31 October 2025

भारताचे उपराष्ट्रपती (Vice President of India)



🔹 संविधानातील कलमे :

 • कलम 63 ते 71 — उपराष्ट्रपतींच्या पदासंबंधी आहेत.


🔹 उपराष्ट्रपतींची निवड (Election):

 1. निवडणूक अप्रत्यक्ष पद्धतीने होते.

 2. संसदेचे दोन्ही सभागृह (लोकसभा आणि राज्यसभा) यांच्या सदस्यांद्वारे निवड केली जाते.

 3. गुप्त मतदानाने (Secret Ballot) व एकांतरणीय हस्तांतरणीय मत (Single Transferable Vote) पद्धतीने निवड होते.


🔹 पदाचा कार्यकाळ:

 • 5 वर्षांचा असतो.

 • पुन्हा निवड होऊ शकते.


🔹 अर्हता (Qualifications):

 1. भारताचा नागरिक असावा.

 2. किमान वय 35 वर्षे असावे.

 3. राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी पात्र असावे.

 4. कोणत्याही नफ्याच्या पदावर नसावा.


🔹 पदाचे अधिकार व कर्तव्ये:

 1. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती (Ex-officio Chairman of Rajya Sabha) असतात.

 2. राष्ट्रपती अनुपस्थित असल्यास किंवा मृत्यू झाल्यास कार्यवाह राष्ट्रपती म्हणून काम पाहतात.

 3. राज्यसभेतील शिस्त, कार्यवाही आणि चर्चेचे नियंत्रण ठेवतात.


🔹 पद रिक्त होण्याची कारणे:

 1. राजीनामा (राष्ट्रपतींकडे दिला जातो)

 2. कार्यकाळ पूर्ण होणे

 3. मृत्यू

 4. अपात्र ठरविणे (संसद ठरवते)

सविनय कायदेभंग चळवळ (1930-1934)



1️⃣ पार्श्वभूमी व आरंभ

➤ 1929 च्या लाहोर अधिवेशनात ‘संपूर्ण स्वराज्य’ हे राष्ट्रध्येय ठरविण्यात आले.

➤ याच अधिवेशनात सविनय कायदेभंगाचा ठराव मंजूर करण्यात आला.

➤ सविनय कायदेभंग चळवळीसाठी ‘मीठ’ या वस्तूची निवड करण्यात आली.


2️⃣ दांडी यात्रा (12 मार्च ते 6 एप्रिल 1930)

➤ एकूण अंतर : 385 कि.मी. (240 मैल) – साबरमती ते दांडी.

➤ गांधीजींसोबत 78 सहकारी सहभागी झाले.

➤ 6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी दांडी किनाऱ्यावर मिठाचा सत्याग्रह केला.

➤ नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दांडी यात्रेची तुलना “नेपोलियन अल्बावरून पॅरिसकडे गेला” या घटनेशी केली.


3️⃣ महिलांचा सहभाग 👩‍🦰

➤ सरोजिनी नायडू

➤ कमलादेवी चट्टोपाध्याय

➤ कमला नेहरू

➤ हेमप्रभा दास

➤ सुचेता कृपलानी

➤ कस्तूरबा गांधी

➤ हंसाबाई मेहता

➤ अवंतीबाई गोखले


4️⃣ सविनय कायदेभंगाचे स्वरूप व प्रमुख केंद्रे

➤ पेशावर सत्याग्रह : नेतृत्व – अब्दुल गफार खान.

➤ सोलापूर सत्याग्रह : लष्करी कायदा अस्तित्वात असताना गिरणी कामगारांनी सत्याग्रह केला.

  मल्लाप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आली.

➤ धारासना सत्याग्रह (गुजरात) : नेतृत्व – सरोजिनी नायडू, मीराबेन.

➤ बॉम्बे चौपाटीवर : कमलादेवी चट्टोपाध्याय व अवंतिकाबाई गोखले यांनी मिठाचा सत्याग्रह केला.

➤ महाराष्ट्रात : वडाळा, मालवण, शिरोडा, दहीहंडा इ. ठिकाणी मिठाचा सत्याग्रह.

➤ कर्नाटकात : ‘सनिकट्टा’ येथे मिठाचा सत्याग्रह.

➤ ज्या ठिकाणी समुद्र किनारा नव्हता, तेथे इतर अन्यायकारक कायद्यांचा भंग करण्यात आला.


5️⃣ इतर स्थानिक चळवळी

➤ महाराष्ट्रातील पुसद येथे बापूजी अणे यांच्या नेतृत्वाखाली जंगल सत्याग्रह झाला.

➤ सातारा जिल्ह्यातील बिळाशी येथे राजुताई कदम यांच्या नेतृत्वाखाली जंगल सत्याग्रह.

➤ गुजरातमध्ये : खेडा, बाडोली, जंबुसार, भरुच येथे साराबंदी चळवळ राबविण्यात आली.


6️⃣ जनसहभाग व प्रतीकात्मक उपक्रम

➤ प्रभातफेरी, मुलांची वानरसेना या आंदोलनात सक्रिय होती.

➤ देशभरात ब्रिटिश कायद्यांविरुद्ध असहकार, बंद, सभा, निदर्शने झाली.

संसदेचे कामकाज करण्याची साधने (Devices of Parliamentary Proceedings)



1️⃣ प्रश्न काळ (Question Hour)

✅️ अर्थ: प्रत्येक संसदीय बैठकीचा पहिला तास म्हणजे प्रश्नकाळ असतो.

➤ या काळात सदस्य शासनाच्या धोरणांबद्दल, निर्णयांबद्दल आणि प्रशासनाच्या कामकाजाबद्दल प्रश्न विचारतात.

➤ संबंधित मंत्री हे प्रश्नांचे उत्तर देतात.


2️⃣ प्रश्नांचे प्रकार (Types of Questions)

अ) तारांकित प्रश्न (Starred Question)

✅️ उत्तर: तोंडी दिले जाते.

➤ सदस्य उपप्रश्न (Supplementary Questions) विचारू शकतात.

➤ अध्यक्ष/सभापती हे प्रश्न अतारांकित प्रश्नांमध्ये रूपांतरित करू शकतात.

➤ एका दिवशी एका सदस्याला एका प्रश्नाचे उत्तर मिळू शकते.

➤ एका दिवशी जास्तीत जास्त 20 प्रश्न घेतले जातात.

➤ पेपरचा रंग: हिरवा (Green Paper)


ब) अतारांकित प्रश्न (Unstarred Question)

✅️ उत्तर: लेखी स्वरूपात दिले जाते.

➤ सदस्यांना उपप्रश्न विचारता येत नाहीत.

➤ या प्रश्नांमध्ये सामान्यतः आकडेवारी किंवा विस्तृत माहिती मागवली जाते.

➤ एका दिवशी एका सदस्याचे 4 किंवा 5 प्रश्न घेतले जातात.

➤ एका दिवशी एकूण 230 प्रश्न घेतले जातात.

➤ पेपरचा रंग: पांढरा (White Paper)


क) अल्प सूचना प्रश्न (Short Notice Question)

✅️ अर्थ: जेव्हा 10 दिवसांपेक्षा कमी कालावधीत उत्तर आवश्यक असते, तेव्हा हा प्रश्न विचारला जातो.

➤ अध्यक्ष/सभापती आणि संबंधित मंत्र्यांची परवानगी आवश्यक असते.

➤ या प्रश्नाचे उत्तर तोंडी दिले जाते.

➤ मंत्र्यांविरुद्ध खासगी सदस्यांनाही प्रश्न विचारता येतात (खाजगी विधेयक असल्यास).

➤ पेपरचा रंग: फिकट गुलाबी (Light Pink Paper)


ड) खाजगी सदस्यांना विचारले जाणारे प्रश्न (Question by Private Member)

✅️ अर्थ: हे प्रश्न सरकारी मंत्र्यांऐवजी इतर खासगी सदस्यांना विचारले जातात.

➤ पेपरचा रंग: पिवळा (Yellow Paper)


📘 महत्त्व:

➤ प्रश्नकाळ हा संसदेतील लोकशाही उत्तरदायित्वाचा सर्वात प्रभावी साधन मानला जातो.

➤ तो शासनाचे कामकाज पारदर्शक ठेवतो आणि मंत्र्यांना जबाबदार बनवतो.

महत्त्वाचे जागतिक निर्देशांक – 2025 (Exam Point of View)

 


1️⃣ मानव विकास निर्देशांक (HDI - 2025)

▪️ Theme: A matter of choice: People & possibilities in the age of AI

➤ भारताचा क्रमांक: 130 वा

➤ पहिले 4 देश: आइसलँड, नॉर्वे, स्वित्झर्लंड, डेन्मार्क


2️⃣ जागतिक असमानता निर्देशांक (GII - 2025) (Global Inequality Index)

▪️ भारताचा क्रमांक: 102 वा


3️⃣ जागतिक भूक निर्देशांक (Global Hunger Index - 2025)

▪️ भारताचा क्रमांक: 102 वा


4️⃣ जागतिक नवोन्मेष निर्देशांक (Global Innovation Index - 2025)

▪️ भारताचा क्रमांक: 38 वा (139 देशांत)


5️⃣ जागतिक आनंद अहवाल (World Happiness Report - 2025)

▪️ भारताचा क्रमांक: 118 वा


6️⃣ जागतिक शांतता निर्देशांक (Global Peace Index - 2025)

▪️ भारताचा क्रमांक: 115 वा


7️⃣ भ्रष्टाचार धारणा निर्देशांक (Corruption Perception Index - 2024)

▪️ भारताचा क्रमांक: 96 वा


8️⃣ शाश्वत विकास अहवाल (Sustainable Development Report - 2025)

▪️ संस्था: SDSN (Sustainable Development Solutions Network)

▪️ भारताचा क्रमांक: 99 वा

➤ पहिले 3 देश: फिनलंड, स्वीडन, डेन्मार्क


9️⃣ जागतिक लिंगभेद निर्देशांक (Global Gender Gap Report - 2025)

▪️ भारताचा क्रमांक: 131 वा

भूगर्भीय हालचाली व वलीकरण (Geological Movements and Folding)



१) पर्वत निर्माणकारी हालचाली (Orogenic Movements)

✅️ भूपृष्ठावर कार्य करणाऱ्या पर्वत निर्माणकारी हालचाली दोन प्रमुख प्रकारच्या असतात :

➤ संकोचीय हालचाल (Compressional movement) – या हालचालींमध्ये भूपृष्ठावर दाब निर्माण होतो, त्यामुळे खडकांचे थर एकमेकांकडे सरकतात व दुमडले जातात.

➤ तणावक हालचाल (Tensional movement) – या हालचालींमध्ये भूपृष्ठावर ताण निर्माण होतो, त्यामुळे खडकांचे थर एकमेकांपासून दूर जातात व भेगा पडतात.


२) संकोचीय हालचालींमुळे निर्माण होणाऱ्या प्रमुख संरचना:

✅️ ➤ सवलन (Warping) – पृथ्वीच्या पृष्ठभागावर मृदू व संथ दाबामुळे वर-खाली वाकणे होते.

✅️ ➤ वलीकरण (Folding) – संकोचामुळे खडकांच्या थरांना वळ्या पडतात व पर्वतरचना निर्माण होते.


३) वलीकरण (Folding):

✅️ भूपृष्ठावरील संकोचीय हालचालींमुळे मृदू आणि अवसादी खडकांच्या थरांना वळ्या पडतात, त्याला वलीकरण असे म्हणतात.

✅️ या प्रक्रियेत खडकांच्या थरांना दाब पडल्याने ते तुटत नाहीत तर वाकतात.

✅️ वलीकरणामुळे अंतर्वल (Anticline) व बहिर्वल (Syncline) अशा संरचना तयार होतात.


४) वळ्यांचे प्रकार (Types of Folds):

1️⃣ साधारण / सम्मित वळण (Symmetrical Fold):

➤ दोन्ही भुजा समान उताराच्या असतात.

➤ वळणाच्या मध्यावर अक्ष रेषा उभी राहते.


2️⃣ असाधारण / असममित वळण (Asymmetrical Fold):

➤ वळ्याच्या दोन्ही भुजांचे उतार असमान असतात.

➤ एका बाजूचा उतार दुसऱ्यापेक्षा जास्त तीव्र असतो.


3️⃣ एकनत वळण (Monoclinal Fold):

➤ एक भुजा मंद उताराची तर दुसरी जवळपास लंबवत असते.

➤ साधारणतः एका दिशेने वाकलेला थर दिसतो.


4️⃣ सम्मयत वळण (Isoclinal Fold):

➤ दोन्ही भुजा एकाच दिशेने झुकलेल्या असतात व जवळपास समांतर होतात.

➤ खूप दाबाखाली हे वळण तयार होते.


5️⃣ परिवलित वळण (Recumbent Fold):

➤ वळ्याच्या भुजा इतक्या वाकतात की एक भुजा दुसऱ्यावर उलटते.

➤ वळ्याचे शीर्ष जवळपास समांतर दिसते.


6️⃣ पंख आकार वळण (Fan-shaped Fold):

➤ वळ्याच्या दोन्ही भुजांची उंची वाढत जाऊन वळण पंखासारखे दिसते.

➤ मध्यभाग खाली व बाजू उंच असतात.


7️⃣ विखंडीत वळण (Nappes Fold):

➤ खूप ताण पडल्याने वळणाची एक भुजा तुटते व दुसऱ्या भुजेवर सरकते.

➤ ही तुटलेली भुजा कधी दुसऱ्या खंडावर जाऊन स्थिरावते.

➤ अशा वळ्यांमुळे भूगर्भीय विस्थापन (displacement) मोठ्या प्रमाणात होते.


५) वलीकरणाचे भूगर्भीय महत्त्व:

✅️ ➤ पर्वतरचना निर्माण करण्यास कारणीभूत (उदा. हिमालय).

✅️ ➤ खनिजांचे, धातूंचे व जलस्रोतांचे स्थान निश्चित करण्यात मदत होते.

✅️ ➤ पृथ्वीच्या अंतर्गत बलांची दिशा व तीव्रता यांचे संकेत मिळतात.

✅️ ➤ भू-रचना विज्ञानात वलीकरण अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो.

नदी प्रवाहाचे प्रकार (Types of River Drainage / Flow)

१) अनुवर्ती प्रवाह (Consequent Stream)

➤ हा प्रवाह प्रदेशाच्या नैसर्गिक उतारानुसार वाहतो.

➤ पर्वतरांग, पठार किंवा भूभागाच्या उताराची दिशा ज्या दिशेने असेल, त्या दिशेनेच हा प्रवाह वाहतो.

➤ या प्रवाहाला ‘आनुषंगिक प्रवाह’ असेही म्हणतात.

➤ उदा. गंगा, गोदावरी, नर्मदा यांच्या काही उपनद्या.


२) परावर्ती प्रवाह (Subsequent Stream)

➤ हा प्रवाह मुख्य प्रवाहानंतर तयार होतो.

➤ तो मुख्य प्रवाहाला समांतर वाहतो आणि दऱ्यांमधून प्रवाहित होतो.

➤ भूपृष्ठाच्या मृदू थरांमध्ये क्षरण झाल्यामुळे अशा प्रवाहांची निर्मिती होते.

➤ उदा. यमुना (गंगेची उपनदी).


३) प्रत्यनुवर्ती प्रवाह (Obsequent Stream)

➤ हा प्रवाह मुख्य प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहतो.

➤ परंतु शेवटी तो मुख्य प्रवाहात मिळतो.

➤ भूगर्भीय उन्नतीनंतर किंवा उतार बदलल्याने असे प्रवाह निर्माण होतात.

➤ उदा. काही हिमालयीन उपनद्या ज्या उलट दिशेने वाहतात.


४) गुंफित प्रवाह (Braided Stream)

➤ प्रवाहात मोठ्या प्रमाणात गाळ, वाळू व गोटे असल्यास नदीचा प्रवाह विभागला जातो.

➤ अनेक लहान प्रवाह एकमेकांत गुंफल्यासारखे वाहतात.

➤ प्रवाहात बेटांसारखे गाळाचे भाग तयार होतात.

➤ उदा. ब्रह्मपुत्रा नदीचा काही भाग.


५) अननुवर्ती प्रवाह (Insequent Stream)

➤ या प्रवाहाचा दिशा, वाहण्याचा क्रम प्रदेशाच्या उताराशी किंवा भूपृष्ठाच्या रचनेशी जुळत नाही.

➤ भूभागातील स्थानिक क्षरण किंवा खडकांच्या वेगवेगळ्या प्रतिकारक्षमतेमुळे हा प्रवाह तयार होतो.

➤ हे प्रवाह अव्यवस्थित स्वरूपाचे असतात.

पंतप्रधानांचे कार्यालय (Prime Minister’s Office – PMO)



१) स्थापना :

➤ 1977 साली पंतप्रधानांचे कार्यालय (PMO) स्थापन झाले.

➤ सुरुवातीला याला Prime Minister’s Secretariat असे म्हणत असत; मोरारजी देसाई यांच्या काळात (1977) याचे नामकरण Prime Minister’s Office (PMO) असे करण्यात आले.


२) रचना आणि कार्यप्रणाली :

➤ हे कार्यालय म्हणजे भारताच्या पंतप्रधानांचे तात्काळ कर्मचारी वर्ग आणि सहाय्यक यंत्रणा आहे.

➤ यात विविध स्तरांवरील अधिकारी, सल्लागार, सचिव आणि सहाय्यक कर्मचारी यांचा समावेश असतो.

➤ PMO चे प्रशासकीय प्रमुख – पंतप्रधानांचे प्रधान सचिव (Principal Secretary to PM) असतात.

➤ सध्या या पदावर प्रमोद कुमार मिश्रा कार्यरत आहेत.


३) PMO अंतर्गत येणाऱ्या प्रमुख संस्था :

➤ Department of Atomic Energy (परमाणु ऊर्जा विभाग)

➤ Department of Space (अंतराळ विभाग)

➤ Performance Management Division (कामगिरी व्यवस्थापन विभाग)

➤ National Security Council (राष्ट्रीय सुरक्षा परिषद)


४) PMO ची मुख्य कार्यक्षेत्रे :

➤ पंतप्रधानांच्या वैयक्तिक लक्षाची आवश्यकता असलेल्या धोरणात्मक व प्रशासकीय बाबींचे व्यवस्थापन.

➤ केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांशी समन्वय राखणे.

➤ राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण, व केंद्र-राज्य संबंधातील महत्त्वाच्या विषयांवर पंतप्रधानांना सल्ला देणे.


५) PMO द्वारे हाताळल्या जाणाऱ्या प्रमुख बाबी :

1️⃣ संरक्षणविषयक महत्त्वाचे मुद्दे.

2️⃣ नागरी आणि संरक्षण क्षेत्रातील त्या बाबी, ज्या राष्ट्रपतींच्या मंजुरीशिवाय अमलात आणता येत नाहीत.

3️⃣ सर्व महत्त्वाचे धोरणात्मक (policy-related) निर्णय.

4️⃣ परदेशातील भारतीय मिशन प्रमुखांच्या नियुक्त्या आणि भारतामध्ये कार्यरत विदेशी मिशन प्रमुखांसाठी मंजुरी प्रस्ताव.

5️⃣ कॅबिनेट सचिवालयाशी संबंधित सर्व निर्णय, तसेच राज्य प्रशासकीय व केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण, UPSC, निवडणूक आयोग, वैधानिक व संवैधानिक समित्या यांच्या सदस्यांच्या नियुक्त्या.

6️⃣ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) आणि इतर नागरी सेवांच्या धोरणात्मक व प्रशासकीय सुधारणा विषयक निर्णय.

7️⃣ राज्यांसाठी पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या विशेष आर्थिक पॅकेजचे निरीक्षण, तसेच त्यासंबंधित नियतकालिक अहवाल सादर करणे.


६) PMO चे महत्त्व :

➤ हे कार्यालय भारत सरकारचे प्रशासकीय व धोरणात्मक केंद्रबिंदू आहे.

➤ पंतप्रधानांना निर्णय घेण्यासाठी आवश्यक तांत्रिक, प्रशासकीय व राजनैतिक सहाय्य पुरवते.

➤ राष्ट्रीय धोरणनिर्मिती, अंमलबजावणी आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्वात PMO चे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.

राजा राममोहन रॉय व ब्राम्हो समाज – भारतीय प्रबोधन युगाचे जनक



➊ मूलभूत माहिती व पार्श्वभूमी

➤ संपूर्ण नाव : राजा राममोहन रॉय

➤ जन्म : १७७२, राधानगर, हुगळी जिल्हा (पश्चिम बंगाल)

➤ वडील : रमाकांत रॉय | आई : तारिणीदेवी

➤ आजोबा : कृष्णचंद्र बंदोपाध्याय (बंगाल नबाबांच्या दरबारात अधिकारी)

➤ 'रॉय' ही पदवी नबाब दरबाराकडून सन्मान म्हणून देण्यात आली


➋ शिक्षण व भाषाशिक्षण

➤ १७८९ मध्ये अरबी व पर्शियन भाषा शिकण्यासाठी पाटणा येथे पाठवले

➤ नंतर बनारस येथे संस्कृत आणि हिंदू धर्मशास्त्रांचे शिक्षण

➤ १८०३ नंतर इंग्रजी शिकण्यास सुरुवात केली

➤ फारसी, बंगाली, हिंदी, संस्कृत, इंग्रजी, पर्शियन, हिब्रू या भाषांवर प्रभुत्व


➌ सामाजिक व धार्मिक सुधारणा कार्य

➤ १८०५ साली ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरी

➤ १८१५ मध्ये नोकरी सोडून ‘आत्मिया सभा’ ची स्थापना – वैचारिक चर्चेचे व्यासपीठ

➤ १८२८ मध्ये ‘ब्राम्हो समाज’ ची स्थापना – एकेश्वरवादावर आधारित समाज

➤ सती प्रथेविरुद्ध प्रयत्न –

  ➤ १८२९ मध्ये सतीप्रथा रद्द करण्यात यश

➤ विधवा पुनर्विवाहासाठी ब्रिटिश सरकारकडे सातत्याने प्रयत्न

➤ स्त्रीशिक्षण व स्त्री हक्कांचा पुरस्कार

➤ धार्मिक सहिष्णुता आणि सर्व धर्मांचा अभ्यास


➍ पत्रकारिता व साहित्य योगदान

➤ तुहफत-उल-मुव्वहिदीन (१८०३) – फारसीत एकेश्वरवादाचा पुरस्कार

➤ वेदांत ग्रंथ (१८१५) – शंकराचार्यांच्या भाष्यांचे बंगालीत भाषांतर

➤ उपनिषदांचे भाषांतर – ईश, केण, मुंडक, मांडूक्य

➤ संवाद कौमुदी (१८२१) – बंगाली साप्ताहिक

➤ मिरात-उल-अखबार (१८२२–१८३२) – फारसी साप्ताहिक

➤ इतर विषयांवरही पुस्तके : इतिहास, भूगोल, बंगाली व्याकरण


➎ शिक्षणासाठी योगदान

➤ १८२७ – डफ्यू हिअर यांच्यासह श्रीरामपूर विद्यालय स्थापन

➤ आधुनिक, वैज्ञानिक व स्त्री शिक्षणावर भर

➤ आत्मीय सभेत विविध विषयांवर चर्चासत्रे – द्वारकानाथ ठाकूर, प्रसन्नकुमार टांगरे, आनंदप्रसाद इत्यादींचा सहभाग


➏ इंग्लंडप्रवास व मृत्यू

➤ इंग्लंडमध्ये दिल्लीच्या बादशाहाचे दूत म्हणून गेले – ‘राजा’ किताब प्राप्त

➤ ब्रिटनच्या स्टेपलटन येथे १८३३ साली मृत्यू

➤ रवींद्रनाथ ठाकूर यांचे आजोबा द्वारकानाथ ठाकूर यांनी कलकत्त्यात समाधी बांधली


➐ ऐतिहासिक महत्त्व व गौरव

➤ भारताच्या सामाजिक सुधारणांचा पाया घालणारे व्यक्तिमत्त्व

➤ ‘भारतीय रेनेसॉन्स’ चे पितामह

➤ आधुनिक भारतातील सर्वांत पहिला जागरूक समाजसुधारक

➤ हिंदू धर्माचे आत्मपरीक्षण घडवून आणणारा क्रांतिकारक

काकोरी ट्रेन ॲक्शन (1925)



1.📍 ऐतिहासिक पार्श्वभूमी➤ उत्तर प्रदेश सरकारने या घटनेच्या नावात बदल करून "काकोरी ट्रेन लूट"ऐवजी "काकोरी ट्रेन ॲक्शन" असे केले आहे.

➤ ➤ यामागे उद्देश क्रांतिकारकांचे राष्ट्रवादी योगदान अधोरेखित करणे हा आहे.


2.📍 घटना व दिनांक

➤ 9 ऑगस्ट 1925 रोजी लखनऊजवळ काकोरी गावाजवळ उत्तर रेल्वे मार्गावर दरोडा टाकण्यात आला.

➤ ➤ या दरोड्याचा उद्देश सरकारकडून मिळणाऱ्या निधीचा वापर सशस्त्र क्रांतीसाठी करणे होता.


3.📍 सहभागी क्रांतिकारक

➤ राम प्रसाद बिस्मिल

➤ अशफाकुल्ला खान

➤ राजेंद्र लाहिरी

➤ ठाकूर रोशन सिंह

➤ ➤ या चौघांना 19 डिसेंबर 1927 रोजी फाशी देण्यात आली.


4.📍 दरोड्याचे नियोजन - हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA)

➤ HRA ची स्थापना राम प्रसाद बिस्मिल यांनी 1924 मध्ये केली.

➤ ➤ चौरी चौरा घटनेनंतर गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेतले. त्यामुळे हिंसक क्रांतीकडे तरुण वळले.

➤ पक्षाचे इतर प्रमुख सदस्य:

➤ ➤ सचिंद्रनाथ सन्याल

➤ ➤ जोगेशचंद्र चॅटर्जी (अनुशीलन समितीचे सदस्य)


5.📍 पक्षाचे विचारसरणी व उद्दिष्टे

➤ लाला हर दयाल यांच्या प्रेरणेतून पक्षाचा घटनात्मक मसुदा अलाहाबाद येथे तयार झाला.

➤ सचिंद्रनाथ सन्याल यांनी 'क्रांतिकारी' नावाचा जाहीरनामा लिहिला.

➤ ➤ उद्दिष्ट: ब्रिटीश सत्तेची उलथापालथ करून "फेडरल रिपब्लिक ऑफ द युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया" स्थापणे.

➤ ➤ सार्वत्रिक मताधिकाराची जोरदार मागणी करण्यात आली होती.


6.📍 पुढील सहभागी क्रांतिकारक व विस्तार

➤ 1924-25 मध्ये अनेक तरुण क्रांतिकारक पक्षात सामील झाले:

➤ ➤ भगतसिंग

➤ ➤ सुखदेव

➤ ➤ चंद्रशेखर आझाद

➤ पक्षाचे नाव पुढे "हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA)" असे ठेवण्यात आले.


7.📍 ऐतिहासिक महत्त्व व स्मरण

➤ काकोरी ॲक्शन ही घटना भारतीय क्रांतिकारी इतिहासातील मैलाचा दगड ठरली.

➤ ➤ ती एक सुसंघटित आणि धाडसी योजना होती, ज्यात क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान दिले.

➤ या घटनेला आता 100 वर्ष होत चालली आहेत – त्यामुळे इतिहासातील या धाडसपूर्ण क्रांतीस पुन्हा उजाळा देणे गरजेचे आहे.


8.📍 शिकवण व प्रेरणा

➤ देशासाठी बलिदान, साहस, संघटन आणि विचारसरणी यांचे उत्तम उदाहरण.

➤ ➤ या क्रांतिकारकांनी जात, धर्म वा भाषा न पाहता एकत्र येऊन देशासाठी प्राण अर्पण केले.

➤ आधुनिक भारतात या क्रांतीचा आदर्श सामाजिक सलोखा, स्वाभिमान व जबाबदारीसाठी प्रेरणा ठरतो.

महत्त्वाच्या घटना सुधारणा



प्रश्न: पहिली संविधान सुधारणा कधी झाली?  

उत्तर: 1951 मध्ये


प्रश्न: 42 व्या सुधारणेस काय म्हणतात?  

उत्तर: लघु संविधान


प्रश्न: 44वी सुधारणा कोणत्या वर्षी झाला?  

उत्तर: 1978 मध्ये


प्रश्न: 73 वी सुधारणा कोणाशी संबंधित आहे?  

उत्तर: पंचायत राज व्यवस्थेशी


प्रश्न: 74 वी सुधारणा कोणाला लागू करते?  

उत्तर: नगर निकाय व्यवस्था


प्रश्न: 86 वी सुधारणा कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे?  

उत्तर: 6-14 वर्षांच्या मुलांच्या शिक्षणाच्या अधिकाराशी


प्रश्न: 61 व्या सुधारणे मध्ये किमान मतदान वय काय केले?  

उत्तर: 18 वर्षे


प्रश्न: 52 वी सुधारणा कोणत्या विषयाशी संबंधित आहे?  

उत्तर: पक्षबदल कायदा


प्रश्न: 101 वी सुधारणा कोणाशी संबंधित आहे?  

उत्तर: GST लागू करणे


प्रश्न: 97 वी सुधारणा कोणाशी संबंधित आहे?  

उत्तर: सहकारी समित्यांशी


प्रश्न: 93 वी सुधारणा कोणाशी संबंधित आहे?  

उत्तर: खासगी संस्थांमध्ये आरक्षणाशी


प्रश्न: 104 वी सुधारणा कोणाशी संबंधित आहे?  

उत्तर: एंग्लो इंडियन आरक्षण समाप्त करणे


प्रश्न: 36 व्या सुधारणे मध्ये कोणते राज्य समाविष्ट आहे?  

उत्तर: सिक्कीम


प्रश्न: 17 वी सुधारणा कोणत्या यादीशी संबंधित आहे?  

उत्तर: 9वी अनुसूची


प्रश्न: 69 वी सुधारणा कोणाशी संबंधित आहे?

उत्तर: दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र घोषित करणे


सिंधू नदी प्रणाली : प्रमुख नद्या व प्रकल्प



1) झेलम नदी

➤ उगम — काश्मीर, पीरपंजाल रांगा, शेषनाग तलावाजवळ

➤ प्राचीन नाव — वितस्ता

➤ काश्मीरमध्ये झेलम नदी वुलर सरोवरातून वाहते

➤ पाकिस्तानमध्ये जाऊन चिनाब नदीला मिळते


▪️किशनगंगा जलविद्युत प्रकल्प ⚡️

➤ झेलमची उपनदी किशनगंगा नदीवर (J&K)

➤ क्षमता — 330 MW

➤ प्रकल्पावर पाकिस्तानचा आक्षेप


2) चिनाब नदी

➤ उगम — बारा लाचा ला, चंद्र + भागा जलप्रवाह

➤ लांबी — 1180 किमी

➤ पाकिस्तानात प्रवेश केल्यानंतर झेलम व रावी नदी मिळतात

➤ पुढे पंचनद येथे सिंधूला मिळते

➤ प्राचीन नाव — असिकनी


▪️बागलिहार जलविद्युत प्रकल्प ⚡️

➤ चिनाब नदीवर — जम्मू व काश्मीर

➤ क्षमता — 900 MW


3) रावी नदी

➤ उगम — हिमाचल प्रदेश, कुलू जिल्हा, रोहतांग खिंडीजवळ

➤ लांबी — 725 किमी

➤ प्राचीन नाव — पारुष्णी

➤ पाकिस्तानातील रापूर येथे चिनाब नदीला मिळते


4) बियास नदी

➤ उगम — रोहतांग खिंडीच्या दक्षिणेला बियास कुंड

➤ लांबी — 460 किमी

➤ प्राचीन नाव — विपाशा

➤ पंजाबमधील हरिके येथे सतलज नदीला मिळते


5) सतलज नदी

➤ उगम — राकस सरोवर, तिबेट (चीन)

➤ लांबी — एकूण 1450 किमी • भारतातील 1050 किमी

➤ प्राचीन नाव — सतद्रू / सुतुद्री / शतुद्री

➤ तिबेटमध्ये लंगकेन झांगो नावाने ओळख

➤ ताशी गंगमार्गे हिमाचल → पंजाब प्रवेश

➤ पाकिस्तानातील मिथानकोट येथे सिंधू नदीला मिळते


▪️भाक्रा-नांगल बहुउद्देशीय प्रकल्प ⚡️

➤ सतलज नदीवर — पंजाब

➤ जलाशयाचे नाव — गोविंदसागर

भू-आकार (भूरूपे) निर्मिती प्रक्रिया



1) नदीद्वारे निर्माण होणारे भू-आकार

➤ नदीच्या क्षरण कार्यात पाणी चार प्रकारे कार्य करते –

➤ द्रविक क्रिया

➤ अपघर्षण

➤ संधर्षण क्रिया

➤ भक्षणक्रिया


▪️ क्षरण व निक्षेपणामुळे निर्माण होणारे भू-आकार –

➤ धावत्या तयार होणारे प्रवाहवैशिष्ट्य

➤ जलप्रपात / धबधबा

➤ अव्खात दरी

➤ घळई

➤ निदरी

➤ जलविभाजक

➤ नागमोड

➤ नालाकृती सरोवरे

➤ पूरमैदाने

➤ नदी तटमंच

➤ पूरतट

➤ त्रिभुज प्रदेश / डेल्टा


▪️ नदी खोर्‍यांचे प्रकार –

➤ विहंगपद प्रकार

➤ क्षीणोकार प्रकार

➤ धनुष्याकार प्रकार

➤ मैदानप्राय प्रकार


2) हिमनद्या (Glaciers) ❄️


▪️हिमनदीचे खणण कार्य (Erosional Landforms)

➤ हिमेरेषा

➤ हिमगव्हर

➤ श्रृंगे (Aretes)

➤ ‘U’ आकाराची दरी

➤ हिमानी सरोवरे

➤ हिमविदर

➤ लांबट्या/टांगत्या दऱ्या

➤ फियॉर्ड


▪️हिमनदीचे संचयन कार्य (Depositional Landforms)

➤ हिमोढ

➤ हिमानी गाळ

➤ हिमजलौढ निक्षेप

➤ तळ हिमोढ

➤ पार्श्व हिमोढ

➤ मध्य हिमोढ

➤ अंत्य हिमोढ

➤ हिमोढगिरी

➤ एस्कर

➤ कॅम्पस

➤ हिमाजलाढे मैदाने (Outwash plains)


3) वार्‍यामुळे निर्माण होणारे भू-आकार 🌬️


▪️वाऱ्याचे खणण कार्य (Erosional Work)

➤ अपवहन

➤ अपघर्षण

➤ संधर्षण


▪️ क्षरणामुळे तयार होणारे भूविशेष –

➤ भूछत्र खडक

➤ इन्सेलबर्ग

➤ यारदांग

➤ भूस्तंभ

➤ द्वीपगिरि


▪️वाऱ्याचे निक्षेपण कार्य

➤ वालुकागिरी (Dunes)

➤ लोएस क्षेत्र


4) कार्स्ट प्रदेशातील भूरूपे (Karst Landforms)

➤ चुनखडी प्रदेशातील क्षरण व विदलनामुळे निर्माण

▪️सामान्यतः येणारी कार्स्ट भूरूपे —

➤ चुनखडी गुहा

➤ स्टॅलेक्टाइट

➤ स्टॅलेग्माइट

➤ कार्स्ट दरी

➤ सिंकहोल

➤ उवाला

➤ ड्राय व्हॅली


5) सागरी लाटा / किनारी प्रक्रियेमुळे निर्माण होणारे भू-आकार 🌊

➤ सागरकिनारा — किनाररेषा — सागरतट


▪️सागरतटाचे प्रकार

➤ अग्रतट

➤ पश्चतट


▪️क्षरणामुळे तयार होणारे भूरूपकार

➤ विरखंडित सागररेषा

➤ कडा / चबुतरे (Cliffs)

➤ सागरकाठाची गुहा (Sea Caves)

➤ नैसर्गिक चिमणी (Blow Hole)

➤ प्रवेशद्वार (Archway)

➤ नैसर्गिक कमानी (Sea Arch)

➤ सागरी स्तंभ (Stacks)


▪️निक्षेपणामुळे तयार होणारे भू-आकार

➤ अपतट दांडा / वाळूचा दांडा (Spit)

➤ लगून

➤ पुळण (Beach)

➤ स्पीट

➤ हुक

➤ लूप

➤ टोमबोलो

आहारशास्त्र (Dietetics)



१) पोषणतत्त्वे

➤ अन्नातील रासायनिक घटक जे योग्य प्रमाणात घेतल्यास शरीराच्या सर्व क्रिया सुरळीत ठेवतात त्यांना पोषणतत्त्वे म्हणतात.

➤ समतोल आहारातील प्रमाण :

▪️ पिष्टमय पदार्थ – ५० ते ७०%

▪️ प्रथिने – १० ते १५%

▪️ स्निग्ध पदार्थ – २० ते ३५%

➤ प्रौढ व्यक्तीस साधारण २४०० कॅलरी ऊर्जा आवश्यक.


२) कर्बोदके / पिष्टमय पदार्थ (Carbohydrates) 🌾

➤ कार्बन + हायड्रोजन + ऑक्सिजन पासून बनलेली संयुगे.

➤ सामान्य सूत्र : Cₙ(H₂O)ₙ

➤ सर्वांत सोपे स्वरूप – ग्लुकोज (त्वरित ऊर्जा).

🔹️उदाहरणे :

➤ माल्टोज = ग्लुकोज + ग्लुकोज (बियामध्ये)

➤ लॅक्टोज = ग्लुकोज + गॅलॅक्टोज (दुधात)

➤ सुक्रोज = ग्लुकोज + फ्रुक्टोज (उसाच्या साखरेत)

➤ सेल्युलोज = ग्लुकोज + ग्लुकोज (वनस्पतींच्या सालीत)

➤ स्टार्च = तांदूळ, गहू, बटाटा इ.

🔹️कार्य :

➤ शरीराला ऊर्जा पुरवणे

➤ प्रथिनांची बचत करणे

➤ स्निग्ध पदार्थांचे पचन सुलभ करणे

➤ सेल्युलोजमुळे मलप्रवृत्ती सुधारते


३) प्रथिने (Proteins) 🧬

➤ कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजनयुक्त संयुगे.

➤ प्रथिने = अमिनो आम्लांची साखळी (एकूण २० अमिनो आम्ले आवश्यक).

➤ क्रियाशील गट : अमिनो (–NH₂) व कार्बोक्झिल (–COOH).

🔹️स्रोत :

➤ डाळी, तेलबिया, मांस, अंडी

🔹️कार्य :

➤ शरीराची वाढ व झीज भरून काढणे

➤ एंझाइम्स, संप्रेरके, प्रतिपिंडे — सर्व प्रथिनांचेच बनलेले


४) स्निग्ध पदार्थ / मेद (Fats) 🧈

➤ कार्बन + हायड्रोजन + ऑक्सिजन, परंतु हायड्रोजनचे प्रमाण जास्त.

➤ ग्लिसेरॉल + स्निग्ध आम्ले = मेद.

🔹️स्रोत :

➤ तेलबिया, वनस्पती तूप, दूध, तूप, लोणी, मांस, कॉड लिव्हर ऑईल

🔹️कार्य :

➤ ऊर्जेचा अंतिम स्रोत

➤ जीवनसत्त्वांचे वाहक

➤ शरीराचे तापमान संतुलित ठेवणे

➤ अंतर्गत अवयवांचे संरक्षण

➤ अन्नाची चव व रुचि वाढवणे

महत्त्वाचे शास्त्रज्ञ



अ) ॲरिस्टॉटल –

➤ याला "जीवशास्त्राचा जनक" म्हणतात.

➤ त्याने वनस्पती व प्राण्यांचे निरीक्षण करून त्यांच्यातील कार्यक्षम भाग जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

➤ त्याने प्रथम प्राण्यांचे वर्गीकरण केले.


ब) थिओफ्रास्टस –

➤ याला "वनस्पतीशास्त्राचा जनक" म्हणतात.

➤ त्याने वनस्पतींच्या जुन्या वास्तव्यावरून (Habitat) आणि आकारावरून प्रथमच वर्गीकरण केले.


क) कार्ल लिनियस –

➤ याला "आधुनिक जीवशास्त्राचा जनक" म्हणतात.

➤ त्याने प्रथमच वनस्पती व प्राण्यांचे शास्त्रीय नामकरण केले.

➤ त्याने वनस्पती व प्राणी यांना नावे देण्याची द्विनाम पद्धती (Binomial Nomenclature) सुरू केली.


ड) क्युआयर –

➤ याला "जीवाश्म शास्त्राचा जनक" म्हणतात.

➤ त्याने प्राण्यांचे अस्थिमुळे साधर्म्य आहे व अस्तित्वात असलेल्या प्राण्यांच्या सांगाड्याच्या तुलनेत अभ्यास केला.


इ) शेलडेन व श्वान –

➤ यांनी "पेशी सिद्धांत" मांडला.

➤ प्रत्येक सजीवाचे शरीर पेशीपासून बनलेले असते.

➤ पेशींना आकार सर्व अवयवांत सारखा असतो.

➤ पेशीद्वारे अनुवांशिक गुण पुढच्या पिढीत संक्रमित केले जातात.


फ) ओपेरिन –

➤ यांनी "सजीवाच्या उत्पत्तीविषयीचा सिद्धांत" मांडला.

➤ चार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीभोवती उष्ण वायू व धातूंचे बाष्प होते.

➤ हायड्रोजन अधिक क्रियाशील होता; त्याने कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजनशी अभिक्रियेतून मिथेन, अमोनिया, पाणी तयार झाले.

➤ ५०°C तापमानावर अल्कोहोल, ग्लिसरॉल, स्निग्ध आम्ल, अमिनो आम्ल, शर्करा, नायट्रोजनयुक्त पदार्थ निर्माण झाले.

➤ यांच्या संयोगातून प्रथिने, स्निग्ध पदार्थ व कर्बोदके तयार झाली.

➤ यांच्या एकत्रिकरणातून प्राथमिक अवस्थेतील पेशी तयार झाली.

➤ यालाच Chemosynthetic theory म्हणतात.


ग) जॉन लॅमार्क –

➤ याने "सजीवाच्या उत्क्रांतीविषयक सिद्धांत" मांडला.

▪️उपयोग-अनुपयोगी नियम:

➤ अवयवाचा अधिक वापर → विकास

➤ उपयोग न केल्यास → ऱ्हास

➤ उदा. जिराफाची मान लांब, सापाचे पाय नष्ट

▪️संपादित गुण:

➤ एका पिढीत मिळालेले गुण पुढील पिढीत संक्रमित होतात.

➤ हे तत्त्व उत्क्रांती पूर्णपणे स्पष्ट करू शकत नाही.


च) चार्ल्स डार्विन –

➤ याला "उत्क्रांतीवादाचा जनक" म्हणतात.

➤ १८५९ मध्ये Origin of Species लिहून "नैसर्गिक निवड सिद्धांत" मांडला.

▪️Struggle for Existence:

➤ सजीवाला अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो.

▪️Survival of the Fittest:

➤ ज्याच्यात सक्षम गुणधर्म आहेत तोच टिकतो.

▪️Natural Selection:

➤ उपयुक्त गुण पुढील पिढीत जातात.


छ) ह्यूगो डी. व्ह्राईस –

➤ याने "उत्परिवर्तन सिद्धांत" मांडला.

➤ नवीन पिढीमध्ये अचानक बदल होणे = उत्परिवर्तन.


ज) जॉन ग्रेगर मेंडेल –

➤ याला "अनुवांशशास्त्राचा जनक" म्हणतात.

➤ १८६६ मध्ये संकरण प्रयोग केले.

➤ संकरित पिढीत प्रभावी गुण उतरतो.

➤ कमजोर गुण सुप्त राहतो व पुढील पिढीत व्यक्त होतो.

आधिवासातील जीवनपद्धती



1) सहजीवन (Symbiosis) 🤝

▪️दोन किंवा अधिक सजीव एकमेकांकडून फायदा घेऊन निर्माण करतात त्या घनिष्ठ संबंधांना सहजीवन म्हणतात.


🔹️उदाहरणे :

▪️लायकेन (दगडफूल)

➤ शैवाल + कवक यांचे सहजीवन.

➤ कवक पाणी व खनिजे पुरवतो; शैवाल अन्न तयार करून देतो.

▪️वाळवीतील ट्रायकॉनिंफा

➤ वाळवीला लाकूड पचविण्यास मदत.

➤ ट्रायकॉनिंफाला सुरक्षित आश्रय.

▪️शिंबीवर्गीय वनस्पती – रायझोबियम

➤ मुळांच्या गाठींमध्ये नायट्रोजन स्थिरीकरण.

➤ वनस्पतींना नायट्रोजनयुक्त संयुगे मिळतात.

▪️जलव्याल (Hydra) – Zoochlorella शैवाल

➤ शैवाल सूर्यप्रकाशातून अन्न देतो.

➤ Hydra संरक्षण व निवासस्थान प्रदान करते.

▪️बाभळीची झाडे – मुंग्या

➤ मुंग्यांना काट्यांमध्ये निवास व अन्न.

➤ मुंग्या झाडांचे संरक्षण करतात.


2) परजीवन (Parasitism) 

▪️एका सजीवाचा लाभ आणि दुसऱ्याचा तोटा होत असल्यास त्या संबंधाला परजीवन म्हणतात.

▪️तोटा होणारा → पोषिंदा (Host)

▪️फायदा घेणारा → परजीवी (Parasite)


🔹️उदाहरणे :

▪️तंबाखूवरील बंबाकू (Aphids)

➤ वनस्पतीचा रस पिऊन जगतात.

➤ वनस्पतीची वाढ कमी होते.

▪️अमरवेल (Cuscuta) – आंबा/कांचन

➤ हिरव्या रंगाचा अभाव; स्वतः अन्न तयार करू शकत नाही.

➤ पोषिंदाच्या वाहिनीतून रस शोषण.

▪️मानवी शरीरातील जंत (Roundworm इ.)

➤ अन्ननलिकेत राहून अन्न शोषून घेतात.

➤ रक्ताल्पता व पोषणतुटी निर्माण होऊ शकते.

29 October 2025

काही महत्त्वाच्या नियुक्त्या सर्व परीक्षांसाठी


◈ सोनाली मिश्रा : रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून नेमणूक. 


◈ डॉ.अजय कुमार : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त. 


◈ भानू प्रताप शर्मा : वित्तीय सेवा संस्था ब्युरोचे  (FSIB) अध्यक्ष. 


◈ उमा कांजीलाल : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नेमणूक. 


◈ अभिजात शेठ : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक. 


◈ एस.महेंद्र देव : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष. 


◈ ॲनालेना बेयरबॉक : संयुक्त राष्ट्र आमसभेच्या पुढील प्रमुख म्हणून निवड. 


◈ डॉ.जेनिफर सिमन्स : सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष. 


◈ दीपक बागला : नीती आयोगाच्या अटल इनोवेशन मिशनचे संचालक म्हणून निवड. 


◈ साहिल किनी : रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. 


◈ नितीन गुप्ता : राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष. 


◈ राजेश कुमार : महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी. 


◈ क्रिस्टी कोव्हेंट्री : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष. 


◈ अनुराधा ठाकूर : आर्थिक व्यवहार विभागाच्या पहिल्या महिला सचिव. 


◈ संजोग गुप्ता : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) मुख्य कार्यकारी अधिकारी. 


◈ सुनील जयवंत कदम : सेबीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती. 


◈ केशवन रामचंद्रन : भारतीय रिझर्व्ह बँकेने कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती.

ज्वालामुखींचे प्रकार (Types of Volcano Eruptions)


1️⃣ हवाईयन (Hawaiian) प्रकार

➤ शांतपणे उफाळणारा ज्वालामुखी — उध्वंसक नसतो.

➤ भेगीय (Fissure) स्वरूपाचा उद्रेक, लाव्हा कमी उंचीचा शंकू तयार करतो.

➤ लाव्हा आम्लारी (Acidic) स्वरूपाचा असतो.

➤ प्रवाही लाव्हामुळे विस्तीर्ण लाव्हा पठारे तयार होतात.

➤ उदाहरण : मौना लोआ (Mauna Loa), मौना केआ (Mauna Kea) — हवाई बेटे.


2️⃣ स्ट्रॉम्बोलीयन (Strombolian) प्रकार

➤ सतत लहान-लहान उद्रेक होत राहतात, त्यामुळे विध्वंस क्षमता कमी असते.

➤ लाव्हा शंकू मध्यम उंचीचा असतो.

➤ लाव्हा आम्लीय (Acidic) स्वरूपाचा असतो.

➤ उद्रेक वेगाने पण सातत्याने होतात — मध्यम तीव्रतेचे स्फोट.

➤ उदाहरण : स्ट्रॉम्बोली ज्वालामुखी (इटली).


3️⃣ वल्कॅनियन (Vulcanian) प्रकार

➤ काही काळ शांततेनंतर अचानक होणारा तीव्र उद्रेक.

➤ त्यामुळे विध्वंसक शक्ती जास्त असते.

➤ उंच लाव्हा शंकू तयार होतो.

➤ गडगडाटी (Noisy) उद्रेक — दाबाखालील लाव्हा भूगर्भातून बाहेर पडतो.

➤ मोठ्या प्रमाणात राख, धूर आणि वायू उत्सर्जन.

➤ उदाहरण : व्हल्कानो बेट (इटली).


4️⃣ पेलियन (Pelean) प्रकार

➤ सर्वाधिक विध्वंसक ज्वालामुखी प्रकार.

➤ अत्यंत आम्लीय (Highly Acidic) लाव्हा असतो.

➤ उंच आणि तीव्र लाव्हा शंकू तयार होतो.

➤ मोठ्या प्रमाणात उष्णता व ऊर्जा उत्सर्जित होते.

➤ राखेचे ढग व गरम वायू प्रवाह (Pyroclastic flows) दूरवर जातात.

➤ उदाहरण : माँट पेली (Mount Pelée), मार्टिनिक (West Indies).

लाव्हामुळे तयार होणारी भूरूपे (Landforms Formed by Lava)


1️⃣ भूअंतर्गत लाव्हा भूरूपे (Intrusive Volcanic Landforms)

✅️ ➤ लाव्हा जमिनीच्या आत थंड झाल्यावर तयार होणारी भूरूपे.

✅️ ➤ यामध्ये खालील रचना आढळतात –

  🔸 बॅथोलिथ (Batholith)

   ➤ पृथ्वीच्या गर्भात मोठ्या खोलीवर थंड झालेला प्रचंड लाव्हाचा थर.

   ➤ हे खडक पर्वताच्या पाया भागात आढळतात.

  🔸 डाईक (Dyke)

   ➤ लाव्हा भेगेतून वर येऊन थंड होतो व उभे स्तंभ तयार करतो.

   ➤ हे उभ्या भेगांमध्ये घुसलेले घनरूप खडकाचे थर असतात.

  🔸 सिल (Sill)

   ➤ लाव्हा आडव्या थरांमध्ये प्रवेश करून थंड झाल्यास तयार होणारे सपाट खडकाचे थर.

  🔸 लॅकॅालिथ (Laccolith)

   ➤ लाव्हा वरच्या थरांना उचलून त्याखाली थंड होऊन तयार झालेली गुमटाकार रचना.

   ➤ यामुळे वरचा प्रदेश थोडा उंच दिसतो.

  🔸 स्टॉक (Stock)

   ➤ बॅथोलिथपेक्षा आकाराने लहान, पण खोलवर तयार होणारी घनरचना.


2️⃣ बाह्य लाव्हा भूरूपे (Extrusive Volcanic Landforms)

✅️ ➤ लाव्हा जमिनीवर बाहेर पडून थंड झाल्यावर तयार होणारी भूरूपे.

✅️ ➤ यामध्ये खालील प्रकार येतात –

  🔸 कॅल्डेरा (Caldera)

   ➤ ज्वालामुखीचा स्फोट झाल्यानंतर त्याच्या मुखाचा भाग कोसळल्याने तयार झालेला मोठा खोल खड्डा.

  🔸 लाव्हा शंकू (Lava Cone)

   ➤ लाव्हा व राखेच्या थरांच्या साचण्याने तयार झालेली शंकूच्या आकाराची रचना.

  🔸 बेसॉल्ट मैदान (Basalt Plain)

   ➤ सतत लाव्हा वाहून आल्याने व थंड झाल्याने तयार झालेली सपाट काळ्या दगडांची मैदानं.

  🔸 पठार (Plateau)

   ➤ लाव्हाच्या अनेक थरांच्या थंड होण्याने तयार झालेली उंच व सपाट भूप्रदेशाची रचना.

   ➤ उदाहरण: दख्खन पठार (Deccan Plateau) — भारतातील सर्वात प्रसिद्ध लाव्हा पठार.

राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे (DPSP)


कलम 36: 

व्याख्या "राज्य" ची व्याख्या (संविधानाच्या भाग 3 प्रमाणे).


कलम 37: 

अंमलबजावणी DPSP कायदेशीररित्या बंधनकारक नसली, तरी शासनासाठी मूलभूत आहेत.


कलम 38: 

सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय प्रस्थापित करणे, असमानता कमी करणे.


कलम 39: 

आर्थिक तत्त्वेसमान उपजीविकेची साधने, संपत्तीचे समान वितरण, लिंग समता, कामगार आणि बालकांचे शोषण टाळणे.


कलम 39A: 

मोफत कायदेशीर सहाय्य आर्थिक कमतरतेमुळे कोणालाही न्याय नाकारला जाऊ नये.


कलम 40: 

ग्रामपंचायतींची स्थापना ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ग्रामीण स्वराज्याला प्रोत्साहन.


कलम 41:

काम, शिक्षण आणि सामाजिक सहाय्यकाम, शिक्षण आणि बेरोजगारी, वृद्धापकाळ, अपंगत्व यामध्ये सहाय्य प्रदान करणे.


कलम 42: 

कामगारांचे संरक्षण कामाच्या न्याय्य आणि मानवीय परिस्थिती, प्रसूती लाभ सुनिश्चित करणे.


कलम 43: 

कामगारांना योग्य वेतन आणि जीवनमान सुनिश्चित करणे; कुटीर उद्योगांना प्रोत्साहन.


कलम 43A: 

कामगारांचा व्यवस्थापनात सहभाग उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग सुनिश्चित करणे.


कलम 44:

एकसमान नागरी कायदा सर्व नागरिकांसाठी एकसमान नागरी कायदा लागू करणे.


कलम 45: 

बालकांचे शिक्षण 14 वर्षांखालील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे.


कलम 46:

मागासवर्गीयांचे संरक्षण अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांचे शैक्षणिक, आर्थिक हितांचे संरक्षण.


कलम 47: 

आरोग्य आणि जीवनमान पोषण, जीवनमान आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे; दारूबंदीला प्रोत्साहन.


कलम 48: 

कृषी आणि पशुसंवर्धन शेती आणि पशुसंवर्धनाचे आधुनिकीकरण; गायींचे संरक्षण.


कलम 48A: 

पर्यावरण संरक्षण , जंगल आणि वन्यजीवांचे संरक्षण आणि सुधारणा.


कलम 49: 

राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाच्या स्मारकांचे संरक्षण.


कलम 50:

न्यायपाल आणि कार्यपाल यांचे विभक्तीकरण लोकसेवा व्यवस्थेत न्यायपाल आणि कार्यपाल यांचे विभक्तीकरण.


कलम 51: 

आंतरराष्ट्रीय शांतता आणि सहकार्य आंतरराष्ट्रीय शांतता, मैत्री आणि कायद्याचा आदर वाढवणे.

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

भारतातील क्रांतिकारी चळवळी: महत्त्वाचे टप्पे (१८७९ – १९१९)



1.🚩 बंगालमधील क्रांतिकारी चळवळ

➤ प्रारंभ (१९०२)

  ➡️ छोट्या क्रांतिकारी गटांची स्थापना — मिदनापूर व कलकत्ता येथील अनुशीलन समिती (प्रमथनाथ मित्र, पुलिन बिहारी दास, बारिंद्रकुमार घोष).

➤ प्रचाराची साधने

  ➡️ १९०६ पासून युगांतर हे क्रांतिकारी साप्ताहिक सुरू झाले.

  ➡️ १९०५–०६ पर्यंत संध्या व युगांतर यांसारख्या वृत्तपत्रांनी क्रांतिकारी दहशतवादाचा पुरस्कार केला.

➤ महत्त्वाच्या घटना

  ➡️ १९०७ — पूर्व बंगालच्या माजी लेफ्टनंट गव्हर्नरवर हल्ल्याचा प्रयत्न.

  ➡️ १९०८ — प्रफुल्ल चाकी व खुदीराम बोस यांनी मुझफ्फरपूरचे मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. खुदीराम बोस यांना फाशी, प्रफुल्ल चाकी यांनी आत्महत्या केली.

  ➡️ १९०८ — अलिपूर बॉम्ब कट प्रकरण : अरविंद घोष, बारिंद्र घोष व इतरांवर खटला.

  ➡️ १९०८ — बऱ्हा डकैती : ढाका अनुशीलनने सरकारी खजिना लुटण्याचा प्रयत्न.

  ➡️ १९१२ — दिल्ली कट : रासबिहारी बोस व सचिन सन्याल यांनी व्हाईसरॉय हार्डिंग यांच्या मिरवणुकीवर बॉम्ब फेकला.

  ➡️ पहिले महायुद्ध (१९१४–१९१८) : जतीन दास व युगांतर गट जर्मन कटात सामील — जर्मनीच्या मदतीने सशस्त्र क्रांतीचा प्रयत्न (अयशस्वी).


2.🦁 महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ

➤ आद्य क्रांतिकारक

  ➡️ १८७९ — वासुदेव बळवंत फडके यांनी रामोशी शेतकरी व गरीब लोकांना एकत्र करून ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र बंड पुकारले. (भारताचा आद्य सशस्त्र क्रांतिकारी उठाव).

➤ जनजागृती

  ➡️ १८९० चे दशक — लोकमान्य टिळक यांनी शिवाजी व गणपती उत्सवांद्वारे तरुणांमध्ये जहाल विचार व देशभक्ती निर्माण केली.

  ➡️ केसरी व मराठा या नियतकालिकांद्वारे ब्रिटिशविरोधी विचारांचा प्रसार.

➤ चाफेकर बंधू

  ➡️ १८९७ — प्लेग कमिशनर रँड व ले. आयर्स्ट यांची पुण्यात चाफेकर बंधूंनी (दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव) हत्या केली. (भारताच्या राजकीय हत्येचे पहिले मोठे क्रांतिकारी कृत्य).

➤ सावरकर आणि अभिनव भारत

  ➡️ १८९९ — विनायक व गणेश सावरकर यांनी मित्र मेळा या गुप्त संस्थेची स्थापना.

  ➡️ १९०४ — मित्र मेळा → अभिनव भारत संघटनेत रूपांतर.

  ➡️ १९०९ — नाशिक कट खटला : अनंत कान्हेरे यांनी जिल्हाधिकारी जॅक्सन यांची हत्या केली.


3.⚔️ पंजाबमधील क्रांतिकारी चळवळ

➤ नेतृत्व आणि प्रचार

  ➡️ लाला लजपत राय, सरदार अजित सिंग, आगा हैदर सय्यद हैदर रझा, भाई परमानंद, लालाचंद ‘फलक’, सुफी अंबाप्रसाद इ. नेत्यांनी ब्रिटिशांविरुद्ध चळवळ चालवली.

  ➡️ सरदार अजित सिंग यांनी भारत माता सोसायटी ची स्थापना केली.

  ➡️ लाला लजपत राय यांचे पंजाबी व अजित सिंग यांचे भारत माता वृत्तपत्रे क्रांतिकारक विचारांचे प्रसारक.

➤ महत्त्वाची घटना

  ➡️ गदर चळवळ (१९१३) : लाला हरदयाल यांनी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे स्थापना केली. उद्देश — ब्रिटिश राजवट उलथविण्यासाठी जगभरातील भारतीयांना एकत्र आणणे.

  ➡️ पहिल्या महायुद्धादरम्यान पंजाबातील क्रांतिकारकांचा क्रांतीचा प्रयत्न.

  ➡️ रासबिहारी बोस यांनी उत्तर भारतातील अनेक क्रांतिकारी कारवायांत पडद्यामागून नेतृत्व केले.

वनस्पतींचे वर्गीकरण


##  मुख्य प्रकार दोन  :

अ) अबीजपत्री (Cryptogamae) 

ब)  बीजपत्री  ( Phanerogame)

--------------=========---------------

अ) अबीजपत्री (Cryptogamae)::

- हे अपुष्प वनस्पती असून यांना बिया येत नाहीत.

-  यांचे तीन विभागात विभाजन करण्यात येते..

1) थॅलोफायटा  ( Thalophyta ) ::

- 'शैवाळाचा विभाग'

- मूळ, खोड, पाने नसतात.

- पाण्यात वाढतात.

* उदाहरण := 

- शैवाळ :: स्पायरोगायरा, कारा, युलोथ्रीक्स,जेलेडीयम, क्लोरेल्ला, कोंड्रस, बट्राकोस्पर्मम.

---------------------------------------------------

2) ब्रायोफायटा ( Bryophyta ) ::

- मुळांऐवजी मुलाभ (Rhuzoid ) असतात. जे वनस्पतींना आधार देतात व अवशोषण करतात.

- उभयचर वनस्पती म्हणून ओळख.

* वर्गीकरण 2 गट ::

i) लिव्हरवार्टस ( हिपॅटेसी )::  

- साधे ब्रायोफायटा

* उदाहरण :: 

रिक्सीया, मर्केन्शीया, पेलीया, लेज्यूनिआ.


ii)माँसेस (मुस्सी ) ::

- प्रगत ब्रायोफायटा

* उदाहरण ::

फ्युनारिया, पॉलीट्रायकम 

--------------------------------------------------

3) टेरिडोफायटा ( Pteridophyta) ::

- अबीजपत्री वर्गातील सर्वात प्रगत व पहिली संवहनी संस्था.

- खरी मुळे, पाने व खोड असलेल्या वनस्पती.

- विकसित वनस्पती

* उदाहरण ::

सिलोटम, इकवीसॅटम, मारसेलिया, नेरीस, ऑडिएन्टम, नेचे, लायकोपोडीअम,

सिलॅजिनेला.

----------------==--------==-----------------

ब) बीजपत्री ( Phanerogamae ) ::

- या बिया येणाऱ्या वनस्पती.

* 2 गटात वर्गीकरण ::


i) अनावृत्तबीजी (Gymnosperms) ::

   - बीयांची निर्मिती होते पण त्या फळामध्ये बंदिस्त नसतात.

- म्हणजे यांना फळे येत नाहीत.

* उदाहरणे ::

पायनस (देवदर), सायकस,पिसिया (ख्रिसमस ट्री ), गिन्कगो बायलोबा.


ii)आवृत्तबीजी वनस्पती ( Angiosperms) :: 

- बिया फळामंध्ये बंदिस्त असतात यांना फळे येतात.

** 2 प्रकार :: 

a) एकबीजपत्री ( monocotyledonous ) ::

- एकाच दलाचे बीज.

* उदाहरणे :: 

कांदा, केळी, बांबू, लसूण, तांदूळ, मका, ज्वारी, गहू.


b) द्विबीजपत्री (Dicotyledonous ) :: 

- दोन दलाचे बीज.

*  उदाहरणे ::

आंबा, पिंपळ, मोहरी,सूर्यफूल, शेंगदाणा.


भारतीय राज्यघटनेचे सर्व भाग

(Parts of the Indian Constitution)

🏛 भाग 1 ते 25 — विषयवार सूची


भाग I (Part I)

कलम (Articles): 1 ते 4

विषय: संघ आणि त्याचे घटक राज्ये (Union and its Territory)

➤ भारत म्हणजे राज्यांचा संघ आहे.

➤ नवीन राज्यांची निर्मिती व सीमाबदल करण्याचे अधिकार संसदेला.


भाग II (Part II)

कलम: 5 ते 11

विषय: नागरिकत्व (Citizenship)

➤ भारताचे नागरिक कोण?

➤ संविधान लागू होताना नागरिकत्वाबाबतच्या तरतुदी.


भाग III (Part III)

कलम: 12 ते 35

विषय: मूलभूत अधिकार (Fundamental Rights)

➤ सहा प्रकारचे अधिकार (14, 19, 21 इ.).

➤ न्यायालयीन अंमलबजावणीसाठी हक्कपत्रे (Writs).


भाग IV (Part IV)

कलम: 36 ते 51

विषय: राज्याच्या धोरणनिर्देशक तत्त्वे (Directive Principles of State Policy)

➤ सामाजिक व आर्थिक न्याय साध्य करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे.


भाग IV-A (Part IV-A)

कलम: 51A

विषय: नागरिकांचे मूलभूत कर्तव्य (Fundamental Duties)

➤ 42वी घटनादुरुस्तीने (1976) समाविष्ट.

➤ एकूण 11 कर्तव्ये.


भाग V (Part V)

कलम: 52 ते 151

विषय: संघ सरकार (The Union)

➤ राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, संसद, सर्वोच्च न्यायालय इत्यादी.


भाग VI (Part VI)

कलम: 152 ते 237

विषय: राज्य सरकार (The States)

➤ राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, विधानमंडळ, उच्च न्यायालय इत्यादी.


भाग VII (Part VII)

विषय: पहिल्यांदा अस्तित्वात असलेले “Part B” राज्ये

➤ नंतर 7वी घटनादुरुस्ती (1956) ने रद्द.


भाग VIII (Part VIII)

कलम: 239 ते 242

विषय: केंद्रशासित प्रदेश (Union Territories)


भाग IX (Part IX)

कलम: 243 ते 243-O

विषय: पंचायत राज (Panchayats)

➤ 73वी घटनादुरुस्ती (1992) ने जोडलेले.


भाग IX-A (Part IX-A)

कलम: 243-P ते 243-ZG

विषय: नगरपालिके (Municipalities)

➤ 74वी घटनादुरुस्ती (1992) ने जोडलेले.


भाग IX-B (Part IX-B)

कलम: 243-ZH ते 243-ZT

विषय: सहकारी संस्था (Co-operative Societies)

➤ 97वी घटनादुरुस्ती (2011) ने जोडलेले.


भाग X (Part X)

कलम: 244 ते 244A

विषय: अनुसूचित व आदिवासी क्षेत्रे (Scheduled and Tribal Areas)


भाग XI (Part XI)

कलम: 245 ते 263

विषय: केंद्र आणि राज्यांमधील संबंध (Relations between Union and States)

➤ विधायी, कार्यकारी व प्रशासकीय संबंध.


भाग XII (Part XII)

कलम: 264 ते 300A

विषय: वित्त, मालमत्ता, कर आणि कर्ज (Finance, Property, Contracts and Suits)


भाग XIII (Part XIII)

कलम: 301 ते 307

विषय: देशातील व्यापार, वाणिज्य आणि आंतरराज्यीय संबंध (Trade and Commerce within the Territory of India)


भाग XIV (Part XIV)

कलम: 308 ते 323

विषय: केंद्र व राज्यातील सेवक (Services under the Union and States)


भाग XIV-A (Part XIV-A)

कलम: 323A ते 323B

विषय: न्यायाधिकरणे (Tribunals)

➤ 42वी घटनादुरुस्तीने (1976) समाविष्ट.

भाग XV (Part XV)

कलम: 324 ते 329A


भाग XVI (Part XVI)

कलम: 330 ते 342

विषय: विशिष्ट वर्गांशी संबंधित विशेष तरतुदी (Special Provisions relating to Certain Classes)

➤ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आणि अँग्लो-इंडियन प्रतिनिधित्वाशी संबंधित तरतुदी.


भाग XVII (Part XVII)

कलम: 343 ते 351

विषय: राजभाषा (Official Language)

➤ हिंदी ही भारताची राजभाषा म्हणून, तसेच इंग्रजीच्या वापराविषयी तरतुदी.


भाग XVIII (Part XVIII)

कलम: 352 ते 360

विषय: आणीबाणी विषयक तरतुदी (Emergency Provisions)

➤ राष्ट्रीय, राज्यीय आणि आर्थिक आणीबाणी संदर्भातील कलमे.


भाग XIX (Part XIX)

कलम: 361 ते 367

विषय: विविध तरतुदी (Miscellaneous)

➤ राष्ट्रपती, राज्यपाल यांना न्यायालयीन संरक्षण इत्यादी.


भाग XX (Part XX)

कलम: 368

विषय: राज्यघटनेतील दुरुस्ती प्रक्रिया (Amendment of the Constitution)

➤ संविधानात बदल करण्याची पद्धत स्पष्ट करणारे एकमेव कलम.


भाग XXI (Part XXI)

कलम: 369 ते 392

विषय: तात्पुरत्या, संक्रमणीय व विशेष तरतुदी (Temporary, Transitional and Special Provisions)

➤ जम्मू-काश्मीर, आसाम, नागालँड आदींसाठी विशेष तरतुदी.


भाग XXII (Part XXII)

कलम: 393 ते 395

विषय: संक्षिप्त नाव, प्रारंभ, हिंदीतील अधिकृत मजकूर व रद्दबातल तरतुदी (Short Title, Commencement, Authoritative Text in Hindi and Repeals)

➤ राज्यघटनेचा प्रारंभ, अधिकृत मजकूर आणि पूर्वीचे कायदे रद्द करण्यासंबंधी तरतुदी.

बहुमताचे प्रकार आणि वापर

 

▪️ साधे बहुमत

▪️ पूर्ण बहुमत

▪️ प्रभावी बहुमत

▪️ विशेष बहुमत

▪️ विशेष बहुमत + साध्या बहुमताने 50% राज्यांची मान्यता


1) साधे बहुमत (Simple Majority)

✅ स्पष्टीकरण :

▪️ उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी 50% पेक्षा जास्त (50% + 1) असे बहुमत संदर्भित करते.

▪️ कार्यशील बहुमत म्हणून देखील साधे बहुमत ओळखले जाते.


💥 उदाहरण :

→ लोकसभेतील सदस्य संख्या : 545

→ अनुपस्थित सदस्य : 45

→ मतदान न करणारे : 100

→ म्हणजे उपस्थित व मतदान करणारे : 400

→ 400 च्या 50% पेक्षा जास्त म्हणजे 200 + 1

→ तर लोकसभेतील साधे बहुमत असेल : 201


✅ वापर / उपयोग :

सर्वसाधारण धन/वित्त विधेयक पारित करण्यासाठी

अविश्वास प्रस्ताव / विश्वास प्रस्ताव / निंदाव्यंजक प्रस्ताव / स्थगन प्रस्ताव पारित करण्यासाठी

उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी लोकसभेत

आर्थिक आणीबाणी लागू करण्यासाठी

राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी

कलम 2 व 3 नुसार नवीन राज्य निर्मिती

संसदेत विधापरिषद निर्मिती / नष्ट करण्यासाठी


2) सर्वकष बहुमत / पूर्ण बहुमत (Absolute Majority)

✅ स्पष्टीकरण :

▪️ सदनाच्या एकूण सदस्य संख्येपैकी 50% पेक्षा जास्त सर्वंकष बहुमत संदर्भित करते.


💥 उदाहरण :

→ लोकसभा सदस्य संख्या : 545

→ तर लोकसभेतील सर्वंकष बहुमत : 545 च्या 50% + 1 = 273


✅ वापर / उपयोग :

सर्वंकष बहुमताचा वापर केंद्र आणि राज्य सदनांमध्ये सहसा होत नाही.

परंतु केंद्र किंवा राज्य सरकारे स्थापनेवेळी या बहुमताचा वापर होतो. (सर्वसाधारण निवडणुकांनंतर)


3) प्रभावी बहुमत (Effective Majority)

✅ स्पष्टीकरण :

▪️ सदनाच्या सदस्य संख्येच्या (रिक्त जागा वगळता) 50% पेक्षा जास्त (50% + 1) संख्या प्रभावी बहुमत संदर्भित करते.

▪️ 50% of the effective strength of the house

▪️ When Indian Constitution mentions "All the then member" that refers to the effective majority.


💥 उदाहरण :

→ लोकसभा सदस्य संख्या : 545

→ रिक्त जागा : 45

→ म्हणजे त्यावेळी सदनाची कार्यक्षम संख्या : 500

→ प्रभावी बहुमत : 500 च्या 50% + 1 = 251


✅ वापर / उपयोग :

उपराष्ट्रतींना पदावरून दूर करण्यासाठी राज्यसभेत वापर (कलम 67b)

लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना पदावरून दूर करणे

राज्य विधानसभेचे व विधान परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना पदावरून दूर करणे


4) विशेष बहुमत (Special Majority)

💥 साधे बहुमत, सर्वंकष बहुमत, प्रभावी बहुमत या व्यतिरिक्त असलेले बहुमत हे विशेष बहुमत प्रकारात येईल.


✅ विशेष बहुमताचे 4 प्रकार आहेत :


💥 प्रकार 1 : कलम 249 नुसार विशेष बहुमत

▪️ सदनातील उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमत

🔸 उदाहरण :

→ राज्यसभा सदस्यसंख्या : 245

→ फक्त 150 सदस्य उपस्थित व मतदान करणारे

→ तर विशेष बहुमत लागेल : 101


✅ वापर / उपयोग :

👉 राज्यसूचीतील विषयांवर कायदा करण्याचा संसदेला अधिकार प्रदान करण्यासाठी


💥 प्रकार 2 : कलम 368 नुसार विशेष बहुमत

▪️ सदनातील एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने (50% + 1) आणि उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने संमत


💥 उदाहरण :

→ लोकसभा सदस्य संख्या : 545

→ एकूण बहुमत (50% + 1) = 273

→ उपस्थित व मतदान करणारे : 500

→ त्यांचे 2/3 = 334


✅ वापर / उपयोग :

घटनादुरुस्ती विधेयके पारित करण्यासाठी

सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर करणे

महालेखापरीक्षक आणि मुख्य निवडणूक आयुक्त यांना पदावरून दूर करणे

राष्ट्रीय आणीबाणीस मान्यता देण्यासाठी दोन्ही गृहात


❇️ विशेष बहुमताचे उर्वरित 2 प्रकार :


💥 प्रकार 3 : कलम 368 नुसार विशेष बहुमत + साध्या बहुमताने 50% राज्यांची मान्यता

▪️ प्रकार 2 नुसार विशेष बहुमत + निम्म्यापेक्षा जास्त राज्यांच्या विधानसभांतील साध्या बहुमताने विधेयक पारित


👉 उदाहरण :

→ प्रकार 2 नुसार विशेष बहुमत

→ 28 राज्यांपैकी 50% + 1 म्हणजे 15 राज्यांची मान्यता


✅ वापर / उपयोग :

संघराज्यीय संरचनेतील बदल होत असलेल्या घटनादुरुस्तीसाठी

उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे स्थान

National Judicial Appointment Commission (NJAC) ही या प्रकारातील दुरुस्तीचे उदाहरण


💥 प्रकार 4 : कलम 61 नुसार विशेष बहुमत

▪️ सदस्यांच्या एकूण संख्येच्या 2/3 बहुमताने

→ लोकसभा : 545 च्या 2/3 = 364 मते

→ राज्यसभा : 245 च्या 2/3 = 164 मते


✅ वापर / उपयोग :

👉 राष्ट्रपतींवरील महाभियोगावेळी हे बहुमत लागते.

रिओ परिषद


🌍 रिओ परिषद व पर्यावरणाशी संबंधित करार

🔹️जागतिक स्तरावर कायद्याच्या शासन विकासासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी जागतिक आराखडा ठरला.

महिला सक्षमीकरण, स्थानिक शासन व बिगर सरकारी संघटनांना यावर भर देतो.

पर्यावरण बचाव, वनसंवर्धन

क) कायदे आणि करार

रिओ परिषदेने यांच्याशी संबंधित ३ कायदेशीर व बंधनकारक करार मांडण्यात आले :


1️⃣ जैविक विविधता अभिसंधी (Convention on Biological Diversity)

➤ सदस्य : १९६

➤ अंमलात : २९ डिसेंबर १९९३

➤ उद्दिष्टे :

▪ जैविक विविधता घटकांचा शाश्वत वापर करणे

▪ उत्कोनीय सोतांचा लाभ न्यायपूर्ण देणे


2️⃣ संयुक्त राष्ट्र पर्यावरण बदलावरील अभिसंधी चौकट (UNFCCC – United Nations Framework Convention on Climate Change)

➤ सदस्य : १९७

➤ अंमलात : २१ मार्च १९९४

➤ उद्दिष्ट :

▪ वातावरणातील हरितगृह वायूंचे (GHG) प्रमाण पर्यावरणाला घातक ठरेल एवढ्या स्तरापेक्षा कमी ठेवणे


3️⃣ संयुक्त राष्ट्रसंघ वाळवंटीकरण प्रतिबंध अभिसंधी (UNCCD – United Nations Convention to Combat Desertification)

➤ सदस्य : १९७

➤ अंमलात : २६ डिसेंबर १९९६

➤ उद्दिष्टे :

▪ वाळवंटीकरण रोखणे

▪ दुष्काळग्रस्तांसाठी लागवडीस प्रोत्साहन देणे

▪ दुर्भिक्षकाळासाठी लागवडीस सहाय्य करणे


🔹️स्पष्टीकरण

➤ १९७२ ची UNEP आणि ब्रुटलँड आयोगाच्या शिफारशीने प्रेरित होऊन १९९२ ला ब्राझीलमधील रिओ डी जानेरो या शहरात पहिली वसुंधरा परिषद भरली. तिलाच रिओ परिषद म्हणतात.

➤ या परिषदेचे शीर्षक होते :


🔹️संयुक्त राष्ट्राची पर्यावरण व विकास परिषद (UNCED – United Nations Conference on Environment & Development)

➤ या परिषदेने ३ आराखडे बनविले :

अ) रिओ घोषणापत्र

▪ विविध देशांच्या आणि समाजाच्या सहकार्याने नवीन आणि समान न्याय देणारी जागतिक भागीदारी निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली.

ब) अजेंडा २१

▪ जून १९९२ ला हा करार संमत झाला.

▪ शाश्वत विकासासाठी आंतरव्यवस्थांना स्थानिक, राष्ट्रीय व प्रादेशिक सहकार्यात कृती आराखडा बनविणे.

४७ वी आसियान शिखर परिषद – मलेशिया (२६ ते २८ ऑक्टोबर २०२५)



१. प्रमुख वैशिष्ट्ये

➤ ४७ वी आसियान शिखर परिषद आणि २२ वी आसियान-भारत शिखर परिषद मलेशियामध्ये आयोजित.

➤ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत व्हर्च्युअल पद्धतीने सहभाग नोंदवला.

➤ मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम हे यजमान.

➤ आसियान देशांसह अमेरिका, चीन, जपान, दक्षिण कोरिया व अन्य प्रमुख भागीदार देशांच्या नेत्यांचा सहभाग.


२. भारताशी संबंधित महत्त्वपूर्ण घोषणा 🇮🇳

➤ नरेंद्र मोदी यांनी २०२६ हे वर्ष "आसियान–भारत सागरी सहकार्य वर्ष" म्हणून साजरे करण्याची घोषणा केली.


३. २०२५ च्या शिखर परिषदेची थीम

➤ "समावेशकता आणि शाश्वतता" (Inclusivity and Sustainability)


४. नवीन सदस्य देशाचा समावेश

➤ २६ ऑक्टोबर २०२५ रोजी तिमोर-लेस्टे (Timor-Leste) ला आसियानचा नवीनतम सदस्य म्हणून अधिकृत मान्यता.

➤ त्यामुळे आसियान समूहात आता एकूण ११ देशांचा समावेश झाला.


५. आसियानचे सदस्य देश (२०२५ नुसार)

➤ ब्रुनेई

➤ कंबोडिया

➤ इंडोनेशिया

➤ लाओस

➤ मलेशिया

➤ म्यानमार

➤ फिलीपिन्स

➤ सिंगापूर

➤ थायलंड

➤ व्हिएतनाम

➤ तिमोर-लेस्टे (नवीन सदस्य)


६. अध्यक्षपदाचे तपशील

➤ २०२५: मलेशिया

➤ २०२६: फिलीपिन्स


७. परिषदेचे महत्त्व

➤ आसियान क्षेत्रातील सागरी सुरक्षा, आर्थिक सहकार्य आणि शाश्वत विकास या विषयांवर भर.

➤ भारत-आसियान संबंध अधिक दृढ करण्यासाठी सागरी भागीदारी आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी या विषयांवर विशेष लक्ष.

चालू घडामोडी :- 28 ऑक्टोबर 2025



◆ रस्त्यांवरील खड्डे आणि खुल्या मॅनहोल्समुळे जीव गमवावा लागल्यास अशा प्रकरणात मृत व्यक्तीच्या वारसांना 6 लाख रुपये, तर अपघातात जखमी झालेल्यांना 50 हजार ते 2.5 लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

◆ भारत पहिल्यांदाच आशिया पॅसिफिक अपघात तपास गट (APAC-AIG) बैठकीचे आणि कार्यशाळेचे आयोजन करत आहे. 

◆ भारतीय वेटलिफ्टर प्रितीस्मिता भोईने बहरीनमधील आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये मुलींच्या 44 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे.

◆ बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाला 'मोंथा' असे नाव थायलंड देशाने दिले आहे. 

◆ प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह यांचे वयाच्या 74 व्या वर्षी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झाले.

◆ दरवर्षी जागतिक स्ट्रोक दिन 29 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.

◆ 20 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर दरम्यान संयुक्त राष्ट्र सप्ताह साजरा करण्यात येतो.

◆ कॅथरीन कॉनोली यांची आयर्लंडच्या राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ माजी न्यायमूर्ती रंजना देसाई यांची आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.

◆ हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि रशियन कंपनी युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन (UAC) ने मॉस्को येथे सुखोई सुपरजेट SJ-100 या, नागरी विमानाच्या निर्मितीसाठी सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी केली. 

◆ हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ही एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी आहे ज्याचे मुख्यालय बेंगळुरू येथे आहे.

◆ जागतिक पोलिओ दिन 2025 ची थीम "पोलिओ संपवा: प्रत्येक मूल, प्रत्येक लसीकरण, सर्वत्र" (End Polio: Every child, every immunization, everywhere) ही आहे.

◆ जागतिक पोलिओ दिन 2024 ची थीम "प्रत्येक मुलापर्यंत पोहोचण्याचे जागतिक ध्येय" ही होती.

28 October 2025

चालू घडामोडी :- 27 ऑक्टोबर 2025



◆ अरुणांक प्रकल्प सीमा रस्ते संघटना (BRO) या संस्थेचा उपक्रम आहे.

◆ भारताने 2025 मध्ये पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवर त्रिसेवा युद्धाभ्यास 'त्रिशूल' सुरू केला आहे. [या युद्धाभ्यासात लष्कर, नौदल आणि 
हवाई दल सहभागी आहेत.]

◆ भारतीय तटरक्षक दलाने (ICG) ICGS अजित आणि ICGS अपराजित या अत्याधुनिक फास्ट पेट्रोल व्हेसल्स 24 ऑक्टोबर 2025 रोजी गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये (GSL) जलावतरण करण्यात आल्या आहेत.

◆ भारतीय स्टेट बँकेला (SBI) न्यूयॉर्कस्थित ग्लोबल फायनान्स कडून 'World's Best Consumer Bank 2025' आणि 'Best Bank in India 2025' हे दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

◆ संयुक्त राष्ट्र (UN) निरस्त्रीकरण सप्ताह दरवर्षी 24 ते 30 ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जातो.

◆ 2025 मध्ये, तिमोर-लेस्टे (पूर्व तिमोर) या देशाला औपचारिकरित्या दक्षिणपूर्व आशियाई राष्ट्रांच्या संघटनेत (ASEAN) अकरावा सदस्य म्हणून सामील करून घेण्यात आले आहे.

◆ स्वस्त आणि मध्यम उत्पन्न गटासाठीच्या घरांसाठी (SWAMIH) इन्व्हेस्टमेंट फंडला वित्त मंत्रालय ने प्रायोजित केले आहे.

◆ अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन (ANRF) ने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि गेट्स फाउंडेशन यांच्या सहकार्याने MAHA MedTech Mission सुरू केले आहे.

◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2026 वर्षाला "आसियान-भारत सागरी सहकार्य वर्ष" म्हणून जाहीर केले.

◆ भारत आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद 2025, 30 ऑक्टोबर 2025 पासून नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे होणार आहे.

◆ संयुक्त राष्ट्र (UN) दरवर्षी 24 ते 31 ऑक्टोबर दरम्यान जागतिक मीडिया आणि माहिती साक्षरता (MIL) सप्ताह साजरा करतो.

◆ जागतिक मीडिया आणि माहिती साक्षरता (MIL) सप्ताहाची 2025 ची थीम "Minds Over AI - MIL in Digital Spaces" आहे.

◆ बंगालच्या उपसागरात तयार झालेले मोंथा चक्रीवादळाला "मोंथा" हे नाव थायलंडने सुचवले होते.

27 October 2025

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

०१) जगात सर्वाधिक वाघ असणारे पहिले तीन देश कोणते ?

- भारत,रशिया,इंडोनेशिया.


०२) कोणत्या संघटनेमार्फत २०२३ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष' म्हणून घोषित केले आहे ?

- संयुक्त राष्ट्र संघ.


०३) 'कोसलाकार' असे कोणाला संबोधले जाते ?

- डॉ.भालचंद्र नेमाडे.


०४) महाराष्ट्रातील सर्वात लहान किल्ला कोणता ?

- तुंग.


०५) राष्ट्रध्वज केव्हा उतरवतात ?

- सूर्यास्ताच्या वेळी.


०१) अमावस्या व पोर्णिमेला येणार्‍या भरतीस कोणती भरती म्हणतात ?

- उधाणाची भरती.


०२) तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणता ?

- निकोटीन.


०३) अवकाशातील तार्‍यांच्या समूहाला काय म्हणतात?

- आकाशगंगा.


०४) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?

- वाघ.


०५) भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?

- वड.


०१) भारत देश कोणत्या खंडात आहे ?

- आशिया.


०२) भारताच्या राष्ट्रध्वजात एकूण किती रंगाचे पट्टे आहेत ?

- तीन-केशरी,पांढरा,हिरवा.


०३) राष्ट्रध्वजावरील केशरी रंग कशाचे प्रतिक आहे ?

- त्याग आणि शौर्याचे प्रतिक.


०४) राष्ट्रध्वजावरील पांढऱ्या रंगातून कोणता संदेश मिळतो ?

- शांततेचा.


०५) राष्ट्रध्वजावरील हिरवा रंग कशाचे प्रतिक आहे ?

- समृद्धीचे प्रतिक


०१) हॉकी इंडियाने भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती केली आहे ?

- क्रेग फुल्टन,दक्षिण आफ्रिका.


०२) महाराष्ट्रातील कोणत्या संताची पदे 'गुरू ग्रंथसाहेब' या शीख धर्मियांच्या धर्मग्रंथात आहेत ?

- संत नामदेव महाराज. 


०३) जागतिक ध्रुवीय अस्वल दिवस केव्हा साजरा केला जातो ?

- २७ फेब्रुवारी.(२०११ पासून)


०४) छत्रपती शिवाजी महाराज कोणता किल्ला जिंकू शकले नाही ?

- जंजिरा किल्ला.


०५) नांदेड जिल्ह्यात एकूण महानगरपालिका किती आहेत ?

- एक.


०१) चिल्का हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

- ओरिसा.


०२) कळसुबाई हे नाव कशाशी संबधित आहे ?

- पर्वत शिखर.


०३) ज्वारीच्या उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो ?

- प्रथम.


०४) चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते ?

- कर्नाटक.


०५) सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

- नर्मदा.


०१) भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले ?

- रवींद्रनाथ टागोर.


०२) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?

- मोर.


०३) शीखांचा मुख्य सण कोणता ?

- बैसाखी.


०४) कोणत्या महापुरुषाला ‘लोहपुरुष’ म्हणतात ?

- सरदार पटेल.


०५) आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो ?

- ८ मार्च.


०१)भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ?

- कमळ.


०२)भारताचा राष्ट्रीय जलचर कोणता आहे ?

- डॉल्फिन.


०३) भारताचे राष्ट्रीय फळ कोणते ?

 - आंबा.


०४) भारताच्या राष्ट्रध्वजाच्या लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर किती आहे ?

- ३:२


०५) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे ?

- हॉकी.


०१) भारतातील पहिला अंतराळवीर कोण ?

- राकेश शर्मा.


०२) अवकाशयात्री पहिली महिला कोण ?

- कल्पना चावला.


०३) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा कोठे घेतली ?

- नागपूर.


०४) भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण ?

- प्रतिभाताई पाटील.


०५) महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे ?

- ९.७ %


०१) टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला ?

- जॉन लोगी बेअर्ड.


०२) भारताची पहिली महिला शासिका कोण होती ?

- रजिया सुलताना.


०३) "अग्निपंख" ( Wings of Fire ) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

- डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम.


०४) जलग्रह असे कोणत्या ग्रहास म्हटले जाते ?

- पृथ्वी.


०५) मासे कशाच्या सहाय्याने श्वास घेतात ?

- कल्ले.


०१) दोन स्वर मिळून तयार होणाऱ्या स्वराला काय म्हणतात ?

- संयुक्त स्वर.


०२) ‘राज्याभिषेक प्रयोग’ हा ग्रंथ कोणी यांनी लिहिला आहे?

- गागाभट्ट.


०३) महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्यास म्हणतात ?

- रायगड.


०४) सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला ?

- अल्बर्ट आईन्स्टाईन.


०५) 'शाकुंतल' हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले ?

- कालिदास.


०१) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो ?

- ८ मिनिटे २० सेकंद.


०२) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात ?

- पांढऱ्या पेशी.


०३) गायत्री मंत्र कोणत्या ग्रंथात लिहिलेला आहे ?

- ऋग्वेद.


०४) 'पंजाब केसरी' म्हणून कोणाला ओळखले जाते ?

- लाला लजपतराय.


०५) सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?

- बुध.


०१) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन कधी असतो ?

- ६ डिसेंबर.


०२) सातही खंडातील सर्वोच्च पर्वत शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला कोण.

- प्रेमलता अग्रवाल.


०३) सर्वात जास्त सौर ऊर्जेचा उत्पादन करणारा देश कोणता ?

- जर्मनी.


०४)डायनामाइट चा शोध कोण लावला.

 - अल्फ्रेड नोबेल.


०५) शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते?

- छोटा मेंदू.


०१)भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते ?

- मौलाना अबुल कलाम आझाद.


०२) महाराष्ट्रातील पहिला १००% साक्षर जिल्हा कोणता आहे?

- सिंधुदुर्ग.


०३)भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते कोण आहेत ?

- रवींद्रनाथ टागोर.


०४) जय जवान, जय किसान, जय विज्ञान हा नारा कोणी दिला ?

- अटलबिहारी वाजपेयी.


०५) माउंट एव्हरेस्ट चढणाऱ्या भारतातील पहिल्या महिलेचे नाव?

- बचेंद्री पाल.


०१) मूकनायक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ?

- डॉ.बाबासाहेब आंबेडकर.


०२) प्रसिद्ध कैलास लेणी कोठे आहे ?

- वेरूळ.


०३) दातांच्या आवरणात सापडणारे क्षार कोणते ?

- फ्लोरिन.


०४) भारतातील सर्वात मोठा खत कारखाना कोठे आहे ?

- सिंद्री.


०५) सर्वात जास्त भूकंप कोणत्या देशात होतात ?

- जपान.


०१) सूर्यापासून सर्वांत जवळ असलेला ग्रह कोणता ?

- बुध.


०२) दौलताबाद किल्ला एकेकाळी कोणत्या नावाने ओळखला जायचा ?

- देवगिरी.


०३) कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असेही संबोधतात.?

- मंगळ.


०४) पृथ्वीवरून चंद्राचा जास्तीत जास्त किती टक्के भाग दिसतो ?

- ५९ टक्के.


०५) चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो ?

- ५० मिनिटे.


०१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात ?

- पांढऱ्या पेशी.


०२) राष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा केला जातो ?

- १२ जानेवारी.


०३) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?

- टंगस्टन.


०४) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?

- न्यूटन.


०५) कावीळ हा आजार शरीरातील कोणत्या अवयवावर परिणाम करतो ?

- यकृत.


०१) 'राष्ट्रीय विज्ञान दिन' केव्हा साजरा केला जातो ?

- २८ फेब्रुवारी.


०२) "काव्यफुले" हा ग्रंथ कोणी लिहला ?

- सावित्रीबाई फुले.


०३) संत गाडगेबाबा यांचा जन्म कोठे झाला ?

- शेंडगाव,जि.अमरावती.


०४) विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका ही योजना कोणी सुरू केली ?

- कर्मवीर भाऊराव पाटील.


०५) कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

- पायगोंडा पाटील.


०१) ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ?

- करनाम मल्लेश्वरी.


०२) जय जवान,जय किसान हा नारा कोणी दिला ?

- लालबहादूर शास्त्री.


०३) अणुऊर्जा आयोगाची स्थापना कोणी केली ?

- पंडित जवाहरलाल नेहरु.


०४) आर्यभट्ट हा भारतीय उपग्रह कधी सोडण्यात आला ?

- १९७५.


०५) अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

- डॉ.होमी भाभा.


०१) बॉर्डर - गावस्कर कसोटी चषक २०२३ भारताने किती फरकाने जिंकला ?

- २ - १ ने.


०२) ऑस्कर पुरस्कार २०२३ प्राप्त सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ?

- एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल एट वन्स.


०३) कोणत्या राज्याने अलीकडे ५४ वर्षांनी संतोष ट्रॉफी जिंकली आहे ? 

- कर्नाटक.


०४) तांदूळ उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ?

- दुसरा.


०५) मेघालय राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

- कोनराड संगमा.


०१) भारत पाकिस्तान या दोन देशात संघर्ष सोडवण्यासाठी १९६६ ला जो करार झाला त्याला कोणता करार म्हणतात ?

- ताश्कंद करार.


०२)भारतात राष्ट्रीय आणीबाणी चा काळ किती वर्ष चालला ?

- दोन वर्ष.(१९७५-१९७७)


०३) लालबहादूर शास्त्री यांचे निधन कधी व कोठे झाले ?

- १९६६,ताश्कंद येथे.


०४) भारताने अणुचाचण्या कोठे केल्या ?

- पोखरण,जि.जैसलमेर राजस्थान.


०५) 'इन्कलाब जिंदाबाद' चा अर्थ काय होतो ?

- क्रांती अमर रहे.


०१)भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत ?

- पाच.


०२) पृथ्वी पेक्षा सूर्य किती पटीने मोठा आहे?

- १३.(तेरा)


०३) अंदमान निकोबार ही बेटे कोणत्या समुद्रात आहेत ?

- बंगालचा उपसागर.


०४) भारतातील सर्वात जास्त लांबीचे धरण कोणते ?

- हिराकुंड.


०५) मानवाने सर्वप्रथम वापरलेला पहिला धातू कोणता ?

- तांबे.


०१) ' देवी ' या रोगावर परिणामकारक लस कोणी शोधून काढली ?

- एडविन जेन्नर.


०२) सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात ?

- ७२.


०३) मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते ?

- ३७ अंश सेल्सिअस.


०४) कोणत्या रक्तगटाचे रक्त हे सर्वांना लागू पडते ?

- ओ.( O )


०५) पोलिओ प्रतिबंधक लस कोणी शोधून काढली ?

- साॅल्क जोनास एडवर्ड.


०१) भारत पाकिस्तान या दोन देशात संघर्ष सोडवण्यासाठी १९६६ ला जो करार झाला त्याला कोणता करार म्हणतात ?

- ताश्कंद करार.


०२)भारतात राष्ट्रीय आणीबाणी चा काळ किती वर्ष चालला ?

- दोन वर्ष.(१९७५-१९७७)


०३) लालबहादूर शास्त्री यांचे निधन कधी व कोठे झाले ?

- १९६६,ताश्कंद येथे.


०४) भारताने अणुचाचण्या कोठे केल्या ?

- पोखरण,जि.जैसलमेर राजस्थान.


०५) 'इन्कलाब जिंदाबाद' चा अर्थ काय होतो ?

- क्रांती अमर रहे.


०१) 'बालकवी' हे कोणाचे टोपण नाव आहे ?

- त्र्यंबक बापूजी ठोंबरे.


०२) हॅलेचा धुमकेतू किती वर्षांनंतर परत दिसतो ?

- ७६ वर्षांनी.


०३) वातावरणातील कोणता वायू अतिनील किरणे शोषून घेतो ?

- ओझोन.


०४) वातावरणातील सर्वांत खालच्या थरास काय म्हणतात ?

- तपांबर.


०५) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ?

- वाघ.


०१) संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे ?

- आळंदी.


०२) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही ?

- मुंबई शहर.


०३) महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते ?

- जायकवाडी.


०४) 'शक्तीस्थळ' हे कोणाचे समाधी स्थळ आहे ?

- इंदिरा गांधी.


०५) 'उपरा' ही कोणाची कादंबरी आहे ?

 - लक्ष्मण माने.




१००० भूगोल प्रश्न

 1) ............... या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते.

   1) सातारा    2) कोल्हापूर    3) कराड      4) महाबळेश्वर

उत्तर :- 3


2) महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली ................ आहे.

   1) भीमा    2) गोदावरी    3) कृष्णा      4) वैनगंगा

उत्तर :- 2


3) योग्य जोडया लावा. 

  धरण      जलाशयाचे नाव

         अ) कोयना      i) शहाजी सागर

         ब) भाटघर      ii) शिवसागर

         क) माणिकडोह    iii) ऑथर सरोवर

         ड) भंडारदरा    iv) येसाजीकंक

    अ  ब  क  ड

           1) i  iv  ii  iii

           2) i  iii  ii  iv

           3) iv  iii  ii  i

           4) ii  iv  i  iii

उत्तर :- 4


4) महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ?

   1) वशिष्ठी    2) तापी      3) भीमा      4) उल्हास

उत्तर :- 3


5) खालील कोणत्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नदीने विशिष्टपणे अर्धवर्तुळाकार आकार घेतल्याने नदीचे तसे नाव पडले आहे ?

   1) देहू      2) आळंदी    3) पंढरपूर    4) नाशिक

उत्तर :- 3


1) खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व  पीके ही ‘दिवस तटस्थ पीके (डे न्युट्ल क्रॉप)’ आहेत

   अ) मका, भात, वाटाणा    ब) गहू, रताळी, भात

   क) वाटाण, कपाशी, गहू    ड) टोमॅटो, वाटाणा, कपाशी

   1) अ व ड    2) ब आणि क    3) कव अ    4) ड फक्त

उत्तर :- 4


2) खालीलपैकी कोणत्या घटकाचा वनस्पतीच्या प्रकाशसंश्लेषण, वाढ व उत्पन्न यासाठी उपयोगी ठरणा-या वित्तंचक निर्मितीवर 

     होतो ?

   1) वा-याचा वेग    2) पालाश    

   3) सूर्यप्रकाश    4) पाण्याचे रेणू

उत्तर :- 3


3) खालीलपैकी कोणते जैविकखत नाही ?

   1) जीवाणू खत    2) शैवाल खत    

   3) हरीत शेणखत    4) वरील सर्व

उत्तर :- 3


4) खालीलपैकी कोणता खतप्रकार हा नियंत्रित स्वरुपात विरघळणा-या खताच्या गटात मोडत नाही ?

   1) आइबीडीयु     2) सीडीयु    

   3) एमडीयु    4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 4


5) बियांमधील तेलांचे प्रमाण, फळांमधील व्हिटॅमिन ‘सी’ चे प्रमाण आणि फळांचा रंग वृध्दिगत करणारे पोषण द्रव्य .................

   1) लोह    2) चुना      3) पालाश    4) स्फुरद

उत्तर :- 3


1) तंबाखू बियाण्याच्या उगवणीकरिता सर्वात अनुकूल तापमान ................... होय.

   1) 20ºC    2) 28ºC      3) 32ºC      4) 25ºC

उत्तर :- 2


2) शाश्वत शेतीची मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत :

   अ) पर्यावरण संतुलन राखणे.    ब) सामाजिक – आर्थिक समता साध्य करणे.

   क) आर्थिक लाभ मिळवणे.

   1) अ व क बरोबर  2) ब व क बरोबर    3) अ व ब बरोबर    4) सर्व बरोबर

उत्तर :- 4


3) सपासप कापणे व जाळणे हे शेतीचे वैशिष्टय खालीलपैकी कोणत्या हवामान विभागात आढळते ?

   1) विषुववृत्तीय पर्जन्य अरण्यांचा प्रदेश    2) भूमध्य हवामानाचा प्रदेश

   3) मोसमी हवामानाचा प्रदेश      4) सूचिपर्णी वृक्षांच्या अरण्यांचा प्रदेश

उत्तर :- 1


4) पृथ्वी व सूर्य यांच्यातील सरासरी अंतरावरील सूर्याचे पृथ्वीवरील प्रचरण सुमारे .................... असते.

   1) 470 W/m²    2) 770 W/m²    3) 1170 W/m²    4) 1370 W/m²

उत्तर :- 4


5) एखाद्या अक्षवृत्तावर एखाद्या ठिकाणी पोहोचणारी सौरशक्ती वर्षात निरनिराळी असते कारण :

   1) ऋतूपरत्वे सूर्यकिरणांनी पृथ्वीच्या पृष्ठभागाशी केलेला कोन बदलतो.

   2) दिवासाची लांबी बदलते.

   3) सूर्यापासूनचे अंतर बदलते.

   4) वरील सर्व

उत्तर :- 4


1) खालीलपैकी कोणते पिके अत्यंत आम्लधर्मीय मृदेस सहनशील आहेत.

   1) एरंड, भात, ओट    2) गहू, भात, वांगी

   3) मका, भात, टोमॅटो    4) वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर :- 1


2) योग्य जोडया लावा.

  वारे      स्थान

         अ) गरजनारे चाळीस    i) 50º द. अक्षवृत्त

         ब) शूर पश्चिमी वारे    ii) 5º उ. ते 5º द. अक्षवृत्त

         क) उन्मत साठ    iii) 40º द. अक्षवृत्त

         ड) निर्वात पट्टा    iv) 60º द. अक्षवृत्त 

    अ  ब  क  ड

           1)  i  iii  iv  ii

           2)  iii  i  iv  ii

           3)  iv  iii  ii  i

           4)  i  ii  iii  iv

उत्तर :- 2


3) खालीलपैकी कोणते एक विधान उंची परत्वे सरासरी तापमानातील होणारी घट बरोबर दर्शविते ?

   1) 1º सें.दर 160 मी. ला    2) 1º सें. दर 170 मी. ला

   3) 1º सें. दर 100 मी. ला    4) 1º सें. दर 260 मी. ला

उत्तर :- 1


4) योग्य जोडया लावा.

  वातावरणाचे थर      उंची

         अ) तापांबर        i) 500 ते 1050 किमी

         ब) स्थितांबर      ii) 16 ते 50 किमी

         क) आयनांबर      iii) 0 ते 16 किमी

         ड) बाह्यांबर        iv) 80 ते 500 किमी

    अ  ब  क  ड

           1)  iii  ii  i  iv

           2)  ii  iv  i  iii

           3)  iii  ii  iv  i

           4)  i  iii  iv  ii

उत्तर :- 3


5) जेव्हा हवामान अंदाजाची उपयुक्तता 3 ते 10 दिवस असते, तो ..................

   1) कमी कालावधीचा हवामान अंदाज    

   2) मध्यम कालावधीचा हवामान अंदाज

   3) जास्त कालावधीचा हवामान अंदाज    

   4) वरील सर्व

उत्तर :- 2


1) खालीलपैकी कोणत्या स्थानिक वा-यांना ‘डॉक्टर वारे’ या नावानेही संबोधिले जाते ?

   1) खारे व मतलई वारे    2) मान्सूनपूर्व वारे

   3) पर्वतीय/ डोंगरी वारे    4) दरी वारे

उत्तर :- 1


2) पृथ्वी सभोवतालचे वातावरण उबदार राहते कारण –

   1) उबदार हवा ग्रीन हाऊस परिणामामुळे बाहेर जात नाही.    2) भूपृष्ठापासून होणारे उष्णतेचे उत्सर्जन.

   3) जैविक इंधन उष्णता बाहेर सोडतात.        4) वनस्पती कार्बनडायऑक्साईडचे शोषण करतात.

उत्तर :- 2


3) सापेक्ष आर्द्रता जेव्हा कमी असते तेव्हा ............................

   1) शुष्क व द्रव तापमानमापक समान तापमान दर्शवितात.

   2) शुष्क आणि द्रव तापमानमापकातील तापमानात जास्त फरक असतो.

   3) जास्त तापमान असेल.

   4) कमी तापमान असेल.

उत्तर :- 2


4) हिवाळयातील ढगाळ रात्री या निरभ्र आकाश ...................... रात्रीच्या तुलनेत जास्त उबदार असतात. कारण :

   1) ढग उष्णतेचे उत्सर्जन पृथ्वीकडे करतात.

   2) ढग शीत लहरी ज्या आकाशातून येतात, त्या सामावून घेऊन पृथ्वीकडे पाठवतात.

   3) ढग पृथ्वीकडून होणा-या उष्णतेचे उत्सर्जन रोखतात.

   4) ढग हे अति उंचीवर असल्याने सूर्याच्या उष्णतेचे शोषण करून उष्णता पृथ्वीकडे पाठवतात.

उत्तर :- 3


5) समुद्र सपाटीपासून वातावरणाची लांबी किती आहे ?

   1) 60,000 ते 80,000 कि.मी    2) 16,000 ते 29,000  कि.मी

   3) 35,000 ते 65,000 कि.मी    4) 10,000 ते 30,000 कि.मी

उत्तर :- 2


1) भूपृष्ठावरील काही पदार्थ, साधारणत: खडक आणि खनिज पदार्थ ................. मुळे प्रतिदिप्तीत होतात किंवा सदृश्य प्रकाशमान 

     होतात.

   1) अवरक्त प्रारण    2) औष्णिक प्रारण    

   3) सूक्ष्मतरंग प्रारण    4) जंबुपार प्रारण

उत्तर :- 4


2) मध्य कटिबंधातील आवर्ताचा व्यास :

   1) उष्ण कटिबंधातील आवर्ताच्या व्यासाइतका असतो.

   2) कधी उष्ण कटिबंधातील आवर्ताच्या व्यासापेक्षाही कमी तर कधी जास्त असतो.

   3) उष्ण कटिबंधातील आवर्ताच्या व्यासापेक्षा जास्त असतो.

   4) उष्ण कटिबंधातील आवर्ताच्या व्यासापेक्षा कमी असतो.

उत्तर :- 3


3) विषुववृत्तीय मैदानात नेहमी येणारा अनुभव

   1) दैनिक तापमान कक्षेत मोठा फरक    2) गडगडाटासह जोरदार पाऊस

   3) वेगवान वारे          4) थंड रात्री

उत्तर :- 2


4) रॉकीजमधील अतिशुष्क व उष्ण वारा म्हणजे :

   1) फॉन    2) लू      3) चिनूक      4) मिस्ट्रल

उत्तर :- 3


5) खालीलपैकी कोणत्या महिन्यात विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा 5 अंशांनी उत्तरेकडे सरकतो ?

   1) जून      2) सप्टेंबर    3) डिसेंबर    4) मार्च

उत्तर :- 1


1) भूपृष्ठाकडे येणा-या सौर ऊर्जेपैकी किती टक्के ऊर्जा ढगांमुळे परावर्तीत होते ?

   1) 27%    2) 34%      3) 51%      4) 17%

उत्तर :- 1


2) अटलांटिक व पॅसिफिक महासागरांप्रमाणे हिंदी महासागरातील सागरी प्रवाहचक्र नियमितपणे व अखंड गतीने कार्यरत राहात 

     नाही, कारण :

   1) 25 अंश उत्तर अक्षवृत्तापलीकडे भुभाग भूखंडाने व्यापलेला आहे.

   2) प्रचलित वा-यांचा समुद्रप्रवाहाच्या दिशेवर परिणाम होतो.

   3) हिंदी महासागरावर ऋतुमानानुसार मोसमी वा-यांची दिशा बदलते.

   4) वरील सर्व

उत्तर :- 4


3) खालील विधाने पहा :

   अ) फिलीपाइन्सच्या किना-यावरील वादळांना टायफून्स म्हणतात.

   ब) व्हिक्टर, कतरीना ही हरीकेन-चक्री वादळाची नावे आहेत.

   क) युएसएच्या फ्लॉरिडा किना-याजवळ निर्माण होणा-या वादळांना टोरनॅडो म्हणतात.

   1) फक्त विधान अ बरोबर आहे.    2) विधाने अ आणि ब बरोबर आहेत.

   3) विधाने ब आणि क बरोबर आहेत.  4) विधाने अ, ब आणि क बरोबर आहेत.

उत्तर :- 4


4) .............. च्या परिणामने इलेक्ट्रोमॅग्नेटिक उत्सजर्नाचे विखरणे वातावरण करत असते.

   1) उत्सर्जनाचा वेग    2) त्याची वारंवारिता

   3) त्याची तीव्रता    4) वरील सर्व

उत्तर :- 4


5) महाराष्ट्र राज्य हे एकूण 9 कृषि हवामान विभागांमध्ये .................. च्या आधारावर विभागलेले आहे.

   1) पर्जन्य, तापमान, मृदा प्रकार व वनस्पती      2) पर्जन्य, तापमान व वनस्पती

  3) पर्जन्य, मृदा प्रकार व वनस्पती        4) पर्जन्य, तापमान व मृदा प्रकार 

उत्तर :- 3


1) ‘जेटस्ट्रीम’ चे गुणधर्म खाली दिलेले आहेत. त्यातील योग्य विधानांचा पर्याय निवडा :

   अ) हे दोन्ही गोलार्धातील वेगवान पश्चिमी वा-यांच्या दरम्यान आढळतात.

   ब) हे विषुववृत्ताच्या तसेच ध्रुवांजवळील भागात आढळतात.

   क) हे वातावरणाच्या खालच्या थरात आढळतात.

   ड) यांचा भूपृष्ठावरील पर्जन्यावर प्रभाव पडत नाही.

   1) अ आणि ब    2) ब आणि क    3) अ आणि क    4) ब आणि ड

उत्तर :- 1


2) एल् निनो वर्षी खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किना-यावर कमी वायू दाबाचा प्रदेश निर्माण होतो ?

   1) ॲटलांटिक    2) पॅसिफिक    3) इंडियन    4) आर्कटिक

उत्तर :- 2


3) भारतीय हवामान खात्याने मान्सून वा-याचे आगमन व निर्गमन यांचा अभ्यास करून चार ऋतू मानलेले आहेत, या ऋतूच्या 

     सोबत कालावधी दिला आहे, यापैकी अचूक पर्याय ‍निवडा.

   अ) नैऋत्य मान्सून काळ  -  जून ते ऑक्टोबर     ब) मान्सून उत्तर काळ  -  ऑक्टोबर ते डिसेंबर

   क) ईशान्य मान्सून काळ  -  जानेवारी ते फेब्रुवारी   ड) मान्सून पूर्व काळ  -  मार्च ते मे

   1) फक्त अ विधान बरोबर आहे.      2) ब आणि क विधाने बरोबर आहेत.

   3) अ, ब आणि क विधाने बरोबर आहेत.    4) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.

उत्तर :- 4


4) भारतीय हवामान वर्गीकरणामध्ये कोपेन या शास्त्राने ‘Amw’ हे अद्यक्षर कशासाठी वापरले आहे ?

   1) निमशुष्क स्टेपी हवामान    2) मोसमी हवामान अल्पकालीन शुष्क हिवाळी

   3) मान्सून शुष्क हिवाळी      4) ध्रुवीय शुष्क हिवाळी

उत्तर :- 2


5) खालीलपैकी कोणत्या घटकावर हवेचे बाष्प धारण करण्याची क्षमता अवलंबून असते ?

   1) हवेचा दाब    2) तापमान    3) वा-याची दिशा    4) सूर्यप्रकाश

उत्तर :- 2


1) गरजणारे चाळीस हे ..................... वारे आहेत ?

   1) ईशान्य – व्यापारी    2) आग्नेय – व्यापारी    

   3) नैऋत्य – प्रतिव्यापारी    4) वायव्य – प्रतिव्यापारी

उत्तर :- 4


2) दिवसातील सर्वाधिक तापमान .............................. या वेळेत असते.

   1) सकाळी 11.00 ते दुपारी 12.00      2) दुपारी 12.00 ते दुपारी 1.00

   3) दुपारी 1.00 ते 2.00        4) दुपारी 2.00 ते 3.00

उत्तर :- 4


3) महाराष्ट्रामध्ये गडगडाटी वादळे ही मान्सूनपूर्व काळात आणि नैऋत्य मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात ...................... या 

     महिन्यांत जास्त येतात.

   1) एप्रिल आणि जुलै    2) एप्रिल आणि मे    

   3) मे आणि जून      4) जून आणि जुलै

उत्तर :- 3


4) खालील पर्यायातून ज्याचा भारतीय मान्सून निर्मितीशी संबंध नाही असा पर्याय निवडा.

   1) हिमालय पर्वत व तिबेटचे पठार यांचे स्थान व विस्तार

   2) व्दीपकल्पीय भारतातील वनांचे प्रमाण

   3) जेट स्ट्रीम वा-यांचे उच्च वातावरणातील चालीय संचलन

   4) हिन्दी महासागर व आशिया खंडांतर्गत भागाचा तापण्याचा व थंड होण्याच्या क्रियेतील तफावत

उत्तर :- 2


5) ज्यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा .............................. टक्के अधिक असतो ते वर्ष पर्जन्याधिक्याचे समजण्यात येते ?

   1) 120    2) 100      

   3) 150    4) 125

उत्तर :- 1


1) खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मान्सून प्रकारचा पाऊस पडत नाही ?

   1) पश्चिम पाकिस्तान    2) फीलीपाईन्स    3) दक्षिण व्हिएतनाम    4) मध्य केनिया

उत्तर :- 4


2) भारताव्यतिरिक्त पुढील प्रदेशामध्ये मोसमी वारे वाहतात :

   अ) आफ्रिकेतील गियानाचा किनारा, उत्तर ऑस्ट्रेलियाचा किनारा

   ब) ब्रह्मदेश, थायलंड, लाओस, कंबोडीया व व्हिएतनाम 

   क) चीन, दक्षिण जपान      ड) संयुक्त संस्थानाचा मेक्सिकोच्या आखातालगतचा भाग

   1) अ, ब, क बरोबर    2) ब, क, ड बरोबर    3) अ, क, ड बरोबर    4) सर्व बरोबर

उत्तर :- 4


3) तापमानाचे उभे वितरण हे ............................ या घटकावर अवलंबून आहे.

   1) अक्षवृत्ते      2) उंची      3) समुद्र सानिध्य      4) सागरी प्रवाह

उत्तर :- 2 


4) जोडया लावा.

   अ) विषुववृत्तीय कमी भाराचा पट्टा    i) या भागातील हवा पृष्ठभागाचे घर्षण व पृथ्वीच्या परिवलनामुळे वर ढकलली जाते.

   ब) मध्य कटिबंधीय जास्त थराचा पट्टा  ii) वर्षभर तापमान 0ºC पेक्षा कमी असते.

   क) उप-ध्रुवीय कमी भाराचा पट्टा    iii) या भागामध्ये वर्षभर सूर्याची किरणे प्रामुख्याने लंबरूप पडतात.

   ड) ध्रुवीय जास्त भाराचा पट्टा    iv) थंड हवा 25º आणि 35º अक्षवृत्तांच्या दरम्यान खाली उतरते.

  अ  ब  क  ड

         1)  i  ii  iv  iii

         2)  iv  ii  iv  iii

         3)  iii  iv  i  ii

         4)  ii  iii  iv  i

उत्तर :- 3


5) खालील विधाने पहा.

   अ) जेट वायुच्या प्रभावामुळे हिवाळयात काश्मिर व हिमाचल प्रदेशात पाऊस आणि हिमालयात बर्फ पडतो.

   ब) हिवाळयात तामिळनाडूमध्ये ईशान्स मान्सून वा-यामुळे पाऊस पडतो.

   क) बंगालमध्ये उन्हाळयात उष्ण हवेचे प्रवाह वाहतात त्यांना कालबैसाखी म्हणतात.

   1) फक्त विधान अ बरोबर आहे.    2) फक्त विधान ब बरोबर आहे.

   3) फक्त विधान क बरोबर आहे.    4) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.

उत्तर :- 4


1) योग्य जोडया लावा :

  वायू      वातावरणातील शुष्क प्रमाण भाग प्रती दशलक्ष

         अ) नायट्रोजन (N2)    i) 0.007ppm

         ब) हेलियम (He)    ii)0.5ppm

        क) ओझोन (O3)    iii) 780,840.0ppm

         ड) हायड्रोजन (H2)    iv) 5.2ppm

    अ  ब  क  ड

           1)  ii  i  iii  iv

           2)  iv  iii  ii  i

           3)  i  ii  iv  iii

           4)  iii  iv  i  ii

उत्तर :- 4


2) खालील विधानांचा विचार करा.

   अ) एल. निनो प्रवाहाच्या वेळी दक्षिण प्रशांत महासागरातील पृष्ठाभागावरील तापमानात वाढ होते.

   ब) वर्ष 2013-14 मध्ये भारतामध्ये भीषण दुष्काळ होता आणि त्यावेळी एल निनो प्रवाह प्रबळ होता.

         वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?

   1) फक्त अ    2) फक्त ब    3) अ आणि ब दोन्हीही    4) अ आणि ब दोन्हीही नाहीत

उत्तर :- 3


3) स्क्वेल / चंडवात (पाऊस व हिम वर्षाबरोबर येणारी वावटळ) ही महाराष्ट्रामध्ये दुर्मिळ आहे, परंतु कधी – कधी ............... 

     प्रसंगी येते. 

   1) किनारपट्टीवर मान्सून पूर्व काळात आणि मान्सून काळादरम्यान अंतर्गत प्रदेशात.

   2) मान्सून काळात किनारपट्टीवर आणि मान्सून पूर्व काळात अंतर्गत प्रदेशात.

   3) मान्सून नंतरच्या काळात किनारपट्टीवर आणि मान्सून काळादरम्यान अंतर्गत प्रदेशात.

   4) मान्सून नंतरच्या काळात किनारपट्टीवर आणि अंतर्गत प्रदेशात.

उत्तर :- 2


4) नॅशनल सेंटर फॉर मोडियम रेंज वेदर फोरकास्टींग (NCMRWF) याची स्थापना .................. साली नवी दिल्लीत झाली.

   1) 1985    2) 1988      3) 1992      4) 1994  

उत्तर :- 2


5) पाणलोट क्षेत्र आधारित जमीन व पाणी संवर्धन योजना मुख्यत: कशावर आधारित असते ?

   1) पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन तंत्रज्ञान

   2) जमीन आणि माती संवर्धन

   3) पिकांचे नियोजन

   4) जमिनीच्या वापराच्या क्षमतेनुसार वर्गवारी करणे

उत्तर :- 1  


1) खालील वातावरणाच्या स्तरांची उंचीनुसार मांडणी करा :

   अ) तपांबर    ब) आयनांबर    क) स्थितांबर    ड) बाह्यांबर

   1) ड, क, ब, अ    2) अ, क, ब, ड    3) अ, ब, क, ड    4) क, ब, अ, ड

उत्तर :- 2


2) सर्वसाधरणपणे उत्सर्जीत सूर्यकिरणांपैकी ................. टक्के सूर्यकिरण पिकाच्या पृष्ठभागावरती शोषले जातात.

   1) 75      2) 79      3) 85      4) 73

उत्तर :- 1


3) जर्मन गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसाहाय्याने ग्रामीण पाणी पुरवठा ‘आपलं पाणी’ प्रकल्प पुढील कोणत्या जिल्ह्यात राबविला

      जात आहे ?

   1) नागपूर-अमरावती-अकोला    2) धुळे-जळगाव-नंदूरबार

   3) सांगली-सातारा-कोल्हापूर    4) पुणे-अहमदनगर-औरंगाबाद

उत्तर :- 4


4) पावसाच्या थेंबामुळे जमिनीचे धुपीवर कोणता मुख्य परिणाम होतो ?

   1) जमिनीच्या कणांची अलिप्तता होऊन त्यामुळे जमिनीची घडण बिघडणे.

   2) पाणी साठयास सुरुवात होणे.

   3) जमिनीतील ओलावा कमी करणे.

   4) जोरात वाहणा-या पाण्यामुळे जमिनीच्या कणांची वाहतुक होते.

उत्तर :- 1


5) पाण्याची वाटप करण्यासंबंधी पाणी पंचायत मॉडेल, विलासराव साळुंखेच्या प्रयत्नाने पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात सुरू 

     करण्यात आले ?

   1) बारामती    2) खेड      3) पुरंदर      4) मावळ

उत्तर :- 3


1) सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी असल्यास खालीलपैकी कशाचा अवलंब करावा ?

   1) जमीन एका हंगामात पडीक ठेवावी.    2) ठिबक आणि तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करावा.

   3) एका आड एक सरी भिजवावी.      4) वरीलपैकी एकही नाही.

उत्तर :- 2


2) भारत सरकारने पाणी वापराबाबत काही निर्देश ठरवून दिले आहेत ? महाराष्ट्रासाठी कोणती जोडी चुकीची आहे ?

   1) महापालिका क्षेत्र – 135 लिटर दर डोई दर दिवशी

   2) ‘अ’ गटातील नगरपालिका – 170 लिटर दर डोई दर दिवशी

   3) ‘ब’ गटातील नगरपालिका – 100 लिटर दर डोई दर दिवशी

   4) ग्रामीण विभाग – 40 लिटर दर डोई दर दिवशी

उत्तर :- 2


3) पाण्यामध्ये वायू विरघळणे ही क्रिया कोणता सिध्दांत वापरून काढतात ?

   1) डारसीज् सिध्दांत    2) हेनरीज् सिध्दांत

   3) ॲव्होगाड्रोज सिध्दांत     4) वरीलपैकी नाही

उत्तर :- 2


4) पिकांना ओलाव्याचा ताण पडलेल्या कालावधी संरक्षक पाणी देण्यासाठी जनसंचयनाची (वॉटर हार्वेस्टिंग) प्रामुख्याने जी आणखी 

     केली जाते त्यास ...................... म्हणतात.  

   1) पावसावरची शेती    2) अपधाव शेती

   3) कोरडवाहू शेती    4) वरील सर्व

उत्तर :- 2


5) अ) समतल बांध पध्दत मुख्यत्वे कमी पावसाच्या प्रदेशात जल संधारणासाठी वापरली जाते.

    ब) ढाळीचे बांध पध्दत जास्त पावसाच्या प्रदेशात जास्त झालेले पाणी बाहेर काढून टाकण्यासाठी वापरली जाते.

         वरील विधानांबाबत खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे  ?

   1) अ बरोबर आणि ब चूक आहे.      2) दोन्ही अ आणि ब बरोबर आहेत.

   3) अ चूक आणि ब बरोबर आहे.      4) दोन्ही अ आणि ब चूक आहे.

उत्तर :- 2


1) जर जमिनीवरून वाहून जाणा-या पाण्याच्या प्रवाहाचा वेग दुप्पट झाल्यास जमिनीची धुप करण्याची शक्ती मूळ वेगाच्या किती 

     पटीने वाढेल ?

   1) एकपट    2) दुप्पट      3) चारपट    4) आठपट

उत्तर :- 3


2) कोणत्या पट्टा पीक पध्दतीमध्ये कडधान्य अथवा गवत यांचे पट्टे शेतामध्ये कायम स्वरुपी ठेवले जातात ?

   1) समतल पट्टा    2) वारा प्रतिबंधक पट्टा  3) वरील दोन्ही    4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 4


3) पृथ्वी वरील पाण्याबाबत काय बरोबर नाही ?

   अ) समुद्रात पृथ्वीवरचे 2/3 पाणी आहे परंतु हे पाणी माणसाला उपयुक्त नाही.

   ब) ताजे पाणी (मीठ नसलेले) केवळ 2.7 टक्के आहे.

   क) केवळ 1 टक्के ताजे पाणी मानवास उपयुक्त आहे.

   ड) सुमारे 70 टक्के ताजे पाणी हिमनद्या व बर्फाच्या स्वरुपात अंटार्टिका, ग्रीनलँड व पर्वतरांगात आहे. त्याच्या ठिकाणामुळे ते 

         दुरापास्त आहे.

   1) ब आणि क    2) क आणि ड    3) ब आणि ड    4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 4


4) कोरडवाहू शेतीमध्ये पीक उत्पादन वाढीसाठी खतांची कार्यक्षमता यामुळे वाढविता येईल :

   अ) माती परीक्षण व मातीची प्रतिक्रिया नुसार खतांचा वापर.

   ब) जमिनीमध्ये बियाण्याच्या 5 से.मी. बाजूला किंवा खाली खत देणे.

   क) पेरणीच्यावेळी स्फुरद आणि पालाश खत वापरणे आणि नत्र खतांचा दोन हप्त्यात विभागून वापर करणे.

   1) अ, ब    2) ब, क      3) अ, क      4) अ, ब, क

उत्तर :- 4

5) तुषार सिंचनाच्या समानता गुणांकावर खालील घटक परिणाम करतात  ?

   अ) तुषार तोटयामधील अंतर    ब) पीक भूमिती

   क) संच चालवण्याच्या कालावधी    ड) वा-याची स्थिती

   1) अ आणि ब    2) अ आणि क    3) अ आणि ड    4) क आणि ड

उत्तर :- 3



1) साठवून ठेवलेल्या पाण्यातील शेवळांची वाढ थांबविण्यासाठी कोणत्या पदार्थाचा मोठया प्रमाणात वापर करण्यात येतो ?

   1) कॉपर सल्फेट      2) शिसे      3) कोबाल्ट    4) कॅडमियम

उत्तर :- 1


2) खालील परिस्थितीत तुषार सिंचन पध्दत चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही ?

   1) वा-याचा जास्त वेग    2) जास्त रोपांची घनता  3) कमी रोपांची घनता  4) उताराची जमीन

उत्तर :- 1


3) प्रवाही जलसिंचनात शेवाळ जे नत्र स्थिरीकरणामुळे स्विकारले जाते, तेच ठिबक सिंचन प्रणालीत मुळीत पसंत केले जात नाही 

     कारण – 

   1) ठिबक सिंचन प्रणाली वापरल्यामुळे शेवाळ नत्र स्थिरीकरण करू शकत नाही.

   2) ठिबक सिंचनाच्या पाईपमध्ये शेवाळ वाढू शकत नाही.

   3) ठिबक तोटया बंद पडू शकतात.

   4) यापैकी काहीही नाही.

उत्तर :- 3


4) महाराष्ट्र सुवर्णजयंती नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा व स्वच्छता योजना :

   अ) महाराष्ट्र सुजल निर्मल अभियानांतर्गत सुरू केलेली आहे.

   ब) अनुसूचित जाती व नवबौध्द कुटुंबांना वैयक्तिक घरगुती नळ जोड व स्वच्छता गृहासाठी ही सुरू केलेली योजना आहे.

   क) या योजनेंतर्गत 75 टक्के अनुदान राज्यसरकार देते तर उर्वरित 25 टक्के रक्कम संबंधित लाभधारक अथवा नागरी स्थानिक 

         संस्थेने खर्च करावी लागते.

   वरीलपैकी कोणती / ते विधान / ने बरोबर आहे / त ?

   1) फक्त अ    2) फक्त अ आणि ब    3) फक्त ब आणि क    4) अ, ब आणि क

उत्तर :- 2


5) समपातळी (कंटूर) बांधाची शिफारस ................... असणा-या भागासाठी आणि ज्या जमिनीमध्ये पाणी झिरपते व 6 टक्के पर्यंत 

     उतार असतो अशा शेत जमिनीत करतात.  

   1) 600 मि.मी. पेक्षा कमी पर्जन्यमान    2) 600 मि.मी. पेक्षा जास्त पर्जन्यमान

   3) 1000 मि.मी. पेक्षा अधिक पर्जन्यमान    4) 700 मि.मी. पेक्षा जास्त पर्जन्यमान

उत्तर :- 1


1) ठिबक सिंचन प्रणालीमध्ये वाळूच्या गाळणीची गरज खालील घटक सिंचनाच्या पाण्यातून काढण्यासाठी होते ?

   अ) शेवाळ    ब) पाण्यात विरघळलेले क्षार    

   क) काडी-कचरा    ड) अतिसुक्ष्म मृदा कण

   1) अ आणि ब    2) अ आणि क    3) ब आणि क    4) क आणि ड

उत्तर :- 2


2) गैबीयनच्या संदर्भात कोणत्या बाबी सत्य आहेत ?

   अ) ते हाताळण्यासाठी लवचिक आहेत.    ब) त्यांचे बांधकाम कमी खर्चाचे असते.

   क) अपधावासाठी ते अपाय असतात.    ड) ते सहज फुटू शकतात.

   1) अ आणि ब    2) ब आणि क    3) अ आणि क    4) अ आणि ड

उत्तर :- 1


3) ............................ जमिनीसाठी तुषार सिंचन उपयुक्त आहे.

   1) खार    2) उथळ व उताराच्या  

   3) आम्लधर्मी    4) अल्कधर्मी

उत्तर :- 2


4) ....................... सांडवा पाणी आडवून पाणी साठवण्यासाठी उपयोगात आणता येत नाही.

   1) आघात    2) आघात प्रवेश    3) घसरणी    4) आपत्कालीन

उत्तर :- 3


5) एप्रिल 2002 मध्ये स्विकारलेल्या राष्ट्रीय जल नितीची ही उद्दिष्टये आहेत :

   अ) जल संसाधनांच्या नियोजनासाठी चौकट तयार करणे.    ब) एकात्मिक जल संसाधनांचा विकास.

   क) उत्तरेतील नद्या दक्षिणेतील नद्यांशी जोडणे.      ड) भूजल व्यवस्थापन.

   1) अ आणि ब फक्त बरोबर आहेत      2) क आणि ड फक्त बरोबर आहेत

   3) अ, ब आणि ड फक्त बरोबर आहेत    4) वरील सर्व बरोबर आहेत

उत्तर :- 3 


1) ................... पिकांसाठी ठिबक सिंचन पध्दत अतिशय उपयुक्त आहे.

   1) अधिक पाण्यामध्ये होणा-या    2) क्षारांना बळी न पडणा-या

   3) कमी उत्पन्न देणा-या      4) फळ

उत्तर :- 4


2) डोंगराळ आणि चढउतार असलेल्या पृष्ठभागाच्या रचनेमध्ये अतिरिक्त पावसाच्या पाण्याच्या संकलन करण्यासाठी कोणत्या 

     प्रकारचा तलाव वापरतात ?

   1) बंधा-याने बांधलेला    2) खोदलेला    

   3) पृष्ठीय      4) वरील सर्व

उत्तर :- 1


3) केंद्रीय जल आयोग हा ......................संबंधी कार्यरत आहे.

   1) भूजल      2) पाण्याची गुणवत्ता    

   3) पृष्ठभागावरील पाणी    4) पाणी पुरवठा व स्वच्छता

उत्तर :- 3


4) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

   अ) धन आयन – विनिमय क्षमता मोन्टरमोरेलोनाइट क्ले खनिजामध्ये जास्त असते.

   ब) पिकातील पानांपासून होणारे बाष्पोणपर्णात्सर्जन बासालीन रोखते.

   1) केवळ अ    2) केवळ ब    

   3) दोन्ही    4) एकही नाही

उत्तर :- 1


5) समान सूर्य किरणोत्सर्गामध्ये, सिंचनाखाली घेतलेल्या पिकाचे उत्पन्न हे समान पाणी पावसामार्फत मिळालेल्या त्याच पिकाच्या 

     उत्पन्ना ............................... असते ?

   1) पेक्षा अधिक    2) एवढे    

   3) पेक्षा कमी    4) पेक्षा अनिश्चित

उत्तर :- 3 


1) पिकाची पाण्याची गरज काढताना सर्वाधिक पीक गुणांक कोणत्या वाढीच्या अवस्थेत असतो ?

   1) प्रजोत्पादन अवस्था    2) रोप अवस्था

   3) जोमदार शाखीय अवस्था  4) पक्वता अवस्था

उत्तर :- 1


2) पाण्याची धूप रोखण्याकरिता कृषीविद्या विषयक कोणकोणत्या उपाय योजना आहेत ?

   अ) पिकाची निवड व जमिनीची मशागत      ब) पट्टा पेर आणि जमिनीवरचे अच्छदान

   क) समतल बांधबंधीस्‍ती आणि वनस्पतीजन्य अडथळे    ड) वरीलपैकी कोणतेही नाही

   1) अ आणि ब फक्त    2) ब आणि क फक्त    

   3) अ आणि क फक्त    4) ड फक्त

उत्तर :- 1


3) ज्या प्रक्रियेमध्ये पावसाचे पाणी तळे, जलाशयामध्ये गोळा करून साठविले जाते आणि ते पिकांना जेव्हा पाहिजे तेव्हा पुरवणी 

     सिंचन म्हणून दिले जाते त्यास .......................... असे म्हणतात.

   1) पाऊस संचयन    2) पाणी संचयन    

   3) संरक्षित सिंचन    4) सिंचन

उत्तर :- 2


4) दोन भिन्न अवस्थांमधील आकर्षणास .......................... असे म्हणतात.

   1) अधेझ्न (Adhesion)      2) कोहीझन (Cohesion)    

   3) प्रतिसारण (Repulsion)    4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 1


5) कमी दर्जाचे / प्रतिचे पाणी सिंचनाच्या ................... या पध्दतीमध्ये वापरले जाऊ शकते.

   1) तुषार सिंचन      2) ठिबक सिंचन    

   3) सरी – वरंबा पध्दत    4) मोकाट पध्दत

उत्तर :- 2


1) भारतामधील बहुतेक सिंचन (कमांड) क्षेत्रामध्ये सिंचनाने ......................... वाढली आहे.

   1) पाणथळ जमिनी    2) भूमिगत उच्चतम पाणी पातळी

   3) क्षारयुक्त जमीन    4) वरील सर्व

उत्तर :- 4


2) झाडांना मॅग्नेशियमचा पुरवठा केल्यास ....................... पुरविणा-या खतांची कार्यक्षमता वाढते.

   1) नत्र      2) स्फुदर      

   3) पालाश    4) वरीलपैकी सर्व

उत्तर :- 2


3) काही वनस्पतीमध्ये पानांच्या कडा किंवा टोक यामधून काही प्रमाणात थेंबांच्या स्वरूपात पाण्याचा –हास होतो. या प्रक्रियेला 

     ................... म्हणतात.

   1) ॲबसॉर्पशन (शोषण)      2) ॲडसॉपर्शन

   3) ऑसमॉसीस (परासरण)    4) गटेशन

उत्तर :- 4


4) वनस्पतीमध्ये पाण्याचा ताण सहन करण्याचा क्षमता ........................ मुळे येते.

   अ) पाणी ग्रहण करणे    ब) पाण्याचे नुकसान कमी करणे

   क) जलसंचय      ड) वरीलपैकी कोणतेही नाही

   1) अ व ब फक्त    2) ब व क फक्त    3) अ, ब व क    4) ड फक्त

उत्तर :- 3


5) पाण्याच्या प्रवाहासोबत कितपत पाणी हे जमिनीत समप्रमाणात विभागले जाते ते .......................... दर्शविते.

   1) पाणी देण्याची कार्यक्षमता    2) पाणी वाटप कार्यक्षमता

   3) पाणी वाहन कार्यक्षमता      4) पाणी साठवण कार्यक्षमता

उत्तर :- 2


1) पृष्ठीय सिंचन पध्दतीची (प्रवाह पध्दती) क्षमता कशी सुधारता येऊ शकते ?

   अ) पाटाचे अस्तरीकरण करून    ब) जमिनीचे योग्य सपाटीकरण करून

   क) मोकाट पध्दतीने पाणी देऊन

   1) अ आणि ब फक्त    2) ब आणि क फक्त

   3) अ आणि क फक्त    4) अ, ब आणि क

उत्तर :- 1


2) खालीलपैकी कोणत्या राज्यात एरंडरीचे उत्पादन अधिक होते ?

   1) गुजरात आणि आंध्रप्रदेश    2) महाराष्ट्र आणि कर्नाटक

   3) तामिळनाडू आणि ओरीसा    4) राजस्थान आणि बिहार

उत्तर :- 1


3) शाश्वत शेतीच्या उद्दीष्ट पूर्तीसाठी कोणत्या शेती पध्दतीचा सहभाग महत्त्वाचा असतो ?

   1) सेंद्रिय शेती        2) कोरडवाहू शेती

   3) पावसावर आधारित शेती    4) चारा – गवत शेती

उत्तर :- 1


4) पडणा-या पावसाच्या संवर्धनासाठी खोल जमिनीत खालीलपैकी कोणती पध्दत अतिशय महत्त्वाची आहे ?

   1) जमिनीच्या वरच्या थरात बदल करणे    2) जमिनीच्या वरच्या थरात विशिष्ट आंतररचना करणे (कॉनफिगरेशन)

   3) खोल नांगरट करणे        4) जमिनीशी उभे आच्छादन करणे

उत्तर :- 2


5) अ) वालुकामय मातीमध्ये चिकन माती पेक्षा जास्त रिकाम्या जागा असतात.

    ब) चिकणमाती वालुकामय मातीपेक्षा जास्त पाणी समावून घेऊ शकते.

   वरील विधानांबाबत खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे ?

   1) अ आणि ब पैकी एकही बरोबर नाही    2) अ बरोबर पण ब चूक आहे

   3) अ चूक पण ब बरोबर आहे      4) दोन्ही अ आणि ब बरोबर आहे

उत्तर :- 3


1) कोणत्या प्रकारच्या मशागतीचा हेतू जमिनींची धूप थांबविण्यासाठी व पिकांची चांगली वाढ होऊन अधिक उत्पादनसाठी आहे ?

   1) धानांच्या ताटांचे बुडरवे, आच्छादन व मशागत    2) शुन्य मशागत

   3) कमीत कमी मशागत          4) प्राथमिक मशागत

उत्तर :- 1


2) खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाच्या प्रस्थापनाला / विकासाला भारत सरकारच्या कृषि मंत्रालयाने हातभार लावला ?

   1) अवर्षण प्रणव क्षेत्र कार्यक्रम (डी.पी.ए.पी.)      

   2) वाळवंट विकास कार्यक्रम (डी.पी.पी.)

   3) कोरड वाहु प्रदेशासाठी राष्ट्रीय पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम (एन.डब्लु.डी.पी.आर.ए.)

   4) बहुव्याप्ती असलेला पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम (काऊडेप)

उत्तर :- 3


3) भारतात मिट्टी बचाओ (माती वाचवा) चळवळीला कुठे सुरवात झाली ?

   1) नागपूर, महाराष्ट्र    2) म्हैसूर, कर्नाटक    

   3) दारभंगा, बिहार    4) होशंगाबाद, मध्यप्रदेश

उत्तर :- 4


4) पिकांना स्फुदराची जास्तीत जास्त उपलब्धता होण्यासाठी जमिनीचा सामू या दरम्यान असतात.

   1) 4.5 – 6    2) 6 – 7    

   3) 7.5 – 8.5    4) 7.0 – 8.5

उत्तर :- 2


5) कमी पावसाच्या प्रदेशातील बागायती जमिनी कशामुळे क्षारयुक्त व चोपण (अल्कली युक्त) होतात ?

   1) कमी प्रमाणात अन्नद्रव्याचा निचरा    2) पीक अवशेषांचा अती वापर

   3) असंतुलीत खतांचा वापर      4) पाण्याच्या बाष्पीभवनामुळे पृष्ठभागातील थरांमध्ये क्षारांची वाढ

उत्तर :- 4


1) पिकांच्या योग्य वाढीसाठी पोयटा (लोम) मातीत, हवा : पाणी : घन पदार्थ........................ प्रमाणात असावेत:

   1) 20:30:50    2) 30:30:40    3) 25:30:45    4) 25:25:50

उत्तर :- 4


2) मध्यवर्ती वाळवंट विभाग संशोधन केंद्र जोधपरू हे कोणत्या संशोधनाशी संबंधित आहे ?

   1) जमीन धुपीचे परिणाम      

   2) पाण्याने होणा-या धुपीचे परिणाम

   3) वा-याने होणा-या धुपीचे परिणाम    

   4) वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर :- 3


3) डोंगराळ प्रदेशात जमिनीची धूप थांबविण्यासाठी बेंच टेरेंसींग सर्वसाधारणपणे या उतारापर्यंत करण्यात येते ........................

   1) 16% ते 33%    2) 3% ते 5%      

   3) >10%      4) 40% ते 45%

उत्तर :- 1


4) जमिनीचा पोत म्हणजे

   1) मातीच्या खनिजांची रचना    2) मातीच्या कणांची रचना

   3) सेंद्रीय पदार्थाची रचना      4) यापैकी काहीही नाही

उत्तर :- 4


5) आम्लधर्मीय जमिनी ................... यांच्या निच-यामुळे तयार होतात ?

   1) पालाश, सोडियम, तांबे, चुना    

   2) मॉलिबडेनम, चुना, मॅग्नेशियम, सोडियम

   3) चुना, मॅग्नेशियम, पालाश, हाइड्रोजन  

   4) चुना, सोडियम, मॅग्नेशियम, पालाश

उत्तर :- 4


1) धूपे बरोबर खालीलपैकी कोणते मुख्य अन्नद्रव्य जास्त प्रमाणात निघून जाते ?

   1) नत्र      2) पालाश    

   3) स्फुरद    4) लोह    

उत्तर :- 3


2) साधारणत: जमिनीची सच्छिद्रता किती असते ?

   1) 20 ते 30%    2) 30 ते 35%    

   3) 30 ते 60%    4) 60 ते 70%

उत्तर :- 3


3) खालीलपैकी कोणते पीक मृदा व पाणी संधारण साधण्यासाठी उपयुक्त आहे ?

   1) मका    2) ज्वारी      

   3) बाजरी    4) चवळी

उत्तर :- 4


4) जमिनीची धूप थांबविण्यासाठी पहिली पायरी म्हणजे.................. थांबविणे.

   1) पाण्याचा प्रवाह    2) वा-याचा वेग

   3) मातीचे विभक्तीकरण    4) झाडांची वाढ

उत्तर :- 3


5) कमी ते मध्यम पावसाच्या भागामध्ये समपातळीत बांध असलेल्या काळया जमिनीवर कोणत्या प्रकारच्या टेरेसिंगचा वापर 

     करतात?

   1) झिंग टेरेसिंग      2) बेंच टेरेसिंग

   3) ग्रेडेड टेरेसिंग      4) वरील सर्व

उत्तर :- 1 


1) ठाळीचे बांध कोणत्या ठिकाणी घेतले जातात ?

   अ) जमीन पाण्याच्या धुपेला कमी ग्रहणशील आहे तेथे    ब) मातीची पारगम्यता कमी आहे तेथे

   क) दलदलीच्या जमिनीत           ड) जास्त उताराच्या जमिनीत

उत्तर :- 3


2) मृदेची सच्छिद्रता (Porosity) जर 50% आहे तर छिद्र गुणोत्तर (void ratio) ......................... इतके असेल.

   1) 0.5      2) 1.0      3) 2.0      4) 5.0

उत्तर :- 2


3) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

   अ) जमिनीची वा-यामुळे होणारी धुप जमिनीची पारगम्यता बदलून गंभीर स्वरुपाची हानी घडवून आणते.

   ब) हिस्टोसोल्स यांनी नैसर्गिक / जैविक मृदा म्हणतात.

   1) केवळ अ    2) केवळ ब    3) दोन्ही      4) एकही नाही

उत्तर :- 2


4) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

   अ) लॅटरीटिक मृदा मोसमी हवामानाच्या प्रदेशात आढळते.

   ब) लॅटरीटिक मृदा लोह, ॲल्युमिनियम, पोटॅश व चुनखडीयुक्त आहेत.

   1) केवळ अ    2) केवळ ब    3) दोन्ही      4) एकही नाही

उत्तर :- 1


5) जमिनीचा उतार ................ टक्केपेक्षा जास्त असतो तेव्हा कंटूर चर तांत्रिकदृष्टया किंवा आर्थिकदृष्टया फायदेशीर ठरत नाहीत.

   1) 10      2) 15      3) 20      4) 25

उत्तर  :- 3


1) चांगल्या पोयटयाच्या मातीत पोयटयाचे प्रमाण साधारण ....................... टक्के असते.

   1) 10-20    2) 20-30    

   3) 30-50    4) 60-75

उत्तर :- 3


2) अपपर्णन हा खालीलपैकी कोणत्या विदारणाचा प्रकार आहे ?

   1) रासायनिक    2) कायिक/भौतिक    

   3) जैविक    4) भस्मीकरण

उत्तर :- 2


3) जास्तीत जास्त जीवाणूंची संख्या जमिनीच्या (मातीच्या) ‘अ’ थरामध्ये का असते ?

   1) मातीची ‘अ’ थरामध्ये जास्त अन्नद्रव्ये असतात.    2) मातीची ‘अ’ थरामध्ये सुपीकता अधिक असते.

   3) मातीची ‘अ’ थरामध्ये जलसंपृक्त असतो.      4) मातीची ‘अ’ थरामध्ये भरपूर सेंद्रीय पदार्थ असतात.

उत्तर :- 4


4) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे  ?

   अ) विम्लधर्मीय आणि क्षारयुक्त विम्‍लधर्मीय जमिनी पुन:प्रापण करण्यासाठी (सुधारण्यासाठी) सल्फर वापरतात.

   ब) क्षारयुक्त जमिनीमध्ये विनिमयात्मक सोडियमची टक्केवारी 15 पेक्षा अधिक असते.

   1) केवळ अ    2) केवळ ब    3) दोन्ही      4) एकही नाही

उत्तर :- 1


5) ‍विधाने वाचून खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

   अ) रेगूर मृदा ही मुख्यत्वे नद्यांच्या खो-यात, पठारी प्रदेशात सापडते.

   ब) जास्त पावसाच्या प्रदेशात तांबडी व जांभी मृदा तर किनारी प्रदेशात करडया रंगाची मृदा आढळते.

   1) विधान अ बरोबर    2) विधान ब बरोबर

   3) दोन्ही विधाने बरोबर    4) दोन्ही विधाने चूक

उत्तर :- 3  


1) माती (मृदा) तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये पदार्थ पाण्याबरोबर वाहत जाऊन जमा होतात ते म्हणजे

   अ) कोलूव्हियम    ब) लॅक्यूस्ट्राइन    क) ॲल्यूव्हीयम    ड) टिल

   1) अ      2) अ व ब    3) क      4) ड

उत्तर :- 3


2) वरून वाहणा-या पाण्यामुळे उताराच्या जमिनीमधून समप्रमाणात पातळ थरामध्ये माती निघून जाणे याला .................... असे 

     म्हणतात.

   1) ओघळपाडी धूप  2) घळई धूप    3) सालकाढी धूप    4) शिंतोडे धूप

उत्तर :- 3


3) दरवर्षी आपल्या देशात अंदाजे किती मातीची धूप होते ?

   1) 12 अब्ज टन    2) 100 अब्ज टन    3) 329 अब्ज टन    4) 120 अब्ज टन

उत्तर :- 1


4) मातीचा .................... गुणधर्म कमी करण्यासाठी ऊसाची मळी मातीमध्ये मिसळली जाते.

   1) क्षार      2) विम्ल      3) अम्ल      4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 2


5) जमिनीमध्ये असणारे पर्याप्त सेंद्रीय पदार्थ किंवा ह्युमस हे जमिनीची ......................... वाढवितात.

   अ) जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता

   ब) अंतर्गलन (जमिनीत पाणी प्रवेश करण्याचा वेग/ दर)

   क) सच्छिद्रता

   1) अ आणि ब फक्त    2) ब आणि क फक्त

   3) अ आणि क फक्त    4) अ, ब आणि क

उत्तर :- 4


1) वालुकामय मातीमध्ये असणारी एकूण रंध्र पोकळी (छिद्रांनी व्यापलेली जागा) ही .........................

   1) चिकणमातीपेक्षा जास्त असते      2) चिकणमातीपेक्षा कमी असते

   3) चिकणमाती इतकीच असते      4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 2


2) व्हर्टीसोलला .......................... असे म्हणतात.

   1) ॲल्यूव्हीएम      2) चेस्टनट    3) रेगूर      4) लॅटोसॉल्स

उत्तर :- 3


3) युनायटेड स्टेटस्‍ डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर यांच्याप्रमाणे मातीमधील मध्यम वाळू कणांचा व्यास ...................... मी.मी. होय.

   1) 0.5 ते 0.25      2) 0.05 ते 0.002    3) 2.00 ते 1.00    4) 1.00 ते 0.50

उत्तर :- 1

4) खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?

   अ) सतलज गंगा खो-यांमध्ये सुपीक गाळाची मृदा आढळते.

   ब) दख्खनच्या पठारावर खोल, मध्यम व उथळ थराची सुपीक काळी मृदा आढळते.

   क) पश्चिम किनारपट्टीला आर्द्र हवामानात जांभी मृदा आढळते.

   ड) व्दीपकल्पीय पठारावर लोहाचा अंश असणारी लाल, तांबूस व पिवळसर मृदा आढळते.

   1) अ आणि ब विधाने बरोबर आहेत.    2) क विधान बरोबर आहे.

   3) अ आणि क विधाने बरोबर आहेत.    4) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.

उत्तर :- 4


5) खाली नमूद केल्यापैकी कोणती मृदा धुपेची कारणे संपूर्णत: मानव निर्मिती आहेत ?

   अ) भूप्रदेशाचा सर्वसाधारण उतार      ब) मृदेचे स्वरूप

   क) जंगलतोड          ड) गवताळ कुरणांचा वाजवी पेक्षा जास्त वापर

   इ) भटकी शेती

   1) वरील सर्व    2) ब, क आणि ड    3) अ, क आणि ड    4) क, ड आणि इ

उत्तर :- 4


1) खाली काही निसर्ग पर्यटन प्रकार आणि त्यांची स्थाने यांच्या जोडया दिल्या आहेत त्यातील अयोग्य जोडी ओळखा.

   1) नदी परिक्रमा – कोलाड    2) आदिवासी निवास – कडूस

   3) भू – भौतिक पर्यटन – सावंतवाडी  4) स्क्युबा ड्रायव्हिंग – तारकर्ली

उत्तर :- 3


2) महाराष्ट्र सरकारने 2006 साली पर्यटन धोरण विकसित केले. खालीलपैकी कोणते विधान या पर्यटन धोरणाचा भाग नाही ?

   अ) करमणूक करामधून सुट        ब) किनारी नियंत्रण कायद्यातून सूट

   क) पाणी आणि विजेचे दर औद्योगिक गटानुसार    ड) मालमत्ता करातून आणि अकृषि करातून सूट

   इ) अविकसित प्रदेशातून सूट

    योग्य पर्याय निवडा:

   1) अ, क आणि इ    2) ब आणि क    3) ब आणि ड    4) फक्त ब

उत्तर :- 4


3) राजीव गांधी खेळ अभियानाबाबत पुढील विधानांपैकी कोणते योग्य नाही ?

   अ) ती एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे.    ब) ती 2014 मध्ये सुरू करण्यात आली.

   क) तिने पंचायत युवा क्रिडा आणि खेळ अभियानाची जागा घेतली.

   ड) ‘युवकात खेळ आयुष्याचा एक मार्ग’ यास प्रोत्साहन देण्यास, खेळांच्या सुविधा सहज उपलब्ध करून देणे व खेळांच्या स्पर्धा 

         भरविणे या बाबी सम्मीलित आहेत.

   इ) सर्वकष क्रीडा केंद्रे या योजनेत बांधली जातील.  फ) स्त्रीयांना स्वत:चे संरक्षण प्रशिक्षण यात सम्मीलित आहे.

   ग) विशेष वर्गासाठी खेळही आयोजित केले जातात असे की उत्तर – पूर्व क्षेत्र खेळ.

   1) इ      2) फ      3) ग      4) वरील तिन्हीपैकी एकही नाही

उत्तर :- 4


4) पुढील दोनपैकी कोणते विधान योग्य आहे ?

   अ) नेलोरी, बेलरी, गुरेजी, केशरी या भारतातील मेंढीच्या जाती आहेत.

   ब) भारतीय लोकर ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत कमी प्रतीची समजली जाते व तिला जाडीभरडी कार्पेट लोकर 

         म्हणतात.

   1) केवळ अ      2) केवळ ब      3) दोन्ही      4) एकही नाही

उत्तर :- 2


5) मलेरिया हा भारत तसेच महाराष्ट्रामध्ये प्रसार पावलेला रोग आहे. मलेरिया बाबत कोणते विधान असत्य आहे ?

   अ) मुंबई ही मलेरियाची राज्यातील राजधानी आहे.

   ब) गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातील दुस-या क्रमांकाचा मलेरिया ग्रस्त जिल्हा आहे.

   क) महाराष्ट्र हे देशात आठव्या क्रमांकाचे मलेरियाग्रस्त राज्य आहे.

   ड) ओरिसा हे भारतातील सर्वाधिक मलेरियाग्रस्त राज्य आहे.

   1) फक्त अ      2) अ, ब आणि ड      3) अ, ब आणि क    4) फक्त क

उत्तर :- 4


1) महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा – वेरूळ लेणी आहेत ?

   1) पुणे      2) अहमदनगर    

   3) औरंगाबाद    4) लातूर

उत्तर :- 3


2) महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे.

   1) 6      2) 4      

   3) 7      4) 9

उत्तर :- 1


3) पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये ......................... चे स्थान आहे.

   1) महाड    2) वाई      

   3) महाबळेश्वर    4) नाशिक

उत्तर :- 2


4) खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते ?

   1) लोणावळा    2) चिखलदरा    

   3) महाबळेश्वर    4) माथेरान

उत्तर :- 2


5) खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही ?

   1) सांगली    2) सातारा    

   3) रायगड    4) रत्नागिरी

उत्तर :- 3


1) जोडया जुळवा.

   अ) सिंधुदुर्ग    1) पेट्रोलियन/ खनिज तेल

   ब) मुंबई    2) औषधी खनिजयुक्त पाणी

   क) गडचिरोली    3) मँगनीज

   ड) ठाणे    4) चुनखडी

   1) अ-4, ब-2, क-1, ड-3      2) अ-3, ब-1, क-4, ड-2

   3) अ-3, ब-2, क-4, ड-1      4) अ-2, ब-1, क-3, ड-4

उत्तर :- 2


2) लोह व ॲल्युमिनिअमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते ?

   1) काळी मृदा    2) गाळाची मृदा    3) जांभी मृदा    4) पिवळसर मृदा

उत्तर :- 3


3) खालीलपैकी कोणती जोडी कृषी विद्यापीठ व गाव यांच्या करिता बरोबर आहे ?

   1) मराठवाडा कृषी विद्यापीठ – राहुरी

   2) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ – अकोला

   3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी विद्यापीठ – परभणी

   4) महात्मा फुले कृषी विद्यापीठ – दापोली

उत्तर :- 2


4) मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर .......................... हे आहे.

   1) कांडला    2) मार्मागोवा    3) हल्दीया    4) न्हावा-शेवा

उत्तर :- 4


5) पर्यावरण व वने मंत्रालय तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या 2009 च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर 

     कोणते ?      

   1) मुंबई    2) ठाणे      3) चंद्रपूर      4) नागपूर

उत्तर :- 3


1) महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने ........................... जिल्ह्यात आढळतात.

   1) सोलापूर    2) अहमदनगर    

   3) जालना    4) अमरावती

उत्तर :- 2


2) माथेरान हे ........................ वस्तीचे उदाहरण आहे.

   1) रेषीय    2) जुळी      

   3) गोलाकार    4) डोंगरमाथा

उत्तर :- 4


3) एखाद्या देशातील व्यक्ती अथवा व्यक्तीसमूह जेव्हा त्याच देशात एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी स्थलांतर करते तेव्हा त्यास 

     .................... स्थलांतर म्हणतात.

   1) सक्तीचे    2) अंतर्गत    

   3) आंतरराष्ट्रीय    4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 2


4) नरनाला किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?

   1) अकोला    2) बुलढाणा    

   3) वाशिम    4) हिंगोली

उत्तर :- 1


5) क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील ........................... क्रमाकांवर देश आहे.

   1) तीन    2) पाच      

   3) सात    4) नऊ

उत्तर :- 3


1) खालीलपैकी कोणते विधान विंध्य प्रणालीला लागू पडत नाही  ?

   1) विंध्य प्रणाली अग्निजन्य खडकांनी बनलेली आहे.

   2) तीची खोली 4000 मीटरपेक्षा जास्त आहे.

   3) या प्रणालीने गंगेचे मैदान व दख्खनचे पठार वेगळे होतात.

   4) ही प्रणाली तांबडया वाळुकाश्मासाठी प्रसिद्ध आहे.

उत्तर :- 1


2) श्रीनगर, लेह व जम्मू एकमेकांना जोडल्या गेल्यास जवळपास कशी आकृती निघेल ?

   1) समभूज त्रिकोण    2) काटकोन त्रिकोण    

  3) सरळ रेषा      4) वरीलपैकी कोणतीही  नाही

उत्तर :- 2


3) खालील विधाने भारतातील हिवाळयातील स्थिती वर्णन करतात.

   अ) उत्तर भारतात कमी तापमान असते.    ब) उत्तर भारतात उच्च दाब असलेला विभाग असतो.

   क) हवेचा दाब उत्तरेकडे कमी होत जातो.    ड) वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात.

   वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

   1) अ, ब, क    2) अ, क, ड    3) अ, ब, ड    4) फक्त क

उत्तर :- 3


4) ......................... हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.

   1) जोग    2) नायगारा    3) कपिलधारा    4) शिवसमुद्र

उत्तर :- 1


5) गुजरात राज्यातील गिर अभयारण्य हे .......................... साठी राखून ठेवण्यात आलेले आहे.

   1) वाघ      2) हत्ती      3) सिंह      4) गेंडा

उत्तर :- 3 


1) जम्मू व काश्मिर या राज्यामधील सलाल जलविद्युत प्रकल्प ....................... या नदीवर आहे.

   1) रावी    2) बियास    3) चिनाब    4) व्यास

उत्तर :- 3


2) जमशेदपूर हे औद्योगिक शहर .......................... या नदीवर वसले आहे.

   1) महानदी    2) सोन      3) सुवर्णरेखा    4) गंगा

उत्तर :- 3


3) .................... हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे.

   1) दिल्ली ते आग्रा    2) मुंबई ते ठाणे

   3) हावडा ते खडकपूर    4) चेन्नई ते रेनीगुंठा

उत्तर :- 2


4) भारतात चहा उत्पादनात ...................... राज्याचा प्रथम क्रमांक आहे.

   1) आसाम    2) बिहार      3) महाराष्ट्र    4) ओरिसा

उत्तर :- 1


5) खालीलपैकी कोणती वाक्ये अर्टेशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत  ?

   1) ही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहे.

   2) अशा विहीरी नैसर्गिक तेल पुरवतात.

   3) या विहीरी नैसर्गिक वायू पुरवतात.

   4) वरील कोणतेही नाही.

उत्तर :- 4


1) 2001 च्या जणगणनेनुसार महाराष्ट्रातले साक्षरता प्रमाण .....................% आहे.

   1) 76.88%    2) 88.76%    3) 71.42%    4) 42.71%

उत्तर :- 1


2) प्रकाशामध्ये (दृश्य)........................ असतात.

   1) लघु लांबीच्या व उच्च वारंवारीता लहरी

   2) दीर्घ लांबीच्या व निम्न वारंवारीता लहरी

   3) लघु लांबीच्या व निम्न वारंवारीता लहरी

   4) दीर्घ लांबीच्या व उच्च वारंवारीता लहरी

उत्तर :- 1


3) पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो ?

   1) सिआल    2) सायमा    3) निफे      4) शिलावरण

उत्तर :- 3


4) खालीलपैकी कोणते मायक्रोफौना आहे ?

   1) बॅक्टेरिया      2) निमॅटोडस्‍    

   3) ॲक्टीनोमायसेटस्‍    4) फंगी

उत्तर :- 2


5) पृथ्वी व सूर्य यांच्यातील सरासरी अंतरावरील सूर्याचे पृथ्वीवरील प्रचरण सुमारे .................. असते.

   1) 470 W/m²      2) 770 W/m²      

   3) 1170 W/m²      4) 1370 W/m²

उत्तर :- 4


1) पाणलोट क्षेत्र आधारित जमीन आणि पाणी संवर्धन योजना मुख्यत: कशावर आधारित असते ?

   1) पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन तंत्रज्ञान    2) जमीन आणि माती संवर्धन

   3) पिकांचे नियोजन        4) जमिनीच्या वापराच्या क्षमतेनुसार वर्गवारी करणे

उत्तर :- 1


2) खालीलपैकी कोणत्या राज्यात एरंडरीचे उत्पादन अधिक होते ?

   1) गुजरात आणि आंध्रप्रदेश    2) महाराष्ट्र आणि कर्नाटक

   3) तामिळनाडू आणि ओरीसा    4) राजस्थान आणि बिहार

उत्तर :- 1


3) खाली काही निसर्ग पर्यटन प्रकार आणि त्यांची स्थाने यांच्या जोडया दिल्या आहेत त्यातील अयोग्य जोडी ओळखा.

   1) नदी परिक्रमा – कोलाड    2) आदिवासी निवास – कडूस

   3) भू – भौतिक पर्यटन – सावंतवाडी  4) स्क्युबा डायव्हिंग – तारकर्ली

उत्तर :- 3


4) महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे ?

   1) सह्याद्री    2) सातपुडा    

   3) मेळघाट    4) सातमाळा

उत्तर :- 2


5) 1 जुलै 1998 रोजी ..................... या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले.

   1) उस्मानाबाद    2) धुळे      

   3) परभणी    4) भंडारा

उत्तर :- 2


1) कोकणचे हवामान ..................... आहे.

   1) कोरडे    2) विषम      

   3) सम      4) थंड

उत्तर :- 3


2) .................. ही वर्धा नदीची उपनदी आहे.

   1) पेनगंगा    2) भीमा      

   3) येरळा    4) पंचगंगा

उत्तर :- 1


3) महाराष्ट्र राज्यात ................ या जिल्ह्यामध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे.

   1) सिंधुदुर्ग    2) गडचिरोली    

   3) औरंगाबाद    4) सोलापूर

उत्तर :- 2


4) पश्चिम महाराष्ट्रातील .................. जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात.

   1) नाशिक    2) पुणे      

   3) कोल्हापूर    4) सोलापूर

उत्तर :- 3


5) महाराष्ट्राच्या पठारावर .................. मृदा आढळते.

   1) क्षारयुक्त    2) वाळुकामय    

   3) काळी    4) जांभी

उत्तर :- 3