Monday 20 July 2020

जयंत विष्णू नारळीकर

भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक
जन्म - जुलै १९, १९३८
नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानाची पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल व इतर अनेक बक्षिसे मिळाली. १९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. डॉ. नारळीकर यांच्या पत्नी मंगला नारळीकर ह्या ’नभात हसते तारे’ या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. ’पाहिलेले देश भेटलेली माणसं’ हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे.

🔸संशोधन
स्थिर स्थिती सिद्धान्त
चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
साहित्यातील भर
विविध मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर सातत्याने विज्ञानचिषयक माहितीने भरलेले ललित लेखन प्रसिद्ध होत असते. नारळीकरांच्या पुस्तकांची जगांतील अनेक भाषांत रूपांतरे झाली आहेत.

🔸विज्ञानकथा पुस्तके
अंतराळातील भस्मासुर
अभयारण्य
टाइम मशीनची किमया
प्रेषित
यक्षांची देणगी
याला जीवन ऐसे नाव
वामन परत न आला
व्हायरस

🔸इतर विज्ञानविषयक पुस्तके
आकाशाशी जडले नाते
गणितातील गमतीजमती
युगायुगाची जुगलबंदी गणित अन् विज्ञानाची (आगामी)
नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर)
विज्ञान आणि वैज्ञानिक
विज्ञानगंगेची अवखळ वळणे विज्ञानाची गरुडझेप
विश्वाची रचना
विज्ञानाचे रचयिते
सूर्याचा प्रकोप
Facts And Speculations In Cosmology (सहलेखक : Geoffrey Burbidge)
Seven Wonders Of The Cosmos

🔸आत्मचरित्र
चार नगरांतले माझे विश्व

🔸पुरस्कार
१९६५मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला. २००४मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. २०१०मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम. पी. बिरला हे पुरस्कारही मिळाले आहेत. २०१४साली मिळालेला तेनाली (हैदराबाद) येथील नायुदअम्मा ट्रस्टचा डॉ. वाय. नायुदअम्मा स्मृती पुरस्कार-२०१३ जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे. ’यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार अमेरिकेतील फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार (२०१२)
चरित्र
डॉ. विजया वाड यांनी डॉ. नारळीकर यांचे ’विज्ञान यात्री डॉ.जयंत नारळीकर’ या नावाचे चरित्र लिहिले आहे.

चंद्रावर मानवाने पाऊल ठेवण्याच्या घटनेला 51 वर्षे पूर्ण

🔸NASA (अमेरिका) च्या 'अपोलो 11' यानाच्या सहाय्याने नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पाऊल ठेवल्याच्या ऐतिहासिक घटनेला 20 जुलै 2020 रोजी 51 वर्षे पूर्ण झाली...

🔸या यानामध्ये आर्मस्ट्राँग यांच्यासोबत एडविन अॉल्ड्रीन आणि मायकेल कॉलिन्स हे सहकारीही उपस्थित होते...

🔸आर्मस्ट्राँग नंतर अॉल्ड्रीन यांनीही चंद्रावर पाऊल ठेवले.कॉलिन्स यांच्यावर 'अपोलो 11' या यानाच्या नियंत्रणाची जबाबदारी होती...

🔸'अपोलो 11' यानाच्या लुनार मॉडेलचे नाव 'द ईगल' असे होते...

🔸हे यान 21 तास 31 मिनिट चांद्रभूमीवर होते.हे यान 24 जुलै 1969 रोजी आपली मोहिम संपवून पृथ्वीवर परतले होते...

🔸 चंद्रावर पहिले पाऊल ठेवल्यानंतर आर्मस्ट्राँग यांचे शब्द होते-"मानवाचं हे लहानसं पाऊल,मानवजातीसाठी मोठी झेप ठरेल"...

महान क्रांतीकारक बटुकेश्वर दत्त


🔸कानपूरात शिकत असताना भगतसिंग यांच्याशी त्यांची ओळख झाली.त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन ते सुरुवातीला कानपूरमध्ये 'हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' या क्रांतीकारी संघटनेत कार्य करू लागले...

🔸या संघटनेत काम करत असतानाच त्यांनी बाँब बनविण्याचे तंत्र शिकून घेतले व त्यांच्या पुढाकाराने आग्रा येथे एक बाँब बनविण्याचा कारखाना गुप्तपणे चालू करण्यात आला...

🔸लाहोर येथे सायमन आयोगाविरुद्ध निदर्शने करताना झालेल्या जबर लाठीहल्ल्यात ज्येष्ठ क्रांतिकारक लाला लजपतराय हे जखमी होऊन पुढे त्यांचे निधन झाले (१९२८).

🔸या घटनेमुळे ब्रिटिशांच्या विरोधात देशभर तीव्र असंतोषाची लाट पसरली. लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लाठीहल्ल्याचा मुख्य सूत्रधार पोलीस अधिकारी स्कॉट याचा खून करण्याचे ठरविले...

🔸तथापि या हल्ल्यात स्कॉट ऐवजी दुसरा पोलीस अधिकारी साँडर्स मारला गेला.तेव्हा लालाजींच्या मृत्यूचा बदला घेतल्याची पत्रके लाहोरच्या रस्त्यांवर झळकली...

🔸त्यातच ब्रिटिश सरकारला अनिर्बंध सत्ता व अधिकार मिळवून देणारी दोन अन्यायकारक विधेयके (Trade Dispute Bill व Public Safety Bill) ब्रिटिश सरकार लादणार होते...

🔸या विधेयकांना विरोध करण्यासाठी व लालाजींच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग यांनी दिल्लीच्या कें.विधानसभेत बाँब टाकण्याचे ठरविले...

🔸सभागृहात ८ एप्रिल १९२९ रोजी ही विधेयके मांडण्यात आली. प्रेक्षकसज्जातून भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी कोणालाही हानी होणार नाही अशा पद्धतीने संसदेच्या सभागृहात बाँब फेकला,हवेत गोळ्या झाडल्या व निषेधपत्रके भिरकावली...

🔸त्यांच्या निषेधपत्रात ‘बहिऱ्या झालेल्या लोकांसाठी हा मोठा आवाज असून खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्यासाठी बलिदान चालू आहेʼ,असा मजकूर होता...

🔸त्यानंतर पळून न जाता दोघेही ‘इन्किलाब जिंदाबादʼ अशा घोषणा देत सरकारच्या स्वाधीन झाले...

🔸भगत व दत्त यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली.तर तत्पूर्वीच्या लाहोर येथील साँडर्स हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप ठेवून भगतसिंग आणि त्यांचे सहकरी सुखदेव, राजगुरू यांना पुढे फाशीची शिक्षा सुनावली...

🔸आपल्याला फाशी झाली नाही म्हणून बटुकेश्वर दत्त दु:खी होते.परंतु क्रांतिकारक फासावर लटकूनच नाही,तर जिवंतपणी कारागृहात मरणयातना भोगूनसुद्धा लढा देतात, अशा शब्दांत भगतसिंगांनी त्यांची समजूत घातली...

🔸अंदमानच्या कारागृहातही दत्त यांनी उपोषण करून इंग्रज सरकारविरुद्ध आवाज उठवला...

🔸महात्मा गांधी यांच्या हस्तक्षेपामुळे त्यांची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली (१९३८)...

🔸छोडो भारत आंदोलनात भाग घेतल्यावरून पुन्हा त्यांना 4 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली.या दरम्यान त्यांना क्षयरोगाचाही सामना करावा लागत होता.पुढे १९४५ साली त्यांची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली...

🔸भारतीय स्वातंत्र्यानंतर ते राजकीय प्रसिद्धीपासून दूरच राहिले.अंजली या युवतीशी त्यांनी विवाह केला (१९४७) व पाटणा येथे स्थायिक झाले..

🔸दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्यावरील अंत्यसंस्कार हे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या स्मृतिस्थळाशेजारी हुसेनीवाला (पंजाब) येथे करण्यात आले...

अब्दुल रसूल कुर्बान हुसेन:-

📚अब्दुल रसूल कुर्बान हुसेन हे सोलापूर येथील स्वातंत्र्य चळवळीतले पत्रकार होते.

📚 कुर्बान हुसेन यांना इंग्रजांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल दोषी ठरवून, १२ जानेवारी १९३१ रोजी फासावर चढविले. त्यावेळी कुर्बान हुसेन यांचे वय अवघे २२ वर्षे होते. एवढ्या तरुण वयात हौतात्म्य लाभलेले ते पहिलेच संपादक असावेत.

📚सोलापुरातील स्वातंत्र्यलढा दडपण्यासाठी इंग्रजांनी मार्शल कायदा लागू केला. त्यामुळे कुर्बान हुसेन यांचे वृत्तपत्र बंद पडले.

📚त्यांनी १९२७ साली ‘गझनफर’ नावाचे उर्दू भाषेतील साप्ताहिक सुरु केले होते.

📚‘गझनफर’ या शब्दाचा अर्थ आहे सिंह. लोकमान्य टिळकांच्या ‘केसरी’ वृत्तपत्राने ज्याप्रमाणे स्वातंत्र्यलढ्यासाठी जागृती केली, त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हयात कुर्बान हुसेन यांच्या ‘गझनफर’ वृत्तपत्राने कार्य सुरु केले होते. गझनफर हे नाव उर्दू भाषेतील होतं, परंतु ते मराठी भाषेत देवनागरी लिपीत छापले जात असे. त्यांनी गझनफर वृत्तपत्रातून स्वातंत्र्यलढा, कामगारांचे प्रश्न, हिदु-मुस्लिम ऐक्य यासह विविध विषयांवर लेखन केले.

📚त्यांची भाषा प्रभावी आणि परखड होती. कुर्बान हुसेन हे एका सामान्य मुस्लीम कुटुंबात जन्माला आले. ते गिरणी कामगार होते. कॉंग्रेसचे कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जात होते, ते सभांमध्ये अतिशय प्रभावी भाषणे करीत असत. ५ मे १९३० रोजी महात्मा गांधीजींना अटक झाल्यानंतर सोलापूर शहरात जे सभा झाली, त्यातील त्यांचे भाषण ऐकून तरुण कार्यकर्ते इंग्रजाविरुद्ध पेटून उठले होते.

📚 सोलापुरातील तरुण रस्त्यावर उतरल्यानंतर येथील परिस्थिती कलेक्टर यांच्या नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे ९, १०, ११ मे १९३० हे तीन दिवस सोलापूर शहरात इंग्रज सरकारचे शासनच नव्हते. भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी तीन दिवस सोलापूर शहराने पूर्ण स्वातंत्र्य अनुभवले.

माता मृत्यूदर कमी असणाऱ्या राज्यांत महाराष्ट्र दुसरा (प्रथम केरळ).

माता मृत्यू दर(MMR) :-

- प्रति एकलाख जिवंत जन्मापैकी
- २०१४-१६ मध्ये १३०,
   २०१५-१७ मध्ये १२२ तर
   २०१६-१८ मध्ये ११३.

- WHO SDG नुसार हे प्रमाण २०३० पर्यंत "७०" उद्दिष्ट.

-  सर्वात कमी(कंसातील आकडे मागील वर्षाचे)
  १ केरळ- ४३,
  २. महाराष्ट्र- ४६(५५),
  ३. तमिळनाडू - ६०,
  ४. तेलंगणा- ६३
  ५. आंध्रप्रदेश- ६५.

- सर्वाधिक-
1.आसाम- २१५,
२. उत्तर प्रदेश- १९७,
३. मध्य प्रदेश- १७३,
4.राजस्थान-१६४,
5.छत्तीसगड-१५९.

- प्रमाण वाढले 👉 केरळ, पंजाब, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, छत्तीसगड.

- प्रमाण खूप कमी झाले 👉 राजस्थान, उत्तर प्रदेश, ओडिशा

चालू घडामोडी


.........................................................
• सीमा रस्ते संस्था (BRO) ने................हा पूल पूर्णपणे बदलण्यासाठी ‘प्रोजेक्ट अरुणक’ आरंभ केला
- डापोरीजो पूल (अरुणाचल प्रदेशातल्या अप्पर सुबानसिरी जिल्ह्यात).

• केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाने EPF ग्राहकांकडून तीन महिन्यांपर्यंत मूलभूत वेतन आणि महागाई भत्तेच्या रकमेपर्यंत किंवा EPF खात्यात सदस्याच्या जमा असलेल्या रकमेच्या ____पर्यंत, जे कमी असेल, आगाऊ रक्कम काढण्याची परवानगी दिली
- 75 टक्के.

• पहिल्यांदाच, भारतीय स्टेट बँकेने (SBI)................. इतक्या रकमेचे ग्रीन बॉन्ड उभारले आहेत जे SBIच्या लंडन शाखेत सिंगापूर SGX वर सूचीबद्ध केले जातील
- 100 दशलक्ष डॉलर.

• नवी दिल्लीच्या AIIMS संस्थेतर्फे स्थापन करण्यात आलेले टेलीमेडिसिन केंद्र, ज्याद्वारे तज्ञ डॉक्टर देशभरातल्या तज्ञांशी संपर्क साधतील
- CoNTeC (कोविड-10 राष्ट्रीय दूर-सल्लामसलत केंद्र).

• 1971 साली पाकिस्तानशी झालेल्या युद्धाच्या वेळी बांगलादेशाच्या मुक्तिसाठी चालविण्यात आलेल्या हवाई मोहिमांमध्ये नेतृत्व करणारे निवृत्त एअर वाइस-मार्शल........... यांचे 29 मार्च रोजी निधन झाले
– चंदन सिंग राठौड.

• .................या राज्य विधानसभेने 30 मार्च 2020 रोजी 2020-21 या आर्थिक वर्षात राज्य सरकारला त्याच्या एकत्रित निधीतून 1.55 लक्ष कोटी रुपये खर्च करण्याचे विनियोजन विधेयक एकमताने मंजूर केले
- ओडिशा.

• ..............या भारतीय संस्थेने विलगीकरण केलेल्या लोकांचा मागोवा घेण्यासाठी ‘कोरोनटाईन’ (CORONTINE) नावाचे एक व्यासपीठ तयार केले
- भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मुंबई.

• ICICI लोंबार्ड कंपनीने ................. या व्यापारी देयक व्यासपीठासह भागीदारीत दुकानदारांसाठी 'कोविड-19 संरक्षण विमा' सेवा सुरू केली
– भारत पे.

• जगातले सर्वात थंड महाद्वीप जिथे शास्त्रज्ञांनी सन 2019-20 उन्हाळ्यात प्रथमच उष्णलहरीच्या घटनेची नोंद केली
- अंटार्क्टिका.

• लिबियावरील संयुक्त राष्ट्रसंघाच्या शस्त्रास्त्र बंदीची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने ................ या देशाने भूमध्य समुद्रात ‘ऑपरेशन इरिनी’ नावाने नौदल मोहीम सुरू करण्याची घोषणा केली
– युरोपिय संघ.

• सध्या चालू असलेल्या देशव्यापी बंदीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उत्पादनांचा पुरवठा सुलभ करण्यासाठी रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (RAI) यांच्या वतीने घेण्यात आलेला पुढाकार
- 'फूड सोल्जर प्रोजेक्ट'.

• .............या राज्य सरकारने कोविड-19 संकटातून निघण्यासाठी व्यवसाय आणि लोकांना मदत करण्यासाठी पुढील पाच वर्षात वीज दरात सरासरी 8 टक्के कपात करण्याची घोषणा केली – महाराष्ट्र.

• आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी दिन
- 31 मार्च.

• तामिळनाडूच्या करुर शहरात दैनंदिन किरकोळ व्यवहार करण्यासाठी ‘एन्कासू’ नावाचे भारताचे पहिले प्री-पेड कार्ड सादर करणारी ......... ही बँक होय
– करुर वैश्य बँक.

• 'लाइफलाईन उडान फ्लाइट्स' उपक्रमाच्या अंतर्गत सतत वैद्यकीय पुरवठा करण्यासाठी भारत आणि........... या देशात "कार्गो एअर ब्रिज" उभारण्याची सरकारने घोषणा केली
- चीन.

• 31 मार्च 2020 रोजी झालेल्या आभासी “जी-20 व्यापार आणि गुंतवणूक मंत्री बैठक” याचे अध्यक्षपद ........... होते
- सौदी अरब.

• संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) या गटाच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ‘ठराव 2518’ मंजूर केला
- शांती सैनिक.

