Saturday 21 September 2019

चालू घडामोडी वन लाइनर्स, 21 सप्टेंबर 2019.


✳ पुरुष वर्ल्ड बॉक्सिंग स्पर्धेची सुरुवात रशियामध्ये

✳ अमित पानघलने वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला

✳ अमित पन्हाळ अंतिम सामन्यात पुरुषांच्या वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिपमध्ये प्रवेश मिळवणारे पहिले भारतीय व्हा

✳ मनीष कौशिक कांस्यपदक जागतिक बॉक्सिंग चँपियनशिपमध्ये  63 केजी गटात

✳ मनीष कौशिक पुरुषांच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत पदक जिंकणारा 5 वा भारतीय खेळाडू ठरला

✳ कझाकस्तानमध्ये 16 व्या जागतिक कुस्ती स्पर्धेस प्रारंभ

✳ जागतिक कुस्ती स्पर्धेत 57 केजी गटात रवी कुमारने कांस्यपदक जिंकले

✳ गोव्यात  37 वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेची बैठक

✳ वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये 65 किलोग्राम प्रकारात बजरंग पुनियाने कांस्यपदक जिंकले

✳ 9 वा रग्बी वर्ल्ड कप 2019 ची सुरुवात जपानमध्ये

✳ अमित शहा यांनी आपत्कालीन प्रतिसाद सहाय्य प्रणाली (ईआरएसएस) - '112' हेल्पलाइन सुरू केली

✳ अमित शहाने '' ई-साथी '' मोबाइल .प्लिकेशन सुरू केले

✳ क्रीडा मंत्रालयाने गगन नारंगच्या अकादमीसाठी 5 कोटींची घोषणा केली

✳ फ्रान्सकडून भारताला पहिला राफेल फायटर जेट "आरबी -001" प्राप्त झाला

✳ एशियन टेबल टेनिस स्पर्धा इंडोनेशियामध्ये सुरू होईल

✳ जी सॅथियान पहिला भारतीय खेळाडू एशियाई टेबल टेनिस चँपियनशिपचा उपांत्य-अंतिम सामना करेल

✳ महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी आज ईसीआय तारखा जाहीर करणार

✳ राष्ट्रपतींनी मद्रास हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश व्ही.के. ताहिलरामनी यांचा राजीनामा स्वीकारला

✳ मधुकर कामथ ऑडिट ब्युरो ऑफ सर्कुलेशन्सचे अध्यक्ष (एबीसी)

✳ विनीत कोठारी यांची मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती

✳ अनिल कुमार जैन यांची नवीन कोळसा सचिवपदी नियुक्ती

✳ आरबीएस बँकेने अ‍ॅलिसन रोजला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे

✳ इंडोनेशियाची संयुक्त राष्ट्रसंघाच्या 74 व्या महासभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली

✳ जॉन थॉमस यांनी दक्षिणी रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला

✳ पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 दिवसांच्या अमेरिकेच्या दौर्‍यावर रवाना

✳ बीबीसीने मुलांसाठी '' डिजिटल वेलबिंग '' अ‍ॅप लाँच केले

✳ मध्य प्रदेश सरकारने गोविंदाला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले

✳ आयुष्मान भारत, ओला हेल्थकेअर बेनिफिट्ससाठी विस्तारित सामंजस्य करार

✳ 2020 मध्ये यूएन हवामान बदल समिटचे आयोजन करण्यासाठी ग्लासगो

✳ केनिया नोव्हेंबर 2019 मध्ये जागतिक लोकसंख्या समिटचे आयोजन करणार आहे

✳ ऑक्टोबरमध्ये रशिया-आफ्रिका समिटचे उद्घाटन सोची करणार आहेत

✳ सीएसआर समिट इंडियाचे 6 वे संस्करण नवी दिल्ली येथे होणार आहे

✳ आयआयटी मद्रासने देशाची पहिली अंतराळ टेक संशोधन बैठक आयोजित केली

✳ मायक्रोसॉफ्टने डिजिटल प्लॅटफॉर्म होस्ट करण्यासाठी आता भारताच्या इरोस बरोबर करार केला

✳ फिफा अंडर -17 डब्ल्यूसी सेवा करातून सूट: सरकार

✳ एमएचएने राष्ट्रीय एकात्मतासाठी सरदार पटेल पुरस्कार जाहीर केला

✳ चँपियन्स गोल्फ टूर्नामेंटमध्ये कपिल देवने 60-64 वयोगटातील गट जिंकला

✳ पीयूष गोयल आज युएईच्या दोन दिवसीय दौर्‍यावर येणार आहेत

✳ 1 ला राजस्थान स्टेट फुटबॉल लीग 2019 प्रारंभ झाला

✳ बी साई प्रणीथ आउट आउट चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धा.

ISRO ने चंद्राच्या कक्षेत फिरणाऱ्या ऑर्बिटरबद्दल दिली माहिती


चांद्रयान-2 मोहिमेत पाठिशी उभे राहिल्याबद्दल देशवासियांचे आभार मानल्यानंतर इस्रोने आज ऑर्बिटरच्या प्रकृतीची माहिती दिली.

ऑर्बिटरच्या पेलोडवर करण्यात आलेले प्रारंभिक प्रयोग यशस्वी ठरले आहेत. सर्व पेलोडसची कामगिरी समाधानकारक आहे असे इस्रोने म्हटले आहे.

चांद्रयान-2 चा ऑर्बिटर ठरल्याप्रमाणे सर्व वैज्ञानिक चाचण्या करत आहे. ऑर्बिटरमध्ये आठ अत्याधुनिक पेलोड आहेत.

ज्यावरुन चंद्राचा नकाशा तयार करण्यात येईल तसेच चंद्रावर पाणी, बर्फ, खनिजांचा शोध घेतला जाईल. वि
चांद्रयान-2 मोहिमेतील लँडरशी संपर्क तुटला असला तरी चंद्राच्या कक्षेत फिरत असलेला ऑर्बिटर निर्णायक ठरेल असा विश्वास काही दिवसांपूर्वी इस्रोचे प्रमुख सिवान यांनी व्यक्त केला होता.

तसेच आधी ऑर्बिटरचे आयुष्य एक वर्ष असणार होते. पण जीएसएलव्ही प्रक्षेपकाने ऑर्बिटरला अचूक कक्षेत प्रस्थापित केले तसेच त्यामध्ये इंधन जास्त असल्यामुळे ऑर्बिटर आणखी सात वर्ष कार्यरत रहाणार आहे.

पाण्यासंदर्भात महत्वपूर्ण शोध ऑर्बिटरच्या माध्यमातून लागू शकतो.

ऑर्बिटरमुळे चंद्रावर बर्फ आणि पाणी शोधून काढण्याची संधी आहे. चंद्राच्या पृष्ठभागाखाली 10 मीटरपर्यंत गोठलेले पाणी पाहण्याची क्षमता आमच्याकडे आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

ग्लोबल वॉर्मिंगचा वेग भविष्यात वाढणार

वातावरणातील कार्बन डायऑक्साइडची पातळी ज्या प्रमाणात वाढत आहे, त्या प्रमाणात जागतिक तापमानातही वाढ होत असल्याचे निरीक्षण एका अभ्यासातून मांडण्यात आले आहे. यासाठी ५० दशलक्ष वर्षांपूर्वीच्या तप्त वातावरणाची तुलना करण्यात आली आहे. काही नाही वाढणार, आजकाल लोकं एवढी झाडे लावतायेत की वातावरण सद्य परिस्थिती पेक्षा शुद्ध होईल.
सुमारे ४८ दशलक्ष ते ५६ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या काळाला 'अर्ली ओसीन' काळ म्हटले जात असून या कालावधीत जगभरात गेल्या ६६ दशलक्ष वर्षांतील सर्वाधिक तापमान होते, असे मानले जाते. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठ आणि अॅरिझोना विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी या 'अर्ली ओसिन' कालावधीचा अभ्यास करून हे मत मांडले आहे.

वातावरणातील कार्बन डायऑक्साइड ज्या प्रमाणात वाढत आहे, त्याचा परिणाम वातावरणावर होत असल्याबद्दल शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. भविष्यात कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण जसे वाढेल, त्यानुसार तापमानवाढीचा वेगही आतापेक्षा अधिक वाढणार आहे आणि ही नक्कीच आपल्यासाठी चांगली बातमी नाही, अशा शब्दांत शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. शास्त्रज्ञांनी याआधी 'अर्ली ओसीन' या काळातील कार्बन डायऑक्साइडच्या प्रमाणाशी याआधीही तुलना केली होती, मात्र तेव्हा त्यांना अशी चिंताजनक तापमानवाढ आढळली नव्हती. त्यांनी वातावरणअभ्यासाच्या तंत्रामध्ये बदल करून त्यात ढगांचे प्रमाण तपासण्याची पद्धत अवलंबल्यानंतर शास्त्रज्ञांना हा बदल आढळून आला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीच्या वातावरणातील ढगांचे प्रकार आणि त्यांच्या प्रमाणामध्ये बदल होतात आणि ढगांमुळे वातावरणावर उष्ण आणि शीत परिणाम होतात.

ढगांचा वातावरणातील बदलावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला असता, भविष्यात वातावरणातील बदल वाढून तापमानवाढ होणार असल्याचे मत शास्त्रज्ञांनी मांडले. भूगर्भशास्त्रीय पुराव्यानुसार 'अर्ली ओसीन' काळात कार्बन डायऑक्साइडची पातळी प्रती एक दशलक्षमागे एक हजार होती (पीपीएम), ही पातळी सध्याच्या स्थितीत ४१२ आहे. कार्बन उत्सर्जनावर निर्बंध न आणल्यास ही पातळी सन २१०० पर्यंत १०००वर पोहोचेल, अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

बाबर (सन 1526 ते 1530)

बाबर हा मुघल साम्राज्याचा संस्थापक होय. दिल्लीमध्ये रब्राहीम लोदी सत्तेत असतांना पंजाबच्या प्रांताधिकारी दौलतखान लोदीने बाबरला भारतात आक्रमण करण्यास पाचारण केले.

बाबरने सन 1526 मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाईत इब्राहीम लोदीचा पराभव करून मुघल साम्राज्याची स्थापना केली. त्याच्या साम्राज्याला राजपुतान्यातील राजपूतांनी आव्हान दिले.

सन 1527 मध्ये खुनव्याच्या लढाईत बाबरने संघटीत राजपुतांचा पराभव केला आणि आपली दिल्लीची सत्ता मजबूत केली.

2. हुमायूम (सन 1530 ते 1555) :

बाबरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हुमायूम सत्तेत आला.

बिहारमधील अफगाणचा प्रमुख शेरशहा सुरीने चौसाच्या लढाईत हुमायूमचा पराभव केला.

यामुळे हुमायूमला पळून जावे लागले चौसाच्या दुसर्‍या लढाईत (सन 1540) हुमायूचा दुसर्‍यांदा पराभव करून मुघलांची सत्ता संपूष्ठात आणली.

पुढे हुमायूमला सत्तेविना भटकंती करावी लागली.

3. शेरशहा सूरी (सन 1540 ते 1554) :-

सन 1540 मध्ये चौसाच्या लढाईत शेरशहा सुरीने हुमायूमचा करून सूरी वंशाची स्थापना केली. शेरशहाने जनतेच्या हितार्थ अनेक योजना सुरू केल्या.

जमीन महसूल सुधारणा: –

शेतीची प्रत निश्चित करून उत्पादनानुसार शेतसारा निश्चित केला.

रस्ते बांधणी :-

राजधानीला जोडणार्‍या रस्त्याचे बांधकाम हाती घेतले. दिल्ली अमृतसर राजमार्ग त्याच्याच काळात पूर्ण झाला.

चलन व्यवस्था :-

त्याने रुपया हे नाणे सुरू केले.

टपाल व्यवस्था :-

राजधानी मध्ये टपाल व्यवस्था सुरू केली.

4. हुमायूम (सन 1555 ते 1556) :

हुमायूमला शेरशहा सूरी सत्तेत असेपर्यंत काहीही करता आले नाही.

शेरशहा सूरीच्या मृत्यूनंतर मुहम्मद आदिलशहा सत्तेत आला. हा विलासी राजा होता.

सन 1555 मध्ये सिकंदर सूरी चा पराभव करून सूरी वंशाची सत्ता संपुष्टात आणली आणि दिल्लीवर पुन्हा आपला ताबा मिळविला. परंतु, त्यास ही सत्ता फार दिवस उपभोगता आली नाही.

सन 1556 मध्ये जिन्यावरुन घसरून मरण पावला.

5. अकबर (1556 ते 1606) :

सम्राट अकबराने अल्पावधीमध्येच अर्ध्या भारतावर आपली सत्ता स्थापित केली.

राणा प्रतापच्या प्रखर विरोधामुळे मेवाड मात्र त्यास आपल्या साम्राज्यात सामील करता आले नाही.

अकबर हा सहष्णू राजा होता.

सर्व धर्माच्या लोकांना विश्वासात घेवून त्याने आपला साम्राज्य विस्तार केला. यामुळे तो सर्व लोकांमध्ये प्रसिद्धीला आला होता.

महत्वाच्या सुधारणा :-

त्याने युद्धकैद्यांना गुलाम बनविण्याची प्रथा बंद केली.

सतीप्रथा बंद करण्याचा प्रयत्न केला.

हिंदूवर लादण्यात आलेला झिझिया कर रद्द केला.

बालहत्या प्रथा बंद केली.

सर्व धर्माची तत्वे एकत्र करून दिन-ए-रलाही धर्माची स्थापना केली.

कला व विद्याप्रेमी :-

अकबराच्या काळात आगर्‍याचा किशाल किल्याचे व फत्तेपूर शिक्रीचा किल्ला बांधला.

अकबराच्या काळातच तानसेन व बैजू बाबरा सारखे गायक प्रसिद्धीला आले.

अकबराच्या काळात अथर्ववेद, पंचतंत्र, रामायण व महाभारताचे फारसी भाषेत रूपांतर करण्यात आले.

तुलसीदासचे रामचरितमानस याच काळात रचले गेले.

अकबराच्या नवरत्न दरबार प्रसिद्ध होता.

6. जहांगीर (1606 ते 1627) :

अकबराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जहांगीर सत्तेमध्ये आला. त्याने अकबराचे राज्य विस्तारचे धोरणपुढे चालू ठेवले.

त्याने पूर्व बंगाल व पंजाबमधील कांगडा प्रांत राज्यास जोडले. हा राजा कलाप्रेमी होता.

मुघल चित्रकलाशैली याच राज्याच्या काळात प्रसिद्धीला आली.

काश्मिरमधील प्रसिद्ध निशांत बाग व शालिमार बाग जहांगीर राजनेच बांधली.

जाहांगीरच्या कारभारावर नूरजहांचे नियंत्रण होते.

7. शहाजहान (सन 1627 ते 1658) :

जहांगीरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा शहाजहान गादिवर आला. त्याने दक्षिणकडे आपला राज्यविस्तार केला.

त्याने दक्षिणेतील आदिलशाही आणि कुतूबशाहींना आपले प्रभुत्व मान्य करण्यास भाग पाडले आणि त्याच्या मदतीने निझामशाही संपुष्टात आणली.

अशाप्रकारे दक्षिणेकडे आपली सत्ता प्रस्तापित केली.

शहाजहान हा कलाप्रेमी राजा होता. त्याने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ ताजमहल नावाची जगप्रसिद्ध वास्तु बांधली. दिल्ली जामा मशीद आली लाल किल्ला हे याच राज्याच्या काळात बांधले गेले.

8. औरंगजेब (सन 1658 ते 1707) :

सन 1657 मध्ये शहाजहान आजारी पडला असता त्याने शहाजहानला नजरकैदेत टाकून स्वत:ला सम्राट घोषित केले.

औरंगजेबाच्या काळापर्यंत मुघल साम्राज्याची सत्ता संपूर्ण भारतभर पसरली होती. औरंगजेब हा सुन्नी विचाराचा असल्यामुळे व संशयी स्वाभावामुळे बरेचशे सरदार व अधिकारी दुखावल्या गेले. याच काळात पंजाब प्रांतात शिखांविरुद्ध संघर्ष सुरू झाला होता आणि महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती.

औरंगजेबास आपली 21 वर्षे मराठ्यांसोबत संघर्ष करण्यात खर्च करावी लागली. परंतु, त्यास यश आले नाही.

शेवटच्या क्षणी सन 1707 मध्ये खुल्ताबाद येथे त्याचे निधन झाले. औरंजेबानंतरचे मुघल सम्राट कमकुवत निघाल्यामुळे प्रांतिक नवाबांनी आपले स्वतंत्र राज्य घोषित केले.

सन 1857 च्या ऊठावात शेवटचा मुघल सम्राट बहादुरशहा जफर-दूसरा यास इंग्रजांनी अटक करून ब्रम्हदेशातील रंगून येथे ठेवले आणि तेथेच त्याचे निधन झाले. अशाप्रकारे मुघल साम्राज्य संपूष्ठात आले.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन

1885 – मुंबई – ओमेशचंद्र बॅनर्जी – राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन

1886 – कलकत्ता – दादाभाई नौरोजी

1887 – मद्रास – बद्रुद्दीन तय्यबजी – पहिले मुस्लिम अध्यक्ष

1888 – अलाहाबाद – सर जॉर्ज युल – पहिले स्काटिश अध्यक्ष

1889 – मुंबई – सर विल्यम वेडरबर्ग – पहिले इंग्रज अध्यक्ष

1896 – कलकत्ता – रहेमतुल्ला सयानी – या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायल्या गेले.

1905 – बनारस – गोपाल कृष्ण गोखले – हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले.

1906 – कलकत्ता – दादाभाई नौरोजी – या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला.

1907 – सूरत – राशबिहारी बोस – राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली.

1915 – मुंबई – लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा – या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला.

1916 – लखनौ – अंबिकाचरण मुजूमदार – या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला.

1917 – कलकत्ता – डॉ. अॅनी बेझंट – राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला.

1920 – कलकत्ता(विशेष) – लाला लजपत रॉय – या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला.

1920 – नागपूर – सी. राघवाचारी – या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

1922 – गया – चित्तरंजन दास – कायदेमंडळाच्या प्रवेशावर हे अधिवेशन गाजले.

1924 – बेळगांव – महात्मा गांधी – महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले.

1925 – कानपूर – सरोजिनी नायडू – राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा.

1927 – मद्रास – एम.ए. अंसारी – सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला.

1928 – कलकत्ता – मोतीलाल नेहरू – नेहरू रिपोर्टला मान्यता देण्यात आली.

1929 – लाहो – पं. जवाहरलाल नेहरू – संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव व महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.

1931 – कराची – सरदार पटेल – मूलभूत हक्काचा ठराव पास करण्यात आला.

1936 – फैजपूर – जवाहरलाल नेहरू – ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन आणि शेतकरी व कामगारांच्या हिताचे ठराव पक्के करण्यात आले.

1938 – हरिपुरा – सुभाषचंद्र बोस –

1939 – त्रिपुरा – सुभाषचंद्र बोस –

1940 – रामगढ – अब्दुल कलाम आझाद – वैयक्तिक सत्याग्रहाची घोषणा करण्यात आली.

1940 – मुंबई – मौ. अब्दुल आझाद – चलेजाव आंदोलनाची घोषणा.

1946 – मिरत – जे. बी. कृपालानी –

भारतातील आंतरराष्ट्रीय दर्जाची विमानतळे

✈️. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ
✅  : - मुंबई 

✈️.  इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
✅.  :-  नवी मुंबई 

✈️. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ
✅.  : - कोलकत्ता

✈️. के. कामराज आंतरराष्ट्रीय विमानतळ
✅.  : - चेन्नई 

✈️. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानतळ
✅.  : - नागपूर 

✈️. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
✅.  : - हैदराबाद 

✈️. गोपीनाथ बारडोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ
✅.  : - गोहाटी 

✈️. दबोलीन आंतरराष्ट्रीय विमानतळ
✅.  :-  गोवा 

✈️. सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळ
✅.  : - अहमदाबाद 

✈️. श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ
✅.  : - श्रीनगर 

✈️ बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ
✅.  : - बंगळूर 

✈️.   मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ
✅.  :-  मंगळूर 

✈️. कलिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ
✅.  : - कलिकत

✈️.  कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ 
✅. : - कोची 

✈️.  त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ
✅.  : - तिरूअनंतपुरम 

✈️.  देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ
✅.  : - इंदौर 

✈️. श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळ
✅.  : - अमृतसर 

✈️. जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ
✅.  : - जयपूर 

✈️.   वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ
✅.  :-  पोर्टब्लेअर 

✈️. कोईमतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ
✅.  :-  कोईमतूर 

✈️.  तिरूचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ
✅.  :-  तिरूचिरापल्ली 

✈️. चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ
✅. -: लखनौ 

✈️. लालबहादुर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ
✅.  :-  वाराणशी

मिराबाईचा राष्ट्रीय विक्रम; ब्राँझपदक मात्र हुकले

◾️माजी जगज्जेती मिराबाई चानू हिने गुरुवारी जागतिक वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या ४९ किलो वजनी गटात आपला राष्ट्रीय विक्रम मोडून काढला खरा

◾️ पण ही कामगिरी तिला पदक मिळवून देण्यासाठी पुरेशी पडली नाही.

◾️२५ वर्षांच्या मिराबाईला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तीनपैकी दोन प्रयत्नांत मिराबाईने आपल्या कामगिरीतील सर्वोत्तम वजन उचलले.

◾️स्नॅचमध्ये मिराबाईने ८७ किलो तसेच क्लीन अँड जर्कमध्ये ११४ किलो वजन उचलले.

◾️असे एकूण २०१ किलो वजन मिराबाईने उचलले. मिराबाईचा याआधीचा राष्ट्रीय विक्रम आहे तो १९९ (८८ किलो+१११ किलो) किलोचा आहे.

◾️ ही कामगिरी तिने यंदा एप्रिलमध्ये पार पडलेल्या आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेत केली होती.

◾️चीनच्या जियांग हुइहुआने नवा विश्वविक्रम नोंदवत सुवर्णपदक पटकावले. तिने २१२ किलो वजन (९४+११८) उचलले.

◾️याआधीचा विश्वविक्रम चीनच्या होऊ झिहुईचा (२१०) आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू’ हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे ?

   1) उपमा    2) उत्प्रेक्षा    3) रूपक      4) अपन्हुती

उत्तर :- 2

2) अभ्यस्त शब्द ओळखा.

   1) तुरट    2) आंबट चिंबट    3) खारट      4) कडवट

उत्तर :- 2

3) स्वातंत्र्य युध्दाच्याकाळात देशभक्तांनी भोगलेल्या तुरुंगवास म्हणजे राष्ट्रहितासाठी दिलेली अग्निपरीक्षाच होती. या विधानातील
    अग्निपरीक्षा या शब्दातून कोणता अर्थ व्यक्त होतो ?

   1) लक्ष्यार्थ    2) वाच्यार्थ    3) वाक्यार्थ    4) शब्दार्थ

उत्तर :- 1

4) पुढीलपैकी न जुळणारा शब्द ओळखा.

   1) दैत्य    2) दानव      3) राक्षस      4) देव

उत्तर :- 4

5) ‘दुष्काळ’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?

   1) नापीक    2) सुकाळ    3) अवर्षण    4) कोरडा

उत्तर :- 2

6) या टोपीखाली दडलंय काय?

   1) उभयान्वयी अव्यय    2) शब्दयोगी अव्यय   
   3) क्रियाविशेषण अव्यय    4) केवलप्रयोगी अव्यय

उत्तर :- 2

7) ‘मरावे परी किर्तीरुपे उरावे !’ या वाक्यातील ‘परी’ या शब्दाने कोणते उभयान्वयी अव्यय सुचित होते.

   1) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय    2) न्युनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
   3) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय      4) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 2

8) केवलप्रयोगी अव्ययांचे एकूण प्रकार किती ?

   1) सात    2) आठ     
   3) नऊ    4) दहा

उत्तर :- 3

9) खालील वाक्यातील काळ ओळखा.

     ‘मधू लाडू खात जाईल’
   1) साधा भविष्यकाळ    2) अपूर्ण भविष्यकाळ
   3) पूर्ण भविष्यकाळ    4) रीती भविष्यकाळ

उत्तर :- 4

10) पुढील शब्दाचे लिंग ओळखा. – विदुषी

   1) पुल्लिंगी    2) नपुंसकलिंगी   
   3) स्त्रीलिंगी    4) यापैकी नाही

उत्तर :- 3

निवडणुकांच बिगुल वाजलं, महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान, 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार

महाराष्ट्रात एकूण 8.94 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्याच्या तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. आजपासून महाराष्च्र आणि हरियाणात आचारंसहिता लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर करण्यात येतील. त्यामुळे महाराष्ट्रात दिवाळीपूर्वी नवं सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रात एकूण 8.94 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

2014 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांवेळी 12 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली होती. तसंच 15 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले होती.

▪️कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम ?

1)  निवडणुकीची अधिसूचना जाहीर होण्याची तारीख – २७ सप्टेंबर

2)  उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख – ४ ऑक्टोबर

3)  अर्जांची छाननी – ५ ऑक्टोबर

4)  उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत – ७ ऑक्टोबर

5)  मतदान – २१ ऑक्टोबर

6)  मतमोजणी – २४ ऑक्टोबर

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...