Friday 25 November 2022

'संविधान दिवस' 26 नोव्हेंबर

देशभरात आज 'संविधान दिवस' साजरा केला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली तो हाच दिवस. या निमित्तान देशभात विविध कार्यक्रमांचं आजोयन करण्यात आलं आहे. या निमित्तानं जाणून घेऊयात संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी...

📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖

💠 १. २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो?

२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती.

💠 २. संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?

- संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.

💠 ३. कसं लिहीलं गेलं संविधान?

-आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं. यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याी जबाबदारी त्यांना देण्यात आली. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.

💠 ४. संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते?

-२९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीनं आपल्या कामकाजास सुरुवात केली. जवाहरलाल नेहरू,अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला आहे.

💠 ५. संविधान सभचे अध्यक्ष कोण होते?
-९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती गठीत करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. पुढं ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले.

💠६. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

-फाळणीनंतर संविधान सिमितीच्या संदस्यांची संख्या २९२ झाली. समितीच्या ११ बैठका झाल्या. त्या १६५ दिवस चालल्या. समितीच्या १९ उपसमित्या जलद कामकाजाच्या दृष्टीनं कार्यरत होत्या. त्यात मसुदा समिती होती. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. या मसुदा समितीच्या ४४ सभा झाल्या.

💠 ७. आपल्या संविधानात किती परिशिष्टे आहेत?

- भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.

💠 ८. भारतीय संविधान कधी लागू करण्यात आलं?

-२६ जानेवारी, १९५० रोजीच भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला.

💠 ९. संविधानात कोणाचं हस्तलेखन आहे?

- भारताचे संविधान बनून तयार होत होते. पण संविधान हे हस्तलिखीत असावं अशी नेहरुंची इच्छा होती. बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी ६ महिने लागले.

💠 १०.संविधानाच्या पानांवर नक्षीकाम कोणी केलं?

-आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती. तसंच प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे.

राज्यसेवा प्रश्नसंच

1. कोणत्या राज्याला 28 ऑगस्ट 2018 पासून आणखी सहा महिन्यासाठी "अशांत शेत्र" म्हणून घोषित करण्यात आले आहे?

A) बिहार      

B) आसाम 💬      

C) अरुणाचल प्रदेश        

D) सिक्किम




2. मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसींना 27 टक्के आरक्षण देताना कोणत्या सालच्या जनगणनेचा आधार घेण्यात आला होता?

A) 1931💬      

B) 1971          

C) 1951        

D) 1961


3. यावर्षीचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार कोणास देण्यात आला आहे?

A) फ्रान्सिस दिब्रिटो                  

B) रामकृष्ण महाराज लहवितकर    

C) किसन महाराज साखरे💬    

D) रामकृष्ण महाराज बोधले


4. जगात सर्वाधिक इंटरनेट ग्राहकांच्या बाबतीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

A) चीन 💬        

B) ब्राझील          

C) भारत          

D) अमेरिका


5. BIMSTEC या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

A) 1991          

B) 1996        

C) 1997💬      

D) 1998


6. कोणता देश 29व्या " अबू धाबी आंतरराष्ट्रीय पुस्तक " मेळाव्याचा (ADIBF) " सन्माननीय पाहुणा " आहे?

A) बांग्लादेश        

B)  इराण          

C) भारत 💬        

D) पाकिस्तान


7. कोणत्या भारतीयास UN च्या सहाय्यक महासचिव तसेच संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रमाच्या (UNEP) न्यूयॉर्क येथील कार्यालयाचे प्रमुख म्हणून नियुक्ती केले गेले आहे?

A) सत्या त्रिपाठी💬        

B) प्रज्ञा झा        

C) शशी थरूर        

D) यापैकी नाही


8. भारतातील किती राज्यांमध्ये सध्या विधानपरिषद अस्तित्वात आहे?

A) पाच          

B) सहा          

C) सात💬        

D) आठ


9. कोणत्या हवाई वाहतूक कंपनीने नुकताच जैवइंधनावर विमान वाहतुकीचा  प्रयोग यशस्वी केला आहे?

A) इंडिगो        

B) स्पाइस जेट 💬    

C) एअर इंडिया        

D) गो एअर


10.  "अटल जी ने कहा" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

A) नरेंद्र मोदी      

B) ब्रिजेंद्रा रेही 💬      

C) व्ही एस नाईक        

D) सत्येन्द्र अगरवाल


11. चर्चेत असलेली नाओमी ओसाका ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या देशाची आहे?

A) जपान 💬    

B) अमेरिका      

C) इंग्लंड      

D) सर्बिया


12. "अभयम-181" या नावाचे मोबाईल अॅप हे महिलांना सुरक्षा देण्याच्या हेतूने कोणत्या राज्य सरकारने लॉंच केले आहे?

A) गुजरात💬      

B) महाराष्ट्र      

C) मध्य प्रदेश    

D) तामिळनाडू


13. कम्युनिशंस कम्पॅटिबिलिटी अँड सिक्युरिटी एग्रीमेंट

(COMCASA) हा करार खालील कोणत्या दोन देशात झाला?

A) भारत - फ्रान्स    

B) भारत - जपान      

C) जपान - अमेरिका    

D) भारत - अमेरिका💬


14. रंजन गोगोई हे सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश असून ते सर्वोच्च न्यायालयाचे कितवी सरन्यायाधीश आहे?

A) 44      

B) 45      

C) 46💬    

D) 47


15. खालीलपैकी कोणत्या देशाने ' NOPE ' या मंगळ मोहिमेची घोषणा केली आहे?

A) इस्राईल      

B) यूएई 💬      

C) सौदी अरेबिया          

D) इराण


16. नुकताच निवृत्त झालेला क्रिकेटपटू ऍलिस्टर कुक हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे?

A) दक्षिण आफ्रिका        

B) ऑस्ट्रेलिया      

C) वेस्ट इंडिज      

D) इंग्लंड💬


17. भारतात प्रथमच भरविण्यात आलेल्या 'FIBA 3×3 world tour master' ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

A) बास्केटबॉल 💬      

B) बॉक्सिंग    

C) ब्रिज      

D) बॅटमिंटन


18.  भारताच्या पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 मध्ये कोणत्या संघाला नमवत ब्राँझ पदक मिळविले?

A) जपान      

B) दक्षिण कोरिया    

C) पाकिस्तान💬    

D) फिलिपिन्स


19. "Moving on, moving forward : A year in office" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

A) व्यंकय्या नायडू 💬    

B) रामनाथ कोविंद    

C) सुमित्रा महाजन    

D) अरुण जेटली


20. नुकतेच निधन झालेले आर्थर परेरा हे कोणत्या खेळाशी संबंधित होते?

A) बुद्धिबळ      

B) बॅटमिंटन      

C) फुटबॉल💬      

D) टेनिस


21. राज्य शासनातर्फे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत देण्यात येणारा 2016- 17 चा " तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम " या पुरस्कारात प्रथम क्रमांक कोणत्या ग्रामपंचायतीस मिळाला?

A) शेळगाव गौरी    

B) मन्याचीवाडी      

C) हिवरे बाजार 💬    

D) खाटाव


22. चतुरंग प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार यावर्षी कोणास देण्यात आला?

A) विजय भटकर      

B) गिरीश प्रभुणे      

C)सुहास बहुळकर 💬        

D) यापैकी नाही


23. दुसरी "जागतिक हिंदू परिषद" कुठे पार पडली?

A) नवी दिल्ली        

B) लंडन        

C) शिकागो 💬      

D) न्यूयॉर्क



 1. संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?

अ) ती प्रौढ मताधिकारावर आधारित न्हवती

ब) ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती.

क) ब्रिटिश भारतास 292 जागा देण्यात आल्या होत्या

ड) ती विविध समित्यांद्वारे कार्य करीत असे.

1.अ आणि ब

2. ब आणि क

3. अ आणि ड✅

4  वरील सर्व


2.खालीलपैकी कोणती सेवा अखिल भारतीय सेवा म्हणून गणली जात नाही

1. भारतीय प्रशासकीय सेवा 

2. भारतीय पोलीस सेवा

3. भारतीय विदेश सेवा✅

4. भारतीय वन सेवा


3.घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेच्या आधारे झाली?

1. सिमला परिषद

2. कॅबिनेट मशीन✅

3. क्रिप्स योजना

4.यापैकी नाही



4.राज्यपालांची नेमणूक कोण करतात?

1. पंतप्रधान

2. मुख्यमंत्री

3. राष्ट्रपती✅

4. उपराष्ट्रपती


5.खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

1.लोकसभेपेक्षा राज्यसभेला व्यापक अधिकार आहेत

2.राज्यसभेपेक्षा लोकसभेला व्यापक अधिकार आहेत✅

3. राज्यसभेचा कालावधी 6 वर्ष असतो

4. लोकसभा हे स्थायी सभागृह आहे.


6.राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो?

1. राष्ट्रपती

2. पंतप्रधान

3 उपराष्ट्रपती✅

4. गृहमंत्री


7.भारतीय घटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यामागील मुख्य संकल्पना म्हणजे ......

1. कल्याणकारी राज्याची निर्मिती✅

2. समाजवादी व निधर्मी समाज रचना

3. व्यक्तीस्वातंत्र्याची हमी

4. मूलभूत हक्कांना बाधा पोहोचविण्यास प्रतिरोध


8.भारतीय राज्यघटनेतील कलम 280 कशाशी संबंधित आहे?

1. भारतीय नियोजन आयोग

2. भारतीय निवडणूक आयोग

3. संघ लोकसेवा आयोग

4. भारतीय वित्त आयोग✅


9.वन हा विषय कोणत्या सुचितील आहे?

1. केंद्र

2. राज्य✅

3. समवर्ती

4. यापैकी सर्व


10.वार्षिक केंद्रीय आर्थिक अंदाजपत्रकाला लोकसभेची मंजुरी न मिळाल्यास ....

1. अंदाजपत्रक दुरुस्त करून फेरसादर केले जाते 

2. राज्यसभेचा अभिप्राय घेण्याकरिता पाठविले जाते 

3. राष्ट्रपतींचे अभिप्रायासाठी पाठविले जाते

4. पंतप्रधान व मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो.


प्रश्न 1 मातृत्व वंदना योजना महाराष्ट्रात कोणता जिल्हा प्रथम क्रमांकचा ठरला आहे?

A  कोल्हापूर 

B  सातारा  

C  पुणे 

D  नाशिक 

उत्तर  2


प्रश्न 2  इम्रान खान हे पाकिस्तान या देशाचे 22 वे पंतप्रधान ठरले आहेत त्यांनी जो पक्ष स्थापन केला होता तेहरिक-ए-इन्साफ याची स्थापना पुढील पैकी केव्हा करण्यात आली होती?

A  14 ऑगस्ट 1993

B  16  जुलै  1996

C  22 एप्रिल 1996

D  16 ऑक्टोबर 1998

उत्तर  C


प्रश्न 3  पुढील विधाने अभ्यासा?

अ  इस्रोने 23 नोवेंबर 2018 रोजी तीस उपग्रह अवकाशात सोडले

ब 30 पैकी पंचवीस उपग्रह हे अमेरिकेचे आहेत

क या मोहिमेत भारतासह एकूण दहा देश सहभागी आहेत

वरीलपैकी कोणती विधान/ने सत्य आहे

1  फक्त अ

2  ब आणि  क

3  फक्त  क

4  अ आणि  ब

उत्तर  4


प्र 4  इसरो ने जे 30 उपग्रह सोडले त्यामध्ये कोणत्या देशाचा समावेश होत नाही?

1  अमेरिका

2   जपान

3   स्पेन

4   नेदरलँड

उत्तर  2


प्र  5 हाइपर सपेक्ट्रल इमेजिंग सॅटॅलाइट हा उपग्रह कोणत्या  कोणत्या देशाने विकसित केला आहे?

1  फ्रांस

2  रशिया

3  भारत

4   चीन

उत्तर  3


प्र  6  इंडियन पोस्टल पेमेंट बँक ची सुरुवात प्रायोगिक तत्वावर खालीलपैकी कोणत्या शहरात सुरू करण्यात आली होती?

1   पुणे

2   रांची

3  अलाहाबाद

4   लखनऊ

उत्तर  2


प्र  7   पुढील पैकी कोणती बँक ही ग्राहकांना क्रेडिट कार्ड सेवा पुरवत नाही?

1  बंधन बँक

2  देना बँक

3  महाराष्ट्र ग्रामीण बँक

4  पोस्टल पेमेंट बँक

उत्तर 4


8  वारसा यादीत पुढिलपैकी कोणत्या रेल्वेचा समावेश होत नाही?

1  निलगिरी

2  दार्जिलिंग

3  पठाणकोट

4  कलका

उत्तर  3


प्र  9  नुकतेच भारतीय रेल्वे ने कोणत्या देशाच्या रेल्वे सोबत करारावर हस्ताक्षर केले? 

1  चीन

2  रशिया

3  नेपाळ

4  म्यानमार

उत्तर  3


प्र  10  महाराष्ट्रत पहिला समलिंगी विवाह कोठे पार पडला?

1  नाशिक

2  नागपूर

3  यवतमाळ

4  पुणे

उत्तर  3

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची गौरवगाथा प्रश्न सराव


🔹परश्न १:- 'दलितांचा मुक्तीदाता ' या शब्दात डॉ.आंबेडकरांचा गौरव कोणी केला ?


१) शाहू महाराज ✅✅

२) डॉ.बेव्हरेल निकोल्स

३) जोतिबा फुले

४) यापैकी नाही


🔹परश्न २:-  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओ.बी.सी समाज बांधवांच्या हक्क अधिकारांसाठी संविधानात कोणत्या कलमाची निर्मिती केली ?


१) कलम ३४०✅✅

२) कलम ३४१

३) कलम ३४२

४) कलम ३४३


🔹परश्न ३:-  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्माची दीक्षा कोणी दिली ?


१) भंते संघरत्न

२) भंते प्रज्ञानंद

३) भंते चंद्रमणी महास्थीर ✅✅

४) भंते सद्दतिस्स


🔹परश्न ४:-  विश्वरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या साली मिळाला ?


