Thursday, 23 February 2023

मोठी पर्यावरण हानी झालेल्या 50 विभागांत महाराष्ट्र :-


◆हवामान बदलामुळे जगभरातच पर्यावरणाची हानी होत आहे. या पर्यावरण हानीमध्ये जगभरातील जे 50 विभाग आघाडीवर आहेत, त्यात महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब यासह भारतातील नऊ राज्यांचा समावेश आहे. हवामान बदलाचा अभ्यास करणाऱ्या ‘क्रॉस डिपेंडन्सी इनिशिएटिव्ह’ने हा अभ्यास केला आहे.


◆ या प्रदेशांची तुलना पूर, जंगलातील आग, उष्णतेची लाट आणि समुद्राच्या पाणी पातळीतील वाढीमुळे इमारती आणि मालमत्तेचे नुकसान होण्याच्या मॉडेलच्या अंदाजानुसार केली आहे.


◆ चीन आणि भारतावर विशेष लक्ष केंद्रित करतानाच या प्रदेशातील 2050 मध्ये अव्वल 200 पैकी अर्ध्याहून अधिक जोखीम असलेल्या प्रांतांच्या यादीत आशिया खंड आघाडीवर असल्याचे म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

Daily Top 10 News : 21 March 2023

1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 मार्च 2023 रोजी नवी दिल्ली येथे ग्लोबल मिलेट्स (श्री अण्णा) परिषदेचे उद्घाटन केले. ते याप्रसंगी उपस्थितां...