Thursday 5 May 2022

मानवी शरीर प्राथमिक माहिती


1 मानवी डोके वजन: - 1400 ग्रॅम असते.


2 सामान्य रक्तदाब: - 120/80 मि. मी.


3 शरीरातील सर्वात मोठे स्नायू: - न्यूरॉन


4 रक्तामध्ये एकूण रक्त: - 5 ते 6 लिटर


5 सर्वात लहान हाड: - स्थिती (कान हाड)


6 सर्वात मोठी हाड: -फिमर / थाई बोन


7 लाल रक्तपेशींचे आयुष्यः - 120 दिवस.


8 पांढरे रक्त पेशी: 5000 ते 10000 प्रति सें.मी. सेमी


9. पांढऱ्या रक्त पेशींचे आयुष्यः - 2 ते 5 दिवस.


10 रक्तातील प्लेटलेटचे माउंटः -2 लाख ते 4 मिलियन क्यूबिक सेंटीमीटर


11. सामान्य हृदयगती: - 72 ते 75 मिनिटे प्रति मिनिट


12. पल्स दर (नाडीचा दर): - 72 प्रति मिनिट.


13 सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी: - थायरॉईड ग्रंथी.


14 सर्वात मोठे स्नायू - ग्लुटियस मायक्मीस


15 एकूण सेल प्रकारांची संख्या - 63 9


16 प्रौढांमध्ये दातांची संख्या - 32


17 मुलांमध्ये दातांची संख्या - 20 दात ते दुध.


18. सर्वात पातळ त्वचा - पापणी

परीक्षेची संधी थोडक्यात हुकली आहे. आशा लोकांसाठी एक छोटीशी गोष्ट शेअर करत आहे.


----------------------------------------------

टीचरने शिट्टी वाजवली तशी चिमुकल्या पावलांचा ५० मुलामुलींचा गट शाळेच्या मैदानावर धावू लागला. 

एकच लक्ष. 

पलिकडच्या टोकाला टच करुन लवकर परत यायचं. 


पहिल्या तिघांना बक्षिस. 

पहिल्या तीनसाठी सगळ्यांची चढाओढ.


 बघायला सगळ्यांचे आईबाबा म्हणुन उत्साह जरा  जास्तच होता. 


पावले परत फिरली. 

गर्दीतुन बघ्यांचे "पळ पळ" म्हणून  आवाज वाढू लागले. 

पहिल्या तिघांनी हात वर करत आनंदाने पालकांकडे पाहिलं.


 चौथे, पाचवे काठावर बक्षिस हुकले म्हणुन नाराज झालेले. काही पालकही नाराज झालेले.


आणि नंतरचे आता बक्षिस मिळणार नाही, आता कशाला पळा म्हणत चालू लागले.

त्यांच्यासोबत दमलेले, मनापासुन शर्यतीत नसणारे सगळेच. 


५ व्या आलेल्या मुलीने नाराजीनेच बाबाकडे धाव घेतली.


 बाबानेच आनंदाने पळत पुढे जाऊन तिला उचलून घेतले आणि म्हणाला, 

" वेल डन बच्चा. चल कुठले आइस्क्रिम खाणार?". 


" पण बाबा माझा नंबर कुठे आलाय ?" मुलीनं आश्चर्याने विचारलं.


" आलाय की. पहिला नंबर आलाय तुझा बेटा. "


" कसा काय बाबा. ५ वा आला ना ?"  मुलगी गोंधळलेली.


"अगं, तुझ्या मागे कितीजण होते ?"


थोडीशी आकडेमोड करत ती म्हणाली ,

" ४५ जण"


" म्हणजे उरलेल्या ४५ जणात तू पहिली आलीस. म्हणून तुला आइस्क्रिम."


" आणि पुढचे चार जण ?"

 गोंधळ वाढला तिचा.


" त्यांच्याशी आपली शर्यत नव्हतीच यावेळी".


"का ?".


" कारण त्यांनी जास्त तयारी केलेली. आता आपण

परत चांगली तयारी करायची. मग पुढल्यावेळी तु

४८ जणात पहिली येणार. त्यानंतर ५० जणात."


"असं असतंय बाबा ?".


" होय बेटा असंच असतंय ".


"मग पुढल्यावेळी शेवटी एकदम मोठी उडी मारुन पहिली येते की ?".  आता मुलीला उत्साह आलेला.


" एवढी घाई कशाला बेटा ? पाय मजबूत होऊ देत की. आणि आपण आपल्यापुढे जायचं. दुस-यांच्या नाही".


तिला फार काही समजलं नाही पण विश्वासानं म्हणाली, " तुम्ही म्हणाल तसं ".


"आता आइस्क्रिम सांगा की हो ". - बाबा.


मग मात्र नवीन आनंद गवसावा तशी, मुलगी ४५ जणात पहिली आल्याच्या आनंदात बाबाच्या खांद्यावर हसत मान ठेऊन जोरात ओरडली,

" मला बटरस्कॉच आइस्क्रिम पाहिजे".


मित्रहो या गोष्टीतून आपणास शिकण्यासारखं बरंच काही आहे. तुम्ही थोडक्यात हुकला याचा अर्थ असा नाही की तुमचा अभ्यास कमी होता, फक्त त्या लोकांचा अभ्यास आपल्यापेक्षा थोडा जास्त होता, जो आपणासही करण्यासाठी येत्या काळात भरपूर वेळ आपल्याकडे आहे. 


एक गोष्ट बऱ्याच अधिकाऱ्यांकडून तुम्ही ऐकली असेल, "जोपर्यंत तुम्ही त्या पदाच्या लायक बनत नाही, तोवर पोस्ट मिळणार नाही" त्यामुळे दुःख/अपयश थोडं बाजूला ठेऊन पुन्हा जोमाने अभ्यासाला लागणे फार गरजेचे आहे. स्वतःमध्ये त्या क्षमता आणणे फार गरजेचे आहे. आत्मपरीक्षण करून कुठे चूक झाली पाहणे, आणि त्या चुका पुन्हा होणार नाहीत याची खबरदारी घेणेही तितकेच आवश्यक आहे.


आगामी काळात आपणास अभ्यासासाठी भरपूर वेळ उपलब्ध आहे, तेंव्हा पुन्हा एकदा अगदी अगदी सुरवातीपासून सगळं व्यवस्थित जुळवून आणण्याची संधी आपल्याकडे आहे.


अभ्यासासाठी शुभेच्छा...!

आदिवासी जमाती !!



महाराष्ट्रात भिल्ल, गोंड, महादेव कोळी, पावरा, ठाकूर, वारली या प्रमुख आदिवासी जमाती आहेत. 


कोलाम (यवतमाळ जिल्हा), कातकरी (मुख्यत: रायगड व ठाणे जिल्हा) आणि माडिया गोंड (गडचिरोली जिल्हा) या केंद्र शासनाने  म्हणून अधिसूचित केलेल्या अशा तीन जमाती आहेत


आदिवासी जमातीची सर्वात जास्त संख्या (सर्वात जास्त ते कमी) 

==> भिल्ल- (२१.२%), 

==> गोंड- (१८.१%), 

==> महादेव कोळी-(१४.३%), 

==> वारली- (७.३%), 

==> कोकणा- (६.७%)  

==> ठाकूर- (५.७%) 


अशी लोकसंख्येची विभागणी आहे. महाराष्ट्रात एकुण १९ आदिवासी जमाती अशा आहेत ज्यांची संख्या १००० पेक्षाही कमी आहे

महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न



1. भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमध्ये परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे ?


⭕️ Ans- ऑपरेशन गंगा


2. मॉस्को वुशू स्टार चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या भारतीयाने सुवर्णपदक जिंकले आहे?


⭕️ Ans- सादिया तारिक


3. नुकतेच बोल्टजमान पदक मिळालेले पहिले भारतीय कोण बनले आहे?

⭕️ Ans- दीपक धर


4. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय IP निर्देशांक 2022 मध्ये भारत कोणत्या स्थानी आहे?

⭕️ Ans- ४३ वा


5. नुकतीच भारतीय मंदिर वास्तुकलाची आंतरराष्ट्रीय परिषद देवायतनम कुठे आयोजित केले जाते?

⭕️ Ans- कर्नाटक


6. राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभागाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

⭕️ Ans- अभिषेक सिंग


7. वनस्पती आधारित C-19 लसीचा प्रमाणित वापर करणारा पहिला देश कोणता आहे?

⭕️ Ans - • कॅनडा


8. नुकतेच म्यूजियम ऑफ द फ्यूचर कोठे उघडले आहे?

⭕️Ans दुबई


 9. भारत जपान 3रा संयुक्त सराव EX धर्म गार्जियन 2022 कुठे होणार आहे ?

⭕️ Ans- बेलगाम


10. वंदे भारतमसाठी सिग्नेचर ट्यून कोण रिलीज केली आहे?

⭕️ Ans मीनाक्षी लेखी


📕पर. अलीकडेच अंतर्गत प्रकरणांच्या तपासासाठी सीबीआयकडून संमती काढून घेणारे देशातील 9 वे राज्य कोण बनले आहे?

उत्तर :- मेघालय


📕पर. अलीकडेच सहा क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणारी जगातील पहिली महिला क्रिकेटपटू कोण बनली आहे?

उत्तर :- मिताली राज


📕पर. HANSA-NG ने भारतातील सर्वात प्रगत फ्लाइंग ट्रेनरच्या चाचण्या कोठे पूर्ण केल्या?

उत्तर :- पुडुचेरी


📕पर. CISF ने आपला 53 वा स्थापना दिवस कधी साजरा केला?

उत्तर :- ०६ मार्च


📕पर. अलीकडे कोणत्या अंतराळ संस्थेने युरोपा क्लिपर अंतराळयान विकसित करण्यास सुरुवात केली आहे?

उत्तर :- नासा


📕पर. ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची अलीकडेच चाचणी कोणी केली?

उत्तर :- INS चेन्नई


📕पर. भारतातील पहिले स्मार्ट मॅनेज्ड ईव्ही चार्जिंग स्टेशन कोठे सुरू झाले आहे?

उत्तर :- नवी दिल्ली


📕पर. अलीकडेच, भारत आणि कोणत्या देशाच्या राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचा 75 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला?

उत्तर :- नेदरलँड

महाराष्ट्रातील पंचायतराज



👉 आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.


◆ कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?

  - स्थानिक स्वराज्य संस्था


◆ राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?

  -  2 ऑक्टोबर 1953


◆ बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?

  - 16 जानेवारी 1957


◆ बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?

  - वसंतराव नाईक समिती


◆ वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?

  - 27 जून 1960


◆  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?

  - महसूल मंत्री


◆ वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?

  - 226


◆ वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?

  - जिल्हा परिषद


◆ पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?

  - तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)


◆ महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?

   - 1  मे 1962


◆ ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?

  -  महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966


◆ महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?

  -  7 ते 17


◆ ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?

  - जिल्हाधिकारी


◆ ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?

  - जिल्हाधिकारी


◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?

  - 5 वर्षे


◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?

  - पहिल्या सभेपासून


◆ ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?

  - तहसीलदार


◆ सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?

  - विभागीय आयुक्त


◆ उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - सरपंच


◆ सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - पंचायत समिती सभापती


◆ पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?

  - दोन तृतीयांश (2/3)


◆ महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?

  - तीन चतुर्थांश (3/4)


◆ पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - पंचायत समिती सभापती


◆ पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - जिल्हा परिषद अध्यक्ष


◆ जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - संबंधित विषय समिती सभापती


◆ जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - जिल्हा परिषद अध्यक्ष


◆ जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - विभागीय आयुक्त


◆ कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?

  -  ग्रामसेवक


◆ ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?

   - जिल्हा परिषदेचा


◆ ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?

  - जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून


◆ ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?

  - ग्रामसेवक


◆ ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?

   -  शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)


◆ ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

  -  राज्यशासनाला


◆ सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?

   -  विस्तार अधिकारी


◆ गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?

  - ग्रामविकास खाते


  ◆ जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

  - जिल्ह्याचे पालकमंत्री


◆ जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?

  -  जिल्हाधिकारी


◆ जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?

  -  दहा (स्थायी+9 विषय समित्या)


◆ जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?

  - स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा


◆ जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?

  -  जिल्हा परिषद अध्यक्ष


◆  महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?

  -  वसंतराव नाईक


74 वी घटनादुरूस्ती



कलम - 243 P - व्याख्या. 


कलम - 243 Q - नगरपालिकांचे घटक व स्तर. 


कलम - 243 R - नगरपालिकांची रचना. 


कलम - 243 S -  वार्ड समित्यांची रचना आणि मांडणी. 


कलम - 243 T -  अनुसूचीत जात जमाती साठी राखीव जागा.  


कलम - 243 U - नगरपालिकांचा कालावधी. 


कलम - 243 V - सदस्यांची अपात्रता. 


कलम - 243 W - नगरपालिकाचा हक्क  व जबाबदर्‍या. 


कलम - 243 X - कर बसवण्याचे आधिकार व वित्तव्यवस्था. 


कलम - 243 Y - वित्त आयोगाचा आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रस्थापना .  


कलम - 243 Z - नगरपालिकेच्या हिशेबांचे लेखापरीक्षण.  


कलम - 243 ZA - नगरपालिकांच्या निवडणुका  


 कलम - 243 ZB - केंद्रशासित प्रदेशांना नगरपालिका कायदा . 


 कलम - 243 ZC - विशिष्ट प्रदेशांना नगरपालिका कायदा लागू न करणे. 


 कलम - 243 ZD - जिल्हा नियोजनासाठी समिति. 


 कलम - 243 ZE  -  मेट्रोपोलीटन विकासासाठी समिति. 


 कलम - 243 ZF - नगरपालिका सबंधित विद्यमान कायदा व तरतुदी चालू  ठेवण्यासाठी. 


 कलम - 243 ZG - नगरपालिका निवडणूकात कोर्टाच्या हस्तक्षेपास मनाई.

महाराष्ट्र स्थान, विस्तार, सीमा आणि प्रादेशिक/ राजकीय भूगोल


(२ मार्क - Combine २०२१)❣️


🟢महाराष्ट्र स्थान आणि विस्तार


१. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार आणि त्यातील फरक पाठच करणे.( रेखावृतीय विस्तार मधील फरक  (8°14') या वरती प्रश्न येणे बाकी)


२.महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी


 ३.महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी (या वरती प्रश्न येणे बकी आहे)


४.महाराष्ट्राचे क्षेत्रफळ


५.महाराष्ट्राच्या इतर राज्यांशी असलेल्या सीमा

-MH ची सीमा सर्वाधिक किंवा सर्वात कमी कोणत्या राज्यांना लागून आहे.

-इतर राज्यांच्या सीमेलगत असणारे जिल्हे -दोन राज्यांची सीमा करणारी जिल्हे.


६.महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग

-विभागांचा क्षेत्रफळ,लोकसंख्या, तालुके जिल्हा नुसार क्रम (प्रश्न येणे बाकी आहे)


७.सर्वाधिक जिल्हे असणारा विभाग


८. सर्वात कमी जिल्हे असणारा 

विभाग(प्रश्न येणे बाकी आहे)


९. सर्वाधिक तालुके असणारा विभाग 


१०.सर्वात कमी तालुके असणारा विभाग(प्रश्न येणे बाकी आहे)


११.विभागांच्या नकाशाचा अभ्यास आणि त्यांचे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर बाजूचे तालुके (new trend-२०१९ पासून)


१२.एका जिल्ह्याच्या सीमा इतर जिल्ह्यांशी लागून आसणे व त्यांचे नकाशे


१३.जिल्हा निर्मिती


१४.जिल्ह्याचा क्षेत्रफळानुसार क्रम(सर्वात मोठा/सर्वात लहान)(१ ते ३ पाठ करा)


१५.सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे 


१६.सर्वाधिक कमी तालुके असणारे जिल्हे(प्रश्न येणे बाकी)


1 मे 1960 नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले जिल्हे



★ नवीन जिल्हा : मूळ जिल्हा : निर्मिती 


◆ सिंधुदुर्ग : रत्नागिरी : 1 मे 1981

◆ जालना : औरंगाबाद : 1 मे 1981

◆ लातूर : उस्मानाबाद : 16 ऑगस्ट 1982

◆ गडचिरोली : चंद्रपुर : 26 ऑगस्ट 1982

◆ मुंबई उपनगर : मुंबई शहर : 1990

◆ वाशीम : अकोला : 1 जुलै 1998 

◆ नंदुरबार : धुळे : 1 जुलै 1998

◆ हिंगोली : परभणी : 1 मे 1999

◆  गोंदिया : भंडारा : 1 मे 1999

◆ पालघर : ठाणे : 1 ऑगस्ट 2014


नकाराधिकार (Veto Power)



आधुनिक राष्ट्रांमध्ये राष्ट्राध्यक्षांना प्राप्त असलेल्या नकाराधिकार यांचे चार प्रकार पडतात...

1) पूर्ण किंवा शुद्ध नकाराधिकार

2) गुणात्मक नकाराधिकार

3) निलंबनात्मक नकाराधिकार

4) पॉकेट नकराधिकर


1) पूर्ण किंवा शुद्ध नकाराधिकार-

याचा अर्थ संसदेने संमत केलेल्या विधेयकाला संमती पूर्णपणे रोखून धरणे असा होतो.


2) गुणात्मक नकाराधिकार-

याचा अर्थ राष्ट्राध्यक्षांनी संसदेकडे पुनर विचारार्थ पाठवलेल्या विधेयकास संसदेने पूर्वीपेक्षा अधिक बहुमताने पारित केल्यास राष्ट्राध्यक्षांना त्यासंबंधी द्यावीच लागेल.


3) निलंबनात्मक नकाराधिकार-

याचा अर्थ राष्ट्राध्यक्षांनी संसदेकडे पुनर्विचार पाठवलेल्या विधेयकास संशोधने पुन्हा साध्या बहुमताने पारित केले तरी राष्ट्राध्यक्षांना त्यास संमती द्यावी लागेल.


4) पॉकेट नकाराधिकार-

याचा अर्थ संसदेने पारित केलेल्या विधेयकावर कोणताही निर्णय न घेता ते तसेच पडून देणे.


👉🏻 वरील चार प्रकारांपैकी भारतीय राष्ट्रपतींना गुणात्मक नकाराधिकार उपलब्ध नाही.

(अमेरिकन राष्ट्राध्यक्ष यांना मात्र प्राप्त आहे)

भारतातील राज्ये आणि स्थापना दिवस


📌 मध्यप्रदेश - १ नोव्हेंबर १९५६


📌 अरुणाचल प्रदेश - २० फेब्रुवारी १९८७


📌 आसाम - २ डिसेंबर १९२८


📌 बिहार - २२ मार्च १९१२


📌 दिल्ली - १ नोव्हेंबर १९५६ 


📌 छत्तीसगढ - १ नोव्हेंबर २०००


📌 गोवा - ३० मे १९८७


📌 गजरात - १ मे १९६०


📌 हरियाणा - १ नोव्हेंबर १९६६


📌 हिमाचल प्रदेश - १५ एप्रिल १९४८


📌 झारखंड - १५ नोव्हेंबर २०००


📌 कर्नाटक - १ नोव्हेंबर १९५६


📌 करळ - १ नोव्हेंबर १९५६


📌 महाराष्ट्र - १ मे १९६०


📌 मणिपूर - २१ जानेवारी १९७२


📌 मघालय - २१ जानेवारी १९७२ 


📌 मिझोरम - २० फेब्रुवारी १९८७


📌 नागालँड - १ डिसेंबर १९६३


📌 ओडिशा - १ एप्रिल १९३६


📌 पजाब - १ नोव्हेंबर १९६६


📌 राजस्थान - ३० मार्च १९४९


📌 सिक्कीम - १६ मे १९७५ 


📌 तमिळनाडू - १ नोव्हेंबर १९५६


📌 तलंगणा - २ जून २०१४ 


📌 तरिपुरा - २१ जानेवारी १९७२


📌 उत्तर प्रदेश - २४ जानेवारी १९५०


📌 उत्तराखंड - ९ नोव्हेंबर २०००


📌 पश्चिम बंगाल - २० जून १९४७


📌 पदुच्चेरी - १ नोव्हेंबर १९५४ 


📌 अदमान-निकोबार - १ नोव्हेंबर १९५६ 


📌 आध्र प्रदेश - १ नोव्हेंबर १९५६


भारताची स्वर कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जीवन चरित्रावर एक नजर


*_🎙️भारतरत्न लता मंगेशकर स्वर कोकिळा भारताच्याच नाही तर अखिल विश्वातील सर्वात सुप्रसिध्द आणि अनमोल अश्या गायिका आहेत. त्यांच्या आवाजाची किमया केवळ भारतियांवरच नव्हें तर विदेशातील नागरिकांवर देखील आजतागायत पसरलेली आपल्याला दिसते…_


▪️पर्ण नाव : लता दिनानाथ मंगेशकर

▪️जन्म :28 सप्टेंबर 1939 इन्दौर

▪️वडिलांचे नाव :पंडित दिनानाथ मंगेशकर

▪️आईचे नाव :वंती मंगेशकर

▪️बहिणी :आशा भोंसले, उशा मंगेशकर, मीना मंगेशकर

▪️भाऊ : हृदयनाथ मंगेशकर

▪️विवाह:अविवाहित

▪️राष्ट्रीयत्व :भारतिय

▪️वयवसाय :प्लेबॅक सिंगर, म्युझिक कंपोजर


📸`किती हसाल' या १९४२ सालच्या चित्रपटातले `नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी' हे सदाशिव नेवरेकरांनी संगीतबद्ध केलेले मराठी गीत गाऊन त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

वसंत जोगळेकरांच्याच १९४६ सालच्या `आप की सेवा में' या हिंदी चित्रपटात संगीतकार दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या `पा लागू कर जोरी' हे पहिले गीत दीदींनी गायले.


 📸`मधुमती' या चित्रपटासाठी स्वरबद्ध केलेल्या *`आजा रे परदेसी'* या गाण्यासाठी त्यांना पहिल्यांदा फिल्मफेअर पारितोषिक मिळाले. 


🎙️लताजींना गायनासाठी 1958, 1960, 1965, आणि 1969 ला फिल्म फेयर अवाॅर्ड प्राप्त झाले आहेत. *‘गिनीज बुक आॅफ वल्र्ड रेकाॅर्डस्’* तर्फे देखील त्यांचा विशेश सन्मान करण्यात आला आहे.


▪️मध्यप्रदेश सरकार तर्फे त्यांच्या नावे प्रत्येक वर्षी 1 लाखाचा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 1989 ला लतादिदींना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.


👉तयांना मिळालेले विशेष,प्रमुख बहुमान


🎖️फिल्मफेअर पुरस्कार

(1958, 1962, 1965, 1969, 1993 आणि 1994)


🎖️राष्ट्रीय पुरस्कार

 (1972, 1975 आणि 1990)


🎖️महाराष्ट्र शासन पुरस्कार

(1966 आणि 1967)

१९६९ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


🎖️1989 मध्ये त्यांना चित्रपट जगतातील सर्वोच्च सन्मान ‘दादा साहेब फाळके पुरस्कार’ देण्यात आला.


🎖️1993 मध्ये त्यांना फिल्मफेअरचा ‘लाइफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’ देण्यात आला.


🎖️1996 मध्ये त्यांना स्क्रीनच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


🎖️1997 मध्ये त्यांना ‘राजीव गांधी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.


🎖️1999 मध्ये पद्मविभूषण N.T.R. आणि झी सिनेच्या ‘लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड’ने सन्मानित.


🎖️2000 साली I.I.A. F. (IIFA) च्या ‘लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड’ने सन्मानित.


🎖️2001 मध्ये त्यांना स्टारडस्टचा ‘जीवनगौरव पुरस्कार’, नूरजहाँ पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

2001 मध्ये, भारत सरकारने तुमच्या कामगिरीचा गौरव करताना तुम्हाला देशातील सर्वोच्च पुरस्कार *“भारतरत्न”* देऊन गौरविले.


🏆महाराष्ट्र शासनाने त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव म्हणून त्यांच्या नावे महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दिला जातो.



लता मंगेशकर सुरांची राणी, भारत देशातील खास रत्नापैकी एक आहे.  लता दीदी देश विदेशात सर्व ठिकाणी त्यांच्या सुरांमुळे  ज्ञात  आहेत.  लता दीदी यांचे नाव गिनीज बुक ऑफ़ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील प्रविष्ट केले आहे,  लता दीदींनी जवळपास 30 हजार गाणे 20 भाषां मध्ये  1948-87 पर्यंत गायले आहे,  आता तोच आकडा  ४० हजार पर्यंत पोहचला आहे.


साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्य



● सदानंद मोरे : तुकारामदर्शन (1998)


● रंगनाथ पठारे : ताम्रपट (1999 )


● ना.धो.महानोर : पानझड (2000 )


● राजन गवस : तणकट (2001)


● त्र्यंबक विनायक सरदेशमुख : डांगोरा एका नगरीचा (2003)


● महेश एलकुंचवार : युगांत (2002)


● सदानंद देशमुख : बारोमास (2004)


● अरुण कोल्हटकर : भिजकी वही (2005)


● आशा बगे : भुमी (2006)


● वसंत आबाजी डहाके : चित्रलिपी (2009)


● सरोज देशपांडे : अशी काळवेळ (2010 )


● अशोक केळकर : रुजुवात  (2010)

Online Test Series

आप्पासाहेब भोसल्यांचा उठाव (1817 – 18)

⚔ आप्पासाहेब भोसल्यांचा उठाव (1817 – 18)
▪️गौड जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने उठाव केला
▪️बेतूर येथे इंग्रजी फौजेचा त्यांनी पराभव केला.
▪️शीख राजा रनजीसिंहचे लढण्यासाठी मन वळविण्यासाठी प्रयत्न केला.
▪️शेवटी इंग्रजांकडून पराभव पत्कारला.

⚔ हटकरांचा उठाव – मराठवाड्यात
▪️नांदेड, परभणी व पैनगंगेच्या प्रदेशात 1800 – 1820 या काळात.
▪️नेता – नौसोजी नाईक
▪️प्रमुख ठाणे – नोव्हा
▪️ब्रिटीशांनी उठाव मोडून काढला.  

⚔ खानदेशातील भिल्लाचा उठाव
▪️भिल्लाची खानदेशात लूटमार.याला यशवंतराव होळकरची फूस होती.
▪️नेते – काजरसिंग, भीमा नाईक, भागोजि नाईक, नेवश्य नाईक, कलुबाबा, दौलत नाईक, तंट्या भिल्ल
▪️भिल्लणा वठणीवर आणण्यासाठी लॉर्ड एलफिन्स्टनने प्रयत्न केले.

⚔ खानदेशातील भिल्लाचा उठावाचे उपाय:
▪️1825 मध्ये भिल्लाकरिता जमिनी देणे, वसाहती निर्माण करणे.
▪️भिल्लाणा पोलिस दलात नोकर्‍या दिल्या.  
▪️बंडखोर भिल्लाणा वठणीवर आणण्यासाठी इतर भिल्लाचा वापर केला.

⚔ काजरसिंग नाईकचा उठाव:
▪️1875 च्या वेळी खानदेशात ब्रिटीशांविरुद्ध भिल्लाच्या उठावात नेतृत्व केले.
▪️पूर्वी ब्रिटीशांच्या पोलिस दलात होता.
▪️ब्रिटीशांचा 7 लाखाचा खजिना लुटला.

❣❣❣❣❣

भारतीय क्रांतिकारी संघटना

❇️ भारतीय क्रांतिकारी संघटना

🅾  व्यायाम मंडळ
– चाफेकर बंधू  ( १८९६ )

🅾  अनुशीलन समिती
– ज्ञानेंद्रनाथ बोस ( १९०१ ) मिदनापुर

🅾  अभिनव भारत( पुणे )
– वि .दा .सावरकर  ( १९०२ )

🅾  इंडिया हाऊस
– श्यामजी कृष्णा वर्मा ( १९०४ )

🅾  स्वदेश बांधव समिती
– अश्विनीकुमार दत्त ( १९०५ )

🅾  अभिनव भारत( लंडन)
– वि. दा. सावरकर ( १९०६ )

🅾  इंडियन इंडिपेंडस लिग
– तारकानाथ दत्त ,अमेरिका, १९०७

🅾  अनुशीलन समिती
– विरेंद्रकुमार घोष - भूपेंद्र दत्त
                  १९०७ ( ढाका )

🅾  भारत माता सोसायटी
– अजितसिंह आंबाप्रसाद (१९०७ )

🅾  गदर पार्टी
– लाला हरदयाळ ( १९१३ )

🅾  इंडियन इंडिपेंडस लिग
– लाला हरदयाळ - विरेंद्र चट्टोपाध्याय ( १९१४ ) ( बर्लिन )

🅾  इंडियन इंडिपेंडस लिग
– राज महेंद्र प्रताप ( १९१५ ) काबूल

🅾  हिन्दुस्थान रिपब्लिकन असोशिएशन
– सचिंद्रनाथ संन्याल ( १९२४ )

🅾  नौजवान सभा
– भगतसिंग ( १९२६ ) (लाहोर)

🅾  हिन्दुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोशियशन
– चंद्रशेखर आझाद (१९२८)

🅾  इंडियन इंडिपेंडन्स लिग ( *टोकियो* )
– रासबिहारी बोस (१९४२)

🅾  आझाद हिंद सेना
– रासबिहारी बोस (१९४२) टोकियो .
--------------------------------------------------
❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

आधुनिक भारताचा इतिहास

.       🎇 "आधुनिक भारताचा इतिहास" 🎇
________________________________________
✍ टॉपिक - गांधी युग 1920 -1948

◾️ भारत सरकार कायदा 1935

◾️ प्रेसीडेंट पद्धत 1937-1940

◾️ दूसरे महायुद्ध  1939 - 1945

◾️ ऑगस्ट ऑफर 1940

◾️ क्रिप्स योजना 1942

◾️ छोडो भारत चळवळ 1942

◾️ त्रिमंत्री योजना 1946

◾️ भारत स्वातंत्र्याचा कायदा 1947

◾️ स्वातंत्र्य भारत 15 ऑगस्ट 1947

◾️ गांधीचा मृत्यु 1948
_______________________________

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

इतिहास :- प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे

♻️ इतिहास  :- प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे

*🔸 हिंदू नेपोलियन --  स्वामी विवेकानंद*

*🔹 मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री*

*🔸 कैद-ए-आजम -- बॅ. जीना*

*🔹 शहीद-ए-आलम --  भगतसिंग*

*🔸 लोकनायक -- बापूजी अणे*

*🔹 भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू*

*🔸 गान कोकिळा -- लता मंगेशकर*

*🔹 आंध्र केसरी -- थंगबालू प्रकाशम्*

*🔸 गरिबांचे कैवारी -- के. कामराज*

*🔹 प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी*

*🔸 देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद*

*🔹 भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल*

*🔸 पंजाबचा सिंह --  राजा रणजितसिंग*

*🔹 विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियाणी*

*🔸 विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर*

*🔹 समर सौदामिनी -- अरुणा आसफअली*

*🔸 भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी*

*🔹 शांतीदूत -- पंडित नेहरू*

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

भारतातील शिक्षणासंबंधी समित्या


📚भारतातील शिक्षणासंबंधी समित्या 📚

1. सनदी कायदा 1813.

2. एलफिन्स्टनची सरकारी पुस्तिका.

3. Committee of Public Instruction by गव्हर्नर जनरल अॅडम

4. लाॅर्ड मेकाॅलेचा प्रस्ताव 1835.

5. चार्ल्स वुडचा खलिता
(1854) भारतीय शिक्षणाचा मॅग्नाकार्टा .

6. हंटर शिक्षण आयोग (1882) प्राथमिक व माध्यमिक शिक्षणावर भर.

7. थाॅमस रॅले आयोग (1902) भारतातील विद्यापीठय शिक्षणाचा आढावा.

8. भारतीय विद्यापीठ कायदा (1904).

9. सॅडलर आयोग (1917) विद्यापीठय शिक्षण समस्येच्या अभ्यासासाठी.

10. हार्टोग समिती (1929) प्राथमिक शिक्षणाला राष्ट्रीय महत्त्व द्यावे.

11. सार्जंट योजना (1944) .

12. राधाकृष्णन आयोग (1948).

13. कोठारी आयोग (1964).

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले उठाव

ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले उठाव.
________________________

संन्याशाचा उठाव : 1765-1800 – बंगाल

शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक

चुआरांचा उठाव : 1768 – बंगाल-मिजापूर जिल्हा जगन्नाथ घाला.

हो जमातीचे बंड : 1820 – छोटा नागपूर व सिंगभूम

जमिनदारांचा उठाव : 1803 – ओडिशा जगबंधू

खोंडांचा उठाव : 1836 – पर्वतीय प्रदेश दोरा बिसाई

संथाळांचा उठाव : 1855 – कान्हू व सिंधू

खासींचा उठाव : 1824 – आसाम निरतसिंग

कुंकिंचा उठाव : 1826 – मणिपूर

_______________________________

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣.

_______________________________

वासुदेव बळवंत फडके यांची कामगिरी

Mpsc History
वासुदेव बळवंत फडके यांची कामगिरी :

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

वासुदेव बळवंत फडके यांची कामगिरी

यांना महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते.
वासुदेव फडक्यांनी 1879 मध्ये रामोशी, कोळी, ठाकर अशा जमतीच्या लोकांना हाताशी धरून इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र उठाव करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
सार्वजनिक काकांनी फडक्याचे वकीलपत्र घेतले होते.
जानेवारी 1880 मध्ये वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा झाली.
17 फेब्रुवारी 1883 रोजी फडक्यांचे क्षय रोगाने एडनच्या तुरुंगात निधन झाले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

चाफेकर बंधु

1896-97 मध्ये दामोदर हरी चाफेकर व बाळकृष्ण हरी चाफेकर यांनी पुण्यात व्यायाम मंडळाची स्थापना केली.
1897 मध्ये पुण्यात ब्युबॉनिक प्लेगची साथ पसरली होती.
22 जून 1897 रोजी दामोदर व बाळकृष्ण चाफेकर या बंधूनी जुलमी प्लेग कमिशनर रॅड व इंग्रज अधिकारी आर्यहस्ट यांची हत्या केली.
द्रवीड बंधूनी रॅड हत्या कटाची माहिती सरकारला दिली.
चाफेकर बंधूना येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली.
वासुदेव चाफेकर व महादेव आपटे यांनी द्रवीड बंधूची हत्या केली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

दहशतवादाच्या उदयाची कारणे :

इ.स. 1857 ची प्रेरणा
प्रबोधन चळवळ
युरोपातील घटना
बंगालची फाळणी
रशिया जपान युद्ध
प्रखर राष्ट्रवाद
राष्ट्रसभेची नेमस्त वाटचाल
इंग्रजी भाषा
इंग्रज अधिकार्‍यांचे उद्दात वर्तन
अहिंसात्मक तत्वज्ञान
क्रांतीकारकांचे आदर्श
जहालाची कार्यप्रणाली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

भारतात समुद्रमार्गे येणारे यूरोपियन :

Mpsc History
भारतात समुद्रमार्गे येणारे यूरोपियन :

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

यूरोपियन – कोलंबस

राष्ट्र – स्पेन
वर्ष – 1493
वखारी – त्याने वेस्ट इंडिज बेटाचा शोध लावला.
2. यूरोपियन – वास्को-डी-गामा

राष्ट्र – पोर्तुगल
वर्ष – 1498
वखारी – कलिकत (भारतात येणारा पहिला यूरोपियन)
3. यूरोपियन – कॅप्टन हॉकीन्स

राष्ट्र – ब्रिटिश
वर्ष – 1607
कंपनी – ईस्ट इंडिया कंपनी
वखारी – पहिली वखार सूरत येथे स्थापन केली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

ब्राह्मो समाजाची उद्दिष्टे

📚 ब्राह्मो समाजाची उद्दिष्टे 📚

🖍  हिंदू धर्माचे शुद्धीकरण करुन भारतीय लोकांना खऱ्या धर्माच्या तत्त्वाची ओळख करुन देणे.

🖍  समाजातील अनिष्ट रुढी, प्रथा, परंपरा, चालीरीती नाहीशा करणे.

🖍  ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या हिंदू धर्मावरील टीकेला व धर्मांतरास विरोध करणे आणि त्यांच्या धर्म प्रसार कार्यास शह देणे.

🖍  हिंदू धर्मात आणि समाजात सुधारणा घडवून आणणे.

  📚  ब्राह्मो समाजाचे तत्त्वज्ञान  📚

🖍  एकेश्वरवाद   : ईश्वर हा एकच असून तो निर्गुण, निराकार आहे. ईश्वर हा या अनंत जगाचा निर्माता व नियत्ता आहे. त्या निराकार अशा ईश्वराची उपासना करावी. ईश्वराच्या उपासनेसाठी कोणत्याही कर्मकांडाची जरुरी नाही.

🖍  मूर्तीपूजेस विरोध  : मूर्तीपूजेला विरोध केला. ईश्वराचे अस्तित्त्व मूर्तीत अथवा वस्तूत नसल्यामुळे मूर्तीपूजा करू नये.

🖍  बंधुत्त्वाची भावना : ईश्वर हा आपणा सर्वांचा पिता आहे. म्हणून आपण सर्वजण एकमेकांचे बंधू आहोत.

🖍  अवतारवादास विरोध : ईश्वर हा निराकार असल्यामुळे तो साकार होऊ शकत नाही. त्यामुळे अवतारवादाची कल्पना भ्रामक व चुकीची आहे.

🖍  आत्म्याचे अमरत्त्व : आत्मा हा अमर असून तो आपल्या कृत्याबद्दल फक्त ईश्वरालाच जबाबदार असतो.

🖍  सर्व धर्मातील ऐक्य  : नीतीमत्ता, सदाचार, मानवाबद्दलचे प्रेम, भूतदया यामुळे विविध धर्मात ऐक्य निर्माण होते.
🖍  विश्वबंधुत्त्वावर श्रद्धा : ब्राह्मो समाज सर्व धर्मातील तत्त्वज्ञानाचा आदर करतो. त्याची निंदा करत नाही. त्यामुळे विश्वबंधुत्वावर श्रद्धा आहे.

🖍  प्रेम, परोपकार, सेवा : धर्माचा खरा अर्थ प्रेम, परोपकार, सेवा असा आहे, हे गृहीत धरुन एकमेकांशी व्यवहार करावेत.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

मवाळवादी युगात गोपाळ कृष्ण गोखले यांची भूमिका

Mpsc History
मवाळवादी युगात गोपाळ कृष्ण गोखले यांची भूमिका:

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

प्रारंभीचे राष्ट्रवादी मवाळ म्हणून ओळखले जातात. त्यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून साम्राज्यवादाचे केलेले विश्लेषण आणि आर्थिक प्रश्नांवर त्यांनी सतत चालविलेली चळवळ होय.

व्यापार, उद्योग व अर्थव्यवस्था या तिन्ही दृष्टींनी साम्राज्यवादी अर्थव्यवस्थेने कशी पिळवणूक केली याचे त्यांनी विश्लेषण केले.
भारतीय अर्थव्यवस्थेला ब्रिटिश अर्थव्यवस्थेची बटीक बनविणे हेच ब्रिटिश वसाहतवादाचे सार आहे हे त्यांनी पक्के ओळखले.

केवळ कच्च्या मालाचा पुरवठा करणारा देश, ब्रिटनमध्ये तयार होणार्‍या मालाला हुकमी बाजारपेठ व परकीय भांडवल गुंतवणुकीस उत्तम क्षेत्र् असे भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरुप प्राप्त करुन देण्याचा जो ब्रिटिश वसाहतवादी अर्थव्यवस्थेचा हेतू होता त्याला त्यांनी जोरदार विरोध केला.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

मवाळवादी युग :-

काॅंग्रेसच्या स्थापनेपासून ते 1905 पर्यत मवाळवादी नेत्यांचा प्रभाव असल्याने त्यास मवाळवादी कालखंड असे म्हणतात.
मवाळवाद्यांची कार्यपध्दत –

(1) इंग्रजांशिवाय भारताचा विकास आणि देशात शांतता सुव्यावस्था प्रस्थापित होणार नाही म्हणून मवाळवादी नेते इंग्रजांशी एकनिष्ठ होते.

(2) इंग्रजांच्या न्यायप्रियतेवर विश्र्वास असून ते न्यायानुसारच योग्य कार्य सुधारणा करतील. त्यांच्याकडील अर्ज, विनंत्या क्रमाक्रमाणे सुधारणा द्याव्यात म्हणजे त्या पेलण्याची ताकद वाढेल

(3) इंग्रजांनी आपणाला क्रमाक्रमाने सुधारणा द्याव्यात म्हणजे त्या पेलण्याची ताकद वाढेल.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

राष्ट्रीय कॉग्रसचे प्रारंभीचे कार्य –

1885-1905 या काळात मवाळद्यांनी अनेक कार्ये करून आपली उदिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न केला.
(1) देशातील अनेक धर्म, प्रांत, जाती, यांच्या संदर्भात पूर्वग्रह व गैरसमज होते. ते नष्ट करून सर्वाच्यामध्ये स्नेहसंबंध निर्माण करण्याचे उदिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न केला.

वसाहतीच्या स्वराज्याची मागणी –

र्लॉड कर्झनच्या अत्याचारी धोरणामुळे आणि आयरिश नेता मि. स्मेडले यांच्या वसाहतीच्या स्वराज्य या कल्पनेनुसार 1905 च्या बनारस अधिवेशात गोखल्यांनी वसाहतीच्या स्वराज्याचा ठराव मांडला व तशी मागणी केली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

जाचक कायदे रद्दची मागणी –

भारतीयांवर अनेक जाचक कायदे लादले. प्रशासन व न्यायदानात भेदभाव विना चौकशी तुरुंगात ऑम्र्स अ‍ॅक्ट 1878 प्रेस अ‍ॅक्ट इ. जाचक कायदे रद्द करण्याची मागणी अमरावती अधिवेशनात सुरेंद्रनाथ बॅनर्जीच्या अध्यक्षतेखाली केली.
लोकजागृतीचे कार्य –

कॉग्रसने अर्ज, विनंत्या करुन जनतेची दु:खे सरकार दरबारांमध्ये मांडली. सभा ठराव लेखन या माध्यमांमधून लोकजागृतीचे कार्य केले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

सरकार विरुध्द आक्रमक पवित्रा –

काँग्रेस व सरकार यांचे प्रारंभीचे मैत्रीसंबंध कोलकत्या अधिवेशनानंतर राहिले नाहित कारण काँग्रेसने आक्रमक कार्यक्रमांची सुरुवात केली. इंग्रजांविरुध्द अ‍ॅटी कॉर्नली लीनच्या चळवळीप्रमाणे चळवळ सूरु करावी असे आदेश दिले.

परदेशातील हिंदी जनतेसाठी कार्य –

इंग्रजांनी त्यांच्या वसाहतीमध्ये अनेक भारतीय मजुरांना पाठविले होते. त्यांच्यावर अन्याय अत्याचार डोइजड कर लादले होते. मतदानाचा व मालमता ठेवण्याचा हक्क नव्हता यासाठी कॉग्रसने संघर्ष करुन न्याय मिळवून दिला.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

परदेशातील हिंदी जनतेसाठी कार्य –

इंग्रजांनी त्यांच्या वसाहतीमध्ये अनेक भारतीय मजुरांना पाठविले होते. त्यांच्यावर अन्याय अत्याचार डोइजड कर लादले होते. मतदानाचा व मालमता ठेवण्याचा हक्क नव्हता यासाठी कॉग्रसने संघर्ष करुन न्याय मिळवून दिला.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

हिंदी जनतेची गार्‍हाणी मांडली –

भारतीयांच्या विविध क्षेत्रांतील अडचणींचा विचार करण्यासाठी रॉयल कमिशन नेमले.

या प्रसंगी कॉग्रेसने सरकारकडे विविध मागण्या केल्या वर्तमानपत्रांना स्वातंत्र्य, पोलिस खात्यात व प्रशासनात सुधारणा शासकीय खर्च कपात, शेतकर्‍यांना कमी व्याज दरात कर्ज, देशी उद्योगंधद्यांना संरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शेतकर्‍यांना कमी व्याज दरात कर्ज देशी उद्योगधंद्यांना संरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारात वाढ, स्पर्धा परिक्षा भारतात घ्यावी व वयोमर्यादा कमी करावी.

काॅंगे्रसचे इंग्लंडमधील कार्य –

इंग्लंडमधील जनतेचा व संसदेचा आपल्या हक्कांना पाठिंबा मिळविण्यासाठी इंग्लंडमध्ये चळवळ सुरु केली 1887 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी इंडियन रिफॉर्म असोसिएशनची स्थापना केली.
1889 मध्ये ब्रिटिश कमिटी ऑफ दी इंडियन नॅशनल काँग्रेस ही संघटना स्थापन केली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

सायमन कमिशन बद्दल माहिती

Mpsc History

सायमन कमिशन बद्दल माहिती -------

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

1919 च्या सुधारणा कायद्यात येणार्‍या अडचणी व निर्माण होणारे दोष यांचा विचार करण्यासाठी सर अलेक्झांडर मुडीमन यांच्या अध्यक्षतेखाली 1924 मध्ये समिती नेमली होती.

नोव्हें. 1927 मध्ये कमिशन नेमले गेले
सात सदस्यीय या कमिशनात एकही भारतीय व्यक्ती नसल्यामुळे काँग्रेससह इतर पक्षांनी कमिशनवर बहिष्कार घातला.
.
3 फेब्रुवारी 1928 मध्ये सायमन कमिशन भारतात आले.

पंजाब मध्ये सायमन कमिशनला विरोध लाला लजपतराय यांनी केला.

1930 रोजी सायमन कमिशनचा अहवाल जाहीर.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

टिळक युगातील महत्वाच्या घटना

Mpsc History

टिळक युगातील महत्वाच्या घटना:

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

1. प्लेगची साथ व टिळकांना झालेली अटक :

सन 1896 ते 1899 या काळात पुण्यात ब्युबानिक प्लेगची भयंकर साथ आली होती.

शासनाने प्लेगच्या साथीवर नियंत्रण मिळविण्याकरिता रॅंड या इंग्रज अधिकार्‍याची नियुक्ती केली.
रॅंडने उपाय योजनेच्या नावाखाली जनतेवर आतोनात अत्याचार केले.
याचा बदला म्हणून चाफेकर बंधूंनी रॅंड व आयर्स्ट यांचा गोळ्या घालून वध केला.
ब्रिटिश शासनाने टिळकांचा रॅंडच्या खुनाशी संबंध जोडून त्यांना अटक केली.

न्यायालयाने टिळकांना दीड वर्षाची शिक्षा ठोठावली.
भारतीय जनतेने टिळकांच्या शिक्षेविरुद्ध संपूर्ण भारत बंद पाळला. हा भारतीय जनतेने पाळलेला पहिला बंद होय.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

2. बंगालची फाळणी (1905) :

लॉर्ड कर्झनने राष्ट्रीय काँग्रेसमधील हिंदू-मुस्लिम जनतेमध्ये फुट पाडण्याच्या उद्देशाने 19 जुलै 1905 रोजी बंगालच्या फाळणीची घोषणा केली.
बंगालच्या फाळणीविरुद्ध बंगाल प्रांतात आंदोलन सुरू झाले. या घटनेच्या विरोधात लोकमान्य टिळकम बिपीनचंद्र पाल व लाला लजपतराय यांनी रान उठविले.
बंकिमचंद्र बॅनर्जी यांचे वंदे मातरम हे गीत राष्ट्रीय चळवळीला महामंत्र ठरले.

आनंद मोहन बोस यांच्या अध्यक्षतेखाली स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या चार गोष्टीची घोषणा केली.
टिळकांनी यालाच चतु:सूत्री असे नाव दिले.
सन 1905 ते 1920 नंतरचा काळ टिळक युग म्हणून ओळखला जातो.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

3. टिळकांना शिक्षा :

ब्रिटिश सरकारच्या विरोधात केसरीमध्ये जनतेच्या भावना भडकविणारे लेखन केल्याचा आरोप लोकमान्य टिळकांवर ठेवण्यात आला व त्यांना 6 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावून मंडाले येथील तुरुंगात ठेवण्यात आले.

4. होमरूल लीग चळवळ :

डॉ. अॅनी. बेझंट यांनी सप्टेंबर 1916 मध्ये मद्रास येथे होमरूल लीगची स्थापना केली.
थिऑसॉफीकल सोसायटीच्या माध्यमातून ही चळवळ संपूर्ण भारतभर पसरली.
सन 1914 मध्ये लोकमान्य टिळक मंडालेहून शिक्षा भोगून परत आले.

लोकमान्य टिळकांनी एप्रिल 1916 मध्ये पुण्यातून होमरूल लीग चळवळ सुरू केली.
बॅरिस्टर जोसेफ बाप्टिस्टा हे या चळवळीचे अध्यक्ष होते. न.ची. केळकर हे सचिव होते.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

5. टिळकांचे निधन :

लोकमान्य टिळकांनी. या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याचा स्विकार करण्याच्या उद्देशाने प्रतीयोगिता सहकारिता हे धोरण जाहीर केले. ॰

या कायद्यानुसार घेण्यात येणार्‍या निवदणुकीत काँग्रेस लोकशाही पक्षाची स्थापना केली होती.
एप्रिल 1920 मध्ये निवडणुकीचा जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला. परंतु दुर्दैवाने लोकमान्य टिळकांचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले.
भारतीय राजकारणाच्या क्षितीजावर गांधी युगाचा उदय झाला.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

Latest post

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती

०१) महाराष्ट्रातील नेहरू स्टेडियम कोठे आहे ? - पुणे. ०२) अँल्युमिनियम हा धातू कोणत्या खनिजापासून तयार केला जातो ? - बाॅक्साईट. ०३) डाॅ.पंजाब...