Wednesday 21 August 2019

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर



(१४ एप्रिल १८९१ – ६ डिसेंबर१९५६), बाबासाहेब आंबेडकर नावाने ओळखले जात.

आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या.आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यांनी नंतरच्या जीवनात राजकीय कार्यांवर लक्ष केंद्रित केले;
ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित करणे, दलितांसाठी राजकीय हक्क व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला१९५६ मध्ये त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला, व लक्षावधी दलितांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.

१९५० च्या दशकात बौद्ध भिक्खुंनी त्यांना बोधिसत्व ही बौद्ध धर्मातील उपाधी प्रदान केली. इ.स. १९९०साली त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला.
आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकप्रिय संस्कृतित उभी राहिली आहेत.

महाराष्ट्रातील समाज सुधारक :- प्रबोधनकार ठाकरे


⬜️ जीवन परिचय ⬜️

◼️ केशव सीताराम ठाकरे हे त्यांचे नाव. जन्म १७ सप्टेंबर १८८५  रायगड जिल्ह्यात पनवेल येथे झाला.

◼️ प्रबोधनकार हे पत्रकारितेत  जेवढे झुंजार तेवढेच त्यांचे वक्तृत्वही झुंझार होते. त्यांनी त्यांच्या पत्रकार सारथी,लोकहितवादी, आणि प्रबोधन केले.

◼️त्यांच्या कुमारिकेचे शाप १९१९, भिक्षुकशहिचे बंड १९२१ यासारख्या पुस्तकातून आणि खरा ब्राम्हण १९३३, विधीविशेष १९३४, यासारख्या नाटकातून समाजसुधारक प्रकटतो.

💠 पुस्तके - चरित्रे 💠

◼️ग्रामण्याचा साद्यंत इतिहास - १९१९ वर्षे

◼️स्वराज्याचा खून - १९२२ वर्षे
 
◼️ प्रतापसिह छत्रपतीरंगो बापुजी - १९४८
 
◼️रायगड - १९५१
 

🔳 चरित्रे 🔳

◼️ संत रामदास - १९१८ 
 
◼️पंडिता रमाबाई - १९५०
 
◼️गाडगे महाराज  - १९५२
 
◼️माझी जीवनगाथा हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.

२० नोवेंबर १९७३ रोजी त्यांचे निधन झाले.

उस्ताद बिस्मिल्ला खान

- जन्म: 21 मार्च 1916, मृत्यू: 21 ऑगस्ट 2006
- पहिला सर्वात मोठा कार्यक्रम 1937 मध्ये अखिल भारतीय संगीत परीषदेत शहनाई वाजवली.
- भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनी 1947 मध्ये भारतीयांना मंत्रमुग्ध केले.
------------------------------------------------------
● चित्रपट

- 1959: गुंज ऊठी शहनाई
- 1977: Sanaadi Appanna
- 1989: Sange Meel Se Mulaqat
------------------------------------------------------
● प्राप्त पुरस्कार

- अखिल भारतीय संगीत परीषद 1937 तीन पदके
- संगीत नाटक अकादमी पुरस्कार: 1956
- पद्मश्री: 1961
- पद्म भूषण: 1968
- पद्म विभूषण: 1980
- Talar Mausiquee: 1992
- भारतरत्न: 2001

【】वाक्प्रचारांचा अर्थ व वाक्यात उपयोग【】

1) नाव मिळवणे. 
अर्थ :- कीर्ती मिळविणे. 
वाक्य :- शालान्त परीक्षेत जिल्ह्य़ात प्रथम 
            येऊन सुप्रियाने नाव मिळविले. 

2) रक्ताचे पाणी करणे. 
अर्थ :- खूप कष्ट करणे. 
वाक्य:- शिवाजी महाराजांनी रक्ताचे पाणी 
     केले आणि स्वराज्याची स्थापना केली. 

3) सोंग काढणे. 
अर्थ :- नक्कल करणे. 
वाक्य :-  सुमित सर्व शिक्षकांचे हुबेहूब 
            सोंग काढतो. 

4) रात्रीचा दिवस करणे. 
अर्थ :- खूप कष्ट करणे. 
वाक्य:-रात्रीचा दिवस करून आईवडिलानी सानियाला शिकवले. 

5)भांबावून जाणे. 
अर्थ :- गोंधळून जाणे. 
वाक्य :- गावचा सुनिल पहिल्यांदा शहरात 
           आला, तेव्हा इथली गर्दी पाहून तो  भांबावून गेला.

6)डोक्यावर घेणे. 
अर्थ :- अतिलाड करणे. 
वाक्य :- तुषार पोहण्याच्या स्पर्धेत पहिला 
    आला, तेव्हा बाबांनाी त्याला डोक्यावर 
    घेतले. 

7) आळा घालणे. 
अर्थ :- बंदी आणणे. 
वाक्य :-जंगल तोड करणाऱ्या चोरांना सजा 
देऊन पोलिसांनी गैरकृत्याला आळा घातला. 

8) तीरासारखे धावणे. 
अर्थ:- खूप वेगाने धावणे. 
वाक्य :- कशाचीही पर्वा न करता निलेश 
       स्पर्धेत तीरासारखा धावतो. 

9) मर्जी राखणे. 
अर्थ :- खूश ठेवणे. 
वाक्य:-निवडणूक जवळ आल्यावर नेत्यांनी 
      जनतेची मर्जी राखायला सुरूवात केली. 

10) संगोपन करणे. 
अर्थ :- पालनपोषण करणे. 
वाक्य:-आई वारल्यामुळे शारदाच्या मावशीने 
          तिचे संगोपन केले.

11) अटक करणे :- खूप परिश्रम करून पोलिसांनी अट्टल गुन्हेगाला अटक केली.

12) अपशब्द वापरणे :- चंदूचा अमरला धक्का लागताच, अमरने चंदूविषयी रागाने अपशब्द वापरले.

13)अग्निदिव्य करणे :- वचन पाळण्यासाठी प्रभुरामचंद्रांना चौदा वर्षे वनवास भोगून अग्निदिव्य करावे लागले.

14) अचंबा वाटणे :- भर उन्हात पाऊस पडला, याचा लहानश्या मुलाला अचंबा वाटला.

15) अभिमान वाटणे :- आलोक स्कॉलरशिप परीक्षेत सर्वप्रथम आला, याचा बाबांना अभिमान वाटला.

16) अटकाव करणे :- धरणाच्या ठिकाणी आंदोलन करण्यास सरकारने लोकांना अटकाव केला.

17) अठराविश्व दारिद्र्य : कमवणारे कोणी नसल्यामुळे वावेरकार कुटुंबात अठराविश्व दारिद्र्य होते.

18) अनुकरण करणे :- लहान मुले नेहमी मोठ्या माणसांचे अनुकरण करतात.

19)अभिप्राय देणे :- मी लिहिलेला निबंध चांगला आहे, असा सरांनी अभिप्राय दिला.

20) अभिवादन करणे :- १५ ऑगस्टला आम्ही विद्यार्थ्यांनी तिरंग्याला एकसाथ अभिवादन केले.

DRDOने मोबाइल मेटलिक रॅम्प (MMR) भारतीय सैन्याकडे सुपूर्द केला

भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्थेनी (DRDO) विकसित केलेल्या मोबाइल मेटलिक रॅम्प (MMR) भारतीय सैन्याकडे सुपूर्द केले. 70 मेट्रिक टन (MT) एवढा भार सहन करू शकणार्‍या MMRची रचना व विकास DRDOच्या एका केंद्राने केला.

मोबाइल मेटलिक रॅम्प (MMR) हा पूलाचा एक प्रकार आहे, जो गाडीच्या मदतीने कुठेही सोबत घेवून जाता येतो. या यंत्रणेमुळे सैन्याच्या सशस्त्र वाहनांच्या चळवळीला लागणारा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे.

✍DRDO विषयी

संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) ही भारताच्या संरक्षण क्षेत्रात संशोधनासाठी समर्पित असलेली प्रमुख संस्था आहे. त्याची स्थापना 1958 साली करण्यात आली आणि मुख्यालय नवी दिल्लीत आहे. ही संस्था भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्यरत आहे.

मंत्रिमंडळाचे 19 महत्त्वाचे निर्णय, खुल्या प्रवर्गातील दुर्बल घटकांचा विकास करणार

✍खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी अमृत संस्था स्थापण्यास मान्यता.

✍गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय.

✍मुंबई शहरासाठी इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (आयटीएमएस) प्रकल्प राबविण्यासह त्यासाठी लागणाऱ्या खर्चास मान्यता.

✍मराठवाडा वॉटरग्रीड अंतर्गत हायब्रीड ॲन्युईटी तत्त्वावर बीड जिल्ह्यातील 4800 कोटींच्या कामासाठी निविदा मागविणार.

✍कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल व परिसराच्या विकास आराखड्यास मान्यता.

✍साताऱ्याच्या जिहे कठापूर येथील गुरुवर्य कै. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेस द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता.

✍राष्ट्रीय कौशल्य विकास अभियानांतर्गत उपजीविकेसाठी कौशल्य संपादन व ज्ञान जागरुकता अभियान (संकल्प) प्रकल्प राज्यात राबविण्यास मान्यता.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) खालीलपैकी शुध्द शब्द कोणता ?

   1) निलिमा    2) नीलिमा   
   3) निलीमा    4) नीलीमा

उत्तर :- 2

2) मराठीत एकूण स्वर किती आहेत ?

   1) आठ    2) दहा     
  3) बारा      4) चौदा

उत्तर :- 3

3) ‘वाक्यातील विराम बदलला की वाक्याचा अर्थ बदलतो’ यास काय म्हणतात ?

   1) बलाघात    2) सीमासंधी   
  3) सुरवली    4) व्यंजनव्दित्त

उत्तर :- 2

4) पुढीलपैकी कोणत्या नामांना धर्मीवाचक नामे असे म्हणतात.

   अ) भाववाचक नामे  ब) विशेषनामे   
   क) सामान्यनामे    ड) पदार्थवाचक नामे
   1) फक्त अ    2) फक्त ब व क    3) वरील सर्व    4) फक्त अ व ब

उत्तर :- 2

5) ‘कोण’, ‘काय’ ही सर्वनामे खालील कोणत्या प्रकारात येतात ?

   1) प्रश्नार्थक व अनिश्चित    2) दर्शक व संबंधी
   3) पुरुषवाचक व अनिश्चित  4) दर्शक व प्रश्नार्थक

उत्तर :- 1

6) ‘पंचमुखी हनुमान’ हे कोणते विशेषण आहे ?

   1) अव्ययसाधित विशेषण      2) धातुसाधित विशेषण
   3) समासाधारित विशेषण      4) संबंधी विशेषण

उत्तर :- 3

7) ‘त्या राजाला मुकुट शोभतो’ – या वाक्यातील कर्म ओळखा.

   1) राजाला    2) मुकुट     
   3) शोभतो    4) त्या

उत्तर :- 2

8) ‘नित्य, सदा, सर्वदा, सतत, नेहमी ही कोणती क्रियाविशेषण अव्यये आहेत ते लिहा.

   1) कालदर्शक      2) सातत्यदर्शक   
   3) आवृत्ती दर्शक    4) स्थल दर्शक

उत्तर :- 2

9) वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार कोणता ? – ‘प्रवाशांकरिता मोनोरेल सुरू झाली.’

   1) हेतूवाचक    2) संबंधवाचक   
   3) साहचर्यवाचक    4) करणवाचक

उत्तर :- 1

10) खालीलपैकी कोणत्या वाक्यात न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहे. पुढीलपैकी बरोबर पर्याय निवडा.

   1) मरावे परी किर्तीरूप उरावे    2) तुला ज्ञान हवे की धन हवे
   3) एक रुपया म्हणजे शंभर रुपये    4) प्रयत्न केला तर फायदाच होईल

उत्तर :- 1

7 सप्टेंबरला 'चांद्रयान'चंद्रावर उतरणार, मोहीम योग्य दिशेने - इस्रो

🔰'चांद्रयान-2' ही चंद्रावर स्वारी करणारी हिंदुस्थानची मोहीम योग्य दिशेने चालली असून ठरल्याप्रमाणे हे यान चंद्राच्या दक्षिणेकडील बाजूला येत्या 7 सप्टेंबरला उतरणार आहे, अशी माहिती हिंदुस्थानी अंतराळ संशोधन केंद्राने (इस्रो) नुकतीच ट्विटरवरील आपल्या अधिकृत हॅण्डलवर दिली.

🔰या मोहिमेत इस्रो चंद्राच्या आतापर्यंत कधीही समोर न आलेल्या बाजूचे संशोधन करणार आहे. चंद्राच्या पृष्ठभूमीवर उतरणारे हिंदुस्थानचे हे पहिलेच पाऊल असणार आहे. या यानामध्ये ऑर्बिटर, लॅण्डर आणि रोव्हर अशी तीन उपकरणे आहेत. आपल्या बळावर चंद्रावर स्वारी करणारा हिंदुस्थान हा चौथा देश ठरला आहे . यापूर्वी अमेरिका , रशिया आणि चीनने चंद्रावर उतरण्याची कामगिरी केली आहे . बुधवारीच हिंदुस्थानी प्रमाणवेळेनुसार पहाटे तीन ते चार या वेळेत ' ट्रान्स लुनर इन्सर्शन ' ही प्रक्रिया यानाने पार पाडली आहे . त्यानंतर 20 ऑगस्टला ' चांद्रयान -2' हे यान चंद्राच्या कक्षेत पोहोचणार असून त्यानंतर 7 सप्टेंबरला ते चंद्राच्या पृष्ठभूमीवर उतरेल , असेही इस्रोने आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे .

*चालू घडामोडी वन लाइनर्स 21 ऑगस्ट 2019.*


✳ भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

✳ दिल्ली विधानसभा अध्यक्ष आर एन गोयल यांनी आमदार संदीप कुमार यांना अपात्र ठरविले आहे

✳ दिवाकर वासू यांची तामिळनाडू प्रशिक्षक म्हणून नेमणूक

✳ गुजरात सरकार राज्य योग मंडळाची स्थापना करतो

✳ दुती चंद आता पुमचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

✳ शिशपाल एस राजपूत यांना गुजरात राज्य राज्य मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले

✳ सुधांशु सारंगी यांची भुवनेश्वर पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती

✳ प्रताप ज्योती हंडिक यांनी गौती विद्यापीठाचे नवीन कुलगुरू म्हणून नेमणूक केली

✳ ब्रॅड हॅडिनने सनरायझर्स हैदराबादचा सहाय्यक प्रशिक्षक नियुक्त केला

✳ भूमी पेडणेकर यांनी मनुकासाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून स्वाक्षरी केली

✳ शोपीने क्रिस्टियानो रोनाल्डोला सर्वात नवीन ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून घोषित केले

✳ केविन पीटरसन बेटवेचे ग्लोबल क्रिकेट अ‍ॅम्बेसेडर

✅ *YouGov ने ग्लोबल वार्षिक ब्रँड हेल्थ रँकिंग्ज 2019 जाहीर केले*

✳ गुगल टॉप ग्लोबल वार्षिक ब्रँड हेल्थ रँकिंग्ज 2019

✳ ग्लोबल वार्षिक ब्रँड हेल्थ रँकिंग्स 2019 मध्ये व्हॉट्सअॅपने दुसर्‍या क्रमांकावर आहे

✳ ग्लोबल वार्षिक ब्रँड हेल्थ रँकिंग 2019 मध्ये यूट्यूबचे तिसरे स्थान आहे

✳ ग्लोबल वार्षिक ब्रँड हेल्थ रँकिंगमध्ये सॅमसंगने चौथ्या क्रमांकावर आहे

✳ ग्लोबल वार्षिक ब्रँड हेल्थ रँकिंग्ज 2019 मध्ये फेसबुकने 5 वे स्थान मिळविले

✳ जागतिक वार्षिक ब्रँड आरोग्य क्रमवारीत 2019 मध्ये मेझॉनचा 6 वा क्रमांक आहे

✳ ग्लोबल वार्षिक ब्रँड हेल्थ रँकिंग्ज 2019 मध्ये आयकेईए 7 व्या स्थानावर आहे

✳ ग्लोबल वार्षिक ब्रँड हेल्थ रँकिंग्स 2019 मध्ये नायकेचा 8 वा क्रमांक आहे

✳ ग्लोबल वार्षिक ब्रँड हेल्थ रँकिंग्ज 2019 मध्ये पेपल 9 व्या स्थानावर आहे

✳ जागतिक वार्षिक ब्रँड हेल्थ रँकिंग्स 2019 मध्ये नेटफ्लिक्सचा दहावा क्रमांक आहे

✳ आर दिलीप यांनी हुबळी-धारवाड पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला

✳ एन के कतील यांची कर्नाटक भाजपा अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे

✳ पुरुषांच्या फ्री स्टाईलमध्ये 2019  वर्ल्ड सी’शिपसाठी सुशील कुमार पात्र 74 कि.ग्रा

✳ बेंगळुरू येथे कर्नाटक राज्य ज्युनियर बास्केटबॉल स्पर्धा आयोजित

✳ एसएआय एसटीसी धारवाड जिंकली कर्नाटक राज्य ज्युनियर बास्केटबॉल स्पर्धा

✳ सर्बियात तिसर्‍या ज्युनियर नेशन्स बॉक्सिंग टूर्नामेंट

✳ भारतीय पुरुष संघाने तिसर्‍या ज्युनियर नेशन्स बॉक्सिंग स्पर्धेत 11 पदके जिंकली

✳ राज्य पर्यटन मंत्री परिषद नवी दिल्ली येथे आयोजित

✳ नवी दिल्ली येथे एनसीटीई आयोजित शिक्षक शिक्षणावरील आंतरराष्ट्रीय परिषद

✳ दिव्यांग सतेंद्रसिंग लोहिया अमेरिकेच्या कॅटालिना चॅनेलला पार करणारा पहिला आशियाई जलतरणपटू ठरला

✳ मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बाबूलाल गौर यांचे निधन

✳ राष्ट्रीय संसाधन कार्यक्षमता धोरण 2019 चा मसुदा प्रसिद्ध झाला

✳ एसएमव्हीडीयूने राष्ट्रीय सौर मोहीम साध्य करण्यासाठी एनआयएसई सह सामंजस्य करार केला

✳ बीजिंगमध्ये भारत आणि चीन यांच्यात संरक्षण चर्चा

✳ भारतीय-अमेरिकन नवनीथ मुरली विजयी 2019 दक्षिण आशियाई स्पेलिंग बी स्पर्धा

✳ केमिकल अभियांत्रिकी व तंत्रज्ञानासाठी देशाची पहिली संस्था मिळविण्यासाठी गुजरात

✳ पेटीएमचे अध्यक्ष म्हणून सीएफओ मधुर देवरा पदोन्नती झाली

✳ कर्नाटक सरकारने निकोटाईनचे "वर्ग एक विष" म्हणून वर्गीकरण केले

✳ आयओसीएल वोन डोलो -650 बंगळुरू चषक अखिल भारतीय हॉकी स्पर्धा 2019

✳ मुख्य वैज्ञानिक के. थंगराज यांनी वर्ष 2019 साठी जेसी बोस फेलोशिप जिंकला.

अभिनेते अशोक सराफ स्वच्छ भारत मिशनचे ब्रँड ॲम्बेसिडर ठरले

◼️स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला आहे. ही स्वच्छता शाश्वत स्वरुपात टिकविण्यासाठी ग्रामीण भागात व्यापक प्रसिद्धीसाठी व ग्रामीण जनतेच्या वर्तन बदलासाठी ज्येष्ठ सिने अभिनेते अशोक सराफ ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून काम करणार आहेत.

◼️2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या कार्यक्रमाची सुरुवात झाली.

◼️2 ऑक्टोबर 2019 ऐवजी 18 एप्रिल 2018 रोजीच ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त घोषित करण्यात आला.

◼️34 जिल्हे, 351 तालुके व 27 हजार 667 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त घोषित केल्या.

◼️स्वच्छ भारत मिशनअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी यापूर्वी चार हजार रुपये इतके अनुदान देण्यात येत होते. ते आते आता बारा हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते.

दिनांक 21 ऑगस्ट 2019 प्रश्न आणि उत्तरे

📌ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या माजी गोलंदाजांना मेरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC) याचे मानद आजीवन सभासदत्व बहाल केले गेले?

(A) शेन वॉर्न
(B) नॅथन लियोन
(C) मिशेल जॉन्सन✅✅✅
(D) मिशेल स्टार्क

📌19 ऑगस्टला निधन झालेल्या ज्येष्ठ संगीतकाराचे नाव काय होते?

(A) मोहम्मद जहूर 'खय्याम' हाशमी✅✅✅
(B) नौशाद
(C) रवी शंकर
(D) मदन मोहन

📌कोणत्या खेळाडूने 2019 सालाचा राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार जिंकला आहे?

(A) बजरंग पुनिया✅✅✅
(B) शिखर धवन
(C) सुनील छेत्री
(D) मिताली राज

📌ग्रीनपीस या संस्थेच्या मते, कोणता देश जगात सर्वाधिक मानवनिर्मित सल्फर डायऑक्साइड (SO2) उत्सर्जित करणारा देश आहे?

(A) जर्मनी
(B) संयुक्त राज्ये अमेरिका
(C) स्वित्झर्लंड
(D) भारत✅✅✅

📌19 ऑगस्टला निधन झालेल्या बिहारच्या माजी मुख्यमंत्रीचे नाव काय होते?

(A) अचल त्यागी
(B) जगन्नाथ मिश्रा✅✅✅
(C) ए. के. मिश्रा
(D) देवेश्वर दत्त

📌2019 साऊथ एशियन स्पेलिंग बी कोंटेस्ट नावाची स्पर्धा जिंकणार्‍या भारतीय वंशाच्या अमेरीकावासीचे नाव ओळखा.

(A) नवनीत मुरली✅✅✅
(B) दिपक गुप्ता
(C) सुधीर वर्मा
(D) नलिन गुप्ता

📌एसो अल्बेन कोणत्या क्रिडाप्रकारासाठी ओळखला जातो?

(A) कुस्ती
(B) हॉकी
(C) सायकलिंग✅✅✅
(D) टेबल टेनिस

इमाव, साशैमाप्र, विजाभज, विमाप्र विभागासाठी उपसचिव पदाच्या निर्मितीस मान्यता

🔳राज्यात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या इतर मागास वर्ग, सामाजिक-शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग विभागासाठी उपसचिव पदाच्या निर्मितीस आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

🔳 इमाव, साशैमाप्र, विजाभज, विमाप्र विभागाकडे पूर्वीच्या 16 योजनांसह मराठा आरक्षण, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग कल्याण, राज्‍य मागास आयोग, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) यासह इतर संबधित विषय तसेच धनगर समाजासाठीच्या 22 योजना नुकत्याच वर्ग करण्यात आल्या आहेत.

🔳 तसेच विभागांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) स्थापन करण्यात आली आहे. विभागाकडील कामाच्या वाढत्या प्रमाणामुळे नवीन पद निर्मितीस मान्यता देण्यात आली आहे. नवीन पदनिर्मितीमुळे विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी अधिक वेगाने होण्यास मदत होणार आहे.

सर सिडने यांचा रौलट कायदा [१९१९]


* यालाच काळा कायदा किंवा Black Act असे म्हणतात

* राजद्रोही व्यक्तीवरील खटले हायकोर्टातील तीन न्यायाधीशांच्या विशेष न्यायालयात चालविण्याची तरतूद केली.

* या न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर कोणत्याही कोर्टात अपील करता येत नाही.

* कोणत्याही व्यक्तीला केवळ संशयावरून देखिल अटक करून त्याच्यावरती राजद्रोहाचा आरोप लावला गेला होता.

* ब्रिटीश पोलिस कोणत्याही व्यक्तीला वारंटशिवाय देखील अटक करू शकत होते.

* कोणत्याही व्यक्तीची किंवा त्याच्या घराची ब्रिटीश पोलिस केव्हाही झडती घेत होते.

* थोडक्यात रौलट नावाच्या अधिकाराच्या अहवालानुसार ब्रिटीश शासनाने तयार केलेले कायदे हे व्यक्तीस्वातंत्र्याची पायमल्ली करणारे कायदे होते.

 

भारताकडून सर्वाधिक 'एसओ२' उत्सर्जन

👉कोळसा जाळून सल्फर डायऑक्साइडचे (एसओ२) उत्सर्जन करणारा भारत हा जगातील सर्वांत मोठा देश असल्याचा दावा 'ग्रीनपीस' या स्वयंसेवी संस्थेने 'नासा'च्या पाहणीचा हवाला देऊन केला आहे.

👉'नासा'ने ही पाहणी केली असून, त्यासाठी ओझोन मॉनिटरिंग इन्स्ट्रुमेंट (ओएमआय)चा वापर करण्यात आला.

👉त्यात 'एसओ२'चे सर्वाधिक उत्सर्जन करणारी जगातील प्रमुख ठिकाणांची पाहणी करण्यात आली.

👉 त्यापैकी भारत हा सर्वाधिक १५ टक्के 'एसओ२'चे उत्सर्जन करत असल्याचे म्हटले असल्याचे 'ग्रीनपीस'ने म्हटले आहे.

👉भारतात मध्य प्रदेशातील सिंगरौली, तमिळनाडूतील नेवेली आणि चेन्नई, ओडिशातील तल्चेर आणि झारसुगुडा, छत्तीसगडमधील कोरबा, गुजरातेतील कच्छ, तेलंगणातील रामागुंडम आणि महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि कोराडी येथे सर्वाधिक उत्सर्जन होत असल्याचे या पाहणीत आढळले.

👉हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी भारतातील बहुतेक प्रकल्पांमध्ये तंत्रज्ञानाचा अभाव असल्याचेही या पाहणीच्या विश्लेषणात आढळले.

👉जगातील सर्वाधिक 'एसओ२'चे उत्सर्जन रशियातील नोरिल्सक स्मेल्टर कॉम्प्लेक्स येथे होते.

👉त्या पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेतील क्रील आणि इराणमधील झाग्रोझ या ठिकाणांचा समावेश आहे.

👉मात्र 'एसओ२'चे उत्सर्जन करणारी अधिक ठिकाणे भारतात असल्याने भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे.

ISRO चे बंगळुरूमध्ये एसएसएएम (SSAM) केंद्र.


● भारतीय अवकाश संशोधन संघटनेने (इस्रो) नुकतीच कर्नाटकच्या बेंगळुरूमध्ये पिन्या(Peenya) येथे एसएसएएम SSAM (Space Situational Awareness Control Centre) (अंतराळ परिस्थिती जागरूकता नियंत्रण केंद्र) पायाभरणी केली.

◆ उद्देश : अंतराळात पसरलेल्या कचऱ्यापासून भारतीय उपग्रहांचे संरक्षण करणे आहे.

SSAM (Space Situational Awareness Control Centre)

● हे केंद्र भारतीय उपग्रहांना निष्क्रीय उपग्रहांपासून संरक्षण देण्यासाठी खूप प्रभावी ठरेल,तसेच यातून हवामानाविषयी माहिती सुद्धा दिली जाईल.

● हे केंद्र निष्क्रिय उपग्रहांविषयी डेटा संकलित करेल. यामुळे अवकाशात पसरलेला कचरा काढून टाकण्यास मदत मिळेल.

● सध्या इस्रोकडे जवळपास 50 उपग्रह कार्यरत आहेत, हे उपग्रह संप्रेषण, नेव्हिगेशन आणि निगराणीसाठी वापरले जातात.

● याआधी इस्रो, अवकाशात पसरलेल्या कचऱ्याशी संबंधित माहिती व देखरेखीसाठी उत्तर अमेरिका एरोस्पेस डिफेन्स कमांड (NORAD) वर अवलंबून होते.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था

● 1962 ला (Indian National Committee for Space Research (INCOSPAR))भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन समितीची स्थापना अणूऊर्जा विभागातंर्गत केली.

● 1969 मध्ये INCOSPAR चे रूपांतर ISRO मध्ये केले गेले.

● 1972 मध्ये भारत सरकारने 'अंतराळ आयोग' आणि 'अंतराळ विभाग' तयार केला व इस्रो हे अंतरिक्ष विभागाच्या(DOS) नियंत्रणाखाली आले.

● इस्रोची व्यावसायिक शाखा: अँट्रिक्स.

● भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (इस्रो) व्यावसायिक विभाग असलेल्या 'अँट्रिक्स कॉर्पोरेशन'ने मागील तीन वर्षांत 239 उपग्रह प्रक्षेपित केले आणि यातून सुमारे 6289 कोटी रुपयांचा महसूल मिळाला.

● सरकारने ६ मार्चला अंतराळ विभागाच्या (डीओएस) प्रशासकीय नियंत्रणाखाली न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) या कंपनीची स्थापना केली आहे.याद्वारे 'इस्रो'ची केंद्र आणि अंतराळ विभागाच्या शाखांतील संशोधन आणि विकासाला व्यावसायिकदृष्ट्या चालना देण्यात येणार आहे.

● इसरो चेअरमन: के सिवन.(15 जानेवारी 2018 पासून)

स्रोत: THE HINDU, ISRO OFFICIAL WEBSITE, महाराष्ट्र टाइम्स.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा – मर्झबान पटेल यांना द्रोणाचार्य तर नितीन किर्तने यांना ध्यानचंद पुरस्कार


महाराष्ट्रातील मर्झबान पटेल यांना हॉकीतील योगदानासाठी द्रोणाचार्य जीवनगौरव तर नितीन किर्तने यांना टेनिस मधील योगदानासाठी ध्यानचंद पुरस्कार जाहीर झाला आहे.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या वतीने आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०१९ ची घोषणा करण्यात आली.

यंदाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पॅरा ॲथलेटिक खेळाडू दीपा मलिक या दोघांना जाहीर झाला आहे. तर द्रोणाचार्य पुरस्कारासाठी तीन प्रशिक्षकांची निवड करण्यात आली आहे.

अर्जुन पुरस्कारासाठी १९ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तर तीन ज्येष्ठ खेळाडूंना ध्यानचंद पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. दोन संस्थांना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाले आहेत .

तर चंदीगडच्या पंजाब विद्यापीठाला ‘मौलाना अबूल कलाम आझाद चषक’ जाहीर झाला आहे.

गेल्या चार दशकांपासून गरीब मुलांना हॉकीचे नि:शुल्क प्रशिक्षण देताहेत मर्झबान पटेल

हॉकी प्रशिक्षक म्हणून निवृत्त झाल्यानंतर मुर्झबान पटेल हे गेल्या चार दशकांपासून मुंबईत गोरगरीब मुलांना हॉकीचे मोफत प्रशिक्षण देत आहेत. युवराज वाल्मीकी, ॲड्रीन डिसुजा, देवेंद्र वल्मिकी , गॅवीन फरेरा आदी ऑलिम्पिक हॉकी खेळाडू मर्झबान पटेल यांच्या तालमीत घडले आहेत. मर्झबान पटेल यांनी हॉकी प्रशिक्षक म्हणून दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन त्यांना द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे .

नितीन किर्तने यांच्या टेनिस खेळातील योगदानाची दखल

मुंबईतील नितीन किर्तने यांनी वयाच्या 5 व्या वर्षापासूनच टेनिस खेळायला सुरुवात केली. त्यांनी देश-विदेशातील मानाच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेत देशाचे प्रतिनिधीत्व केले. डावखुरे खेळाडू असणारे किर्तने यांनी एकेरी आणि दुहेरी टेनिस स्पर्धेत सहभाग घेवून उत्तम रँकींग मिळविली आहे. टेनिसमधील त्यांच्या योगदानासाठी त्यांना ध्यानचंद पुरस्कार जाहीर झाला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना प्रशिक्षण देणाऱ्या विविध क्रीडा क्षेत्रातल्या प्रशिक्षकांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड केली जाते.

क्रीडा क्षेत्रात मोठं योगदान देणाऱ्यांना ध्यानचंद पुरस्काराने गौरविण्यात येते

Latest post

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती

०१) महाराष्ट्रातील नेहरू स्टेडियम कोठे आहे ? - पुणे. ०२) अँल्युमिनियम हा धातू कोणत्या खनिजापासून तयार केला जातो ? - बाॅक्साईट. ०३) डाॅ.पंजाब...