Saturday 7 September 2019

तिसरे अफगाण युद्ध : (१९१९).

● पहिल्या दोन युद्धांत इंग्रजांनी अफगाणिस्तानावर स्वारी केली होती. तिसऱ्या वेळी मात्र अफगाणिस्तानने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले.

● अमीर अमानुल्ला  याने अफगाण लोकांच्या दडपणामुळे १९१९ च्या एप्रिल महिन्यात ब्रिटिश प्रदेशावर आक्रमण केले.
हे युद्ध फक्त दोनच महिने चालू होते.

● अफगाण लोकांनी खैबर खिंडीतून पेशावरच्या परिसरात हल्ले केले. इंग्रजांनी विमानासारख्या आधुनिक साधनांचा वापर केल्यामुळे ते यशस्वी झाले.

● १९१९ च्या नोव्हेंबर महिन्यात तह झाला. अफगाणिस्तानला परराष्ट्रीय धोरणाच्या बाबतीत स्वातंत्र्य मिळाले.

● इंग्रजांकडून अमीराला मिळणारे आर्थिक साहाय्य बंद झाले. या युद्धानंतर इंग्रज अफगाण संबंध सुधारले.

पहिले अफगाण युद्ध : (१८३८–१८४२).

● अफगाणिस्तानातून रशिया हिंदुस्थानावर स्वारी करील, अशी धास्ती इंग्रजांना वाटत होती.

● त्यातून इराणच्या शाहाने रशियाच्या मदतीने अफगाणिस्तानातील हेरातला १८३७ मध्ये वेढा दिल्यामुळे इंग्रजांना रशियाचे आक्रमण होणार, याची खात्री वाटली व त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न चालू केले.

● याच सुमारास रणजितसिंगाने घेतलेला पेशावर प्रांत परत जिंकून घेण्यासाठी अफगाणिस्तानच्या दोस्त महंमदाने इंग्रजांकडे मदत मागितली. इंग्रजांनी नकार दिल्यामुळे दोस्त महंमद रशियाकडे गेला.

● आपल्या वर्चस्वाखाली राहील असा अमीर अफगाणिस्तानात असावा, म्हणून गव्हर्नर जनरल ऑक्लंडने रणजितसिंग व शाह शुजा यांबरोबर त्रिपक्षीय तह करुन शाह शुजाला अफगाणिस्तानचे अमीरपद देण्याचे ठरविले.

● दरम्यान १८३८ मध्ये हेरातचा वेढा उठला होता. तरीही ऑक्लंडने शाह शुजाला गादीवर बसविण्यासाठी सर जॉन किन व सर कॉटन यांना सैन्य देऊन काबूलास रवाना केले.

● सिंधच्या अमीराचा विरोध असतानाही इंग्रज सैन्याची एक तुकडी फिरोझपूरहून सिंध, बोलन खिंड, बलुचिस्तान या मार्गाने कंदाहार येथे पोहचली.

● शाह शुजाचा मुलगा तैमूर याच्या नेतृत्वाखाली शीख सैनिक व इंग्रज अधिकारी वॉड यांची दुसरी तुकडी पंजाब, पेशावर, खैबरखिंड या मार्गाने कंदाहारला पोहोचली.

● इंग्रजांनी १८३९ च्या एप्रिल महिन्यात कंदाहार, जुलैत गझनी आणि ऑगस्टमध्ये काबूल घेतले. दोस्त महंमद बूखाऱ्याला पळाला. त्यानंतर इंग्रजांनी त्याला कलकत्त्यात कैदेत ठेवले.

● इंग्रजांनी शाह शुजाला गादीवर बसवून त्याच्या संरक्षणासाठी तेथे फौज ठेवली. त्यामुळे अफगाण चिडले.

● दोस्त महंमदाचा मुलगा अकबरखान याने बंड करून १८४१ मध्ये बर्न्स, मॅकनॉटन व इतर अधिकारी यांचे खून केले.

● त्यानंतर मेजर हेन्री पॉटिंजर आला. त्याने पूर्वी झालेला तह अंमलात आणून जलालाबाद, गझनी व कंदाहार ही स्थळे सोडून देण्याचे ठरविले. परत जाणाऱ्या इंग्रजांची अफगाणांनी खैबर खिंडीत कत्तल केली. बाहेरूनही मदत मिळण्यास इंग्रजांना अडचण पडू लागली.

● गव्हर्नर जनरल नॉर्थब्रुकने सैनिकांना माघार घेण्यास सांगितले. अखेरीस खजिना व तोफा अफगाणांच्या स्वाधीन करून इंग्रजांनी माघार घेतली.

● या युद्धामुळे इंग्रजांचा काहीच फायदा झाला नाही. ज्या शाह शुजासाठी इंग्रजांनी अफगाणिस्तानात सैन्य पाठविले, त्याचाच अफगाणांनी खून केला.

● ऑक्लंडच्या आक्रमक धोरणामुळे निष्कारण पैसा खर्च होऊन २०,००० लोक मृत्युमुखी पडले.

दुसरे अफगाण युद्ध : (१८७५–१८७९).

● इंग्लंड व रशिया यांत अफगाणिस्तानात आपापले वर्चस्व स्थापन करण्याची स्पर्धा होती. यातूनच दुसरे अफगाण युद्ध उद्भवले.

● वारसाहक्काच्या भांडणाचा निकाल लागून १८६८ मध्ये शेरअली हा अमीर झाला.

● रशियाचे मध्य आशियात वर्चस्व वाढल्यामुळे शेरअलीने इंग्रजांकडे मदत मागितली परंतु इंग्रजांच्या धरसोडीमुळे त्याने रशियाबरोबर मैत्रीची याचना केली.

● रशियाचा वकील काबूलला जाताच गव्हर्नर जनरल लॉर्ड लिटनने शेरअलीस आपलाही वकील काबूल येथे ठेवून घेण्याचा आग्रह धरला.

● शेरअलीने ही विनंती नाकारताच गव्हर्नर जनरल लॉर्ड लिटनने त्याविरुद्ध युद्ध पुकारले.

● जनरल रॉबर्ट, जनरल स्ट्यूअर्ट व सॅम ब्राउन हे खैबर खिंडीतून अफगाणिस्तानात पोहोचले.

● इंग्रजांनी कंदाहार घेताच शेरअली रशियाच्या हद्दीत पळाला. त्याचा मुलगा याकूबखान याने इंग्रजांबरोबर १८७९ मध्ये गंदमक येथे तह केला.

● या तहानुसार इंग्रज वकील काबूल येथे रहावयाचा होता. कुर्रम, पिशी आणि तिवी ही ठिकाणे इंग्रजांच्या ताब्यात आली.

● अफगाणांना हा तह मान्य नसल्यामुळे त्यांनी काही इंग्रज अधिकाऱ्यांचे खून केले व याकूबखानला कैद केले. त्याचा भाऊ अयूबखान याने बंड करुन इंग्रज फौजेचा मैवंद येथे पराभव केला.

● शेवटी गव्हर्नर जनरल रिपनने शेरअलीचा पुतण्या अब्दुर रहमान याच्याशी तह करुन दुसरे अफगाण युद्ध थांबविले.

● इंग्रजांनी अमीराकडून खंडणी घेऊन गंमडकच्या तहाने सोडलेला प्रदेश परत मिळविला.

● या युद्धामुळे इंग्रजांचे वर्चस्व अफगाणिस्तानात स्थापन होऊन रशियाच्या आक्रमक धोरणाला पायबंद बसला.

पुढचे १४ दिवस विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल – इस्रो प्रमुख

📌चंद्रावर लँडिंगच्या अंतिम टप्प्यामध्ये असताना विक्रम लँडरचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला

📌 तरी पुढचे १४ दिवस विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल असे इस्रोचे प्रमुख के.सिवन यांनी शनिवारी सांगितले.

📌लँडर बरोबर जो संपर्क तुटला त्यासाठी मिशनच्या शेवटच्या टप्प्यात चुकीच्या पद्धतीने झालेली अंमलबजावणी जबाबदार असल्याचे सिवन म्हणाले.

📌विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटर अंतरावर असताना संपर्क तुटला. शेवटच्या टप्प्यात योग्य पद्धतीने प्रक्रिया पार पडली नाही.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मद्रास हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीश विजया के. ताहिलरमानी यांनी बदलीविरोधात राजीनामा दिला.


✍सुप्रीम कोर्टाच्या कॉलिजीअमने त्यांची बदली मेघालय उच्च न्यायालयात केली होती. त्याच्याविरोधात विजया ताहिलरमानी यांना आपला राजीनामा राष्ट्रपती कोविंद यांच्याकडे पाठवला. राजीनाम्याची एक प्रत सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्याकडे पाठवण्यात आली आहे.

✍न्या. ताहिलरमानी यांची २६ जून २००१ मध्ये मु्ंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक करण्यात आली होती. तर, १२ ऑगस्ट २००८ रोजी मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी त्यांची नेमणूक करण्यात आली होती. न्या. ताहिलरमानी या २ ऑक्टोबर २०२०मध्ये निवृत्त होणार आहेत. मात्र, वर्षभरापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला. न्या. ताहिलरमानी आणि न्या. गीता मित्तल या देशातील २५ उच्च न्यायालयात या दोन महिला मुख्य न्यायाधीशपदी आहेत.

✍सरन्यायाधीश रंजन गोगई यांच्या अध्यक्षतेखालील कॉलेजिअममध्ये न्या. एस.ए. बोबडे, एन.व्ही. रमना, अरुण मिश्रा आणि आर.एफ. नरीमन यांचा समावेश होता. मेघालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. ए.के. मित्तल यांची बदली मद्रास हायकोर्टात करण्यात आली.

ISSF World Cup 2019: विजेते

- Elavenil Valarivan
सुवर्ण पदक: महिला 10 मी रायफल

- अभिषेक वर्मा
सुवर्ण पदक: पुरूष 10 मी पिस्तूल

- मनू भाकर आणि सौरभ चौधरी
सुवर्ण पदक: संयुक्त 10 मी पिस्तूल

- यशस्वीनी देसवाल आणि अभिषेक वर्मा
रौप्य पदक: संयुक्त 10 मी पिस्तूल

- अंजूम मुदगल आणि दिव्यांश पनवर
कांस्य पदक: संयुक्त 10 मी रायफल

- अपूर्वी चंडेला आणि दिपक कुमार
सुवर्ण पदक: संयुक्त 10 मी रायफल

- यशस्वीनी सिंग देसवाल
सुवर्ण पदक: महिला 10 मी पिस्तूल

- संजीव राजपूत
रौप्य पदक: पुरूष 50 मी रायफल 3 Position

- सौरभ चौधरी
कांस्य पदक: पुरूष 10 मी पिस्तूल

वाहतुकीचे नवे नियम त्वरित लागू न करण्याचा पंजाब सरकारचा निर्णय

रस्त्यावरील अपघाती मृत्यू रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरामध्ये 1 सप्टेंबरपासून नवीन मोटार वाहन कायदा लागू केला आहे. नव्या वाहतूक नियमांचा भंग केल्यास वाहनधारकांना अधिक दंड भरावा लागत आहे.

त्यामुळे 5 सप्टेंबर 2019 रोजी पंजाब राज्याने नवीन मोटार वाहन नियम त्वरित लागू न करण्याचा निर्णय घेतला. पंजाबसहित इतरही काही राज्यांनी असा निर्णय घेतला आहे, ज्यात राजस्थान, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, तेलंगणा, ओडिशा आणि गुजरात या राज्यांचा समावेश आहे. दिल्लीने देखील अद्याप नवे नियम अधिसूचित केले नाहीत.

नवे नियम
नव्या मोटार वाहतूक कायद्यातल्या 63 तरतुदी लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना काढली आहे. संसदेच्या दोन्ही सदनात मोटार वाहतूक दुरुस्ती विधेयक संमत करण्यात आले होते. वाहतूक नियमांचा भंग केल्यास आकारला जाणारा दंड आता भरघोस वाढवण्यात आला आहे. यात कमीत कमी म्हणजे 500 रु.पये दंड हा रस्ते नियम तोडण्यासाठी असून जास्तीत जास्त म्हणजे 25 हजार रु.पये दंड आहे तसेच अल्पवयीन मुला-मुलीने वाहन चालवून गुन्हा केल्यास मालक वा पालकाला तीन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे.

🔸रस्ते नियमांचा भंग – जुना दंड: 100 रु., नवीन दंड 500 रु.

🔸प्रशासनाचा आदेशभंग - जुना दंड 500 रु., नवीन दंड 2000 रु.

🔸परवाना नसलेले वाहन चालवणे – जुना दंड: 500 रु., नवीन दंड: 5000 रु.

🔸पात्र नसताना वाहन चालवणे - जुना दंड: 500 रु., नवीन दंड: 10000 रु.

🔸वेगमर्यादा तोडणे – जुना दंड: 400 रु., नवीन दंड: 2000 रु.

🔸धोकादायक वाहन चालवणे - जुना दंड: 1000 रु., नवीन दंड: 5000 रु.

🔸दारू पिऊन वाहन चालवणे – जुना दंड: 2000 रु., नवीन दंड: 10000 रु.

🔸वेगाने वाहन चालवणे - जुना दंड: 500 रु., नवीन दंड: 5000 रु.

🔸विनापरवाना वाहन चालवणे – जुना दंड: 5000 रु., नवीन दंड: 10000 रु.

🔸सीटबेल्ट नसणे – जुना दंड: 100 रु., नवीन दंड: 1000 रु.

🔸दुचाकीवर दोनपेक्षा जास्त व्यक्ती – जुना दंड: 100 रु., नवीन दंड: 2000 रु.

🔸अ‍ॅम्ब्युलन्ससारख्या महत्त्वाच्या वाहनांना रस्ता न देणे – नवीन दंड: 10000 रु.

🔸विमा नसताना वाहन चालवणे – जुना दंड: 1000 रु., नवीन दंड: 2000 रु.

🔸अल्पवयीन मुला-मुलींकडून गुन्हा — 25000 रु. दंड व मालक/पालक दोषी: 3 वर्षे तुरुंगवास

​​खासदार सुप्रिया सुळे देशात पुन्हा अव्वल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची पुन्हा एकदा 'उत्कृष्ट संसदपटू' म्हणून निवड करण्यात आली आहे. सतराव्या लोकसभेच्या पहिल्या सत्रात सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून सुळे यांची निवड करण्यात आली आहे,

2019 मध्ये झालेल्या 17 व्या लोकसभेच्या निवडणुकीत सुळे यांनी बारामतीमधून विजय मिळवला होता. संसदेच्या पहिल्या सत्रांमध्ये सुळे यांनी 34 चर्चासत्रांत भाग घेतला. चार खासगी विधेयके मांडली. 147 प्रश्‍न उपस्थित केले आहेत. पहिल्या सत्रांमध्ये खा. सुळे यांची संसदेतील उपस्थिती 100 टक्के राहिली आहे.

गेल्या लोकसभेत सुळे यांनी 1181 प्रश्‍न विचारले होते, तर 22 खासगी विधेयके मांडली होती. 152 वेळा चर्चेत सहभाग नोंदवला होता. तसेच संसदेत 100 टक्के हजेरी लावली होती. गेल्या संसदेतमधील खासदारांची हजेरी 80 टक्के होती.

चालू घडामोडी प्रश्नसंच

📌कोणत्या भारतीय राज्याने ‘सिस्टर स्टेट’ या संदर्भात संयुक्त राज्ये अमेरिकेच्या डेलावर राज्याबरोबर एक सामंजस्य करार केला?

(A) राजस्थान
(B) गुजरात✅✅✅
(C) पंजाब
(D) आसाम

📌झिम्बाब्वे या देशाच्या माजी राष्ट्राध्यक्षाचे 6 सप्टेंबर 2019 रोजी निधन झाले. त्या व्यक्तीचे नाव काय होते?

(A) एमर्सन मनांगग्वा
(B) सिबुसीसो मोयो
(C) कनान बनाना
(D) रॉबर्ट मुगाबे✅✅✅

📌कोणत्या साली संयुक्त राष्ट्रसंघ समुद्र कायदा परिषद (UNCLOS) हा करार अस्तित्वात आला?

(A) सन 1958
(B) सन 1984
(C) सन 1994✅✅✅
(D) सन 1999

📌कोणत्या सार्वजनिक बँकेनी ESICच्या सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यांना त्याची थेट ई-देयक सेवा प्रदान करण्यासाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) सोबत करार केला?

(A) कॅनरा बँक
(B) युनियन बँक ऑफ इंडिया
(C) इंडियन बँक
(D) भारतीय स्टेट बँक✅✅✅

📌“युद्ध अभ्यास 2019” हा भारत आणि ___ या देशांच्या दरम्यानचा एक संयुक्त लष्करी सराव आहे, ज्याची सुरुवात 5 सप्टेंबर 2019 रोजी झाली.

(A) ब्रिटन
(B) संयुक्त राज्ये अमेरिका✅✅✅
(C) युरोपीय संघ
(D) रशिया

📌कसोटी क्रिकेटच्या इतिहासातला सर्वात तरुण कर्णधार कोण ठरला आहे?

(A) सरफराज अहमद
(B) अँड्र्यू स्ट्रॉस
(C) रशीद खान✅✅✅
(D) टटेंडा तायबू

📌वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर (WWF) या आंतरराष्ट्रीय संस्थेचे स्थापना वर्ष कोणते आहे?

(A) सन 1961✅✅✅
(B) सन 1971
(C) सन 1981
(D) सन 1991

📌कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने भारतीय गेंड्याच्या संवर्धनार्थ जागरूकता वाढविण्यासाठी WWF इंडिया या संस्थेसोबत भागीदारी केली आहे?

(A) विराट कोहली
(B) रोहित शर्मा✅✅✅
(C) कपिल देव
(D) हरभजन सिंग

📌कोणत्या शहरात असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन इलेक्शन बॉडीज (A-WEB) या संस्थेचे कायमस्वरूपी सचिवालय आहे?

(A) नवी दिल्ली, भारत
(B) सोल, दक्षिण कोरिया✅✅✅
(C) टोकियो, जापान
(D) बिजींग, चीन

📌मास्टरकार्ड इंक या संस्थेच्या वार्षिक क्रमावारीनुसार कोणते शहर जगातले सर्वाधिक भेट दिले गेलेले शहर आहे?

(A) बँकॉक✅✅✅
(B) पॅरिस
(C) लंडन
(D) जयपूर

तलाठी परीक्षा २०१९ स्कोर लिस्ट (Score List)


🔗 तलाठी परीक्षा २०१९ स्कोर लिस्ट (Score List)

👇👇👇👇👇👇👇👇


🔗 तलाठी परीक्षा २०१९ स्कोर लिस्ट (Score List)

राज्यातील 20 हजार महसूल कर्मचारी बेमुदत संपावर

✍राज्यभरातील तब्बल 20 हजार महसूल कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. मागच्या पाच वर्षात राज्य शासनाने 19 मागण्यांपैकी एकाही मागणीचा विचार न केल्याने महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचं हत्यार उपसलं आहे.

✍अंशदायी पेन्शन योजनेऐवजी जुनीच पेन्शन योजना कायम ठेवणे, महसूल सहाय्यक पदनाम करणे, लोकसेवा भरतीत 5 टक्के जागा राखीव ठेवणे या प्रमुख मागण्यांसह इतर 16 मागण्यांसाठी राज्यभरातील महसूल कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आंदोलन केली.

✍मात्र याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने आजपासून राज्यातील सर्वच तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत.ऐन निवडणुकांच्या तोंडावर या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने प्रशासनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

धनगर समाजासाठी लागू केलेल्या योजना

1. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील भूमीहिन मेंढपाळ कुटुंबांसाठी अर्धबंदिस्त, बंदिस्त, मेंढीपालनासाठी जागा उपलब्ध करुन देणे किंवा जागा खरेदीसाठी अनुदान तत्वावर अर्थसहाय्य देणे.

2. वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या भटक्या जमाती-क या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाच्या स्वयं योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना कार्यान्वित करणे.

3. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांत प्रवेश देणे.

4. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना पहिल्या टप्प्यात 10,000 घरकुले बांधून देणे.

5. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील आवश्यक असलेल्या परंतु अर्थसंकल्पित निधी उपलब्ध नसलेल्या योजना / कार्यक्रम राबविण्यासाठी न्युक्लिअस बजेट योजना.

6. राज्यातील भटक्या जमाती-क या प्रवर्गातील व्यक्ती सदस्य असलेल्या सहकारी सूत गिरण्यांना भागभांडवल मंजूर करणे.

7. केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत भटक्या जमाती-क या प्रवर्गातील नवउद्योजकांना सहाय्य करण्यासाठी मार्जिन मनी उपलब्ध करुन देणे.
8. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील मेंढपाळ कुटुंबांना पावसाळ्यात चराईकरिता जून ते सप्टेंबर या 04 महिन्यांसाठी चराई अनुदान देणे.(प्रायोगिक तत्वावर)

9. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील होतकरु बेरोजगार पदवीधर युवक युवतींना स्पर्धा परिक्षेसाठी परीक्षापूर्व निवासी प्रशिक्षण.

10. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील बेरोजगार युवक-युवतींना स्पर्धा परिक्षेसाठी परिक्षा शुल्कात आर्थिक सवलती लागू करणे.

11. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील बेरोजगार युवक युवतींना लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलीस भरतीसाठी आवश्यक ते मूलभूत प्रशिक्षण देणे.

12. ग्रामीण परिसरातील कुक्कुटपालन संकल्पनेंतर्गत भटक्या जमाती (क) या प्रवर्गातील जमातीसाठी 75 टक्के अनुदानावर चार आठवडे वयाच्या सुधारित देशी (सीएआरआय- मान्यता प्राप्त) प्रजातीच्या 100 कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अर्थसहाय्य.

13. नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर व अमरावती या महसूली विभागांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी भटक्या जमाती-क प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करणे.

Latest post

रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera)

📌हे सर्वांत साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना 'स्पंज' म्हणतात.  ➡️त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद...