Thursday 14 March 2024

चालू घडामोडी :- 15 मार्च 2024

◆ ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू हे निवडणूक आयोगाचे नवे आयुक्त, पंतप्रधानांच्या समितीने केली निवड.

◆ दरवर्षी 14 मार्च रोजी 'पाय डे' साजरा केला जातो.

◆ भारताच्या नुमालीगढ रिफायनरी लिमिटेडने बांगलादेशची राजधानी ढाका येथे आपले संपर्क कार्यालय उघडले आहे.

◆ भूतानचे पंतप्रधान दाशो शेरिंग तोबगे हे पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत.

◆ भारतीय ऑफस्पिनर 'रविचंद्रन अश्विन' आयसीसी कसोटी क्रमवारीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा गोलंदाज बनला आहे.

◆ केंद्र सरकारने दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी ‘हैदराबाद मुक्ती दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा गौरव टांझानियाचे राष्ट्रपती डॉ. सामिया सुलुहू हसन यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे.

◆ श्रीनिवासन स्वामी यांना 45व्या IAA जागतिक काँग्रेसमध्ये प्रतिष्ठित ‘IAA गोल्डन कंपास पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

◆ ‘सचिन साळुंखे’ यांना ‘प्रॉमिसिंग इन्व्हेस्टर ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाला आहे.

◆ अवजड उद्योग मंत्रालयाने ऑटोमोटिव्ह आणि ईव्ही क्षेत्रातील नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी IIT रुरकीसोबत सामंजस्य करार केला आहे.

◆ रशिया, चीन आणि इराणने ओमानच्या आखातात 'संयुक्त सराव' केला आहे.

◆ चंदीगडमध्ये 'खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन' (KIRTI) कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

◆ अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यातील गेमिथांग येथे ‘गोरसम कोरा महोत्सव’ साजरा करण्यात आला.

◆ ‘ब्रिजेश कुमार सिंग’ यांची इंडियन बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ भारताने डॉमिनिकन रिपब्लिकसोबत संयुक्त आर्थिक आणि व्यापार समिती स्थापन करण्यासाठी करार केला आहे.

◆ केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी जनऔषधी केंद्रांसाठी ‘क्रेडिट असिस्टन्स प्रोग्राम’ सुरू केला आहे.

◆ ग्रामीण विकास मंत्रालयाने MGNREGA मालमत्तेच्या देखरेखीसाठी AI आणि भू-स्थानिक तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन IIT दिल्लीसोबत भागीदारी केली आहे.

◆ "एलिस पेरी"(रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) WPL इतिहासात सहा बळी घेणारी पहिली खेळाडू बनली आहे.[मुंबई इंडियन्स विरुद्ध]

◆ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने IPL 2024 पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू असे आपले नाव बदलले.[ बंगळुरू :- बेंगळुरू]

चालू घडामोडी :- 14 मार्च 2024

◆ महाराष्ट्र राज्य सरकारने अहमदनगर शहराचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास मान्यता.

◆ पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता महाराष्ट्र राज्य सरकारने दिली आहे.

◆ दरवर्षी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी "No smoking day" साजरा करण्यात येतो.

◆ गोरासम कोरा महोत्सव अरुणाचल प्रदेश या राज्यात साजरा करण्यात येतो.

◆ महाराष्ट्र राज्यात 100 महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राची सुरुवात करण्यात येणार आहे.

◆ हिमाचल प्रदेश राज्यात स्पायडर (कोळी) च्या नविन प्रजातीचा शोध लागला आहे.

◆ रणजी चषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यात शतक झळकवणारा मुशीर खान हा सर्वात युवा मुंबईकर ठरला आहे.

◆ ‘नायब सिंग सैनी’ हरियाणाचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत.

◆ जपानी वास्तुविशारद रिकेन यामामोटो यांना प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार 2024 मिळाला आहे.

◆ स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) या जागतिक संस्थेने जारी केलेल्या अहवालानुसार, भारत हा जगातील सर्वात मोठा शस्त्र आयात करणारा देश बनला आहे.

◆ केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी 'दिल्ली ग्रामोदय अभियान' प्रकल्पाचे उद्घाटन केले.

◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील साबरमती येथे ‘कोचरब आश्रमा’चे उद्घाटन केले.

◆ 12 मार्च 2024 रोजी 'स्वामी रामकृष्ण परमहंस' यांची जयंती साजरी करण्यात आली.

◆ आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोनितपूरमध्ये 50 मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन केले.

◆ 'ॲनाबेल सदरलँड' आणि 'यशस्वी जैस्वाल' यांनी फेब्रुवारी महिन्यासाठी 'आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ'चा किताब पटकावला आहे.

◆ भारतीय लेखक अमिताव घोष यांना हवामान बदलाच्या संकटावर प्रकाश टाकल्याबद्दल नेदरलँड्सच्या प्रीमियम इरास्मियनम फाउंडेशनने 'इरास्मस पुरस्कार' 2024 ने सन्मानित केले आहे.

◆ जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ येथे उत्तर भारतातील पहिले 'सरकारी होमिओपॅथिक कॉलेज' स्थापन केले जाणार आहे.

General Knowledge टारगेट फक्त पोलिसच

·       भारतातील पहिला मेडिकल पार्क – चेन्नई (तमिळनाडू)

·       सांडपाणी व मलजल धोरण जाहीर करणारे पहिले राज्य – राजस्थान

·        आधार कार्डवर चालणारे पहिले एटीएम – डीसीबी बँक, मुंबई.

·       पहिली विमान पार्क – बगोदरा (गुजरात)

·       स्वाईन फ्ल्यूची लस मोफत देणारे राज्य – महाराष्ट्र

·       पहिले सेंद्रिय कृषी विद्यापीठ – गुजरात

·       बेटावरील पहिला जिल्हा – माजुली (आसाम)

·       पहिले आधार गाव -  टेंभली (नंदुरबार)

·       पहिले केरोसिन मुक्त शहर – चांदीगड

·       पहिले झोपडीमुक्त शहर – चांदीगड

·       देशातील पहिले बाल न्यायालय – दिल्ली

·       पहिली फूड बँक – दिल्ली

·       इ- गव्हर्नन्स धोरण राबविणारे पहिले राज्य- महाराष्ट्र

·       इ- कॅबिनेट वापरणारे पहिले राज्य – आंध्र प्रदेश

·       जन सुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य – आंध्र प्रदेश

·       वायफाय सुविधा देणारे पहिले रेल्वे स्थानक – बंगळुरू

·       राज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिले राज्य – महाराष्ट्र

·       भारतातील पहिली स्त्री बटालियन – हडीरानी (राजस्थान)

·       पहिले ई-पंचायत सुरू करणारे राज्य – महाराष्ट्र

·       ग्रामपंचायतीमध्ये ई-बँकिंग सुविधा देणारे पहिले राज्य – महाराष्ट्र

·       सिकलसेल आजार ग्रस्तांना मोफत एसटी प्रवास सुविधा देणारे राज्य – महाराष्ट्र

·       क्रीडा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य – महाराष्ट्र

·       युवा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य – महाराष्ट्र

·       भूजलसंबंधी कायदे करणारे पहिले राज्य – महाराष्ट्र

·       स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ईव्हीएमवर नोटा पर्याय देणारे पहिले राज्य – महाराष्ट्र

·       सामाजिक बहिष्काराविरुद्ध कायदा करणारे पहिले राज्य – महाराष्ट्र

·       सेवा हमी कायद्यातील 369 सेवा ऑनलाइन देणारे पहिले राज्य – महाराष्ट्र

·       डिजिटल लॉकर सुविधा देणारी पहिली नगरपालिका – राहुरी (अहमदनगर)

·       ऑनलाइन मतदान सुविधा देणारे पहिले राज्य – गुजरात

·       ई-रेशन कार्ड देणारे पहिले राज्य – नवी दिल्ली

·       पंचायत निवडणुकीसाठी शैक्षणिक पात्रता बंधनकारक करणारे पहिले राज्य – राजस्थान

·       देशातील पहिले ग्रीनफील्ड खाजगी विमानतळ – अंदल (पश्चिम बंगाल)

·       पहिले धूम्रपानमुक्त शहर – कोहिमा (नागालँड)

·       आशियातील सर्वांत स्वच्छ गाव – मेलीनॉन्ग (मेघालय)

·       पदवीपर्यन्त लैंगिक शिक्षण सक्तीचे करणारे राज्य – तेलंगणा

·       बालकच्या  जन्मानंतर लगेच आधार नोंदणी करणारे पहिले राज्य – हरियाणा

·       शहर प्राणी घोषित करणारे पहिले शहर – गुवाहाटी (गंगेतील डॉल्फिन)

·       गुन्हेगारांची डीएनए रेखाचित्रित करून ठेवणारे पहिले राज्य – आंध्रप्रदेश

·       पहिले महिला न्यायालय – माल्डा (पश्चिम बंगाल)

·       फॅट कर लागू करणारे पहिले राज्य – केरळ (14.5%)

·       खाणींचा ई-लिलाव करणारे पहिले राज्य – राजस्थान

·       आनंदी विभाग सुरू करणारे पहिले राज्य – मध्य प्रदेश

·       जीएसटी पारित करणारे पहिले राज्य – आसाम

·       अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे पहिले राज्य – छत्तीसगड

·       शेतीसाठी अर्थसंकल्प राबविणारे पहिले राज्य – कर्नाटक

·       तृतीय पंथीयांसाठी धोरण जाहीर करणारे पहिले राज्य – केरळ

·       तृतीय पंथीयांना पेन्शन सुविधा देणारे पहिले राज्य – ओडिशा

·       सौर ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ – कोची

·       सौर ऊर्जेवर चालणारे न्यायालय – कुंटी (झारखंड)

·       ई-सिगरेटवर बंदी घालणारे पहिले राज्य – पंजाब

·       प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य- हिमाचल प्रदेश

·       थर्मोकोलच्या ताटांवर बंदी घालणारे पहिले राज्य – झारखंड

·       पहिले पोलिओमुक्त राज्य – केरळ

·       पहिले मोफत एयायफाय शहर – कोलकाता

·       पहिले सेंद्रिय शेती करणारे राज्य – सिक्किम

·       श्लोक बेटी गार्डन (फक्त मुलींसाठीचे पहिले गार्डन) – उदयपूर (राजस्थान) 

·       पहिले त्सुनामी केंद्र – हैदराबाद

·       पहिले ई-न्यायालय – हैदराबाद उच्च न्यायालयात

·       एलएनजी इंधंनावरील पहिली बस – केरळ

·       पहिला बँकिंग रोबो – लक्ष्मी (सिटी युनियन बँक)

·       विमुद्रिकरण ठराव पारित करणारे पहिले राज्य – छत्तीसगड

·       पहिली पेमेंट बँक – एरटेल पेमेंट बँक (राजस्थान)

·       पहिले हरित शहर – आगरताळा (त्रिपुरा) (दुसरे – नागपूर)

·       रॅगिंग विरोधात कायदा करणारे पहिले राज्य – तमिळनाडू

·       सेवा हमी कायदा लागू करणारे पहिले राज्य – मध्य प्रदेश

·       पहिले हगणदारी मुक्त राज्य – सिक्किम

·       निर्मल भारत अभियानांतर्गत 100% स्वच्छता झालेले राज्य – सिक्किम

·       सर्वाधिक पोलिस असणारे राज्य – तमिळनाडू


मातीचे प्रकार व स्थान


गाळाची मृदा

सतलज-गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मैदानी प्रदेशात गाळाची मृदा आढळते. उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम राज्यात गाळाची मृदा आहे.


काळी मृदा 

दख्खनच्या पठारावर काळी मृदा आढळते. तिला रेगूर मृदा या नावानेही ओळखतात. बेसॉल्ट व ग्रॅनाइट खडकांचे विदारण होऊन काळी मृदा तयार झाली आहे.


तांबडी मृदा

तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशचा ईशान्य भाग, महाराष्ट्राचा आग्नेय भाग, ओडिशा, बिहार, राजस्थानातील अरवली टेकडय़ा, पूर्वेकडील खासी, जैतिया, नागा टेकडय़ा या भागांमध्ये तांबडी माती आढळते.


वाळवंटी मृदा 

राजस्थानमधील अरवली पर्वताच्या पश्चिमेकडील संपूर्ण भागात वालुकामय माती आहे. पंजाब व हरियाणाचा दक्षिण भाग, गुजरातमधील सौराष्ट्र व कच्छच्या भागात ही माती पसरलेली आहे.


गाळाची मृदा 

नद्यांमध्ये खाडय़ांमध्ये चिखल व मळीच्या संचयनाने गाळाची माती तयार होते. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीलगत सखल प्रदेशात गाळाची माती आहे, तिला भाबर मृदा असेही म्हणतात.

भारतीय नदी(INDIAN RIVERS


*1 सिन्धु नदी* :-

•लम्बाई: (2,880km)

• उद्गम स्थल: मानसरोवर झील के निकट

• सहायक नदी:(तिब्बत) सतलुज, व्यास,

झेलम, चिनाब,

रावी, शिंगार,

गिलगित, श्योक जम्मू और कश्मीर, लेह

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*2 झेलम नदी*

•लम्बाई: 720km

•उद्गम स्थल: शेषनाग झील,

जम्मू-कश्मीर

•सहायक नदी: किशन, गंगा, पुँछ लिदार,करेवाल,

सिंध जम्मू-कश्मीर,

कश्मीर


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*3 चिनाब नदी*

•लम्बाई: 1,180km

•उद्गम स्थल: बारालाचा दर्रे के निकट

•सहायक नदी: चन्द्रभागा जम्मू-कश्मीर

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*4 रावी नदी*

•लम्बाई: 725 km

•उद्गम स्थल:रोहतांग दर्रा,

कांगड़ा

•सहायक नदी :साहो, सुइल पंजाब


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*5 सतलुज नदी*

•लम्बाई: 1440 (1050)km •उद्गमस्थल:मानसरोवर के निकट राकसताल

•सहायक नदी : व्यास, स्पिती,

बस्पा हिमाचल प्रदेश, पंजाब

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*6 व्यास नदी*

•लम्बाई: 470

•उद्गम स्थल: रोहतांग दर्रा •सहायक नदी:तीर्थन, पार्वती,

हुरला


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*7 गंगा नदी*

•लम्बाई :2,510 (2071)km •उद्गम स्थल: गंगोत्री के निकट गोमुख से

• सहायक नदी: यमुना, रामगंगा,

गोमती,

बागमती, गंडक,

कोसी,सोन,

अलकनंदा,

भागीरथी,

पिण्डार,

मंदाकिनी, उत्तरांचल,

उत्तर प्रदेश,

बिहार,

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*8 यमुना नदी*

•लम्बाई: 1375km

•उद्गम स्थल: यमुनोत्री ग्लेशियर

•सहायक नदी: चम्बल, बेतवा, केन,

टोंस, गिरी,

काली, सिंध,

आसन

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*9 रामगंगा नदी*

•लम्बाई: 690km

•उद्गम स्थल:नैनीताल के निकट एक हिमनदी से

• सहायक नदी:खोन

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*10 घाघरा नदी*

•लम्बाई: 1,080 km

•उद्गम स्थल:मप्सातुंग (नेपाल)

• सहायक नदी:हिमनद शारदा, करनली,

कुवाना, राप्ती,

चौकिया

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*11 गंडक नदी*

•लम्बाई: 425km

•उद्गम स्थल: नेपाल तिब्बत सीमा पर मुस्ताग के निकट •सहायक नदी :काली गंडक,

त्रिशूल, गंगा

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*12 कोसी नदी*

•लम्बाई: 730km

•उद्गम स्थल: नेपाल में सप्तकोशिकी

(गोंसाईधाम)

•सहायक नदी: इन्द्रावती,

तामुर, अरुण,

कोसी

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*13 चम्बल नदी*

•लम्बाई: 960 km

•उद्गम स्थल:मऊ के निकट जानापाव पहाड़ी से

•सहायक नदी :काली सिंध,

सिप्ता,

पार्वती, बनास

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*14 बेतवा नदी*

•लम्बाई: 480km

•उद्गम स्थल: भोपाल के पास उबेदुल्ला गंज के पास मध्य प्रदेश

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*15 सोन नदी*

•लम्बाई: 770 km

•उद्गमस्थल:अमरकंटक की पहाड़ियों से

•सहायक नदी:रिहन्द, कुनहा 


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*16 दामोदर नदी*

•लम्बाई: 600km

•उद्गम स्थल: छोटा नागपुर पठार से दक्षिण पूर्व

•सहायक नदी:कोनार,

जामुनिया,

बराकर झारखण्ड,

पश्चिम बंगाल


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*17 ब्रह्मपुत्र नदी*

•लम्बाई: 2,880km

•उद्गम स्थल: मानसरोवर झील के निकट (तिब्बत में सांग्पो)

•सहायक नदी: घनसिरी,

कपिली,

सुवनसिती,

मानस, लोहित,

नोवा, पद्मा,

दिहांग अरुणाचल प्रदेश, असम

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*18 महानदी*

•लम्बाई: 890km

•उद्गम स्थल: सिहावा के निकट रायपुर

•सहायक नदी: सियोनाथ,

हसदेव, उंग, ईब,

ब्राह्मणी,

वैतरणी मध्य प्रदेश,

छत्तीसगढ़,

उड़ीसा

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*19 वैतरणी नदी*

• लम्बाई: 333km

•उद्गम स्थल:क्योंझर पठार उड़ीसा

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*20 स्वर्ण रेखा*

•लम्बाई: 480km

•उद्गम स्थल ;छोटा नागपुर पठार उड़ीसा,

झारखण्ड,

पश्चिम बंगाल

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*21 गोदावरी नदी*

•लम्बाई: 1,450km

•उद्गम स्थल: नासिक की पहाड़ियों से

•सहायक नदी:प्राणहिता,

पेनगंगा, वर्धा,

वेनगंगा,

इन्द्रावती,

मंजीरा, पुरना महाराष्ट्र,

कर्नाटक,

आन्ध्र प्रदेश

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*22 कृष्णा नदी*

•लम्बाई: 1,290km

•उद्गम स्थल: महाबलेश्वर के निकट

•सहायक नदी: कोयना, यरला,

वर्णा, पंचगंगा,

दूधगंगा,

घाटप्रभा,

मालप्रभा,

भीमा, तुंगप्रभा,

मूसी महाराष्ट्र,

कर्नाटक,

आन्ध्र प्रदेश

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*23 कावेरी नदी*

•लम्बाई: 760km

•उद्गम स्थल: केरकारा के निकट ब्रह्मगिरी

•सहायक नदी:हेमावती,

लोकपावना,

शिमला, भवानी,

अमरावती,

स्वर्णवती कर्नाटक,

तमिलनाडु

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*24 नर्मदा नदी*

•लम्बाई: 1,312km

•उद्गम स्थल :अमरकंटक चोटी

•सहायक नदी: तवा, शेर, शक्कर,

दूधी, बर्ना मध्य प्रदेश,

गुजरात


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*25 ताप्ती नदी*

•लम्बाई: 724km

•उद्गम स्थल: मुल्ताई से (बेतूल)

•सहायक नदी: पूरणा, बेतूल,

गंजल, गोमई मध्य प्रदेश,

गुजरात


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*26 साबरमती*

•लम्बाई: 716km

•उद्गम स्थल: जयसमंद झील

(उदयपुर)

•सहायक नदी:वाकल, हाथमती राजस्थान,

गुजरात


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*27 लूनी नदी*

•उद्गम स्थल: नाग पहाड़ •सहायक नदी:सुकड़ी, जनाई,

बांडी राजस्थान,

गुजरात,

मिरूडी,

खेळ क्लुप्त्यांचा :- अभ्यास थोडासा वेगळा


1) महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगा व त्या दरम्यानच्या नद्या कशा ओळखाव्या

क्लुप्ती : विन सातसा गोहभी मकृ:

वि- विध्य पर्वत

न – नर्मदा

सा- सातपुडा

ता- तापी

सा – सातमाळ

गो- गोदावरी

ह –हरिचंद्र बालघाट

भी –भीमा

म- महादेव

कृ- कृष्णा


2) भारतातील कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जाते ?

कर्कवृत्त हे अक्षवृत्त ८ राज्यातून जाते. कोणत्या राज्यातून जाते

क्लूप्त्या : “गुझराती काका के 8 परममित्र है”

गु = गुजरात

झ = झारखंड

ती = छातीसगड

प = पं. बंगाल

र = राजस्थान

म = मध्यप्रदेश

मि = मिझोरम

त्र = त्रिपुरा


3) भारतातील हिमालय पर्वताचे पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रादेशिक विभाग कसे लक्षात ठेवणार

क्लूप्त्या : कप काकू ने पूर्व हिमालयातून आणले

क = काश्मीर हिमालय

प  =  पंजाब हिमालय

कु = कुमाऊ हिमालय

ने   = नेपाळ हिमालय

पूर्व हिमालय = पूर्व हिमालय


4) हिमाचल पर्वतरांगाच्या दक्षिण उत्तरावर असलेले गीरीस्थानके

क्लूप्त्या : 'शिमा नैनाला घेवून दार्जीलिंग ला गेली'

शि – शिमला

म  – मसुरी

नैना – नैनिताल

दार्जी– दार्जीलिंग


5) बांगलादेश या देशाला भारताच्या राज्यांच्या लागलेल्या सीमा

क्लूप्त्या : “मैत्री आमिप”

मै = मेघालय

त्री = त्रिपुरा

आ = आसाम

मि = मिझोरम

प =पश्चिम बंगाल.


6) द्वीपकल्पावरील महत्वाची शिखरे उतरत्या क्रमाने असे लक्षात ठेवा.

क्लुप्ती : "अन्ना दोन वेळा गुरु सोबत काळूबाईला धूप वाहायला गडावर गेला""

अन्ना = अनायमुडी - २६९५

दोन = दोडाबेटा - २६३

गुरु = गुरुशिखर - १७२२

काळूबाई = कळसुबाई - १६४६

धूप = धुपगड = १३५०


7) भारतात ४ अल्ट्रा मेगा पॉवर प्रोजेक्ट खाजगी विकासकांना बहाल करण्यत आले आहेत

क्लुप्ती : "कृत्ति" मुंगूस.

कृ - कृष्णपट्टम (प्रकल्प आं.प्र)

ति - तिलैया प्रकल्प (झारखंड)

मुगू - मुद्रा प्रकल्प (गुजरात)

स - ससन प्रकल्प (मध्य प्रदेश)


8) भारताच्या सागरी सीमेशी सल्लग्न असलेले देश कसे लक्षात ठेवाल?

क्लुप्ती : "MIM BSP"

M - म्यानमार

I - इंडोनेशिया

M - मालदीव

B - बांगलादेश

S -श्रीलंका

P - पाकिस्तान


9) आदिश राशी कशा लक्षात ठेवाल.

क्लुप्ती : “आकाशचा अवघा वेळ ऊर्जेत गेला”.

आ – आकारमान

का – कार्य

श – शक्ती

चा – चाल

अ – अंतर

व – वस्तुमान

घा – घनता

ला – लांबी

वेळ - ऊर्जा


१0) सदिश राशी कशा लक्षात ठेवाल.

क्लुप्ती : "सविता वेग वजन बग "

स - संवेग

वि - विस्थापन

त - त्वरण

वेग

वजन

ब - बल

ग - गती


१1) दगडी कोळसा कार्बन प्रमाण उतरत्या क्रमाने

क्लुप्ती : ऑबिलीपी

ऑ - अन्थ्रासाईड

बी  - बिटूमिंस

लि - लिग्नाईट

पी - पिट


१2)  महाराष्ट्रातील घाट

आंबा कोर -

आंबा घाट - कोल्हापूर ते रत्नागिरी

माथूना - मुंबई ते नाशिक - थळ घाट

बापुचादिवा - पुणे ते बारामती - दिवा घाट.

कुंभा चिपक - कराड ते चिपळूण - कुंभार्ली घाट

खांबाला पूस - पुणे ते सातारा - खंबाटकी घाट.

फोकोगा - फोंडा घाट- कोल्हापूर ते गोवा.

मुना कसा आहेस - मुंबई ते नाशिक - कसारा घाट


१3) सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे

क्लूप्त्या : “साथ आहे मी तुझ्या”

सात – सातमाळ

आ   -  अजिंठा

हे    -  हरिश्चंद्र

मी   - महादेव


१4) सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे

क्लूप्त्या : “साथ आहे मी तुझ्या”

सात – सातमाळ

आ   -  अजिंठा

हे    -  हरिश्चंद्र

मी   - महादेव


१5) महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नाद्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कसा लक्षात ठेवावा

क्लूप्त्या : ‘सूर्य वैतागला उल्हासवर

             आंबा पडला सावित्रीवर

             वैशिष्टी काजळ लावून गेली वाघावर

             काळी गेली तळ्यात खोलवर’

सूर्या नदी

वैतागला – वैतरणा नदी

उल्हास नदी

आंबा – आंबा नदी

सावित्री नदी

वशिष्टी नदी

काजळ -  काजळी नदी

वाघ – वाघोठान नदी

काळी नदी

तेरेखोल नदी


१6)  महाराष्ट्राच्या प्रमुख नद्यांचा विस्तारानुसार उतरता क्रम

क्लूप्त्या : 'गोभीकृतान '

गो - गोदावरी

भी - भीमा

कृ - कृष्णा

ता - तापी

न - नर्मदा

वनांचे प्रकार


🔸भारतीय वनांचे पुढीलप्रमाणे पाच प्रकारांत वर्गीकरण केले जाते.

1)उष्णप्रदेशीय सदाहरित वने:

--250 से.मी पेक्षा अधिक पावसाच्या भागात सदाहरित वने आढळतात.

◾️प्रमुख वृक्ष:महोगणी,रोजवूड,बिशपवुड,रबर,आंबा,जांभूळ,शिसव, साल,हिरडा,बांबू,वेत.

🔺उपयोग:इमारती,जहाज बांधणी इत्यादीसाठी.



2)उष्ण परदेशीय पानझडी वने:

--'मोसमी वने' या नावेही ओळखली जाणारी हि वने 200 से.मी.पर्यंत पाऊस असणाऱ्या मधप्रदेश,बिहार,ओरिसा,महाराष्ट्र या राज्यात आढळतात.

▪️उष्ण कोरड्या हवेत बाष्पीभवन टाळण्यासाठी हे वृक्ष पाने गाळतात.

◾️प्रमुख वृक्ष:साल,साग,पळस, सिसंम, खैर,अर्जुन,मोह,पिंपळ,अंजन,धावडा,चंदन,किंजल,कुंभी,बांबू.

🔸उपयोग: जहाजबांधणी,रेल्वे डबे,खेळणी इत्यादींसाठी.


3)उष्ण प्रदेशीय काटेरी वने व झुडपे:

--50 ते 75 से.मी.पावसाच्या प्रदेशात कच्छ, सौराष्ट्र,राजस्थान,पंजाब,हरियाणा,आणि महाराष्ट्रातील कमी पावसाच्या प्रदेशात हि वने आढळतात.

◾️प्रमुख वृक्ष: बाभूळ,सालाई, निवडुंग,हिवर, बोर,केतकी,नागफणी,यासारखी काटेरि झुडपे या वनात आढळतात.


4)पर्वतीय वने:

--120से.मी. पेक्षा अधिक पावसाच्या काश्मीर,उत्तराखंड,हिमाचल प्रदेश या राज्यांच्या उंच पर्वतीय भागात हि वने आढळतात.

🔸प्रमुख वृक्ष: पाइन,ओक,चेस्टनट, स्पृस,देवदार,फर, पोपलेर, बर्रच, मॅपल.

🔸उपयोग: लाकूड मऊ व वजनाने हलके असल्याने त्यापासून आग्कड्या, कागदाचा लगदा,कलाकुसरीच्या वस्तू बनविल्या जातात.


5)समुद्रकाठची वने: 

--किनाऱ्यावरील त्रिभुज प्रदेशात हि वने दाटीवाटीने आढळतात.

--पश्चिम बंगालमधील सुंदरबन,ओडिशा,आंध्रप्रदेश,तामिळनाडू,या राज्यांच्या किनारी प्रदेशात हे वृक्ष वाढतात.

🔸उपयोग:

1)बिहार,ओडिशा,मध्य प्रदेश या राज्यातू  लाखेचे उत्पादन होते.

2)लाखेचा उपयोग औषधे,रंग,ग्रोमोफोन रेकॉर्ड ,बांगड्यानिर्मिती अशा अनेक उदोगात केला जातो.

3)बाभळीची साल कातडी कमावण्यासाठी व औषधे बनविण्यासाठी उपयुक्त असते.




          🌷वन्य प्राणी🌷


➡️आसाम,केरळ,कर्नाटकच्या जंगलात हत्ती आढळतात.

➡️कच्छच्या रन: चिंकारा,काळवीट,जंगली गाढव,उंट.

➡️राजस्थानचे वाळवंट: लाल कोल्हा,जंगली मांजर.

➡️राजस्थानच्या मैदानात भारतीय रानकोंबडा, खरुची,गिधाड,गरुड,बहिरी ससाणा,मोर हे पक्षी आढळतात.

➡️पश्चिम बंगाल व आसाममध्ये - एकशिंगी गेंडा.

➡️सौराष्ट्रातील जुनागड गिरच्या रानात: सिंह.

➡️प.बंगालमधील सुंदरबानंत : वाघ हे प्राणी आढळतात.


आजचे प्रश्नसंच

भारतीय घटनेतले कोणते कलम जम्मू व काश्मीरला विशेष स्वायत्त राज्य हा दर्जा प्रदान करते?

(A) कलम 360

(B) कलम 350

(C) कलम 370

(D) कलम 390

Ana:-C


कोणता युरोपमधील भूपरिवेष्टित देश आहे?

(A) नेपाळ

(B) फ्रान्स

(C) जर्मनी

(D) स्लोव्हाकिया

Ans:-D


स्लोव्हाकियाच्या प्रथम महिला राष्ट्राध्यक्ष कोण आहेत?

(A) जुझाना कापुतोवा

(B) मार्स सेफकोव्हिक

(C) मारिया कॅंडिला

(D) जोसेफ एलिझाबेथ

Ans:-A


..... रोजी 'अर्थ अवर 2019' पाळण्यात आला.

(A) 1 एप्रिल

(B) 30 मार्च

(C) 2 एप्रिल

(D) 31 मार्च

Ans:-B


कोणते राज्य 1936 साली भाषेच्या आधारावर बनविण्यात आलेले पहिले राज्य आहे?

(A) आंध्रप्रदेश

(B) केरळ

(C) ओडिशा

(D) बिहार

Ans-C


कोणता राज्य 1 एप्रिल रोजी स्थापना दिन साजरा करतो?

(A) उत्तराखंड

(B) झारखंड

(C) बिहार

(D) ओडिशा

Ans:-D


कोणत्या पुरुष टेनिसपटूने ATP मियामी ओपन 2019 या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले?

(A) राफेल नदाल

(B) रॉजर फेडरर

(C) अँडी मरे

(D) नोव्हाक जोकोविच

Ans:-B


भारतात कोणत्या प्रकारचा GST राज्याद्वारे विशेषतः गोळा केला जातो?

(A) CGST

(B) SGST

(C) IGST

(D) यापैकी नाही

Ans:-B


कोणत्या महिन्यात सर्वाधिक वस्तू व सेवा कर (GST) महसूल संकलन नोंदवले गेले?

(A) जानेवारी 2019

(B) फेब्रुवारी 2019

(C) मार्च 2019

(D) यापैकी नाही

Ans:-C


कोणत्या प्रक्षेपकाच्या मदतीने ISRO द्वारा भारताचा एमिसॅट हा पाळत ठेवणारा उपग्रह सोडण्यात आला?

(A) PSLV सी-44

(B) PSLV सी-43

(C) PSLV सी-45

(D) PSLV सी-41

Ans:-C


कोणत्या देशामध्ये ‘लांगकावी आंतरराष्ट्रीय सागरी व हवाई प्रदर्शनी (LIMA 2019)’ भरविण्याचे नियोजित आहे?

(A) इजिप्त

(B) मॉरीशस

(C) मलेशिया

(D) दक्षिण आफ्रिका

Ans:-C


कोणत्या तारखेपासून सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकेकडून Ind AS किंवा भारतीय लेखा मानके अंमलात आणली जातील?

(A) 1 एप्रिल 2019

(B) 1 मे 2019

(C) 1 एप्रिल 2020

(D) निर्णय अद्याप घेतलेला नाही

Ans:-D


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्या देशावर लादली जाणारी अतिरिक्त बंदी रद्द करण्याचा आदेश दिला?

(A) इराण

(B) उत्तर कोरिया

(C) चीन

(D) रशिया

Ans:-B



कोणत्या व्यक्तीने शांतनिकेतनमध्ये वसंत उत्सव आयोजित करण्यास सुरुवात केली?

(A) सुभाष चंद्र बोस

(B) महात्मा गांधी

(C) रवींद्रनाथ टागोर

(D) सतीश चटर्जी

Ans:-C



भारतातल्या कोणत्या राज्यात बंदर ताप किंवा किसानूर वन रोगाचे पहिले प्रकरण आढळले?

(A) तामिळनाडू

(B) बिहार

(C) केरळ

(D) पंजाब

Ans:-C


‘GRAPES-3 म्यूऑन टेलिस्कोप’ सुविधेच्या माध्यमातून जगात पहिल्यांदाच संशोधकांनी गडगडाटी ढगाचा विद्युत भार, त्याचा आकार आणि उंची शास्त्रीयदृष्ट्या मोजला. कोणत्या शहरात GRAPES-3 म्यूऑन टेलिस्कोप आहे?

(A) बेंगळुरू

(B) उटी

(C) भुवनेश्वर

(D) पुडुचेरी

Ans:-B



‘इंडियन नेटवर्क फॉर क्लाइमेट चेंज असेसमेंट’ याने भारताच्या किनार्‍यालगतच्या शहरांवर वाढत्या सागरी पातळीचा परिणामासंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार समुद्राचे पाणी घुसल्यामुळे कोणत्या शहरी भागाला धोका निर्माण झाला आहे?

(A) चेन्नई

(B) हैदराबाद

(C) मुंबई

(D) बेंगळुरू

Ans:-A



ESPN आणि IIT मद्रास यांनी अनावरीत केलेले ‘सुपरस्टॅट्स’ हे नवे मॅट्रिक्स कोणत्या खेळामध्ये वापरले जाणार?

(A) फुटबॉल

(B) क्रिकेट

(C) हॉकी

(D) बॅडमिंटन

Ans:-B



जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त शाश्वत वन व्यवस्थापन संदर्भात प्रमाणता मानक (SFM) ही भारताची पहिली वन प्रमाणता योजना कोणत्या भारतीय ना-नफा संस्थेद्वारे तयार केले गेले?

(A) सेंटर फॉर एन्विरोंमेंट ऑर्गनायझेशन

(B) कंझर्व्ह

(C) इंडिया नेचर वॉच

(D) नेटवर्क फॉर सर्टिफिकेशन अँड कंझर्व्हेशन ऑफ फॉरेस्ट्स

Ans:-D



कोणत्या गणितज्ञाला 2019 या वर्षीचा एबल पारितोषिक मिळाला?

(A) सी. एस. शेषाद्री

(B) एम. राम मूर्ती

(C) रवी वकील

(D) कॅरेन उलेनबेक

Ans:-D



‘इंड-इंडो कॉर्पेट 2019’ नावाचा सागरी गस्त कार्यक्रम कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आयोजित करण्यात आला?

(A) भारत आणि इंडोनेशिया

(B) भारत आणि आइसलंड

(C) भारत आणि आयर्लंड

(D) भारत आणि इटली

Ans:-A



1911 सालापर्यंत बंगाल प्रेसीडेंसीच्या (बांग्लादेश वगळता) अधिपत्याखाली वर्तमानातली किती भारतीय राज्ये होती?

(A) 4

(B) 3

(C) 5

(D) 6

Ans:-A



जागतिक हवामान दिन-2019 याचा विषय काय आहे?

(A) सेव्ह द अर्थ

(B) अर्थ, व्हेदर अँड वॉटर

(C) द सन, द अर्थ अँड द व्हेदर

(D) द सन अँड द व्हेदर

Ans:-C



जागतिक हवामान दिन ...... रोजी साजरा केला जातो.

(A) 23 मार्च

(B) 25 मार्च

(C) 26 मार्च

(D) 27 मार्च

Ans:-A



कोणत्या प्रशिक्षण केंद्रात भारतीय नौदलाच्या ‘अभेद्य’ प्रशिक्षण कार्यक्रमाचा आरंभ केला गेला?

(A) INS मांडवी

(B) INS शिवाजी

(C) INS गरुड

(D) INS हमला

Ans:-B



कोणत्या देशाने ‘लूज टू विन’ कार्यक्रम राबवविण्यास सुरुवात केली?

(A) संयुक्त राज्ये अमेरिका

(B) जर्मनी

(C) संयुक्त अरब अमिरात

(D) इराण

Ans:-C



कोणत्या देशाने ‘लूज टू विन’ कार्यक्रम राबवविण्यास सुरुवात केली?

(A) संयुक्त राज्ये अमेरिका

(B) जर्मनी

(C) संयुक्त अरब अमिरात

(D) इराण

Ans:-C


दरवर्षी कोणत्या दिवशी ‘राजस्थान दिन’ साजरा केला जातो?

(A) 1 एप्रिल

(B) 2 एप्रिल

(C) 30 मार्च

(D) 31 मार्च

Ans:-C


लिथियम पदार्थाचा विकास आणि औद्योगिक वापरासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला?

(A) केनिया

(B) युक्रेन

(C) बोलिव्हीया

(D) रशिया

Ans:-C


लोकांमध्ये विज्ञान विषयाबाबत आवड निर्माण करण्यासाठी कोणत्या राज्यात 'कॅफे सायंटिफिका' नावाच्या पुढाकाराचा आरंभ केला गेला?

(A) बिहार

(B) मध्यप्रदेश

(C) केरळ

(D) आंध्रप्रदेश

Ans:-C


आंतरराष्ट्रीय पातळीवर भौगोलिक खूण (GI) टॅग कोणत्या आंतरराष्ट्रीय कराराद्वारे प्रशासित केले जाते?

(A) TRIPS करार

(B) GIIP करार

(C) IGIO करार

(D) यापैकी नाही

Ans:-A


औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘कंधमाल हळद’ याला GI टॅग प्राप्त झाले. कंधमाल जिल्हा कोणत्या भारतीय राज्यात आहे?

(A) केरळ

(B) ओडिशा

(C) तामिळनाडू

(D) आंध्रप्रदेश

Ans:-B


मँगेनीज ओअर इंडिया लिमिटेड (MOIL) या कंपनीने 2018-19 या आर्थिक वर्षात आतापर्यंतची सर्वाधिक उलाढाल नोंदवली. या कंपनीचे कोणत्या शहरात मुख्यालय आहे?

(A) मुंबई

(B) दिल्ली

(C) नागपूर

(D) हैदराबाद

Ans:-C


“AUSINDEX” हा कोणत्या देशादरम्यानचा द्वैपक्षीय सागरी सराव आहे?

(A) भारत आणि युक्रेन

(B) भारत आणि इंडोनेशिया

(C) ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया

(D) ऑस्ट्रेलिया आणि भारत

Ans:-D


कोणत्या शहरात व्यापार व आर्थिक सहकार्य संदर्भात भारत-युक्रेन कृती गटाची (IU-WGTEC) चौथी बैठक आयोजित करण्यात आली?

(A) क्यीव

(B) नवी दिल्ली

(C) कोलकाता

(D) बेंगळुरू

Ans:-B


उत्तर गोलार्धामध्ये कोणता दिवस ‘वसंत विषुववृत्त’ (Spring Equinox) म्हणून ओळखला जातो?

(A) 20 मार्च

(B) 23 नोव्हेंबर

(C) 12 एप्रिल

(D) यापैकी नाही

Ans:-A


अंतरळातल्या कोणत्या खगोलीय घटकाला ब्रह्मांडाचे प्रकाशस्थान म्हणून संबोधले जाते?

(A) पल्सर

(B) लघुग्रह

(C) शनीचा चंद्र

(D) यापैकी नाही

Ans:-A


इकॉनॉमिस्ट इंटेलिजेंस युनिट या संस्थेनी ‘जागतिक जीवनावश्यक खर्च सर्वेक्षण 2019’ हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. सर्वेक्षणानुसार कोणते शहर जगातले सर्वात महागडे शहर आहे?

(A) सिंगापूर

(B) पॅरिस

(C) न्यूयॉर्क

(D) (A) आणि (B)

Ans:-D


कोणत्या मध्य आशियाई देशाच्या राजधानीचे नाव बदलून ‘नुरसुलतान’ असे ठेवण्यात आले आहे?

(A) कझाकीस्तान

(B) किर्गिझस्तान

(C) ताजिकीस्तान

(D) तुर्कमेनिस्तान

Ans:-A


‘जागतिक आनंद अहवाल 2019’ यामध्ये भारताचा कोणता क्रमांक आहे?

(A) 140

(B) 99

(C) 97

(D) 130

Ans:-A


कोणता देश ‘जागतिक आनंद अहवाल 2019’ यामध्ये जगातला सर्वाधिक आनंदी देश घोषित करण्यात आला?

(A) स्वीडन

(B) फिनलँड

(C) भुटान

(D) अमेरिका

Ans:-B


WTO तंटा निवारण प्रक्रियेचा पहिला टप्पा कोणता आहे?

(A) नेमलेल्या समितीद्वारे निर्णय

(B) निर्णयाची अंमलबजावणी

(C) पक्षांमध्ये सल्लामसलत

(D) यापैकी नाही

Ans:-C


कोणत्या देशाने ‘सुलतान अझलन शहा चषक 2019’ या हॉकी स्पर्धेचा किताब पटकावला?

(A) भारत

(B) मलेशिया

(C) इंडोनेशिया

(D) दक्षिण कोरिया

Ans:-D


2 एप्रिलला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने RBIच्या 12 फेब्रुवारी 2019 रोजीच्या परिपत्रकास रद्द केले. RBIचे ते परिपत्रक ...... याच्याशी संबंधित होते.

(A) बँकांच्या बुडीत कर्जाच्या निराकरणासाठी नवीन कार्यचौकट

(B) रेपो दरातली नवीन वाढ

(C) डॉलर-रुपया करन्सी स्वॅप

(D) वरील सर्व

Ans:-A


कोणत्या देशाकडून रोमियो म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘MH-60R’ सीहॉक बहुभूमिका हेलीकॉप्टरांची भारतात आयात केली जाईल?

(A) फ्रान्स

(B) रशिया

(C) अमेरिका

(D) जपान

Ans:-C


कोणता 5G नेटवर्क कार्यरत असलेला जगातला पहिला जिल्हा असेल?

(A) शांघाय जिल्हा, चीन

(B) मुंबई उपनगर जिल्हा, भारत

(C) शिकागो, अमेरिका

(D) यापैकी नाही

Ans:-A


कोणत्या सोशल मिडिया नेटवर्कने राजकीय पक्षांशी संबंधित असलेली 702 खाती बंद केली आहेत?

(A) ट्विटर

(B) लिंक्डइन

(C) फेसबुक

(D) यूट्यूब

Ans:-C


‘सेंडाई कार्यचौकट 2015-2030’ कश्या संदर्भात आहे?

(A) स्मारकांचे संवर्धन

(B) पाणथळ प्रदेशांचे संवर्धन

(C) आपत्ती जोखीम कमतरता

(D) वरील सर्व

Ans:-C


कोणत्या शहरात आपत्ती स्थितीस्थापक पायाभूत सुविधा संदर्भात आंतरराष्ट्रीय कार्यशाळा (IWDRI) आयोजित करण्यात आली होती?

(A) दिल्ली

(B) मुंबई

(C) चेन्नई

(D) उदयपूर

Ans:-A


‘हायाबुसा-2’ या मानवरहित जपानी अंतराळयानाने पृथ्वीच्या उत्पत्तीशी संबंधित आश्चर्यकारक शोध लावण्यासाठी कशाची परिक्रमा केली?

(A) लघुग्रह

(B) मंगळ

(C) चंद्र

(D) गुरु

Ans:-A


पुढीलपैकी कोणते ‘ज्युडिशिएल ओव्हररीच’ (न्यायिक अतिरेक) या प्रकाराचे उदाहरण आहे?

(A) उच्च न्यायालयातर्फे जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती करणे व बढती देणे

(B) जेव्हा सरकार योग्य योजना तयार करण्यात अपयशी ठरते तेव्हा उच्च न्यायालयाद्वारे सरकारी योजना तयार करणे

(C) उच्च न्यायालयाद्वारे खटला चालविण्यासाठी खालच्या न्यायालयांच्या निर्णयांचे खंडण करणे

(D) यापैकी नाही

Ans:-B



सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा खालीलपैकी कोणत्या राज्यात प्रभावी नाही?

(A) नागालँड

(B) मणिपूर

(C) आसाम

(D) मेघालय

Ans:-B


भारताच्या केंद्र सरकारला वेज़ एंड मीन्स एडवांस यांच्यामार्फत पुरविले गेले आहे?

(A) भारतीय रिझर्व्ह बँक

(B) निती आयोग

(C) आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी

(D) वित्त आयोग

Ans:-A


खाद्यान्न संकुलाचा जागतिक अहवाल 2019 अंतर्गत पुढील आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आला आहे काय?

(A) जागतिक बँक

(B) अन्न व कृषी संस्था

(C) जागतिक आर्थिक मंच

(D) संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम

Ans:-B


पुढीलपैकी कोणत्या देशात जगातील पहिल्या देशव्यापी 5 जी मोबाइल नेटवर्कची सुरूवात झाली आहे?

(A) दक्षिण कोरिया

(B) चीन

(C) संयुक्त राज्य

(D) तैवान

Ans:-A


पुढीलपैकी कोणत्या शहरात फायनान्शिअल ऍक्शन टास्क फोर्सचे मुख्यालय आहे?

(A) लंडन

(B) पॅरिस

(C) न्यू यॉर्क

(D) जिनेवा

Ans:-B


पुढीलपैकी कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जयद मेडल प्रदान केले आहे?

(A) तुर्की

(B) संयुक्त अरब अमीरात

(C) सौदी अरेबिया

(D) इराण

Ans:-B


RBI च्या मौद्रिक धोरण समितीमध्ये केंद्र सरकारद्वारे किती सदस्य नामनिर्देशित केले जातात?

(A) 2

(B) 1

(C) 3

(D) 4

Ans:-C


04 एप्रिल 2019 रोजी आयोजित RBI च्या चलनविषयक धोरण बैठकीनुसार सुधारित रेपो दर काय आहे?

(A) 6.25%

(B) 6.00%

(C) 6.50%

(D) 6.20%

Ans:-B


सस्टेनेबल एनर्जी फॉर ऑल (SEforALL) या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे?

(A) कोपनहेगन, डेन्मार्क

(B) बॉन, जर्मनी

(C) स्टॉकहोम, स्वीडन

(D) व्हिएन्ना, ऑस्ट्रिया

Ans:-D


वैश्विक शीतकरण युती ही तीन कार्यक्रमांच्या अंतर्गत होणार्‍या कार्यांना जोडणारी एक एकात्मिक आघाडी आहे. कोणता कार्यक्रम वैश्विक शीतकरण युतीचा भाग नाही?

(A) किगाली दुरुस्ती करारनामा

(B) पॅरिस करारनामा

(C) शाश्वत विकास ध्येय

(D) SEforALL

Ans:-D


‘2030 अजेंडा आणि पॅरिस करारनामा यांच्यादरम्यानचे सहयोग’ याविषयक प्रथम जागतिक परिषदेचे आयोजन कुठे केले गेले?

(A) कोपनहेगन, डेन्मार्क

(B) बॉन, जर्मनी

(C) स्टॉकहोम, स्वीडन

(D) मॉस्को, रशिया

Ans:-A


UNICEF याच्या अहवालानुसार, हवामानातल्या बदलांशी निगडित नैसर्गिक संकटांमुळे बांग्लादेशात राहणार्‍या ....... लहान मुलामुलींचे जीवन आणि भविष्य धोक्यात आले आहे.

(A) 9 दशलक्ष

(B) 19 दशलक्ष

(C) 90 दशलक्ष

(D) 9 अब्ज

Ans:-B


ADB याच्या 'एशियन डेव्हलपमेंट आऊटलुक (ADO) 2019' अहवालानुसार, 2019-20 या आर्थिक वर्षासाठी भारताचा वृद्धीदर किती अंदाजित केला आहे?

(A) 6.2%

(B) 7.2%

(C) 8.2%

(D) 9.2%

Ans:-B


‘जागतिक आरोग्य दिन 2019’ याची संकल्पना काय आहे?

(A) फूड सेफ्टी

(B) डिप्रेशन: लेट्स टॉक

(C) युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज

(D) युनिव्हर्सल कव्हरेजः एव्हरीवन, एव्हरीव्हेअर

Ans:-D


विविध शास्त्रीय भाषेतल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी व्यक्तींना महर्षी बद्रायन व्यास सन्मान दिला जातो. या पुरस्काराशी संबंधित नसलेली भाषा ओळखा.

(A) संस्कृत

(B) हिंदी

(C) अरबी

(D) पाली

Ans:-B


‘ESPN इंडिया मल्टी-स्पोर्ट पुरस्कार’ याचा 2018 सालासाठीचा वर्षातला सर्वोत्तम महिला क्रिडापटूचा किताब कोणाला दिला गेला?

(A) सायना नेहवाल

(B) एकता भ्यान

(C) पी. व्ही. सिंधू

(D) परिनीती सिंघाल

Ans:-C


भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित कोणत्या घटनेला 13 एप्रिल 2019 रोजी 100 वर्षे पूर्ण होत आहेत?

(A) असहकार चळवळ

(B) खिलाफत आंदोलन

(C) चौरी-चौरा घटना

(D) जालियनवाला बाग हत्याकांड

Ans:-D


कोण ‘FIFA कार्यकारी परिषद’ याचे सदस्य म्हणून निवड झालेले पहिले भारतीय आहेत?

(A) सुनील छेत्री

(B) उदांत सिंग

(C) प्रफुल पटेल

(D) संदीप त्यागी

Ans:-C


………. रोजी राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो.

(A) 5 एप्रिल

(B) 9 एप्रिल

(C) 1 मे

(D) 3 मे

Ans:-A


5 एप्रिल 2019 रोजी जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून कोणाला नेमण्यात आले?

(A) रघुराम राजन

(B) कौशिक बसू

(C) डेव्हिड मालपास

(D) जेनेट येलेन

Ans:-C


कोणातर्फे ‘हरित आणि भूदृष्य’ याविषयक राष्ट्रीय परिसंवाद हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला?

(A) भारतीय हवामान विभाग

(B) विज्ञान व तंत्रज्ञान विभाग

(C) वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद

(D) केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग

Ans:-D


वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) याचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोण कार्य करतात?

(A) पंतप्रधान

(B) राष्ट्रपती

(C) उपराष्ट्रपती

(D) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री

Ans:-A


सजीबू चेईराओबा सण भारताच्या कोणत्या राज्यामध्ये नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो?

(A) मणीपूर

(B) मेघालय

(C) आसाम

(D) पंजाब

Ans:-A


गुढीपाडवा सण भारताच्या कोणत्या राज्यामध्ये नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो?

(A) महाराष्ट्र

(B) बिहार

(C) उत्तरप्रदेश

(D) केरळ

Ans:-A


उगादी सण भारताच्या कोणत्या राज्यामध्ये नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो?

(A) कर्नाटक

(B) आंध्रप्रदेश

(C) तेलंगणा

(D) तीनही राज्यांमध्ये

Ans:-D


कोणत्या राष्ट्रीय संस्थेतर्फे ‘अनलॉकिंग नॅशनल एनर्जी एफिशिएंसी पोटेन्शियल’ (UNNATEE) या शीर्षकाखाली राष्ट्रीय धोरणासंबंधी दस्तऐवज प्रसिद्ध करण्यात आले आहे?

(A) केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स मर्यादित

(B) भारतीय इलेक्ट्रॉनिक्स महामंडळ

(C) ऊर्जा कार्यक्षमता विभाग

(D) यापैकी नाही

Ans:-C


कोणत्या मच्छराच्या चाव्यामुळे पश्चिमी नील विषाणू ताप हा रोग होतो?

(A) एडीस मच्छर

(B) अॅनोफिलेस मच्छर

(C) कुलेक्स मच्छर

(D) यापैकी नाही

Ans:-C

मराठी व्याकरण प्रश्न मंजुषा

धुमकेतू ही विज्ञानकथा खालिलपैकी कोणत्या कथासंग्रहातील आहे ?

१) बारा बलुतेदार

२) गावशिव

३) यशाची देणगी ☑️

४) दौंडी


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


पुन्हा कविता, पुन्हा एकदा कविता हे कवितासंग्रह कोणत्या कवीचे आहेत ?

१) चंद्रकांत पाटील ☑️

२) बबन सराडकर

३) कुसुमाग्रज

४) चंद्रकांत वाघमारे



🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


तराळ - अंतराळ या आत्मचरित्राचे लेखक कोन ?

१) शंकरराव खरात ☑️

२) अभय बंग

३) जयंत नारळीकर

४) शिवाजी सावंत


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


मृत्यूंजय , छावा आणि युगंधर या प्रसिद्ध कादंबऱ्यांचे लेखक कोन ?

१) शिवाजी सावंत ☑️

२) ना. सि. फडके

३) वि. वा. शिरवाडकर

४) श्री. ना. पेंडसे


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


क्षिप्रा, सरहद्द आणि जन हे वोळतू जेथे या कादंबऱ्यांचे लेखक कोन ?

१) जयंत नारळीकर

२) शंकरराव खरात

३) शरच्चंद्र मुक्तिबोध ☑️

४) अभय बंग


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


कोणत्या कविचा जन्मदिन मराठी भाषा गौरवदिन म्हणून साजरा केल्या जातो ?

१) कुसुमाग्रज ☑️

२) गोविंदाग्रज

३) वि. दा. करंदीकर

४) यापैकी नाही


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


विदर्भ जनजागर या वाङमयीन साप्ताहिकाचे संपादक कोन ?

१) चंद्रकांत पाटील

२) चंद्रकांत वाघमारे

३) बबन सराडकर ☑️

४) चंद्रकांत कुलकर्णी


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


अस्पृश्यांना जाठ पैलवान, सरदार आणि पंडित अशा उपाध्या कुणी दिल्या ?

१) छत्रपती शिवाजी महाराज

२) छत्रपती संभाजी महाराज

३) छत्रपती शाहू महाराज ☑️

४) छत्रपती शहाजी महाराज


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


पुढीलपैकी आई - वडिलांना पाठविणाऱ्या पत्राचा मायना कोणता ?

१) तिर्थरुप ☑️

२) तिर्थस्वरुप

३) १ आणि २

४) यापैकी नाही


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


धुमकेतु या विज्ञान कथेचे लेखक कोन ?

१) शंकरराव खरात

२) जयंत नारळीकर ☑️

३) अभय बंग

४) यापैकी नाही



🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


आंबेडकर विचारांची नवी संस्कृति कोणत्या कविला सापडली आहे ?

१) चंद्रकांत वाघमारे ☑️

२) कुसुमाग्रज

३) बबन सराडकर

४) यापैकी नाही


 🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


सुर्यास्त हा कोणत्या संधीचा शब्द आहे ?

१) विसर्गसंधी

२) स्वरसंधी ☑️

३) व्यंजनसंधी

४) यापैकी नाही


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


अस्पृश्यांचा आधारवड या ललित लेखाचे लेखक कोन ?

१) शरच्चंद्र मुक्तिबोध

२) शंकरराव खरात

३) जयंत नारळीकर

४) शिवाजी सावंत ☑️


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


सांगावा व तळिपार या कथासंग्रहाचे लेखक कोन ?

१) जयंत नारळीकर

२) शिवाजी सावंत

३) अभय बंग

४) शंकरराव खरात ☑️


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


कुसूमाग्रज या टोपण नावाने काव्यलेखन करणाऱ्या कविचे पूर्ण नाव काय ?

१) विष्णु वामन शिरवाडकर ☑️

२) राम गणेश गडकरी

३) माणिक शंकर गोडघाटे

४) आत्माराम रावजी देशपांडे


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


पुर्व विदर्भाची लोककला कोणती ?

१) लावणी

२) तमाशा

३) दंडार ☑️

४) गोंधळ


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


घरी अड, ना पाण्याचा लड ही म्हण कोणत्या प्रदेशातील आहे ?

१) कोकण

२) वऱ्हाड

३) झाडीपट्टी ☑️

४) मराठवाडा


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


शोधग्राम कुठे वसलेले आहे ?

१) चंद्रपुर

२) वर्धा

३) नागपुर

४) गडचिरोली ☑️


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


अस्पृश्यांचा आधारवड कोणाला संबोधले जाते ?

१) शाहू महाराज ☑️

२) संभाजी महाराज

३) महात्मा फुले

४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


प्रेरित या कादंबरी चे लेखक कोन ?

१) गंगाधर गाळगिळ

२) जयंत नारळीकर ☑️

३) शंकरराव खरात

४) शिवाजी सावंत


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


कपटी व कृष्णकारस्थाने करणारा मनुष्य कोन ?

A) कंसमामा

B) कपटीमामा

C) शकुनीमामा ☑️

D) काळूमामा


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


हत्तीच्या पिल्याला काय म्हणतात ?

A) बछडा

B) शिंगरु

C) करभ☑️

D) शावक

आदिवासी संस्कृती संभाव्य प्रश्न


 (आदिवासी विकास विभागाच्या दृष्टीने महत्वाचे आदिवासी संस्कृती वरील संभाव्य प्रश्न दिले आहेत, त्याचा परीक्षा  तयारीसाठी उपयोग होईल, योग्य उत्तर (#) चिन्हाने दर्शवले आहे.)



१.महाराष्ट्रात एकूण किती आदिवासी जमातींना अनुसूचित जमातीच्या दर्जा देण्यात आला आहे?

१.45

२.47 #

३.49

४.५१


2.राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार आदिवासींना अनुसूचित जमातीच्या दर्जा देता येतो?

१.३४१ #

२.३४२

३.३४३

४.३४४

 

 3.भारतात साधारणपणे किती आदिवासी जमाती आहेत?

१.300

२.400

३.500

४.700 #


4.महाराष्ट्रात कोणती आदिवासी जमात आढळत नाही?

1.भिल्ल

2.गोंड

3.पावरा

4.चुआर #


5.महाराष्ट्रात कोणत्या भागात आदिवासी जमाती सर्वाधिक आहेत?

1.मराठवाडा

2.विदर्भ #

3.पश्चिम महाराष्ट्र

4.उत्तर महाराष्ट्र


 6.जेव्हा माणूस जागा होतो हे पुस्तकात गोदावरी परुळेकर यांनी आदिवासी भागातील कोणत्या आदिवासी जमातीसंबंधीचे अनुभव कथन केले आहेत?

1.वारली #

2.आंध

3.खोंड

4.भिल्ल


7.कोसबडच्या टेकडीवरून हे पुस्तक आदिवासी क्षेत्रातील शिक्षण अनुभवांवर कोणी लिहिले आहे?

1.ताराबाई मोडक

2.अनुताई वाघ #

3.ठक्कर बाप्पा

4.शामराव देशमुख


 8.भिल्लांचे धर्मगुरू असे महात्मा गांधी यांनी कोणाला संबोधले?

1.शामराव परुळेकर

2.ठक्कर बाप्पा #

3.गोविंद गारे

4.विलास संगवे

 

9.आदिवासी करिता "अनुसूचित जमाती" ही संज्ञा प्रथम कोणत्या कायद्यात वापरण्यात आली?

1.1935 #

2.1919

3.1909

4.1927


10.आदिवासी स्त्रिया व बालके यांच्यामधील कुपोषण रोखण्यासाठी डॉ.अभय बंग व डॉ.राणी बंग यांनी "शोधग्राम" ही संस्था कोठे स्थापन केली आहे?

१.गडचिरोली #

२.नंदुरबार

३.अमरावती

४.चंद्रपूर

पोलीस भरती सराव १०० महत्त्वाचे प्रश्न

१) भीमा नदीचा …. लांबीचा प्रवाह महाराष्ट्रातून गेला आहे.

= ४५१ कि.मी

२)…. या जातीचा ससा महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो.

= लिपस निग्रीकोलीस

३) महाराष्ट्राचा आकार अनियमित असला तरी काहीसा …. सारखा आहे.

= काटकोन त्रिकोण

४) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आकर्षण वाटणारे पीक …..

= ऊस

५) राज्यात …. या जिल्ह्यांमध्ये अभ्रकाचे साठे आढळतात.

= सिंधुदुर्ग, चंद्रपूर व नागपूर

६) चद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेवरून कोणती नदी वाहते?

= वैनगंगा

७) महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवरून कोणती नदी वाहते?

= इंद्रावती

८) राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा’ म्हणून पुणे जिल्ह्याचा, तर ‘सर्वाधिक घनतेचा जिल्हा’ म्हणून …. जिल्ह्याचा उल्लेख करावा लागतो.

=मुंबई उपनगर

९) रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी नदी कोणती?

= शुक्र

१०) केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानासाठी राज्यातील किती शहरांची निवड केली गेली आहे ?

= १०
११) ….. ही पश्चिम किनारपट्टीवरील सर्वांत मोठी खाडी आहे.

= धरमतर

१२) कसारा घाट’ म्हणजेच …..

= थळघाट

१३) सन १९६० मध्ये …. या दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्याने तो दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातो.

= १ मे

१४).…. या दिवशी द्वैभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले होते.

= १ नोव्हेंबर, १९५६

१५) सन १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन होत असतानाच मूळच्या द्वैभाषिक राज्यातून ….हेही स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले.

= गुजरात

१६) महाराष्ट्रातील दक्षिण-उत्तर पसरलेल्या ……….पर्वतरांगेस ‘पश्चिम घाट’ असेही म्हणतात.

= सह्य

१७) ….. या महाराष्ट्राच्या उपराजधानीत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते.

= नागपूर

१८) नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीवर …. येथे बांधण्यात आलेल्या धरणातून नाशिक शहरास पाणीपुरवठा होतो.

= गंगापूर

१९) अजिंठ्याचे डोंगर, हरिश्चंद्र डोंगररांगा, बालाघाट डोंगररांगा व महादेव डोंगररांगा या वास्तविक ….. या पर्वताच्याच उपरांगा होत.

= सह्य

२०) राज्यात कोणत्या नदीच्या खोऱ्यात तंबाखूचे सर्वाधिक उत्पन्न काढले जाते?

= कृष्णा

२१) जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य उद्देश महाराष्ट्राला …. पर्यंत पाणी टंचाई मुक्त करण्याचा आहे.

= सन २०१९

२२) भारतातील एकूण साखर कारखान्यांपैकी सर्वाधिक कारखाने महाराष्ट्रात आहेत. किती टक्के?

= ३६ टक्के

२३) सन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार राज्यातील सर्वांत कमी लोकसंख्येचा जिल्हा’ म्हणून …. या जिल्ह्याचा निर्दश करावा लागेल.

= सिंधुदुर्ग

२४) भौगोलिक निकटत्वामुळे मराठीच्या …. या उपभाषेवर किंवा बोलीवर काहीसा गुजरातीचाही ठसा आढळतो.

= खानदेशी

२५) सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येत अनुसूचित जातींचे प्रमाण ११.८ टक्के इतके, तर अनुसूचित जमातींचे प्रमाण …. टक्के इतके आहे.

= ९.४

२६) दुग्ध उत्पादनात राज्याचा देशात कितवा क्रमांक लागतो?

= सातवा

२७) सन २०१७ च्या वनस्थिती अहवालानुसार राज्यातील भौगोलिक क्षेत्राशी बनव्याप्त क्षेत्राचे प्रमाण …. इतके आहे.

= १६.४७ टक्के

२८) सन २०१७ च्या वनस्थिती अहवालानुसार भारतातील एकूण क्षेत्राच्या अवघे …. इतके वनक्षेत्र महाराष्ट्रात आहे.

= ७.१६ टक्के

२९) महाबळेश्वर परिसरातील कृष्णा, कोयना व सावित्री यांच्या उगम प्रदेशातील वने प्रकारची आहेत.

= उष्ण कटिबंधीय सदाहरित वने

३०) सह्याद्रीच्या पूर्वाभिमुख उतारावर कोणत्या प्रकारची वने प्रामुख्याने आढळतात ?

= शुष्क पानझडी वृक्षांची वने

३१) …. पर्वताला महाराष्ट्राचा प्रमुख जलदुभाजक म्हटले जाते.

= सह्य

३२) राज्यातील उत्तरेकडील बोर्डी-तलासरीपासून दक्षिणेकडील …. पर्यंतचा चिंचोळा पट्टा कोकण किनारपट्टीत मोडतो.

= रेडी-बांदा

३३) कोकण किनारा ‘रिया’ प्रकारचा असून या किनाऱ्यावर …. जवळ ‘सागरी गुहा’ आढळतात.

= मालवण

३४) सह्य पर्वताची एकूण लांबी सुमारे १,६०० कि. मी. असून त्यांपैकी सुमारे …. लांबीचा भाग महाराष्ट्रात आहे.

= ६४० कि. मी.

३५) उत्तरेस सातमाळा-अजिंठ्याचे डोंगर व दक्षिणेस हरिश्चंद्र-बालाघाटचे डोंगर यांच्या दरम्यान राज्यात …. चे खोरे पसरलेले आहे.

= गोदावरी

३६) उत्तरेला हरिश्चंद्र-बालाघाटचे डोंगर व दक्षिणेला महादेवाचे डोंगर यांच्या दरम्यान राज्यात …. नदीचे खोरे पसरलेले आहे.

= भीमा

३७) पुणे जिल्ह्यात भीमाशंकर येथे उगम पावणारी भीमा नदी कर्नाटक राज्यात रायचूर जिल्ह्यात येथे कृष्णेस मिळते.

= कुरुगड्डी

३८) गोदावरी नदीची एकूण लांबी सुमारे १,४६५ कि. मी. असून त्यांपैकी सुमारे …. लांबीचा प्रवाह महाराष्ट्रातून गेला आहे.

= ७३२ कि. मी.

३९) केंद्र स्तरावरील सांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने कोणती योजना सुरू केली आहे?

= आमदार आदर्श ग्राम योजना

४०) तापी नदी महाराष्ट्रातील …….या जिल्ह्यांतून वाहत जाते.

= जळगाव, नंदुरबार व धुळे

४१) वैतरणा नदीवर बांधण्यात आलेल्या …. या धरणातूनही मुंबईला पाणीपुरवठा होतो.

= मोडकसागर

४२) …. ही पर्वतराग महाराष्ट्राच्या उत्तर सीमेस अनेक ठिकाणी छेदून वा स्पर्शून गेलेली आहे.

= सातपुडा

४३) डिसेंबर, २०१८ अखेर राज्यात एकूण दूरध्वनी जोडण्यांची संख्या …. इतकी होती.

= ४५.१० लाख

४४) हि राज्यातील सर्वाधिक लांबीची नदी दक्षिणेची गंगा’ तसेच ‘वृद्धगंगा’ म्हणून ओळखली जाते.

= गोदावरी

४५) महाराष्ट्राला प्रामुख्याने अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैत्रत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस मिळतो. हा पाऊस साधारणतः …. या कालखंडातपडत असतो.

= जुन ते सप्टेंबर

४६) महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस …, पसरलेला आहे.

= अरबी समुद्र

४७) खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील …. हा विभाग सर्वाधिक समृद्ध आहे.

= विदर्भ

४८) सह्य पर्वताची किंवा पश्चिम घाटाची निर्मिती …. मुळे झाली आहे.

= प्रस्तरभंग

४९) राज्यातील किनारपट्टीच्या कोकण भागात …. प्रकारचा पाऊस पडतो.

= प्रतिरोध

५०) सागाची झाडे …. प्रकारच्या अरण्यात आढळतात.

= पानझडी वृक्षांची अरण्ये

५१) महाराष्ट्रात लाकूड-कटाईचे कारखाने (सॉ-मिल्स) …. या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर आहेत.

= चंद्रपूर, गडचिरोली व अमरावती

५२) महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात ….

= माडिया-गोंड

५३) राज्यातील …. या विभागात सर्वांत कमी वने आढळतात.

= मराठवाडा

५४) महाराष्ट्र पठारावरील …. या सर्वांत मोठ्या डोंगररांगेने कृष्णा व भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी केली आहेत.

= महादेव डोंगररांग

५५) हरिश्चंद्र-बालाघाट’ या डोंगररांगेमुळे …. या नद्यांची खोरी एकमेकांपासून अलग झाली आहेत.

= गोदावरी व भीमा

56) ‘गाविलगड’ व ‘नर्नाळा’ हे प्रसिद्ध किल्ले …. या पर्वतावर वसले आहेत.

= सातपुडा

57) अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यांच्या सीमेवर, सह्य पर्वतावर वसलेले ‘कळसूबाई’ हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वतशिखर असून त्याची उंची …. इतकी आहे.

= १,६४६ मीटर

58) अरुंद अशा कोकण किनारपट्टीची रुंदी …. नदीच्या खोऱ्यात वाढलेली आहे.

= उल्हास

59) ….. या जिल्ह्यांना पूर्वी ‘खानदेश’ म्हणून ओळखले जाई.

= धुळे, नंदुरबार व जळगाव

६०) बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’ या नदीच्या काठी वसले आहे.

= दहिसर

६१) नाशिकहून ठाणे जिल्ह्यात उतरताना …. हा घाट पार करावा लागतो.

= कसारा

६२)’कस्तुरी’ मांजर राज्यात …. जिल्ह्यांत आढळते.
= रायगड व रत्नागिरी

६३) गांधीजींनी घालून दिलेले आदर्श व त्यांची तत्त्वे यांच्या माध्यमातून विकास साधण्याची उद्दिष्टे असलेली ‘वर्धा योजना’ ….या वर्षीच्या गांधी जयंतीपासून वर्धा जिल्ह्यात राबविली जात आहे.

= १९८३

६४) एकोणिसाव्या पशुगणनेनुसार देशातील एकूण पशुधनात राज्याचा कितवा क्रमांक लागतो?

= सहावा

६५)संजय गांधी निराधार अनुदान’ योजनेअन्वये पात्र व्यक्तीस दरमहा …. इतके आर्थिक साहाय्य देण्यात येते.

= रुपये ६००/

६६) महाराष्ट्रातील…. या भागाचा उल्लेख यादवकालीन शिलालेखात ‘सेऊन देश’ असा केला गेला आहे.

= खानदेश (धुळे, नंदुरबार, जळगाव)

६७) केंद्र शासनाने ‘अतिमागास’ म्हणून जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील जमाती ….

= चंद्रपूर : माडिया-गोंड; यवतमाळ
नांदेड : कोलाम ; ठाणे, रायगड : कातकरी

६८) …. हे दोन महाराष्ट्राचे प्रमुख स्वाभाविक विभाग होत.

= कोकण व पठार (देश)

६९) कोकण किनारपट्टीत सापडणाऱ्या ‘जांभा’ या प्रकारच्या मातीत …. यांचे प्रमाण अधिक असते.

= लोह व जस्त

७०) महाराष्ट्राची सीमा खालील सहा राज्यांना भिडलेली आहे

= गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़,
तेलंगाणा, कर्नाटक व गोवा

७१) पूर्णा, वर्धा, पैनगंगा व वैनगंगा या …. भागातील प्रमुख नद्या होत.

= विदर्भ

७२) ‘अहिराणी’ ही मराठीची उपभाषा किंवा बोलीभाषा प्रामुख्याने …. या जिल्ह्यांत बोलली जाते.

= धुळे, नंदुरबार, जळगाव

७३) रोशा’ जातीचे गवत राज्यात …. या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते.

= धुळे, नंदुरबार व जळगाव

७४) ‘कन्हान’, ‘वर्धा’ आणि ‘खोबरागडी’ या …. नदीच्या उपनद्या होत.

= वैनगंगा

७५) एकूण लोकसंख्येशी असलेले नागरी लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता महाराष्ट्राचा (४५.२२ टक्के) क्रमांक देशात तिसरा लागतो; तर …. या राज्याचा क्रमांक पहिला लागतो.

= तमिळनाडू (४८.४० टक्के)

७६) …. या नदीच्या खोऱ्यास ‘संतांची भूमी’ म्हणून संबोधले जाते.

= गोदावरी

७७) राज्यातील …. या जिल्ह्यांमध्ये बांबूची वने मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.

= चंद्रपूर व गडचिरोली

७८) विड्या तयार करण्यासाठी तेंदूची (टेंभुर्णीची) पाने वापरतात. तेंदूची झाडे ….या जिल्ह्यातील वनांमध्ये विपुल प्रमाणात आढळतात.

= नागपूर, गोंदिया व भंडारा

७९) परकीय चलन मिळवून देणारा ‘हापूस’ जातीचा आंबा या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो.

= रत्नागिरी व सिंधुदुर्ग

८०) राज्यातील हळदीच्या उत्पादनात अग्रेसर असलेले दोन जिल्हे …. हे होत.

= सातारा व सांगली

८१) ‘काटेपूर्णा’ व ‘नळगंगा’ या …. नदीच्या उपनद्या होत.

= पूर्णा

८२) सावंतवाडीहून बेळगावला जाताना लागणारा घाट …..

= आंबोली

८३) ‘पूर्णा’ व ‘गिरणा’ या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?

= तापी

८४) महाराष्ट्रात ……येथे रासायनिक द्रवांचे कारखाने आहेत.

= पनवेल व अंबरनाथ

८५) ‘पेंच ‘ प्रकल्पात महाराष्ट्राचे सहकारी राज्ये ….

= मध्य प्रदेश

८६) ….या विदर्भातील प्रमुख नद्या होत .

= वर्धा व वैनगंगा

८७) महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावर लागणार घाट …..

= आंबेनळी

८८) महाराष्ट्रातील …..हे विभाग कापूस उत्पादनात अग्रेसर आहेत.

= खान्देश व विदर्भ

८९) गिरणा ,पांझरा व बुराई या …च्या उपनद्या होत.

= तापी

९०) सातारा ,सांगली ,कोल्हापूर हि शहरे …….खोऱ्यात वसली आहेत .

= भीमा

९१) राज्यात काडीपेटी तयार करण्याचे कारखाने ….येथे आहेत .

= मुंबई ,नागपूर ,अंबरनाथ

९२) मराठीच्या ..या बोलीस किंवा उपभाषेस अहिरांची भाषा म्हणून ‘अहिराणी ‘असेही म्हणतात.

= खान्देशी

९३) तापी नदीची एकूण लांबी ७२४ कि .मी.असून तापीचा सुमारे ….चा प्रवाह राज्यातून गेला आहे.

= २२८ कि .मी .

९४) येरळा ,वारणा व पंचगंगा या ….नदीच्या उपनद्या वा तिला येऊन मिळणाऱ्या नद्या होत.

= कृष्णा

९५) राज्यातील उत्तरेकडील बोर्डी-तलासरीपासून दक्षिणेकडील …. पर्यंतचा चिंचोळा पट्टा कोकण किनारपट्टीत मोडतो.

= रेडी-बांदा

९६)राज्यात एकूण ……जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत.

= ३१

९७) लोकआयुक्ताची नेमणूक कोण करतात ?

= राज्यपाल

९८) महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस …, पसरलेला आहे.

= अरबी समुद्र

९९) ‘लोकआयुक्त ‘ हे पद राज्यात आस्तित्वात आले .

= २५ ओक्टोम्बर ,१७७२

१००) महाबळेश्वर परिसरातील कृष्णा, कोयना व सावित्री यांच्या उगम प्रदेशातील वने प्रकारची आहेत.

= उष्ण कटिबंधीय सदाहरित वने

प्रशासकीय विभाग



● भौगोलिक विभागाचे नाव : कोकण 

● मुख्यालय : मुंबई

● विभागाअंतर्गत जिल्हे : पालघर, ठाणे, मुंबई नगर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग


प्रशासकीय विभागाचे नाव : पुणे


● भौगोलिक विभागाचे नाव : पश्चिम महाराष्ट्र

● मुख्यालय : पुणे 

● विभागाअंतर्गत जिल्हे : पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर


प्रशासकीय विभागाचे नाव : नाशिक


● भौगोलिक विभागाचे नाव : उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश

● मुख्यालय : नाशिक

● विभागाअंतर्गत जिल्हे : नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव


प्रशासकीय विभागाचे नाव : औरंगाबाद


● भौगोलिक विभागाचे नाव : मराठवाडा

● मुख्यालय : औरंगाबाद

● विभागाअंतर्गत जिल्हे : औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद


प्रशासकीय विभागाचे नाव : अमरावती


● भौगोलिक विभागाचे नाव : विदर्भ 

● मुख्यालय : अमरावती

● विभागाअंतर्गत जिल्हे : अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम


प्रशासकीय विभागाचे नाव : नागपूर


● भौगोलिक विभागाचे नाव : विदर्भ 

● मुख्यालय : नागपूर 

● विभागाअंतर्गत जिल्हे : नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली

महाराष्ट्रातील हवामान



महाराष्ट्रातील हवामान विशिष्टपूर्ण आहे. याचे कारण त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. महाराष्ट्रात मान्सून वाऱ्यामुळे पाऊस मिळतो.


महाराष्ट्राच्या हवामानाचे स्वरूप -


कोकण -

कोकणचे हवामान उष्ण, दमट, सम, प्रकारचे आहे. कोकणची सखल किनारपट्टी अरबी समुद्रास अगदी जवळ असल्याने वर्षभर वर्षभर तो प्रदेश फार उष्नही व फार थंडही नसतो.


सह्यान्द्री -

समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतशी हवा थंड होते. म्हणून सह्यान्द्रीच्या घाटमाथ्यावर उन्हाळ्यत देखील तेथील हवामान थंड असते. हिवाळ्यात मात्र कडाक्याची थंडी असते. म्हणून या भागातील हवामान थंड व आद्र असते.


महाराष्ट्र पठार -

महाराष्ट्राच्या पठारावर उष्ण,विषम,व कोरडे आहे. या भागात मार्च ते मे या काळात बरीच उष्णता असते. म्हणजेच उन्ह्याळातील व हिवाळ्यातील तापमानातच बरीच तफावत असल्याने पठारावरील हवामान हे विषम आहे.


महाराष्ट्रातील ऋतू -

महाराष्ट्रात साधारणपणे उन्हाळा-मार्च ते मे, पावसाळा -जून ते सप्टेम्बर, हिवाळा - ऑक्टोबर ते फेब्रूअरी, हे तीन मुख्य ऋतू आहेत.


उन्हाळा -

२१ मार्चनंतर उत्तर गोलार्धात सूर्यकिरणे लंबरूप पडण्यास प्रारंभ होतो तसेच दिनमानाच्या कालही वाढते.

महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान सुमारे १६' ते २२' दरम्यान असल्याने या काळात तापमानात वाढत जाते. कोकण किनार पट्टीत अरबी समुद्राच्या सानिध्यामुळे खरे व मतलई वारे यांचा फायदा मिळतो. तर दख्खनचे पठार हे सह्यन्द्री पर्वतामुळे

अरबी समुद्रापासून अलग झालेले असते. यामुळे कोकण व पठार यावरील बरीच तफावत आहे.


कोकणामध्ये दैनिक कमाल तापमान कक्षा ३०' ते ३३' सें च्या दरम्यान असते. मराठवाड्यात ३० ते ३५ सें तापमान असते. तर विदर्भामध्ये ४२ ते ४३ सें च्या आसपास असते.


हवेचा दाब व वारे -

उन्हाळ्यात असे तापमान वाढत गेल्यास साहजिकच हवेचा दाब कमी कमी होत जातो. आणि कोकण किनारपट्टीत समभार रेषा समांतर होत जातात. एप्रिल मे महिन्यात जसजसा उन्हाळा कडक होत जातो तसतसा समभार रेषा जवळजवळ येऊ लागतात आणि वायुभार उतार तीव्र होत जातो. अरबी समुद्रावरील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे वाहू लागतात. आणि वायुभर उतार तीव्र होत जातो. अरबी समूद्रवरील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे वाहू लागतात व किनारपट्टीवर दुपारच्या कडक उन्हानंतर आरोह प्रकारचा पाऊस पडतो. तर मराठवाडा आणि विदर्भात उन्हाळ्याच्या शेवटच्या कालखंडात धुळीची वादळे निर्माण होतात.


पर्जन्य -

हिवाळ्यामध्ये वायव्य भारतात तयार झालेल्या जास्त दाबाचा पट्टा सूर्य कर्कवृत्ताकडे असल्याने हळूहळू दक्षिणेकडे सरकतो. एप्रिल महिन्यात हा जास्त दाबाचा पट्टा भारताच्या दक्षिण भागात असतो. व त्याचा बराचसा प्रदेश सागरावारही असतो. वायव्य भारतात दाबाचा प्रदेश असतो. परंतु तो अजूनही कमजोरच असतो. दाबाच्या प्रदेशाकडून

जास्त दाबाच्या प्रदेशाकडून लागतात. ते एप्रिल व मी महिन्यात महाराष्ट्रच्याही भागावरून वाहत जाऊन पाऊस देतात. यावेळेस आंब्याचा बहर असतो. म्हणून या पावसाला आंबेसरी

असे म्हणतात.


महाराष्ट्र मान्सूनची संकल्पना -


सर्वसाधारणपणे मान्सूनचे आगमन हि अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. उन्हाळ्यात भूभाग

व जलभाग तापणे हे मान्सून चे तंत्र आहे. हे भारतीय उपखंडाचे वैशिष्ट्य आहे. सर्वसामान्यपणे महाराष्ट्रात जो पाऊस पडतो. त्यापैकी सुमारे ८५% पाऊस नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून मिळते. पावसाळ्यात चार महिन्याच्या कालावधीत कोकण आणि सह्यन्द्री पर्वतरांगेत भरपूर पाऊस पडतो. त्यामानाने मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस पडतो. महाराष्ट्राच्या पूर्व भागात अजून पावसाचे प्रमाण वाढत जाते. त्याचे कारण विदर्भ हा प्रदेश बंगालच्या उपसागरावरील मान्सून वाऱ्याच्या शाखेत येतो त्या भागात आगस्ट आणि सप्टेंबर या दरम्यान पाऊस पडतो.

कोकणात २५० ते ३०० सें मी पाऊस पडतो. घाठ्माठ्यावरील आंबोली येथे सर्वात जास्त

म्हणजे ७०७ से मी पूस कोसळतो. तर महाबळेश्वरला ५९४ एवढा पाऊस पडतो. माथेरानच्या पठारावर पावसाचे प्रमाण ४९३ से मी आहे. सह्यांद्रीच्या पूर्वेकडे म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या भागाकडे ५० ते ६० सें मी पाऊस पडतो. तसेच हा प्रदेश अनिश्चित स्वरूपाचे आहे. म्हणून या भागाला अवर्षणग्रस्त प्रदेश म्हटले जाते.

मराठवाड्यात ६० ते ८० सें मी एवढे पर्जन्य आहे. विदर्भात पावसाचे प्रमाण वाढत जाते. विदर्भात पश्चिमेकडून पूर्वेस पावसाचे प्रमाण वाढत जाते. पश्चिम विदर्भात ७५ ते ९० सें मी पाऊस पडतो. तर पूर्व विदर्भात ९० ते १५० से मी इतका पाऊस पडतो. विदर्भातील गाविलगडच्या डोंगरात पावसाचे प्रमाण वाढत जाते. तेथील थंड हवेच्या चिखलदरा या ठिकाणी १५० सें मी एवढा पाऊस पडतो.


ऑक्टोंबर संक्रमणाचा महिना -

या महिन्यात प्रखर सूर्यप्रकाश असतो. आणि हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण भरपूर असल्याने उकाडा अनुभवास येतो.


हिवाळा -

मान्सून संपल्यावर वाऱ्याचा काळ संपल्यावर नोवेंबरपासून खऱ्या अर्थाने हिवाळा चालू होतो. हिवाळ्यात सरासरी मासिक तापमानाचा विचार केला तर असे आढळते कि बऱ्याचशा रेषा पश्चिम पूर्व दिशेने असून त्या एकमेकास समांतर आहेत. हिवाळ्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडतो.


महाराष्ट्रात हिवाळ्यात संपूर्ण खानदेश, नाशिक जिल्हा, बराचसा अहमदनगर पुण्यातील जुन्नर घोडेगाव,राजगुरुनगर, शिरूर,पुणे,हवेली, तालुके. विदर्भात अमरावती जिल्ह्याच्या धारणी,चिखलदरा, तसेच वरुड नागपूर भंडारा, चंद्रपूर या भागात किमान तापमान १० सें ते १२.५ सें एवढे असते. महाराष्ट्राच्या उर्वरित भागात म्हणजे दक्षिण महाराष्ट्र बऱ्याच प्रमाणात मराठवाडा व पश्चिम विदर्भ व पूर्व विदर्भात नागपूर जिल्ह्याचा दक्षिण भाग वर्धा, गोंदिया, भंडारा,चंद्रपूरच्या उत्तर भागात किमान तापमान १२.५ व १५ सें दरम्यान आहे.


महाराष्ट्रातील वार्षिक पर्जन्याचे वितरण -


जास्त पर्जन्याचा प्रदेश - महाराष्ट्रातील कोकण आणि सह्यान्द्री डोंगरावर आणि डोंगराच्या पायथाचा प्रदेश या भागात ३०० ते ६०० इतका पाऊस पडतो. मध्यम पर्जन्याचा प्रदेश- सह्यान्द्रीच्या भागात, तर नाशिक,पुणे,सातारा,सांगली, या जिल्ह्याचा पश्चिम भाग गोंदिया, गडचिरोली, या भागात ३०० ते २०० से मी पाऊस पडतो. मध्यम ते कमी पर्जन्याचा प्रदेश - चन्द्रपूर, यवतमाळ,वर्धा, या भागात मध्यम पर्जन्य पडते. तर मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि सोलापूर, अहमदनगर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्याचा भागात तसेच पश्चिम विदर्भातील सर्व जिल्हे या भागात कमी पर्जन्य होते.

भारतातील विविध वृत्तपत्रे व संपादक


🔰 दर्पण : बाळशास्त्री जांभेकर 

🔰 दिग्दर्शन (मासिक) : बाळशास्त्री जांभेकर

🔰 परभाकर (साप्ताहिक) : भाऊ महाराज

🔰 हितेच्छू (साप्ताहिक) : लोकहितवादी 

🔰 काळ (साप्ताहिक) : शी.म.परांजपे 

🔰 सवराज्य पत्र (साप्ताहिक) शी.म.परांजपे

🔰 कसरी : लोकमान्य टिळक

🔰 मराठा (इंग्रजी साप्ताहिक) : लोकमान्य टिळक

🔰 दिंनबंधू (साप्ताहिक) : कृष्णाराव भालेकर 

🔰 समाज स्वास्थ (मासिक) : रघुनाथ धोंडो कर्वे 

🔰 विध्यर्थी (मासिक) : साने गुरुजी

🔰 कॉग्रेस (साप्ताहिक) : साने गुरुजी

🔰 साधना (साप्ताहिक) : साने गुरुजी

🔰 शालापत्रक : कृष्णशास्त्री चिपळूणकर

🔰 उपासना (साप्ताहिक) : वी.रा.शिंदे

🔰 सबोध पत्रिका : प्रार्थना समाज

🔰 महाराष्ट्र धर्म (मासिक) : आचार्य विनोबा भावे

🔰 मानवी समता : महर्षी धो. के. कर्वे 

🔰 सधारक (साप्ताहिक) : आगरकर

🔰 बहिष्कृत भारत (पाक्षिक) : डॉ. बाबासाहेब

🔰 मकनायक (पाक्षिक) : डॉ. बाबासाहेब 

🔰 जनता (प्रबुध्द भारत) : डॉ. बाबासाहेब 

🔰 समता : डॉ. बाबासाहेब 

🔰 मानवता: डॉ. बाबासाहेब 

🔰 बहिष्कृत मेळा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

🔰 सार्वजनिक सभा : न्या. म गो रानडे

🔰 इदुप्रकाश : म गो रानडे

🔰 हिंदुस्थान गदर (साप्ताहिक) : लाला हरदयाळ

🔰 शरद्धा (साप्ताहिक) : स्वामी श्रद्धानंद

🔰 विजय (साप्ताहिक) : स्वामी श्रद्धानंद

🔰 अर्जुन (साप्ताहिक) : स्वामी श्रद्धानंद

🔰 सदधर्म प्रचार (साप्ताहिक) : स्वामी श्रद्धानंद

🔰 वदे मातरम : अरविंद घोष

🔰 पिपल्स : लाला लजपतराय

🔰 नशनल हेरॉल्ड : पंडित जवाहरलाल नेहरू

🔰 फॉरवर्ड (मासिक) : सुभाषचंद्र बोस

🔰 इडियन सोशॉलिस्ट : श्यामजी कृष्ण वर्मा

🔰 रास्त गोफ्तर : दादाभाई नौरोजी

🔰 वहाईस ऑफ इंडिया : दादाभाई नौरोजी

🔰 बगाली : सुरेंद्र नाथ बनर्जी

🔰 इन्डीपेन्डस इंडिया : मानवेंद्रनाथ रॉय

🔰 द व्हेगाड : मानवेंद्रनाथ रॉय

🔰 उद्बोधक (बंगाली) : स्वामी विवेकानंद

🔰 परबुद्ध भारत (इंग्रजी) : स्वामी विवेकानंद

🔰 नवजीवन (गुजराती साप्ताहिक) : महात्मा गांधी

🔰 हरिजन : महात्मा गांधी

🔰 यग इंडिया : महात्मा गांधी

🔰 इडियन ओपीनियन : महात्मा गांधी

🔰 सत्याग्रह : महात्मा गांधी

🔰 मिरत उल अखबार : राजा राममोहन रॉय

🔰 समाचार चंडिका : राजा राममोहन रॉय

🔰 बगॉल हेरॉल्ड : राजा राममोहन रॉय

🔰 कवारी : भास्कर जाधव

🔰 भाषांतर (मासिक) : वि. का. राजवाडे

🔰 मराठवाडा : सदाशिव विश्वनाथ पाठक

🔰 महाराष्ट्र केशरी : डॉ. पंजाबराव देशमुख

🔰 अखंड भारत : भाई महादेवराव बागल

🔰 शतपत्रे : गोपाळ हरी देशमुख

🔰 टाईम्स ऑफ इंडिया : रॉबर्त नाईट

🔰 हितवाद : गोपाळ कृष्णा गोखले

🔰 यगांतर : भूपेंद्र दत्त

🔰 अमृत बझार पत्रिका : मोतीलाल घोष

🔰 सलभ समाचार : केशवचंद्र सेन

🔰 नटिव्ह ओपिनियन :  वि. ना. मंडलिक 

🔰 विचारलहरी : कृष्णशास्त्री चिपळूणकर

🔰 हिंदु पंच : कृष्णशास्त्री चिपळूणकर

🔰 भाला : भास्कर बळवंत भोपटकर

🔰 सदेश : अच्युत बळवंत कोल्हटकर

🔰 तरुण मराठा : दिनकरराव जवळकर  .

🔰 लबर किसान गँझेट : एम सिंगारवेलु

🔰 दि सोशालिस्ट : श्रीपाद डांगे

🔰 करांती : श्रीपाद डांगे

🔰 नयु इंडिया : अँनी बेझेंट 

🔰 कॉमन व्हील : अँनी बेझेंट 

🔰 जञान सिंधु : तात्या छत्रे 

🔰 गदर : लाला हरदयाल 

🔰 बामबोधिनी : उमेशचंद्र दत्ता 

🔰 बगाली : सुरेंद्रनाथ बँनर्जी 

🔰 अबलाबांधव : द्वारकानाथ गांगुली

🔰 भारती : द्वीजेंद्रनाथ टागोर 

🔰 वसुमती : हेमचंद्र घोष 

🔰 सदेश : कोल्हटकर 

🔰 आत्मोद्वार : एस एन चौधरी 

🔰 भारत : काकासाहेब कर्वे

🔰 सवक : एल एन मेढे 

🔰 दलित भारत : धनाजी बिराडे 

🔰 लीडर : पं. मदनमोहन मालवीय 

🔰 अल-हिलाल : अब्दुल कलाम आझाद 

🔰 परबोधन : केशव ठाकरे 

🔰 नवयुग : आचार्य अत्रे 

🔰 परभात : भालचंद्र कोठारी

भूगोल प्रश्नसंच

◾️ महाराष्ट्रच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे ? 

1) सह्याद्री 

2) सातपुडा ✅

3) मेळघाट 

4) सातमाळा




◾️ मांजरा पठार कुठल्या भागात आहे ? 

1) मराठवाडा ✅

2) पश्चिम महाराष्ट्र 

3) विदर्भ 

4) खानदेश




◾️ भामरागड टेकडया खालीलपैकी कुठे स्थित आहेत  ? 

1) औरंगाबाद 

2) गडचिरोली ✅

3) चंद्रपूर 

4) नंदुरबार 




◾️ खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे. 

1) वैराट ✅

2) अस्तंभा 

3) हनुमान 

4) जळगाव




◾️खालील पैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे ?

 A)  लातूर✅

 B)  मुंबई उपनगर 

 C)  उस्मानाबाद

 D) जालना



◾️खालील पैकी कोणत्या एका गटातील नद्या पश्चिमधाटात उगम पावून पश्चिमेकडे जातात ? 

 A)  तापी, सावित्री, काळू

 B) सावित्री, काळू, उल्हास✅

 C) काळू, गिरना, कुंडळिका

 D)  सावित्री, उल्हास, गोदावरी



◾️खालील पैकी कुठले राष्ट्रीय उद्यान विदर्भ विभागात मोडत नाही ? 

 A)  नवेगाव

 B)  गुगामाळ 

 C)  पेंच

 D)  वरील पैकी कोणतेही नाही✅



◾️महाराष्ट्रातील कमी पावसाचा जिल्हा कोणता ?

 A)  नाशीक जिल्हा

 B) पुणे जिल्हा 

 C) चंद्रपूर जिल्हा

 D)  यापैकी नाही✅



◾️खालील पैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही ? 

 A)  सांगली

 B)  सातारा

 C) रायगड✅

 D) रत्नागिरी


◾️गोदावरी व भीमा नद्यांची खोरी कोणत्या पर्वत रांगेने वेगळी झाली आहे ? 

 A) सातमाळा

 B) अजिंठा 

 C)  हरीश्चंद्र-बालाघाट✅

 D) गावीलगड

महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या




गोदावरी- वारणा, प्रवरा, सिंधफणा, दक्षिण पुर्णा, इंद्रावती, मांजरा पुर्णा व गिरणा, प्राणहिता ,पैनगंगा , दुधना


तापी - गिरणा, पुर्णा, बोरी, अनेर , पाझरा


कृष्णा - कोयना , वेरळा, पारणा, पंचगंगा, वेण्णा


भिमा -  इंद्रायणी, मुळा, सीना, कुकडी, पवना, कर्हा, मुठा, नीरा


पैनगंगा -  कन्हान, वर्धा व पैनगंगा


पुर्णा -  काटेरुर्णा व नळगंगा


सिंधफणा  - बिंदुसरा


मांजरा -  तेरणा , कारंजी, घटणी, तेरू


कोकणातील नद्या


 उल्हास , तेरेखोल, कुंडलिका, शास्त्री, वशिष्ठी , काळ, कर्ली, जगबुडवी


तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम


1. औरंगाबाद - 8 जिल्हे , 76 तालुके

2. नागपूर - 6 जिल्हे , 64 तालुके

3. पुणे - 5 जिल्हे , 58 तालुके

4. अमरावती - 5 जिल्हे , 56 तालुके

5. नाशिक - 5 जिल्हे , 54 तालुके

6. कोकण - 7 जिल्हे , 50 तालुके




🔰महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे :


1. यवतमाळ , नांदेड - 16 तालुके


2. रायगड , नाशिक , जळगाव , चंद्रपूर - 15 तालुके


3.पुणे , अहमदनगर , अमरावती , नागपूर - 15 तालुके.



🔰कोकणातील प्रमुख नद्या (उत्तरेकडून दक्षिणेकडे) :


1. पालघर जिल्हा - दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा


2. ठाणे जिल्हा - भातसई , काळू , उल्हास


3. रायगड जिल्हा - पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल


4. रत्नागिरी जिल्हा - सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव


5. सिंधुदुर्ग जिल्हा - काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल



💦 महाराष्ट्रातील नद्यांची माहिती(उतरत्या क्रमाने) :-


🔰नदीखोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार(चौ.किमी):


1.गोदावरी - 69000

2. भीमा - 46184

3. वर्धा - 46182

4. वैनगंगा - 38000

5. तापी - 31200

6. कृष्णा - 28700



🔰लांबीनुसार(किमी) : 


1. गोदावरी - 668

2. पैनगंगा - 495

3. वर्धा - 455

4. भीमा - 451

5. वैनगंगा - 295

6. कृष्णा - 282

7. तापी - 208 


🔰 पाणी उपलब्धतेनुसार(टी एम सी) :


1. कृष्णा - 769

2. वैनगंगा - 719

3. गोदावरी - 404

4. भीमा - 309

5. तापी - 229


कोकणातील विविध प्रकृतीक भुरुपे



1. खाडी : भारतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत आत शिरते त्या भागाला खाडी म्हणतात.


ठाणे : दाटीवरे, डहाणू, वसई, मनोरी, व ठाणे


मुंबई उपनगर : मालाड, माहीम


मुंबई : माहीम


रायगड : पनवे, उरण, धरमतर, रोहा, राजापुरी, बाणकोट


रत्नागिरी : दाभोळ, जयगड, विजयदुर्ग


सिंधुदुर्ग : देवगड, कालवली, कर्ली, तेरेखोल


2. पुळनी : समुद्र किनार्‍याजवळ सागरी लाटांच्या संचयन कार्यामुळे उथळ कींनार्‍यावर तयार होणार्‍या वाळूच्या पट्टयाना 'पुळन' असे म्हणतात.


मुंबई उपनगर : जिहू बीच


मुंबई शहर


दादर, गिरगाव


रत्नागिरी : गणपतीपुळे, हर्न, गुहागर


सिंधुदुर्ग : मालवनजवळ तरकर्ली, शिरोड, दापोली, उमादा


रायगड : अलिबाग, मुरुड-जंजिरा, श्रीवर्धन


3. वाळूचे दांडे : सागरी लाटांमुळे उथळ कींनार्‍यावर 'वाळूचे दांडे' तयार होतात.


खरदांडा(रायगड)


4. बेटे : मुंबई : मुंबई बेट


रायगड : धारपूरी (एलिफंटा केव्ह)


अलिबाग : खांदेरी, उंदेरी


सिंधुदुर्ग : कुरटे (सिंधुदुर्ग किल्ला)


मुंबई उपनगर : साष्टी, अंजदिव


5. बंदरे : महाराष्ट्राच्या किनारपट्टीला लहानमोठे 49 बंदरे आहेत.


मुंबई = मुंबई, ठाणे = अलिबाग, न्हावाशेवा(JNPT),


रत्नागिरी = हर्न, जयगड = रत्नागिरी ,


सिंधुदुर्ग = मालवण, वेंगुले, रेड्डी


6. खनिजे : बॉक्साईट = ठाणे,


म्यंगेणीज = सिंधदुर्ग,


क्रोंमाईत = सिंधुदुर्ग, रत्नागिरी, लोह व


जिप्सम = रत्नागिरी


7. नद्या : ठाणे : दमनगंगा, सूर्या, तानसा, वैतरणा, काळू, पिंजाल, भारसाई, उल्हास, मुरबाडी,


मध्य प्रदेश : पताळगंगा, आंबा, कुंडलिका, काळ, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री


दक्षिण कोकण : काजवी, मुचकुंदी, वाघोटने, शुक, गड, कर्ली, तेरेखोल.


जास्त लांबी- वैतरणा, व उल्हास मुखाजवळ प्रवाह किनार्‍यास समांतर. कारण, 'डोंगरांच्या रांगा'


8. किल्ले : जिल्हे डोंगरी किल्ले व सागरी किल्ले


ठाणे वसूली, माहुली, भंडारगड, पळसगड अर्नाळा


रायगड कर्नाळा, शिवथर, माळांगगड, रायगड जंजिरा


रत्नागिरी जयगड, फत्तेगड, पुर्नगड, कानकदुर्ग सुवर्नदुर्ग


सिंधुदुर्ग रांगना, देवगड, भगवंतगड, मनोहारगड, सिंधुदुर्ग विजयदुर्ग


भारतगड, पधगड सजैकोत

काय आहे गल्फा प्रवाह?



📌उत्तर अटलांटिक महासागरातील जगप्रसिद्ध उबदार सागरी प्रवाह. १४९२ मध्ये कोलंबसच्या व १५१३ मध्ये पॉन्से द लेऑन या स्पॅनिश नाविकाच्या लक्षात तो आला होता. तो मेक्सिकोच्या आखातातून येतो, या समजुतीमुळे बेंजामिन फ्रँक्लिनने त्याला गल्फ स्ट्रीम हे नाव दिले.*

📌परंतु फ्लॉरिडाच्या सामुद्रधुनीपासून न्यू फाउंडलंडच्या आग्‍नेयीकडील ग्रँड बँक्सपर्यंत त्याची खास वैशिष्ट्ये दिसून येत असल्यामुळे, एवढ्या भागातच त्याचे हे नाव योग्य आहे. फ्लॉरिडा सामुद्रधुनीपासून नॉर्वेजियन समुद्रापर्यंतच्या प्रवाहास हे नाव अजूनही दिले जाते.
दक्षिण अमेरिकेच्या सेंट रॉक भूशिराजवळ दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहाच्या दोन शाखा होतात.

📌तयांपैकी उत्तरेकडील शाखा दक्षिण व मध्य अमेरिकेच्या किनाऱ्याकिनाऱ्याने कॅरिबियन समुद्रात आल्यावर तिला उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाची वेस्ट इंडीजच्या दक्षिणेकडील शाखा मिळते. मग तो प्रवाह मेक्सिकोच्या आखातात जाऊन तेथून फ्लॉरिडाच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडतो.

📌तयाला उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाची अँटिलीस प्रवाह ही शाखा मिळते व मग खरा गल्फ प्रवाह सुरू होतो. येथे त्याचे तापमान २०० से. ते २४०से.; रुंदी सु.१०० किमी.; खोली. सु. ८०० मी.; वेग ताशी ६·५ किमी.; क्षारता उच्च व रंग गर्द निळा असून तो दर सेकंदास २·६ कोटी घ. मी. पाणी वाहून नेतो
पृथ्वीच्या परिवलनामुळे मिळणाऱ्या कोरिऑलिस प्रेरणेमुळे तो उजवीकडे वळू लागतो

📌अमेरिकेच्या आग्‍नेय किनाऱ्याला समांतर मार्गाने हॅटरस भूशिरापर्यंत गेल्यावर तो अधिक रूंद व संथ होतो, त्यात लहान लहान भोवरे दिसतात, खोली ४ ते ५ हजार मी. होते व तो सेंकदाला ८·२ कोटी घ.मी.पाणी वाहून नेतो. ग्रँड बँक्सकडे गेल्यावर त्याला लॅब्रॅडॉर हा थंड प्रवाह मिळतो. त्याचे काही फाटे गल्फ प्रवाह व किनारा यांच्या दरम्यान शिरतात आणि गल्फ प्रवाह कोरिऑलिस प्रेरणेमुळे किनार्‍यापासून दूर गेल्यामुळे तळाचे थंड पाणी वर येते. यामुळे किनारा व गल्फ प्रवाह यांच्यामध्ये थंड पाण्याची एक भिंतच उभी राहते.

📌गल्फ प्रवाहाच्या उजवीकडे न दक्षिणेस सारगॅसो समुद्राचे पाणीही उच्च क्षारतेचे व उबदार असते.
गल्फ प्रवाहात व उत्तर अटलांटिक प्रवाहचक्राच्या मध्यभागीच्या सारगॅसो समुद्रात सारगॅसो या विशिष्ट सागरी वनस्पतीची चकंदळे तरंगत असतात.

*📌गल्फ प्रवाहाच्या उजव्या बाजूच्या पाण्याची पातळी डावीकडील पातळीपेक्षा सु. ८० सेंमी. उंच असते. ग्रँड बँक्सजवळ उष्ण प्रवाहावरील आर्द्र हवा, थंड प्रवाहावरील थंड हवेत मिसळून बाष्पांचे सांद्रीभवन होते व दाट धुके पडते.*

📌 त तेथील मासेमारी नौकांस धोक्याचे असते. सु. ४०० उ. अक्षांश व ५०० प. रेखांश येथे गल्फ प्रवाह कोरिऑलिस प्रेरणेमुळे ईशान्येकडे जाऊन पश्चिमी वाऱ्यांमुळे वाहणाऱ्याउत्तर अटलांटिक प्रवाहात मिसळून जातो.
पुढे हा प्रवाह यूरोपच्या पश्चिम किनार्‍यापर्यंत गेल्यावर त्याच्या दोन शाखा होतात.

📌 दक्षिणेकडील शाखा आयबेरियन द्विपकल्प, वायव्य आफ्रिका यांच्याजवळून थंड कानेरी प्रवाह म्हणून उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाला मिळते.
उत्तरेकडील शाखा ब्रिटिश बेटे व नॉर्वे यांच्या किनाऱ्यांजवळून जाऊन पुढे आर्क्टिक महासागरात नाहीशी होते. तिचे तपमान अझोर्सच्या उत्तरेस १५·५० से. होते.

📌या प्रवाहामुळे कॅनडाचे हॅलिफॅक्स, रशियाचे मुरमान्स्क व ब्रिटिश बेटे आणि नॉर्वे यांची बंदरे हिवाळ्यात न गोठता खुली राहतात. गल्फ प्रवाहामुळे पश्चिम व वायव्य युरोपचे हवामान अधिक उबदार होते, असे समजले जाते.

📌तथापि हा परिणाम प्रवाहापेक्षा त्याने वेढलेल्या उबदार जलसंचयाचा आहे असे आता दिसून आले आहे; किंबहूना प्रवाह जेव्हा अधिक पाणी वाहून नेत असतो, तेव्हा यूरोपात तपमान थोडे कमीच होते असे आढळले आहे.
अमेरिकेहून यूरोपकडे जाणाऱ्या नौकांस गल्फ प्रवाहाचा फायदा मिळून वेळ व जळण यांची बचत होते. परंतु उलट बाजूने येणाऱ्या नौका मात्र हा प्रवाह टाळतात.

 📌गल्फ प्रवाह, त्याच्या समुद्रपृष्ठावरील व खोल पाण्यातील लहानमोठ्या शाखा, खालून वाहणारा प्रतिप्रवाह, सागरतळावरील निक्षेपांवर होणारा परिणाम इत्यादींचे संशोधन आधुनिक पद्धतींनी चालूच आहे.

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...