Friday 2 December 2022

Basic Concepts of Economics :

✔️ दारिद्र्य 

जीवनाच्या मुलभूत किमान गरजा भागविता येण्याची अक्षमता म्हणजे दारिद्र्य होय.

दारिद्र्य एक सापेक्ष संकल्पना आहे.



✔️ कामगार 

उच्च किंवा निम्न अशा कोणत्याही स्तरावरील आर्थिक क्रियांमध्ये गुंतलेल्या व त्याद्वारे राष्ट्रीय उत्पन्नात भर घालणा-या सर्व व्यक्तींना कामगार म्हटले जाते.




✔️ बेरोजगारी

 रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता येईल.  रोजगार मिळविण्यासाठी उत्सुक असलेली व्यक्ती त्यासाठी शारिरीक व मानसिकदृष्ट्या समर्थ असावी.



📚 बेरोजगारीचे प्रकार


१) खुली बेरोजगारी :- 

काम करण्याची इच्छा व क्षमता असूनही नियमित उत्पन्न देणारा रोजगार प्राप्त होत नसेल तर त्याला खुली बेरोजगारी असे म्हणतात.


२) हंगामी बेरोजगारी :-

शेतीच्या नांगरणीपासून कापणीपर्यंतचा कालावधी सोडून वर्षाच्या इतर काळात भासणारी बेरोजगारी.


३) अदृश्य / प्रच्छन्न बेरोजगारी :-

आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करुन एखादे काम जेवढे व्यक्ती करू शकतात त्यापेक्षा जास्त व्यक्ती त्या कामात गुंतलेले असल्यास..


४) कमी प्रतीची बेरोजगारी :-

ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला आपल्या क्षमतेपेक्षा / शिक्षणाच्या दर्जेपेक्षा कमी प्रतीच्या रोजगारावर समाधान मानावे लागते.


५) सुशिक्षीत बेरोजगारी :- 

जेव्हा सुशिक्षीत लोक कमी प्रतीच्या किंवा खुल्या बेरोजगारीला बळी पडतात.


६)चक्रीय बेरोजगारी :-

विकसीत भांडवलशाही देशांमधील व्यापारी चक्राच्या मंदीच्या परिस्थितीत ही बेरोजगारी दिसून येते.


७) घर्षणात्मक बेरोजगारी :-

 विकसीत देशांना जेव्हा नवीन उद्योग जुन्या उद्योगांना आपल्या व्यवसायातून बाहेर पडण्यास भाग पाडतात व कामगार अधिक चांगल्या रोजगाराच्या प्रतिक्षेत असतात तेव्हा ही बेरोजगारी निर्माण होते.

• असा तात्पुरता कालावधी जेव्हा कामगार ऐच्छिकरित्या बेरोजगार असतो तेव्हा त्या परिस्थितीला घर्षणात्मक बेरोजगारी असे म्हणतात. (येथे घर्षण जुन्या व नव्या उद्योगामध्ये निर्माण झालेले असतात.)


Mpsc pre exam samples question


1) सिंधू संस्कृतीतील लोकांनी _______ पाळलेला होता किंवा नाही या बद्दल शंका आहेत.

 A. कुत्रा

 B. घोडा✍️

 C. हत्ती

 D. ऊंट.

____________________________

2) कोणाचे सुप्रसिद्ध आत्मचरित्र पुढील विधानाने सुरू होते ?

विशेषतः भारतात, सुखवस्तू कुटुम्बाचे एकुलते एक चिरंजीव बिघडण्याची शक्यता अधिक असते.”

 A. जवाहरलाल नेहरू✍️

 B. मोहनदास करमचंद गांधी

 C. नसीरूद्दीन शहा

 D. जे.आर.डी. टाटा.

____________________________

3) विद्युतचुंबकीय लहरींची पुढीलपैकी कोणती उदाहरणे आहेत ?
अ. दूरदर्शन लहरी

ब. अतिनील किरणे

क. क्ष-किरणे

ड. सूर्यप्रकाश किरणे

 A. अ, ब आणि क

 B. अ, क आणि ड

 C. अ, ब आणि ड

 D. अ, ब, क आणि ड. ✍️


____________________________

4) अभ्रक कपड्यांच्या इस्त्रीत वापरळा जातो. यासंदर्भात पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

अ. अभ्रक विजेचा सुवाहक आहे.

ब. अभ्रक उष्णतेचा सुवाहक आहे.

 A. फक्त अ

 B. फक्त ब✍️

 C. दोन्ही अ आणि ब

 D. दोन्ही नाहीत.

____________________________

5) पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

अ. अणु अंक म्हणजे अणु केंद्रकातील एकूण प्रोटॉन्सची संख्या.

ब. अणु वस्तुमान म्हणजे अणु केंद्रकातील एकूण प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्सची संख्या

 A. फक्त अ

 B. फक्त ब

 C. दोन्ही अ आणि ब

 D. दोन्ही नाहीत.✍️

____________________________

6) एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते ?

 A. 1 लीटर✍️

 B. 0.75 लीटर

 C. 0.50 लीटर

 D. 0.25 लीटर.

____________________________

7) 'बंडल ऑफ हिज़' (His) जे जाळे

 A. संपुर्ण हृदयात पसरलेल्या मज्जातंतू चे असते

 B. संपुर्ण हृदयात पसरलेल्या स्नायूतंतू चे असते

 C. फक्त हृदयातील जवनिका (वेंट्रिकल) मध्ये पसरलेल्या स्नायूतंतूचे असते✍️

 D. हृदयातील जवनिका मध्ये पसरलेल्या मज्जातंतू चे असते.

____________________________

8) जस अशी रासायनिक अभिक्रिया होत रहाते वेळेनुसार तिचा वेग ________ .

 A. मंदावतो✍️

 B. वाढतो

 C. बदलत नाही

 D. खूप वेगाने वाढतो.

____________________________

9) नैसर्गिक रबर हा एक _________ चा पॉलिमर आहे.

 A. प्रोपीन

 B. आइसोप्रीन✍️

 C. फॉर्माल्डिहाइड

 D. फिनॉल.

____________________________

10) खालीलपैकी कोणता पिष्ठमय पदार्थ डायसँकैराइड आहे ?

 A. ग्लुकोज

 B. फ्रक्टोज

 C. सुक्रोज✍️

 D. सेल्युलोज.



◾️कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत भारताची राजधानी कोलकाता येथून दिल्ली येते नेण्यात आली ?

A. लॉर्ड डलहौसी
B. लॉर्ड रिपन
C. लॉर्ड कर्झन
D. लॉर्ड हार्डिंग II ☑️


◾️रपया नावाचे नाणे भारतात प्रथम जारी करणारे कोण होते?

A. अकबर
B. अलेक्झांडर लोदी
C. शेरशाह सुरी ☑️
D. बल्बन

◾️मट्टूर धरण - कोणत्या नदीवर बांधले आहे?

A. कृष्णा
B.कावेरी☑️
C. नर्मदा
D. तुंगभद्रा


◾️राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना कधी केली?

A. 1815
B. 1812
C. 1828 ☑️
D. 1830


 ◾️नॉर्वे ची राजधानी कोठे आहे?

A. ओस्लो ☑️
B. पेरिस
C. वॉर्न
D. लिस्बन

Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग

Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा

Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य

Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)

Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी

Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी

Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ

 Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र

Q-9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे

Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड

अर्थव्यवस्था प्रश्न सराव

1) भारतात आर्थिक नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने रुजावे यासाठी सर्वप्रथम प्रयत्नात येतात.

   अ) श्री. एम. एन. रॉय यांचे पुस्तक “प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया”

   ब) श्री. विश्वेश्वरय्या यांचे “टेन यिअर पिपल्स प्लॅन”

        वरील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?


   1) केवळ अ   

   2) केवळ ब 

   3) दोन्ही     

   4) एकही नाही


उत्तर :- 4


2) राज्यांचा एकत्रित निधी वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणती उपाययोजना बाराव्या वित्त आयोगाने (2005-10) सुचविली आहे ?

   1) ग्रामपंचायत आणि नगरपालिकांचा वित्तीय साधनांना पूरक निधी

   2) विकेंद्रीकरणाच्या प्रक्रियेस प्रोत्साहन देणे

   3) रस्ते आणि पूल बांधणे

   4) आर्थिक विकासास चालना देणे


उत्तर :- 2


3) भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेनुसार (2002-2007) शेती क्षेत्रामधून अजूनही ............. टक्के रोजगार निर्मिती होत आहे.

   1) 50.3   

   2) 40.4    

   3) 45.0     

  4) 58.4


उत्तर :- 1


4) दारिद्रय निर्मुलन (गरीबी हटाओ) आणि आत्मनिर्भरता ही .............. पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्टे होती.

1) तिस-या    

2) पाचव्या   

3) दुस-या    

4) सहाव्या


उत्तर :- 2


5) उत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड या राज्यांची निर्मिती ............. या पंचवार्षिक योजनेत झाली.

   1) नवव्या    

  2) सातव्या  

  3) आठव्या   

  4) वरीलपैकी नाही


उत्तर :- 1



6) योग्य जोडया जुळवा.

   अ) 1 ली योजना      i) उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण प्रतिमान    

   ब) 2 री योजना      ii) हॅरॉड, डोमर प्रतिमान

   क) 8 वी योजना      iii) महालनोबिस प्रतिमान

   ड) 11 वी योजना    iv) पुरा प्रतिमान

  अ  ब  क  ड

         1) i  ii  iii  iv

         2) ii  iii  iv  i

         3) ii  iii  i  iv

         4) iv  i  ii  iii


उत्तर :- 3


7) खालीलपैकी कोणते घटक भारतामधील  आर्थिक नियोजनाचे अपयश आहेत ?

   अ) अल्प दरडोई उत्पन्न आणि वृद्धी दर

   ब) दारिद्रय आणि बेकारी

   क)‍ संथ औद्योगिकरण

   ड) उत्पन्न आणि संपत्तीमधील विषमता

   1) ब, ड आणि क 

   2) अ आणि ब   

   3) अ, ब आणि क  

  4) ब आणि ड


उत्तर :- 4


8) भारतीय नियोजन मंडळाने प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी धोरणात्मक उपाय योजना स्वीकारलेल्या आहेत. त्या 

     खालीलप्रमाणे –

   अ) मागास प्रदेशाचा प्रत्यक्ष विकास करण्यासाठी विशेष क्षेत्र विकास कार्यक्रम राबविणे.

   ब) मागास प्रदेशातील उद्योग प्रकल्पांना सवलतीचा वित्तपुरवठा स्टेट बँक ऑफ इंडिया कडून देणे.

   क) मागास प्रदेशात खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे.

         वरीलपैकी कोणते/ती विधान/ ने बरोबर आहे/ आहेत  ?


   1) अ आणि क     

   2) ब आणि क   

   3) फक्त अ    

   4) अ, ब आणि क


उत्तर :- 1


9) भारतातील आठ अग्रगण्य उद्योगपतींनी 1950 च्या दशकात तयार केलेल्या आर्थिक विकासाच्या योजनेस ............ म्हणतात.

   1) बॉम्बे प्लॅन (योजना)   

   2) गांधी योजना   

   3) नेहरू योजना   

   4) पंचवार्षिक योजना


उत्तर :- 1


10) भारतातील कोणत्या राज्याने पहिल्यांदा विकेंद्रीत नियोजन अंगिकारले ?

     1) कर्नाटक  

     2) महाराष्ट्र    

     3) गुजरात  

    4) राजस्थान


उत्तर :- 4

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...