आश्रम 
D. इंडियन आश्रम

5. महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?

A. दिल्ली
B. मुंबई
C. अहमदाबाद
D. चंपारण्य 

6. कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला होता ?

A. सन 1916
B. सन 1918 
C. सन 1919
D. सन 1920

7. जालियानवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते ?

A. सायमन कमिशन
B. हंटर कमिशन 
C. रिपन कमिशन
D. वूड कमिशन

8. _ साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले.

A. सन 1930
B. सन 1933 
C. सन 1936
D. सन 1939

9. 'सरहद्द गांधी' या नावाने कोणाला ओळखले जाते ?

A. आगा खान
B. खान अब्दुल गफार खान 
C. महात्मा गांधी
D. मोहम्मद अली जीना

10. ____ रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला.

A. 1 ऑगस्ट 1920 
B. 1 ऑगस्ट 1925
C. 1 ऑगस्ट 1929
D. 1 ऑगस्ट 1935

11. भारतीय घटनेत सुरूवातीला किती कलमे होती ?

A. 6
B. 8 
C. 10
D. 12

12. देशात आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार जारी केली जाते ?

A. कलम 356
B. कलम 360 
C. कलम 365
D. कलम 368

13. भारत सरकारला कायदेविषयक सल्ला कोण देतो ?

A. कायदामंत्री
B. राष्ट्रपती
C. सरन्यायाधीश 
D. लोकसभा सभापती

14. भारतात खरी कार्यकारी सत्ता कोणाकडे असते ?

A. भारतातील सनदी अधिकारी
B. भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती
C. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ 
D. भारताचे सर्वोच्च न्यायालय

15. राज्यसभा लोकसभेने मंजूर केलेले अर्थविधेयक किती काळापर्यंत रोखून ठेवू शकते ?

A. 14 दिवस 
B. एक महिना
C. चार महिना
D. एक वर्ष

16. विधानसभेत कमाल किती सदस्य असतात ?

A. 250
B. 270
C. 350
D. 500 

17. केंद्र-राज्य विवाद खालीलपैकी कोणत्या संस्थेकडून सोडविले जातात ?

A. उच्च न्यायालय
B. नियोजन मंडळ
C. आंतरराज्यीय परिषद
D. यापैकी कोणी नाही 

18. राज्यपालाचा कार्यकाळ सामान्यतः किती असतो ?

A. कायम
B. 5 वर्षे 
C. 6 वर्षे
D. 10 वर्षे

19. भारताने घटनादुरुस्तीची पध्दत कोणत्या देशाकडून घेतली ?

A. अमेरिका
B. दक्षिण आफ्रिका 
C. कॅनडा
D. आयर्लंड

20. भारतात केंद्रीय वित्त आयोगाची स्थापना दर किती वर्षांनी केली जाते ?

A. 3 वर्षे
B. 4 वर्षे
C. 5 वर्षे 
D. 6 वर्षे

21. रक्तात असणाऱ्या प्रथिनाला काय म्हटले जाते ?

A. मायोसीन
B. फायब्रीनोजन 
C. केसीन
D. व्हिटेलीन

22. एक ग्रॅम प्रथिनांमधून किती उष्मांक मिळतात ?

A. 10
B. 8
C. 6
D. 4 

23. खालीलपैकी कोणते खरे फळ आहे ?

A. सफरचंद
B. काजू
C. अननस
D. नारळ 

24. TRIPS आणि TRIMS ह्या संज्ञा कोणत्या यंत्रणेशी निगडीत आहेत ?

A. WTO 
B. IMF
C. IBRD
D. ADB

25. वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकूण वातावरणाच्या 85% इतका व्यापलेला आहे ?

A. मिसोस्फियर
B. थर्मोस्फियर
C. ट्रोपोस्फियर 
D. स्ट्रॅटोस्फियर

26. एकक क्षेत्र जमिनीवर पीक वाढीच्या कालावधीत पर्णक्षेत्र निर्माण करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात?

A. पर्णक्षेत्र निर्देशांक
B. पर्णक्षेत्र कालावधी 
C. पीक वाढीचा दर
D. तुलनात्मक पीक वाढीचा दर

27. महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह _____ येथे झाला.

A. संगमनेर, रत्नागिरी, मालवण
B. वडाळा, मालवण, शिरोडा 
C. शिरोडा, संगमनेर, ठाणे
D. कल्याण, मालवण, शिरोडा

28. युनेस्कोने पर्यावरण शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंमलात आणला ?

A. WHO
B. WWF
C. IEEP
D. UNEP 

29. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे ?

A. कराड
B. कोल्हापूर
C. नरसोबाची वाडी 
D. सातारा

30. _______ यांनी स्वामी दयानंद सरस्वतींना 'आर्यसमाज' स्थापनेसाठी मदत केली.

A. स्वामी विवेकानंद
B. आगरकर
C. गोखले
D. लोकहितवादी 

31. कोणत्या साली गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी आपली सत्ता स्थापन केली ?

A. सन 1500
B. सन 1510 
C. सन 1520
D. सन 1530

32. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

A. सन 1500
B. सन 1550
C. सन 1600
D. सन 1650

33. प्लासीची लढाई ______ रोजी झाली.

A. 23 जानेवारी 1757
B. 23 जून 1
C. जून 1758
D. 31 मार्च 1751.

34. वसईचा प्रसिध्द तह कोणत्या वर्षी घडून आला ?

A. सन 1801
B. सन 1802 
C. सन 1803
D. सन 1818

35. तैनाती फौज भारतात कोणी सुरू केली ?

A. अकबर
B. औरंगजेब
C. लॉर्ड वेलस्ली 
D. लॉर्ड कॉर्नवालीस

36. सतीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी पास झाला ?

A. सन 1829 
B. सन 1859
C. सन 1929
D. सन 1959

37. विधवा पुर्नविवाहाचा कायदा कधी पास झाला ?

A. सन 1926
B. सन 1936
C. सन 1946
D. सन 1956 

38. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार कोठे उभारली ?

A. चंद्रनगर
B. सुरत 
C. कराची
D. मुंबई

39. कोणत्या साली भारतात विद्यापीठ कायदा पास झाला ?

A. सन 1834
B. सन 1864
C. सन 1894
D. सन 1904 

40. भारतात येणारे पहिले युरोपियन कोण ?

A. इंग्रज
B. फ्रेंच
C. डच
D. पोर्तुगीज 

41. नेफा हे ______ चे जुने नाव आहे.

A. मणिपूर
B. मेघालय
C. अरुणाचल प्रदेश 
D. त्रिपुरा

42. खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते ?

A. महाराष्ट्र
B. आंध्रप्रदेश 
C. गुजरात
D. आसाम

43. IIM मध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते ?

A. NET
B. JEE
C. GATE
D. CAT 

44. भारत सरकार कोणत्या दिवशी 'राष्ट्रीय मतदार दिन' म्हणून साजरा करते ?

A. 12 जानेवारी
B. 15 जानेवारी
C. 25 जानेवारी 
D. 26 जानेवारी

45. स्वतंत्र तेलंगणाची मागणी कशावर आधारलेली होती ?

A. भाषिक महत्त्वाकांक्षा
B. प्रादेशिक असंतुलन 
C. फुटीरतावादी राजकारण
D. राज्याच्या स्वायत्ततेशी

46. मोटार वाहनांमुळे _____________ प्रकारचे प्रदूषण होते .

A. हवेमधील
B. प्राथमिक
C. दुय्यम
D. प्राथमिक व दुय्यम दोन्ही प्रकारचे 

47. ई-मेलचा अर्थ ________________ असा आहे.

A. इलेक्ट्रॉनिक मेल 
B. इलेक्ट्रिकल मेल
C. इलेक्ट्रोमॅग्नेटीक मेल
D. इलेक्ट्रोस्टॅटीक मेल

48. खालीलपैकी कोणत्या महामार्गावर 'खंबाटकी घाट' लागतो ?

A. मुंबई-पुणे
B. मुंबई-गोवा
C. मुंबई-आग्रा
D. पुणे-बेंगळूरु 

49. खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे ?

A. व्यवसाय कर 
B. मूल्यवर्धित कर
C. सेवा कर
D. विक्री कर

50. महाराष्ट्रातील आदिवासी विकासाच्या चळवळीशी कोण संबंधित नव्हते ?

अ. सेनापती पांडुरंग बापट ब. अनुताई वाघ क. ताराबाई मोडक ड.केशवराव जेधे

A. ब, ड
B. अ, क
C. अ, ड 
D. ब, क


曆曆曆曆曆曆曆曆曆曆曆

मूलभूत कर्तव्य


■पार्श्वभूमी :

◆ समाजाचा घटक या नात्याने व्यक्तीला जसे हक्क प्राप्त होतात त्याच प्रमाणे त्या व्यक्तीने समाजासाठी काही जबाबदारया पार पाडणे अपेक्षित असते.

◆कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडल्याने अधिकराची प्राप्ती होते,म्हणून आर्य चाणक्य ने कर्तव्याला ' स्वधर्म' म्हटलं आहे.

◆ कर्तव्य म्हणजे नीतिमत्ता व कायदा यांच्याद्वारे व्यक्तीवर एखादी कृती करणे वा न करणे ह्या संबंधी टाकलेले बंधन होय.

◆प्रथमतः मूळ संविधानात मु.कर्तव्यांचा समावेश नव्हता.

◆ घटनादूरूस्थी ४२ वी (१९७६) नूसार भाग-४,कलम-५१ (क) मध्ये १० मूलभूत करव्ये समवीष्ट करण्यात आली. 

◆८६ वी घटना दूरस्ती (२००२)-११ वे करव्ये समाविष्ट 

◆मूलभूत कर्तव्ये - स्वीकार - सोव्हिएत रशिया

◆ यु.एस. ए,कँनडा,जर्मनी, ऑस्ट्रेलिया यासारख्या प्रमुख देशाच्या घटनेमध्ये मु. कर्तव्ये नाहीत.(जपान याला अपवाद)

◆ समाजवादी देशांनी नागरिकांच्या मूलभूत हक्क व मूलभूत कर्तव्यांना सारखेच महत्व प्रदान केले आहे. 

■सरदार स्वर्ण सिंह समिति-१८

◆आणीबाणीच्या काळात निर्माण झालेल्या गरजेमुळे भारत सरकारने ही समिती स्थापन 

◆ शिफारस-मूलभूत करवव्याचे एक स्वतंत्र प्रकरण समाविष्ट करणे.

◆ त्यांनी १० मूलभूत कर्तव्यांची यादी दिली मात्र ८ च कर्तव्यांची शिफारस केली.

★मूलभूत कर्तव्यांची यादी:-

१) संविधांनाचे पालन करणे आणि संविधानातील आदर्श व संस्था ,राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.

२) राष्ट्रीय लढ्यात ज्या उदात्त आद

आदर्शामुळे स्फूर्ती मिळाली. त्या आदर्श तत्वांची जोपासना व अनुकरण करणे.

३) भारताचे सार्वभौमत्व ,एकता ,व एकात्मता  यांचा सन्मान करून त्यांचे रक्षण करणे.

४) देशाचे संरक्षण व राष्ट्रीय सेवा करण्यास तयार राहणे.

५) धर्म ,भाषा ,प्रदेश ,वर्गभेद विसरून अखिल भारतीय जनतेत एकोपा व बंधुभाव वाढीस लावणे,स्त्रीयांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथा सोडून देणें.

६) आपल्या संमिश्र संस्कृती च्या वारशाचे मोल जाणून तो जतन करणे.

७) नैसर्गिक पर्यावरण ज्यात अरण्य,सरोवरे, नद्या व वन्यजीव सृष्टी यांचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, सजीव प्राण्यांबाबत भूतदया बाळगणे.

८) विज्ञाननीष्ठ दृष्टीकोण ,मानवतावाद,शोकबुद्धि व सुधारणावाद यांचा विकास करणे.

९) सार्वजनिक संपत्ती चे रक्षण करणे, हिंसाचार चा निग्रहपूवक त्याग करणे.

१०) आपले राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल ,अश्या प्रकारे सर्व व्यतिगत व सामुदायिक क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी प्रयत्न शील राहणे.

११) 6 ते 14 वरश्यापर्यंत मुलांना मोफत शिक्षण उपलब्ध करून देणे.(२००२ च्या ८६ व्या घटनादुरीस्ती ने जोडण्यात आले)

★मूलभूत कर्तव्यवरील टीका:-

१) संविधानाविषयी दुराग्रह 

२) सर्व समावेशक नाहीत.

३)मोघम तरतुदी 

४) नैतीकतेची जंत्री

५) नागरिकांच्या गुलामीची सनद

६) व्याहरिक गोंधळ

७) चुकीच्या ठिकाणी समावेश- ही कर्तव्य भाग-४ ला जोडण्या ऐवजी भान-३ ला जोडून त्यांना मु.हक्कच्या बरोबरिचा दर्जा देने आवश्यक 

★मूलभूत कर्तव्याचे महत्व:-

●आपल्या ला देश,समाज व इतर नागरिकांप्रति आपली काही कर्तव्य आहेत याची जाणीव करून देण्याचे कार्य ही कर्तव्य करतात.

● राष्ट्रविरोधी व समाजविरोधी कृत्य करण्याविरुद्ध ही कर्तव्य ताकीद देतात.

● कर्तव्यामुळे शिस्त व जबाबदारी च्या भावनेशी प्रोत्साहन मिळते.

● एखाद्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्या साठी न्यायालयास मु.कर्तव्याचा आधार घेत येतो.उदा: 1992-सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात निर्णय दिला की,मु.कर्तव्याची अमलबजावणी करणारा कायदा कलम-१४(कायद्यासमोर समानता)व कलम-१९(सहा स्वतंत्र)च्या संदर्भात 'पर्याप्त 'असल्याचे मान्य केले जाऊ शकते.

★इंदिरा गांधींच्या मते:-"मूलभूत कर्तव्याचे नैतीक मूल्य....लोकांना आपल्या हक्काबरोबरच आपल्या कर्तव्याची जाणीव निर्माण करून लोकशाही संतुलन प्रस्थापित करेल".

★ मोरारजी देसाई यांच्या जनता पार्टी सरकारने ४३ व्या,४४व्या घटनादुरुस्थि अन्वेये ४२ व्या घटनांदूरस्थिने समवीष्ट केलेल्या अनेक तरतुदी काढून टाकण्याची प्रयत्न केला ,मात्र मूलभूत कर्तव्यांना त्यांनी स्पर्श केला नाही.

★वर्मा समिती (१९९९):-

मु.कर्तव्याच्या अमलबजावणी साठी करण्यात आलेल्या कायद्याच्या तरतुदी ची ओळख केली होती.

42वी घटनादुरुस्ती 1976



या घटनादुरुस्तीला लघु राज्यघटना म्हणून ओळखले जाते.


1)  प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता या तीन नवीन शब्दांचा समावेश केला.


2) नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये हा नवीन भाग कलम ५१ (अ) मध्ये समाविष्ट केला.


3) राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करण्याचे बंधनकारक केले.


4) प्रशासकीय न्यायासन आणि इतर विषयांसाठी न्यायासनाची तरतूद


5) 1971 च्या जनगणनेच्या आधारावर २००१ पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची निश्चिती


6) घटनादुरुस्त्या ह्या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवल्या.


7) न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयाचा आदेश, अधिकार क्षेत्राचा संकोच केला.


8) लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्षे करण्यात आला.


9) मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या कायद्यांमुळे काही मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते. या आधारावर न्यायालये त्यांना अवैध घोषित करू शकत नाही.


10) देश विघातक कारवायांना हाताळण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आणि अशा कायद्यांचे मूलभूत हक्कांवर देखील श्रेष्ठत्व असेल.


11) तीन नवीन मार्गदर्शक तत्वांची भर घालण्यात अली. उदा. समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत; उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग आणि पर्यावरण, जंगले व प्राण्यांचे संरक्षण


12) भारताच्या कोणत्याही भागामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करणे सुकर केले.


13) घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा एकवेळ (सलग) कालावधी ६ महिन्यांवरून १ वर्ष करण्यात आला.


14) कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हाताळण्यासाठी कोणत्याही राज्यात सशस्त्र सैनिक दलांची तैनाती करण्याचे अधिकार केंद्राला दिले.


15) राज्यसूचीतील ५ विषय समवर्तीसूची मध्ये स्थानांतरित केले. उदा. शिक्षण, जंगले, जंगली प्राणी आणि पक्षांचे संरक्षण, वजन आणि मापे आणि न्यायाचे प्रशासन, सर्वोच्च आणि उच्च न्यायालये वगळता इतर सर्व न्यायालयांची स्थापना आणि संरचना इत्यादी


16) संसद आणि राज्य विधिमंडळातील गणपूर्तीची आवश्यकता रद्द केली.


17) संसदेचे सदस्य आणि तिच्या समित्यांचे हक्क आणि विशेषाधिकार वेळोवेळी निश्चित करण्याचे अधिकार संसदेला दिले.


18) अखिल भारतीय न्यायिक सेवेच्या निर्मितीसाठी तरतूद


19) चौकशीनंतर दुसऱ्या टप्प्यावर आपली बाजू मांडण्याचा सनदी सेवकांचा हक्क काढून घेत शिस्तभंगाच्या कारवाईची कार्यपध्द्त संक्षिप्त केली.


प्रश्न मंजुषा


🔴 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप भारताने आतापर्यंत किती वेळा जिंकला आहे? 


१) ३ वेळा

२) ४ वेळा ✔️✔️

३) २ वेळा

४) ५ वेळा

________________________________

🟤 घटना समितीला पुढीलपैकी कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता ?


१) अमेरिका 

२) ऑस्ट्रेलिया

३) चीन

४) ब्रिटेन  ✔️✔️

________________________________

⚫️ भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने  १ नोव्हेंबर १८५८ रोजी कोणत्या शहरात  राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला ?


१) मुंबई 

२) दिल्ली 

३) अलाहाबाद  ✔️✔️

४) कलकत्ता

________________________________

🔵 विधान परिषदेतुन मुख्यमंत्री निवडले जाणारे उद्धव ठाकरे हे कितीवे व्यक्ती ठरतील ?


१) ४ थे 

२) ५ वे 

३) ६ वे 

४) ७ वे ✔️✔️

________________________________

🟢 महाराष्ट्राची बीजमाता म्हणून कोणाला ओळखले जाते ?


१) रंजना सोनवणे 

२) प्रज्ञा पासून 

३) राहीबाई पोपरे ✔️✔️

४) स्मिता कोल्हे

________________________________

🟡 संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून दर्जा कधी प्राप्त झाला? 


१) २४ जानेवारी १९५०  ✔️✔️

२) २५ जानेवारी१९५०

३) १४ ऑगस्ट १९४७

४) १५ ऑगस्ट १९४७

________________________________

🟠 ९३ वे मराठी साहित्य संमेलन  १० ते १२ जाने २०२० उस्मानाबाद येथे पार पडली त्याचे अध्यक्ष कोण होते ?  


१) पुष्पा भावे

२) राम लक्ष्मण

३) फ्रान्सिस दिब्रिटो ✔️✔️

४) शरद पवार

________________________________

🔴 बुद्धचरित पुस्तकाचे लेखक कोण होते ? 


१) अश्वघोष 🚔

२) नागार्जुन 

३) वलुनिय

४) नागसेन


🟠 5 ते 7 डिसेंबर 1934 दरम्यान .....येथे भरलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत संविधान सभेची मागणी झाली.?  

  

      A) दिल्ली

      B) पाटणा ✅✅

      C) मुंबई

      D) मद्रास

________________________________

🟡....... रोजी संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केले?


     A) 15 ऑगस्ट 1947

     B) 22 जुलै 1947

     C) 24 जानेवारी 1950✅✅

     D) 25 डिसेंबर 1952

________________________________

🟢 संविधान सभेने घटना निर्मितीसाठी वेगवेगळ्या समित्या तयार केल्या त्यापैकी सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते ?


     A) जवाहरलाल नेहरू

     B) वल्लभाई पटेल 

    C) डॉ.के.एम. मुन्शी✅✅

    D) एच. सी .मुखर्जी

________________________________


🔵 आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे या तरतुदींचा स्त्रोत कोणत्या देशाची घटना आहे ?


     A) जपान

     B) जर्मनी ✅✅

     C) फ्रान्स

     D) दक्षिण आफ्रिका

________________________________


⚫️ घटना दुरुस्तीची पद्धत कलम......... मध्ये देण्यात आली.*


       A)368 ✅✅

      B)365

      C)360

      D)352

________________________________

⚪️ मतदानाचे किमान वय........ व्या घटना दुरुस्तीनुसार 21 होऊन 18 वर्षे असे कमी करण्यात आले.?


      A) 42 व्या

      B) 61 व्या ✅✅

      C) 86 व्या

      D) 92 व्या

________________________________


🟤 बलवंतराय मेहता समिती......  मध्ये भारत सरकारने बलवंतराय जी मेहता यांच्या अध्यक्षतेखाली  स्थापना केली.?


     A)1962

     B)1957✅✅

     C)1960

     D)1966

________________________________

🔴 ......... मध्ये आंध्र प्रदेशाचे विभाजन करून तेलंगण हे 29 वे राज्य निर्माण करण्यात आले.?


     A) 2 जून 2013

     B) 2 जून 2014 ✅✅

     C) 13 डिसेंबर 2016

     D)10 मार्च 2011

________________________________


🟠स्वातंत्र्याचा हक्क कलम .......ते.......मध्ये देण्यात आला.?


     A)14 ते 18

     B)19 ते 22✅✅

     C)25 ते 28

     D)23 व 24

________________________________


🔴 अमेरिकेच्या घटनेमध्ये किती कलमे आहेत?

     A)21

     B)15

     C)7 ✅✅

     D)14


🟣 देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ................... होय.


1) राज्य विधिमंडळ  

2) कार्यकारी मंडळ    

3) संसद ✔️✔️    

4) न्यायमंडळ


___________________________________

🔵 सनदी सेवकांना ........................ बनण्याची परवानगी नाही.


1) संसद सदस्य     ✔️✔️

2) मुख्य निर्वाचन आयुक्त    

3) विद्यापीठाचे कुलगुरू    

4) चौकशी आयोगाचे प्रमुख


___________________________________

🟡 घटनेच्या कलम 82 मधील सध्याच्या तरतूदीप्रमाणे, राज्या-राज्यांमध्ये लोकसभेच्या जागांचे समायोजन यापुढे कोणत्या वर्षानंतर होऊ शकते ?


1) 2016    

2) 2021      

3) 2026  ✔️✔️    

4) 2031


___________________________________

🟠 विधान अ : भारतात राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात.

 कारण ब : राज्यसभा लोकांपेक्षा राज्यांचे प्रतिनिधित्व करते.


1) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण आहे.

2) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत पण ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही✔️✔️.

3) अ हे बरोबर आहे, ब हे चूक आहे.

4) अ हे चूक आहे पण ब हे बरोबर आहे.


___________________________________

🔴 राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करतात ?


1) वाङमय, शास्त्र, कला आणि समाज सेवा ✔️✔️

2) शास्त्र, तंत्रज्ञान, कला आणि समाज सेवा

3) समाजशास्त्रे, संगीत, क्रीडा, कला

4) समाजशास्त्रे, नृत्य, संगीत, क्रीडा

द्रव्याच्या अवस्था आणि स्पष्टीकरण



🌸 विश्व द्रव्याचे :


🌸 वस्तुमान (m) –

प्रत्येक पदार्थ जागा व्यापतो, दोन वस्तु एकाच वेळी एकच जागा व्यापू शकत नाहीत.

एखाद्या वस्तूचे वस्तुमान त्या वस्तूमध्ये असणार्‍या द्रव्याचे प्रमाण दर्शवते.

वस्तुमान ही भौतिक राशी वस्तूतील द्रव्याचे प्रमाण दर्शविते.


🌸 आकारमान (v) –

भांड्यातील द्रव्याने व्यापलेल्या जागेला त्या द्रव्याचे आकारमान म्हणतात.


🌸 घनता –

घनता ही वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर आहे.

घनता=वस्तुमान (m)/आकारमान (v)


🌸 गणधर्म –

 द्रव्य जागा व्यापते.

द्रव्याला आकारमान व वस्तुमान असते.

 द्रव्य अनेक सूक्ष्म कणांनी बनलेले असते.


🌸 दरव्याच्या अवस्था –

स्थायुरूप

द्रवरूप

वायुरूप


1. स्थायू आवस्था :

स्थायू पदार्थ कठीण असतात, कारण त्यांचे रेणू एकमेकांच्या अगदी जवळ असतात.

जेवढे रेणू अधिक जवळ तेवढा पदार्थ अधिक कठीण.

स्थायू पदार्थांना स्वतःचा आकार व आकारमान असतो.

स्थायू पदार्थातील कण फारशे हलू शकत नाहीत हा स्थायुचा भौतिक गुणधर्म आहे.

स्थायू पदार्थातील कण हे बलामुळे एकमेकांशी बांधले गेलेले असतात त्यामुळे ते खूप मजबूत असतात.

उदा. रबर, लाकूड, हिरा इ.

2. द्रव अवस्था :

द्रव पदार्थांना निश्चित आकारमान असते.

द्रवपदार्थांना निश्चित आकार नसतो. ते ज्या भांड्यात असतील त्या भांड्याचा आकार ते धारण करतात.

द्रवपदार्थ सहजपणे दाबले जात नाही कारण त्यांचे कण एकमेकांच्या जवळ असतात.

द्रव्यात प्रवाहीतपणा हा गुणधर्म असतो.

उदा. दूध, पाणी, मध, रॉकेल इ.

3. वायु अवस्था :

वायु पदार्थातील अणू व रेणू हे एकमेकांच्या दूर असतात. व ते ऊर्जाभारित असतात.

वायु कोणत्याही आकार व आकारमानाच्या भांड्यात भरता येतात.

उदा. हवा, गॅस इ.


🌸 अवस्थांतर :

स्थयुला उष्णता दिल्यास द्रवत रूपांतर होते त्या तापमानाला त्या स्थायू पदार्थाचा ‘द्र्वनांक’ असे म्हणतात.

द्रवला उष्णता दिल्यास वायुत रूपांतर होते.

वायुला  उष्णता दिल्यास त्याचे प्लाझ्मा मध्ये रूपांतर होते.


🌺🌺 दरव्याचे प्रकार 🌺🌺

1. द्रव्य :

द्रव्य तीन रूपात असतात.

1. स्थायू
2. द्रव
3. वायु


🌸 चल वस्तु

2. मूलद्रव्य :

मूलद्रव्याचे प्रत्येक कण एकसारख्याच पदार्थाने बनलेले असतात.

त्याचा प्रत्येक अविभाज्य कणांचे गुणधर्म सारखेच असतात.

कोणत्याही भौतिक किंवा रासायनिक पद्धतीने मूलद्रव्याच्या कणांचे विभाजन करता येत नाही.

सज्ञेचा वापर करून मूलद्रव्य दर्शविता येतात.

एकूण 119 मूलद्रव्य ज्ञात आहेत,त्यापैकी 92निसर्गात आढळतात.


🌸 मलद्रव्याचे वर्गीकरण –

1. धातू
2. अधातू
3. धातुसदृश

1.धातू – धातू हे काठीण्य, वर्धंनियता, तन्यता, चकाकी आणि उष्णता व वीज सुवाहकता ही धातूची वैशिष्ट आहेत. सर्वसाधारण धातू हे स्थायुरूप असतात.

2. अधातू – अधातू हे न चकाकणारे, ठिसुल, उष्णता आणि विजेचे दुर्वाहक असतात.

3. धातुसदृश – काही गुणधर्म धातूंप्रमाणे तर काही गुणधर्म अधातूप्रमाणे असतात.अर्सेनिक, सिलिकॉन, सेलनियम ही धातूसदृश आहेत,

3. संयुगे :

दोन किंवा अधिक मूलद्रव्याच्या वजनी प्रमाणात आणि रासायनिक संयोगाने बनलेल्या पदार्थ म्हणजे संयुगे होय.

व त्या रासायनिक प्रक्रियेत सध्या होणार्‍या घटकांत विभाजन करता येते.

रेणूसूत्राच्या सहाय्याने संयुगे दर्शविता येतात.

पाणी हे संयुग आहे.

4. मिश्रणे :

दोन किंवा अधिक पदार्थ एकमेकांत कोणत्याही प्रमाणात मिसळणे त्याला मिश्रण म्हणतात.

मिश्रणात मूल घटकांचे गुणधर्म कायम राहतात.

मिश्रणातील मूळ घटक साध्या पद्धतीने वेगळे करता येतात.

मिश्रणातील घटक ठराविक प्रमाणात नसतात.

उदा. हाताने उचलणे, लोहचुंबक फिरवणे इ.

दोन किंवा अधिक धातू किंवा धातू आणि अधातू यांच्या मिश्रणाने संमिश्र तयार होतात.

हवा हे एक मिश्रण आहे.


🌸 मिश्रणाचे प्रकार –

1.समांगी मिश्रण
2. विषमांगी मिश्रण


समांगी मिश्रणातील घटक संपूर्ण मिश्रणात एकसारखे मिसळतात.

समांगी मिश्रणाचे गुणधर्म आणि संघटन संपूर्ण मिश्रणात समान असतात.

पोटॅशिअम परमॅँगनेटचे द्रावण हे समांगी मिश्रण आहे.

द्रावण – दोन किंवा अधिक पदार्थाच्या मिश्रणास द्रावण म्हणतात.

उदा. सोडा वॉटर.

स्थायूची द्रावणे (संमिश्रे) व वायूंची द्रावणे (हवा)

द्रावनातील कण अतिशय लहान असतात. ते त्यातून जाणार्‍या प्रकाश शलाकेला विखातू देत नाही.

द्रव्य विरघळतो त्यास द्रावण म्हणतात.

 विषमांगी मिश्रणातील घटक संपूर्ण मिश्रणात एकसारखे मिसळलेले नसतात.

विषमांगी मिश्रणाचे गुणधर्म आणि संघटन संपूर्ण मिश्रणात एकसारखे नसतात.

पाणी आणि तेलाचे मिश्रण विषमांगी आहे.

निलंबन – हे विषमांगी मिश्रण आहे ज्यात द्राव्याचे कण न विरघळता निलंबित राहतात हे कण आपण नुसत्या डोळ्यांनी पाहू शकतो.

कलिल – कण द्रावणात एकसारखे मिसळलेले असतात. कलिल कण हे निलंबन कणांपेक्षाही आकाराने लहान असतात.

हे समांगी द्रवनाप्रमाणे दिसते पण हे विषमांगी द्रावण आहे.

 कलिल घटक अपस्करीत प्रावस्था व अपस्कारीत माध्यमात असतात.

कान

श्रवणाच्या इंद्रियाला कान असे म्हणतात. शरीराचा समतोल राखणे हेही अंतर्कर्णाचे कार्य आहे.

याचे बाह्य, मध्य व अंतर्कर्ण असे तीन भाग सस्तन प्राण्यांत स्पष्ट दिसतात. सरीसृप (सरपटणारे प्राणी), उभयचर (जमिनीवर व पाण्यात वावरणारे) व पक्षी यांत मध्य व अंतर्कर्ण असे दोनच भाग दिसतात.

 तर जलचरांत फक्त अंतर्कर्णच अस्तित्वात असतो. या लेखात प्रथमत: मानवी कानासंबंधी व त्यानंतर अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांच्या आणि मनुष्येतर पृष्ठवंशी प्राण्यांच्या कानांसंबंधी माहिती दिली आहे.

हवेतून आलेल्या ध्वनिलहरी एकत्रित करून बाह्यकर्ण कर्णपटलावर (कानाच्या पडद्यावर) पोहोचवितो. कर्णपटलाचे हे कंपन मध्यकर्णातील अस्थींच्या साखळीने व थोडेफार हवेतून अंतर्कर्णात पोहोचते.

 सर्पिल कुहरात (अंतर्कर्णातील हाडांनी बनलेल्या नलिकाकार पोकळीत) व श्रोतृ कुहरात (सर्पिल कुहराच्या मध्य भागातील लंबवर्तुळाकार पोकळीत) काही जागी संवेदन ग्राहके (संवेदना ग्रहण करणारी मज्जातंतूची टोके ) असतात.

 त्यांच्यामार्फत अंगस्थिती (तोल सांभाळण्याच्या दृष्टीने असणारी शरीराची अवस्था) व ध्वनिलहरींमुळे झालेला द्रवदाबातील फरक आपण ओळखू शकतो [→ संस्थिती रक्षण]. पृष्ठवंशी प्राण्यांत समतोलपणाचे ज्ञान श्रवणज्ञानापेक्षा पुरातन आहे.

श्रवणाकरिता वापरला जाणारा अंतर्कर्णाचा भाग सस्तन प्राण्यांत जास्त स्पष्ट वाढलेला दिसतो.


🌺बाह्यकर्ण🌺

♦️कर्णपाली (कानाची पाळी) व बाह्यकर्णमार्ग मिळून बाह्यकर्ण बनतो. बाह्यकर्णमार्गाच्या आतल्या टोकाला कर्णपटल असते.

♦️कर्णपाली उपास्थीची (मजबूत व लवचिक पेशीसमूहाची कूर्चेची) बनलेली असून तिच्यावर त्वचेचे आवरण असते. कर्णमार्गाचा बाहेरचा भाग उपास्थीचा व आतील अस्थीचा असतो.

♦️तयावर बहुस्तरीय पट्टकीय (एकावर एक थर असलेल्या घट्ट चपट्या) स्तरांचे आवरण अगदी ताणून बसलेले असते. यामुळे त्यावर बारीकसा फोड झाला तरी सुद्धा फार वेदना होतात.

♦️या अधिस्तरांत (चपट्या कोशिकांच्या दृढ स्तरांत) लोम (केस) व सूक्ष्म ग्रंथी असतात. त्या ग्रंथी चिकट लालसर स्त्राव निर्माण करतात. घट्ट झालेल्या स्त्रावास कानातील मळ म्हणतात.

♦️मार्गाची लांबी सु. २४ मिमी. असून तो नागमोडी असतो.

कर्णदर्शिकेतून (कानाच्या आतील भागाच्या तपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या नळीतून) बाह्यकर्णमार्गात पाहिल्यास मोतिया रंगाचे कर्णपटल दिसते.

♦️त हाडाच्या खोबणीमध्ये ताणून व तिरकस बसलेले असते. याचा वरील भाग कमी ताणलेला असतो. कर्णपटल कोलॅजन (एक प्रकारच्या प्रथिनाच्या) तंतूंचे बनलेले असून त्याच्या बाह्यांगावर पट्टकीय अधिस्तर व आतल्या अंगास श्लेष्मकलेचा (बुळबुळीत अस्तराचा) स्तर असतो. याचे क्षेत्रफळ ५५ चौ. मिमी. असते.

♦️ धवनिलहरीने हा कंप पावतो आणि आतील बाजूस पडद्याला टेकलेल्या अस्थिकांच्या (लहान हाडांच्या) साखळीत कंप निर्माण करतो.

♦️मध्य कर्णातील पुष्कळसे विकार या पटलाच्या तपासणीने समजतात.



🌺मध्यकर्ण🌺

💥कर्णपटलाच्या आतील बाजूस व अंतर्कर्णाच्या बाहेर शंखास्थीच्या (कवटीच्या बाजूच्या दोन्हींकडील कमानीसारख्या भागातील हाडाच्या) लहानशा पण पोकळ वेड्यावाकड्या भागास मध्यकर्ण म्हणतात.

💥मध्यकर्णाची रचना समजण्यासाठी प्रथम तो निर्माण का झाला हे पाहणे आवश्यक आहे. सरीसृप, पक्षी व सस्तन प्राण्यांत तो आढळतो, पण जलचर प्राण्यांत आढळत नाही.

💥अतर्कर्णात संवेदन ग्राहक द्रव माध्यमात असतात. ध्वनिलहरीने द्रव माध्यमात तरंग उत्पन्न झाल्यासच ते ग्राहक चेतवले जातात व ऐकू येते.

💥धवनिलहरी उत्पन्न करण्यास द्रवामध्ये हवेपेक्षा जास्त ऊर्जा खर्च करावी लागते कारण द्रवाची घनता हवेपेक्षा जास्त आहे

💥. जलचर प्राण्यात पाण्यातून असलेल्या तरंगाच्या उर्जेमुळे अंतर्कर्णातील द्रव सहज कंप पावू शकतो; पण भूचर प्राण्यांत ध्वनिलहरी हवेतून येतात व त्यांना द्रवात कंप निर्माण करावयाचा असतो. त्यामुळे ते तरंग अंतर्कर्णापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांच्यातील उर्जेचा साठी वाढविला पाहिजे.

💥 तो मध्यकर्णातील अस्थिकांमार्फत होतो म्हणून मध्यकर्णाची आवश्यकता आहे. त्यात बिघाड होताच कमी ऐकू येते.


🍀अतर्कर्ण🍀

🌸शखास्थीच्या घन विभागात अंतर्कर्ण असतो. त्याची रचना अत्यंत गुंतागुंतीची आहे. त्याचे प्रमुख दोन भाग आहेत



🌸(१) अस्थिमय सर्पिल कुहर व (२) कलामय (पातळ पटलाचे बनलेले) सर्पिल कुहर.

कलामय सर्पिल कुहराभोवती अस्थिमय सर्पिल कुहराचे आवरण असते. या दोन्ही कुहरांच्यामध्ये असणाऱ्या द्रवाला परिलसीका आणि कलामय कुहरात असलेल्या द्रवाला अंतर्लसीका म्हणतात.

🌸 अस्थिमय कुहराच्या आतील भागावर पर्यास्थी कलेचे (एक प्रकारच्या संयोजी ऊतकाचे म्हणजे समान रचना व कार्य असलेल्या पेशीसमुहाचे) आवरण असते. तेथून बारीक तंतू निघून ते कलामय कुहराला जखडून ठेवतात.

🌸अस्थिमय कुहराला असलेल्या चाळणी- सारख्या छिद्रांतून मेंदूपासून निघणाऱ्या आठव्या तंत्रिकेचे दोन भाग आत येतात.

🌸अस्थिमय सर्पिल कुहराचे तीन भाग आहेत. (१) श्रोतृ कुहर, (२) कर्णशंकू (किंवा कर्णशंबूक, अस्थिमय कुहरातील शंक्वाकार नाल) आणि (३) अर्धवर्तुलाकृती नलिका.


🌺गोणिका व लघुकोश🌺

🍃एका रेषेत होणारे गतिवर्धन व डोक्याची पुढे, मागे किंवा बाजूस झालेली हालचाल गोणिका व लघुकोश यांतील संवेदन ग्राहकांमार्फत समजते.

🍃यथील संवेदन ग्राहक श्रवण तंत्रिका शाखेच्या टोकाशी असतो. या ग्राहकाची मूळ रचना इतर अंतर्कर्ण ग्राहकासारखीच असते.

🍃 यथे जिलेटीनसदृश पदार्थात रेतीसारखे बारीक स्फटिकरूपी कण असतात.त्यांना



कर्णवालुका म्हणतात. त्यामुळेच या संवेदन ग्राहकांस कर्णवालुकाग्राहक असे नाव आहे. जसजशी प्राण्यांच्या डोक्याची स्थिती किंवा वेग बदलतो तसतशा कर्णवालुका गुरूत्वाकर्षणाने ओढल्या जातात, लोमावरील ताण कमीजास्त होतो व हा ताणातील फरक ज्ञात होतो आणि त्यावरून डोक्याची स्थिती समजते. यामुळे येथील संवेदन ग्राहकास गुरूत्वाकर्षण संवेदन ग्राहक म्हणतात.

कर्णशंकू (कर्णशंबूक) : हा भाग श्रावणाशी संबंधित आहे. हा पावणे तीन वेटोळ्यांचा असतो.

🍃अस्थिमय शंकूंच्या वेटोळ्यात कलामय शंकूची वेटोळी असतात. शंकूच्या मधल्या शंक्वाकार कण्यास मध्यनाभी म्हणतात. मध्यनाभीपासून निघणारे नाजूक सर्पिल पत्र (पातळशी पट्टी) सर्व वेटोळ्यांतून जाते.

🍃ह पत्र अर्धवट रूंदीचे असून ते शंकुभित्तीपर्यंत पोहोचत नाही. हे मधले अंतर आधारकलेने जाडलेले असते. आधार कला तळाच्या वेटोळ्यांत कमी रूंदीची असते व जसजशी ती शंकूच्या टोकाकडे येते तसतशी ती जास्त रूंद होते. अशा प्रकारे शंकूच्या वेटोळ्याचे दोन भाग पडतात. वरच्या भागाचे `राइसनर' कलेने (राइसनर नावाच्या शास्त्रज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्‍या कलेने) परत दोन भाग होतात. अशा प्रकारे वेटोळ्यात तीन भाग पडतात.

🍃 वरच्या भागास प्रकोष्ठ सोपान, मधल्यास मध्य सोपान व खालच्या भागास कर्णपटल सोपान म्हणतात. पहिला व तिसरा भाग शंकूच्या टोकात असलेल्या बारीक सर्पिल छिद्राने एकमेकांस मिळतात.

🍃याला संधी सोपान म्हणतात. या दोन सोपानांत परिलसीका असते, तर मध्य सोपानात अंर्तलसीका असते



💥💥डसिबेल 💥💥


dB) हे आवाजाची पातळी मोजण्याचे एक एकक आहे. ही पातळी ज्या ठिकाणी आवाज निर्माण होतो त्या ठिकाणी मोजली जाते.
तेथून जसजसे दूर जाऊ तसतशी डेसिबेलची मात्रा कमीकमी होत जाते. हे लॉगरिथमिक स्केल असल्याने dBचे माप १०ने वाढले तर आवाजाची तीव्रता शंभरपट होते.

शून्य dB म्हणजे ऐकू येणारा सर्वात हळू आवाज. त्याच्या दहापट मोठ्या आवाजाची मात्रा १० dB. २० dB आवाज म्हणजे सर्वात हळू आवाजाच्या १००पट मोठा आवाज; ३० dB म्हणजे हजारपट मोठा आवाज, वगै


🌺आवाजाच्या काही स्रोतांचे डेसिबेल मापन🌺

ऐकू येणारा सर्वात हळू आवाज (जवळजवळ पूर्ण शांतता) - शून्य dB

कुजबूज - १५ dB

सामान्य संभाषण - ३० dB

वाहनाचा किंवा यंत्राचा आवाज - ५० ते ६० dB

कारखान्याचा आवाज - ८० ते १०० dB

डॉल्बीचा

⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️

राज्यसेवा, PSI-STI-ASO मुख्य परीक्षा प्रश्नसंच


1) कलम 3 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अप्रस्तुत ठरते ?

   अ) कलम 3 नुसार संसद एक राज्यातून भूप्रदेश अलग करून नवे राज्य निर्माण करू शकते.

   ब) संसद राज्यांच्या सीमा व नाव बदलू शकते.

   क) नवीन राज्य निर्माण करण्याबाबतचे विधेयक केवळ राष्ट्रपतींच्या पूर्वशिफारशीनेच संसदेत सादर करता येते.

   ड) अशा प्रकारच्या विधेयकासंदर्भात राज्य विधीमंडळाचा सल्ला स्वीकारणे बंधनकारक आहे.

        वरीलपैकी कोणता / ते पर्याय चूकीचा / चे आहे / आहेत ?

   1) अ   

   2) ब   

   3) क    

  4) ड


उत्तर :- 4


2) भारतात राज्य निर्मितीच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतुदी घटनेत अंतर्भुत नाहीत ?

   अ) दोन किंवा अधिक राज्ये एकत्रित करून नव्या राज्याची निर्मिती करता येते.

   ब) कोणत्याही राज्याचे नाव अथवा सीमा बदलण्याकरीता संबंधीत राज्य विधी मंडळाची स्पष्ट सहमती आवश्यक असते.

   क) कोणतेही राज्य, केंद्रशासित प्रदेश म्हणून रुपांतरीत करता येईल.

   ड) संबंधीत राज्य शासनाचे मत मागवून केंद्र शासन, नवीन राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करू शकते.


1) क, ड  

2) ब, क, ड    

3) अ, ड    

4) ब, ड


उत्तर :- 2


3) ‘नागपूर करार’ बाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?

   1) विधिमंडळाचे किमान एक अधिवेशन नागपूर येथे घ्यावे.

   2) मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर येथे असावे.

   3) सरकारी नोक-यात लोकसंख्येच्या प्रमाणात भरती करावी.

   4) मराठवाडयातील काँग्रेस नेत्यांचा ‘नागपूर करारास’ विरोध होता.


उत्तर :- 4


4) राज्यांची पुनर्रचना किंवा संघ – राज्य संबंधाबाबत कोणती समिती आणि आयोग संबंधित आहे  ?

अ) जे.व्हि.पी. समिती      

ब) दार आयोग    

क) राज गोपालाचारी समिती   

ड) सरकारिया आयोग


1) फक्त अ, ब, क   

2) फक्त अ, ब, ड    

3) फक्त अ, क, ड    

4) फक्त ब, क, ड


उत्तर :- 2


5) व्दैभाषिक मुंबई राज्याची निर्मिती .............. या दिवशी झाली.

 1) 1 मे 1960     

 2) 1 नोव्हेंबर 1956   

 3) 1 मे 1966   

 4) 1 जून 1975 


उत्तर :- 2



2006) सध्या भारतीय संघराज्यात किती घटकराज्ये व केंद्रशासित प्रदेश आहेत ?

1) 28 व 7 

2) 26 व 9    

3) 27 व 8 

4) 29 व 6


उत्तर :- 1


7) 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या ‘भाषावार प्रांतरचना आयोगाचे’ अध्यक्ष कोण होते ?

1) न्या. एस.के. दार 

2) एस.के. पाटील    

3) ब्रिजलाल बियाणी 

 4) काकासाहेब गाडगीळ


उत्तर :- 1


8) कोणत्याही संघराज्य क्षेत्राचे क्षेत्र वाढविण्याबाबतचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येत जर त्यास  ?

   1) राष्ट्रपतींनी शिफारस केलेली असली व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायासह

   2) राष्ट्रपतींनी शिफारस केलेली असली व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायाशिवाय

   3) राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय परंतु संबंधित संघराज्य क्षेत्राच्या अभिप्रायासह

   4) राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायाशिवाय


उत्तर :- 2


9) घटक राज्यांची पुनर्रचना किंवा त्यांच्या सीमा बदलण्याबाबतच्या खालील विधानांपैकी कोणते विधान चूक आहे ?

   1) संसदेला तो अधिकार दिला आहे.

   2) संसद साध्याबहुमताने तसा कायदा करू शकते.

   3) विधेयकाची शिफारस करण्यापूर्वी राष्ट्रपतींनी संबंधित विधीमंडळांची मते ‘आजमावली’ आहेत.

   4) सीमा बदलण्यासाठी संबंधित घटकराज्यांची संमती आवश्यक आहे.


उत्तर :- 4




१) राष्ट्रीय विकास मंडळाने भारत सरकारने धान्य व्यापारात पदार्पण करावे अशी शिफारस कधी केली ?

 1) 1951

 2) 1958     

 3) 1977     

 4) 1985

उत्तर :- 2


२) महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद ............................ रोजी अस्तित्वात आली असून पुणे येथे मुख्यालय आहे.

   1) 1974 

   2) 1984 

     3) 1994  

    4) 1986


उत्तर :- 2


३) आधुनिक काळात प्रमंडळ शेती पध्दती कोणत्या देशात दिसून येते ?

1) रशिया  

2) चीन      

3) अमेरिका

4) इस्त्रायल

उत्तर :- 3


४) भारतीय शेती संशोधन मंडळ खालील विषयांसाठी उपक्रम आयोजित करते.

 अ) फलोत्पादन   

 ब) शेती वित्त   

 क) शेती बाजारपेठा 

 ड) पशु विज्ञान

   वरीलपैकी कोणता / ते पर्याय योग्य आहे / त ?


1) अ व ब  

2) ब व क    

3) क व ड   

4) अ व ड


उत्तर :- 4


५) योग्य पर्याय निवडा :

     भारतातील पीक पध्दतीवर परिणाम करणारे घटक :

 अ) पिकांची फेररचना 

 ब) किंमती व उत्पन्न महत्तम करणे    

क) शेतीचा आकार

 ड) जोखीम स्वीकारणारा विमा

  इ) आदानाची उपलब्धता   

 फ) भूधारणा पध्दती


   1) अ, ब व क 

   2) ड व इ    

  3) वरील सर्व चूक  

  4) वरील सर्व बरोबर


उत्तर :- 4


६) खालील विधाने विचारात घ्या :

   अ) 1985 मध्ये भारत सरकारने सर्व समावेशक पीक विमा योजना सुरू केली.

   ब) 1999 मध्ये खरीप पिकांसाठी राष्ट्रीय कृषी पिक विमा योजना सुरू केली.

         वरीलपैकी कोणते / ती विधान / ने योग्य आहे / त ?

   1) फक्त ब

    2) अ व ब  

  3) फक्त अ  

  4) यापैकी नाही


उत्तर :- 3


७) खालील विधाने विचारात घ्या :

   अ) राष्ट्रीय कृषी विकास योजना सन 2007 – 2008 मध्ये सुरू करण्यात आली.

   ब) किसान क्रेडिट कार्ड योजनेची अंमलबजावणी ऑगस्ट, 1998 पासून करण्यात येत आहे.

   क) राष्ट्रीय कृषी विमा योजना भारतातील 16 राज्यात अंमलात आणली.

  वरीलपैकी कोणते / ती विधान / ने योग्य आहे / त ?


1) फक्त अ  

2) फक्त क    

3) अ व ब   

4) सर्व बरोबर


उत्तर :- 3


८) केंद्रशासन पुरस्कृत ‘गुणवत्ताधारक व शुध्द दूध उत्पादनासाठी सशक्त पायाभूत सुविधा योजना” ऑक्टोबर 2003 मध्ये कार्यान्वीत  झाली. या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे / आहेत ?

   अ) देशातील जिल्हा पातळीवरील आजारी दुग्ध सहकारी संघांचे पुनरुज्जीवन करणे.

   ब) देशातील ग्रामपातळीवरील कच्चा दुग्ध उत्पादनाच्या गुणवत्तेत सुधारणा घडवून आणणे.


1) केवळ अ  

2) केवळ ब    

3) दोन्ही     

4) एकही नाही


उत्तर :- 2


९) भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या क्रांतीमुळे अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्णता तसेच जादा उत्पादन झाले ?

  1)पीत क्रांती

  2) श्वेत क्रांती  

  3) हरित क्रांती  

  4) नील क्रांती


उत्तर :- 3


१०) सिंचनाला खालील  योजनेत सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले ?

1) प्रथम पंचवार्षिक योजना  

2) व्दितीय पंचवार्षिक योजना

3) तृतीय पंचवार्षिक योजना   

4) वरील सर्व पर्याय


उत्तर :- 1



१) खालीलपैकी कोणते / कोणती विधान / ने बरोबर आहे / आहेत ?

   अ) अनिवासी भारतीय नागरिक निवडणुकीत मतदानाला पात्र असतील.

   ब) अशी व्यक्ती भारतातील कोणत्याही मतदारसंघात नाव नोंदवू शकतो.

   क) मतदार म्हणून नाव नोंदवण्याकरता अशा व्यक्तीने अशा व्यक्तीने भारतीय दूतावासात अर्ज केला पाहिजे.

 1) सर्व विधाने   

 2) कोणतेही नाही 

 3) फक्त अ  

 4) अ आणि ब


उत्तर :- 3



२) भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधातील खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ?

   1) फसवणूक करून, खोटी माहिती दर्शवून किंवा वस्तुस्थिती लपवून नागरिकत्व मिळवले असेल.

   2) कृतीतून वा भाषणातून राज्य घटनेशी बेइमानी किंवा द्रोह केला असेल.

   3) भारताशी शत्रुत्व किंवा युध्द करणा-या राष्ट्राला मदत केली असेल.

   4) भारताबाहेर सलग पाच वर्षे वास्तव्य केल्यास


उत्तर :- 4


३) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

   अ) एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर परंतु 1 जुलै 1987 पूर्वी झालेला असेल तर ती  व्यक्ती भारतीय नागरिक असते.

   ब) एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात 1 जुलै 1987 रोजी किंवा त्यानंतर झाला असेल आणि जर तिच्या जन्माच्या वेळी तिच्या  आईवडिलांपैकी कोणीही एक भारताचे नागरिक असतील तर ती व्यक्ती भारतीय नागरिक असेल.

   क) जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या भारतीय नागरिकत्वाचा त्याग करते तेव्हा त्या व्यक्तीच्या प्रत्येक अज्ञान मूलाचे भारतीय    नागरिकत्व देखील संपुष्टात येते.


   1) अ   

   2) ब   

   3) क   

   4) वरीलपैकी एकही नाही


उत्तर :- 4


४) भारतीय नागरिकांच्या ............ अधिकारांचा समावेश घटनेच्या विभाग 3 कलम 14 ते 18 मध्ये केला आहे.

   1) समतेचा   

   2) स्वातंत्र्याचा 

   3) धर्माचा   

   4) चौथ्या


उत्तर :- 1


५) 44 व्या घटनादुरुस्तीने मूलभूत अधिकारांच्या यादीतून कोणता  काढून टाकण्यात आला ?

   1) समानतेचा अधिकार   

   2) संपत्तीचा अधिकार

   3) स्वातंत्र्याचा अधिकार   

   4) शैक्षणीक अधिकार


उत्तर :- 2


६) खालीलपैकी कोणत्या तरतूदीव्दारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते ?

   1) अनुच्छेद 32 

   2) अनुच्छेद 25 

   3) अनुच्छेद 14 

   4) अनुच्छेद 30


उत्तर :- 1


७) खालीलपैकी कोणते विधान चूक   आहे ?

   1) अनुच्छेद 29 च्या शिर्षकात अल्पसंख्याक शब्द आहे.

   2) अनुच्छेद 29 च्या बहुसंख्यासाठीही लागू आहेत.

   3) अल्पसंख्याकाचा निकष धर्म आणि भाषा आहे.

   4) सर्व विधाने खरी आहेत.


उत्तर :- 4


८) खालीलपैकी कोणता हक्क “सविधांनिक” आहे परंतु मूलभूत हक्क नाही ?

   1) अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क

   2) मालमत्तेविषयक हक्क

   3) संपूर्ण भारतात मुक्त संचार करण्याचा हक्क

   4) धर्म स्वातंत्र्याचा हक्क


उत्तर :- २


९) भारतीय राज्यघटनेचे कलम 16 कशाशी संबंधित आहे ?

   1) राज्यकारभाराची मार्गदर्शक तत्वे व मूलभूत कर्तव्ये

   2) मूलभूत कर्तव्ये व अधिकार

   3) नववा परिशिष्ट व सातवा परिशिष्ट

   4) मूलभूत अधिकार


उत्तर :- 4


1०) भारतीय राज्य घटनेच्या कलम 12 नुसार “राज्य” या संज्ञेत खालीलपैकी कोणती संस्था / यंत्रणा अंतर्भूत होत नाही ?

1) विधानसभा   

2) विधान परिषद  

3) उच्च न्यायालय    

4) जिल्हा परिषद


उत्तर :- 3


१) भारतीय संविधानाच्या 19 (1) व्या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही ?

1) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य  

2) मुद्रण स्वातंत्र्य

3) बिनाशस्त्र व शांततेने  एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य  

4) भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य

उत्तर :- 2


२०३२) घटनेच्या 19 (1) (अ) व्या कलमामध्ये मान्य केलेल्या नागरिकांच्या खालील कारणांमुळे वाजवी बंधने येऊ शकतात.

   अ) देशाचे सार्वभौमत्व   

   ब) देशाची एकता    

   क) प्रांताची सुरक्षितता 

   ड) सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी


  1) अ, क   

  2) ब, ड 

  3) अ, ब    

  4) ड

उत्तर :- 3


२०३३) खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मुलभूत हक्कात नाही  ?

   1) समतेचा हक्क      

   2) स्वातंत्र्याचा हक्क  

   3) धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क    

   4) मालमत्तेचा हक्क

 

उत्तर :- 4


४) सहा ते 14 वर्षे वय गटातील मुलांना मोफत व अनिवार्य शिक्षणाचा अधिकार संविधानांत संशोधन करून भाग III मध्ये एक अनुच्छेद समाविष्ट करुन प्रदान केला आहे. कितवे संशोधन व कोणता अनुच्छेद ? एक जोडी निवडा.  

    1) 86 वे संशोधन – अनुच्छेद 19 (फ)     2) 93 वे संशोधन – अनुच्छेद 21 (अ)

   3) 86 वे संशोधन – अनुच्छेद 21 (अ)    4) 93 वे संशोधन – अनुच्छेद 19 (फ


उत्तर :- 3


५) ‘बंदीप्रत्यक्षीकरण’ आज्ञेबाबतच्या विधानांचा विचार करा:

   अ) मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी अशी आज्ञा काढली जाते.

   ब) अशी आज्ञा काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांना दिला आहे.

   क) व्यक्तीला न्यायालयापुढे हजर करुन बंदी करण्याचा कारणाचे समर्थन करण्याची आज्ञा न्यायालय बंदी करणा-या  अधिका-याला देऊ शकते.

   ड) न्यायालयाने फौजदारी गुन्ह्याबद्दल तुरुंगवास दिलेल्या व्यक्तीची सुटका मिळविण्यासाठी देखील अशी आज्ञा काढता येते.


         वरील ‍विधानांपैकी कोणते बरोबर आहे / आहेत ?

   1) केवळ अ   

  2) केवळ ब आणि क   

  3) केवळ अ आणि क   

  4) केवळ अ, ब आणि क


उत्तर :- 4 


२१४१) नॅशनल इन्स्टीटयूट ऑफ न्युट्रीशन या संस्थेच्या शिफारशी नुसार भारतामधील दरडोई प्रति वर्ष अंडी आणि पोल्ट्री मांसाचा उपभोग किती असला पाहिजे  ?

1) 180 अंडी आणि 11 किलो पोल्ट्री मांस  

2) 90 अंडी आणि 10 किलो पोल्ट्री मांस

3) 365 अंडी आणि 12 किलो पोल्ट्री मांस    

4) 180 अंडी आणि 12 किलो  मांस


उत्तर :- 1


२) मध्यान्ह भोजन कार्यक्रमाअंतर्गत प्राथमिक स्तरावर शिजवलेल्या अन्नाव्दारे किती प्रमाणात उष्मांक व प्रथिने पुरविण्यात येतात ?

   1) 350 कॅलरी व 12 ग्रॅम प्रथिन  

   2) 450 कॅलरी व 12 ग्रॅम प्रथिन

   3) 700 कॅलरी व 20 ग्रॅम प्रथिन   

   4) 450 कॅलरी व 20 ग्रॅम प्रथिन


उत्तर :- 2


३) HDI आणि GDI मुल्यांच्या बाबतीत, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे  ?

   1) HDI आणि GDI च्या मूल्यांमध्ये जेवढा जास्त फरक असेल तेवढी जास्त लैंगिक विषमता असणार

   2) HDI आणि GDI च्या मूल्यांमधील फरक आणि लैंगिक विषमता असणार

   3) HDI आणि GDI च्या मूल्यांची तुलना होऊ शकत नाही.

   4) वरीलपैकी कोणतेही नाही


उत्तर :- 1


४) संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (यू.एन.ओ) “सहस्त्रकातील विकासाचे उद्दिष्ट” या अंतर्गत कोणत्या वर्षापर्यंत भूकेचा प्रभाव निम्म्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

   1) वर्ष 2050   

   2) वर्ष 2030  

   3) वर्ष 2020   

   4) वर्ष 2015

 

उत्तर :- 4


५) UNDP च्या 2013 च्या अहवालात प्रसिध्द झालेल्या मानव विकास निर्देशांकानुसार पुढील देशांची उतरत्या क्रमाने मांडणी करा.

   अ) दक्षिण कोरिया

   ब) जपान   

   क) अमेरिका  

   ड) नॉर्वे


1) अ, ब, क, ड   

2) क, ड, ब, अ    

3) ब, अ, क, ड    

4) ड, क, ब, अ

 

उत्तर :- 4 


🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

रक्ताभिसरण संस्था

           
"हृदयाद्वारे शरीराच्या विविध अवयवांकडे रक्त पोहोचवण्याच्या आणि तेथून परत हृदयाकडे आणण्याच्या क्रियेस रक्ताभिसरण संस्था म्हणतात".

रक्ताभिसरण संस्था हृदय(Heart), रक्त(Blood), रक्तवाहिन्या(Blood Vessels) या पासून बनलेली आहे.

शोध : विल्यम हार्वे 1628  मध्ये
( फादर ऑफ अँजिओलॉजी, विल्यम हार्वे यांना सर्क्युलेटर असे म्हणतात)

शरीरातील महत्त्वाचा घटक हृदय.

       *प्रकार *
1)खुली रक्ताभिसरण संस्था .
2)बंद रक्ताभिसरण संस्था.
1) खुली रक्ताभिसरण संस्था:
रक्तवाहिन्या नसतात.
" मॉलुस्का" आणि "आर्थोपोडा" या गटातील सजीव  यात येतात. शुद्ध व अशुद्ध रक्त एकमेकात मिसळते .
अपवाद ऑक्टोपस ऑक्टोपस व स्क्विड  हे प्राणी बंद रक्ताभिसरण संस्था याच्यामध्ये येतो.
2)बंद रक्ताभिसरण संस्था:
यात रक्तवाहिन्या असतात .
शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकमेकात मिसळत नाही.
या संस्थेत उभयचर ,पृष्ठवंशीय ,सरपटणारे प्राणी येतात.

             *मानवी रक्त*
मानवी शरीरात रक्तवाहिन्या ची लांबी 97000 किलोमीटर आहे.
रक्तवाहिन्या(Blood Vessels): 3 प्रकार
1)धमनी(Arteries):
हृदयाकडून  शरीरांच्या सर्व भागांना ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा .
अपवाद- हृदयाकडून फुप्फुसाकडून  ऑक्सिजन विरहीत रक्त वाहून नेणारी एक अपवादात्मक धमणी असते जिला फुप्फुसभिगा /फुप्फुस धमणी (Pulmonary Arteryअसे म्हणतात
शरीराच्या खोलवर भागात असतात .
धमन्यांमध्ये झडपा नसतात .
धमन्या कमी लवचिक असतात.
  रक्तदाब जास्त असतो धमणी मध्ये सुमारे  सरासरी रक्तदाब 100mmHg असतो.

2)शिरा(Veins):
  शरीराच्या सर्व कविवा कडून ऑक्सिजन विरहीत रक्त हृदयाकडे पोचवतात.
अपवाद- फुप्फुसाभिगा शिरा(Pulmonary Vein) पुरुषाकडून हृदयाकडे ऑक्सिजनयुक्त  रक्त वहन करते.
शिरा जास्त लवचिक/ स्थितिस्थापक असतात.
शिरांमध्ये झडपा असतात.
शिरांमधील रक्तदाब दमण यांच्या मानाने खूप कमी म्हणजे 2mmHg असतो.

3) केशवाहिन्या(Capillaries)
केशवाहिन्या एकत्र येऊन शिरा तयार होतात केशवाहिन्या च्या धमनीका आणि शिरा यांना जोडतात.
केशवाहिन्याचा शरीरातील पेशी प्रत्यक्ष संबंध असतो म्हणजे केशवाहिन्या आणि पेशी यांच्या दरम्यान सतत ऑक्सिजन, कार्बनडाय-ऑक्साइड ,पोषकद्रव्ये ,हार्मोनस ,टाकाऊ पदार्थ यांची देवाण-घेवाण चालू असते.

       *रक्तदाबनुसार *
शिरांमधील रक्तदाब कमी असतो .
केशवाहिनी मधील रक्तदाब हा शिरा पेक्षा जास्त असतो व धमनी पेक्षा कमी असतो.
धमणी मध्ये सर्वाधिक रक्तदाब असतो.

        *जाडीनुसार*
केशवाहिन्या ह्या कमी जाडीच्या व आतून पोकळी जास्त असते . शीरा ह्या केशवाहिनी पेक्षा जाड असतात व धमणी पेक्षा कमी जाड असतात .
धमनी सर्वात जास्त जाड असते व आतून पोकळी कमी असते.

         *रक्त(Blood)*
खारट चव.
दोन घटकांनी बनलेले आहे

 
1】रक्तद्रव(Plasma):
  रंग-फिकट पिवळा रंग किंवा रंगहीन
सर्व रक्तापैकी 55% रक्तद्रव यापैकी 90%पाणी+7%प्रथिने+3% असेंद्रिय घटक
【7%प्रथिने
1-ग्लोब्ल्यूलिन: प्रतिद्रव्य (ऍन्टीबॉडी) तयार करते, प्रतिकार शक्ती नियंत्रित करते.
2-अलब्यूमिन: शरीरातील पाण्याचे नियंत्रण ठेवते.
3-प्रोथॉम्बिंन: रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत.
4-फायब्रीनोजन: रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत.】


2】रक्तपेशी(Corpuscle):
तीन प्रकार


1]RBC(Red Blood Cell)/लाल/तांबड्या/लोहित पेशी:
केंद्रकविरहित( अपवाद- उंट)
संख्या: A) पुरुष 52 लाख/mm^3 of Blood
          B) स्त्री 47 लाख/mm^3 of Blood
           RBC:WBC=  7:1 प्रमाण
आकार: गोल द्विअंतर्वक
निर्मिती: अस्थीमज्जा(Bone marrow)
आयुष्य: 125 -127 दिवस.
नाश: यकृतात (liver)
कार्य: RBCs मध्ये हिमोग्लोबिन असते.
हिमोग्लोबिन हे ऑक्सिजन व कार्बन डायॉक्साईडचे अल्पप्रमाणात वहन करते.
हिमोग्लोबिन मुळे रक्ताला लाल रंग येतो.
त्वचेला deep cherry red रंग carboxy haemoglobin मुळे येतो.
संबंधित रोग: १) ॲनिमिया रोग हिमोग्लोबिन च्या कमतरतेमुळे.
                   २) थॅलॅसेमिया रोग.


2]WBC(White Blood Cell)/श्वेत/पांढऱ्या/सैनिकी पेशी:
केंद्रक असते.
संख्या: 9 ते 10 हजार/mm^3 of Blood
निर्मिती: अस्थीमज्जा(bone marrow)
आकार:आकारहीन /अमिबसदृश्य
आयुष्य: 15 दिवस.
नाश: यकृतामध्ये
कार्य: शरीराला रोगप्रतिकारशक्ती मिळवून देणे म्हणून त्यांना सैनिकी पेशी म्हणतात.
संसर्ग झाल्यावर यांची संख्या वाढते.
संबधित रोग: १)रक्ताचा कॅन्सर (Leucamia) WBC वाढल्यावर
                २)एड्स -HIV T4 Lymphocytes वर हल्ला करतो.


3) रक्तबिंबिका /रक्तपट्टीका (platelets):
द्विबहिर्वक्र आकार .
रंगहीन
या फक्त सस्तन प्राण्यांमध्ये आढळतात.
केंद्र नसते .
अतिशय लहान असतात.
संख्या:2.5 ते 4 लाख/mm^3 of Blood
निर्मिती:अस्थीमज्जा(bone marrow)
कार्य: रक्त गोठण्याची क्रिया सुरू होण्यासाठी.
(डेंगू मलेरिया टाइफाइड इत्यादी रोगांमध्ये रक्तपट्टीकांचे प्रमाण कमी होते.)

अन्नपचन प्रक्रिया


🔶सजीवाने अन्न ग्रहन केल्यापासून ते उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकण्याच्या अवस्थेपर्यंत अन्नावर घडणार्‍या संपूर्ण प्रक्रियेला अन्नाची पचन क्रिया असे म्हणतात.

🔶अन्न पचण्याची प्रक्रिया चालू असतांना त्या अन्नात या अवयवांकडून अनेक स्त्राव सोडले जातात.

🔶या स्त्रावामध्ये विकरे, आम्ल, उत्प्रेरक, यांचा समावेश होते.

🔶या स्त्रावामुळे अन्नातील जटिल घटकांचे सुलभ घटकात रूपांतर होते. ज्यामुळे अन्न पचण्यास सुलभ जाते.

🔶खाल्लेले अन्न पचविण्याच्या क्रियेत खालील अवयवांचा महत्वाचा सहभाग असतो. अन्नपचनाची प्रक्रिया खालीलप्रकारे पाडली जाते.  


🔴 अंग पदार्थ – मुख व गुहा

स्त्राव – लाळ  

विकर – टायलिन

माध्यम – अल्पांशाने

मूळ अन्न पदार्थ – पिष्टमय पदार्थ  

क्रिया आणि अंतिम – शर्करा (माल्टोज)


🔴 अंग पदार्थ – जठर

स्त्राव – हायड्रोक्लोरिक

माध्यम – आम्ल, अॅसिड  

मूळ अन्न पदार्थ – प्रथिने  

क्रिया आणि अंतिम – जंतुनाशक


🔴 अंग पदार्थ – जठररस  

स्त्राव – पेप्सीन,रेनीन

माध्यम – आम्ल

मूळ अन्न पदार्थ – प्रथिने, दूध

क्रिया आणि अंतिम – सरल प्रथिने (पेप्टोन), व्हे मध्ये रूपांतर  


🔴 अंग पदार्थ – लहान आतडे

स्त्राव – पित्तरस

माध्यम – अल्कली

मूळ अन्न पदार्थ – प्रथिने व मेद

क्रिया आणि अंतिम – मेदाचे विघटन व अन्न जंतूनाशक करणे.


🔴 अंग पदार्थ – स्वादुपिंडरस  

विकर – ट्रिप्सीन, अमायलेझ, लायपेझ

माध्यम – अल्कली, अल्कली

मूळ अन्न पदार्थ – प्रथिने(पेप्टोन), पिष्टमय पदार्थ, मेद

क्रिया आणि अंतिम – अमिनोआम्ल, शर्करा व ग्लुकोज, मेदाम्ल व ग्लिसरॉल


🔴 अंग पदार्थ – आंत्ररस

विकर – इरेप्सीन, इनव्हरटेझ, लायपेझ

माध्यम – अल्कली

मूळ अन्न पदार्थ – प्रथिने, शर्करा, मेद  

क्रिया आणि अंतिम – अमिनोआम्ल, ग्लुकोज, फ्रूटोज व माल्तैझ, मेदाम्ल व ग्लिसरॉल.

यकृत कार्य

👉यकृत रक्तातील बहुतेक रासायनिक पातळीचे नियमन करते आणि पित्त नावाच्या उत्पादनास उत्सर्जित करते. हे यकृत पासून कचरा उत्पादने वाहून नेण्यास मदत करते. 


👉पोट आणि आतडे सोडणारे सर्व रक्त यकृतामधून जाते. यकृत या रक्तावर प्रक्रिया करते आणि तोडतो, संतुलित होतो, आणि पोषकद्रव्ये तयार करतो आणि औषधे शरीरात उर्वरित वापरण्यास सोपी किंवा नॉनटॉक्सिक अशा फॉर्ममध्ये चयापचय करते. 


👉यकृत सह 500 हून अधिक महत्त्वपूर्ण कार्ये ओळखली गेली आहेत. काही अधिक सुप्रसिद्ध कार्ये खालीलप्रमाणे:


👉पित्त उत्पादन, पचन दरम्यान कचरा दूर आणि लहान आतडे चरबी तोडण्यास मदत करते


👉रक्ताच्या प्लाझ्मासाठी काही प्रथिने तयार करणे


👉शरीरात चरबी वाहून नेण्यासाठी कोलेस्टेरॉल आणि विशेष प्रथिने तयार करणे


👉सटोरेजसाठी जास्त प्रमाणात ग्लूकोजचे रूपांतर ग्लायकोजेनमध्ये करणे (ग्लायकोजेन नंतर उर्जेसाठी ग्लूकोजमध्ये परत रूपांतरित केले जाऊ शकते) आणि संतुलन आणि आवश्यकतेनुसार ग्लूकोज बनवणे. 


👉अमीनो idsसिडच्या रक्ताच्या पातळीचे नियमन, जे प्रथिने बनवण्याचे ब्लॉक बनवते


👉हिमोग्लोबिनची लोह सामग्री वापरण्यासाठी प्रक्रिया (यकृत लोह साठवते)


👉विषारी अमोनियाचे युरियामध्ये रूपांतरण (युरिया हे प्रथिने चयापचयातील एक शेवटचे उत्पादन आहे आणि मूत्रात उत्सर्जित होते)


👉औषधे आणि इतर विषारी पदार्थांचे रक्त साफ करणे


👉रक्त गोठण्यास नियमित करणे


👉रोगप्रतिकारक घटक बनवून आणि रक्तप्रवाहापासून बॅक्टेरिया काढून संक्रमणांना प्रतिकार करते


👉लाल रक्तपेशींपासून देखील बिलीरुबिनचे क्लीयरन्स. जर बिलीरुबिनचे संचय होत असेल तर त्वचा आणि डोळे पिवळे होतात. 


👉जव्हा यकृत हानिकारक पदार्थांचा नाश करतो तेव्हा त्याची उप-उत्पादने पित्त किंवा रक्तात मिसळतात.


👉 पित्त-उप-उत्पादने आतड्यात प्रवेश करतात आणि मलच्या स्वरूपात शरीर सोडतात. मूत्रपिंडांद्वारे रक्ताद्वारे-उत्पादनांना फिल्टर केले जाते आणि शरीर मूत्र स्वरूपात सोडते.

प्रश्नमंजुषा

  

1) कोणाच्या शिफारशी शिवाय धन विधेयक विधानसभेत मांडता येत नाही.

A) मुख्यमंत्री

B) राज्यपाल✔️✔️

C) राष्ट्रपती

D) विधानसभा अध्यक्ष




2) भारतीय रेल्वे संदर्भात कोणते विधान सत्य आहे.

अ) रेल्वे वाहतुकीचा बाजार हिस्सा  थोडाच वाढला आहे

ब) अपुरे  क्षमता जाळे आणि पायाभूत सुविधा या समस्यांचा रेल्वे सामना करावा लागतो.


पर्याय:-

A) अ, ब दोन्ही बरोबर

B) अ , ब दोन्हीं चुक

C) अ बरोबर

D) ब बरोबर✔️✔️




3) सर्व शिक्षा अभियान यांच्याकडून राबविले जाते.

A) केंद्र शासन

B) राज्य शासन

C) केंद्र आणि राज्य शासन दोन्ही✔️✔️

D) वरीलपैकी नाही.




4 ) सन 2011 मध्ये साक्षरता दरासंदर्भात खालील राज्यांची घटत्या  क्रमाने मांडणी करा.

अ) पश्चिम बंगाल

ब) महाराष्ट्र

क) हिमाचल प्रदेश


A) अ, ब,क

B) क, ब, अ✔️✔️

C) ब, क, अ

D) ब , अ, क




5) कोणते विधान बरोबर आहे.

अ) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिम 2015 मध्ये सुरू करण्यात आली.

ब) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिमेचा हेतू आणि कुटुंबकल्याण कार्यक्रमाना बळकटी देणे हा आहे.


A) अ बरोबर

B) ब बरोबर ✔️✔️

C) अ ,ब दोन्ही बरोबर

D) अ, ब दोन्ही चूक




6) पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे.

अ) भारतातील सर्व खेडी सर्व हवामान रस्त्यांनी जोडण्याचे उद्दिष्ट दहाव्या पंचवार्षिक योजनेत होते.

ब) राष्ट्रीय व राज्य रस्ते किमान दुमार्गी श्रेणीचे करायचे हे 12 व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट आहे.


A) अ

B) ब

C) अ , ब दोन्ही बरोबर✔️✔️

D) एक ही नाही





7) भारत निर्माण कार्यक्रम 2005 या ग्रामीण भागात पायाभूत सुविधा कोणत्या  आहेत.

अ) जलसिंचन व ग्रामीण रस्ते

ब) ग्रामीण निवारा

क) ग्रामीण पाणीपुरवठा

ड) ग्रामीण विद्युतीकरण

इ) ग्रामीण दूरध्वनी


A) ब ,क, ड

B) अ, ब, क, ड

C) अ, क, ड, इ

D) अ, ब, क, ड, इ✔️✔️





8) सन 2009 साठी आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट परिषदे ने 5-15  दशलक्ष प्रवासी वाहतूक हाताळणाऱ्या  विमानतळा मध्ये कोणत्या विमानतळा जगातील उत्कृष्ट म्हणून गौरविले आहे.

A) एअरपोर्ट नवी दिल्ली

B) एअरपोर्ट मुंबई

C) एअरपोर्ट शमशाबाद हैदराबाद

D) एअरपोर्ट बेंगलोर



9 ) सार्वजनिक क्षेत्रातील वीज निर्मितीत खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वीजनिर्मितीचा वाटत सर्वाधिक आहे.

अ) जलविद्युत

ब) औण्विक विद्युत

क) अनुउर्जा

ड) पवन ऊर्जा


A) फक्त अ

B) फक्त ब✔️

C) अ आणि ब

D) अ, ब, ड, क





10) ग्रामीण भागात शहरी सुखसोयी चे प्रावधान हे पुढील पैकी कोणाचे ग्रामीण भारताच्या प्रवक्ता त्यांचे स्वप्न आहे.

A) डॉ. मनमोहन सिंग

B) डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम✔️

C) सी रंगराजन

D) डॉ. अमर्त्य सेन


Q 1️⃣

सुपरसॉनिक विमाने आकाशात उडताना फारसा आवाज करत नाहीत कारण............. 

A. त्यांचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त असतो

B. त्यांची कंपने कमी असतात

C. ती फार उंची वरून प्रवास करतात✅✅

D. ती वजनाने फार हलकी असतात


Q 2️⃣

हायड्रोमीटर हे उपकरण खालीलपैकी काय मोजण्यासाठी वापरले जाते ? 

A. द्रव पदार्थाचे विशिष्ट गुरूत्व ✅✅

B. द्रव पदार्थाची घनता

C. द्रव पदार्थाची तरलता

D. हवेतील हायड्रोजनचे प्रमाण


Q 3️⃣

क्षरण प्रतिबंधासाठी खालीलपैकी कोणत्या पध्दती वापरतात ? 

अ) गॅल्व्हानायझेशन 

ब) कथीलीकरण 

क) विद्युत विलेपन 

ड) धनाग्रीकरण 


A. फक्त अ आणि ब

B. फक्त अ, ब आणि क

C. फक्त अ, ब आणि ड

D. वरील सर्व ✅✅


Q 4️⃣

C-C या बंधाची सर्वात कमी लांबी कोणत्या संयुगामध्ये असते ? 


A. इथेन

B. इथिलीन

C. बेन्झीन

D. एसटीलीन ✅✅



Q 5️⃣

दुर्बिणीसारख्या प्रकाशीय उपकरणातील क्षेत्रभिंग व नेत्रभिंग यांच्या जोडणीतून काय साकारले जाते ? 

A. वस्तूभिंग

B. संयुक्त नेत्रभिंग ✅✅

C. विशालक

D. वरीलपैकी एकही नाही


Q 6️⃣

ऑक्सीश्वसनामध्ये ऑक्सिजन कोणती मुख्य भुमिका बजावतो ? 


A. इलेक्ट्रॉन दाता

*B. इलेक्ट्रॉन ग्राही* ✅✅

C. प्रोटॉन दाता

D. प्रोटॉन ग्राही


Q 7️⃣

खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे ? 


A. गर्द पिवळे मुत्र- मेलॅन्युरीया

B. रंगहीन मुत्र-निर्जलीकरण

C. रक्तरंग मुत्र -हीमॅच्युरीया ✅✅

D. हिरवट रंगाचे मुत्र - बीट खाल्यामुळ


Q 8️⃣

खालीलपैकी मॅक्रोन्यूट्रीयंट कोणते आहे ? 

A. मॅग्नेशिअम✅✅

B. मॉलीबडेनिअम

C. बोरॉन

D. झिंक


Q 9️⃣

सामान्यतः अमोनिया वायू औद्योगिक पातळीवर तयार करतात कारण त्याचा उपयोग ..................... 

A. प्रथिने तयार करण्यासाठी होतो

B. साबण तयार करण्यासाठी होतो

C. रसायनिक खते तयार करण्यासाठी होतो ✅✅

D. कृत्रिम खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी होतो


Q 🔟

 अटल पेन्शन योजनेबाबत खालीलपैकी काय चुकीचे आहे? 


A. सहभागी होण्याचे किमान वय 18 वर्ष

B. सहभागी होण्याचे कमाल वय 40 वर्ष

C. वर्गणीदारने आपला हिस्सा भरण्याचा किमान कालावधी 20 वर्ष किंवा अधिक

D. सुरवात 1 जानेवारी 2016 पासून ✅

डीएनए





50 एस राइबोसोमल सब्यूनिटचे त्रिमितीय प्रतिनिधित्व . रिबोसोमल आरएनए ब्लूमध्ये प्रथिने जेरो मध्ये आहेत. सक्रिय साइट लाल रंगात दर्शविलेल्या आरआरएनएचा एक छोटा विभाग आहे.

🍁आरएनएची रासायनिक रचना डीएनए प्रमाणेच आहे , परंतु तीन प्राथमिक मार्गांनी ती भिन्न आहेः

🍁दहेरी अडकलेल्या डीएनए विपरीत, आरएनए त्याच्या अनेक जैविक भूमिकांमधील एकल-अडकलेला रेणू आहे
🍁आणि त्यात न्यूक्लियोटाइड्सच्या लहान साखळ्या असतात.
🍁तथापि, एकल आरएनए रेणू, टीआरएनए प्रमाणे पूरक बेस जोड्याद्वारे इंट्रास्ट्रॅन्ड डबल हेलिक्स बनवू शकतो.

डीएनएच्या साखर-फॉस्फेट "बॅकबोन" मध्ये डीऑक्सिरीबोज असते , तर आरएनएऐवजी राईबोज असते. []] रिबोजचा पेंटोज रिंगला हायड्रॉक्सिल ग्रुप जोडलेला असतो जो २ मध्ये स्थित असतो . राइबोस पाठीचा कणा मध्ये hydroxyl गट आरएनए अधिक रासायनिक करा जी रासायनिक द्रव्ये उष्णतेने त्वरित बदलतात अशांना ही संज्ञा लावली जाते कमी डीएनए पेक्षा सक्रियन ऊर्जा च्या पाण्याबरोबर संयोग होऊन लहान कणात पृथ : क्करण होणे .

डीएनएमध्ये enडेनिनचा पूरक आधार थाईमाइन असतो , तर आरएनएमध्ये तो युरेसिल असतो , जो थायमाइनचा एक अखंड प्रकार आहे.


❇️Deoxyribonucleic❇️

🍂 आम्ल ( डीएनए ) एक परमाणू दोन साखळ्या की गुंडाळी बनलेला आहे एकमेकांना सुमारे एक तयार करण्यासाठी दुहेरी Helix घेऊन अनुवांशिक , विकासाच्या सुचना कार्य, वाढ आणि पुनरुत्पादन सर्व ज्ञात organismsअनेक आणि व्हायरस . डीएनए आणि रिबोन्यूक्लिक acidसिड (आरएनए) न्यूक्लिक idsसिड असतात ; हळूच प्रथिने , lipids आणि गुंतागुंतीच्या कर्बोदकांमधे ( polysaccharides ), nucleic ऍसिडस् चार मुख्य प्रकार आहेत macromolecules सर्व ज्ञात
 फॉर्म आवश्यक असलेल्या जीवन .




गोवर



गोवर हा विषाणुजन्य आजार आहे. या आजारात एक्झॅन्थम या नावाने ओळखले जाणारे पुरळ त्वचेवर येतात. गोवर हा रुबेला, पाच दिवसाचा गोवर किंवा हार्ड मीझल्स या नावानेसुद्धा ओळखला जातो.
वर्णन : गोवर हा जगभर आढळणारा आजार आहे. सध्याच्या गोवर लसीकरणाच्या प्रथेआधी दर दोन किंवा तीन वर्षानी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात गोवराची साथ येत असे. एक वर्षाआड येणारी लहान गोवराची साथ ही सामान्य बाब होती. तान्ह्या मुलापासून ते आठ महिन्यापर्यंतच्या मुलामध्ये गोवराविरुद्ध नैसर्गिक प्रतिकार शक्ती असते. ही प्रतिकारशक्ती मातेच्या गर्भाशयातील पेशींमधून मुलास मिळालेली असते.

माणसाला कोणत्याही वयात एकदा गोवर होऊन गेला की त्याला तो पुढच्या आयुष्यात परत होत नाही.

◾️कारण आणि लक्षणे

गोवराचे कारण पॅरामिक्झोव्हायरस नावचा विषाणू. अति संसर्गजन्य प्रकारातील हा विषाणू आहे. ज्यास गोवर झाला आहे त्याचा खोकला, शिंका यातून विषाणू पसरतो. ८५% गोवर या प्रकारे पसरतो. एकदा गोवराच्या विषाणूचा संसर्ग झाला की आठ ते पंधरा दिवसात विषाणूचा संसर्ग झालेल्या ९५% व्यक्तींना गोवर होतो. गोवराची लक्षणे दिसण्यापूर्वी तीन ते पाच दिवस गोवर विषाणूचा संसर्ग झालेला असतो. नंतरच्या चार दिवसात गोवराचे पुरळ अंगावर येण्यास प्रारंभ होतो.

गोवराचे पहिले लक्षण म्हणजे ताप, नाक वाहणे , डोळे तांबडे होऊन डोळ्यातून पाणी येणे आणि खोकला. काहीं दिवसात तोंडामध्ये गालाच्या आतील बाजूस पुरळ उठतात. ते वाळूच्या आकाराचे पांढरे पुरळ तांबूस उंचवट्यावर असतात. या पुरळांस कॉप्लिक पुरळ असे म्हणतात. हे गोवराचे नेमके लक्षण आहे. घसा सुजतो, तांबडा होतो आणि खवखवतो.

◾️उपचार

गोवरावर नेमके उपचार नाहीत. उपचार रुग्णास आराम वाटावा यासाठी केले जातात. इतर जीवाणू संसर्ग झाल्यास प्रतिजैविके देण्यात येतात. ताप उतरण्यासाठी असिटॅमिनोफेन देण्यात येते. गोवर झालेल्या लहान मुलाना कधीही अ‍ॅस्पिरिन देऊ नये

◾️परतिबंध

गोवराचा प्रतिबंध लसीने उत्तम प्रकारे करता येतो. गोवराची लस गोवराच्या विषाणूपासून बनवलेली आहे. गोवराच्या विषाणूवरील सर्व प्रथिने शिल्लक असल्याने लस दिल्यानंतर शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होते. भविष्यकाळात गोवराच्या विषाणूबरोबर संपर्क आल्यास शरीर विषाणूचा त्वरित प्रतिकार करते.. वयाच्या १५ महिन्यापूर्वी बालकाची प्रतिकारशक्ती पुरेशी निर्माण न झाल्याने गोवराची लस १५ महिन्यानंतर देण्यात येते. या वयात लस टोचल्यास तयार होणारी प्रतिकार शक्ती दीर्घकाळ टिकते.

गर्भवती महिलाना गोवराची लस देऊ नये. याचे कारण गर्भारपणात गोवराची लस दिल्यास जन्मलेल्या बळास गोवर होण्याची शक्यता असते.

प्रथिने (Proteins)-

√ प्रथिने ही अमिनो आम्लापासून बनलेली असतात.
√ शरीराला २४ अमिनो आम्लाची गरज असते.
√ त्यापैकी नऊ (९) अमिनो आम्ले शरीरात निर्माण होऊ शकत नाही.
√ त्यामुळे ती आहारात पुरवावी लागतात, म्हणून अशा अमिनो आम्लांना "आवश्यक अमिनो आम्ल'' असे म्हणतात.

√ आवश्यक अमिनो आम्ल पुढील प्रमाने आहे.

१) लायसिन
२) ल्यूसिन
३) आयसोल्युसिन
४) व्हलिन
५) हिस्ट्रीटीन
६) थ्रिओनिन
७) टिष्ट्रोफॅन
८) मितिओनिन
९) फिनाईल अॅलनिन

√ अमिनो आम्ले ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर व कधीकधी फॉस्फरस व लोह यांपासून बनलेली असतात.

● प्रथिनांचे कार्य-

√१)शरीरांची वाढ व विकास करणे.
√२) उतींचे प्रमाण वाढविण्यासाठी.
√३) प्रति पिंडे (Anti bodies), विकरे, संप्रेरके, हार्मोन्स यांच्या निर्मितीसाठी.
√४) रक्त निर्मितीतील व ऊर्जा निर्मितीसाठी प्रथिने कार्य करतात.

● प्रथिनांचे स्त्रोत-

√१) प्राणीज स्त्रोत : दुध, अंडी, मासे, मांस
√२) वनस्पतीज स्त्रोत :
i) दाळी- तुर, मुंग, हरभरा, उडीद, मसूर
ii) धान्य-ज्वारी, बाजरी, नाचणी, गहु
iii) तेलबिया - तीळ, कडई, शेंगदाणे, सोयाबिन, बदाम

● प्रथिनांचे प्रमाण-

१. डाळीमध्ये: २० ते २५ टक्के
२. सोयाबिनमध्ये: ४३.२ टक्के (सर्वाधिक)
३. दुधामध्ये: ३.२ ते ४.३ टक्के
४. अंडी: १३टक्के
५. मासे: १५ ते २३ टक्के
६. मांस: १८ ते २६ टक्के

√ प्राणिज प्रथिने ही वनस्पतीज प्रथिनांपेक्षा अधिक महत्वाची असतात, कारण त्यामध्ये सर्वाधिक अमिनो आम्ल' असतात.

★★★★★★★★★★★★★★★★★★

Latest post

सामान्य ज्ञान

1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात. Ans:- संप्लवन 2. निसर्ग...