Wednesday 3 April 2024

Science Top-10 Quiz


Q : ___ निश्चित आकार असतो ? 

(अ) स्थायुला ✅✅

(ब) द्रवाला 

(क) प्लाझ्माला 

(ड) वायूला  



Q :___निश्चित आकार नसतो व आकारमानही नसते ? 

(अ) स्थायुला 

(ब) द्रवाला ✅✅

(क) प्लाझ्माला 

(ड) वायूला  



Q : पाणी  0 अंशसेल्सला____अवस्थेत असते? 

(अ) स्थायू  ✅✅

(ब) वायू 

(क) द्रव 

(ड) पुनर्घटन 



Q : पाण्याचा गोठणबिंदू _आहे? 

(अ) 0 अंश F

(ब) 100  अंश F

(क) 10 अंश F

(ड) 32 अंश F ✅✅



Q : स्थायू पदार्थाचे सरळ वायू पदार्थात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला____ म्हणतात? 

(अ) संघनन 

(ब) बाष्पीभवन 

(क) संप्लवन ✅✅

(ड) वितळणे 



Q : वाफेपासून द्रवाचे थेंब तयार होण्याच्या प्रक्रियेला ___ म्हणतात? 

(अ) संघनन ✅✅

(ब) बाष्पीभवन 

(क) संप्लवन 

(ड) वितळणे 


Q : पाण्याचा  उत्कलनबिंदू _आहे? 

(अ) 112 अंश F 

(ब) 212  अंश F  ✅✅

(क) 102 अंश F

(ड) 202 अंश F 



Q : ____ या पदार्थाला उष्णता दिली असता, त्याचे संप्लवन होत नाही? 

(अ) कापूर 

(ब) अमोनियम क्लोराइड  

(क) फॉस्फरस  ✅✅

(ड) आयोडीन 


Q : उत्कलनबिंदूच्या खाली कोणत्याही तापमानाला द्रवरूप पदार्थाचे रूपांतर वायूरूप पदार्थात होण्याच्या प्रक्रियेला___ असे म्हणतात?  

(अ) संघनन 

(ब) बाष्पीभवन ✅✅

(क) संप्लवन 

(ड) वितळणे 



Q : द्रव्याची ____ही पाचवी अवस्था आहे?  

(अ) प्लाझ्मा 

(ब) बोस-आईन्स्टाईन कंडेनसेट  ✅✅

(क) वायू  

(ड) द्रव 



Q : द्रव्याच्या चौथ्या अवस्थेला_____म्हणतात? 

(अ) द्रव 

(ब) वायू 

(क) प्लाझ्मा  ✅✅

(ड) स्थायू 


Q : ___ रेणू एकमेकांपासून दूर असतात? 

(अ) ऑक्सिजनमधील  ✅✅

(ब) अल्कोहलमधील 

(क) लाकडामधील 

(ड) आयोडिनमधील  


जीवनसत्त्व ड


» या जीवनसत्त्वात ‘ड२’ आणि ‘ड३’ असे प्रकार आहेत. 


» ‘ड२’ जीवनसत्त्वाची रासायनिक नावे अरगोकॅल्सिफेरॉल, कॅल्सिफेरॉल, व्हायोस्टेरॉल अशी आहेत. 


» ‘ड३’ जीवनसत्त्वाचे नाव कोलेकॅल्सिफेरॉल आहे. 


» सर्व प्राण्यांच्या त्वचेमध्ये ७-डीहायड्रोकोलेस्टेरॉल हा पूर्वगामी ‘ड३’जीवनसत्त्व घटक असतो. 


» कोवळ्या सूर्यप्रकाशात अतिनील किरणांमुळे त्याचे कोलेकॅल्सिफेरॉलमध्ये रूपांतर होते. 


» अरगट आणि यीस्ट या कवकांत अरगोस्टेरॉल असते.


» ड जीवनसत्त्व वनस्पतींमध्ये अत्यल्प प्रमाणात असते. 


» सर्व प्राण्यांत ते अल्प प्रमाणात असून जठर आणि यकृतात असते. 


» शार्क व कॉड माशांच्या यकृतापासून मिळविलेल्या तेलात ते असते. 


» रोजच्या आहारातून ड जीवनसत्त्व पुरेसे मिळत नाही. म्हणून यकृत तेल वापरल्यास किंवा उन्हात बसल्यास ड जीवनसत्त्वाची कमतरता भरून निघते. 


» प्रौढ व्यक्तीला दररोज १५ मिग्रॅ. ड जीवनसत्त्व आवश्यक असते. 


» त्याचे कार्य आणि परावटू ग्रंथीतील पॅराथॉर्मोन संप्रेरकाचे कार्य एकमेकांस पूरक असते. 


» कॅल्शियम व फॉस्फरस या खनिजांच्या चयापचयावर ड जीवनसत्त्वाचे नियंत्रण असते. 


» शरीरातील हाडे आणि दात यांच्या जडणघडणीवर ड जीवनसत्त्वाचा परिणाम होतो. त्यामुळे कॅल्शियम, फॉस्फरस या दोन्हींच्या अभिशोषणात वाढ होते. 


» ड जीवनसत्त्व रक्तातील फॉस्फेटची पातळी नियमित राखते.


» ड जीवनसत्त्वाच्या त्रुटीमुळे लहान मुलांच्या बरगडया, मनगट, पाय यांच्या हाडांमध्ये बदल होतात. 


» शरीरातील लांब हाडांच्या टोकाशी कूर्चा तयार होते, हाडे वाकल्यामुळे बरगडया व पायांना बाक येतो, कवटीच्या हाडांचे कॅल्सीभवन होत नाही आणि दात किडतात. या लक्षणांना मुडदूस विकार म्हणतात. 


» ड जीवनसत्त्वाच्या अभावे प्रौढांना अस्थिमार्दव विकार होतो. त्यामुळे हाडांतील कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊन हाडे ठिसूळ होतात.


महत्वाचे धातू आणि अधातु व त्याचे उपयोग

1. तांब्याचा उपयोग :

भांडी व विद्युत वाहक तार तयार करण्यासाठी.

विद्युत विलेपनासाठी व तांब्याचे क्षार तयार करण्याकरिता.

तांब्यापासून तयार करण्यात येणारी संमिश्रे :

संमिश्र –  पितळ

धातू व प्रमाण – तांबे (60 ते 90 %) व जस्त (40 ते 10%)

उपयोग – भांडी तयार करण्याकरिता

संमिश्र – ब्राँझ

धातू व प्रमाण – तांबे (81 ते 90%) व कथील (19 ते 10%)

उपयोग – बेअरिंग, जहाजाची बांधणी, पुतळे, नाणी आणि पदके तयार करण्याकरिता

संमिश्र – जर्मन सिल्व्हर

धातू व प्रमाण – तांबे (50%), जस्त (25%) व निकेल (25%)

उपयोग – हे संमिश्र उच्च प्रतीचे विद्युत रोधक आहे, म्हणून त्याचा उपयोग विद्युत रोधक उपकरणे तयार करण्याकरिता केला जातो.

संमिश्र – बेल मेटल

धातू व प्रमाण – तांबे (78%) व कथील (22%)

उपयोग – घंटया, तास तयार करण्याकरिता

संमिश्र – अॅल्युमिनीयम ब्राँझ

उपयोग – तांबे व अॅल्युमिनीयम भांडी तयार करण्याकरिता

संमिश्र – गनमेटल

धातू व प्रमाण – तांबे (88%) कथील (10%) व जस्त (2%)

उपयोग – बंदुका व बॉयलरचे सुटे भाग व जस्त तयार करण्याकरिता



2. लोखंडाचा उपयोग :

ओतीव लोखंड आणि बीड : झोतभट्टीमध्ये लोखंडाची धातुके वितळयानंतर त्यापासून लोहरस तयार होतो. हा लोहरस थंड झाल्यानंतर जे लोखंड तयार होते त्यास ओतीव लोखंड किंवा बीड असे म्हणतात.

नरम किंवा घडीव लोखंड : ओतीव लोखंडाच्या उपयोग नरम लोखंड तयार करण्याकरिता केला जातो.

पोलाद : ओतीव लोखंडापासून पोलाद तयार करण्याकरिता बेसिमर भट्टी किंवा विवृत भट्टीचा उपयोग केला जातो.

लोखंडाचे संमिश्र आणि त्याचे उपयोग :

संमिश्र – स्टेनलेस स्टील

धातू – लोखंड, क्रोमीअम, कार्बन

उपयोग – तीक्ष्ण हत्यारे, भांडी सायकली व स्वयंचलीत वाहनाचे सुटे भाग व निकेल तयार करण्याकरिता

संमिश्र – टंगस्टन स्टील

धातू – लोखंड, टंगस्टन व कार्बन

उपयोग – जलद गतीने कापण्यासाठी वापरली जाणारी हत्यारे तयार करण्याकरिता.

संमिश्र – मॅगनीज स्टील

धातू – लोखंड व मॅगनीज

उपयोग – कठीण खडकाला छिद्रे पाडणारी हत्यारे तयार करण्याकरिता.

संमिश्र – क्रोमीअम स्टील

धातू – लोखंड व क्रोमीअम

उपयोग – बॉलबेअरिंग, रोलर बेअरिंग स्वयंचलीत वाहनाचे सुटे भाग व खडक फोडण्याकरिता वापरण्यात येणार्‍या यंत्राचा जबडा तयार करण्याकरिता.



3. अॅल्युमिनीअमचा उपयोग :

घरातील भांडी, विमानाचे भाग, फोटोफ्रेम तयार करण्याकरिता

चॉकलेट, सिगारेट आदि वस्तूच्या आवरणाकरिता

विद्युत वाहक तारा तयार करण्याकरिता.

रुपेरी रंग तयार करण्याकरिता.

अॅल्युमिनीयमपासुन तयार करण्यात येणारी संमिश्रे :

संमिश्र – ड्युरालयुनिम

धातू – अॅल्युमिनीयम, तांबे, मॅग्नेशियम व मॅगनीज

उपयोग – हवाई वाहने, मोटारीचे साचे आणि आगगाडीचे भाग तयार करण्याकरिता.

संमिश्र – मॅग्नेलियम

धातू – अॅल्युमिनीयम व मॅग्नेशियम

उपयोग – शास्त्रीय तराजूच्या दांडया, घरघुती उपकरणे व हवाई वाहने तयार करण्याकरिता.

संमिश्र – अॅल्युमिनीअम ब्राँझ

धातू – तांबे, अॅल्युमिनीयम, लोखंड व कथील अॅल्युमिनीयम, कोबाल्ट.

संमिश्र – अल्किनो

धातू – अॅल्युमिनीयम, कोबाल्ट व निकेल

उपयोग – विद्युत जनित्राकरिता लागणारे उच्च प्रतीचे चुंबक तयार करण्याकरिता.



4. जस्ताचे उपयोग :

लोखंड व पोलाद गंजू नये म्हणून त्यावर विलेपन करण्याकरिता.

विद्युत घटामध्ये इलेक्ट्रोड म्हणून उपयोग केला जातो.

धातूची संमिश्रे तयार करण्याकरिता.



5. पाराचा उपयोग :

हवादाबमापी आणि तापमापीमध्ये पार्‍याचा उपयोग करतात.

बाष्पदीप तयार करण्याकरिता पार्‍याचा उपयोग करतात.

आरसे तयार करण्याकरिता केला जातो.



6. सोडीयमचे उपयोग :

सोडीयम बाष्पदीपामध्ये सोडीयमचा उपयोग करतात.

उच्च तापमान दर्शक तापमापीमध्ये त्याचा उपयोग होतो.



7. मॅग्नेशियमचे उपयोग :

क्षणदिप्ती छायाचित्रणामध्ये मॅग्नेशियमचा उपयोग करतात.

शोभेच्या दारूमध्ये.

धातूची संमिश्रे तयार करण्याकरिता.

धातूची जोडकामे करण्याकरिता थमाईट मिश्रण तयार करण्यासाठी.



8. चांदीचा उपयोग :

दागिने तयार करण्याकरिता

चांदी व पारा यापासून तयार झालेल्या मिश्रणाचा उपयोग दातांमधील पोकळी बुजविण्याकरिता केला जातो.

छायाचित्रण, औषधे आणि अंकनशाई तयार करण्याकरिता.

विद्युतविलेपन आणि रजत विलेपन तयार करण्याकरिता.


9. सोन्याचे उपयोग :

नाणी व दागिने तयार करण्याकरिता व संवेदनशील विद्युत उपकरणामध्ये विद्युतवाहक म्हणून या धातूचा उपयोग केला जातो.



10. शिशाचा उपयोग :

मुद्रण धातूचे खिळे तयार करण्याकरिता.

दारूगोळा तयार करण्याकरिता.

विद्युत घटात इलेक्ट्रोड तयार करण्याकरिता.

विद्युत परीपथकात वितळतार करण्यास.

अणुभट्टीतून न्युट्रॉन शोषक म्हणून भिंती तयार करण्याकरिता.

डाग देण्याचा धातू व सहज वितळणारी संमिश्रे तयार करणे.

पुरातनकाळी किल्याच्या भिंती मजबूत करण्याकरिता दोन दगडाच्या जोडात शिशे भरले जात असे.


 महत्त्वाचे धातू आणि अधातु व त्यांचे उपयोग 【भाग-2】


11. कथिलचा उपयोग :

मुद्रण धातूचे खिळे तयार करण्याकरिता

रंग तयार करण्याकरिता

विद्युत परीपथकामध्ये

मिश्रधातू तयार करण्याकरिता

विद्युत परीपथकात वितळतार तयार करण्याकरिता.


12. गांधकाचे उपयोग :

सल्फ्युरिक अॅसिडच्या उत्पादनकरिता.

आगकाडी उत्पादनात वापरण्यात येणारे अॅटिमनी सल्फाइड तयार करण्याकरिता.

गंधकाची पूड ही कवक नाशक आहे. यामुळे गंधकाची पूड पिकावर धूरळण्याकरिता उपयोगात आणली जाते. तसेच कीटकनाशके आणि कीडनाशके तयार करण्याकरिता गंधकाचा उपयोग केला जातो.

सल्फा ड्रग तयार करण्याकरिता

बंदुकीची दारू आणि स्फोटक द्रव्ये तयार करण्याकरिता

रबराचे व्हल्कनायझेन तयार करण्यासाठी.


13. सल्फर डायऑक्साइडचे उपयोग :

सल्फ्युरिक आम्लाच्या निर्मितीकरिता.

साखर, कृत्रिम धागे इत्यादीच्या विरंजनाकरिता.

कागद तयार करण्याकरिता आवश्यक असलेली कॅल्शियम बायसल्फाट सारखी संयुगे तयार करण्याकरिता

द्रवरूप सल्फर डायऑक्साइडचा उपयोग पेट्रोलियमच्या शुद्धीकरणाकरिता केला जातो.


14. पिवळा फॉस्फरसचे उपयोग :

तांबडा फॉस्फरस तयार करण्याकरिता. तांबडया फॉस्फरसपासून सुरक्षित आगकाडया तयार केल्या जातात.

अतिशय टणक, न गंजणारे फॉस्फर ब्राँझ मिश्र धातू तयार करण्याकरिता

उंदरासाठी मारण्याकरिता उपयोगी पडणारे झिंक फॉस्फेट विष तयार करण्याकरिता.

स्मोक बॉम्ब आणि शोभेची दारू तयार करण्याकरिता

स्फुरदयुक्त खताची निर्मिती करण्याकरिता


15. क्लोरीनचे उपयोग :

कापड, धागे, कागद व कागदाच्या लगदाच, विरंजन करण्याकरिता.

क्लोरीन जंतूनाशक असल्यामुळे पाण्याच्या शुद्धीकरणाकरिता या उपयोग केला जातो.

क्लोरोफार्म, एथीलीन क्लोराइड, कार्बन टेट्राक्लोराइड इत्यादि संयुग तयार करण्याकरिता.

कृत्रिम रबर, प्लास्टीक, डी.डी.टी तयार करण्याकरिता.

विरंजक चूर्ण तयार करण्याकरिता.


16. ब्रोमीनचे उपयोग :

ब्रोमाइड क्षार तयार करण्यासाठी ब्रोमीन वापरतात.

रंग व जंतुनाशके तयार करण्यासाठी ब्रोमीनच उपयोग करतात.

फोटोफिल्म तयार करण्याकरिता सिल्व्हर ब्रोमाइडचा उपयोग करतात.

औषध उद्योगांमध्ये सोडीअम व पोटेशियमचे ब्रोमाईड वापरतात.


17. आयोडिनचे उपयोग :

टिंक्चर आयोडीन तयार करण्याकरिता व सिल्व्हर आयोडीन तयार करण्याकरिता.

आयोडिनपासून जंतुनाशक मलमे तयार केली जातात.

कृत्रिम रबर, प्लास्टिक, डी.डी.टी. तयार करण्याकरिता.


18. हिर्‍याचा उपयोग :

दागिण्यातील रत्न म्हणून

कठीण पदार्थातला छिद्र पाडण्यासाठी अवजारे तयार करण्याकरिता व काच कापण्याकरिता.


19. ग्रॅफाईट उपयोग :

विद्युत भट्टीमध्ये इलेक्ट्रोड म्हणून

शिसपेन्सिल तयार करण्याकरिता

उच्च तापमानावर कार्य करणार्‍या यंत्रामध्ये वंगण म्हणून

युरेनियमभट्टीमध्ये न्युट्रॉन शोषक म्हणून


20. कार्बन मोनॉक्साइडचा उपयोग :

कार्बनमोनोऑक्साइड आणि हायड्रोजनचा उपयोग वॉटर गॅस म्हणून करतात.

कार्बनमोनोऑक्साइड आणि नायट्रोजनचा उपयोग प्रोड्यूसर गॅस म्हणून करतात

रंगाच्या कारखाण्यात उपयुक्त असणार्‍या फॉस्जिन वायूच्या उत्पादनाकरिता

फॉस्जिन वायुचा उपयोग युद्धात विषारी वायु तयार करण्याकरिता सुद्धा करतात.


21. कार्बन डायऑक्साइडचा उपयोग :

सोडीयम कार्बोनेट आणि सोडीयम बायकार्बोनेट तयार करण्याकरिता

वायुमिश्रीत जल तयार करण्याकरिता

अग्निशामक दलामध्ये आग विझविण्याकरिता

अन्नपदार्थ टिकविण्याकरिता किंवा त्याची वाहतूक करण्याकरिता शितकारक म्हणून कोरडा बर्फ वापरतात.


22. मिथेनचा उपयोग :

गोबर गॅस आणि नॅचरल गॅसच्या स्वरुपात घरघुती इंधन म्हणून

काजळी आणि कार्बन ब्लॅक तयार करण्याकरिता.

ऊर्जानिर्मिती केंद्रामध्ये इंधन म्हणून

हायड्रोजनचे उत्पादन घेण्याकरिता


23. मिथेनॉलचा उपयोग

प्रयोग शाळेत स्पिरीट लॅम्प करिता इंधन म्हणून.

लाकडावर पॉलिश करण्याकरिता लागणारा द्रावक म्हणून

सुगंधी द्रव्ये तयार करण्याकरिता व कृत्रिम धागे तयार करण्याकरिता.


24. इथिलिनचा उपयोग :

कातकाम आणि धातुंच्या जोडकामाकरिता उपयोगात येणारी ऑक्सि-इथेलीन ज्योत तयार करण्याकरिता.

कृत्रिमरीत्या फळे पिकविण्याकरिता.

प्लास्टिकचे सामान व वस्तू त्याचप्रमाणे पॉलिथीन तयार करण्याकरिता.


25. अॅसिटीक अॅसिडचा उपयोग :

सेल्यु लोज अॅसिडच्या निर्मिती करिता.

कृत्रिम धागे आणि प्लास्टिकचे उत्पादन घेण्याकरिता

लोणची, सॉस, केचप यात परीरक्षक म्हणून अॅसिडपासून तयार केलेल्या व्हिनेगरचा उपयोग करतात.


26. बेंझीनचा उपयोग :

चरबी, राळ, रंगलेप आणि रबर इत्यादि द्रावकाकरिता.

ड्रायक्लीनिंगसाठी

पेट्रोल तुटवड्याच्या काळात मोटारच्या इंधनातील घटक म्हणून

निरनिराळी कार्बनी संयुगे तयार करण्याकरिता.

वातावरणाविषयी माहिती

पृथ्वी भोवतीच्या हवेच्या आवरणास वातावरण म्हणतात. वातावरणाचे खालील स्तर पडतात.

1. तपांबर

भूपृष्ठापासून तेरा किलोमीटर ऊंची पर्यंतच्या हवेच्या थर तपांबर म्हणून ओळखला जातो. या थराची विषुववृत्तावरील जाडी जवळजवळ सोळा किलोमीटर असून ध्रुवावर ती सहा किलोमिटरच्या दरम्यान आहे.

समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी कमी होत जाते. या कारणामुळे समुद्रसपाटीपासून उंच ठिकाणी थंड हवेची ठिकाणे निर्माण झालेली आहेत.

2. तपस्तब्धी

भुपृष्ठापासून जवळजवळ दहा किलोमिटरच्या उंचीपर्यंत वातावरणाच्या तापमानात सतत घट होत जाते. त्यानंतर तीन किलोमीटरच्या थरातील तापमानात कोणताही बदल होत नसल्यामुळे वातावरणाचा हा थर स्थिर तापमानाचा थर म्हणून ओळखला जातो. या थराला तपस्तब्धी असे म्हणतात.

3. स्थितांबर

तपस्तब्धीनंतर वातावरणाच्या या थराला सुरुवात होते. स्थितांबराच्या या भागाची जाडी जवळजवळ 13 ते 50 किलोमीटर पर्यंत आहे. या थरामधील सुरुवातीच्या 32 ते 40 किलोमीटर उंचीच्या भागात तापमान सारखेच आढळते. स्थितांबरामध्ये खालील स्थराचे अस्तित्व आढळते.
ओझोनोस्पीअर – स्थितांबराच्या खालच्या भागात ओझोन वायुचा स्तर आहे. हा थर ओझोनोस्पीअर या नावाने ओळखला जात असून या थरामध्ये सूर्यापासून आलेली अल्ट्राव्होयलेट किरणे शोषली जातात.
मध्यांबर – स्थितांबरचा वर मध्यांबर आहे. या भागात तापमानाचे प्रमाण सर्वात कमी आहे.

4. आयनाबंर

मध्यांबराच्या पलीकडील हवेच्या भागास आयनांबर म्हणतात. या थराची जाडी 80 ते 500 किलोमीटर पर्यंत आहे. या भागात हवेचे अत्यंत विरळ अस्तित्व आहे. सूर्यापासुन आलेल्या अल्ट्राव्होयलेट किरणाची हवेच्या अणूवर प्रक्रिया होऊन तेथे आयनांबर थर निर्माण झालेला आहे. यामध्ये खालील स्तर आढळतात.

इ-लेअर – या थरातील 100 ते 208 किलोमिटरचा थर इ-लेअर (E-Layaer) म्हणून ओळखला जातो. या थरामधून पृथ्वीवरील नेभोवाणीकडून निघालेल्या मध्यम रेडिओ लहरी पृथ्वीवर प्रवर्तित होतात.

एफ-लेअर – त्यानंतरचा थर (F-Layer) एफ-लेअर म्हणून ओळखला जातो. या थरामधून पृथ्वीवरील नभोवाणी केंद्रामधून निघालेल्या लघु रेडिओ लहरी पृथ्वीवर परावर्तीत होतात.

5. बाहयांबर


आयनाबंराच्या पलीकडील हवेच्या भागास बाहयांबर म्हणतात. या थरात उंचीनुसार तापमान वाढत जाते. या भागात हायड्रोजन सारख्या हलक्या वायूचे अस्तित्व आढळते.
माहिती संकलन:अमोल कवडे पाटिल.

दसरे महायुद्ध सुरु 1 सप्टेंबर 1939



◾️दसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रं - ज्यात सोव्हिएत युनियन, अमेरिका, ब्रिटन, आणि फ्रांस ह्यांचा समावेश होता तर अक्ष राष्ट्र - ज्यात नाझी जर्मनी, इटली, आणि जपान ह्यांचा समावेश होता.

◾️दसऱ्या महायुद्धाची बीजं ही पहिल्या युद्धात जर्मनीचा मानहानीकारक पराभवानंतर जर्मनीवर लादलेल्या जाचक अटींमध्ये होती. त्यावर लॉर्ड केन्स ह्यांचं “ Consequences of peace ” हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

◾️पहिल्या महायुद्धाचं Theater हे युरोपात होतं तर दुसऱ्या महायुद्धाचं Theater हे जगभर पसरलं होतं.

◾️दसरं महायुद्ध सुरू होण्याचं तात्कालिक कारण म्हणजे राजपुत्र फर्डिनांड ची हत्या.

◾️नाझी जर्मनीने 1 सप्टेंबर, 1939 ला पोलंड वर केलेला हल्ला. त्याच बरोबर फ्रांस आणि ब्रिटनने जर्मनी विरूद्ध युद्ध पुकारलं.

◾️जर्मनीचा इटली आणि जपान सोबत Molotov-Ribbentrop करार झाला होता आणि त्या अनुषंगाने इटली आणि जपान जर्मनीच्या मदतीसाठी युद्धात उतरले.

◾️1941 पर्यंत युरोपातला बऱ्याचशा भागावर जर्मनीचं प्रभूत्व आलं होतं.

◾️जर्मनीने 1941 साली सोव्हिएत रशियाच्या पूर्व सीमेवर हल्ला चढवला आणि गल्लत झाली.

◾️सोव्हिएत रशियाच्या पूर्व सीमेपासून पश्चिम सीमेपर्यंतचं अंतर जवळपास ८००० किलोमीटर आहे.

◾️तयामुळे संपूर्ण रशिया जर्मनीच्या ताब्यात येणं जवळपास अशक्य होतं. पण हिटलर ला स्टालिनग्राड, लेनिनग्राड आणि मॉस्को वर ताबा मिळवणं पुरेसं होतं.

◾️तयात पूर्व सीमेवर प्रचंड थंडी असल्यामुळे इंधन गोठू लागलं आणि जर्मनीचं सैन्य अडकून पडलं.

◾️ जर्मनी ज्या तेलाच्या विहीरींमधून इंधनाची सोय करणार होतं ते रशियाने उधळून लावलं.

◾️ह सगळं होईपर्यंत अमेरिका या महायुद्धापासून अलिप्त होती.

◾️पण डिसेंबर 1941 ला जपानने अमेरिकेवर हल्ला केला आणि अमेरिका युद्धात उतरली. अक्ष राष्ट्रांनीही अमेरिकेविरूद्ध युद्ध पुकारलं.

◾️पण 1942 साली जपानचा Battle of Midway त पराभव झाला. त्यानंतर जर्मनी आणि इटली ह्यांच्या पराभवाची मालिका सुरू झाली.

◾️1944 साली फ्रांस च्या नॉर्मनडी च्या किनाऱ्यावरून दोस्त राष्ट्रांनी प्रति लढाई सुरू केली.

◾️1945 साली सोव्हिएत युनियनने बर्लिनवर ताबा मिळवला, ॲडॉल्फ हिटलर ने आत्महत्या केली. त्यानंतर जर्मनीने बिनशर्त शरणागती पत्करली.

◾️यरोपातलं महायुद्ध संपलं. पण जपान आणि अमेरिकेतली लढाई अजून सुरूच होती.

◾️जन 1945 मध्ये अमेरिकेने अणू बॉंब ची चाचणी यशस्वीरीत्या घेतली. 7 डिसेंबर 1939 साली जपानने पर्ल हार्बर वर जिथे अमेरिकेचा तळ होता तिथे हल्ला केला होता. त्याचा बदला घेण्याची सूचना अमेरिकी अधिकारी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रूमन ला करतच होते.

◾️जपान हे युद्धमान राष्ट्र असल्याने जपान शरण येण्याची शक्यता नव्हती आणि सरतेशेवटी अमेरिकेने 6 ऑगस्ट 1939 ला जपानच्या हिरोशिमा शहरावर आणि 9 ऑगस्ट, 1945 ला नागासाकी शहरावर अणुबॉम्ब टाकला.

◾️2 सप्टेंबर 1945 रोजी जपानने शरणांगती घेऊन दुसरे महायुद्ध समाप्त झाले.

महाराष्ट्र पोलिस भरती - महत्त्वाचे 50 प्रश्न


1) अंकारा – टर्की (तुर्कस्तान)ची राजधानी.

2)अंजनी – हिला वायुकृपेने हनुमान पुत्र झाला.

3)अंजनेरी – वायुपूत्र हनुमान याचा जन्म या ठिकाणी झाला.

4)अंबिले – संत तुकारामांचे आडनाव.

5)अकबर – प्रसिद्ध बुलंद दरवाजा या मोगल बादशहाने बांधला.

6)अक्रा – घाना या देशाची राजधानी.

7)अक्ष – रावन व मंदोदरी यांचा पुत्र.

8)अक्षयघाट – मोरारजी देसाई यांचे समाधी स्थान.

9)अक्षौहिणी – २१८७० हत्ती, तितकेच रथ, ६५६१० घोडे व १०९३५० पायदळ मिळून होणारे सैन्य.

10)अगरतळा – त्रिपुरा या राज्याची राजधानी.

11)अचमद सुकार्नो – इंडोनेशियाचे संस्थापक अध्यक्ष.

12)अजिंठा – भारतातील सर्वात लांब लेणी.

13)अटल बिहारी वाजपेयी – भारतीय जनता पार्टीचे पहिले अध्यक्ष.

14)अठरा – हिंदू धर्मातील पुराणांची संख्या.

15)अणू – मुलद्रव्याचा सर्वात लहान अविभाज्य कण.

16)अथर्ववेद – चार वेदांपैकी सर्वात शेवटी लिहीला गेलेला वेद.

17)अथेन्स – ग्रीस ची राजधानी.

18)अदिती – वामनावतारी विष्णुची माता.

19)अनिल – कवी आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपण नाव.

20)अनुराधा पाल – देशातील पहिली महिला तबलजी.

21)अपोलो मोहीम – चंद्रावरील पहिली मोहीम. या मोहीमेद्वारे नीलआर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर प्रथम पाऊल टाकले.

22)अबुजा – नायजेरियाची राजधानी.

23)अबोध – माधुरी दीक्षितचा पहिला चित्रपट.

24)अभिनव भारत – वि.दा.सावरकर यांनी बांधलेली तरुण क्रांतिकारकांची गुप्तसंघटना.

25)अमरकंटक – नर्मदा नदीचे उगमस्थान.

26)अमूल डेरी – भारतातील सर्वात मोठी सहकारी दूध वितरण संस्था.

27)अमृतसर – जालियनवाला बाग येथे आहे.

28)अमृतसर – हे शहर सुवर्ण मंदिरांचे शहर म्हणुन ओळखले जाते.

29)अमेझॉन नदी – जगातील नाईल खालोखाल दुस-या क्रमांकाची लांब नदी.

30)अमेरिका – कॉपीराईटचा कायदा प्रथम या देशाने केला.


31)अमेरिका – मानवाला चंद्रावर उतरविण्यात यशस्वी ठरलेले पहिले राष्ट्र.

32)अमेरिका – सूर्यास्ताचा देश.

33)अयोध्या – श्रीरामाची जन्मभूमी.

34)अरबी – इजिप्तची अधिकृत भाषा.

35)अरुणाचल प्रदेश – आसाम पासून १९८७ साली निर्माण झालेले राज्य.

36)अरुणाचल प्रदेश – भारतातील सर्वात पुर्वेकडील राज्य.

37)अर्कल स्मिथ – रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाचे पहिले गव्हर्नर.

38)अलहाबाद – भारतीय प्रमाणवेळ या ठिकाणापासुन मोजण्यात येते.

39)अलिबाग – रायगड जिल्ह्याचे मुख्यालय.

40)अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले महानिर्देशक.

41)अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे जनक.

42)अल्टीमिटर – उंची मापक उपकरण.

43)अल्ट्राव्हायोलेट – या किरणांमुळे त्वचा काळी पडते.

44)अल्लाउद्दीन खलजी – दक्षिण भारतावर स्वारी करणारा पहिला तुर्की सेनापती.

45)अशोक स्तंभ – भारताचे राजचिन्ह.

46)अस्ताना – कजाकस्तान या देशाचीच राजधानी.

47)अहमदनगर – प्रसिद्ध शिर्डी मंदिर या जिल्ह्यात आहे.

48)अहमदनगर – महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा.

49)आंबेडकर डॉ.बाबासाहेब – भारताचे पहिले कायदामंत्री.

50)आईस हॉकी – कॅनडाचा राष्ट्रीय खेळ.

इलेक्ट्रॉनचा शोध

🔥1897 मध्ये, जे जे थॉमसन यांना आढळले की कॅथोड किरण इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाटा नसतात परंतु हायड्रोजन (सर्वात हलके अणू) पेक्षा 1,800 पट जास्त फिकट असलेले कण बनतात. 


🔥थॉमसनने असा निष्कर्ष काढला की हे कण कॅथोडमधील अणूमधून आले आहेत - ते सबटामिक कण होते. त्यांनी या नवीन कणांना कॉर्पसुल्स म्हटले परंतु नंतर ते बदलून इलेक्ट्रॉन केले गेले . 


🔥थॉमसन यांनी हे देखील दर्शविले की इलेक्ट्रोन फोटोइलेक्ट्रिक आणि किरणोत्सर्गी सामग्रीद्वारे सोडलेल्या कणांसारखेच होते . 


🔥 ह त्वरित ओळखले गेले की इलेक्ट्रॉन हे विद्युतीय प्रवाह वाहणारे कण आहेतधातूच्या तारा मध्ये. थॉमसनने असा निष्कर्ष काढला की हे इलेक्ट्रॉन त्याच्या उपकरणांमधील कॅथोडच्या अगदी अणूमधून उद्भवले , ज्याचा अर्थ असा की अणू नावाच्या सूचनेनुसार अणू अविभाज्य नसतात .

जॉन डाल्टन

 जॉन डाल्टनच्या सिद्धांतानुसार एका मूलद्रव्याचे सर्व अणू एकसारखे असायला हवेत.

तसेच डाल्टनचा अणू हा एखाद्या भरीव गोळ्यासारखा, म्हणजेच एकसंध कण असायला हवा. परंतु वास्तव काही निराळेच असल्याचे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील प्रयोगांनी दाखवून दिले.

हवेचा अत्यंत कमी दाब असलेल्या नळीतून विद्युत प्रवाह पाठवला, तर त्यामुळे प्रकाशाच्या स्वरूपातला विद्युत विमोच (इलेक्ट्रिक डिस्चार्ज) निर्माण होत असल्याचे अठराव्या शतकातही ज्ञात होते.

 उच्च दर्जाचे पंप उपलब्ध झाल्यानंतर, जर्मनीच्या ज्युलियस प्ल्युकेर याने १८५८ साली उच्च दर्जाची पोकळी निर्माण करून हेच प्रयोग केले. या प्रयोगांत त्याला, कॅथोडच्या (ऋणभारित इलेक्ट्रोड) विरुद्ध बाजूला असलेला नळीचा भाग, हिरव्या प्रकाशाने चमकायला लागल्याचे दिसून आले.

ही दीप्ती कॅथोडमधून निघत असलेले अज्ञात किरण निर्माण करीत असल्याने, या किरणांना 'कॅथोड किरण' म्हटले जाऊ लागले. याच किरणांवरील १८७९ सालच्या प्रयोगांत, इंग्लडच्या विल्यम क्रूक्स याला हे किरण चुंबकामुळे दिशा बदलत असल्याचे दिसले.

या दिशाबदलाचे स्वरूप या कणांवर ऋण विद्युत प्रभार असल्याचे दाखवत होते. क्रूक्सने वेगवेगळे वायू आणि वेगवेगळ्या धातूंचे इलेक्ट्रोड वापरून हेच प्रयोग केले. परंतु या किरणांमुळे निर्माण होणाऱ्या दीप्तीत कोणताही फरक पडला नाही.

 यावरून विल्यम क्रूक्स याने हे कॅथोड किरण म्हणजे इलेक्ट्रोडकडून येणारा विद्युत प्रवाहच असल्याचा निष्कर्ष काढला.

सन १८९७ मध्ये इंग्लंडच्या जे. जे. थॉमसन याने अत्युच्च दर्जाची निर्वात पोकळी वापरून केलेल्या प्रयोगांत, नळीच्या बाहेर बसवलेल्या अ‍ॅल्युमियमच्या दोन पट्टय़ांत विद्युत प्रवाह पाठवून विद्युतक्षेत्र निर्माण केले.

 या विद्युत क्षेत्रामुळे हे ऋण प्रभारित कॅथोड किरण अपेक्षेनुसार धन प्रभारित पट्टीकडे झुकत होते. चुंबकीय व विद्युत क्षेत्रांमुळे होणाऱ्या या कणांच्या मार्गबदलाच्या प्रमाणावरून थॉमसनने या कणांचा विद्युतभार व वस्तुमान काढले.

या कणांचे वस्तुमान हायड्रोजनच्या अणूच्या वस्तुमानाच्या तुलनेत अत्यल्प होते. या निरीक्षणांवरून कॅथोडपासून निघणारे हे ऋण प्रभारित कण अणूंचे मूलभूत घटक असले पाहिजेत, असा निष्कर्ष थॉमसनने काढला आणि त्यांना 'इलेक्ट्रॉन' या नावे संबोधले.

 अणूतील या घटकाच्या शोधाद्वारे, थॉमसनने अणूचे एकसंध स्वरूप संपुष्टात आणले. वायूंतील विद्युतवहनावरील केलेल्या संशोधनासाठी, थॉमसनला १९०६ सालचे नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

विज्ञान प्रश्नसंच.


🏆 खाली दिलेल्या राशींपैकी अदिश राशी .................... आहे 


⚪️ विस्थापन 

⚫️ चाल☑️

🔴 गती

🔵 तवरण 

_________________________


🏆 वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?


⚪️ ऑक्सिजन

⚫️ हड्रोजन

🔴 कार्बन डायऑक्साईड☑️

🔵 नायट्रोजन

_________________________


🏆 नयूटनचा दुसरा नियमफ ----------- चे मापन देतो?


⚪️सवेग☑️

⚫️बल

🔴तवरण

🔵घडण


🏆 कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची व फळांची उत्पादकता वाढवितात?


⚪️अल्फा

⚫️बिटा

🔴गमा☑️

🔵कष-किरण

_________________________


🏆 रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता?


⚪️मलॅनिन

⚫️इन्शुलिन☑️

🔴यकृत

🔵कल्शियाम

_________________________


 🏆 मायका चा वापर कोणत्या कारणांसाठी करतात?


⚪️रग तयार करणे

⚫️विद्युत रोधक म्हणून☑️

🔴विद्युत सुवाहक म्हणून 

🔵वरील सर्व कारणांसाठी 

_________________________


🏆 धान्यसाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?


⚪️सोडियम क्लोरेट☑️

⚫️मायका

🔴मोरचुद

🔵कॉपर टिन

_________________________


🏆 बहिर्वक्र आरशाने तयार होणारी प्रतिमा नेहमीच वस्तूपेक्षा आकाराने .................. असते.


⚪️मोठी

⚫️लहान☑️

🔴दप्पट

🔵तिप्पट

_________________________


🏆 वस्तूवर कार्यरत असलेले बल दुप्पट केले, तर तिचे त्वरण ........................


⚪️तितकेच राहते

⚫️निमपट होत

🔴चौपट होते

🔵दप्पट होते ☑️

_________________________


🏆 धवनीचे प्रसारण ..................... मधून होत नाही .

⚪️सथायू 

⚫️दरव

🔴वायू

🔵निर्वात प्रदेश ☑️

_____________________________

सर्व स्पर्धा परीक्षा IMP प्रश्न

०१. महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला ?


A. लतिका घोष ✔️

B. सरोजिनी नायडू

C. कृष्णाबाई राव

D. उर्मिला देवी



०२. पहिल्या कर्नाटक युद्धानंतर कोणत्या तहानुसार फ्रेंचांनी इंग्रजांना मद्रास दिले ?


A. अक्स-ला-चॅपेलचा तह ✔️

B. पॉंडेचेरीचा तह

C. मँगलोरचा तह

D. पॅरिसचा तह



०३. १८५७च्या उठावाचा बिहारमधील प्रमुख नेता कोण होता ?


A. खान बहादूर खान

B. कुंवरसिंग ✔️

C. मौलवी अहमदुल्ला

D. रावसाहेब



०४. डलहौसीने झाशी संस्थान केव्हा खालसा केल े?


A. १८४९

B. १८५१

C. १८५३ ✔️

D. १८५४



०५. १९०९ मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी कोणते वृत्तपत्र प्रकाशित केल े?


A. फ्री इंडिया

B. नया भारत

C. फ्री प्रेस जर्नल

D. लीडर ✔️



०६. १८५७च्या उठावाबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा.


अ] उठावकर्त्यांना विशिष्ठ राजकीय उद्दिष्ट नव्हते.

ब] झीनत महल हिने स्वतःच्या सुरक्षेसाठी इंग्रजांशी बोलणी केली.


A. फक्त अ

B. फक्त ब

C. वरील दोन्ही ✔️

D. वरीलपैकी एकही नाही



०७. खाली दिलेल्या भारताच्या व्हॉइसरॉय यांचा योग्य कालक्रम लावा.


अ] लॉर्ड कर्झन

ब] लॉर्ड चेम्सफर्ड

क] लॉर्ड हार्डिंग्स II

ड] लॉर्ड आयर्विन


पर्याय

A. अ-ब-क-ड ✔️

B. अ-क-ब-ड

C. क-अ-ब-ड

D. अ-ड-क-ब



०८. विधान :- अ] १९२९ चा बालविवाह कायदा हा शारदा कायदा म्हणून प्रसिद्ध आहे.

स्पष्टीकरण:-  ब] उमा शंकर सारडा यांनी हा कायदा केंद्रीय कायदेमंडळात मांडला.


पर्याय

A. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ✔️

B. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.

C. अ बरोबर आणि ब चूक

D. अ चूक आणि ब बरोबर



०९. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये भारतीयांना स्थान मिळाले ?


A. भारत सरकारचा कायदा १९३५

B. भारत सरकारचा कायदा १९१९

C. भारत कौन्सिल कायदा १९०९ ✔️

D. भारत कौन्सिल कायदा १८९२



१०. मानवजातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर. ही घोषणा कोणी दिली ? 


A. सहदरण आय्यपन 

B. नारायण गुरु ✔️

C. हृदयनाथ कुंजरू 

D. टी.एम. नायर 



१२. बंगाली साहित्यातील 'नील दर्पण' ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते ?


A. कथा 

B. कादंबरी 

C. काव्य 

D. नाटक ✔️



१३. श्री नारायण एम. लोखंडे-मजूर चळवळीचे जनक यांच्या बाबत पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?


A. त्यांनी प्रथम मजूर संघटना 'बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन' स्थापन केली 

B. त्यांना त्यांच्या हिंदू-मुस्लीम दंग्याच्या वेळी केलेल्या सलोख्याच्या कामाबाबत राव बहादूर हा किताब बहाल करण्यात आला. 

C. त्यांना 'जस्टीस ऑफ पीस' हा पुरस्कार देण्यात आला. 

D. वरील एकही नाही ✔️


१४. क्रांतिकारकांच्या कार्यक्रमात पुढीलपैकी कशाचा सहभाग नव्हता ? 


A. भारतात शस्त्रास्त्रे तयार करणे. नसल्यास बाहेरून आयात करणे. 

B. श्रीमंताकडून कोणत्याही मार्गाने पैसे काढणे. 

C. रेल्वे लाईन व इतर यातायात साधनांवर हल्ला बोलणे जेणेकरून ब्रिटीश साम्राज्य अडचणीत येईल. 

D. वरील सर्वाचा त्यात समावेश होता ✔️



१५. बापुजी आणे यांनी पुसदमध्ये १० जुलै १९३० रोजी इंग्रजांविरुद्ध विरोध दर्शवण्यास काय केले ?


A. त्यांनी मीठ तयार केले व संविनय कायदेभंग चळवळीत सहभाग घेतला. 

B. त्यांनी मिठाची पाकिटे विकण्यासाठी सभा घेतल्या. 

C. त्यांनी राखीव जंगलातून गवत कापून जंगल कायदा मोडला. ✔️

D. त्यांनी पाश्चिमात्य कपडे गोळा करून त्यांना आग लावली. 



१६. भारतीय मजुरांची प्रातिनिधिक संघटना म्हणून आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने कोणत्या संघटनेस मान्यता दिली ? 


A. भातातीय राष्ट्रीय ट्रेड युनियन कॉंग्रेस ✔️

B. अखिल भातारीय लाल ट्रेड युनियन कॉंग्रेस 

C. अखिल भातारीय ट्रेड युनियन कॉंग्रेस 

D. अखिल भारतीय किसान सभा 


१७. सशस्त्र क्रांतिकारकांच्या आणि त्यांच्या कारवायांच्या क्षेत्राच्य जोड्या लावा. 


अ)  श्रीधर परांजपे                १. हैद्राबाद 

ब)  डॉ. सिद्धनाथ काणे        २. अमरावती 

क)  दादासाहेब खापर्डे           ३. यवतमाळ 

ड)  नार्हरीपंत घारपुरे            ४. वर्धा,नागपूर 


         अ)  ब)  क)  ड)

   A.   ४   ३    १    २ 

   B.   ४   ३    २    १ ✔️

   C.   १   २   ३    ४ 

   D.   २   १   ४    ३ 



१८. शिवराम जनाबा कांबळे ज्यांनी सोमवंशीय हितवर्धक सभा १९१० मध्ये आयोजित केली, त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता ? 


A. जी.बी.वालंगकर 

B. ज्योतिबा फुले 

C. वरील दोघांचाही ✔️

D. वरील कोणाचाही नाही 



१९. खालीलपैकी कोणती वाक्ये चुकीचे आहेत ? 


A. सातारा जिल्ह्यात नाना पाटील यांनी पत्री सरकार-समांतर सरकार सुरु केले. 

B. याश्वाणराव चव्हाण यांनी चळवळीत भाग घेतला. 

C. प्रभात फेऱ्या व लष्करी कारवाया आयोजित केल्या.

D. वरीलपैकी एकही नाही


1️⃣खालीलपैकी भरपूर प्रमाणात ‘अ’ जीवनसत्वे देणारा पदार्थ………

1} सफरचंद

2} गाजर✅✅✅

3} केळी

4} संत्र


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣खालीलपैकी कोणता रोग ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावी?

1} स्कर्व्ही

2} बेरीबेरी

3} मुडदूस✅✅✅

4} राताधळेपण


📖📖📖📖📖📖📖📖📖


3️⃣पथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे ……..कि.मी.इतकी आहे.

1} २००

2} ३५०

3} ५००

4} ७५०✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


4️⃣जव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो,तेव्हा त्याचे वजन……….

1} वाढते

2} कमी होते

3} पूर्वीइतकेच राहते

4} शून्य होते✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


5️⃣कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप……..

1} दगडी कोळसा

2} कोक

3} चारकोल

4} हिरा✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


6️⃣जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः ………..मुळे होतात.

1} जीवाणू (bacteria)

2} विषाणू (virus)✅✅✅

3} कवक (fungi)

4} बुरशी


📖📖📖📖📖📖📖📖📖


7️⃣लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही?

1} देवी

2} मधुमेह✅✅✅

3} पोलिओ

4} डांग्या खोकल


📖📖📖📖📖📖📖📖📖


8️⃣……..या किरणांना वस्तुमान नसते.

1} अल्फा

2} ‘क्ष’

3} ग्यामा✅✅✅

4} बीटा


📖📖📖📖📖📖📖📖📖


9️⃣खालीलपैकी कोणता रोग  'अ’ जीवनसत्त्वाच्या अभावी होतो?

1} रंगाधळेपण

2} स्कर्व्ही

3} बेरीबेरी

4} यापैकी नाही✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


🔟हिवतापावरील प्रभावी ऑंषध……..

1} पेनेसिलीन

2} प्रायमाक्वीन✅✅✅

3} सल्फोन

4} टेरामायसीन


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣1️⃣निष्क्रिय वायू हे………..

1} पाण्यामध्ये विरघळतात

2} स्थिर नसतात

3} रासायनिक क्रिया करू न शकणारे✅✅✅

4} रासायनिक क्रियेसाठी जास्त क्रियाशील


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣2️⃣…….हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे.

1} प्लुटोनिअम✅✅✅

2} U -२३५

3} थोरीअम

4} रेडीअम


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣3️⃣खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते?

1} युरिया

2} नायट्रेट

3} अमोनिअम सल्फेट

4} कंपोस्ट✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣4️⃣आतड्यातील जिवाणूमुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते?

1} ‘ब-१’ जीवनसत्त्व

2} ‘ब-४’ जीवनसत्त्व

3} ‘ड ‘ जीवनसत्त्व

4} ‘के ‘ जीवनसत्त्व✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣5️⃣जी.एस.आर’ हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात.

1} मेंदूचे स्पंदन

2} हृदयाचे स्पंदन

3} डोळ्यांची क्षमता✅✅✅

4} हाडांची ठिसूळता


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣6️⃣किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो?

1} १०० डी.बी.च्या वर✅✅✅

2} ११० डी.बी.च्या वर

3} १४० डी.बी.च्या वर

4} १६० डी.बी.च्या वर


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣7️⃣डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला?

1} आयोडीन-१२५✅✅✅

2} अल्बम-३०

3} ल्युथिनिअरम-१७७

4} सेसिअम-१३७


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣8️⃣आधुनिक जैवतंत्रज्ञान …………. पातळीवर कार्य करते.

1} अवअणू

2} अणू

3} रेणू✅✅✅

4} पदार्थ


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣9️⃣मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण……….हे विकर त्याच्या जठरात नसते.

1} सेल्युलेज✅✅✅

2} पेप्सीन

3} सेल्युलीन

4} सेल्युपेज


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣0️⃣इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन…

1} कमी होते✅✅✅

2} वाढते

3} सारखेच राहते

4} शून्य होते


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣1️⃣पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ……… इतकी असते.

1} M

2} N✅✅✅

3} A

4} XB


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣2️⃣सौरऊर्जा _ स्वरुपात असते.

1} प्रकाश प्रारणांच्या

2} विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या✅✅✅

3} अल्फा प्रारणांच्या

4} गामा प्रारणांच्या


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣3️⃣अहरित वनस्पती ____ असतात.

1} स्वयंपोषी

2}  परपोषी✅✅✅

3} मांसाहारी

4} अभक्ष


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣4️⃣किण्वन हा _____ चा प्रकार आहे.

1} ऑक्सिश्वसन

2} विनॉक्सिश्वसन✅✅✅

3} प्रकाशसंश्लेषण

4} ज्वलन


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣5️⃣परकाश संश्लेषनात ___ प्रकाशउर्जा ग्रहण केली जाती.

1} हरितद्रव्यामुळे✅✅✅

2} झथोफिलमुळे

3} कॅरोटीनमुळे

4} मग्नेशिंअममुळ


1857 च्या पूर्वीचे उठाव:

चोरोंचा उठाव  (१८००-१८०२)

-बिहार  – नेतृत्व: भूषण शिंह


फकिरांचा उठाव  -बंगाल-  नेतृत्व: माज्नुम सहा

-फकीर: बंगालमधील धार्मिक मुसलमानांचा समूह


संन्यासाचा उठाव – बंगाल (१७७०-१८२०)

-प्रमुख कारण : यात्रेकरूना तीर्थस्थानाला जाण्यास प्रतिबंध

-या उठावाचा उल्लेख बंकिमचंद्र चटर्जी ने आपल्या आनंद माठ या कादंबरीत केला आहे


कुका उठाव – पंजाब

-या उठावाची सुरवात जवाहरमल भगत आणि बालक शिंग यांनी केला

-हजारो या नावाचे ठिकाण त्यांचे मुख्यालय होते

-आंदोलनाचा उद्देश : शिख धर्मातील अंधश्रद्धा दूर करणे

-१८७२ मध्ये राम शिंह यांना रंगून ला निर्वासित करण्यात आले.


सावंतवाडीचा उठाव – महाराष्ट्र (१८४४) नेतृत्व:  फोंडा सावंत


पाड्यागरोंचा उठाव

– दक्षिण भारत (१८०१-१८०५)

– नेतृत्व कट्टाबोम नायकम


वेलोर:  शिपायांचा उठाव  (१८०६)

-टिपू सुलतानच्या वंशजांनी शिपायांना साथ दिली


-शिपायांचा पहिला उठाव

नायक उठाव

-मेदिनापूर जिल्हा बंगाल

-नेतृत्व अचल शिंह.

त्रावणकोर उठाव

-नेतृत्व वेलू थम्पि

-फ्रांस व अमेरिकेकडे मदतीची मागणी


बरेलीचा उठाव  (1816)

-नेतृत्व मुफ्ती मोहमद एवाज


अलिगढ उठाव  (1817)

-दयाराम आणि भगवंत शिंह.

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना



◾️भारतात रेलवे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली?

- लॉर्ड हार्डींग्ज पहिला


◾️इंग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतिल प्रथम वृत्तपत्र कोणते?

- बॉम्बे हेराॅल्ड.


◾️भारतातील पहिली जातीय संघटना कोणती?

- मुस्लिम लीग


◾️ टिपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?

- 1780 ची पाल्लुतुरची लढाई 


◾️भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी?

- लॉर्ड कॅनिंग 


◾️ निळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला?

- बंगाल प्रांतात


◾️1858च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री?

- लॉर्ड स्टैनले


◾️1857च्या उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये पेटली?

- 34वी एन. आय. रजिमेंट 


◾️इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते?

- कलकत्ता विद्यालय

तिसरे कर्नाटक युध्द (1756-1763)



1756 मध्ये युरोपात इंग्लंड व फ्रान्समध्ये पुन्हा युध्द सुरु झाले. ते सप्तवर्षीय म्हणून प्रसिध्द आहे.


  फ्रेंच सरकारने ताबडतोब काऊंट लाली यास भारतात पाठविले तो जवळजवळ एक वर्ष प्रवास करीत एप्रिल 1758 मध्ये भारतात येऊन पोहोचला या दरम्यान सिरोजउद्दीला या पराभव करुन इंग्रजानी बंगालवर आपले नियंत्रण प्रस्थापित केले होते.


  त्यास इंग्रजांचा जो प्रचंड आर्थिक फायदा झाला, त्याचा उपभोग त्यांनी फ्रेंचांविरुध्द लढण्यास केला.

  काऊंट लालीने 1758 मध्येच पाॅंडेचरी जवळ असलेला सेंट डेविड किल्ला जिंकून घेतला त्यानंतर त्याने तंजावरवर आक्रमण करण्याचा आदेश दिला.


  कारण तंजावरच्या राजाकडून 56 लक्ष रुपये घ्यावयाचे होते, परंतु या मोहिमेत अपयश आल्यामुळे फ्रेंचांच्या आरमार आल्यामुळे त्याने हा वेढा उठवला.


  दुसर्‍या बाजूला पोकॅाकच्या नेतृत्वाखाली इंग्रज आरमारी तुकडीने डी अ‍ॅशच्या नेतृत्वाखाली असलेल्या फ्रेंच आरमारी तुकडीचा तीन वेळा पराभव करुन त्यांना भारतीय सागरातून परत सेनानी सरआयकूट याने वांदिवाश येथे फ्रेंचांचा जबरदस्त पराभव केला.

  खुद्द बुसीला युध्दकैदी बनविण्यात आले.


  युध्दातील या पराभावामुळे फ्रेंच पॉडेंचरीला परत गेले. पण इंग्रजांनी पाँडेचरीलाच वेढा घातला शेवटी आठ महिन्यानंतर फ्रेंचांनी पॉडेचरी इंग्रजांच्या ताब्यात दिले.


  कर्नाटकाच्या तिसर्‍या युध्दात फ्रेंचांचा अंतिम पराभव झाल्यामुळे हे युध्द निर्णायक सिध्द झाले.


  1763 च्या पॅरिसच्यातहाने सप्तवर्षीय युध्द थांबल्यावर भारतातील संघर्षही संपुष्टात आला.


  या तहानुसार पॉडेचरी व काही प्रदेश फ्रेंचांना परत मिळाला असला तरी यापुढे फ्रेंचांनी इंग्रजाविरूध्द युध्द करण्याची हिंमत केली नाही. येथून फ्रेंच सत्ता भारतात वाढू शकती नाही.

भारताचा घटनात्मक विकास ( राज्यसेवा - पूर्व + मुख्य साठी )

प्रस्तावना


ब्रिटिश राजवटीपूर्वी भारतात राजेशाही अस्तित्वात होती़ राजेशाहीची अंतिम विधिसत्ता, कार्यकारी सत्ता व न्यायसत्ता ही राजाच्या हातात एकवटलेली होती़.

या काळात मात्र खेडी ही स्वयंपूर्ण होती व स्वतंत्रही होती़ यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण झालेले होते.

याच काळामध्ये युरोपियन लोक भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले त्यामधील एक कंपनी म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होय़.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ची स्थापना इ़ स़ १६०० मध्ये करण्यात आली, या कंपनीने इंग्लंडच्या राणीकडून ३१ डिसेंबर १६०० रोजी पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची सनद मिळवली.

प्रथम ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे एकच ध्येय होते, ते भारतीय लोकांशी व्यापार करणे व त्यापासून नफा कमवणे़ म्हणून इ़ स़ १६०० ते १७५७ पर्यंतच्या कालखंडास ब्रिटिश ईस्ट इंडियाकंपनीचा व्यापार विस्ताराचा काळ असे म्हटले जाते़.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये सत्तेचा पाया हा प्लासी (१७५७) (बंगाल प्रान्त) च्या लढाईने घातला, तर १७६४ च्या बक्सारच्या लढाईने आपल्या सत्तेचा पाया भक्कम केला़.

भारताच्या घटनात्मक विकासासंदर्भात खालील प्रमाणे वर्गीकरण केले जाते

१) ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कालखंडामध्ये झालेला घटनात्मक विकास : १७७३ ते १८५८ पर्यंत़

२) ब्रिटिश राणी किंवा ब्रिटिश पार्लमेंटच्या काळामध्ये झालेला घटनात्मक विकास : १८५८ -१९४७


भारताचा घटनात्मक विकास १७७३ -१८५८ :


१७७३ चा रेंग्युलेटिंग अॅक्ट :

बंगालमधील जनतेत कंपनी सरकारकडून होणाऱ्या अत्याचाराच्या व जुलमाच्या बातम्या इंग्लंडमधील अधिकाऱ्यांच्या कानावर पडत होत्या़.

त्याच काळामध्ये बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला़ बंगाल प्रान्तामध्ये मोठ्या प्रमाणात अराजकता माजली़.

भारतीय व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला असल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत असे़ व्यापारी कंपनीला राज्य करण्यास परवानगी देण्याविरुद्ध मोठ्या प्रमाणात इंग्लंडमध्ये आरडाओरड सुरू झाली़.

या सुमारास ईस्ट इंडिया कंपनीने पार्लमेंटकडे मोठ्या रकमेच्या कर्जाची मागणी केली़ तेव्हा कंपनीच्या एकूण कारभारावर पार्लमेंटमध्ये टीका होऊन त्यातून कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी रेग्युलेटींग अॅक्ट संमत करावा लागला़.

रेंग्युलेटिंग अॅक्ट

कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटतर्फे जो अॅक्ट देण्यात आला, त्यास रेंग्युलेटिंग अॅक्ट असे म्हणतात़.

त्यावेळी इंग्लंडमध्ये लॉर्ड नॉर्थ यांचे सरकार होते़ त्यांना इंग्लंडमधील संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत होते़ त्यामुळे कंपनी विषयी त्या सरकारने सभागृहामध्ये दोन कायदे केले़

१) पहिल्या कायद्यानुसार कंपनीच्या मागणीनुसार कंपनीला ४ टक्के व्याजदराने व काही अटींवर १४ लाख पौंड एवढे कर्ज दिले़

२) दुसरा कायदा म्हणजे कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवणारा रेग्युलेटिंग अॅंक्ट होय़

रेग्युलेटिंग अॅाक्टमधील तरतूदी

१) या अॅक्टनुसार कंपनीच्या इंग्लंडच्या व भारताच्या घटनेत बदल करण्यात आला़

२) या अॅेक्टनुसार कंपनीच्या कारभाराचे भारतामध्ये एकसूत्रीकरण करण्यात आले़

३) बंगाल प्रान्तातील गव्हर्नरला बंगाल प्रांताचा गव्हर्नर जनरल हा किताब देण्यात आला व त्याच्या नियंत्रणाखाली मुंबई व मद्रास प्रान्ताचे गव्हर्नर आले़ (विशेष बाब म्हणजे १७७३ च्या अॅचक्टपूर्वी अशा प्रकारे नियंत्रण नव्हते़ प्रत्येक प्रांताच्या गव्हर्नरवर प्रत्यक्ष संचालक मंडळाचे नियंत्रण होते़)

४) या अॅरक्टनुसार गव्हर्नर जनरलच्या मदतीला चार जणांचे एक सल्लागार मंडळ नेमण्यात आले़ प्रशासनाच्या कामात मार्गदर्शन व साहाय्य करण्याचे त्याचे काम होते़

५) या कायद्यानुसार बंगालमध्ये गव्हर्नर जनरल आणि ४ जणांचे सल्लागार मंडळ यांचे मिळून कार्यकारी मंडळ तयार करण्यात आले होते़ या कार्यकारी मंडळाचे सर्व निर्णय हे बहुमताने घेतले जावेत असे ठरवण्यात आले़

६) या कायद्यामधील तरतुदीनुसार १७७४ मध्ये कोलकत्ता या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली़ (पहिले न्यायाधीश -एलिजा इम्पे)

कंपनीचे कर्मचारी या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये आणले़

७) गव्हर्नर जनरल व न्यायाधीशांसह कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांना कोणाकडूनही बक्षीस, भेटवस्तू इ़ स्वीकारता येणार नाहीत असे सांगण्यात आले़

८) प्रत्येक २० वर्षानंतर कंपनीच्या कारभाराचे मूल्यमापन केले जाईल किंवा भारताच्या कारभारासाठी फेर कायदा देण्याचे ठरवण्यात आले़ हे फेर कायदे/मूल्यमापन (१) १७९३, (२) १८१३, (३) १८३३, (४) १८५३ मध्ये देण्यात आले

-------------------------------------------------------------------------१७८१

१७८१ चा संशोधनात्मक कायदा :

१७७३ च्या रेग्युलेटिंग अॅाक्टनंतर काही उपायात्मक व पूरक कायदे करण्याची आवश्यकता निर्माण झाली, त्यांपैकी एक म्हणजे १७८१ चा भारत सरकारचा कायदा होय़ यास १७८१ चा संशोधनात्मक कायदा असे म्हणतात़

१) त्यानुसार कंपनीच्या अधिकाऱ्यांना आपल्या शासकीय कार्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर करण्यात आले़

२) यानुसार सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र निश्चित करण्यात आले़.

--------------------------------------------------------------------------पिट्सचा

१७८४ चा पिट्स अॅक्ट :

१७८१ चा भारत सरकारच्या कायद्यानंतर - गव्हर्नर जनरलच्या भारतातील प्रशासनावर सक्त नजर ठेवण्याची गरज आहे अशी जाणीव ब्रिटिश सरकारला (पार्लमेंटला) झाली़ तसेच १७७३ च्या कायद्यातील दोष दूर करण्यासाठी १७८४ चा पिट्स अॅ क्ट देण्यात आला़ (पिट्स हे इंग्लंडचे पंतप्रधान होते़)

तरतुदी :

१) या कायद्यानुसार कंपनीच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले़.

२) कंपनीच्या संचालकांचे धोरण नियंत्रित करण्यासाठी ६ सदस्यीय नियंत्रक मंडळाची स्थापना करण्यात आली़

३) या कायद्यानुसार कंपनीचे राजकीय व व्यापारविषयक अधिकार वेगळे करण्यात आले़.

४) गव्हर्नर जनरलच्या अधिकारात वाढ करताना सल्लागार मंडळाची सदस्य संख्या ४ वरून ३ करण्यात आली़.

५) गव्हर्नर जनरलला इतर गव्हर्नरांनी आपल्या प्रांतात लागू केलेले कायदे व नियम याची एक प्रत देणे सक्तीचे केले़

---------------------------------------------------------------------------१७९३

१७९३ चा चार्टर अॅक्ट :

१) या अॅक्टनुसार ईस्ट इंडिया कंपनीला दिलेल्या मुदतीमध्ये पुन्हा २० वर्षाची वाढ करण्यात आली़

२) कंपनीची व्यापाराची मक्तेदारी कमी करण्यात आली.

३) यानुसार नियामक मंडळाच्या सदस्यांना व त्यांच्या नौकर वर्गाला, भारताच्या महसुलातून तनखे देण्याची तरतूद करण्यात आली़.

४) कंपनीने केलेल्या कायद्याची व्याख्या करण्याचा अधिकार सर्वाच्च न्यालायला देण्यात आला.

५) कायम धारा या नवीन महसूल पद्धतीचा अवलंब करण्यात आला.

६) गव्हर्नर जनरल सैन्याचा सर्वाच्च प्रमुख बनला

--------------------------------------------------------------------------१८१३

१८१३ चा चार्टर अॅक्ट :

१) १८१३ च्या चार्टर अॅक्टद्वारे ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी संपुष्टात आणण्यात आली़

मात्र : कंपनीचा चहाच्या व्यापाराचा तसेच चीनशी व्यापाराची मक्तेदारी कंपनीचीच असेल असे ठरवण्यात आले़.

२) या कायद्यानुसार भारताच्या राज्यकारभाराबाबत सनदेची आणखी २० वर्षे मुद्दत वाढवण्यात आली़.

३) या कायद्यानुसार नियंत्रक मंडळाची सत्ता अधिक स्पष्ट करण्यात आली व त्यात वृद्धी करण्यात आली़.

४) या कायद्याने सरकारने जनतेत शिक्षण प्रसार करण्याचे ठरवले़.

५) भारतीय लोकांच्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी कंपनीने १ लाख रुपये खर्च करावेत असे कायद्यात सांगितले़

६) या अॅनक्टनुसार खिस्ती धर्मप्रचारकास भारतामध्ये येण्याचे परवाने मिळाले़.

--------------------------------------------------------------------------१८३३

१८३३ चा चार्टर अॅक्ट :

१) या कायद्यानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला २० वर्ष मुदत वाढ देण्यात आली़

२) १८३३ च्या चार्टर अॅशक्टनुसार भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासनाचे केंद्रीकरण करण्यात आले़ यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल यास भारताचा गव्हर्नर जनरल हा किताब देण्यात आला़.

भारताचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग़

३) १८३३ च्या चार्टर अॅक्टनुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय घटनेत बदल करण्यात आला व या अॅक्टनुसार कंपनीचा चहाचा व्यापार व चीनसोबतच्या व्यापारविषयक मक्तेदारी संपुष्टात आली़

४) या कायद्यानुसार प्रांताच्या गव्हर्नरच्या मंडळातील सदस्यांची तीन ही संख्या निश्चित करण्यात आली; परंतु आर्थिक बाबतीत पूर्वीचे विकेंद्रीकरण नष्ट करण्यात आल्याने अधिकारावर मर्यादा आली़ अर्थकायदा, याबाबतीतही प्रांतावर मध्यवर्ती सरकारचे नियंत्रण प्रस्थापित झाले़

5) विधी आयोगाची स्थापना करण्यात आली (अध्यक्ष-लॉर्ड मेकोले)

-----------------------------------------------------------------------------१८५३

१८५३ चा चार्टर अॅक्ट :

:रेग्युलेटिंग अॅटक्टमधील तरतुदीनुसार १७९३, १८१३, १८३३ व १८५३ या मधील १८५३ चा चार्टर अॅक्ट महत्त्वाचा आहे़.

एकीकडे डलहौसीच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारतातील अनेक संस्थाने ब्रिटिश साम्राज्यात विलीन झाली होती़.याच सुमारास ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता भारतामधून संपवावी अशी मागणी भारतातील अनेक नेत्यांनी, संस्थानांनी केलेली होती़.

या सर्व मागण्यांचा काही फायदा झाला नाही कारण या अॅक्टनुसार कंपनीची सत्ता संपुष्टात आणण्यात आली नाही; पण सत्तेचा कालावधीही ठरविण्यात आला नाही़.

तरतुदी

१) कंपनीला व्यापाराचा व कारभाराची सत्ता मागील चार्टर अॅक्टप्रमाणे २० वर्षे वाटून देण्यात आली नाही़

२) या अॅक्टनुसार इंग्लंड पार्लमेंट जोपर्यंत देईल तेवढीच मुदतवाढ मिळेल असे स्पष्ट केले़

३) गव्हर्नर जनरल व गव्हर्नर यांच्या सल्लागार मंडळात पार्लमेंटच्या अनुमतीनेच सभासदांची नेमणूक केली जावी असे स्पष्ट केले़

४) बोर्ड ऑफ कंट्रोल अध्यक्षाचा दर्जा वाढवून त्याला इंग्लंडमधील मंत्र्यांचा दर्जा देण्यात आला़

५) भारतीयांच्या मागणीनुसार सनदी नोकरांच्या भरतीसाठी स्पर्धा परीक्षेची पद्धत स्वीकारण्यात आली़ (१८५४ मध्ये भारतामध्ये पहिल्यांदा स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या)

६) या कायद्यानुसार बंगाल प्रांतासाठी गव्हर्नरचे स्वतंत्र पद देण्यात आले़ यापूर्वी बंगालचा गव्हर्नर जनरल बंगालचा कारभार पाहत असे़.

नियामक कायदा (1773) :-

कंपनीचा दिवाळखोरीपणा आणि दुहेरी राज्यव्यवस्थेच्या दुष्परिणामामुळे कंपनीचे ब्रिटिश सरकारकडे 14 लाख कर्ज मागितले याचा फायदा घेऊन पार्लमेंटने कंपनीवर आपले नियंत्रण प्रस्थापित करण्याच्या हेतुने नियामक कायदा 1773 मध्ये मंजूर केला.


▪️कायदा मंजूर करण्याची कारणे पुढीलप्रमाणे-


बंगालमध्ये अत्याचार - कंपनीच्या नोकरांनी बंगालमध्ये मोठया प्रमाणात अत्याचार केला.


कारागिराकडून जबरदस्तीने स्वस्त दरात माल घेणे, दंड करणे कारागृहात पाठविणे शेतकरी व्यापारी यांच्यकडून जबरदस्तीने कर्जाचे रोखे लिहून घेणे यामुळे इंग्लडची जनता कंपनी शासनावर टीका करुन कंपनी सरकार बरखास्त केले.


कंपनीचे शासन म्हणजे व्यापारी धोरण - प्लासीच्या युध्दाने राजकारणात प्रवेश तर बक्सारच्या युध्दाने सत्ता स्थिर झाली. संरक्षण परराष्ट्रीय धोरण, करार, तह इ. महत्वाचे अधिकार कंपनीला मिळाले शासनविषयक सज्ञ्ल्त्;ाा व्यापारी संघटनेकडे असणे योग्य नाही असे मत राजनीतिज्ञम्प्;म्पनी व्यक्त केले.


व्यापारी हे कुशल प्रशासक नसतात असे म्हटले जाते.


ब्रिटिश पार्लमेंटला संधी - कंपनीच्या कर्मचार्‍यांनी अनेक मार्गाने मोठया प्रमाणात पैसा स्वत:साठी गोळा केला.


कंपनीने सतत युध्दाचे धोरण स्वीकारले त्यामूळे आर्थिक स्थिती कोलमडली होती. यासाठी कंपनीने पार्लमेंटकडे आर्थिक मदत मागितली.


1772 मध्ये संसदेने कंनीच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी 31 सदस्य असलेल्या प्रवर समिती व त्याचबरोबर 13 सदस्यअसलेल्या गुप्त समितीची नेमणूक केली. समितीच्या अहवालाच्या आधारे 14 लाख पौंड रक्कम कर्जाऊ दिली.


त्याचवेळी 1 ऑक्टोबर 1773 रोजी नियंत्रणाचा कायदा मंजूर केला.

बंगाल राज्य व बंगाल युद्धे

 प्लासीची लढाई 

      बंगालचा नबाब सिराजउद्दौला व ईस्ट इंडिया कंपनी यांत दि. २३ जून १७५७ रोजी बंगालमधील हुगळी (भागीरथी) नदीकाठी प्लासी (पलास) या गावाजवळ झालेली ऐतिहासिक महत्त्वाची लढाई. इंग्रजांना बंगालमध्ये फ्रेंचांचे वर्चस्व नष्ट करून आपली सत्ता दृढमूल करावयाची होती. त्यात सिराजउद्दौला हा मोठा अडसर होता. म्हणून त्यांनी काहीतरी निमित्त शोधून सिराजउद्दौलावर हे युद्ध लादले.

सिराजउद्दौला (कार. १० एप्रिल १७५६-२३ जून १७५७) हा ⇨अलीवर्दीखान याचा नातू (मुलीचा मुलगा) वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी तो बंगालचा (ओरिसा, बंगाल व बिहारचा सुभेदार) नबाब झाला. या सुमारास इंग्रजांनी कलकत्त्यातील फोर्ट सेंट विल्यम किल्ल्याची डागडुजी विनापरवाना सुरू केली, म्हणून त्याने कलकत्त्यावर स्वारी करून तो किल्ला काबीज केला. अंधारकोठडीची तथाकथित घटना याच वेळची [⟶ अंधारकोठडी, कलकत्त्याची]. कलकत्त्यावर इंग्रजांचा पुन्हा हल्ला होईल याची सिराजला कल्पना नव्हती. ⇨रॉबर्ट क्लाइव्ह व ॲडमिरल चार्ल्स वॉट्सन यांनी तयारी करून कलकत्ता काबीज केले (२ जानेवारी १७५७). तेव्हा सिराजने ईस्ट इंडिया कंपनीबरोबर अलीनगर येथे शांततेचा तह केला (९ फेब्रुवारी १७५७). या तहानुसार सिराजने कंपनीला अनेक सवलती दिल्या. बंगालची शांतता भंग होईल असे कोणतेही वर्तन उभयपक्षांकडून होणार नाही, अशी महत्त्वाची अट या तहात होती. यानंतर काही दिवसांतच यूरोपमध्ये इंग्लंड व फ्रान्स यांत युद्ध सुरू झाले. सिराजची सहानुभूती फ्रेंचांकडे होती आणि गुप्तपणे त्यांची मदतही तो घेत असे त्यांच्या व्यापारी वखारींना सवलती देई. या गोष्टी इंग्रजांना माहीत होत्या. इंग्रजांना सिराजविरुद्ध युद्ध करण्यास हे निमित्त पुरेसे होते. शिवाय फ्रेंचांचे बंगालमधील वर्चस्व त्यांना नष्ट करावयाचे होते. म्हणून इंग्रजांनी अलीनगरचा तह धुडकावून फ्रेंचांचे चंद्रनगर हे ठाणे काबीज केले (२३ मार्च १७५७) आणि सिराजउद्दौलाविरूद्ध एक कारस्थान रचले. या कारस्थानाचा मुख्य सूत्रधार कलकत्ता कौन्सिलचा एक सभासद व सेनानी रॉबर्ट क्लाइव्ह होता. त्याने सिराजउद्दौलाचा सरसेनापती मीर जाफर यास बंगालचा नबाब बनविण्याचे अभिवचन दिले. त्याबद्दल त्याच्याकडून काही रक्कम स्वतःस व काही कंपनीस घेण्याचे ठरले. शिवाय राय दुर्लभराम व मीर मादन या दुसऱ्या सेनापतींनाही फितूर करण्याचा प्रयत्न झाला. 

कंपनीने सिराजकडे तीन मागण्या केल्या : (१) फ्रेंच हे आमचे शत्रू आहेत, त्यांचा निःपात करण्यास मदत करावी. (२) फ्रेंचांच्या वखारी बंद कराव्यात आणि (३) फ्रेंच सेनापती झां लॉ व त्याचे कासिमबझार येथील सैनिक आमच्या ताब्यात द्यावेत. सिराजला फ्रेंचांच्या बाबतीत कोणतेच निश्चित धोरण ठरविता येईना आणि इंग्रजांना तो अखेरपर्यंत संदिग्ध उत्तरे देत राहिला. तेव्हा दोन्हींकडून युद्धाची तयारी होऊ लागली. सिराजला कटाची कल्पना होती पण ऐनवेळी आपले लोक दगा देतील यावर त्याचा विश्वास नव्हता. काही दिवस सरसेनापतिपदावरून दूर केलेल्या मीर जाफरलाच पुन्हा सर्व सैन्याचे नेतृत्व त्याने दिले. दोन्ही सैन्यांची गाठ प्लासीजवळ उत्तरेस पडली. इंग्रजांच्या बाजूने ३,००० सैनिक व आठ तोफा होत्या आणि नेतृत्व क्लाइव्हकडे होते. शिवाय सर आयर कुट वगैरे काही चांगले लढवय्ये होते, तर सिराजउद्दौलाकडे ६०,००० सैन्य, ५३ मोठ्या तोफा आणि सेंट फ्रेअसच्या हाताखाली फ्रेंचांचा तोफखाना होता. सैन्याचे नेतृत्व मीर जाफरकडे होते. क्लाइव्हने १९ जून रोजी काटवाचा किल्ला घेऊन मुर्शिदाबादकडे कूच केली पुढे लष्करी मंडळाचा निर्णय धुडकावून २१ जून रोजीच तो पूर आलेली भागीरथी पार करून प्लासीकडे गेला. २२ जून रोजी तो आपल्या सैन्यासह प्लासीजवळच्या आंबराईत तळ ठोकून होता. दुसरे दिवशी युद्धास प्रारंभ झाला. मीर मादन हा केवळ एकच निष्ठावान सेनापती सिराजच्या बाजूने विश्वासाने लढला पण तो मारला गेला. मीर जाफर लढत नाही, याची खात्री झाल्यावर क्लाइव्हच्या सर्व सैन्याचे चढाई केली. सकाळी सुरू झालेली ही चकमक कशीबशी दुपारपर्यंत संपली. आपले सैन्य फितूर झालेले पाहून सिराजउद्दौला रणांगणांतून पळून गेला. त्याला पकडून ठार करण्यात आले. इंग्रजांचे फक्त ६५ सैनिक मारले गेले. क्लाइव्हचे नेतृत्व व डावपेच यांमुळे या लढाईत यश मिळाले.

विजयी इंग्रजांनी मीर जाफरला घेऊन मुर्शिदाबाद ही सिराजची राजधानी जिंकली आणि मीर जाफरला नबाब केले. क्लाइव्हने स्वतःस बक्षीस म्हणून मोठी रक्कम घेतली आणि काही आपल्या सहकाऱ्यांना दिली. या विजयामुळे पुढे क्लाइव्हला काही उच्च पदे-बंगालचे गव्हर्नरपद व सरदारकी-मिळाली. त्यामुळे नबाबाचा खजिना रिकामा झाला आणि तो पूर्णतः ईस्ट इंडिया कंपनीवर अवलंबून राहिला. त्यामुळे साहजिकच इंग्रज बंगालचे अप्रत्यक्ष रीत्या राज्यकर्ते बनले. पुढे फ्रेंचांबरोबरच्या युद्धात (कर्नाटक) त्यांना या वेळची बरीच साधनसामग्री उपयोगी पडली [⟶ इंग्रज-फ्रेंच युद्धे, भारतातील]. बंगालमधील फ्रेंचांचे वर्चस्व कमी झाले आणि ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता तिथे दृढतर झाली. यांतून पुढे भारतभर इंग्रजांना आपल्या सत्तेचा विस्तार करणे सोपे झाले.



बक्सारची लढाई

(२२ ऑक्टोबर १७६४). मोगल सम्राट दुसरा शाह आलम, त्याचा वजीर व अयोध्येचा (अवध किंवा औंध) सुभेदार शुजाउद्दौला व बंगालच्या सुभेदार मीर कासिम यांची संयुक्त आघाडी आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यात बक्सार गावापाशी झालेली लढाई. बक्सार बिहार प्रातांत पाटण्याच्या पश्चिमेस सु. १२० किमी. वर गंगा नदीच्या दक्षिण तीरावर वसले आहे.

लढाईची पार्श्वभूमी व कारणे

प्लासीच्या लढाईनंतर बंगालचा सुभेदार मीर जाफर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या इच्छेप्रमाणे वागण्यास कुरकुर करू लागला. मीर जाफरनंतर त्यास कोणी वारस नसल्याने, त्याच्या जावयास-मीर कासिमला सुभेदारी द्यावी या कंपनीच्या बेताला मीर जाफरने संमती दिली नाही. ब्रिटिशांचे पारडे बंगालमध्ये जड होत असल्याचे पाहून मीर जाफरने डचांच्या स्वारीला फूस दिली. बंगाल मधून कंपनीला हुसकावून लावण्यासाठी शाह आलमने मीर जाफरशी मसलत सूरू केली. त्याने पाटणा व मुर्शिदाबाद घेण्याचे अयशस्वी प्रयत्न केले (१७६०) वरील घटनांवरून मीर जाफरबद्दल कंपनीला संशय आला आणि त्यामुळे कंपनीने त्यास पदच्युत केले व मीर कासिमला सुभेदारपद दिले. सुभेदारीच्या बदल्यात मीर कासिम कंपनीच्या मर्जीप्रमाणे सुभ्याचा कारभार करील, अशी कंपनी अधिकाऱ्यांची अपेक्षा होती. कंपनी व कंपनीच्या इंग्रज नोकरांनी मीर कासिमला कर न देता व्यापार चालू केला. बंगाल सुभ्यातील (बंगाल, बिहार, व ओरिसा) प्रजेने व जमीनदारांनी कंपनीच्या व्यापाराबद्दल तक्रारी केल्या. यावरून मीर कासिमने कंपनीकडे तक्रार केली. त्याच्या कर वसुलीत मोठी घट येऊ लागली. कंपनीने या घटनांकडे दुर्लक्षच केले. मीर कासिमने सर्वांना करमुक्त व्यापार करण्यास सवलत जाहीर केली. कंपनीने अशा परिस्थितीत तैनाती फौजेच्या खर्चासाठी खंडणी वाढवून पैशाचा तगादा सुरू केला. वातावरण स्फोटक होण्याचे आणखी एक कारण म्हणजे पाटणा येथील कंपनीच्या प्रतिनिधी एलिस याचा उद्दामपणा, हे होते. मीर कासिमने कंपनीला एलिसबद्दल कळविले होते. मीर कासिम नमत नाही हे पाहून त्याऐवजी मीर जाफरला परत सुभेदार करण्याचे कंपनीने ठरविले. बादशाहा शाह आलमची संमती घेण्याचेही कंपनीला आवश्यक वाटले नाही. ७ जुलै १७६३ रोजी कंपनीने मीर कासिमविरूध्द युध्द पुकारले. कंपनीने सर्व कायदे धाब्यावर बसविले. युध्द पुकारण्यापूर्वीच २४ जून १७६३ रोजी एलिसने पाटण्याचा किल्ला व पाटणा ताब्यात घेतले. दंडेलीची बातमी लागताच मीर कासिमच्या सेनापतीने पाटण्याजवळील कंपनीच्या वखारीवर हल्ला करून एलिस आणि कंपनीचे सैन्य यांना वखारीत कोंडले. बंगालमधून इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी मीर कासिम तयार झाला. मीर जाफरला सुभेदारपद देण्यासाठी मुर्शिदाबादकडे निघालेल्या कंपनीच्या सैन्यावर ५ जुलै १७६३ रोजी मीर कासिमने केलेला हल्ला अयशस्वी ठरला. १९ जुलै १७६३ रोजी काट्वा येथे झालेल्या लढाईत मीर कासिमचा निष्णात सेनापती मुहंमद तकी मारला गेला व त्याला माघार घ्यावी लागली. २३ जुलै १९६३ रोजी मुर्शिदाबाद येथे मीर जाफरला सुभेदारी देण्यात आली. मीर कासिमला बंगाल सुभ्यातून हाकलून लावण्यासाठी कंपनीने मोंघीरकडे सैन्य पाठविले. २ ऑगस्ट रोजी मुर्शिदाबादजवळ व ५ सप्टेंबर रोजी गंगेच्या काठी उघुनाला येथे किरकोळ लढाया होऊन मीर कासिमला माघार घ्यावी लागली. ९ सप्टेबर १७६३ रोजी मीर कासिमने कंपनीला ताकीद दिली, की जर पाटण्याच्या रोखाने कंपनी सैन्याने आगेकूच केला, तर पाटण्यातील एलिस व इतरांना देहदंड दिला जाईल. कंपनीने मोंघीर घेतल्याबरोबर मीर कासिमचा सेनापती वॉल्टर राइनहार्ट (समरू) याने एलिस इत्यादींना मारले. नोव्हेंबर १७६३ मध्ये मीर कासिमने पाटणा सोडले व तो शुजाउद्ददौलाच्या आश्रयाला गेला. शाह आलमसुध्दा शुजाउद्ददौल्यापाशी होता. १७६३ च्या अखेरीपासून मार्च १७६४ पर्यंत कंपनीच्या गोऱ्या व हिंदुस्थानी सैन्यांत बेदिली होती. त्यामुळे सैनिकी कारवायात खंड पडला होता. या काळात शाह आलम, शुजाउद्ददौला व मीर कासिम यांनी मोगली संयुक्त आघाडी उभी करून पाटण्याकडे चाल केली. पाटण्यापाशी मे १७६४ मध्ये चकमकी उडाल्या. पावसाळ्यामुळे मोगली सैन्याने बक्सार येथे तळ ठोकला. मोगली सैन्याचा पाठलाग कंपनी सैन्याने सुरू केला.

बक्सार येथे संयुक्त आघाडीला तडे जाऊ लागले. शाह आलमने कंपनीशी गुप्तपणे मसलत सुरू केली. मीर कासिमच्या अकार्यक्षम नेतृत्वामुळे आघाडीचे नेतृत्व शुजाउद्दीदैल्याकडे आले.

पाटण्याहून निघालेल्या कंपनी सैन्याला (सेनापती मेजर हेक्टर मन्रो) बक्सारपाशी २२ ऑक्टोबर १७६४ रोजी मोगली सैन्य दिसले. मन्रोने २४ ऑक्टोबरला त्यावर हल्ला करण्याचे ठरविले. पूर्वतयारी म्हणून त्याने गंगेच्या किनाऱ्यापासून पूर्वेकडे एका तळ्यापर्यंत तिरप्या रांगेचा व्यूह रचला. व्यूहाची रचना साधारणपणे चौकोनी होती. शुजाउद्ददौला याने २३ ऑक्टोबर रोजी गंगातीरावरील सेरामपूर गावापासून पूर्वेकडे अर्धचंद्राकृती व्यह रचला व कंपनी सैन्याच्या पीछाडीवर व डाव्या बगलेवर धडाका सुरू केला. मन्रोने कंपनी सैन्याच्या पीछाडी सैन्याला उत्तरेकडे तोंड फिरवून मोगली सैन्याच्या हल्ल्यास तोंड द्यावयास लावले. मीर कासिमचा सेनापती राइनहार्ट याने आयत्या वेळी काढता पाय घेण्यास सुरूवात केली. मन्रोने तोफखाना पुढे काढून मोगली तोफा बंद पाडल्या. मोगली घोडदळाचे हल्ले अयशस्वी झाले. मन्रोने ताबडतोब मोगली सैन्याच्या आघाडीवर व डाव्या बगलेवर जोरदार हल्ला केला. मोगली सैन्याचा धीर सुटून त्याने रणांगणातून माघार घेतली. कंपनीचा जय झाला. कंपनीचे ८५७ गोरे व ७,०७२ एतद्देशीय सैनिक आणि संयुक्त आघाडीचे ६,००० वर मोगली सैनिक ठार झाले, असे म्हणतात. संयुक्त आघाडीच्या पराभवामुळे येथे ब्रिटिश सत्तेचा पाया घातला गेला.

मोगली सैन्याचा पराभव होण्याची कारणे

खंबीर नेतृत्वाची उणीव व भाडोत्री यूरोपीयांची दगाबाजी. मीर कासिमने यूरोपीय पध्दतीचे कवायती सैन्य प्रथमच हिंदुस्थानात तयार केले होते. संपूर्ण हिंदुस्थानी बनावटीच्या त्याच्या बंदुका कंपनी बंदुकापेक्षा परिणामकारक होत्या. असे असूनही राइनहार्टने दगा दिल्यामुळे मोगलांना पराभव पतकारावा लागला. पुढे २३ सप्टेंबर १८०३ रोजी झालेल्या असईची लढाई ही बसारच्याच लढाईची पुनरावृत्ती होती. बक्सारच्या विजयामुळे संपूर्ण बंगाल सुभ्याचा कारभार कंपनीच्या हातात आला; मोगल सम्राट शाह आलम तिच्या आश्रयास आला; कलकत्ता ते अयोध्या प्रांतांच्या पश्चिमी हद्दीपर्यंत वा अप्रत्यक्ष कंपनीची हुकूमत आल्यामुळे मराठ्यांच्या व पठाण -रोहिल्यांच्या कारवायांना पायबंद घालणे कंपनीला सुलभ झाले. रॉबर्ट क्लाईव्हच्या वक्तव्यावरून संपूर्ण मोगल साम्राज्य कंपनीच्या हातात आल्यासारखेच होते. ३ मे १७६५ रोजीकोरा येथे शेवटची लढाई होऊन शुजाउद्ददौलासुध्दा कंपनीचा मांडलिक झाला. मराठ्यांना किंवा एतद्देशीय राजसत्तांना या संघर्षाच्या दूरगामी परिणामाची जाणीव झाली नाही.





दत्तक विधान नामंजूर - लॉर्ड डलहौसीने

🖍 दत्तक विधान नामंजूर या तत्वाचा हा शोधकर्ता नव्हता.

🖍  या तत्वांचा प्रथम पुरस्कार हा ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाकडे जातो. 

🖍  1834 मध्ये कंपनीच्या संचालकांनी घोषणा केली होती की पुत्र नसल्यास दत्तक घेण्याचा अधिकार देणे म्हणजे आमची ही विशेष कृपा आहे.

 

  या आदेशांवरून सर्वप्रथम खालसा झालेली राज्ये. 

  मांडवी राज्य :- 1839 

  कुलाबा व जालौर :- 1840 

  सुरतच्या नवाबाचे राज्य :- 1842 



🖍 वयपगत सिध्दांतानुसार विलीन झालेले प्रथम            संस्था म्हणजेच सातारा होय व शेवटचे संस्थान म्हणजेच नागपुर होय.

डलहौसीने पुढील राज्ये खालसा करून ती इंग्रजी राज्यात विलीन केली.

  सातारा :- 1848 

  जैतपूर व संबलपूर :- 1849 

  पंजाब :- 1849 

 ओरछा :- 1849 

 भागत /बघाट :- 1850 

 उदयपूर :- 1852 

 झांसी :- 1853 

 नागपूर :- 1854 

 करौली :- 1855 

🖍  इ. स. 1852 :- ब्रम्हदेश हा इंग्रजी राज्यात विलीन केला गेला. 

🖍  इ. स. 1853 :- तैनाती फौजेची बाकी म्हणुन त्याने हैद्राबदच्या निजामाकडून वऱ्हाड प्रांत घेतला.

🖍  इ. स. 1855 :- याने तंजावरच्या राजाची राजा ही पदवी रद्द केली. 

🖍  इ. स. 1856 :- गैरव्यवहार व अव्यवस्था या कारणाखाली याने औंधच्या नवाबाचे राज्य खालसा केले. 

🖍  इ. स. 1856 :- याने अवधचा नवाब वाजिद अली शाह यास सत्तात्याग करण्यास सांगितले परंतु नवाबाने नकार दिला तेव्हा ‘प्रशासन’ हा मुद्दा बनवून त्याने अवधचे विलीनीकरण केले. 

🖍  पशवा बाजीराव दुसरा याचे दत्तक पुत्र धोंडोपंत उर्फ नानासाहेब यांची वार्षिक 8 लक्ष रूपयांची पेन्शन तसेच पेशवा ही पदवीदेखील डलहौसीने रद्द केली. तसेच नानासाहेबांना बिठूर जहागीर सोडण्याचाही हुकूम दिला गेला. 

🖍 कर्नाटकच्या नवाबाला मिळत असलेली 8 लक्ष प्रती वर्ष ही पेंन्शन याने बंद केली. 

🖍  बादशहा बहादुरशहा याची पदवी रद्द करण्याचा डलहौसीचा प्रयत्न मात्र असफल ठरला.


भारतीय इतिहासाशी संबंधित टॉप (1000) ल्युसेंटवर आधारित महत्त्वाचे प्रश्नोत्तरे



प्रश्न 1. भारतात मुस्लिम राजवटीचा पाया कोणी घातला?

उत्तर - शहाबुद्दीन (उर्फ मोहम्मद घोरी)


प्रश्न 2. भारतात मुस्लिम लीगची स्थापना केव्हा व कोठे झाली?

उत्तर – ३० डिसेंबर १९०६, ढाका (बांगलादेश)


प्रश्न 3. भारतात मानवाचा पहिला पुरावा कोठे सापडला?

उत्तर - नर्मदा खोऱ्यातून (मध्य प्रदेश)


प्रश्न 4. 1881 मध्ये भारतीयांनी स्थापन केलेली आणि व्यवस्थापित केलेली भारतातील पहिली मर्यादित दायित्व बँक कोणती होती?

उत्तर - अवध कमर्शियल बँक


प्रश्न 5. भारतातील ब्रिटिश जमीन महसूल प्रणालीचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला?

उत्तर - जमीनदार


प्रश्न 6. बीबी का मकबरा भारतात कुठे आहे?

उत्तर - औरंगाबाद (महाराष्ट्र) मध्ये


प्रश्न 7. भारतात पहिला रेल्वेमार्ग कोणी टाकला?

उत्तर - लॉर्ड डलहौसी यांनी 1850 मध्ये


प्रश्न 8. पोलो हा खेळ भारतात कोणाच्या काळात सुरू झाला?

उत्तर - तुर्कांच्या काळात


प्रश्न 9. भारतातील पोर्तुगीज साम्राज्याचा संस्थापक कोण मानला जातो?

उत्तर - अल्फोन्सो डी अल्बुकर्क


प्रश्न 10. भारतात पहिली कापूस कापड गिरणी कधी आणि कुठे स्थापन झाली?

उत्तर - 22 फेब्रुवारी 1854 इ.स. बॉम्बे (मुंबई) स्पिनिंग आणि विव्हिंगच्या स्थानिक पारशी उद्योजकाने.

भारताचे गवर्नर जनरल


●  किस गवर्नर जनरल को भारतीय प्रेस का मुक्तिदाता कहा जाता है ?

— लॉर्ड चार्ल्स मेटकॉफ


●  लॉर्ड एलिनबरो के कार्य का समय रहा है ?

— (1842-44 ई.) लॉर्ड एलिनबरो


●  दास प्रथा का उन्मूलन किस गवर्नर जनरल के समय हुआ ?

— लॉर्ड एलिनबरो


●  किस गवर्नर जनरल के समय ब्रिटिश हुकूमत में सिंध को मिला लिया गया 

— लॉर्ड एलिनबरो (अगस्त, 1843 में)


●  लॉर्ड ऑकलैंड के कार्य का समय रहा है ?

— (1836-42 ई.) लॉर्ड ऑकलैंड


●  लॉर्ड हार्डिंग के कार्य का समय रहा है ?

— (1844- 48 ई.) लॉर्ड हार्डिंग


●  लॉर्ड हार्डिंग ने किस प्रथा पर रोक लगाई ?

— नरबलि प्रथा


●  प्रथम आंग्ल-सिख युद्ध किसके समय हुआ, जिसमें अंग्रेज जीत गए ?

— लॉर्ड हार्डिंग


●  लॉर्ड डलहौजी के कार्य का समय रहा है ?

— ( 1848-56 ई.) लॉर्ड डलहौजी


●  द्वितीय आंग्ल-सिख युद्ध तथा पंजाब का ब्रिटिश हुकूमत में विलय किस गवर्नर के काल में हुआ ?


—लॉर्ड डलहौजी



●  लॉर्ड विलयम बैटिक के कार्य का समय रहा है ?

— (1828-35 ई.) लॉर्ड विलयम बैटिक


●  बंगाल का अंतिम गवर्नर जनरल कौन था ?

— (लॉर्ड विलयम बैटिक


●  किस एक्ट के तहत बंगाल के गवर्नर-जनरल को भारत का गवर्नर जनरल बनाया गया ?

— (चार्टर एक्ट


●  चार्टर एक्ट लागू होने के बाद भारत का पहला गवर्नर जनरल कौन बना ?

— (विलयम बैटिक


●  सती प्रथा को कब प्रतिबंधित किया गया ?

— (1829 ई.


●  किसके सहयोग से लॉर्ड विलियम बैटिक ने सती प्रथा को प्रतिबंधित किया ?

— (राजा राममोहन राय


●  सती प्रथा के अलावे विलियम बैटिक का कार्यकाल किसके लिए जाना जाता है ?

— शिक्षा सुधार


●  किस मेडिकल कॉलेज की स्थापना लॉर्ड विलयम बैटिक ने की ?

— सन् 1835 में कलकत्ता मेडिकल कॉलेज


●  किसकी सिफारिशों को मानते हुए विलियम बैटिक ने अंग्रेजी को शिक्षा का माध्यम बनाया ?

— (मैकाले (1835 ई.)


●  बैटिक ने ठगी प्रथा को रोकने के लिए किसकी नियुक्ति की ?

— कर्नल स्लीमैन


●  लॉर्ड चार्ल्स मेटकॉफ के कार्य का समय रहा है ?

— (1835-36 ई.) लॉर्ड चार्ल्स मेटकॉफ


●  लॉर्ड डलहौजी के समय महारानी विक्टोरिया को जो हीरा भेजा गया उसका क्या नाम था ?

— कोहिनूर हीरा


●  किस कमीशन के तहत लॉर्ड डलहौजी ने भूमिकर रहित जागीरों की जमीन हड़पनी शुरू की ?

— इनाम कमीशन


●  डलहौजी के शासन को किस कारण याद किया जाता है ?

— व्यपगत सिद्धांत (Doctrine of lapse)


●  डलहौजी ने सिक्कम पर कब और कैसे अधिकार कर लिया ?

— सन् 1850 ई. में दो अंग्रेज डॉक्टरों के साथ बदसलूकी का आरोप लगाकर ।


●  अवध का विलय डलहौजी ने कौन-सा आरोप लगाकर किया ?

— कुशासन का आरोप


●  जिस समय अवध को ब्रिटिश शासन में शामिल किया गया उस समय वहां का नवाब कौन था ?

— वाजिद अली शाह


●  डलहौजी ने अपनी ग्रीष्मकालीन राजधानी कहां बनवाई ?

— शिमला


●  भारतीय नागरिक सेवा के लिए सबसे पहले प्रतियोगिता परीक्षा की शुरुआत किसने की ?

— लॉर्ड डलहौजी


●  पहली बार स्वतंत्र रुप से लोक सेवा विभाग की स्थापना किसने और कब की ?

— 1854 ई. में लॉर्ड डलहौजी ने


●  सन् 1853 में पहली बार लॉर्ड डलहौजी के समय बिजली से संचालित तार-सेवा कहां शुरू हुई ?

— कलकत्ता एवं आगरा ।


●  बंगाल, बिहार एवं उड़ीसा में स्थायी बंदोबस्त कब और किसने लागू किया

— 1793 ई. में लॉर्ड कार्नवालिस ने ।


●  डलहौजी के शासन में सबसे पहले रेल की शुरुआत हुई, पहली रेल कहां से कहां तक चली थी ?

— बम्बई से थाणे


●  बम्बई से थाणे के बीच पहली बार चलने वाली ट्रेन को हरी झंडी कब मिली 

— 15 अप्रैल 1853 ई.


●  उस समय बुम्बई से थाणे के बीच चलाई गई ट्रेन ने कितनी दूरी तय की थी 

— 34 किलोमीटर


●  नया पोस्ट ऑफिस एक्ट कब पारित हुआ ?

— 1854 ई.


●  भारत में पहली बार डाक टिकट का प्रचलन कब शुरू हुआ ?

— 1854 ई.

बक्सारची लढाई: 22 ऑक्टोबर 1764

◾️मोगल सम्राट दुसरा शाह आलम, त्याचा वजीर व अयोध्येचा (अवध किंवा औंध) सुभेदार शुजाउद्दौला व बंगालच्या सुभेदार मीर कासिम यांची संयुक्त आघाडी आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यात बक्सार गावापाशी झालेली लढाई. 


◾️बक्सार बिहार प्रातांत पाटण्याच्या पश्चिमेस सु. 120 किमी. वर गंगा नदीच्या दक्षिण तीरावर वसले आहे.


◾️मीर कासिमने सर्वांना करमुक्त व्यापार करण्यास सवलत जाहीर केली.


◾️वातावरण स्फोटक होण्याचे आणखी एक कारण म्हणजे पाटणा येथील कंपनीच्या प्रतिनिधी एलिस याचा उद्दामपणा, हे होते


◾️कपनीचे 857 गोरे व 7072 एतद्देशीय सैनिक आणि संयुक्त आघाडीचे 6000 वर मोगली सैनिक ठार झाले, असे म्हणतात. संयुक्त आघाडीच्या पराभवामुळे येथे ब्रिटिश सत्तेचा पाया घातला गेला


चालू घडामोडी :- 03 एप्रिल 2024

◆ IPL मध्ये सर्वाधिक धावा करणारा KKR(272 धावा] हा दुसरा संघ ठरला आहे.[पहिला SRH :- 277धावा]

◆ 'जीएसटी' प्रणाली लागू झाल्यापासून महाराष्ट्राने संकलनात पहिला क्रमांक कायम राखला आहे.

◆ इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन च्या अहावालानुसार भारतात पुरूष कामगारांना सर्वाधिक पगार दिल्ली राज्यात दिला जातो.

◆ इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन च्या अहावालानुसार देशात पुरूष कामगारांना सर्वात कमी पगार मध्यप्रदेश या राज्यात मिळतो.

◆ देशात पुरूष कामगारांना मिळणाऱ्या पगाराच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य 18व्या क्रमांकावर आहे.

◆ इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन अहावालानुसार देशात हिमाचल प्रदेश या राज्यात महिलांना सर्वाधिक वेतन मिळते.

◆ महिलांना वेतन देण्यात महाराष्ट्र राज्य देशात 22व्या क्रमांकावर आहे.

◆ भारतात 15 ते 29 वयोगटा दरम्यान सुशिक्षित तरुणांचा बेरोजगारीचा दर सर्वाधिक ओडिशा राज्यात आहे.

◆ इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन च्या अहावालानुसार भारतातील गुजरात या राज्यात 15 ते 29 वयोगटाच्या सुशिक्षित तरुणांना सर्वाधिक नोकरीची संधी आहे.

◆ आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देशाच्या ऐकून GST संकलनात महाराष्ट्र राज्याचा वाटा 15 टक्के आहे.

◆ ज्युडिश सुमिनवा तुलुका यांची काँगो देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान पदी निवड झाली आहे.

◆ एशिया सोसायटी इंडियाच्या अध्यक्ष पदी संगिता जिंदाल यांची निवड झाली आहे.

◆ भारताचे पहिले ट्राय सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशन मुंबई या ठिकाणी होणार आहे.

◆ Covinet हे कारोना व्हायरस नेटवर्क WHO या संस्थेने लाँच केले आहे.

◆ उत्तर प्रदेश राज्यातील बनारस या ठिकाणच्या शहनाई ला GI टॅग प्राप्त झाले आहे.

◆ तक्रार निवारण प्रणालीची एक नवीन आणि अधिक वापरकर्ता अनुकूल आवृत्ती Scores 2.0 SEBI या संस्थेकडून लाँच करण्यात आली आहे.

◆ आंतरराष्ट्रिय संस्कृती पुरस्कार 2024 ने मीना चरंदा यांना सन्मानित करण्यात आले आहे.

◆ रिन्यूबल एनर्जी फायनान्सिंग क्षेणीमध्ये Skotch ESG पुरस्कार "REC Ltd" या कंपनीला मिळाला आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...