१) १९९२

२) १९८९

३) १९९०✅✅

४) १९९१


🔹परश्न ५:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता ?


१) थॉटस ऑन पाकिस्तान 

२) बुद्ध आणि त्यांचा धम्म ✅✅

३) हू  वेअर शुद्राज

४) दि अनटचेबल्स 


🔹परश्न ६ :-  १९५२ मध्ये कोलंबिया विद्यापीठाने डॉ.आबेडकरांना कोणती पदवी बहाल केली ?


१) एम.ए

२) पी.एच.डी

३) एल.एल. डी✅✅

४) डी.एस सी


 🔹परश्न ७ :-  महाडचा क्रांती स्तंभ किती उंच आहे ?


१) ५१ फूट ✅✅

२) ५५ फूट

३) ५७ फूट

४) ५४ फूट



 🔹परश्न ८:- डॉ.आंबेडकर यांनी त्यांच्या तीन गुरू पैकी दुस-या क्रमांकावर कोणाला गुरू मानले ?


१) तथागत गौतम बुद्ध

२) महात्मा ज्योतिबा फुले

३) संत कबीर ✅✅

४) यापैकी नाही


🔹 परश्र ९ :-  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मातरांची घोषणा कधी केली ?


१) १४ ऑक्टोबर १९३५

२) १३ ऑक्टोबर १९५५

३) १४ ऑक्टोबर १९५५

४) १३ ऑक्टोबर १९३५ ✅✅


🔹 परश्न १० :-  जगाच्या शिल्पकारामधे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कितवा क्रमांक लागतो ?


१) पहिला

२) दुसरा

३) तिसरा

४) चौथा ✅✅


भारतीय संविधान निर्मितीच्या संविधान सभेत 15 महिलांचा समावेश होता.


1) अँनी मास्करेन

2) बेगम अझिझ रसुल

3) दक्षयानी वेलायुथ

4) दुर्गाबाई देशमुख (मद्रास़)

5) हंसाबेन मेहता

6) पुर्णिमा बँनर्जी

7) रेणुका रे

8) विजयालक्ष्मी पंडीत (सं. प्रांत)

9) सरोजिनी नायडु (बिहाऱ)

10) सुचेता क्रुपलानी

11) कमला चौधरी

12) लीला रे 

13) मालती चौधरी

14) राजकुमारी अम्रुत कौर (मध्य प्रांत)

15) अम्मु स्वामीनाथन 


“डाॅ. आंबेडकर आणि घटना समित्या”


🔸 डाॅ. आंबेडकर १ समितीचे अध्यक्ष तर एकुण १० समित्यांचे सदस्य होते. सर्वाधिक समित्यांचा सदस्य असलेले ते एकमेव व्यक्ती होते. 


🔸 २९ आॅगस्ट १९४७ रोजी स्थापन केलेल्या मसुदा समितीचे(Drafting committee) ते अध्यक्ष होते.


🔸 पढील १० समित्यांचे ते सदस्य होते - 


१) ध्वज समिती

२) मुलभूत हक्क उपसमिती

३) अल्पसंख्यांक उपसमिती

४) संघ राज्य घटना समिती

५) घटना सुधारणा उपसमिती

६) नागरिकत्व तदर्थ समिती

७) सर्वोच्च न्यायालय तदर्थ समिती

८) सल्लागार समिती

९) पुर्व पंजाब आणि बंगालच्या अल्पसंख्यांकांच्या       समस्येवरील उपसमिती

१०) संविधान सभा कार्य समिती(Functions committee)


🔸 जलै १९४६ च्या घटना सभात्याग निवडणुकीत आंबेडकर बंगाल मधील “जेस्सोर आणि खुलना” या मतदार संघातून निवडुन आले होते.”जोगेंद्र नाथ मंडल” यांनी यासाठी या जागेचा राजीनामा दिला होता. 


🔸 दशाची फाळणी झाल्यावर हा भाग पाकिस्तान मध्ये गेला. त्यावेळी आंबेडकरांनी त्या जागेचा राजीनामा दिला.


🔸 मात्र नंतर आंबेडकर “बाँम्बे प्रांतातुन” घटना सभेवर पुन्हा निवडुन आले. यावेळी बॅ. “एम. आर. जयकर” यांनी राजीनामा दिला होता.

भारताचे संविधान प्रश्नसंच

भारताचे संविधान

भारताचे संविधान
भारतातील सर्वोच्च कायदा

भारताचे संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा (legal basis) आहे. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत.

