Tuesday 12 November 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न


1) व्याकरणातील पुरुष ही संज्ञा लौकिक जीवनातील पुरुष या व्यक्तीशी संबंधित असून तृतीय पुरुषाच्या बाबतीत तिन्ही लिंगे
     येतात.

   1) या विधानाचा उत्तरार्ध चूक आहे      2) हे संपूर्ण विधान चूक आहे
   3) या विधानाचा उत्तरार्ध बरोबर आहे    4) हे संपूर्ण विधान बरोबर आहे

उत्तर :- 3

2) लाटणे – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

   1) लाटण    2) लाटण्या    3) लाटणी    4) लाटणा

उत्तर :- 3

3) योग्य जोडया जुळवा.

   a) व्दितीया    अ) चा, ची, चे
   b) तृतीया    ब) ने, ए, शी
   c) पंचमी    क) स, ला, ते
   d) षष्ठी      ड) ऊन, हुन

   1) a – अ, b - ब, c - क, d – ड    2) a – ड, b - क, c - ब, d – अ
   3) a – क, b - ब, c - ड, d – अ    4) a – क, b - अ, c - ब, d – ड   

उत्तर :- 3

4) ‘सर्कशीत काम करणा-या प्राण्यांचे हाल मला बघवत नाहीत’ – वाक्यप्रकार ओळखा.

   1) केवल    2) मिश्र      3) गौण      4) संयुक्त

उत्तर :- 1

5) ‘मोठा पक्षी आपले सुंदर घरटे उंच झाडावर बांधतो’ – या केवल वाक्याचे पृथ्थकरण करा.

   1) उद्देश्य – पक्षी, उद्देश्य विस्तार – मोठा, क्रियापद – बांधतो, कर्म – आपलले सुंदर घरटे, विधेय विस्तार – उंच झाडावर.

   2) उद्देश्य – मोठा, उद्देश्य विस्तार – पक्षी, क्रियापद – बांधतो, कर्म – आपलले सुंदर घरटे, विधेय विस्तार – उंच झाडावर.

   3) उद्देश्य – घरटे, उद्देश्य विस्तार – मोठा पक्षी, क्रियापद – बांधतो, कर्म –सुंदर, विधेय विस्तार – उंच झाडावर.

   4) उद्देश्य – उंच , उद्देश्य विस्तार – मोठा पक्षी , क्रियापद – बांधतो, कर्म – सुंदर घरटे, विधेय विस्तार – उंच झाडावर.

उत्तर :- 1

6) कर्मकर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा.

   1) गाय गुराख्याकडून बांधली जाते      2) त्त्वा काय कर्म करिजे लघुलेकराने
   3) शिक्षक मुलांना शिकवितात      4) शिक्षकांनी मुलांना शिकवावे

उत्तर :- 1

7) खालीलपैकी ‘गुळांबा’ या शब्दाचा समास ओळखा.

   1) कर्मधारय      2) तत्पुरुष   
   3) मध्यमपदलोपी    4) बहुव्रीही

उत्तर :- 3

8) खालील वाक्यात शेवटी विरामचिन्हे द्या. – अबब ! केवढी मोठी ही भिंत.

   1) -      2) ?     
   3) !      4) ”

उत्तर :- 3

9) उपमेय असूनही ते उपमेय नाही, तर उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा .................. हा अलंकार होतो.

   1) श्लेष      2) आपन्हुती   
   3) यमक      4) दृष्टांत

उत्तर :- 2

10) ‘तद्भव’ शब्द निवडा.

   1) ओठ    2) आठव   
   3) आयुष्य    4) आठशे

उत्तर :- 1

मानवी हक्क संरक्षण कायदा : 1993

प्रारंभिक:

(या कायद्यामध्ये एकूण 43 कलम आहेत.)

1. संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :

या अधिनियमाला मानवी हक्क संरक्षण कायदा असे संबोधण्यात येईल.

याचा विस्तार जम्मू-काश्मीर सोडून संपूर्ण भारतभर असेल.

तो दिनांक 28 सप्टेंबर 1993 रोजी अंमलात आल्याचे मानण्यात येईल.

2. व्याख्या :

सशस्त्र दले याचा अर्थ नौदल, भुदल, हवाईदल आणि त्यामध्ये संघातील इतर कोणत्याही सशस्त्र दलाचा समावेश होतो.

अध्यक्ष म्हणजे आयोगाच्या किंवा राज्य आयोगाच्या अध्यक्ष्यस्थानी असलेली व्यक्ती होय.

आयोग म्हणजे कलम 3 नुसार राष्ट्रीय मानवी हक्क आयोग होय.

मानवी हक्क म्हणजे व्यक्तीचे जीवनस्वातंत्र्य, समता व प्रतिष्ठा यासंबधीचे संविधानाने हमी दिलेले किंवा आंतरराष्ट्रीय करारामध्ये समाविष्ट असलेले आणि भारतातील न्यायालयांना अमलबजावणी करता येईल असे हक्क होय.

मानवी हक्क न्यायालये म्हणजे कलम 30 नुसार करण्यात आलेली मानवी हक्क न्यायालये होय.

आंतरराष्ट्रीय करार म्हणजे नागरी व राजकीय हक्कांवरील आंतरराष्ट्रीय करार जे 16 डिसेंबर,1966 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये स्वीकारण्यात आलेले आहेत; आणि केंद्र सरकार अधिसूचनेव्दारे निर्दिष्ट करेल त्याप्रमाणे संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेकडून स्वीकृत करण्यात येईल अशी संधी किंवा करार होय.

सदस्य म्हणजे आयोगाचा किंवा राज्य आयोगाचा सदस्य होय.

अल्पसंख्यांकसाठी राष्ट्रीय आयोग म्हणजे अल्पसंख्याकासाठी राष्ट्रीय आयोग कायदा 1992 च्या कलम 3 नुसार स्थापन करण्यात आलेला अल्पसंख्याकासाठी राष्ट्रीय आयोग असा होतो.

अनुसूचित जातीकरीता राष्ट्रीय आयोग म्हणजे राज्य घटनेच्या कलम 338 मध्ये निर्देशित करण्यात आलेल्या अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोग, असा आहे.

अनुसूचित जमातीकरीता राष्ट्रीय आयोग म्हणजे राज्य घटनेच्या कलम 338 (क) मध्ये निर्देशित केलेल्या अनुसूचित जमातींकरिता राष्ट्रीय आयोग असा आहे.

महिलांसाठी राष्ट्रीय आयोग म्हणजे महिलांसाठी राष्ट्रीय आयोग कायदा 1990 च्या कलम 3 नुसार स्थापन करण्यात आलेला राष्ट्रीय महिला आयोग असा होतो.

अधिसूचना म्हणजे राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली अधिसूचना होय.

विहित म्हणजे या कायद्याद्वारे करण्यात आलेल्या नियमांव्दारे विहित करण्यात आलेले होय.

लोकसेवक या संज्ञेस भारतीय दंडसंहितेच्या (1860 ई ) कलम 21 मध्ये जो अर्थ दिला आहे तोच अर्थ असेल.

राज्य आयोग म्हणजे कलम 21 नुसार स्थापण्यात आलेला राज्य मानवी हक्क आयोग होय.

जम्मू व काश्मीर राज्यात अस्तित्वात नसलेल्या कोणत्याही कायद्याचा निर्देश या कायद्यात करण्यात आला असेल तर त्याचा अर्थ त्या राज्यात या कायद्याशी अनुरूप असा कोणताही कायदा अस्तित्त्वात असेल तर त्याचा निर्देश आहे असा समजण्यात येईल.

महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग

✍महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची जुलै २००७ मध्ये स्वायत्त मंडळ म्हणून बाल हक्क संरक्षण कायदा २००५ (२००६ मधील ४) अन्वये राज्यातील बालकांच्या हक्कांचे संरक्षण, प्रचलन आणि रक्षण करण्यासाठी स्थापना करण्यात आली आहे. सी आर सी म्हणजेच बालहक्क परिषदेत निर्देषित मानांकना बरहुकूम वर्तणूकीकरिता आयोग विविध उपक्रम राबवितो. यामध्ये खाली दिलेल्या काही प्रमाण मानांकनांचा समावेश होतो:

✍बालकांना सर्व प्रकारच्या जातीपाती, रंग, लिंग, भाषा, धर्म, राजकीय किंवा इतर मते, राष्ट्रीय पंरपरा किंवा सामजिक मुळ, संपत्ती, व्यंग किंवा इतर दर्जा याच्या भेदभावा पासून संरक्षण आहे.

✍बालकांसंदर्भातील कृती मध्ये, बालकाच्या सर्वोत्तम हिताला सर्वाधिक प्राथमिकता दिली जाईल.

✍बालकाला ओळख, नाव आणि राष्ट्रीयत्वाचा हक्क आहे.

✍प्रत्येक बालकाला जन्मजात जीवन जगण्याचा, जिवनमानाचा आणि विकासाचा, कोणत्याही प्रकारच्या आजारावर सर्वोत्तम दर्जाचा उपचार मिळण्याचाही, बालकाच्या संपूर्ण क्षमतेने व्यक्तिमत्व विकासाचा, बुध्दिमत्ता आणि  शारीरिक क्षमता यांच्याकडे निर्देशित शिक्षणाचा अधिकार तसेच सामाजिक सुरक्षेचा अधिकार आहे.

✍बालकाला आराम करण्याचा आणि विश्रांती घेण्याचा तसेच खेळणे आणि मनोरंजक कृती मध्ये रमण्याचा अधिकार आहे.

✍प्रत्येक बालकाचा योग्य त्या प्रमाणात शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक, मनोबल आणि सामाजिक विकास होईल अशा प्रमाण जीवनमानाचा अधिकार आहे.

✍कोणत्याही बालकाला बेकायदेशीर हस्तातंरण, अपहरण, विक्री किंवा वाहतूक इत्यादी उद्देशाने किंवा कोणत्याही प्रकारे हानि होता कामा नये.

✍बालकाच्या दृष्टीकोनाला योग्य तो सन्मान द्यायला हवा.

✍बालकाला त्याच्या  मनाविरुध्द त्याच्या पालकांपासून विभक्त करू नये, अपवादात्मक परिस्थितीत जेव्हा असे विभक्त करणे बालकाच्या उत्तम हीतासाठी साठी आवश्यक असते.

✍कौटुंबिक वातावरणापासून वंचित असलेल्या बालकाला राज्याकडून विशेष संरक्षण आणि मदत मिळण्याचा हक्क असतो.

✍बालकांची काळजी घेणे किंवा संरक्षण करणे यासाठी जबाबदार संस्था, सेवा आणि सुविधांनी संस्थापित मानाकंनाना धरून राहण्याची निश्चिती करावी.

✍मानसिक किंवा शारीरिक दृष्ट्या विकलांग असलेल्या मुलांना त्यांचा सन्मान राखणाऱ्या परिस्थिती, स्वावलंबंत्वाचा पुरस्कार आणि समाजामध्ये सक्रिय सहभागाने आयुष्याचा संपूर्ण आनंद घेता यावा आणि चांगले जीवन जगता यावे.

💕आर्थिक शोषणापासून बालक संरक्षित आहेत.

✍मुलांनी अंमली पदार्थ आणि मनावर विपरित परिणाम करणाऱ्या औषधांचे बेकायदेशीर सेवन करता कामा नये.

✍बालकांना सर्व प्रकारच्या शारीरिक किंवा मानसिक हिंसा, इजा किंवा गैरवर्तन, दुर्लक्ष किंवा निष्काळजीत्व,  दुर्वतन किंवा शोषण, लैंगिक गैरवर्तनासकट सर्व बाबींपासून संरक्षण आहे.

✍प्रत्येक मुलं सर्व प्रकारच्या लैंगिक शोषण आणि लैंगिक गैरवर्तनापासून संरक्षित आहे.

✍कोणत्याही मुलाला बेकायदेशीरपणे किंवा स्वैरपणे यातना किंवा इतर क्रूर वर्तणूक, अमानवीय किंवा मानहानिकारक वर्तणूक किंवा शिक्षा किंवा स्वातंत्र्य मूकायला लागता कामा नये.

✍कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष, शोषण किंवा गैरवर्तणूक, यातना पिडीत मुलांचे शारीरिक आणि मानसिक हानि भरून येण्यासाठी आणि त्यांचा समाजात समावेश होण्याकरिता आवश्यक त्या सर्व गोष्टी योग्य प्रकारे केल्या गेल्या पाहिजेत.

✍सैन्य हमल्या बाधित मुलांना आंतरराष्ट्रीय मानवता कायदा लागू आहे.

✍आरोपित, आरोप असलेले किंवा कायद्याचे उल्लंघन करतांना आढळलेल्या मुलांना योग्य त्या सन्मानाने आणि न्यायाने वर्तणूक मिळण्याचा अधिकार आहे.

✍कोणत्याही मुलाच्या खाजगी जीवनात मनमानीपणे किंवा बेकायदेशीर हस्तक्षेप, त्याच्या/तिच्या घरावर किंवा त्याच्या/तिच्या सन्मान आणि नावलौकीकावर आघात होता कामा नये.

RBI ने 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली!

📍 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली आहे

👉 चालू आर्थिक वर्षात 2000 रुपयांची एक नोटही छापली नाही, माहिती अधिकारात माहिती समोर

💁‍♂ वर्ष आणि नोटांची छपाई :

● 2016-17मध्ये : 354.29 कोटी
● 2017-18 मध्ये : 11.15 कोटी
● 2018-19मध्ये : 4.66 कोटी

💫 चालू आर्थिक वर्षात एकही नोट छापण्यात आली नाही, अशी माहिती आरबीआयने दिली आहे

भारतीयांच्या वापरात नसलेल्या स्विस खात्यांतील पैसा सरकारजमा..

🍀स्विस बँकेतील भारतीयांची अनेक खाती ही वापरात नसून त्यातील पडून असलेला पैसा आता स्वित्र्झलड सरकारकडे हस्तांतरित केला जाणार आहे.

🍀स्विस सरकारने बंद असलेल्या अशा खात्यांची यादी २०१५ मध्ये जाहीर केली होती.

🍀या खात्यांवर कुणीही दावा केलेला नाही.

🍀या खात्यांबाबत पुरावे देऊन ती चालू करण्याचा प्रस्ताव बँकेने दिला होता. त्यातील किमान १० खाती भारतीयांशी संबंधित आहेत.

🍀भारतीय निवासी, नागरिक, यांची ही खाती असून त्यातील काही ब्रिटिश काळातील आहेत.

🍀या दहाही खात्यांपैकी एकावरही कुणी सहा वर्षांत दावा केलेला नाही, असे स्विस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

🍀या खात्यांवर दावा करण्याचा कालावधी पुढील महिन्यात संपत आहे. काही खात्यांवर २०२० अखेपर्यंत दावा करता येणार आहे.

मंदीचा फेरा; मूडीजकडून भारताला निगेटीव्ह दर्जा

📌देशात आर्थिक मंदीमुळे चिंतेचे वातावरण आणखी दाट होत असताना  या आंतरराष्ट्रीय इन्व्हेस्टर सर्व्हीस संस्थेने भारताला दिलेला 'स्थिर' हा दर्जा हटवून आना 'निगेटीव्ह' असा दर्जा दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून भारताचा विकासदर धिमा राहील असेही या संस्थेने म्हटले आहे.

📌कॉर्पोरेट करात कपात आणि सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढीचा मंदावलेला वेग पाहता, मार्च २०२० मध्ये संपणाऱ्या वित्तीय वर्षादरम्यान अर्थसंकल्पीय तूट ३.७ टक्के इतकी राहू शकते असा अंदाज मूडीजने व्यक्त केला आहे. या वर्षासाठी अर्थसंकल्पीय तुटीचे लक्ष्य ३.३ इतके ठेवण्यात आले होते.

📌ऑक्टोबर २०१९ मध्ये मूडीजने २०१९-२० मध्ये सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या विकासाच्या अंदाजात घट करून तो ५.८ टक्के इतका धरला होता. यापूर्वी मूडीजने जीडीपी ६.२ असेल असा अंदाज व्यक्त केला होता.

📌भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती आणि संबंधित संभाव्य धोके लक्षात घेत मूडीजने भारताच्या रेटींगमध्ये घट केली आहे, असे मूडीज या संस्थेने आपल्या निवेदनात म्हटले आहे. याचाच अर्थ मागील वाढीच्या तुलनेत आता भारताची अर्थव्यवस्थेचा धीम्या गतीने मार्गक्रमण करेल असा आहे.

📌केद्र सरकारने मंदीशी दोन हात करण्याबाबतच्या धोरणांची योग्य अंमलबजावणी न होणे हेच या मागे कारण असल्याचे मूडीजने म्हटले आहे. देशावरील कर्जाचा भारही हळूहळू वाढत जाईल, असाही मूडीजचा अंदाज आहे.

📌मंदीशी लढण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम पडेल,असे मूडीजला वाटते. शिवाय यामुळे मंदीचा कालावधी देखील कमी होऊ शकतो, असे मूडीजला वाटते.

📌मंदीमुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले असून रोजगाराच्या संधीही कमी झाल्या आहेत. इतकेच नाही, तर गैर बँकिंग वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) देखील संकटात सापडल्या असल्याचे मूडीजने म्हटले आहे.

📌उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक आणि विकासाचा दर वाढवण्यासाठी करावयाच्या सुधारणा आणि करप्रणालीचा पाया मजबूत बनवण्याच्या प्रयत्नांनाही खिळ बसली असल्याचे मूडीजचे म्हणणे आहे.

📌एप्रिल ते जून अशा तिमाहीच्या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्था ५.० टक्के दराने पुढे सरकत आहे. हा दर २०१३ च्या नंतरचा सर्वात कमी दर आहे.

📌मागणीत झालेली घट आणि वाढता सरकारी खर्च ही या मागची कारणे असल्याचे मूडीजने म्हटले आहे. हे लक्षात घेत भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केली. याबरोबरच सरकारने देखील कॉर्पोरेट करात कपात करण्याचे पाऊल उचलले.

भारत 2023 पुरुष हॉकी विश्वचषक आयोजित करेल..

🔰भारत 1323 ते 29 जानेवारी दरम्यान 2023 पुरुष हॉकी विश्वचषक आयोजित करेल.

🔰आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) आज जाहीर केले की भारत पुरुषांच्या स्पर्धेचे आयोजन करेल तर स्पेन आणि नेदरलँड्स या संघांचे सह-यजमान म्हणून निवड करण्यात येणार आहे. २०२२ महिला विश्वचषक स्पर्धा १ ते २२ जुलै या कालावधीत होणार आहे.  .  .

🔰स्वित्झर्लंडच्या लॉझने येथे एफआयएच कार्यकारी मंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.

🔰एफआयएचने पुढे सांगितले की पुरुष व महिला वर्ल्ड कप या दोन्ही ठिकाणांची घोषणा यजमान देशांनी नंतरच्या तारखेला केली जाईल.

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...