Tuesday, 10 March 2020

राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा प्रश्नसंच

प्र.1. भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली? (राज्यसेवा मुख्य २०१५)

१) उद्देशपत्रिका २) मूलभूत अधिकार

३) मूलभूत कर्तव्ये ४) मार्गदर्शक तत्वे

प्र.2. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही ……..आहे. (राज्यसेवा मुख्य २०१२)

अ) राज्यघटनेचे हृदय ब) राज्यघटनेचा आत्मा

क) राज्यघटनेचे डोके ड) यापैकी नाही

योग्य पर्याय निवडा: –

१) अ व क २) ब व क

३) फक्त ब ४)फक्त ड

प्र.3. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमत: केव्हा दुरुस्त करण्यात आली? (राज्यसेवा मुख्य २०१२)

१) १९५२ २) १९६६

३) १९७६ ४) १९८६

प्र.4. खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रास्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले? (राज्यसेवा मुख्य २०१३)

4) बेरुबरी खटला

२) गोलकनाथ खटला

३) केसवानंद भारती खटला

४) बोम्मई विरुध्द भारताचे संघराज्य

प्र.5. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील ‘सार्वभौम’ या संकल्पनेतून खालीलपैकी कोणकोणता अर्थ ध्वनित होतो? (राज्यसेवा मुख्य २०१३)

अ) बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वत:शी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करु शकतो.

ब) संघ आणि घटक राज्ये दोन्ही सार्वभौम आहेत.

क) भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करु शकतो.

ड) भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेशात फेरफार करण्याचे अधिकार आहेत.

पर्याय उत्तरे :

१) ब,क,ड २) अ,ब,क

३)अ,क,ड ४)अ,ब,ड

प्र.6. खालील मुद्यांचा विचार करा.(राज्यसेवा मुख्य २०१४)

अ) भारतीय संविधानाचे तत्वज्ञान पंडित नेहरुंच्या ऐतिहासिक उद्दिष्टांच्या ठरावात अनुस्यूत होते.

ब) हा ठराव संविधान सभेने २२ जानेवारी १९४८ रोजी स्वीकृत केला.

१) दोन्ही बरोबर आहेत २) दोन्ही चूक आहेत

३) ब बरोबर आहे ४) अ बरोबर आहे

प्र.7.भारतीय राज्यघटनेचे ‘आर्थिक न्याय’ हे उद्दिष्ट ……यातून व्यक्त होते. (राज्यसेवा मुख्य २०१५)

१) प्रस्तावना आणि मूलभूत अधिकार

२) प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्वे

३) मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे

४) वरीलपैकी एकही नाही

प्र.8. राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेची वर्णने व ज्या विद्वानांनी किंवा न्यायालयांनी ती केली यांची जुळणी करा: (राज्यसेवा मुख्य २०१५)

अ) ‘घटना कर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली’ i) पंडीत ठाकुरदास भार्गव

ब) ‘राज्यघटनेचा सर्वात मौल्यवान भाग’ ii) के.एम.मुन्शी

क) ‘राजकीय कुंडली’ iii) भारताचे सर न्यायाधीश ‘सिक्री’

ड) ‘अत्यंत महत्वपूर्ण भाग’ iv) बेरुबारी संदर्भ खटला (१९६०)

अ   ब क   ड

१) iv i ii iii

२) i ii iii iv

३) iii iv i ii

४) ii iii iv i

प्र.9, फाझल अली कमिशनचे सदस्य…………. होते. (राज्यसेवा मुख्य २०१६)

अ) के.एम. पण्णीकर ब) हृदयनाथ कुझरू

क) यशवंतराव चव्हाण ड) अण्णा डांगे

पर्याय

१) फक्त अ,ब २) फक्त क, ड

३) फक्त ब, क ४) वरीलपैकी सर्व

प्र.10. उद्दिष्टांच्या ठरावासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान गैरलागू (राज्यसेवा मुख्य २०१६)

१) पं. जवाहरलाल नेहरू यांनी घटनासमितीपुढे उद्दिष्टांचा ठराव मांडला.

२) दिनांक १३ डिसेंबर १९४६ रोजी उद्दिष्टांचा ठराव घटनासमिती समोर ठेवण्यात आला.

३) उद्दिष्टांचा ठराव हा घटना समितीसाठी दिशादर्शक होता.

४) या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र, सार्वभौम, समाजवादी आणि गणराज्य म्हणून घोषित करण्यात आले.

प्र.11. खालील विधाने विचारात घ्या( राज्यसेवा मुख्य २०१७)

अ) सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्त्रोतही नाही अथवा कायदेमंडळाचा अधिकारांवर बंधनेही घालत नाही.

ब) सर्वोच्च न्यायालयाने बेरूबारी खटल्यात (१९६०) सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असे मत मांडले.

क) केशवानंद भारती खटल्यामध्ये (१९७३) सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असे म्हटले.

ड) भारतीय जीवन विमा निगम खटल्यात (१९९५) सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग नाही असे पुनश्च प्रतिपादन केले.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

१) अ २) अ, क ३) ब, क, ड ४) अ, ब, ड

प्र.12. घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली.(Asst मुख्य २०१३)

१) आयर्लंड २) यु.के

३) यु.एस.ए ४) ऑस्ट्रेलिया

प्र.13. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रीकेमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ या शब्दांचा समावेश १९७६ च्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला. (Asst मुख्य २०११)

१) ४४ वी २) ४१ वी

३) ४२ वी ४) ४६ वी

प्र.14. भारताच्या राज्यघ

टनेच्या उद्देशपत्रिकेवर ……प्रभाव दिसतो. (Asst मुख्य २०१२)

अ) कॅनडाची राज्यघटना

ब) जपानची राज्यघटना

क) इंग्लंडची राज्यघटना

ड) अमेरिकेची राज्यघटना

१) अ व क २) क व ड

३) फक्त ड ४) फक्त ब

प्र.15. १९७६ च्या ४२ व्या घटना दुरुस्तीने प्रस्ताविकेत कोणत्या नवीन शब्दांचा समावेश केला आहे ? (Asst मुख्य २०१३)

अ) सार्वभौम आणि समाजवादी

ब) समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष

क) श्रध्दा, उपासना आणि व्यक्तीची प्रतिष्ठा

ड) एकता आणि एकात्मता

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

१) फक्त ब २) ब आणि क

३) क आणि ड ४) ब आणि ड

प्र.16………….या तारखेपासून भारत एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य आहे असे भारतीय राज्यघटनेने घोषित केले.(Asst मुख्य २०१५)

१) १३-१-१९७६ २ )३-१-१९७७

३) ३१-१-१९७८ ४) १-३-१९७७

प्र.17) ४२ व्या घटना दुरुस्तीद्वारे उद्देश्यपत्रिकेमध्ये …….आणि …..शब्द जोडण्यात आले. (Asst मुख्य २०१४)

अ) समाजवादी ब) धर्मनिरपेक्ष

क) प्रजासत्ताक ड) राष्ट्राची एकता

१) अ,ब,क

२)अ,ब,ड

३) ब,क,ड

४) अ,क,ड

प्र.18). आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने “विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि ………… यांचे स्वातंत्र्य दिले आहे. (Asst मुख्य २०१६)

१) व्यवसाय २) संघटना

३) पूजा ४) संचार

प्र.19) भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. (Asst. मुख्य २०१७)

अ) सरनामा हा राज्यघटनेचे अविभाज्य अंग आहे.

ब) सरनाम्यातील तरतूदी या न्यायालयाद्वारे अंमलात आणता येतात.

क) सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्त्रोत म्हणून कार्य करू शकतो.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

१) फक्त अ २) फक्त क

३) फक्त ब, क ४) अ, ब, क

प्र.20). भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकानुसार भारतात हे ‘प्रजासत्ताक’ आहे. प्रजासत्ताकाचा अर्थ कोणता? (ASOमुख्य २०१८).

अ) राज्यकर्ता वंशपरंपरागत नसतो.

ब) सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असते.

क) शासन प्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो.

ड) राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो.

खाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा.

१) अ २) अ, ब, क

३) वरील सर्व ४) अ, ड

प्र.21). भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत शेवटी समाविष्ट केलेले शब्द कोणते? (Asst पूर्व २०१२)

अ) समाजवादी आ)धर्मनिरपेक्ष इ) सार्वभौम

ई)लोकशाही उ) गणराज्य ऊ)न्याय

ए) स्वातंत्र्य ऐ)समानता ओ)बंधुता

औ) एकात्मता

पर्यायी उत्तरे :

१) अ, ब, औ २) क, ड, ऊ

३) उ, ए, ऐ ४) अ, ड, ओ

PSI pre and Mains

प्र.22). भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेवर ……प्रभाव दिसतो. (PSI मुख्य २०१३)

अ) उद्देशपत्रिकेत ‘बंधुभाव’ या तत्वाचा समावेश केला.

ब) मूलभूत हक्कांद्वारे प्रतिष्ठा सुरक्षित केली आहे.

क) हे हक्क वादयोग्य (दाद मागता येणार) आहेत.

ड) गरजा आणि दुर्दशापासून नागरिकांना मुक्त ठेवण्यासाठी राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे समाविष्ट केली आहेत.

वर दिलेल्या विधानांपैकी कोणते/कोणती बरोबर आहेत ?

१) अ २) अ,ब

३) अ, ब, क ४) सर्व

प्र.23) ४२ व्या घटनादुरुस्तीनंतर भारताचे केलेले वर्णन असे : (PSI मुख्य २०१२)

१) सार्वभौम समाजवादी प्रजासत्ताक गणराज्य

२) सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य

३)सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य

४) प्रजासत्ताक गणराज्य

प्र.24) उद्देशपत्रिकेत बहाल केलेल्या ‘स्वातंत्र्यांचा’ बरोबर क्रम आहे. (PSI मुख्य २०१३)

१) अभिव्यक्ती, विचार, श्रध्दा, विश्वास, उपासना

२) विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा, उपासना

३) अभिव्यक्ती, विचार, विश्वास, उपासना, श्रध्दा

४) विचार, अभिव्यक्ती, उपासना, विश्वास, श्रध्दा

प्र.25) गटा बाहेरचा ओळखा : (PSI मुख्य २०१४)

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा, उपासना, सामाजिक

पर्यायी उत्तरे :

१) विचार २) श्रध्दा

३) उपासना ४) सामाजिक

प्र.26) उद्देशपत्रिकेची खालील वर्णने आणि विद्वान यांनी जुळणी करा: (PSI मुख्य २०१४)

अ) राजकीय कुंडली i) पंडीत ठाकुरदास भार्गव

ब) कल्याणकारी राज्याची

अचंबीत करणारी तत्वे ii)एम.व्ही.पायली

क) उत्कृष्ट गद्य-काव्य iii)के.एम.मुन्शी

ड) अशा प्रकारचा केलेला

एक सर्वोत्तम मसुदा iv)आचार्य.जे.बी.कृपलानी

अ   ब क   ड

१) iii iv i ii

२) i ii iii iv

३) ii i iv iii

४) iv iii ii i

प्र.27) खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? (PSI मुख्य २०१६)

१) सरनामा न्यायालयाद्वारा अंमलात आणता येत नाही…

२) राज्यघटनेस प्रस्थापित आणि विकसित करण्यायोग्य जी उद्दिष्ट्ये आह

ेत ती सरनाम्यातून व्यक्त होतात.

३) सरनाम्यातून राज्यघटनेने आपल्या अधिकाराचे स्त्रोत कोणाकडून प्राप्त केले आहे हे स्पष्ट होते.

४) आपल्या सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता आणि बंधूता ती आदर्श तत्वे रशियन राज्यक्रांती (१९१७) कडून घेतली आहेत.

प्र.28) भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे ? (PSI पूर्व २०१६)

१) स्वातंत्र्य २) समता

३) बंधुता ४) न्याय

STI Pre and Mains

प्र.29) खालील विधाने विचारात घ्या. (STI मुख्य २०१६)

अ) सरनाम्यामध्ये घटनाकारांची वास्ताविक उद्दिष्ट्ये आणि तत्वज्ञान यांचा समावेश आहे.

ब) बेरूबरी संघ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले कर सरनाम्यातून राज्य घटनेचा साधारण हेतू दिसतो आणि म्हणून तो राज्य घटनेचा भाग आहे.

क) केशनावंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बेरूबरी संघ खटल्यातील घेतलेला निर्णयच योग्य असल्याचे पुन्हा

प्रतिपादन केले.

ड) १९७६ च्या ४२ व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे सरनाम्यात-समाजवादी, सार्वभौम आणि अखंडता या तीन शब्दाचा समावेश करण्यात आला.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/त?

१) अ २) अ, ब, क

३) ड ४) अ, ब, क, ड

प्र.30) भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे? (STI पूर्व २०११)

१) स्वातंत्र्य २) समता

३) न्याय ४) बंधुभाव

प्र.31) खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?(STI पूर्व २०१५)

१) बेरुबरी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला होता.

२) केशवानंद भारतीय खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिला होता.

३) सरनाम्यामध्ये आतापर्यंत घटनादुरुस्तीद्वारे दोन वेळा बदल करण्यात आलेले आहेत.

४) वरील एकही नाही.

प्र.32) खालील विधाने लक्षात घ्या : (STI पूर्व २०१४)

अ) भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये ३६८ व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते.

ब) भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका संविधानाचा भाग नाही आणि त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही.

क) उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाच्या “मौलिक संरचनेला’’ धक्क न लावता दुरुस्ती

करता येते.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

१) अ २) अ,ब

३) क ४) अ, क

प्र.33) भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले? (STI पूर्व २०१५)

अ) राष्ट्राची एकता

ब) राष्ट्राची अखंडता

पर्यायी उत्तरे

१) केवळ अ

२) केवळ ब

३)दोन्ही

४) दोन्ही प्रथमपासूनच सम्मिलित होते

Ans : १) १, २) ३, ३) ३, ४) १, ५) ३, ६) ४, ७) २, ८) १, ९) १, १०) ४, ११) १, १२) ३, १३) ३, १४) ३, १५) १, १६) २, १७) २, १८) ३, १९) १, २०) ४, २१) १, २२) ४, २३) २, २४) २, २५) ४, २६) १, २७) ४, २८) ४, २९) १, ३०) ३, ३१) ४, ३२) ४, ३३) २

Current Affairs - 10/03/2020

1)COVID-19 विषाणूच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या -

1. या विषाणूच्या उद्रेकाचे मूळ चीन देशात होते.

2. इटली हा चीननंतर या विषाणूच्या संसर्गाने सर्वाधिक प्रभावित होणारा देश आहे.

दिलेल्यापैकी अचूक विधान असलेला पर्याय निवडा.

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही.  √
(D) ना (1), ना (2)

2)मार्च 2020 मध्ये CBI आणि ED या संस्थांनी घोटाळा आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली बँकींग क्षेत्रातल्या कोणत्या व्यक्तीची चौकशी केली?
(A) चंदा कोचर
(B) राणा कपूर.  √
(C) गिरीश चंद्र चतुर्वेदी
(D) राकेश माखीजा

3)‘BBC वर्ल्ड हिस्ट्री’ मासिकाच्या सर्वेक्षणानुसार जगाच्या इतिहासातला सर्वात महान नेता म्हणून कोणा व्यक्तीची निवड केली गेली?
(A) महाराजा सवाई मान सिंग
(B) महाराजा हरी सिंग
(C) महाराजा रणजित सिंग.  √
(D) महाराजा गुलाब सिंग

4)वर्ष 2014 आणि वर्ष 2016 या काळात कोणत्या राज्यात सर्वाधिक पर्यावरण-विषयक गुन्हे घडले?
(A) छत्तीसगड
(B) राजस्थान.  √
(C) उत्तराखंड
(D) महाराष्ट्र

5)कोणती व्यक्ती केंद्रीय माहिती आयोगाचे (CIC) नवे मुख्य माहिती आयुक्त आहे?
(A) रघुराम राजन
(B) सुब्रमण्यम स्वामी
(C) उर्जित पटेल
(D) बिमल जुल्का.  √

6)पाठविल्या जाणाऱ्या ‘मंगळ मोहीम 2020’ यासाठी NASA संस्थेनी बनविलेल्या ‘मार्स रोव्हर’चे नाव काय आहे?
(A) अपोलो
(B) ईगल
(C) डेस्टीनी
(D) पर्सेवेरन्स.  √

7)नव्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत किती निधीसह एक विधेयक मंजूर करण्यात आले?
(A) 8.3 अब्ज डॉलर.  √
(B) 6.6 अब्ज डॉलर
(C) 4.5 अब्ज डॉलर
(D) 10.1 अब्ज डॉलर

8)वर्ष 1920 ते वर्ष 2020 या कालावधीत ‘TIME 100 कव्हर्स फॉर 100 विमेन’ या यादीत कोणत्या दोन भारतीय महिलांचा समावेश करण्यात आला?
(A) कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स
(B) राजमाता गायत्री देवी आणि सोनिया गांधी
(C) मिताली राज आणि सानिया मिर्झा
(D) इंदिरा गांधी आणि अमृत कौर.  √

9)कोणते शहर उत्तराखंडची उन्हाळी राजधानी आहे?
(A) देहरादून
(B) गैरसैन.  √
(C) हरिद्वार
(D) नैनीताल

10)आयुर्वेदासाठी मानदंड संज्ञा आणि विकृती नियमांसाठी आयुष मंत्रालयाद्वारे विकसित केलेल्या डिजिटल व्यासपीठाचे नाव काय आहे?
(A) नमस्ते पोर्टल.  √
(B) हेलो पोर्टल
(C) स्वागत पोर्टल
(D) आयुर्वेद पोर्टल

महत्त्वाचे प्रश्नसंच


*खालीलपैकी कोणते पेशवे हे राऊ म्हणून ओळखले जातात?*

A) माधवराव पेशवे
B) दुसरे बाजीराव पेशवे
C) पहिले बाजीराव पेशवे ✅✅
D) रघुनाथराव पेशवे

*पुढील वाक्य प्रकारचा योग्य अर्थ सांगा. उखळ पांढरे होणे.*

A) दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडणे
B) नशीब उघडणे ✅✅
C) उखळात पीठ पडणे
D) उखाळाचा रंग जाणे

*तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. या वाक्यातील अधोरेखित शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात येतो?*

A) सामान्यनाम ✅✅
B) विशेषनाम
C) सर्वनाम
D) भाववाचक नाम

*बँकेचा संबंध पैशांशी असतो या आधारावर वाहतुकीचा संबंध कशाशी असतो?*

A) हालचाल
B) कोंडी
C) माल ✅✅
D) रस्ते

*खालीलपैकी कोणते स्टेशन युनेस्कोचे हेरीटेज स्थळ म्हणून ओळखले जाते?*

A) चर्चगेट, मुंबई
B) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ✅✅
C) मुंबई सेन्ट्रल
D) लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला

*नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत?*

A) के. र. शिरवाडकर
B) भा. रा. तांबे
C) विजय तेंडूलकर
D) वि. वा. शिरवाडकर✅✅

*“पंधरा दिवसातून एकदा निघणारे” या अर्थाचा खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.*

A) वार्षिक
B) पाक्षिक ✅✅
C) दैनिक
D) साप्ताहिक

*सन १९३० मध्ये कोणत्या भौतिक शास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले?*

A) यापैकी नाही
B) सी. व्ही. रामण ✅✅
C) अमर्त्य सेन
D) डॉ. सुब्रमण्यम

*“अंबर” या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा*

A) अमर
B) अभंग
C) आकाश ✅✅
D) परमेश्वर

: *शाळा : मुख्याध्यापक :: वृत्तपत्र : ?*

A) संपादक ✅✅
B) बातमी
C) लेखक
D) अग्रलेख

*“विदुषी” हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे?*

A) हुशार
B) विद्वान ✅✅
C) मुर्ख
D) विदुषक

*“कवी” या शब्दाचे अनेकवचन ……..*

A) कवयित्री
B) कवी ✅
C) राजकवी
D) महाकवी

*होमरूल चळवळ ही खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे?*

A) गोपाळ आगरकर
B) अॅनी बेझंट ✅✅
C) दादाभाई नौरोजी
D) महात्मा गांधी

*खालील चार शब्दांपैकी एकमेकांशी संबंधित असून एक शब्द वेगळा आहे ते शोधा.*

A) गाजीयाबाद
B) वाराणसी
C) भागलपूर ✅✅
D) गोरखपूर

*“शकुंतलम” हे काव्य खालीलपैकी कोणी रचले आहे?*

A) वल्लभदास
B) कालिदास✅✅
C) रामदास
D) गोविंददास

करोना विषाणू म्हणजे काय

- करोना हे विषाणूच्या एका समूहाचे नाव असून माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये आढळतो. साध्या सर्दी-खोकल्यापासून ते सार्स किंवा मर्ससारख्या गंभीर आजारांसाठी करोना विषाणू कारणीभूत असतात.
- चीनमधील वुहान शहरात आढळलेला करोना विषाणू यापूर्वी माणसामध्ये आढळलेल्या सहा-सात विषाणूंपेक्षा वेगळा आहे. म्हणून याला नोवेल करोना विषाणू असे म्हटले आहे.

● या आजाराची लक्षणे काय?

- मुख्यत्वे श्वसनसंस्थेशी निगडित लक्षणे असतात. सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारासारखीच लक्षणे असून सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, न्युमोनिया, काही वेळ मूत्रपिंड निकामी होणे प्रामुख्याने आढळते.

● धोकादायक आहे का?

- श्वसनाशी निगडित संसर्गाप्रमाणे करोनाची लक्षणे आहेत. कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर व्यक्ती पूर्णपणे बरी होऊ  शकते. रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्यास विषाणूची बाधा झाली तरी धोकादायक परिस्थिती उद्भवण्याची शक्यता कमी असते. 
- ज्येष्ठ व्यक्ती, तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह असलेल्या व्यक्ती यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना बाधा होण्याची शक्यता असते.

● अशी काळजी घ्या

- श्वसनसंस्थेचे आजार असलेल्या व्यक्तींशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची खबरदारी घेणे
- हात वारंवार धुणे
- शिंकताना आणि खोकताना नाका-तोंडावर रुमाल धरणे
- अर्धवट शिजलेले, कच्चे मांस खाऊ  नये
- फळे, भाज्या न धुता खाऊ  नये

● कोणी विशेष काळजी घ्यावी?

- श्वसनाचा त्रास असणारे.
- वरील लक्षणे कोणत्या आजारामुळे आहेत हे स्पष्ट होत नसल्यास व रुग्णाने बाधित देशातून प्रवास केला असल्यास.
- प्रतिकारशक्ती कमी असलेल्या आणि बाधित देशात नुकताच प्रवास केला असल्यास अशा व्यक्तींनी तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.

● यावर औषध आहे का?

- करोना विषाणूवर मात करण्यासाठी सध्या तरी औषध उपलब्ध नाही. रुग्णांना त्यांच्या लक्षणानुसार औषधे दिली जात आहेत.
- रोगप्रतिकारकशक्ती अधिक चांगल्या रीतीने कार्यरत असल्यास अन्य इन्फ्लुएन्झाप्रमाणे या विषाणूशी शरीर योग्य रीतीने सामना करते आणि रुग्ण बरा होतो.
- केरळमध्ये या विषाणूची बाधा झालेल्या दोन्ही विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली असून ती सुधारत आहे.

● आजार पसरतो कसा?

- करोना विषाणूचे मूळ स्थान प्राणीजगतात आहे. यापूर्वी चीन आणि सौदी अरेबियामध्ये दोन प्रकारचे करोना विषाणू प्राण्यांमधून माणसामध्ये पसरल्याचे आढळले आहे.  मात्र प्राण्यांमध्ये आढळणारे इतर प्रकारचे करोना विषाणू अद्याप तरी माणसामध्ये पसरलेले नाहीत.
- नोवेल करोना विषाणूचा स्रोत अजून तरी सापडलेला नाही. परंतु याचा अर्थ असा नव्हे की कोणत्याही प्राण्यापासून किंवा पाळीव प्राण्यापासून याची तुम्हाला बाधा होईल.
- रुग्णांना उपचार देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही याची बाधा झाल्याचे चीनमध्ये आढळून आले आहे. या विषाणूचा प्रसार सर्वसाधारणपणे हवेतून शिंकण्या, खोकल्यावाटे पसरत असून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होण्याची शक्यता असल्याचे सिद्ध झाले आहे. 
- चीन किंवा अन्य बाधित देशातून आलेल्या व्यक्तींना करोनाची बाधा होण्याचा संभव असला तरी होईलच असे नाही.

● मास्क वापरणे गरजेचे आहे का?

- कोरोनाची भीती वाढल्याने जिकडेतिकडे व्यक्ती मास्क घालून फिरताना दिसत आहेत. काही व्यक्ती तर एन९५ प्रकारचे मास्क वापरतानाही आढळले आहेत.
- एन ९५ मास्क हे केवळ वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यक्तींनी वापरावेत. विषाणूबाधित व्यक्तींच्या संपर्कात अधिक काळ असल्याने त्यांच्यासाठीही हे मास्क आहेत.

● उपचाराच्या काय सुविधा आहेत?

- चीन आणि व्यतिरिक्त करोनाचे रुग्ण आढळलेल्या १२ देशांमधून प्रवासी भारतात आल्यास आणि करोनाची संभाव्य लक्षणे आढळल्यास त्याला विलगीकरण कक्षामध्ये १४ दिवसासाठी ठेवले जाते.
- तपासण्या निगेटिव्ह आलेल्या आणि घरी सोडलेल्या प्रवाशांची स्थानिक आरोग्य अधिकारयामार्फत २१ दिवस दररोज पाठपुरावा केला जातो. जेणेकरून १४ दिवसानंतर कोणत्या प्रवाशाला लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार केले जावेत.

● तपासण्या आणि विलीगिकरण कक्ष कुठे आहेत?

- राज्यात मुंबईमध्ये कस्तुरबा रुग्णालयात आणि पुण्यात राष्ट्रीय विषाणू विज्ञान (एनआयव्ही) संस्थेमध्ये करोनाची तपासणी केली जाते.
- तसेच कस्तुरबा रुग्णालयासह पुण्यातील नायडू आणि राज्यातील जिल्हा रुग्णालयामध्ये विलीगीकरण कक्ष कार्यरत आहेत

गालफुगी

गालगुंड किंवा गालफुगी(Mumps) हा सर्वसाधारणपणे लहान मुलांच्या लाळ ग्रंथींना होणारा विषाणूजन्य आजार आहे. बहुधा दोन्ही गालामध्ये येणारी दुखरी सूज हे त्याचे लक्षण. एका गालास आलेली सूज आणि सूज ना येणे अशी दोन्ही पर्याय कधी कधी आढळतात. पॅरोटायटिस असे त्याचे इंग्रजी नाव आहे. गालामधील लाळग्रंथीना पॅरोटिड ग्लँड असे म्हणतात. त्यामुळे हे नाव. त्याचे मम्स हे नाव ओल्ड इंग्लिशमध्ये गालामधील फुगण्याला वापरलेल्या शब्दावरून आले आहे.

वर्णनसंपादन करा

झपाट्याने संसर्ग होणारा हा आजार शाळेमध्ये जाणाऱ्या लहान मुलांमध्ये झपाट्याने पसरतो. गालफुगी हा गोवराइतका संसर्गजन्य नाही. एके काळी गालफुगी हा सामान्यपणे सर्वत्र आढळणारा आजार होता. सार्वत्रिक लसीकरणानंतर याचे प्रमाण कमी झाले आहे. चार ते सात या वयात तो साधारणपणे आढळतो. भारतातील दर एक लाख मुलांमधील त्याचे १९४१ मधील प्रमाण दररोज २५० नवे रुग्ण असे होते. गालफुगीच्या लसीचा वापर सुरू झाल्यानंतर हे प्रमाण ७६ एवढे कमी झाले. गालफुगीची लस प्रचलित झाल्याने गालफुगीच्या रुग्णामध्ये खूपच घट झाली. १९८७मध्ये काही राज्यांमध्ये गालफुगीच्या रुग्णामध्ये पाच पटीने वाढ झाली होती. याचे कारण शाळेमध्ये लसीकरणामध्ये झालेले दुर्लक्ष. १९९६ पासून शाळेतील मुलांमध्ये १००% लसीकरणाची मोहीम राबवल्याने सीडीसी (सेंटर फॉर डिसीज कंट्रोल- यू एस ) च्या रिपोर्ट प्रमाणे देशभरात फक्त ७५१ नवे रुग्ण आढळले. (दर पन्नास लाखात एक ).

कारण आणि लक्षणेसंपादन करा

पॅरामिक्सोव्हायरस नावाच्या लाळेमधील विषाणूमुळे गालगुंड होतो. गालगुंड झालेल्या व्यक्तीच्या शिंकणे आणि खोकल्यामधून याचा प्रसार होतो. एकदा व्यक्ती विषाणूच्या संपर्कात आली म्हणजे बारा ते पंधरा दिवसाने गालगुंडाची लक्षणे दिसतात. संसर्गाची प्राथमिक लक्षणे म्हणजे थंडी वाजून येणे, डोकेदुखी, भूक ना लागणे आणि निरुत्साह. कधी कधी संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये यातील कोणतेही लक्षण दिसत नाही. लक्षणे दिसू लागल्यानंतर बारा ते चोवीस तासात गालगुंड झाल्याचे आढळते. अन्न चावण्यास आणि गिळण्यास त्रास होतो. त्यातल्या त्यात आम्लयुक्त पदार्थ गिळताना अधिक त्रास होतो. ताप ४० सें (१०४ फॅ) पर्यंत असतो. दुसऱ्या दिवशी गालाची सूज वाढते. सातव्या दिवशी सूज पूर्णपणे उतरते. एकदा गालगुंड झाले म्हणजे रुग्णामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि परत गालगुंडाचा त्रास होत नाही. बहुतेक रुग्णामध्ये होणारा आजार गुंतागुंतीशिवाय बरा होतो. आजार मोठ्या व्यक्तीस झाला म्हणजे गुंतागुंत होण्याची शक्यता असते. १५% रुग्णामध्ये मेंदू आणि मज्जारज्जूचा दाह- मेनेंजायटिस होतो.

Latest post

संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नसंच

1.पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात अतिशूरपणे दीर्घकाळ कोण लढले? तात्या टोपे राणी लक्ष्मीबाई शिवाजी महाराज नानासाहेब पेशवे उत्तर : तात...