Monday 9 December 2019

महत्त्वाचे प्रश्नसंच

1)जास्तीत जास्त किती दिवस अर्थविषयक विधेयक राज्यसभा स्वत:कडे ठेवू शकते?
७ 
१५
१६
१४👈

2)अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कुणाला आहे?

लोकसभा 
राज्यसभा 👈
लोकसेवा आयोग
मंत्रीमंडळ

3)'विटाळ विध्वंसन' या आपल्या पुस्तकातून कोणी अस्पृश्यतेचे खंडन केले
आहे
1. गोपाळबाबा वलंगकर👈
2. वि.रा.शिंदे
3. वीरेशलिंगम पतलू
4. नारायण गुरु

4)आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली?
सावित्रीबाई फुले
महात्मा गांधी
पंडिता रमाबाई 👈
दयानंद सरस्वती

5)अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कोण होते?
स्वामी सहजानं सरस्वती 👈
प्रा. एन.जी.रंगा
बाबा रामचंद्र
दिनबंधुमित्र

6)डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' ची स्थापना कधी केली
1906
1925👈
1930
1934

7)1921 साली कोणाच्या नेतृत्वाखाली उत्तर भारतात हिंदू-मुस्लिम
शेतकऱ्यांचे ऐक्य आंदोलन घडून आले
मदारी पासी 👈
एन.जी.रंगा
सहजानंद सरस्वती
महात्मा गांधी

8)मोपला शेतकऱ्यांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागात घडून आला
बिहार
केरळ👈
बंगाल
पंजाब

9)तामिळनाडूमध्ये 'नाडरमहाजन संघ' ही संस्था कधी स्थापन झाली
1910👈
1916
1925
1931

10)दलित चळवळीत अग्रस्थानी असलेल्या जस्टीस पक्षाचे कार्य कोणत्या
प्रांतात विशेषत्वाने दिसून येते
बंगाल
मद्रास👈
महाराष्ट्र
पंजाब

11)कोणाच्या नेतृत्वाखाली दलितांच्या संघर्षाला व्यापक चळवळीचे स्वरुपप्राप्त झाले?
महात्मा गांधी
राजर्षी शाहू महाराज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर 👈
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

12)भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना कधी झाली
1931
1934
1919
1925👈

13)अहमदाबाद कापड गिरणी कामगार असोसिएशन ची स्थापना कोणीकेली?
जे.बी. कृपलानी
एन.एम.जोशी
महात्मा गांधी👈
सरदार वल्लभभाई पटेल

14)सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली
पंडिता रमाबाई
सावित्रीबाई फुले
रमाबाई रानडे 👈
ताराबाई शिंदे

15) मुंबई ते इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस  ची स्थापना कोणी केली?
महात्मा गांधी
सरदार वल्लभाई पटेल👈
लाला लजपतराय
पंडित नेहरु

*1. वस्तूच्या कंपनामुळे ____ ची निर्मिती होते. ?*

अ. *ध्वनी ☑*
ब. प्रतिध्वनी
क. अवतरंग
ड. प्रकाश

*2. खालील पैकी कशामध्ये ध्वनीचा वेग सर्वात जास्त असेल. ?*

अ. पाणी
ब. वायू
क. *लाकडी ठोकळा ☑*
ड. निर्वात वातावरण

*3. कार्य करण्यासाठी साठवलेली क्षमता म्हणजे ?*

अ. बल
ब. *ऊर्जा ☑*
क. शक्ती
ड. गती

*4. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला ?*

अ. डाल्टन
ब. *चॅडविक ☑*
क. रूदरफोर्ड
ड. थॉमसन

*5. आधुनिक आवर्तसारणीमध्ये किती आवर्त आहेत ?*

अ. आठ
ब. *सात ☑*
क. नऊ
ड. सहा

*6. हा वैश्विक द्रावक आहे.?*

अ. हवा
ब. अल्कोहोल
क. *पाणी ☑*
ड. रॉकेल

*7. ज्वलनासाठी कोणत्या वायूची गरज असते. ?*

अ. *ऑक्सीजन ☑*
ब. नायट्रोजन
क. सल्फर डाय ऑक्साईड
ड. कार्बन डाय ऑक्साईड

*8. वनस्पतीवर अप्रत्यक्षपणे अवलंबून असणारे प्राणी कोणते ?*

अ. शाकाहारी
ब. मिश्राहारी
क. कीटकहारी
ड. *मांसाहारी ☑*

*9. अन्न तयार करण्यासाठी वनस्पतींना कशाची गरज असते?*

अ. ऑक्सीजन
ब. *सुर्यप्रकाश ☑*
क. माती
ड. अंधार

*10. प्लेगच्या साथीसाठी कोणता प्राणी कारणीभूत असतो ?*

अ. डास
ब. मासे
क. *उंदीर ☑*
ड. मासे

*11. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?*

अ. सातारा
ब. नाशिक
क. *रायगड ☑*
ड. पुणे

*12. मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे?*

अ. *मुळा ☑*
ब. तापी
क. गोदावरी
ड. कृष्णा

*13. महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते?*

अ. पुणे विद्यापीठ
ब. *मुंबई विद्यापीठ ☑*
क. शिवाजी विद्यापीठ
ड. नागपूर विद्यापीठ

*14. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ एकूण किती चौ. किमी आहे?*

अ. *307713 ☑*
ब. 407434
क. 503932
ड. 603832

*15. महाराष्ट्राचा लोकसंख्या बाबतीत भारतात कितवा क्रमांक लागतो?*

अ. पहिला
ब. *दुसरा ☑*
क. तिसरा
ड. चौथा

*16. चिकूचे उत्पादन सर्वाधिक कोठे होते?*

अ. रायगड
ब. ठाणे
क. *पालघर ☑*
ड. नाशिक

*17. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक जास्त लोकसंख्या आहे?*

अ. रायगड
ब. पुणे
क. नागपूर
ड. *ठाणे ☑*

*18 कोणत्या जिल्ह्यात तुषार सिंचनाचे प्रमाण सर्वाधिक आहे?*

अ. पुणे
ब. *नाशिक ☑*
क. नागपूर
ड. कोल्हापूर

*19. महाराष्ट्रात सर्वात जास्त विहीरी कोणत्या जिल्ह्यात आहेत?*

अ. *अहमदनगर ☑*
ब. पुणे
क. सोलापूर
ड. रायगड

*20. सेवाग्राम आश्रम कोणत्या ठिकाणी आहे?*

अ. पुणे
ब. सांगली
क. *वर्धा ☑*
ड. अहमदनगर

*21. पंचायत समितीचा सचिव कोण असतो?*

अ. सभापती
ब. तहसीलदार
क. *गटविकास अधिकारी ☑*
ड. विस्तार अधिकारी

*22. पंचायत समितीचा उपसभापती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात?*

अ. *सभापती ☑*
ब. जिल्हाधिकारी
क. तहसीलदार
ड. गटविकास अधिकारी

*23. जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती कोणती आहे?*

अ. विषय समिती
ब. *स्थायी समिती ☑*
क. अर्थ समिती
ड. शिक्षण समिती

*24. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हटले जाते?*

अ. महात्मा गांधी
ब. जवाहरलाल नेहरू
क. वसंतराव नाईक
ड. *लॉर्ड रिपन ☑*

*25. स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायत राज हे नाव कोणी दिले ?*

अ. *जवाहरलाल नेहरू ☑*
ब. महात्मा गांधी
क. बलवंतराय मेहता
ब. वसंतराव नाईक

*26. पंचायत राज स्विकारणारे पहिले राज्य कोणते?*

अ. महाराष्ट्र
ब. गुजरात
क. कर्नाटक
ड. *राजस्थान ☑*

*27. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भुषवतो?*

अ. ग्रामसेवक
ब. *सरपंच ☑*
क. तलाठी
ड. तहसीलदार

*28. ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असते?*

अ. *18 ☑*
ब. 21
क. 23
ड. 25

*29. पंचायत व्यवस्थेविषयी घटनात्मक तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात आहे?*

अ. 73
ब. 14
क. *40 ☑*
ड. 44

*30. ग्रामसभेचे कामकाज सुरू करण्यासाठी किती गणपूर्ती आवश्यक असते?*

अ. 10%
ब. *15% ☑*
क. 20%
ड. 25%

*31. वेबसाईट वरील वेब पेजचा पत्यास काय म्हणतात?*

अ. *URL ☑*
ब. HTTP
क. Browser
ड. Email

*32. इंटरनेट मध्ये जोडलेल्या संगणकाच्या ॲड्रेसला काय म्हणतात?*

अ. Email
ब. Browser
क. WWW
ड. *इंटरनेट प्रोटोकॉल ☑*

*33. FTP चे विस्तारीत रूप काय आहे?*

अ. File Transfer Procedure
ब. File Transport Protocol
क. *File Transfer Protocol ☑*
ड. Fully Transfer Protocol

*34.खालील पैकी कोणत्या टेक्नोलॉजीचा 4G मध्ये समावेश होतो?*

अ. जीएसएम
ब. *युएलबी ☑*
क. सीडीएमए
ड. जीपीएस

*35. सायबर स्पेस ही प्रथम संकल्पना कोणी मांडली?*

अ. विल्यम वर्डसवर्थ
ब. विल्यम जॉर्डन
क. *विल्यम गिब्सन ☑*
ड. विल्यम स्मिथ

उत्तर - क. विल्यम गिब्सन

*36. खालील पैकी कोणता आऊटपुट डिव्हाइस आहे?*

अ. की बोर्ड
ब. जॉयस्टीक
क. माऊस
ड. *मॉनिटर ☑*

*37. कोणत्या कंपनीने पहिले व्यावसायिक संगणक तयार केले?*

अ. *रेमिग्टंन रॅड ☑*
ब. IBM
क. पास्कल
ड. मायक्रोसॉफ्ट

*38. _ चा वापर हे तिसर्या पिढीतील संगणकाचे वैशिष्ट्य होते.?*

अ. व्हक्युम ट्यूब
ब. *इंटिग्रेटेड सर्किट ☑*
क. चीप
ड. आर्टीफीशल इंटलिजन्ट

*39. ____ हे माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे साधन आहे. ?*

अ. दुरदर्शन
ब. टेलिफोन
क. उपग्रह
ड. *वरील सर्व ☑*

*40. जगभरात पसरलेल्या व एकमेकांना जोडलेल्या संगणकाच्या जाळ्याला काय म्हणतात?*

अ. *इंटरनेट ☑*
ब. ईमेल
क. टेलिफोन
ड. ईकॉमर्स

*41. खालील पैकी कोणता आऊटपुट डिव्हाइस आहे?*

अ. की बोर्ड
ब. जॉयस्टीक
क. माऊस
ड. *मॉनिटर ☑*

*42. कोणत्या कंपनीने पहिले व्यावसायिक संगणक तयार केले?*

अ. *रेमिग्टंन रॅड ☑*
ब. IBM
क. पास्कल
ड. मायक्रोसॉफ्ट

*43. _ चा वापर हे तिसर्या पिढीतील संगणकाचे वैशिष्ट्य होते.?*

अ. व्हक्युम ट्यूब
ब. *इंटिग्रेटेड सर्किट ☑*
क. चीप
ड. आर्टीफीशल इंटलिजन्ट

*44. ____ हे माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे साधन आहे. ?*

अ. दुरदर्शन
ब. टेलिफोन
क. उपग्रह
ड. *वरील सर्व ☑*

*45. जगभरात पसरलेल्या व एकमेकांना जोडलेल्या संगणकाच्या जाळ्याला काय म्हणतात?*

अ. *इंटरनेट ☑*
ब. ईमेल
क. टेलिफोन
ड. ईकॉमर्स

सराव प्रश्नसंच - अर्थशास्त्र

*46. कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र या दोन्हीचा समावेश असतो?*

अ. समाजवादी
ब. भांडवलशाही
क. साम्यवादी
ड. *मिश्र ☑*

*47. गरीबी हटाव ही कोणत्या पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्ट होती?*

अ. पहिल्या
ब. सहाव्या
क. चौथ्या
ड. *पाचव्या ☑*

*48. सेज हे कशाशी संबंधित आहे?*

अ. *उद्योगधंदे ☑*
ब. शेती
क. मत्यव्यवसाय
ड. पर्यावरण

*49. चलनाच्या अवमुल्यनाने काय होते?*

अ. आयात वाढते
ब. *निर्यात वाढते ☑*
क. बेरोजगारी वाढते
ड. निर्यात कमी होते

*50. मुंबई योजनेला प्रत्युत्तर म्हणून कोणी जनता योजना मांडली?*

अ. नारायण अग्रवाल
ब. जयप्रकाश नारायण
क. *एम. एन. रॉय ☑*
ड. सदाशिव वर्ते

भारत विकणार सुपरसॉनिक ‘ब्रह्मोस’ मिसाइल

✍ब्रह्मोस हे आजच्या घडीला भारताकडे असलेले सर्वात घातक क्षेपणास्त्र आहे. मागच्या काही काळापासून भारत हे क्षेपणास्त्र अन्य देशांना विकण्याचा प्रयत्न करत आहे.

✍तर लवकरच फिलीपाईन्स ब्रह्मोस क्षेपणास्त्र विकत घेणारा पहिला देश बनू शकतो. सध्या भारत आणि फिलीपाईन्समध्ये ब्रह्मोसची विक्री किंमत निश्चित करण्यावरुन चर्चा सुरु आहे. 2020 पर्यँत हा करार प्रत्यक्षात आणण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न आहे.

✍ब्रह्मोस हे भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. भारताची मागच्या काही वर्षांपासून थायलंड, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम या देशांबरोबर ब्रह्मोस विक्रीबद्दल चर्चा सुरु आहे.तसेच ब्रह्मोस हे सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल असून ते  जमीन आणि पाण्यातून हल्ला करण्यासाठी सक्षम  आहे.

✍तर वेगवेगळया चाचण्यांनंतर फिलीपाईन्सच्या लष्कराने ब्रह्मोस विकत घेण्याचे सुनिश्चित केले आहे. आता फक्त किंमतीवरुन चर्चा सुरु आहे. या संरक्षण व्यवहारासाठी भारताने फिलीपाईन्सला 10 कोटी डॉलर्सचे कर्ज देण्याची तयारी दाखवली आहे.

✍पण फिलीपाईन्स स्वत:च्या पैशाने हे क्षेपणास्त्र विकत घेण्याचा विचार करत आहे.त्यासाठी पुढच्यावर्षीच्या अर्थसंकल्पात ब्रह्मोसच्या खरेदीसाठी तरतूद करण्याचा फिलीपाईन्सचा विचार आहे. भारतीय लष्कर आणि नौदलाने ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वापर सुरु केला आहे.

✍ब्रह्मोस हे नाव भारतातील ब्रह्मपुत्रा आणि रशियातील मॉस्क्वा या दोन नद्यांच्या नावांतील सुरुवातीची अक्षरे एकत्र करून बनवले आहे. ब्रह्मोसचा पल्ला 290 किमी असून त्यावर 300 किलो वजनाची पारंपरिक स्फोटके किंवा अण्वस्त्रे बसवता येतात.

✍ब्रह्मोस सध्या जगातील सर्वात वेगवान आणि अचूक क्रूझ क्षेपणास्त्र मानले जाते. त्याचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा 2.8 ते 3 पट आहे. म्हणजे ब्रह्मोस एका सेकंदात 1 किमी अंतर पार करते.

✍तसेच त्याची नेम चुकण्याची क्षमता (सक्र्युलर एरर प्रॉबेबिलिटी – सीईपी) 1 मीटरपेक्षा कमी असल्याचा दावा केला जातो. म्हणजेच त्याची अचूकता 99.99 टक्के  आहे.

✍क्रूझ क्षेपणास्त्र असल्याने ब्रह्मोस जमिनीपासून कमी उंचीवरून प्रवास करून शत्रूच्या रडारला चकवा देऊ शकते.
तसेच मार्ग बदलून क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणांपासून बचाव करून घेऊ शकते.

✍ब्रह्मोस जमीन, पाणी तसेच हवेतून डागता येते. भारताच्या तिन्ही सेनादलांत आणि रशियाच्या सैन्यात ब्रह्मोस तैनात केले जात आहे.

सराव प्रश्नसंच - चालू घडामोडी

● जगातली सर्वाधिक मानधन मिळविणारी महिला खेळाडू खोण आहे?

अ. सेरेना विल्यम्स
ब. सिमोना हलेप
क. हरमनप्रीत कौर
ड. सानिया नेहवाल

उत्तर - अ. सेरेना विल्यम्स

● कोणत्या शहरात दहाव्या ‘आशिया जलतरण महासंघ एशियन एज ग्रुप अजिंक्यपद 2019’ या स्पर्धा आयोजित केली आहे?

अ. मुंबई
ब. चेन्नई
क. बेंगळुरू
ड. दिल्ली

उत्तर - क. बेंगळुरू

● पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी कोणी स्वीकारली?

अ. के. श्रीकांत
ब. आर. के. मिश्रा
क. सचिन मेहता
ड. मनोज शर्मा

उत्तर - अ. के. श्रीकांत

● ऑगस्टमध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार्‍या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाचे नाव काय ?

अ. ए.बी.डिव्हीलियर्स
ब. मोर्नी मोर्कल
क. डेल स्टेन
ड. हाशिम अमला

उत्तर - क. डेल स्टेन

● कोणी ATP वॉशिंग्टन ओपन 2019’ या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद जिंकले?

अ. डॅनिल मेदवेदेव
ब. नोव्हाक जोकोविच
क. राफेल नदाल
ड. रॉजर फेडरर

उत्तर - अ. डॅनिल मेदवेदेव

● बंधन बँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ आणि संशोधन विभागाचे प्रमुख म्हणून कोणाची नेमणूक केली?

अ. प्रमोद वाजपेयी
ब. सिद्धार्थ सन्याल
क. चंद्रशेखर घोष
ड. सागर प्रसाद

उत्तर - ब. सिध्दार्थ सन्याल

● CEO World 2019 या मासिकेच्या जगातले सर्वाधिक प्रभावशाली मुख्य कार्यकारी अधिकारी’ या जागतिक मानांकन यादीत प्रथम क्रमांकावर कोण आहे?

अ. मुकेश अंबानी
ब. सुंदर पिचाई
क. डगलस मॅकमिलन
ड. लक्ष्मी मित्तल

उत्तर - क. डगलस मॅकमिलन

● सीमा सुरक्षा दलाचे नवे महासंचालक (DG) म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली?

अ. व्ही. के. जोहरी
ब. राजेंद्र कूमार
क. राहुल वर्मा
ड. दीपक मिश्रा

उत्तर - अ. व्ही. के. जोहरी

● 22 वी ‘राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद 2019’ आयोजित करण्यात येणार आहे?

अ. दिल्ली
ब. मुंबई
क. रांची
ड. शिलाँग

उत्तर - ड. शिलाँग

● कोणाची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळावर संचालकपदी नेमणूक करण्यात आली?

अ. अतनू चक्रवर्ती
ब. अजय सिंग
क. राजेंद्र प्रजापती
ड. राकेश वर्मा

उत्तर - अ. अतनू चक्रवर्ती

● भारताने कोणत्या देशाला विकास प्रकल्पांसाठी अर्थसहाय्य म्हणून 100 दशलक्ष डॉलरची पतमर्यादा देवू केली?

अ. श्रीलंका
ब. बेनिन
क. नेपाळ
ड. भूटान

उत्तर - ब. बेनिन

अमेरिकन आयोगाची अमित शाहंवर निर्बंध लादण्याची मागणी :

आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या अमेरिकन आयोगाने केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा विधेयकावर तीव्र आक्षेप घेतला आहे. हे चुकीच्या दिशेने जाणारे धोकादायक वळण आहे असे अमेरिकन आयोगाने म्हटले आहे. हे विधेयक भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर अमेरिकेने निर्बंध घालावेत अशी मागणी आयोगाने केली आहे.

आठ तासांच्या वादळी चर्चेनंतर सोमवारी मध्यरात्री लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने ३११ तर विरोधात ८० मते पडली. आता हे विधेयक मंजुरीसाठी राज्यसभेत मांडले जाणार आहे. या विधेयकानुसार ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या हिंदू, शीख, पारशी, जैन, बौद्ध आणि ख्रिश्चन नागरीकांना यापुढे बेकायद मानले जाणार नाही. त्यांना भारतीय नागरीकत्व बहाल करण्यात येईल.

“कॅब संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले तर अमेरिकेने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अन्य प्रमुख नेत्यांवर निर्बंध लावण्याचा विचार करावा” असे अमेरिकेच्या यूएससीआयआरएफ आयोगाने म्हटले आहे.

जगातील सर्वात तरुण पंतप्रधान

☘️ फिनलंडच्या पंतप्रधानपदी साना मरिन (वय 34) यांची निवड झाली आहे. त्या देशाच्या इतिहासातील व जगातीलही सर्वांत कमी वयाच्या पंतप्रधान ठरल्या आहेत.

🍀 फिनलंडच्या सत्ताधारी सोशल डेमॉक्रॅटिक पक्षाने मरिन यांची पंतप्रधानपदी निवड झाल्याची घोषणा केली. या आधी त्या परिवहनमंत्री होत्या. 

🍀 मरिन या फिनलंडच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत.

🍀 माजी पंतप्रधान ऍन्टी रिने यांनी 3 डिसेंबर रोजी पदाचा राजीनामा दिल्यानंतर काल नव्या पंतप्रधानांची निवड झाली.

🍀 "सेंटर पार्टी' पक्षाचे नेते इस्को अहओ हे 1991 फिनलंडच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले होते.

🍀 त्या वेळी ते 36 वर्षांचे होते.

🍀 मरिन या त्यांच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहेत.

🍀 जगातील सर्वांत कमी युक्रेनचे 35 वर्षांचे पंतप्रधान ओलेस्की हॉंचारुक हे जगातील सर्वांत कमी वयाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी 21 ऑगस्ट 2019 रोजी देशाचे नेतृत्व स्वीकारले होते.

जगातील : सात खंड 

👉 आशिया - ४,४२,५०,००० चौ किमी

👉 आफ्रिका - ३,०२,६४,००० चौकिमि

👉 उत्तर अमेरिका - २,४३,९७,००० चौकीमी

👉 दक्षिण अमेरिका - १,७७,९३,००० चौकीमी

👉 अंटार्टिका - १,३२,०९,००० चौकिमि

👉 युरोप - १,०४,५३,००० चौकिमि

👉 आस्ट्रेलिया - ८९,२३,००० चौकिमि

जिल्हा व त्याचे महत्व

१)मुंबई*——–भारताचे प्रवेशद्वार,
भारताचे प्रथम क्रमांकाचे
औद्योगिक शहर,भारताची,
राजधानी

*२)रत्नागिरी*—देशभक्त व
समाजसेवकांचा जिल्हा

*३)सोलापूर*—-ज्वारीचे कोठार,
सोलापुरी चादरी

*४)कोल्हापुर*–कुस्तीगिरांचा जिल्हा
गुळाचा जिल्हा

*५)रायगड*—–तांदळाचे कोठार व
डोंगरी किल्ले असलेला
जिल्हा

*६)सातारा*—-कुंतल देश व शुरांचा
जिल्हा

*७)बिड*——जुन्या मराठी कविंचा
जिल्हा,मिठगरांचा जिल्हा,
देवळादेवळा जिल्हा, ऊस
कामगारांचा जिल्हा

*८)परभणी*—ज्वारीचे कोठार

*९)उस्मानाबाद*–श्री.भवानी मातेचा
जिल्हा

*१०)औरंगाबाद*–वेरुळ-अजिंठा
लेण्यांचा जिल्हा,
मराठवाडयाची
राजधानी

*११)नांदेड*–संस्कृत कवींचा जिल्हा

*१२)अमरावती*–देवी रुख्मिणी व
दमयंतीचा जिल्हा

*१३)बुलढाणा*–महाराष्ट्राची
कापसाची बाजारपेठ

*१४)नागपुर*—-संत्र्यांचा जिल्हा

*१५)भंडारा*—–तलावांचा जिल्हा

*१६)गडचिरोली*–जंगलांचा जिल्हा

*१७)चंद्रपुर*—-गौंड राजांचा जिल्हा

*१८)धुळे*—-सोलर सिटीचा जिल्हा

*१९)नंदुरबार*-आदिवासी बहुल
जिल्हा

*२०)यवतमाळ*-पांढरे सोने-
कापसाचा जिल्हा

*२१)जळगाव*–कापसाचे शेत,
केळीच्या बागा,
अजिंठा लेण्यांचे
प्रवेशद्वार

*२२)अहमदनगर*-साखर कारखाने
असलेला जिल्हा

*२३)नाशिक*—मुंबईची परसबाग,
द्राक्षांचा जिल्हा,मुंबईचा
गवळीवाडा

२४) सांगली – हळदीचा जिल्हा ,
कलावंतांचा जिल्हा

चौथी ‘भारत जल प्रभाव शिखर परिषद’ नवी दिल्लीत संपन्न

● कालावधी :- 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर 2019

●विषय:- 'व्हॅल्यूइंग वॉटर - ट्रान्सफॉर्मिंग गंगा'

● उद्घाटन :- जल शक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत हस्ते

● आयोजक:-
IIT कानपूरच्या नेतृत्वात भारत सरकारचे 1.जल शक्ती मंत्रालय आणि
2.सेंटर फॉर गंगा रिव्हर बेसिन मॅनेजमेंट अँड स्टडीज (cGanga) या संस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

▪️कार्यक्रमातल्या ठळक बाबी

- पाणीपुरवठ्याशी संबंधित मुद्द्यांवर आणि त्याच्या संवर्धनाबाबत उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

-कार्यक्रमादरम्यान, 'रिव्हर रिस्टोरेशन अँड कन्झर्वेशन - ए कॉन्सिस मॅन्युअल अँड गाईड' यासंबंधीचा अहवाल तसेच आतापर्यंत विकसित केलेल्या 'गंगा हब' यांचा हवाला जाहीर करण्यात आला.
-बैठकीत ग्रामीण व शहरी भागातल्या जलसंपत्तीच्या एकात्मिक व्यवस्थापनावर भर देण्यात आला.
--------------------------------------------------------------
   
--------------------------------------------------------------

परावर्तन

नमुनेदार प्रतिबिंबांचे रेखाचित्र

प्रतिबिंब दोन प्रकारांमध्ये विभागले जाऊ शकते: स्पेक्युलर रिफ्लेक्शन आणि डिफ्यूज रिफ्लेक्शन्स 

. विशिष्ट प्रतिबिंब मिररसारख्या पृष्ठभागाच्या चमकांचे वर्णन करते, जे प्रकाश, सोप्या आणि अंदाजानुसार प्रतिबिंबित करते. 

हे प्रतिबिंबित प्रतिमांच्या निर्मितीस अनुमती देते जे अंतराळातील वास्तविक ( वास्तविक ) किंवा एक्स्ट्रोपोलेटेड ( आभासी ) स्थानाशी संबंधित असू शकते .

 डिफ्यूज प्रतिबिंब कागदावर किंवा रॉकसारख्या चमकदार नसलेल्या पदार्थांचे वर्णन करते. 

या पृष्ठभागावरील प्रतिबिंबांचे वर्णन केवळ आकडेवारीनुसार केले जाऊ शकते, साहित्याच्या सूक्ष्म रचनांवर अवलंबून प्रतिबिंबित प्रकाशाचे अचूक वितरण. 

लम्बर्टच्या कोसाइन कायद्याद्वारे बरेच डिफ्यूज रिफ्लेक्टर वर्णन केले आहेत किंवा अंदाजे केले जाऊ शकतातजे कोणत्याही कोनातून पाहिले असता समान चमकदार पृष्ठभागांचे वर्णन करते . 

चमकदार पृष्ठभाग सट्टेबाज आणि डिफ्यूज दोन्ही प्रतिबिंब देऊ शकतात.

तुम्हाला हे माहितीच हवे - भारतातील सर्वात मोठे 10 चर्चित घोटाळे

⭐️ देशाच्या स्वातंत्र्यापासून ते आतापर्यंत देशात अनेक मोठे घोटाळे झाले आहे. परंतु आज आम्ही आपणास अशा घोटाळ्यांची माहिती देत आहोत ज्याची जगभरात चर्चा झाली.

1⃣ जीप घोटाळा : हा देशातील सगळ्यात पहिला घोटाळा होता. भारताला स्वांतत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने लंडनमधील एका कंपनीसोबत 2000 जीपचा करार केला होता. हा करार 80 लाखांचा होता. मात्र 155 जीपच मिळू शकल्या. या घोटाळ्यात भारतीय उच्चायुक्त व्ही.के.मेनन यांचा हात असल्याचे वृत्त समोर आले होते.

2⃣ कोळसा घोटाळा : या घोटाळ्यात कोळशाचे चुकीच्या पद्धतीने वाटप झाले. कोणतीही सनदी प्रक्रिया न करता कोळशाच्या ब्लॉकचा लिलाव करण्यात आला, ज्यामुळे 1.86 लाख कोटींचे नुकसान झाले. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात हा घोटाळा झाला.

3⃣ तेलगी स्टॅम्प घोटाळा : बनावट मुद्रांक शुल्क घोटाळ्यात अब्दुल करीम तेलगीने देशाला जवळपास 20 हजार कोटींचा चुना लावला होता. अब्दुल करीम तेलगीने बनावट स्टॅम्प पेपर छापले होते. या बनावट स्टॅम्प पेपरची बँका आणि अनेक संस्थांना त्याने विक्री केली होती.

4⃣ बोफोर्स तोफ घोटाळा : 1987 मध्ये स्वीडनची एक कंपनी बोफोर्स एबी कडून लाच घेतल्याप्रकरणी राजीव गांधीसकट अनेक मोठे नेते अडकले होते. प्रकरण असे होते की भारतीय 155 मिमी च्या फिल्ड हॉवीत्जरच्या बोलीवर या नेत्यांनी जवळपास 64 कोटींचा घपला केला होता.

5⃣ 2जी स्पेक्ट्रम घोटाळा : 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा भारतातील सर्वात मोठा घोटाळा आहे. हा एकूण 1.76 लाख करोड रुपयांचा घोटाळा झाला. माजी दूरसंचार मंत्री ए राजा आणि कनिमोळी यांना या घोटाळ्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

6⃣ कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा : कॉमनवेल्थ घोटाळ्यामध्ये जवळपास 70 हजार कोटींचा घोटाळा उघड आला होता. घोटाळ्याचे सूत्रधार होते आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी आणि त्यांचे सहकारी.या घोटाळ्यात यंत्रसामग्री निश्चित किमतीपेक्षा दुपटीने खरेदी करण्यात आली होती.

7⃣ सत्यम घोटाळा : सत्यम घोटाळा कॉर्पोरेट जगतातील आतापर्यंतचा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. आयटी कंपनी 'सत्यम कंम्प्यूटर सर्विस'ने रियल इस्टेट आणि शेअर मार्केटच्या माध्यमातून जवळपास 14 हजार कोटींची आफरातफरी केली होती.

8⃣ चारा घोटाळा : 1996 मध्ये चारा घोटाळ्यात 900 कोटींचे नुकसान झाले, जी त्या काळची सर्वात मोठी रक्कम होती. या घोटाळ्यात बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव मुख्य आरोपी आहेत.

9⃣ हवाला स्कँडल : हवाला स्कँडल 1996 मध्ये जनतेसमोर आले. यात ज्यांची नावे समोर आली ते सरकार चालवत होते. अनेक नेत्यांवर आरोप लागले की, ते हवालाच्या दलालांकडून लाच घेत होते. या घोटाळ्यात भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी यांचे नाव समोर आले होते.

🔟 स्टॉक मार्केट घोटाळा : स्टॉक ब्रोकर केतन पारेखने स्टॉक मार्केटमध्ये 1,15,000 कोटींचा घोटाळा केला होता. डिसेंबर, 2002 मध्ये त्याला अटक करण्यात आले होते.

Latest post

रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera)

📌हे सर्वांत साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना 'स्पंज' म्हणतात.  ➡️त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद...