Saturday 27 February 2021

रिअर ऍडमिरल एस. व्यंकटरमण यांनी गोव्याच्या नौदल युद्ध महाविद्यालयाचा कार्यभार स्वीकारला.



🔰रिअर ऍडमिरल एस. व्यंकटरमण, विशिष्ट सेवा पदक यांनी शुक्रवारी गोव्यात, भारतीय नौदलाच्या प्रतिष्ठित नौदल युद्ध महाविद्यालयाच्या प्रमुख म्हणून  कार्यभार स्वीकारला. रिअर ऍडमिरल संजय जसजीत सिंह , अति विशिष्ट सेवा पदक,एनएम यांच्याकडून ऍडमिरल यांनी नौदलाच्या सर्वोच्च प्रशिक्षण संस्थेचा कार्यभार स्वीकारला.

 

🔰रणनितीक आणि कार्यात्मक विचारांच्या संस्कृतीला चालना देण्याच्या दृष्टीने,संरक्षण नियोजन, सामरिक आणि  कार्यात्मक विषयांवर परदेशी सहभागींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी हे  नौदल युद्ध  महाविद्यालय  प्रशिक्षण आयोजित करते.


🔰रियर ऍडमिरल व्यंकटरमण हे राष्ट्रीय संरक्षण अकादमी खडकवासलाचे माजी विद्यार्थी आहेत. ते कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स युद्ध पद्धतीत तज्ञ आहेत.1 जानेवारी 1990 रोजी सेवेत रुजू झालेल्या व्यंकटरमण यांची भारतीय नौदलाच्या आघाडीच्या युद्धनौकांवर विविध ठिकाणी नियुक्ती झाली आहे.


🔰तयांच्या समुद्रातील कार्यकाळात आय एन एस तबार या विनाशिकेवर त्यांनी काम केले आहे. गोव्यात कार्यभार स्वीकारण्यापूर्वी ते नौदल मुख्यालयातील नौदल गुप्तहेर संचालनालयाचे प्रमुख होते.


🔰सरक्षण व्यवस्थापन महाविद्यालयातून व्यवस्थापन अभ्यासक्रमात संरक्षण आणि रणनितिक अभ्यासक्रमात  पदव्युत्तर पदवीसह अनेक पदव्युत्तर अभ्यासक्रम कार्यक्रम त्यांनी पूर्ण केले आहेत.

ग्रीन कार्ड’वरील बंदीचा निर्णय बायडेन यांच्याकडून रद्द.



🔰अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना साथीच्या काळात अनेक ग्रीन कार्ड अर्जदारांचा अमेरिकेतील प्रवेश रोखला होता, मात्र नवे अध्यक्ष जो बायडेन यांनी ट्रम्प यांचा हा धोरणात्मक निर्णय रद्द केल्याने आता अमेरिकेत एच-१बी व्हिसावर काम करणाऱ्या अनेक भारतीयांना बायडेन यांच्या निर्णयामुळे लाभ होणार आहे.


🔰गरीन कार्ड हे अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्यास मुभा असलेले अधिकृत कार्ड म्हणून ओळखले जाते. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय व्यावसायिक मुख्यत्वे एच-१बी व्हिसा घेऊन अमेरिकेत येतात. मात्र सध्याच्या इमिग्रेशन पद्धतीचा त्यांना मोठा फटका बसत होता.


🔰गरीन कार्ड अर्जदारांना देशात पुन्हा प्रवेश खुला करताना जो बायडेन यांनी म्हटले आहे की, माजी अध्यक्ष ट्रम्प यांच्या धोरणामुळे अमेरिकेच्या हिताची जपणूक होत नव्हती. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकेतील जे उद्योगसमूह जगभरातील गुणवत्तेचा वापर करून घेत होते त्यांचीही हानी होत होती, असेही बायडेन यांनी म्हटले आहे.

लव्ह जिहाद’ विरुद्ध गुजरातमध्ये लवकरच कायदा.



🔰हिंदू मुलींचे अपहरण आणि धर्मातर थांबवण्यासाठी आपले सरकार ‘लव्ह जिहाद’ विरुद्ध कायदा करेल, असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी गुरुवारी एका निवडणूक प्रचार सभेत सांगितले.


🔰राज्य विधानसभेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतचे विधेयक मांडण्याच्या इराद्याचा रुपाणी यांनी पंचमहाल जिल्ह्य़ातील गोध्रा येथे पुनरुच्चार केला. ‘लव्ह जिहाद’ म्हणजे हिंदू महिलांचे विवाहाच्या माध्यमातून धर्मातर करण्याच्या कथित कारस्थानाविरोधात मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातील भाजप सरकारांनी यापूर्वी कायदे केले आहेत.


🔰‘विधानसभेचे अधिवेशन १ मार्चपासून सुरू होत असून, लव्ह जिहादच्या विरोधात कठोर कायदा करण्याची माझ्या सरकारची इच्छा आहे. हिंदू मुलींच्या अपहरणाचे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. महिलांना प्रलोभन दाखवून त्यांचे धर्मातर करण्यात येते. असे प्रकार थांबवणे हा या नव्या कायद्याचा उद्देश आहे’, असे रुपाणी म्हणाले.


🔰राज्यात २८ फेब्रुवारीला होत असलेल्या नगरपालिका, तालुका व जिल्हा पंचायत निवडणुकांसाठी रुपाणी सध्या प्रचार करत आहेत. राज्यातील भाजप सरकार अशा प्रकारचा कायदा करणार असल्याचे त्यांनी १५ फेब्रुवारीला सर्वप्रथम जाहीर केले होते. भाजपचे आमदार शैलेश मेहता व पक्षाचे बडोद्याच्या खासदार रंजनाबेन भट्ट यांनी यापूर्वी उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशच्या धर्तीवर असा कायदा करण्याची मागणी केली होती.

इंधन दरवाढ हे धर्मसंकट; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य.



🔰केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी एका कार्यक्रमामध्ये इंधन दरवाढीसंदर्भात एक भाष्य केलं आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती कधी कमी होतील हे आपल्याला सांगता येणार नाही असं सीतारामन यांनी म्हटलं आहे. तसेच पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किंमती या धर्मसंकट असल्याचेही निर्मला यांनी म्हटलं आहे.


🔰अहमदाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये पेट्रोल, डिझेलच्या किंमती कधी कमी होणार यासंदर्भातील प्रश्नावर, “मला नाही संगता येणार ‘कधी’.. हे धर्मसंकट आहे,” असं उत्तर दिलं.


🔰“यावर केवळ उपकर आकारला जातो असं नाही. केंद्राकडून आकरले जाणारे उत्पादन शुल्क तसेच राज्यांकडून आकारला जाणारा व्हॅटही यामध्ये असतो. त्यामुळे यामधून महसूल मिळतो हे काही लपवण्यासारखी गोष्ट नाही. केवळ मलाच नाही तुम्ही कोणत्याही राज्याला विचारलं तरी यात महसूल आहे असं ते सांगतील,” असंही निर्मला यांनी म्हटलं.


🔰या इंधन दरवाढीवर मार्ग काढण्याचा एकमेव उपाय म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारांनी चर्चा करावी हा आहे, असंही निर्मला यांनी म्हटलं. “यासंदर्भात काहीतरी करणं गरजेचे आहे हे मला मान्य आहे. आम्हाला काय करणं शक्य आहे पाहुयात,” असंही निर्मला यांनी ग्राहकांना अधिक पैसे द्यावे लागू नयेत असं मत मांडताना म्हटलं आहे.

नेपाळचे पंतप्रधान ओली राजीनामा देण्यास अनुत्सुक.



🔰नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली हे लगेच राजीनामा देणार नाहीत, तर येत्या दोन आठवडय़ांत संसदेला सामोरे जाऊन सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करतील, असे ओली यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.


🔰ससदेचे २७५ सदस्यांचे कनिष्ठ सभागृह विसर्जित करण्याचा ओली सरकारचा निर्णय ‘घटनाविरोधी’ असल्याचा निर्णय सरन्यायाधीश चोलेंद्र शमशेर यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापीठाने मंगळवारी दिला होता. येत्या १३ दिवसांच्या आत सभागृहाचे अधिवेशन बोलवावे, असाही आदेश न्यायालयाने ओली यांना दिला होता.


🔰सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षात (एनसीपी) सत्तासंघर्ष सुरू असतानाच, पंतप्रधान ओली यांच्या शिफारशीवरून राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी २० डिसेंबरला ‘प्रतिनिधी सभा’ हे संसदेचे कनिष्ठ सभागृह विसर्जित करून ३० एप्रिल व १० मे रोजी नव्याने निवडणुका घेण्याची घोषणा केली होती. यामुळे देशात राजकीय संकट उद्भवले.


🔰दोन आठवडय़ांच्या आत अधिवेशन होणार असलेल्या संसदेला सामोरे जाऊन, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा ओली यांचा मनोदय आहे, अशी माहिती त्यांचे माध्यम सल्लागार सूर्य थापा यांनी दिली.

जागतिक स्पर्धेची अंतिम फेरी महत्त्वाची.



🔰महान अष्टपैलू कपिलदेव यांच्या १३१ कसोटींचा विक्रम मोडण्याचा अद्याप विचारही केला नसून सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताला पोहोचविण्याचे एकमेव ध्येय माझ्यासमोर आहे, अशी प्रतिक्रिया अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माने व्यक्त केली.


🔰मोटेरा येथील सरदार पटेल स्टेडियमवर भारत-इंग्लंड यांच्यातील गुलाबी चेंडूने खेळल्या जाणाऱ्या प्रकाशझोतातील तिसऱ्या कसोटीला बुधवारपासून प्रारंभ होणार आहे. इशांतच्या कारकीर्दीतील हा १००वा कसोटी सामना असणार आहे.


🔰कपिल यांच्यानंतर १०० कसोटी खेळणारा इशांत हा भारताचा दुसराच वेगवान गोलंदाज ठरणार आहे. त्याशिवाय कपिल यांच्या १३१ कसोटींचा विक्रम मोडण्याचीही संधी इशांतला आहे. याविषयी इशांत म्हणाला, ‘‘कपिल यांच्या विक्रमाविषयी मी अद्याप विचारही केलेला नाही. भारतासाठी १००वी कसोटी खेळण्याची संधी मिळणे, हीच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. सध्या मी ३२ वर्षांचा असून एकाच प्रकारात भारतासाठी खेळत असल्याने तंदुरुस्ती टिकवण्याबरोबरच जोपर्यंत स्वत:चे १०० टक्के योगदान देऊ शकेन, तोपर्यंत निवृत्तीचाही विचार करणार नाही.’’


🔰‘‘जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका फार महत्त्वपूर्ण असल्याने मी सध्या भारताला कशाप्रकारे जिंकवता येईल, याचाच विचार करत आहे. कारकीर्दीत मी एकदाही विश्वचषक खेळलो नाही. त्यामुळे आम्ही जर जागतिक स्पर्धा जिंकली, तर अन्य खेळाडू ज्याप्रमाणे विश्वचषक विजयाचा जल्लोष करतात त्याचप्रमाणे मीसुद्धा या जेतेपदाचा आनंद साजरा करेन,’’ असेही इशांतने सांगितले.

संरक्षण उत्पादन क्षमता वाढवण्यास भारत वचनबद्ध.


🔰भारताला पूर्वीच्या काळापासून शस्त्रे व लष्करी साधने बनवण्याचा अनुभव होता. स्वातंत्र्यानंतर देशाला ही क्षमता वाढवता आली नाही. परंतु आता आम्ही संरक्षण उत्पादन क्षमता वाढवण्यास वचनबद्ध आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.


🔰कद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींची योग्य अंमलबजावणी करण्याबाबतच्या एका वेबिनारमध्ये ते बोलत होते. सरकारला देश संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याची अपेक्षा आहे. स्वातंत्र्यापूर्वी आपल्याकडे शस्त्रे व लष्करी सामग्री निर्मितीच्या क्षमता होत्या.


🔰जागतिक महायुद्धांमध्येही भारताने मोठय़ा प्रमाणात शस्त्रांची निर्यात केली होती, पण स्वातंत्र्यानंतर अनेक कारणांनी संरक्षण उत्पादन क्षमतेत भारत मागे पडत गेला. आपल्याला अगदी लहान शस्त्रेही परदेशांकडून विकत घेण्याची वेळ आली. भारत हा शस्त्रांचा मोठा आयातदार देश बनला, पण ही अभिमानाची बाब नाही. भारतातील लोकांकडे संरक्षण उत्पादनाची क्षमता नाही असा भाग नाही, ते वाढवता येऊ शकते पण आधीच्या काळात शस्त्रांची आयात करण्यात आली.


🔰भारतात आता परिस्थिती बदलत असून संरक्षण सामग्री उत्पादन वाढवण्यास सरकार वचनबद्ध आहे. निर्यात उत्तेजन, परदेशी गुंतवणूक उदारीकरण याच्या माध्यमातून सरकारने संरक्षण उत्पादन वाढीस चालना दिली आहे. संरक्षणप्रमुख पद निर्माण करून भारताने संरक्षण उत्पादन खरेदी प्रक्रियेत समन्वय साधला आहे. त्यामुळे आता नवीन संरक्षण शस्त्र सामुग्रीची निर्मिती शक्य झाली आहे.

ब्रिक्स’ यजमानपदासाठी भारताला चीनचा पाठिंबा.



🔰ब्रिक्स शिखर परिषदेचे या वर्षीचे यजमानपद भारताने स्वीकारण्यास चीनने पाठिंबा दर्शविला असून पाच सदस्य असलेल्या देशांमधील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी भारतासमवेत काम करण्याची तयारीही दर्शविली आहे. पूर्व लडाखमधून भारत आणि चीन यांनी आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केल्यानंतर चीनने भारताला पाठिंबा दर्शविला आहे.


🔰भारताने २०२१ च्या ब्रिक्स शिखर परिषदेचे (ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका) अध्यक्षपद स्वीकारण्याचे गृहीत धरले असून त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी १९ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या सुषमा स्वराज भवनातील ब्रिक्स सचिवालयात भारताचे ब्रिक्स २०२१ संकेतस्थळ सुरू केले.


🔰यावर्षीच्या ब्रिक्स परिषदेचे यजमानपद भारताने स्वीकारण्याचे ठरविले आहे त्या बाबत विचारले असता चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी, भारताने ब्रिक्सचे यजमानपद स्वीकारण्यास चीनचा पाठिंबा असल्याचे, सांगितले.


🔰बरिक्स हा आता आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये सकारात्मक, स्थिर आणि रचनात्मक शक्ती आहे, असे ते म्हणाले. मात्र, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग शिखर परिषदेला उपस्थिती राहणार आहेत का, त्याबाबत वांग यांनी कोणतेही भाष्य केले नाही.

सर्वच भरती प्रक्रिया लोकसेवा आयोगामार्फत राबविण्याचा सरकारचा विचार



महाराष्ट्रातील विविध विभागातील रखडलेल्या नोकरभरती संदर्भात मोठी अपडेट समोर आली असून केवळ क्लासवन अधिकारीच नाही तर चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या नोकरभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत मार्फत घेण्याचा विचार राज्य सरकार करत असून यासाठी राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी यासंदर्भात विविध विभागांच्या सचिवांची बैठक बोलविली आहे.


सध्या आयोगामार्फत वर्ग एक आणि वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांचीच निवड केली जाते तर अराजपत्रित ब, क आणि ड संवर्गातील पदांची भरती दुय्यम सेवा निवड मंडळांमार्फत केली जात असून यापुढे ही भरती निवड मंडळांऐवजी  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याचा सरकाराच प्रस्ताव विचाराधीन असून कोणत्या संवर्गांची नोकरभरती आयोगामार्फत करता येईल, याची चाचपणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले असून त्या अनुषंगानेच फेब्रुवारी महिन्यातच मुख्य सचिव सदरील बैठक घेणार आहेत.


यापूर्वी दुय्यम सेवा निवड मंडळाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी वा विभागीय आयुक्त हे असतात आणि या दुय्यम निवड मंडळाला भरती प्रक्रियेत साहाय्य करण्यासाठी अलीकडेच तीन कंपन्यांची नव्याने नियुक्ती सामान्य प्रशासन विभागाने केली असली तरी मात्र विश्वासार्हता आणि पारदर्शकतेसाठी दुय्यम सेवा मंडळाच्या अखत्यारीतील निवड प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे समजते.

वन सर्वेक्षण अहवालातील महत्वाच्या बाबी



सर्वाधिक बांबू क्षेत्र असलेली पहिली चार राज्ये

             

               1. मध्य प्रदेश

               2.महाराष्ट्र

               3.अरुणाचल प्रदेश

               4. ओडिसा


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


कांदळवन क्षेत्र (mangrove cover) सर्वाधिक असलेली राज्ये


              1.पश्चिम बंगाल

              2.गुजरात

              3.अंदमान व निकोबार बेटे

              4.आंध्र प्रदेश

              5.महाराष्ट्र


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


कार्बन साठा सर्वाधिक असलेली राज्ये


               1. अरुणाचल प्रदेश

               2. मध्य प्रदेश

               3. छत्तीसगड

               4.महाराष्ट्र


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


सर्वाधिक वनक्षेत्र (क्षेत्रफळानुसार) असलेली राज्ये


              1. मध्य प्रदेश

              2.आंध्र प्रदेश

              3. छत्तीसगड

              4.ओडिसा

              5.महाराष्ट्र


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


सर्वाधिक वनक्षेत्र ( टक्केवारी नुसार) असलेली राज्ये


             1.मिझोराम

             2.अरुणाचल प्रदेश

             3.मेघालय




🔥 सर्वाधिक वेळा मिझोराम राज्यात वणवे निदर्शनास आले.(forest fire alert)

राज्य आणि राज्यसभा सदस्य संख्या


𝟏. अरूणाचल प्रदेश(𝐀𝐑 ) 𝟏              


 𝟐. आसाम (𝐀𝐒 ) 𝟕                             


 𝟑. आंध्र प्रदेश(𝐀𝐏 ) 𝟏𝟏                     


 𝟒. उत्तर प्रदेश(𝐔𝐏 ) 𝟑𝟏                     


 𝟓. उत्तराखंड(𝐔𝐓𝐊 ) 𝟑                     


 𝟔. ओडिशा(𝐎𝐑 ) 𝟏𝟎                        


 𝟕. कर्नाटक(𝐊𝐀𝐑 ) 𝟏𝟐                     


 𝟖. केरल(𝐊𝐑 ) 𝟗                              


 𝟗. गुजरात(𝐆𝐉 ) 𝟏𝟏                        


 𝟏𝟎. गोवा(𝐆𝐎𝐀 ) 𝟏                        


 𝟏𝟏. छत्तीसगढ़(𝐂𝐇𝐓 ) 𝟓                 


 𝟏𝟐. जम्मू-कश्मीर(𝐉 & 𝐊 ) 𝟒            


 𝟏𝟑. झारखंड(𝐉𝐇𝐊 ) 𝟔                   


 𝟏𝟒. तमिलनाडु(𝐓𝐍 ) 𝟏𝟖                 


 𝟏𝟓. त्रिपुरा(𝐓𝐑 ) 𝟏                         


 𝟏𝟔. तेलंगाना(𝐓𝐆 ) 𝟕                      


 𝟏𝟕. नागालैंड(𝐍𝐆 ) 𝟏                     


 𝟏𝟖. निर्वाचित सदस्य (𝐍𝐎𝐌. ) 𝟏𝟐               


💥 𝙎𝙃𝘼𝙍𝙀 & 𝙎𝙐𝙋𝙋𝙊𝙍𝙏 💥


 𝟏𝟗. पंजाब(𝐏𝐁 ) 𝟕                         


 𝟐𝟎. पुडुचेरी(𝐏𝐔𝐃 ) 𝟏                     


 𝟐𝟏. पश्चिमी बंगाल(𝐖𝐁 ) 𝟏𝟔            


 𝟐𝟐. बिहार(𝐁𝐑 ) 𝟏𝟔                       


 𝟐𝟑. मेघालय(𝐌𝐆𝐇 ) 𝟏                  


 𝟐𝟒. मणिपुर(𝐌𝐍 ) 𝟏                      


 𝟐𝟓. मध्य प्रदेश(𝐌𝐏 ) 𝟏𝟏                


 𝟐𝟔. महाराष्ट्र(𝐌𝐇 ) 𝟏𝟗                   


 𝟐𝟕. मिज़ोरम(𝐌𝐙 ) 𝟏                     


 𝟐𝟖. राजस्थान(𝐑𝐉 ) 𝟏𝟎                   


 𝟐𝟗. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र,दिल्ली(𝐃𝐋 ) 𝟑

 

𝟑𝟎. सिक्किम(𝐒𝐊 ) 𝟏                     


 𝟑𝟏. हरियाणा(𝐇𝐑 ) 𝟓                     


 𝟑𝟐. हिमाचल प्रदेश(𝐇𝐏 ) 𝟑


Total - 245 ✔️

चंद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी



◾️23 जुलै 1906 ते  27 फेब्रुवारी 1931


 ◾️ राम प्रसाद बिस्मिल च्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) या क्रांतिकारी संघटनेची हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली.


◾️ तयांना भगत सिंग यांचे गुरू मानले जाते व ते HSRA चे प्रमुख होते.


◾️सघटना:- कीर्ति किसान पार्टी, नवजवान किसान सभा


◾️1921 मध्ये म. गांधींच्या असहकार आंदोलनात 15 व्या वर्षी चंद्रशेखरने सहभाग घेतला होता. 


◾️तयासाठी त्याला अटक झाली होती. तेव्हा न्यायालयात चंद्रशेखरने आपले आडनाव 'आझाद' असल्याचे नोंदवले


◾️सायमन कमिनला विरोधादरम्यान लाठीहल्यात लाला लजपतराय यांचे निधन


◾️बदला म्हणुन लाहोर चा SP जेम्स स्कॉट ला मारण्याचा कट रचला


◾️या कटात भगतसिंग, जय गोपाल, राजगुरु, आझात होते


◾️जम्स स्कॉट एेवजी सॉंडर्स हा

 अधिकारी मारला गेला


◾️वशांतर करुन राजकोट मार्गे इलाहाबाद येथे दाखल झाले


◾️27 फेब 1931 रोजी अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्क येथे चंद्रशेखर आझाद व पोलिसांमध्ये गोळीबार झाला.

शेवटी स्वत:वर गोळी मारुन घेतली

२७ फेब्रुवारी - कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती


जन्म - २७ फेब्रुवारी १९१२ (पुणे)

स्मृती - १० मार्च १९९९ (नाशिक)


"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन्‌ आशा किनारा तुला पामराला' असे स्पष्टपणे सांगणारी अजरामर कविता लिहिणाऱ्या कविवर्य कुसुमाग्रजांची आज जयंती.


वि.वा.शिरवाडकर हे कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन करत. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्नवं असे त्यांचे वर्णन करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. 


कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस हा "मराठी भाषा दिवस" म्हणून साजरा केला जातो. मराठी साहित्यातील काव्य, कथा, नाटक या सर्व प्रकारात वैपुल्याने भर घालणाऱ्या आणि आपला ठसा उमटविणाऱ्या कुसुमाग्रजांचे मराठी कवितेत एक अढळ स्थान आहे. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. 


कुसुमाग्रज यांचे वडील शेतकरी होते. नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर सोबत, स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. 


कुसुमाग्रजांनी उठा उठा चिऊताई सारख्या किलबिल कविता लिहिल्या तशाच पृथ्वीचे प्रेमगीत सारख्या गहन कविताही लिहिल्या. ’काढ सखे गळ्यातले’ सारखे लडिवाळ शब्दही त्यांचे आणि ’जे भुक्त त्यांची राहते पोटात सारी संस्कृती’ हे स्पष्टोक्तीचे परखड बोलही त्यांचेच. 


या महान साहित्यिकाचा काव्यव्यासंग अथांग असला तरीही कुसुमाग्रजांचे नाव घेताच डोळ्यापुढे उभा राहतो तो एक ओजस्वी क्रांतिकवी आणि कानी ऐकू येतो गगनभेदी जयघोष, ’गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’. कवी कुसुमाग्रज हे खऱ्या अर्थाने ’क्रांतिकवी’. वयाच्या अवघ्या विशीत कुसुमाग्रजांनी अनेक तेजस्वी क्रांतिकाव्ये लिहिली. 


हुतात्मा चंद्रशेखर आझाद, हुतात्मा भगतसिंह, हुतात्मा राजगुरू, हुतात्मा सुखदेव,  हुतात्मा महावीरसिंह या सारखे महात्मे आपले दिव्य करून गेले. क्रांतिकारकारकांच्या बलिदानाची महती गाणारी क्रांतिगीते कुसुमाग्रजांनी लिहिली आणि त्या महात्म्यांची ध्येयगाथा जगाला सांगितली. जे काही ते क्रांतिकारक स्वतः सांगू शकले नव्हते मात्र करून गेले होते ते महान कार्य या क्रांतिकवीने घराघरात व मुखामुखात पोचवले. 


कुसुमाग्रजांचे विशाखा, समिधा, किनारा, हिमरेषा, मराठी माती, वादळवेल, रसयात्रा, छंदोमयी यासारखे कवितासंग्रह आणि नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, कौतेंय या सारख्या नाट्यकृतींचा अभ्यास अजूनही होत आहे. 


‘गर्जा जयजयकार’ सारखी कविता लिहून क्रांतिवीरांना स्फुरण देणाऱ्या कुसुमाग्रजांनी ‘काढ सखे गळ्यातले, चांदण्याचे तुझे हात’ सारखी कविताही लिहिली. ‘नटसम्राट’ मधून नाट्यरसिकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या आणि ‘कल्पनेच्या तीरावर’ सारख्या कादबंरीतून त्यांना खळखळून हसायलाही लावले. 


मा.कुसुमाग्रज यांचे १० मार्च १९९९ रोजी निधन झाले. 


मा.कुसुमाग्रज यांना आदरांजली !

बरिक्स देशांच्या गटाचे नेतृत्व या वर्षी भारताकडे.



🌞 ब्रिक्स देशांच्या गटाचे नेतृत्व या वर्षी भारताकडे असून तीन दिवसांच्या शेरपा बैठ्कीद्वारे भारताच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ आज सुरू झाला. 


🌞 पारपत्र आणि व्हिसा विभागाच्या सचिवांनी बैठकीचे अध्यक्षपद भूषवताना आगामी वर्षासाठीच्या कामांचा आराखडा सादर केला.


🌞 पढच्या दोन दिवसांमध्येही या बैठकीत सदस्य देशांबरोबर उपयुक्त चर्चा होईल, असं विश्वास परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले. 


🌞 बरिक्स हा गट जगभरात प्रभावी ठरत असून तो आणखी वाढवण्यासाठी यजमान असलेला भारत करणार असलेल्या प्रयत्नांना चीनचा पाठींबा असेल, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेनबिन यांनी म्हटलं आहे. 


🌞 चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे भारतात वर्षाच्या अखेरीस आयोजित होणाऱ्या ब्रिक्स परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

भारतीय निवडणूक आयोग



● स्थापना :- २५ जानेवारी १९५०

● मुख्यालय :- नवी दिल्ली

● मुख्यनिवडणूक आयुक्तांची निवड :- 

    राष्ट्रपती - सूनिल अरोरा

● हेल्पलाईन क्रमांक :- १९५०

● स्लोग्न :- देश का महा त्योहार

● पोर्टल :- eci.gov.in

● राज्यघटना भाग :- १५

● कलम :- 324

● आयोग संबधित कलम :- 

   ३२४ - ३२९

● ७३ वी घटना दुरुस्ती :- राज्य निवडणूक 

   आयोगाची स्थापना

● निवडणूक आयोगाची कामे :-

०१) मतदारसंघ आखणे

०२) मतदारयादी तयार करणे

०३) राजकीय पक्षांना मान्यता देणे 

       निवडणूक चिन्हे ठरवणे

०४) उमेदवारपत्रिका तपासणे

०५) निवडणुका पार पाडणे

०६) उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा 

       ताळमेळ लावणे

◆ ६१ वी घटना दुरुस्ती :- १९८८ , 

    मतदार वय २१ वरून १८ करण्यात 

   आले.

◆ अन्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक - 

     राष्ट्रपती - ३२४ (२) - या दोन 

     निवडणूक आयुक्तांना पदावरून 

     काढण्या साठी महाभियोग 

     चालवण्यात येत नाही.

◆ आयोग घटनात्मक, स्थायी, स्वायत्व

नोबेल पुरस्कार २०१९ विजेते



🏆 वद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार २०१९

👤 १) विलियम कैलीन (अमेरिका)

👤 २) ग्रेग सीमेंजा (अमेरिका)

👤 ३) पीटर रैटक्लिफ (ब्रिटन)


🏆 भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार २०१९

👤 १) जेम्स पीबल्स (अमेरिका)

👤 २) माइकल मेयर (स्वित्झर्लंड)

👤 ३) डिडियर क्वेलोज (स्वित्झर्लंड)


🏆 रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०१९ 

👤 १) जॉन बी गुडइनफ (अमेरिका)

👤 २) एम स्टेनली व्हिटिंगम (ब्रिटन)

👤 ३) अकीरा योशिनो (जपान)


🏆 साहित्यातील नोबेल पुरस्कार २०१९

🙎‍♀ १) ओल्गा टोकार्चुक (२०१८) : पोलंड

👤 २) पीटर हैंडका (२०१९) : ऑस्ट्रीया


🏆 शांततेतील नोबेल पुरस्कार २०१९

👤 १) एबे अहमद अली (प्रधानमंत्री : इथिओपिया)


🏆 अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०१९

👤 १) अभिजीत बैनर्जी (अमेरिका)

👤 २) माइकल क्रेमर (अमेरिका)

🙎‍♀ ३) एस्थर डुफ्लो (अमेरिका) .



 नोबेल पुरस्कार २०२० विजेते 👇


🏆 वद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार २०२० 

👤 १) हार्वे अल्टर (अमेरिका)

👤 २) मायकल होउगटन (ब्रिटन)

👤 ३) चार्ल्स राइस (अमेरिका)


🏆 भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०

👤 १) रॉजर पेनरोज (ब्रिटन)

👤 २) रेनहार्ड गेंजेल (जर्मनी)

🙎‍♀ ३) अॅण्ड्रीया गेज (अमेरिका)


🏆 रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२० 

🙎‍♀ १) इमॅन्यूअल शार्पेंची (जर्मनी)

🙎‍♀ २) जेनफिर डाउडना (अमेरिका)


🏆 साहित्यातील नोबेल पुरस्कार २०२० 

🙎‍♀ १) लुईस ग्लुक ( अमेरिका )


🏆 शांततेतील नोबेल पुरस्कार २०२० 

🌾 १) संयुक्त राष्ट्र अन्न सुरक्षा कार्यक्रम


🏆 अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०

👤 १) पॉल आर. मिलग्रोम (अमेरिका)

👤 २) रॉबर्ट बी. विल्सन (अमेरिका)

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...