Wednesday 4 November 2020

विधानसभेबद्दल संपूर्ण माहिती


> घटना कलम क्र. 170 मध्ये प्रत्येक घटकराज्यासाठी एक विधानसभा असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. 


> विधानसभा हे कनिष्ठ परंतू अधिकाराच्या बाबतीत श्रेष्ठ सभागृह समजले जाते तर विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असून अधिकाराच्या बाबतीत


✅ विधानसभेची रचना :


> 170 व्या कलमात सांगितल्याप्रमाणे विधानसभेत 60 व जास्तीत जास्त 500 सभासद असतात.


✅ राखीव जागा :


> घटना कलम क्र. 332 मध्ये सांगितल्याप्रमाणे अनुसूचीत जाती जमातीसाठी महाराष्ट्रामध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. 


> अनुसूचीत जातींसाठी 33 तर अनुसूचीत जमातीसाठी 14 राखीव जागा आहेत.


✅ निवडणूक : प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने सदस्यांची निवड केली जाते.


✅ उमेदवारांची पात्रता :


> तो भारताचा नागरिक असावा.


> त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावी.


> संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.


✅ सदस्यांचा कार्यकाल : सदस्यांचा कार्यकाल पाच वर्ष इतका असतो.


✅ गणसंख्या : 1/10


✅ अधिवेशन : दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.


✅ सभापती व उपसभापती :


> विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसर्‍या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.


✅ सभापतीचे कार्य आणि अधिकार :


> विधानसभेत मांडण्यात येणार्‍या प्रस्तावाला संमती देणे.


> विधानसभेत शांतता व सुव्यवस्था राखणे.


> सभागृहात एखाद्या विषयावर समान मते पडल्यास आपले निर्णायक मत देणे.


> जनविधेयक आहे की नाही ते ठरविणे.


✅ जनरल माहिती :


> धनविधेयक प्रथम विधानसभेत मांडतात.


> धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार सभापतीला आहे.


> धनविधेयकाला विधानपरिषदेने 14 दिवसाच्या आत मान्यता द्यावी लागते. काहीच न कळवल्यास तीला ते मान्य आहे असे समजले जाते.


> मुख्यमंत्री हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो.


> घटकराज्यांचे मंत्रीमंडल संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असते.


> मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय.


> मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री भूषवितो.


> स्वातंत्र्य भारताचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते.


दुधवा राष्ट्रीय उद्यान.


🅾️उत्तर प्रदेशातील दुधवा राष्ट्रीय उद्यान वाघ आणि रेनडिअरसाठी जगप्रसिद्ध आहे. दुधवाचा उत्तर किनारा नेपाळसोबतच्या आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असून, त्याच्या दक्षिणेला सुहेली नदी वाहते. दुधवात घनदाट हिरवेगार जंगल, उंच गवत आणि अनेक प्रकारचे वृक्ष आढळून येतात. 


🅾️हरणांच्या अनेक प्रजातींशिवाय वाघ, बिबट्या, रेनडीअर, हत्ती, कोल्हा, तडस आणि एकशिंगी गेंडा आदी प्राणी येथे आहेत. मोरासह पक्ष्यांच्या अनेक प्रजातींचेही हे वस्तिस्थान आहे. दुधवा हे उत्तर प्रदेशातील जैव विविधतेने समृद्ध असे सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान असून ते खिरी जिल्ह्यात आहे. 


🅾️१ फेब्रुवारी १९७७ साली दुधवा जंगलाला राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आले. त्यानंतर १९८७-८८ मध्ये किशनपूर वन्यजीव क्षेत्राला दुधवात सामील करून याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला गेला. 


🅾️दधवात सरासरी १५०० मि.मी. पाऊस होतो. नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान येथे कमाल तापमान २० ते २० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ४ ते ८ अंश सेल्सिअस असते. पहाटे धुके आणि रात्री थंडी पडते. 


🅾️मार्च आणि मेदरम्यान कमाल तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २० ते २५ अंश सेल्सिअससह वातावरण आल्हाददायक असते. जून ते आॅक्टोबर या काळात उन्हाळा असला तरी येथे मुसळधार पाऊस पडतो.


दशातील ४० टक्के कीटकनाशके पर्यावरणाला घातक.


🅾️कषिक्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांपैकी तब्बल ४० टक्के कीटकनाशके ही सुमार दर्जाची आणि जमीन व पर्यावरणाला घटक असल्याचे आढळून आले आहे. अशा कीटकनाशकांमुळे पिकांवरील कीड, आळ्या, बुरशी आणि रोगांवर नियंत्रण ठेवण्यास अपयश येऊन कृषिउत्पादनात १५ ते २० टक्क्यांची घट होते आणि उत्पादनांची गुणवत्ता खालावते; असेही निदर्शनास आले आहे.


🅾️फडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि टाटा स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट ग्रुपच्या वतीने करण्यात आलेल्या शेतीविषयक अभ्यासात ही बाब निदर्शनास आली आहे.


🅾️शतकऱ्यांमधील अज्ञान, नवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्याबाबत कीटकनाशक उत्पादकांमध्ये असलेली उदासीनता यामुळे दर्जाहीन कीटकनाशके वापरली जातात. त्यामुळे कीटक आणि आळ्यांचा प्रतिबंध प्रभावीपणे होत नाही त्याचप्रमाणे नापिकी आणि पर्यावरणाचीही मोठ्या प्रमाणावर हानी होते; असे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.


🅾️ शतकऱ्यांमध्ये असलेला शिक्षणाचा अभाव, भारतातील भाषा वैविध्य यामुळे आघाडीच्या रसायन उद्योगांना आपल्या उत्पादनाची वैशिष्ट्य आणि त्याच्या वापराची पद्धत शेतकऱ्यांना समजावून देताना अडचणी येतात. त्यामुळे शेतकरी दुय्यम दर्जाच्या कीटकनाशकांचा वापर करतात. 


🅾️उत्पादक आणि शेतकरी यांच्यातील सुवा असलेल्या घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांमध्ये तांत्रिक माहितीचा अभाव असल्याने ते देखील शेतकऱ्यांना योग्य कीटकनाशक वापरण्याचा सल्ला देण्यात अपयशी ठरतात; असेही दिसून आले आहे.

तांदूळ वाण 'IR-8' व हरितक्रांती ला 50 वर्षे पूर्ण झाली.


🅾️आतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था (IRRI) ने 29 नोव्हेंबर 1966 रोजी IR-8 च्या नावाने तांदळाची एक जात शोधून काढली होती. या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपारिक बियाणे हे प्रति हेक्टर फक्त दोन टन भाताचे उत्पन्न देते, तर IR-8 हे प्रति हेक्टर सात टन भाताचे उत्पन्न देते. आज या घटनेला 50 वर्षे पूर्ण झालेली आहेत.


🅾️या तांदळाची लागवड प्रथम 1966 साली फिलीपिन्स मध्ये  करण्यात आली होती. IRRI ही मुळची फिलीपिन्स मधील कृषि संशोधन संस्था आहे. फोर्ड फाउंडेशन, रॉकफेलर फाउंडेशन हे संस्थापक आहेत. तर मुख्यालय लॉस बॅनोस, लागुना, फिलीपिन्स मध्ये आहे.


🧩IR-8 ची पार्श्वभूमी....


🅾️भारतासह बहुतेक आशियायी देशांमध्ये दुष्काळ चालु असताना, तांदळाची उच्च उत्पादन क्षमतेची वाण विकसित करण्यासाठी सन 1960 मध्ये संशोधनाला सुरुवात करण्यात आली. पीटर जेनिंग्स, आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचे प्रथम तांदूळ प्रजनक (rice breeder) (1961-67) यांनी यामध्ये नेतृत्वपूर्ण कामगिरी केली. संशोधकांनी चीन, तैवान आणि इंडोनेशिया पासून मिळालेल्या तांदूळ वाणांचे 38 अलग-अलग संकरीत वाण तयार केले.


🅾️अनेक वर्षांच्या संशोधनानंतर, हेन्री एम. बिचेल, जेनिंग्स यांचे सहकारी, यांनी तांदळाच्या डी-जिओ-वू-गेन आणि पेटा या वाणांचे संकरीत स्वरूप म्हणून IR8-288-3 या नव्या वाणाचा विकास केला आणि फिलीपिन्स मध्ये त्याचे परीक्षण केले. आश्चर्यकारक बाब म्हणजे त्यावेळी 88 किलो शुद्ध बियाणांच्या पेरणीपासून 71 टन भाताचे उत्पादन झाले होते. त्यानंतर, 29 नोव्हेंबर 1966 रोजी IRRI ने या नव्या जातीला अधिकृतपणे IR-8 हे नाव दिले आणि जाहीर केले.


🧩हरित क्रांती आणि भारत...


🅾️फिलीपिन्स मध्ये मिळालेल्या परिणामानंतर, भारत हा मोठया प्रमाणात भात खाणारा देश असल्यामुळे, दुष्काळाच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, सन 1967 मध्ये, एन. सुब्बा राव यांनी आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्हा अटचंता मध्ये 2,000 हेक्टर क्षेत्रात IR-8 ची पेरणी केली. हा क्षण म्हणजे भारतामध्ये भात लागवडीमधील क्रांतीचा भाग झाला.


🅾️कमी वाढ कालावधी व उच्च उत्पन्न तसेच नायट्रोजन खताला प्रतिसाद देणारे वाण असल्यामुळे IR-8 हे शेतकर्‍यांमध्ये अधिक लोकप्रिय झाले. कीटक प्रतिरोधक हे आणखी एक कारण होते. शिवाय, आकाराने खूपच लहान असल्याने, IR8 हे वाराधून परिस्थितीत उभे राहू शकत होते. IR-8 हे फक्त 105 दिवसांत कापणीसाठी तयार होते.


🅾️तयानंतर, भारतीय शास्त्रज्ञांनी IR-20, IR-36, आणि IR-50 असे अनेक वाण विकसित केले आहे.


🅾️भारत आणि फिलीपिन्स मधील,  यशानंतर डॉ. जेनिंग्स यांनी युद्धाने ग्रासलेल्या व्हिएतनाम मध्ये याची लागवड करण्यात आली. व्हिएतनाम मध्ये याला कौतुकाने "होंडा राइस" असे म्हणतात, कारण याच्या उच्च उत्पादन क्षमतेमुळे शेतकऱ्यांना पैसे कमावता आले. ज्यामधून त्यांनी होंडा मोटारसायकल घेण्यास सुरू केले होते.


🧩हवामानातील बदलाचा उत्पन्नावर परिणाम


🅾️2010 साली, फील्ड क्रॉप्स रिसर्च जर्नल कडून प्रकाशित अभ्यासामधून हे दिसून आले आहे की, हवामान बदलामुळे, IR-8 च्या उत्पादन क्षमतेत 15 टक्क्यांनी घट झाली आहे. गरम रात्री, वारंवार येणारे पुर आणि प्रदूषण हे यासाठी जबाबदार असल्याचे स्पष्ट केले आहे.


मध्यप्रदेशातील खडककला जगातील प्राचीन.


🅾️मध्यप्रदेशातील मंडसौर जिह्यामधील भानपूर क्षेत्रातील एका टेकडीमधील खडकावर कोरलेली चित्रे जगातील सर्वात जुनी असून तज्ञांच्या मते ती 2 ते 5 लाख वर्षांपूर्वीची असावीत, असा अंदाज आहे. चालू नोव्हेंबरच्या 2 ते 23 पर्यंत झालेल्या यशस्वी मोहिमेने हे नवीन रहस्य जगापुढे आणले आहे. आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे सरसचिव प्रा. गिरिराज कुमार आणि ऑस्ट्रेलियन वैज्ञानिक रॉबर्ट बेडनरिक यांच्या संयुक्त सहकार्यातून सदर मोहीम यशस्वी करण्यात आली. बेनरिक हे खडककलेतील जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक असून ते ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रॉक आर्ट ऑर्गनायझेशन’ चे (आयएफआरएओ) समन्वयक आहेत. आग्य्रातील दयाळबाग एज्युकेशनल इन्स्टिटय़ूटमधील रॉक आर्ट सायन्सचे कुमार प्राध्यापक आहेत. त्यांनीच सदर खडकचित्रकलेचे वय 2 ते 5 लाख वर्षांचे असल्याबद्दलचा अंदाज व्यक्त केला.


🅾️दर की चट्टान गुहेतील खडकावर कलात्मक चित्र असल्याचा शोध 2002 च्या प्रारंभी लागल्याने त्यासंदर्भात संशोधन सुरू झाले. त्याजागी प्रहार केल्याने निर्माण झालेले दगडही 5 लाख वर्षांपूर्वीचे असावेत, असे कुमार यांनी सांगितले. खडक प्रकल्पाचा तपशील सांगताना ते म्हणाले की सदर प्रकल्पाच्या कामाने ही मोहीम रूंपली दर की चट्टान गुहेतील खडकांचे नमुने व तपशील जाणण्याचा यामागील हेतू होता. यासाठी भारतासह ऑस्टेलिया व युरोपमधील वैज्ञानिकांनी भाग घेतला आहे.


भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प.



🅾️ मुचकुंदी प्रकल्प 

मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मिती.


🅾️ शरीशैलम प्रकल्प

आंध्र प्रदेश कृष्ण नदीवर मुख्य उद्देश वीजनिर्मिती.


🅾️ बियास प्रकल्प

पंजाब, हरियाना व राजस्थान यांचा संयुक्त प्रकल्प. यामध्ये बियास सतलज जोड कालवा व बियास नदीवरील पोंग येथील धरणाचा समावेश होतो.


🅾️ भाक्रा-नानगल

पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान व हरियाना यांचा संयुक्त प्रकल्प. सतलज नदीवर हिमाचल प्रदेशात ' भाक्रा व पंजाब मध्ये नानगल अशी दोन धरणे भारताची सर्वात मोठी बहुददेशीय योजना. भाक्रा हे देशातील सर्वात उंच धरण आहे. उंची २२६ मीटर.


🅾️दामोदर खोरे योजना

पश्चिम बंगाल व विभाजनापूर्वी बिहारमधील संयुक्त प्रकल्प. जलसिंचन, वीजनिर्मिती, पूरनियंत्रण, इत्यादी, या प्रकल्पाचे व्यवस्थापन दामोदर खोरे महामंडळ तर्फे केले जाते. अमेरिकेतील प्रसिद्ध टेनेसी व्हाली च्या धर्तीवर रचना.

 

🅾️ फराक्का योजना 

हि योजना पश्चिम बंगालमध्ये राबविली जात असून या योजनाअंतर्गत गंगा नदीवर फराक्का येथे व भागीरथी नदीवर जांगीपूर येथे धरणे बांधली आहेत. हुगळी नदीचा प्रवाह कायम राखणे व कोलकाता बंदराची व्यवस्था राखणे हे या योजनेमागचे उद्देश आहेत.

 

🅾️ हिराकूड 

प्रकल्प ओरिसा राज्यात आहे. संबळपूरजवळ महानदीवर जगातील सर्वाधिक लांबीचे धरण बांधले जाते. धरणाची लांबी २५.४०  कि मी आहे.


🅾️ चबळ योजना

हि मध्य प्रदेश व राजस्थान ची संयुक्त योजना असून या योजनेंतर्गत चंबळ नदीवर रानाप्रतापसागर व जवाहरसागर कोटा दोन धरणे राजस्थान व गांधीसागर हे धरण मध्य प्रदेशात बांधले आहे. मुख्य उद्देश वीजनिर्मिती आहे.


🅾️ उकाई प्रकल्प

तापी नदीवरील गुजरात राज्यातील बहुद्देशीय प्रकल्प होय.

 

🅾️ कोसी प्रकल्प

विभाजनापूर्वी बिहार व नेपाळ सरकारची संयुक्त संस्था. गंडकी नदीवर वाल्मिकी नदीवर धरण.


🅾️नागार्जुनसागर

आंध्रप्रदेशात कृष्णा नदीवर नंदिकोंडा येथे धरण.


भारतीय संघाच्या क्रिकेट साहित्याचा करार तोटय़ाचा.


🔰एमपीएल स्पोर्ट्स अ‍ॅपॅरल आणि अ‍ॅक्सेसरीज हे पुढील तीन वर्षांसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या क्रिकेट साहित्याचे नवे पुरस्कर्ते निश्चित झाले आहेत. परंतु ‘बीसीसीआय’ला प्रति सामन्यांसाठी नायकेच्या ८८ लाख रुपयांच्या तुलनेत एमपीएलकडून फक्त ६५ लाख रुपये मिळणार आहेत. म्हणजे ‘बीसीसीआय’ प्रति सामन्यास २३ लाखांचा तोटा सहन करावा लागणार आहे.


🔰भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कार्यकारिणी सदस्याने सोमवारी एमपीएल कंपनीशी करार झाल्याची माहिती दिली. ‘बीसीसीआय’च्या क्रिकेट साहित्याचा करार भारताच्या पुरुष, महिला, ‘अ’ संघ आणि युवा (१९ वर्षांखालील) संघांसाठी करण्यात आला आहे. ‘बीसीसीआय’ला विक्रीसंदर्भातील स्वामित्व हक्कापोटी आणखी १० टक्के रक्कमसुद्धा मिळू शकेल. हा करार नोव्हेंबर २०२३ पर्यंत कार्यरत असेल.


🔰एमपीएल हे सध्या ‘आयपीएल’मधील कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु या संघांशी करारबद्ध आहेत. याचप्रमाणे कॅरेबियन प्रीमियर लीगमधील ट्रिनबागो नाइट रायडर्स, आर्यलड आणि संयुक्त अरब अमिरातीशी करारबद्ध आहे.

मिशन सागर-2”: INS ऐरावत सुदान बंदरामध्ये दाखल.


🔰भारतीय नौदलाने चालविलेल्या ‘मिशन सागर-2’चा एक भाग म्हणून INS ऐरावत हे जहाज अन्नधान्य घेऊन 2 नोव्हेंबर 2020 रोजी सुदान बंदरामध्ये दाखल झाले.


🔰या मोहिमेमध्ये भारत सरकारच्या वतीने आपल्या मित्र देशांना नैसर्गिक आपत्ती आणि कोविड-19 महामारीच्या काळात अन्नधान्याची मदत करण्यात येत आहे. सुदानच्या जनतेसाठी भारताने दिलेल्या 100 टन अन्नधान्याची मदत INS ऐरावतमार्फत पाठविण्यात आली आहे.


🔴पार्श्वभूमी...


🔰‘मिशन सागर-2’ मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला मे-जून 2020 मध्ये प्रारंभ झाला. त्यानुसार भारताने मालदीव, मॉरिशस, सेशेल्स, मेदागास्कर आणि कोमोरोस येथे अन्नधान्याची आणि औषधांची मदत पाठविण्यात आली. याचा भाग म्हणून भारतीय नौदलाच्या ऐरावत जहाजामार्फत सुदान, दक्षिण सुदान,  जिबुती आणि इरिट्रिया देशाकडे मदत पाठविण्यात आली आहे.


🔰आपल्या सागरी शेजारी देशांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि मित्रत्वाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी त्या देशांना संकटकाळामध्ये मदत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून ‘मिशन सागर-2’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र कल्याण मंत्रालय यांच्या समन्वयातून ही मोहीम पार पाडण्यात येत आहे.

न्यूझीलंडमध्ये प्रथमच भारतीय वंशाची महिला मंत्री.


🔰न्यूझीलंडमध्ये जॅसिंडा अर्डर्न यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारतीय वंशाच्या महिलेला मंत्रिमंडळात स्थान मिळाले असून प्रियांका राधाकृष्णन या न्यूझीलंडमधील भारतीय वंशाच्या पहिल्या मंत्री ठरल्या आहेत.


🔰अर्डर्न यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात पाच नवीन मंत्र्यांचा समावेश केला त्यात राधाकृष्णन यांचा समावेश आहे. भारतात जन्मलेल्या राधाकृष्णन ४१ वर्षांच्या असून सिंगापूरला शिकलेल्या आहेत. नंतरचे शिक्षण न्यूझीलंडमध्ये झाले. त्यांनी घरगुती हिंसाचाराने ग्रस्त महिला, छळ झालेले स्थलांतरित कामगार यांच्या वतीने आवाज उठवला. त्या संसदेवर मजूर पक्षाच्या वतीने सप्टेंबर २०१७ मध्ये निवडून आल्या.


🔰२०१९ मध्ये त्यांची वांशिक समुदाय खात्याच्या मंत्र्यांच्या खासगी सचिव म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी राजकीय जम बसवून काम केले. आता सर्वसमावेशकता व विविधता, वांशिक अल्पसंख्याक विभागाच्या त्या मंत्री झाल्या आहेत. न्यूझीलंडमध्ये त्या भारतीय वंशाच्या पहिल्या मंत्री आहेत.

मोदी सरकारने जाहिरातींसाठी रोज खर्च केले दोन कोटी रुपये; RTI मधून समोर आली माहिती.


🔰पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने स्वत:च्या प्रचारासाठी रोज दोन कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मिळेल्या आकडेवारीनुसार मोदी सरकारने मागील आर्थिक वर्षामध्ये वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि होर्डींग्सच्या माध्यमातून केलेल्या जाहिरातींवर करदात्यांचे ७१३ कोटी २० लाख रुपये खर्च केल्याचे उघड झालं आहे.


🔰सरकारने ही रक्कम जाहिरातबाजी आणि प्रचारासाठी खर्च केली आहे. मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते जतिन देसाई यांनी आरटीआयअंतर्गत या संदर्भातील माहिती मागवली होती. या अर्जाला उत्तर देताना सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ब्यूरो ऑफ अकाटरिच अ‍ॅण्ड कम्युनिकेशनने दिलेल्या माहितीनुसार केंद्राने २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये जाहिरातींवर दिवसाला सरासरी एक कोटी ९५ लाख रुपये खर्च केले आहेत.


🔰मागील आर्थिक वर्षामध्ये लोकसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकही पार पडली. ७१३ कोटींपैकी इलेक्ट्रॉनिक मीडियावर ३१७ कोटी ५ लाख, प्रिंट मीडियावर २९५ कोटी ५ लाख आणि आऊटडोअर म्हणजेच होर्डींग आणि जाहिरातींवर १०१ कोटी १० लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केलं आहे.

सौम्य करोनाचे सात लक्षणसमूह



- कोविड १९ संसर्गातून निर्माण होणाऱ्या लक्षणांचे सात नवीन प्रकार वैज्ञानिकांनी शोधून काढले आहेत. करोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतरही दहा आठवडय़ांच्या काळात प्रतिकारशक्ती प्रणालीत बदल झालेले दिसून आले आहेत. या संशोधनाचा उपयोग करोना रुग्णांनी नंतर कशी काळजी घ्यावी किंवा सक्षम लस नेमकी कशा स्वरूपाची असावी हे ठरवण्यासाठी होणार आहे.


- अ‍ॅलर्जी या नियतकालिकात प्रसिद्ध 


-  व्हिएन्नातील वैद्यकीय विद्यापीठातील वैज्ञानिकांनी हे संशोधन केले असून त्यांच्या मते करोनाचे एकूण सात लक्षणसमूह निष्पन्न झाले आहे 


- त्यात फ्लू सदृश ताप, थंडी, थकवा व कफ यांचा समावेश आहे. 


- दुसऱ्या प्रकारात सर्दीसारखी लक्षणे म्हणजे शिंका, घसा कोरडा पडणे, नाक चोंदणे, स्नायुदुखी यांचा समावेश आहे. काही रुग्णांमध्ये डोळे व श्लेष्मल आवरणाची आग होते. 


- फुफ्फुसाच्या समस्या, न्यूमोनिया,श्वास घेण्यात अडथळे, आतडय़ाच्या समस्या जसे की अतिसार, मळमळणे, डोकेदुखी, वास व चव जाणे या सारख्या लक्षणांचाही समावेश आहे.


- रुग्णांच्या एका गटात असे दिसून आले की, वास व चव गेलेल्या व ज्यांची प्रतिकारशक्ती प्रणाली ‘तरुण’ आहे त्यांच्यात टी लिंफोसाइटस जास्त असतात व त्या करोना संसर्गात थायमस ग्रंथीतून स्थलांतरित होतात असे यातील सह संशोधक विनफ्राइड एफ पिकल यांनी म्हटले आहे.


◾️नमके काय परिणाम होतात..

कोविड १९ विषाणू नेमके काय परिणाम शरीरात करतो याबाबत उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, मानवी प्रतिकारशक्ती प्रणालीतील ग्रॅन्युलोसाइटस या पेशी जीवाणू तसेच विषाणूंशी लढण्याचे काम करतात. 


- कोविड १९ रुग्णात त्या कमी झालेल्या दिसून आल्या. सीडी ४ व सीडी ८ टी पेशी या प्रतिकारशक्तीतील स्मृती पेशींच्या संचाचे काम करतात त्यातील सीडी ८ टी नावाच्या पेशी जास्त क्रियाशील झालेल्या दिसून आल्या. 


- याचा अर्थ सुरुवातीच्या संसर्गानंतर या पेशी बराच काळ लढत राहतात. अनेक रुग्णांच्या रक्तात प्रतिपिंड निर्माण करणाऱ्या प्रतिकारशक्ती पेशींची पातळी वाढलेली दिसली. 


- कमी पातळीवरच्या करोना संसर्गात जेवढा ताप जास्त तेवढे प्रतिपिंड जास्त दिसून आले. करोना १९ विषाणूशी लढताना आपली प्रतिकारशक्ती दुप्पट शक्तीने काम करीत असते असे दिसून आले आहे.


-  प्रतिकारशक्ती प्रणाली व प्रतिपिंड हे दोन्ही झुंज देतात. या संशोधनाचा उपयोग प्रभावी लस तयार करण्यासाठी होऊ शकतो.

सरोजिनी नायडू



🔰 तयांचा जन्म हैदराबाद येथे सधन कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव सरोजिनी अघोरनाथ चट्टोपाध्याय (चतर्जी).


🔰 वडील निजाम महाविद्यालयाचे प्राचार्य. ते शिक्षणतज्ज्ञ व कळकळीचे कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते. सरोजिनींच्या आई मूळच्या बंगालच्याच. त्या बंगालीमध्ये कविता करीत. सरोजिनींवर अशा सुसंस्कृत पालकांचे संस्कार लहानपणीच झाले. यांतून त्यांचे कविमन घडले आणि लहानपणीच त्यांना कविता रचण्याचा छंद जडला व स्फूर्ती मिळाली.


🔰 निजामाची छात्रवृत्ती घेऊन पुढे त्या इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेल्या (१८९५). या वास्तव्यात त्यांचा एडमंड गॉस या इंग्रज साहित्य समीक्षकाशी चांगला परिचय झाला. त्यांनी आपल्या काही कविता त्यास दाखविल्या आणि पुढील काव्यलेखनात गॉस यांचे त्यांस चांगलेच मार्गदर्शन लाभले. 


🔰 द गोल्डन थ्रेशहोल्ड (१९०५) या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहास गॉसनी प्रस्तावना लिहिली आणि हा काव्यसंग्रह त्या वेळच्या साहित्यक्षेत्रात चांगलाच गाजला. त्याला वृत्तपत्रांतून यथोचित प्रतिसाद मिळाला. रवींद्रनाथ टागोरांनीही सरोजिनींचे कौतुक केले.


🔰 सरोजिनींनी द गोल्डन थ्रेशहोल्डनंतर द बर्ड ऑफ टाईम (१९१२) व द ब्रोकन विंग (१९१७) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध केले. हिंदी महिलेने सुरेख इंग्रजीत लिहिलेल्या या कविता स्वरमाधुर्य, राष्ट्रीय दृष्टिकोण, प्रेमाचा पुरस्कार व क्रांतिकारक राष्ट्रवादी विचार इ. वैशिष्ट्यांनी लोकप्रिय झाल्या. पाश्चात्त्य तसेच पौर्वात्य देशांत त्यांस कीर्ती लाभली आणि कवयित्री म्हणून त्यांचा नावलौकिक वाढला.


🔰 ‘भारतीय कोकिळा’ म्हणून त्यांचा सर्वत्र उल्लेख होऊ लागला. मात्र त्यांच्या गीतरचनेचा सूर एलियटच्या नव्या काव्यप्रवाहाशी जुळला नाही व ती थांबली.


🔰 तयानंतर सरोजिनी नायडू देशसेवा, समाजसेवा इत्यादी गोष्टींकडे वळल्या. त्यांनी होमरूल लीगसाठी ॲनी बेझंट आणि सी. पी. रामस्वामी अय्यर यांच्या बरोबर हिंदुस्थानभर दौरा काढला. आपल्या भाषणांतून त्यांनी तरुणांचे कल्याण, श्रमप्रतिष्ठा, स्त्रीस्वातंत्र्य व राष्ट्रवाद यांचा पुरस्कार केला. 


🔰 सरोजिनी नायडूंनी गोखल्यांना गुरुस्थानी मानले आणि महात्मा गांधींचे नेतृत्व पूर्णतः स्वीकारले. हैदराबाद येथील प्लेगच्या साथीत त्यांनी फार परिश्रम घेऊन जनतेला सर्वतोपरी मदत केली. त्याबद्दल त्यांना कैसर– इ– हिंद हे सुवर्णपदक देण्यात आले; पण ते त्यांनी जालियनवाला बाग येथील हत्याकांडानंतर ब्रिटिश सरकारला हत्याकांडाच्या निषेधार्थ परत केले. रौलट कायदा, माँटेग्यू – चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार वगैरे विविध चळवळींत त्यांनी काँग्रेसच्या ध्येयधोरणांनुसार प्रसार आणि प्रचार केला, मोहिमा काढल्या आणि गांधींच्या असहकार चळवळीत हिरिरीने भाग घेतला. सरोजिनींनी हिंदु – मुसलमान ऐक्य, स्त्रियांचे पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याचे हक्क आणि स्वातंत्र्य हेच आपले जीवनकार्य मानले.


🔰 टिळकांच्या मृत्यूनंतर सरोजिनी नायडू पूर्णतः गांधीवादी झाल्या आणि पेहराव व राहणीमान यांत त्यांनी आमूलाग्र बदल केले. त्यांनी आपले वास्तव्य हैदराबादमधून मुंबईत हलविले. त्या मुंबई महानगरपालिकेत सभासद म्हणून निवडून आल्या आणि पुढे प्रांतिक काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या (१९२१). 


🔰 पढे कानपूर येथील अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनाच्या त्या अध्यक्षा म्हणून निवडल्या गेल्या (१९२५) व काँग्रेस कार्यकारिणीच्या सभासद झाल्या. काँग्रेसच्या सर्व धोरणांत त्या हिरिरीने भाग घेत. कलकत्ता येथे भरलेल्या १९०७ च्या बंगालच्या फाळणी विरोधी सभेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजाविली. १९०८ मध्ये विधवाविवाह परिषदेत त्यांनी स्त्रियांच्या चळवळीचा पाया घातला आणि येथूनच त्यांच्या स्त्रीविषयक चळवळीस खरा प्रारंभ झाला.

वन नेशन, वन गोल्ड’ योजना लागू होण्याची शक्यता.



संपूर्ण देशात लवकरच ‘वन नेशन, वन गोल्ड’ ही व्यवस्था लागू होण्याची शक्यता आहे. या व्यवस्थेनुसार, देशातील कोणत्याही राज्यात सोन्याचा एकसारखाच भाव असेल.देशभरात ही व्यवस्था आणण्याचा विचार सरकारकडून सुरु आहे.


ज्वेलर्स असोसिएशनची मागणी आहे की, सरकारने देशात ‘वन नेशन, वन गोल्ड’ ही व्यवस्था आणावी.यामुळे ग्राहकाला देशभरात सर्व ठिकाणी एकाच किंमतीत सोनं उपलब्ध होईल.


सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यांची मागणी आहे की, वाढत्या दराने सोन्याच्या मागणीत घट झाली आहे. यामुळे व्यवसायावर परिणाम होत आहे.


त्यामुळे एकच किंमत सर्व जागी लागू झाली तर याचा ग्राहकांना मोठा फायदा होईल. ते कुठल्याही राज्यातून सोन खरेदी करु शकतात.

ठिकाण – विशेष नाव


• काश्मीर – भारताचे नंदनवन.

• कॅनडा – बर्फाची भूमी.

• कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश.

• कॅनडा – लिलींचा देश.

• कोची – अरबी समुद्राची राणी.

• कोलकाता – राजवाड्यांचे शहर.

• क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार.

• जपान – उगवत्या सुर्याचा देश.

• जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड.

• जयपूर – गुलाबी शहर.

• जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली.

• झांझिबार – लवंगांचे बेट.

• तिबेट – जगाचे छप्पर.

• त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट.

• थायलंड – पांढ-या हत्तींचा देश.

• दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू.

• नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश.

• न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर.

• पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश.

• पामीरचे पठार – जगाचे आढे.

• पॅलेस्टाईन – पवित्रभूमी.

• प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार.

• फिनलंड – हजार सरोवरांचा देश.

• बंगळूर – भारताचे उद्यान.

• बहरिन – मोत्यांचे बेट.

• बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग.

• बेलग्रेड – श्वेत शहर.

• बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र.

• मुंबई – भारताचे प्रवेशद्वार.

• मुंबई – सात टेकड्यांचे शहर.

• म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी.

• रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड.

• शिकागो – उद्यानांचे शहर.

• श्रीलंका – पाचूंचे बेट.

• स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण काश्मीर – भारताचे नंदनवन.

• कॅनडा – बर्फाची भूमी.

• कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश.

• कॅनडा – लिलींचा देश.

• कोची – अरबी समुद्राची राणी.

• कोलकाता – राजवाड्यांचे शहर.

• क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार.

• जपान – उगवत्या सुर्याचा देश.

• जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड.

• जयपूर – गुलाबी शहर.

• जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली.

• झांझिबार – लवंगांचे बेट.

• तिबेट – जगाचे छप्पर.

• त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट.

• थायलंड – पांढ-या हत्तींचा देश.

• दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू.

• नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश.

• न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर.

• पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश.

• पामीरचे पठार – जगाचे आढे.

• पॅलेस्टाईन – पवित्रभूमी.

• प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार.

• फिनलंड – हजार सरोवरांचा देश.

• बंगळूर – भारताचे उद्यान.

• बहरिन – मोत्यांचे बेट.

• बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग.

• बेलग्रेड – श्वेत शहर.

• बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र.

• मुंबई – भारताचे प्रवेशद्वार.

• मुंबई – सात टेकड्यांचे शहर.

• म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी.

• रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड.

• शिकागो – उद्यानांचे शहर.

• श्रीलंका – पाचूंचे बेट.

• स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण

Online Test Series

समाजसुधारक व पदव्या


▪️ सरदार : वल्लभभाई पटेल


▪️ महर्षी : धोंडे केशव कर्वे / विठ्ठल रामजी शिंदे


▪️ राष्ट्रसंत : तुकडोजी महाराज


▪️ हिंदुस्थानच्या कुषक क्रांतीचे जनक : पंजाबराव देशमुख


▪️ धन्वंतरी : डॉ. भाऊदाजी लाड


▪️ राजर्षी : शाहू महाराज


▪️ वस्तीगृहाचे अद्यजनक : शाहू महाराज


▪️ असंतोषाचे जनक : लोकमान्य टिळक


▪️ जहाल राजकारणी : लोकमान्य टिळक


▪️ मराठी भाषेचे शिवाजी : विष्णुशास्त्री चिपळूणकर


▪️ आधुनिक गद्याचे जनक : विष्णुशास्त्री चिपळूणकर


▪️ निबंधकार : विष्णुशास्त्री चिपळूणकर


▪️ मराठी भाषेचे शिल्पकार : विष्णुशास्त्री चिपळूणकर


▪️ मराठीतील जॉन्सन : कृष्णुशास्त्री चिपळूणकर


▪️ करांतीसिंह : नाना पाटील


▪️ सनापती : पांडुरंग महादेव बापट


▪️ सार्वजनिक काका : गणेश वासुदेव जोशी


▪️ मराठी भाषेतील पाणिनी : दादोबा पांडुरंग तर्खडकर


▪️ महाराष्ट्रातील पहिले धर्मसुधारक : दादोबा पांडुरंग तर्खडकर


▪️ महाराष्ट्रातील मार्टिन ल्युथरकिंग : महात्मा ज्योतीबा फुले ‌.

जगातील सर्वात प्रभावशाली देशांच्या यादीतून भारत बाहेर.


करोनामुळे देशाला बसलेल्या आर्थिक फटक्याच्या पार्श्वभूमीवर आणखीन एक चिंतेत टाकणारी बातमी समोर आली आहे. सामर्थ्यशाली देशांच्या यादीमधून भारत बाहेर फेकला गेला आहे. भारत हा आशियामधील चौथा सर्वात शक्तीशाली देश ठरला आहे. सिडनीमधील लोवी इन्स्टिट्यूटने केलेल्या अभ्यासामध्ये आशियामधील सर्वात प्रभावशाली देशांची यादी जाहीर केली आहे.


आशिया पॉवर इंडेक्स फॉर २०२० हा अहवाल सादर झाला असून आशिया पॅसिफिक प्रदेशामध्ये भारत हा अमेरिका, चीन आणि जपाननंतर चौथा सर्वात प्रभावशाली देश ठरला आहे. मात्र सर्वात सामर्थ्यशाली म्हणजेच मेजर पॉवर हा दर्जा भारताने गमावला आहे. ४० हून अधिक गुण असणाऱ्या देशांना प्रभावशाली देशांच्या यादीत स्थान दिलं जातं. मागील वर्षी भारताला ४१ गुण होते तर यंदा यामध्ये १.३ ची घट झाली असून भारताला  २०२० मध्ये ३९.७ गुण मिळाले आहेत.


आशिया पॅसिफिकमध्ये करोनामुळे सरासार परिस्थिती खालावत चाललेल्या १८ देशांमध्ये भारताचा समावेश आहे. करोनामुळे देशाच्या आरोग्य आणि आर्थिक परिस्थितीवर मोठा ताण पडला असून यामुळेच भारताचा विकास मंदावला आहे असं लोवी इन्स्टिट्यूटने आपल्या अहवालात म्हटलं आहे. चीनच्या तुलनेत भारत म्हणावा तसा विकास करत नसल्याचेही या अहवालात म्हटलं आहे.


“लोकसंख्येच्या दृष्टीने चीनच्या बरोबरीने उभा राहणार भारत हा एकमेव देश असला तरी विकासाच्या बाबतीत तो पुढील काही वर्षांमध्ये चीनची बरोबर करु शकणार नाही. करोनाचा भारतावर मोठा परिणाम झाला असून या साथीमुळे दोन देशांमधील दरी अधिक वाढली आहे,” असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. २०३० पर्यंत भारत हा चीनच्या ४० टक्के विकास करु शकतो असं या अहवालात म्हटलं आहे. २०१० च्या आशिया पॉवर इंडेक्समध्ये हा विकासदर ५० टक्के असेल असं नमूद करण्यात आलं होतं. मात्र आता यामध्ये घट होणार असून तो ४० पर्यंत राहण्याचा अंदाज आहे.

आम्ल

 🔴शरीरात तयार न होणारे आम्ल🔴


◾️वहॅलीन    ◾️लयुसीन


◾️आयसोल्युसिंन   ◾️अर्जेंनिन


◾️लायसीन     ◾️थरीओनीन


◾️फनीलाणीन   ◾️टरेप्टोफॅन


◾️हिस्टीडीन     ◾️मथीओनिन


🔴शरीरात तयार होणारे आम्ल🔴


▪️गलायसीन     ▪️ऍलणीनं


▪️गल्युत्मिक ऍसिड   ▪️सिस्टीन


▪️सरीन      ▪️असपारजिन


▪️आसपार्टीक ऍसिड  ▪️परोलिन


▪️टामरोसीन     ▪️गल्युटामाईन


✍️वरील 10 अमिनो आम्ल शरीरात तयार होतात.

पंचवार्षिक योजना


◾️ 1 एप्रिल 1951 पासून भारतात आर्थिक आर्थिक नियोजनास सुरवात झाली. 


◾️ही पध्दती भारताने रशियाकडून स्वीकारली आहे. तेव्हा पासून 11 योजना पूर्ण झाल्या असून 12 वी योजना चालू आहे. 


◾️7 वार्षिक योजनाही भारतात राबविल्या गेल्या त्यातील 1966-69 च्या कालावधीत योजनेला सुट्टी (Plan Holiday) असे म्हणतात. 


      🎇 पहिली पंचवार्षिक योजना 🎇


 📌  कालावधी: इ.स. १९५१ - इ.स. १९५६

📌  अध्यक्ष: पं.जवाहरलाल नेहरु.

📌 अग्रक्रम: 

कृषी  पहिल्या योजना काळात सार्वजनिक क्षेत्रात २०६९ कोटी रु. खर्च करण्याचे ठरविले , तरी प्रत्यक्षात मात्र १९६० कोटी रु. दुसऱ्या महायुद्धाचे झालेले परिणाम व नुकत्याच झालेल्या फाळणीमुळे मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली 


🏭 परकल्प :• 


🔹 १. दामोदर खोरे विकास योजना (झारखंड-पश्चिम बंगाल) 

🔹 २. भाक्रा-नानगल प्रकल्प (सतलज नदीवर,हिमाचल प्रदेश-पंजाब) 

🔹  ३. कोसी प्रकल्प (कोसी नदी बिहार) 

🔹 ४. हिराकूड योजना (महानदीवर ओरिसा) 

🔹 ५. सिंद्री (झारखंड) खत कारखाना 

🔹 ६. चित्तरंजन (पश्चिम बंगाल) येथे रेल्वे इंजिनचा कारखाना. 

🔹 ७. पेरांबुर (तामिळनाडू) येथे रेल्वे डब्यांचा कारखाना. 

🔹 ८. HMT- बँगलोर ९. हिंदुस्थान एंटीबायोटिक 

_________________________________

चालू घडामोडी चे प्रश्न व उत्तरे




प्रश्न१) पृथ्वी 2 हे ____ क्षेपणास्त्र आहे.

उत्तर :-  पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र


प्रश्न२) कोणत्या राज्यातून रुशिकुल्य नदी वाहते?

उत्तर :-  ओडिशा


प्रश्न३) कोणत्या संस्थेनी “बेंडिंग द कर्व्ह: द रिस्टेरेटीव पॉवर ऑफ प्लॅनेट-बेस्ड डायट्स” या शीर्षकाखाली एक अहवाल प्रकाशित केला?

उत्तर :- वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड


प्रश्न४) कोणत्या राज्यात गोलकोंडा किल्ला आहे?

उत्तर :- तेलंगणा


प्रश्न५) कोणत्या कायद्यात ‘हलक पंचायत’ची तरतूद आहे?

उत्तर :- जम्मू व काश्मीर पंचायतराज अधिनियम, 1989


प्रश्न६) SLINEX’ ही भारत आणि ____ या देशांच्या नौदलांच्या दरम्यानची सागरी कवायत आहे.

उत्तर :- श्रीलंका


प्रश्न७) कोणती व्यक्ती ‘वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द ईयर’ पुरस्काराची प्रथम भारतीय विजेता ठरली?

उत्तर :- ऐश्वर्या श्रीधर


प्रश्न८) कलेक्टिव्ह सेक्युरिटी ट्रीटी ऑर्गनाइझेशन (CSTO) ही _ या देशाच्या नेतृत्वाखाली असलेली एक युती आहे.

उत्तर :- रशिया


प्रश्न९) कोणत्या रेल्वे-नि-रस्ता पूलावरून ‘झिरो राजधानी’ रेलगाडी धावणार?

उत्तर :- बोगीबील


प्रश्न१०) कोणत्या शहरात जगातला सर्वात मोठा झिंक स्मेलटर प्रकल्प उभारला जाणार?

उत्तर :- गुजरात



 प्रश्न१) ‘जागतिक भूकबळी निर्देशांक 2020’ या 107 देशांच्या यादीत भारताला कोणत्या क्रमांक प्राप्त झाला?

उत्तर :- ९४ वा


प्रश्न२) कोणता देशातला पहिला 'हर घर जल' राज्य ठरला?

उत्तर :- गोवा


प्रश्न३) केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार कोणत्या वर्षापर्यंत भारत ट्रान्स-फॅट फ्री होणार?

उत्तर :- २०२२


प्रश्न४) कोणते राज्य ‘मिशन शक्ती’ नावाने महिला सशक्तीकरण अभियान राबवित आहे?

उत्तर :- उत्तरप्रदेश


प्रश्न५) 'लँसेट मेडिकल’ अहवालानुसार, भारताचे आयुर्मान किती आहे?

उत्तर :- ७०.८ वर्ष


प्रश्न६) कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाने ‘माय टाउन माय प्राइड’ कार्यक्रमाचा आरंभ केला?

उत्तर :- जम्मू व काश्मीर


प्रश्न७) कोणाला आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघाचे नवीन अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले?

उत्तर :- डॉ मायकेल इराणी


प्रश्न८) कोणत्या दिवशी जागतिक अन्न दिन साजरा केला जातो?

उत्तर :- 16 ऑक्टोबर


प्रश्न९) कोण ‘द बॅटल ऑफ बिलॉन्गिंग’ या पुस्तकाचे लेखक आहेत?

उत्तर :- शशी थरूर


प्रश्न१०) कोणत्या देशाला भारताकडून किलो-श्रेणीची ‘INS सिंधुवीर’ पाणबुडी मिळणार आहे?

उत्तर :- म्यानमार



Q1) कोणत्या व्यक्तीची रोखे बाजारच्या आकडेवारीसाठी धोरणांची शिफारस करण्यासाठी SEBI संस्थेनी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली?

------- माधबी पुरी बुच


Q2) कोणत्या संस्थेच्यावतीने 'मेरी सहेली' उपक्रम चालवला जात आहे?

------ रेल्वे सुरक्षा दल


Q3) एशिया पॉवर इंडेक्स 2020’ यामधल्या सामर्थ्यशाली देशांच्या यादीत भारताचा क्रमांक कोणता आहे?

------- 4 था क्रमांक


Q4) कोणत्या व्यक्तीला वैद्यकीय संशोधनासाठी "आउटस्टँडिंग यंग पर्सन ऑफ द वर्ल्ड 2020" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

-------  जाजिनी व्हर्गीस


Q5) भारतीय हवाई दलात सेवा दिलेल्या पहिल्या महिला अधिकारीचे नाव काय आहे, ज्यांचे नुकतेच निधन झाले?

------- विजयालक्ष्मी रामानन


Q6) कोणत्या मंत्रालयाच्यावतीने “लाइफ इन मिनीएचर” प्रकल्पाचा आरंभ करण्यात आला आहे?

-------- सांस्कृतिक मंत्रालय


Q7) कोणत्या संस्थेनी ‘स्टेट ऑफ द ग्लोबल एअर (SOGA) 2020’ अहवाल प्रसिद्ध केला?

--------  हेल्थ इफेक्ट इंस्टीट्यूट


Q8) मानवी शरीराच्या कोणत्या भागात “ट्युबरिअल सलायवरी ग्लॅंड” आहे?

---------  ग्रसनी यामध्ये


Q9) 'पोर्ट्रेट्स ऑफ पॉवर’ हे कोणत्या भारतीयाचे आत्मचरित्र आहे?

-------- एन. के. सिंग (15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष )


Q10) कोणत्या कंपनीची निवड NASA संस्थेनी चंद्रावर 4G सेल्युलर नेटवर्क तैनात करण्यासाठी केली?

--------  नोकिया




Q1) चीनच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू जहाजाचे नाव काय आहे?

------ शनदोंग


Q2) कोणत्या संस्थेनी 'रीडिंग बिटवीन द लाईन्सः व्हॉट द वर्ल्ड रियली थिंक्स ऑफ टीचर्स' या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला?

------ वर्की फाउंडेशन


Q3) कोणत्या देशाने शांघाय सहकार्य संघटनेच्या विदेश व्यापार आणि अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या मंत्र्यांची 19 वी बैठक आयोजित केली?

----- भारत


Q4) खालीलपैकी कोणत्या बाबीशी ‘इंडिजेन जीनोम’ प्रकल्प संबंधित आहे?

------ व्यक्तींचा जीन क्रम


Q5) कोणत्या संस्थेनी "इलेक्ट्रिसिटी अॅक्सेस इन इंडिया अँड बेंचमार्किंग डिस्ट्रीब्यूशन यूटिलिटिज" अहवाल प्रकाशित केला?

-------  नीती आयोग


Q6) छत्तीसगड विधानसभेत मंजूर झालेल्या ‘कृषी उत्पन्न बाजार (दुरुस्ती) विधेयक-2020’ याच्याबाबतीतले कोणते विधान चुकीचे आहे?

------- कृषी उत्पन्न बाजारांचे नियमन करण्याचे अधिकार केंद्र सरकारला देते


Q7) _ ही संस्था ‘स्टेट फायनान्स’ विषयक वार्षिक अहवाल प्रकाशित करते.

------- भारतीय रिझर्व्ह बँक


Q8) कोणत्या देशाने "बाय, बाय कोरोना" या शीर्षकाखाली जगातले पहिले वैज्ञानिकदृष्टीचे कार्टून पुस्तक प्रकाशित केले?

------- भारत


Q9) कोणत्या संरक्षण दलाने “सिक्युअर अप्लिकेशन फॉर इंटरनेट (SAI)” नामक एक सुरक्षित मेसेजिंग अॅप विकसित केला?

------ भारतीय भुदल


Q10) भारताच्या कोणत्या शेजारी देशाने “नो मास्क नो सर्व्हिस” धोरण अंमलात आणले आहे?

------ बांग्लादेश



शाहिर अमर शेख


जन्म : २० ऑक्टोबर, १९१६

निधन :  २९ ऑगस्ट, १९६९


🌷 सयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या पोवाड्यांनी मराठी माणसाची अस्मिता जागविणारे शाहीर अमर शेख.


🌷 महबूब हुसेन पटेल हे त्यांचे मूळ नाव.


🌷 तयांचा जन्म सामान्य गरीब कुटुंबात बार्शी येथे झाला. 


🌷 तयांना पहाडी आवाजाची देणगी आणि प्रतिभाही मिळाली होती. आईकडून लोकगीतांचा वारसाही मिळाला होता.


🌷 परिस्थितीमुळे त्यांना लहानपणा पासूनच मालट्रकवर क्‍लिनर तसेच गिरणी कामगार म्हणून कष्टाची कामे करावी लागली होती. 


🌷 सोलापूरच्या गिरणी कामगार संपात त्यांनी पुढाकार घेतला त्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरुंगाची हवा खावी लागली.


🌷 तथे त्यांची कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर यांची गाठ पडली व ते डाव्या चळवळीकडे ओढले गेले. 


🌷 पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते कोल्हापूर येथे आले व मास्टर विनायकांच्या स्टुडिओत काम करु लागले.


🌷 यथेच त्यांच्या मित्रांनी त्यांचे नामकरण  'शाहीर अमर शेख’ असे नामकरण केले.


🌷 अमर शेख 1930-32 च्या सुमारास राष्ट्रीय चळवळीत सामील झाले.


🌷 पर्वाश्रमीच्या कुसुम शामराव जयकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. 


🌷 तयांची खरी ओळख झाली ती संयुक्त महाराष्ट्र चळवळीने. 


🌷 तयांची प्रतिभा बहरली व ते डफ घेऊन सभास्थानी आले व सभेचे फड जिंकू लागले, त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. 


🌷 सवतः कामगार असल्याने सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न त्यांनी पाहिले. 


🌷 सवरचित तसेच इतर कवींच्या रचनांही त्यांनी गायल्या.


🌷 ग. दि. माडगूळकर यांचे “रागरागाने गेला निघून’ हे “वैजयंता’ या चित्रपटातील वसंत पवार यांनी संगीतबध्द केलेले गीत आशा भोसले यांचे बरोबर त्यांनी गायले.


🌷 तयांच्या शाहिरीमधे पोवाडे लोकनाट्य यांचा समावेश असे. 


🌷 चिनी आक्रमणाचे वेळी त्यांनी कार्यक्रम करून लाखो रुपयांचा संरक्षण निधी गोळा करून राष्ट्रकार्यास हातभार लावला.


🌷 तयावेळी “बर्फ पेटला हिमालयाचा’ हे त्यांनी रचलेले व गायलेले गीत खूप गाजले होते.


🌷 तयांची लेखणी प्रसंगानुरूप चालत असे व वर्तमानाचे प्रतिबिंब त्यांच्या काव्यातून डफाच्या ठेक्‍यातून आणि बुलंद आवाजातून लोकांच्या काळजाचा ठाव घेत असे.


🌷 आचार्य अत्रे त्यांना “महाराष्ट्राचा मायकोव्हस्की’ म्हणत.


🌷 “कलश’ (1958) आणि “धरतीमाता’ (1963) हे त्यांचे काव्यसंग्रह


🌷 “अमरगीत’ (1951) हा गीतसंग्रह आणि “पहिला बळी’ (1951) हे त्यांनी लिहिलेले नाटक. 


🌷 तयांनी रचलेल्या पोवाड्यांत छ. शिवाजी महाराज, होळकर आणि उधमसिंग यांच्या पोवाड्यांचा समावेश असे.


🌷 जया पक्षासाठी त्यांनी जीवाचे रान केले तो पक्ष त्यांच्या जीवनाचे अखेरीस शेख यांना सोडावा लागला. 


🌷 तयांच्या विविध गुणांचा वारसा त्यांच्या कन्या प्रेरणा व मल्लिका यांच्याकडे आला आहे. इंदापूर येथे शेख यांचे अपघाती निधन झाले.

आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती..


🔶 मानवी डोक्याचे वजन ?

→   १४०० ग्रॅम.

 

🔶 सामान्य रक्तदाब ? 

→   १२०/८० मि. मी. पा-याची उंची. 


🔶 शरीरातील सर्वात मोठी पेशी ?

→   न्यूरॉन. 


🔶 लाल रक्त पेशींची संख्या ?

→   पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.

→   स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी. 


🔶 शरिरातील एकूण रक्त ? 

→   ५ ते ६ लीटर.

 

🔶 सर्वात लहान हाड ? 

→   स्टेटस ( कानाचे हाड ) 


🔶 सर्वात मोठे हाड ?

→   फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड ) 


🔶 लाल रक्तपेशींचा जीवनकाळ ?

→   १२० दिवस. 


🔶 पांढरा-या रक्तपेशींचा संख्या ? 

→   ५००० ते १०००० प्रति घ. सेमी. 


🔶 पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ ? 

→   २ ते ५ दिवस. 


🔶 रक्तातील प्लेटलेट्स माऊंट ?

→   २ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी. 


🔶 हिमोग्लोबिनचे प्रमाण ?

→   पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी. 

→   स्त्रिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी. 


🔶 हरदयाचे सामान्य ठोके ? 

→   ७२ ते ७५ प्रति मिनिट. 


🔶 नाडी दर (पल्स रेट) ?

→   ७२ प्रतिमिनिट. 


🔶 सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी ?

→   थायरॉईड ग्रंथी. 


🔶 सर्वात मोठा स्नायू ?

→   ग्लुटियस म्याक्सीमस. 


🔶 एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या ?

→   ६३९.


🔶 रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या ?

→   मोनोसाईटस - ३ ते ८%. 

→   बेसोफिल्स - ०.५%. 

→   लिम्फोसाईटस - २० ते २५%. 

→   न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%. 


🔶 शरीराचे तापमान ? 

→   ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन. 


🔶 परौढांमधील दातांची संख्या ?

→   ३२.


 🔶 लहान मुलांमधील दातांची संख्या ?

→   २० दूधाचे दात. 


🔶 सर्वात पातळ त्वचा ? 

→   पापणी (कंजक्टायव्हा)

US Election : समजून घ्या काय आहे EARLY BALLOTS CAST सिस्टम




🔸करोनाच्या पार्श्वभूमीवर या प्रक्रियेच्या वापरात विक्रमी वाढ


🔸अमेरिकेत आज राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, दरम्यान, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेच पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार का? किंवा जो बायडेन यांच्याकडे राष्ट्राध्यक्षपदाची धुरा जाणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, काही राजकीय जाणकारांच्या मते डोनाल्ड ट्रम्प हे पराभूत होतील असं म्हटलं जात आहे. दरम्यान, अमेरिकेत EARLY BALLOTS CAST सिस्टमदेखील कार्यान्वित आहे.

जाणून घेऊया काय आहे ही प्रक्रिया.


🔸अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या मतदान प्रक्रियेपूर्वीच जवळपास साडेसात कोटी लोकांनी आपलं मत दिलं आहे. करोना विषाणूच्या संकटादरम्यान यावेळी मेल-इन मतदानाला प्रोत्साहन देण्यात आलं आहे. दरम्यान, याद्वारे निरनिराळ्या राज्यांतील अनेकांनी आपलं मत दिलं आहे. मुख्य मतदानाच्या मतमोजणीसोबतच ही मतं मोजली जाणार आहेत. अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेत EBCS बद्दल सांगण्यात आलं आहे. जी या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावू शकते.


🔸काय आहे Early ballots cast system?


एकाच दिवसात कोट्यवधी लोकांनी मत देणं ही अशक्य बाब आहे. यासाठी अमेरिकेतील संविधानात एक पर्याय सूचवण्यात आला आहे. ज्याद्वारे मतदारांना मतपत्रिकेद्वारे किवा मेलद्वारे मत देता येतं. याचा वापर अमेरिकेतील ग्रामीण भागांमध्ये राहणाऱ्या किंवा मतदान केंद्रांपासून दूर असलेल्या मतदारांना करता येतो. याव्यतिरिक्त वयस्क लोकांनादेखील हा पर्याय वापरता येतो. मतदानाच्या तीस दिवसांपूर्वी मतदारांना याद्वारे आपलं मत देता येतं. प्रत्येक राज्यांमध्ये स्थानिक निवडणूक आयोग याची तारीख निश्चित करत असतो. तसंच यासाठी नोंदणी करावी लागते, तेव्हाच आपलं मत मेल करता येतं. दरम्यान, या मतांची मोजणीदेखील मुख्य मतमोजणीसोबतच केली जाते. यावेळी या पर्यायानं सर्व विक्रम मोडीत काढल्याचं दिसत आहे. पहिल्या दोन आठवड्यांमध्येच २.७ कोटी लोकांनी तर आतापर्यंत जवळपास सात कोटींपेक्षा अधिक लोकांची या पर्यायाद्वारे मतदान केलं आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यात वाढ झाल्याचं म्हटलं जात आहे.



🔸भारतीय वंशाच्या मतदारांची ताकद


अमेरिकेच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे मतदार एक मोठी भूमिका बजावणार असल्याचं म्हटलं जात आहे. १६ राज्यांमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या अमेरिकेतील नागरिकांपेक्षाही अधिक आहे. परंतु १३ लाख भारतीय त्या आठ राज्यांमध्ये राहतात ज्या ठिकाणी चुरशीची लढत आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही पक्षाला एक मतही बहुमोल ठरणार आहे. अमेरिकेत २८ ऑक्टोबरपर्यंत ७.५ कोटींपेक्षा अधिक मतं देण्यात आली आहेत. राजकीय क्षेत्रातील जाणकारांनुसार यावेळीही याप्रकारचे ‘सायलेंट वोटर’च ‘किंगमेकर’ ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. अमेरिकेत मतदानासाठी मेल किंवा लवकर मत देणं आणि दुसरं मतदान केंद्रांवर जाऊन मत देणं असे पर्याय उपलब्ध आहेत.

Latest post

चालू घडामोडी :- 17 मार्च 2024

◆ काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे. ◆ 2025 मध्ये चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान ...