28 June 2024

सरकारिया आयोगाच्या शिफारशी

🎯मख्यमंत्र्याची निवड करताना राज्यपालाने पुढील तत्त्वे लक्षात घ्यावीत.


📌(१) ज्या पक्षाला किंवा पक्षांच्या आघाडीला विधानसभेत जास्तीत जास्त पाठिंबा आहे असे राज्यपालास वाटेल त्या पक्षाच्या किंवा आघाडीच्या नेत्याला राज्यपालाने मंत्रिमंडळ बनविण्यास सांगावे.

📌(२) राज्यपालास जी धोरणे मान्य आहेत ती अमलात आणण्यास तयार असलेले मंत्रिमंडळ बनवण्याचा राज्यपालाने प्रयत्न करू नये. राज्यात लोकप्रतिनिधींचे मंत्रिमंडळ अधिकारारूढ होईल अशी व्यवस्था करणे हे त्याचे काम आहे.

📌(३) कोणत्याच पक्षाला किंवा आघाडीला काठावरचे किंवा साधे बहुमतही मिळालेले नसते तेव्हा 'त्रिशंकू' विधानसभा अस्तित्वात येते. अशा परिस्थितीत ज्या पक्षाचे किंवा निवडणुकीपूर्वी तयार झालेल्या आघाडीचे विधानसभेत संख्याबळ इतर पक्षांच्या किंवा आघाडीच्या आमदारांच्या संख्याबळापेक्षा जास्त असेल त्या पक्षाच्या किंवा आघाडीच्या नेत्याला आवश्यक त्या किमान बहुमतासाठी 'स्वतंत्र' किंवा 'अपक्ष" म्हणून निवडून आलेल्या आमदारांचा पाठिंबा मिळवून मंत्रिमंडळ बनवण्याचा दावा करता येईल.

📌(४) निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आघाडी बनवली असेल, तर तीत सहभागी झालेल्या सर्व पक्षांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देता येईल. 

📌(५) निवडणुकीनंतर अस्तित्वात आलेल्या आघाडीने बनवलेल्या मंत्रिमंडळास आघाडीतील काही घटकपक्ष तसेच अपक्ष किंवा स्वतंत्र उमेदवार बाहेरून पाठिंबा देतील तर काही घटकपक्षांचे प्रतिनिधी मंत्रिमंडळात सामील होतील.

📌(६) राज्यपालाने निवडलेल्या मुख्यमंत्र्याला विधानसभेत साध्या किंवा काठावरच्या बहुमताचाही पाठिंबा नसल्यास त्याने ३० दिवसांच्या मुदतीत विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव मांडावा. तो एक मत जास्त मिळाल्यामुळे पारित झाला तरी त्याचे मंत्रिमंडळ अधिकारावर राहू शकते.

📌(७) आपण निवडलेल्या मुख्यमंत्र्याला बहुमताचा पाठिंबा आहे की नाही ते राज्यपालाने पुढाकार घेऊन विधानसभेबाहेर म्हणजे उदाहरणार्थ- राजभवनात आमदारांची ओळखपरेड आयोजित करून निश्चित करण्याचा धोका पत्करू नये. बहुमताचा पाठिंबा आहे की नाही हे ठरवण्याची एकच जागा म्हणजे विधानसभा!

पोलीस भरती प्रश्नसंच


1. लोकसभापतीची निवड कोण करतो/करते?

लोकसभा सदस्य ✅

मंत्रिमंडळ

राज्यसभा सदस्य

राष्ट्रपती


2. घटक राज्यातील वरिष्ठ सभागृह कोणते?

विधानसभा ✅

विधानपरिषद

लोकसभा

राज्यसभा


3. भारतीय राज्यघटनेच्या ................ कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेत आहे?

१९ ते २२ ✅

३१ ते ३५

२२ ते २४

३१ ते ५१


4. केंद्रीय मंत्रीमंडळातील एखादा सदस्य संसदेंच्या कोणत्याही गृहाचा सदस्य नसेल तर शपथ ग्रहण केल्यापासून --------- त्यासा कोणत्याही एका गृहाचे सदस्यत्व मिळविणे बंधनकारक आहे?

तीन महिन्याच्या आत 

सहा महिन्याच्या आत✅

एका न्यायालयाची आत

पाच वर्षाच्या आत


 

5. महाराष्ट्राच्या विधानसभेची एकूण सभासद संख्या किती आहे?

२७० 

२८८

२८९✅

२९०


6. संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे ---------- मानले आहेत.

घटनात्मक प्रमुख 

कार्यकारी प्रमुख

तिन्ही दलाचे प्रमुख

यापैकी सर्व✅


7. भारताचे राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख असले तरी राष्ट्रपतीच्या अधिकाराचा वास्तविक वापर कोण करते?

संसद 

मंत्रीमंडळ✅

सरन्यायाधिश

उपराष्ट्रपती


8. सरन्यायाधीशाला आपल्या पद व गोपनियतेची शपथ कोण देतो?

निवृत्त होणारे सरन्यायाधीशा 

राष्ट्रपती✅

सर्वोच्च न्यायालयातीला कार्यकारी न्यायाधीश

पंतप्रधान


 

9. उपराष्ट्रपतीला पद व गोपनियतेची शपथ कोण देतात?

राष्ट्रपती ✅

पंतप्रधान

सरन्यायाधीश

लोकसभेचे सभापती


10. खालीलपैकी राज्यसूचीतील विषय कोणता?

संरक्षण 

तार

पोस्ट

जमिनमहसूल✅


11. शेतकऱ्यांनी पेरणी केली.

अपूर्ण भूतकाळ 

साधा भूतकाळ ✅

पूर्ण वर्तमानकाळ 

भविष्यकाळ


12. पुढील वाक्यातील मुळ विधेय कोणते? जयंतास घरी येण्यास उजाडले.

जयंतास  

घरी येण्यास ✅

घरी येण्यास उजाडले

उजाडले 


13. मोठ्या माणसाचा टिकाव कसा लागणार?

प्रश्नार्थक ✅

नकारार्थी

उद्गारार्थी

होकारार्थी


14. तुणतुणे वाजवणे-

तेच तेच पुन्हा पुन्हा सांगणे  ✅

स्तुती करणे

निंदा करणे

गाणे म्हणणे


 

15. ‘डोळ्यात अंजन घालणे’ म्हणजे –

 डोळ्यात काजळ घालणे  

चूक लक्षात आणून देणे ✅

डोळ्यात दुखापत होणे 

डोळे रागाने मोठे करून पाहणे 


16. पळाला म्हणून तो बचावला या वाक्यातील म्हणून हे कोणते अव्यय आहे?

स्वरूपदर्शक  ✅

हेतू दर्शक 

कारण दर्शक

संकेत दर्शक


17. सैनिकाने बंदूकीने शत्रुचा प्राण घेतला

प्रथमा 

व्दितीय

तृतीया✅

चतुर्थी


18. विरूध्दार्थी लिंग ओळखा (बोका)

भाटी ✅

बोकी 

बोके

यापैकी नाही


 

19. संकेतार्थी वाक्य ओळखा

पाऊस पडला आणि हवेत गारवा आला 

पाऊस पडला तर हवेत गारवा येईल✅

हवेत गारवा येण्यासाठी पाऊस पडावा

हवेत गारवा येण्यासाठी मेघा पाऊस पाड


20. कवी

कवयित्री ✅

कवित्री

कवियत्री

कवियित्री


21. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा 

1, 11, 29 ____, 89.

46 

55✅

57

63


22.जर शिक्षक दिन दुधवारी आला असेल तर त्याच वर्षात गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल?

मंगळवार ✅

बुधवार

गुरुवार

शनिवार


23.  एका सांकेतिक लिपीमध्ये MUMBAI हे LVLCZJ असे लिहितात तर SOLAPUR हे कसे लिहाल?

TPLBQVS 

MBQVSTP

TPMBSVQS

RPKBOVQ✅


24. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा

ab _, bca, _, abc

abbc 

cbca

cacb

cabc✅


 

25. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा 

3, 24, 81,192, ____.

348 

375✅

384

378


26.एका सांकेतिक लिपीत SUITINGS हा शब्द SGNITIUS असा लिहितात तर SHIRTING हा शब्द कसा लिहील?

GNIRHTSI 

GNITRISHII

SGNIRTHI

GNITRIHS✅


27.राधाने एका स्पर्धा परिक्षेत 100 प्रश्न सोडविले बरोबर उतरासाठी 3 गुण दिले जातात आणि चुकीच्या उतरासाठी 2 गुण 100 गुण मिळाले तर त्याच्या बरोबर उतरांची संख्या किती?

60 ✅

65

70

75


28.जर एका सांकेतिक भाषेत 3 = N, 5 = C, 7 = E, 9 = A, 11 = R, 13 = Y तर NEAR = ?

37911 ✅

11973

79113

97113


 

29. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा 

1, 9, 25, 49,?

69 

64

81

100✅


30. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा

ad _, cdb _, adh _

a, a, cc 

bb, cc

bc, a, c✅

dd, cc

गरामपंचायतीच्या सभासदांची पात्रता.



1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याला 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत.

3. त्याचे गावच्या मतदान यादीत नाव असावे.

🅾️गरामपंचायतीचे विसर्जन : विसर्जित झाल्यापासून सहा महिन्याच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे तिच्या राहिलेल्या कालावधीसाठी पुढे काम करणे.

🅾️सरपंच व उपसरपंच यांची निवड : निवडून आलेल्या सदस्यांमधूनच ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेच्या वेळी केले जाते.

🅾️सरपंच व उपसरपंचाचा कार्यकाल : 5 वर्ष इतका असतो परंतु त्यापूर्वी ते आपला राजीनामा देतात.

🧩राजीनामा :

🅾️सरपंच - पंचायत समितीच्या सभापतीकडे देतो.

🅾️उपसरपंच - सरपंचाकडे

🅾️निवडणुकीच्या वेळी वाद निर्माण झाल्यास :

🅾️सरपंच-उपसरपंचाची निवड झाल्यापासून 15 दिवसांच्या आत जिल्हाधिकार्‍याकडे तक्रार करावी लागते व त्यांनी दिलेल्या निर्णयानंतर त्याविरोधी 15 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करावी लागते.

🧩अविश्वासाचा ठराव :

🅾️सरपंच आणि उपसरपंचाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही व तो फेटाळला गेल्यास पुन्हा त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.

🅾️बठक : एका वर्षात 12 बैठका होतात (म्हणजे प्रत्येक महिन्याला एक)

🅾️अध्यक्ष : सरपंच असतो नसेल तर उपसरपंच

🅾️तपासणी : कमीत कमी विस्तारात अधिक दर्जाच्या व्यक्तीकडून तपासणी केली जाते.

🅾️अदाजपत्रक : सरपंच तयार करतो व त्याला मान्यता पंचायत समितीची घ्यावी लागते.

🅾️आर्थिक तपासणी : लोकल फंड विभागाकडून केली जाते.

आजचे प्रश्नसंच

 .......... साली भारताच्या गव्हर्नर जनरल ने भारत सरकारचे सचिवालय बंगालच्या सरकारपासून वेगळे केले..

A. 1835

B. 1839

C. 1843✔️

D. 1848


योग्य कोणते.

1.. भारतातील सचिवालय ही ब्रिटन मधील व्हाईट हॉल व्यवस्थेपेक्षा निराळी आहे.

2. धोरण बनविणे आणि त्याची अंबलबजावणी करणे या दोहांची जबाबदारी ब्रिटन मध्ये मंत्रालयावर असते.

A. Tt✔️

B. Tf

C. Ft

D. Ff

 

............ मध्ये केंद्र सरकारमधील कामकाजाच्या पद्धतीत "डेस्क ऑफिसर सिस्टम" लागू केली.

A. १९४७

B.१९६१

C. १९७३✔️

D. १९७६



........... याने पोर्टफोलिओ पद्धत सुरू केली.

A. लॉर्ड बेंटिक

B. लॉर्ड डलहौसी

C. लॉर्ड कॅंनिंग✔️

D. लॉर्ड कर्जन



पदावधी व्यवस्था कोणी सुरू केली..

A. लॉर्ड बेंटिक

B. लॉर्ड डलहौसी

C. लॉर्ड कॅंनिंग

D. लॉर्ड कर्जन

१९४७ साली केंद्रीय सचिवालय मध्ये .....

खाती होती.

A. १५

B. १८✔️

C. १९

D. २१


........... हा शाखेचा प्रमुख असतो म्हणून त्याला शाखा अधिकारी असे संबोधले जाते.

A. सचिव

B. उपसचिव

C. अवर सचिव✔️

D. सह सचिव


योग्य कोणते.

1.. भारतातील कॅबिनेट साचिवाचे पद १९५० मध्ये निर्मिले गेले.

2. एन.आर. पिल्लई हे पहिले मंत्रिमंडळ सचिव होते.

A. Tt✔️

B. Tf

C. Ft

D. Ff


1.जावेद अख्तर यांच्यासंबंधी विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.

अ) प्रसिद्ध संगीतकार आहेत 

ब) प्रसिद्ध गीतकार 

क) प्रसिद्ध गीतकार आहेत 

1) फक्त अ 

2) अ व ब

3) ब व क  ✔️✔️

4) फक्त ब

 

2. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने भारताचे सरन्यायाधिश उपराष्ट्रपती व राष्ट्रपती या तिन्ही पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे? 

1) व्ही. व्ही गिरी 

2) बी.डी.जत्ती

3) महमंद हिदायतुल्ला  ✔️✔️✔️

4) मिलम संजीव रेड्डी


3. २०१५ चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार  

1) कोर्ट  ✔️✔️✔️

2) पानासिंग तोमर 

3) शीप ऑफ थिसेस

4) आर्गो


4.

पंडित शंकर घोष यांच्यासंबंधी विधाने वाचा 

अ) घोष हे प्रसिद्ध सतारवादक होते.

ब) घोष हे किराणा घराण्यातील कलाकार होते 

क) घोष हे प्रसिद्ध तबलावादक होते.

वरीलपैकी सत्य विधान/न कोणते/ती?

1)  फक्त अ  

2)  अ व ब 

3)  ब व क 

4)  फक्त क ✔️✔️✔️



 

5. आनंदमठ या कादंबरीचे जनक कोण? 

1) बकिमचंद्र चॅटर्जी  ✔️✔️✔️

2) स्वींद्रनाथ टागोर

3) अरुणा असफ अली

4) धोंडो केशव कर्वे


6. प्रणव मुखर्जी हे भारताचे कितव्या क्रमांकाचे राष्ट्रपती आहेत? 

1) दहाव्या 

2) बाराव्या

3) तेराव्या ✔️✔️✔️

4) चौदाव्या


7. रिओ ऑलिम्पिक गॉल्फ साठी  किती देश पात्र आहेत? 

1) २४  ✔️✔️✔️

2) ३०

3) २५

4) १५


8. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नौदलाचे केंद्र (नेव्ह कमांड) नाही? 

1) मुंबई 

2) विशाखापदृणम

3) कोची

4) कन्याकुमारी ✔️✔️✔️

 

9.

जागतिक बँकेने भारताच्या स्वच्छभारत या उपक्रमासाठी पाठिंबा म्हणून कर्ज देण्याचे घोषित केले.

अ) स्वच्छ भारत अभियान हे २ ऑक्टोबर २०१४ रोजी सुरु झाले.

ब) या अभियानाची उदिष्टे २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

क) साज्यांचा उपक्रमात सहभाग असावा म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालय प्रयत्न करते.

वरील विधानांपैकी सत्य विधाने कोणती?

1)  अ व ब  ✔️✔️✔️

2)  ब व क 

3)  अ व क 

4)  वरील सर्व 


10. मराठी रंगभूमीचा पहिला प्रयोग कोठे सादर झाला? 

1) सातारा

2) पुणे

3) सांगली ✔️✔️✔️

4) कोहापूर                                                                                                                                                                                                                                                                  11.

जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक २०१५ संबंधी खालील विधाने विचारात घ्या 

अ) या निर्देशांकानुसार भारत हा श्रीलंकेपेक्षा वरच्या स्थानावर आहे.

ब) सार्क देशांपैकी पाकिस्तान या देशात सर्वात अधिक भ्रष्टाचार आदळून येतो.

1)  अ बरोबर ब चूक  ✔️✔️✔️

2) ब बरोबर अ चूक 

3) वरिल दोन्ही बरोबर 

4) वरिल दोन्ही चूक


12.

खालील विधाने वाचा 

अ) बीड जिल्हा हा जालना जिल्ह्याच्या सीमेवर नाही.

