Monday 18 March 2024

रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera)






📌हे सर्वांत साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना 'स्पंज' म्हणतात. 


➡️त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद्रांना 'ऑस्टीया' आणि 'ऑस्कुला' म्हणतात.


📌हे जलवासी प्राणी असून त्यांतील बहुतेक समुद्रात तर काही गोड्या पाण्यात आढळतात.


➡️बहुतेक सर्व प्राण्यांचे शरीर असममित असते


📌 या प्राण्यांच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी असतात. त्यांच्या मदतीने हे प्राणी शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करतात.


➡️हे प्राणी आधात्रीशी संलग्न असल्याने त्यांच्यात प्रचलन होत नाही. म्हणून त्यांना 'स्थानबद्ध प्राणी' (Sedentary animals) म्हणतात.


📌ह्यांच्या स्पंजासारख्या शरीरास कंटिकांचा/शुकिकांचा (Spicules) किंवा स्पाँजिनच्या तंतूचा आधार असतो. कंटिका कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलीकाच्या बनलेल्या असतात.


➡️ह्यांच्या शरीरात घेतल्या गेलेल्या पाण्यातील लहान सजीव व पोषकद्रव्यांचे ते भक्षण करतात. 'ऑस्टीया' नावाच्या छिद्रांद्वारे पाणी शरीरात घेतले जाते आणि 'ऑस्क्युला' नावाच्या छिद्रांद्वारे बाहेर सोडले जाते.


📌त्यांचे प्रजनन मुकुलायन (Budding) या अलैंगिक पद्धतीने किंवा /आणि लैंगिक पद्धतीने होते. याचबरोबर त्यांना मोठ्या प्रमाणात पुनरुद्भवन (Regeneration) क्षमता असते


➡️उदा : सायकॉन, यूस्पाँजिया (आंघोळीचा स्पंज), हायालोनिमा, युप्लेक्टेल्ला इ.

यावर प्रश्न अपेक्षित आहे..


📊अनावृत्तबीजी वनस्पती (Gymnosperms)

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

📌अनावृत्तबीजी गटातील वनस्पती बहुदा सदाहरित, बहुवार्षिक व काष्ठमय असतात. 

📌या वनस्पतींच्या खोडांना फांदया नसतात. 


➡️पानांचा मुकुट तयार झालेला असतो. 

📌या वनस्पतींची नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येतात. 

📌यांच्या बियांवर नैसर्गिक आच्छादन नसते, म्हणजेच यांना फळे येत नाहीत, म्हणूनच यांना अनावृत्तबीजी म्हणतात. Gymnosperms म्हणजे Gymnos - न झाकलेले/अनावृत्त, Sperm - बीज.


✅उदा. सायकस, पिसिया (ख्रिसमस ट्री), थुजा (मोरपंखी), पायनस (देवदार) इत्यादी.



☄️☄️आवृत्तबीजी वनस्पती (Angiosperms)☄️☄️

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

💸या वनस्पतींना येणारी फुले हे त्यांचे प्रजननाचे अवयव आहेत. 

💸फुलांचे रूपांतर फळांत होते व फळांच्या आत बिया तयार होतात. 

💸या बियांवर आवरण असते. 

💸Angiosperms = Angios - Cover म्हणजे आवरण, sperm - बी. 

💸ज्यांच्या बियांचे सहजपणे दोन भाग सुटे होतात, त्यांना द्विबीजपत्री वनस्पती म्हणतात.

💸तर ज्यांच्या बियांचे दोन भाग होत नाहीत, त्यांना एकबीजपत्री वनस्पती असे म्हणतात.


➡️उदा...

📌द्विबीजपत्री - घेवडा, शेंगदाणा, चिंच, आंबा 

📌एकबीजपत्री - गहू, मका, ज्वारी


श्राव्य, अवश्राव्य व श्रव्यातीत ध्वनी

🎙मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा 20 Hz ते 20000 Hz आहे म्हणजेच या वारंवारिते मधील ध्वनी मानवी कान ऐकू शकतो म्हणून या ध्वनीला श्राव्य (Audible) ध्वनी म्हणतात. 


📊मानवी कान 20 Hz पेक्षा कमी व 20000 Hz (20 kHz) पेक्षा जास्त वारंवारितेचा ध्वनी ऐकू शकत नाही. 


🎙20 Hz पेक्षा कमी वारंवारितेच्या ध्वनीस अवश्राव्य ध्वनी (Infrasound) म्हणतात. 


🎙दोलकाच्या कंपनाने निर्माण झालेला ध्वनी, भूकंप होण्यापूर्वी पृथ्वीच्या पृष्ठभागाची कंपने होऊन निर्माण झालेला ध्वनी हा 20 Hz पेक्षा कमी वारंवारितेचा म्हणजेच अवश्राव्य ध्वनी (Infrasound) आहे. 


🎙20000 Hz पेक्षा अधिक वारंवारितेच्या ध्वनीला श्रव्यातीत ध्वनी (Ultrasound) असे म्हणतात.


🎙कुत्रा, उंदीर, वटवाघूळ, डॉल्फिन असे प्राणी त्यांना असणाऱ्या विशेष क्षमतेमुळे श्रव्यातीत असलेले ध्वनी ऐकू शकतात. 


🎙या क्षमतेमुळे त्यांना काही आवाजाची चाहूल लागते, जी आपल्याला लागू शकत नाही. 


🎙पाच वर्षाखालील लहान मुले, काही प्राणी व किटक 25000 Hz पर्यंतचा ध्वनी ऐकू शकतात. 


🎙डॉल्फिन्स, वटवाघूळे, उंदीर वगैरे प्राणी श्रव्यातीत ध्वनी निर्माणही करू शकतात.


जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती


०१) महाराष्ट्रातील नेहरू स्टेडियम कोठे आहे ?

- पुणे.


०२) अँल्युमिनियम हा धातू कोणत्या खनिजापासून तयार केला जातो ?

- बाॅक्साईट.


०३) डाॅ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे ?

- अकोला.


०४) कुलाबा जिल्ह्याचे नामकरण रायगड असे कोणी केले ?

- बॅरिस्टर अंतुले.


०५) तानसा धरण कोणत्या नदीवर आहे ?

- तानसा नदी.(ठाणे)


०१) प्रवरा नदीवर कोणते धरण बांधण्यात आले आहे ?

- भंडारदरा(विल्सन धरण). 


०२) पांडवांच्या वडिलांचे नाव काय होते ?

- पंडू राजा.


०३) राधानगरी हे प्रसिद्ध अभयारण्य महाराष्ट्रात कोठे आहे ?

- कोल्हापूर.


०४) बाल शिवाजीने वयाच्या कितव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला ?

- सोळाव्या वर्षी.


०५) महाराष्ट्रात पहिले मातीचे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले ?

- गोदावरी.


०१) पंढरपूर मधील पवित्र नदीचे नाव कोणते ?

- चंद्रभागा.


०२) महाराष्ट्रात "श्रीमंत मंदिर "कोणास म्हटले आहे ?

- शिर्डी साईबाबा मंदिर.


०३) क्षेत्रफळानुसार महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे ?

- तिसरा.


०४) महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेस कोणते राज्य आहे ?

- मध्य प्रदेश.


०५) महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता ?

- भंडारा.


०१) महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र कोठे आहे ?

- तारापूर.


०२) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?

- मुंबई शहर.


०३) छावा या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक कोण ?

- शिवाजी सावंत.


०४) महाराष्ट्र राज्याचे एकूण प्राकृतिक विभाग किती व कोणते ?

- तीन,१) सह्याद्री किंवा पश्चिम घाट २) सातपुडा रांगा महाराष्ट्र पठार (दख्खन पठार) ३) कोकण किनारपट्टी.


०५) महाराष्ट्र राज्याचे एकूण प्रशासकीय विभाग किती व कोणते ?

- सहा,कोकण,छत्रपती संभाजीनगर

(औरंगाबाद),पुणे,नाशिक,नागपूर व अमरावती.


०१) स्वराज्याची पहिली राजधानी कोणती ?

- राजगड.


०२) सह्याद्री पर्वत कोणत्या राज्यात आहे ?

- महाराष्ट्र.


०३) ग्रामसभेचे अध्यक्ष पद कोण भूषविते ?

- सरपंच.


०४) ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

- पाच वर्ष.


०५) ग्रामपंचायत व शासन यामधील दुवा कोणती व्यक्ती असते ?

- ग्रामसेवक.


०१) श्रध्दानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली ?

- डॉ.पंजाबराव देशमुख.


०२) महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- नाशिक.


०३) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?

- महात्मा ज्योतिबा फुले.


०४) नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?

-डॉ. बाबासाहेब आंबेडकर.


०५) भारताच्या पूर्वेला कोणता उपसागर आहे ?

- बंगालचा उपसागर.


०१) भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे ?

- जन-गण-मन.


०२) भारतातील सर्वात उंच मिनार कोणता आहे ?

- कुतुब मिनार.


०३) भारतातील सर्वात मोठे (क्षेत्रफळाच्या दृस्टीने) राज्य कोणते आहे ?

- राज्यस्थान.


०४) न संपणारे ऊर्जा स्त्रोत कोणते आहे ?

- सौरऊर्जा.


०५) भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?

- गंगा नदी.


०१) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?

- श्रीमती प्रतिभाताई पाटील.


०२) नासिक जिल्ह्यात विपश्यना ध्यान केंद्र कुठे आहे ?

- इगतपुरी.


०३) भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली ?

- डॉ.पंजाबराव देशमुख.


०४) नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा किती वर्षांनी भरतो ?

- दर बारा वर्षानी.


०५) नाशिक जिल्ह्यातील पक्षी अभयारण्य कोठे आहे ?

- नांदूर मधमेश्वर.



चालू घडामोडी :- 18 मार्च 2024



◆ दिव्यांग तिरंदाज व अर्जुन पुरस्कार मिळवणारी शीतल देवी यांची भारतीय निवडणुक आयोगाची राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्व म्हणून निवड केली.


◆ 'रॉयल चॅलेंजर्स बंगलोर'ने महिला प्रीमियर लीगच्या (WPL) दुसऱ्या सत्राचे विजेतेपद पटकावले आहे.


◆ भारतातील पहिले 'आयुर्वेदिक कॅफे' नवी दिल्लीत सुरू झाले.


◆ भारतीय सैन्य दल सेशेल्सला संयुक्त लष्करी सराव ‘एक्सरसाइज लिमिट-2024’ मध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहे.


◆ केंद्रीय आदिवासी व्यवहार आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांनी E-NAM (National Agriculture Market) मोबाईल ॲप लाँच केले आहे.


◆ हैदराबादमध्ये नुकताच ‘वर्ल्ड स्पिरिच्युअली फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात आला आहे.


◆ केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी PB-SHABD आणि अपडेटेड न्यूज ऑन एअर मोबाईल ॲप लाँच केले आहे.


◆ प्रसार भारती च्या अध्यक्ष पदी "नवनीत कुमार सहगल" यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


◆ देशातील बंगळुरू या ठिकाणी 75 शेफनी एकत्रितपणे जगातील सर्वात लांब डोसा तयार केला असून त्याची नोंद गिनिज बुकमध्ये झाली आहे.


◆ केंद्रिय पेट्रोलियम मंत्री हरदिप सिंग पूरी यांनी 'इथेनॉल-100' या इंधनाचा प्रारंभ केला आहे.


◆ लोकसभा निवडणुकीत आचार संहिता भंगाच्या तक्रारी तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रिय निवडणुक आयोगाने "C vigil" हे ॲप विकसित केले आहे. 


◆ प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो PIB च्या मुख्य महासंचालकपदी 'शेफाली सरन' यांची निवड झाली आहे.


◆ लमीतीए-2024 हा संयुक्त युद्धसराव सेशेल्स या देशात होत आहे.


◆ सेशेल्स या देशात लमीतीए हा युद्ध सराव 2001 वर्षा पासून होत आहे.


◆ अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षपदी नितीन सारंग यांची निवड झाली आहे.


◆ WPL 2024 क्रिकेट स्पर्धेचा विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू या संघाने पटकावले आहे.


◆ महीला आयपीएल 2024 चे उप विजेतेपद "दिल्ली कॅपिटल" या संघाने पटकावले आहे.


◆ महीला आयपीएल 2024 स्पर्धेमध्ये एलिस पेरी ही खेळाडू ऑरेंज कॅप ची वेजेती ठरली आहे.


◆ WPL 2024 स्पर्धेत श्रेयंका पाटील ही खेळाडू पर्पल कॅप ची विजेती ठरली आहे.


◆ WPL 2024 क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता.


◆ भारतात केरळ या राज्यात "Lyame Disease" चा पहिला रुग्ण आढळला आहे.


◆ राज्यपाल रमेशबैस यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार व रंगभूमीचे अभ्यासक गिरीजा शंकर लिखित 'रंग मंच' या पुस्तकाचे राजभवन, मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले.

महाराष्ट्राचा भूगोल


दख्खनवरील पठारे
------------------------------------------------------------
-----------------------
अ.क्र. पठार. जिल्हा.
------------------------------------------------------------
-----------------------
१) अहमदनगर पठार. अहमदनगर.
२) सासवड पठार. पुणे.
३) औंध पठार. सातारा.
४) पाचगणी पठार (टेबललँड) सातारा.
५) खानापूर पठार. सांगली.
६) मालेगांव पठार. नाशिक.
७) बुलढाणा पठार. बुलढाणा.
८) तोरणमाळ पठार. नंदुरबार.
------------------------------------------------------------
-----------------------
दख्खन पठारावरील अन्य डोंगर (टेकड्या)
------------------------------------------------------------
-----------------------
अ. क्र. डोंगर. जिल्हा.
------------------------------------------------------------
-----------------------
०१) अस्तंभा डोंगर. नंदुरबार.
०२) गाळणा डोंगर. धुळे-नंदुरबार.
०३) अजिंठा डोंगर. औरंगाबाद.
०४) वेरुळ डोंगर. औरंगाबाद.
०५) हिंगोली डोंगर. हिंगोली.
०६) मुदखेड डोंगर. नांदेड.
०७) गरमसूर डोंगर. नागपुर.
०८) दरकेसा टेकड्या गोंदिया.
०९) चिरोली डोंगर. गडचिरोली.
१०) भामरागड. गडचिरोली.
११) सुरजागड. गडचिरोली.
------------------------------------------------------------
-----------------------
महाराष्ट्रातील महत्त्वाची शिखरे.
------------------------------------------------------------
-----------------------
अ. क्र. शिखर. उंची जिल्हा
------------------------------------------------------------
-----------------------
०१) कळसुबाई. १६४६. अहमदनगर.
०२) साल्हेर. १५६७. नाशिक.
०३) महाबळेश्वर. १४३८. सातारा.
०४) हरिश्चंद्रगड. १४२४. अहमदनगर.
०५) सप्तश्रुंगी. १४१६. नाशिक.
०६) तोरणा. १४०४. पुणे.
०७) अस्तंभा. १३२५. नंदुरबार.
०८) त्र्यंबकेश्वर. १३०४. नाशिक.
०९) तौला. १२३१. नाशिक.
१०) वैराट. ११७७. अमरावती.
११) चिखलदरा. १११५. अमरावती.
१२) हनुमान. १०६३. धुळे.
------------------------------------------------------------
-----------------------
महाराष्ट्रातील प्रमुख घाट.
------------------------------------------------------------
-----------------------
अ. क्र. घाट. मार्ग
------------------------------------------------------------
-----------------------
०१) थळ (कसारा) घाट. मुंबई-नाशिक.
०२) बोरघाट. पुणे-मुंबई.
०३) खंबाटकी घाट. पुणे-सातारा.
०४) दिवा घाट. पुणे-बारामती.
०५) कुंभार्ली घाट. कराड-चिपळुण.
०६) आंबा घाट. कोल्हापुर-रत्नागिरी.
०७) आंबोली घाट. सावंतवाडी-बेळगांव.
०८) फोंडा घाट. कोल्हापुर-पणजी.
------------------------------------------------------------
-----------------------
महाराष्ट्र : राष्ट्रीय उद्याने.
------------------------------------------------------------
----------------------------
अ.क्र. उद्याने जिल्हा क्षेत्रफळ.
------------------------------------------------------------
----------------------------
०१) ताडोबा चंद्रपुर. ११६.५५०
०२) संजय गांधी. ठाणे-मुंबई उपनगर. ८६.९८५
०३) नवेगांव. भंडारा १३३.८८०
०४) पेंच नागपुर. २५९.७१०
(जवाहरलाल नेहरु).
०५) गुगामल. अमरावती. ३६१.६८०
०६) चांदोली. सातारा, सांगली, ३१७.६७०
कोल्हापुर, रत्नागिरी
------------------------------------------------------------
--------------------------
महाराष्ट्र : व्याघ्र प्रकल्प.
------------------------------------------------------------
--------------------------------
अ.क्र. व्याघ्र प्रकल्प. जिल्हा क्षेत्रफळ
(चौकिमी)
------------------------------------------------------------
--------------------------------
०१) मेळघाट व्याघ्र प्रकल्प. अमरावती २७६९
०२) ताडोबा अंधारी चंद्रपुर. १७२८
०३) सह्याद्री (चांदोली). सातारा, रत्नागिरी
११६६
कोल्हापुर, रत्नागिरी
०४) पेंच (नेहरु)क्षेत्रफळ नागपुर. ७४१
०५) नागझिरा गोंदिया
------------------------------------------------------------
---------------------------------
महाराष्ट्र : थंड हवेची ठिकाणे
------------------------------------------------------------
-----------------------
अ.क्र. जिल्हा ठिकाण
------------------------------------------------------------
-----------------------
०१) सातारा महाबळेश्वर, पाचगणी.
०२) रायगड. माथेरान.
०३) बीड. चिंचोली.
०४) औरंगाबाद. म्हैसमाळ.
०५) पुणे लोणावळा, खंडाळा, भीमाशंकर,
तोरणा
०६) अमरावती चिखलदरा.
०७) नागपुर. रामटेक.
०८) जळगांव. पाल.
०९) रत्नागिरी दापोली, माचाळ.
१०) ठाणे जवाई, सुर्यमाळ.
११) नाशिक. सप्तश्रुंगी.
१२) नंदुरबार. तोरणमाळ.
१३) अहमदनगर. भंडारदरा.
१४) कोल्हापुर. पन्हाळा, विशालगड.
१५) अकोला नर्नाळा.
१६) सिंधुदुर्ग. अंबोली.




महाराष्ट्र : गरम पाण्याचे झरे.
------------------------------------------------------------
-----------------------
अ.क्र. जिल्हा झरे
------------------------------------------------------------
-----------------------
०१) जळगांव. चांगदेव, अडावेद, उपनदेव.
०२) रायगड. साव, उन्हेर.
०३) अमरावती सालबरडी.
०४) नांदेड. उनकेश्वर.
०५) यवतमाळ. कापेश्वर.
०६) ठाणे वज्रेश्वरी, अकलोली, सतीवली.
०७) रत्नागिरी उन्हर्वे, अरवली, फनसवने,
राजापौर उन्हाळे, तूरळ, गोळवली.
महाराष्ट्र : लेण्या
------------------------------------------------------------
-----------------------
अ.क्र जिल्हे लेण्या
------------------------------------------------------------
-----------------------
०१) औरंगाबाद. अजिंठा & वेरुळ, म्हैसमाळ व
गलवाडा.
०२) नाशिक. पांडव, भिलवाडा, मुंगी-तुंगी,
चांदवड,
चांभार, अंकाई-टंकाई लेण्या.
०३) पुणे कार्ले, बेडसा, भादे, लेण्याद्री, चावंड,
जीवधन.
०४) नांदेड. माहूर & शिऊर.
०५) लातूर. खरोसा (औसा)
०६) जालना भोकरदन.
०७) जळगांव. घटोत्कच लेणी.
०८) कोल्हापुर. हिद्रापूर.
०९) ठाणे सोपारा, अंबरनाथ, अशरगड, लोणाड.
१०) सिंधुदुर्ग. आचरा.
११) सातारा लोणारवाई.
१२) उस्मानाबाद. धाराशिव.
१३) अकोला पातूर.
१४) चंद्रपुर. भद्रावती.
१५) बीड. अंबाजोगाई.
१६) मुंबई उपनगर. महाकाली, जोगेश्वरी, मंडपेश्वर,
कान्हेरी(मुंबई ठाणे सिमेवर).
१७) रायगड. धारापूरी (एलीफंटा अरोरा.)
गांधारफणी, चामले, कोंडगांव, कोल,
कोंडाणे, कुडा, पाले, खडसावळे.
------------------------------------------------------------
-----------------------
महाराष्ट्र : अष्टविनायक
------------------------------------------------------------
-----------------------
अ.क्र. अष्टविनायक. स्थान
------------------------------------------------------------
-----------------------
०१) महागणपती रांजणगांव (पुणे)
०२) चिंतामणी थेऊर. (पुणे)
०३) मोरेश्वर. मोरगांव. (पुणे)
०४) विघ्नहर. ओझर. (पुणे)
०५) गिरिजात्मक. लेण्याद्री (पुणे)
०६) बल्लाळेश्वर. पाली (रायगड)
०७) वरद विनायक. महाड. (रायगड)
०८) सिध्दी विनायक. सिध्दटेक (अहमदनगर)
------------------------------------------------------------
-----------------------
महाराष्ट्र : औष्णिक विद्युत प्रकल्प
------------------------------------------------------------
-----------------------
अ.क्र. प्रकल्प. ठिकाण.
------------------------------------------------------------
-----------------------
०१) कोराडी, खापरखेडा नागपुर.
०२) दुर्गापूर. बल्लारपूर (चंद्रपुर)
०३) डहाणू, चोला ठाणे.
०४) एकलहरे नाशिक.
०५) बीड. परळी वैजनाथ.
०६) फेकरी भुसावळ.
०७) पारस. अकोला.
०८) ऊरण. रायगड.
------------------------------------------------------------
-----------------------
महाराष्ट्र : अभयारण्ये.
------------------------------------------------------------
-----------------------
कोकण प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) कर्नाळा, फनसाड रायगड.
०२) तुंगारेश्वर, तानसा ठाणे.
०३) मालवण. सिंधुदुर्ग.
------------------------------------------------------------
-----------------------
पुणे प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) भिमाशंकर अभयारण्य. पुणे व ठाणे.
०२) कोयना अभयारण्य. सातारा.
०३) सागरेश्वर अभयारण्य. सांगली.
०४) राधानगरी अभयारण्य. कोल्हापुर.
०५) मयुरेश्वर सूपे अभयारण्य. पुणे
------------------------------------------------------------
-----------------------
नाशिक प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) रेहेकुरी अभयारण्य. अहमदनगर.
०२) माळढोक पक्षी अभयारण्य. सोलापुर &
अहमदनगर.
०३) कळसुबाई व हरिश्चंद्र अभयारण्य. अहमदनगर.
०४) यावल अभयारण्य. जळगांव.
०५) अनेर धरण अभयारण्य. नंदुरबार.
------------------------------------------------------------
-----------------------
औरंगाबाद प्रशासकीय विभागातील
अभयारण्ये.
०१) जायकवाडी पक्षी अभयारण्य. औरंगाबाद
व नगर.
०२) नायगांव मयुर अभयारण्य बीड.
०३) येडशी रामलिंग घाट अभयारण्य.
उस्मानाबाद.
०४) गवताळा औटरम घाट अभयारण्य. औरंगाबाद
व जळगांव.
------------------------------------------------------------
-----------------------
अमरावती प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) ढाळकोळकाज/मेळघाट, वाणअभयारण्य.
अमरावती.
०२) काटेपूर्णा अभयारण्य. वाशिम.
०३) पैनगंगा अभयारण्य. नांदेड व यवतमाळ.
०४) अंबाबर्वा, ज्ञानगंगा, लोणार अभयारण्य
बुलढाणा.
०५) नर्नाळा अभयारण्य. अकोला.
०६) टिपेश्वर अभयारण्य. यवतमाळ.
नागपुर प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) नागनागझिरा गोंदिया
०२) बोर. वर्घा व नागपुर
०३) अंधारी चंद्रपुर
०४) चपराळा, भांबरागड. गडचिरोली....

महाराष्ट्रातील पर्वत शिखरे


🎯 महाराष्ट्र पठार निर्मिती ही   🌋जवालामुखीच्या  उद्रेकामुळे झालीआहे


🎯 गरम पाण्याचे झरे हे ज्वालामुखी उद्रेकाचे पुरावे देतात


🎯यातूनच सहयाद्री पर्वतरांग तयार झाली जी प्रमुख पश्चिम वाहिनी आणि पुर्व वहिनी नद्यांची जलविभाजक बनली.


🎯महाराष्ट्र मध्ये सह्याद्री ची उंची ही उत्तरे कडून दक्षिणेकडे कमी कामी होत जाते


🎯महाराष्ट्रातील प्रमुख पर्वत शिखरे


  ☘️  कळसुबाई 1,646 मी अहमदनगर


  ☘️  साल्हेर 1,567 मी नाशिक


  ☘️  महाबळेश्वर  1,438 मी सातारा


  ☘️ हरिश्चंद्रगड 1,424 मी अहमदनगर

  

  ☘️ सप्तश्रृंगी 1,416 मी नंदुरबार


  ☘️  तोरणा 1,404 मी पुणे 


  Trick 

🏆 कसा मी हसतो अत्रे तिला विचारतो🏆


  🌸 क  = कळसुबाई

  🌸 सा  = साल्हेर

  🌸 मी  = महाबळेश्वर

  🌸 हा   = हरिश्चंद्रगड

  🌸 स   =सप्तश्रृंगी

  🌸 तो   = तोरणा

  🌸 अ  =  अस्तंभा

  🌸  तर  =  त्र्यंबकेश्वर

  🌸 तिला =  तौला

  🌸 वि    = विराट

  🌸 चा    = चिखलदरा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे

भारतात नोट बंदी केव्हा झाली?

उत्तर : 8 नोव्हेंबर 2016

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

पुलवामा हल्ला केव्हा झाला?

उत्तर : 14 फेब्रुवारी 2019

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

जम्मू काश्मीर मध्ये 370 हे कलम केव्हा हटवले?

उत्तर : 5-8-2019

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

राम मंदिरचा निर्णय केव्हा झाला?

उत्तर : 9 नोव्हेंबर 2019

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

जगातील सर्वात पहिला कोरोणा रुग्ण कोठे आढळला?

उत्तर : 17 नोव्हेंबर 2019 मध्ये चीन येथे

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

नोकरी हमी योजना (job guarantee scheme) सुरु करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : केरळ

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

पहिला ऑनलाइन कचरा विनिमय कार्यक्रम (first online waste exchange programme) कोठे सुरू करण्यात आला होता?

उत्तर :आंध्रप्रदेश

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

हायपरलूपमधून प्रवास करणारा पहिला भारतीय कोण आहे?

उत्तर : तनय मांजरेकर

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

पहिले स्पायडर म्युझियम कोठे आहे?

उत्तर : मेळघाट व्याघ्र प्रकल्प

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्राम वर्गणीतून संपूर्ण गावाला रोग प्रतिबंधक होमिओपॅथी अर्सेनिक अल्बम ३० हे औषध वितरणाचा निर्णय घेणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत कोणती?

उत्तर : सिंदखेड (जि.बुलडाणा)

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

एनआरसी, सीएएविरोधात ठराव मांडणारी देशातली पहिली ग्रामपंचायत कोणती?

उत्तर : इसळक (जि. अहमदनगर)

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

मिड डे मिल रेशन पुरवणारे पहिले राज्य कोणते? उत्तर : मध्यप्रदेश

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

प्रत्येक जिल्हयात व्हेंटिलेटरसह बेड सुविधा देणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर :उत्तर प्रदेश

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

आफ्रिकन स्वाईन फ्ल्यूची भारतातील पहिली केस कोठे आढळली होती?

उत्तर : आसाम

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

एफआयआर आपके द्वार ही अभिनव योजना सुरु करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर :मध्य प्रदेश

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

भारतात पहिला कोरोना रुग्ण कोठे आढळला होता?

उत्तर : 30 जानेवारी 2020 लाख केरळ येथे.

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

भारतात सर्वात पहिल्यांदा जनता कर्फ्यू केव्हा लावला होता?

उत्तर : 22 मार्च 2020

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

भारत चीन वाद केव्हा झाला?

उत्तर : 17 जून 2020

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

राम मंदिर चे पूजन केव्हा झाले होते?

उत्तर : पाच ऑगस्ट 2020.

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

महात्मा गांधी यांना बापू ही उपाधी कोणी दिली?

उत्तर : सरोजिनी नायडू

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️


Combine STI/PSI/ASO Pre Practice Questions

 प्र1): रियासतकार सरदेसाई यांच्या मते १८५७ चा उठाव  म्हणजे…………….होय.

A) शिपायांची गर्दी 

B) भारतीय जनतेतील असंतोषाचा स्फोट 

C) स्वातंत्र्य युद्ध 

D) गो–यांविरुद्ध काळ्यांनी व्यक्त केलेला असंतोष.


B✅🎁🍨🔥⚔️


 प्र2: नानासाहेब पेशवे यांचा सेनापती …… याने १८५७ च्या उठावात कामगिरी बजावली.

A)  रावसाहेब पटवर्धन

B) बापू गोखले 

C) गंगाधर फडणीस 

D)  तात्या टोपे


D ✅🎁🍨🔥⚔️



 प्र3): इ .स. १८५७ च्या उठावात ज्यांनी क्रांतिकारकांचे नेतृत्व केले होते , अशा नेत्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येत नाही.?

A) बहादूरशहा 

B) नानासाहेब 

C) बापू गोखले 

D) कुंवर सिंह


 C ✅🎁🌹🔥⚔️


 प्र4: १८५७ च्या उठावात अनेक संस्थानिक इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले . अशा संस्थानांमध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थानाचा समावेश करता येणार नाही ?

A) हैद्राबाद 

B) ग्वाल्ह्रेर 

C) बडोदा 

D) जगदीशपूर


D ✅🎁🌹🔥⚔️


 प्र5):जबलपूर  प्रदेशातील गोंड राजा…………… याने १८५७ च्या उठावात भाग घेउन क्रांतिकारकांना साथ दिली.

A) मान सिंह 

B) विक्रम सिंह 

C) शंकर सिंह 

D) लॉरेन्स


C ✅🎁🔥🌹⚔️


 प्रश्न6): क्रांतिकारकांनी दिल्ली ताब्यात घेतली त्या वेळी दिल्ली चा कमिशनर  कोण होता ?

A) सायमन फ्रेझर 

B) निकोलसन 

C) हडसन 

D) लॉरेन्स


A ✅🎁🌹〽️⚔️


प्र 7) : ३० जू न १८५७ रोजी  क्रांतिकारकारकांनी……………. यांना पेशवा म्हणून घोषित केले.

A)  तिसरा बाजीराव

B) तात्या टोपे 

C) चिमासाहेब 

D)  नानासाहेब


D ✅🎁🌹Ⓜ️⚔️


 प्र8): …………… हे क्रांतिकारकांनी क्रांतीचे प्रतीक उठवले होते.

A) जळता निखारा 

B) बंदूक 

C) लालकमळ 

D) गुलाब


 C ✅🎁🌺🌺Ⓜ️


 प्र 9): १८५७ च्या उठावाची पूर्व नियोजित तारीख कोणती होती ?

A) ११ मे १८५७ 

B) ३० जून १८५७ 

C) २९ मार्च १८५७ 

D) ३१ मे १८५७


D ✅🎁🌺🌹Ⓜ️



प्र 10 ): १८५७ च्या उठावात अभूतपूर्व संग्रामा नंतर इंग्रजांना पुन्हा दिल्ली काबीज करुन देणारा आधिकारी कोण होता ?

A) सर हेन्री बर्नाड 

B) जनरल नील 

C) जनरल स्मिथ 

D) निकोलसन


D ✅🎁〽️Ⓜ️⚔️


 प्र 11): खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

A) बहादूरशहा इंग्रजांशी लढता लढता मरण पावला 

B) इंग्रजांनी बहादूरशहास पकडून क्रुरपणे ठार केले. 

C) बहादूरशहा रंगुन येथे मृत्यु पावला . 

D) बहादूरशहा नेपाळ येथे मृत्यु पावला


 C ✅🎁🔥⚔️Ⓜ️


 प्र 12): १८५७ च्या उठावात सहभागी झाल्याबद्दल इंग्रज सरकारने ……………. याला १८ एप्रिल १८५९ रोजी शिप्री येथे जाहीररित्या फाशी दिली .

A) नानासाहेब 

B) तात्या टोपे 

C) बहादूरशहा 

D) कुवंर सिंह


B ✅🎁🌹🔥〽️


 प्र13): १८५७ चा उठाव हिंदी शिपायांनी केवळ स्वार्थी हेतूने प्रेरीत होऊन केला होता , असे मत व्यक्त करणारा इतिहासकार कोण ?

A) रियासतकार सरदेसाई 

B) अशोक मेहता 

C) सर जॉन सिली 

D) वि. दा . सावरकर


C ✅Ⓜ️🎁🔥⚔️


प्र14: खालीलपैकी कोणते संस्थान लॉर्ड डलहौसी  याने खालसा केलेले नाही.

A) सातारा 

B) नागपूर 

C) ग्वाल्हेर 

D) म्हैसूर


 C ✅🎁🔥🌹Ⓜ️


 प्र 15 ): खालीलपैकी कानपूर येथील हत्याकांडाला जबाबदार असण–या व्यक्ती कोण ?

A) कुँवर सिंह 

B) तात्या टोपे 

C) अझीमउल्ला 

D) नानासाहेबांचे सैन्य


D ✅🎁🌹🔥〽️


 प्र 16): १८५७ च्या उठावाचे राजस्थानमधील मुख्य ठिकाण कोणते  ?

A) कोटा 

B) नसीराबाद 

C) जैसलमेर 

D) अजमेर


A ✅🎁🌹Ⓜ️🔥



 प्र 17): खालीलपैकी कोणत्या वर्गाने क्रांतिकारकांना सहाय्य केले नाही ?

A) संस्थानिक 

B) जमीनदार 

C) शेतकरी व कामगार D) नवमध्यम वर्ग


D ✅🎁🌹Ⓜ️🔥


 प्र 18): ओरिसा ते छोटा नागपूरच्या प्रदेशात १८५७ च्या उठावात कोणी मुख्यत्वे भाग घेतला होता ?

A) आदिवासी जमाती 

B) जमीनदार 

C) जुने संस्थानिक 

D) वरील सर्व


D ✅🎁🔥Ⓜ️〽️


 प्र 19) :१८५७  च्या उठावाचे आसाममध्ये नेतृत्व कोणी केले  होते ?

A) दिवान मणिराम दत्त B) कंदावेश्वर सिंह 

C) पुरंदर सिंह 

D) पिलारि बरुआ


A ✅🎁🔥〽️Ⓜ️


 प्र20) :१८५७ च्या उठावादरम्यान सम्राट बहादूरशहा चा सर्वात विश्वासू सल्लगार  कोण ?

A)अजिमुल्ला खान

B) झवान बख्त 

C) झीनत महल 

D) बख्त खान



[प्र.१] सुर्य किरणांद्वारे येणाऱ्या अतिनील किरणांची तरंगलांबी किती असते?

१] १००-२०० nm

२] २८०-३१५ nm

३] ६४०-८२० nm

४] ८५०-९१० nm


उत्तर✅

२] २८०-३१५ nm

--------------------------------

[प्र.२] "परीसंस्थांशी संलग्न जनता" असे कोणास संबोधले जाते?

१] पर्यावरणवादी

२] पर्यावरण विशेषज्ञ

३] जंगलात रहाणारे आदिवासी

४] जुन्या पिढीतील शहरी लोक 


उत्तर✅

३] जंगलात रहाणारे आदिवासी 

--------------------------------

[प्र.३] कोणत्या राष्ट्रीय उद्यानास जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असे नाव देण्यात आले?

१] पेंच

२] ताडोबा

३] मेळघाट

४] सह्याद्री


उत्तर

१] पेंच ✅

--------------------------------

[प्र.४] खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये "बिझार्ड" या नैसर्गिक आपत्तीचा समावेश करता येईल?

१] हवामानातील नैसर्गिक आपत्ती

२] पाण्यातील नैसर्गिक आपत्ती

३] जमिनीवरील नैसर्गिक आपत्ती

४] जैविक नैसर्गिक आपत्ती


उत्तर✅

१] हवामानातील नैसर्गिक आपत्ती 

--------------------------------

[प्र.५] कोणता नेत्रदोष नेत्रगोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो?

१] निकटदृष्टीता

२] दूरदृष्टीता

३] रंगांधळेपणा

४] वृद्धदृष्टीता


उत्तर✅

१] निकटदृष्टीता 

--------------------------------

[प्र.६] इथेनॉल चे उत्पादन वाढवण्यासाठी भारताने अलीकडेच कोणत्या देशाबरोबर करार केला?

१] अमेरिका

२] इस्त्राईल

३] पेरू

४] फ़िलिपाइन्स


उत्तर

४] फ़िलिपाइन्स ✅

--------------------------------

[प्र.७] महाराष्ट्र शासनाने 'ग्राम न्यायालय कायदा २००८' कधी लागू केला?

१] २ ऑक्टोबर २००८

२] १५ ऑगस्ट २००८

३] २ ऑक्टोबर २००९

४] १५ ऑगस्ट २००९


उत्तर

३] २ ऑक्टोबर २००९ ✅

--------------------------------

[प्र.८] आंध्र लेक कोणत्या जिल्ह्यात आहे?

१] ठाणे

२] बुलढाणा

३] पुणे

४] धुळे


उत्तर

३] पुणे ✅

--------------------------------

[प्र.९] "Industrial association of western India" ची स्थापना कोणी केली?

१] म.गो.रानडे

२] पंजाबराव देशमुख

३] नारायण लोखंडे

४] मुकुंदराव पाटील


उत्तर

१] म.गो.रानडे ✅

---------------------------------

[प्र.१०] सेंद्रिय शेतीचे फायदे कोणते?

अ] कमी खर्चाची शेती

ब] कमी वेळ लागतो

क] कमी मजूर लागतात


१] फक्त अ

२] अ आणि ब

३] अ आणि क

४] वरील सर्व


उत्तर

१] फक्त अ✅

लॉर्ड कर्झन (1899 - 1905)


●लाॅर्ड कर्झन म्हणजे भारतातील सर्वात वादग्रस्त व्हाइसराॅय.... 


●1899 मध्ये भारतासाठी चांदी ऐवजी सुवर्ण परिमाण लाॅर्ड कर्झन याने अवलंबिले.


●1901 मध्ये काश्मिर व पंजाब यांचा काही भाग मिळुन वायव्य सरहद्द प्रांत निर्माण केला.


●1901 मध्ये भारतीय राजपुत्रांना उच्च शिक्षण देण्यासाठी लाॅर्ड कर्झन याने Imperial Cadet Core  ची स्थापना केली.


●23 जानेवारी 1901 रोजी महाराणी व्हिक्टोरीया हिचे निधन झाले. पुढे 1921 मध्ये महाराणी व्हिक्टोरिया हिच्या स्मरणार्थ कलकत्ता येथे व्हिक्टोरिया हॉल बांधण्यात आला.


●1902 मध्ये सर थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली 'युनिव्हर्सिटी कमिशन' नेमण्यात आले.

 

●1902 मध्ये सर अँन्ड फ्रेजर यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस खात्याची समिती नेमण्यात आली. यानुसारच criminal investigation bureau ची सुरुवात झाली. 


●1902 रोजी कर्झनने दुष्काळ निवारणासाठी 'मॅकडोनाल्ड दुष्काळ आयोग' स्थापन केला.


●1903 मध्ये लाॅर्ड कर्झन याने दिल्ली येथे भव्य दरबार भरवुन राणीच्या वारसाला भारत सम्राट घोषित केले.


●1903 मध्ये सर ॲन्ड्र्यु फ्रेजर यांनी बंगालच्या फाळणीची योजना तयार केली. 


●1904 मध्ये पहिला सहकारी कायदा पारित करण्यात आला. 


●1904 मध्ये प्राचीन स्मारक संरक्षण कायदा पारीत केला.

 

●लाॅर्ड कर्झन याने व्यापार व उद्योगधंदे खाते निर्माण केले.

 

●1901 मध्ये बंगालमध्ये पुसा येथे कृषी संशोधन संस्थेची स्थापना लाॅर्ड कर्झन यांनी केली. 


●लाॅर्ड कर्झनच्या काळात DSP व Dysp यांची थेट नेमणूक सुरु झाली. 


●ब्रिटीश शासनासोबत झालेल्या मतभेदांमुळे (कर्झन - किचनर विवाद) कर्झन 1905 मध्ये मायदेशी परतला.


●कर्झन याने रेल्वे कारभाराच्या चौकशी साठी सर रॉबर्टसन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. 


● भारतात रेल्वेचे विस्तृत जाळे पसरविण्याचे श्रेय कर्झन कडे जाते.


●लाॅर्ड कर्झन याने टाटा इंस्टिट्युट ऑफ सायन्स, बेंगलोर येथील संशोधन कार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्थेला देणगी दिली.


●19 आॅगस्ट 1905 रोजी केसरी वृत्तपत्रामध्ये लिहिलेल्या आपल्या लेखात लोकमान्य टिळकांनी कर्झनची कारकीर्द औरंगजेबाची प्रतिकृती होती असे म्हटले होते. 


●लोकमान्य टिळक आणि नामदार गोखले यांनी लाॅर्ड कर्झन याची तुलना औरंगाजेबाशी केली.


●कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर लिखित  'किचकवध' नाटकात किचक ची तुलना कर्झन सोबत केली गेली.


●कर्झनची कारकीर्द आपल्या दुष्कृत्यामुळे खुप गाजली. लंडन मध्ये मदनलाल धिंग्रा याने कर्झनला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.


● 'व्हाइसराॅय पदाचा राजीनामा  दिल्यानंतर कलकत्त्याचा महापौर होण्यास मला आवडेल' असे कर्झन म्हणत.


पहिली गोलमेज परिषद



 तारिख :- 12 नोव्हेंबर 1930 ते जानेवारी 1931

 कार्यकाळ :- तीन महिेने

 अध्यक्ष :- सर रॅमसे मॅकडोनाल्ड

  उपस्थित भारतीय सदस्य :- एकुण 89

  उद्घाटक :- ब्रिटिश  सम्राट पंचम जॉर्ज.



 🖍 काँग्रेस पक्षाने या गोलमेज परिषदेत भाग घेतला नाही. कारण कायदेभंग चळवळीत काँग्रेसचे अनेक नेते  तुरूंगवासात होते व बाकीच्यांनी काँग्रेसच्या निर्णयाला साथ दिली.

 🖍 यावेळी मुस्लिमांचे प्रतिनिधी निवडण्याचे काम लॉर्ड आयर्विन यांनी अापल्या कार्यकारी मंडळातील  कट्टर मुस्लिम नेते फजली हुसेन यांच्यावर सोपविले होते व त्यांनी मवाळ मुस्लिम नेते सोडून कडव्या मुस्लिम नेत्यांची निवड केली

📚   या परिषदेतील उपस्थित असलेले प्रमुख भारतीय 📚

 🖍 मसिल्म लीग :- मुहम्मद अली जिना, आगा खान, ए.के. फजलुल हक, मुहम्मद शफी.

 🖍 हिंदु महासभा :- एम.आर.जयकर, बी.एस.मुंजे

 🖍 भारतीय लिबरल पार्टी :- तेजबहादुर सप्रु, सी.वाय. चिंतामणी, श्रीनिवासन शास्त्री.

 🖍अस्पृश्यांचे प्रतिनिधी :- बाबासाहेब आंबेडकर

  🖍कामगार प्रतिनिधी :- एन.एम. जोशी

📚   परिषदेतील प्रमुख ठराव व मागण्या 📚

🖍  या परिषदेत वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी करण्यात आली.

  🖍सपूर्ण भारतीय राज्याचे स्वरूप संघराज्य असावे.

  🖍बरम्हदेश हा भारतापासुन वेगळा करण्यात यावा.

 🖍 या परिषदेत आठ उपसमित्या स्थापन करण्यात आल्या.

 🖍 जिना व आंबेडकर यांनी स्वतंत्र मतदार संघाचा आग्रह धरला.

  🖍जातीय प्रश्नावर या परिषदेत एकमत होवू शकले नाही.

  🖍काँग्रेसच्या गैर हजेरित घटनात्मक सुधारणा अशक्य ठरल्या.

 🖍 डाँ. आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली.

1853 चा चार्टर अ‍ॅक्ट :-

 कंपनीला दिलेल्या सनदेची मुदत 1853 मध्ये संपली, कंपनीकडे राजकीय सज्ञ्ल्त्;ाा ठेवण्यास अनेक संसद सदस्यांचा विरोध होता. त्यातून आज्ञापत्र मंजूर करण्यात आले.


· त्यातील तरतुदी -


(1) आज्ञापत्रांची 20 वर्षाची मुदत रद्द केली. संसद कंपनीचे अधिकार रद्द करत नाही. तोपर्यत सम्राटाचा प्रतिनिधी म्हणून कंपनीने भारतात कारभार करावा


(2) कंपनीच्या संचालकांची संख्या 18 करण्यात आली. त्यामध्ये 10 वर्षासाठी सम्राटाकडून 6 तर स्पर्धा परीक्षेच्या माध्यामातून 12अशी निवड करावी


(3) नियंत्रण मंडळाच्या गव्हर्नरची नेमणूक करण्याची परवानगी दिली. प्रत्यक्षात 1912 मध्ये गव्हर्नरची नेमणूक झाली.


(4) भारतीय कायद्यांचे संहितीकरण करण्यासाठी इंडियन लॉ कमिशनची नेमणूक करण्यात आली.


(5) विधीनिर्मितीसाठी कार्यकारणी परिषदेची सदस्य संख्या 12 निश्चित करण्यात आली.


· यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश इतर एक न्यायाधीश आणि चांर प्रांताचे मुंबई, मद्रास, आग्रा, बंगाल चा सदस्य असे 6 सदस्य व इतर 6 सरकारी सदस्य असे.

सायमन कमिशन (1927-28)



- अध्यक्ष :-जॉन सायमन 

- सदस्य: Clement Attlee, Harry Levy-Lawson, Edward Cadogan, Vernon Hartshorn, George Lane-Fox, Donald Howard


- 8 नोव्हेंबर 1927 इंग्लंड येथे स्थापना

- 8 फेब 1928 मुंबईत दाखल, 7 सदस्य सर्व इंग्रज

- भारतात दोनदा आले: फेब्रुवारी 1928, ऑक्टोंबर 1928

- अहवाल सादर मे 1930

- शिफारस :- गोलमेज परिषद


नेहरु रिपोर्ट 1928

- सायमन कमिशनला विरोध केल्यामुळे

- भारतमंत्री लॉर्ड बर्केनहेड ने आव्हान दिले की तुम्ही संविेधानासाठी प्रयत्न करा

- सचिव् जवाहर लाल नेहरु, अन्य 9 सदस्य होते पैकी एक सुभाष चन्द्र बोस 

- समिति ने रिपोर्ट 28-30 अगस्त, 1928 सादर केला

- पहिल्या दोन बैठका M A अन्सारींच्या अध्यक्षतेखाली झाल्या

- तिसरी बैठक मोतीलाल नेहरुंच्या अध्यक्षतेखाली झाली

- 29 राजनीतिक संगठनांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले

- यात प्रथम वसाहतीअंतर्गत स्वराज्य मागितले व 

- नेहरु व सुभाषचंद्र बोस यांनी संपूर्ण स्वातंत्र मागितले

1909 चा कायदा ,1919 चा कायदा ,

1909 चा कायदा


भारतीय सुधारणा चळवळीला सुरुवात

1909 च्या कायदयास मोर्ले – मिंटो सुधारणा कायदा असे ही म्हणतात.
मोर्ले हे भारतमंत्री तर मिंटो हे व्हाईसरॉय होते.
1909 च्या कायद्याने लंडनमधील भारतमंत्र्यांच्या इंडिया कॉन्सिल मध्ये दोन हिंदी लोकांचा समावेश करण्यात आला.
के.जी. गुप्ता
सय्यद हुसेन बिलग्रामी
1909 च्या कायद्याने भारतातील गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात एक जागा हिंदी सभासंदासाठी राखून ठेवण्याची तरतूद केली गेली. त्यानुसार रायपूरचे ‘लॉर्ड सत्येंद्र प्रसन्न सिन्हा’ यांची नेमणूक करण्यात आली.
1909 च्या कायद्याने मुस्लिमांना विभक्त मतदारसंघ देण्यात आले.
गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाची संख्या या कायद्याने आठ वर नेली.
केंद्रीय कायदे मंडळाची संख्या 68 केली.
1909 च्या कायद्यातील दोष पुढीलप्रमाणे :

संसदीय पद्धत लागू पण उत्तरदायीत्वाचा अभाव.
निवडणूक पद्धत काही अंशी मान्य करण्यात आली.
प्रांतात भारतीयांचे बहुमत पण केंद्रात बहुमत नाही.
1909 च्या कायद्याने सभासदांना प्रश्न विचारण्याचा, अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा अधिकार मिळाला परंतु त्यावर मतदान करण्याचा अधिकार दिला नाही.

_____________________________________

1919 चा कायदा


Must Read (नक्की वाचा):

1919 चा सुधारणा कायदा मॉन्टेग्यु – चेम्सफोर्ड नावानेही ओळखला जातो. मॉन्टेग्यु हे भारतमंत्री तर चेम्सफोर्ड हे व्हाईसरॉय होते.


20 ऑगस्ट 1917 – भारतमंत्री मॉन्टेग्युची घोषणा – भारताला ‘साम्राज्यअंतर्गत स्वराज्य’ टप्याटप्याने दिले जाईल. या घोषणेचे स्वागत मवाळांनी ‘मॅग्ना चार्टा ऑफ इंडिया’ असे केले.


1919 च्या कायद्याने भारतमंत्र्यांचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून सुरू केला.


इंडिया कौन्सिलच्या सभासंदांची संख्या आठ ते बारा करण्यात आली त्यात तीन भारतीय सदस्यांचा समावेश करण्यात आला.


1919 च्या कायद्याने हायकमिशन ऑफ इंडिया हे पद निर्माण करून त्यांचा पगार भारतीय तिजोरीवर लादला.


केंद्रीय कायदेमंडळ व्दिगृही केले.


कनिष्ठ सभा (Legislative Assembly – 143)


वरिष्ठ सभा (Council state -60)


1919 च्या कायद्याने मुस्लिमांबरोबर शीख, युरोपीय आंदिना स्वतंत्र मतदार संघ दिले.


या कायद्याने प्रांतात व्दिदल शासनाचा प्रारंभ केला.


वरिष्ठ सभागृहाचा कार्यकाल 5 वर्षाचा तर कनिष्ठ सभागृहाचा कार्यकाल 3 वर्षाचा करण्यात आला.


निवडणुकीचा नागरिकांना देण्यात आलेला मतदानाचा


कान

श्रवणाच्या इंद्रियाला कान असे म्हणतात. शरीराचा समतोल राखणे हेही अंतर्कर्णाचे कार्य आहे.

याचे बाह्य, मध्य व अंतर्कर्ण असे तीन भाग सस्तन प्राण्यांत स्पष्ट दिसतात. सरीसृप (सरपटणारे प्राणी), उभयचर (जमिनीवर व पाण्यात वावरणारे) व पक्षी यांत मध्य व अंतर्कर्ण असे दोनच भाग दिसतात.

 तर जलचरांत फक्त अंतर्कर्णच अस्तित्वात असतो. या लेखात प्रथमत: मानवी कानासंबंधी व त्यानंतर अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांच्या आणि मनुष्येतर पृष्ठवंशी प्राण्यांच्या कानांसंबंधी माहिती दिली आहे.

हवेतून आलेल्या ध्वनिलहरी एकत्रित करून बाह्यकर्ण कर्णपटलावर (कानाच्या पडद्यावर) पोहोचवितो. कर्णपटलाचे हे कंपन मध्यकर्णातील अस्थींच्या साखळीने व थोडेफार हवेतून अंतर्कर्णात पोहोचते.

 सर्पिल कुहरात (अंतर्कर्णातील हाडांनी बनलेल्या नलिकाकार पोकळीत) व श्रोतृ कुहरात (सर्पिल कुहराच्या मध्य भागातील लंबवर्तुळाकार पोकळीत) काही जागी संवेदन ग्राहके (संवेदना ग्रहण करणारी मज्जातंतूची टोके ) असतात.

 त्यांच्यामार्फत अंगस्थिती (तोल सांभाळण्याच्या दृष्टीने असणारी शरीराची अवस्था) व ध्वनिलहरींमुळे झालेला द्रवदाबातील फरक आपण ओळखू शकतो [→ संस्थिती रक्षण]. पृष्ठवंशी प्राण्यांत समतोलपणाचे ज्ञान श्रवणज्ञानापेक्षा पुरातन आहे.

श्रवणाकरिता वापरला जाणारा अंतर्कर्णाचा भाग सस्तन प्राण्यांत जास्त स्पष्ट वाढलेला दिसतो.


🌺बाह्यकर्ण🌺

♦️कर्णपाली (कानाची पाळी) व बाह्यकर्णमार्ग मिळून बाह्यकर्ण बनतो. बाह्यकर्णमार्गाच्या आतल्या टोकाला कर्णपटल असते.

♦️कर्णपाली उपास्थीची (मजबूत व लवचिक पेशीसमूहाची कूर्चेची) बनलेली असून तिच्यावर त्वचेचे आवरण असते. कर्णमार्गाचा बाहेरचा भाग उपास्थीचा व आतील अस्थीचा असतो.

♦️तयावर बहुस्तरीय पट्टकीय (एकावर एक थर असलेल्या घट्ट चपट्या) स्तरांचे आवरण अगदी ताणून बसलेले असते. यामुळे त्यावर बारीकसा फोड झाला तरी सुद्धा फार वेदना होतात.

♦️या अधिस्तरांत (चपट्या कोशिकांच्या दृढ स्तरांत) लोम (केस) व सूक्ष्म ग्रंथी असतात. त्या ग्रंथी चिकट लालसर स्त्राव निर्माण करतात. घट्ट झालेल्या स्त्रावास कानातील मळ म्हणतात.

♦️मार्गाची लांबी सु. २४ मिमी. असून तो नागमोडी असतो.

कर्णदर्शिकेतून (कानाच्या आतील भागाच्या तपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या नळीतून) बाह्यकर्णमार्गात पाहिल्यास मोतिया रंगाचे कर्णपटल दिसते.

♦️त हाडाच्या खोबणीमध्ये ताणून व तिरकस बसलेले असते. याचा वरील भाग कमी ताणलेला असतो. कर्णपटल कोलॅजन (एक प्रकारच्या प्रथिनाच्या) तंतूंचे बनलेले असून त्याच्या बाह्यांगावर पट्टकीय अधिस्तर व आतल्या अंगास श्लेष्मकलेचा (बुळबुळीत अस्तराचा) स्तर असतो. याचे क्षेत्रफळ ५५ चौ. मिमी. असते.

♦️ धवनिलहरीने हा कंप पावतो आणि आतील बाजूस पडद्याला टेकलेल्या अस्थिकांच्या (लहान हाडांच्या) साखळीत कंप निर्माण करतो.

♦️मध्य कर्णातील पुष्कळसे विकार या पटलाच्या तपासणीने समजतात.



🌺मध्यकर्ण🌺

💥कर्णपटलाच्या आतील बाजूस व अंतर्कर्णाच्या बाहेर शंखास्थीच्या (कवटीच्या बाजूच्या दोन्हींकडील कमानीसारख्या भागातील हाडाच्या) लहानशा पण पोकळ वेड्यावाकड्या भागास मध्यकर्ण म्हणतात.

💥मध्यकर्णाची रचना समजण्यासाठी प्रथम तो निर्माण का झाला हे पाहणे आवश्यक आहे. सरीसृप, पक्षी व सस्तन प्राण्यांत तो आढळतो, पण जलचर प्राण्यांत आढळत नाही.

💥अतर्कर्णात संवेदन ग्राहक द्रव माध्यमात असतात. ध्वनिलहरीने द्रव माध्यमात तरंग उत्पन्न झाल्यासच ते ग्राहक चेतवले जातात व ऐकू येते.

💥धवनिलहरी उत्पन्न करण्यास द्रवामध्ये हवेपेक्षा जास्त ऊर्जा खर्च करावी लागते कारण द्रवाची घनता हवेपेक्षा जास्त आहे

💥. जलचर प्राण्यात पाण्यातून असलेल्या तरंगाच्या उर्जेमुळे अंतर्कर्णातील द्रव सहज कंप पावू शकतो; पण भूचर प्राण्यांत ध्वनिलहरी हवेतून येतात व त्यांना द्रवात कंप निर्माण करावयाचा असतो. त्यामुळे ते तरंग अंतर्कर्णापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांच्यातील उर्जेचा साठी वाढविला पाहिजे.

💥 तो मध्यकर्णातील अस्थिकांमार्फत होतो म्हणून मध्यकर्णाची आवश्यकता आहे. त्यात बिघाड होताच कमी ऐकू येते.


🍀अतर्कर्ण🍀

🌸शखास्थीच्या घन विभागात अंतर्कर्ण असतो. त्याची रचना अत्यंत गुंतागुंतीची आहे. त्याचे प्रमुख दोन भाग आहेत



🌸(१) अस्थिमय सर्पिल कुहर व (२) कलामय (पातळ पटलाचे बनलेले) सर्पिल कुहर.

कलामय सर्पिल कुहराभोवती अस्थिमय सर्पिल कुहराचे आवरण असते. या दोन्ही कुहरांच्यामध्ये असणाऱ्या द्रवाला परिलसीका आणि कलामय कुहरात असलेल्या द्रवाला अंतर्लसीका म्हणतात.

🌸 अस्थिमय कुहराच्या आतील भागावर पर्यास्थी कलेचे (एक प्रकारच्या संयोजी ऊतकाचे म्हणजे समान रचना व कार्य असलेल्या पेशीसमुहाचे) आवरण असते. तेथून बारीक तंतू निघून ते कलामय कुहराला जखडून ठेवतात.

🌸अस्थिमय कुहराला असलेल्या चाळणी- सारख्या छिद्रांतून मेंदूपासून निघणाऱ्या आठव्या तंत्रिकेचे दोन भाग आत येतात.

🌸अस्थिमय सर्पिल कुहराचे तीन भाग आहेत. (१) श्रोतृ कुहर, (२) कर्णशंकू (किंवा कर्णशंबूक, अस्थिमय कुहरातील शंक्वाकार नाल) आणि (३) अर्धवर्तुलाकृती नलिका.


🌺गोणिका व लघुकोश🌺

🍃एका रेषेत होणारे गतिवर्धन व डोक्याची पुढे, मागे किंवा बाजूस झालेली हालचाल गोणिका व लघुकोश यांतील संवेदन ग्राहकांमार्फत समजते.

🍃यथील संवेदन ग्राहक श्रवण तंत्रिका शाखेच्या टोकाशी असतो. या ग्राहकाची मूळ रचना इतर अंतर्कर्ण ग्राहकासारखीच असते.

🍃 यथे जिलेटीनसदृश पदार्थात रेतीसारखे बारीक स्फटिकरूपी कण असतात.त्यांना



कर्णवालुका म्हणतात. त्यामुळेच या संवेदन ग्राहकांस कर्णवालुकाग्राहक असे नाव आहे. जसजशी प्राण्यांच्या डोक्याची स्थिती किंवा वेग बदलतो तसतशा कर्णवालुका गुरूत्वाकर्षणाने ओढल्या जातात, लोमावरील ताण कमीजास्त होतो व हा ताणातील फरक ज्ञात होतो आणि त्यावरून डोक्याची स्थिती समजते. यामुळे येथील संवेदन ग्राहकास गुरूत्वाकर्षण संवेदन ग्राहक म्हणतात.

कर्णशंकू (कर्णशंबूक) : हा भाग श्रावणाशी संबंधित आहे. हा पावणे तीन वेटोळ्यांचा असतो.

🍃अस्थिमय शंकूंच्या वेटोळ्यात कलामय शंकूची वेटोळी असतात. शंकूच्या मधल्या शंक्वाकार कण्यास मध्यनाभी म्हणतात. मध्यनाभीपासून निघणारे नाजूक सर्पिल पत्र (पातळशी पट्टी) सर्व वेटोळ्यांतून जाते.

🍃ह पत्र अर्धवट रूंदीचे असून ते शंकुभित्तीपर्यंत पोहोचत नाही. हे मधले अंतर आधारकलेने जाडलेले असते. आधार कला तळाच्या वेटोळ्यांत कमी रूंदीची असते व जसजशी ती शंकूच्या टोकाकडे येते तसतशी ती जास्त रूंद होते. अशा प्रकारे शंकूच्या वेटोळ्याचे दोन भाग पडतात. वरच्या भागाचे `राइसनर' कलेने (राइसनर नावाच्या शास्त्रज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्‍या कलेने) परत दोन भाग होतात. अशा प्रकारे वेटोळ्यात तीन भाग पडतात.

🍃 वरच्या भागास प्रकोष्ठ सोपान, मधल्यास मध्य सोपान व खालच्या भागास कर्णपटल सोपान म्हणतात. पहिला व तिसरा भाग शंकूच्या टोकात असलेल्या बारीक सर्पिल छिद्राने एकमेकांस मिळतात.

🍃याला संधी सोपान म्हणतात. या दोन सोपानांत परिलसीका असते, तर मध्य सोपानात अंर्तलसीका असते



💥💥डसिबेल 💥💥


dB) हे आवाजाची पातळी मोजण्याचे एक एकक आहे. ही पातळी ज्या ठिकाणी आवाज निर्माण होतो त्या ठिकाणी मोजली जाते.
तेथून जसजसे दूर जाऊ तसतशी डेसिबेलची मात्रा कमीकमी होत जाते. हे लॉगरिथमिक स्केल असल्याने dBचे माप १०ने वाढले तर आवाजाची तीव्रता शंभरपट होते.

शून्य dB म्हणजे ऐकू येणारा सर्वात हळू आवाज. त्याच्या दहापट मोठ्या आवाजाची मात्रा १० dB. २० dB आवाज म्हणजे सर्वात हळू आवाजाच्या १००पट मोठा आवाज; ३० dB म्हणजे हजारपट मोठा आवाज, वगै


🌺आवाजाच्या काही स्रोतांचे डेसिबेल मापन🌺

ऐकू येणारा सर्वात हळू आवाज (जवळजवळ पूर्ण शांतता) - शून्य dB

कुजबूज - १५ dB

सामान्य संभाषण - ३० dB

वाहनाचा किंवा यंत्राचा आवाज - ५० ते ६० dB

कारखान्याचा आवाज - ८० ते १०० dB

डॉल्बीचा

⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️

रक्त



👉लाल रक्त पेशी
(आरबीसी किंवा एरथ्रोसाइट्स),

👉पांढर्‍या रक्त पेशी
(ल्युकोसाइट्स) आणि

👉बिंबिका
(प्लेटलेट्स किंवा थ्रोम्बोसाइट्स)

▪️यांनी बनलेला व गुंतागुंतीची (जटिल) रचना असलेला जैविक द्रव पदार्थ आहे.

▪️रक्ताचा मुख्य घटक पाणी आहे.
▪️रक्त हा एकमेव द्रव उती आहे.

▪️रक्तामध्ये लाल रक्तपेशींचे प्रमाण सर्वाधिक असते. या पेशींमधील हिमोग्लोबिन या घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसते.

▪️हिमोग्लोबिनमुळे प्राणवायू आणि कार्बन डायॉक्साइड रक्तात विरघळू शकतात आणि त्यांचे वहन करणे सुलभ बनते.

▪️पांढर्‍या रक्त पेशींमुळे संसर्गाला प्रतिबंध होतो तर बिंबिकांमुळे रक्ताची गुठळी होण्यास मदत होते.

🟤 पष्ठ्वंशी प्राण्यांचे रक्त तांबड्या रंगाचे असते.

▪️ सधिपाद प्राणी आणि मृदुकाय प्राण्यांच्या रक्तामध्ये प्राणवायू वहनानासाठी हिमोग्लोबिनऐवजी हिमोसायनिन असते.


मानवी रक्ताचे घटक

मानवी शरीरामध्ये शरीराच्या आठ टक्के वजनाएवढे रक्त असते.

रक्ताची सरासरी घनता १०६० प्रतिकिलो/घन मीटर. ही घनता शुद्ध पाण्याच्या १००० किलो/ घन मीटरच्या जवळपास आहे.

एका प्रौढ व्यक्तीच्या शरीरात सुमारे पाच लिटर (१.३ गॅलन) रक्त असते.

रक्तामध्ये रक्तद्रव आणि रक्त पेशी असतात.

🛑 रक्तपेशीमध्ये

👉एरिथ्रोसाइटस- लाल रक्तपेशी;
👉लयूकोसाइट्स- पांढर्‍या रक्त पेशी , आणि
👉थरॉंबोसाइट्स- बिंबिका किंवा रक्तकणिका असतात.

▪️घनफळाच्या दृष्टीने रक्तामध्ये

👉४५% लाल रक्तपेशी आणि
👉५४.३% रक्तद्रव वा
👉०.७% पांढर्‍या रक्त पेशी असतात.

▪️रक्त सांद्रतेचे द्रायुगतिकीच्या दृष्टीने कमीतकमी जागेतून वाहती ठेवण्याच्या दृष्टीने अनुकूलन झाले आहे. सूक्ष्म केशवाहिन्यांमधून पेशी आणि रक्तद्रव सुलभपणे वाहतो.

▪️तांबड्या रक्तपेशीमधील हिमोग्लोबिन जर रक्तद्रव्यामध्ये असते,तर रक्ताच्या वाढलेल्या सांद्रतेमुळे हृदयाभिसरण संस्थेवर ताण पडला असता.


रक्तवाहिन्या 

बंद पद्धतीच्या अभिसरण संस्थेमध्ये तीन प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात.

१. धमन्या,
२. केशिका आणि
३. शिरा.


धमन्या

धमन्या (Arteries) शरीराच्या विविध अवयवांकडे रक्त वाहून नेतात. यांच्या भिंती जाड असतात. धमन्या शरीरात खोल भागात असतात. त्यांची भित्तिका स्थितिस्थापक असते. सर्व घमन्यांमधून प्राणवायुयुक्त रक्त वाहते. फुप्फुस धमनीत मात्र विनॉक्सिजनित रक्त असते. धमन्यांमधील रक्त दाबयुक्त असते. महाधमनी अनेक स्नायुमय लहान धमन्यांमध्ये विभागलेली असते. स्नायुमय धमनीपासून निघालेल्या लहान धमन्यांना धमनिका म्हणतात.

केशिका

(capillaries) या अत्यंत बारीक एकस्तरीय पातळ भिंती असलेल्या नलिका आहेत. धमनिका आणि शिरिका याना जाळ्याच्या स्वरूपात जोडण्याचे काम करतात. शरीरपेशींशी यांचा प्रत्यक्ष संबंध असतो. केशिकामुळे संप्र्रके, अवशिष्ट पदार्थ, अन्नधटक,कार्बन डाय ऑक्साइड अशा पदार्थांचे उतीबरोबर देवाणघेवाण करण्याचे कार्य होते.

शिरा

शिरांच्या (veins) भिंती पातळ असतात. त्या विविध अवयवाकडून हृदयाकडे रक्त वाहून नेतात. अनेक शिरिकांच्या जोडण्यामधून शिरा तयार होतात. शिरिका त्वचेलगत असून कमी स्नायुयुक्त आणि स्थितिस्थापक असतात. फुप्फुस शिरांव्यतिरिक्त सर्व शिरांमधून विनॉक्सिजनित रक्त वाहते. धमन्यांमध्ये रक्त पुढे ढकलण्यासाठी झडपा असतात. शिरांमधून रक्त हृदयाकडे नेण्यात स्नायूंचा मोठा वाटा आहे. स्नायूंच्या हालचालींमुळे शिरांमधील रक्त हृदयाकडे ढकलले जाते.


दमा म्हणजे नेमके काय


रुग्णाला दमवतो म्हणूनच या आजाराला दमा असे नाव पडले असावे ! अस्थमा, ब्राँकायटिस, व्हीझ, बाळदमा यांत धाप लागणे हे प्रमुख लक्षण असते. काही गंभीर हृदयाच्या आजारात व फुप्फुसाच्या आजारातही धाप लागणे हे लक्षण दिसून येते. पण दमा या आजारात इतर कोणतीही कारणे नसताना श्वासनलिकांचा आकार लहान होतो. श्वासनलिकांमध्ये असलेले गोलाकार स्नायू कोणतेही ज्ञात कारण नसताना आकुंचन पावल्याने ही क्रिया घडून येते. अर्थातच फुप्फुसांना होणारा शुद्ध हवेचा पुरवठा कमी पडू लागतो. श्वासाची क्रिया जलद गतीने करावी लागते. एरवी जी क्रिया घडत असल्याचे भान कोणत्याही प्राणिमात्राला ठेवावे लागत नाही, ते भान वा जाणीव होऊ लागते. यालाच दमा असे म्हणतात.


 दम्याचा परिणाम होऊन फुफ्फुसांची लवचिकता कमी होत जाते. लवचिकता कमी झाल्यावर प्राणवायू घेणे व दूषित कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर टाकणे या क्रियेमध्ये शिथिलता येते. शरीराला प्राणवायू हळूहळू कमी पडू लागतो. चयापचयाच्या क्रियेसाठी प्राणवायूची गरज सतत लागते. ती पूर्ण होईनाशी होते. हे टाळण्यासाठी दम्याच्या विकाराकडे गंभीरपणे लक्ष देणे आवश्यक आहे.


 दमा हा थोडाफार अनुवांशिक असू शकतो. शहरी वातावरणातील धूर, धूळ, विविध रासायनिक प्रदूषण यांमुळे दम्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. विशेषत: २० वर्षांच्या आतील मुलामुलींना दमा असणे हे २५ वर्षांपूर्वीपेक्षा चक्क दसपटींनी वाढले आहे. शहरातील प्रदूषणाचा हा दृश्य परिणाम भयानकच आहे.


 दम्याचे नेमके कारण काय, हे आजही कोणाला माहित नाही. काहीजणांच्या बाबतीत अॅलर्जी हे कारण आढळते. एखाद्या पदार्थाच्या, एखाद्या वासाच्या वा एखाद्या रसायनाच्या वासाने, स्पर्शाने, संपर्काने दमा उफाळून आल्याची उदाहरणे आहेत. पण सर्वांचाच दमा तसा नसतो. काहींना जास्त श्रमानंतर दमा सुरू होऊ शकतो, तर काहींना व्यायामाने बरे वाटून दमा कमीही होतो. या प्रकारच्या उलटसुलट निष्कर्षांमुळे दम्याचा इलाज कठीण होऊन बसला आहे. थोडेफार पथ्यपाणी ज्याचे त्याला कळत असेल तसे करणे, हाच याचा थोडासा प्रतिबंधक भाग होतो.


 दम्यामुळे साऱ्या आयुष्यावरती निराशा झाकोळून राहावी, अशी परिस्थिती गेल्या १५-२० वर्षांत राहिलेली नाही, एवढाच यातील महत्त्वाचा दिलासा आहे. त्यापूर्वी मात्र चांगली परिणामकारक औषधे उपलब्ध नव्हती. त्यामुळे दम्याचा त्रास सुरू झाला की, नेहमीचे उद्योग करणे अशक्य होऊन विश्रांती घेणे एवढाच एक उपाय राहत असे. हल्ली मात्र कमीत कमी दुष्परिणाम असणारी, सहजगत्या रुग्णालाच वापरता येतील अशा स्वरूपातील औषध उपलब्ध आहेत. इंजेक्शनद्वारे औषधांचा उपयोग करणे दम्याच्या बाबतीत आजकाल क्वचितच जरुरीचे भासते. अर्थातच डॉक्टरी सल्ल्यानुसार वापरता येणाऱ्या इनहेलर (Inhaler) मधून खोल श्वास घेऊन, थेट फुप्फुसांपर्यंत अगदी नेमका औषधांचा डोस जाऊन, श्वासनलिकांचे आकुंचन कमी करता येणे शक्य होते.


 दमा सुरू झाल्यावर खूप त्रास होऊ लागल्यावर इलाज करण्याऐवजी सुरू होताच इलाज केल्यास तो लवकर आटोक्यात येतो; हेही सिद्ध झाले आहे. ज्या आजारात आजार्‍याला रोगाची पूर्ण जाणीव व इलाजाचे स्वरूप माहित असणे अत्यावश्यक आहे, स्वतःच तातडीने इलाज सुरू करणे आवश्यक आहे, कोणावरही अवलंबून राहणे चुकीचे आहे, अशा मोजक्या आजारात दमा मोडतो. म्हणूनच दम्याचा विकार असल्यास प्राथमिक इलाजाचे स्वरूप नीट माहित करून घ्यावे.


ग्रंथी (Glands).

🎇 मानवी शरीरात जे रासायनिक नियंत्रण🧪 ठवण्याचे काम होते ते काम ग्रंथीच्या मार्फत होते


🎇 गरंथी या दोन प्रकारच्या असतात

1)अंतः स्रावी ग्रंथी (Endocrine Gland)

2)बाह्यस्रावी ग्रंथी (Exocrine Gland)


🎇अंतः स्रावी ग्रंथी 

या संप्रेरके(Harmon's)स्रावतत


🎇बाह्यस्रावी ग्रंथी

 या. विकारे(Enzymes)स्रावतत


🎇अतः स्रावी ग्रंथी यांना कोणतेही कोणतीही नलिका नसते ते आपला स्राव थेट रक्तात सोडतात(Ductless Gland)

🎇 बाह्यस्रावी ग्रंथी यांना मात्र नलिका असतात


🌸 ❗️अंतः स्रावी ग्रंथी❗️ 🌸

      

         🍀 खलीलप्रमाणे आहेत🍀


🎇 पीनल ग्रंथी (Pineal Gland)

    🎯आपल्या मेंदूतील ही सर्वात छोटी ग्रंथी आहे.

   🎯सप्ररकामुळे उशीरा पौगाड अवस्था येते


🎇 पियूषिका ग्रंथी (Pituitary Gland)

     🎯ही ग्रंथी मेंदूमध्ये असते 

     🎯गरंथी शरीरातील इतर ग्रंथीवर नियंत्रण ठेवते


🎇 अवटू ग्रंथी(Thyroid Gland)

   🎯 चयापचय क्रियेवर नियंत्रण ठेवते


🎇 स्वादुपिंड (Pancreas) 

    🎯ही ग्रंथी अंत:स्त्राधी व बाह्यस्त्रावी दोन्हीही कामे करते(अपवाद)

    🎯इन्सुलिनचे प्रमाणाचे नियंत्रण करते(H)

    🎯ट्रीपसिन, लायपेज आणि अमायलेज यांचे पचन करते(E)


🎇 अधिवृक्क ग्रंथी(Adrenal gland)

     🎯भीतीदायक वातावरण व भावनिक प्रसंगी काम करते (Emergency Hormone)

     🎯मीठ प्रमाण नियंत्रण करते


🎇  अंडाशय(Ovary)

    🎯सत्रियांमध्ये आढळून येते

    🎯प्रोजेस्टेरोन(गर्भधारणा मदत)

    🎯इस्ट्रोजन (गर्भाशयाचा विकास) करते


🎇 वृषण ग्रंथी(Testis)

   🎯टेस्टोस्टेरोन हार्मोन्स स्रावते पुरुषांच्या त आढळते पुरुषत्व विकास होतो

ऊती व ऊतींचे प्रकार

 (Tissue and types of tissue)

🌸 समान रचना असणाऱ्या व समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला ऊती असे म्हणतात.

🌸 सजीवांमध्ये निरनिराळ्या ऊती एकञ येऊन अवयव बनतात व हे अवयव एकञ येऊन अवयव संस्था बनते. उदा. पचनसंस्था, श्वसनसंस्था इ.

🌸 ऊतींचा अभ्यास करणाऱ्या शास्ञाला ऊतीशास्ञ असे म्हणतात.

🌺 पराणी ऊती (Animal Tissue)

🌸 पराणी ऊतींचे वर्गीकरण मुख्य दोन गटात म्हणजे सरल ऊती व जटील ऊती यात केले जाते.

🌸 सरल ऊतीमध्ये केवळ अभिस्तर ऊतींचा समावेश होतो तर जटील ऊतींध्ये संयोजी ऊती, स्नायू ऊती व चेता ऊती यांचा समावेश होतो.



१) अभिस्तर ऊती (Epithelial Tissue)

🌸 अभिस्तर ऊतीमध्ये पेशी एकमेकींचा अतिशय चिटकून व जवळजवळ असतात.
या ऊती तंतूमय पटलाने खालच्या ऊतीपासून वेगळ्या झालेल्या असतात.

त्वचा, तोंडातील स्तर, रक्तवाहिन्यांचे स्तर हे अभिस्थर उतीपासून बनलेले असतात.

🌺 अभिस्तर ऊतींचे प्रकार-

🌸 सरल पट्टकी अभिस्तर (Simple Squamous epithelium)-

या ऊती आकाराने अतिशय बारीक व चपट्या असतात. तसेच या नाजूक अस्तर तयार करतात.

🌸 सतरीत पट्टकी अभिस्तर (Stratified Squamous epithelium)-

 नावाप्रमाणेच या ऊतींच्या रचनेमध्ये एकावर एक असे थर असतात. हे त्वचेच्या बाह्यस्तरात आढळून येतात. या ऊती अवयवांचे संरक्षण करण्याचे व त्यांची झीज थांबवण्याचे मुख्य कार्य करतात.

🌸 सतंभीय अभिस्तर (Columnar epithelium)-

नावाप्रमाणेच या ऊतींची रचना स्तंभाप्रमाणे असते. आकाराने लांबट असून त्या आतड्याच्या आतील स्तरात असतात. पचन झालेल्या अन्नातील पोषणद्रव्यांचे शोषण करणे व पाचकरस स्ञवणे हे स्तंभीय अभिस्तर ऊतींचे मुख्य कार्य आहे.

🌸 रोमक स्तंभीय अभिस्तर (Ciliated columnar epithelium)-

ज्या संभीय अभिस्तर ऊतींना केसासारखे रोमके असतात, त्यांना रोमक स्तंभीय अभिस्तर ऊती म्हणतात. या ऊती आतड्याच्या आतील स्तरात असतात. या ऊती प्रामुख्याने श्वसनमार्गात आढळतात.

🌸 घनाभरूप अभिस्तर (Cuboidal epithelium)-

नावाप्रमाणेच या ऊती घनाकृती असतात. या ऊती वृक्कनलिकांच्या आतील स्तर, लाळग्रंथीच्या नलिका या ठिकाणी आढळतात. लाळ स्ञवण्यासाठी यांचा उपयोग होतो.

🌸 गरंथिल अभिस्तर (Glandular epithelium)-

क्वचित वेळी अभिस्तर ऊतीच्या आतील बाजूस घड्या पडतातत व त्यामुळे बहुपेशीय ग्रंथी तयार होतात, त्यांना ग्रंथिल अभिस्तर ऊती म्हणतात.



२) संयोजी ऊती (Connective Tissue)

🌸 सयोजी ऊती हा मानवी शरीरातील सर्वात प्रचलित आणि व्यापकपणे वितरित ऊती प्रकार आहे.

🌸 शरीरातील विविध अवयव आणि ऊतींना एकमेकींना जोडण्याचे व शरीरातील अवयवांना आधार देण्याचे काम संयोजी उती करतात.
संयोजी ऊती या जेलीसदृश्य द्रवरूपात स्वतःच्या पेशींना सामावून घेतात.

🌸सयोजी ऊतींचे महत्वाचे प्रकार पुढीलप्रमाणे-

🌺 अस्थी (Bone) –

 या अतिशय मजबूत असतात व शरीरातील मुख्य अवयवांना आधार देण्याचे कार्य करतात. अस्थिंमार्फत शरीराची आधारचौकट बनवली जाते. अस्थिपेशी या कॅल्शियम आणि फाॅस्फरसच्या संयुगापासून बनलेल्या जेलीसदृश्य द्रवात घट्ट रूतलेल्या असतात.

🌺 रक्त (Blood) –

रक्त हे द्रवरूप संयोजी ऊती असून हे ज्या द्रवात सामवलेले असते त्याला रक्तद्रव असे म्हणतात. हे रक्तद्रव प्रथिने, क्षार, संप्ररके, लोहित रक्तकणिका, श्वेतरक्तकणिका व रक्तपट्टीका यांनी बनलेले असते. शरीराच्या विविध भागांकडे रक्तातील वायू, अन्नातील पोषणद्रव्ये व संप्रेरके यांचे वहन करण्याचे कार्य रक्त करते.

🌺 अस्थिबंध (Ligament) –

अतिशय लवचिक व त्याबरोबच मजबूत असणारे हे अस्थिबंध सजीवातील दोन हाडांना एकमेकांशी जोडण्याचे कार्य करतात. आकृतीबंध स्थिर राहण्यास मदत करण्याचे कार्यही अस्थिबंध करतात.

🌺 सनायूरज्जू (Tendons) – स्नायूरज्जू तंतूमय व कमी लवचिक असूनही खूप मजबूत असतात. यांच्याद्वारे स्नायू हाडांशी जोडले जातात व अस्थि किंवा आकृतीबंधाची हालचाल होऊ शकते.

🌺 कास्थी (Cartilage) –

शरीरभर विस्तृत भागात विखुरलेल्या असून कास्थीमुळे हाडांच्या सांध्यांच्या ठिकाणी नरमपणा येतो. या पेशी नाक, कान, श्वसननलिका व स्वरयंञातील पोकळीत असतात.

🌺 विरल ऊती (Areolar) – आंतर इंद्रियांना आधार देणे, ऊतींची झीज भरून काढणे व अवयवांच्या आतील भाग भरणे हे यांचे मुख्य कार्य असते. चेतातंतू, अस्थिमज्जा, रक्तवाहिन्यांच्या सभोवताली आणि ऊती त्वचा व स्नायू यांच्या दरम्यान विरल ऊती वास्तव्य करतात.

🌺 चरबीयुक्त युती (Adipose) – या युती त्वचेखाली, वृक्काच्या सभोवताली आढळतात. यांच्या पेशी मेदपिंडाने (fat globules) युक्त असतात. तसेच या ऊती उष्णतारोधक म्हणून कार्य करतात.

३) स्नायूऊती (Mascular Tissue)

🌸 सनायू उती या स्नायूतंतूच्या लांब पेशीपासून बनलेल्या असतात. स्नायुंमध्ये विशिष्ट प्रकारचे प्रथिन असते. त्यास ‘संकोची प्रथिन’ असे म्हणतात. या प्रथिनांच्या आकुंचन व प्रसारणामुळे स्नायूंची

यकृत कार्य

👉यकृत रक्तातील बहुतेक रासायनिक पातळीचे नियमन करते आणि पित्त नावाच्या उत्पादनास उत्सर्जित करते. हे यकृत पासून कचरा उत्पादने वाहून नेण्यास मदत करते. 


👉पोट आणि आतडे सोडणारे सर्व रक्त यकृतामधून जाते. यकृत या रक्तावर प्रक्रिया करते आणि तोडतो, संतुलित होतो, आणि पोषकद्रव्ये तयार करतो आणि औषधे शरीरात उर्वरित वापरण्यास सोपी किंवा नॉनटॉक्सिक अशा फॉर्ममध्ये चयापचय करते. 


👉यकृत सह 500 हून अधिक महत्त्वपूर्ण कार्ये ओळखली गेली आहेत. काही अधिक सुप्रसिद्ध कार्ये खालीलप्रमाणे:


👉पित्त उत्पादन, पचन दरम्यान कचरा दूर आणि लहान आतडे चरबी तोडण्यास मदत करते


👉रक्ताच्या प्लाझ्मासाठी काही प्रथिने तयार करणे


👉शरीरात चरबी वाहून नेण्यासाठी कोलेस्टेरॉल आणि विशेष प्रथिने तयार करणे


👉सटोरेजसाठी जास्त प्रमाणात ग्लूकोजचे रूपांतर ग्लायकोजेनमध्ये करणे (ग्लायकोजेन नंतर उर्जेसाठी ग्लूकोजमध्ये परत रूपांतरित केले जाऊ शकते) आणि संतुलन आणि आवश्यकतेनुसार ग्लूकोज बनवणे. 


👉अमीनो idsसिडच्या रक्ताच्या पातळीचे नियमन, जे प्रथिने बनवण्याचे ब्लॉक बनवते


👉हिमोग्लोबिनची लोह सामग्री वापरण्यासाठी प्रक्रिया (यकृत लोह साठवते)


👉विषारी अमोनियाचे युरियामध्ये रूपांतरण (युरिया हे प्रथिने चयापचयातील एक शेवटचे उत्पादन आहे आणि मूत्रात उत्सर्जित होते)


👉औषधे आणि इतर विषारी पदार्थांचे रक्त साफ करणे


👉रक्त गोठण्यास नियमित करणे


👉रोगप्रतिकारक घटक बनवून आणि रक्तप्रवाहापासून बॅक्टेरिया काढून संक्रमणांना प्रतिकार करते


👉लाल रक्तपेशींपासून देखील बिलीरुबिनचे क्लीयरन्स. जर बिलीरुबिनचे संचय होत असेल तर त्वचा आणि डोळे पिवळे होतात. 


👉जव्हा यकृत हानिकारक पदार्थांचा नाश करतो तेव्हा त्याची उप-उत्पादने पित्त किंवा रक्तात मिसळतात.


👉 पित्त-उप-उत्पादने आतड्यात प्रवेश करतात आणि मलच्या स्वरूपात शरीर सोडतात. मूत्रपिंडांद्वारे रक्ताद्वारे-उत्पादनांना फिल्टर केले जाते आणि शरीर मूत्र स्वरूपात सोडते.

रक्तगट




🌺रक्तगटाचा शोध लँड्स्टेनर यानी लावला या शोधांबद्दल त्याना नोबेल पुरस्कार मिळाला.

🌺मानवी रक्तामध्ये असलेल्या तांबड्या रक्तपेशीवरील असलेले विशिष्ट प्रथिनांमुळे रक्तगट ठरतो. या प्रथिनांना प्रतिपिंडे असेही म्हणतात.

🌺 महत्त्वाचे रक्तगट दोंन आहेत. प्रथिन प्रकार ए, आणि प्रथिन प्रकार बी. यालाच ए रक्तगट आणि बी रक्तगट असे म्हणतात.

🌺 तांबड्या पेशीवर कोणत्याही प्रकारचे प्रथिने नाहीत म्हणजे रक्तगट ओ. आणि ए, व बी या दोन्ही प्रकार्ची प्रथिने असल्यास एबी रक्तगट.

🌺रक्त हे पेशी आणि रक्तरस म्हणजे प्लाझमा या द्रवांनी बनलेले असते. रक्तपेशी ए गटातील असल्या म्हणजे रक्तरसामध्ये बी प्रकारच्या प्रथिनांविरुद्ध प्रतिद्रव्य असते.

🌺तसेच बी रक्तगट असल्यास ए प्रकारच्या पेशी विरुद्ध प्रतिद्रव्य रक्तरसामध्ये असते. ए बी रक्तगट असल्यास रक्तरसामध्ये प्रतिद्रव्य नाही.

🌺 पण ओ गटाचे रक्त असल्यास रक्तरसामध्ये दोन्ही ए आणि बी पेशी विरुद्ध प्रतिद्रव्य असते.

रक्ताचे चार प्रमुख गट आहेत.


🍀परकार🍀

🌻रक्तगट

♦️'ए', 'एबी', 'बी', आणि 'ओ' असे चार प्रमुख गट असून 'आरएच' (र्‍हिसस) पॉझिटिव्ह व 'आरएच' निगेटिव्ह असे या प्रत्येक गटाचे दोन प्रकार मिळून आठ रक्‍तगट होतात.

♦️रक्तगट ही रक्ताच्या वर्गीकरणाची पद्धत आहे. तांबड्या रक्तपेशींच्या पटलावरील प्रतिजनांशी (अँटिजेन) रक्तगटाचा संबंध आहे.

♦️ह प्रतिजन आनुवंशिक असतात. ही प्रतिजने, प्रथिने, कर्बोदके, ग्लायकोप्रथिने, किंवा ग्लायकोलिपिड (मेदाम्ले) याने बनलेली असतात.

♦️ रक्तगटाच्या पद्धतीप्रमाणे प्रतिजन कोणत्या रेणूनी बनलेले असतात हे ठरते. यामधील काहीं प्रतिजन इतर उतींच्या पेशी पृष्ठभागावर असतात. तांबड्या रक्त पेशीवरील पृष्ठभागावरील प्रतिजन युग्मविकल्पी (अलील) जनुकामुळे व्यक्त झालेले असतात.

♦️ तयाना एकत्रपणे रक्तगट असे म्हणण्याची पद्धत आहे. रक्तगट आनुवंशिकता माता आणि पित्याच्या रक्तगटाच्या संक्रमणामुळे पुढील पिढीमध्ये येतात.

♦️एकूण तीसहून अधिक रक्तगट ज्ञात आहेत. आंतराष्ट्रीय रक्त संचरण समितीने याना मान्यता दिली आहे. ( इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रांसफ्यूजन).


🍂🍂रक्तगट वेगवेगळे असण्याची कारणे🍂🍂



♦️रक्तगट वेगवेगळे असण्याचे कारणे

रक्‍तात लाल रक्त पेशीवर एक प्रकारचे प्रोटीन (अ‍ॅन्टिजेन) ही असतात. या अ‍ॅन्टिजेनांच्या भिन्‍नतेमुळे वेगवेगळ्या माणसांचे रक्‍त वेगवेगळे असते. या वेगवेगळ्या रक्‍तांनाच रक्‍तगट वा ब्लडग्रुप म्हणतात. ए. (प्रोटीन) असलेला ‘ए’ रक्‍तगट, बी असलेला ‘बी’ रक्‍तगट, दोन्ही असलेले ‘एबी’ रक्‍तगट यापैकी एकही प्रोटीन नसलेला ‘ओ’ रक्‍तगट.

रक्‍तातील आरएच (र्‍हिसस) हे सुद्धा एक प्रथिनेच असतात. ज्यांच्या रक्‍तात ते असते त्यांना आरएच पॉझिटिव्ह व नसणार्‍याला आरएच निगेटिव्ह म्हणतात.

रक्‍तगट आनुवंशिक असतात व ते आपल्या शरीरात माता व पित्याकडून येणाऱ्या गुणसूत्रांवर अवलंबून असतात. माता व पिता यांच्या रक्तगटाप्रमाणे त्यांच्या अपत्यांचे रक्तगट असतात किंवा दोघांच्या रक्तगटाच्या एकत्रपणावर अवलंबून असतात. त्यामुळे भावा-बहिणींचे रक्‍तगट एकच असेल असे नाही.


🌺🌺समजा माता ‘ए’ आरएच पॉझिटिव्ह व पिता ‘बी’ आरएच पॉझिटिव्ह असेल तर अपत्यांचे रक्तगट खालील प्रकारे असू शकतात.🌺🌺

ए आरएच पॉझिटिव्ह

एबी आरएच पॉझिटिव्ह

एबी आरएच निगेटिव्ह

ए निगेटिव्ह

बी निगेटिव्ह

बी पॉझिटिव्ह

ओ पॉझिटिव्ह

ओ निगेटिव्ह


🌺🌺समजा माता ‘एबी’ आरएच पॉझिटिव्ह व पिता ‘ए’ आरएच पॉझिटिव्ह असेल तर अपत्यांचे रक्तगट खालील प्रकारे असू शकतात.🌺🌺

ए आरएच पॉझिटिव्ह

एबी आरएच पॉझिटिव्ह

एबी आरएच निगेटिव्ह

ए निगेटिव्ह

बी निगेटिव्ह

बी पॉझिटिव्ह


🌺समजा माता ‘ओ’ आरएच पॉझिटिव्ह व पिता ‘ओ’ आरएच पॉझिटिव्ह असेल तर अपत्यांचे रक्तगट खालील प्रकारे असू शकतात.🌺

ओ पॉझिटिव्ह

ओ निगेटिव्ह

बाँबे रक्तगट


🌸🌸रक्त जुळवणी🌸🌸

रक्तगट अनुरूपता व्यक्तीचा रक्तगटकोणत्या गटाचे रक्त चालतेओ−ओ+ए−ए+बी−बी+एबी−एबी+ओ

रक्त अनुकूलनासाठी रक्तगटाव्यतीरिक्त इतरही अनेक बाबी महत्त्वाच्या असतात. या बाबतीत वैद्यकीय सल्ला अपरिहार्य आहे.

रक्तगट प्रणाली तांबड्या रक्तपेशींच्या पटलावर तीस प्रतिजन असतात.

व्यक्तीचा रक्तगट तीस प्रतिजनापैकी एक संयोग असतो. तीस रक्तगटामध्ये सहाशेच्या वर विविध प्रतिजन संशोधकानी शोधलेले आहेत.

यापैकी काहीं अगदीच दुर्मीळ आहेत. काहीं वंशामधील व्यक्तीमध्येच ते आढळतात. बहुघा व्यक्तीचा रक्तगट जन्मत: प्रतिजन ठरविणार्‍या जनुकामुळे ठरतो. तो सहसा बदलत नाही

. क्वचित संसर्ग, कर्करोग आणि स्वप्रतिकारयंत्रणेतील विकारामुळे (ऑटोइम्यून डिसीज) व्यक्तीचा रक्तगट बदलतो.

अस्थिमज्जा रोपण हे रक्तगट बदलाचे एक कारण आहे. ल्यूकेमिया आणि लिंफोमा विकारात अस्थिमज्जा रोपण करावे लागते.

व्यक्तीच्या एबीओ पैकी दुसऱ्या गटाच्या व्यक्तीच्या अस्थिमज्जेचे रोपण झाल्यास रुग्णाचा रक्तगट अस्थिमज्जा दात्याच्या रक्तगटाप्रमाणे बदलतो.

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

अन्नपचन प्रक्रिया


🌾सजीवाने अन्न ग्रहन केल्यापासून ते उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकण्याच्या अवस्थेपर्यंत अन्नावर घडणार्‍या संपूर्ण प्रक्रियेला अन्नाची पचन क्रिया असे म्हणतात.


🌾अन्न पचण्याची प्रक्रिया चालू असतांना त्या अन्नात या अवयवांकडून अनेक स्त्राव सोडले जातात.


🌾या स्त्रावामध्ये विकरे, आम्ल, उत्प्रेरक, यांचा समावेश होते.


🌾या स्त्रावामुळे अन्नातील जटिल घटकांचे सुलभ घटकात रूपांतर होते. ज्यामुळे अन्न पचण्यास सुलभ जाते.


🌾खाल्लेले अन्न पचविण्याच्या क्रियेत खालील अवयवांचा महत्वाचा सहभाग असतो. अन्नपचनाची प्रक्रिया खालीलप्रकारे पाडली जाते.



🌿1. अंग पदार्थ – मुख व गुहा


स्त्राव – लाळ  


विकर – टायलिन


माध्यम – अल्पांशाने


मूळ अन्न पदार्थ – पिष्टमय पदार्थ  


क्रिया आणि अंतिम – शर्करा (माल्टोज)


🌿2. अंग पदार्थ – जठर


स्त्राव – हायड्रोक्लोरिक


माध्यम – आम्ल, अॅसिड  


मूळ अन्न पदार्थ – प्रथिने  


क्रिया आणि अंतिम – जंतुनाशक


🌿3. अंग पदार्थ – जठररस  


स्त्राव – पेप्सीन,रेनीन


माध्यम – आम्ल


मूळ अन्न पदार्थ – प्रथिने, दूध


क्रिया आणि अंतिम – सरल प्रथिने (पेप्टोन), व्हे मध्ये रूपांतर



🌿4. अंग पदार्थ – लहान आतडे


स्त्राव – पित्तरस


माध्यम – अल्कली


मूळ अन्न पदार्थ – प्रथिने व मेद


क्रिया आणि अंतिम – मेदाचे विघटन व अन्न जंतूनाशक करणे.



🌿5. अंग पदार्थ – स्वादुपिंडरस  


विकर – ट्रिप्सीन, अमायलेझ, लायपेझ


माध्यम – अल्कली, अल्कली


मूळ अन्न पदार्थ – प्रथिने(पेप्टोन), पिष्टमय पदार्थ, मेद


क्रिया आणि अंतिम – अमिनोआम्ल, शर्करा व ग्लुकोज, मेदाम्ल व ग्लिसरॉल



🌿6. अंग पदार्थ – आंत्ररस


विकर – इरेप्सीन, इनव्हरटेझ, लायपेझ


माध्यम – अल्कली


मूळ अन्न पदार्थ – प्रथिने, शर्करा, मेद  


क्रिया आणि अंतिम – अमिनोआम्ल, ग्लुकोज, फ्रूटोज व माल्तैझ, मेदाम्ल व ग्लिसरॉल.

गोवर



गोवर हा विषाणुजन्य आजार आहे. या आजारात एक्झॅन्थम या नावाने ओळखले जाणारे पुरळ त्वचेवर येतात. गोवर हा रुबेला, पाच दिवसाचा गोवर किंवा हार्ड मीझल्स या नावानेसुद्धा ओळखला जातो.

वर्णन : गोवर हा जगभर आढळणारा आजार आहे. सध्याच्या गोवर लसीकरणाच्या प्रथेआधी दर दोन किंवा तीन वर्षानी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात गोवराची साथ येत असे. एक वर्षाआड येणारी लहान गोवराची साथ ही सामान्य बाब होती. तान्ह्या मुलापासून ते आठ महिन्यापर्यंतच्या मुलामध्ये गोवराविरुद्ध नैसर्गिक प्रतिकार शक्ती असते. ही प्रतिकारशक्ती मातेच्या गर्भाशयातील पेशींमधून मुलास मिळालेली असते.


माणसाला कोणत्याही वयात एकदा गोवर होऊन गेला की त्याला तो पुढच्या आयुष्यात परत होत नाही.


◾️कारण आणि लक्षणे


गोवराचे कारण पॅरामिक्झोव्हायरस नावचा विषाणू. अति संसर्गजन्य प्रकारातील हा विषाणू आहे. ज्यास गोवर झाला आहे त्याचा खोकला, शिंका यातून विषाणू पसरतो. ८५% गोवर या प्रकारे पसरतो. एकदा गोवराच्या विषाणूचा संसर्ग झाला की आठ ते पंधरा दिवसात विषाणूचा संसर्ग झालेल्या ९५% व्यक्तींना गोवर होतो. गोवराची लक्षणे दिसण्यापूर्वी तीन ते पाच दिवस गोवर विषाणूचा संसर्ग झालेला असतो. नंतरच्या चार दिवसात गोवराचे पुरळ अंगावर येण्यास प्रारंभ होतो.


गोवराचे पहिले लक्षण म्हणजे ताप, नाक वाहणे , डोळे तांबडे होऊन डोळ्यातून पाणी येणे आणि खोकला. काहीं दिवसात तोंडामध्ये गालाच्या आतील बाजूस पुरळ उठतात. ते वाळूच्या आकाराचे पांढरे पुरळ तांबूस उंचवट्यावर असतात. या पुरळांस कॉप्लिक पुरळ असे म्हणतात. हे गोवराचे नेमके लक्षण आहे. घसा सुजतो, तांबडा होतो आणि खवखवतो.


◾️उपचार


गोवरावर नेमके उपचार नाहीत. उपचार रुग्णास आराम वाटावा यासाठी केले जातात. इतर जीवाणू संसर्ग झाल्यास प्रतिजैविके देण्यात येतात. ताप उतरण्यासाठी असिटॅमिनोफेन देण्यात येते. गोवर झालेल्या लहान मुलाना कधीही अ‍ॅस्पिरिन देऊ नये


◾️परतिबंध


गोवराचा प्रतिबंध लसीने उत्तम प्रकारे करता येतो. गोवराची लस गोवराच्या विषाणूपासून बनवलेली आहे. गोवराच्या विषाणूवरील सर्व प्रथिने शिल्लक असल्याने लस दिल्यानंतर शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होते. भविष्यकाळात गोवराच्या विषाणूबरोबर संपर्क आल्यास शरीर विषाणूचा त्वरित प्रतिकार करते.. वयाच्या १५ महिन्यापूर्वी बालकाची प्रतिकारशक्ती पुरेशी निर्माण न झाल्याने गोवराची लस १५ महिन्यानंतर देण्यात येते. या वयात लस टोचल्यास तयार होणारी प्रतिकार शक्ती दीर्घकाळ टिकते.


गर्भवती महिलाना गोवराची लस देऊ नये. याचे कारण गर्भारपणात गोवराची लस दिल्यास जन्मलेल्या बळास गोवर होण्याची शक्यता असते.

---–-------–------------------------–-------------

सूक्ष्म पोषक


सूक्ष्म पोषक घटक चयापचय समर्थन करतात.

🍀 खनिजे सामान्यत: ट्रेस घटक, ग्लायकोकॉलेट किंवा तांबे आणि लोहासारखे आयन असतात. यापैकी काही खनिजे मानवी चयापचयसाठी आवश्यक आहेत.

🍀जीवनसत्त्वे शरीरासाठी आवश्यक सेंद्रिय संयुगे आहेत. ते सहसा शरीरातील विविध प्रथिने कॉएन्झाइम्स किंवा कोफेक्टर्स म्हणून कार्य करतात.

🍁आवश्यक पोषक🍁

एक आवश्यक पोषक एक सामान्य शारीरिक क्रिया करण्यासाठी आवश्यक असे पोषक असते जे शरीरात एकत्रित केले जाऊ शकत नाही - एकतर किंवा पुरेसे प्रमाणात - आणि म्हणूनच ते आहारातील स्त्रोताकडून प्राप्त केले जाणे आवश्यक आहे .

🌷आमच्या पाणी जे सर्वत्र देखभाल आवश्यक आहे, homeostasis सस्तन प्राणी मध्ये, आवश्यक पोषक विविध सेल्युलर साठी हक्क आहेत चयापचय प्रक्रिया आणि मेदयुक्त राखण्यासाठी आणि अवयव कार्य.

🌿मानवाच्या बाबतीत, तेथे नऊ अमीनो idsसिडस् , दोन फॅटी ,सिडस् , तेरा जीवनसत्त्वे आणि पंधरा आहेतखनिजे ज्यांना आवश्यक पोषक मानले जातात.

🌷या व्यतिरिक्त, अशी अनेक रेणू आहेत जी सशर्त आवश्यक पोषक मानली जातात कारण ते विशिष्ट विकासात्मक आणि पॅथॉलॉजिकल अवस्थेमध्ये अपरिहार्य असतात.

मॅक्रोन्यूट्रिएंट्स




मॅक्रोन्यूट्रिएंट्सची अनेक प्रकारे व्याख्या केली जाते.

🌿रासायनिक घटक मानव सर्वात मोठी प्रमाणात नाश आहेत कार्बन , हायड्रोजन , नायट्रोजन , ऑक्सिजन , फॉस्फरस , आणि गंधक , सारांश CHNOPS .

🌿मानव बहुतेक प्रमाणात वापरतात आणि मोठ्या प्रमाणात ऊर्जा प्रदान करतात अशा रासायनिक संयुगे कार्बोहायड्रेट , प्रथिने आणि चरबी म्हणून वर्गीकृत केल्या जातात . मोठ्या प्रमाणात पाण्याचेही सेवन केले पाहिजे.

🌿फॉस्फरस आणि सल्फरसह कॅल्शियम , सोडियम , पोटॅशियम , मॅग्नेशियम आणि क्लोराईड आयन मॅक्रोन्युट्रिएंट्ससह सूचीबद्ध केले जातात कारण सूक्ष्म पोषक घटकांच्या तुलनेत ते मोठ्या प्रमाणात आवश्यक असतात

🌿, म्हणजेच जीवनसत्त्वे आणि इतर खनिजे, नंतरचे ट्रेस किंवा अल्ट्राट्रेस खनिजे म्हणून वर्णन केले जातात


🌷मक्रोन्यूट्रिएंट ऊर्जा प्रदान करतात:🌷

🌾कार्बोहायड्रेट साखरच्या प्रकाराने बनविलेले संयुगे आहेत .

🌷 कार्बोहायड्रेट्स त्यांच्या साखर युनिट्सच्या संख्येनुसार वर्गीकृत केले जातात: मोनोसाकेराइड्स (जसे की ग्लूकोज आणि फ्रुक्टोज ), डिस्केराइड्स (जसे सुक्रोज आणि लैक्टोज ), ऑलिगोसाकराइड्स आणि पॉलिसेकेराइड्स (जसे की स्टार्च , ग्लाइकोजेन आणि सेल्युलोज ).

🌿परोटीन हे सेंद्रिय संयुगे असतात ज्यात पेप्टाइड बॉन्ड्ससह सामील अमीनो ac सिड असतात .

🌿शरीर काही अमीनो idsसिड तयार करू शकत नाही ( आवश्यक अमीनो idsसिडस् म्हणतात ), आहाराने त्यांना पुरविणे आवश्यक आहे.

🌷 पचन माध्यमातून प्रथिने आहेत उद्ध्वस्त करून proteases परत मुक्त amino ऍसिडस् मध्ये.

🌿चरबीमध्ये ग्लिसरीन रेणूचा समावेश असतो ज्यामध्ये तीन फॅटी idsसिड जोडलेले असतात.

🌷फटी acidसिड रेणूंमध्ये एकल कोंड (एक संतृप्त फॅटी idsसिडस् ) किंवा दुहेरी आणि एकल बंध ( असंतृप्त फॅटी idsसिडस्) द्वारे जोडलेल्या अनब्रँक्ड हायड्रोकार्बन साखळ्यांसह जोडलेले- कोओएच समूह असते .

अभ्यास ते अधिकारी

 🔴 १९३५ च्या कायद्याने-------% जनतेला मतदानाचा अधिकार मिळाला. 

१) ५ 

२) १०✅

३) १५

४) २०

___________________________________

🟠 सांप्रदायिक निवडणुकीचे जनक असे कोणाला संबोधतात?

१) लॉर्ड कर्झन  

२) लॉर्ड मिन्टो✅

३) मोंटेग्यु 

४)  चेम्सफर्ड

___________________________________

🟡 ---------- च्या चार्टर कायद्यानुसार नागरी सेवकांसाठी खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येवू लागले 

१) १८५८

२)  १८११

३) १८६१

४) १८३३ ✅

_______________________________

🟢 १८३३ च्या चार्टर कायद्यानुसार बंगालच्या  गव्हर्नर  जनरल ला भारताचा  गव्हर्नर  जनरल असे संबोधण्यात आले भारताचे प्रथम गव्हर्नर  जनरल ----------------- हे होते 

१) विल्यम बेंटिक ✅

२) वॉरन हेस्टीग्ज

३) रोबर्ट क्लाइव्ह

४) लॉर्ड कोर्नवालीस

___________________________________

🔵 १७७३  च्या रेग्युलेटिंग  कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नर ला गव्हर्नर  जनरल असे संबोधण्यात येवू लागले पहिले गव्हर्नर जनरल ------------- हे होते

१) विल्यम बेंन्टीक 

२) वॉरन हेस्टीग्ज ✅

३) रोबर्ट क्लाइव्ह

४ लॉर्ड कोर्नवालीस

___________________________________

🟣 भारतात देशी वृत्तपत्रांना खरा प्रारंभ कधी आणि कोणाच्या काळात झाला?

१) मार्क्विस ऑफ हेस्टीग्ज ✔️✔️

२) लॉर्ड वेलस्ली

३) लॉर्ड मिंटो

४) लॉर्ड विल्यम बेंटिक

___________________________________

⚫️ भारतात पोलीस खात्याची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?

१) वॉरन हेस्टींग्ज

२) विल्यम कॅरी

३) लॉर्ड विल्यम बेंटिक

४) चार्ल्स बॅबेज

५) लॉर्ड कॉर्नवालीस ✅

___________________________________

⚪️ ब्रिटीश नागरी सेवेची सुरवात

कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?

१) रोबर्ट हुक 

२) जॉन स्नोव

३) लॉर्ड कॉंर्नवालीस ✅

४) रॉबर्ट कोच

___________________________________

🟤 भारतीय सनदी सेवांचा जनक कोणत्या गव्हर्नर जनरलला म्हणतात?

१)फ्रँकेल 

२)लॉर्ड कर्झन

३) रिकेट्स

४) लॉर्ड कॉंर्नवालीस ✅

_______________________________

🔴 भारतीय नागरिकांना उच्च पदे आणि इंग्रजी शिक्षण कोणत्या गव्हर्नर जनरलने दिले?

१) एम.डब्लू.beijerinck1

२) लॉर्ड विल्यम बेंटीक ✅

३) जे.एच. वॉलकर

४)लॉर्ड मिंटो


🔴 सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला ...असे म्हणतात.


१) मोद्रिक धोरण.

२)राजकोषीय धोरण ✔️✔️

३)द्रव्य निर्मिती 

४) चलनविषयक धोरण

_____________________________________


🟠 स्टेनलेस स्टील हे कशाचे समिश्र आहे. 

१) लोखंड व कार्बन

२) लोखंड क्रोमियम व निकेल ✔️✔️

३) लोखंड क्रोमियम व कोबाल्ट

४) लोखंड टीन व कार्बन

_____________________________________


🟡 गुरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेच्या सर्वोच्च शिखर आहे.

 

१)छोटा नागपूर

२)अरवली ✔️✔️

३) मालवा

४) विध्य

_____________________________________


🟢  खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो.

१) कांगारू 

२) पेग्विन

३) व्हेल

४) प्लॅटिपस ✔️✔️

_____________________________________


🔵 पंचायतराज स्वीकारणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे 

१)दुसरे

२)पाचवे

३)सातवे

४)नववे ✔️✔️

_____________________________________

🟣  रक्तगटाचा शोध कोणी लावला

 

१) लॅडस्टयनर ✔️✔️

२)फुन्क

३)स्टेड

४)विल्यम हार्वे

_____________________________________


⚫️........ या पदार्थाची विशिष्ट उष्माधरक्ता सर्वाधिक असते

१)पारा 

२) चांदी

३) पाणी ✔️✔️

४) लोखंड

_____________________________________

🟤 भारतीय राष्ट्वादाचे जनक या‌ऺना म्हटले आहे.


१)सुरेंद्रनाथ बॅनर्जी  ✔️✔️

२) लोकमान्य टिळक

३) न्यायमूर्ती रानडे

४)म.गांधी

_____________________________________


🔴....... मुळे दुधाचा रंग पांढरा असतो

१)ग्लुकोज

२) लक्टोज

३)रेनिन

४)केसिन ✔️✔️

_____________________________________


🟣 वनस्पति किवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता कार्बन आयसोटोप वापरतात.

१)सी -१४  ✔️✔️

२) सी -१३

३) सी -१२

४) यापैकी एकही नाही


कोणत्या देशाने कोविड-19 रोगावर जलद तपासणी साधन विकसित करण्यासाठी भारताशी भागीदारी केली?


(A) फ्रान्स

(B) इस्त्रायल✅✅

(C) टर्की

(D) रशिया


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या देशाला जिंजा जिल्ह्यात एक ‘मिलिटरी वॉर गेम सेंटर’ उभे करण्यासाठी भारताकडून मदत केली जात आहे?


(A) रवांडा

(B) सुदान

(C) अल्जेरिया

(D) युगांडा✅✅


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या राज्याने ‘श्रम सिद्धी’ योजना राज्यात लागू केली?


(A) उत्तरप्रदेश

(B) हरयाणा

(C) राजस्थान

(D) मध्यप्रदेश✅✅


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या व्यक्तीला न्यूयॉर्क इंटेलेक्चुवल प्रॉपर्टी लॉ असोसिएशन या संस्थेच्या वतीने ‘इंव्हेंटर ऑफ द इयर’ हा सन्मान जाहीर केला गेला?


(A) कविता सेठ

(B) छेको असाकावा

(C) राजीव जोशी✅✅

(D) सत्य चौहान


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


‘जागतिक थायरॉईड दिवस’ कधी पाळला जातो?


(A) 25 मे✅✅

(B) 26 मे

(C) 27 मे

(D) 28 मे


1. शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती?

1) ३६९ 

 2) ५४७

 3) ६३९ ✅✅✅

 4) ९१२


2. धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?

 1) सोडियम क्लोरेट ✅✅✅

 2) मायका

 3) मोरचुद

 4) कॉपर टिन

3. जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर


 1) त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते . 

 2) त्या वस्तूची चाल व दिशा बदलतात .

 3) त्या वस्तूची चाल व दिशा सारखी राहते .

 4) त्या वस्तूची चाल बदलते,पण दिशा तीच राहते.✅✅✅


4. रक्तपेशी किती प्रकारच्या असतात?

1) तीन  ✅✅✅

 2) दोन

 3) चार

 4) सहा


5. मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते?

1)  अ 

 2) ब ✅✅✅

 3) ड

 4) ई


6. खालीलपैकी कोणते गतीज ऊर्जेचे उदाहरण आहे?

1)  सायकल 

 2) रेल्वे

 3) जहाज

 4) वरिल सर्व ✅✅✅


7. २३५२ डेसि मीटर = किती हेक्टोमीटर?

1)  २३.५२                                                                                                                                       2) २३५.२

 3) २३०.५२

 4) २.३५२ ✅✅✅


8. त्वरण म्हणजे ................... मधील बदलाचा दर होय .

1) वेग ✅✅✅

 2) अंतर

 3) चाल

 4) विस्थापन 


9. होकायंत्रात .............. चुंबक वापरतात . - Not Attempted

1)  निकेल 

 2) रबर

 3) रबर

 4) सूची✅✅✅


10. हॅड्रोजन आणि ----------HB - या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते?

1)  ऑक्सीजन ✅✅✅

 2) नायट्रोजन

 3) कार्बनडाय ऑक्साईड

 4) हेलियम


🟣 खालीलपैकी कोणते राष्ट्र हे BRICS चे सदस्य नाही?
1. ब्रिटन
2. रशिया
3. भारत
4. दक्षिण आफ्रिका

🔵 मुंबई बंदरातील वाहतूकीचा भार कमी करता यावा म्हणून ------ हे बंदर विकसित करण्यात आलेले आहे.
1. हल्दिया
2. न्हावा-शेवा
3. कांडला
4. मार्मागोवा

🟡. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय ----- येथे आहे.
1. जिनिव्हा
2. पॅरिस
3. न्यूयॉर्क
4. रोम

🟠. ------ येथे डॉ. आंबेडकरांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह केला.
1. महाड
2. औरंगाबाद
3. नाशिक
4. मुंबई

🔴 भारतीय प्रमाणवेळ (I.S.T.) ही ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा (G.M.T.) ----- तासांनी पुढे आहे.
1. अडीच
2. तीन
3. साडे चार
4. साडे पाच

🟣 ------ यांना महाराष्ट्राचे 'मार्टिन ल्युथर' म्हणतात.
1. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
2. लोकहितवादी
3. महात्मा फुले
4. न्या. महादेव गोविंद रानडे

🟤. पेट्रोलमध्ये मिसळलेल जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात?
1. द्राक्ष
2. मका
3. उस ✔️✔️
4. डिझेल

🟣. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?
1. नीळ
2. भात फक्त
3. गहू फक्त
4. भात व गहू

🟡. पर्वतीय वार्यांना चिनुक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात?
1. अमेरिका आणि मेक्सिको
2. अमेरिका आणि कॅनडा ✔️✔️
3. ब्राझिल आणि अर्जेटीना
4. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

🟠. खालीलपैकी कोणती वाक्ये अर्टेशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत?
1. ही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहे
2. अशा विहिरी नैसर्गिक तेल पुरवतात
3. या विहिरी नैसर्गिक वायु पुरवतात.
4. वरील कोणतीही नाही ✔️✔️

🔴 20. -----% सौरशक्ति पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही.
1. 79
2. 59
3. 49 ✔️✔️
4. 39


🔴 व्यावसायिक बँकांच्या दुसर्‍या राष्ट्रीयीकरणात ___ बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.

1. 4
2. 5
3. 6 ✅
4. 8

🟠 वायदा बाजार आयोग खालीलपैकी कोणता बाजार (Market) स्वतंत्रपंणे नियंत्रित करतो?
1.म्युच्युअल फड  
2.वस्तू विनिमय  ✅
3.भागभांडवल बाजार
4.परकीय चलन बाजार


🟡12 जुलै 1982 रोजी एआरडीसीमध्ये विलीनीकरण करण्यात आले ?

1.आरबीआय 
 2.नाबार्ड  ✅
3. एक्झिम बँक
4. वरीलपैकी काहीही नाही


🟢 एअरटेल पेमेंट्स बँकेने भारतीय शेतकरी आणि लघु व मध्यम उद्योगांसाठी खास प्रकारच्या पेमेंट सोल्यूशन्स विकसित करण्यासाठी कोणत्या कंपनीशी हातमिळवणी केली आहे?

1.पेपल
2.मास्टरकार्ड  ✅
3.व्हिसा
4.मेझॉन

🔵सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार एमएसएमई क्षेत्राने जीडीपीमध्ये किती टक्के वाटा उचलला आहे?

1. 25%
2.29%  ✅
3.32%
4. 36%

⚫️ भारत सरकारच्या कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागांतर्गत नाफेडने लॉकडाऊनमध्ये डाळी व तेलबिया खरेदी केली. नाफेडची स्थापना कोणत्या तारखेला झाली?

1.2 ऑक्टोबर 1958  ✅
2.2 ऑक्टोबर 1968
3.2 ऑक्टोबर 1978
4.2 ऑक्टोबर 1988

🟤 वित्तीय तूट म्हणजे काय?

1.नवीन चलन नोटा छापणे
2.थकित चलनासह नवीन चलन बदलणे
3.सार्वजनिक खर्चाची संख्या सार्वजनिक खर्च  ✅
4.. सार्वजनिक खर्चापेक्षा जास्त सार्वजनिक उत्पन्न

🔴आंतरराष्ट्रीय नाणेनिधी खालील दिवशी कार्यरत झाले:
1.1 मार्च, 1944 
2.1 मार्च, 1945
3.1 मार्च, 1946
4.1 मार्च, 1947 ✅

वहाइसरॉय घटकांवरील सराव प्रश्न


♦️परश्न 1️⃣: कोणाच्या काळात भारतीय परिषद कायदा 1861 पारित करण्यात आला-?

१) लॉर्ड कॅनिंग✅✅

२)लॉर्ड मिंटो

३) लॉर्ड डफरीन

४) यापैकी नाही


♦️परश्न 2️⃣:कॅम्पबेल यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ कमिटी कोणाच्या काळात स्थापन केली?

१)लॉर्ड कॅनिंग

२) लॉर्ड रिपन

३) लॉर्ड जॉन लॉरेन्स ✅✅

४) लॉर्ड लिटन


♦️परश्न 3️⃣:- "रॉयल टायटल ऍक्ट" कोणाच्या काळात संमत करण्यात आला?

१) लॉर्ड रिपन

२) लॉर्ड हेस्टिंग

३) लॉर्ड लिटन ✅✅

४) यापैकी नाही


♦️परश्न 4️⃣:-पहिला फॅक्ट्री ऍक्ट कोणाच्या काळात झाला?

१)लॉर्ड रिपन ✅✅

२) लॉर्ड लान्सडाऊन

३) लॉर्ड चेम्सफर्ड

४) यापैकी नाही


♦️परश्न 5️⃣:-पंजाब टेंनसी ऍक्ट कोणाच्या काळात झाला?

१) लॉर्ड वेलस्ली

२) लॉर्ड डफरिन ✅✅

३) लॉर्ड कानींग

४) लॉर्ड मेयो


♦️परश्न 6️⃣:- मणिपूर राज्यच्या कारभारात कोणी हस्तक्षेप केला?

१) लॉर्ड वेलस्ली

२) लॉर्ड मिंटो

३) लॉर्ड लिटन

४) लॉर्ड लान्सडाऊन✅✅


 ♦️परश्न 7️⃣ :-भारतीय नाणी व चलन कायदा कोणी केला?

१) लॉर्ड कर्झन✅✅

२) लॉर्ड कॉर्नवॉलिस

३) लॉर्ड मेयो

४) लॉर्ड रिपन



 ♦️परश्न 8️⃣:-भारतीय विद्यापीठ कायदा कोणाच्या काळात झाला?

१) लॉर्ड लिटन

२) लॉर्ड चेम्सफर्ड

३) लॉर्ड कर्झन ✅✅

४) यापैकी नाही


 ♦️परश्र 9️⃣ :- कोणच्या काळात वंगभंग चळवळ घडून आली?

१) लॉर्ड मिंटो

२) लॉर्ड हार्डिंग

३)लॉर्ड कर्झन

४) लॉर्ड मिंटो II ✅✅


 ♦️परश्न १०:- असहकार चळवळ कोणच्या काळात सुरू झाली?

१) लॉर्ड रिडींग ✅✅

२) लॉर्ड होर्डिंग

३) लॉर्ड चेम्सफर्ड

४) यापैकी नाही

इग्रज अधिकारी व कामगिरी


▪️रॉबर्ट क्लाइव्ह - दुहेरी राज्यव्यवस्था 


◾️वॉरन हेस्टींग - रेग्युलेटिंग अॅक्ट* 


◾️लॉर्ड कॉर्नवॉलिस - कायमधारा पद्धत


◾️लॉर्ड वेलस्ली - तैनाती फौज


◾️लॉर्ड हेस्टींग - पेंढाऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त


◾️ लॉर्ड विल्यमबेंटीक - सती प्रतिबंधक कायदा


◾️ चार्ल्स मूटकॉफ - वृत्तपत्राचा मुक्तिदाता


◾️ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी


◾️ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण


◾️ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय


◾️ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना


◾️ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक


◾️ लॉर्ड लिटल - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट


◾️ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक

तैनाती फौज



🔸(सब्‌सिडिअरी फोर्स) हिंदुस्थानात सार्वभौम सत्ता स्थापन करण्यासाठी फ्रेंच आणि इंग्रज यांनी अवलंबिलेली एक उपाययोजना. तैनाती फौजेची सुरूवात प्रथम फ्रेंचांनी केली. 


▪️१७४८–४९ मध्ये द्यूप्लेक्स व चंदासाहेब यांच्यात करार होऊन फ्रेंचांनी आपली फौज नबाबाच्या मदतीसाठी ठेवली. त्याबद्दल नबाबने द्यूप्लेक्सला पॉंडिचेरीजवळचा मुलूख तोडून दिला. यातच पुढे इंग्रजांनी सुरू केलेल्या तैनाती फौजेचा उगम आहे. अशाच तऱ्हेचा करार १७६० मध्ये इंग्रजांनी मीर कासीमशीही केला होता.


◾️वॉरन हेस्टिंग्जने थोड्या फार प्रमाणात तैनाती फौजेची योजना अंमलात आणली होती. पण बेलस्लीने हिंदुस्थानात खऱ्या अर्थाने तैनाती फौजेचा प्रसार केला आणि एतद्देशीय संस्थानिकांना ब्रिटिश अंमलाखाली आणले व हिंदुस्थानचे ब्रिटिश साम्राज्यात रूपांतर केले. 


◾️वलस्लीने प्रथम निजामाकडची फ्रेंच फौज काढून टाकण्यास सांगून त्या जागी इंग्रज फौज ठेवून तैनाती फौजेच्या योजनेला मूर्त स्वरूप दिले. पुढे त्याने या योजनेची सक्ती केली व जे एतद्देशीय संस्थानिक फौज ठेवून घेणार नाहीत, अशांबरोबर काहीतरी निमित्त काढून युद्धे केली. उदा., टिपू, दुसरा बाजीराव पेशवा, नागपूरकर भोसले, शिंदे, होळकर इत्यादी. तसेच जे संस्थानिक इंग्रजांची तैनाती फौज ठेवून घेतील, त्यांच्यावर काही अटी लादण्यात आल्या.


🔴त्यापैकी महत्त्वाच्या अटी अशा :


(१) संस्थानिकांनी फौजेच्या खर्चापुरता मुलूख तोडून द्यावा.


(२) इंग्रजांच्या परवानगीशिवाय इतर युरोपीयांस आपल्या पदरी नोकरीस ठेवू नये व परकीय सत्तेशी कोणताही करार करू नये.


(३) आपापसांतील तंट्याचा निकाल इंग्रज करतील तो संस्थानिकांनी मान्य करावा.


(४) तैनाती फौजेचे अधिकारी इंग्रजच असावेत.


(५) संस्थानची देखरेख पाहण्यास रेसिडेंट नावाचा अधिकारी ठेवून घ्यावा. अशा तऱ्हेच्या अनेक अटी घालून वेलस्लीने पेशवे, नागपूरकर भोसले, गायकवाड, शिंदे वगैरे मराठी संस्थानिकांस तसेच म्हैसूर व हैदराबाद येथील सत्ताधारी यांच्या पदरी तैनाती फौज ठेवून त्यांना आपले मांडलिक केले. अशा तऱ्हेने एतद्देशीयांची विरोध करण्याची शक्ती कमी करून इंग्रजांनी आपली सार्वभौम सत्ता प्रस्थापित केली.


⌛️तनाती फौजेच्या प्रकारामुळे एतद्देशीय संस्थानिकांतील स्वत्व नाहीसे होऊन हिंदुस्थानला लवकरच पारतंत्र्य प्राप्त झाले. या योजनेत अनेक दोष होते. इंग्रजांनी संस्थानिकांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतल्यामुळे संस्थानिकांनी स्वतःची फौज ठेवेण बंद केले. त्यामुळे संस्थानात बंडाळी व लुटालूट वाढली. रयतेला आणि उद्योगधंद्यांना संरक्षण मिळेनासे झाले. संस्थानात ठेवलेली तैनाती फौज सर्व राज्यातील बंडाळीचा मोड करण्यास अपुरी होती. एतद्देशीय राज्यकर्ते क्रमाने परतंत्र बनून बेजबाबदारपणे वागू लागले. त्यांची कारभार करण्याची कार्यक्षमता कमी झाली. जनतेतील लढण्याची शक्तीच नाहीशी होऊन तीही परतंत्र बनू लागली

सराव प्रश्न


१) हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया......

१) वाढते

२) मंदावते 🅾️

३) कमी होते

४) समान राहते


२) शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो.......

१) साखर🅾️

२)जीवनसत्वे

३) प्रथिने

४) पाणी


४) प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन .......तून दिला जातो.

१) पाणी🅾️

२) कार्बन डाय ऑक्साईड 

३) हरित द्रव्य

४) नायट्रोजन 


५) निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात?

१) जीवाणू

२) मासा

३) हिरव्या वनस्पती🅾️

४) मानवी प्राणी


६) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?

१) बुरशी🅾️

२) शैवाल

३) दगडफूल

४) नेचे


७) क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ?

१) तुरटी

२) विरंजक चुर्ण 🅾️

३) चुनखडी 

४) धुण्याचा सोडा


८) ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला .........हायकार्बन असे म्हणतात.

१) संतृप्त 

२) असंतृप्त🅾️

३) वलयांकित

४) वरील सर्व


९) अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा .........ची वाढ होय.

१) सुक्ष्मजीव 🅾️

२) किटक

३) विषाणू

४) कृमी


१०) कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात?

१) डोळे

२) कान

३) त्वचा🅾️

४) नाक 


११) समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला ..........म्हणतात.

१) ऊती🅾️

२) केंद्रक

३) मूल 

४) अभिसार


१२) १८७३ मध्ये लुईस पाश्चरने .........हा नवा सिध्दांत मांडला

१) स्वयंप्रेरीत जीव निर्मिती

२) जंतूपासून रोगोद्भव🅾️

३) साथीचे रोगविषयक 

४)  यापैकी नाही 


1. वसईचा प्रसिध्द तह कोणत्या वर्षी घडून आला ? 


A. सन 1801 

B. सन 1802 🅾️

C. सन 1803 

D. सन 1818 


2. तैनाती फौज भारतात कोणी सुरू केली ? 


A. अकबर 

B. औरंगजेब 

C. लॉर्ड वेलस्ली 🅾️

D. लॉर्ड कॉर्नवालीस 


3. सतीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी पास झाला ? 


A. सन 1829 🅾️

B. सन 1859 

C. सन 1929 

D. सन 1959 


4. विधवा पुर्नविवाहाचा कायदा कधी पास झाला ? 


A. सन 1926 

B. सन 1936 

C. सन 1946 

D. सन 1956 🅾️


5. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार कोठे उभारली ? 


A. चंद्रनगर 

B. सुरत 🅾️

C. कराची 

D. मुंबई 


6. कोणत्या साली भारतात विद्यापीठ कायदा पास झाला ? 


A. सन 1834 

B. सन 1864 

C. सन 1894 

D. सन 1904 🅾️


7. भारतात येणारे पहिले युरोपियन कोण ? 


A. इंग्रज 

B. फ्रेंच 

C. डच 

D. पोर्तुगीज 🅾️


8. नेफा हे __________ चे जुने नाव आहे. 


A. मणिपूर 

B. मेघालय 

C. अरुणाचल प्रदेश 🅾️

D. त्रिपुरा 


9. खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते ? 


A. महाराष्ट्र 

B. आंध्रप्रदेश 🅾️

C. गुजरात 

D. आसाम


10. IIM मध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते ? 


A. NET 

B. JEE 

C. GATE 

D. CAT 🅾️


11. भारत सरकार कोणत्या दिवशी 'राष्ट्रीय मतदार दिन' म्हणून साजरा करते ? 


A. 12 जानेवारी 

B. 15 जानेवारी 

C. 25 जानेवारी 🅾️

D. 26 जानेवारी 


12. स्वतंत्र तेलंगणाची मागणी कशावर आधारलेली होती ? 


A. भाषिक महत्त्वाकांक्षा 

B. प्रादेशिक असंतुलन 🅾️

C. फुटीरतावादी राजकारण 

D. राज्याच्या स्वायत्ततेशी 


13. मोटार वाहनांमुळे _________________ प्रकारचे प्रदूषण होते . 


A. हवेमधील 

B. प्राथमिक 

C. दुय्यम 

D. प्राथमिक व दुय्यम दोन्ही प्रकारचे 🅾️


14. ई-मेलचा अर्थ ____________________ असा आहे. 


A. इलेक्ट्रॉनिक मेल 🅾️

B. इलेक्ट्रिकल मेल 

C. इलेक्ट्रोमॅग्नेटीक मेल 

D. इलेक्ट्रोस्टॅटीक मेल 


15. खालीलपैकी कोणत्या महामार्गावर 'खंबाटकी घाट' लागतो ? 


A. मुंबई-पुणे 

B. मुंबई-गोवा 

C. मुंबई-आग्रा 

D. पुणे-बेंगळूरु 🅾️


16. खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे ? 


A. व्यवसाय कर 🅾️

B. मूल्यवर्धित कर 

C. सेवा कर 

D. विक्री कर 


17. महाराष्ट्रातील आदिवासी विकासाच्या चळवळीशी कोण संबंधित नव्हते ? 


अ. सेनापती पांडुरंग बापट ब. अनुताई वाघ क. ताराबाई मोडक ड.केशवराव जेधे 


A. ब, ड 

B. अ, क 

C. अ, ड 🅾️

D. ब, क


 १.  अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? 

 

१. कर्नाटक 

२. मध्यप्रदेश 🚔🚔

३. महाराष्ट्र 

४. उत्तरप्रदेश


 २.  पुढील गण कोणत्या वृत्ताचे आहे?* 

 *म-स-ज-स-त-त-ग 


१. भुजंगप्रयात 

२. वसंततिलका 

३. आर्या 

४. शार्दुलविक्रिडित🚔🚔


 ३.  कोलो रँडो वाळवंट कोणत्या खंडात आहे? 


१. उत्तर अमेरिका 🚔🚔

२. आफ्रिका 

३. दक्षिण अमेरिका 

४. आशिया


 ४.  चंद्रप्रभा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? 


१. महाराष्ट्र 

२. मध्यप्रदेश 

३. उत्तर प्रदेश 🚔🚔

४. हिमाचल प्रदेश


 ५.  'पाओली एक्सप्रेस' या नावाने कोणाला ओळखले जाते? 


१. मनू साहनी

२. पी. टी. उषा 🚔🚔

३. हिमा दास 

४. नरिंदर बत्रा


 ६.  भारतात इथेनाँलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरूवात कोठे झाली? 


१. मुंबई 

२. बँगलोर 

३. दिल्ली 

४. नागपूर🚔🚔


 ७.  स्वातंत्र्यपूर्व भारतातील खालीलपैकी कोणत्या आंदोलनात "काईनल सक्सुर्लर"  प्रकाशित करण्यात आले होते? 


१. छोडो भारत आंदोलन 

२. स्वदेशी आंदोलन 🚔🚔

३. इल्बर्ट बिल प्रतिक्रिया आंदोलन 

४. असहकार आंदोलन


 ८.  खालीलपैकी कोणते उष्ण सागरी प्रवाह आहेत? 

अ. फाँकलँड प्रवाह  

ब. बेंग्युना प्रवाह  

क. ब्राझील प्रवाह 

ड. सोमाली प्रवाह 


१. अ आणि ब

२. ब आणि क 

३. ड आणि क 🚔🚔

४. वरील सर्व


 ९.  नगरपरिषदेचे कोणते अनिवार्य कार्य नाही? 


१. अतिक्रमण काढणे 

२. रस्त्यांना नावे देणे 

३. गलिच्छ वस्त्यांची सुधारणा करणे 🚔🚔

४. महत्वांची सिमाचिन्हे उभारणे



 १०.  "लोकपाल" ही संकल्पना सर्वप्रथम कोणत्या देशाने स्विकारली? 


१. कँनडा 

२. अमेरिका 

३. स्विडन 🚔🚔

४. आँस्ट्रेलिया


 ११.  एल. टी. टी. ई. ही दहशतवादी संघटना कोणत्या देशातील आहे? 


१. भारत 

२. आर्यलँड 

३. पँलेस्टाईन 

४. श्रीलंका🚔🚔


 १२. आँलंम्पिक चिन्हाच्या मध्यभागातील रिंगचा रंग कोणता? 


१. हिरवा 

२. पिवळा🚔🚔 

३. काळा 

४. लाल


 १३.  'मिथिल अमाईन' हे आम्लारी असून ते आम्लारिच्या कोणत्या प्रकारात मोडते ? 


१. तीव्र आम्लारी 🚔🚔

२. सौम्य आम्लारी 

३. तीव्र व सौम्य आम्लारी 

४. यापैकी नाही


 १४.  हिंदीची कोणती बोलीभाषा आहे? 


१. कोकणी 

२. संस्कृत 

३. अहिराणी 

४. मैथिली🚔🚔


 १५.  AFSPA/ अफस्पा कायदा म्हणजे काय? 


१. आर्म्ड फोर्सेस स्पेशल पाँवर अँक्ट 🚔🚔

२. आर्मी फोकस स्पेशल पाँवर अँक्ट 

३. आर्मी फ्राँम रिस्पेक्ट स्पेशल अँक्ट 

४. आर्म्ड फोर्सेस सेक्युरिटी पाँवर अँक्ट


 १६.  प्रथमच चलनात येणाऱ्या २० रूपयाच्या नाण्याचे वजन किती आहे?


 *उत्तर : ८.५४ ग्रँम*


 १७.  संयुक्त राष्ट्राचे २०२० मध्ये अध्यक्ष कोण आहेत?


 उत्तर : अँन्टेनिओ गुट्रेस

Latest post

रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera)

📌हे सर्वांत साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना 'स्पंज' म्हणतात.  ➡️त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद...