Saturday 17 October 2020

ससदेविषयी महत्त्वाची माहीती




· एका वर्षात संसदेची कमीत कमी तीन अधिवेशने घ्‍यावी लागतात.


· संसदेच्‍या दोन अधिवेशनामधील अंतर (कालावधी) जास्‍तीत जास्‍त सहा महिने असू शकतो.


· नागरिकत्‍व नियमित करण्‍याचा अधिकार संसदेस आहे.


· राज्‍यघटनेतील तरतुदी बदलण्‍याचा अधिकार केवळ संसदेला आहे.


· घटनेच्‍या कलम ३०२ नुसार विविध निर्बंध लादण्‍याचे अधिकार संसद यांना आहेत.


· संरक्षण या विषयावर कायदा करण्‍याचे सर्वस्‍वी अधिकार संसदेस आहेत.


· जेव्‍हा राज्‍यात राष्‍ट्रपती-शासन कलम ३५६ अन्‍वये लागू होते, तेव्‍हा राज्‍य यादीतील कर कायदे संमत करण्‍याचे अधिकार संसद अथवा संसदेने विहित केले प्राधिकारी यांना आहेत.


· विधेयकाचे रूपांतर विधिनियमात होण्‍यासाठी त्‍यांला तीन टप्‍प्‍यातून जावे लागते.


· करात कपात किंवा कर रद्द करण्‍याविषयी तरतूद असलेले विधेयक राष्‍ट्रपतीच्‍या शिफारशीशिवाय मांडता येतो.


· सामान्‍यत: वित्त विधेयकाची मसंडणी व प्रविष्‍टीकरण राष्‍ट्रपतींची शिफारस असल्‍याशिवाय शक्‍य होत नाही.


· वित्त विधेयकाची मांडणी राष्‍ट्रपती यांच्‍या शिफरशीवरून केली जाते.


· विधेयक वित्त विधेयक आहे/नाही असा प्रश्‍न उद्भवचल्‍यास अंतिम निर्णय लोकसभेचे सभापतीचा असतो.


· वित्त विधेयक हे कर, कर्जे व खर्च याबाबत असते.


· वित्त-विधेयक प्रथमत: लोकसभेत मांडले जाते.


· सर्व वित्त विधेयके (Financial Bills) ही धन विधेयके (Money Bills) असतात.


· राज्‍यघटनेच्‍या कलम ३३० व ३३२ अनुसार लोकसभा व राज्‍याच्‍या विधानसभांनी अनुसूचित जाती व जमातींसाठी खास राखीव जागा ठेवल्‍या आहेत.


· लोकसभेमध्‍ये केंद्रशासित प्रदेशांमधून १३ सदस्‍य निवडले जातात.


· लोकसभेच्‍या पहिल्‍या मध्‍यावधी निवडणुका १९७१ मध्‍ये घेण्‍यात आल्‍या.


· आणीबाणीच्‍या काळात लोकसभेचा कार्यकाळ एक वर्ष पर्यंत वाढवता येतो.


· राज्‍यसभा कधीच बरखास्‍त केली जात नाही.


· राज्‍यसभेच्‍या सभासदाचा कार्यकाळ ६ वर्षाचा असतो.


· लोकसभेने पारित केलेले व राज्‍य सभेकडे शिफारशीकरिता पाठवलेले वित्त विधेयक १४ दिवसात परत पाठवणे हे राज्‍यसभेवर बंधनकारक आहे.

महाराष्ट्र नदी प्रणाली



🍀  महाराष्ट्र हा सह्याद्री पर्वतरांगा ⛰🏔मळे विभागला गेला आहे. कोकण आणि महाराष्ट्र पठार असे दोन विभाग पडले आहेत.


🍀 सहयाद्री पर्वत⛰⛰ हा महाराष्ट्र मध्ये प्रमुख जलविभाजक म्हणून काम करतो या मुळे पुर्व वाहिनी नद्या  आणि पश्चिम वाहिनी नद्या असे दोन प्रकार पडले आहेत.


🍀 पुर्व वाहिनी नद्या या आकाराने आणि लांबी ने ही पश्चिम वहिनी नद्यांच्या पेक्षा मोठ्या आहेत.


🍀  गोदावरी नदी ही महाराष्ट्रमधील सर्वांत मोठी नदी आहे


🍀 गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हणूनदेखील ओळखलं जाते.


🍀महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यांची लांबी


      🔥(लांबी फक्त महाराष्ट्रामधील🔥


🌸 गोदावरी     668 km 


🌸 पैनगंगा      495 km* 


🌸 वर्धा          455 km


🌸 भीमा        451 km


🌸 वैनगंगा      295 km 


🌸 कृष्णा        282 km 


🌸 तापी         208 km 


   ‼️ Trick -गप वर्धा भिवु नको ‼️


विधानपरिषद ट्रिक


🏆  भारतात सर्व मिळून 29 राज्यं आहेत

त्यापैकी 22 राज्यात फक्त विधानसभा अस्तित्वात आहे


🏆 आणि उरलेल्या 7 राज्यामध्ये विधानसभा   बरोबरच विधानपरिषद हे अस्तित्वात आहे


  🏆 Article 169 विधानपरिषद बनवणे किवा अस्तित्वात असलेली विधानपरिषद बरखास्त करणे यासाठी


🏆 विधानपरिषदची स्थापना किंवा आहे ती बरखास्त करणे यासाठी फक्त संसद कायदा करू शकते 


🏆 मात्र यासाठी त्या राज्याच्या विधानसभा ने विशेष बहुमत ठराव पास करून संसदेत पाठवावा लागतो


🏆 विधानपरिषद कोण कोणत्या राज्यात आहेत


☘️ Trick- TU B MJA KAR(तू भी मजा कर ) ☘️


🏆 T -Telangana ( तेलंगाणा)


🏆 U- UttarPradesh ( उत्तरप्रदेश)


🏆 B- Bihar ( बिहार)


🏆 M- Maharashtra ( महाराष्ट्र)


🏆 J - Jammu & Kashmir( जम्मू काश्मीर)


🏆 A- Andhrapradesh (आंध्रप्रदेश)


🏆 KAR- Karnatak (कर्नाटक)

'चांद्रयान-२'



🚀  यत्या १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी भारताचं 'चांद्रयान -२' 🛰अवकाशात झेपावणार आहे.


🚀   6 सप्टेंबरला "चांद्रयान-2'🛰 चद्रावर दक्षिण ध्रुवाजवळ उतरेल, असा विश्‍वास "इस्रो'ने व्यक्त केला आहे. 


🚀   इस्रो'चे अध्यक्ष के. सिवान यांनी या मोहिमेची माहिती दिली.


🚀   परेक्षपणासह या संपूर्ण मोहिमेवर 978 कोटी रुपये खर्च होतील, असं सिवान यांनी सांगितलं.


🚀  इस्रो'ने 2008 मध्ये "चांद्रयान-1 चे प्रक्षेपण केले होते.


🚀  श्रीहरीकोटा येथून "जीएसएलव्ही एमके-3 '(GSLV MK|||) या प्रक्षेपकाद्वारे "चांद्रयान-2'चे उड्डाण होणार आहे.


🚀   चांद्रयान-2'चे ऑर्बिटर, लॅंडर (विक्रम) आणि रोव्हर (प्रज्ञान) असे तीन भाग आहेत.


🚀   इस्रो'चे संस्थापक आणि भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांचे "विक्रम' हे नाव "चांद्रयान-2'मधील लॅंडरला देण्यात आले आहे


🚀  चांद्रयान-2' वैशिष्ट म्हणजे यात एकही उपकरण (पेलोड) विदेशी नाही(संपूर्ण स्वदेशी). या यानाचे सर्व भाग संपूर्णपणे स्वदेशी आहेत. "चांद्रयान-1'च्या अवकाश यानात युरोपचे तीन व अमेरिकेचे दोन पेलोड होते.


🚀  यानाचं एकूण वजन 3800(3.8 टन) किलो आहे


🚀  रोव्हरचं वजन २७ किलो  व लांबी १ मीटर आहे.


🚀  लँडरचं वजन १४०० किलो  आणि लांबी ३.५ मीटर आहे.


 🚀  ऑर्बिटरचं वजन २४०० किलो आणि लांबी २.५ मीटर आहे.


👇👇👇👇👇👇

🚀  रशियाची अंतराळ संस्था "रॉसकॉसमॉस'ने 2007 मध्ये "चांद्रयान-2' मोहिमेला सहकार्य करण्याची तयारी दाखविली होती पण त्यांनी नंतर त्यातून माघार घेतली 

इस्रो'ने स्वतःच स्वदेशी🇮🇳🇮🇳 लडर व रोव्हर तयार केले.

जीवनसत्वे आणि त्यांचे प्रकार



📌फक शास्त्रज्ञाने जीवनसत्वे शोध लावला

📌5 प्रकारची जीवनसत्वे आपणाला लागतात

📌जीवनसत्वे A,B,C,D,E,K

📌जीवनसत्वे B,C हे पाण्यात

विरघळतात बाकी सर्व मेदात विरघळतात

📌D हे एकमेव जीवनसत्वे आपले शरीर तयार करते(सूर्यप्रकाशाचा कोवळ्या उन्हात) बाकी सर्व आपणाला आपल्या आहारातुन मिळवावे लागले


🧬जीवनसत्व व त्यांची शास्त्रीय नावे🧬


📌Vitamin A-  Retinol(रेटिनॉल) 

📌Vitamin B-  Thiamine(थयमिन)

📌Vitamin C-  Ascorbic      Acid(असकरबीक ऍसिड)

📌Vitamin D- Calciferol(कॅलसिफेरोल)

📌Vitamin E- Tocoherol(टोकॉफेरोल)

📌Vitamin K- Phylloquinone(फिलॉकवेनॉन)


💡नावे लक्षात ठेवण्यासाठी Trick💡

रथा एकटी फिरली

VitA  र -रेटिनॉल

VitB  था-थयमिन

VitC  ए-असकरबीक ऍसिड

VitD  क-कॅलसिफेरोल

VitE  टी-टोकॉफेरोल

VitK  फी-फिलॉकवेनॉन

पहिली पंचवार्षिक योजना



कालावधी:-1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956


प्रतिमान:- हेरॉड डोमर


योजना


🔴दामोदर प्रकल्प(झारखंड व पश्चिम बंगाल)


🔴भाक्रा नांगल(हिमाचल प्रदेश व पंजाब)


🔴कोसी प्रकल्प (बिहार)


🔴हिराकुड योजना( ओडिशा महानदीवर)


🔴सिंद्री खत कारखाना(झारखंड)


🔴HMT बंगलोर


🔴चित्तरंजन इंजिन कारखाना


🔴हिंदुस्थान अँटिबायोटिक (पूणे)


1952:- समुदाय विकास कार्यक्रम


1952:- भारतीय हातमाग बोर्ड


1953:-खादी व ग्रामोद्योग बोर्ड


1955:- SBI स्थपना


1955:-ICICI स्थापना


👉राष्ट्रीय उत्पन्न 18 टक्के वाढ


👉दरडोई उत्पन्न 11 टक्के वाढ


👉किंमत निर्देशांक 13 टक्के ने कमी


🌷वृद्धी दर🌷


संकल्पित👉2.1%


साध्य👉3.6%

सराव प्रश्न

(1)1857 च्या उठावात पहिला हुतात्मा कोण झाला?

तात्या टोपे

मंगल पांडे✅✅✅

नानासाहेब पेशवे

बहादुरशहा जफर



2)चंपारण्य सत्याग्रह 1917 मध्ये करण्यात आला. चंपारण्य हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

उत्तरांखंड 

उत्तर प्रदेश

पंजाब

बिहार✅✅✅ 




3)जगात सर्वात जास्त बोलणाऱ्या एकूण भाषांपैकी हिंदी भाषेचा कितवा क्रमांक लागतो?

पाचवा

सहावा✅✅✅

सातवा

आठवा




4)नव्या शैक्षणिक धोरणानुसार 10+2 ऐवजी कोणती पद्धत राबवली जाणार आहे?

5+3+3+4✅✅✅

5+10+12

5+8+4

5+4+3+2




5)कोणते पोलीस ठाणे देशातील सर्वोत्तत्कृष्ठ ठरले आहे?

नादौन पोलीस ठाणे✅✅✅

नानखारी पोलीस ठाणे

रामपूर पोलीस ठाणे

नेरवा पोलीस ठाणे

इतिहास महत्त्वाचे उठाव


🔹ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले उठाव :


संन्याशाचा उठाव :  1765-1800 - बंगाल शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक

 

चुआरांचा उठाव : 1768 - बंगाल-मिजापूर जिल्हा जगन्नाथ घाला

 

हो जमातीचे बंड : 1820 - छोटा नागपूर व सिंगभूम

 

जमिनदारांचा उठाव : 1803 - ओडिशा जगबंधू

 

खोंडांचा उठाव : 1836 - पर्वतीय प्रदेश दोरा बिसाई

 

संथाळांचा उठाव : 1855 - कान्हू व सिंधू

 

खासींचा उठाव : 1824 - आसाम निरतसिंग

 

कुंकिंचा उठाव : 1826 - मणिपूर

 

🔹दक्षिण भारतातील उठाव  -


पाळेगारांचा उठाव : 1790 - मद्रास

 

म्हैसूरमधील शेतकर्‍यांचा उठाव : 1830 - म्हैसूर

 

विजयनगरचा उठाव : 1765 - विजयनगर

 

गोरखपूरच्या जमिनदारांचा उठाव : 1870 - गोरखपूर

 

रोहिलखंडातील उठाव : 1801 -           रोहिलखंड

 

रामोश्यांचा उठाव : 1826 - महाराष्ट्र उमाजी नाईक व बापू त्र्यंबकजी सावंत

 

भिल्ल व कोळ्यांचा उठाव : 1824

 

केतूरच्या देसाईचा उठाव : 1824 - केतूर

 

फोंडा सावंतचा उठाव : 1838


भिल्लाचा उठाव : 1825- खानदेश

 

दख्खनचे दंगे : 1875- पुणे,सातारा,महाराष्ट्र शेतकरी

राजा राममोहन रॉय



 भारतीय समाजसुधार होते. त्यांचा जन्म बंगालमधील हुगळी गावातील ब्राह्मण कुटुंबात २२ मे १७७२ रोजी झाला.त्या काळात प्रशासनासाठी वापरली जाणारी भाषा पर्शियन व अमेरिका होती. त्यामुळे पर्शियन व अरेबिक शिकण्यासाठी त्यांना पाटणा येथे पाठविण्यात आले. त्यानंतर ते बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी तिबेट व बनारसला गेले. पर्शियन व अरेबिक भाषेत त्यांनी वेदांत ग्रंथ हे पहिले पुस्तक लिहले. १८१५ मध्ये कोलकत्ता येथे परतल्यावर त्याचे बंगाली भाषेत रुपांतर(भाषांतर) केले. त्यांना "राजा"हि पदवी मुगल सम्राट अकबर{द्वितीय} याने बहाल केली. मुगल सम्राटचे राजदूत म्हणून ते इंग्लंडला गेले होते. भारतातून इंग्लंडला जाणारे ते पहिले भारतीय होते.राजा राममोहन रॉय यांना भारतात नव विचाराचे जनक म्हंटले जातात.त्यांनी सर्वप्रथम "ब्रह्मपत्रिका"नावाचे वृत्तपत्र सुरु केले.ते पहिले उच्चशिक्षित व्यक्ती होते. ते भारतातून इंग्लडला गेले.त्यांनी मूर्तीपूजेला,देवदेवतांच्या पूजेला विरोध केला. जीवसृष्टीचा निर्माता एकच आहे व तो निर्गुण, निराकार आहे,असे ते मानत होते. हिंदू धर्मातील कालबाह्य झालेल्या रूढी व परंपराना त्याचा विरोध होता.भारतातील समाजाला नवी दिशा देणे ही त्यांची इच्छा होती.त्यासाठी त्यांनी १८३० साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली.ख्रिश्चन धर्माचा आभ्यास केला.प्रथा ,परंपराविरुद्ध लढा दिला. भारतातील धर्मव्यवस्था, अर्थव्यवस्था, व शिक्षणव्यवस्था यासंदर्भात लेखन करण्यास सुरुवात केली.त्यासाठी काही वृतपत्रे तसेच सुधारणा चळवळ सुरु केली.त्यांना भारतीय सुधारणेचे जनक म्हटले जाते. 


🌷वत्तपत्रे - 

त्यांनी ४ डिसेंबर १८२१ रोजी संवाद कैमुदी हे बंगाली भाषेतील तर १२ एप्रिल १८२२ रोजी मिरात_उल_ अखबार हे पर्शियन व्रतपत्र सुरु केले. त्यांनी १८२८ साली प्रेसिदेन्शी कॉलेज सुरु केले.


🌷शिक्षण -

२२ मे १७७२ रोजी बंगालमधील राधानगर येथे जन्मलेल्या राममोहन यांच्या जडणघडणीत त्यांच्या माता-पित्यांच्या घराण्यांचा संबंध फार मोठा आहे. वडीलांकडील सर्व मंडळी आधुनिक शिक्षण घेतलेली आणि बहुतांश सरकार दरबारी मोठ्या हुद्द्यावर नोकरी करणारी होती. त्यामुळेे त्यांच्या वडीलांनी वयाच्या नवव्या वर्षी त्यांना अरबी, फारसी या त्याकाळच्या सरकारात / व्यवहारात वापरल्या जाणार्‍या भाषा आणि शास्त्र शिकण्यासाठी पाटण्याच्या एका मदरशात (मुक्तब) पाठवल. मदरशामधे अरबी आणि फारसी भाषांबरोबरच त्यांनी इस्लाम धर्म आणि सुफी पंथ, शायर आणि शायरी यांचादेखील अभ्यास केला. हाफीज आणि सादी हे त्यांचे आवडते शायर होते.तिथ शिक्षण घेतल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षी आईच्या प्रभावामुळे, ज्यांच्या माहेरची मंडळी प्रामुख्यान पौरोहित्य करणारी होती, धार्मिक शिक्षण घेण्यासाठी म्हणून बनारस (काशी) इथ त्यांना पाठवण्यात आल. तिथ त्यांनी संस्कृत भाषेबरोबरच वेद, वेदांत, उपनिषदे अशा गोष्टींचा अभ्यास केला. सोळाव्या वर्षापर्यंत त्यांनी बनारस मधे वास्तव्य केल. हे अस दोन टोकाच्या किंवा पूर्ण वेगवेगळ्या व्यवस्थेत शिक्षण घेउन राम मोहन वयाच्या सोळाव्या वर्षी घरी परत आले. घरी परतल्यावर त्यांनी तुहफतूल मुवाहीद्दीन (एकेश्ववरवाद्यांना भेट) नावाचा अरबीत प्रस्तावना असणारा एक लेख फारसीमधे लिहीला. यामधे त्यांनी मूर्तीपूजेवर कडाडून टीका केली होती. त्यांच्यामते मूर्तीपूजा ही वेदांच्या शिकवणुकीच्या विरुद्ध होती. त्या लेखामुळ वडीलांशी त्यांचे पटेनास झाल आणि स्वत्:च घर सोडून निघून गेले.

प्राचीन भारताचा इतिहास :



 राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विशेषतः

.

* सिंधू संस्कृती

०१. समांतर चतुर्भुज आकाराचा हडप्पाचा गढ ४६० गज (४१८ मीटर) लांब, २१५ गज (१९५ मीटर) रुंद व १७ गज (१५ मीटर) उंच होता.


०२. सिंधू संस्कृतीची लिपी ही चित्रलिपी होती. ज्याच्यात ६०० पेक्षा जास्त चित्राक्षर व ६० मुळाक्षरे होती.


०३. १९२५ साली अर्नेस्ट मैक च्या नेतृत्वाखाली चन्हुदडो नावाच्या शहराचे उत्खनन केले गेले. या शहरात गढ नाही.

०४. नाळ, डाबरकोट, राखीगढी, बनवली, रंगपूर, लोथल, आम्री, कुल्ली, राणा घुन्डाई, अंजिरा, गुमला, देस मोरासी घुन्डाई, मुन्डीगाक, दिप्लबंगा, सहर-ए-सोख्ता, बामपूर व क्वेट्टा या ऐतिहासिक स्थळी सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.


०५. १९६१ साली राजस्थानातील कालीबंगा येथे बी.बी. लाल आणि बी.के. थापड यांच्या निर्देशनाखाली उत्खनन करण्यात आले. उत्खननात खालील भागात पूर्व-सिंधू संस्कृतीचे अवशेष तर वरील पृष्ठभागात सिंधू संस्कृतीचे अवशेष मिळाले. येथील शहर आणि गडाच्या चारही बाजूंनी तटबंदी होती.


०६. रंगनाथ राव यांच्या निदर्शनाखाली १९५३-५४ मध्ये गुजरात मधील रंगपूर येथे सिंधुकालीन स्थळाचे उत्खनन करण्यात आले. येथे कच्च्या विटांचे गड, नाल्या, मातीची भांडी, दगडांचे फलक इत्यादी गोष्टी मिळाल्या. परंतु देवींच्या मूर्ती व मुद्रा सापडल्या नाही.


०७. प्राचीन काळी लोथल हे शहर समुद्रकिनाऱ्यावर स्थित होते. त्याच्या उत्खननात जहाज बांधणी कारखान्याचे अवशेष सापडले. यावरून असे समजले कि लोथलचे नागरिक पश्चिम आशियाशी व्यापार करत होते.


०८. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील सूरकोटडा या ठिकाणचे उत्खनन कार्य १९६४ मध्ये जगतपति जोशी यांच्या निर्देशनाखाली केले गेले.


०९. सिंधू संस्कृतीचे उत्खनन करत असताना २४२ फुट लांब आणि ११२ फुट रुंदीची एक विशाल इमारत सापडली. त्या इमारतीच्या भिंतीची रुंदी सुमारे ५ फुट होती.


१०. सिंधू संस्कृतीत काही मूर्ती सापडल्या. ज्याच्या मध्य भागात सूर्याची प्रतिमा होती. यावरून समजण्यात आले कि त्या काळात सूर्य पूजा प्रचलित होती.


११. भारतात मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे साधारणतः १.५ करोड वर्षापूर्वीचे आहेत. भारतीय लोकांचे निग्रीटो, प्राचीन ऑस्ट्रेलियन, काकेशसी, व मेंगोलाईड्स असे चार मूळ वांशिक उपप्रकार पडतात.


१२. अलाहाबाद जवळील सराय नाहर राय, बालाईखोर व लेखनिया येथे मानवी शरीराचे सांगाडे सापडले आहेत. मोठी उंची, चपटे नाक व रुंद चेहरा ही यांची विशेषता होती. हे सांगाडे मध्य पाषाणकालीन असावेत.


१३. सिंधू नदीची उपनदी असलेल्या सोहन नदीच्या किनाऱ्यावर पूर्व पाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष सापडले. म्हणून याला सोहन संस्कृती असेसुद्धा म्हटले जाते.


१४. हडप्पा संस्कृतीत देवीची पूजा केली जात असे. हडप्पा संस्कृतीत कुत्रा, मांजर आणि घोड्याच्या शरीराचे अवशेष मिळाले आहेत.


१५. सिंध प्रदेश हा कापूस उत्पादन करणारा प्रदेश होता. म्हणून ग्रीकांनी याला सिडोन असे नाव दिले होते.


१६. हडप्पामध्ये चांदीची आयात अफगाणिस्तान, दक्षिण भारत, इराण व अरबस्थानातून केली जात असे. निर्माण कार्यासाठी लागणारा लाज्बर्द बदक्शां येथून, फिरोजा इराण मधून, जबूमणि महाराष्ट्रातून, मुंगा आणि लाल सौराष्ट्र व पश्चिम भारतातून तसेच 'हरा पत्थर' मध्य आशियातून आयात केला जात असे.


१७. राजस्थानातील अहाड संस्कृती ताम्रयुगीन होती. मातीची घरे, ताम्र भांडी, भातशेती ही या २००० वर्षापूर्वीच्या संस्कृतींची विशेषता होती.


१८. माळवा या ताम्र पाषाण कालीन संस्कृतीची चिन्हे नव्दातौली येथून प्राप्त झाली आहेत.

राष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना


.

1). ब्रिटिश अधिकाऱ्यांतही व्हाइसरॉय लॉर्ड डफरिन, ए. ओ. ह्यूमसारखे लोक यांनी भारतात सुराज्य निर्माण व्हावे, दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भडका उडू नये, त्यांच्या अभिव्यक्तीला एक सनदशीर साधन मिळावे, हिंदी लोकांना स्वायत्ततेचे हक्क प्राप्त व्हावेत असे वाटत होते.

2) सर्व देशाचे प्रतिनिधित्व करणारी एखादी अखिल भारतीय राजकीय संस्था निर्माण झालेली नव्हती. ती स्थापन करण्यात ए.ओ. हयूम या सेवा निवृत्त सनदी अधिकाऱ्याने सर विल्यम वेडरबर्न व सर हेन्री कॉटन या दोन सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्याचेही सहकार्य घेतले.

3)  राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन पुण्यास भरविण्याचे ठरले होते. पण पुण्यास फार मोठया प्रमाणावर प्लेगची साथ झाली. त्यामुळे ते २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईच्या गोवालिया टॅंकजवळील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये ते भरविण्यात आले. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे या पहिल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. सर्व भारतातून एकूण ७२ प्रतिनिधी राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनास हजर होते.

4)  त्यामध्ये दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, न्या के. टी. तेलंग, दिनशा वाच्छा, वीर राघवाचार्य, पी. आनंद चार्लू, गंगाप्रसाद वर्मा, न्या. रानडे, बद्रुद्दीन तय्यबजी, रा. गो. भांडारकर, एस्. सुब्रमण्यम् अय्यर, दिवाणबहादूर रघुनाथराव, केशव पिल्ले, एन्. जी. चंदावरकर, गो. ग. आगरकर  इ. हिंदी नेत्याचा समावेश होता.

5)  कॉग्रेसचे पुढील अधिवेशन २८ डिसेंबर १८८६ राजी कलकत्ता येथे भरवण्यात यावेत असे ठरले. यानंतर ए.ओ. हयूम आणि राणी व्हिक्टोरिया यांना धन्यवाद देऊन सभा बरखास्त करण्यात आली. राष्ट्रसभेचे सुरुवातीचे स्वरुप कार्यपध्दती मवाळच होती.

मध्ययुगीन भारत (थोडक्यात)



गुप्त साम्राज्यानंतर भारताचा इतिहास मध्ययुगीन इतिहासात मोडतो. गुप्त साम्राज्यानंतर हूणांच्या आक्रमणांनी खिळखिळे झाले. त्यानंतर हर्षवर्धन या कनौज च्या सम्राटाने भारतीय राज्ये पुन्हा एका छत्राखाली आणली.


त्याचे साम्राज्य तो जिवंत असे पर्यंत टिकले परंतु प्रभावी वारसदार नसल्याने ते त्यानंतर लगेचच कोसळले. ७ व्या शतकानंतर ते १३ व्या शतकापर्यंत अनेक हिंदू साम्राज्ये उदयास येउन लयाला गेली.


१३ व्या शतकातले विजयनगरचे साम्राज्य हे शेवटचे मध्ययुगीन हिंदू साम्राज्य होते. या काळात भारतीयांनी स्थापत्यामध्ये फार मोठी प्रगती केली. मध्ययुगाच्या पूर्वाधात ६ व्या शतकात शंकराचार्यांनी प्राचीन अद्वैतवादाचे पुनरुत्थान केले.


आपल्या पांडित्याने हिंदू सनातन धर्माला पुन्हा एकदा बळकटी दिली. यानंतर भारतातील बौद्ध धर्माचे प्रस्थ कमी झाल्याचे समजले जाते. 


या काळात दक्षिण भारत व महाराष्ट्रात राष्ट्रकूटांचे राज्य होते तर मध्य व पश्चिम भारतात मालव प्रांतात प्रतिहार पूर्वेकडे बंगालमध्ये पाल साम्राज्य उदयास आले ज्यांनी काही काळ जवळपास संपूर्ण उत्तर भारत व अफगाणिस्तानापर्यंत आपल्या सीमा वाढवल्या होत्या. 


प्रतिहारांनी उमय्यद खलीफांच्या काळात झालेल्या पहिल्या इस्लामी आक्रमणाचा प्रखर सामना केला व पुढील तीन चार शतके इस्लामी आक्रमणे होण्यापासून भारताचे रक्षण केले. 


प्रतिहारांचे मध्य व पश्चिम भारतावरील साम्राज्य कालांतराने क्षीण झाले व अनेक लहान सहान राज्यांमध्ये विभागले जी राज्ये राजपूत राज्ये (राजस्थानमधील) म्हणून ओळखली जात,


त्या राज्यांनी अगदी भारत इंग्रजांपासून स्वतंत्र होईपर्यंत आपले अस्तित्व टिकवले होते.


या राजपूत राज्यांनी उत्तर भारतातील मोठ्या प्रांतावर अनेक शतके राज्य केले, यापैकी पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजपूत राजा दिल्लीचा राजा होता व इस्लामी आक्रमकांविरुद्ध अनेक युद्धे केली.


भारताच्या इतिहासातील पराक्रमी योद्धयांमध्ये पृथ्वीराजची गणना होते. मोहम्मद घौरी याने पृथ्वीराजचा पराभव करून त्याचा वध केला व स्वतः दिल्लीचा शासक बनला व भारतावर अधिकृतरीत्या इस्लामी राजवट सुरू झाली.


या काळात दक्षिण व मध्य भारतात चालुक्य साम्राज्य होते. *चालुक्यांचा कार्यकाल इस ५५० ते ७५० इतका होता.* चालुक्यांची राजधानी कर्नाटकातील बदामी इथे होती.


आजही बदामी इथे चालुक्यांचा इतिहास सांगणारी प्राचीन मंदीरे आढळून येतात. पल्लवांनी देखिल याच काळात अजून दक्षिणेला राज्य केले. चालुक्यांच्या साम्राज्यातील स्थापत्यामधील प्रगती लक्षणीय होती. 


अजंठा व वेरुळची लेणी चालुक्य राज्यकर्त्यांनी बांधल्या असे मानतात. चालुक्यांचे राज्य जसे जसे क्षीण होत गेले तसे त्याचे विभाजन होत गेले. महाराष्ट्रात देवगीरीचे यादवांनी चालुक्य राज्य चालवले तर वारंगळमध्ये काकतीय तर कर्नाटक होयसाळांनी ताबा घेतला.


चालुक्यांचे राज्य क्षीण झाल्यानंतर दक्षिणेत प्राचीन चोल साम्राज्याने जबरदस्त उभारी घेतली व भारताच्या इतिहासातील एक अतिशय प्रभावी साम्राज्य बनले.


राजाराज चोल व राजेंद्र चोल यांनी चोल साम्राज्याच्या सीमा भारताबाहेर पार मलेशिया आणि थायलंड पर्यंत नेल्या. साम्राज्यवादी चोलांचे साम्राज्य भारताबाहेर पसरण्यास त्यांची प्रभावी नौदलीय सैन्यरचना उपयोगी ठरली.


या काळात दक्षिण भारतातील राज्यांनी पाश्चिमात्य व पौर्वात्य जगाशी व्यापार वाढवला व प्रबळ बनले. १३४३ पर्यंत चोलांचा प्रभाव कमी झाला व दक्षिणेतील सर्व लहान मोठी राज्ये विजयनगर साम्राज्यात संमिलीत झाली.


या काळात उत्तरेत इस्लामी राज्यकर्त्यांची पकड मजबूत झाली होती. विजयनगरचे साम्राज्य शेवटी इस्लामी राज्यकर्त्यांच्या आक्रमणाने लयाला गेले.

सरन्यायाधीश व त्याची कार्यकाळ


1)हरिलाल जेकिसनदास केनिया -      २६ जानेवारी १९५० ते ११ जून १९५१.


2)मंडकोलातुर पतंजली शास्त्री -          ७ नोव्हेंबर १९५१ ते ३ जानेवारी १९५४.


3) मेहर चंद महाजन -  ४ जानेवारी १९५४ ते २२ डिसेंबर १९५४.


4) बिजन कुमार मुखर्जी     -  ३ जानेवारी १९५५ ते ३१ जानेवारी१९५६.


5)सुधी रंजन दास - १ फेब्रुवारी १९५६ ते ३० सप्टेंबर १९५९.


6)भुवनेश्वरप्रसाद सिंह - १ ऑक्टोबर १९५९ ते ३१जानेवारी१९६४.


7)प्रल्हाद बालाचार्य गजेंद्रगडकर - फेब्रुवारी १९६४ ते मार्च १९६६.


8)अमल कुमार सरकार - १६ मार्च १९६६ ते २९ जून १९६६.


9)कोका सुब्बा राव - ३० जून  १९६६ ते ११ एप्रिल १९६७.


10)कैलास नाथ वांचू - १२ एप्रिल १९६७ ते २४ फेब्रुवारी १९६८.


11)मोहम्मद हिदायत उल्लाह - २५ फेब्रुवारी १९६८ ते १६डिसेंबर१९७०.


12)जयंतीलाल छोटालाल शाह - १७ डिसेंबर १९७० ते २१जानेवारी१९७१.


13)सर्वमित्र सिकरी - २२ जानेवारी १९७१ ते २५ एप्रिल १९७३.


14)अजित नाथ राय - २५ एप्रिल १९७३ ते २८ जानेवारी १९७७.


15)मिर्झा हमीदुल्ला बेग - २९ जानेवारी १९७७ ते २१ फेब्रुवारी १९७८.


16)यशवंत विष्णू चंद्रचूड - २२ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५.


17)प्रफुलचंद्र नटवरलाल भगवती -  १२ जुलै १९८५ ते २० डिसेंबर १९८६.


18)रघुनंदन स्वरुप पाठक -  २१ डिसेंबर १९८६ ते १८ जून १९८९.


19)एंगलगुप्पे सीतारामैया वेंकटरामैया - १९ जून १९८९ ते १७ डिसेंबर १९८९.


20)सब्यसाची मुखर्जी -  १८ डिसेंबर १९८९ ते २५ सप्टेंबर १९९०.


21)रंगनाथ मिश्रा - २५ सप्टेंबर १९९० ते २४ नोव्हेंबर १९९१.


22)कमल नारायण सिंग - २५ नोव्हेंबर १९९१ ते १२ डिसेंबर १९९१.


23)मधुकर हिरालाल केणिया -  १३ डिसेंबर १९९१ ते १७ नोव्हेंबर १९९२.


24)ललित मोहन शर्मा - १८ नोव्हेंबर १९९२ ते १२ फेब्रुवारी १९९३.


25)मनेपल्ली नारायणराव वेंकटचलैया -१२ फेब्रुवारी १९९३ ते २४ ऑक्टोबर १९९४.


26)अझीझ मुशब्बर अहमदी -  २५ ऑक्टोबर १९९४ पासून २४ मार्च १९९७.


27)जगदीश शरण वर्मा - २५ मार्च १९९७ ते १८ जानेवारी १९९८.


28)मदन मोहन पूंछी - १८ जानेवारी १९९८ ते ९ ऑक्टोबर १९९८.


29)आदर्श सेन आनंद -  १० ऑक्टोबर १९९८ ते ३१ ऑक्टोबर २००१.


30)सॅम पिरोज भरुचा - ११ जानेवरी २००१ ते ५ मे २००२.


31)भुपिंदर नाथ किरपाल - ६ मे २००२ ते ८ नोव्हेंबर २००२


32)गोपाल बल्लव पटनाइक  -  ९ नोव्हेंबर २००२ ते १८ डिसेंबर २००२.


33)विश्वेश्वरनाथ खरे - १९ डिसेंबर २००२ ते २ मे २००४.


34)एस. राजेन्द्र. बाबू - २ मे २००४ ते १ जून २००४.


35)रमेश चंद्र लाहोटी -  १ जून २००४ ते १ नोव्हेंबर २००५.


36)योगेशकुमार सभरवाल - 2  नोव्हेंबर २००५ ते १३ जानेवारी २००७


37)के. जी. बालकृष्णन - १४ जानेवारी २००७ पासुन १२ मे २०१०.


38)सरोश होमी कापडिया - १० मे २०१० ते २८ सप्टेंबर  २०१२.


39)अल्तमस कबीर - २९ सप्टेंबर २०१२ ते १८ जुलै २०१३.


40)पलानिसमय सदाशिवम् - १९ जुलै २०१३ ते २६ एप्रिल २०१४.


41)राजेन्द्रमल लोढा - २७ एप्रिल २०१४ ते - २७ सप्टेंबर २०१४.


42)एच. लक्ष्मीनारायणस्वामी दत्तू - २८ सप्टेंबर २०१४ ते २ डिसेंबर २०१५.


43)तीरथ सिंग तथा टी.एस. ठाकुर - ३ डिसेंबर २०१५ ते ४ जानेवारी २०१७.


44)जगदीश सिंग खेहर -

४ जानेवारी, इ.स. २०१७ ते २८ ऑगस्ट, २०१७.


45)दीपक मिश्रा - २८ ऑगस्ट २०१७ ते 2 ऑक्टोबर 2018


46) रंजन गोगाई - 3 ऑक्टोबर 2018 पासून.. 


भारताची ‘मिसाईल पॉवर’


 एकात्मिक मार्गदर्शीत क्षेपणास्त्र विकास (इंटिग्रेटेड गाईडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम -आयजीएमडीपी) हा भारतीय लष्काराचा प्रकल्प आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करते. बॅलेस्टिक मिसाईलमधील संशोधनास भारताने 1960 च्या दशकात प्रारंभ केला. 


▪️पथ्वी-1


सरकारच्या आयजीएमडीपी कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेले पृथ्वी-1 हे भारताचे पहिले क्षेपणास्त्र होय. फेब्रुवारी 1988 साली सादर करण्यात आलेल्या या क्षेत्रपणास्त्राची क्षमता 150 कि.मी. इतकी होती. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र 1994 साली लष्करात दाखल झाले.


▪️अग्नि-1


अणवस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेले हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र. अग्नि मालिकेतील पहिले क्षेपणास्त्र 1983 मध्ये डीआरडीओने सादर केले. याची मारक क्षमता 700 कि.मी. इतकी होती.


▪️आकाश


जमिनीवर आकाशात मारा करणार्‍या आकाशची क्षमता 30 कि.मी. इतकी असून एकाच वेळी अनेक लक्ष्यही भेदता येते. भारतीय लष्कर आणि हवाई दलासाठी याचा वापर केला जातो. 1997 साली याची पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र पूर्णपणे रडारद्धारा संचालित केले जाते.


▪️नाग


रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची तिसरी पिढी म्हणजे ‘नाग’ होय. याची क्षमता 3 ते 7 कि.मी. इतकी आहे. रात्रीदेखील अचूक लक्ष्य भेदण्याची क्षमता या ‘नाग’मध्ये आहे. ‘नाग’चा उपयोग हेलिकॉप्टरमध्येही केला जातो. 


▪️तरिशूल


जमिनीवरून आकाशात मारा करणारे ‘त्रिशूल’ एअरक्राप्ट जामरला उद्ध्वस्त करण्याचे काम करते. याची क्षमता 9 कि.मी. असून लढाऊ जहाजावर होणारे हल्ले रोखण्यासाठीही याचा उपयोग होतो.


▪️अग्नि 2


एप्रिल 1999 साली अग्नि-2 ची पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या ‘अग्नि’ ची क्षमता 2000 ते 2500 कि.मी. इतकी आहे. पारंपरिक आणि आधुनिक शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता यात आहे.


▪️पथ्वी 3


नौसेनेसाठी तयार करण्यात आलेले हे क्षेपणास्त्र 350 कि.मी.पर्यंत मारा करू शकते. याची चाचणी 2000 साली घेण्यात आली होती.


▪️बराह्मोस


भारत आणि रशियाद्धारे विकसित करण्यात आलेले हे आतापर्यंतचे सर्वात आधुनिक क्षेपणास्त्र आहे. ब्राह्मोसने भारताला क्षेपणास्त्र तंत्राज्ञाता अग्रेसर देश म्हणून ओळख मिळवून दिली. या सुपरसोनिक क्षेपणास्त्रात गती आणि अचूकतेचा जबरदस्त संगम आहे. भारताची ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियाची मस्कवा यांच्या नावावरून ‘ब्राह्मोस’ हे नाव त्याला देण्यात आले आहे. 300 कि.मी.पर्यंतचे लक्ष्य भेदण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये आहे.


▪️सागरिका


समुद्रातून लाँच करता येणारे पहिले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असून 750 कि.मी. पर्यंत लक्ष्य भेदता येते. 2008 साली याची पहिली चाचणी घेण्यात आली. अरिहंत या पाणबुडीसाठी हे खास तयार करण्यात आले.


▪️धनुष


पृथ्वी-2 या क्षेपणास्त्राचे हे छोटे रूप. समुद्रातील मार्‍यासाठी हे खास तयार करण्यात आले. मार्च 2011 साली लढाऊ जहाजांवरून याची यशस्वी चाचणी घेण्यात आली.


▪️अग्नि-3


अग्नि-2 ची ही सुधारित आवृत्ती असून मारक क्षमता 3500 ते 5000 कि.मी. इतकी मोठी आहे. शेजारील देशांमध्ये आतपर्यंत मारा अग्नि-3 करू शकते. 2011 साली लष्करात हे दाखल झाले.


▪️अग्नि-4


पहिल्या दोन अग्निची आणखी सुधारित आवृत्ती. पहिल्या दोन्ही क्षेपणास्त्रांपेक्षा वजनाने हलके, पण वाहक आणि मारक क्षमता जास्त.


▪️अग्नि-5


भारताचे पहिले आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र. 5000 कि. मी. पर्यंत क्षमता.


▪️निर्भया


जमीन, समुद्र आणि आकाश अशा तिन्ही ठिकाणहून हे क्षेपणास्त्र सोडता येते. ब्राह्मोसला सहाय्य म्हणूनही या क्षेपणास्त्राची ओळख आहे.


▪️परहार


जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे 150 कि.मी. क्षमता असलेल्या ‘प्रहार’ची 2011 साली पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. रोड मोबाईल लाँचरच्या मदतीने याचा मारा करता येतो. लष्कराला युद्धाच्या वेळी ‘प्रहार’चा चांगला उपयोग होतो.

आजचे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

Q.1) जगातील पहिला पाण्यावर तरंगणारा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशाने सुरू केला ?

⚫️ रशिया✅✅✅

⚪️ जर्मनी

🔴 फरान्स

🔵 इग्लंड


Q.2) नुकतीच कोणत्या जिल्हा सत्र न्यायालयाने भारतात सर्वप्रथम ई-पेमेंटची सुविधा सुरू केली ?

⚫️ शिवाजीनगर✅✅✅

⚪️ औरंगाबाद

🔴 मबई

🔵 नागपूर


Q.3) हॉकी वर्ल्ड कप 2018 कोणी जिंकला ?

⚫️ ऑस्ट्रेलिया

⚪️ नदरलँड

🔴 बल्जियम✅✅✅

🔵 इग्लंड


Q.4) हॉकी वर्ल्ड कप 2018 कोणत्या राज्यात पार पडली ?

⚫️ पजाब

⚪️ हरियाणा

🔴 पश्चिम बंगाल

🔵 ओडिशा✅✅✅


Q.5) हॉकी वर्ल्ड कप 2018 स्पर्धेचे शुभंकर चिन्ह काय होते ?

⚫️ आसामचा गेंडा

⚪️ गिरचा सिंह

🔴 बगाल टायगर

🔵 ओलिव रिडले कासव✅✅✅


Q.6) मिस युनिव्हर्स 2018 किताब कोणी पटकविला?

⚫️ टमारिन ग्रीन

⚪️ सटेफनी गुटेरझ

🔴 कट्रिओना ग्रे✅✅✅

🔵 यापैकी नाही

जम्मू, काश्मीर, लडाख हे भारताचे अंतर्गत भाग



🔰जम्मू, काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश हे भारताचे अंतर्गत भाग होते, आहेत आणि कायम राहतील, असे भारताने गुरुवारी स्पष्ट केले आणि चीनला भारताच्या अंतर्गत बाबींसंदर्भात भाष्य करण्याचा कोणताही अधिकार नाही, असेही भारताने ठणकावले.


🔰लडाख या केंद्रशासित प्रदेशाला त्याचप्रमाणे अरुणाचल प्रदेश या राज्याला आमची मान्यता नसल्याचे चीनने म्हटले होते त्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी वरील बाब स्पष्ट केली.


🔰जम्मू, काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश हे भारताचे अंतर्गत भाग होते, आहेत आणि काम राहतील ही भारताची स्पष्ट आणि कायम भूमिका आहे, असे प्रवक्त्याने सांगितले.

किर्गिझस्तानच्या अध्यक्षांचा राजीनामा


🔰वादग्रस्त संसदीय निवडणुकीनंतर देशात उसळलेला क्षोभ संपुष्टात आणण्याचा प्रयत्न म्हणून किर्गिझस्तानचे अध्यक्ष सूरोनबाय जीनबेकॉव्ह यांनी गुरुवारी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.


🔰राजकीय प्रतिस्पर्धी आणि निदर्शकांकडून जीनबेकॉव्ह यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती, किर्गिझस्तानात शांतता प्रस्थापित होणे, देशाची एकात्मता, जनतेचे ऐक्य आणि सामाजिक शांतता सर्वाहून महत्त्वाची आहे, सत्ता नव्हे असे जीनबेकॉव्ह यांच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या एका निवेदनामध्ये म्हटले आहे.


🔰सरकार समर्थक पक्षांनी ४ ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीत बाजी मारली असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केल्यानंतर देशात क्षोभ उसळला. मतांची खरेदी आणि अन्य गैरप्रकार निवडणुकीत करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला.


🔰तयानंतर निदर्शकांनी सरकारी इमारतींवर कब्जा केला, काही कार्यालये लुटण्यात आली. त्यानंतर मध्यवर्ती निवडणूक आयोगाने निवडणूक रद्द केली. त्यानंतर विरोधकांनी जीनबेकॉव्ह यांना हटविण्याची आणि नवे सरकार स्थापन करण्याची योजना जाहीर केली.

मराठी व्याकरण :- अलंकारिक शब्द



१) अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस


२) अकलेचा कांदा : मूर्ख


३) अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य


४) अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार


५ ) अष्टपैलू  : अनेक चांगले गुण असलेला


६) अळवावरचे पाणी : फार काळ न टिकणारे


७) अक्षरशत्रू : निरक्षर माणूस


८) अंडीपिल्ली : गुप्त गोष्ट


९) अंधेर नगरी : अव्यव्स्तीत पानाचा

 कारभार


१०) ओनामा : एखाद्या गोष्टीची सुरवात


११) उंटावरचा शहाणा : मूर्खपणाचा सल्ला देणारा


१२) उंबराचे फुल : अगदी दुर्मिळ वस्तू


१३) कर्णाचा अवतार : उदार माणूस


१४) कळसूत्री बाहुले : दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा


१५) कळीचा नारद : भांडण लाऊन देणारा


१६) काडी पहिलवान : हडकुळा माणूस


१७) कुंभकर्ण : झोपाळू माणूस


१८) कुपमंडूक : संकुचित दृष्टीचा


१९) कैकयी/मन्थरा : द्रुष्ट स्री


२०) कोल्हेकुई : लोकांची वटवट : खडाजंगी

संविधान सभा महिला सदस्य


✍️एकूण 15 महिलांचा सहभाग होता


✍️बगम रसूल या मुस्लिम लीग च्या होत्या..


✍️14 महिला काँग्रेस पक्षाच्या होत्या


🍀विजयालक्ष्मी पंडित:-UP


🍀बगम रसूल:-UP


🍀सचिता कृपलानी:-UP


🍀पर्णिमा बॅनर्जी:-UP


🍀कमला चौधरी:-UP


💥आम्मू स्वामिनाथन:-मद्रास


💥दर्गाबाई देशमुख:-मद्रास


💥दक्षयनी वेलायडून:-मद्रास


⚛️लीला रे:-बंगाल


⚛️रणुका रे:-बंगाल


⭕️राजकुमारी कौर:-केंद्रीय प्रांत


⭕️हसा मेहता:-बॉम्बे


⚛️सरोजिनी नायडू:-बिहार


⚛️मालती चौधरी:-ओरिसा


⚛️ऍनि मस्करीन:-त्रावणकोर

नोबेल पुरस्कार २०२० विजेते


🏆 वद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार २०२० 

👤 १) हार्वे अल्टर (अमेरिका)

👤 २) मायकल होउगटन (ब्रिटन)

👤 ३) चार्ल्स राइस (अमेरिका)


🏆 भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०

👤 १) रॉजर पेनरोज (ब्रिटन)

👤 २) रेनहार्ड गेंजेल (जर्मनी)

🙎‍♀ ३) अॅण्ड्रीया गेज (अमेरिका)


🏆 रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२० 

🙎‍♀ १) इमॅन्यूअल शार्पेंची (जर्मनी)

🙎‍♀ २) जेनफिर डाउडना (अमेरिका)


🏆 साहित्यातील नोबेल पुरस्कार २०२० 

🙎‍♀ १) लुईस ग्लुक ( अमेरिका )


🏆 शांततेतील नोबेल पुरस्कार २०२० 

🌾 १) संयुक्त राष्ट्र अन्न सुरक्षा कार्यक्रम


🏆 अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०

👤 १) पॉल आर. मिलग्रोम (अमेरिका)

👤 २) रॉबर्ट बी. विल्सन (अमेरिका)

वाचा :- मराठी समानार्थी शब्द



चव = रुची, गोडी

चरण = पाय, पाऊल

चरितार्थ = उदरनिर्वाह  

चक्र = चाक  

चऱ्हाट = दोरखंड

चाक = चक्र 

चंद्र = शशी, रजनीनाथ, इंदू 

चिंता = काळजी

चिडीचूप = शांत

चिमुरडी = लहान 

चूक = दोष  

चेहरा = मुख 

चौकशी = विचारपूस 

छंद = नाद, आवड

छान = सुरेख, सुंदर 

छिद्र = भोक 

जग = दुनिया, विश्व

जत्रा = मेळा 

जन = लोक, जनता  

जमीन = भूमी, धरती, भुई 

जंगल = रान 

जीव = प्राण

जीवन = आयुष्य, हयात 

जुलूम = अत्याचार, छळ, बळजोरी, अन्याय  

झाड = वृक्ष, तरू

झोपडी = कुटीर, खोप 

झोप = निद्रा  

झोका = झुला 

झेंडा = ध्वज, निशाण

ठग = चोर 

ठिकाण = स्थान 

डोके = मस्तक, शीर्ष, शीर 

डोळा = नेत्र, नयन, लोचन

डोंगर = पर्वत, गिरी 

ढग = मेघ, जलद, पयोधर, अभ्र 

ॠण = कर्ज 

तक्रार = गाऱ्हाणे 

तळे = तलाव, सरोवर, तडाग

त्वचा = कातडी

तारण = रक्षण 

ताल = ठेका

तुरंग = कैदखाना, बंदिवास 

तुलना = साम्य 

थट्टा = मस्करी, चेष्टा

थवा = समूह 

थोबाड = गालपट   

दगड = पाषाण, खडक 

दरवाजा = दार, कवाड

दाम = पैसा  

दृश्य = देखावा  

दृढता = मजबुती

दिवस = दिन, वार, वासर

दिवा = दीप, दीपक 

दूध = दुग्ध, पय

द्वेष = मत्सर, हेवा 

देव = ईश्वर, विधाता 

देश = राष्ट्र 

देखावा = दृश्य

दार = दरवाजा 

दारिद्र्य = गरिबी 

दौलत = संपत्ती, धन  

धरती = भूमी, धरणी 

ध्वनी = आवाज, रव 

नदी = सरिता  

नजर = दृष्टी

नक्कल = प्रतिकृती

नमस्कार = वंदन, नमन  

नातेवाईक = नातलग 

नाच = नृत्य 

निश्चय = निर्धार 

निर्धार = निश्चय 

निर्मळ = स्वच्छ

नियम = पद्धत 

निष्ठा = श्रद्धा 

नृत्य = नाच 

नोकर = सेवक


Latest post

सायमन कमिशन (1927-28)

- अध्यक्ष :-जॉन सायमन  - सदस्य: Clement Attlee, Harry Levy-Lawson, Edward Cadogan, Vernon Hartshorn, George Lane-Fox, Donald Howard - 8 नोव्...