Thursday 24 June 2021

अंकगणित प्रश्नसंच

Q1) चार अंकी मोठ्यात मोठी संख्या व चार अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज.

1) 10999✅ 

2) 11110 

3) 8888  

4) 8999 


Q2) 587, 678, 499, 591 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या तर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकांच्या संख्यांमधील फरक किती येईल?

1) 91 

2) 4 

3) 87 

4) 88✅ 


Q3) ज्यात 3 हा अंक नाही अशा दोन अंकी संख्या किती ?

1) 72✅

2) 80 

3) 79 

4) 81  


Q4) सर्वात मोठी दोन अंकी सम संख्या व सर्वात लहान दोन अंकी विषम संख्या यातील फरक किती?* 

1) 87✅

2) 88 

3) 89 

4) 90  


Q5) तीन अंकी दोन संख्येची बेरीज खाली दिलेली आहे. ती बेरीज कोणती आहे ?

1) 198 

2) 199 

3) 1999 

4) 1998✅


Q6) खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे.

1) सम संख्या + सम संख्या = सम संख्या   

2) विषम संख्या + विषम संख्या = सम संख्या 

3) सम संख्या x सम संख्या = सम संख्या 

4) विषम संख्या x विषम संख्या = सम संख्या✅  


Q7) तीन अंकी मोठ्यात मोठी सम संख्या कोणती?

1) 900 

2) 990 

3) 998✅  

4) 999 


Q8) पाच क्रमावर विषम संख्यांचे बेरीज 295 येते तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?

1) 60 

2) 61 

3) 62 

4) 63✅  


Q9) 7663 या संख्येतील 6 च्या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती?

1) 660 

2) 630 

3) 540✅ 

4) 450  


Q10) पहिल्या 30 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?

1) 15.5✅

2) 15 

3) 14.5 

4) 16.5 


important Questions 25


🎯01] हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?

👉🏻 बियास


🎯02] भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?

👉🏻 तिरुवनंतपुरम


🎯03] कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow’s Sanctuary) स्थापन्यात येणार आहे? 

👉🏻 मध्य प्रदेश


🎯04] कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.

👉🏻 औरंगाबाद


🎯05]  हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?

👉🏻 रांची


🎯06] फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

👉🏻 जळगाव


🎯07] मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?

👉🏻 लक्षद्वीप


🎯08] भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे? 

👉🏻 12 लाख चौ.कि.मी.


🎯09] नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?

👉🏻 दख्खनचे पठार


🎯10] महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे? 

👉🏻 मध्य प्रदेश


🎯11] महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत? 

👉🏻 उत्तर


🎯12]  परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?

👉🏻 निर्मळ रांग


🎯13] ‘V’ आकाराची दरी कशामुळे तयार होते?

👉🏻 नदीचे अपघर्षण


🎯14] दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे? 

👉🏻 Lignite



🎯15] बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

👉🏻 औरंगाबाद


🎯16] Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?

👉🏻 पाचगणी


🎯17] हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?

👉🏻 आसाम


🎯18] पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?

👉🏻 मणिपूर


🎯19] पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?

👉🏻 मरियाना गर्ता


🎯20] गोवरी’ कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?

👉🏻 राजस्थान


🎯21] घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?

👉🏻 दर्गा


🎯22] ग्रेट बॅरियर रीफ’ कोणत्या महासागरात आहे?

👉🏻 परशांत महासागर


🎯23] या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?

👉🏻 शक्र


🎯24]  कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?

👉🏻 गोदावरी


🎯25]   भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?

👉🏻 आसाम

चालू घडामोडी प्रश्न


१.   अ) भारताचे सार्वभौम पतमानांकन दोन वर्षांच्या कालावधीसाठी सध्या आहे त्याच  स्तरावर कायम राहील असे भाकीत स्टॅंडर्ड अँड पुअर क्रेडिट रेटिंग संस्थेने केली आहे.

ब). भारताचे सध्याचे सार्वभौम पतमानांकन BBB - (minus)आहे.


१) फक्त अ   

२).फक्त ब  

३) दोन्ही चुकीचे 

४) अ व ब दोन्ही बरोबर आहेत ✔️✔️


२. करोनाची सौम्य लक्षणं असलेल्या व लक्षणे नसलेल्या बाधित रुग्णांसाठी आयुष मंत्रालयाने कोणती बहुऔषधीयुक्त आयुर्वेदिक औषध वितरित करण्यात ठरविले आहे.

१) आयुष ६४   २. कोरोनील   ३. काबसुरा कुडीनिर

४. करोना बुटी.


 अ) फक्त १ आणि २

ब) फक्त १ आणि ३✔️✔️

क) फक्त १

ड) फक्त ४


३. 'नवसंशोधन दुत'  या नवीन उपक्रमासंबंधी खालील पैकी कोणती विधाने सत्य आहे/त.

अ). शाळांमध्ये नवं संशोधनाची संस्कृती रुजवण्यासाठी उपक्रम असेल.

ब). शाळेतील शिक्षक हे 'नवसंशोधन दुताची भूमिका घेणार

क). हा उपक्रम केंद्रिय शिक्षण मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे कडून निर्माण केले जाणार आहे.


१) फक्त अ

२) फक्त ब

३) सर्व विधाने बरोबर आहेत ✔️✔️

४) फक्त


४. नुकतेच RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी कविड -१९ दुसऱ्या लाटेमुळे घसरणाऱ्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी व उभारी देण्यासाठी किती कोटी रुपयांची आर्थिक उपाय योजना जाहिर केली आहे.

१) ४०,०००  

 २) ६०,०००  

 ३) ५०,००० ✔️

 ४) ३०,०००


५. महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच किती हजार कोटींची दीर्घकालीन कर्जरोखे विक्रीला काढली होती.

१)४०००.✔️

 २)३०००  

३)२०००. 

४) ५०००


1)कोणती भारतीय शैक्षणिक संस्था वा विद्यापीठ ‘QS जागतिक विद्यापीठांची मानांकन यादी 2020’ या क्रमवारीत भारतातले पहिल्या क्रमांकाचे ठरले?

(A) IIT मुंबई✅✅✅

(B) IIT मद्रास

(C) IIT दिल्ली

(D) IIT मंडी


 2)कोणी स्लोव्हाकिया या देशाच्या प्रथम महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली?

(A) मारिया रोको

(B) एड्रियाना कारेमब्यू

(C) डेनिएला हांतुचोवा

(D) जुझाना कापुतोवा✅✅✅



🌹📚🌹📚🌹📚🌹📚🌹📚



3)कोणती शैक्षणिक संस्था वा विद्यापीठ ‘QS जागतिक विद्यापीठांची मानांकन यादी 2020’ या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे?

(A) मॅसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी✅✅✅

(B) ऑक्सफर्ड विद्यापीठ

(C) मॅक्स प्लांक विद्यापीठ

(D) भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू


🌹📚🌹📚🌹📚🌹📚🌹📚


 4)कोणत्या सालापर्यंत ‘भारतमाला’ प्रकल्पाच्या अंतर्गत एकूण 35000 किलोमीटर लांबीच्या महामार्गांचे केले जाणार आहे?

(A) सन 2025

(B) सन 2022✅✅✅

(C) सन 2030

(D) सन 2035



5)राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने भारताला 5 भूकंपीय विभागांमध्ये विभागले आहे. कोणता क्षेत्र सर्वात उच्च जोखमीचा क्षेत्र मानला जातो जो अतीव तीव्रतेच्या भूकंपांना बळी पडतो?

(A) क्षेत्र 5✅✅✅

(B) क्षेत्र 1

(C) क्षेत्र 3

(D) क्षेत्र 2



🌹📚🌹📚🌹📚🌹📚🌹📚


6)भारतीय नौदलाच्या कोणत्या प्रकल्पाच्या अंतर्गत 6 पाणबुडी तयार करण्यासाठी भारत सरकारने जून महिन्यात 45 हजार कोटी रुपयांच्या खर्चाने प्रकल्पाची सुरुवात केली?

(A) प्रोजेक्ट 17A

(B) प्रोजेक्ट 75-I✅✅✅

(C) प्रोजेक्ट 71A

(D) प्रोजेक्ट 79-I



7)भारताने सॉलिड फ्युएल डक्टेड प्रणोदन समर्थित क्षेपणास्त्राचे चाचणी उड्डाण यशस्वीपणे पार पाडले. या क्षेपणास्त्राचे नाव काय आहे?

(A) कर्णजेट

(B) जेटएक्स

(C) जेट-ओ

(D) रामजेट✅✅✅


📚🌹📚🌹📚🌹📚🌹📚🌹


8) भारतीय प्राणीशास्त्रीय सर्वेक्षण (ZSI) आणि भारतीय वनस्पतीशास्त्रीय सर्वेक्षण (BSI) च्या प्रकाशनानुसार, 2017 साली वनस्पती आणि प्राण्यांच्या किती प्रजाती शोधल्या गेल्या?

(A) 539✅✅✅

(B) 739

(C) 639

(D) 439



9) कोणते कण हृदयरोग आणि श्वसनाच्या आजाराला कारणीभूत ठरणार्‍या PM2.5 या प्रदूषकाच्या वर्गामधील सर्वात मोठे घटक आहे?

(A) कार्बन डाय ऑक्साइड

(B) नायट्रोजन✅✅✅

(C) मिथेन

(D) सल्फर डाय ऑक्साईड


📚🌹📚🌹📚🌹📚🌹📚🌹


10) स्पेनमधील सेव्हिले विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शहरी सांडपाण्यामधून बहुतेक प्रदूषके शोषून घेणारा पदार्थ शोधून काढला. त्या पदार्थाचे नाव काय आहे?

(A) Na-माईका-4

(B) CL-माईका-4

(C) N4-माईका-4

(D) C18-माईका-4✅✅✅

चालू घडामोडीचे प्रश्न व उत्तरे

 ● कोरोना काळात भारत सरकारच्या वंदे भारत मिशन अंतर्गत काय करण्यात आले ?

उत्तर : परदेशात  अडकलेल्या भारतीयांची सुटका.  


● उत्तराखंडमध्ये कोणत्या संस्थेने वॉटर स्पोर्ट्स अँड ऍडव्हेंचर इन्स्टिटयूट ची स्थापना केली.   

 उत्तर :  भारत-तिबेट सीमा पोलीस 


● कोणत्या कार्यक्रमात मोदींनी इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्ह हा प्रस्ताव मांडला ? 

उत्तर : पूर्व आशिया शिखर परिषद 


● 'अन्नपूर्णा पर्वतशिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?   

उत्तर : प्रियानक मोहिते.  


● कोणत्या कंपनीच्या कोळसा गॅसिफिकेशन युरिया साठी केंद्र सरकारने अनुदान मंजूर केले आहे. 

उत्तर : तलचर फर्टिलायझर्स लिमिटेड 


● रासायनिक शस्त्रास्त्र प्रतिबंध मंडळाचे बाह्य लेखा परीक्षक कोण ? 

उत्तर : जी. सी. मुर्मू 


● संयुक्त राष्ट्र संघाच्या कोणत्या परिषदेच्या मंडळांवर भारताची निवड करण्यात आली आहे. 

उत्तर : आर्थिक व सामाजिक 


● चिराग प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे. 

उत्तर : छत्तीसगड


 कोणत्या प्रक्षेपण स्थळावरून ‘क्रू-२’ मोहीम अंतराळात सोडण्यात आली?

उत्तर :-  केनेडी एलसी-३९ए


कोणत्या योजनेच्या अंतर्गत मालमत्ता कार्ड वितरणास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरंभ केला?

उत्तर :- सुधारित तंत्रज्ञानासह ग्रामीण भागातील खेड्यांचे सर्वेक्षण आणि मानचित्रण (SVAMITVA)


 केआरआय नानगाला (४०२) नामक लढाऊ पाणबुडी _ या देशाची आहे.

उत्तर :-  इंडोनेशिया नौदल


कोणत्या मंत्रालयाने सरकारमध्ये फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर (FOSS) याला स्वीकारण्याच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी ‘#FOSS4GOV इनोव्हेशन चॅलेंज’ जाहीर केले?

उत्तर :- इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय


 ‘आंतरराष्ट्रीय माहिती व दळणवळण तंत्रज्ञानातील मुली दिन २०२१’ याची संकल्पना काय आहे?

उत्तर :- कनेक्टिंग गर्ल्स, क्रिएटिंग ब्राइटर फ्युचर्स


कोण अमेरिकेच्या न्याय विभागाचे सहाय्यक महान्यायवादी (अटर्नी जनरल) या पदावर नियुक्ती झालेली पहिली भारतीय वंशाची व्यक्ती ठरली?

उत्तर :- वनिता गुप्ता


 कोणत्या राज्यात नीती खोरे आहे?

उत्तर :-  उत्तराखंड


कोणत्या दिवशी जगभरात ‘शांतीसाठी बहुपक्षीयवाद व मुत्सद्दीगिरी याचा आंतरराष्ट्रीय दिन’ साजरा करण्यात येतो?

उत्तर :- २४ एप्रिल


 कोणत्या दिवशी ‘जागतिक आवाज दिन’ साजरा करतात?

उत्तर :- १६ एप्रिल


कोणत्या संस्थेने ‘स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट २०२१’ हा अहवाल प्रकाशित केला?

उत्तर :- संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या निधी


 ‘वरुण’ ही _ या देशांच्या नौदलांदरम्यान होणारी संयुक्त युद्ध कवायत आहे.

उत्तर :- भारत आणि फ्रान्स


कोणत्या व्यक्तीने भारताचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली?

उत्तर :- नुदलापती वेंकटा रामणा


अलीकडेच महावीर जयंती साजरी करण्यात आली आहे. महावीर जैन धर्माचे कितवे तीर्थंकार होते?

उत्तर :- २४ वे


चीनच्या मंगळ ग्रहावर पाठविलेल्या पहिल्या रोव्हरचे नाव काय आहे?

उत्तर :-  झुरॉंग


 कोणत्या देशात मारीब शहर आहे?

उत्तर :- येमेन


शास्त्रीय गायक राजन मिश्रा यांचे निधन झाले आहे; त्यांचे _ घरान्याशी संबंध होते.

उत्तर :- बनारस घराना


 कोणत्या ठिकाणी कोवलून द्वीपकल्प आहे?

उत्तर :- हाँगकाँग


कोणत्या मंत्रालयाने ‘ग्रामीण आरोग्य सांख्यिकी अहवाल’ प्रसिद्ध केला?

उत्तर :- आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय


 २०२२ सालापर्यंत ई-इंधन तयार करण्यासाठी पोर्श आणि सीमेन्स एनर्जी या कंपन्यांनी मान्य केलेल्या प्रकल्पाचे नाव काय आहे?

उत्तर :- हारू ओनी प्रकल्प


कोणत्या संस्थेने ‘इंडिया एनर्जी डॅशबोर्ड्स व्हर्जन २.०’ नामक एका डिजिटल मंचाचे उद्घाटन केले?

उत्तर :- नीती आयोग



 कोणत्या देशाने ‘डिफेन्डर-युरोप २१’ नामक संयुक्त सैन्य कवायतीचे आयोजन केले?

उत्तर :- अमेरिका


लंडनच्या ‘ब्रँड फायनान्स इन्शुरन्स १०० २०२१ ’ अहवालानुसार, ___ जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात बळकट विमा ब्रांड आणि जगातील दहाव्या क्रमांकाचा सर्वात मौल्यवान विमा ब्रँड म्हणून अस्तित्त्वात आले.

उत्तर :-  जीवन विमा महामंडळ


 कोणत्या संस्थेने ‘ग्लोबल फॉरेस्ट गोल्स रिपोर्ट २०२१’ प्रकाशित केला?

उत्तर :- संयुक्त राष्ट्रसंघ


भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ‘सेंट्रल बँक्स अँड सूपरवायजर्स नेटवर्क फॉर ग्रीनिंग फायनॅनशीयल सिस्टम’ (NGFS) या आंतरराष्ट्रीय जाळ्याचा एक भाग बनली; NGFS याचे मुख्यालय कुठे आहे?

उत्तर :- पॅरिस


 कोणत्या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा करतात?

उत्तर :- ०१ मे


‘कॅरेन बंडखोर गट’ हा _ देशातील सर्वात जुना बंडखोर गट आहे.

उत्तर :- म्यानमार


 कोणत्या संस्थेने “MACS १४०७” नामक एक नवीन सोयाबीन वाण विकसित केले?

उत्तर :- आघरकर रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे आणि भारतीय कृषी संशोधन परिषद


कोणत्या व्यक्तीची अॅक्सिस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर तीन वर्षांसाठी नियुक्ती झाली?

उत्तर :- अमिताभ चौधरी


कोणत्या संस्थेने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी श्वास / SHWAS आणि आरोग / AROG या दोन योजना लागू केल्या आहेत?

उत्तर :- SIDBI


कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ साजरा करतात?

उत्तर :- ०१ मे

भारतीय घटनेतील प्रमुख कलमे

भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.


कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती


कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे


कलम १४. - कायद्यापुढे समानता


कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा


कलम १८. - पदव्या संबंधी


कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार


कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी


कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार.


कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना


कलम ४४. - समान नागरी कायदा


कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण


कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन


कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग


कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे


कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती


कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक


कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता


कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही


कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ


कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग


कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती


कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता


कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग


कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक


कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार


कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ


कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार


कलम ७६. - भारताचा महान्यायवादी


कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल


कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य


कलम ७९ - संसद


कलम ८० - राज्यसभा


कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील


कलम ८१. - लोकसभा


कलम ८५. - संसदेचे अधिवेशन


कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते


कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो


कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही


कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो


कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या


कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक


कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार


कलम १२४. - सर्वोच न्यायालय


कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.


कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात


कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक


कलम १५३. - राज्यपालाची निवड


कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ


कलम १५७. - राज्यपालाची पात्रता


कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)


कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती


कलम १७०. - विधानसभा


कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग


कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक


कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार


कलम २१४. - उच्च न्यायालय


कलम २३३. - जिल्हा न्यायालय


कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये


कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार


कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी


कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार


कलम २८०. - वित्तआयोग


कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा


कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग


कलम ३२४. - निवडणूक आयोग


कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा


कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा


कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती


कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी


कलम ३५६. - राज्य आणीबाणी


कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी


कलम ३६८. - घटनादुरुस्ती


कलम ३७०. - जम्मू-काश्मीर ला खास सवलती


कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे


कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता


ग्रामपंचायत माहिती


– “खेड्याकडे चला” असा संदेश महात्मा गांधी यांनी दिला. खेडे हि सक्षम व स्वयंपूर्ण झाली पाहिजे यासाठी ‘ग्रामस्वराज्य’ संकल्पना महात्मा गांधी यांनी मांडली.


– त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वात शेवटचा स्टार म्हणजे ग्रामपंचचायत  हा होय.


– भारतातीतील राज्यघटनेच्या कलम ४० मध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख आढळतो


– महाराष्ट्रात ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ५ नुसार गावस्तरावर ग्रामपंचायतीची स्थापना केली जाते.


– एखाद्या ठिकाणी ग्रामपंचायत निर्माण करण्याच्या किंवा रद्द करण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो.


– पंचायत राज हा विषय राज्यसूची मध्ये येतो.


– देशातील पहिली ग्रामपंचायात२ ऑक्टोबर १९५९ ला राजस्थानातील नागोरी येथे स्थापन करण्यात आली.


– ग्रामपंचायत हि ग्रामसभेची कार्यकारी समिती आहे.


– संपूर्ण देशात सर्वात सक्षम ग्रामपंचायती राजस्थान राज्यात आहे.


– महाराष्ट्रामध्ये २८,००० पेक्षा अधिक ग्रामपंचायती अस्तित्वात आहेत.


– महाराष्ट्रातील सर्वात जुनी ग्रामपंचायत सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर.


– महाराष्ट्रातील सर्वात मोठी व सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत सोलापूर जिल्हातील ‘अकलूज’ हि आहे.


– महाराष्ट्रातील विविध विकासयोजना राबविणारी पहिली ग्रामपंचायत अहमदनगर जिल्ह्यातील ‘हिवरे बाजार हि होय.


– महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ग्रामपंचायती सातारा जिल्ह्या मध्ये आहे. ( १४०० पेक्षा अधिक )


– भारतामध्ये सर्वात जास्त ग्रामपंचायती उत्तरप्रदेशा मध्ये आहे.


– ७३ व्य घटनादुरुस्तीनुसार पंचायतराज ला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला.


– ७३ व्या घटना दुरुस्तीमध्ये अव्यये पहिल्या ग्रामपंचायत निवडणुका एप्रिल १९९५ ला पार पडल्या.

महाराष्ट्रातील महानगरपालिका


🔶 कोकण प्रशासकीय विभाग🔶 

1. बृहन्मुंबई महानगरपालिका

2. ठाणे महानगरपालिका

3. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका

4. मीरा-भाईंदर महानगरपालिका

5. भिवंडी-निजामपूर महानगर पालिका

6. नवी मुंबई महानगर पालिका

7. उल्हास नगर महानगरपालिका

8.  पनवेल महानगरपालिका

9.वसई-विरार महानगरपालिका


🔶 पणे प्रशासकीय विभाग 🔶

1. पुणे महानगरपालिका

2. पिंपरी -चिंचवड महानगरपालिका

3. सोलापूर महानगरपालिका

4. कोल्हापूर महानगरपालिका 

5. सांगली-मिरज-कुपवाडा महानगरपालिका


🔶 नाशिक प्रशासकीय विभाग 🔶

1. नाशिक महानगरपालिका

2. मालेगाव महानगरपालिका

3. अहमदनगर महानगरपालिका

4. धुळे महानगरपालिका

5. जळगाव महानगरपालिका


🔶 औरंगाबाद प्रशासकीय विभाग 🔶

1. औरंगाबाद महानगरपालिका

2. परभणी महानगरपालिका

3. लातूर महानगरपालिका

4. नांदेड - वाघाळा महानगरपालिका


🔶अमरावती प्रशासकीय विभाग 🔶

1. अमरावती

2. अकोला


 🔶 नागपूर प्रशासकीय विभागात 🔶

1. नागपूर

2. चंद्रपूर

चालू घडामोडी व सामान्य ज्ञान प्रश्न & उत्तर


 2017 मध्ये विम्बल्डन महिला एकेरी विजेते कोण आहे?

(अ) सेरेना विल्यम्स

(ब) एलेना वेस्निना

(क) व्हिनस विल्यम्स

(ड) गरबाइन मुगुरुझा✔️✔️


 समुद्राचा रंग निळा का दिसत असतो?

(अ) प्रकाशाच्या विखुरल्यामुळे✔️✔️

(ब) प्रकाशाच्या अपवर्तनामुळे.

(क) प्रकाशाच्या परावर्तनामुळे.

(ड) वरील सर्व कारणांमुळे


22. Why does the color of the ocean appear blue?

(a) Due to scattering of light.✔️✔️

(b) due to refraction of light.

(c) due to reflection of light.

(d) Because of all of the above.


 ध्वनी तरंग ____च्या माध्यमातून प्रवास करू शकत नाहीत?

(अ) घन 

(ब) द्रव 

(क) वायू 

(ड) निर्वात ✔️✔️


 वनस्पति तेलापासून वनस्पती तूप तयार करण्यासाठी कोणता गॅस वापरला जातो?

(अ) हायड्रोजन✔️✔️

(ब) नायट्रोजन

(क) इथिलीन

(ड) कार्बन डाय ऑक्साईड


अनुवांशिकतेचे जनक शास्त्रज्ञ कोणाला म्हणतात?

(अ) राबर्ट हुक

(ब) चार्ल्स डार्विन

(क) ह्यूगो डि व्रीस

(ड) ग्रेगर मेंडल✔️✔️


भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते?

(अ) मणिपूर

(ब) सिक्किम✔️✔️

(क) ओरिसा

(ड) अरुणाचल प्रदेश


कोणत्या राज्य सरकारने साखर फटाक्यांच्या आयात किंवा विक्रीला दंडनीय गुन्हा घोषित केला आहे?

(अ) हरियाणा✔️✔️

(ब) पंजाब

(क) आसाम

(ड) महाराष्ट्र



ओडिशा सरकारने कोणत्या फर्राटा धावपटूची(Ferrata runner) पदोन्नती जाहीर केली?

(अ) दुती चंद✔️✔️

(ब) राजपाल सिंग

(क) मिहिर शर्मा

(ड) देवांश खंडेलवाल


पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या नव्या संचालकपदाची जबाबदारी कोणी घेतली?

(अ) अभय चौधरी✔️✔️

(ब) राजपाल सिंग

(क) मिहिर शर्मा

(ड) देवांश खंडेलवाल


भारतीय क्रिकेट संघाचा नवीन पोशाख प्रायोजक कोण बनला आहे?

(अ) RELIANCE

(ब) LIKY

(क) PUB

(ड) MPL ✔️✔️ 


महाराष्ट्र राज्य सरकारने लॉकडाउन कालावधी किती काळ वाढविला आहे?

(अ) 30 नोव्हेंबर✔️✔️

(ब) 15 नोव्हेंबर

(क) 20 नोव्हेंबर

(ड) 25 नोव्हेंबर


पंजाबनंतर आता कोणत्या राज्य सरकारने कृषी विधेयकाविरूद्ध दुरुस्ती विधेयक मंजूर केले?

(अ) पंजाब

(ब) राजस्थान✔️✔️

(क) आसाम

(ड) महाराष्ट्र


सेशेल्स (Seychelles) देशाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाला निवडले गेले आहे?

(अ) डोनाल्ड सिंह

(ब) वेवल रामकाळवान✔️✔️

(क) ब्रशले रॉय

(ड) शोएब खान


नुकत्याच फ्रान्समध्ये झालेल्या अलेक्सिस वेस्टिन आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत कोणत्या भारतीय बॉक्सरने सुवर्ण पदक जिंकले आहे?

(अ) राजपाल सिंग

(ब) अमित पंघाल आणि संजीत✔️✔️

(क) मिहिर शर्मा

(ड) देवांश खंडेलवाल


देशाच्या राजधानीत खुल्या सिगारेट आणि बिडींच्या विक्रीवर सरकारने पूर्ण बंदी कधीपासून जाहीर केली आहे?

(अ) 07 डिसेंबर

(ब) 05 डिसेंबर

(क) 08 डिसेंबर

(ड) 01 डिसेंबर✔️✔️


अदानी समूहाला पुढील 50 वर्षांसाठी कोणते विमानतळ दिले गेले आहे?

(अ) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ लखनऊ

(ब) चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ लखनऊ✔️✔️

(क) इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ लखनऊ

(ड) महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ लखनऊ


हे लक्षात ठेवा :- शाश्वत विकास १७ ध्येये



१. सर्व प्रकारच्या गरिबीचे निर्मूलन करणे.


 २. भूक संपवणे, अन्न सुरक्षा व सुधारित पोषणआहार उपलब्ध करून देणे आणि शाश्वत शेतीला प्राधान्य देणे.


३. आरोग्यपूर्ण आयुष्य सुनिश्चित करणे व सर्व वयोगटातील नागरिकांचे कल्याण साधणे.


४. सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करणे.


५. लिंगभावाधिष्ठित समानता व महिला आणि मुलींचे सक्षमीकरण साधणे.


६. पाण्याची व स्वच्छतेच्या संसाधनाची उपलब्धता सुनिश्चित करणे.


७. सर्वाना अल्पखर्चीक विश्वासार्ह, शाश्वत आणि आधुनिक ऊर्जा साधने उपलब्ध करून देणे.


८. शाश्वत, सर्वसमावेशक आर्थिक वाढ आणि उत्पादक रोजगार उपलब्ध करणे.


९.पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करणे, सर्वसमावेशक आणि शाश्वत औद्योगिकीकरण करणे आणि कल्पकतेला वाव देणे.


१०. विविध देशांमधील असमानता दूर करणे.


११. शहरे आणि मानवी वस्त्या, अधिक समावेशक, सुरक्षित, संवेदनशील आणि शाश्वत करणे.


१२. उत्पादन आणि उपभोगाच्या पद्धती शाश्वत रूपात आणणे.


१३. हवामान बदल आणि त्याच्या दुष्परिणामांना रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे.


१४. महासागर व समूहांचे संवर्धन करणे तसेच त्यांच्याशी संबंधित संसाधनांचा शाश्वतपणे वापर करणे.


१५.परिस्थितिकीय व्यवस्थांचा (Ecosystem) शाश्वत पद्धतीने वापर करणे. वनाचे शाश्वत व्यवस्थापन, वाळवंटीकरणाशी मुकाबला करणे, जमिनीचा कस कमी होण्याची प्रक्रिया आणि जैवविविधतेची हानी रोखणे.


१६. शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाजव्यवस्थांना प्रोत्साहन देणे. त्यांची शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल निश्चित करणे, सर्वाची न्यायापर्यंत पोहोच स्थापित करण्यासाठी विविध पातळ्यांवर परिणामकारक, उत्तरदायी आणि सर्वसमावेशक संस्था उभ्या करणे.


१७. चिरस्थायी विकासासाठी वैश्विक भागीदारी निर्माण व्हावी यासाठी अंमलबजावणीची साधने विकसित करणे.

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.



💐 गौतम बुद्धांना कोणत्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली ?

🎈गया.( बोधगया ) 


💐गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती कोणत्या पौर्णिमेला झाली ?

🎈वशाख पौर्णिमा.


💐 गौतम बुद्धांचे पहिले प्रवचन कोठे झाले ?

🎈सारनाथ.


💐 गौतम बुद्धांनी प्रथम किती लोकांना दीक्षा दिली ?

🎈पाच.


💐 बौद्ध धम्मातील त्रिरत्ने कोणती ?

🎈बद्ध,धम्म,संघ.


💐 तरिपिटक या बौद्ध धम्मग्रंथाचे किती भाग पाडण्यात आले आहे ?

🎈तीन.


💐जगामध्ये दु:ख आहे हे कोणी सांगितले ?

🎈गौतम बुद्ध.


💐 गौतम बुद्धांचे पत्नीचे नाव काय होते ?

🎈यशोधरा.


💐 गौतम बुद्धांचे मुलाचे नाव काय होते ?

🎈राहूल.


💐 'लाईट ऑफ एशिया' म्हणून कोणाला ओळखले जाते ?

🎈तथागत गौतम बुद्ध.

ऑलिम्पिकसाठी जपानमधील १० हजार प्रेक्षकांना परवानगी



📚टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेसाठी जपानमधील १० हजार प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहता येईल, असे स्थानिक संयोजन समिती आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) सोमवारी स्पष्ट केले.


📚सर्व ऑलिम्पिक स्टेडियममध्ये प्रेक्षकक्षमतेच्या ५० टक्के आणि जास्तीत जास्त १० हजार प्रेक्षकांना हजर राहता येईल, असे संयोजकांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक संयोजन समिती, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती, आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती, जपान सरकार आणि टोक्यो महानगर सरकार यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.


📚ऑलिम्पिकपासून प्रेक्षकांना दूर ठेवावे, अशी सूचना जपानमधील प्रख्यात वैद्यकीय सल्लागार डॉ. शिगेरू ओमी यांनी केली होती. करोना साथीच्या काळात ऑलिम्पिकच्या आयोजनावरही त्यांनी टीका केली होती. २३ जुलैपासून टोक्योमध्ये ऑलिम्पिकला प्रारंभ होणार आहे. या स्पध्रेसाठी परदेशी प्रेक्षकांना मज्जाव करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वीच घेण्यात आला आहे.


📚३६ ते ३७ लाख तिकिटे जपानमधील नागरिकांसाठी उपलब्ध आहेत, असे संयोजन समितीने स्पष्ट केले आहे. प्रेक्षकांना परवानगी देण्याच्या निर्णयास पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनीही अनुकूलता दर्शवली आहे. ‘‘आणीबाणी असली तरी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये हजर राहण्यासाठी काही नियम शिथिल केले जातील. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य असेल,’’ असे सुगा यांनी म्हटले आहे.

न्यायमूर्ती संजय यादव: अलाहाबाद उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायधीश.



🔰राष्ट्रपती राम नाथ कोविन्द यांनी उत्तरप्रदेश राज्यासाठीच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश या पदावर न्यायमूर्ती संजय यादव यांची नियुक्ती केली.


🔰भारतीय संविधानाचे कलम 217(1) भारताच्या राष्ट्रपतीला उच्च न्यायालयाचे न्यायधीश नियुक्त करण्याचा अधिकार प्रदान करते.


🔴भारतीय उच्च न्यायालय...


🔰भारताच्या राज्यघटनेत नमूद कलम क्र. 214 अन्वये प्रत्येक घटकराज्याला एक उच्च न्यायालय असेल किंवा एक किंवा दोन राज्यांसाठी मिळून एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे.


🔰सध्या देशात 25 उच्च न्यायालये (नव्या आंध्रप्रदेश उच्च न्यायालयामुळे) कार्यरत आहेत. याशिवाय प्रत्येक राज्यामध्ये विभागीय पातळीवर खंडपीठे निर्माण करण्यात आली आहेत. उच्च न्यायालयात एक मुख्य न्याय‍धीश आणि राष्ट्रपतीच्या आदेशानुसार ठरविण्यात आलेल्या संख्येनुसार इतर न्याय‍धीश असतात. उच्च न्यायालयातल्या सर्वोच्च न्यायधिशांची नेमणूक करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे.


🔰कवळ दिल्ली या केंद्रशासित प्रदेशासाठी स्वतंत्र उच्च न्यायालय आहे.


🔰महाराष्ट्राचे उच्च न्यायालय मुंबई येथे असून त्याची महाराष्ट्रात पणजी (गोवा), नागपूर, औरंगाबाद अश्या तीन ठिकाणी तीन खंडपीठे आहेत

येडियुरप्पाच कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कायम’ .



🔰कर्नाटकमधील नेतृत्वबदलाच्या चर्चेला भाजपचे राष्ट्रीय सरचिटhणीस (कर्नाटकचे प्रभारी) अरुण सिंह यांनी गुरुवारी पूर्णविराम दिला. बी. एस. येडियुरप्पा हे मुख्यमंत्री आहेत, ते उत्तम काम करीत आहेत आणि तेच मुख्यमंत्रिपदी कायम राहणार असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले.


🔰करोनाच्या काळात केवळ येडियुरप्पाच नव्हे तर राज्यातील मंत्री, पक्ष आणि प्रत्येकानेच उत्तम कामगिरी केली आहे. उच्चस्तरीय बैठकीत येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असे सिंह यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.


🔰मख्यमंत्र्यांसह भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कतील यांची उचलबांगडी करण्याबाबत सुरू असलेली चर्चा अफवा आहे. येडियुरप्पांना हटविण्यासाठी कर्नाटकमधील सत्तारूढ भाजपमधील एक गट सक्रिय आहे, अशी जोरदार चर्चा सुरू होती.

INS चक्र’ पाणबुडी रशियाला परतली.



⏺भारतीय नौदलाची अण्वस्त्र हल्ले करू शकणारी ‘INS चक्र’ ही एकमेव पाणबुडी रशिया देशाकडे परत पाठविण्यात आली आहे.


⏺ही पाणबुडी 2012 साली रशियाकडून भाडेकरारवर घेण्यात आली होती. संपूर्णपणे रशियन बनावटीची असलेली ही पाणबुडी 10 वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्वावर घेण्यात आली होती. अण्वस्त्र क्षमता असलेली रशियाकडून घेण्यात आलेली ही भारताची दुसरी पाणबुडी होती.


☑️‘INS चक्र’ची वैशिष्ट्ये ...


⏺‘INS चक्र’ ही रशियाच्या बनावटीची अकुला श्रेणीची पाणबुडी आहे.

ही पाणबुडी पाण्याच्या पृष्ठभागावर न येता जवळपास 100 दिवस पाण्याखाली राहू शकते.


⏺या पाणबुडीत 1 हजार हॉर्सपॉवर एवढी ताकद असलेले इंजिन आहे, त्यामुळे ती ताशी 30 नॉटीकल मैल एवढ्या प्रचंड वेगाने धावू शकते.‘INS चक्र’ चालवण्यासाठी साधारणतः 30 अधिकारी आणि त्यांच्या सोबत 70 हून अधिक सहाय्यकांची गरज लागते.


☑️भारतीय नौदलाविषयी...


⏺भारतीय नौदल ही भारतीय सशस्त्र दलाची सागरी शाखा आहे आणि भारताचे राष्ट्रपती हे या दलाचे कमांडर-इन-चीफ (प्रमुख) आहेत. भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते.


⏺छत्रपती राजा शिवाजी भोसले यांना भारतीय नौदलाचे संस्थापक मानले जाते. ‘शं नो वरुण’ (संस्कृत) हे या दलाचे घोषवाक्य आहे. 1612 साली ईस्ट इंडिया कंपनीने जहाजांच्या रक्षणासाठी ‘मरीन’ शाखा उघडली. त्यानंतर, 1934 साली ब्रिटीशांनी ‘रॉयल इंडियन नेव्ही’ या दलाची स्थापना केली. 1950 साली दलाला वर्तमान नाव प्राप्त झाले.


⏺1971 साली भारत-पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा दिवस म्हणजेच 4 डिसेंबर ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

परधानमंत्री जन धन योजना.



ही भारताची एक आर्थिक क्षेत्राची वित्तीय समावेशन योजना आहे ज्याद्वारे,बॅंक बचत व जमा खाते,प्रदान, जमा करणे विमा व पेन्शन या आर्थिक सेवा एकाच परवडणाऱ्या रितीने हाताळता येतात.याचे विमोचन पंतप्रधान नरेंद्र मोदीद्वारे २८ ऑगस्ट २०१४ ला करण्यात आले.[१] त्यांनी या योजनेची घोषणा आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या प्रथम भाषणात दि. १५/०८/२०१४ ला केली होती.


🔰आर्थिक मंत्रालयाद्वारे चालित या योजनेत उद्घाटनाच्याच दिवशी १.५ करोड खाती उघडण्यात आलीत.[२][३] गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने याची नोंद घेतली. त्यांनी दिलेल्या प्रमाणपत्रात ते म्हणतात:


🔰एकाच आठवड्यात म्हणजे २३ ते २९ ऑगस्ट २०१४ या दरम्यान,भारतीय बॅकांद्वारे सुमारे १,८०,९६,१३० इतकी खाती उघडण्यात आलीत.जून २०१६ पर्यंत हा आकडा २२० लाख ईतका पोचला व याद्वारे रु. ३८४.११ लाख इतके या योजनेत जमा करण्यात आलेत..


🔰जन धन योजना आधारस्तंभ:-


जन धन योजनेअंर्तगत सहा आधारस्तंभ निवडण्यात आले असून या सहा विषयांमध्ये व्यापक वित्तीय समावेशन करायचे आहे सहा विषय दोन टप्प्यामध्ये विभागले आहेत


🔰पहिला टप्पा -( १४ ऑगस्ट २०१५ पर्यंत )


१) बँकिंग सुविधापर्यॅंत वैश्विक पोहोच  


२) ६ महिन्यापर्यंत ५,०००रुपयापर्यंतची अधिकर्ष सुविधा देणारे, १ लाख रुपयांच्या अपघाती विम्याची सुविधा असणारे रूपे कार्ड देणारे ,


   रूपे किसान कार्ड देणारे ' बॅंकखाते '


३) ' वित्तीय साक्षरता कार्यक्रम '


🔰दसरा टप्पा ( १५ऑगस्ट २०१५ ते १५ ऑगस्ट २०१८)


४) ओव्हरड्राफ्ट खात्यामधील बुडालेल्या कर्जासाठी 'पतहमी निधी ची उभारणी


५) सूक्ष्म विमा


६) असंघटीत क्षेत्रासाठी स्वालंबनसारख्या 'पेन्शन योजना '


Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...