Sunday 11 August 2019

विक्रम साराभाई



भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ

भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार

जन्मदिन - १२ ऑगस्ट, १९१९
 
विक्रम अंबालाल साराभाई (गुजराती: વિક્રમ અંબાલાલ સારાભાઇ) (१२ ऑगस्ट, इ.स. १९१९ - ३० डिसेंबर, इ.स. १९७१) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.

बालपण व शिक्षण :-

विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म अमदाबाद येथील एका संपन्न कुटूंबात ऑगस्ट १२ १९१९ ला झाला. त्यांचे वडील हे एक उद्योगपती होते. त्यांचे बऱ्याच राजकीय व्यक्तिंशी त्यांचे संबध असल्याने रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी आदी लोकांचे त्यांच्या घरी जाणे-येणे होते. विक्रम साराभाई यांच्या आई सरलादेवी यांनी आपल्या ८ मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःची मांटेसरी पद्धतीची शाळा काढली होती. या शाळेतच विक्रम साराभाईचे शिक्षण युरोपातून आलेल्या शिक्षकांद्वारे झाले. त्याना लहानपणापासुनच गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय विशेष आवडत होते.
आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण आटपून १९३७ साली पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. पण दुसरे महायुद्ध सुरु झाल्याने ते भारतात परत आले व त्यांनी बंगलोरमधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स मध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणावर संशोधन केले.

१९४२ साली त्यांनी भरतनाट्यम, कुचिपुडी या नृत्यकलेत पारंगत असलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांच्याशी विवाह केला. त्यांना कार्तिकेय आणि मल्लिका ही दोन अपत्ये झाली.

कारकीर्द:-

१९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. १९४७ साली त्यानी ‘कास्मिक रे इंवेस्टिगेशन इन ट्रापिकल लैटीट्यूड्स’ वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याचवर्षी ते आपल्या मायदेशी परत आले.

भारतात परत येउन त्यांनी नोव्हेंबर ११ १९४७ला अहमदाबाद येथे भौतिकी संशोधन कार्यशाळा ची स्थापना केली. हे त्यांचे पहिले पाउल होते, पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली.

विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे.

विक्रम साराभाई यांनी जागतिक किर्ती असलेल्या अनेक सस्थांची सुरवात केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट (IIM) ही भारतातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन शिक्षण संस्था डाॅ. साराभाई यांच्या प्रयत्नातुनच उभी राहिली. भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (PRL) देखिल डाॅ. साराभाई यांनीच सुरू केली.

अहमदाबाद येथे वस्त्रोद्योग निर्मितीस चालना देणारे अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्रीयल रिसर्च असोसिएशन (ATIRA) या संस्थेची उभारणी त्यांनी केली. पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेली सेंटर फॅार इन्व्हीरॅान्मेंटल प्लॅनिंग ॲन्ड टेक्नॅालॅाजी (CEPT) ही संस्था देखिल त्यांनी उभारली.

✅एका ओळीत सारांश, 12 ऑगस्ट 2019✅✅

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी तसेच स्टार्टअप्स उद्योगांसाठी तयार करण्यात आलेले भारताचे प्रथम कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड - फ्रीडम कार्ड (एनकॅश कंपनीचे).

👉मास्टरकार्डद्वारे समर्थित असलेले हेल्थकॅश या संकल्पनेसह को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड तयार करणारी संस्था - RBL बँक आणि प्रॅक्टो कंपनी.

🌹🌳🌴पर्यावरण🌴🌳🌹

👉नव्याने शोधला गेलेला तलाव जो जगातला सर्वाधिक उंच ठिकाणी असलेला तलाव आहे - काजिन सारा तलाव (नेपाळच्या मानंग जिल्ह्यात सिंगारखारका येथे समुद्रसपाटीपासून 5,200 मीटर उंचीवर असलेला 1,500 मीटर लांबीचा आणि 600 मीटर रुंद तलाव).

👉आता, जगातला द्वितीय क्रमांकाचा सर्वाधिक उंच ठिकाणी असलेला तलाव - तिलीचो तलाव(नेपाळमध्ये समुद्रसपाटीपासून 4919 मीटर उंचीवर असलेला 4 किमी लांबीचा आणि 1.2 किमी रुंद आणि सुमारे 200 मीटर खोल तलाव).

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉CREDAI आणि CBRE या संस्थांच्या अहवालाच्या मते, युनिकॉर्न स्टार्टअप उद्योग तयार करण्याच्या बाबतीत जगातला प्रथम क्रमांकाचा देश – संयुक्त राज्ये अमेरीका.

🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹

👉CREDAI आणि CBRE या संस्थांच्या अहवालाच्या मते, स्टार्टअप उद्योगांच्या संख्येच्या बाबतीत भारताचा जगातला क्रमांक – तिसरा.

👉CREDAI आणि CBRE या संस्थांच्या अहवालाच्या मते, युनिकॉर्न स्टार्टअप उद्योग तयार करण्याच्या बाबतीत भारताचा जगातला क्रमांक - चौथा.

👉‘लवाद व समन्वय (दुरुस्ती) कायदा-2019’ यामधल्या तरतुदींनुसार स्थापना करण्यात येणार्‍या लवाद परिषदेचे अध्यक्ष – भारतीय प्रधान न्यायाधीश (CJI).

👉‘बिल्डिंग बेटर कोट्स: सर्वेयींग इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ इंडियाज डिस्ट्रिक्ट कोर्ट्स’ या अहवालानुसार, जिल्हा न्यायालय संकुलात उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांच्या बाबतीत देशात प्रथम क्रमांक - चंदीगड (त्यानंतर दिल्ली).

🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹

👉2018-19 सालासाठी युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन (UEFA) याच्या 'गोल ऑफ द सीझन अवॉर्ड' या पुरस्काराचा विजेता - लिओनेल मेस्सी.

🌹🌳🌴राज्य विशेष🌴🌳🌹

👉‘बिल्डिंग बेटर कोट्स: सर्वेयींग इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ इंडियाज डिस्ट्रिक्ट कोर्ट्स’ या अहवालानुसार, जिल्हा न्यायालय संकुलात उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांच्या बाबतीत देशात महाराष्ट्राचा क्रमांक – 18 वा.

🌹🌳🌴विज्ञान व तंत्रज्ञान🌴🌳🌹

👉“HarmonyOS” (किंवा चीनी भाषेत हाँगमेंग) या नावाने चीनचे स्वतःचे ऑपरेटिंग सिस्टम तयार करणारी कंपनी - हुवेई.

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (CREDAI) याचे स्थापना वर्ष -  सन 1999.

👉युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन (UEFA) – स्थापना वर्ष: सन 1954; मुख्यालय: न्यॉन, स्वित्झर्लंड.

👉स्वातंत्र्यानंतर भारताचे प्रथम प्रधान न्यायाधीश - हरीलाल जेकिसुनदास कानिया (14 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950).

👉फेडरल कोर्ट ऑफ इंडिया (स्वातंत्र्यापूर्वी) येथे प्रथम प्रधान न्यायाधीश - मॉरिस ग्वेयर (1 ऑक्टोबर 1937 ते 25 एप्रिल 1943).

👉फेडरल कोर्ट ऑफ इंडिया येथे प्रथम भारतीय प्रधान न्यायाधीश - श्रीनिवास वरदाचारीयर (25 एप्रिल 1943 ते 7 जून 1943).

👉वर्तमानातले भारताचे प्रधान न्यायाधीश - रंजन गोगोई(3 ऑक्टोबर 2018 पासून).

🌺🌺गेल्या १७ वर्षांत यंदा राज्यसभेची कामगिरी ठरली सर्वोत्कृष्ट; तब्बल ३१ विधेयके मंजूर🌺🌺

🔰गेल्या १७ वर्षात यंदा पहिल्यांदाच राज्यसभेची कामगिरी ही सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे. कारण, बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी राज्यसभेकडे मंजुरीसाठी आलेल्या ३३ विधेयकांपैकी तब्बल ३१ विधेयके मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे सुमारे १०५ टक्क्यांनी विधेयकांच्या मंजुरी प्रमाणात वाढ नोंदवली गेली आहे.

🔰या मंजूर विधेयकांमध्ये जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक २०१९, मुस्लिम महिलांचे वैवाहिक हक्क संरक्षण विधेयक २०१९ (तिहेरी तलाक) या महत्वाच्या विधेयकांचा समावेश आहे. या अधिवेशनाचा कार्यकाळ संपताना राज्यसभेचे सभापती एम. वैंकय्या नायडू यांनी सांगितले की, गेल्या पाच अधिवेशनांमध्ये सभागृहाची मंजुरी क्षमता ही ७.४४ टक्क्यांहून ६५.६० टक्क्यांवर पोहोचली. गेल्या पाच वर्षातील ही आकडेवारी १०० टक्क्यांहून अधिक आहे.

🔰या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेत ३६ तर राज्यसभेत ३१ विधेयके मंजूर झाली आहेत. ही ३१ विधेयके ३५ बैठकांमध्ये मंजूर करून घेण्यात आली. राज्यसभेची ही गेल्या १७ वर्षातली सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे. एकूण ५२ सत्रांमध्ये ही कामगिरी केली गेली. २४९ सत्रांपैकी कामकाजाचे अडीज दिवस हे गोंधळामुळे वाया गेले, यामध्ये सभागृहाच्या कामकाजाची १९ तास १२ मिनिटे वायाला गेली.

🔰नायडू म्हणाले, या अधिवेशनात मंजूर झालेली विधेयके ही देशात सामाजीक, आर्थिक आणि भौगोलिकदृष्ट्या परिणाम करणारी महत्वाची विधेयके होती. यांपैकी तिहेरी तलाक विधेयक जे गेल्या ६० वर्षांत हिंदू कोड बिलानंतर मंजूर झालेले सर्वाधिक महत्वाचे सामाजीक सुधारणा विधेयक होते. त्याचबरोबर जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक हे देखील एक ऐतिहासिक विधेयक होते.

📚 *चालू घडामोडी (11/08/2019)*📚


▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा*

● 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची नवी दिल्ली येथे घोषणा करण्यात आली.

● ‘हेलारो’  या गुजराती चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला.

● ‘भोंगा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला.

● मराठी चित्रपट ‘पाणी’ ला पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार

● ‘बधाई हो’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार पटकावला.

● हिंदी चित्रपट ‘पॅड मॅन’ ला सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषित करण्यात आले.

● ‘अंधाधुन’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला.

●  ‘ओंदला एर्दला’ या कन्नड चित्रपटाला राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा नर्गीस दत्त पुरस्कार जाहीर झाला.

● ‘पाणी’ या मराठी चित्रपटाला पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरवण्यात आले.

● ‘नाळ’ या मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यांना सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा इंदिरा गांधी पुरस्कार जाहीर झाला. या चित्रपटातल्या भूमिकेसाठी श्रीनिवास पोकळेला सर्वोत्कृष्ट बालकलाकार ठरवण्यात आले.

● ‘चुंबक’ या मराठी चित्रपटासाठी स्वानंद किरकिरे यांना सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला.

● ‘आई शप्पथ’ साठी दिग्दर्शक गौतम वझे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

● ‘आयुष्मान खुराणा आणि विकी कौशल यांना ‘अंधाधुन’ आणि ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटातल्या भूमिकांबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा संयुक्त पुरस्कार जाहीर झाला.

● तेलगू चित्रपट ‘महानती’ मधील भूमिकेसाठी किर्ती सुरेश या अभिनेत्रीला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला.

● ‘उरी’ या चित्रपटासाठी आदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

___________________________
      
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *आरबीआयच्या रेपो दरात कपात*

◆ सहा सदस्यीय पत धोरण समितीने (MPC) बुधवारी रेपो दरात ०.३५ टक्क्यांची कपात करून तो ५.४० टक्के केला तर रिव्हर्स रेपो दर ५.१५ टक्के केला.

◆ ही आरबीआयने केलेली सलग चौथी कपात आहे.रेपो दर (तो व्याज दर, ज्यावर आरबीआय व्यावसायिक बँकांना कर्ज देते) ५.७५ टक्के होता, जो सप्टेंबर २०१० नंतरचा सर्वात कमी दर होता.

◆ त्यानंतर आरबीआयने तीन वेळा रेपो दर ०.७५ टक्के केला. यामुळे कर्ज स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *​लेखिका टोनी मॉरिसन यांचे निधन

• आधुनिक साहित्याच्या जनक मानल्या गेलेल्या, नोबेल पुरस्कारप्राप्त लेखिका टोनी मॉरिसन यांचे अल्प आजाराने सोमवारी रात्री येथे निधन झाले.

• त्या ८८ वर्षांच्या होत्या. बिलव्ह्ड, साँग ऑफ सोलोमन यांसारख्या त्यांच्या कादंबऱ्यांना मोठ्या प्रमाणावर वाचकांची पसंती मिळाली.

• वंशांच्या सीमा सांभाळतानाही स्वातंत्र्याचा केलेला व स्वप्नवत वाटणारा पुरस्कार हे त्यांच्या कादंबऱ्यांचे वैशिष्ट्य होते.

• मॉरिसन यांच्या निधनाचे वृत्त त्यांचे प्रकाशक आल्फ्रेड नॉफ यांनी जाहीर केले.

• टोनी मॉरिसन यांनी 'दि ब्लूएस्ट आय' ही पहिली कादंबरी त्यांच्या चाळीसाव्या वर्षी लिहिली.
https://t.me/TargetMpscMh
• वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत त्यांच्या सहा कादंबऱ्या गाजत होत्या. 'व्हिजनरी फोर्स' या त्यांच्या साहित्यकृतीला 1993 मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला.

• साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला ठरल्या.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2019*

● सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - भोंगा
● सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- अंधाधुन
● सर्वोत्कृष्ट अभिनेता – आयुषमान खुराना (अंधाधुन), विकी कौशल (उरी)
● सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - किर्ती सुरेश (महानटी)
● सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - स्वानंद किरकिरे (चुंबक)
●  सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - सुरेखा सिक्री (बधाई हो)
● सर्वोत्कृष्ट बालकलाकार - श्रीनिवास पोकळे (नाळ)
● सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - आदित्य धर (उरी)
● सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक –सुधाकर रेड्डी यंकट्टी(नाळ)
●  सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - संजय लीला भन्साळी (पद्मावत)
● सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - अरिजीत सिंग (पद्मावतमधील बिंते दिल गाण्यासाठी)
● सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - बिंदू मनी
●  सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन- कृती महेश मिद्या आणि ज्योती तोमर (पद्मावत चित्रपटातील घूमर गाण्यासाठी)
● सर्वोत्कृष्ट अॅक्शन चित्रपट - केजीएफ
● सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट - बधाई हो
● सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट - पॅडमॅन

Latest post

रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera)

📌हे सर्वांत साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना 'स्पंज' म्हणतात.  ➡️त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद...