Tuesday 28 February 2023

प्रचंड हेलिकॉप्टर हवाई दलात दाखल



- ३ ऑक्टोंबर २०२२ रोजी जोधपूर येथे हवाई दलात दाखल 


- संपूर्ण भारतीय बनावटीचे (स्वदेशी बनावटीचे) 


- वजनाने हलके लढावू हेलिकॉप्टर 


निर्मिती:- हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि.

लांबी :- ५१.१ फूट

उंची:- १५.५ फूट

पल्ला:-  ५५० किमी

वजन:- ५.८ टन

वेग:- २७० km/hr

इंजिन:-२ 


📌 वैशिष्ट्ये:-


- शत्रूच्या रडारला चकमा देण्याची क्षमता

- हवेतून हवेत क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता

- दिवसा व रात्री उड्डाणाची क्षमता


- एका मिनिटात ७५० गोळ्या डागु शकते

- रणगाडे, ड्रोन, बंकर लक्ष करू शकते

- सर्व प्रकारच्या हवामानात कार्य करण्यास सक्षम


- २० एमएमच्या बंदुकानी सज्ज 

- आधुनिक फ्रेंच तंत्रज्ञानावर आधारित ५.८ टन दुहेरी इंजिन


- लाईट कॉम्बॅक्ट मध्ये २ लोक बसू शकतात.

- प्रचंड हेलिकॉप्टर धनुष नावाच्या हेलिकॉप्टर युनिट मध्ये सामील केले गेले.

चालू घडामोडी :- 27 फेब्रुवारी 2023


◆ पंतप्रधान मोदी PM-KISAN अंतर्गत 16,800 कोटी रुपयांचा 13 वा हप्ता वितरित करतील.


◆ अमित शहा यांनी मध्य प्रदेश येथे 'कोल जनजाती महाकुंभ'ला संबोधित केले.


◆ एलोरा अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव 2023 महाराष्ट्रात आयोजित करण्यात आला.


◆ पर्यटन क्षेत्रात महिलांना सक्षम करण्यासाठी केरळने यूएन वुमनसोबत करार केला.


◆ कर्नाटकने बयंदूर येथे देशातील पहिल्या मरीनाची योजना आखली आहे.


◆ पाकिस्तान, अफगाणिस्तानने तोरखाम क्रॉसिंग पुन्हा उघडल्याने व्यापार पुन्हा सुरू झाला.


◆ चीनने Zhongxing-26 उपग्रह मोहिमेसह कक्षीय प्रक्षेपण पुन्हा सुरू केले.


◆ रशियन सोयुझ अंतराळयानाने ISS वर अडकलेल्या क्रूला परत आणण्यासाठी मोहीम सुरू केली.


◆ श्रीलंकेने अदानी ग्रीनच्या $442 दशलक्ष पवन ऊर्जा प्रकल्पाला मंजुरी दिली.


◆ लेफ्टनंट जनरल आरएस रेन यांनी महासंचालक गुणवत्ता आश्वासन म्हणून कार्यभार स्वीकारला.


◆ आंतरराष्ट्रीय IP निर्देशांक: 55 देशांमध्ये भारत 42 व्या क्रमांकावर आहे.


◆ नोकियाने त्यांचा लोगो अपडेट केला आहे.


◆ ओम बिर्ला यांनी सिक्कीममध्ये 19 व्या वार्षिक CPA परिषदेचे उद्घाटन केले.


◆ नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळा 2023 तीन वर्षांच्या अंतरानंतर परतला.


◆ महाराजा सयाजीराव विद्यापीठ, गुजरात द्वारे युथ 20 इंडिया समिट आयोजित करण्यात आला.


◆ ऑस्ट्रेलियाने 6व्या महिला T20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले.


◆ मध्यप्रदेशने वरिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप जिंकली.


◆ डॅनिल मेदवेदेवने अँडी मरेचा पराभव करून कतार ओपनचे विजेतेपद पटकावले.


◆ भारताचा स्वदेशी LCA तेजस यूएईमध्ये त्याच्या पहिल्याच विदेशी हवाई सरावात भाग घेण्यासाठी उतरला


◆ संगणक शास्त्रज्ञ हरी बालकृष्णन यांना 2023 चा मार्कोनी पुरस्कार मिळाला.


◆ मेटा ने LLaMA मॉडेल लाँच केले, LLaMA हे OpenAI च्या GPT-3 पेक्षा अधिक शक्तिशाली आहे.


◆ जागतिक NGO दिन 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.


◆ इंडियन ऑइल कॉर्पोरेशन सर्व रिफायनरीजमध्ये ग्रीन हायड्रोजन प्लांटची स्थापना करेल.

टी-20 विश्वचषकात शबनिम इस्माईलने रचला इतिहास



◆ महिला टी-20 विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे खेळवला जात आहे.


◆ या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका संघावर 19 धावांनी मात केली.

त्याचबरोबर सहाव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले.


◆ विजेतेपदाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईलने 2 बळी घेत इतिहास रचला.

ती या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली आहे.


◆ शबनीम इस्माईलने महिला टी-20 विश्वचषकातील 32 सामन्यांत 43 बळी घेतले आहेत.


◆ या बाबतीत तिने 27 सामन्यात 41 बळी घेणाऱ्या इंग्लंडच्या अन्या श्रबसोलेला मागे टाकले आहे.

जागतिक पुस्तक मेळ्याच्या ३१ व्या आवृत्तीला कालपासून नवी दिल्लीत सुरुवात.


🔰 जागतिक पुस्तक मेळ्याच्या ३१ व्या आवृत्तीला कालपासून नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर सुरुवात झाली.


🔰 ९ दिवस चालणाऱ्या या पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटन शिक्षण राज्यमंत्री डॉ राजकुमार रंजन सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं.


🔰 'आझादी का अमृत महोत्सव ' या विषयाच्या अनुषंगाने अनेक साहित्यिक सहभागी झाले असून विविध सांस्कृतिक उपक्रम या मेळ्यामध्ये आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये दोन हजारांहून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले असून एक हजाराहून अधिक पुस्तक प्रकाशक सहभागी झाले आहेत.या पार्श्वभूमीवर अनेक चर्चासत्रे, परिषदा,पुस्तक प्रकाशन,साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.


🔰 या मेळयासाठी फ्रान्सची गेस्ट ऑफ ऑनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


🔰 या मेळाव्यादरम्यान प्रकाशन विभाग ‘आझादी का अमृत महोत्सव’ पुस्तक संग्रह प्रदर्शित करत आह.


🔰 देशाच्या स्वातंत्र्य चळवळीवर प्रकाश टाकणारा आणि देशासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण या पुस्तक संग्रहतून करण्यात आलं आहे.


🔰 प्रकाशन विभागाची;योजना, कुरुक्षेत्र, आज - काल आणि बालभारती यांसारखी नियतकालिकेही या मेळयात  उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

कोब्रा वॉरियर युध्द सराव : 2023




◆ युनायटेड किंग्डममधील वॅडिन्ग्टन येथील रॉयल एयर फोर्सच्या हवाई तळावर होणाऱ्या कोब्रा वॉरियर या युद्धसरावात सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या 145 हवाई योद्ध्यांची तुकडी 26 फेब्रुवारी 2023 रोजी हवाई दलाच्या जामनगरच्या तळावरून रवाना झाली आहे. 6 मार्च 2023 ते 24 मार्च 2023 दरम्यान हा युद्धसराव होणार आहे.


◆ कोब्रा वॉरियर हा बहुस्तरीय हवाई युद्धसराव असून यामध्ये फिनलंड, स्वीडन, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि सिंगापूर हवाई दलाच्या तुकड्या देखील रॉयल एयर फोर्स आणि भारतीय हवाई दलासोबत सहभागी होणार आहेत.


◆ भारतीय हवाई दल यावेळी या युद्धसरावात पाच मिराज-2000 ही लढाऊ विमाने, दोन सी-17 ग्लोबमास्टर III आणि IL-78 हे हवेत इंधन भरणारे एक विमान यांच्यासह सहभागी होणार आहेत. 


➤ या युद्धसरावाचा उद्देश :- हवाई युद्धामधील विविध प्रकारच्या परिस्थितीमध्ये सहभागी होणे व विविध हवाई दलांच्या सर्वोत्तम पद्धती शिकणे.

महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या -



🔶 गोदावरी - वारणा, प्रवरा, सिंधफणा, दक्षिण पूर्णा, मांजरा पूर्णा व गिरणा, प्राणहिता, पैनगंगा, दुधना.


🔶 तापी - गिरणा, पूर्णा, बोरी, अनेर, पांझरा.


🔶 कृष्णा - कोयना, वेरळा, पारणा, वेण्णा, पंचगंगा.


🔶 भीमा - इंद्रायणी, मुळा, सीना, कुकडी, पवना,  कऱ्हा, नीरा, मुठा.

 

🔶 पैनगंगा - कन्हान, वर्धा व पैनगंगा.


🔶 पूर्णा - काटेपूर्णा व नळगंगा.


🔶 सिंधफणा - बिंदुसरा.


🔶 मांजरा - तेरु, तेरणा, कारंजी, घटणी.

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी नॉर्थ ईस्टच्या पहिल्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लांटचे उद्घाटन केले



🔹आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी 26 फेब्रुवारी 2023 रोजी, आसाममधील कामरूप जिल्ह्यातील सोनापूर येथे ईशान्य भारतातील पहिल्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन केले.


🔸या प्लांटची पाच टन प्रति-दिवस संकुचित बायोगॅसची उत्पादन क्षमता असेल जी गुरांचे शेण, नगरपालिका घनकचरा इत्यादी कच्च्या मालापासून तयार केली जाईल.

शैलेश पाठक यांची फिक्कीच्या महासचिवपदी नियुक्ती




🔹फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) ने 1 मार्च 2023 पासून माजी नोकरशहा शैलेश पाठक यांची महासचिव म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे.


🔸आयएएस अधिकारी म्हणून त्यांनी सरकारमध्ये काम केले आहे.


🔹FICCI ने असेही जाहीर केले की अरुण चावला, महासंचालक, 30 जून 2023 रोजी सेवानिवृत्त होतील आणि सल्लागाराच्या भूमिकेत बदली होतील.

Sunday 26 February 2023

काही महत्वपूर्ण मुद्दे


♦️बंगालचे प्रथम गव्हर्नर - रॉबर्ट क्लाईव्ह. 

♦️बंगालचे शेवटचे गव्हर्नर - वॉरेन हेस्टिंग्ज. 

♦️बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल- वॉरेन हेस्टिंग्ज.

♦️बंगालचे शेवटचे गव्हर्नर जनरल- विलियम बेंटिंक.

♦️भारताचे प्रथम गव्हर्नर जनरल - विलियम बेंटिंक.

♦️भारताचे अंतिम गव्हर्न जनरल - लॉर्ड कॅनिंग.

♦️भारताचे प्रथम व्हाईसरॉय - लॉर्ड कॅनिंग. 

♦️भारताचे अंतिम व्हाईसरॉय - लॉर्ड माऊंटबॅटन.

♦️स्वतंत्र भारताचे प्रथम गव्हर्नर जनरल:- लॉर्ड माऊटबटन.

♦️पहिले भारतीय गव्हर्नर जनरल :- सी. राजगोपालाचारी.

♦️ऑगस्ट घोषणा  (१९१७) :- लॉर्ड माँटेग्यू.

♦️ऑगस्ट प्रस्ताव – (१९४०) - लॉर्ड लिनलिथगो.

♦️ऑगस्ट क्रांती - (१९४२) - चलेजाव आंदोलन.


गव्हर्नर जनरल डलहौसीने या काळात खालसा/विलीनीकरण झालेल्या राज्यांचा क्रम


♦️ सातारा 1848.

♦️जैतपूर- 1849.

♦️संभलपूर व ओरछा- 1849.

♦️बघाट 1850.

♦️उदयपूर - 1852.

♦️झाशी - 1853.

♦️नागपूर-1854.

♦️करौली- 1855.

♦️अवध - 1856.



⭕️♦️⚠️ गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्लीच्या काळात तैनाती फौज

स्वीकारणारी राज्याचा क्रम:-

♦️हैदराबाद - 1798.

♦️म्हैसूर - 1799.

♦️तंजावर - 1799.

♦️अवध - 1801.

♦️पेशवा - 1802.

♦️भोसले - 1803.

♦️शिंदे - 1804.

प्रमुख राजवंश आणि संस्थापक


▪️ हर्यक वंश                    - बिम्बिसार


▪️ नन्द वंश                      - महापदम नन्द


▪️ मौर्य साम्राज्य              - चन्द्रगुप्त मौर्य


▪️ गुप्त वंश                      - श्रीगुप्त


▪️ पाल वंश                      - गोपाल


▪️ पल्लव वंश                   - सिंहविष्णु


▪️ राष्ट्रकूट वंश                  - दन्तिदुर्ग


▪️ चालुक्य-वातापी वंश     - पुलकेशिन प्रथम


▪️ चालुक्य-कल्याणी वंश  - तैलप-द्वितीय


▪️ चोल वंश                      - विजयालय


▪️ सेन वंश                       - सामन्तसेन


▪️ गुर्जर प्रतिहार वंश         - हरिश्चंद्र/नागभट्ट


▪️ चौहान वंश                  - वासुदेव


▪️ चंदेल वंश                    - नन्नुक


▪️ गुलाम वंश                  - कुतुबुद्दीन ऐबक


▪️ ख़िलजी वंश  - जलालुद्दीन फिरोज ख़िलजी


▪️ तुगलक वंश                - गयासुद्दीन तुगलक


▪️ सैयद वंश                    - खिज्र खान


▪️ लोदी वंश                    - बहलोल लोदी


▪️ विजयनगर साम्राज्य     - हरिहर / बुक्का


▪️ बहमनी साम्राज्य          - हसन गंगू


▪️ मुगल वंश                    - बाबर



⭕️♦️प्राचीन इतिहास ,जोड्या जुळवा येऊ शकतो लक्षात असुद्या मोजके वंशज आणि संस्थापक✔️


येणाऱ्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षेकरिता अर्थव्यवस्था महत्वाचे मुद्दे


⚠️ 👇👇👇 हे करा 10-12 मार्क्स हमखास येतील.


♦️ राष्ट्रीय उत्पन्न मोजणी :-

♦️ राष्ट्रीय उत्पन्न मोजणीच्या पध्दती :-

➡️ उत्पाद पद्धत ,उत्पन्न पद्धत  खर्च पद्धत 


♦️राष्ट्रीय उत्पन्न मोजणीशी संबंधित संकल्पना :-

➡️ GDP GNP NNP NDP


♦️GDP मोजमाप पद्धती :-

➡️स्थिर ,चालू किंमत, घटक किंमत, बाजारमूल्य


♦️आधारभूत वर्ष (समिती) :- 

➡️2011-12

➡️2017-18


♦️GREEN GDP ,GNH, PCI ,PPP


♦️CURRENT:-

➡️GDP GROWTH RATE, GDP मधील क्षेत्रनिहाय वाटा 

➡️PRIMARY SECOnDARY TERTIARY


⭕️✔️चलनवाढ :-

➡️ संकल्पना .

➡️ तेजीचे चक्र व मंदीचे चक्र.


♦️इतर संकल्पना :- 

➡️ delation disinflation ,reflation stagflation .


♦️चलनवाढीचे प्रकार :-

➡️ दरानुसार ,कारणांनुसार 


♦️चलनवाढीचे मोजमापसाठी निर्देशांक :-

➡️WPI ,CPI, GDP DEFLECTOR, NHB


♦️चलनवाढीचे परिणाम:- 

चांगले , वाईट ,शुन्य


♦️चलनवाढ नियंत्रणात ठेवण्याचे उपाय(3-5%) :- 

➡️ मौद्रीक उपाय .

➡️ राजकोशीय उपाय .

➡️ प्रत्यक्ष उपाय.

➡️ Angels law

➡️ Say चा नियम

➡️ जिफेन वस्तू

➡️ व्यापरचक्र

➡️ फिलिप्स curve

➡️ पैशाचे प्रकार :-m0,m1 m2,m3

➡️ पैसा गुणक 

पैशाचा संख्यात्मक सिद्धांत



⭕️✔️पैसा व चलन:-

➡️ पैसे व चलन मधील फरक

➡️ पैशाची कार्य :-SUMS

➡️ नोटा व नाणी उत्क्रांती :-कायदे

➡️SPMCIL .


♦️कागदी चलनाचे प्रकार :- 

➡️ परिवर्तनीय अपरिवर्तनीय


⭕️✔️Rbi व मौद्रीक धोरण :-

➡️ RBI ची उत्क्रांती .

➡️RBI ची रचना.

➡️पतनियंत्रण ची साधने :- 

➡️संख्यात्मक .

➡️गुणात्मक.

➡️अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा :-


♦️ बँकांचे वर्गीकरणलक्ष्य :-40%.


♦️उत्क्रांती.


♦️भांडवल पर्याप्तता.


♦️✔️सार्वजनिक वित्त :

➡️ अर्थसंकल्प ची सुरुवात आणी उत्क्रांती.

➡️ राजकोष धोरण :- उद्दिष्ट

➡️ अर्थसंकल्प रचना

➡️ भारत शासनाचे निधी :- 3 

➡️ वित्तमंत्रालाय रचना

➡️ अर्थसंकल्प निर्मिती ची प्रक्रिया

➡️ अनुदानाचे प्रकार 

➡️ तुटीचे प्रकार

➡️ अर्थसंकल्प प्रकार

➡️ प्रारूपे :-GENDER BUDGET

➡️ संसदीय समित्या

➡️ CAG ,CGA



⭕️✔️कररचना:-

➡️ करकसोट्या.

➡️ करांचे प्रकार

➡️लाफर CURVe

➡️भारतातील महत्वाचे प्रकार


♦️वित्त आयोग :-

➡️ 13,14,15

➡️ बाकी अध्यक्ष


⭕️ उद्योग:-

♦️ IIP

♦️गाभा उद्योग :- 8

♦️ओद्योगिक धोरण:- 1948 ,1956,1969,1973,1977,1991

♦️राष्ट्रीय उत्पादन धोरण 2011

♦️Make in india


⭕️✔️ आर्थिक सुधारणा:-

➡️Lpg  fullform

➡️IMF ,WTO, WORLD BANK (BASIC ONLY)


⭕️✔️परकीय व्यापार:-

♦️अनुकूल व प्रतिकूल वर्ष

♦️भारतीय आयात निर्यातपरिवर्तनीय व अवमूल्यन 

♦️EPZ, SEZ

♦️परकीय गुंतवणूक:-

FDI 


⭕️✔️ दारिद्र्य व बेरोजगार:-

♦️समित्या व आकडेवारी

♦️पंचवार्षिक योजना

♦️योजना आयोग

♦️NDC 

♦️NITI आयोग


♦️⭕️ चालू घडामोडी


⭕️✔️पायाभूत सुविधा


➡️ कृषिशी संबंधित :-

➡️ आकडेवारी व योजना 

➡️ सामाजिक योजना



👆👆👆👆वरील दिलेले सर्व मुद्दे जरी cover केले तरी येणाऱ्या संयुक्त पूर्वपरीक्षा मध्ये 10-12 मार्क्स हमखास 100% शाश्वती ने मिळतील नसतील केले तर नुसते बघू नका करून घ्या😍😍



चालू घडामोडी


◆ आरटीआयने डेटा जारी केला, 60% मतदारांनी आधारला मतदार ओळखपत्राशी जोडले.


◆ भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी” सर्व सर्वोच्च न्यायालयांसाठी “Neutral Citations” लाँच केले.


◆ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला 04 वर्षे पूर्ण झाली.


◆ यमुनोत्री धाम येथे रोपवेसाठी उत्तराखंड सरकारने करार केला.


◆ मॅनहोल्स साफ करण्यासाठी रोबोटिक स्कॅव्हेंजरचा वापर करणारे केरळ हे पहिले राज्य ठरले आहे.


◆ भूतानचा 7 वर्षीय राजकुमार देशाचा पहिला डिजिटल नागरिक बनला आहे.


◆ औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’ करण्यात आले.


◆ पाकिस्तानला चीनकडून $700 दशलक्ष निधी मिळाला.


◆ जागतिक बँकेने युद्धाच्या वर्धापनदिनानिमित्त युक्रेनला अतिरिक्त 2.5 अब्ज डॉलरची मदत जाहीर केली.


◆ भारत, गयाना तेल आणि वायू क्षेत्रावर करार करणार आहेत.


◆ युक्रेन संघर्षामुळे आर्थिक गुन्हे वॉचडॉग FATF ने रशियाचे सदस्यत्व निलंबित केले आहे.


◆ जानेवारीमध्ये जीएसटी महसूल 1.56 लाख कोटी रुपयांच्या दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला.


◆ भारतीय रिजर्व्ह बँकेने ने 5 सहकारी बँकांवर निर्बंध लादले आहेत.


◆ Infosys क्लाउडच्या उद्योगाला गती देण्यासाठी मायक्रोसॉफ्टसोबत करार केला.


◆ CSC Academy आणि NIELIT यांनी डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी सामंजस्य करार केला.


◆ 2023 मध्ये क्रिप्टोचा अवलंब करण्यास भारत 7 व्या क्रमांकावर आहे.


◆ गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा करण्यासाठी UAE ने प्रथम I2U2 उप-मंत्रिमंडळ बैठक आयोजित केली.


◆ बिल गेट्स 902 दशलक्ष डॉलर्सला हेनेकेनमधील स्टेक खरेदी केली.


◆ भारतीय पाणबुडी INS सिंधुकेसरी इंडोनेशियामध्ये पहिल्यांदा डॉक करण्यात आली.


◆ IDEX च्या तिसर्‍या दिवशी NAVDEX 2023 वर $1.5bn किमतीचे 11 सौदे झाले.


◆ एस. एस. राजामौली यांच्या RRR ने HCA येथे ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट’ पुरस्कार जिंकला.


◆ पंतप्रधान मोदींनी ‘बारिसु कन्नड दिम दिमावा’ महोत्सवाचे उद्घाटन केले.


◆ जर्मनीने भारतासोबत 5.2 अब्ज डॉलर्सच्या 6 पाणबुड्या बांधण्याचा करार केला आहे.

मराठी भाषा गौरव दिन


- 27 फेब्रुवारी

- कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस

--------------------------------------------------

● विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज)


- जन्म: 27 फेब्रुवारी 1912, मृत्यू 10 मार्च 1999

- जन्म पुणे येथे तर नाशिक येथे शिक्षण. बी. ए. झाल्यावर १९३४ ते १९३६ या काळात ते चित्रपट व्यवसायात होते.

- आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार

--------------------------------------------------

● ग्रंथसंपदा


नाटके

दुसरा पेशवा (१९४७), कौंतेय (१९५३), आमचं नाव बाबुराव (१९६६), ययाति आणि देवयानी (१९६६), वीज म्हणाली धरतीला (१९७०), नटसम्राट (१९७१), दूरचे दिवे (१९४६), वैजयंती (१९५०), राजमुकुट (१९५४), ऑथेल्लो (१९६१) व बेकेट (१९७१)


काव्यसंग्रह

जीवनलहरी (१९३३), विशाखा (१९४२), किनारा (१९५२), मराठी माती (१९६०), स्वगत (१९६२), हिमरेषा (१९६४) व वादळवेल (१९७०)


कादंबर्‍या

वैष्णव (१९४६), जान्हवी (१९५२) व कल्पनेच्या तीरावर (१९५६).


कथासंग्रह

फुलवाली (१९५०), सतारीचे बोल आणि इतर कथा (१९६८), काही वृद्ध, काही तरुण (१९६१), प्रेम आणि मांजर (१९६४) व निवडक बारा कथा (१९६८)

--------------------------------------------------

● पुरस्कार


- 1974 मध्ये त्यांच्या नटसम्राट ह्या नाटकला साहित्य अकादेमीचे पारितोषिक मिळाले.

- 1987 साली ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला.

- त्यांचा विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे.

- 1964 मधील गोव्याच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.


साधारण विधेयक आणि धनविधेयक यांचा तुलनात्मक अभ्यास

🔴 साधारण विधेयक


▪️साधारण विधेयकाची सुरुवात संसदेच्या कोणत्याही सभागृहात करता येते.

▪️कोणताही सदस्य असे विधेयक मांडू शकतो.

▪️राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीशिवाय मांडता येते.

▪️राज्यसभा यात बदल करू शकते किंवा फेटाळू शकते.

▪️राज्यसभा जास्तीत जास्त 6 महिने असे विधेयक रोखून धरू शकते. -

▪️लोकसभेने पारित केलेले विधेयक राज्यसभेत पाठवण्यासाठी अध्यक्ष्यांच्या सहीची गरज नसते.

▪️दोन्ही सभागृहांत असहमती झाल्यास राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलावू शकतात

▪️मत्र्याने लोकसभेत मांडलेले साधारण विधेयक अस्वीकृत झाल्यास/ सरकारचा मतदानात पराभव झाल्यास सरकारला राजीनामा द्यावा लागतो. खाजगी सदस्याच्या विधेयकाच्या बाबतीत असे झाल्यास मंत्रीपरिषदेला राजीनामा द्यावा लागत नाही.

▪️राष्ट्रपती असे विधेयक पुनर्विचारासाठी परत पाठवू शकतात.


🔵धन विधेयक

▪️सरुवात फक्त लोकसभेत करता येते.

▪️फक्त मंत्रीच मांडू शकतो.

▪️फक्त राष्ट्रपतींच्या पूर्व संमतीनेच मांडता येते.

▪️राज्यसभेला फक्त बदल सुचवण्याचा हक्क आहे.

▪️राज्यसभा जास्तीत जास्त 14 दिवस धन विधेयक रोखून धरू शकते.

▪️लोकसभेने पास केलेल्या धनविधेयकावर अध्यक्षांची सही असणे गरजेचे असते.

▪️असहमती झाल्यास लोकसभेने स्वीकारलेल्या स्वरुपातच विधेयक दोन्ही सभागृहांनी पारित केल्याचे मानले जाते. यावर संयुक्त बैठकीची तरतूद नाही.

▪️लोकसभेने नामंजूर झाल्यास सरकार राजीनामा देते.

▪️राष्ट्रपती अस्वीकृत करू शकतात पण पुन्हा विचार करण्यासाठी परत पाठवू शकत नाही.


पदे व राजीनामा कोणाकडे देऊ शकतो

राष्ट्रपती  -  उपराष्ट्रपतीकडे

उपराष्ट्रपती  -  राष्ट्रपतींकडे

पंतप्रधान  -  राष्ट्रपतींकडे

राज्यपाल  -  राष्ट्रपतींकडे

संरक्षण दलाचे प्रमुख -   राष्ट्रपतींकडे 

महालेखापाल  - राष्ट्रपतींकडे

महान्यायवादी  - राष्ट्रपतींकडे

लोकसभा सदस्य  -  लोकसभा सभापतींकडे

लोकसभा सभापती  -  लोकसभा उपसभापतीकडे

मुख्य निवडणूक आयुक्त -   राष्ट्रपतींकडे

मुख्यमंत्री  -  राज्यपालांकडे

महाधिवक्ता  -  राज्यपालांकडे

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश  -  राष्ट्रपतींकडे

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश -   राष्ट्रपतींकडे 

विधानसभा अध्यक्ष  - विधानसभा उपाध्यक्षांकडे

विधानसभा सदस्य  -  विधानसभा अध्यक्षांकडे

लोकपाल  -  राष्ट्रपतींकडे 

महाराष्ट्र लोकायुक्त  -  राज्यपालांकडे

मसुदा समिती (Drafting Committee)

📌घटना समितीच्या सर्व समित्यांमध्ये सर्वात महत्वाची समिती.

📌29 ऑगस्ट 1947 रोजी म्हणजे स्वातंत्र्य प्राप्ती नंतर पार पडलेल्या 5 व्या अधिवेशनामध्ये गठीत केली.

📌 मसुदा समितीची पहिली बैठक 30 ऑगस्ट 1947 रोजी पार पडली. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची या समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली.

📌घटना समितीचे घटनात्मक सल्लागार बी.एन. राउ यांनी ऑक्टोबर 1947 मध्ये मसुदा घटना तयार केली होती. त्यात 243 कलमे आणि 13 अनुसूची होत्या. मसुदा समितीने या मजकुराची चिकित्सा करण्यास ऑक्टोबर 1947 मध्ये सुरुवात केली व त्यात अनेक बदल केले.

📌पढे 21 फेब्रुवारी 1948 रोजी मसुदा समितीने मसुदा राज्यघटना घटना समिती अध्यक्षांना आणि समितीला सादर केली. यावेळी वितरीत केलेल्या मसुदा राज्यघटनेवर घटना समिती आणि समिती बाहेर देशभरात चर्चा सुरु झाली. या मसुदा राज्यघटनेत 315 कलमे आणि 8 अनुसूची होत्या.

📌मसुदा राज्यघटनेसाठी एकूण 7,635 दुरुस्त्या प्रस्तावित होत्या, त्यापैकी केवळ 2,473 दुरुस्त्यांचे प्रस्ताव घटना समितीत मांडण्यात आले.


📌मळ समितीमध्ये एकूण 7 सदस्य (अध्यक्षासहित) होते - 

(1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (या समितीचे अध्यक्ष)

(2) एन. गोपालस्वामी अय्यंगार (काँग्रेस) (3) डॉ. के. एम. मुन्शी (काँग्रेस)

(4) सईद मोहम्मद सादुल्ला (मुस्लिम लीग)

(5) अल्लादी कृष्णस्वामी अय्यर (अपक्ष)

(6) बी. एल. मित्तर (अपक्ष)

(7) डी. पी. खैतान (अपक्ष)


📌 मसुदा समिती सदस्यांमध्ये झालेला बदल

(1) बी. एल. मित्तर यांचे घटना समितीचे सदस्यत्व पहिल्या बैठकीनंतर संपुष्टात आले. त्यामुळे त्यांना मसुदा समितीच्या पुढील बैठकांना उपस्थित राहता आले नाही. तसेच आपल्या आजारपणामुळे त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी एन. माधव राव यांची नियुक्ती करण्यात आली.

(2) डी.पी. खैतान यांचे 1948 मध्ये निधन झाल्यामुळे त्यांच्या जागी टी.टी. कृष्णम्माचारी (काँग्रेस) यांची नियुक्ती करण्यात आली.


📌मसुदा राज्यघटनेची 3 वाचने -

(1) पहिले वाचन - 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 1948.

(2) दुसरे वाचन 15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949 (3) तिसरे वाचन 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949


📌मसुदा राज्यघटनेचा विचार करण्याकरीता 114 दिवस लागले.

📌.26 नोव्हेंबर 1949 रोजी मसुदा राज्यघटना संमत आणि स्वीकृत करण्यात

आली.


भारतीय संविधान प्रश्नसंच


1. भारतीय राज्यघटनेच्या ----- कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे?

 19 ते 22

 31 ते 35

 22 ते 24

 31 ते 51

उत्तर : 19 ते 22


2. राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा ----- यांच्याकडे सादर करतात.

 राष्ट्रपती

 उपराष्ट्रपती

 पंतप्रधान

 राज्यपाल

उत्तर : राष्ट्रपती


3. सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायधिशांची नेमणूक ----- करतात?

 राष्ट्रपती

 राज्यपाल

 पंतप्रधान

 सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती

उत्तर : सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती


4. ---- रोजी पंडित नेहरूंची घटनेची उद्देशपत्रिका/प्रस्तावना लिहिली?


 11 डिसेंबर 1946

 29 ऑगस्ट 1947

 10 जानेवारी 1947

 9 डिसेंबर 1946

उत्तर : 11 डिसेंबर 1946


5. भारतीय राज्यघटेनेच्या ----- परीशिष्टात विविध शपथ व नमुने दिलेले आहेत.

 परिशिष्ट-1

 परिशिष्ट-2

 परिशिष्ट-3

 परिशिष्ट-4

उत्तर : परिशिष्ट-3


6. सध्या समावर्ती सूचीमध्ये ----- विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.

 47

 48

 52

 यापैकी नाही

उत्तर : 47


7. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

 डॉ. आंबेडकर

 डॉ. राजेंद्रप्रसाद

 पंडित नेहरू

 लॉर्ड माऊंटबॅटन

उत्तर : डॉ. राजेंद्रप्रसाद


8. घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

 डॉ. राजेंद्रप्रसाद

 डॉ. आंबेडकर

 महात्मा गांधी

 पंडित नेहरू

उत्तर : डॉ. आंबेडकर


9. खालीलपैकी संसदेचे स्थायी सभागृह कोणते?

 लोकसभा

 विधानसभा

 राज्यसभा

 विधानपरिषद

उत्तर : राज्यसभा


10. लोकसभापतीची निवड कोण करतो/करते?


 लोकसभा सदस्य

 मंत्रीमंडळ

 राज्यसभा सदस्य

 राष्ट्रपती

उत्तर :  लोकसभा सदस्य


11. लोकसभेची मुदत किती वर्ष असते?

 1.8 वर्षे

 6 वर्षे

 4 वर्षे

 5 वर्षे

उत्तर : 5 वर्षे


12. राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो?

 राष्ट्रपती

 सभापती

 उपराष्ट्रपती

 पंतप्रधान

उत्तर : उपराष्ट्रपती


13. खालीलपैकी राज्यसूचीतील विषय कोणता?

 संरक्षण

 तार

 पोस्ट

 जमिनमहसूल

उत्तर : जमिनमहसूल


14. लहान मुलाला प्रथम नागरीकत्वाचे धडे ----- पासून मिळतात.


 कुटुंब

 शाळा

 दोन्हीही

 मंदिर

उत्तर : दोन्हीही


15. भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो?

 राष्ट्रपती

 उपराष्ट्रपती

 पंतप्रधान

 सरन्यायधीश

उत्तर : राष्ट्रपती


16. भारतात कोणत्या प्रकारातील शासनप्रणाली आहे?

 लष्करी

 अध्यक्षीय

 हुकूमशाही

 संसदीय

उत्तर : संसदीय


17. राष्ट्रपती राज्यसभेवर किती खासदार नेमतात?

 18

 12

 16

 20

उत्तर : 12


18. राज्यघटनेमध्ये एकूण सूची किती?

 2

 1

 3

 4

उत्तर : 3


19. योजना आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?

 राष्ट्रपती

 उपराष्ट्रपती

 पंतप्रधान

 अर्थमंत्री

उत्तर : पंतप्रधान


20. राज्यसभेच्या सदस्याचा कालावधी किती वर्षे असतो?

 4 वर्षे

 5 वर्षे

 6 वर्षे

 कायमस्वरूपी

उत्तर : 6 वर्षे

अविश्वास प्रस्ताव

"(No Confidence Motion) )"

🅾️2018 साली लोकसभेत सद्याच्या सरकार विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव "तेलगू देसम पार्टीने" (TDP) मांडला होता. प्रस्ताव मात्र संमत झाला नसल्याने सरकार स्थिर आहे यावर्षी  होणाऱ्या परीक्षासाठी अविश्वास प्रस्तावाबाबत घटनात्मक आणि सभागृहात काय तरतुदी  आहेत त्याचा आढावा.

🅾️ कलम 75 सांगते की, मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते. त्यामुळे लोकसभेत बहुमत असे पर्यंत मंत्रिमंडळ सत्तेवर राहते. मंत्रीमंडळावर अविश्वासाचा प्रस्ताव मांडून लोकसभा त्याला सत्तेवरून हटवू शकते.

1) राज्यघटनेत कुठेही विशेष अशी अविश्वास प्रस्तावाची तरतूद नाही.

2) अविश्वास प्रस्ताव हा फक्त लोकसभेत मांडता येतो. राज्यसभेत नाही.

3) अविश्वास प्रस्तावाची तरतूद लोकसभेच्या कार्यपद्धती मध्ये आहे.

4) लोकसभेचा कोणताही खासदार (सत्ताधारी अथवा विरोधी) हा लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडू शकतो.

5) प्रस्ताव मांडण्यासाठी कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 वाजता लोकसभा सचिवांकडे नोटीस देणे बंधनकारक आहे.

6) प्रस्ताव मांडताना 50 लोकसभा सदस्यांचे समर्थन बंधनकारक आहे.

7) वरील सगळी प्रक्रिया पूर्ण झाली की लोकसभा अध्यक्ष प्रस्तावावर चर्चा व मतदान कधी होणार हे सांगतात.

८) सभागृहात जर हा प्रस्ताव मंजूर झाला. त्या सरकारला राजीनामा द्यावा लागतो.

9) प्रस्तावावर मतदान हे आवाजी किंवा मतविभागणी करून होते.

10) अविश्वास प्रस्ताव मांडताना करणे देण्याची गरज नसते.

11) अविश्वास प्रस्ताव फक्त मंत्रिमंडळाविरुद्ध मांडता येतो.

आजाद हिंद सेनेची स्थापना



👑 भारताच्या स्वातंत्र्यचळवळीतील एक सर्वाधिक लोकप्रिय नेते सुभाषचंद्र बोस होत. १९३८ व १९३९ साली राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली.

👑 दसरे महायुध्द सुरू झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय चळवळ प्रखर करण्याचा आणि परकीयांची (म्हणजेच ब्रिटनच्या शत्रूराष्ट्रांची) मदत घेऊन स्वातंत्र्य प्राप्त करण्यात यावे, असा विचार मांडला. 

👑 फसिस्ट राष्ट्रांना अन्य ज्येष्ठ नेत्यांचा प्रखर विरोध असल्याने, सुभाषचंद्र बोस यांचे त्यांच्याशी मतभेद झाले. त्याची परिणती म्हणजे नेताजींनी दिलेला राष्ट्रीय काॅंग्रेसचा राजीनामा आणि फॉरर्वड ब्लॉक या पक्षाची केलेली स्थापना. 

👑 बरिटिशांविरूध्द उठाव करण्याच्या त्यांच्या प्रचारामुळे सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले, नजरकैदेतून शिताफिने निसटून ते प्रथम जर्मनीला आणि नंतर जपानला गेले.

👑 जयेष्ठ स्वातंत्र्यसेनानी रासबिहारी बोस यांनी १९४२ साली जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेने ची स्थापना केली.

👑 जपानमधील रासबिहारी बोस यांनी सिंगापूर, मलाया, ब्रम्हदेश येथील हिंदी लोकांचा हिंद स्वातंत्र्य संघ स्थापन केला. हिंदी सैन्यात राष्ट्रप्रेम निर्माण केले रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेंनेची स्थापना केली

👑 नताजींनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करावे, अशी रासबिहारी बोस यांनी विनंती केल्याने त्यांनी त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले.

👑 नताजींनी १९४३ आझाद हिंद सरकार ची स्थापना केली. आणि अमेरिका व इंग्लडविरूध्द युदध घोषित केले.

👑 आझाद हिंद सेनेने भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजींचा अपघाती मृत्यू झाला व या सशस्त्र संघर्षाच्या पर्वाची समाप्ती झाली.

👑 आझाद हिंद सेनेच्या अधिकारी व सैनिकांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात डांबन्यात आले.

गुजरात विधानसभेने भरती परीक्षेतील पेपरफुटी रोखण्यासाठी विधेयक मंजूर केले




🔹गुजरात विधानसभेने 24 फेब्रुवारी 2023 रोजी सरकारी भरती परीक्षांमधील पेपरफुटीला आळा घालण्यासाठी 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद असलेले विधेयक मंजूर केले.


🔸विधेयकानुसार, आरोपीला 10 लाख रुपयांपेक्षा कमी नसलेल्या दंडासाठी जबाबदार असेल, जो 1 कोटी रुपयांपर्यंत वाढू शकेल.


🔹गुजरात पब्लिक एक्झामिनेशन (प्रिव्हेन्शन ऑफ फेअर मीन्स) बिल, 2023, राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी मांडले होते.

लेफ्टनंट जनरल आर एस रेन यांनी महासंचालक गुणवत्ता आश्वासन (DGQA) म्हणून पदभार स्वीकारला



🔹लेफ्टनंट जनरल आरएस रेन यांनी 24 फेब्रुवारी'23 रोजी महासंचालक गुणवत्ता आश्वासन म्हणून पदभार स्वीकारला.


🔸1986-बॅचचे अधिकारी, लेफ्टनंट जनरल रीन हे इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडूनचे माजी विद्यार्थी आहेत.


🔹त्यांनी श्रीनगरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बीई (इलेक्ट्रिकल) पूर्ण केले.


🔸ते डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ क्वालिटी अॅश्युरन्स, बेंगळुरू येथे वरिष्ठ प्राध्यापक होते.


🔹ते अतिरिक्त म्हणून DQA(L) चे प्रमुख होते. महासंचालक (इलेक्ट्रॉनिक्स).


मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशन आता पहिले भारतीय आरबीआय गव्हर्नर सीडी देशमुख म्हणून ओळखले जाईल.


▪️रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) पहिले गव्हर्नर सीडी देशमुख यांच्या नावावरून मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाला लवकरच ‘चिंतामणराव देशमुख स्टेशन’ असे संबोधण्यात येणार आहे. 


▪️एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाची पहिली राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक, ज्याला निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना घोषित केले होते. 


▪️या बैठकीत चर्चगेट रेल्वे स्थानकाचे आरबीआयचे माजी गव्हर्नर आणि केंद्रीय अर्थमंत्री सीडी देशमुख यांच्या नावावर करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.


✅ चर्चगेट रेल्वे स्थानक


▪️चर्चगेट हे मुंबई शहराच्या चर्चगेट भागातील एक रेल्वे स्थानक आहे. 


▪️चर्चगेट स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गांवरील टर्मिनस असून पश्चिम मार्ग येथे संपतो. 


▪️चर्चगेट मुंबईमधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे.


जानेवारीमध्ये जीएसटी महसूल 1.56 लाख कोटी रुपयांच्या दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला.




▪️वस्तू आणि सेवा कर संकलनासाठी जुलै 2017 मध्ये अप्रत्यक्ष कर आकारणी (GST) सुरू केल्यापासूनचा दुसरा-सर्वोच्च मोप-अप जानेवारी 2023 मध्ये 1.56 ट्रिलियन रुपये होता. 


▪️एप्रिल 2022 मध्ये, जीएसटी प्राप्ती 1.68 ट्रिलियन रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली.

Friday 24 February 2023

MPSC : महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहीरात प्रसिद्ध; 673 पदांकरीता भरती

✅महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ची जाहिरात (जा.क्र.११/२०२३) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 

राज्यसेवा गट अ गट ब  = 295 जागा

महाराष्ट्र शासन स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट अ गट ब = 130 जागा

महाराष्ट्र वैधमान शास्त्र गट ब = 15 जागा

विद्युत अभियांत्रिकी सेवा गट ब निरीक्षक = 39 जागा

अन्न व औषध प्रशासन सेवा गट ब = 194

👉Total_673 जागा


 ✅राज्यसेवा मुख्य परीक्षेमधील वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने घेण्यात येईल..




स्वतःच्या प्रवर्गाला जागा नाहीत म्हणून open मधून फॉर्म भरण्याची चूक करू नका, याआधी ज्यांनी अशा चुका केल्यात त्यांना नंतर पश्चाताप झाला.


👉कारण नंतर स्वतःच्या प्रवर्गाला खूप जागा वाढल्या.


म्हणून प्रत्येक मागासवर्गातील उमेदवाराने स्वतःचा प्रवर्ग कायम ठेवून अर्ज करा. 


👉Caste ला जागा नसली तरीही open च्या जागा मिळण्यास तुम्ही पात्र असता...

आलेल्या जाहिरातीत जागा वाढ होवू शकते..

एका वर्षात एकच परीक्षा होणार असल्यामुळे Mains पर्यंत काही ना काही जागा ह्या वाढणारच...


राज्य सेवा मुख्य परीक्षा -२०२३ ऑनलाईन पद्धतीने होईल आणि इतर सर्व मुख्य परीक्षा वर्णनात्मक/पारंपरिक पद्धतीने नवीन अभ्यासक्रमानुसार होतील.


कृषि सेवा, वन सेवा , यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा आणि विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा परीक्षेतील पदे जाहिरातीत आलेली नाहीत.


जागा ६७३ नाही. तर, राज्य सेवा २९५ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी १३० जागा, विद्युत अभियांत्रिकी १५ जागा, Assistant Commissioner and Food Safety Officer १९४  जागा आणि Inspector of Legal Metrology ३९ जागा अश्या पूर्णतः वेग वेगळ्या जागा आहेत 

 यातील ज्याला पात्र तेवढ्या जागा तुमच्यासाठी😃 आणि त्याचा जास्तीचा अभ्यासक्रम.

अर्ज प्रक्रिया 
Start Date : ०२ मार्च २०२३.
End Date : २२ मार्च २०२३.



🔰गेल्या काही वर्षांतील राज्यसेवा जागा

🔺2010 - 100
🔺2011 - 245
🔺2012 - 339
🔺2013 - 265
🔺2014 - 104
🔺2015 - 434
🔺2016 - 135
🔺2017 - 377
🔺2018 - 169
🔺2019 - 413
🔺2020 - 200
🔺2021 - 405
🔺2022 - 623 
🔺2023 - 295

पंजाब सरकारने पहिला राज्यस्तरीय ‘कोळंबी मेळा’ आयोजित केला.



▪️पंजाब सरकारने पहिला राज्यस्तरीय ‘प्रॉन फेअर’ (कोळंबी मेळा) आयोजित केला आहे. 


▪️हा “कोळंबी मेळा” किंवा कोळंबी मेळा हा राज्य सरकारचा कोळंबी शेतीबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न आहे. 


▪️कोळंबी शेती ही मानवी वापरासाठी कोळंबी तयार करण्यासाठी सागरी किंवा गोड्या पाण्यात एक जलचर-आधारित क्रियाकलाप आहे. 


▪️2022-23 पर्यंत, नैऋत्य पंजाबमध्ये कोळंबी शेतीसाठी एकूण 1,212 एकर जमीन घेण्यात आली असून एकूण 2,413 टन कोळंबीचे उत्पादन झाले आहे.


❣️

चालू घडामोडी वनलायनर 24 February 2023


1. गुजरातचे अर्थमंत्री कनुभाई देसाई यांनी नुकताच विधानसभेत 3.01 लाख कोटी रुपयांचा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत हे प्रमाण 23% जास्त आहे.



2. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, इंडोनेशियामध्ये 6.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र 99 किमी खोलीवर होते. हा भूकंप शक्तिशाली होता आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.


3. जगभरात कांद्याची टंचाई वाढत आहे. मोरोक्कोपासून ते फिलीपिन्सपर्यंत सरकार त्यांच्या कांद्याच्या पुरवठ्याचे संरक्षण करत आहेत. मोरोक्को, तुर्कस्तान आणि कझाकिस्तानने कांद्याची वाढती मागणी आणि त्यांच्या मायदेशात वाढलेल्या किमतीमुळे त्यांची निर्यात थांबवली आहे.


4. हायड्रॉलिक बिघाडामुळे विमान केरळची राजधानी तिरुवनंतपुरमकडे वळवण्यात आले. टेकऑफ दरम्यान एअर इंडिया एक्स्प्रेसची शेपटी धावपट्टीवर आदळली. विमानात 182 प्रवासी होते आणि ते कालिकतहून दमामला जात होते.


5. Roscosmos ने अलीकडेच अंतराळात अडकलेल्या अंतराळवीरांना परत आणण्यासाठी रिकामे SOYUZ अंतराळयान प्रक्षेपित केले. Soyuz MS-22 कॅप्सूलमधून कूलंटची गळती सुरू झाल्याने तीन अंतराळवीर अंतराळात अडकले होते.


6. सुंदा सामुद्रधुनी पार केल्यानंतर, भारतीय पाणबुडी INS सिंधुकेसरी इंडोनेशियामध्ये दाखल झाली. इंडोनेशियामध्ये भारतीय पाणबुडी डॉकिंग करण्याची ही पहिलीच वेळ आहे.


7. चीनने अलीकडेच 333 दशलक्ष USD खर्चून Zhongxing-26 उपग्रह प्रक्षेपित केला. लाँग मार्च ३बी रॉकेटवर हे प्रक्षेपित करण्यात आले. विमान वाहतूक आणि जहाजाशी संबंधित कामकाजासाठी ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान करणे हा उपग्रहाचा मुख्य उद्देश आहे.


8. ॲग्रीकल्चर इनोव्हेशन मिशन फॉर क्लायमेट हा अमेरिकेचा संयुक्त उपक्रम आहे. याची सुरुवात यूएई आणि यूएसए यांनी केली होती. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भूक आणि हवामानातील बदलांना संबोधित करणे हा आहे.


9. युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या ठरावावर संयुक्त राष्ट्रांनी नुकतेच मतदान केले. ठरावानुसार रशियाने आपले सैन्य मागे घ्यावे, अशी सदस्यांची इच्छा होती.


10. जागतिक बँकेचे माजी अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी हवामानाशी संबंधित वादांमुळे त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच राजीनामा दिला. #Prize


CAG GC मुर्मू यांची आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे बाह्य लेखापरीक्षक म्हणून निवड.



🔹फिलीपिन्सची सर्वोच्च ऑडिट संस्था, ILO चे सध्याचे बाह्य लेखापरीक्षक, CAG द्वारे बदलले जातील.


🔸आयएलओने बाह्य लेखापरीक्षकाच्या नामनिर्देशनासाठी एक पॅनेल स्थापन केले आहे आणि सुपीरियर ऑडिट संस्थांकडून (एसएआय) प्रस्तावांची विनंती केली आहे असे सांगून कॅगने तपशील प्रदान केला.


🔹ILO ने तीन सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था (भारत, कॅनडा आणि युनायटेड किंगडम) त्यांच्या तांत्रिक कौशल्य आणि इतर घटकांवर आधारित तांत्रिक सादरीकरणासाठी निवडल्या.

अमेरिकेने मास्टरकार्डचे माजी सीईओ अजय बंगा यांना जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी नामनिर्देशित




🔹अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी 24 फेब्रुवारी 2023 रोजी व्यवसाय कार्यकारी अजय बंगा यांना जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून नामांकित केले.


🔸अजय बंगा यांची सध्या खाजगी इक्विटी फर्म जनरल अटलांटिकमध्ये उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


🔹मास्टरकार्ड आणि अमेरिकन रेड क्रॉस, क्राफ्ट फूड्स आणि डाऊ इंकच्या बोर्डवर वेगवेगळ्या भूमिका हाताळण्याचा त्यांना 30 वर्षांपेक्षा जास्त व्यवसायाचा अनुभव आहे.


जातिभेदावर बंदी घालणारे सिएटल हे अमेरिकेतील पहिले शहर ठरले आहे.

  



◆ सिएटल सिटी कौन्सिलने वंश, धर्म आणि लिंग ओळख यांसारख्या गटांसह शहराच्या म्युनिसिपल कोडमधील संरक्षित वर्गांच्या यादीत जात जोडणारा अध्यादेश काढला. 


◆ जाती-आधारित भेदभावावर स्पष्ट बंदी घालणारे सिएटल हे पहिले यूएस शहर बनून इतिहास रचला.

महत्वाचे दहा प्रश्न उत्तरे



प्रश्न 1 - "इंडियन नॅशनल कॉंग्रेस" चे अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी कोण होते?

उत्तर - लॉर्ड डफरिन


प्रश्न 2- स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण होते?

उत्तर - आचार्य जे.बी. कृपलानी


प्रश्न 3- प्रथम ब्रिटिश सम्राट भारतात येणार कोण होता?

 उत्तरः जॉर्ज पाचवा


प्रश्न 4- 'केसरी' वृत्तपत्राचे संपादक कोण होते?

उत्तर - बाळ गंगाधर टिळक


प्रश्न 5 - कोणत्या वायसरॉयच्या कार्यकाळात 'शिमला परिषद' आयोजित केली गेली होती?

उत्तर - लॉर्ड वेव्हेल 


प्रश्न 6- ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोठे झाली?

 उत्तर - लंडन


प्रश्न 7 - महात्मा गांधींनी 'साबरमती आश्रम' कोठे स्थापित केले होते?

उत्तर - अहमदाबाद


प्रश्न 8 - कोणत्या इतिहासकाराने 1857 च्या उठावाला ‘भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम’ म्हटले आहे?

 उत्तर - व्ही.डी. सावरकर


प्रश्न 9 - गदर पार्टीची स्थापना कोठे झाली?

 उत्तर - सॅन फ्रान्सिस्को


प्रश्न 10 - 1857 च्या क्रांतीच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते?

 उत्तर - लॉर्ड पामर्स्ट.

पोलीस भरती प्रश्नमंजुषा

 1. जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे?

उत्तर : भारत


2. कोणत्या देशात पहिल्यांदा पुस्तक छापले गेले?

उत्तर : चीन


3. अमेरिकेच्या कोणत्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता?

उत्तर : निक्सन


4. नकुल व सहदेव कोणाचे पुत्र होते?

उत्तर : माद्री


5. मालदीव देशाच्या संसदेला काय म्हणतात?

उत्तर : मजलीस


6. कलिंग प्रदेश कोणत्या राज्याचे ऐतिहासीक नाव आहे?

उत्तर : ओडिसा


7. तुर्की या देशाची राजधानी कोणती?

उत्तर : अंकारा


8. भारतात सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोठे आहे?

उत्तर : खरगपूर


9. डायनामाईटचा आविष्कार कोणी केला?

उत्तर : अल्फ्रेड नोबेल


10. भारत व पाकिस्तानला विभाजित करणाऱ्या रेषेचे नाव काय आहे?

उत्तर : रेडक्लिफ रेष


11. केसरी या वर्तमानपत्राची स्थापना कोणी केली?

उत्तर : बाळ गंगाधर टिळक


12. पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोणत्या तारखेस झाला होता?

उत्तर : 14 नोव्हेंबर


13. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर : पुणे


14. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते?

उत्तर : नागपूर


15. पानझडी वृक्षांची अरण्ये महाराष्ट्रात कोठे आढळतात?

उत्तर : विदर्भ


16. कोकण भागात…...या प्रकारची मृदा आढळते

उत्तर : जांभी

परश्नसंच.


🅾️रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?

उत्तर--------- स्वामी विवेकानंद


 🅾️आर्य समाजाची स्थापना कोणी केली?

उत्तर--------- स्वामी दयानंद सरस्वती


🅾️परार्थना समाजाची स्थापना कोणी केली?

उत्तर--------- आत्माराम पांडुरंग 


🅾️सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?

उत्तर----------महात्मा फुले


🅾️दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?

उत्तर----------- बाळशास्त्री जांभेकर


🅾️इदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?उत्तर----------- न्या. रानडे


🅾️मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?

उत्तर ----------- दादोबा पांडुरंग


 🅾️निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?

उत्तर ------------ महर्षी धोंडो केशव कर्वे


🅾️महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?

उत्तर ------------- लोकमान्य टिळक


🅾️आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?

उत्तर ------------- पंडिता रमाबाई


🅾️हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?

उत्तर-------------- महात्मा गांधी


🅾️भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?

उत्तर ---------------गोपाळ कृष्ण गोखले


 🅾️गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?

उत्तर -------------- विनोबा भावे


🅾️सवासदन ची स्थापना कोणी केली?

उत्तर-------------- रमाबाई रानडे 


🅾️एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ कोणी लिहला?

उत्तर-------------- न्या. रानडे


🅾️परमहंस सभेची स्थापना कोणी केली?

उत्तर------------- दादोबा पांडुरंग


 🅾️दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?

उत्तर------------- डॉ. बाबासाहेब आंबेडकर


🅾️सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?

उत्तर-------------- ग. वा. जोशी


 🅾️शतपत्रे कोणी लिहली?

उत्तर------------ गोपाल हरी देशमुख (लोकहितवादी)


🅾️ गरामगीता कोणी लिहली?

उत्तर------------- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

वाचा :- अब्दुल रसूल कुर्बान हुसेन



📚अब्दुल रसूल कुर्बान हुसेन हे सोलापूर येथील स्वातंत्र्य चळवळीतले पत्रकार होते.


📚 कर्बान हुसेन यांना इंग्रजांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल दोषी ठरवून, १२ जानेवारी १९३१ रोजी फासावर चढविले. त्यावेळी कुर्बान हुसेन यांचे वय अवघे २२ वर्षे होते. एवढ्या तरुण वयात हौतात्म्य लाभलेले ते पहिलेच संपादक असावेत.


📚सोलापुरातील स्वातंत्र्यलढा दडपण्यासाठी इंग्रजांनी मार्शल कायदा लागू केला. त्यामुळे कुर्बान हुसेन यांचे वृत्तपत्र बंद पडले.


📚तयांनी १९२७ साली ‘गझनफर’ नावाचे उर्दू भाषेतील साप्ताहिक सुरु केले होते. 


📚‘गझनफर’ या शब्दाचा अर्थ आहे सिंह. लोकमान्य टिळकांच्या ‘केसरी’ वृत्तपत्राने ज्याप्रमाणे स्वातंत्र्यलढ्यासाठी जागृती केली, त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हयात कुर्बान हुसेन यांच्या ‘गझनफर’ वृत्तपत्राने कार्य सुरु केले होते. गझनफर हे नाव उर्दू भाषेतील होतं, परंतु ते मराठी भाषेत देवनागरी लिपीत छापले जात असे. त्यांनी गझनफर वृत्तपत्रातून स्वातंत्र्यलढा, कामगारांचे प्रश्न, हिदु-मुस्लिम ऐक्य यासह विविध विषयांवर लेखन केले.


📚तयांची भाषा प्रभावी आणि परखड होती. कुर्बान हुसेन हे एका सामान्य मुस्लीम कुटुंबात जन्माला आले. ते गिरणी कामगार होते. कॉंग्रेसचे कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जात होते, ते सभांमध्ये अतिशय प्रभावी भाषणे करीत असत. ५ मे १९३० रोजी महात्मा गांधीजींना अटक झाल्यानंतर सोलापूर शहरात जे सभा झाली, त्यातील त्यांचे भाषण ऐकून तरुण कार्यकर्ते इंग्रजाविरुद्ध पेटून उठले होते.


📚 सोलापुरातील तरुण रस्त्यावर उतरल्यानंतर येथील परिस्थिती कलेक्टर यांच्या नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे ९, १०, ११ मे १९३० हे तीन दिवस सोलापूर शहरात इंग्रज सरकारचे शासनच नव्हते. भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी तीन दिवस सोलापूर शहराने पूर्ण स्वातंत्र्य अनुभवले.

आधुनिक भारताचे जनक विषयी माहिती

आधुनिक भारताचे जनक विषयी माहिती
01.) आधुनिक भारताचे जनक - राजा राममोहन रॉय
02.) आधुनिक भारताचे शिल्पकार- पंडित जवाहरलाल नेहरू.
03.) भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी.
04.) भारतीय राष्ट्रवादाचे जनक - सुरेंद्रनाथ चटर्जी
05.) भारतीय असंतोषाचे जनक- लोकमान्य
06.) भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार – सरदार वल्लभभाई पटेल.
07.) मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक - आचार्य बाळशास्त्री जांभेकर.
08.) भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक - दादासाहेब फाळके.
09.) भारताच्या अनुविज्ञानाचे जनक - डॉ.होमी भाभा.
10.) आधुनिक मराठी कादंबरीचे जनक - ह.ना.आपटे.
11.) आधुनिक मराठी कवितेचे जनक - केशवसुत.
12.) स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक- लॉर्ड रिपन.
13.) भारताच्या हरितक्रांतीचे जनक - डॉ.एम.एस.स्वामिनाथन.
14.) भारताच्या धवलक्रांतीचे जनक - डॉ.व्हार्गीस कुरियन.
15.) भारतीय भूदान चळवळीचे जनक - आचार्य विनोबा भावे.
16.) भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार - विक्रम साराभाई.
17.) भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक- सॅम पित्रोदा.

सराव प्रश्नमालिका


1. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे केली?

सिंगापूर

टोकिओ

रंगून 

बर्लिन


● उत्तर - सिंगापूर


2. इंडिया इंडिपेंडन्स लीगची (भारतीय स्वातंत्र्य संघाची) स्थापना कोणी केली?

सुभाषचंद्र बोस 

रासबिहारी बोस

जगन्नाथराव भोसले

कॅप्टन मोहन सिंग


● उत्तर - रासबिहारी बोस


3. ……… या संतांचे गुरू जनार्दन स्वामी होते?

संत ज्ञानेश्वर

संत एकनाथ

संत तुकाराम

संत नामदेव


● उत्तर - संत एकनाथ


4. ज्ञानेश्वर महाराजांचा ग्रंथ कोणता?

ज्ञानेश्ररीची शुध्द प्रत

भावार्थ रामायण

मनाचे श्लोक

ज्ञानेश्वरी

● उत्तर - ज्ञानेश्वरी


5. पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युध्दात अतिशुरपणे दीर्घकाळ कोण लढले?

तात्या टोपे

राणी लक्ष्मीबाई 

शिवाजी महाराज 

नानासाहेब पेशवे


● उत्तर - तात्या टोपे


6. भारतात आल्यानंतर गांधीजीनी पहिली चळवळ कोठे घडवून आणली?

बाडोंली

खेडा

चंपारण्य

चौरीचौरा


● उत्तर - चंपारण्य


7. पुणे समाचार हे दैनिक कोणी सुरू केले?

बाबा पद्मजी

गो.ग. आगरकर

शि.म. परांजपे

श्रीधर व्यंकटेश केतकर


● उत्तर - श्रीधर व्यंकटेश केतकर


8. अक्कलकोटच्या युवराजांना शिकवण्यासाठी सरकारने कोणाची नेमणूक केली हाती?

नाना जगन्नाथ शंकरशेठ

बाळशास्त्री जांभेकर

विष्णूशास्त्री पंडित

विष्णूबुवा ब्रह्मचारी


● उत्तर - बाळशास्त्री जांभेकर


9. खालीलपैकी योग्य जोडी कोणती?

बार्डोली सत्याग्रह - सरदार वल्लभभाई पटेल 

असहकार चळवळ - लोकमान्य टिळक

चंपारण्य सत्याग्रह - गो. कृ. गोखले

रामकृष्ण मिशन - दयानंद सरस्वती


● उत्तर - बार्डोली सत्याग्रह - सरदार वल्लभभाई पटेल


10. र्इष्ट असेल ते बोलणार,  साध्य असेल ते करणार हे कोणत्या नियतकालिकाचे ब्रीदवाक्य?

केसरी

मराठा

ज्ञानोदय

सुधारक (गो.ग आगरकर)


● उत्तर - सुधारक (गो.ग आगरकर)

सामान्य ज्ञान 10 प्रश्नोत्तरे

प्रश्न १ : महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केले ?

           १)  लोकमान्य टिळक

           २)  आचार्य विनोबा भावे ✔️

           ३)  बाळशास्त्री जांभेकर

           ४)  गो.ग.आगरकर


प्रश्न २ : निकटदृष्टीता हा दृष्टीदोष ............ भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो ?

           १)  अंतर्वक्र ✔️

           २)  बहिर्वक्र

           ३)  गोलीय

           ४)  द्विनाभीय


प्रश्न ३ : ‘चले जाव’ ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली ?

           १)  1942 साली ✔️

           २)  1920 साली

           ३)  1940 साली

           ४)  1930 साली


प्रश्न ४ : तंबाखूमध्ये ............. हे धोकादायक रसायन असते .

           १)  युरिया

           २)  युरिक आम्ल

           ३)  निकोटीन ✔️

           ४)  कॅल्शियम कार्बोनेट


प्रश्न ५ : जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला ?

           १)  न्यूटन

           २)  सी व्ही रमन

           ३)  आईनस्टाइन

           ४)  चार्ल्स डार्विन ✔️


प्रश्न ६ : महात्मा गांधी खालीलपैकी कोणती गोलमेज परिषदेत हजर होते ?

           १)  पहिल्या 

           २)  दुसर्‍या ✔️

           ३)  तिसर्‍या

           ४)  चौथ्या


प्रश्न ७ : खालीलपैकी कोणत्या धातुपासून बनविलेल्या वस्तु चुंबकाकडे आकर्षिल्या जातात ?

           १)  लोखंड

           २)  निकेल

           ३)  कोबाल्ट

           ४)  वरील सर्व ✔️



प्रश्न ८ : बर्फामध्ये ............ मिसळल्यानंतर तो वितळण्यास खूप वेळ लागतो ?

           १)  साखर

           २)  मीठ ✔️

           ३)  कॉपर

           ४)  झिंक


प्रश्न ९ : नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य कोणत्या प्रकारच्या शासन पद्धतीमध्ये मिळतात ?

           १)  राजेशाही

           २)  लोकशाही ✔️

           ३)  हुकुमशाही

           ४)  वरीलपैकी नाही


प्रश्न १० : हॅलेचा धूमकेतू किती वर्षातून एकदा दिसतो ?

           १)  40 वर्षातून

           २)  50 वर्षातून

           ३)  76 वर्षातून ✔️

           ४)  80 वर्षातून

विज्ञान 15 प्रश्न

🟤. संतृप्त हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूंमध्ये............असतो.

A. एकेरी बंध

B. दुहेरी बंध

C. तिहरी बंध ✔️

D. आयनिक बंध


🟣. ..................हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यामालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे.

A. शुक्र

B. बुध✔️

C. मंगळ

D. पृथ्वी


🔴. एलपीजी मध्ये .......घटक असतात.

A. मिथेन आणि इथेन

B. मिथेन आणि ब्युटेन

C. ब्युटेन आणि प्रोपेन ✔️

D. हायड्रोजन आणि मिथेन


🔵. MKS पद्धतीत दाबाचे एकक.........असते.

A. न्युटन

B. पासकल ✔️

C. डाइन

D. वॅट


🟡. ..................किरणांना वस्तूमान नसते.

A. अल्फा

B. बीटा

C. गॅमा ✔️

D. क्ष


🔵 दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिजद्रव्य महत्तवाचे ठरते ?

A. सोडियम

B. आयोडिन

C. लोह

D. फ्लोरिन ✔️


🟢. पुढीलपैकी कोणते जीवनसत्तव भाज्यांतून मिळत नाही ?

A. ब जीवनसत्त्व

B. क जीवनसत्त्व

C. ड जीवनसत्त्व ✔️

D. इ जीवनसत्त्व


🟣. आईच्या दुधात पुढीलपैकी कशाचा अभाव असतो ?

A. क जीवनसत्त्व व सोडियम

B. प्रथिने व लोह

C. सोडियम व प्रथिने

D. लोह व क जीवनसत्त्व ✔️


⚫️. जास्ता चोथा असलेले अन्नघटक पुढीलपैकी कोणते ?

A. सफरचंद व तूप

B. काकडी व सफरचंद ✔️

C. अंडी व केळी

D. केळी व दूध


🟡. आतड्यातील जीवानून मुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते ?

A. ब-1 जीवनसत्त्व

B. ब-4जीवनसत्त्व

C. ड जीवनसत्त्व

D. के जीवनसत्त्व ✔️


🟢. पुढीलपैकी कोणत्या घटकात कर्बोदक आढळत नाहीत ?

A. पालक

B. लोणी

C. चीज

D. मासे ✔️


🔵. अफू मध्ये खालीलपैकी कोणते द्रव्य प्रधान असते ?

A. कॅफिन

B. टॅनिन

C. मॉर्फिन ✔️

D. निकोटीन


🟤 पुढीलपैकी कोणता अन्नघटक ब-12 जीवनसत्त्वाचा प्रमुख स्रोत आहे ?

A. मासा ✔️

B. सफरचंद

C. कलिंगड

D. काजू


⚪️. हुंगण्याचे बधिरकारी साधन म्हणून पुढीलपैकी कोणत्या पदार्थाचा वापर केला जातो ?

A. नायट्रोजन

B. नायट्रोजन पेरॉक्साईड

C. अमोनिया

D. नायट्रस ऑक्साईड ✔️


🟢. वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकून वातावरणाच्या 85 % इतका व्यापलेला आहे ?

A. मिसोस्फियर

B. थर्मोस्फियर

C. ट्रोपोस्फियर ✔️

D. सेट्रॅटोस्फियर



1️⃣खालीलपैकी भरपूर प्रमाणात ‘अ’ जीवनसत्वे देणारा पदार्थ………

1} सफरचंद

2} गाजर✅✅✅

3} केळी

4} संत्र


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣खालीलपैकी कोणता रोग ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावी?

1} स्कर्व्ही

2} बेरीबेरी

3} मुडदूस✅✅✅

4} राताधळेपण


📖📖📖📖📖📖📖📖📖


3️⃣पथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे ……..कि.मी.इतकी आहे.

1} २००

2} ३५०

3} ५००

4} ७५०✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


4️⃣जव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो,तेव्हा त्याचे वजन……….

1} वाढते

2} कमी होते

3} पूर्वीइतकेच राहते

4} शून्य होते✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


5️⃣कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप……..

1} दगडी कोळसा

2} कोक

3} चारकोल

4} हिरा✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


6️⃣जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः ………..मुळे होतात.

1} जीवाणू (bacteria)

2} विषाणू (virus)✅✅✅

3} कवक (fungi)

4} बुरशी


📖📖📖📖📖📖📖📖📖


7️⃣लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही?

1} देवी

2} मधुमेह✅✅✅

3} पोलिओ

4} डांग्या खोकल


📖📖📖📖📖📖📖📖📖


8️⃣……..या किरणांना वस्तुमान नसते.

1} अल्फा

2} ‘क्ष’

3} ग्यामा✅✅✅

4} बीटा


📖📖📖📖📖📖📖📖📖


9️⃣खालीलपैकी कोणता रोग  'अ’ जीवनसत्त्वाच्या अभावी होतो?

1} रंगाधळेपण

2} स्कर्व्ही

3} बेरीबेरी

4} यापैकी नाही✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


🔟हिवतापावरील प्रभावी ऑंषध……..

1} पेनेसिलीन

2} प्रायमाक्वीन✅✅✅

3} सल्फोन

4} टेरामायसीन


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣1️⃣निष्क्रिय वायू हे………..

1} पाण्यामध्ये विरघळतात

2} स्थिर नसतात

3} रासायनिक क्रिया करू न शकणारे✅✅✅

4} रासायनिक क्रियेसाठी जास्त क्रियाशील


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣2️⃣…….हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे.

1} प्लुटोनिअम✅✅✅

2} U -२३५

3} थोरीअम

4} रेडीअम


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣3️⃣खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते?

1} युरिया

2} नायट्रेट

3} अमोनिअम सल्फेट

4} कंपोस्ट✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣4️⃣आतड्यातील जिवाणूमुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते?

1} ‘ब-१’ जीवनसत्त्व

2} ‘ब-४’ जीवनसत्त्व

3} ‘ड ‘ जीवनसत्त्व

4} ‘के ‘ जीवनसत्त्व✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣5️⃣जी.एस.आर’ हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात.

1} मेंदूचे स्पंदन

2} हृदयाचे स्पंदन

3} डोळ्यांची क्षमता✅✅✅

4} हाडांची ठिसूळता


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣6️⃣किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो?

1} १०० डी.बी.च्या वर✅✅✅

2} ११० डी.बी.च्या वर

3} १४० डी.बी.च्या वर

4} १६० डी.बी.च्या वर


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣7️⃣डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला?

1} आयोडीन-१२५✅✅✅

2} अल्बम-३०

3} ल्युथिनिअरम-१७७

4} सेसिअम-१३७


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣8️⃣आधुनिक जैवतंत्रज्ञान …………. पातळीवर कार्य करते.

1} अवअणू

2} अणू

3} रेणू✅✅✅

4} पदार्थ


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣9️⃣मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण……….हे विकर त्याच्या जठरात नसते.

1} सेल्युलेज✅✅✅

2} पेप्सीन

3} सेल्युलीन

4} सेल्युपेज


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣0️⃣इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन…

1} कमी होते✅✅✅

2} वाढते

3} सारखेच राहते

4} शून्य होते


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣1️⃣पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ……… इतकी असते.

1} M

2} N✅✅✅

3} A

4} XB


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣2️⃣सौरऊर्जा _ स्वरुपात असते.

1} प्रकाश प्रारणांच्या

2} विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या✅✅✅

3} अल्फा प्रारणांच्या

4} गामा प्रारणांच्या


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣3️⃣अहरित वनस्पती ____ असतात.

1} स्वयंपोषी

2}  परपोषी✅✅✅

3} मांसाहारी

4} अभक्ष


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣4️⃣किण्वन हा _ चा प्रकार आहे.

1} ऑक्सिश्वसन

2} विनॉक्सिश्वसन✅✅✅

3} प्रकाशसंश्लेषण

4} ज्वलन


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣5️⃣परकाश संश्लेषनात ___ प्रकाशउर्जा ग्रहण केली जाती.

1} हरितद्रव्यामुळे✅✅✅

2} झथोफिलमुळे

3} कॅरोटीनमुळे

4} मग्नेशिंअममुळ


Thursday 23 February 2023

Combine पूर्व 2023 साठी इथून पुढील दिवसातील Strategy काय असावी?

साधारणतः 65 दिवसांवरती आपली Combine पूर्व आहे. Group ब आणि Group C अशा मिळून जवळपास 8000 जागांची मेगाभरती यावर्षी होणार आहे.तर आपल्याला देखील तेवढ्याच जोमाने यासाठी तयार राहावं लागेल.

🔅इथून पुढील आपल अभ्यासाचं नियोजन कस असावं याबद्दल बोलूयात.

1.आपल्याकडे अजून 65 दिवस असं पकडलं तरी आपण 30+35 चा formula यासाठी वापरू शकतो.
30+35 म्हणजे कस? तर पहिले 30 दिवस तुम्ही सर्व विषय एकदा व्यवस्थित वाचून घेऊ शकता म्हणजे तुमचा प्रत्येक विषयावर एक minimum hold तयार होईल. त्यानंतर राहिलेले 35 दिवसात तुम्ही minimun 2 आणि max 3 revisions करू शकता. ज्या तुम्हाला 60+ score साठी उपयोगी ठरु शकतील.

2.Reading करताना एवढं लक्षात ठेवा की फक्त ढोबळमानाने न वाचता minute(reading between the lines)गोष्टी फोकस व्हायला हव्यात कारण दिवसेंदिवस आयोगाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. नुकतेच झालेले राज्यसेवा मुख्य चे पेपर पाहिल्यावर तुमच्या हे लक्षात येईलच.

3.आता एक गोष्ट लक्षात घ्या की दिवसेंदिवस cutoff वाढत आहेत.So कोणताच विषय option ला न ठेवता सर्वच विषयांची व्यवस्थित तयारी करण आवश्यक झालं आहे.ही चूक अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांकडून especially math & reasoning च्या बाबतीत होताना दिसते. So be alert 😊.

4.आता फक्त एक एक विषय पुर्ण कसा करता येईल यावर लक्ष केंद्रित करा.त्यासाठी तुम्ही एखादी Test series join केली असेल तर त्यानुसार नियोजन करू शकता.Math & current affairs आपण dailly basis वरती read करायला हवं. ( दोन्ही विषयांना min 2.5-3 hrs )

5.आपल्याला test solving, time management, exam temperament building या गोष्टीवरती काम करायचं आहे पण ते revision च्या वेळी आपण जाणीवपूर्वक करू शकतो. आता फक्त आयोगाचे Pyq आणि reading जास्त Imp आहे.

♦️काही सर्वसाधारण सूचना :

1. 2 महिने हा खूप जास्त वेळ नाही त्यामुळे आत्तापासूनच serious व्हा.नाहीतर शेवटी पळता भुई थोडी होते.

2. आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल पाहता अभ्यासासोबतच logic building, approach या गोष्टी मॅटर करत आहे असं दिसतय त्यावरती पण काम होणं आवश्यक आहे.(जे केवळ Pyq मधूनच शक्य आहे.)

3.Science आणि math दुर्लक्षित नको. कारण आपल लीड या 2 विषयावरच ठरत आहे. बाकी विषयात बऱ्यापैकी सर्वांनी एक minimum level गाठली आहे.
आपण math & reasoning + Science असं मिळून min 15 marks च तरी target ठेवायला हवं.

4.एखादा विषय अवघड जातं असेल तर त्याचा तात्काळ Class join करून तो विषय पक्का करून घ्यायला हवा.कारण एकदा वेळ गेल्यावर परत काहीही करता येणार नाही.

5. आज आपण असा संकल्प करूयात की 2023 या वर्षात मी किमान एक तरी पोस्ट मिळवीनच. आणि त्यासाठी आपण आपले सर्वोत्तम द्यायला हवं.

कारण अभी नही तो कभी नही..✌️✌️

विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत रुद्रांक्षचा पुन्हा सुवर्णवेध :-


◆ भारताचा जगज्जेता नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने कामगिरीत सातत्य राखताना मंगळवारी विश्वचषक स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकारातील वैयक्तिक गटात सुवर्णपदक पटकावले. या पदकासह भारताचे स्पर्धेतील वर्चस्वही कायम राहिले.


◆ भारताची आतापर्यंत तीन सुवर्णपदकांसह एकूण चार पदके झाली आहेत. सोमवार 21 फेब्रुवारी 2023 रोजी आर. 


◆ नर्मदा नितीनच्या साथीने मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकल्यानंतर रुद्रांक्षने मंगळवारी वैयक्तिक गटात आपल्या अव्वल मानांकनास साजेशी कामगिरी करताना पुन्हा सोनेरी यश संपादन केले.

संयुक्त राष्ट्रांच्या पोषण मोहीम समन्वयकपदी भारतीय वंशाच्या अफशान खान :-


◆ भारतीय वंशाच्या अफशान खान यांची संयुक्त राष्ट्रांच्या ‘पोषण वर्धन मोहिमे’च्या समन्वयकपदी नेमणूक केली आहे.

संयुक्त राष्ट्रांचे सेक्रेटरी जनरल अंतोनियो गुटेरेस यांनी त्यासंबंधी घोषणा केली.

अफशान खान यांच्याकडे कॅनडा आणि ब्रिटनचे नागरिकत्व आहे.


◆ ‘पोषण वर्धन मोहीम’ कुपोषण असलेल्या 65 देशांमध्ये राबवण्यात येते, त्यामध्ये भारताच्या चार राज्यांचाही समावेश आहे. सर्व प्रकारच्या कुपोषणाचे 2030 पर्यंत उच्चाटन करणे हे या मोहिमेचे लक्ष्य आहे. 


◆ सर्व संबंधितांना सहभागी करून, जगातील सर्व प्रकारचे कुपोषण थांबवण्यासाठी पोषण वर्धन रणनीतीची अंमलबजावणी करणे हे अफशान खान यांचे काम असेल. ‘विमेन फॉर विमेन इंटरनॅशनल’ या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.


मोठी पर्यावरण हानी झालेल्या 50 विभागांत महाराष्ट्र :-


◆हवामान बदलामुळे जगभरातच पर्यावरणाची हानी होत आहे. या पर्यावरण हानीमध्ये जगभरातील जे 50 विभाग आघाडीवर आहेत, त्यात महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब यासह भारतातील नऊ राज्यांचा समावेश आहे. हवामान बदलाचा अभ्यास करणाऱ्या ‘क्रॉस डिपेंडन्सी इनिशिएटिव्ह’ने हा अभ्यास केला आहे.


◆ या प्रदेशांची तुलना पूर, जंगलातील आग, उष्णतेची लाट आणि समुद्राच्या पाणी पातळीतील वाढीमुळे इमारती आणि मालमत्तेचे नुकसान होण्याच्या मॉडेलच्या अंदाजानुसार केली आहे.


◆ चीन आणि भारतावर विशेष लक्ष केंद्रित करतानाच या प्रदेशातील 2050 मध्ये अव्वल 200 पैकी अर्ध्याहून अधिक जोखीम असलेल्या प्रांतांच्या यादीत आशिया खंड आघाडीवर असल्याचे म्हटले आहे.

विघ्नेश आणि विशाख एनआर हे ग्रँडमास्टर बनणारे भारताचे पहिले भावंड आहेत.



◆ जर्मनीतील बॅड झ्विसचेनाह येथे 24 वा नॉर्डवेस्ट कप 2023 जिंकल्यानंतर आणि जर्मन IM इल्जा श्नाइडरचा पराभव केल्यानंतर, भारतीय बुद्धिबळपटू विघ्नेश एनआर भारताचा 80 वा ग्रँडमास्टर बनला. चेन्नईच्या मुलाने थेट रेटिंगमध्ये 2500 चा टप्पा पार करून हा टप्पा गाठला. 


◆ विघ्नेशचा मोठा भाऊ विशाख एनआर 2019 मध्ये भारताचा 59 वा जीएम बनला होता. अशा प्रकारे, विशाख आणि विघ्नेश हे ग्रँडमास्टर असलेले भारताचे पहिले भावंड बनले आहेत.


━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔷 भारतातील पहिला अँग्री चॅटबॉट Ama KrushAI ओडिशामध्ये लॉन्च झाला.


◆ ओडिशाचे राज्यपाल प्रा. गणेशी लाल यांनी ‘कृषी ओडिशा 2023’ च्या समापन सत्रात कृषी क्षेत्रासाठी भारतातील पहिला AI चॅटबॉट ‘Ama KrushAI’ लाँच केला. 


◆ Ama KrushAI चॅटबॉट शेतकऱ्यांना सर्वोत्तम कृषी पद्धती, सरकारी योजना आणि 40 हून अधिक व्यावसायिक आणि सहकारी बँकांकडून कर्ज उत्पादनांबद्दल माहिती देण्यास मदत करेल.


━━━━━━━━━━━━━━━━━━━

ओला भारतात उभारणार जगातील सर्वात मोठे EV HUB :-


◆ इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Ola इलेक्ट्रिक भारतातील तामिळनाडू राज्यामध्ये एक ईव्ही हब स्थापन करणार आहे. ज्यामध्ये चांगल्या क्वालिटीचे सेल, ईव्ही तयार करण्याच्या सुविधा आणि डीलर – सप्लायर असतील. ईव्ही हब हे एकाच ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांसाठी सर्वात मोठे सपोर्टींग इकोसिस्टीम बनेल असे कंपनीचे म्हणणे आहे.


◆ ओलचे ईव्ही हब संपूर्ण ईव्ही इकोसिस्टीमला एका छताखाली आणेल. ज्यामध्ये आम्ही टू-व्हिलर , फोर-व्हिलर आणि सेलमध्ये एक मजबूत वर्टिकल इंटिग्रेटेड मोबिलिटी कंपनी होईल असे त्यांनी कंपनीच्या निवेदनामध्ये म्हटले आहे.


संसद रत्न पुरस्कार 2023 साठी 13 संसद सदस्य (MP) नामांकित करण्यात आले आहेत.


◆ संसद रत्न पुरस्कार 2023 साठी 13 संसद सदस्यांची (एमपी) नामांकन करण्यात आली आहे. अर्जुन राम मेघवाल (संसदीय कामकाज राज्यमंत्री) यांच्या अध्यक्षतेखाली आणि टीएस कृष्णमूर्ती (माजी मुख्य निवडणूक) यांच्या सह-अध्यक्षपदी प्रख्यात संसदपटू आणि नागरी समाजाची ज्युरी समिती भारताचे आयुक्त) यांनी संसद रत्न पुरस्कार 2023 साठी लोकसभेतील आठ आणि राज्यसभेतील पाच खासदारांचे नामनिर्देशन केले आहे. 


◆ हे नामांकन प्रश्न, खाजगी सदस्यांची विधेयके आणि 17 व्या लोकसभेच्या सुरुवातीपासून सदस्यांच्या वादविवादांवर आधारित आहेत.


➤ संसद रत्न पुरस्कार 2023 (लोकसभा)


◆ अधीर रंजन चौधरी (INC, पश्चिम बंगाल)

◆ गोपाळ चिनय्या शेट्टी (भाजप, महाराष्ट्र)

◆ सुधीर गुप्ता (भाजप, मध्य प्रदेश)

◆ डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्र)

◆ विद्युत बरन महतो (भाजप, झारखंड)

◆ डॉ. सुकांता मजुमदार (भाजप, पश्चिम बंगाल)

◆ कुलदीप राय शर्मा (INC, अंदमान निकोबार बेटे)

◆ डॉ हिना विजयकुमार गावित (भाजप, महाराष्ट्र)


➤ संसद रत्न पुरस्कार 2023 (राज्यसभा)


◆ श्रीमती फौजिया तहसीन अहमद खान (राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्र)

◆ डॉ. ए.एस. जॉन ब्रिटास (सीपीआय-एम, केरळ);

◆ डॉ. मनोज कुमार झा (राजद, बिहार),

◆ विशंभर प्रसाद निषाद (समाजवादी पार्टी, उत्तर प्रदेश)

◆ श्रीमती छाया वर्मा (कॉंग्रेस, छत्तीसगड)


━━━━━━━━━━━━━━━━━━━

चालू घडामोडी : 23 फेब्रुवारी 2023


◆ पशुपती कुमार पारस यांनी दुबईमध्ये इंडिया पॅव्हिलियन गल्फफूड 2023 चे उद्घाटन केले.


◆ शिवसेना मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड झाली आहे.


◆ केरळ हायकोर्टाने प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित केला.


◆ दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन व्हर्च्युअल शॉपिंग अँप लाँच करण्याच्या तयारीत आहे.


◆ जातिभेदावर बंदी घालणारे सिएटल हे अमेरिकेतील पहिले शहर ठरले आहे.


◆ राजीव रघुवंशी यांची भारताचे नवीन औषध नियंत्रक जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली.


◆ यूकेने भारताला मागे टाकून जगातील सहाव्या क्रमांकाची इक्विटी मार्केट बनवली आहे.


◆ स्टेट बँक ऑफ इंडियाने सिंगापूरसह रिअल-टाइम भीम पेमेंटला परवानगी दिली.


◆ कोटक महिंद्रा बँक कॉर्पोरेट डिजिटल बँकिंग पोर्टल ‘कोटक फायन’ सुरु केले.


◆ भारत आणि सेशेल्स यांनी सागरी सुरक्षेमध्ये माहितीची देवाणघेवाण करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली.


◆ ऑकलंड विद्यापीठ, टाटा मेमोरियल हॉस्पिटलने कॅन्सर सेवेसाठी सामंजस्य करार केला.


◆ अबू धाबी संरक्षण कंपनीने UAE च्या संरक्षण प्रदर्शनात भारताच्या HAL सोबत सामंजस्य करार केला.


◆ संसद रत्न पुरस्कार 2023 साठी 13 संसद सदस्य (MP) नामांकित करण्यात आले आहेत.


◆ ढाका येथे डॉ.महेंद्र मिश्रा यांना आंतरराष्ट्रीय मातृभाषा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


◆ बचाव कार्यासाठी नौदल प्रमुखांना ऑन-द-स्पॉट युनिट सन्मानपत्र आयएनएस निरक्षक प्रदान करण्यात आले.


◆ तिलोत्तमा सेनने ISSF विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये कांस्यपदक जिंकले.


◆ टेलीफोनिका जर्मनीने भविष्यासाठी तयार ऑपरेशन्स सपोर्ट तयार करण्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन पार्टनर म्हणून TCS ची निवड केली.


◆ भारतातील पहिले हायब्रिड रॉकेट चेंगलपट्टू येथे प्रक्षेपित करण्यात आले.


◆ माजी आयकर मुख्य आयुक्त टीसीए रामानुजम यांचे निधन झाले.


◆ जेपी नड्डा यांनी ‘मोदी: शेपिंग अ ग्लोबल ऑर्डर इन फ्लक्स’ या पुस्तकाचे प्रकाशन केले.


━━━━━━━━━━━━━━━━━━━

राज्यांना सर्व थकबाकी तातडीने अदा केली जाईल :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण


◆ अप्रत्यक्ष करप्रणालीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी राज्यांना 16,982 कोटींची थकबाकी त्वरित अदा केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली.


◆ 18 फेब्रुवारी 2023 रोजी येथे वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेची बैठक झाल्यानंतर त्यांनी याबाबत माहिती दिली.


◆ या बैठकीत द्रवरूप गूळ, पेन्सिल शार्पनर यावरील कर घटविण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षेतेखाली जीएसटी परिषदेची 49 वी बैठक पार पडली.


🔷 पर्यटन मंत्रालयाने प्रसाद योजनेअंतर्गत चार तीर्थक्षेत्रांची निवड केली.


◆ पर्यटन मंत्रालयाने 'स्वदेश दर्शन' आणि 'नॅशनल मिशन ऑन पिलग्रिमेज रिजुवनेशन अँड स्पिरिच्युअल, हेरिटेज ऑगमेंटेशन ड्राइव्ह (प्रसाद)' या योजनांअंतर्गत विकासासाठी चार तीर्थक्षेत्रे ओळखली आहेत. 


◆ ते देशातील पर्यटन पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेश प्रशासन इत्यादींना आर्थिक सहाय्य देतात.

राज्यात 15 मार्चपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरू होईल: महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

 राज्यातील तलाठी भरतीसंदर्भात (Talathi Bharti 2023) महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात 15 मार्चपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरु होणार असं ते म्हणाले. ते अहमदनगरमधील लोणी येथे महसूल परिषदेत बोलत होते.

अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे दोन दिवसीय महसूल परिषद संपन्न झाली आहे. या परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांनीही उपस्थिती लावली. दोन दिवस चाललेल्या या महसूल परिषदेत अनेक धोरण निश्चित करण्यात आली असून या धोरणांपैकी वाळू लिलावाचे महत्त्वाचे धोरणाचा अंतिम मसुदा तयार झाला आहे. लवकरच ते कॅबिनेटमध्ये मांडणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patill) यांनी दिली आहे. प्रथमच अशी परिषद यशदाच्या बाहेर ग्रामीण भागात घेण्यात आली आणि यापुढे सुद्धा पुण्याच्या बाहेर परिषद घेण्याचा मानस महसूलमंत्र्यांनी व्यक्त केला.

केरळ उच्च न्यायालय - प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे देशातील पहिले




🔹केरळ उच्च न्यायालयाने 21 फेब्रुवारी 2023 रोजी मल्याळममध्ये अलीकडील दोन निकाल प्रकाशित केले आहेत.


🔸हा दिवस (२१ फेब्रुवारी) आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणूनही साजरा केला जातो.


🔹यासह, केरळ उच्च न्यायालय हे प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे देशातील पहिले उच्च न्यायालय ठरले.


🔸मल्याळममधील निकाल न्यायालयाच्या वेबसाइटवर इंग्रजी आवृत्तीच्या खाली अपलोड करण्यात आले होते.


नवी दिल्ली येथे जीएसटी परिषदेची 49 वी बैठक झाली.



▪️18 फेब्रुवारी 2023 रोजी नवी दिल्ली येथे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली 49 वी GST परिषदेची बैठक झाली. 


▪️केंद्रीय अर्थसंकल्प 2023 पासून तीन आठवड्यांच्या कालावधीत ही बैठक आयोजित केली जात आहे. 


▪️केंद्रीय अर्थमंत्री, 

▪️केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, 

▪️याशिवाय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री (विधानमंडळासह) आणि 

▪️केंद्रातील वरिष्ठ अधिकारी अर्थ मंत्रालयाच्या अधिकृत हँडलनुसार, सरकार आणि राज्ये या बैठकीत उपस्थित होते.

आयुष्मान खुराना यांची बालहक्कांचा राष्ट्रीय दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे



▪️भारतात, आयुष्मान खुराना युनिसेफ (युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड) चे प्रतिनिधित्व करेल. 


▪️युनिसेफने या अभिनेत्याचे राष्ट्रीय राजदूत म्हणून नाव जाहीर केले. 


▪️त्याच्या कर्तव्याचा एक भाग म्हणून, आयुष्मान प्रत्येक मुलाच्या जीवन, 


▪️आरोग्य आणि संरक्षणाच्या हक्कांची हमी देण्यासाठी UNICEF सोबत काम करेल.


▪️तसेच त्यांच्यावर परिणाम करणाऱ्या बाबींमध्ये त्यांचा आवाज आणि एजन्सी वाढवेल.


खजुराहो नृत्य महोत्सव मध्य प्रदेशात आयोजित



▪️सात दिवस चालणाऱ्या 49 व्या खजुराहो नृत्य महोत्सवाची सुरुवात युनेस्को वारसा म्हणून घोषित केलेल्या मंदिरात भरतनाट्यम आणि कथ्थकने होईल. 


▪️खजुराहो नृत्य महोत्सवाचा वार्षिक कार्यक्रम 


- उस्ताद अल्लाउद्दीन खान संगीत एवम कला अकादमी आणि 


- संस्कृती संचालनालय 


▪️यांनी पर्यटन विभाग आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे.

उत्तर भारतातील पहिला अणु प्रकल्प हरियाणामध्ये बांधला जाणार आहे.

  

▪️केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार, उत्तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प हरियाणातील गोरखपूर येथे बांधला जाईल. 


▪️त्यांनी दावा केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील प्रमुख यशांपैकी एक म्हणजे देशभरात अणु आणि अणुऊर्जा प्रकल्पांची स्थापना करणे, 


▪️जे पूर्वी दक्षिणेकडील तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश तसेच पश्चिम महाराष्ट्र या राज्यांपुरते मर्यादित होते.

MPSC अध्यक्ष ठाम; हवा तर राजीनामा घ्या… पण तो निर्णय घेणार नाही

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) सर्व अभ्यासक्रम नियमांनुसार तयार केला आहे. हवा तर तुम्ही माझा राजीनामा (Resignation) घ्या. पण २०२५ पासून नवीन अभ्यासक्रम (New Syllabus) लागू करण्याचा निर्णय मान्य होणार नाही, अशी आयोगाचे अध्यक्ष किशोर राजेनिंबाळकर (Kishor Rajenimabalkar) यांनी भूमिका घेतल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्य सरकार यांच्या वतीने होणारी एमपीएससी सोबतची बैठक रद्द करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचा नवीन अभ्यासक्रम आतापासून लागू न करता २०२५ पसून लागू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्याविरोधात विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. प्रामुख्याने नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी विद्यार्थी सातत्याने मागणी करत आहे. त्यासाठी आंदोलन देखील करत आहे. मात्र, याबाबत केवळ आश्वासन दिले जात आहे. अद्याप ठोस निर्णय जाहीर केलेला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
एमपीएससीने नवीन अभ्यासक्रम २०२३ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यभरातील विद्यार्थी सातत्याने आंदोलन करत आहेत. या संदर्भात विद्यार्थ्यांनी आयोगाचे अध्यक्ष किशोर राजेनिंबाळकर यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदन दिले आहेत. त्यावेळी या प्रश्नाची दखल घेत आम्ही २०२५ पासून नवीन अभ्यासक्रम लागू करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना दिले.
मात्र, त्यानंतर या संदर्भात आयोगाने कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन काढले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. राज्यभर विद्यार्थ्यांनी सातत्याने आंदोलन केले. त्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आंदोलनात भाग घेऊन विद्यार्थ्यांच्या बाजूने आम्ही आहोत, अशी आश्वासने दिले. परंतु, त्यानंतरही काहीच फरक पडलेला नाही. तर विद्यार्थी मात्र, नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा या मागणीवर ठाम आहेत. तर दुसरीकडे आयोगाचे अध्यक्ष किशोर राजेंनिंबाळकर हे सन २०२३ पासून अभ्यासक्रम लागू करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे सुत्रांची माहिती आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने याबाबत तातडीने दखल घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, एमपीएससीने अद्याप यावर कोणताही निर्णय घेतला नाही. एमपीएससीने निर्णयाचा पुनर्विचार न केल्यास‌ राज्य सरकार त्या विरोधात न्यायालयात‌ जाणार आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...