•  ‘द डेथ ऑफ जीसस’ या कादंबरीचे लेखक
- जे. एम. कोएत्सी.

• वाहनांसाठी ई-पास देण्याकरिता ...........या राज्य सरकारने ‘प्रग्यान अॅप’ सुरू केले
- झारखंड.

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स

1) ब्राह्मो समाज —- 1828 —— राजाराम मोहन रॉय

2) आदी ब्राह्मो समाज —— 1865 —--- देवेंद्रनाथ टागोर

3) भारतीय ब्राह्मो समाज —--- 1865 —— केशवचंद्र सेन

4) तरुण ब्राह्मो समाज —— 1923----वि.रा.शिंदे

5) प्रार्थना समाज —--- 1867 —— आत्माराम पांडुरंग तर्खडकर

6) आर्य समाज —— 1875 —— स्वामी दयानंद सरस्वती

7) आर्य समाज शाखा कोल्हापूर —--1918--- शाहू महाराज

8) आर्य महिला समाज —— 1889 —— पंडिता रमाबाई

9) सत्यशोधक समाज —-1873----महात्मा फुले

10) सत्यशोधक समाज कोल्हापूर —— 1911---- शाहू महाराज

11) सार्वजनिक समाज —— 1872----आनंदमोहन बोस

12) नवविधान समाज —--1880--- केशवचंद्र सेन

13) भारत सेवक समाज---1905---- गोपाळ कृष्ण गोखले

14) भारत कृषक समाज —--1955---- पंजाबराव देशमुख

🅾समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 2)

15) डेक्कन एजुकेशन सोसायटी —- 1884- —--आगरकर,टिळक,चिपळूणकर

16) डेक्कन सभा —— 1893 —— न्या.म.गो.रानडे

17) डेक्कन रयत शिक्षण संस्था —-1916---- शाहू महाराज

18) रयत शिक्षण संस्था —-1919---- कर्मवीर भाऊराव पाटील

19) श्री शिवाजी शिक्षण संस्था —-1932--- पंजाबराव देशमुख

20) मनवधर्म सभा —— 1844----दादोबा पांडुरंग तर्खडकर

21) परमहंस सभा —— 1849---- दादोबा पांडुरंग /ईश्वरचंद्र विद्यासागर

22) ग्यानप्रसारक सभा —— 1848 —- दादोबा पांडुरंग

23) मद्रास महाजन सभा —— 1884 —— पी.आनंद चार्लू / सुब्रमण्यम अय्यर

24) हिंदू महासभा —- 1915 —— मदन मोहन मलविय

25) वृद्धांसाठी संगत सभा —— वि.रा.शिंदे

26) वकतरीत्वा उत्तेजक सभा —--न्या.म.गो.रानडे

27) सार्वजनिक सभा —-1870---- ग.वा.जोशी

🅾समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 3)

28) ग्रँट मेडिकल कॉलेज —1838--जगन्नाथ शंकर सेठ

29) ग्रँट मेडिकल सोसायटी —1852--भाऊ दाजी लाड

30) बंगाल असियाटीक सोसायटी--1784 —विलीयम जोन्स

31) असियाटीक सोसायटी —1789--विलीयम जोन्स

32) बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी —1822— जगन्नाथ शंकर सेठ

33) सायन्तिफिक सोसायटी — 1862— सर सय्यद अहमद खान

34) मोहमदम लिटररी सोसायटी —1863— नवाब अब्दुल लतीफ

35) ट्रॅन्स्लेशन सोसायटी — 1864— सर सय्यद अहमद खान

36) लंडन इंडियन सोसायटी — 1865— दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी

37) थेओसोफिकॅल सोसायटी — 1875— मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट

38) मराठा एजुकेशन सोसायटी — 1901— शाहू महाराज

39) इंडियन होमरूल सोसायटी — लंडन —1905 —श्यामजी कृष्ण वर्मा

40) पीपल्स एजुकेशन सोसायटी —1945— बाबासाहेब आंबेडकर

41) किंग एड्वर्ड मोहमद्न एजुकेशन सोसायटी —1906— शाहू महाराज

🅾समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 4)

42) निष्काम कर्ममठ —1910— महर्षी धो.के.कर्वे

43) निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे

44) हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले

45) महारष्ट्राचे चे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील

46) हिंदुस्तान चे मार्टिन लुथर किंग — राजाराम मोहन रॉय

47) महारष्ट्रा चे मार्टिन लुथर किंग — महात्मा फुले

48) अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी) — 1923— वि.रा.शिंदे

49) पवनार आश्रम (वर्धा) —1921— विनोबा भावे

50) अनाथ बालिका आश्रम —1899— महर्षि धो.के.कर्वे

51) विक्टोरीया अनाथाश्रम —- महात्मा फुले

52) विक्टोरीया मराठा बोर्डींग —1901— शाहू महाराज

53) सेवा समिती — 1910— हृदयनाथ कुंझर

54) सेवा सदन — वि.रा.शिंदे

55) पूना सेवा सदन — रमाबाई रानडे

56) शारदा सदन मुंबई —1889 — पंडिता रमाबाई

57) मुक्ती सदन केडगाव —1898— पंडिता रमाबाई

58) कृपा सदन, प्रीती सदन —- पंडिता रमाबाई

🅾समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 5)

59) केसरी — लोकमन्या टिळक

60) महारष्ट्र केसरी —— पंजाबराव
देशमुख

61) महारष्ट्र धर्म —- विनोबा भावे

62) अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह —- पंजाबराव देशमुख

63) पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — साने गुरुजी

64) नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — बाबासाहेब आंबेडकर

65) पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —- एस.एम.जोशी

66) कुसाबाई शी पुनार्वीवाह केला (1874) —- विष्णू शास्त्री पंडित

67) गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) —- महर्षी धो.के.कर्वे

68) स्वतहाच्या मुलीचा पुनार्वीवाह करवून दिला —— रा.गो.भांडारकर

69) विधवा विवाह उत्तेजक मंडळी —- (1893) ——  महर्षी धो.के.कर्वे

70) पुनार्वीवाह उत्तेजक मंडळी (1865) —- न्या.म.गो.रानडे

71) विधवा विवाह पुस्तक —- विष्णू शास्त्री पंडित

72) विधवा विवाहाचा कायदा व पुनार्वीवाह कायदेशीर मान्यता (1917) — शाहू महाराज

73) आंतर जातीय विवाहास मान्यता कायदा (1918) — शाहू महाराज

🅾समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 6)

74) मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी —--नाशि

1857 च्या पूर्वीचे उठाव.

🧩आप्पासाहेब भोसल्यांचा उठाव (1817 - 18)

🅾गौड जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने उठाव केला.बेतूर येथे इंग्रजी फौजेचा त्यांनी पराभव केला.शीख राजा रनजीसिंहचे लढण्यासाठी मन वळविण्यासाठी प्रयत्न केला.
शेवटी इंग्रजांकडून पराभव पत्कारला.
हटकरांचा उठाव - मराठवाड्यात

🅾नांदेड, परभणी व पैनगंगेच्या प्रदेशात 1800 - 1820 या काळात.नेता - नौसोजी नाईक.प्रमुख ठाणे - नोव्हाब्रिटीशांनी उठाव मोडून काढला.  खानदेशातील भिल्लाचा उठाव

🅾भिल्लाची खानदेशात लूटमार.याला यशवंतराव होळकरची फूस होती.
नेते - काजरसिंग, भीमा नाईक, भागोजि नाईक, नेवश्य नाईक, कलुबाबा, दौलत नाईक, तंट्या भिल्लभिल्लणा वठणीवर आणण्यासाठी लॉर्ड एलफिन्स्टनने प्रयत्न केले.

🧩खानदेशातील भिल्लाचा उठावाचे उपाय:

🅾1825 मध्ये भिल्लाकरिता जमिनी देणे, वसाहती निर्माण करणे.भिल्लाणा पोलिस दलात नोकर्‍या दिल्या.  बंडखोर भिल्लाणा वठणीवर आणण्यासाठी इतर भिल्लाचा वापर केला.

🧩काजरसिंग नाईकचा उठाव:

🅾1875 च्या वेळी खानदेशात ब्रिटीशांविरुद्ध भिल्लाच्या उठावात नेतृत्व केले.पूर्वी ब्रिटीशांच्या पोलिस दलात होता.
ब्रिटीशांचा 7 लाखाचा खजिना लुटला.
1858 च्या 'अंबापाणी' लढाईत भिल्लची ब्रिटीशांशी लढाई स्रियांचाही सहभाग होता.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

होमरूळ चळवळ (1916)

🅾लोकमान्य टिळकांच्या जीवनातील होमरूळ चळवळ म्हणजे शेवटची राष्ट्रव्यापी चळवळ होय

🅾ब्रिटिशांच्या अटकेतून सुटका झाल्यानंतर लोकमान्य टिळकांना राष्ट्रीय चळवळ थंडावली असे वाटले

🅾त्याच वेळी त्यांनी स्वराज्याची मागणी करून राष्ट्रीय आंदोलन सुरू केले .

🅾त्यासाठी महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी व मद्रासमध्ये डॉ  अनी बेझेंट यांनी होमरुळ लीग ची स्थापना केली .

🅾होमरुळ लीगने जागृती घडवून आणली ; त्यामुळे लोकमान्य टिळक व अनि बेझेंट यांना अटक करण्यात आली .

🅾शेवटी लोकमान्य टिळकांनी हाय कोर्टात जाऊन दाद मागितली व सुटका करून घेतली.

🅾होमरुळ म्हणजे स्वराज्य .सरकारच्या दडपशाही व अन्याय्य कायद्याच्या लोकांनी न डगमगता आपली चळवळ पुढे चालू ठेवण्याचा संदेश लोकमान्य टिळकांनी जनतेला दिला .

पोलीस भरती प्रश्नसंच

: १. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी नदी कोणती ? :- गोदावरी

२. महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्यसंख्या किती आहे ? :- २८८

३. सूर्यकुलात सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह कोणता ? :- गुरु

४. कोणत्या नदीला आसामचे दुखाश्रु म्हणून संबोधले जाते ? :- ब्रह्मपुत्रा

५. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व कोणी केले ? :- स्वामी रामानंद तीर्थ

६. हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे ? :- शक्ती

७. महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक कोण ?:- वासुदेव बळवंत फडके

८.महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ? :- यशवंतराव चव्हाण

९.कोणत्या राज्याने फणस या फळाला राज्यफळाचा दर्जा दिला आहे ? :- केरळ

१०. शिवसमुद्रम हा धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे ? :- कावेरी

: 1. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून उगम पवणारी नदी कोणती? 
✅ - कृष्णा. 

2. वेण्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
✅  - कृष्णा

3. पवना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? 
✅ - कृष्णा. 

4.  मुळा-मुठा नदीचा संगम कोठे झाला?
✅  - पुणे.

5. कृष्णा व वारणा नदीचा नदीचा संगम कोठे झाला? 
✅ - हरीपुर.

7.  कृष्णा-पंचगंगा नदीचा संगम कोठे झाला? 
✅ - नरसोबाची वाडी. 

8.  इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले स्थळ कोणते?
✅ - देहु. 

9. शिवाजी सागर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?
✅  - कोयना. 

10. पुणे शहराला कोणत्या धरणातून पानी पुरवठा होतो?
✅  - खडकवासला. 

11. पानशेत धरण कोणत्या नदीवर आहे? 
✅ - मुठा.

12. कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती नदीवर कोणते धरण बांधण्यात आले आहे? 
✅ - राधानगरी. 

13.  चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? 
✅ - वारणा. 

15. पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? 
✅ - नीरा.

16. कोयना धरणासाठी प्रसिद्ध असलेले हेळवाक कोणत्या जिल्हयात आहे? 
✅ - सातारा. 

17.  उजणी धरण कोणत्या नदीवर आहे? 
✅ - भीमा. 

18. दुघगंगा योजनेचा फायदा कोणत्या जिल्ह्याला होतो?
✅  - कोल्हापूर.

19. भीमा सिंचन योजनेपासून कोणत्या जिल्ह्यास पानी मिळते?
✅  - पुणे. 

20. मुळशी धरण कोणत्या जिल्हयात आहे? 
✅ - पुणे. 

Latest post

चालू घडामोडी :- 17 मार्च 2024

◆ काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे. ◆ 2025 मध्ये चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान ...