१६ एप्रिल २०२५

Mpsc pre exam samples questions

1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?

 A. 1 ते 14 वयोगट

 B. 6 ते 14 वयोगट✍️

 C. 1 ते 18 वयोगट

 D. 5 ते 14 वयोगट.

____________________

2) "आरोग्य म्हणजे केवळ रोग किंवा अशक्तता यांचा अभाव नव्हे तर शारीरिक, मानसिक व सामाजिक सुस्थिती होय,'' असे कोणी म्हटले?

 A. महात्मा गांधी

 B. हर्बर्ट स्पेन्सर

 C. थॉमस वुड✍️

 D. जागतिक आरोग्य संघटना.


____________________


3) भारत सरकारने _ पासून मौखिक पोलीओ कार्यक्रमासोबत इंजेक्शनद्वारा लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला.

 A. 1 नोव्हेंबर, 2011

 B. 30 नोव्हेंबर, 2015 ✍️

 C. 1 जानेवारी, 2016

 D. 26 फेब्रुवारी, 2017.


______________________


4) बलवंतराय मेहता समितीने त्री-सूत्री पद्धतीमध्ये ज्या शिफारशी मांडल्या त्यांना 'पंचायत राज'' असे कोणी संबोधीले ?

 A. महात्मा गांधी

 B. डॉ. राजेंद्र प्रसाद

 C. पंडित जवाहरलाल नेहरू✍️

 D. बलवंतराय मेहता.


____________________


5) खालीलपैकी कोणती योजना बालकांवरील लैंगिक अत्याचार, बलात्कार आणि अॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्यांचे पुनर्वसन व अर्थसाहाय्य करण्यासाठी सुरू केली आहे?

 A. माझी कन्या भाग्यश्री योजना 

 B. बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ योजना 

 C. मनोधैर्य योजना ✍️

 D. जीवनोन्नती योजना.


____________________


6) देवदासींच्या उदरनिर्वाहाकरीता महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती योजना सुरू केली आहे ?

 A. स्वाधार योजना

 B. राज्य गृह योजना 

 C. मातृत्व सहयोग योजना

 D. निर्वाह अनुदान योजना.✍️


____________________


7) भारताची जनगणना 2011 च्या आकडेवारीनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात (दर हजारी) अर्भक मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे?

 A. पश्चिम बंगाल

 B. बिहार 

 C. उत्तर प्रदेश

 D. मध्य प्रदेश.✍️


____________________


8) 73वी घटनादुरुस्ती ही महिलांसाठी महत्वाची मानली जाते कारण त्यानुसार :

 A. संघटित क्षेत्रात काम करणा-या स्त्रियांना 3 ऐवजी 6 महिने मातृत्व रजा मिळाली.

 B. कामावर होत असलेल्या शोषणाची तक्रार केल्यास महिलेला खास संरक्षण देण्यात येते. 

 C. पंचायतीत एकूण संख्येच्या एक तृतीयांश जागा स्त्रियांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक केले. ✍️

 D. लग्नाच्या संमतीसाठी वयाची किमान मर्यादा वाढविण्यात आली.


____________________


9) 1969 साली सुरू झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेचा (NSS) उद्देश काय आहे? 

 A. सहयोगातून शिक्षण

 B. सेवेतून उत्कृष्टता

 C. कल्याणातून शिक्षण

 D. सेवेतून शिक्षण.✍️


____________________


10) खालीलपैकी कोणत्या उद्देशाने 'माझी कन्या भाग्यश्री' ही योजना सुरू केली?

(a) मुलींचा जन्मदर वाढविणे.

(b) मुलींच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे.

(c) मुलींना शिक्षण देणे.

(d) बालविवाहास प्रतिबंध करणे.


पर्यायी उत्तरे :

 A. फक्त (a)

 B. (a) आणि (c)

 C. (a), (b) आणि (c)

 D. (a), (b), (c) आणि (d). ✍️

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच


1) महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा?

उत्तर-  सोलापूर


2) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?

उत्तर- अहमदनगर


3) जागतिक योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

उत्तर- 21 जून


4) पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले?

उत्तर- 1761


5) कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्विकृत केला?

उत्तर- 22 जुलै 1947


6) वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला?

उत्तर-जेम्स वॅट


7) भारतीय पोलीस प्रशिक्षण अकादमी कोणत्या राज्यात आहे?

उत्तर- तेलंगणा


8) अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर-औरंगाबाद


9) अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्रि कोण आहेत?

उत्तर- बहिणाबाई चौधरी


10) डेसीबल या एककाने  काय  मोजतात ?

उत्तर- ध्वनीची तीव्रता


11) लोणार हे उल्काजन्य सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर- बुलढाणा


12) तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे हा रोग होतो?

उत्तर- कर्करोग


13) डोळ्याच्या आरोग्यासाठी हे जीवनसत्व महत्त्वाचे आहे?

उत्तर- ए


14) महाराष्ट्रातला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना या ठिकाणी आहे?

उत्तर- शिरपूर


15) उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते?

उत्तर- तोरणमाळ


16) सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे?

उत्तर- महाराष्ट्र


17) जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

उत्तर- 8 मार्च


18) डायलीसिस उपचार कोणत्या आजारात करतात?

उत्तर- मूत्रपिंडाचे विकार


19) कोवळ्या सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते?

उत्तर- ड


20) महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली आहे?

 उत्तर-  भ्रंशमूलक उद्रेक


21) अर्ध मॅरेथॉन चे अंतर किती असते?

उत्तर- 21 कि.मी


22) भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबी यांचे प्रमाण किती आहे?

उत्तर- 2:3


23) अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते?

 उत्तर- कॅलरीज


24) इन्सुलिन हे प्राण्यांच्या कोणत्या अवयवामध्ये स्रवणारे संप्रेरक आहे? 

 उत्तर- स्वादुपिंड


25) हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे?

उत्तर- फिनलंड


26) करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला?

 उत्तर- महात्मा गांधी


27) मध्य रेल्वेचे मुख्यालय  कोठे आहे?

 उत्तर- मुंबई


28) भारताचे तिनही दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात?

उत्तर- राष्ट्रपती


29) सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली झालेले चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढले गेले? 

 उत्तर- वृक्षतोड विरोधी आंदोलन


30) अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली होती?

: उत्तर- डॉक्टर होमी जहांगीर भाभा



31) जयपूर फूट चे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?

सर): उत्तर- डॉक्टर प्रमोद सेठी


32) भारतातील सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती कोण असतात?

उत्तर- राष्ट्रपती


33) पायराईट हे कशासारखे दिसते म्हणून त्याला फूल्सगोल्ड म्हणून ओळखले जाते?

 उत्तर- सोन्यासारखे


34) इन्डोसल्फान हे  कशाचे उदाहरण आहे?

उत्तर- कीडनाशक


35) रक्ताच्या कर्करोगासाठी कोणती संज्ञा लागू होते?

 उत्तर-  ल्युकेमिया


36) महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती स्विकारण्यासंबंधी नेमले गेलेली समिती कोणती आहे?

 उत्तर- वसंतराव नाईक समिती


37) गावाच्या पिकाची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो?

 तलाठी


38) पंचायतराज ही मूळ संकल्पना कोणाची आहे?

उत्तर-  महात्मा गांधी


39) परम-8000 हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केला?

उत्तर- डॉक्टर विजय भटकर


40) भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईजक्षेत्र म्हणून ओळखले जाते?

उत्तर- वाहन


41) वि.वा शिरवाडकरांचे टोपण नाव कोणते?

उत्तर- कुसुमाग्रज


42) संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?

 उत्तर- न्यूयॉर्क


43) बुलढाणा जिल्ह्यात किती तालुके आहेत?

उत्तर- 13


44) माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर- रायगड


45) सिद्धटेक हे अष्टविनायक गणपती चे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

 उत्तर- अहमदनगर


46) केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे?

 उत्तर- राजस्थान


47) विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर- कोल्हापूर


48)  ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे?

उत्तर- ऑस्ट्रेलिया


49) कोटोपेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? 

 उत्तर- इक्वेडोर


50) अनातोलिया चे पठार कोणत्या देशात आहे?

उत्तर- तुर्कस्तान


51) झुलू जमात कोठे आढळते ?

उत्तर- दक्षिण आफ्रिका


52) सुएझ कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो?

 उत्तर- भूमध्य सागर व लाल सागर


53) कृष्णा नदीचे उगमस्थान कोणत्या राज्यात आहे?

 उत्तर- महाराष्ट्र


54) शिवसमुद्रम नदी खोरे विकास योजना कोणत्या नदीशी संबंधित आहे?

उत्तर- कावेरी


55) भारतीय रेल्वेचे दक्षिण-मध्ये झोनचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?

उत्तर- सिकंदराबाद


56) बुडापेस्ट कोणत्या देशाची राजधानी आहे?

 उत्तर- हंगेरी


57) अजिंठा -वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या वंशाच्या राज्यकर्त्यांच्या काळात निर्माण केले आहे?

उत्तर- राष्ट्रकूट


58) सन  1885 मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

उत्तर- व्योमेशचंद्र बॅनर्जी


59) 1905 मध्ये लंडन येथे इंडिया होमरूल सोसायटीची स्थापना कोणी केली?

 उत्तर- श्यामजी कृष्णा वर्मा


60) फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली?

 उत्तर- सुभाषचंद्र बोस


61) मराठा आणि केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे?

: उत्तर- लोकमान्य टिळक


62) कोणत्या कायद्यान्वये भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून महाराणी (क्राऊन) कडे गेला? 

: उत्तर- भारत सरकार अधिनिय 1858


63) मोर्ले-मिंटो सुधारणा कोणत्या वर्षाच्या कायद्याशी संबंधित आहे?

: उत्तर- 1909


64) पहिल्या गोलमेज परिषदेचे वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते?

: उत्तर- लॉर्ड आयर्विन


65) महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे?

: उत्तर- सविनय कायदेभंग


66) poverty and Un-british Rule in india चे लेखक कोण आहेत?

: उत्तर- दादाभाई नौरोजी


67) पुर्ण स्वराज्य दिवस सर्वप्रथम कोणत्या वेळी साजरा करण्यात आला?

: उत्तर- 26 जानेवारी 1930


68) भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

: उत्तर- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर


69) राज्य पुर्नरचना आयोग 1953 चे अध्यक्ष कोण होते?

: उत्तर- फाजलअली


70) मूलभूत अधिकाराचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात केला आहे?

: उत्तर- 3


71) भारतीय राज्यघटनेचे कलम 25 कशाशी संबंधित आहे?

: उत्तर- धर्मस्वातंत्र्याचे अधिकार


72) कोणत्या समितीच्या शिफारशीवरून भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला?

: उत्तर- स्वर्णसिंह समिती


73) भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राष्ट्रपतीचे अध्यादेशाशी संबंधित आहे?  

: उत्तर- कलम 123


74) संसदेच्या लोकलेखा समिती मध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात?

: उत्तर- 22


75) केंद्र व राज्य यांच्यातील संबंधाविषयी घटनेच्या कोणत्या प्रकरणात तरतूद आहे?

: उत्तर- 11


76) जागतिक अपंग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

: उत्तर- 3 डिसेंबर


77) हंबनटोटा बंदर कोणत्या देशात आहे?

: उत्तर- श्रीलंका


78) सुजय कशाशी संबंधित आहे?

: उत्तर- ऑफशोअर पेट्रोलिंग  व्हेसल


79) बॉक्साईट या धातुकापासून कोणते खनिज निष्कर्षण केले जाते?

: उत्तर- ॲल्युमिनियम


80) कोणती शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे व त्यातून पित्तरस स्त्रवतो? 

: उत्तर- यकृत


81) आवाजाची तीव्रता मोजण्याचे परिमाण कोणते आहे?

: उत्तर- डेसिबल


82) बाल्कन प्रदेश हा कोणत्या देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता?

: उत्तर- तुर्कस्तान


83) भारताने कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले?

: उत्तर- 1991


84) भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे?

: उत्तर- अप्रत्यक्ष


85) पंचायत समितीचा कार्यकारी/प्रशासकीय अधिकारी कोण असतो?

: उत्तर- गटविकास अधिकारी


86) क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य कोणते?

: उत्तर- राजस्थान


87) अष्टविनायकांपैकी किती गणेश मंदिरे ही पुणे जिल्ह्यात आहेत? 

: उत्तर- 5


88) अहमदनगर-कल्याण मार्गावर कोणता घाट आहे?

: उत्तर- माळशेज


89) पुणे जिल्ह्यातील भाडघर धरण हे कोणत्या नदीवर बांधलेले आहे?

: उत्तर- वेलवंडी


90) भारत सरकारने कोणत्या दिवशी चलनातून 500 व 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता?

: उत्तर- 8 नोव्हेंबर 2016


91) कृषी क्षेत्रातील पीतक्रांती म्हणजे कोणत्या उत्पादनातील वाढ होय.

: उत्तर- तेलबीया


92) निरा- नरसिहापुर हे तीर्थ क्षेत्र पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते? 

: उत्तर- इंदापुर


93) बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी कोणी 1916 रोजी डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली? 

: उत्तर- छत्रपती शाहू महाराज


94) पाचगणी हे शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे?

: उत्तर- जॉन चेसन


95) महाबळेश्वर मधील पॉईंट मध्ये समुद्रसपाटीपासून सर्वात उंचावर कोणता पॉईंट आहे?

: उत्तर- आर्थरसीट


96) साताऱ्याचे अजिंक्यतारा किल्ल्यास सर्वप्रथम मराठ्यांचा राजधानीचा मान कोणी दिला?

: उत्तर- छत्रपती राजाराम राजे ‌


97) थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील होते?

: उत्तर- कराड


98) महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे?

: उत्तर- पुणे


99) कोणता दिवस पोलीस शहीद दिन म्हणून ओळखला जातो?

: उत्तर- 21 ऑक्टोंबर


100) कोणत्या योजनेअंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते?

: उत्तर- मनोधैर्य


Q 1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे? 

उत्तर :- साखर उद्योग 


Q 2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे? 

उत्तर :- चौथा


Q 3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो? 

उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य 


Q 4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे? 

उत्तर :- पणजी (गोवा) 


Q 5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?

उत्तर :- आम्रसरी  


Q 6) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते? 

उत्तर :- झारखंड 


Q 7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो? 

उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ 


 Q 8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते? 

उत्तर :- महाराष्ट्र 


Q 9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे? 

उत्तर :- पुणे 


Q 10) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? 

उत्तर :- राजेवाडी


प्रश्न 1 - "इंडियन नॅशनल कॉंग्रेस" चे अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी कोण होते❓
उत्तर - लॉर्ड डफरिन

प्रश्न 2- स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण होते❓
उत्तर - आचार्य जे.बी. कृपलानी

प्रश्न 3- प्रथम ब्रिटिश सम्राट भारतात येणार कोण होता❓
 उत्तरः जॉर्ज पाचवा

प्रश्न 4- 'केसरी' वृत्तपत्राचे संपादक कोण होते❓
उत्तर - बाळ गंगाधर टिळक

प्रश्न 5 - कोणत्या व्हाइसरॉयच्या कार्यकाळात 'शिमला परिषद' आयोजित केली गेली होती❓
उत्तर - लॉर्ड वेव्हेल 

प्रश्न 6- ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोठे झाली❓
 उत्तर - लंडन

प्रश्न 7 - महात्मा गांधींनी 'साबरमती आश्रम' कोठे स्थापित केले होते❓
उत्तर - अहमदाबाद

प्रश्न 8 - कोणत्या इतिहासकाराने 1857 च्या उठावाला ‘भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम’ म्हटले आहे❓
 उत्तर - व्ही.डी. सावरकर

प्रश्न 9 - गदर पार्टीची स्थापना कोठे झाली❓
 उत्तर - सॅन फ्रान्सिस्को

प्रश्न 10 - 1857 च्या क्रांतीच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते❓
 उत्तर - लॉर्ड पामर्स्टन

111) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
): उत्तर- आसाम

112) स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कोणी केली होती?
): उत्तर- बाळ गंगाधर टिळक

113) रक्तदाब कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो?
: उत्तर- स्पीग्मोमॅनोमीटर

114) प्रकाश संश्लेषण क्रियेच्या वेळी कोणता वायू उत्सर्जित केला जातो? 
): उत्तर- ऑक्सिजन

115) मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे?
): उत्तर- दर्पण

116) मीराबाई चाणु कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
): उत्तर- वेटलिफ्टिंग

117) नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे?
): उत्तर- कोहिमा

118) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे?  
): उत्तर- बिलासपुर

119) माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला?
): उत्तर- 2005

120) अजंठा ,वेरूळ या लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? 
): उत्तर- औरंगाबाद

121) धुपगड -पंचमढी ही शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत?
): उत्तर- सातपुडा

122) वुलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे?
): उत्तर- जम्मू काश्मीर

123) संयुक्त राष्ट्र संघटनाचे (युनो) मुख्यालय कोठे आहे?
): उत्तर- न्यूयॉर्क

124) ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली?
): उत्तर- सुरत

125) चलो जाव चळवळ भारतामध्ये कोणत्या वर्षी झाली?
): उत्तर- 1942

126) महाराष्ट्रात एकूण किती महसूल जिल्हे आहे?
): उत्तर- 36

127) दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
): उत्तर- चित्रपट

128) आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
): उत्तर- स्वामी दयानंद सरस्वती

129) गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते आहे?
): उत्तर- लुंबिनी

130) भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे?
): उत्तर- आरबीआय

131) ललिता बाबर ही खेळाडू कोणत्या खेळा बद्दल प्रसिद्ध आहे?
): उत्तर- स्टीपल चेस

132) शहराचा प्रथम नागरिक कोण असतो?
): उत्तर- महापौर

133) विंग्स ऑफ फायर (अग्निपंख) हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
): उत्तर- डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

134) मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे?
): उत्तर- औरंगाबाद

135) महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? 
): उत्तर- 78

136) राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे?
): उत्तर- पुणे

137) महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला? 
): उत्तर- प्रवरानगर

138) भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता?
): उत्तर- मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

139) कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत?
): उत्तर- औरंगाबाद

140) मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
): उत्तर- उत्तराखंड

141) साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय?
): उत्तर- गोविंदाग्रज

142) राज्यसभेचा सभापती कोण असतो?
): उत्तर- उपराष्ट्रपती

143) घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे?
): उत्तर- भारतीय संसद

144) डेक्कन सभेची स्थापना कोणी केली?
): उत्तर- महादेव गोविंद रानडे

145) खेडेगावात जन्म-मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो? 
): उत्तर- ग्रामसेवक

146) भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो? 
): उत्तर- 18

147) महाराष्ट्र राज्याच्या पोलिस प्रमुखांना काय म्हणतात?
): उत्तर- पोलीस महासंचालक

148) मनाचे श्लोक कोणी लिहिले?
): उत्तर- संत रामदास

149) महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? 
): उत्तर- पुणे

150) ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे?
): उत्तर- साहित्य

151) महाराष्ट्राला किती कि‌‌.मी चा समुद्रकिनारा लाभला आहे?
): उत्तर- 720 कि.मी

152) राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे?
): उत्तर- 35

153) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो?
): उत्तर- नाशिक

154) इस्राइल या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण?
): उत्तर- नरेंद्र मोदी

155) व्हॅलेंन्टाईन डे कोणत्या दिवशी असतो?
): उत्तर- 14 फेब्रुवारी

156) हत्तीरोग (हत्तीपाय रोग) कोणता डास चावल्याने होतो ?
): उत्तर- क्युलेक्स

157) रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता कोणता रोग होतो? 
): उत्तर- ॲनिमिया (पंडुरोग)

158) चिकन गुणिया हा रोग कशापासून होतो?
): उत्तर- विषाणू

159) मानवी आहारातील कोणत्या घटका पासून शरीरास ऊर्जा मिळते? 
): उत्तर- कार्बोहायड्रेट

160) ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो?
): उत्तर- डोळे

161) गाजर या वनस्पतीत कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात आढळते?
): उत्तर- अ

162) मूत्रपिंडाचे विकारावर कोणती उपचार पद्धती वापरली जाते?
): उत्तर- डायलीसिस

163) मोसाद ही गुप्तहेर संस्था कोणत्या देशाची आहे?
): उत्तर- इस्राईल

164) कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेत त्रुटी असे म्हणतो?
): उत्तर- पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट

165) कोणत्या इंग्लिश गव्हर्नर जनरल ने तैनाती पद्धत आमलात आणली?
): उत्तर- लॉर्ड वेलस्ली

166) राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?
): उत्तर- कायमचे स्थायी सभागृह

167) कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त कोणी लिहिलेले आहे? 
): उत्तर- अनुताई वाघ

168) भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो चे मुख्यालय कुठे आहे?
): उत्तर- बंगरुळ

169) राष्ट्रीय महामार्ग 50 (NH -50 ) हा कोणत्या दोन शहरांना जोडतो? 
): उत्तर- पुणे-नाशिक

170) पेनल्टी कॉर्नर ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
): उत्तर- हाॅकी

171) जागतिक आरोग्य संघटना ( WHO ) चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
): उत्तर- जिनिव्हा

172) भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? 
): उत्तर- आर्यभट्ट

173) सतीश कुमार शिवलिंगम हा भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
): उत्तर- वेटलिफ्टिंग

174) फेसबुकचा संस्थापक कोण आहे?
): उत्तर- मार्क झुकेरबर्ग

175) आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे?
): उत्तर- हेग

176) मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
): उत्तर- आर. के. नारायण

177) मुऱ्हा ही कोणत्या जनावराची जात आहे?
): उत्तर- म्हैस

178) पेनिसीलीन या प्रतिजैविकाचा शोध कोणी लावला?
): उत्तर- अलेक्झांडर फ्लेमिंग

179) संतोष करंडक ही क्रीडा स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 
): उत्तर- फुटबॉल

180) चौसा ही जात कोणत्या पिकाशी संबंधित आहे?
): उत्तर- आंबा

181) भारत व चीन यांच्या दरम्यान च्या सीमारेषेला कोणती लाईन म्हणतात?
): उत्तर- मॅकमोहन लाईन

182) ईराण या देशाची राजधानी कोणती आहे?
): उत्तर- तेहरान

183) भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली?
): उत्तर- 1 एप्रिल 1935

184) नदीवरील जगातील सर्वात मोठे बेट मांजुली हे कोणत्या नदीवर व कोणत्या राज्यात आहे?
): उत्तर- ब्रह्मपुत्रा नदी आसाम राज्य

185) नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? 
): उत्तर- कृष्णा

186) लंडन हे शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे?
): उत्तर- थेम्स

187) मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे काय? 
): उत्तर- अस्तीबंध

188) बर्फी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण? 
): उत्तर- अनुराग बासु

189) रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती?
): उत्तर- हिल्टन यंग कमीशन

190) ॲनाॅलाॅगचे चे डिजिटल व डिजिटलचे ॲनाॅलाॅग  कोणती प्रणाली करते?
): उत्तर- मोडेम

191) तारपा हे वाद्य कशापासून बनविले जाते?
): उत्तर- वाळलेला भोपळा

192) पालघर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली?
): उत्तर- सातपाटी

193) दाभोळ धबधबा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
): उत्तर- जव्हार

194) यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती?
): उत्तर- सर हेन्री व्हीवियन

195) पालघर जिल्ह्यात रिलायन्स औष्णिक प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे?
): उत्तर- डहाणू

196) पालघर जिल्हा महाराष्ट्रातील कितवा जिल्हा आहे?
): उत्तर- 36 वा

197) पालघर जिल्ह्यास कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत? 
): उत्तर- ठाणे, नाशिक

198) पोलीस विभागात परिक्षेत्राचे प्रमुखास काय म्हणतात?
): उत्तर- पोलीस उपमहानिरीक्षक

199) महाराष्ट्रात जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस उपविभागाचे प्रमुखास काय म्हणतात?
): उत्तर- उपविभागीय पोलिस अधिकारी

200) बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण?
): उत्तर- व्यंकटेश माडगूळकर


"महाराष्ट्रातील पंचायत राज- महत्त्वपूर्ण माहिती"


🌻1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?

==> स्थानिक स्वराज्य संस्था


🌻2. राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?

==> 2 ऑक्टोबर 1953


🌻3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?

==> 16 जानेवारी 1957


🌻4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?

==> वसंतराव नाईक समिती


🔘5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?

==> 27 जून 1960


🌻6. वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?

==> महसूल मंत्री


🔘7. वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?

==>226


🌻8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?

==> जिल्हा परिषद


🔘9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?

==> तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)


🌻10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?

==> 1 मे 1962


🌻11. ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?

==> महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966


🔘12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?

==> 7 ते 17


🌻13. ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?

==>जिल्हाधिकारी


🔘14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?

==> जिल्हाधिकारी


🌻15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?

==> 5 वर्षे


🌻16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कधी पासून मोजला जातो ?

==> पहिल्या सभेपासून


🌻17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?

==> तहसीलदार


🌻18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?

==> विभागीय आयुक्त


🌻19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> सरपंच


🌻20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

=पंचायत समिती सभापती


🌻21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?

==> दोन तृतीयांश (2/3)


🔘22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?

==> तीन चतुर्थांश (3/4)


🌻23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> पंचायत समिती सभापती



🔘24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> जिल्हा परिषद अध्यक्ष


🌻25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> संबंधित विषय समिती सभापती


🌻26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> जिल्हा परिषद अध्यक्ष


🌻27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> विभागीय आयुक्त


🌻28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?

==> ग्रामसेवक


🌻29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?

==> जिल्हा परिषदेचा


🌻30. ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?

==> जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून


🌻31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?

==> ग्रामसेवक


🌻32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?

==> शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)


🌻33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

==> राज्यशासनाला


🔘34. सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?

==> विस्तार अधिकारी


🌻35. गटविकास अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे ?

==> ग्रामविकास खाते


🌻36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

==> जिल्ह्याचे पालकमंत्री


🔘37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?

==> जिल्हाधिकारी


🌻38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?

==> दहा (स्थायी+9 विषय समित्या)


🌻39. जिल्हा परिषदेच्या समित्या कोणत्या आहेत ?

==> स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा


🌻40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात ?

==> जिल्हा परिषद अध्यक्ष


🌻41.महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?

==> वसंतराव नाईक 

सामान्य ज्ञान

1. भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली?

१. महात्मा गांधी

२. मानवेंद्र नाथ रॉय✅

३. डॉ बाबासाहेब आंबेडकर

४. जवाहरलाल नेहरू


2. संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्ष पदी कोणाची निवड केली होती?

१. डॉ राजेंद्र प्रसाद

२. एच सी मुखर्जी

३. डॉ सच्चीदानंद सिन्हा✅

४. पं मोतीलाल नेहरू



3. मूलभूत उप हक्क समिती चे अध्यक्ष कोण होते?

१. एच सी मुखर्जी

२. के एम मुन्शी 

३. वल्लभभाई पटेल

४. जे बी कृपलानी✅


4. कलम नं.....मध्ये भारताचे वर्णन 'राज्यांचा संघ' असे करण्यात आले आहे.

१. कलम न 1✅

२. कलम न 2

३. कलम न 3

४. कलम न 4



5. 'एकेरी नागरिकत्व' ची पद्धत भारताने कोणत्या घटने कडुन स्वीकारली आहे?

१. यु एस ए 

२. जपान

३.जर्मनी

४. ब्रिटिश✅


6. संविधान सभेचे उपअध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली?

१. बी एन राव

२. जवाहरलाल नेहरू

३. के एम मुन्शी

४. एच सी मुखर्जी✅




7..... रोजी संविधान सभेने भारताचा राष्ट्रध्वज स्वीकृत केला.

१. २२ जुलै १९४७✅

२. १७ नोव्हेंबर १९४७

३. २४ जानेवारी १९५०

४. ४ नोव्हेंबर१९४८


8. 'उद्देश पत्रिका' ही कोणी मंडली होती?

१. डॉ बाबासाहेब आंबेडकर

२. पं मोतीलाल नेहरू

३. डॉ राजेंद्र प्रसाद

४. जवाहरलाल नेहरू✅




9. घटनेचा आमल.....पासून सुरू झाला.

१. २६/०१/१९५०✅

२. २६/११/१९४९

३. २६/०८/१९४७

४. ०४/११/१९४८


10. मसुदा समिती मध्ये खालीलपैकी कोण नव्हते?

१. डॉ के एम मुन्शी

२. एन गोपालस्वामी अय्यंगार

३. अल्लादि कृष्णस्वामी अय्यर

४. बी एन राव✅



गोमटेश्वर – भारतातील सर्वात उंच पुतळा.


गोवा – क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य.


गोवा – भारतातील पहिला छापखाना या राज्यात निघाला.


गोविंद – बुटक्या तांदळाची जात.


ग्रामपंचायत – पंचायतराज व्यवस्थेतीस सर्वात खालचा स्थर.


ग्रामसेवक – हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो.


ग्रीनलंड – जगातील सर्वात मोठे बेट.


ग्रीनवीच – मुळ रेखावृत्त या शहरातुन जाते.


ग्रीनिच – ग्रेट ब्रिटनमधील 0० रेखांश स्थान व जागतिक प्रमाणवेळ स्थान.


ग्रीस – पहिले ऑलिम्पीकचे सामने येथे भरले गेले होते.


घटोत्कच – भीमाचा हिडिंबेपासून झालेला मुलगा.


घनफळ – घनाकृतीची लांबी, रूंदी व उंची यांच्या गुणाकारांनी आलेली संख्या.


घनमूळ – अंकगणितात ज्या मूळ संख्येला त्याच संख्येने दोनदा गुणले असता येणा-या गुणाकाराशी मूळ संख्येचे नाते.


घनीभवन – द्रवरूप तसेच वायुरुप पदार्थ घट्ट होण्याची प्रक्रिया.


घाशीराम कोतवाल – विजय तेंडूलकर यांनी १९७२ साली लिहीलेले हे नाटक गाजले.


चंडीगढ – पंजाब किंवा हरीयाणा या राज्यांची राजधानी.


चंदिगढ – भारताचे पहिले सुनियोजीत शहर.


चंद्रपुर – ताडोबा अभयारण्य या जिल्ह्यात आहे.

हे नक्की वाचा :- परीक्षेसाठी महत्वाचे



◆ ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक


◆ ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच


◆ ग्रामपंचायतीचा सचिव - ग्रामसेवक


◆ ग्रामसभेचे अध्यक्षस्थान - सरपंच


◆ सरपंचाच्या अनुपस्थित - उपसरपंच


◆ पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख - गटविकास अधिकारी


◆ पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सभापती


◆ पंचायत समितीचे सचिव - गटविकास अधिकारी


◆ पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव - BDO


◆ सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. समितीचे उपसभापती


◆ सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव - विस्तार अधिकारी


◆ जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख - CEO


◆ जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख - जि. प. अध्यक्ष


◆ जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव - Dy. CEO


◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष - जि. प. अध्यक्ष


◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव - Dy. CEO


◆ जिल्हा आमसभेचे अध्यक्ष - पालकमंत्री


◆ जिल्हा आमसभेचे सचिव - जिल्हाधिकारी


◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष - पालकमंत्री


◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव - जिल्हाधिकारी


◆ नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - मुख्याधिकारी


◆ नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - नगराध्यक्ष 


◆ नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव - मुख्याधिकारी


◆ महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - आयुक्त


◆ महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - महापौर


◆ महानगरपालिकेचा सचिव - आयुक्त


नियंत्रक आणि महालेखा परीक्षक

     नियंत्रक आणि महालेखाकार (कॅग) भारत लेख 148 स्थापना करून एक अधिकार आहे, भारतीय संविधानाच्या , जे ऑडिट सर्व पावत्या आणि खर्च या भारत सरकारच्या आणि राज्य सरकार , संस्था आणि अधिकारी सेवनाने यांनी आर्थिक त्या सरकार. कॅग ही सरकारी मालकीच्या कंपन्यांचे बाह्य ऑडिटरही आहेआणि सरकारी कंपन्यांचे पूरक लेखापरीक्षण करते, म्हणजेच कोणतीही नॉन-बँकिंग / बिगर-विमा कंपनी ज्यात केंद्र सरकारची इक्विटी हिस्सा कमीतकमी 51१ टक्के किंवा विद्यमान सरकारी कंपन्यांच्या सहाय्यक कंपन्यांचा हिस्सा आहे. कॅगचे अहवाल संसद / विधिमंडळात मांडले जातात आणि लोकलेखा समित्यांनी (पीएसी) आणि सार्वजनिक उपक्रमांवरील समित्यांनी (सीओपीयू) विचारात घेतल्या आहेत, ज्या भारतीय संसदेत आणि राज्य विधानमंडळातील विशेष समित्या आहेत . कॅग भारतीय ऑडिट अँड अकाउंट्स विभागाचे प्रमुख देखील आहेत, ज्याचे कामकाज भारतीय ऑडिट आणि अकाउंट्स सर्व्हिसेसच्या अधिका by ्यांमार्फत केले जातात आणि देशभरात (०१.०3.२०२० पर्यंत), 43,576 employees कर्मचारी आहेत.


नियुक्ती

नियंत्रक आणि भारत महालेखापरीक्षक नियुक्त केले राष्ट्रपती भारत  एक शिफारसीचे अनुसरण पंतप्रधान . भेटीनंतर, त्याने / तिला राष्ट्रपतींसमोर शपथ किंवा कबुली द्यावी लागेल.



कॅग कर्तव्ये

घटनेतील तरतुदीनुसार कॅगचा (डीपीसी) (कर्तव्ये, अधिकार व सेवा अटी) कायदा १ 1971.. लागू करण्यात आला. विविध तरतुदींनुसार, कॅगच्या कर्तव्यांमध्ये ऑडिट समाविष्ट आहेः

भारतीय समेकित निधी व राज्य व केंद्र शासित प्रदेश विधानसभेचे असणारी पावती व खर्च.

ट्रेडिंग, मॅन्युफॅक्चरिंग, नफा आणि तोटा खाती आणि ताळेबंद आणि इतर सहाय्यक खाती कोणत्याही सरकारी विभागात ठेवली जातात; शासकीय कार्यालये किंवा विभागांत ठेवलेली स्टोअर व साठा यांचे लेखा

कंपनी अ‍ॅक्ट, २०१ of मधील तरतुदीनुसार सरकारी कंपन्या .

संबंधित कायद्याच्या तरतुदीनुसार संसदेने बनविलेल्या कायद्यांनुसार किंवा त्या अंतर्गत स्थापना केलेली महामंडळे.

केंद्र आणि राज्य सरकारांच्या एकत्रित निधीतून प्राधिकरणास आणि संस्थांना मोठ्या प्रमाणात वित्तपुरवठा केला जातो. एकत्रीकृत निधीकडून भरीव अर्थसहाय्य दिले गेलेले नसले तरीही कोणाचे किंवा प्राधिकरण, त्याचे लेखापरीक्षण सीएंडएजीकडे सोपविले जाऊ शकते.

विशिष्ट उद्देशाने संस्था व प्राधिकरणास शासनाने दिलेले अनुदान व कर्ज.

तांत्रिक मार्गदर्शन व समर्थन (टीजीएस) अंतर्गत पंचायती राज संस्था आणि शहरी स्थानिक संस्था यांचेकडे सोपविलेले ऑडिट.


MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम




MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा
अभ्यासक्रम



पेपर- १ (गुण २०० - कालावधी २ तास)

1.राज्य ,राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी.

2.भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ

3.महाराष्ट्र , भारत आणि जगाचा भूगोल- भौतिक , सामाजिक आणि आर्थिक.

4.महाराष्ट्र व भारत - राज्यव्यवस्था आणि शासन- राज्यघटना , राजकीय व्यवस्था , पंचायती राज , शहरी प्रशासन , शासकीय  धोरणं ,  हक्कविषयक घडामोडी इत्यादी .

5.आर्थिक आणि सामाजिक विकास- शाश्वत विकास , गरिबी , समावेशन , लोकसंख्याविषयक मुद्दे , सामाजिक धोरणं इ.

6.पर्यावरणीय परिस्थिती ,जैव विविधता , हवामान बदल (सर्वसामान्य मुद्दे )

7. सामान्य विज्ञान


पेपर- 2 (गुण २०० - कालावधी २ तास)

▪️इंटरपर्सनल स्किल्स (कम्युनिकेशन स्किलसह)

▪️तर्कशुद्ध युक्तिवाद आणि मीमांसा/ पृथ:करण क्षमता (लॉजिकल रिझनिंग आणि अॅनालिटिकल अॅबिलिटी)

▪️निर्णय क्षमता व प्रश्नांची उकल ( डिसिजन मेकींग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग)

▪️सामान्य बुद्धिमापन क्षमता (जनरल मेंटल एबिलिटी)

▪️बेसिक न्यूमरसी , डेटा इंटरप्रिटेशन (चार्ट , ग्राफ , टेबल्स) (दहावीचा स्तर असेल)

▪️इंग्लिश व मराठी भाषा आकलन क्षमता - कॉम्प्रिहेन्शन स्किल (दहावीस्तर)



 राज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तके

▪️ इतिहास- डॉ अनिल कठारे
▪️समाजसुधारक- के सागर
▪️भूगोल- ए. बी. सवदी
▪️भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत
▪️पंचायतराज- के सागर
▪️भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे
▪️विज्ञान आणि तंत्रज्ञान- अनिल कोलते
▪️गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे
▪️बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
▪️राज्यसेवा C-SAT गाईड- अरिहंत प्रकाशन
▪️चालू घडामोडी– लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, चाणक्य मंडल मासिक,

राज्यघटना महत्वाचे मुद्दे


1)घटनानिर्मिती:-


➡️TIMELINE पूर्ण पाठ करा.

➡️घटनेचे स्रोत 

➡️ मसुदा समिती ( सदस्य पाठ करा)

➡️ कबिनेट मिशन योजना आणि तरतुदी निवडणूक ( निवडून आलेले सदस्य).

➡️भारतीय स्वातंत्र्य चा कायदा आणि बदल 

➡️दार आयोग ,jvp समिती ,पाक आयोग तरतुदी ,अहवाल पाठ करा .

➡️ राज्यनिर्मिती क्रम आणि संबंधित घटनादुरुस्ती


⭕️मलभूत हक्क :-

➡️कलम 25-29 

➡️कलमे आणि जोड्या जुळवा

➡️कलमे अपवाद (25-29 , 15-19कलम 32 :- कोणाविरुद्ध देऊ शकतो आणि  कोणाविरुद्ध नाही . 

➡️कलम 13 आणि कायदा ह्यात समाविष्ट घटक .

➡️ कलम 19 आणि  अपवाद*(IMP)


⭕️मार्गदर्शक तत्वे :- 

➡️ कोणत्या घटनादुरुस्ती ने  कोणते टाकले गेले करा EXPECTED प्रश्न.

➡️ कलम 44,40,39 ,48,41,43 पाठ करा 

➡️ नयायप्रविष्ट नाही आणि महत्वाचे मुद्दे,काय प्रस्थापित करतात ते बघून घ्या .

➡️ मलभूत हक्क आणि DPSP फरक करून घ्या .

➡️कलम 351 हिंदी भाषा संबंधित तत्वे .


⭕️मलभूत कर्तव्ये:-

➡️ करम येऊ शकतो .

➡️ कोणत्या समिती ने टाकले आणि संबंधित घटनादुरुस्ती टाकले .

➡️ नयायप्रविष्ट आहे नाही or परकीयांना उपलब्ध की नाही करून घ्या 

➡️कर्तव्ये वाचून घ्या कोणते आहे कोणते नाही चूकओळखायला येऊ शकतो.



⭕️✔️ राष्ट्रपती ,उपराष्ट्रपती, & राज्यपाल महत्वाचे कलमे (राष्ट्रपती अनुमोदन ,निवडणूक सहभाग ?कार्य शपथ ,कार्यकाळ ,क्षमादान )


♦️ घटनात्मक आयोग आणि बिगर घटनात्मक आयोग (1 प्रश्न compulsory)

➡️ राज्य निवडणूक आयोग (25 वर्ष)

➡️मानवी हक्क आयोग ,राज्य महिला आयोग 

➡️ नयायालय (SC ,HC,:- अध्यक्ष पात्रता ,इतर न्यायाधीश तरतुदी )

➡️ पचायत राज :-


♦️समिती आणि अहवाल


♦️  गरामपंचायत ,सरपंच ,जिल्हा परिषद ,पंचायत समिती (ह्या बाहेर अजून प्रश्न नाही)

♦️ महान्यायवादी ,महाधिवक्ता (कार्यकाळ ,पदच्युत ? नेमणूक ,कलमे   मतदान?)

♦️ससद ,राज्यविधिमंडल :- विधेयक ,zero hour,  प्रस्ताव ,समित्या करा .

♦️पतप्रधान ,मुख्यमंत्री कार्य तरतुदी .

♦️घटनादुरुस्ती :- प्रकार ,संमती कधी पर्यंत करा .

♦️ CAG :- कार्यकाळ ,पदच्युत पद्धत( PYQ FOCUS )



⚠️⚠️वरील सर्व topic focus असू द्या एकदा नजर फिरवून घ्या polity हा अत्यंत सोपा वाटतो परंतु पेपर ला गेल्यावर चांगले चांगल्या लोकांची wicket पडते म्हणून आपली पडायला नको तर हे topic वाचून व्यवस्थित करूनच घ्या 7-8 मार्क्स हमखास मिळतील.


😱वरील विषयाचा मी तज्ञ नाही केवळ आयोगाच्या मागील 10 वर्षाच्या ANALYSIS वरून हे TOPIC काढलेले आहे ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी नसेल केले हे टॉपिक तर नक्की करा झाला तर 1000% टक्के फायदा आणि 0% तोटा होईल ही शाश्वती😜😜


भारतीय राज्यघटना

पार्श्वभूमी:


दुसरे महायुध्द संपुष्टात आल्यानंतर, भारतीयांने ज्या आश्वासनावर ब्रिटिशांना मदत केली. ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी १९४२ मध्ये स्टॅफोर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली एक आयोग भारतात पाठवण्यात आले. मात्र स्टॅफोर्ड क्रिप्स यांनी जो अहवाल तयार केला त्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्याविषयी कोणत्याही प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे भारतातील नेत्यांकडून या अहवालाविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली.

त्यानंतर १९४६ मध्ये ‘त्रिमंत्री मंडळ’ भारताविषयी निर्णय घेण्यासाठी पाठवण्यात आले. या मंडळामध्ये पॅट्रिक लॉरेन्स, स्टॅफोर्ड क्रिप्स व ए.व्ही. अलेक्झांडर यांचा समावेश होता. या मंडळाच्या शिफारशीनुसार ब्रिटीश सरकारने भारताच्या स्वातंत्र्याची मागणी स्वीकारली होती. त्यामुळे भारतामध्ये सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या कॉंग्रेसने या मंडळाचा अहवाल स्वीकारला होता.

या त्रिमंत्री योजनेच्या शिफारशीमध्ये स्वतंत्र भारताची राज्यघटना बनवण्याची एक महत्वाची शिफारस होती. या शिफारशीनुसार जुलै १९४६ मध्ये घटना परिषदेच्या निवडणुका घेण्यात आल्या. निवडून आलेल्या सदस्यांची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ मध्ये घेण्यात आली.


घटना परिषदेची रचना :


१) घटना परिषदेतील सदस्यांची संख्या- ३८९ यामध्ये २९६- सदस्य ब्रिटिश भारतातील होते, तर ९३- सदस्य हे भारतीय संस्थानातील होते.

2) निवडण्यात आलेले सदस्य हे १० लाख लोकसंख्येमागे एक सदस्य या प्रमाणात निवडण्यात आलेले होते.

3) भारतातील सर्व समाजातील प्रतिनिधींना सभासदत्व देण्यात आलेले होते.

4) निवडून आलेल्या सदस्यांमध्ये कॉंग्रेसचे २०८ सदस्य होते. मुस्लीम लीगचे ७३ सदस्य होते. तर इतर छोट्या पक्षांना एकूण १५ जागा मिळाल्या होत्या.


घटना परिषदेचे कार्य:


I. ९ डिसेंबर १९४६ मध्ये या परिषदेच्या प्रत्यक्ष कार्याला सुरवात झाली.

II. घटना परिषदेच्या पहिल्या बैठकीचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली.

III. ११ डिसेंबर १९४६ मध्ये राजेंद्र प्रसाद यांची घटना परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

IV. मात्र मुस्लीम लीगकडून घटना परिषदेवर बहिष्कार घालण्यात आला होता.

V. त्यामुळे २११ सदस्यांच्या घटना निर्मितीच्या कार्याला सुरवात झाली.


घटनेचा उद्देश ठराव:


कोणतेही कार्य करत असताना आपल्या समोर उद्दिष्ट असावे लागते. उदा. आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्या समोर अधिकारी बनण्याचे उद्दिष्ट असते. त्याप्रमाणे भारत हा स्वातंत्र्यानंतर लोकशाही देश बनणार होता. त्यामुळे भारतीय राज्यघटना निर्माण करत असताना घटना परिषदेसमोर काही उद्दिष्ट असणे आवश्यक होते. त्यामुळे १३ डिसेंबर १९४६ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय राज्यघटनेचा ठराव मांडला.

1) प्रशासनविषयक : ही घटना परिषद असे जाहीर करते कि, भारत देश स्वतंत्र, सार्वभौम, गणराज्य आहे व या देशाच्या प्रशासनासाठी आम्ही ही राज्यघटना निर्माण करू.

2) संघविषयक: सध्या भारतामध्ये समाविष्ट असणारा भुप्रदेश, राज्याचा भूप्रदेश, ब्रिटीश भारताबाहेरील भारताचा इतर भाग ज्यांना सार्वभौम भारताचा घटक बनण्याची इच्छा आहे, या सर्वांचा एक संघ असेल.

3) न्याय स्वातंत्र्य, समता यांची हमी व संरक्षण: न्याय- सामाजिक, राजकीय, आर्थिक यांच्या बाबतीत समता- दर्जा, संधी आणि कायद्यासमोर यांच्या बाबतीत स्वातंत्र्य- विचार, उच्चार, श्रद्धा, उपासना, व्यवसाय आणि संघटना या बाबतीत.

a) अल्पसंख्यांक व मागासांना संरक्षण: अल्पसंख्यांक, मागास आणि आदिवासी, वंचित व मागास वर्ग यांना पुरेसे संरक्षण

b) राज्यघटनेचा स्त्रोत- भारतीय लोक: सार्वभौम स्वतंत्र भारत, तिचे घटनात्मक भाग आणि शासनाची सत्ता आणि अधिसत्ता याचा स्त्रोत भारतीय लोक असतील.

c) सार्वभौम हक्क: गणराज्याची अखंडता व सभ्य राष्ट्राच्या न्याय व कायद्याप्रमाणे तिचा जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्र यावरचे सार्वभौम हक्क अबाधित राखला जाईल.

d) जगात मनाचे स्थान: ही प्राचीन भूमी, जगात तिचे न्याय हक्क आणि सन्मान प्राप्तल करेल. त्याचबरोबर मानवी समाजाचे कल्याण व जागतिक शांततेसाठी पूर्णपणे योगदान करेल.

e) स्वायतता : भारतीय भूभागाला राज्यघटनेप्रमाणे स्वायत्त एककाचा दर्जा दिला जाईल.





घटना परिषदेची इतर महत्वाची कामे


I. राष्ट्रीय ध्वज स्वीकारला – २२ जुलै १९४७

II. राष्ट्रकुल सदस्यत्वाला मंजुरी देण्यात आली.- मे १९४९

III. राष्ट्रगीताचा स्वीकार करण्यात आला- २४ जानेवारी १९५०

IV. राष्ट्रीय गीताचा स्वीकार करण्यात आला- २४ जानेवारी १९५०

V. पहिले राष्ट्रपती म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली- २४ जानेवारी १९५०


घटना परिषदेविषयी विशेष महत्वाचे


या घटना परिषदेची स्थापना करण्यात आल्यापासून तिचे कामकाज २ वर्ष ११ महिने व १८ दिवस चालले. शेवटची बैठक २४ जानेवारी १९५० रोजी झाली. घटनापरिषदेने देशांच्या घटनांचा अभ्यास केला. या परिषदेवर एकूण कालावधीमध्ये ६० लाख रुपये खर्च झाले. या परिषदेचे एकूण ११४ दिवस अधिवेशन चालले.


घटना समितीतील महत्वाच्या समित्या व त्यांचे अध्यक्ष


अ. क्र.   समितीचे नाव   समितीचे अध्यक्ष

१   संघराज्य घटना समिती   पं. जवाहरलाल नेहरू

२.   केंद्रीय उर्जा समिती   पं. जवाहरलाल नेहरू

३.   मसुदा समिती   डॉ. बाबासाहेब आंबेडकर

४.   प्रांतीय राज्यघटना समिती   सरदार पटेल

५.   राज्य समिती   पं. जवाहरलाल नेहरू

६.   सुकाणू समिती   डॉ. राजेंद्र प्रसाद

७.   सभागृह समिती   पट्टाभी सीतारामय्या


मसुदा समिती


आपण पाहिलेल्या समितीमध्ये मसुदा समितीचे कार्य हे महत्वाचे होते. कारण, या समितीने घटनेला लिखित स्वरूप प्राप्त करून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली २९ ऑगस्ट १९४७ मध्ये मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. या समितीमध्ये सात सदस्यांचा समावेश करण्यात आलेला होता.

१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( अध्यक्ष)

२) एन. गोपालस्वामी अय्यंगार

३) अल्लादी कृष्णास्वामी अय्यर

४) के.एम.मुन्शी

५) सय्यद मोहमद शादुल्ला

६) एन. माधव राव

७) टी. टी. कृष्णम्माचारी ( यांची निवड खैतानच्या मृत्युनंतर करण्यात आली.)

मसुदा समितीने घटना परिषदेतील वेगवेगळ्या समित्यांसोबत चर्चा केली. त्याचबरोबर देशातील वेगवेगळ्या गटांबरोबर चर्चा करून आपला मसुदा फेब्रुवारी १९४८ मध्ये प्रसिध्द केला.

तो मसुदा प्रसिद्ध केल्यानंतर लोकांना त्यावर चर्चा करण्यासाठी व त्यावर आपले मत मांडण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी देण्यात आला. ज्या लोकांना आपले मत मांडावयाचे आहे त्यांच्यासाठी पत्राद्वारे आपले मत मांडण्यास परवानगी देण्यात आली.

- लोकांकडून आलेल्या मतानुसार काही दुरुस्त्या करण्यात आल्या. काही दुरुस्त्या करण्यात येऊन ऑक्टोबर १९४८ मध्ये पुन्हा मसूदा तयार करण्यात आला.


मसुद्याचे कायद्यात रुपांतर कसे झाले ?


पहिले वाचन


४ नोव्हेंबर १९४८ मध्ये मसुदा घटना परिषदेसमोर ठेवण्यात आला. या परिषदेमध्ये मसुद्यावर सर्वसाधारण ५ दिवस चर्चा करण्यात आली. या वाचनामध्ये काही दुरुस्त्या सुचवण्यात आल्या.


दुसरे वाचन


दुसऱ्या वाचन १५ नोव्हेंबर १९४८ ते १७ ऑक्टोबर १९४९ या कालावधीदरम्यान करण्यात आले. पहिल्या वाचनामध्ये ज्या दुरुस्त्या सुचवण्यात आलेल्या होत्या त्यावर चर्चा करण्यात आली.


तिसरे वाचन


तिसरे वाचन १९ नोव्हेंबर १९४९ रोजी करण्यात आले. हे एक औपचारिक वाचन होते. कारण ज्या काही दुरुस्त्या होत्या त्या दुसऱ्या वाचनादरम्यान करण्यात आलेल्या होत्या. या वाचनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेला मसुदा मान्यतेसाठी घटना समितीसमोर ठेवला.

२६ नोव्हेंबर १९४९ मध्ये घटना परिषदेकडून राज्यघटनेला मान्यता देण्यात आली.


राज्य घटना प्रत्यक्ष लागू


- २६ जानेवारी १९५० रोजी राज्य घटना प्रत्यक्ष लागू करण्यात आली. २६ जानेवारी ही तारीख निवडण्याचे कारण म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये २६ जानेवारी १९३० रोजी पूर्ण स्वराज्याची घोषणा करण्यात आलेली होती.


अश्याच महत्वाच्या माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-



राज्य घटनेची वैशिष्ट्ये :


a)विस्तृत लिखित राज्यघटना:


जगामध्ये दोन प्रकारच्या राज्यघटना अस्तित्वात आहेत. लिखित राज्यघटना व अलिखित राज्यघटना. अमेरिकेच्या राज्यघटनेकडे पाहिल्यास या घटनेमध्ये फक्त १४ कलमे आहेत.

मात्र भारताच्या राज्यघटनेमध्ये ८ परिशिष्टे व ३९५ कलमे होती. सध्या १२ परिशिष्टे व ४५० कलमांचा समावेश करण्यात आला आहे.


b) विविध स्त्रोतांपासून निर्मिती:


- राज्यघटना बनवत असताना इतर देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करण्यात आला.

- या राज्यघटनेवर १९३५ च्या कायद्याचा जास्त प्रमाणावर प्रभाव दिसून येतो.

- अमेरिकन राज्यघटनेवरून मुलभूत हक्क / न्यायालयीन पुनर्विलोकन या बाबींचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला.

- आयर्लंडच्या राज्यघटनेवरून मार्गदर्शक तत्वांचा स्वीकार करण्यात आला.


c) मुलभूत हक्क:


- राज्यघटनेनुसार देशातील नागरिकांना काही मुलभूत हक्क देण्यात आलेले आहेत.

- राज्यघटनेमध्ये एकूण सहा प्रकारचे मुलभूत हक्क देण्यात आले आहेत.

- मुलभूत हक्कांचा समावेश राज्यघटनेच्या तिसऱ्या विभागामध्ये करण्यात आला आहे.


d) लवचिक व ताठर राज्यघटना :


- अमेरिकन राज्यघटना ही खूपच ताठर आहे. कारण या राज्यघटनेतील कलमांमध्ये सहजासहजी बदल / दुरुस्त्या करता येत नाहीत.

- तर ब्रिटिश राज्यघटना ही खूपच लवचिक आहे.

- मात्र घटनाकर्त्यांनी या दोन्हींचा विचार करून मधला मार्ग निवडला आहे.

- काही कलमांची दुरुस्ती ही सहज करता येते तर काही कलमांच्या दुरुस्तीसाठी विशेष अशा बहुमताची गरज असते.


e) मुलभूत कर्तव्य :


- १९७६ च्या ४२ व्या घटनादुरुस्तीन्वये राज्यघटनेमध्ये एकूण ११ कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे.

- मुलभूत कर्तव्यांचा राज्यघटनेमध्ये समावेश करण्यासाठी स्वर्ण सिंग समितीची स्थापना करण्यात आली होती.

- या समितीच्या शिफारसीनुसार राज्यघटनेमध्ये मुलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला.

- मात्र मुलभूत कर्तव्यांबाबत कायदेशीर बंधने घालण्यात आलेली नाहीत.

- ही केवळ आदर्शे आहेत.


f) निधर्मी राष्ट्र:


- पाकिस्तानसारखे राष्ट्र हे एक इस्लाम धर्म असणारे राष्ट्र आहे.

- मात्र भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात. कोणत्या एका धर्माला जास्त महत्व न देता सर्वांना समानता देण्यात आली आहे.

- सार्वजनिक सुव्यवस्था, नितीमत्ता, आरोग्य यांना बाधा न आणता सर्वांना धार्मिक आचरण करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

- अल्पसंख्यांकांना शिक्षण संस्था स्थापण्याचा व चालवण्याचा अधिकार देण्यात आला आहे.


g) मार्गदर्शक तत्व:


- घटनेच्या चौथ्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे.

- शासनाने आपला राज्यकारभार कोणत्या उद्देशासाठी करावा- हे स्पष्ट करणारी मार्गदर्शक तत्वे घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.

- ही मार्गदर्शक तत्वे- राजकीय, सामाजिक, आर्थिक, मानवहित, आरोग्य यासंबंधी आहेत.

- या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी कशी होते, त्यावरून त्या राज्याच्या शासनाच्या कार्याचे मूल्यमापन होत असते.


h) एकेरी नागरिकत्व :


- अमेरिकेमध्ये संघाचे व राज्याचे असे वेगवेगळे नागरिकत्व दिले जाते.

- भारतामध्येही अनेक राज्य अस्तित्वात आहेत, मात्र या प्रत्येक राज्यांना वेगवेगळे नागरिकत्व न देता सर्वांसाठी एकच (एकेरी) नागरिकत्व देण्यात आले आहे.


i) स्वतंत्र व एकेरी न्यायव्यवस्था :


- संपूर्ण देशासाठी एकसूत्री न्यायव्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.

- सर्व देशासाठी सर्वोच्च न्यायालय हे अंतिम न्यायालय आहे. (apex court)


j)मतदानाचा अधिकार :


- पहिल्यांदा २१ वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता.

- मात्र १९८९ मध्ये ५१ व्या घटनादुरुस्तीनुसार १८ वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.


k)आणीबाणीची तरतूद :


- काही घटनात्मक पेचप्रसंगाच्या वेळी देशामध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते, अशा वेळी आणीबाणी लागू केली जाते. हे आणीबाणी लागू करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आले आहेत.

- या आणीबाणीच्या काळामध्ये केंद्र हे प्रबळ बनते. राज्याचे सर्व अधिकार केंद्राकडे जात असतात.


l) त्रि–स्तरीय सरकारची स्थापना:


- केंद्र, राज्य, पंचायत राज

- यानुसार पूर्ण देशासाठी केंद्र सरकार अस्तित्वात असून, ही एक उच्च अशी शासनव्यवस्था आहे.

- प्रत्येक राज्यासाठी राज्य सरकारची निर्मिती करण्यात आली आहे.

- तर जिल्हा- तालुका- ग्राम( खेडे) यासाठी पंचायतराजची स्थापना करण्यात आली आहे.


राज्यघटनेविषयीचे काही दोष:


1. घटना निर्मिती करण्यासाठी जी घटना परिषद बनवण्यात आली होती, त्यातील सदस्यांची निवड ही प्रत्यक्ष मतदानाद्वारे करण्यात आली नव्हती.

2. लॉर्ड विस्काऊट सायमन व विन्स्टन चर्चिलच्या मते, “ भारतीय राज्यघटना ही हिंदू लोकांपासून बनवण्यात आलेली आहे.”

3. काहींच्या मते, “ घटना परिषद ही वकील- राजकीय व्यक्तींची बनलेली होती.”


  

पंचायतराज संबंधित घटनादुरुत्या

७३ वी घटना दुरुस्ती ( १९९२ – ९३ )

           ग्रामविकास राष्ट्रविकासाचा मूलभूत पाया मानला जातो. भारतीय राह्यघटनेच्या कलम ४० मध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख आढळतो. परंतु हे कलम राज्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये येत असल्यामुळे याकडे राज्यांनी दुर्लक्ष केले. भारतामध्ये प्राचीन कालखंडापासून पंचायतराज संस्था अस्तित्वात आहेत. परंतु या संस्थांना घटनात्मक दर्जा नसल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणामध्ये या संस्थांचा विकास झाला नाही. पंचायतराज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा. अशी शिफारस सर्वप्रथम १९८६ मध्ये डॉ. एल. एम. सिंघवी या समितीने केली होती.


            ग्रामीण भागात सत्तेचे विकेंद्रीकरण होण्यासाठी व पंचायतराज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्यासाठी पहिला प्रयत्न राजीव गांधी यांनी केला ‘नया पंचायतराज’ नावाचे ६४ वे घटनादुरुस्ती विधेयक १९८९ ला संसदेत सादर केले. परंतु अपयश आले. तसेच व्ही. पी. सिंग व चंद्रशेखर यांनीही प्रयत्न केले.


– पंचायतराज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा अशी शिफारस प्रथम डॉ. एल. एम. सिंघवी यांनी केली.

– राजीव गांधी यांनी सर्वप्रथम १५ मे  १९८९ ला ‘नाय पंचायतराज’ नावाचे ६४ वे पंचायतराज घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर केले.

– १९८९ ला व्ही. पी.सिंग व चंद्रशेखर यांनीही पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याचा प्रयत्न केले.

– १९९० ला लोकसभा विसर्जित झालयामुळे या विधेयकावर चर्चा होऊ शकली नाही.

-१९९२ ला पी. व्ही. नरसिंहराव यांनी पंचायतराज संबधी ७३ वे घटना दुरुस्ती विधेयक तयार केले.

– २२ डिसेंबर १९९२ ला या विधेयकावर लोकसभेत बहुमत सिद्ध.

– २३ डिसेंबर १९९२ ला या विधेयकावर राज्यसभेत बहुमत सिद्ध. व त्यानंतर या विधेयकास १७ राज्याची विधिमंडळाची मंजुरी मिळाली.

– २० एप्रिल १९९३ ला या विधयेकावर राष्टत्रपतीची स्वाक्षरी होऊन पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला.

– २४ एप्रिल १९९३ पासून ७३ व्या घटना दुरुस्तीच्या अंबलबजावणी सुरु.

– २४ एप्रिल १९९४ पर्यंत या शिफारशी सर्व राज्यांना लागू करण्याचे बंधनकारक आले.

– २०१० पासून २४ एप्रिल हा दिवस संपूर्ण देशामध्ये ‘पंचायतराज दिन’ म्हणून पाळला जातो.

– भारतीय राज्यघटनेच्या कलम २४३ ( A ते O ) मध्ये पंचायतराजची तरतूद करण्यात आली. व भारतीय राज्यघटनेला ११ वे परिशिष्ट जोडण्यात आले व त्यामध्ये एकूण २९ विषयांचा समावेश करण्यांत आला आहे.

– ७३ व्या घटनादुरुस्ती विधेयकास बिहार व पश्चिम बंगाल या राज्यांनी विरोध दर्शविला होता.


 ७३ व्या घटनादुरुस्तीचे वैशिष्ट्य / परिणाम / भूमिका :


१) पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त कलम २४३ ( A ते O )

2) राज्यघटनेला अकरावे परिशिष्ट जोडण्यात आले. ( त्यामध्ये एकूण २९ विषयांचा समावेश आहे. )

३) जिल्हा ग्रामसभा व पंचायत व्याख्या कलम ( २४३ )

४) ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्राप्त कलम २४३ ( A )

५) त्रिस्तरीय पंचायत राज संस्थेची तरतूद कलम २४३ ( B )

६) पंचायत राज संस्थांची रचना निश्चित कलम २४३ ( C )

७) पंचायत राजमध्ये राखीव जागांची तरतूद कलम २४३ ( D )

अ ) महिलांसाठी ३३ टक्के राखीव जागा

ब ) इतर मागासवर्गीय ( OBC ) २७ टक्के राखीव जागा

क ) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ( SC / ST ) यांना लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा.


८) पंचायतीत राज संस्थांचा कार्यकाल निश्चित कलम २४३ (E)

९) पंचायत राज सदस्यांची अपात्रता कलम २४३ ( F )

१०) पंचायतराजसंस्था सत्ता अधिकार व जवाबदाऱ्या २४३ ( G )

११) पंचायत राज संस्थासंबधी वित्तीय तरतुदी कलम २४३ ( H )

१२) राज्य वित्त आयोगाची स्थापना कलम २४३ ( I )

१३) पंचायत राज संस्थांचे हिशोब व ऑडिट कलम २४३ ( J )

१४) पंच्यात्तराजच्या निवडणूका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोग कलम २४३ ( K )

१५) केंद्रशासित प्रदेशाबाबत तरतुदी कलम २४३ ( L )

१६) काही प्रदेशाला ७३ व्या घटनादुरुस्तीमधून सूट कलम २४३ ( M )

१७) सध्या अस्तित्वात असलेल्या पंचायती चालू ठेवणे कलम २४३ ( N )

१८) पंचायत संस्थांचा निवडणूक प्रक्रियेत न्यायालयाचा हस्तक्षेप नाही कलम २४३ ( O )



अर्थव्यवस्था प्रश्न सराव


1) भारतात आर्थिक नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने रुजावे यासाठी सर्वप्रथम प्रयत्नात येतात.

   अ) श्री. एम. एन. रॉय यांचे पुस्तक “प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया”

   ब) श्री. विश्वेश्वरय्या यांचे “टेन यिअर पिपल्स प्लॅन”

        वरील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

   1) केवळ अ   

   2) केवळ ब 

   3) दोन्ही     

   4) एकही नाही


उत्तर :- 4


2) राज्यांचा एकत्रित निधी वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणती उपाययोजना बाराव्या वित्त आयोगाने (2005-10) सुचविली आहे ?

   1) ग्रामपंचायत आणि नगरपालिकांचा वित्तीय साधनांना पूरक निधी

   2) विकेंद्रीकरणाच्या प्रक्रियेस प्रोत्साहन देणे

   3) रस्ते आणि पूल बांधणे

   4) आर्थिक विकासास चालना देणे


उत्तर :- 2


3) भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेनुसार (2002-2007) शेती क्षेत्रामधून अजूनही ............. टक्के रोजगार निर्मिती होत आहे.

   1) 50.3   

   2) 40.4    

   3) 45.0     

  4) 58.4


उत्तर :- 1


4) दारिद्रय निर्मुलन (गरीबी हटाओ) आणि आत्मनिर्भरता ही .............. पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्टे होती.

1) तिस-या    

2) पाचव्या   

3) दुस-या    

4) सहाव्या


उत्तर :- 2


5) उत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड या राज्यांची निर्मिती ............. या पंचवार्षिक योजनेत झाली.

   1) नवव्या    

  2) सातव्या  

  3) आठव्या   

  4) वरीलपैकी नाही


उत्तर :- 1



6) योग्य जोडया जुळवा.

   अ) 1 ली योजना      i) उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण प्रतिमान    

   ब) 2 री योजना      ii) हॅरॉड, डोमर प्रतिमान

   क) 8 वी योजना      iii) महालनोबिस प्रतिमान

   ड) 11 वी योजना    iv) पुरा प्रतिमान

  अ  ब  क  ड

         1) i  ii  iii  iv

         2) ii  iii  iv  i

         3) ii  iii  i  iv

         4) iv  i  ii  iii


उत्तर :- 3


7) खालीलपैकी कोणते घटक भारतामधील  आर्थिक नियोजनाचे अपयश आहेत ?

   अ) अल्प दरडोई उत्पन्न आणि वृद्धी दर

   ब) दारिद्रय आणि बेकारी

   क)‍ संथ औद्योगिकरण

   ड) उत्पन्न आणि संपत्तीमधील विषमता

   1) ब, ड आणि क 

   2) अ आणि ब   

   3) अ, ब आणि क  

  4) ब आणि ड


उत्तर :- 4


8) भारतीय नियोजन मंडळाने प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी धोरणात्मक उपाय योजना स्वीकारलेल्या आहेत. त्या 

     खालीलप्रमाणे –

   अ) मागास प्रदेशाचा प्रत्यक्ष विकास करण्यासाठी विशेष क्षेत्र विकास कार्यक्रम राबविणे.

   ब) मागास प्रदेशातील उद्योग प्रकल्पांना सवलतीचा वित्तपुरवठा स्टेट बँक ऑफ इंडिया कडून देणे.

   क) मागास प्रदेशात खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे.

         वरीलपैकी कोणते/ती विधान/ ने बरोबर आहे/ आहेत  ?


   1) अ आणि क     

   2) ब आणि क   

   3) फक्त अ    

   4) अ, ब आणि क


उत्तर :- 1


9) भारतातील आठ अग्रगण्य उद्योगपतींनी 1950 च्या दशकात तयार केलेल्या आर्थिक विकासाच्या योजनेस ............ म्हणतात.

   1) बॉम्बे प्लॅन (योजना)   

   2) गांधी योजना   

   3) नेहरू योजना   

   4) पंचवार्षिक योजना


उत्तर :- 1


10) भारतातील कोणत्या राज्याने पहिल्यांदा विकेंद्रीत नियोजन अंगिकारले ?

     1) कर्नाटक  

     2) महाराष्ट्र    

     3) गुजरात  

    4) राजस्थान


उत्तर :- 4

भारताची राज्यघटना 200 प्रश्न आणि उत्तर

1.राज्यसभेचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात?

1. राष्ट्रपती

2. महान्यायवादी

3.उपराष्ट्रपती✅

4.पंतप्रधान 


2. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचा अध्यक्ष कोण असतो?

1.पोलीस अधीक्षक

2.जिल्हाधिकारी✅

3.मुख्य कार्यकारी अधिकारी

4.पालकमंत्री


3.महाराष्ट्रातून लोकसभेत किती सदस्य निवडून जातात?

1.46

2. 48✅

3.50

4 44


4.मतदारासाठी आवश्यक पात्रता वय 21 वरुन 18 वर्षे कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले?

1.61 वी✅

2. 62 वी

3.71 वी

4.81 वी


5.नव्या कायद्याच्या प्रस्तावाला  काय म्हणतात?

1.ठराव

2. अध्यादेश

3.वटहुकूम

4.विधेयक✅

 

6.भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो? 

1.भारताचा नियंत्रक व महालेखापाल

2.सर्वाच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश

3.भारताचा महान्यायवादी✅

4. Ad. जनरल


7.संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते?

1.लोकसभा

2.राज्यसभा✅

3.विधानसभा

4.विधानपरिषद


8.भारतातील भाषिक तत्वावर निर्माण झालेल पहिलं राज्य कोणतं?

1.पंजाब

2.महाराष्ट्र

3.गुजरात

4 आंध्रप्रदेश✅


9.कोणत्या घटकराज्यात विधानपरिषद अस्तित्वात नाही?

1.महाराष्ट्र

2.कर्नाटक

3.गुजरात✅

4. केरळ


10.राज्यघटना दुरुस्तीची पद्धत कोणत्या कलमामध्ये स्पष्ट करण्यात आली आहे?

1. 361

2.368✅

3.371

4.378


1. खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्त्वाचे मूलभूत अधिकारात रुपांतर झाले आहे?

१.काम करण्याचा अधिकार

२.माहिती अधिकार

३.चांगल्या पर्यावरणाचा अधिकार

४.शिक्षणाचा अधिकार✅


2. सरपंचा विरुद्ध चा अविश्वास ठराव दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने संमत झाला नाही तर पुढीलपैकी काय होऊ शकते?

१.अविश्वास ठराव पुन्हा सहा महिन्यांच्या आत आणता येतो

२.अविश्वास ठराव पुन्हा आणताच येत नाही

३.एक वर्षानंतर त्याच सरपंचा विरुद्ध अविश्वास ठराव मांडता येतो✅

४.सरपंचाला विवाद अर्ज उच्च न्यायालयात सादर करता येतो


3. महाराष्ट्राच्या रचनेनंतर इ. स. १९६० या वर्षी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष कोण होते?

१.श्री ग मवळकर

२.श्री त्र्य शि भारदे

३.श्री स ल सिलम✅

४.श्री के कृ वानखेडे


4. 'नेमो डिबेट ई इंडेक्स इन प्रोप्रिया क्वाझा' (Nemo Debet Esse Index In Propria Causa) या लॅटिन माक्झिम चा पुढीलपैकी के अर्थ आहे?

१.राजा कधीही चूक करत नाही

२.कोणतीही व्यक्ती स्वतः च्या प्रकरणात न्यायाधीश असू शकत नाही✅

३.बाजू मांडण्याची संधी दिल्या शिवाय कोणत्याही व्यक्तीला शिक्षा देण्यात येणार नाही

४.जो ऐकेल तोच निर्णय देईल


5.भारतीय संसदेतील स्थायी समितीची महत्वाची कार्ये कोणती?

अ)शासकीय कार्याचे निःपक्षपाती परीक्षण

ब)कामगिरी चे मूल्यमापन व देखरेख

क)राज्यशासनाच्या कार्यांचे मूल्यमापन

ड)पुरवणी अंदाजाचे परीक्षण

१.अ, ब आणि क

२.अ, ब आणि ड✅

३.अ, क आणि ड

४.ब, क आणि ड


6.राज्यघटनेच्या मसुद्यावर 'वकिलांचे नंदनवन' अशी टीका केली जाते, त्याची कारणे कोणती आहेत?

१.मसुद्याची भाषा केवळ न्यायालयांना च परिचित आहे

२.तरतुदी मागील धनव्यर्थ केवळ अनुभवी व घटनात्मक कायद्यात पारंगत व्यक्तीला च समजू शकतो

३.मसुदा लोकांना सत्या पासून दूर नेतो म्हणतात

४.मसुदा समितीतील सात पैकी तीन सभासद त्या काळातील कायदे तज्ञ होते✅


7. भारतीय संविधानाच्या १० व्या परिशिष्टां नुसार एखादा सदस्य अपात्र आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणाला आहे?

अ)राज्यसभेचे अध्यक्ष

ब)लोकसभेच सभापती

क)भारताचे राष्ट्रपती

ड)सर्वोच्च न्यायालय

१.अ, ब, क

२.अ, ब,क, ड

३.अ, ब✅

४.अ, ब, ड


8.वार्षिक केंद्रीय आर्थिक अंदाजपत्रकला लोकसभेची मंजुरी न मिळाल्यास

१.अंदाजपत्रक दुरुस्ती करून फेरसदर केले जाते

२.राज्यसभेचा अभिप्राय घेण्याकरिता ठेवले जाते

३.राष्ट्रपतींच्या अभिप्रायासाठी पाठवले जाते

४.पंतप्रधान व मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो✅


9. खालीलपैकी कोणत्या राज्याने नव्याने विधानपरिषदेची स्थापना केली आहे?

१.महाराष्ट्र

२.राजस्थान

३.जम्मू काश्मीर

४.आंध्र प्रदेश✅


10. संसद अधिवेशन चालू नसताना शासनाला नैसर्गिक संकटावर झालेला खर्च कशातून भागवता येतो?

१.आकस्मिक निधी

२.सांचीत निधी

३.भविष्य निर्वाह निधी✅

४.यापैकी नाही


 1.कोणत्या घटना दुरुस्ती द्वारे राष्ट्रपती ना मंत्री परिषदेच्या सल्ल्यानुसार वागणे बंधनकारक आहे?

१.४२ वी घटना दुरुस्ती ✅

२.४४ वी घटना दुरुस्ती

३.24 वी घटना दुरुस्ती 

४.५२ वी घटना दुरुस्ती


2.१९३५ च्या कायद्यांत कशाची तरतूद होती?

१.प्रौढ मताधिकर

२.साम्राज्यांर्गत शासनाधिकार

३.सापेक्ष स्वायत्तता

४.प्रांतिक स्वायत्तता✅


3.संविधानाच्या प्रारंभी भारताचा नागरिक होण्याकरिता कोणती अट आवश्यक नव्हती?

१.भारतात अधिवास आणि

२.भारतात जन्म किंवा

३.माता व पितांचा भारतात जन्म किंवा✅

४.अशा प्रारंभ पूर्वी किमान ५ वर्षे भारतात सामान्यतः निवास


4.खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णया द्वारे प्रास्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले?

१.बेरुबाली खटला ✅

२.गोलाखनाथ खटला

३.केशवानंद भारती खटला

४.बोम्मई विरुद्ध भारताचे संघराज्य


5.घटनेच्या कलम ८२ मधील सध्याच्या तरतुदी प्रमाणे, राज्या-राज्यामध्ये लोकसभेच्या जागांचे समायोजन यापुढे कोणत्या वर्षा नंतर होऊ शकते?

१.२०१८

२.२०२१

३.२०२६✅

४.२०३१


6.भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली?

१.एम सी छागल

२.एम हिदायतुल्ला✅

३.वाय चंद्रचूड

४.यापैकी नाही


7.भारताचे राष्ट्रपती म्हणून कोणाचा कालावधी सर्वात कमी होता?

१.डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण

२.डॉ झाकीर हुसेन✅

३.श्री व्ही व्ही गिरी

४.डॉ फकरुद्दी अली महंमद


8.ऍमिकस कुरी हे संबोधन कशासाठी वापरतात?

१.न्यायालयाचा मित्र वकिल✅

२.न्यायालयाचा संदेशवाहक

३.नायलायचा एक पगारी अधिकारी

४.न्यायालयाचे एक ब्रिटिशकालीन नामाभिधान


9.महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला?

१.२०००

२.२००५

३.२०१०✅

४.२०११


10.भारतातील भाषावार प्रांतरचनेच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या भागाचा अधिक पुढाकार होता?

१.मराठवाडा

२.आंध्र प्रदेश ✅

३.महाराष्ट्र

४.कर्नाटक


1. 'मार्गदर्शक तत्वे कोऱ्या चेकप्रमाणे आहेत ज्यांचे वटवणे बँकेच्या इच्छेवर सोडलेले आहे' असे कोणी म्हटले आहे?

१.डॉ बी आर आंबेडकर

२.प्रो के टी शहा✅

३.एन जी रंगा

४.बी एन राव


2. भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली आहे?

१.उद्देशपत्रिका✅

२.मूलभूत अधिकार

३.मूलभूत कर्तव्ये

४.राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे


3. आंतरराज्यीय नद्या व नद्या खोरे विवादाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

१.संसद कायदा करून आंतरराज्यीय नदी अथवा नदी खोऱ्यामधील पाणी वापर, वाटप अथवा नियंत्रण याबाबत तरतूद करू शकते.

२.संसद कायदा करून आशा आंतरराज्यीय जल विवादाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार बंदीत करू शकत नाही✅

३.संसद कायद्याद्वारे उच्चन्यायालयाच्या अथवा इतर कनिष्ठ न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातून हा विषय वगळण्याची तरतूद करू शकते

४.महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश यांमधील कृष्णा पाणीवाटप लवाद हा राज्य घटनेच्या कलम २६२ च्या तरतुदी नुसार जाहीर करण्यात आला आहे.


4. खालीलपैकी कोणती/कोणत्या संस्था वैधानिक नाहीत?

अ.राष्ट्रीय विकास परिषद

ब.विद्यापीठ अनुदान आयोग

क.नियोजन आयोग

ड.केंद्रीय दक्षता आयोग

१.फक्त अ

२.अ आणि ब

३.अ आणि क✅

४.ब आणि ड


5.भारतीय राज्यघटनेच्या कलम १२ नुसार "राज्य" या संज्ञेत खालीलपैकी कोणती संस्था/यंत्रणा अंतर्भूत होत नाही?

१.विधानसभा

२.विधानपरिषद

३.उच्च न्यायाल✅

४.जिल्हा परिषद


6. राज्य मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष पदी पुढीलपैकी कोण असू शकते?

१.जे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते

२.जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते

३.जे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते✅

४.जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते


7.भारतीय संविधानात अनुछेद ३७१ काय सांगतो?

१.जम्मू व काश्मीर बाबत विषय तरतूद

२.केवळ उत्तम पूर्व भागाकरिता विशेष तरतुदी

३.निव्वळ हैदराबाद राज्यकरिता विशेष तरतूद

४.विविध राज्यांकर्ता विशेष तरतुदी✅


8. संविधानाच्या प्रारंभी आंग्ल भारतीय समाजातील व्यक्तींच्या नियुक्त्या १५ ऑगस्ट १९४७ पूर्वीप्रमाणेच पुढीलपैकी कोणत्या विभागात केल्या जात होत्या?

अ. रेल्वे

ब.सीमाशुल्क

क.आयकर

ड. डाक व तार

१.अ ब आणि क

२.ब क आणि ड

३.अ ब आणि ड✅

४.अ क आणि ड


9. भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका प्रथमतः केव्हा दुरुस्त करण्यात आली?

१.१९५२

२.१९६६

३.१९७६✅

४.१९८६


10. ए के क्रयपाक विरुद्ध केंद्र (AIR 1970 S. C. 150) च्या खटल्या मध्ये खालीलपैकी कोणता मुद्दा होता?

१.आर्थिक पक्षपात

२.वैयक्तिक पक्षपात✅

३.विषय पक्षपात

४.वरील सर्वच


1. खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्य वरून असे  निदर्शनास येते की, वास्तविक कार्यकारी सत्ता पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या मंत्रिमंडळाच्या हातात आहे?

१.प्रातिनिधिक लोकशाही

२.अध्यक्षीय लोकशाही

३.सांसदीय लोकशाही✅

४.प्रत्यक्ष लोकशाही



2. "आम्ही त्यांना कोणतीही वास्तविक सत्ता दिली नाही, पण आम्ही त्यांचे स्थान अधिकाराचे आणि प्रतिष्टेचे केले आहे" राष्ट्रपतींच्या स्थानाबाबत असे कोण म्हणाले?

१.पंडित जवाहरलाल नेहरू✅

२.डॉ बाबासाहेब आंबेडकर

३.के एम मुन्शी

४.डॉ राजेंद्र प्रसाद



3. राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकारसंबंधी प्रतिपादन केलेल्या पुढील विधनातील अयोग्य विधान कोणते?

१.कोर्ट मार्शल द्वारा देण्यात आलेल्या शिक्षेस हा अधिकार लागू पडत नाही✅

२.राष्ट्रपती या अधिकाराचा वापर मंत्री परिषदेच्या सल्ल्याने च करतात

३.राष्ट्रपतींच्या या अधिकाराच्या वापराचे न्यायालयीन पुनर्विलोकन करता येत नाही

४.घटनेच्या कलम ७२ नुसार या अधिकाराचा वापर करताना विशिष्ट मार्गदर्शक तत्वे मांडण्याची गरज नाही



4. भारतात खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत प्रशासकीय अधिकाऱ्याने बजावलेल्या स्वेच्छानिर्णय अधिकाऱ्यांचे न्यायिक पुनर्विलोकन होऊ शकते?

१.प्रशासकीय निर्णयाची योग्यता बघण्यासाठी

२.साक्षी पुराव्याची योग्यता पुन्हा पडताळणीसाठी

३.निर्णय प्रक्रिया बरोबर झाली की नाही हे पडताळण्यासाठी✅

४.वरीलपैकी एक ही नाही



5. पुढील राज्यांचा निर्मिती नुसार क्रम लावा.

१.झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगड

२.उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड

३.छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड

४.छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड✅



6. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते?

१.मोरारजी देसाई

२.वसंतराव नाईक

३.मारोतराव कन्नमवार✅

४.शंकरराव चव्हाण



7.खालीलपैकी कोण राज्यपाल आणि मंत्री परिषद यातील दुवा म्हणून भूमिका बजावतात?

१.राज्यपाल

२.मुख्यमंत्री✅

३.मूख्य सचिव

४.राज्य सरकार



8. काही राज्य कायदेमंडळे द्विगृही आहेत. त्यांच्यामध्ये विधेयक पारित करण्या संदर्भात असहमती असल्यास, कोणता पर्याय उपलब्ध असतो?

१.राज्यपाल दोन्ही सदनांची संयुक्त बैठक बोलावतात आणि त्यामध्ये बहुमताने जो निर्णय होईल तो मान्य होतो

२.राज्यपालांचा निर्णय अंतिम असतो

३.विशिष्ट मुदत संपल्यानंतर विधानसभेचा निर्णय अंतिम असतो✅

४.सादर बाब निर्णयासाठी राष्ट्रपती कडे पाठवली जाते



9. कोणत्या राज्यांना ७३ व्या घटनादुरुस्तीतील तरतुदी पासुन सूट देण्यात आली आहे?

अ)मिझोराम

ब)मेघालय

क)नागालँड

ड)अरुणाचल प्रदेश

१.अ, ब, क✅

२.ब, क, ड

३.क, ड, अ

४.ड, अ, ब



10. शिक्षणच्या व्यवसायिकर्णावर कोणत्या समितीने भर दिला?

१.कोठारी समिती

२.बोगीरवर समिती

३.चटोपाध्यय समिती✅

४.बळवंत राय मेहता समिती


1. भारतीय राज्यघटनेत ५२ वी घटनादुरुस्ती कोणत्या हेतूने करण्यात आली?

अ)पक्षांतरला आळा घालणे

ब)मतदारांची वयोमर्यादा वाढवणे

क)निवडणूक प्रक्रियेत बदल करणे

ड)निवडणूक आयोगा बहू सदस्यीय करणे

१.फक्त अ✅

२.अ आणि ब

३.अ ब क

४.अ ब ड


2. निवडणूक आयोगाच्या भूमिकेशी विसंगत असलेल्या विधानाची निवड करा.

अ)मतदारसंघांची आखणी करणे

ब)राजकीय पक्षांना मान्यता देने

क)उमेदवाराच्या निवडणूक खर्चास पूर्ण मोकळीक देणे

ड)देशभरातील निवडणूका सुरळीत पार पाडणे

१.अ आणि क✅

२.अ आणि ब

३.ब आणि ड

४.अ आणि ड


3. भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात "कायद्याचे राज्य" या तत्वाचा समावेश केला आहे?

अ)संविधानाची प्रस्तावना

ब)भाग lll मूलभूत हक्क

क)भाग IV-A मूलभूत कर्तव्ये

१.अ आणि ब फक्त✅

२.अ, ब आणि क 

३.ब आणि क

४.वारीपैकी कोणताही नाही


4. प्रशासनिक न्यायाधिकरण....

 नुसार अस्तित्वात येतात?

१.विभाग

२.प्रशासन

३.कायदा✅

४.न्यायपालिका


5. नैसर्गिक न्यायचा नियम...... ला लागू होत नाही?

१.कायदे करण्या संबंधी कायदेमंडळची कृती✅

२.न्यायालय विषयक कृती

३.प्रशासकीय कृती

४.वरीलपैकी एक ही नाही


6. विभाग प्रमुखाच्या परवानगीशिवाय खालीलपैकी कोणत्या मुद्द्यावर राज्यातील कार्यालयीन अप्रकाशित नोंदींवर आधारित पुरावा देता येत नाही?

१.विभागीय धोरण

२.सार्वजनिक धोरण✅

३.अधिकारीय धोरण

४.वरीलपैकी काही नाही


7. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ अंतर्गत जास्तीत जास्त शिक्षा कोणती आहे?

१.पाच वर्षे व दंड

२.सात वर्षे व दंड

३.जन्मठेप

४.मृत्यूदंड✅


8. संघ लोकसेवा आयोग राष्ट्रपतींना पुढील बाबींवर सल्ला देतो.

अ)नागरी सेवा आणि पदांच्या भरती पद्धतीन संदर्भातील बाबी

ब)भारत सरकारच्या अधीन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अनुशासना बाबत ची प्रकरणे

क)एका वर्षांपेक्षा अधिक कालावधीच्या तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आलेल्या नेमणुका व त्यासंबंधी ची नियमितता

ड)सनदी सेवा आणि पदांवरील नेमनुकसाठी अनुकराव्याच्या तत्वा संबधी

१.अ आणि ब 

२.ब आणि क

३.अ, ब आणि क

४.अ, ब, क आणि ड✅


9. खालीलपैकी भारतीय रिजर्व बँकेचे गव्हर्नर कोण नव्हते?

१.सी रंगराजन✅

२.मनमोहन सिंग

३.डॉ डी सुबाराव

४.नरेंद्र जाधव


10. लोकलेखा समितीवर शासनाचे किती प्रतिनिधी नेमलेले असतात?

१.एक

२.दोन

३.तीन

४.एकही नाही✅


1. भारतातील घटनादुरुस्ती प्रक्रियेविषयी कोणते विधान अयोग्य आहे?

१.घटनादुरुस्ती विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात सादर करता येते

२.घटनादुरुस्ती विधेयकाला संमती राष्ट्रपतींना घ्यावीच लागते

३.घटनादुरुस्ती विधेयक सादर करण्यापूर्वी राष्ट्रपतींची संमती आवश्यक असते✅

४.घटनादुरुस्ती विधेयकसबंधी संसदेच्या दोन्ही सभागृहात असहमती निर्माण झाल्यास संयुक्त अधिवेशन बोलावण्याची तरतूद नाही


2. भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेतील 'सार्वभौम' या संकल्पनेतून खालीलपैकी कोण कोणता अर्थ ध्वनित होतो?

अ)बाह्य हस्तक्षेपविना भारत स्वतः शी निगडित निर्णय घेऊ शकतो व रद्द करू शकतो

ब)संघ आणि घटकराज्ये दोन्ही सार्वभौम आहेत

क)भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो

ड)भारताच्या संघाकडे राष्ट्रीय प्रदेशात फेरफार करण्याचे अधिकार आहेत

१.ब, क, ड

२.अ, ब, क

३.अ, क, ड✅

४.अ, ब, ड


3. खलील विधान वाचून अचूक पर्याय निवडा.

विधी मंत्रालयाने तयार केलेला मसुदा कच्चा असल्याचे कारण देत प्रतिबंधात्मक स्थानबद्दता वाढवणारे विधेयक मे १९९७५ मध्ये सभापतींना विरोधकांनी रद्द करण्याची आवश्यकता पटवून दिली. अशा उदाहरणांचे वर्णन कशा प्रकारे केले जाते?

१.विधिमंडळाची सक्रियता

२.अंत्यतिक विधीवाध✅

३.कार्यकारी मंडळाची सक्रियता

४.प्रशासकीय सक्रियता


4. लोकसभेत अनुसुचित जाती व अनुसूचित जनजाती याच्याकरता जागा राखून ठेवण्या संदर्भात कोणत्या राज्यकरिता वेगळी तरतूद आहे?

१.केवळ आसाम करीता✅

२.केवळ जम्मू व काश्मीर करिता

३.वरील दोन्ही करिता

४.वरील कोणाही करीत नाही


5. घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यंचा समावेश.... च्या शिफारशी वरून करण्यात आला?

१.वल्लभभाई पटेल समिती

२.कृपलानी समिती

३.सरकारिया आयोग

४.स्वर्णसींग समिती✅


6. भारतीय संविधानाच्या १९ (१) व्या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही?

१.भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य

२.मुद्रण स्वतंत्र्य ✅

३.भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वतंत्र

४.विनाशस्त्र व शांतपणे एकत्र जमण्याचे स्वतंत्र


7. खालीलपैकी कोणते विषय घटनेच्या समवर्ती सूचित अंतर्भूत आहेत?

अ)शिक्षण

ब)व्ययसाय कर

क)वजन माप मानके (प्रमाण)

ड)वजन

ई)वने

१.अ, ड, इ✅

२.अ, ब, क

३.सर्व

४.एकही नाही


8. खालीलपैकी कोणत्या दाव्यात 'ध्वनी क्षेपकाच्या वापरावर सार्वजनिक आरोग्यासाठी मर्यादा हे कायदेशीर कारण आहे' असे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे?

१.स्टेट ऑफ राजस्थान विरुद्ध जी चावला

२.हिम्मतलाल विरुद्ध पोलीस कमिशनर✅

३.कृष्ण गोपाळ विरुद्ध स्टेट ऑफ एम पी

४.धनलाल विरुद्ध आय जी पोलीस बिहार



9. संसदेच्या कामकाजाच्या भाषेबाबत कोणते विधान खरे आहे?

अ)संसदेचे कामकाज हिंदीतून चालवण्यात येते

ब)संसदेचे कामकाज हिंदीतून किंवा इंग्रजीतून चालवण्यात येते

क)संविधानाच्या प्रारंभी संसदेचे कामकाज हिंदीतून किंवा इंग्रजीतून चालवता येत होते

ड)सभापती/अध्यक्ष त्यांच्या अनुज्ञेने सदस्य आपल्या मातृभाषेत भाषण करू शकतो

१.अ, क

२.ब, ड

३.फक्त ब

४.फक्त अ✅


10. खलील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?

अ)आतापावेतो नियमित राष्ट्रपती म्हणून डॉ झाकीर हुसेन यांचा कार्यकाल सर्वात कमी राहिला

ब)डॉ झाकीर हुसेन व श्री फकरुद्दीन हेच दोघे केवळ त्यांचा राष्ट्रपती म्हणून त्यांचा कार्यकाल पूर्ण करू शकले नाहीत

१.फक्त अ

२.फक्त ब✅

३.दोन्ही नाही

४.दोन्हीही

1.विधानसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण लागतात?
1. 30 वर्षे
2. 21 वर्षे
3. 25 वर्षे✅
4. 18 वर्षे

2.कोणाच्या शिफारशिशिवाय धनविधेयक विधानसभेत मांडता येत नाही?
1. मुख्यमंत्री
2. राज्यपाल✅
3. राष्ट्रपती
4. यापैकी नाही

3. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात?
1. पंतप्रधान व मुख्यमंत्री
2. राज्यपाल✅
3. राष्ट्रपती
4. मुख्य न्यायमूर्ती

4.जिल्ह्यातील महसूल प्रशाशनाचे प्रमुख कोण असतात?
1. तहसीलदार
2. जिल्हाधिकारी✅
3. आयुक्त
4. उपजिल्हाधिकारी
  

5. महाराष्ट्रात पंचायतराज व्यवस्था कधी पासून अमलात आणली?
1. १ मे १९६०
2. १ मे १९६१
3.  १ मे १९६२✅
4.  १ मे १९६४

6. 4G Wi= Fi   (वाय - फाय) सेवा देणारी देशातील पहिली नगरपरिषद कोणती? 
1. अकलूज
2. इस्लामपूर✅
3. मिरज
4. सांगली

7. भारतात महिलांसाठी .......... जागा राखीव आहेत 
1. लोकसभा
2. पंचायतराज संस्था
3. राज्य विधिमंडले
4. यापैकी nahi✅

8. ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी सदस्यांची संख्या किती? 
1.पाच
2. सात✅
3. नऊ
4. अकरा

9. तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात?
1. चावडी
2. पार
3.दफ्तर
4. सजा✅

10. कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतो?
1. तहसीलदार✅
2. उपविभागीय अधिकारी
3. जिल्हाधिकारी
4. विभागीय अधिकारी

1.भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट चारमध्ये कशाचा समावेश आहे?
1. राज्यसभेत राज्याचे व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व ✅
2. राष्ट्रपती , पंतप्रधान वगैरे यांचे वेतन व भत्ते
3. राष्ट्रपती , मंत्री, न्यायाधीश वगैरे यांनी घ्यायवायच्या शपथा
4. यापैकी नाही

2.विधेयक वित्त विधेयक आहे का नाही असा प्रश्न उदभवल्यास अंतिम निर्णय कोणाचा असतो?
1. राष्ट्रपती
2. उपराष्ट्रपती
3. लोकसभेचे सभापाती✅
4. पंतप्रधान

3. भारतीय घटनेच्या अनुच्छेद 312 अनुसार भारतात किती अखिल भारतीय सेवा गठीत करण्यात आल्या आहेत?
1. चौदा
2. दोन
3. तीन✅
4. सोळा

4. भारतीय संविधानाच्या १९(१) व्या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही?
1. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य
2. मुद्रण स्वातंत्र्य
3. भरताचया राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्यं 
4. विनाशस्त्र व शांततेने सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य✅

5.राज्यघटनेने खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य जर्मनीच्या वायमर राज्यघटने कडून स्वीकारले आहे?
1.केंद्रसत्ता प्रबळ असलेल्या संघराज्याची संकल्पना
2.राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत
3.प्रजासत्ताक आणि न्यायाची संकल्पना
4.राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारा संबंधित तरतुदी✅

6. भारत हे गणराज्य आहे याचा अर्थ..
अ)येथे लोकशाही आहे
ब)राष्ट्रपती लोकांनी अप्रत्यक्षपणे निवडून दिलेला असतो
क)येथे संसदीय पद्धती आहे
ड)पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिलेले असते
1.अ फक्त
2.अ व ब
3.ब फक्त✅
4.क व ड 

7. भारतीय राज्यघटनेच्या कलम......मधील तरतुदीनुसार, मानवी वाहतूक आणि भिक्षेगीरी किंवा या सारखी कोणतीही सक्तीची मजुरी हे मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे व शिक्षेस पत्र असेल.
1.२१
2.२२
३.२३✅
4.२४

8. राष्ट्रपती निवडणूक २०१७ बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
1.विधानसभा सदस्यांच्या मताचे मूल्य हे त्याच्या राज्याच्या लोकसंख्येवर अवलंबून असते
2.संसद सदस्यांच्या मताचे मूल्य हे सर्वांच्या सारखेच असते
3.उत्तम प्रदेश विधानसभा सदस्यांच्या प्रत्येक मताचे मूल्य सर्वाधिक होते
4.गोवा विधानसभा सदस्यांच्या प्रत्येक मताचे मूल्य सर्वात कमी होते✅

9.भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधानपरिषद अस्तित्वात आहे?
अ)बिहार
ब)कर्नाटक
क)तेलंगणा
ड)मध्यप्रदेश
1.अ, ब, क✅
2.अ, ब, ड
3.ब, क, ड
4.अ, क, ड

10. राज्य निर्मितीचा क्रम चढत्या श्रेणीने लावा.
अ)हरियाणा
ब)मेघालय
क)तेलंगणा
ड)झारखंड
इ)गुजरात
1.इ, अ, ब, ड, क✅
2.अ, इ, ब, ड, क
3.ब, अ, इ, ड, क
4.इ, ब, अ, ड, क


1. भारतीय राज्यघटनेत नागरिकांची खालीलपैकी कोणती मूलभूत कर्तव्ये नेमून दिली आहेत?
अ)सामाजिक अन्यायापासून दुरबल घटकांचे संरक्षण करणे
ब)व्यक्तिगत आणि सामूहिक अशा प्रत्तेक क्षेत्रात उच्चतम पातळी गाठणे
क)सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करणे
ड)शास्त्रीय वृत्ती विकसित करणे
1.अ, ब
2.क, ड
3.अ, ब, क
4.ब, ड✅

2. भारतीय राज्यघटनेच्या सारनाम्या बाबत खालील विधाने विचारात घ्या.
अ)सर्वनामा हा घटनेचा अविभाज्य अंग आहे
ब)सारनाम्यातील तरतुदी या न्यायालयाद्वारे अमलात आणता येतात
क)सारनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत म्हणून कार्य करू शकतो
1.अ✅
2.क
3.ब, क
4.अ, ब, क

3. अनुच्छेद 12 नुसार 'राज्य' मध्ये याचा समावेश होतो.
अ)भारताचे शासन व संसद
ब)प्रत्येक राज्याचे शासन व विधिमंडळा
क)सर्व स्थानिक संस्था(नगरपालिका, जिल्हा बोर्ड)
ड)भारतीय शासनाच्या नियंत्रणाखालील संस्था
1.अ, ब, ड
2.अ, ब, क
3.अ, ब
4. वरील सर्व✅

4. खालीलपैकी कोणत्या बाबींच्या आधारावर उत्प्रेशन रीट याचिका दाखल करता येत नाही.
1.जेथे अधिकारक्षेत्र वापरण्यात चूक/गफलत झाली असेल
2.जेथे कायद्याची चूक/गल्लत झाली असेल
3.जेथे प्रथमदर्शनी तथ्यांची चूक/गल्लत झाली असेल✅
4.जेथे नैसर्गिक न्यायत्वाचा भंग झाला असेल

5. 'शुन्य प्रहर' बाबत खलील विधाने विचारात घ्या.
अ)प्रश्नोत्तराच्या तासानंतर तो असतो
ब)त्याचा उल्लेख कामकाज पद्धतीच्या नियमांमध्ये आहे
क)सांसदीय कार्यप्रणालीतील भारतातील हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे
ड)कोणतीही पूर्वसूचना न देता लोकहिताचा कोणताही मुद्दा शून्य प्रहरात उपस्थित करण्यास सदस्य स्वतंत्र असतात
1.अ, ब, क
2.अ, क, ड✅
3.ब, क, ड
4.अ, ब, ड

6. खालीलपैकी कोणते केंद्रीय कार्यकारणी विभागाचे अंग आहेत?
अ)राष्ट्रपती
ब)मंत्रिमंडळ
क)महन्यायवादी
ड)भारताचा नियंत्रक व महालेखपरिक्षक
1.अ, ब, ड
2.ब, क, ड
3.अ, ब, क✅
4.अ, क, ड

7. खालीलपैकी कोणत्या मान्यवरास पद्ग्रहन करण्यापूर्वी भारतीय राज्यघटनेचे रक्षण करण्याची शपथ घ्यावी लागते?
अ)राष्ट्रपती
ब)उपराष्ट्रपती
क)पंतप्रधान
ड)लोकसभा सभापती
1.अ फक्त✅
2.अ, ब
3.अ, ब, क
4.अ, ब, क, ड

8. भारताचे स्वतंत्र आणि अखंडता टिकून ठेवण्यासाठी घटनाकारांनी भारतीय संघराज्यात.
अ)केंद्राला अधिक अधिकार दिले आहेत
ब)घटकराज्याना अधिक अधिकार दिले आहेत
क)राष्ट्रपतींना अधिक अधिकार दिले आहेत
ड)मुख्यमंत्र्यांना अधिक अधिकार दिले आहेत
1.अ फक्त✅
2.ब फक्त
3.ब, क
4.क, ड

9. सर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य खलील मुद्द्याद्वारे अधोरेखित होते.
अ)अवमान झाल्यास दंड देण्याचा अधिकार
ब)न्यायालयाच्या कर्मचारी, वर्गाची भरती व नियुक्ती
क)कार्यकाळाची सुरक्षितता
ड)न्यायाधीशांची नियुक्ती व पदच्युती संबंधि संविधानिक तरतुदी
1.अ, ब, क
2.ब, क, ड
3.अ, ब, ड
4.वरील सर्व✅

10. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या तरतुदी न्यायालयाच्या स्वतंत्रेशी संबंधित आहे?
अ)न्यायधीशाची नियुक्ती व पदच्युती
ब)कार्यकाळाची सुरक्षा
क)वेतन व सेवा शर्ती
ड)न्यायालयास अवमानाबाबत शिक्षा देण्याचा अधिकार 
1.अ, ब, क
2.अ, ब, ड
3.ब, क, ड
4.वरील सर्व✅

१) कोणत्या खटल्यान्वये सर्वोच्च न्यायालयाने कलम ३६८ नुसार घटनेच्या मूलभूत गाभ्याला धक्का न लावता घटनेच्या कोणत्याही भागात दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला असल्याचे मान्य केले?
१) केशवानंद भारती ✅  २) गोलकनाथ    ३) सज्जन सिंग    ४) शंकरी प्रसाद

२) भारतीय नागरिकाचे कोणते मूलभूत कर्तव्य नाही?
१) देशाचे संरक्षण करणे    २) नियमित कर भरणे  ✅  ३) सहा ते १४ वर्षा दरम्यानचे अपत्य किंवा पाल्य यांस शिक्षणाच्या संधी देणे   ४) वरील एकही पर्याय योग्य नाही.

३) कोणत्या खटल्याचा परिणाम म्हणून संसदेने २४ वी घटना दुरुस्ती कायदा संमत केला?
१) गोलकनाथ खटला  २) मिनर्व्हा मिल्स खटला  ३) केशवानंद भारती खटला ✅ ४) शकरी प्रसाद खटला

४) नागरिकांना भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र __ लाभावी यासाठी राज्य प्रयत्नशील राहील.
१) सुखशांती   २) एकरुप नागरी संहिता  ✅ ३) एकरुप ज्ञान संहिता    ४) विविध भाषा संहिता

५) "भारताची ____, एकता व _ उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे" हे भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे.
१) अस्मिता, एकात्मिकता २) सार्वभौमता, एकात्मता ३) सुरक्षा, एकात्मता ✅४) सार्वभौमता, विविधता

६) भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधातील खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही?
१) फसवणूक करून, खोटी माहिती दर्शवून किंवा वस्तुस्थिती लपवून नागरिकत्व मिळवले असेल.
२) कृतीतून वा भाषणातून राज्य घटनेशी बेइमानी किंवा द्रोह केला असेल.
३) भारताशी शत्रुत्व किंवा युध्द करण्याऱ्या राष्ट्राला मदत केली असेल.
४) भारताबाहेर सलग पाच वर्षे वास्तव्य केल्यास.✅

७) "राज्य हे देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील" हे मार्गदर्शक तत्त्व कोणत्या घटनादुरुस्तीन्वये भारतीय संविधानात समाविष्ट करण्यात आले आहे?
१) ६९     २) ४२  ✅   ३) ४४     ४) ४८ 

८) भारताच्या संविधानाची तत्त्वे / सिद्धांत निर्धारित करण्यासाठी १९ मे १९२८ रोजी मुंबईमध्ये संपन्न सर्वपक्षीय अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली?
१) सचिदानंद सिन्हा    २) डॉ. राजेंद्र प्रसाद   ३) प. मोतीलाल नेहरू✅   ४) प. जवाहरलाल नेहरू

९) ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्यान्वये संपुष्टात आली?
१) १७९३ चा सनदी कायदा    २) १८१३ चा सनदी कायदा    ✅
३) १७७३ चा नियमनाचा कायदा    ४) १८५८ चा भारताच्या सुशासनाचा कायदा

१०) भारताच्या संविधानात नमूद केलेली मूलभूत कर्तव्ये किती आहेत?
१) ११✅    २) १२        ३) १०     ४) 1

१) राज्यघटनेने मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी निदेश जारी करण्याचे अधिकार ____ दिलेले आहेत.
१) सर्वोच्च न्यायालयास कलम ३२ अन्वये     २) उच्च न्यायालयास कलम २२६ अन्वये
३) सर्वोच्च न्यायालय कलम ३२ अन्वये आणि उच्च न्यायालय कलम २२६ अन्वये असे दोघांनाही✅
४) कोणतेही न्यायालयास किंवा अधिकरणास

२) राजकुमारी अमृत कौर या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या?
१) बिहार    २) किंद्रीय प्रांत ✅   ३) बॉम्बे    ४) पंजाब

३) राज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिक एकता राखण्यासाठी खालील तत्त्वांचा स्वीकार केला आहे.
अ) एकेरी न्यायव्यवस्था    ब) मूलभूत नागरी व फौजदारी कायद्याबाबत समानता
क) समान अखिल भारतीय सेवा
१) अ, क      २) अ, ब     ३) ब, क      ४) वरील सर्व✅

४) योग्य क्रम निवडा
अ) भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे     ब) सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे
क) नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे     ड) संविधानाचा सन्मान करणे

५) भारतीय संविधानातील कोणता भाग हा महिलांच्या सन्मानाला न शोभणाऱ्या प्रथांचा त्याग करण्याबाबत सुचवितो?
१) मूलभूत अधिकार   २) मूलभूत कर्तव्ये ✅   ३) प्रस्तावना     ४) राज्याच्या उद्दिष्टांची मार्गदर्शक तत्त्वे

६) घटनेच्या मूलभूत अधिकारांतर्गत खालीलपैकी कोणते कलम योग्य पर्यावरणात प्रतिष्ठीतपणे जगण्याचा अधिकार देते?
१) २१  ✅   २) २२     ३) २३     ४) २४

७) संविधान सभेच्या समित्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती समिती बरोबर जुळत नाही?
समिती     -     अध्यक्ष
१) सुकाणू समिती - डॉ. राजेंद्र प्रसाद      
२) कामकाज समिती - के. एम. मुन्शी
३) मुलभूत हक्क उपसमिती - जे. बी. कृपलानी
४) अल्पसंख्याक उपसमिती - मौलाना अबुल कलाम आझाद✅

८) राज्य धोरणांची निदेशक तत्त्वे भारताच्या संविधानातील कोणत्या भागात वर्णन केली आहेत?
१) भाग १     २) भाग २     ३) भाग ३     ४) भाग ४✅

९) ९ डिसेंबर १९४६ रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले?
१) डॉ.बी.आर. आंबेडकर २) डॉ. राजेंद्र प्रसाद  ३) डॉ. सचिदानंद सिन्हा  ✅४) पंडित जवाहरशलाल नेहरू

१०) १९३५ च्या कायद्यात कशाची तरतूद होती?
१)प्रौढ मताधिकार
२)साम्राज्य अंतर्गत शासन✅
३)सापेक्ष स्वायत्तता
४)प्रांतीय स्वायत्तता

१) खालीलपैकी कोणती समिती निवडणुका सुधारनांशी संबंधित नाही ?
अ) संथानाम समिती ✅
ब) वांछू व गोस्वामी समिती 
क) तारकुंडे समिती 
ड) गोपालकृष्णन समिती 


२) राष्टीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
अ) पाच वर्षे✅
ब) सहा वर्षे 
क) तीन वर्षे
ड) दोन वर्षे

३) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होते ?
अ) उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश
ब) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश
क) उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश
ड) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश✅


४) आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते ?
अ) केंद्र सरकार
ब) राज्य सरकार
क) जिल्हाधिकारी
ड) निवडणूक आयोग✅


५) कलम १६९ नुसार विधानपरिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला असतो ?
अ) केंद्र
ब) राज्य✅
क) दोन्ही
ड) यापैकी नाही

6) भारतात वृत्तपत्र स्वतंत्र चा हक्क कोणी दिला आहे?
१.प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया
२.भारतीय राज्यघटना✅
३.माहिती व प्रसारण मंत्रालय
४.प्रेस कोन्सिल ऑफ इंडिया

7) विधानपरिषदेची सदस्य संख्या विधानपरिषडेच्या सदरस्य संख्येच्या किती पट असते?
१.२/३
२.१/४
३.१/३✅
४.३/४

8.खालीलपैकी नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो?
१. नियोजन मंत्री
२.वित्तमंत्री
३.पंतप्रधान✅
४.राष्ट्रपती

9. केंद्र राज्य आर्थिक संसाधनांची विभागणी करणेबाबत शिफारस कोण करते?
१.राष्ट्रीय विकास परिषद
२.आंतरराज्य परिषद
३.नियोजन आयोग
४.वित्त आयोग✅

10. संस्थानांच्या विलीनीकरणाबाबत सर्वात महत्वाची भूमिका कोणी बजावली?
१.जवाहरलाल नेहरू
२.सरदार पटेल✅
३.महात्मा गांधी
४.मोतीलाल नेहरू

1.संविधानाच्या कुठल्या कलमांतर्गत लोकसभा आणि राज्य विधान सभा निवडणुका प्रौढ मताधिकाराने होणे नमूद केले गेले आहे?

१.322
२.324
३.326✅
४.329


2. SC-ST करिता विशेष तरतुदी संदर्भात असणाऱ्या यादीत कोणत्या जातीला समाविष्ट करायचे हा अंतिम अधिकार कोणाचा आहे?
१. संसद✅
२.राज्याचे राज्यपाल
३.राष्ट्रपती
४. सर्वोच्च न्यायालय


3.खालील विधानांचा विचार करा.
अ. लोकशाही समाजवादी प्रणालीमध्ये सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व असते.
ब. भारतीय समाजवाद हा मार्क्सवाद व गांधीवाद यांचा मिलाफ आहे.
क. भारतीय समाजवाद मार्क्सवादी समाजवादाकडे अधिक झुकलेला दिसतो.
ड. 1991 च्या 'उखाजा' धोरणामुळे भारताची समाजवादी ओळख कमी झाली आहे.

वरील विधानांतून योग्य विधाने ओळखा.
१.अ,ब,क,ड
२.अ,ब,ड✅
३.अ,क,ड
४.ब,क,ड

4.भारतीय राज्यघटना सरनाम्यातील सामाजिक , आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श नमूद केले आहेत. 

या तिन्ही प्रकारांचे मूळ स्रोत कोणते?
१.फ्रेंच राज्यक्रांती 1789
२.रशियन राज्यक्रांती 1917✅
३.जर्मनी (वायमर संविधान)
४.जपान संविधान

5. आंतरराष्ट्रीय न्यायालयात नियुक्त झालेले प्रथम भारतीय न्यायाधीश कोण होते?

१.डॉ नागेन्द्र सिंह✅
२.जी. वी. माळवणकर
३.जगदीश चंद्र बसु
४.आर. के. नारायण

6. नागरिकत्व मिळवणे व गमावणे याबाबत आणि नागरिकत्वासंबंधी इतर कोणत्याही विषयाबाबत तरतुदी करण्याचा संसदेचा अधिकार राज्यघटनेच्या कितव्या कलमात नमूद केलेला आहे?
१.कलम 11✅
२.कलम 10
३.कलम 9
४.कलम 8

7. परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारक(OCI) व्यक्तीस भारतीय नागरिकत्व प्राप्तीसाठी अर्ज नोंदणीपूर्वी किती दिवस भारतीय वास्तव्य आवश्यक आहे?
१.12 महिने
२.3 वर्ष
३.5 वर्ष✅
४.7 वर्ष

8. भारतात प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार कोणाला दिला आहे?
१.राष्ट्रपती
२.पंतप्रधान
३.सर्वोच्च न्यायालय
४.संसद✅

9. मूलभूत हक्क अंमलबजावणीसाठी कायदे करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत?
१.केंद्रीय मंत्रिमंडळ
२.संसद✅
३.राज्य विधिमंडळ
४.संसद आणि राज्य विधिमंडळ

10. खालील विधानांचा विचार करा.

अ. कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क राज्यांच्या कारवाईपासून संरक्षित आहेत.

ब. कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क खासगी व्यक्तीपासून संरक्षित नाहीत.

क. कलम 19 मधील हक्क भारतीय नागरिक व कम्पनी भागधारकांना लागू आहेत.

ड. कलम 19 मधील हक्क परकीय नागरिक किंवा निगम/कम्पनी यांना लागू नाहीत.
पर्याय
१.अ,ब,क,ड✅
२.अ,ब,क
३.ब,क,ड
४.अ,ब,ड


1. भारतीय राज्यघटनेच्या ----- कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे?

१.19 ते 22✅
२.31 ते 35
३.22 ते 24
४.31 ते 51

2. राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा ----- यांच्याकडे सादर करतात.

१.राष्ट्रपती✅
२.उपराष्ट्रपती
३.पंतप्रधान
४.राज्यपाल

3. सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायधिशांची नेमणूक ----- करतात?

१.राष्ट्रपती
२ राज्यपाल
३.पंतप्रधान
४.सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती✅


4. ----- रोजी पंडित नेहरूंची घटनेची उद्देशपत्रिका/प्रस्तावना लिहिली?

१.11 डिसेंबर 1946✅
२.29 ऑगस्ट 1947
३.10 जानेवारी 1947
४.9 डिसेंबर 1946


5. भारतीय राज्यघटेनेच्या ----- परीशिष्टात विविध शपथ व नमुने दिलेले आहेत.

१.परिशिष्ट-1
२.परिशिष्ट-2
३.परिशिष्ट-3✅
४.परिशिष्ट-4

6. सध्या समावर्ती सूचीमध्ये ----- विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.

१.47✅
२.48
३.52
४.यापैकी नाही


7. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

१.डॉ. आंबेडकर
२.डॉ. राजेंद्रप्रसाद✅
३.पंडित नेहरू
४.लॉर्ड माऊंटबॅटन


8. घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

१.डॉ. राजेंद्रप्रसाद
२.डॉ. आंबेडकर✅
३.महात्मा गांधी
४.पंडित नेहरू


9. खालीलपैकी संसदेचे स्थायी सभागृह कोणते?

१.लोकसभा
२.विधानसभा
३.राज्यसभा✅
४.विधानपरिषद

10. लोकसभापतीची निवड कोण करतो/करते?

१. लोकसभा सदस्य✅
२.मंत्रीमंडळ
३. राज्यसभा सदस्य
४. राष्ट्रपती


1. भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली?
१. महात्मा गांधी
२. मानवेंद्र नाथ रॉय✅
३. डॉ बाबासाहेब आंबेडकर
४. जवाहरलाल नेहरू

2. संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्ष पदी कोणाची निवड केली होती?
१. डॉ राजेंद्र प्रसाद
२. एच सी मुखर्जी
३. डॉ सच्चीदानंद सिन्हा✅
४. पं मोतीलाल नेहरू

3. मूलभूत उप हक्क समिती चे अध्यक्ष कोण होते?
१. एच सी मुखर्जी
२. के एम मुन्शी 
३. वल्लभभाई पटेल
४. जे बी कृपलानी✅

4. कलम नं.....मध्ये भारताचे वर्णन 'राज्यांचा संघ' असे करण्यात आले आहे.
१. कलम न 1✅
२. कलम न 2
३. कलम न 3
४. कलम न 4

5. 'एकेरी नागरिकत्व' ची पद्धत भारताने कोणत्या घटने कडुन स्वीकारली आहे?
१. यु एस ए 
२. जपान
३.जर्मनी
४. ब्रिटिश✅

6. संविधान सभेचे उपअध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली?
१. बी एन राव
२. जवाहरलाल नेहरू
३. के एम मुन्शी
४. एच सी मुखर्जी✅

7..... रोजी संविधान सभेने भारताचा राष्ट्रध्वज स्वीकृत केला.
१. २२ जुलै १९४७✅
२. १७ नोव्हेंबर १९४७
३. २४ जानेवारी १९५०
४. ४ नोव्हेंबर१९४८

8. 'उद्देश पत्रिका' ही कोणी मंडली होती?
१. डॉ बाबासाहेब आंबेडकर
२. पं मोतीलाल नेहरू
३. डॉ राजेंद्र प्रसाद
४. जवाहरलाल नेहरू✅

9. घटनेचा आमल.....पासून सुरू झाला.
१. २६/०१/१९५०✅
२. २६/११/१९४९
३. २६/०८/१९४७
४. ०४/११/१९४८

10. मसुदा समिती मध्ये खालीलपैकी कोण नव्हते?
१. डॉ के एम मुन्शी
२. एन गोपालस्वामी अय्यंगार
३. अल्लादि कृष्णस्वामी अय्यर
४. बी एन राव✅


1. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे?
१. ४४✅
२. ४८
३. ४६
४. ५०

2. घटनाकारांच्या मते भारतीय राज्यघटनेची गुरुकिल्ली म्हणजे.... हे होय.
१. घटनेचा मसुदा
२. मूलभूत अधिकार 
३. घटनेचा सरनामा ✅
४. मार्गदर्शक तत्त्वे

3. ११० वे घटनादुरुस्ती विधेयक कशाबाबत आहे?
१. संसद विधिमंडळात महिलांना 33 टक्के आरक्षण ✅
२. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण
३. लोकपाल 
४. लोकायुक्त

4. विधान परिषद सदस्यांशी संबंधित योग्य बाब खालीलपैकी कोणती?
१. विधान परिषदेतील काही सदस्य विधानसभा सदस्यांनी निवडलेले असतात✅
२. विधानपरिषदेतील प्रत्येक सभासद दर दोन वर्षांनी निवृत्त होतो 
३. विधान परिषदेतील काही सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती मार्फत होते
४. विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो

5. राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख कोण असतो?
१. गृहमंत्री
२. पंतप्रधान✅
३. राष्ट्रपती
४. उपराष्ट्रपती

5. भारतीय संसद महाराष्ट्र राज्य  विधिमंडळ यांची सभागृहे आणि त्यातील सदस्य संख्या यांच्या जोडीला योग्य पर्याय कोणता?
१. महाराष्ट्र विधानसभा - 278
२. महाराष्ट्र विधानपरिषद- 88
३. लोकसभा - 543
४.राज्यसभा - 250✅

6. खालीलपैकी घटनेत नमूद असलेले मूलभूत कर्तव्य ओळखा.
१. वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे✅
२. हुंडा पद्धती बंद करणे
३. निरक्षरता दूर करणे 
४.राष्ट्रीय नेत्यांचे मन राखणे

7. भारतीय घटनेचा सरनामा हा राज्यघटनेचा एक भाग आहे अशा स्वरूपाचा निर्णय.. ....या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे?
१. गोलकनाथ विरुद्ध पंजाब
२. मिनर्वा मिल्स लिमिटेड विरुद्ध भारत सरकार 
३.केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार ✅
४. विद्यावती विरुद्ध राजस्थान सरकार

8. राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यासाठी बंदी करण्यात आली आहे?
१. कलम 21 
२. कलम 23 
३. कलम 24 ✅
४. कलम 28

9. कोणत्या कलमानुसार संसद घटना दुरुस्ती करू शकते?
१. कलम 350
२. कलम 368✅
३. कलम 370 
४. कलम 360

10. खालील पैकी कोणत्या राज्याने नव्याने विधान परिषदेची स्थापना केली आहे?
१. महाराष्ट्र 
२. राजस्थान 
३. जम्मू कश्मीर 
४. आंध्र प्रदेश✅

1. ओबीसींना खासगी संस्थांमध्ये आरक्षण कोणत्या घटना दुरुस्तीने देण्यात आले?
१. 92 वी घटनादुरुस्ती 
२. 93 वी घटनादुरुस्ती✅
३. 94 घटनादुरुस्ती 
४. 95 वी घटनादुरुस्ती

2. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री भूषवलेल्या मुख्यमंत्री कोण?
१. सुधाकरराव नाईक 
२. शरद पवार 
३. वसंतराव नाईक ✅
४. विलासराव देशमुख

3. महाभारतातील ग्रामव्यवस्थेचा ग्रामप्रमुख कोणत्या नावाने ओळखले जात असे?
१. ग्रामीणी
२. गावण्डा 
३. ग्रामीक ✅
४. ग्राममुकुटा 

4. रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
१. लॉर्ड मेयो 
२. लॉर्ड रिपन 
३. हॉब हाऊस ✅
४. लोर्ड कॉर्नवॉलीस

5. ग्रामीण विकासाच्या विविध कार्यक्रमांना दिला जाणारा निधी कोणामार्फत करण्याची शिफारस बलवंतराय मेहता समितीने केली?
१. पंचायत समिती ✅
२. जिल्हा परिषद 
३. तहसीलदार 
४. जिल्हाधिकारी

6. जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नसावा अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली?
१. बोंगीरवार 
२.पी बी पाटील 
३. काटजू 
४. वसंतराव नाईक✅

7. सरपंचाचे ऐकून जागेपैकी किती टक्के जागा स्त्रियांसाठी राखीव असल्याची शिफारस बीबी पाटील समितीची होती?
१. 33%
२. २७%
३. २५%✅
४. ५०% 

8. ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार आढळल्यास त्या संबंधीचा ठराव ग्रामसभा कोणाकडे पाठविते?
१. पंचायत समिती
२. राज्य शासन
३. जिल्हा परिषदेची स्थायी समिती ✅
४. मुख्य कार्यकारी अधिकारी

9. सार्वजनिक निवडणुकांनंतर होणाऱ्या वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो?
१. तहसीलदार
२. गटविकास अधिकारी
३. उपजिल्हाधिकारी 
४. सरपंच✅

10. सरपंच अनुपस्थित असल्यास ग्राम सभेची बैठक बोलावण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे?
१. ग्रामसेवक
२. उपसरपंच✅
३. तहसीलदार 
४.जिल्हाधिकारी

1. भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे कारण...
१. भारत हा समाजवादी देश आहे 
२. भरतात असंख्य धर्म आहेत
३. भारतात सर्व धर्माच्या नागरिकांना समान वागणूक आहे✅
४. भारतात धर्माला महत्त्व दिले जात नाही

2. राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वात खालीलपैकी कशाचा समावेश होतो?
१. सामान्य व मोफत कायदेशीर मदत 
२. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा पालन 
३. ऐतिहासिक वस्तूंचे जतन
४. समान नागरी कायदा 
अ. फक्त ४
ब. १, २, ३
क. २, ३, ४
ड. १, २, ३, ४✅

3. जनमत हा कोणत्या प्रकारच्या  शासन व्यवस्थेचा अविभाज्य घटक आहे?
१. अप्रत्यक्ष लोकशाही 
२. नियंत्रित लोकशाही 
३. आनियंत्रित लोकशाही
४. प्रत्यक्ष लोकशाही✅

4. राष्ट्रध्वजातील अशोकचक्रा मध्ये किती आले आहेत?
१. 22 
२. 23 
३. 21 
४. 24✅

5. 'समाजवादी' आणि
 'धर्मनिरपेक्ष' हे दोन शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने घटनेच्या प्रास्ताविकात समाविष्ट करण्यात आले?
१. 41व्या 
२. 42 व्या✅
३.44 व्या
४. 46 व्या

6. घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेच्या आधारे झाली?
१. सिमला परिषद 
२. कॅबिनेट मिशन ✅
३. क्रिप्स योजना 
४. ऑगस्ट प्रस्ताव

7. भारत हे गणराज्य आहे कारण..
१. देशाचा प्रमुख जनतेने निवडून दिला आहे ✅
२. भारत लोकशाही राष्ट्र आहे
३. अंतिम सत्ता लोकांच्या हाती आहे 
४. भारत राजेशाहीचा विरोध करतो

8. स्वातंत्र्य समता बंधुता या सरनाम यातील घोषणे मागच्या प्रेरणा कोणत्या आहेत?
१. रशियन राज्यक्रांती 
२. आयरिश राज्यक्रांती
३. अमेरिकेची राज्यक्रांती
४. फ्रान्सची राज्यक्रांती✅

9. घटनेच्या सरनाम्यातुन  खालील पैकी काय दिसून येते?
१. साध्य करावयाचे आदर्श
२. शासन व्यवस्था 
३. सत्तेचा स्त्रोत
अ. फक्त १
ब. फक्त २
क. १, २
ड. १, २, ३✅

10. घटनेच्या कोणत्या भागात घटनाकारांची भूमिका दिसून येते?
१. राज्यघटनेचा सरनामा✅
२.मार्गदर्शक तत्त्वे 
३. मूलभूत कर्तव्य
4. आणीबाणीच्या तरतुदी

1. आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित होण्याची प्रक्रिया आपण कोणत्या देशाच्या घटनेवरून स्वीकारली आहे?
१. जापान ची घटना 
२. आयरिश घटना
३. ऑस्ट्रेलियाची घटना 
४. वायमार प्रजासत्ताक ची घटना✅

2. खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नाही?
१. के एम मुंशी 
२. एन माधवराव 
३. टी टी कृष्णमाचारी 
४. जे बी कृपलानी✅

3. खाली दिलेल्या पर्यायातील अचूक पर्याय निवडा.
१. संविधान सभेत एकूण 379 सदस्य होते
२. संविधान सभेच्या निर्मितीची रचना ऑगस्ट ऑफर मध्ये करण्यात आली 
३. संविधान सभेच्या निवडणुकांमध्ये दहा जागा अपक्षांना मिळाल्या 
४. 1949 मध्ये संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिले✅

4. खालील विधानांचा विचार करा..
अ) भारतीय संसद पूर्णपणे सार्वभौम नाही 
ब) सर्वोच्च न्यायालय पूर्णपणे सर्वोच्च नाही
१. फक्त अ बरोबर
२. फक्त ब बरोबर
३. दोन्ही चूक
४. दोन्ही बरोबर✅

5. खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
अ) संविधान सभेच्या सदस्यांची निवडणूक प्रत्यक्षपणे प्रौढ मतदानाच्या आधारे घेण्यात आली.
ब) संस्थानिकांना मिळालेल्या 93 जागा भरू शकल्या नाहीत कारण संस्थानिकांनी संविधान सभेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला.
१. फक्त अ बरोबर
२. फक्त ब बरोबर✅
३. दोन्ही चूक
४. दोन्ही बरोबर

6. समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द कितव्या घटना दुरुस्तीने प्रास्ताविकेत समाविष्ट करण्यात आले?
१. 41
२. 43
३. 44
४. यापैकी नाही✅

7. घटनेच्या संघ राज्य शासन व्यवस्थेवर विविध तज्ञांची मते खाली दिलेली आहेत त्यातील अयोग्य जोडी ओळखा.
१. अर्ध संघराजीय - के सी व्हेयर
२. सहकारी संघराज्य - ग्रेन विल ऑस्टिन 
३. वाटाघाटीचे संघराज्य - मॉरीस जोन्स 
४. केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेले संघराज्य - एच सी मुखर्जी✅

8. 42 वी घटनादुरुस्ती किती सली संमत करण्यात आली?
१. 1974
२. 1975
३. 1976 ✅
४. 1977 

9. घटनेच्या सरनाम्यातून खालीलपैकी काय दिसून येते?
1. साध्य करावयाचे आदर्श
2. शासन व्यवस्था 
3. सत्तेचा स्त्रोत
१. फक्त 1
२. फक्त 2
३. 1, 2
४. 1, 2, 3✅

10. राज्यघटनेच्या कोणत्या भागात घटनाकारांची भूमिका दिसून येते?
१. राज्यघटनेचा सरनामा✅
२. मार्गदर्शक तत्त्वे 
३. मूलभूत कर्तव्य
४. आणीबाणीच्या तरतुदी


Latest post

भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 1947

- ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान कलेमंट अटली यांनी ३० जून, 1948 पर्यंत भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात येईल आणि त्यानंतर सत्ता जबाबदार भारतीया...