Tuesday 18 October 2022

चौथी पंचवार्षिक योजना (Fourth Panchwarshik Scheme)



कालावधी : 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च 1974


मुख्य भार : स्वावलंबन


घोषवाक्य : स्थैर्यासह आर्थिक वाढ


घोषणा : मार्च 1971 च्या संसदीय निवडणुकीच्या वेळी इंदिरा गांधींनी ”गरीबी हटाओ” ही घोषणा दिली.



प्रतिमान : अॅलन व रुद्र यांचे खुले सातत्य प्रतिमान


योजनेचे उपनाव : गाङगीळ योजना


आराखडा आकार : 15.900 कोटी


अपेक्षित वृद्धी दर : 5.5%


प्रत्यक्ष : 3.3%



उद्दिष्ट्ये :


1. स्वावलंबन


2. सामाजिक न्यायासह आर्थिक वाढ


3. समतोल प्रादेशिक विकास


प्राधान्य क्षेत्र :


1. शेती


2. उद्योग


कार्यक्रम :


1. 1973 – अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम


2. 1974 – लघु शेतकरी विकास अभिकरन


3. 1972 – बोकारो पोलाद प्रकल्प


4. 1973 – SAIL


5. 1969 – 14 बँकांचे राष्ट्रीकरण


6. 1967– MRTP कायदा


7. 1973 – FERA कायदा



विशेष घटनाक्रम :


1. 1972 मध्ये साधारण विमा व्यवसायाचा कायदा संमत करून 1 जानेवारी 1973 रोजी भारतीय साधारण विमा मंडळाची स्थापना करण्यात आली.


2. 1972-73 मध्ये पहिल्यांदा भारताचा व्यापार तोल अनुकूल ठरला.


3. 1973 मध्ये परकीय चलन कायदा संमत करण्यात आला.


4. 1973- 1974 मध्ये पहिल्यांदाच नियोजन मंडळाणे दारिद्र्य रेषेचे मोजमाप  कॅलरी च्या स्वरुपात करण्यास प्रारंभ केला.

मूल्यमापन :

– 1971 चे भारत-पाक युद्ध किवा बांग्लादेश – निर्मित युद्ध व त्यामुळे निर्माण झालेला बांग्लादेशी निर्वासिताचा प्रश्न


– 1973 ला पहिलं तेलाचा झटका – तेलाच्या जागतिक किमती 400% ने वाढल्या याला “oil crisis” किवा “तेलाचे संकट” असे म्हणतात.


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

रुपयाचे अवमूल्यन (Devaluation of Rupee) :

अवमूल्यनाचा अर्थ : रुपया परकीय चालनाच्या संदर्भात मागणी व पुरवठ्याच्या आधारे स्वस्त होत असल्यास आपण रुपया घसरत आहे, (Rupee is depreciating) असे म्हणतो.

अवमूल्यनामुळे सुद्धा रुपया परकीय चलनाच्या संदर्भात स्वस्त होत असतो.

मात्र अवमूल्यन सरकारने मुद्दाम घडवून आणलेले असते. अवमूल्यनाव्दारे रुपयाची किंमत परकीय चलनाच्या संदर्भात कमी करणे हा सरकारचा किंवा मध्यवर्ती बँकेचा (RBI) धोरणात्मक निर्णय असतो.


अवमूल्यनाचे परिणाम :


1) आयतीवरील परिणाम : अवमूल्यनामुळे भारत आयात करीत असलेल्या वस्तूंची किंमत भारतात वाढते. आयात महाग झाल्याने आयातदरांची आयातीची प्रवृत्ती कमी होऊन आयातीचे आकारमान कमी होण्याची परिस्थिती निर्माण होते.


 


2) निर्यातीवरील परिणाम : अवमूल्यनामुळे भारत निर्यात करीत असलेल्या वस्तूंची किंमत परदेशात कमी होते. भारतीय वस्तु परदेशात स्वस्त वाटायला लागल्याने परकीय आयातदार भारतीय वस्तूंची अधिक मागणी करायला लागतात. त्यामुळे भारताची निर्यात वाढण्याची परिस्थिती निर्माण होते.



अवमूल्यनाची यशस्वीतता :


अवमूल्यन यशस्वी होण्यासाठी देशाच्या आयात आणि निर्यात वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात लवचिक (highly elastic demand) असावी.


अवमूल्यनाचे प्रयोग :


स्वातंत्र्यप्राप्तिनंतर रुपयाचे तीन वेळा अवमूल्यन घडवून आणण्यात आले होते.

पहिले अवमूल्यन, 1949 –


26 सप्टेंबर 1949 या दिवशी रुपयाचे अमेरिकन डॉलरच्या संदर्भात 30.5 टक्क्यांनी अवमूल्यन घडवून आणण्यात आले. पाउंड स्टर्लिंगच्या संदर्भात हे अवमूल्यन घडवून आणण्यात आले नाही.

अवमूल्यनामुळे एका रुपयाची डॉलरमधील किंमत 30.2 सेंटस वरुन 21 सेंटस पर्यंत कमी झाली. तसेच एका रुपयाची सोन्यातील किंमत 0268601 ग्रॅम्स वरून 0.186621 ग्रॅम्स पर्यंत कमी झाली.

अवमूल्यनामुळे भारताची व्यापार तुट कमी झाली. 1948-49 मध्ये 185.1 कोटी रुपये असलेली व्यापार तूट 1949-50 मध्ये 141.9 कोटी तर 1950-51 मध्ये 49.6 कोटी रुपये एवढी कमी झाली. मात्र हा अनुकूल परिणाम फार काळ टिकला नाही. 1951-52 मध्ये तूट वाढून 237.1 कोटी रुपये झाली.

तत्कालीन अर्थमंत्री – जॉन मथाई


दुसरे अवमूल्यन, 1966 –


6 जून 1966 रोजी रुपयाचे अवमूल्यन अमेरिकन डॉलर व इतर हार्ड यूरोपियन चलनांच्या संदर्भात 36.5 टक्क्यांनी घडवून आणण्यात आले.

या अवमूल्यनामुळे रुपयाचा विनिमय दर 4.76 रुपये प्रती डॉलर वरून 7.50 रुपये प्रती डॉलर असा कमी झाला.

तसेच एका रुपयाची सोन्यातील किंमत 0.186621 ग्रॅम्स वरून 0.118489 ग्रॅम्स पर्यंत कमी झाली.

या अवमूल्यनाची उद्दिष्टे –

1) भारताची हार्ड चलन देशांकडून होणारी आयात कमी करणे.

2) भारताची निर्यात वाढविणे.

3) भारताचा व्यापारतोल कमी करणे.

अवमूल्यनामुळे भारताची निर्यात वाढली मात्र दुष्काळी वर्षामुळे अन्नधान्याची आयात करावी लागल्याने व्यापार तूट अपेक्षेप्रमाणे कमी झाली नाही.

तत्कालीन अर्थमंत्री – सचिव चौधरी



तिसरे अवमूल्यन, 1991 –

जुलै 1991 मध्ये रुपयाचे अवमूल्यन तीन टप्प्यांमध्ये जगातील महत्वाच्या चलनांच्या संदर्भात (डॉलर, पाउंड, मार्क, येन, फ्रँक इ.) घडवून आणण्यात आले.

i) 1 जुलैला 9.5 टक्क्यांनी.

ii) 3 जुलैला 10 ते 10.78 टक्क्यांनी.

iii) 15 जुलैला 2 टक्क्यांनी. तिन्ही टप्पे मिळून रुपयाचे अवमूल्यन सुमारे 20 टक्क्यांनी झाले.

तत्कालीन वित्तमंत्री – डॉ. मनमोहनसिंग.


☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘

तिसरी पंचवार्षिक योजना (Third Panchwarshik Scheme)

कालावधी : 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966.


मुख्य भर : कृषि व मूलभूत उद्योग.


प्रतिमान : महालनोबिस.


योजनेचा खर्च : प्रास्ताविक खर्च – 7500 कोटी रु, वास्तविक खर्च – 8577 कोटी रु.


अपेक्षित वृद्धी दर = 5.6%.


प्रत्यक्ष वृद्धी दर = 2.8%.



उद्दिष्टे :


आर्थिक वाढ – लक्ष्य दर – 5.6%

स्वावलंबी व स्वयंपूर्ण अर्थव्यवस्थेची निर्मिती

रोजगार निर्मिती

संधीची समानता



मुख्य प्राधान्य :


दळणवळण

उद्योग

शेती


योजनेदरम्यान घडलेल्या घटना :


1962 चे चीनशी युद्ध

1965 चे पाकिस्तानशी युद्ध

1965 – 66 चा भीषण दुष्काळ



विशेष घटनाक्रम :


खाघ समस्येच्या समाधानासाठी 1964 – 65 मध्ये सधनकृषि क्षेत्र कार्यक्रम सुरू करण्यात आला.

1965 मध्ये प्रो. दातवाला यांच्या अध्यक्षतेखालीकृषि मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली.

1966 भारतीय अन्न महामंडळ स्थापना करण्यात आली.

1964 मध्ये IDBI तसेच UTI ची स्थापना करण्यात आली.



मूल्यमापन :


अन्नधान्याचे उत्पादन 82 दशलक्ष टनाहून 72 लक्ष टनापर्यंतकमी झाले.

1966- 67 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न 4.2% ने कमी झाले.

भारतीय अर्थव्यस्ता दिवाळखोर बनली.

भारताला मदतीसाठी IMF कडे जावे लागले.

आत्तापर्यंत सर्वाधिक अपयशी ठरलेली योजना आहे.


🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

Latest post

चालू घडामोडी :- 17 मार्च 2024

◆ काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे. ◆ 2025 मध्ये चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान ...