Thursday 26 November 2020

वासुदेव बळवंत फडके


🖍वासुदेव बळवंत फडकेंचा जन्म 4 नाेव्हेंबर 1845 रोजी कुलाबा जिल्ह्यातील शिरढोण येथे एका मध्यवर्गीय कुटुंबात झाला. 


🖍फडके यांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. 


🖍1857 च्या उठावानंतर भारतात इंग्रजांविरोधात जो पहिला सशस्त्र उठाव झाला तो फडके यांचा होता. 


🖍 पशवाईच्या काळात पनवेल जवळील कर्नाळ जिल्ह्याची किल्लेदारी ही फडक्यांच्या घराण्यात होती. 

त्यांना सुभेदार फडके म्हणून देखील ओळखले जात असे.


🖍उदरनिर्वाहासाठी वासुदेव फडके यांनी प्रथम रेल्वे खात्यात लिपिक म्हणून कामास सुरुवात केली व नंतर ते लष्करी खात्यात नोकरीस लागले. 


🖍 इग्रजांकडून त्यांना नेहमी अपमानास्पद वागणूक मिळत असे व त्यांच्या या नोकरीमुळे त्यांना त्यांच्या आईच्या अंत्यविधीस देखील जाता आले नाही. 


🖍फडकेंवर न्या. रानडे व गणेश वासुदेव जोशी (सार्वजनिक काका) यांचा प्रभाव होता. 


🖍1873 मध्येफडकेंनी स्वदेशी वस्तु वापरण्याची शपथ घेतली तसेच समाजात समानता, ऐक्य व 

समन्वय निर्माण करण्यासाठी ऐक्यवर्धीनी संस्था सुरू केली. 


🖍 पणे येथे फडकेंने 1874 मध्ये पुना नेटिव्ह इन्स्टिट्युशन ही शाळा स्थापन करुन स्वदेशीचा पुरस्कार देखील केला. 


🖍फडके हे दत्त उपासक होते व त्यांनी दत्तमाहात्म्य हा 7,000 ओव्यांचा ग्रंथ लिहिला 

होता. 


🖍शस्त्रबळाचा वापर केल्याशिवाय इंग्रज भारतातून जाणार नाहीत असे त्यांना वाटत असल्यामुळे इंग्रजांविरोधी उठावास त्यांनी सुरूवात केली व इंग्रजांना आपली ओळख पटू नये म्हणून त्यांनी दाढी वाढविली व वैराग्याचा वेश घेवून जन जागृती करत ते गावोगावी फिरू लागले. 


🖍 दौलतराव नाईकांच्या मदतीने लोणीजवळ धामरी गावावर त्यांनी पहिला दरोडा घातला यामध्ये त्यांना केवळ 3,000 रुपये मिळाले. 


🖍 सरकारी खजिन्यास कडक बंदोबस्त असल्यामुळे सरकारी खजिना लुटण्यापेक्षा खेड्यापाड्यातील श्रीमंताची व सावकारांची घरे लुटण्यावर त्यांचा भर होता. त्यांनी लोणी, खेड, जेजुरी जवळील वाल्हे, पुरंदर, हुरणे, सोलापूर, वरसगाव येथे दरोडा टाकून लुटमार केली. याच काळात त्यांनी रामदरा, मल्हारगाव येथील जंगलांचा आश्रय घेवून आसपासचा प्रदेश देखील लुटला. 


🖍 अखेर दिवसेंदिवस या लुटीच्या बातमीने हादरुन पुण्याचा पोलीस प्रमुख मेजर डॅनिअल याने फडकेंचा शोध घेत असता शुक्रवार पेठेत पोचला व त्याठिकाणी त्यास तलवारी, बंदुका मिळाल्या व डॅनीअलने लगेलच फडकेंवर अटक वॉरंट काढले व यानुसार फडकेंना पकडण्यासाठी मुंबई सरकारने 4,000 रुपयांचे रोख बक्षिस घोषित केले. 


🖍 यावर प्रतिउत्तर म्हणून फडकेंनी जाहीर केले की, मुंबईचा गव्हर्नर सर रिचर्ड टेंपल याचे डोके कापून आणणाऱ्यास 10,000 रुपयांची बक्षिस दिले जाईल. परंतु फडकेंचा उत्साह फार काळ टिकू शकला नाही व रामोशांनी देखील त्यांची साथ सोडली होती. 


🖍 अखेर 23 जुलै 1879 रोजी विजापूर जवळील देवर नावडगी या गावाच्या बाहेर एका बाैध्द विहारमध्ये गाढ झोपेत असताना त्यांना अटक करण्यात आली होती. 


🖍 नया. अल्फ्रेड केसर यांच्या समोर सदरील खटला सुरू झाला व त्यांनी सत्र न्या. न्युनहॅमकडे हा खटला वर्ग केला. फडकेंचे वकीलपत्र ग.वा. जोशींनी घेतले होते व उच्च न्यायालयात त्यांच्या बचावाचे काम महादेव चिमाजी आपटे यांनी केले होते. 


🖍 फडके यांच्या बचावासाठी जनतेने उस्ताहाने निधीदेखील गोळा केला परंतू कोर्टाने त्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.


🖍 अखेर जानेवारी 1880 मध्ये त्यांची तेहरान बोटीने एडण येथे रवानगी करण्यात आली व तेथेच 17 फेब्रुवारी 1883 रोजी तेथील इंग्रजांच्या होणारया छळाला बळी पडून त्यांचे निधन झाले.


🖍 "  देशप्रेमाने ओथंबलेला हिमलया सारखा उत्तुंग महापुरुष " असा फडकेंचा गौरव बंगालमध्ये प्रसिध्ह अमृतबाजार पत्रिकेने त्यांच्या अटकेनंतर एका पत्रात केला होता.


'मलबार नौदल युद्ध सराव' ( malabar exercise 2020)


04 नोव्हेंबर 2020 


⚓️ सहभागी देश : 

भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया


⚓️ ठिकाण : 

बंगालचा उपसागर, अरबी समुद्र


⚓️ कालावधी :  

हा सराव दोन टप्प्यात होईल. 

- पहिला टप्पा विशाखापट्टणममध्ये ३ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर या काळात होणार आहे.

- दुसरा टप्पा नोव्हेंबरच्या मध्यात अरबी समुद्रात प्रस्तावित आहे.


⚓️ उद्देश : 

प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी पोषक वातावरण तयार करणे.


⚓️ पार्श्वभूमी :

- क्वाड सदस्य देशांमध्ये भविष्यात लष्करी सहकार्य राहावे याचा प्रयत्न म्हणून या कवायतींकडे पाहिले जात आहे. 

- जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांचेही अनेक वादग्रस्त प्रश्नांवरून चीनशी संबंध ताणले गेले आहेत. 

- इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनचा वाढणारा प्रभाव हा प्रश्न प्रामुख्याने चर्चेचा मुद्दा आहे. 

- या कवायतींमध्ये सहभाग घेतलेले देश इंडो-पॅसिफिक क्षेत्रात संरक्षणविषयक सहकार्य करण्यास बांधील आहेत हे यावरून स्पष्ट होते

   

⚓️ विशेष :

- यंदाच्या मलबार युद्ध सरावाचं विशेष महत्त्व म्हणजे १३ वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया या सरावात पुनरागमन करत आहे. 

- करोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चार देशातील हा नौदलाच्या युद्ध सरावात कुठलाही प्रत्यक्ष संपर्क नसेल.

राज्यघटना बाबत मते


❇️एन श्रीनिवासन:-


🔳भाषा आणि आशय या बाबतीत घटना जवळजवळ 1935 च्या कायद्यासारखीच आहे


❇️आयव्हर जेंनीग्स:-


🔳1935 च्या कायद्यातून काही तरतुदी जशास तश्या घेतल्या आहेत


❇️के हनुमंतय्या:-


🔳आम्हला विना किंवा सतार याचे संगीत हवे होते पण येथे इंग्लिश घोष विभागाचे संगीत आहे


🔳जया प्रकारची घटना गांधीजींना नको होती व त्यांना अपेक्षित न्हवती नेमक्या त्याच प्रकारची ही घटना आहे


❇️लोकनाथ मिश्र:-


🔳पश्चिमचे गुलामी अनुकरण,त्याहून पश्चिमेला गुलामी शरणागती


❇️लक्ष्मीनारायण साहू:-


🔳मसुदा ज्या विचारधारावर आधारलेला आहे त्याचे मूळ भारतीय विचारधाराशी कोणतेही नाते दिसत नाही


❇️एच बी कामत:-


🔳आपल्या समितीसाठी हत्ती हे चिन्ह स्वीकारले आहे ते राज्यघटनाशी सुसंगत आहे.

विभक्ती व त्याचे प्रकार


🔰 नामे व सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना ‘विभक्ती’ असे म्हणतात.


🔰 नामाचे किंवा सर्वनामचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडली जातात त्यांना ‘प्रत्यय’ असे म्हणतात.


🔰 नामांच्या किंवा सर्वनामांच्या क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध 8 प्रकारचा असतो, म्हणून विभक्तीचे एकूण 8 प्रकार पडतात.


⭕️ परथमा – प्रत्यय नाहीत – प्रत्यय नाहीत – 

      कर्ता


⭕️ वदितीया – स, ला, ते – स, ला, ना, ते – 

      कर्म


⭕️ ततीया – ने, ए, शी – ने, शी, ही, ई – करण


⭕️ चतुर्थी – स, ला ते – स, ला, ना, ते – 

      संप्रदान


⭕️ पचमी – ऊन, हून – ऊन, हून – अपादान


⭕️ षष्टी – चा, ची, चे – चा, ची, चे – संबंध


⭕️ सप्तमी – त, ई, आ – त, ई, आ – 

     अधिकरण


⭕️ सबोधन – नो – संबोधन

लोकपाल



    पहिले लोकपाल:-पिनाकी चंद्र घोष


गैर न्यायिक सदस्य:- अर्चना रामसुंदर, दिनेश कुमार जैन, महेंद्रसिंग, इंद्रजित प्रसाद गौतम


 न्यायिक सदस्य:- दिलीप भोसले, प्रदीप कुमार मोहंती, अजयकुमार त्रिपाठी, अभिलाषा कुमारी


🛑 लोकपाल निवड समिती

1)पंतप्रधान

2)सरन्यायाधीश

3)लोकसभा अध्यक्ष

4)लोकसभा विरोधी पक्षनेते

5)कायदेतज्ज्ञ


🛑 लोकपाल पात्रता


1)सर्वोच्च न्यायालयचे निवृत्त मुख्य सरन्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश

2)भ्रष्टाचार विरोधी धोरण,सार्वजनिक प्रशासन,दक्षता,विमा बँकिंग याबाबत किमान 25 वर्षे अनुभव


🛑 अध्यक्ष अपात्रता


 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेली व्यक्ती लाभाचे पद धारण करणारी व्यक्ती संसद व विधिमंडळ सदस्यअपराधी दोषी


🛑 कार्यकाल


5 वर्ष किंवा वयाच्या 70 वर्ष पर्यंत जो अगोदर  संपेल तो


 🛑 पगार


अध्यक्षाला सरन्यायाधीश प्रमाणे

सदस्य ला न्यायाधीश प्रमाणे


🛑 लोकपाल कायदा 2013


   राज्यसभा:-17 डिसेंबर 2013

लोकसभा:-18 डिसेंबर 2013

राष्ट्रपती:-1 जानेवारी 2014

अंमलबजावणी :-16 जानेवारी 2014


🛑 रचना: 1 अध्यक्ष व जास्तीत जास्त 8 सदस्य

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून १८ दहशतवाद्यांची यादी जाहीर




केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी दहशतवाद्यांविरोधात मोठा पाऊल उचलत, एक नवी यादी जाहीर केली आहे. बेकायदा कृत्यविरोधी दुरुस्ती विधेयक (यूएपीए) अंतर्गत गृह मंत्रालयाने १८ दहशतवाद्यांची यादी घोषित केली आहे. या यादीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊत इब्राहिमच्या अनेक सहकाऱ्यांची नावं आहेत. छोटा शकील, टायगर मेमन यांचा देखील या यादीत समावेश आहे.


या १८ दहशतवाद्यांमध्ये पाकिस्तानस्थित असलेल्या दहशतवाद्यांचा देखील समावेश आहे. सरकारने २६/११ मुंबई हल्ल्यातील आरोपी लष्कर ए तोयबाचा युसूफ मुजम्मील, लष्कर ए तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदचा मेव्हणा अब्दुर रहमान मक्की, १९९९ मधील कंधार आयसी-८१४ विमान अपहरणातील आरोपी युसूफ अजहर, मुंबई बॉम्ब स्फोटाचा कट रचणारा टायगर मेमन, छोटा शकील, हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीन आणि इंडियन मुजाहिद्दीनच्या भटकल बंधूंना देखील दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.


हे आहेत १८ दहशतवादी -


१. साजिद मीर (लष्कर ए तोयबा), २. युसूफ भट्ट (लष्कर ए तोयबा), ३.अब्दुर रहमान मक्की (लष्कर ए तोयबा), ४. शाहीद महमूद (लष्कर ए तोयबा) ५. फरहातुल्लाह गोरी ६.अब्दुल रऊफ असगर ७. इब्राहीम अतहर ८. युसूफ अजहर ९. शाहीद लतीफ १०. मोहम्मद युसूफ शाह (हिजबुल मुजाहिद्दीन) ११. गुलाम नबी खान (हिजबुल मुजाहिद्दीन) १२. जफर हुसैन भट्ट १३. रियाज इस्माइल १४. मोहम्मद इकबाल १५. छोटा शकील १६. मोहम्मद अनीस १७. टाइगर मेमन १८. जावेद चिकना

२०१९ व २०२० मधील काही महत्त्वाची पुस्तके / आत्मचरित्रे व त्यांचे लेखक


🔰 बाय बाय कोरोना : पी के श्रीवास्तव

🔰 यवर बेस्ट डे ईस टुडे : अनुपम खेर

🔰 द इंडिया वे : एस जयशंकर

🔰 पोर्टरेटस् ऑफ पॉवर : एन के सिंह 

🔰 द बँटल ऑफ बिलोंगिंग : शशी थरुर

🔰 वन अरेंजड् मर्डर : चेतन भगत

🔰 विशेष : कोड टु विन : निरुपमा यादव

🔰 बाबू द अनफॉर्गेटेबल : मनीष सिसोदिया

🔰 वॉईसेस ऑफ डिसेंट : रोमिला थापर

🔰 अ प्रोमिसड लॅन्ड : बराक ओबामा

🔰 आझादी : फ्रीडम . फॅसिझम. फिक्शन : अरुंधती रॉय

🔰 माय लाईफ इन डिझाईन : गौरी खान

🔰 लट अस ड्रीम : पोप फ्रान्सिस

🔰 करिकेट द्रोना : जतिन परांजपे

🔰 अमेझिंग अयोध्या : नीना राय

🔰 द एंडगेम : हुसैन झैदी

🔰 अ सॉंग ऑफ इंडिया : रस्किन बाँड

🔰 ओवरड्राफ्ट : सेविंग द इंडियन सेवर : उर्जित पटेल

🔰 लिजेंन्ड ऑफ सुहेलदेव : अमिश त्रिपाठी

🔰 कोर्टस् ऑफ इंडिया : रंजन गोगोई

🔰 लिसनिंग , लर्निंग , लिडींग : वैकय्या नायडू 

🔰 माय लाईफ , माय मिशन : बाबा रामदेव

🔰 वी आर डीसप्लेसड् : मलाला युसुफजाई

🔰 एवरी वोट काऊंटस् : नवीन चावला

🔰 विराट : द मेकिंग ऑफ ए चॅम्पियन : नीरज झा

🔰 द थर्ड पिलर : रघुराम राजन

🔰 आय डु व्हाँट आय डु : रघुराम राजन

🔰 गम चेंजर : शाहिद आफ्रीदी

🔰 चजिंग इंडिया : मनमोहन सिंह

🔰 द पँराडॉक्सीकल प्राईम मिनिस्टर : शशि थरुर

🔰 मातोश्री : सुमित्रा महाजन

🔰 सिटीझन दिल्ली : माय टाईम , माय लाईफ : शिला दिक्षित

🔰 २८१ अँन्ड बियॉन्ड : वी वी एस लक्ष्मण 

🔰 आवर हाऊस इस ऑन फायर : ग्रेटा थनबर्ग

🔰 माइंड मास्टर : विश्वनाथन आनंद .

महत्वाचे प्रश्नसंच

 (०१)  राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो ?

उत्तर- २४ डिसेंबर.


(०२)  सायकलचा शोध कोणी लावला ?

उत्तर- मॅकमिलन.


(०३)  'कुरल' या तामिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर कोणी केले ?

उत्तर- पांडूरंग सदाशिव साने.


(०४)  भारताने आॅलिम्पिक स्पर्धेत प्रथम कधी भाग घेतला ?

उत्तर- १९२० मध्ये.


(०५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतीगृह कोठे सुरू केले ?

उत्तर- सोलापूर.


(०६)  भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?

उत्तर- वड.


(०७)  विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?

उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.


(०८)  कोणती आंतरराष्ट्रीय टेनिस खेळ स्पर्धा हिरव्या गवताच्या मैदानात खेळली जाते ?

उत्तर- विंबलडन.


(०९)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा केला ?

उत्तर- २० मार्च १९२७.


(१०) साखरेचे रासायनिक रेणूसूत्र काय आहे ?

उत्तर- C₁₂H₂₂O₁₁ 


(११)  भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास म्हणतात ?

उत्तर- दादासाहेब फाळके.


(१२)  डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- रूडाल्फ डिझेल.


(१३)  'फटका' या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?

उत्तर- अनंत भवानीबाबा घोलप/ अनंत फंदी


(१४)  व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?

उत्तर- २७० ते २८० ग्रॅम.


(१५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?

उत्तर- ४ सप्टेंबर १९२७.


(१६)  महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती ?

उत्तर- पुणे.


(१७)  वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- जेम्स वॅट.


(१८)  'एकच प्याला' या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक कोण आहे ?

उत्तर- राम गणेश गडकरी.


(१९)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितिवर निवड केव्हा झाली ?

उत्तर- ८ जुलै १९३०.


(२०) ग्लुकोजचे रेणुसूत्र काय आहे ?

उत्तर- C₆H₁₂O₆ 


(२१)  राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतिक आहे ?

उत्तर- त्याग आणि शौर्य.


(२२)  टेलिफोनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- अलेक्झांडर ग्रॅहम बेल.


(२३)  ना. धों.महानोर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ?

उत्तर- रानकवी.


(२४)  अर्जून पुरस्कार कधी दिला जातो ?

उत्तर- २९ आॅगस्ट.


(२५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमामाई यांचे महापरिनिर्वाण केव्हा झाले ?

उत्तर- २७ मे १९३५.


(२६)  न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?

उत्तर- किवी.


(२७)  ग्रामोफोनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.


(२८)  मुकुंदराजाचा हा मराठीतील पहिला ग्रंथ,असे एक मत आहे ?

उत्तर- विवेकसिंधू.


(२९)  'सनी डेज' हे पुस्तक कोणाचे आहे ?

उत्तर- सुनील गावस्कर.


(३०) डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांनी आचार्य अत्रे यांच्या कोणत्या चित्रपटाचे उद्घाटन केले ?

उत्तर- महात्मा फुले.


(३१)  अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे शासकीय निवासस्थान कोणते आहे ?

उत्तर- व्हाइट हाऊस.


(३२)  अंधासाठीच्या लिपीचा शोध कोणी लावला ?

उत्तर- ब्रेल लुईस.


(३३)  ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?*

उत्तर- अरूणा ढेरे.


(३४)  'गोल्डन गर्ल' हे पुस्तक कोणाचे आहे ?

उत्तर- पी. टी. उषा.


(३५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे गोखले अर्थशास्त्र संस्थेत कोणत्या विषयावर भाषण केले ?

उत्तर- फेडरेशन व्हर्सेस फ्रिडम.


(३६) मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी कोणती ?

उत्तर- मोचनगड, गुंजीकर यांची 


(३७)  महाराष्ट्रातील विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

उत्तर- सयाजीराव लक्ष्मण सीलप


(३८)  देशातील पहिला स्वच्छ निर्मल जिल्हा कोणता ?

उत्तर- कोल्हापूर.


(३९)  श्यामची आई या चित्रपटाचे निर्माते  ?

उत्तर- प्र.के.अत्रे 


(४०)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला ?

उत्तर- 1990 


(४१)  तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये कोणत्या नदीच्या पाण्यावरून वाद आहे ?

उत्तर- कावेरी नदी.


(४२)  पेनिसिलीनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- अलेक्झांडर फ्लेमिंग.


(४३)  आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?

उत्तर- कृष्णाजी केशव दामले.


(४४)  अमेरिकेचा कार्ल लुईस कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- अॅथेलेटिक्स.


(४५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन केव्हा केली ?

उत्तर- २५ डिसेंबर १९२७.

 

(४६)  सात टेकड्याचे शहर कोणते आहे ?

उत्तर- रोम.


(४७)  डायनामाइटचा शोध कोणी लावला ?

उत्तर- आल्फ्रेड नोबेल.


(४८)  आधुनिक मराठी कांदबरीचे जनक कोणास म्हटले जाते ?

उत्तर- ह. ना. आपटे.


(४९)  'प्लेईंग टू विन' हे पुस्तक कोणाचे आहे ?

उत्तर- सायना नेहवाल.


(५०)  डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या संस्थेचे ब्रीद वाक्य 'शिका,संघटित व्हा,संघर्ष करा.' हे होते ?

उत्तर- बहिष्कृत हितकारिणी सभा.

लव्ह जिहाद विरोधात योगी सरकारने केला कायदा; अध्यादेशाला मंजुरी



उत्तर प्रदेश कॅबिनेटने ‘लव्ह जिहाद’विरोधातील अध्याधेशास आज मंजुरी दिली आहे. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा अध्यादेश पारीत केला गेला.


अध्यादेशानुसार धर्मपरिवर्तन करण्यास जबरदस्ती करणाऱ्यास एक ते पाच वर्षे कारावासाची शिक्षा व १५ हजार रुपये दंड असणार आहे. तसेच, अल्पवयीन व अनुसूचित जाती / जमातीमधील महिलांच्या धर्मांतरणासाठी तीन ते दहा वर्षे कारावास व २५ हजार रुपये दंड असणार आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी ही माहिती दिली आहे.


तसेच, अनेकांचे जबरदस्ती धर्मांतरण केल्याप्रकरणी अध्यादेशात तीन ते दहा वर्षे कारावसाच्या शिक्षेसह ५० हजार रुपये दंडाची तरतूद आहे. याशिवाय एखाद्या व्यक्तीस धर्मांतरण करून विवाह करायचा असल्यास, त्याला दोन महिने अगोदर जिल्हाधिकाऱ्यांकडून तशी परवानगी घ्यावी लागणार आहे, असे देखील सांगण्यात आले आहे.


उत्तर प्रदेशात लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर पावलं उचलली आहेत. काही दिवसांअगोदरच या संदर्भात राज्याच्या गृहमंत्रालयाने कायदे व विधी विभागाकडे प्रस्ताव देखील पाठवला होता.


लव्ह जिहादच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी, महिलांच्या सन्मानाशी खेळणाऱ्यांचे आता राम नाम सत्य होईल, असा गंभीर इशारा या अगोदरच दिलेला आहे.


'अलाहाबाद न्यायालयानं निर्णय दिला आहे की, केवळ विवाहासाठी धर्मांतरण वैध नाही. धर्म परिवर्तन नाही केले गेले पाहिजे. याला मान्यता मिळाली नाही पाहिजे. 


यासाठी सरकार देखील निर्णय घेत आहे की, लव्ह जिहादला कठोरपणे रोखण्याचं काम केले जावे. सरकार लव्ह जिहादला रोखण्यासाठी कायदा तयार करणार आहे. मी त्या लोकांना इशारा देत आहे, जे आपली ओळख लपवतात व आमच्या बहिणींच्या सन्मानाशी खेळतात, जर तुम्ही सुधाराला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार आहे.” असं योगी आदित्यनाथ यांनी एका सभेत बोलून दाखवलं होतं.

भारतीय रेल्वेनं 13 लाख कर्मचाऱ्यांना दिलं मोठं गिफ्ट


🔰भारतीय रेल्वेने आपल्या 13 लाख कर्मचार्‍यांना मोठे गिफ्ट दिले आहे. रेल्वेने कर्मचार्‍यांच्या सोयीसाठी आता डिजिटल ऑनलाईन मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली (HRMS) सुरू केली आहे.


🔰तर या सुविधेमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना अ‍ॅडव्हान्स मॉड्यूलद्वारे त्यांचे पीएफ बॅलेन्स चेक करता येणार आहे. याशिवाय त्यांना अ‍ॅडव्हान्स पीएफसाठी ऑनलाईन अर्जही करता येणार आहे.


🔰रल्वे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे, की सुधारित उत्पादकता आणि कर्मचार्‍यांना फायदा मिळवून देण्यासाठी भारतीय रेल्वेने एचआरएमएस हा एक खास प्रकल्प सुरू केला आहे.


🔰रल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनोदकुमार यादव यांनी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने, रेल्वे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी उपयुक्त एचआरएमएस (HRMS) आणि यूझर डेपोची मॉड्यूल्स लॉन्च करण्यात आले आहेत. यात कर्मचारी सेल्फ सर्व्हिसचा (ESS) लाभ घेऊ शकतात.

आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंदच


🔰आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) घेतला आहे.


🔰यापूर्वी आंतरराष्ट्रीय विमानसेवा 30 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असं जाहीर करण्यात आलं होतं. पण करोना व्हायरसचा वाढता प्रसार पाहता आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


🔰नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने परिपत्रक जारी करुन याबाबत आदेश दिले आहेत. मात्र, या कालावधीत ‘वंदे भारत मिशन’अंतर्गत सुरू असलेल्या खास विमानांना उड्डाणाची परवानगी असेल.

तसंच, डीजीसीएकडून परवानगी मिळालेल्या विशेष विमानांवर बंदी नसेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.


🔰यापूर्वी डीजीसीएने आंतरराष्ट्रीय विमानांवरील बंदी  30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली होती. करोना व्हायरसमुळे यावर्षी 23 मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यावेळी देशांतर्गत विमानांवरही बंदी होती, पण 25 मेपासून देशांतर्गत विमानांना पुन्हा परवानगी देण्यात आलीये.


🔰तर, आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक 30 नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता होती, पण आता करोनाचा प्रभाव पुन्हा वाढत असल्याचे दिसत असल्याने 31 डिसेंबर 2020 पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद राहणार आहे.

लाच घेण्यात भारत आशिया खंडात अव्वल.


🔰ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने केलेल्या सर्व्हेनुसार, भारतात लाचखोरीचं प्रमाण हे 39 टक्के आहे. गेल्या 12 महिन्यांत भ्रष्टाचारात वाढ झाल्याचे 47 टक्के लोकांचं म्हणणं आहे.सरकार भ्रष्टाचार संपवण्यासाठी योग्य पावलं उचलत असल्याचं या सर्व्हेत सहभागी झालेल्या 63 टक्के लोकांचं म्हणणं आहे.


🔰भारतात 46 टक्के लोक आपलं काम करुन घेण्यासाठी वैयक्तिक संबंधांचा फायदा उठवतात. लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये सुमारे निम्म्या लोकांकडून लाच मागण्यात आली आहे.

तर वैयक्तिक संबंधांचा वापर करणारे 32 टक्के लोकांचं म्हणणं आहे की त्यांनी जर असं केलं नाही तर त्याचं काम होतच नाही.


🔰भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे कंबोडिया. या देशात 37 टक्के लोक लाच देतात. यानंतर भ्रष्टाचाराचं प्रमाणं 30 टक्के असल्याने इंडोनेशिया तिसऱ्या स्थानी आहे. तर सर्वात कमी लाचखोरी चालणारे देश आहेत मालदीव आणि जपान. या दोन्ही देशांमध्ये दोन टक्के लोकच लाच घेतात.


🔰आशिया खंडातील दक्षिण कोरियामध्ये भ्रष्टाचाराचा  दर 10 टक्के आहे. तसेच नेपाळमध्ये 12 टक्के लोकचं भ्रष्टाचार करतात. मात्र, या सर्व्हेमध्ये पाकिस्तानचा समावेश करण्यात आलेला नाही.

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने ‘ग्लोबल करप्शन बॅरोमीटर-आशिया’या नावाने आपला अहवाल सादर केला आहे.

तृतीयपंथी’ व्यक्तींसाठी समर्पित असलेल्या राष्ट्रीय संकेतस्थळाचे उद्घाटन


🔰कद्रीय सामाजिक न्याय व सक्षमिकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते ‘तृतीयपंथी’ व्यक्तींसाठी समर्पित असलेल्या राष्ट्रीय संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच संकटात सापडलेल्या तृतीयपंथी व्यक्तींना निवारा देण्यासाठी गुजरातच्या वडोदरा शहरात ‘गरिमा गृह’ या नावाने एका केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे.


🔰29 सप्टेंबर 2020 रोजी अधिसूचित करण्यात आलेल्या “तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) अधिनियम-2020” यामध्ये समर्पित असे एक राष्ट्रीय संकेतस्थळ तयार करण्याची तरतुद आहे.


🔰ह व्यासपीठ एखाद्या तृतीयपंथी व्यक्तीला देशात कोणत्याही भागातून प्रमाणपत्र आणि ओळखपत्र मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यात मदत करते. प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय कोणत्याही कार्यालयाला भेट न देता त्यांना ओळखपत्र दिले जाणार आहे.


🔴‘गरिमा गृह’ विषयी...


🔰‘गरिमा गृह’चे व्यवस्थापन संपूर्णपणे तृतीयपंथीयांकडून संचालित केल्या जाणाऱ्या ‘लक्ष्य ट्रस्ट’कडून केले जाणार आहे. तृतीयपंथी व्यक्तींना निवारा, अन्न, वैद्यकीय सेवा आणि करमणुकीच्या सुविधा या मूलभूत सुविधा पुरवणे तसेच त्यांना कौशल्य विकासाचे धडे देऊन त्यांना सक्षम करणे, ज्यामुळे त्यांना सन्मानाने जीवन जगता येणार, या उद्देशाने ही संस्था आहे.


🔰‘गरिमा गृह’ प्रमाणेच आणखी 13 केंद्रांची स्थापना करण्यासाठी 10 शहरांची ओळख पटविण्यात आली आहे. त्यात वडोदरा, नवी दिल्ली, पटना, भुवनेश्वर, जयपूर, कोलकाता, मणीपुर, चेन्नई, रायपूर, मुंबई या शहरांचा समावेश आहे. या योजनेत मंत्रालयाने निश्चित केलेल्या प्रत्येक केंद्रावर किमान 25 लोकांचे पुनर्वसन केले जाणार.

चीनच्या आणखी 42 उपयोजनांवर बंदी.



🔰चीनच्या 42 मोबाइल उपयोजनांवर इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने बंदी घातली असून त्यात अलीबाबा वर्कबेंच, अलीएक्स्प्रेस, अलीपे कॅशियर, कॅमकार्ड, वुई डेट यांचा समावेश आहे. भारताचे सार्वभौमत्व, सुरक्षा व सार्वजनिक व्यवस्था यांना या उपयोजनांमुळे धोका असल्याचे सांगण्यात आले.तर मंत्रालयाने म्हटले आहे की, भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने दिलेल्या अहवालाच्या आधारे या उपयोजनांवर बंदी घालण्यात येत आहे.


🔰तसेच 29 जुलै रोजी सरकारने चीनच्या 59 उपयोजनांवर बंदी घातली होती त्यात टिक टॉक, युसी ब्राउजर यांचा समावेश होता. त्यानंतर 2 सप्टेंबरला 118 उपयोजनांवर बंदी घालण्यात आली त्यात पबजी नॉर्डिक मॅप,लिव्हिक, पबजी मोबाइल लाइट, वुई चॅट वर्क, बायडू, टेनसेंटर वेयुन यांचा समावेश होता. त्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 69 ए अन्वये बंदी घालण्यात आली.

चद्रावरील खडकांचे नमुने आणण्यासाठी चीनचे यान रवाना.


🔰चद्रावरील खडकांचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्यासाठी चीनचे मानवरहित यान मंगळवारी चंद्राकडे रवाना झाले आहे.चीनच्या चँग इ -5 या शोधक यानाने दक्षिणेकडील हैनान प्रांतात वेंगचँग अवकाशयान उड्डाण तळावरून यशस्वी झेप घेतल्याची माहिती सीजीटीएन या संस्थेने दिली आहे.


🔰तर हे यान लाँग मार्च 5 या प्रक्षेपकाच्या मदतीने बीजिंगच्या प्रमाणवेळेनुसार पहाटे 4.30 वाजता अवकाशात झेपावले.

चँग इ- 5 ही अतिशय गुंतागुंतीची चांद्रमोहीम असून त्यात अवकाश इतिहासावर भर देण्यात आला आहे. गेल्या चाळीस वर्षांच्या काळात जगात प्रथमच चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्याची मोहीम राबवली जात आहे.


🔰तसेच अमेरिकेने चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करण्यासाठी अवकाशवीर पाठवले होते. रशियाने खडकांचे नमुने आणण्यासाठी मानवरहित मोहिमा राबवल्या होत्या. ही अवकाशयाने चंद्रावर जाऊन परत आली होती. चीनची मोहीम गुंतागुंतीची आहे कारण त्यात हे यान चंद्राच्या कक्षेत प्रस्थापित केले जाणार असून तेथील खडकांचे जास्तीत जास्त नमुने गोळा करणार आहे.

भारतातील चक्रीवादळे व विविध देशांकडून दिलेली नावे (२०१९-२०२०)



🌀 निवार : तमिळनाडू , आंध्रप्रदेश 

✔️ नाव दिले : इराण


🌀 फनी : ओडिशा , पश्र्चिम बंगाल 

✔️ नाव दिले : बांग्लादेश


🌀 वायु : भारत , पाकिस्तान

✔️ नाव दिले : भारत 


🌀 हिक्का : गुजरात

✔️ नाव दिले : मालदीव 


🌀 महा : ओमान , श्रीलंका , भारत 

✔️ नाव दिले : ओमान


🌀 बलबुल : बांग्लादेश , भारत

✔️ नाव दिले : पाकिस्तान


🌀 कयार : सोमालिया , भारत , येमन

✔️ नाव दिले : म्यानमार 


🌀 पवन : सोमालिया , भारत 

✔️ नाव दिले : श्रीलंका 


🌀 अम्फान : ओडिशा , पश्र्चिम बंगाल

✔️ नाव दिले : थायलंड


🌀 निसर्ग : महाराष्ट्र , गोवा , गुजरात

✔️ नाव दिले : बांग्लादेश .

उमंग इंटरनॅशनल”: उमंग मोबाईल अ‍ॅपची आंतरराष्ट्रीय आवृत्ती


♒️कद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या हस्ते उमंग अॅपच्या आंतरराष्ट्रीय आवृत्तीचे अनावरण करण्यात आले.


♨️ठळक बाबी ...


♒️परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या समन्वयाने “उमंग इंटरनॅशनल” अॅपमार्फत भारत सरकारच्या सेवा दिल्या जाणार आहेत.

ही आवृत्ती अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड या निवडक देशांसाठी तयार करण्यात आली आहे.


♒️अपमार्फत भारतीय आंतरराष्ट्रीय विद्यार्थी, अनिवासी भारतीय, परदेशातले भारतीय पर्यटक यांना भारत सरकारच्या सेवांचा कोणत्याही वेळी लाभ घेता येणार.

उमंग अॅपवर उपलब्ध असणाऱ्या भारतीय सांस्कृतिक सेवांमुळे भारताला जागतिक पातळीवर नेण्यास मदत होणार आणि परदेशी पर्यटकांमध्ये भारताला भेट देण्याविषयी आवड निर्माण होणार.


♨️उमंग अ‍ॅपविषयी...


♒️“उमंग” (UMANG - युनिफाईड मोबाईल अ‍ॅप्लीकेशन फॉर न्यू-एज गवर्नन्स) मोबाईल अ‍ॅप हा भारत सरकारचा एकल, एकात्मिक, सुरक्षित, बहुविध, बहु-भाषी, बहु-सेवा मोबाईल अ‍ॅप (सुपर-अ‍ॅप) आहे. अॅपमार्फत केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागाच्या उच्च प्रभावित सेवा प्रदान केल्या जातात.


♒️उमंगची निर्मिती इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभाग (NeGD) यांनी केली आहे. त्याचे लोकार्पण 23 नोव्हेंबर 2017 रोजी करण्यात आले होते.


♒️“उमंग” अ‍ॅपने तीन वर्षे पूर्ण केली असून 2000 पेक्षा अधिक सेवांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. अ‍ॅपवर सध्या 2039 सेवा (88 केंद्रीय विभागाच्या 373 सेवा, 27 राज्यांच्या 101 विभागाच्या 487 सेवा आणि 1179 सेवा उपयोगिता बिल देयके) उपलब्ध आहेत आणि यात निरंतर वाढ होत आहे.

Online Test Series

२६ नोव्हेंबर : संविधान दिन

🟢 घटना समितीत १५ महिला सदस्यांचा समावेश होता

🙎‍♀ १) अम्मू स्वामीनाथन
🙎‍♀ २) एनी मस्करीन
🙎‍♀ ३) बेगम एजाज रसूल
🙎‍♀ ४) दक्षयानी वेलायुधन
🙎‍♀ ५) दुर्गाबाई देशमुख
🙎‍♀ ६) हंसा मेहता
🙎‍♀ ७) पुर्णिमा बँनर्जी
🙎‍♀ ८) रेणुका रे
🙎‍♀ ९) सरोजिनी नायडू
🙎‍♀ १०) विजयालक्ष्मी पंडित
🙎‍♀ ११) सुचिता कृपलानी
🙎‍♀ १२) कमला चौधरी
🙎‍♀ १३) लीला रे
🙎‍♀ १४) मालती चौधरी
🙎‍♀ १५) राजकुमारी कौर

चालू घडामोडी प्रश्नसंच

 📍विम्बलडन टेनिस स्पर्धा – २०१६ चा पुरुष एकेरीचा विजेता खेळाडू खालीलपैकी कोणता?

 A) अँडी मरे ✅✅

 B) नोव्हाक जोकोविच 

 C) राफेल नदाल 

 D) रॉजर फेडरर


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📍‘द टर्बुलेट इयर्स’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?

 A) प्रणव मुखर्जी ✅✅

 B) शरद पवार 

 C) लालकृष्ण आडवाणी 

 D) बरखा दत्त


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📍भारतीय राज्याघटनेच्या कलम ७६ मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आली?

 A) अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया ✅✅ 

 B) कंट्रोलर ऍड ऑडीटर जनरल ऑफ इंडिया 

 C) ऑडीटर जनरल ऑफ इंडिया 

 D) सर्वोच्य न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📍महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे?

 A) विश्वास नांगरे पाटील 

 B) सतीश माथुर ✅✅

 C) संजीव द्याल 

 D) प्रवीण दीक्षित


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📍धळे-नागपूर -कोलकाता महामार्ग हा कोणता आशियाई महामार्ग आहे?

 A) AH-48 

 B) AH-45 

 C) AH-47 

 D) AH-46 ✅✅


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📌भारताचा कॉर्पोरेट कर दरात कपात करत ____ एवढा केला, ज्यामुळे खासगी क्षेत्रासाठी अप्रत्यक्षपणे 1.45 लक्ष कोटी रुपयांचे भांडवल मिळणार.

(A) 24 टक्के

(B) 22 टक्के✅✅✅

(C) 26 टक्के

(D) 28 टक्के




📌कोणते राज्य सरकार सरकारी रुग्णालयात काम करणार्‍या डॉक्टरांच्या खासगी सरावावर बंदी घालणार आहे?

(A) आंध्रप्रदेश✅✅✅

(B) पंजाब

(C) महाराष्ट्र

(D) कर्नाटक




📌कोणत्या राज्यात NTPC भारतातले सर्वात मोठे सौर पार्क तयार करणार?

(A) तामिळनाडू

(B) कोलकाता

(C) राजस्थान

(D) गुजरात✅✅✅




📌खालीलपैकी कोणते विधान ‘INS खंदेरी’ बाबत अचूक नाही?

(A) INS ‘खंदेरी’ स्कॉर्पियन पाणबुडी मझगाव डॉक लिमिटेड (MDL) द्वारे तयार करण्यात आली आहे.

(B) INS ‘खंदेरी’ ही कलवरी श्रेणीतली डिझेल-इलेक्ट्रिक वर चालणारी लढाऊ पाणबुडी आहे

(C) पाणबुडी खंदेरीची संरचना अमेरिकेच्या नेवल ग्रुप या संस्थेने तयार केली आहे.

(D) पाणबुडी खंदेरीचे नाव हिंद महासागरात सापडणार्‍या घातक सॉफिश खंदेरी याच्या नावावरून ठेवले गेले आहे.


📌चीन आणि तैवान यांच्यातल्या तणावावरून तैवान आणि ___ या देशाने त्यांच्यातले राजनैतिक संबंध तोडले.

(A) किरीबाती✅✅✅

(B) फिलीपिन्

(C) जापान

(D) अफगाणिस्तान


📌कोणत्या मंत्रालयाने “नॅशनल एज्युकेशनल अलायन्स फॉर टेक्नॉलॉजी (NEAT) आर्टिफिश्यल इंटेलिजेंस (AI)” या नावाने योजना सादर केली?

(A) इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

(B) मनुष्यबळ विकास मंत्रालय✅✅✅

(C) सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय

(D) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय


📌 शतकऱ्यांना 24 तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते ?

1) गोवा

2) तेलंगणा✅✅

3) गुजरात

4) पंजाब 


📌 भारतातील पहिली करेन्सी प्रिंटिंग प्रेस ( टाकसाळ ) कोठे स्थापन करण्यात आली ?


1) मुंबई

2) कोलकाता

3) नाशिक✅✅

4) हैदराबाद


📌 महाराष्ट्रात सर्वात जास्त खेडी असणारा जिल्हा कोणता ?

1) पुणे ✅✅

2) सिंधुदुर्ग

3) अमरावती

4) सोलापूर


📌कोणत्या ठिकानांदरम्यान दक्षिण आशिया प्रदेशातली पहिली क्रॉस-बॉर्डर पेट्रोलियम प्रॉडक्ट पाइपलाइन आहे?

(A) मोतिहारी आणि अमलेखगंज✅✅✅

(B) सबा आणि सारवाक

(C) हजीरा आणि विजयपूर

(D) ताशकंद आणि बिश्केक


📌कोणत्या सालापर्यंत पाय व मुखरोगांचे निर्मूलन करणे हे पाय व मुखरोग (FMD) यासाठीच्या ‘राष्ट्रीय पशूरोग नियंत्रण कार्यक्रम’चे उद्दीष्ट आहे?

(A) 2025

(B) 2035

(C) 2030✅✅✅

(D) 2027


📌भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ____ यांनी संयुक्तपणे दक्षिण आशिया प्रदेशातल्या पहिल्या क्रॉस-बॉर्डर पेट्रोलियम प्रॉडक्ट पाइपलाइनचे उद्घाटन केले.

(A) बांग्लादेशी पंतप्रधान शेख हसीना

(B) नेपाळी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली✅✅✅

(C) चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग

(D) म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष विन मिंट


📌कोणते राज्य सरकार भारतातले पहिले आंतरराष्ट्रीय महिला व्यापार केंद्र (iWTC) याची स्थापना करणार आहे?

(A) दिल्ली

(B) राजस्थान

(C) महाराष्ट्र

(D) केरळ✅✅✅


📌“सावरकर: इकोज फ्रॉम ए फरगॉटन पास्ट, 1883-1924” पुस्तकाचे लेखक कोण आहेत? #books

(A) विक्रम संपथ✅✅✅

(B) श्री प्रह्लादसिंग पटेल

(C) रीना बॅरॉन

(D) व्यंकय्या नायडू


📌कोणत्या देशाच्या मंजुरीनंतर ‘1995 बेसल प्रतिबंध दुरुस्ती’ ठराव आंतरराष्ट्रीय कायदा झाला आहे?

(A) बोलिव्हिया

(B) ब्रुनेई

(C) क्रोएशिया

(D) कंबोडिया


📌कोणत्या समूहाने भारतासह वस्तूंसंदर्भातल्या मुक्त व्यापार कराराचा (FTA) आढावा घेण्यास सहमती दर्शविली?

(A) जागतिक व्यापार संघटना

(B) ASEAN✅✅✅

(C) BRICS देश

(D) बांग्लादेश

डेली का डोज 23 नवम्बर 2020



1.केंद्र सरकार ने किस राज्य में सूक्ष्म सिंचाई परियोजनाओं के लिए 3,971 करोड़ रुपये के ऋण को मंजूरी दी?

a.    बिहार

b.    तमिलनाडु✔️

c.    पंजाब

d.    झारखंड


2.निम्न में से किस देश को 2023 में होने वाली G-20 देशों की बैठक की अध्यक्षता प्रदान की गयी है?

a.    भारत✔️

b.    नेपाल

c.    पाकिस्तान

d.    बांग्लादेश


3.अरब सागर में भारत, सिंगापुर एवं किस देश के बीच “सिटमैक्स-20” सैन्य अभ्यास के दूसरे संस्करण को शुरू किया गया है?

a.    नेपाल

b.    चीन

c.    रूस

d.    थाईलैंड✔️


4.अमेरिका के निर्वाचित राष्ट्रपति जो बाइडन ने अपनी पत्नी जिल बाइडन के लिए निम्न में से किस भारतीय मूल की महिला को नीति निदेशक नियुक्त किया है?

a.    प्रमिला जयपाल

b.    कमला हैरिस

c.    माला अडिगा✔️

d.    मेधा नार्वेकर


5.राष्ट्रीय कैडेट कोर (एनसीसी) ने 22 नवंबर को अपना कौन सा स्थापना दिवस मनाया है?

a.    50वां स्थापना दिवस

b.    72वां स्थापना दिवस✔️

c.    65वां स्थापना दिवस

d.    62वां स्थापना दिवस


6.अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आईसीसी) ने अंतरराष्ट्रीय क्रिकेट में डेब्यू करने की उम्र क्या निर्धारित की है?

a.    15 साल✔️

b.    20 साल

c.    25 साल

d.    12 साल


7.विश्व दूरदर्शन दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?

a.    22 अगस्त

b.    10 मार्च

c.    21 नवंबर✔️

d.    15 अप्रैल


8.विश्व मत्स्य दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?

a.    21 नवंबर✔️

b.    15 मार्च

c.    10 अप्रैल

d.    12 जून



टिपू सुलतान : (२० नोव्हेंबर १७५०–४ मे १७९९).



म्हैसूरचा एक प्रसिद्ध व पराक्रमी राजा. त्याचे पूर्ण नाव शाह बहाद्दूर फत्ते अल्लीखान असे होते. टिपू याचा अर्थ कन्नडमध्ये वाघ असा होतो. त्याच्या एकूण स्वभावगुणांवरून हे नाव त्यास मिळाले असावे. हैदर अलीचा हा थोरला मुलगा. कर्नाटकातील देवणहळ्ळी (बंगलोर) या गावी जन्मला. त्याच्या बालपणाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. तथापि त्याने मौलवींकडून पारंपरिक शिक्षण आणि गाझीखान या अधिकाऱ्याच्या हाताखाली लष्करी शिक्षण घेतले होते. पहिली काही वर्षे तो हैदरबरोबर लढाईत भाग घेत असे. एवढेच नव्हे, तर स्वतंत्र रीत्याही त्याने लढाया केल्या होत्या. म्हैसूरच्या गादीवर येण्यापूर्वी १७७१ मध्ये त्याने मराठ्यांच्या सैन्याबरोबर मुकाबला दिला होता, तर १७८१ मध्ये सेनापती कर्नल बेली आणि कर्नल ब्रॅथवेट असे दोघेजण टिपूवर चालून आले असता उभयतांचा पराभव करून त्याने दोघांनाही पकडले व काही फौज कैद केली. १७८२ मध्ये हैदरच्या मृत्यूनंतर टिपू म्हैसूरच्या गादीवर आला. टिपूचे फ्रेंचांशी प्रथमपासून सख्य होते. यामुळे इंग्रज सेनापती एअर कूट हा टिपूवर चालून आला असता फ्रेंच सेनापती बुसी याने टिपूला मदत केली. सालबाईच्या तहाप्रमाणे इंग्रजांचा जो मुलूख हैदर अलीने जिंकला होता, तो परत करावा असे ठरले होते. पण टिपूस ही अट मान्य नव्हती. म्हणून इंग्रजांनी टिपूचा बीदनूर प्रांत घेतला. तेव्हा त्याने जनरल मॅथ्यूझला पकडले. त्यामुळे इंग्रजांना मंगलोरचा शांतता तह करावा लागला (१७८४). त्यानुसार एकमेकांचा घेतलेल्या प्रदेश परत करावा, असे ठरले. याच साली टिपूने नरगुंद व कित्तूर या संस्थानांवर सैन्य पाठवून लूट केली व तेथील किल्ले हस्तगत केले. टिपूचे धोरण नेहमी आक्रमक होते परंतु लढाई अंगाशी येत, असे दिसताच तो तह करी. पण पुढे तो तह कधीच पाळीत नसे. टिपूच्या या वाढत्या सत्तेस पायबंद घालण्याकरिता नाना फडणीसाने निजामची यादगीर येथे भेट घेतला आणि दोघांनी टिपूवर स्वारी करण्याचे ठरले. त्याप्रमाणे उभयतांनी टिपूवर स्वारी करून अनेक ठाणी काबीज केली. सावनेर येथे मोठी लढाई झाली. पण ती निर्णायक झाली नाही. तेव्हा नाना फडणीसाने मॅलेट यास भेटून इंग्रजांची मदत घेण्याचे ठरविले. त्या वेळी टिपूने मराठ्यांबरोबर १७८७ मध्ये तह केला. त्यानुसार ४८ लक्ष रु. खंडणी ठरली व गजेंद्रगड, बादामी, नरगुंद व कित्तूर येथील किल्ले मराठ्यांस परत द्यावेत, अदवानी संस्थान निजामास द्यावे आणि सावनेरकरांचा मुलूख त्यांचा त्यांना परत करावा. पुढे मराठ्यांच्या सैन्याने कर्नाटकातून माघार घेताच त्याने कित्तूरचा किल्ला पुन्हा हस्तगत केला आणि मराठ्यांशी कायमचे वैर निर्माण केले. निजामाने टिपूशी मैत्री करण्याचे प्रयत्न केले ते असफल ठरले. तेव्हा कॉर्नवॉलिसने मराठे व निजाम यांना टिपूविरुद्ध एकत्र आणण्यास ही संधी चांगली आहे, हे हेरून त्यांच्याशी स्नेह वाढविला. शिवाय टिपूच्या या धोरणामुळे शेजारच्या राजवटी त्यावर विश्वास ठेवीत नसत.


अशा परिस्थितीत टिपूने त्रावणकोरवर हल्ला केला तो फसला. पण दरम्यान कॉर्नवॉलिसने मराठे व निजाम यांच्याशी मैत्रीचा तह करून टिपूवर स्वारी करण्याचे ठरविले. १७९० मध्ये प्रत्यक्ष मोहिमेस सुरुवात झाली. टिपूने आपल्या कणखर नेतृत्वाखाली प्रतिकार केला. पण या तिघांच्या सैन्यापुढे त्यास अखेर शरणागती पतकरावी लागली. त्याने २३ फ्रेब्रुवारी १७९२ रोजी श्रीरंगपटण येथे तह केला. त्यानुसार निम्मा प्रदेश व तीन कोट रु. नुकसानभरपाई व ती फिटेपर्यंत दोन मुलगे इंग्रजांकडे ओलिस ठेवणे त्यास भाग पडले. या अपमानास्पद तहामुळे तो पुढे अधिकच बेफिकीर व आक्रमक झाला आणि इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी तो इतरांच्या मदतीची शोधाशोध करू लागला. या संदर्भात त्याने इराण, तुर्कस्तान तसेच नेपोलियन यांच्यांशी संधान बांधून आपली बाजू बळकट करण्याचाही प्रयत्न सुरू केला. एवढेच नव्हे, तर त्याने काही फ्रेंच पलटणी नोकरीस ठेवल्या. या सर्व कारवायांसंबंधी लॉर्ड वेलस्ली याने त्यास जाब विचारला आणि तैनाती फौज स्वीकारण्यासंबंधी विचारणा केली तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. म्हणून वेलस्लीने निजामाशी तह केला, मराठ्यांनाही त्याला यात सहभागी करून घ्यावयाचे होते. पण पेशव्यांचे धोरण अनिश्चित होते. १७९९ च्या सुरुवातीस इंग्रजांनी युद्ध पुकारले व टिपूची वेलस्लीने कुर्ग, मळवळ्ळी वगैरे काही ठाणी काबीज केली. पुढे श्रीरंगपटणास वेढा घातला. तिथे टिपून शिकस्तीचा पराक्रम केला. अखेर तो गोळी लागून मरण पावला. नंतर इंग्रजांनी भयंकर लुटमार केली. टिपूचे एक कोटी सहा लक्ष रुपायांच्या उत्पन्नाचे राज्य घेतले व काही भाग निजामाला दिला व काही भाग मुळाच्या चामराज वोडेयर यांच्या वंशजास दिला. टिपूच्या मुलांना व नातेवाईकांना २४,००० होनांचा मुलूख लावून दिला. पुढे वेल्लोरच्या बंडात टिपूच्या मुलाचा हात आहे, या सबबीवर इंग्रजांनी टिपूची जहागीर खालसा केली. अशा रीतीने टिपूचे राज्य इंग्रजांनी पुढे पूर्णतः गिळंकृत केले.


टिपूच्या खासगी जीवनासंबंधी फारशी माहिती उपलब्ध नाही. त्याला दोन बायका होत्या. त्यांपैकी पहिली नवायेत मुस्लिम घराण्यातील असून हैदरने निवडली होती व दुसरी रुकय्या बानू स्वतः टिपूने निवडली होती. यांपासून त्यांस अनेक मुले झाली. त्यांत १२ मुलगे होते. यांपैकी दोन मुलगे त्याने इंग्रजांकडे ओलिस ठेवले होते. काही इंग्रज लेखकांच्या मते टिपू हा अत्यंत धर्मवेडा, क्रूर, लोभी, अविश्वासू व चंचल होता परंतु टिपूचा एकूण कारभार, राज्यव्यवस्था व धडाडी पाहिली असता, हे आरोप सबळ पुराव्यांवर आधारित आहेत असे म्हणता येत नाही. तथापि काही दुर्गुण व सेनापतींची फितूरी यांमुळे त्याच्या सुसंघटित सैन्याचा अखेर पराभव झाला, ही वस्तुस्थिती आहे.


राज्यकारभारात त्याने चोख व्यवस्था ठेवून प्रांतांची नावे बदलली. स्वतःची नवीन मापे, वजने व नाणी पाडली. एवढेच नव्हे, तर स्वतःची कालगणना सुरू करून तीमधील वर्षे व महिने यांस नवी नावे दिली. त्याचप्रमाणे मुलकी व लष्करी खात्यांत अनेक सुधारणा केल्या. त्याला कलाकौशल्याचा व वाङ्‌मयाचा छंद होता. फार्सी, मराठी, उर्दू व कन्नड या भाषा अवगत होत्या. त्याची मराठी पत्रे उपलब्ध आहेत. त्याने जमविलेला संग्रह लंडन, मद्रास व कलकत्ता या ठिकाणी आहे. त्यात दहाव्या शतकापासून त्या वेळेपर्यंतच्या अनेक कलाकुसरींच्या वस्तू, हस्तलिखित ग्रंथ, कुराणाची भाषांतरे, मोगल कालीन इतिवृत्ते, तवारिखा इ. साहित्य आहे. टिपूने फर्मान बनाम अलीराजा व फतह-उल्-मुजाहिदैनत या नावांचे ग्रंथ लिहिले, असे म्हणतात. तो खुतबापठणाच्या बाबतीत दक्ष असे. त्याने आपल्या नावे खुतबापठण करण्याची प्रथा सुरू केली होती.


संदर्भ :1. Ahmad, Fazl, Sultan Tippu, Lahore, 1958.


    2. Forrest, Denys, Tiger of Mysore, Bangalore, 1970.


    3. Hasan, Mohibbul, History of Tipu Sultan, Calcutta, 1951.

वाचा :- भारतीय संविधानाबद्दल 10 महत्वाच्या गोष्टी



भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली.म्हणून जाणून घेऊयात संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी...


 १. २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो? 


२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती.


 २. संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?


- संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.


३. कसं लिहीलं गेलं संविधान?


-आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं. यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याी जबाबदारी त्यांना देण्यात आली. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.


४. संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते?


-२९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीनं आपल्या कामकाजास सुरुवात केली. जवाहरलाल नेहरू,अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला आहे.


 ५. संविधान सभचे अध्यक्ष कोण होते?


-९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती गठीत करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. पुढं ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले.


६. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?


-फाळणीनंतर संविधान सिमितीच्या संदस्यांची संख्या २९२ झाली. समितीच्या ११ बैठका झाल्या. त्या १६५ दिवस चालल्या. समितीच्या १९ उपसमित्या जलद कामकाजाच्या दृष्टीनं कार्यरत होत्या. त्यात मसुदा समिती होती. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. या मसुदा समितीच्या ४४ सभा झाल्या.


 ७. आपल्या संविधानात किती परिशिष्टे आहेत?


- भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.


 ८. भारतीय संविधान कधी लागू करण्यात आलं?


-२६ जानेवारी, १९५० रोजीच भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला.


 ९. संविधानात कोणाचं हस्तलेखन आहे?


- भारताचे संविधान बनून तयार होत होते. पण संविधान हे हस्तलिखीत असावं अशी नेहरुंची इच्छा होती. बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी ६ महिने लागले.


१०.संविधानाच्या पानांवर नक्षीकाम कोणी केलं?


-आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती. तसंच प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे.


यशवंतराव चव्हाण: आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार



◾️आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 35 वी पुण्यतिथी.


◾️ महाराष्ट्रातील राजकारणाला सुयोग्य दिशा देण्याचे आणि समतोल व जातिभेदरहीत राजकारणाचा वारसा देण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे. 


◾️यशवंतरावांची ग्रंथसंपदा

आपले नवे मुंबई राज्य, ॠणानुबंध, कृष्णाकाठ, भूमिका, विदेश दर्शन, सह्याद्रीचे वारे, युगांतर.


◾️यशवंतरावांचे आयुष्य रेखाटणारी पुस्तके: आधुनिक महाराष्ट्र के शिल्पकार, आमचे नेते यशवंतराव, कृष्णाकाठचा माणूस, घडविले त्यांना माऊलीने, नवमहाराष्ट्राचे शिल्पकार, मुलांचे यशवंतराव चव्हाण, यशवंतराव : इतिहासाचे एक पान, यशवंतराव : एक इतिहास.


◾️यशवंतरावांचे आर्थिक विचार

यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्व इत्यादीशी निगडीत आहेत.


🔺यशवंतरावांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी


◾️ यशवंतरावांना भाषण, संगीत आणि भजन-कीर्तनाची आवड होती. त्यांनी अनेक वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिके पटकावली. 

◾️तयांनी सालसेत येथे सत्याग्रहात भाग घेतला होता. 


◾️ यरवडा तुरुंगात असताना आचार्य भागवत, एस.एम.जोशी यांच्याशी त्यांची ओळख झाली. तेथेच त्यांना राजकीय, सामाजिक प्रश्नांची जाणीव झाली.


◾️ 1930 साली महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केल्यानंतर त्यांनी त्यामध्ये भाग घेतला


◾️ 1932 साली त्यांना पहिला तुरुंगवास घडला. या कारावासात मार्क्सवादाशी विचारांशी त्यांचा परिचय होऊन काँग्रेसमधील रॉयपंथीय गटाशी त्यांचे संबंध वाढले.

◾️ दसऱ्या महायुद्धाच्या वेळी यशवंतराव चव्हाणांना रॉय यांनी घेतलेली युद्धविषयक भूमिका अमान्य झाली. 

◾️1942 साली छोडो भारत आंदोलनात ते सहभागी झाले


◾️1946 साली मुंबई प्रांताच्या विधिमंडळाच्या निवडणुकीत ते सातारा मतदार संघातून निवडून संसदीय चिटणीस झाले.


◾️1948 साली त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या चिटणीसपदावर नियुक्ती झाली.1952 ला ते स्थानिक स्वराज्य व पुरवठा खात्याचे मंत्री झाले


◾️1 नोव्हेंबर 1956 ला द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले व 1960 साली संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले.


◾️ 1962-66 या काळात ते भारताचे संरक्षणमंत्री, 1966-70 गृहमंत्री, 1970-74 पर्यंत अर्थमंत्री व 1974 साली परराष्ट्रमंत्री बनले.


◾️ यशवंतराव चव्हाण यांनी 25 नोव्हेंबर 1984 रोजी जगाचा निरोप घेतला.


संयुगाचे नाव रेणुसूत्रे Chemical Name



पाणी(हायड्रोजन ऑक्साइड) H2O Hydrogen Oxide


अमोनिआ NH3 Ammonia


हायड्रोक्लोरिक आम्ल HCl Hydrochloric Acid


सल्फ्युरिक आम्ल H2SO4 Sulphuric Acid


कार्बनडाय ऑक्साइड CO2 Carbon Dioxide


सोडिअम ब्रोमाइड NaBr Sodium Bromide


कॅल्शिअम ऑक्साइड CaO Calcium Oxide


मॅग्ननोशीअम वलोराइड MgCl2 Magnesium chloride


पोटॉशीअम नायट्रेट KNO3 Potassium Nitrate


पोटॉशीअम कार्बोनेट K2CO3 Potassium Carbonate


पोटॉशीअम क्लोराइड Kcl Potassium Chloride


अमोनिअम सल्फेट (NH4)2SO4 Ammonium Sulphate


सोडिअम फॉस्फेट Na3PO4 Sodium Phosphate


अॅल्युमिनिअम क्लोराइड AlCl3 Aluminium Chloride


अॅल्युमिनिअम हायड्रॉंक्साइड Al(OH)3 Aluminium Hydroxide


कॅल्शिअम कार्बोनेट CaCO3 Calcium Carbonate


अमोनिअम हायड्रॉंक्साइड NH4OH Ammonium Hydroxide


सोडिअम बायकार्बोनेट NaHCO3 Sodium Bicarbonate


हायड्रॉंब्रोमीक आम्ल HBr Hydrotropic Acid


नायट्रीक आम्ल HNO3 Nitric Acid


हायड्रोजन सल्फाइड H2S Hydrogen Sulphide


कार्बोनिक आम्ल H2CO3 Carbonic Acid


फॉस्पोरिक आम्ल H3PO4 Phosphoric Acid


सोडिअम हायड्रॉंक्साइड NaOH Sodium Hydroxide


पोटॉशीअम क्लोरेट KOH Potassium Chlorate


चुनखडी (शाहाबाद) CaCO3 Calcium Chlorate


पोटॉशीअम क्लोरेट KClO3 Potassium Chlorate


पोटॉशीअम परमँगनेट KMnO4 Potassium Permanganate


मॅगनीजडाय ऑक्साइड MnO2 Manganese dioxide


मॅग्नोशीअम ऑक्साइड MgO Magnesium Oxide


झिंक सल्फेट ZnSO4 Zinc Sulphate


झिंक क्लोराइड ZnCl2 Zinc Chloride

मिथेन CH4 Methane


सिल्व्हर नायट्रेट AgNO3 Silver Nitrate


सोडिअम नायट्रेट NaNO3 Sodium Nitrate


सोडिअम सल्फेट NaSO4 Sodium Sulphate


जिपसम (कॅल्शिअम सल्फेट) CaSO4 Gypsum (Calcium Sulphate)


इपसम(मॅग्नेशिअम सल्फेट) MgSO4

 Epsom (Magnesium Sulphate)


कॉपर सल्फेट (मोरचूद) CuSO4 Copper Sulphate


चुन्याची निवळी (कॅल्शिअम हायड्रॉंक्साइड) Ca(OH)2 Calcium Hydroxide


मीठ/ कॉमन सॉल्ट / सोडिअम क्लोराइड) NaCl Common Salt (Sodium Chloride)


सोडाअश/ सोडिअम कार्बोनेट Na2CO3 Sodium Carbonate

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...