ब) जालना हा जिल्हा हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर नाही

क) बीड जिल्ह्याच्या सीमेवर उस्मानाबाद जिल्हा आहे.

वरीलपैकी सत्य विधान कोणते?

1)  अ व ब 

2)  ब व क  ✔️✔️✔️

3)  अ व क 

4)  वरील सर्व 


13. सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात केव्हा झाली?

1) २००० - २००१  ✔️✔️✔️

2) २००१ - २००२

3) २००२ - २००३

4) २००४ – २००५


14.

केप्लर हे काय आहे?

अ) अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासाने मंगळ ग्रहावर पाठविलेले अवकाशयान आहे.

ब) केप्लर यान नासाने २००९ मध्ये प्रक्षेपित केले

1)  अ बरोबर ब चूक  

2) ब बरोबर अ चूक ✔️✔️✔️

3) वरील दोन्ही बरोबर 

4) वरील दोन्ही चूक 


 

15. खालीलपैकी महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री कोण आहेत?

1) प्रकाश मेहता 

2) पंकजा मुंडे ✔️✔️✔️✔️

3) विष्णू सावरा

4) रामदास कदम


16.

नई मंझिल या केंद्रीय क्षेत्र योजनेसंबंधी विधाने वाचा.

अ) ही योजना अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालय राबविते.

ब) शिक्षण सोडलेल्या अल्पसंख्यांक युवकांना शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण देणे हा या योजनेमागचा उगेश आहे.

क) अल्पसंख्यांक मंत्री नज्मा हेत्पुल्ला यांनी ८ ऑगस्ट २०१५ रोजी पटना येथून या योजनेस सुरुवात केली.

वरीलपैकी चुकीचे विधान कोणते?

1)   अ व ब  

2)  ब व क 

3)  अ व क 

4)  कोणतेही नाही ✔️✔️✔️ 


17.

चैन सिंग या खेळाडूसंबंधी विधाने वाचा 

अ) चैनसिंग हा भारतीय सैन्याकडून खेळणारा नेमबाजीतील खेळाडू आहे.

ब) चैनसिंग याने ५९ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुबर्ण पदक जिंकले.

सुवर्ण पदक जिंकले.

1)   अ बरोबर, ब चूक  

2)  ब बरोबर, अ चूक 

3)  वरील दोन्ही बरोबर  ✔️✔️✔️

   4) वरील दोन्ही चूक 



18.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसंबंधी विधाने वाचा

अ) या योजेनेंर्ग्त रस्त्यांनी जोडले न गेलेले सर्व पात्र प्रामीण रस्ते जोडण्यात येणार

ब) ही योजना २०० साली सुरु केली गेली 

क) या योजनेंतर्गत ग्रामीण रस्ते जोडणीचे उगिष्ट २०२२ ऐवजी २०११ पर्यंतच पूर्ण करण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे.

वरीलपैकी चुकीचे विधाने कोणते.

1)   फक्त अ  

2)  फक्त ब

3)  ब व क 

4)  कोणतेही नाही ✔️✔️✔️

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? राष्ट्रपती राजवट केव्हा लागते?



एखाद्या राज्यातील शासनयंत्रणा कोलमडल्यास, घटनेप्रमाणे कारभार चालू शकणार नाही, अशी राज्यपालांची खात्री झाल्यास राज्यपाल तसा अहवाल राष्ट्रपतींना पाठवितात. त्या अहवालाबाबत खात्री झाल्यास राष्ट्रपती तेथील सरकार बडतर्फ करू शकतात.


कलम 356 नुसार, एखाद्या राज्यातील प्रशासन घटनात्मक पद्धतींने चालत नसल्यास राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येते.


पुन्हा निवडणूक होईपर्यंत तेथे राष्ट्रपती राजवट लागू केली जाते हा कालावधी 6 महिन्यापर्यंत वाढविता येतो.


राज्यात जास्तीत जास्त 3 वर्षे राष्ट्रपती राजवट लावू शकता येते. (भारतात प्रथम पंजाब राज्यात 1951 साली 356 कलम लावल्या गेले.)


राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्याचे सर्व अधिकार केंद्राचा प्रतिनिधी म्हणून राज्यपालांकडे एकवटतात.

राष्ट्रपती राजवटीच्या कालावधीत विधानसभा निलंबित अवस्थेत राहते. ती स्थापनही झाली नसेल तर तिचे गठनही निलंबित राहते.


राज्यपालांच्या मदतीसाठी तीन सनदी अधिकारी सल्लागार म्हणून काम करतात. राज्याचे सर्व प्रशासन राज्यपालांच्या अधिकार कक्षेत येते. विधानसभा जे कायदे करते ते कायदे संसदेत केले जातात.


संसदेच्या दोन्ही सभागृहांची संमती न मिळाल्यास राष्ट्रपती राजवट सहा महिन्यांनी संपुष्टात येते. संसदेची संमती घेऊन एका वेळी सहा महिने अशा प्रकारे जास्तीत जास्त तीन वर्षे राष्ट्रपती राजवट लागू राहू शकते. मात्र राष्ट्रपती राजवट एक वर्षाहून अधिक काळ लागू ठेवायची असेल तर संबंधित राज्यात निवडणूक घेणे शक्य नसल्याचे निवडणूक आयोगाचे प्रमाणपत्र सक्तीचे असते. देशात आधीपासूनच आणिबाणी पुकारलेली असेल तर एखाद्या राज्यातील राष्ट्रपती राजवट एक वर्षांहून जास्त काळ लागू ठेवता येऊ शकते.


राज्यातील शासन राज्यघटनेनुसार चालविता येण्यासारखी परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्याची खात्री झाल्याने राज्यपालांनी तशी शिफारस केल्यास लागू असलेली राष्ट्रपती राजवट केव्हाही संपुष्टात आणता येते. सरकार स्थापन न होऊ शकल्याने लावलेली राष्ट्रपती राजवट सरकार स्थापनेची शक्यता निर्माण होईल तेव्हा उठविता येते. लागू केलेली राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठी संसदेच्या संमतीची गरज नसते.


राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यपाल राजकीय पक्षांना बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलावू शकतात. सर्वांत जास्त संख्या असलेल्या किंवा बहुमताचा आकडा शक्य असलेल्या राजकीय पक्षांना सत्तास्थापनेचा दावा करता येतो. त्यांना ठराविक मुदत देऊन बहुमत सिद्ध करण्यास सांगितले जाते.


राष्ट्रपती राजवटीच्या काळात मंत्रिमंडळच नसते. त्यामुळे पालकमंत्री असण्याचा प्रश्नच नाही. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतात.


पंचायत_समिती



पंचायत समितीबद्दल संपूर्ण माहिती:


महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961, कलम क्र. 56 नुसार प्रत्येक तालुक्यासाठी एक पंचायत समिती निर्माण करण्यात आली आहे.

पंचायत राज्यातील मधला स्तऱ म्हणून पंचायत समितीला ओळखले जाते.

निवडणूक : प्रत्येक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.


सभासदांची पात्रता :

1. तो भारताचा नागरिक असावा

2. त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत.

3. त्या तालुक्यातील मतदान यादीत त्याचे नाव असावे.


आरक्षण :

1. महिलांना : 50 %

2. अनुसूचीत जाती/जमाती : लोकसंख्येच्या प्रमाणात (महिला 50%)

3. इतर मागासवर्ग : 27% (महिला 50%)


विसर्जन : 

राज्य सरकार करते व विसर्जन झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे.


कार्यकाल : 5 वर्ष


राजीनामा :

सभापती - जिल्हा परिषदेच्याअध्यक्षांकडे

उपसभापती - पंचायत समितीच्या सभापतीकडे 


त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास : 

30 दिवसांच्या आत जिल्हाधिकार्याकडे व त्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे.


मानधन : 

सभापती - दरमहा रु 10,000/- व इतर सुखसुविधा

उपसभापती - पंचायत समितीच्या सभापतीकडे यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास : 30 दिवसाच्या  आत जिल्हाधिकार्याकडे व त्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे.


मानधन :

 सभापती - दरमहा रु 10,000/- व इतर सुखसुविधा

उपसभापती - दरमहा रु 8,000/- व इतर सुखसुविधा पंचायत समितीची बैठक - कलम क्र. 117 व 118 नुसार वर्षात 12 म्हणजेच प्रत्येक महिन्याला 1 अंदाज पत्रक - गटविकासअधिकारी तयार करतो व त्याला जिल्हा परिषदेची मान्यता आवश्यक आहे.


गटविकास अधिकारी :

निवड - गटविकास अधिकारी

नेमणूक - राज्यशासन

कर्मचारी - ग्रामविकास खात्याचा वर्ग-1 व वर्ग-2 चा अधिकारी

नजिकचे नियंत्रण - मुख्य कार्यकारी अधिकारी

पदोन्नती - उपमुख्य कार्यकारी अधिकारी


कार्य व कामे :

1. पंचायत समितीचा सचिव

2. शासनाने ठरवून दिलेले कर्तव्य पार पाडणे.

3. वर्ग-3 व वर्ग-4 च्या कर्मचार्यांच्या राजा मंजूर करणे.

4. कर्मच्यार्यांवर नियंत्रण ठेवणे.

5. पंचायत समितीने पास केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे.

6. पदाधिकार्यांना मार्गदर्शन करणे.

7. पंचायत समितीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकार्यांस सादर करणे.

8. अनुदानाची रक्कम काढणे व तिचे वितरण करणे.

9. महत्वाची कागदपत्रे सांभाळणे.


पंचायत समितीची कामे :

1. शिक्षण

2. कृषी

3. वने

4. समाजकल्याण

5. पशुसंवर्धन व दुग्धविकास

6. सार्वजनिक आरोग्य सेवा

7. दळणवळण

8. समाजशिक्षण

भारतीय राज्यघटनेचे स्त्रोत

📌भारतीय शासन कायदा 1935📌

·जवळ जवळ राज्यघटनेचा मोठा भाग भारतीय शासन कायदा 1935 पासून घेण्यात आला.

संघराज्यीय शासन पद्धती

·न्यायव्यवस्था

लोकसेवा आयोग, आणीबाणीची तरतूद, राज्यपालाचे पद

प्रशासकीय तरतूद



📌बरिटिश घटना📌

·संसदीय शासन व्यवस्था

कॅबिनेट व्यवस्था

 द्विगृही संसद पद्धती

फर्स्ट पास्ट-पोस्ट-सिस्टम

कायदे प्रणाली व कायदा करण्याची पद्धत

एकेरी  नागरिकत्व

 संसदीय विशेषाधिकार

आदेश देण्याचे विशेष हक्क  



📌य एस ए ची घटना📌

 राज्यघटनेतील मूलभूत हक्क

·उपराष्ट्रपती हे पद

·न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य

न्यायिक पुनर्विलोकन

·राष्ट्रपतीवरील महाभियोगाची पद्धत

·सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत


    


📌कनडाची घटना📌

 प्रभावी केंद्र असलेले संघराज्य

· शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद ( राज्यघटनेमध्ये समावर्ती सूची, केंद्र सूची  व राजयसूची चा समावेश असतो ज्या विषयाचा या तिन्ही पैकी कोणत्याही सूचित समावेश नसतो त्यास शेषाधिकार असे म्हणतात )

·राज्यपालाची केंद्राचा प्रतींनिधी म्हणून नेमणूक

· सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार आधिकार क्षेत्र



📌आयरीश घटना📌

राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे

·राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत

·राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन



📌आस्ट्रेलियाची घटना📌

राज्यघटनेतील समावर्ती सूची

संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक

· व्यापार व वाणीज्याचे स्वातंत्र्



📌फरांस ची घटना📌

   गणराज्य

· प्रस्ताविकेतील स्वातंत्र्य

समता व बंधुता हे आदर्श



📌दक्षिण आफ्रिकेची घटना📌

घटना दुरुस्तीची पद्धत

राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक



📌सोव्हिएत रशियाची घटना📌

मूलभूत कर्तव्य

प्रस्ताविकेतील सामाजिक , आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श


📌जपानची घटना📌

कायद्याने प्रस्थापित पद्धत



📌जर्मनीची घटना📌

आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे

​भारतीय निवडणूक आयोग

ही एक संवैधानिक संस्था असून कलम 324 नुसार याची स्थापना25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आलेली आहे. भारतीय निवडणुक आयोगातर्फे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद, राज्य विधिमंडळ यांच्या निवडणूका पार पाडल्या जातात. पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांनी कामकाज पाहिले होते. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती करतात व ते 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे होईपर्यंत ते पदावर राहतात.

▪️राज्यसभा
- संसदेचे उच्च सभागृह
- भारताचे उपराष्ट्रपती पदसिद्ध अध्यक्ष असतात
- एकूण जागा: 250: 238 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश + 12 राष्ट्रपती नियुक्त
- सध्या जागा: 245: 233 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश + 12 राष्ट्रपती नियुक्त (कलम 80 नुसार ही नियुक्ती)
- महाराष्ट्रात राज्यसभेच्या 19 जागा
- मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, पाॅडेचरी, गोवा या राज्यांना राज्यसभेवर प्रत्येकी 1 जागा

▪️लोकसभा
- एकूण जागा: 552 (कलम 81 & 331 नुसार)
- पहिल्या लोकसभेची स्थापना: 2 एप्रिल 1952
- 16 वी लोकसभा स्थापना: 4 जून 2014

▪️लोकसभा निवडणूक 2014
- 16 वी लोकसभा निवडणूक
- 7 एप्रिल ते 12 मे या कालावधीतील 10 दिवस भारतभरात मतदान
- 16 मे रोजी निकाल आणि 4 जून 2014 रोजी लोकसभेची स्थापना
- एकूण मतदारसंघ: 543
- एकूण मतदान केंद्र: 927553
- सहभागी राजकीय पक्ष: 464 (2009-363)
राष्ट्रीय- 342, राज्य- 182, नोंदणीकृत- 16, अपक्ष- 3
- एकूण उमेदवारांची संख्या: 8251 पैकी 668 महिला उमेदवार (पैकी 62 निवडून आल्या)

▪️ पक्षीय बलाबल
- भारतीय जनता पक्ष: 282
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: 44
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष: 06
- कम्युनिस्ट पक्ष: 01
- कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी): 09
- राज्यस्तीय पक्ष: 182
- नोंदणीकृत पक्ष: 16
- अपक्ष: 03

▪️ वैशिष्ट्ये
- EVM वर NOTA हा पर्याय भारतभर पहिल्यांदाच वापरण्यात आला.
- नोटाचा सर्वाधिक वापर पाॅडेचरी (3.01%), सर्वात कमी वापर नागालॅड (0.26%) करण्यात आला
- 28,527 तृतीयपंथी मतदारांपैकी 1968 जणांनी मतदानाचा अधिकार बजावला.
- 13,039 (पुरूष 12234, स्त्री 804) भारताबाहेरील भारतीयांपैकी 10 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
- एकूण निवडणूक खर्च: 3,87,0354,56,024 रूपये
--------------------------------------
• महाराष्ट्र: लोकसभा निवडणूक 2014
- 48 मतदारसंघासाठी 90386 मतदान केंद्रे.
- 6 मतदान केंद्रावर फेर मतदान घेण्यात आले.
- 32 मतदारसंघात 16 पेक्षा जास्त उमेदवार उभा होते.
- एकूण मतदानापैकी 0.89% लोकांनी NOTA हा पर्याय वापरला

polity questions for mpsc exam practice

1.भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागण्याचा किंवा विचार-विनिमय करण्याचा अधिकार आहे?

A) कलम 124 B) कलम 130 C) कलम 143 D) कलम 147

उत्तर – कलम 143


2. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्र संबंधी योग्य विधाने ओळखा.

अ) संसद न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात केवळ वाढ करू शकते मात्र घट घडवू शकत नाही.

ब) भारताचे सर्वोच्च न्यायालय अमेरिकन न्यायालयात प्रमाणे फेडरल कोर्ट म्हणून कार्य करते.

क) ब्रिटिश न्यायालयाचा प्रमाणे अपिलाचे अंतिम न्यायालयाचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहेत.

A) अ आणि ब

B) अ आणि क

C) अ ब आणि क

D) ब आणि क

उत्तर – अ, ब आणि क


3. खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयांचे कार्य स्थान त्यांच्या राजधानीच्या शहरात नाही?

अ) उत्तर प्रदेश ब) मध्य प्रदेश

क) छत्तीसगड ड) सिक्किम

A) अ आणि ब

B) क आणि ड

C) अ,ब आणि क

D) अ ब आणि ड

उत्तर – अ ब आणि क


४.भारतीय राज्यघटनेच्या ह्या कलमानुसार दोन किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त उच्च न्यायालय स्थापन करण्याची तरतूद केलेली आहे.

A) कलम 214 B) कलम 226 C) कलम 230 D)कलम 231

उत्तर – कलम 231


५. गावातील अनुभवी ज्येष्ठांकडून तक्रार निवारणाच्या भारतातील पारंपरिक व्यवस्थेची सुधारित व गांधीवादी तत्त्वावर आधारित व्यवस्था म्हणजे काय?

A) लोकायुक्त B) लोक अदालत

C) लोकपाल D) कौटुंबिक न्यायालय

उत्तर – लोकअदालत


६. राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात योग्य पर्याय निवडा.

अ)कॅबिनेट ने केवळ लेखी स्वरुपात शिफारस केल्यानंतरच राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात.

ब) अशी तरतूद घटनेत 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आली.

A) फक्त अ

B) फक्त ब

C) अ,ब

D) वरीलपैकी एकही नाही

उत्तर – फक्त अ


७. उच्च न्यायालयाच्या त्या खालच्या न्यायालया वरील प्रशासकीय नियंत्रणात कोणत्या बाबीचा समावेश होत नाही?

A) नेमणुका

B) निवृत्ती वेतन

C) बदली

D) सक्तीची निवृत्ती

उत्तर – निवृत्तीवेतन


८.73 व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायती संस्थांच्या रचनेबद्दल च्या कोणत्या तरतुदी राज्यसरकार साठी  ऐच्छिक आहेत?

अ) दोन-तीन स्तरीय रचना ब) निश्चित कार्यकाळ

क) ग्रामसभेची भूमिका व व्याप्ती ड) जिल्हा नियोजन समिती

A) क आणि ड

B) अ आणि ब

C) ब आणि ड

D) अ आणि क

उत्तर – क आणि ड


९.केंद्रीय निवडणूक आयोगा संबंधित अयोग्य विधान ओळखा.

अ) याला अखिल भारतीय स्वरूप आहे

ब)देशात मुक्त व न्याय निवडणुका घेणे हेतू आहे.

क) राष्ट्रपती किंवा राज्यपाल आयोगास त्यांच्या मागणीनुसार स्टाफ उपलब्ध करून देते.

ड)राज्यपाल आयोगास मदत करण्यासाठी प्रादेशिक आयुक्त नेमू शकतात.

पर्यायी उत्तरे

A) अ , ब

B) ड

C) अ

D) अ ब क ड

उत्तर – ड


१०. मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवते?

A) राज्यपाल  B) संसद  C) विधिमंडळ  D) राज्यपालांच्या सल्ल्याने राष्ट्रपती

उत्तर – विधिमंडळ


११. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आली आहे?

A) कलम 165 B) कलम 166 C) कलम 164 D) कलम 76

उत्तर – कलम 165


१२.भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या भागात उच्च न्यायालय व कनिष्ठ न्यायव्यवस्था यांच्या संदर्भात तरतुदी देण्यात आलेल्या आहेत?

A) भाग 4 B) भाग 5 C) भाग 6 D) भाग 7

उत्तर – भाग 6


१३.न्यायालयीन पुनर्विलोकन बाबत पुढील विधाने विचारात घ्या.

अ)केवळ संसदीय व राज्य विधिमंडळाचे कायदे नव्हे तर शासकीय कार्यकारी आदेशाची ही तपासणी करणे न्यायिक पुनर्विलोकन याच्या साह्याने शक्य आहे.

ब)राज्यघटनेच्या तत्वांचे चुकीच्या कायद्यापासून संरक्षण करणे हे न्यायालयीन पुनर्विलोकनाचे उद्दिष्ट आहे.

A) फक्त अ बरोबर

B) फक्त ब बरोबर

C) दोन्ही बरोबर

D) दोन्ही चूक

उत्तर – दोन्ही बरोबर


१४. खालील विधाने विचारात घ्या.

अ) राज्य विधिमंडळाचे कायदे केवळ राज्याच्या परिक्षेत्रा साठीच लागू असतात

ब) संसदेचे कायदे भारतीय नागरिकांच्या परदेशातील संपत्तीला लागू असतात वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?

A) फक्त अ

B) फक्त ब

C) अ आणि ब

D) वरीलपैकी नाही

उत्तर – अ आणि ब


१५.आदिवासी क्षेत्रांना संसदीय कायदा लागू होणार नाही असे निर्देश देण्याचे अधिकार अनुक्रमे कोणाला आहेत?

A) राष्ट्रपती, राज्यपाल

B) राज्यपाल, राष्ट्रपती

C) केवळ राज्यपाल

D) पंतप्रधान, राष्ट्रपती

उत्तर – राज्यपाल राष्ट्रपती


१६. भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या परिशिष्टात केंद्र व राज्यांच्या कायदेविषयक विषयांची विभागणी दिलेली आहे?

A) परिशिष्ट 4 B) परिशिष्ट 2

C) परिशिष्ट 7 D) परिशिष्ट 8

उत्तर – परिशिष्ट 7


17. शेषाधिकार संबंधित खालील विधाने विचारात घ्या.

अ) भारतीय घटनेत शेषाधिकार याची तरतूद ऑस्ट्रेलियन घटनेवरून घेतली आहे.

ब) भारतात असे शेषाधिकार यांचे अधिकार संसदेस आहेत.

क)  स्वित्झर्लंड मध्ये शेषाधिकार केंद्राकडे आहेत.

ड) स्पेनमध्ये शेषाधिकार केंद्र व राज्य दोघांकडेही आहेत.

A) वरील सर्व योग्य

B) केवळ ब योग्य

C) ब आणि ड योग्य

D) ब आणि क योग्य

उत्तर ब आणि ड योग्य


18. भारतीय निवडणूक आयोगामार्फत खालीलपैकी कोणत्या निवडणुका घेतल्या जातात?

अ) भारताचा राष्ट्रपती ब) भारताचे उपराष्ट्रपती

क) संसद ड) राज्यविधी मंडळ

इ) नगरपालिका

A) अ,ब,क, इ

B) ब,क,ड

C) अ,क,ड

D) अ,ब,क,ड

उत्तर – अ, ब,क,ड


१९.भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार निवडणूक विषयक बाबींमध्ये न्यायालयांना हस्तक्षेपास मनाई आहे?

A) कलम 326 B) कलम 328

C) कलम 329 D) कलम 330

उत्तर – कलम 329


२०. संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष तसेच सदस्यांच्या सेवाशर्ती ठरवण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत?

A) संघ लोकसेवा आयोग B) संसद

C) राष्ट्रपती D) वरीलपैकी नाही

उत्तर – राष्ट्रपती


२१. राज्य लोकसेवा आयोग आपला वार्षिक अहवाल कोणास सादर करतो?

A) संबंधित राज्याचे राज्यपाल

B) संबंधित राज्याचे विधिमंडळ

C) संबंधित राज्याचे मुख्यमंत्री

D) संबंधित राज्याचे विधिमंडळ अध्यक्ष

उत्तर – संबंधित राज्याचे राज्यपाल


२२. राज्याच्या कार्यकारी विभागात कोणाचा समावेश होतो?

अ) राज्यपाल ब) मुख्यमंत्री मंत्रिमंडळ

क) महाधिवक्ता ड) विधानसभा अध्यक्ष


A) अ आणि ब

B) ब आणि क

C) अ, ब, आणि क

D) अ,ब,क,ड

उत्तर – D. अबकड


२३. भारतीय संविधानाने राज्यपालाची नियुक्ती विषयी ची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारले आहे?

A) अमेरिका B) ब्रिटन

C) कॅनडा D) ऑस्ट्रेलिया

उत्तर – कॅनडा


२४.कोणत्या घटना दुरुस्तीने दोन किंवा अधिक राज्यांना एकच व्यक्ती राज्यपाल म्हणून नियुक्त करण्याची तरतूद संविधानात केली?

A) चौथी घटनादुरुस्ती

B) सहावी घटनादुरुस्ती

C) सातवी घटना दुरुस्ती

D) आठवी घटनादुरुस्ती

उत्तर 7 वी घटना दुरुस्ती


२५. 73 व्या घटनादुरुस्तीने कायद्यातील कोणत्या कलमाला मूर्त स्वरूप दिले?

A) कलम 19

B) कलम 40

C) कलम 45

D) कलम 21

उत्तर – कलम 40


२६. पंचायत समिती सभापती स्वतःचा राजीनामा कोणाकडे सादर करतात?

A) विभागीय आयुक्त

B) जिल्हाधिकारी

C) पंचायत समितीचा उपसभापती

D) जिल्हा परिषदेचा अध्यक्ष

उत्तर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष


२७. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था महिलांना 50 टक्के आरक्षण कधी मिळाले?

A) 2000

B) 2005

C) 2007

D)2011

उत्तर – 2011


28. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला?

A) अशोक राव मेहता समिती

B) एल एम सिंघवी समिती

C) दिनेश गोस्वामी समिती

D) ताखत्मल जैन समिती

उत्तर एम सिंघवी समिती

सराव प्रश्नसंच


1) आर्थिक आणीबाणी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार लागते ?

अ) कलम ३५२

ब) कलम ३५६

क) कलम ३६०

ड) कलम ३६२

=======================

 उत्तर............ क) कलम ३६० 

=======================

२) ४४ व्या घटनादुरुस्तीने कलम ३५२ मधील कोणती तरतूद बदलण्यात आली ?

अ) युद्ध

ब) परकीय आक्रमण

क) अंतर्गत अशांतता

ड) वरीलसर्व

==========================

 उत्तर......... क) अंतर्गत अशांतता 

==========================

३) कोणतेही विधेयक (धनविधेयक सोडून) विधान परिषद किती दिवस विलंब करू शकते ?

अ) दोन महिने

ब) तीन महिने

क) चार महिने

ड) सहा महिने

=====================

 उत्तर....... क) चार महिने  

=====================

४) भारतात कोणत्या केंद्रशाशीत प्रदेशाला स्वतःचे उच्च न्यायालय आहे ?

अ) चंडीगड

ब) लक्षद्वीप

क) दिल्ली

ड) महाराष्ट्र

=====================

 उत्तर..... क) दिल्ली  

=====================

५) कनिष्ठ न्यायालयावर देखरेख करण्याचा अधिकार कुणाला आहे ?

अ) उच्च न्यायालय

ब) सर्वोच्य न्यायालय

क) दोन्ही

ड) यापैकी नाही 

========================

 उत्तर........ अ) उच्च न्यायालय 

========================

६) कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते ?

अ) कलम १३

ब) कलम ३२

क) कलम २२६

ड) यापैकी नाही

=====================

 उत्तर....... क) कलम २२६  

=====================

७) केंद्र व राज्य यांच्यातील संबधावर प्रकाश टाकण्यासाठी १९८३ मध्ये कोणत्या आयोगाची नेमणूक करण्यात आली ?

अ) राजमन्नार आयोग

ब) सच्चर आयोग

क) सरकारिया आयोग

ड) व्ही. के. सिंग

==========================

 उत्तर....... क) सरकारिया आयोग 

==========================

८) राज्य घटनेतील कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ?

अ) कलम २८०

ब) कलम २८२

क) कलम २७५

ड) कलम २८४

=====================

 उत्तर....... अ) कलम २८० 

=====================

९) आंतरराज्जीय नदी विवाद सोडविण्यासाठी राज्य घटनेत कोणत्या कलमाची तरतूद करण्यात आली आहे ?

अ) कलम २६१

ब) कलम २६२

क) कलम २६३

ड) कलम २६४

=====================

 उत्तर....... ब) कलम २६२ 

=====================

१०) निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार राज्यघटनेत आहे ?

अ) कलम ३२४

ब) कलम ३२५

क) कलम ३२६

ड) कलम ३२७

=====================

 उत्तर........ अ) कलम ३२४ 

=====================

११) खालीलपैकी कोणती समिती निवडणुका सुधारनांशी संबंधित नाही ?

अ) संथानाम समिती 

ब) वांछू व गोस्वामी समिती 

क) तारकुंडे समिती 

ड) गोपालकृष्णन समिती 

========================

 उत्तर....... अ) संथानाम समिती 

========================

१२) राष्टीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

अ) पाच वर्षे

ब) सहा वर्षे 

क) तीन वर्षे

ड) दोन वर्षे

=====================

 उत्तर........ अ) पाच वर्षे  

=====================

१३) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होते ?

अ) उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

ब) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

क) उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश

ड) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश

=====================

 उत्तर...... पर्याय (ड) 

=====================

१४) आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते ?

अ) केंद्र सरकार

ब) राज्य सरकार

क) जिल्हाधिकारी

ड) निवडणूक आयोग

========================

 उत्तर....... ड) निवडणूक आयोग 

========================

१५) कलम १६९ नुसार विधानपरिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला असतो ?

अ) केंद्र

ब) राज्य

क) दोन्ही

ड) यापैकी नाही

=====================

 उत्तर.......... ब) राज्य  

लोकसभा

लोकसभेबद्दल संपूर्ण माहिती:


लोकसभेची निर्मिती ब्रिटन आणि कॅनडाच्या कॉमन सभागृहाच्या धर्तीवर करण्यात आली आहे.


सभासदांची संख्या :

घटनेच्या 81 व्या कलमामध्ये लोकसभेच्या सभासदांची संख्या निर्धारित करण्यात आली आहे. 1974 च्या 31 व्या घटनादुरुस्तीनुसार घटकराज्यांच्या सभासदांची संख्या 525 तर केंद्रशासीत प्रदेशांची सभासद संख्या 20 इतकी करण्यात आली आहे. परंतु लोकसभेत जास्तीत जास्त 552 इतके सभासद सांगितले आहेत. त्यामध्ये 530 घटकराज्य. 20 केंद्रशासीत प्रदेश आणि जर अँग्लो इंडियन समाजाला लोकसभेत प्रतिनिधीत्व मिळाले नाही तर दोन सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे. भारतीयलोकप्रतींनिधी कायदा 1951 नुसार पाच ते साडेसात लाख मतदारांमागे एक लोकसभेचा उमेदवार निवडला जातो.


मतदारसंघ निर्धारण आयोग :

या आयोगाची निर्मिती 1972 साली करण्यात आली. त्या आयोगाचा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचा एक न्यायाधीश असतो.


उमेदवारांची पात्रता :

घटनेच्या 84 व्या कलमात सभासदांची पात्रता सांगितली आहे ती पुढीलप्रमाणे

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावीत.

3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.


निवडणूक पद्धत :

लोकसभेची निवडणूक प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने होते. ती निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली होते.


लोकसभेचा कार्यकाल :

पाच वर्ष इतका आहे परंतु तो कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे. आणीबाणीच्या कालखंडात संसद कायदा करून लोकसभेचा कार्यकाल फक्त एकदाच एका वर्षासाठी 83/2 कलमानुसार वाढवू शकतो.


सभासदांचा कार्यकाल :

प्रत्येक सभासदाचा कार्यकाल हा 5 वर्ष इतका असतो परंतु कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी आपला राजीनामा लोकसभेच्या सभापतींकडे देऊ शकतो.


बैठक किंवा अधिवेशन :

घटनेच्या 85 कलमामध्ये सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक सभागृहाची वाटेल त्या वेळी अधिवेशन बोलवितो परंतु दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.


गणसंख्या :

कोणत्याही सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी आवश्यक असलेली सभासद संख्या म्हणजेच गणसंख्या होय. ती 1/10 इतकी निर्धारित करण्यात आली आहे.


पदमुक्तता :

कोणत्याही सभागृहाची परवानगी न घेता एखादा सदस्य सतत 60 दिवस सभागृहात गैरहजर राहिल्यास त्याचे सभासदत्व आपोआप रद्द होते. परंतु (60 दिवसात संबंधित सभागृहाला लागोपाठ चार दिवस सुट्ट्या आल्या असतील तर सभासदत्व रद्द होत नाही.)


लोकसभेचा सभापती कार्य आणि अधिकार :

लोकसभेत निवडून आलेल्या एका सदस्याची सभापती म्हणून व दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून लोकसभेतील सदस्यांकडून निवड केली जाते.


कार्य :

1. धनविधेयक आहे की नाही हे ठरविणे.

2. प्रश्न आणि उपप्रश्न विचारण्यास परवानगी देणे.

3. प्रवर समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती करणे.

4. कमरोको प्रस्ताव आणण्यासाठी सभापतींची परवानगी आवश्यक आहे.

5. सभागृहात शांतता व सुव्यवस्था राखणे.

6. सभागृहाचे कामकाज सुरू होण्यासाठी पुरेशी गणसंख्या नसेल तर कामकाज थांबविणे.

7. राष्ट्रपतीने दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलविल्यास अध्यक्षपद भूषविणे.

8. सामान्य उद्देश समिती, नियम समिती व कार्यवाही समितीचा सभापती पदसिद्ध अध्यक्ष असतो.

जिल्हा_परिषद



जिल्हा परिषदेबद्दल संपूर्ण माहिती:


जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 कलम क्र.6 नुसार प्रत्येक जिल्हयासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना 1 मे, 1962 रोजी करण्यात आली.


रचना :- 

प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक अध्यक्ष आणि जिल्हापरिषद सदस्य मिळून एक जिल्हापरिषद निर्माण करण्यात येईल.


सभासद संख्या - 

प्रत्येक जिल्हापरिषदेमध्ये लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे कमीत 50 व जास्तीत जास्त 75 इतके सभासद असतात. हे सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीव्दारे निवडले जातात. स्वीकृत सदस्य पद्धत पुर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सर्व सभापती हे जिल्हापरिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात.


सभासदांची निवडणूक - 

प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्यनिर्वाचन आयोग दर पाच वर्षानी होते.


पात्रता (सभासदांची) - 

जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याकरिता पुढील पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावी.

3. 1961 च्या कायद्याप्रमाणे (जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम) किंवा त्यामध्ये केलेल्या बदलानुसार पात्र असावा.


आरक्षण : 

1961 च्या जिल्हा परिषद स. अधिंनियमातील कलम क्र. 12/2 (A) विशिष्ट जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.

तसेच महिलांसाठी राखीव जागांची तरतूद 110 व्या घटना दुरूस्तीनुसार सहयोगी सदस्य घेण्याची पद्धत बंद करण्यात आली. फक्त सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात.


कार्यकाल : 

5 वर्ष इतका असतो परंतु काही कारणावरून जिल्हापरिषद विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे. अशी जिल्हा परिषद विसर्जित झाल्यानंतर या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे.


अध्यक्ष / उपाध्यक्षाची निवड :

 जिल्हा परिषदेतील निवडून आलेल्या सदस्यांमधुनच अध्यक्ष/उपाध्यक्षांची निवड केली जाते. परंतु काही कारणांवरून त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास त्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्ताकडे तक्रार करावी लागते. त्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत राज्य सरकारकडे तक्रार करावी लागते.


कार्यकाल :

अध्यक्ष / उपाध्यक्षांचा कार्यकाल इ.स 2000 च्या तरतुदींनुसार अडीच वर्ष इतका करण्यात आला आहे.


राजीनामा :

1. अध्यक्ष - विभागीय आयुक्ताकडे

2. उपाध्यक्ष - जिल्हा परिषद अध्यक्षाकडे


मानधन :

1. अध्यक्ष - 20,000/-

अविश्वासाचा ठराव - अध्यक्ष/उपाध्यक्षाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही आणि तो फेटाळल्यास त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.

सचिव - जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.


बैठक : 

जिल्हा परिषदेच्या एका आर्थिक वर्षात चार बैठका होतात. म्हणजेच दर तीन महिन्यांनी एक बैठक घेतली जाते.


मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) : प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेसाठी आयएएस दर्जाचा अधिकारी असतो. त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे.

विधानसभेबद्दल संपूर्ण माहिती:


घटना कलम क्र. 170 मध्ये प्रत्येक घटकराज्यासाठी एक विधानसभा असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. विधानसभा हे कनिष्ठ परंतू अधिकाराच्या बाबतीत श्रेष्ठ सभागृह समजले जाते तर विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असून अधिकाराच्या बाबतीत


विधानसभेची रचना :

170 व्या कलमात सांगितल्याप्रमाणे विधानसभेत 60 व जास्तीत जास्त 500 सभासद असतात.


राखीव जागा :

घटना कलम क्र. 332 मध्ये सांगितल्याप्रमाणे अनुसूचीत जाती जमातीसाठी महाराष्ट्रामध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचीत जातींसाठी 29 तर अनुसूचीत जमातीसाठी 25 राखीव जागा आहेत.


निवडणूक : 

प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने सदस्यांची निवड केली जाते.


उमेदवारांची पात्रता :

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावी.

3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.

सदस्यांचा कार्यकाल : सदस्यांचा कार्यकाल पाच वर्ष इतका असतो.


गणसंख्या : 1/10

अधिवेशन : 

दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.


सभापती व उपसभापती :

विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.


सभापतीचे कार्य आणि अधिकार :

1. विधानसभेत मांडण्यात येणार्या प्रस्तावाला संमती देणे.

2. विधानसभेत शांतता व सुव्यवस्था राखणे.

3. सभागृहात एखाद्या विषयावर समान मते पडल्यास आपले निर्णायक मत देणे.

4. जनविधेयक आहे की नाही ते ठरविणे.


जनरल माहिती :

1. धनविधेयक प्रथम विधानसभेत मांडतात.

2. धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार सभापतीला आहे.

3. धनविधेयकाला विधानपरिषदेने 14 दिवसाच्या आत मान्यता द्यावी लागते. काहीच न कळवल्यास तीला ते मान्य आहे असे समजले जाते.

4. मुख्यमंत्री हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो.

5. घटकराज्यांचे मंत्रीमंडल संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असते.

6. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय.

7. मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री भूषवितो.

8. स्वातंत्र्य भारताचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते.

भारतीय संविधान प्रश्नसंच :


1. भारतीय राज्यघटनेच्या ----- कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे?

 19 ते 22

 31 ते 35

 22 ते 24

 31 ते 51

उत्तर : 19 ते 22


2. राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा ----- यांच्याकडे सादर करतात.

 राष्ट्रपती

 उपराष्ट्रपती

 पंतप्रधान

 राज्यपाल

उत्तर : राष्ट्रपती


3. सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायधिशांची नेमणूक ----- करतात?

 राष्ट्रपती

 राज्यपाल

 पंतप्रधान

 सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती

उत्तर : सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती


4. ----- रोजी पंडित नेहरूंची घटनेची उद्देशपत्रिका/प्रस्तावना लिहिली?

 11 डिसेंबर 1946

 29 ऑगस्ट 1947

 10 जानेवारी 1947

 9 डिसेंबर 1946

उत्तर : 11 डिसेंबर 1946


5. भारतीय राज्यघटेनेच्या ----- परीशिष्टात विविध शपथ व नमुने दिलेले आहेत.

 परिशिष्ट-1

 परिशिष्ट-2

 परिशिष्ट-3

 परिशिष्ट-4

उत्तर : परिशिष्ट-3


6. सध्या समावर्ती सूचीमध्ये ----- विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.

 47

 48

 52

 यापैकी नाही

उत्तर : 47


7. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

 डॉ. आंबेडकर

 डॉ. राजेंद्रप्रसाद

 पंडित नेहरू

 लॉर्ड माऊंटबॅटन

उत्तर : डॉ. राजेंद्रप्रसाद


8. घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

 डॉ. राजेंद्रप्रसाद

 डॉ. आंबेडकर

 महात्मा गांधी

 पंडित नेहरू

उत्तर : डॉ. आंबेडकर


9. खालीलपैकी संसदेचे स्थायी सभागृह कोणते?

 लोकसभा

 विधानसभा

 राज्यसभा

 विधानपरिषद

उत्तर : राज्यसभा


10. लोकसभापतीची निवड कोण करतो/करते?

 लोकसभा सदस्य

 मंत्रीमंडळ

 राज्यसभा सदस्य

 राष्ट्रपती

उत्तर :  लोकसभा सदस्य


11. लोकसभेची मुदत किती वर्ष असते?

 1.8 वर्षे

 6 वर्षे

 4 वर्षे

 5 वर्षे

उत्तर : 5 वर्षे


12. राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो?

 राष्ट्रपती

 सभापती

 उपराष्ट्रपती

 पंतप्रधान

उत्तर : उपराष्ट्रपती


13. खालीलपैकी राज्यसूचीतील विषय कोणता?

 संरक्षण

 तार

 पोस्ट

 जमिनमहसूल

उत्तर : जमिनमहसूल


14. लहान मुलाला प्रथम नागरीकत्वाचे धडे ----- पासून मिळतात.

 कुटुंब

 शाळा

 दोन्हीही

 मंदिर

उत्तर : दोन्हीही


15. भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो?

 राष्ट्रपती

 उपराष्ट्रपती

 पंतप्रधान

 सरन्यायधीश

उत्तर : राष्ट्रपती


16. भारतात कोणत्या प्रकारातील शासनप्रणाली आहे?

 लष्करी

 अध्यक्षीय

 हुकूमशाही

 संसदीय

उत्तर : संसदीय


17. राष्ट्रपती राज्यसभेवर किती खासदार नेमतात?

 18

 12

 16

 20

उत्तर : 12


18. राज्यघटनेमध्ये एकूण सूची किती?

 2

 1

 3

 4

उत्तर : 3


19. योजना आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?

 राष्ट्रपती

 उपराष्ट्रपती

 पंतप्रधान

 अर्थमंत्री

उत्तर : पंतप्रधान


20. राज्यसभेच्या सदस्याचा कालावधी किती वर्षे असतो?

 4 वर्षे

 5 वर्षे

 6 वर्षे

 कायमस्वरूपी

उत्तर : 6 वर्षे

विधानसभेबद्दल संपूर्ण माहिती

> घटना कलम क्र. 170 मध्ये प्रत्येक घटकराज्यासाठी एक विधानसभा असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. 

> विधानसभा हे कनिष्ठ परंतू अधिकाराच्या बाबतीत श्रेष्ठ सभागृह समजले जाते तर विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असून अधिकाराच्या बाबतीत


✅ विधानसभेची रचना :

> 170 व्या कलमात सांगितल्याप्रमाणे विधानसभेत 60 व जास्तीत जास्त 500 सभासद असतात.


✅ राखीव जागा :

> घटना कलम क्र. 332 मध्ये सांगितल्याप्रमाणे अनुसूचीत जाती जमातीसाठी महाराष्ट्रामध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. 

> अनुसूचीत जातींसाठी 33 तर अनुसूचीत जमातीसाठी 14 राखीव जागा आहेत.


✅ निवडणूक : प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने सदस्यांची निवड केली जाते.


✅ उमेदवारांची पात्रता :

> तो भारताचा नागरिक असावा.

> त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावी.

> संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.


✅ सदस्यांचा कार्यकाल : सदस्यांचा कार्यकाल पाच वर्ष इतका असतो.

✅ गणसंख्या : 1/10

✅ अधिवेशन : दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.

✅ सभापती व उपसभापती :

> विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसर्‍या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.


✅ सभापतीचे कार्य आणि अधिकार :

> विधानसभेत मांडण्यात येणार्‍या प्रस्तावाला संमती देणे.

> विधानसभेत शांतता व सुव्यवस्था राखणे.

> सभागृहात एखाद्या विषयावर समान मते पडल्यास आपले निर्णायक मत देणे.

> जनविधेयक आहे की नाही ते ठरविणे.


✅ जनरल माहिती :

> धनविधेयक प्रथम विधानसभेत मांडतात.

> धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार सभापतीला आहे.

> धनविधेयकाला विधानपरिषदेने 14 दिवसाच्या आत मान्यता द्यावी लागते. काहीच न कळवल्यास तीला ते मान्य आहे असे समजले जाते.

> मुख्यमंत्री हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो.

> घटकराज्यांचे मंत्रीमंडल संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असते.

> मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय.

> मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री भूषवितो.

> स्वातंत्र्य भारताचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते.


लोकपाल

🔰 पहिले लोकपाल:-पिनाकी चंद्र घोष

📚 गर न्यायिक सदस्य:- अर्चना रामसुंदर, दिनेश कुमार जैन, महेंद्रसिंग, इंद्रजित प्रसाद गौतम

📚 नयायिक सदस्य:- दिलीप भोसले, प्रदीप कुमार मोहंती, अजयकुमार त्रिपाठी, अभिलाषा कुमारी


✅ लोकपाल निवड समिती:-

1)पंतप्रधान

2)सरन्यायाधीश

3)लोकसभा अध्यक्ष

4)लोकसभा विरोधी पक्षनेते

5)कायदेतज्ज्ञ


✅ लोकपाल पात्रता

1)सर्वोच्च न्यायालयचे निवृत्त मुख्य सरन्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश

2)भ्रष्टाचार विरोधी धोरण,सार्वजनिक प्रशासन,दक्षता,विमा बँकिंग याबाबत किमान 25 वर्षे अनुभव


✅ अध्यक्ष अपात्रता

- 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेली व्यक्ती

- लाभाचे पद धारण करणारी व्यक्ती

- संसद व विधिमंडळ सदस्य

- अपराधी दोषी


✅ कार्यकाल

5 वर्ष किंवा वयाच्या 70 वर्ष पर्यंत जो अगोदर  संपेल तो

- पगार

अध्यक्षाला सरन्यायाधीश प्रमाणे

सदस्य ला न्यायाधीश प्रमाणे


✅ लोकपाल कायदा 2013

- राज्यसभा:-17 डिसेंबर 2013

- लोकसभा:-18 डिसेंबर 2013

- राष्ट्रपती:-1 जानेवारी 2014

- अंमल:-16 जानेवारी 2014


- रचना: 1 अध्यक्ष व जास्तीत जास्त 8 सदस्य

लोकसंख्या बाबत IMP POINTS


•हेन्री वॉल्टर हे भारतीय जनगणनेचे जनक म्हणून ओळखले जातात.

•जनगणना प्रथम 1872 मध्ये ब्रिटिश व्हाइसरॉय लॉर्ड मेयो यांच्या अंतर्गत सुरू झाली.

• पहिली जनगणना ब्रिटिश राजवटीत १७ फेब्रुवारी १८८१ रोजी W.C. प्लॉडेन, भारताचे जनगणना आयुक्त.

• त्या काळात लॉर्ड रिपन भारताचे व्हाईसरॉय होते.

• स्वतंत्र भारताची पहिली जनगणना 1951 मध्ये आयोजित करण्यात आली होती, जी त्याच्या सलग मालिकेतील सातवी जनगणना होती.

• जनगणना 2011 ही 1872 पासूनची देशाची 15वी राष्ट्रीय जनगणना होती आणि स्वातंत्र्यानंतरची 7वी होती.

परीक्षेत वारंवार येणारे प्रश्न

• ग्रेट डिव्हाइडचे वर्ष - 1921

• सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले राज्य - बिहार (1102)

• सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य - अरुणाचल प्रदेश (17)

• सर्वाधिक लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश – नवी दिल्ली (11320)

• कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश – लक्षद्वीप

• सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य – उत्तर प्रदेश

• सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य – सिक्कीम

• सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य – केरळ

• सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले राज्य – हरियाणा

• सर्वाधिक साक्षरता दर असलेले राज्य – केरळ

• सर्वात कमी साक्षरता दर असलेले राज्य – बिहार

• राज्याची सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या –
UP> महाराष्ट्र> MP> पंजाब

• भारतातील साक्षरता दर (श्रेणी)
• 74.04 % एकूण आहे
• 82.14% पुरुषांसाठी
• 65.46% महिलांसाठी
• M आणि F मधील 16.68% अंतर

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 8326 जागांसाठी भरती

पदाचे नाव  :-
1] मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) :- 4887 पदे
2] हवालदार (CBIC & CBN) :- 3439 पदे

शैक्षणिक पात्रता :-
पद क्र.1 & 2 :- 10वी उत्तीर्ण  किंवा समतुल्य.

वयाची अट :- 01 ऑगस्ट 2024 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
1] MTS & हवालदार (CBN) :- 18 ते 25 वर्षे
2] हवालदार (CBIC) :- 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
Fee :- General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 31 जुलै 2024 (11:00 PM)
परीक्षा (CBT) :- ऑक्टोबर/नोव्हेंबर 2024
Apply Link :- https://ssc.gov.in/


जाहिरातीसाठी पाहण्यासाठी:- click here 

Latest post

२३ जून २०२५ रोजीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडींवर आधारित १० प्रश्न-उत्तरे दिली आहेत, ज्यामध्ये भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय विषय समाविष्ट आहेत:

१. प्रश्न: २३ जून २०२५ रोजी सुरू झालेली लोकजागृती मोहीम कोणत्या राज्यातील उच्च न्यायालय परिसरासाठी आहे? उत्तर: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर उच्...