भारताचे संविधान
Constitution of India.
भारतीय संविधानाची उद्देशिका
मूळ शीर्षक
भारतीय संविधान
न्यायक्षेत्र
भारत
स्वीकारल्याचा दिनांक
२६ नोव्हेंबर १९४९
अंमलबजावणीचा दिनांक
२६ जानेवारी १९५०
शासनप्रणाली
संघीय, संसदीय, घटनात्मक प्रजासत्ताक
शाखा
तीन (कार्यकारी, विधिमंडळ आणि न्यायपालिका)
वैधानिक संस्था
दोन (राज्यसभा आणि लोकसभा)
कार्यकारी
पंतप्रधान - कनिष्ठ सभागृह संसदेचे जबाबदार नेतृत्व करणारे मंत्रीमंडळ
न्यायपालिका
सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये आणि जिल्हा न्यायालये
संघराज्य
संघराज्य
निवडणूक गण
होय, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी
अंतर्भूत कलम

एकूण घटनादुरुस्त्या
१०५
शेवटची घटनादुरूस्ती
१५ ऑगस्ट २०२१ (१०५ वी)
दस्तऐवज जतन स्थान
संसद भवन, नवी दिल्ली, भारत
स्वाक्षरीकर्ते
‌ संविधानसभेचे २८४ सदस्य
पुनर्स्थित करा
भारत सरकारचा कायदा १९३५
भारतीय स्वातंत्र्य कायदा १९४७

१९५७ पर्यंतचे भारताचे संविधान (हिंदी)

बाबासाहेब आंबेडकर आणि २०१५ च्या भारतीय टपाल तिकिटावर भारतीय संविधान

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताची राज्यघटनेची प्रत संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सूपूर्द करतांना, २६ नोव्हेंबर १९४९
देशाच्या कारभारासंबंधी च्या तरतुदीत एकत्रितपणे व सुसूत्रपणे संविधानामध्ये नमूद केलेल्या आहेत संविधान हे देशाच्या राज्यकारभारात संबंधीच्या तरतुदींचा लिखित असा दस्तऐवज आहे जनतेतून निवडून आलेल्या प्रतिनिधींनी मधून शासन किंवा सरकार हे स्थापन केले जाते संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन आहे संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेल्या कायद्यानुसार शासन चालवले जाते संविधानाला विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाहीत तसे केल्यास न्याय मंडळ हे कायदे रद्द करू शकते.

इतिहास संपादन करा
मुख्य लेख: भारताची संविधान सभा

भारतीय संविधानाच्या मसूदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीच्या इतर सदस्यांसमवेत. (बसलेल्यां पैकी डावीकडून) एन. माधवराव, सय्यद सदुल्ला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (अध्यक्ष), अल्लादी कृष्णास्वामी अय्यर, सर बेनेगल नरसिंह राव. (उभे असलेल्यांपैकी डावीकडून) एस.एन. मुखर्जी, जुगल किशोर खन्ना व केवल कृष्णन् (२९ जानेवारी, इ.स. १९४७
१९५० साली अंमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे १९३५ च्या भारत सरकार कायद्यावर आधारित आहे. १९३५ सालच्या या कायद्यान्वये भारताच्या अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला होता. ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ॲटली यांच्या शिष्टमंडळाच्या स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एका मसुदा समितीच्या स्थापनेविषयीच्या कल्पनेस भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या नेत्यांनी सहमती दर्शविली होती. १९४६ च्या उन्हाळ्यात या समितीची स्थापना झाली व तिची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली तर फ्रॅंक अँथनी यांच्या उपाध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील संविधान सभागृहात झाली. ११ डिसेंबर रोजी सर्व सदस्यांच्या सहमतीने डॉ. राजेंद्रप्रसाद यांची अध्यक्षस्थानी तर आशुतोष मुखर्जी यांची उपाध्यक्ष स्थानी निवड करण्यात आली. हे सभागृह आज सेंट्रल हॉल या नावाने परिचित आहे. पहिल्या बैठकीला ९ महिलांसह एकूण २११ सदस्य उपस्थित होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने भारताचे प्रतिनिधी या रूपात काम केले होते.

२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापन झाली. मसुदा समिती ही सर्वात महत्त्वाची समिती होते. हिचे काम संविधान निर्मिती करणे हे होते. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेद्वारे स्वीकारला गेला. त्यामुळे भारतात २६ नोव्हेंबर हा दिवस "भारतीय संविधान दिन" म्हणून साजरा केला जातो.[१] नागरिकत्व, निवडणुका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या. संविधान संपूर्ण रूपाने २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस "भारतीय प्रजासत्ताक दिन" म्हणून साजरा केला जातो.

भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे 1 ते 51पर्यंत

भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे Important Constitutional Articles

संविधानात्मक महत्वाची कलमे Important Articles

लोकशाही प्रशासन असणाऱ्या राष्ट्रांमध्ये लोकांच्या हाती सत्ता एकवटलेली  असते.  लोकशाही प्रशासनामध्ये लोक महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. 

अशा लोकांना आपले हक्क व अधिकार माहित असणे गरजेचे असते.  आणि असे हक्क-अधिकार लोकशाही राष्ट्राच्या संविधाना कडून मिळत असतात.  संविधानामध्ये हे अधिकार स्पष्ट करणारी महत्त्वाची कलमे असतात. 

 भारतीय संघराज्याने सुद्धा लोकशाही प्रशासन व्यवस्था स्वीकारलेली आहे. म्हणून आपल्या देशात लोकांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. 

भारतीय संघराज्यातील प्रत्येक नागरिक महत्त्वाचा आहे.

अशा प्रत्येक नागरिकाला संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार विषयक  संविधानात्मक महत्वाची कलमे  या ठिकाणी पाहणार आहोत.

कलम 1 – संघराज्य या राज्यांचा संघ असेल असे म्हटले आहे 

कलम 2 – मध्ये भारतीय संघात योग्य वाटतील त्या अटी आणि शर्ती वर नवीन राज्यांना समाविष्ट करणे हा अधिकार कलम 2 ने संसदेला दिला 

कलम 3 – मध्ये नवीन राज्याची निर्मिती व विद्यमान राज्याच्या क्षेत्रात सिमात किंवा नावात बदल 

कलम 4 – परिशिष्ट 1 व परिशिष्ट 4 ची दुरुस्ती आणि पूरक अनुषंगिक आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या त्यासंबंधी कलम 2 व कलम 3 अंतर्गत करण्यात आलेले कायदे

राज्यघटनेतील भाग दोन मध्ये कलम 5 ते कलम 11 पर्यंतच्या तरतुदी नागरिकत्वाशी संबंधित आहेत.

कलम 5 – राज्य घटनेच्या प्रारंभीचे नागरिकत्व 

कलम 6 – पाकिस्तान मधून भारतात स्थलांतरित झालेल्या विवाहित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क 

कलम 7 – पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क 

कलम 8 – मूळ भारतीय असणाऱ्या पण भारताबाहेर राहणाऱ्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क 

कलम 9 – परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादन करणाऱ्या व्यक्ती भारताच्या नागरिक नसणे 

कलम 10 – नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे 

कलम 11 – कायद्याद्वारे संसद नागरिकत्वाच्या याचे नियमन करेल.

भारतीय राज्यघटनेच्या भाग-3 मधील तरतुदी मूलभूत हक्काचे संबंधित असून अमेरिकेच्या घटनेवरून या स्वीकारण्यात आलेल्या आहेत. कलम 12 ते 35 या कलमांचा समावेश मूलभूत हक्कांमध्ये होतो.

*समानतेचा हक्क कलम 14 ते 18 

*स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22 

*शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23 ते 24 

*धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28 

*सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम 29 30 

*घटनात्मक उपाययोजनेचा हक्क कलम 32

कलम 31 – (निरसित)

कलम 33 – सैन्य दलासाठी मूलभूत फक्त संसदेला अधिकार 

कलम 34 – लष्करी कायदा लागू मूलभूत हक्कावर मर्यादा 

कलम 35 – मूलभूत कशासाठी तरतुदी लागू करण्याचा कायदा

भारतीय राज्यघटनेच्या भाग-4 मध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे देण्यात आलेली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे कलम 36 ते 51 पर्यंत आहेत.

कलम 36 – राज्याची व्याख्या

कलम 37 – निर्देशक तत्वाचे उपयोजन

कलम 38 – लोककल्याणाच्या संवर्धनासाठी राज्याने समाजव्यवस्था प्रस्थापित करणे

कलम 39 – राज्याने अनुसरा वयाच्या धोरणाची विवक्षित तत्वे

कलम 39 a – समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य

कलम 40 – ग्रामपंचायतीचे संघटन

कलम 41 – कामाचा शिक्षणाचा आणि युवक शेत बाबतीत लोक सहाय्याचा यांची तरतुदी

कलम 42 – कामाच्या ठिकाणी न्याय व मानवीय परिस्थिती आणि प्रसुती विषयक सहाय्य याची तरतूद

कलम 43 – कामगारांना निर्वाह वेतन इत्यादी

कलम 43 A – औद्योगिक व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग

कलम 43 B – सहकार संस्थांचे प्रवर्तन

कलम 44 -नागरिकांसाठी समान नागरी संहिता 

कलम 45 – 6 वर्षाखालील बालकांची प्रारंभिक बाल्य अवस्थेतील देखभाल व शिक्षणाची तरतूद 

कलम 46 – अनुसूचित जाती जमाती आणि इतर दुर्बल घटकांचे शैक्षणिक आणि आर्थिक हित संवर्धन 

कलम 47 – पोषणाचा व जीवनमानाचा स्तर उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्यांचे कर्तव्य 

कलम 48 – कृषी आणि पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था करणे 

कलम 48 A – पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने व जीवसृष्टी यांचे रक्षण करणे 

कलम 49 – राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाची स्मारके ठिकाने वास्तू यांचे संरक्षण 

कलम 50 – कार्यकारी यंत्रणेने पासून न्याय यंत्रणेची फारकत

कलम 51 – आंतरराष्ट्रिय शांतता आणि सुरक्षा यांचे संवर्धन.

संविधान सभेबाबतच्या महत्त्वाच्या समित्या.....

💠मसुदा समिती
अध्यक्ष__डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.

💠कार्यपद्धती नियम समिती
अध्यक्ष__डॉक्टर राजेंद्र प्रसाद.

💠सुकाणू समिती
अध्यक्ष__डॉक्टर राजेंद्र प्रसाद.

💠स्टाफ व वित्त समिती
अध्यक्ष__डॉक्टर राजेंद्र प्रसाद.

💠योग्यता समिती
अध्यक्ष__अल्लादी कृ.अय्यर.

💠ऑर्डर ऑफ बिझनेस समिती
अध्यक्ष__के  एम मुंशी.

💠संस्थानिकांची चर्चेसाठी समिती
अध्यक्ष__पंडित जवाहरलाल नेहरू.

💠ध्वज समिती
अध्यक्ष__डॉक्टर राजेंद्र प्रसाद.

💠संविधान सभेच्या कार्यावरील समिती
(भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याखाली)
अध्यक्ष__ग.वा. मावळणकर.

💠संघराज्य अधिकार समिती
अध्यक्ष__पंडित जवाहरलाल नेहरू.

💠प्रांतिक घटना समिती
अध्यक्ष__वल्लभाई पटेल.

2 मार्क्सचा प्रश्न नक्की पडेल खालील माहिती मधून - भारतीय संविधान आणि सर्व काही

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. आपल्या संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे. आज संविधान दिनानिमित्त जाणून घेऊ आपल्या राज्यघटनेविषयी…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन (1947) झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारला गेला. यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस “भारतीय संविधान दिन” म्हणून साजरा केला जातो.

⭐️ भारतीय संविधान आणि वैशिष्ट्ये :

● भारतीय संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.

● भारताची राज्यघटना उद्देशिका, मुख्य भाग व 12 पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे.

● मुख्य संविधानाचे 22 विभाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे. सुरूवातीच्या 395 कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत.

● सध्या राज्यघटनेत 448 कलमे (39A, 51A यांसारखे कलमे घटना दुरुस्तीद्वारा) असून भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते.

● भारतीय संविधान मुख्यत्वे 1935च्या भारत सरकार कायद्यावर आधारित आहे.

● भारताने अमेरिकेप्रमाणे अध्यक्षीय शासनपद्धती न स्वीकारता ब्रिटनप्रमाणे संसदीय शासनपद्धती स्वीकारली आहे.

● घटनेने लोकसभा व राज्यांच्या विधानसभांच्या निवडणूकांसाठी सार्वत्रिक प्राैढ मतदानाची तरतूद केलेली आहे. 18 वर्षे पूर्ण असणारा प्रत्येक नागरिक या निवडणूकांमध्ये मतदान करू शकतो.

● भारत हे संघराज्य असूनही भारतीय राज्यघटनेने एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केलेला आहे.

● भारताने संघराज्य पद्धतीचा स्वीकार केला आहे. संपूर्ण देशासाठी केंद्र सरकार असून प्रत्येक घटक राज्यांसाठी स्वतंत्र सरकार आहे.

भारतीय संविधान तयार करताना विविध देशांच्या संविधानांचा अभ्यास करण्यात आला आहे. इतर देशांच्या संविधानातील चांगल्या तरतूदी भारतीय संविधानात समाविष्ठ करण्यात आल्या. त्यातील गोष्टी खालीलप्रमाणे : 

1) संसदीय शासन पद्धती : इंग्लंड
2) मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड
3) मूलभूत हक्क : अमेरिका
4) न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका
5) न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिकाय
6) कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड
7) सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड
8) कायदा निर्मिती : इंग्लंड
9) लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड
10) संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया
11) संघराज्य पद्धत : कॅनडा
12) शेष अधिकार : कॅनडा

भारताची राज्यघटना – भारतीय संविधान

भारताची राज्यघटना – भारतीय संविधान

भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा (legal basis) आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.
भारतीय संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे.
नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी 26 इ.स. 1950 पासून राज्यघटना अंमलात आली.
1950 साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे 1935 च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे.
ऑगस्ट 29, रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली.
अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी स्वीकारला गेला.
यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.
नागरिकत्व, निवडणूका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या.
संविधान संपूर्ण रूपानेजानेवारी 26, 1950 रोजी लागू झाले.
त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस ‘भारतीय प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो.
भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व 12 पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे.
मुख्य संविधानाचे 22 विभाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे.
सुरूवातीच्या 395 कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत.
सध्या राज्यघटनेत 447 कलमे असून भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते.
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम (Sovereign) , समाजवादी (Socialist), धर्मनिरपेक्ष (Secular), लोकशाही (Democratic) प्रजासत्ताक(Republic) आहे.
मूळ उद्देशिकेत समाजवादी (Socialist) व धर्मनिरपेक्ष (Secular) हे शब्द नव्हते.
राज्यघटनेच्या 42 व्या दुरूस्तीद्वारे ते उद्देशिकेत घालण्यात आले.
काही महत्वपूर्ण वैशिट्ये :

मूलभूत आधिकार
सरकारसाठीची मार्गदर्शक तत्वे
संघराज्य प्रणाली
प्रत्येक भारतीय नागरिकाची मूलभूत कर्तव्ये.
विभाग :

प्रशासकीय (Executive)
विधीमंडळे (Legislative)
न्यायालयीन (Judicial)

संविधान सभेचे कामकाज


–९ डिसेंबर १९४६ रोजी संविधान सभेची पहिली बैठक भरली. या बैठकीला २११ सदस्य हजर होते. जेष्ठतम असलेल्या डॉ. सच्चितानंद सिन्हा यांना संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले.

-११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष व H C मुखर्जी यांची उपाध्यक्षम्हणून निवड करण्यात आली.

-B N राव यांची नेमणूक संविधान सभेचेकायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून करण्यात आली.

–१३ डिसेंबर १९४६ रोजी जवाहरलाल नेहरूयांनी संविधान सभेत ‘उद्देशपत्रिका‘ मांडली व २२ जानेवारी १९४७ रोजी संविधान सभेने तिचा स्वीकार केला.

*महत्वाचे मुद्दे:*

– मे १९४९ मध्ये संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिले.

– २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने भारताच्या राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला.

– २४ जानेवारी १९४७ रोजी संविधान सभेत भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान  स्वीकृत केले.

– २४ जानेवारी १९५० रोजी झालेल्या संविधान सभेच्या शेवटच्या बैठकीत २६ जानेवारीपासून लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत संविधान सभेलाच तात्पुरती संसद म्हणून घोषित करण्यात आले.

संविधान


अनेक देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी २ वर्ष ११ महिने १८ दिवसात आपले संविधान लिहून पूर्ण केले. व
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीने स्वीकारले.
खऱ्या अर्थाने संविधान २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडरांनी आपल्याला सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय मिळवून दिला,

विचार, अभिवेक्ती, विश्र्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य मिळून दिले,

दर्जा ची व संधीची समानता मिळवून दिली,
बंधुता निर्माण केली.
मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य , राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे दिली..

सर्व नागरिकांना समान अधिकार दिला.

संविधान रूपी आपल्याला त्यांनी सोन्याची तिजोरी मिळवून दिली.
हे सर्व आपल्याला सहज मिळालेलं नाही ये..
या मागे अनेक स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या क्रांती विरांचे, राष्ट्र विरांचे योगदान आहे त्यांचा संघर्ष आहे.
यांनी दिलेले योगदान, त्यांचे मूल्य आपण जोपासले पाहिजे.
ते आत्मसात केले पाहिजे.
व त्या संविधानिक मूल्यांना समोर ठेऊन त्या दिशेने आपण वाटचाल केलीच पाहिजे.
एक जागरूक नागरिक म्हणून आपले हक्क समजलेच पाहिजे.
आणि त्या साठी महत्वाचे म्हणजे संविधान हे सर्वांनी वाचलेच पाहिजे.
तरच आपला देश खऱ्या अर्थाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील सुदृढ लोकशाही असलेला देश होईल.

पोलीस भरती ऑनलाईन सराव टेस्ट

 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  १   Click Here  ( Password: 1112)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  २  Click Here  ( Password: 1113)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  ३  Click Here  ( Password: 1114)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  ४  Click Here  ( Password: 1115)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  ५  Click Here  ( Password: 1116)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  ६  Click Here  ( Password: 1117)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  ७  Click Here  ( Password: 1118)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  ८  Click Here  ( Password: 1119)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  ९  Click Here  ( Password: 1120)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  १०   Click Here  ( Password: 1121)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  ११  Click Here  ( Password: 1112)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  १२  Click Here  ( Password: 1112)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  १३  Click Here  ( Password: 1112)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  १४   Click Here  ( Password: 1112)

Latest post

रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera)

📌हे सर्वांत साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना 'स्पंज' म्हणतात.  ➡️त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद...