चीनमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे.चीनमध्ये सर्वच रुग्णालय तुडूंब भरले असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.त्यात महिला,मुलांचा आक्रोश,जमिनीवर मृतदेहांची रास पडली आहे.त्यामुळे भारतासह संपूर्ण जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोनाच्या व्हेरिएंटच्या BF.7 या सब व्हेरिएंटने चीनमध्ये हाहाकार माजवला असून, भारतातही या सब व्हेरिएंट तीन रूग्ण आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे.
भारतात नवीन कोरोना व्हायरसच्या BF.7 चे दोन रूग्ण समोर आले आहे.त्यात गुजरातमध्ये दोन तर एक रूग्ण ओडिशातून समोर आला आहे. याआगोदर यूएस,यूके आणि बेल्जियम,जर्मनी, फ्रान्स आणि डेन्मार्क सारख्या युरोपियन देशांसह इतर अनेक देशांमध्ये या कोरोना व्हायरसचे व्हेरिएंटचे रूग्ण आधीच आढळून आले आहेत.
जागतिक लेवलवर वाढत असलेल्या नव्या कोरोना व्हायरस मुळे बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोविड आढावा बैठकीत कोविड रूग्णांमध्ये आतापर्यंत वाढ झालेली नसली तरी,नव्या व्हेरिएंटवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.या बैठकीनंतर नीती आयोगाचे सदस्य डॉ.व्हीके पॉल यांनी नागरिकांना कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.
चीनमधून येणाऱ्यांची चौकशी..
चीनमधील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता भारत सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. आरोग्य मंत्रालयाने चीनमधून येणाऱ्यांची विमानतळावर तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.मंत्रालयाने यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.विमानतळांवर आजपासून कोरोना चाचणी करण्यात येत आहे.जगभरातील काही देशांमध्ये वाढती कोरोनाची संख्या लक्षात घेता आजपासून भारतात दाखल होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आजपासून विमानतळांवर रॅन्डम कोरोना चाचाणी केली जाणार आहे,अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
काळजी घ्या....सुरक्षित रहा...!!
--------------------------------------
जन हितार्थ जारी:
Wednesday, 21 December 2022
भारतात पण नव्या कोरोना व्हायरस चे आगमन....काळजी घ्यावी लागेल
महाधिवक्ता
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 165 नुसार the डव्होकेट जनरलची नियुक्ती राज्यपालांद्वारे केली जाते . राज्यातील सर्वोच्च कायदा अधिकारी अॅडव्होकेट जनरल असतात. अॅडव्होकेट जनरल राज्यपालांची कामे करतात. (राज्यपालांनी त्यांना कोणत्याही वेळी आपल्या पदावरून काढून टाकू शकते) उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश बनण्याची क्षमता त्यांच्यात आहे.
काम
Theडव्होकेट जनरल हे राज्यप्रमुखांना कायदेशीर सल्ला देण्यास जबाबदार असतात.राज्याच्या दोन्ही सभागृहात (विधानसभा आणि विधान परिषद) आणि सभागृहात बोलण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे असते. त्यांना विधिमंडळ सदस्यांना सर्व पगाराचे भत्ते आणि सुविधा मिळतात.उदाहरणार्थ भारतातील सर्व राज्यांमध्ये महाधिवक्ता आहेत. राज्यात समान परिस्थिती केंद्र Attorney टर्नी जनरलमधील महाधिवक्ताची स्थिती (अटर्नी जनरल) आहे.
अॅटर्नी जनरल भारत
भारत 's ऍटर्नी जनरल (ऍटर्नी जनरल) सरकार भारतीय s' मुख्य कायदेशीर सल्लागार सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या अग्रगण्य वकील आहे.
Theटर्नी जनरल ऑफ इंडिया (भाग of चे अनुच्छेद)) हे राष्ट्रपती नियुक्त करतात . सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश बनण्याची क्षमता असलेली एखादी व्यक्ती अशा व्यक्तीला राष्ट्रपती Attorneyटर्नी जनरल पदावर नियुक्त करू शकते.
देशाच्या अटर्नी जनरलचे कर्तव्य म्हणजे कायदेशीर बाबींमध्ये केंद्र सरकारला सल्ला देणे आणि राष्ट्रपतींकडे त्याला पाठविलेल्या कायदेशीर प्रक्रियेच्या जबाबदा .्या पार पाडणे. या व्यतिरिक्त त्यांना घटना व इतर कोणत्याही कायद्यानुसार विहित केलेले काम पूर्ण करावे लागेल. कर्तव्य बजावताना त्याला देशातील कोणत्याही न्यायालयात हजर राहण्याचा अधिकार आहे. त्यांना कलम to नुसार संसदेच्या कामकाजात भाग घेण्याचा हक्क आहे, जरी त्यांना मतदानाचा अधिकार नाही. सॉलिसिटर जनरल आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल त्यांच्या कामात त्यांना मदत करण्यासाठी आहेत. सॉलिसिटर जनरल हा भारताचा दुसरा कायदा अधिकारी आहे. ज्याप्रमाणे अॅटर्नी जनरल हे पद हे घटनेचे उत्पादन आहे, त्याचप्रमाणे सॉलिसिटरचे पद हे भारत सरकारचे उत्पादन आहे.
🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽
महाराष्ट्र पोलिस भरती वाचा : महत्त्वाचे 25 प्रश्न उत्तरे
१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले
---------------------------------------------------
२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)
---------------------------------------------------
३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?
उत्तर -- आनंदीबाई जोशी
---------------------------------------------------
४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर -- लता मंगेशकर
--------------------------------------------------
५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
---------------------------------------------------
६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर -- प्रतिभाताई पाटील
--------------------------------------------------
७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- कल्पना चावला
--------------------------------------------------
८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
--------------------------------------------------
९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- बचेंद्री पाल
--------------------------------------------------
१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?
उत्तर -- मीरा कुमार
--------------------------------------------------
११) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?
उत्तर -- किरण बेदी
-------------------------------------------------
१२) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?
उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी
--------------------------------------------------
१३) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?
उत्तर -- प्रेमा माथूर
--------------------------------------------------
१४) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- पी. टी. उषा
--------------------------------------------------
१५) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- नेमबाजी
--------------------------------------------------
१६) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?
उत्तर -- सुश्मिता सेन
--------------------------------------------------
१७)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?
उत्तर -- मदर तेरेसा
--------------------------------------------------
१८) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बॅडमिंटन
-------------------------------------------------
१९) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?
उत्तर -- लाॅन टेनिस
-------------------------------------------------
२०) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर -- बाॅक्सिंग
---------------------------------------------------
२१) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- तिरंदाजी
---------------------------------------------------
२२) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- जलतरण
---------------------------------------------------
२३) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बुध्दिबळ
---------------------------------------------------
२४) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- वेट लिफ्टिंग
---------------------------------------------------
२५) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?
उत्तर -- अनुताई
महाराष्ट्राचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे?
उत्तर--नाशिक💐✅
महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणत्या पर्वताची रांग आहे?
उत्तर----सातपुडा💐✅
महाराष्ट्रात चुंनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
उत्तर--यवतमाळ💐✅
महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांबीचा महामार्ग कोणता ?
उत्तर---national highway 6 💐✅
स्वातंत्र्य वीर सावरकरांचे जन्मस्थान कोणते?
उत्तर- भगुर (जी नाशिक )💐✅
महाराष्ट्रातील शिखांची दक्षिण काशी कोणती?
उत्तर--नांदेड💐✅
छत्रपती शाहू महाराजांनी गुळाची बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यात स्थापन केली?
उत्तर---कोल्हापूर येथे 1895 ला💐✅
महाराष्ट्रातील कापसाची प्रसिद्ध बाजारपेठ कोठे आहे?
उत्तर--अमरावती💐✅
पुणे जिल्ह्यातील कोणते शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर--जुन्नर💐✅
पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या काठी आहे?
उत्तर---भीमा💐✅
महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखरकारखाना कोठे स्थापन करण्यात आला होता?
उत्तर---प्रवरानगर(जी अहमदनगर )💐✅
महाराष्ट्रातील जिल्हयांची संख्या ---
>>>36💐✅
महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात ?
उत्तर ---- गोदावरी💐✅
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?
उत्तर---गोदावरी💐✅
महाराष्ट्रातील सर्वाधिक आवर्षंनग्रस्त जिल्हा कोणता?
उत्तर---अहमदनगर💐✅
संत गाडगेबाबाचे नाव दिलेले विद्यापीठ कोठे आहे ?
उत्तर---अमरावती💐✅
भारतातील पहिले पक्षी अभयअरण्य कोठे स्थापन करण्यात आले? उत्तर
--कर्नाळा जिल्हा रायगड💐✅
यशवंतरावांच्या समाधी स्थळास कोणते नाव देण्यात आले?
उत्तर---प्रीतिसंगम💐✅
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कोठे आहे?
उत्तर---मोझरी (जी. अमरावती.)💐✅
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या प्रकल्पास म्हणतात?
उत्तर--कोयना प्रकल्प💐✅
महाराष्ट्रातील मातीचे धरण ?
उत्तर--गांगपूर जिल्हा नाशिक💐✅
महाराष्ट्रातील कोणत्या शहरास बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते?
उत्तर--औरंगाबाद💐✅
लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर---बुलढाणा💐✅
तलाठी यांचे अधिकार व कार्य
१) जिल्हाधिकाऱ्याने वेळोवेळी ठरवून दिलेली नोंदणी पुस्तके, हिशोब व अभलेखे सांभाळणे.
२) शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे विविध दाखले व उतारे देणे. ( उत्पन्न, रहिवासी, ८-अ ची नक्कल )
३) गावातील जमीन व्यवहाराच्या नोंदी ठेवणे.
४) कोतवालाच्या कार्यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे.
५) तहसीलदार, महसूल अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गावाच्या कामकाजासंबंधी कागदपत्रे तयार करणे.
६) निवडणुकीच्या काळात निवडणूक विषयक कामे पार पाडणे.
७) जमिनीची आणेवारी ठरविणे, त्यांचा अहवाल वरिष्ठाना पाठविणे.
८) गावातील विविध साथीच्या रोगासंबंधीची माहिती तहसीलदार याना कळविणे.
९) गावातील आपतग्रस्त व निराधार कुटुंबाचे सर्वेक्षण करून अहवाल पाठविणे.
१०) जमिनीचा सातबारा (७/१२) उतारा व ८-अ ची नक्कल देणे.
११) महसूल गोळा करणे व कर्ज वसुली करणे.
१२) गावातील कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत जबाबदाऱ्या पार पाडणे.
१३) गावातील कायदा व स्व्यवस्थेसंबंधी नोंदी ठेवणे.
१४) वारसा हक्काचा दाखल करणे.
१५) कोतवालदार देखरेख व नियंत्रण ठेवणे.
पचायत राज व्यवस्थेचा पूर्व इतिहास
पंचायत राज व्यवस्थेच्या मुळाचा शोध घ्यावयाचा झाल्यास भारतात अगदी प्राचीन काळापासून पंचायती अस्तित्वात असल्याचे दिसते.
अर्थात आजच्या पंचायत राज पद्धतीपेक्षा त्याचे स्वरूप खूपच वेगळे होते.
गावातील हुशार, अनुभवी, आदरणीय अशी पंचमंडळी असायची.
गावातील चावडी सारख्या सार्वजनिक ठिकाणी रोज सकाळी ही मंडळी बसायची आणि गावातील लोकांच्या अडचणी समजावून घेऊन मार्गदर्शन करावयाची.
गावामध्ये काही वाद, भांडणे झाल्यास त्यामध्ये लक्ष घालून सोडविणे, गावचा विकास होण्यासाठी योजना आखणे, गावाचा कारभार चालविणे, गावाचा कर गोळा करून राजाला खंड वसूली देणे इ. कामे ही पंचमंडळी पार पाडीत असत.
गावात त्यांना फार मान होता. गावकरी त्यांच्या शब्दाबाहेर जात नसत.
मौर्याच्या काळामध्ये तर त्यांना ग्रामशासनाचा अधिकार होता. व त्या दृष्टीने ह्या पंचायती खूपच विकसित झालेल्या होत्या.
सन ८०० ते १००० च्या दरम्यान बोल घराण्याच्या इतिहासातील एकल येथील चौदा शिळा खऱ्या ग्रामपंचायतीच्या निर्देशक आहेत. आजच्या ग्रामपंचायती करीत असलेली विविध गाव विकासाची कामे या ग्रामपंचायती त्या वेळी करीत होत्या.
ग्रामपंचायतीची निवडणूक दरसाल होत असे व सर्व सभासद लोकनियुक्त असत. त्यांच्यावर सरकारी अधिकाऱ्यांची देखरेखीसाठी नेमणूक होई.
ग्रामपंचायतीकडे स्वतःच्या निधी असायचा.न्याय निवाडे ही पंचायत करी, फाशीची शिक्षा क्वचितच अंमलात येई. देवळात नंदादीप लावणे अगर पंचायतीस अमुक इतक्या गाई पुरविणे या गोष्टी शिक्षा म्हणून देत असत.
भारतात अनेक साम्राज्ये आली होती. बाहेरून आलेल्या मोगलांनी ही पद्धत स्विकारली. भारता सारख्या खंडप्राय खेडया पाड्यात विखुरलेल्या देशाला विकेंद्रित शासनाचीच जरुरी होती.
त्यामुळेच ही पद्धत अनेक वर्षे टिकून होती. त्यातूनच खेडी स्वयंपूर्ण बनत होती. ग्रामीण कारागीर, कष्टकरी यांना पोट भरण्याकरीता व्यवसाय मिळत होता.
शिवाजी महाराजांच्या काळात
ग्रामपंचायतीची पद्धत चोहीकडे चालू होती. तीच रयतेच्या सोयीची वाटल्यावरून महाराजांनी कायम ठेवली.
रयतेला न्याय मिळवण्यासाठी लांब कुठे जावे लागू नये म्हणून गावातील पंचांनीच फुकट न्याय दयावा हे अभिप्रेत होते. छत्रपतीच्या काळात ग्रामपंचायती पूर्वीप्रमाणे चालू होत्या.
ब्रिटीशांच्या आगमनानंतर त्यांनी मात्र आपल्या आपल्या स्वार्थासाठी गावगड्यांची चालू व्यवस्था मोडीत काढून तलाठी पोलीस पाटील यांच्यापासून ते कलेक्टर पर्यंत नोकरशाहीची फौज निर्माण केली.
१८८२ साली लॉर्ड रिपनने मर्यादित स्वरुपात स्थानिक स्वराज संस्थेचा कार्यक्रम अंमलात आणला. परंतु आरोग्य आणि प्राथमिक सोयी सुविधा पुरतेच त्यांचे उद्दिष्ट मर्यादित होते.
त्यामध्ये स्वराज्याचा मागमूसही नव्हता. याच काळात तालुका लोकल बोर्ड, जिल्हा लोकल बोर्ड व काही मोठया गावात ग्रामपंचायती स्थापन झाल्या. या स्थानिक स्वराज्य संस्था स्वातंत्र्य प्राप्ती नंतरही काही काळ चालू होत्या.
देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात देशाच्या पुनुरुत्थापनाचा व नवनिर्माणाचा विचार सुरु झाला. त्यामध्ये गाव विकासाच्या दृष्टीने विचार होणे स्वाभाविक होते. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात खेडयाकडे जाण्याचा मार्ग दाखविला आणि ग्राम स्वराज्याची कल्पना मांडली होती. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना नवा मुलभूत आणि व्यापक अर्थ मिळाला.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि घटना समितीची स्थापना झाली. स्वातंत्र्य लढयात लोकांनी उराशी बाळगलेल्या ध्येयात ग्राम स्वराज्य हे सूत्र होते.
त्यामुळे देशाची घटना होत असताना ग्रामपंचायतीचा स्वतंत्र तिसरा सत्र असावा अशी सूचना मांडण्यात आली. त्या सूचनेला घटना समितीतील काही लोकांनी विरोध केला.
भारतीय समाज व्यवस्था जाती व्यवस्थेच्या उतरंडीवर आधारीत असल्यामुळे तथाकथित उच्च वर्गीय जातींना पंचायत व्यवस्थेत पंच म्हणून स्थान मिळत असे.
तसेच गांवातील उच्च जातीय लोकच निर्णय घेण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत असत. अशा रितीने या पूर्ण व्यवस्थेमध्ये स्त्रिया आणि तथा कथित खालच्या जातींना कोणतेही स्थान नव्हते..
ही व्यवस्था समानतेवर आधारीत नाही असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांचा या व्यवस्थेला विरोध होता.
🔹परस्तावना🔹
आपल्या देशाच्या घटनेत १९९२ साली ७३ वी दुरुस्ती केली या दुरुस्तीमुळे आपल्या देशात पंचायत राज्यपद्धती सुरु झाली. या पंचायत राज्य पद्धतीत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा नावाची एक यंत्रणा निर्माण केली आहे.
महाराष्ट्रात १९५८ साली ग्रामपंचायतीचा कायदा केला गेला. या कायद्यानेही प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामसभा निर्माण केल्या होत्या. त्यांना आता ७३ वी घटना दुरुस्तीमुळे घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने ग्रामसभा संदर्भामध्ये ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये काही सुधारणा मारून १६ ऑक्टोबर २००२ रोजी ग्रामपंचायत ‘सुधारणा अध्यादेश’ काढलेला आहे. त्यामुळे ग्रामसभांना अनन्य साधारण महत्त्व दिलेले असून पूर्वीच्या चार ग्रामसभा ऐवजी एकूण सहा ग्रामसभा अनिवार्य करण्यात आलेल्या आहेत. तसेच महिलांच्या ग्रामसभा घेणेही बंधनकारक आहे. ग्रामसभांना या दुरुस्तीमुळे इतरही विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत.
🔹गरामसभेचे सदस्य 🔹
पूर्वी राजे राज्य करीत. आता लोक राज्यकारभार पाहतात. ज्या कारभारात सर्व लोक सहभागी होतात आणि राज्यकारभाराचे निर्णय घेतात त्या पद्धतीला प्रत्यक्ष सरकार अथवा प्रत्यक्ष [ स्थानिक पातळीवरची ] लोकशाही असे म्हणतात. ज्या कारभारात लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सहभागी होतात आणि राज्यकारभाराचे निर्णय घेतात त्या कारभार पद्धतीला अप्रत्यक्ष सरकार किंवा प्रतिनिधीचे सरकार असे म्हणतात.
🔹आपली ग्रामपंचायत ही अप्रत्यक्ष🔹
कारभाराचे उदाहरण आहे तर ग्रामसभा ही प्रत्यक्ष कारभाराचे उदाहरण आहे आणि ग्रामपंचायतीच्या मतदारांची संस्था आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या गावातील व वाड्यावस्त्यामधील ग्रामपंचायतीचे मतदार हे ग्रामसभेचे सदस्य आहेत.
🔹गरामसभेचा कारभार 🔹
ग्रामसभेच्या सदस्यांनी एकत्र यावे. लोकांच्या गरजा काय आहेत त्या ग्रामपंचायतीला सांगाव्यात आणि गावांच्या भल्यासाठी कोणत्या योजना अगोदर घ्याव्यात हे सुचवावे. ग्रामपंचायतीला सल्ला दयावा आणि मार्गदर्शन करावे. थोडक्यात सांगावयाचे तर ग्रामसभेच्या सदस्यांनी गावांच्या विकासात सहभागी व्हावे. याशिवाय ग्रामसभेने, ग्रामपंचायतीने वर्षभरात गावांच्या विकासाची जी कामे केली असतील त्यांची माहिती व आढावा घ्यावा. ग्रामपंचायतीने पुढील वर्षी विकासाची जी कामे करावयची ठरविले असेल त्यांची माहिती घ्यावी. ग्रामपंचायतीने वर्षभर केलेल्या खर्चाचा हिशोब घ्यावा आणि पुढील वर्षी किती खर्च केला जाणार आहे त्याची माहिती घ्यावी. ग्रामपंचायतीने हिशोब तपासताना हिशोब तपासणाऱ्या अधिकाऱ्याला ज्या शंका आल्या असतील त्या शंका जाणून घ्याव्यात आणि त्या शंकांना ग्रामपंचायतीने जी उत्तरे दिली असतील ती उत्तरे समजून घ्यावीत. ग्रामपंचायत करीत असलेल्या कारभाराची प्रश्न विचारून माहिती घ्यावी आणि ग्रामपंचायतीला सूचना कराव्यात. म्हणजेच ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामसभेने नियंत्रण ठेवावे आणि ग्रामपंचायतीवर निवडून दिलेल्या सदस्यांनी चांगली कामे केली तर प्रोत्साहन दयावे व त्यांच्याकडून कामे नीट होत नसतील तर त्यांना जाब विचारावा अशी अपेक्षा आहे.
🔹गरामसभेचे पदाधिकारी 🔹
ग्रामसभेला पदाधिकारी नाहीत. ग्रामसभेला एक अध्यक्ष आहे. निवडणूक झाल्यानंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष व आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष हा सरपंचच असतो. त्याच्या अनुपस्थितीमध्ये उपसरपंच अध्यक्ष असतो. इतर ग्रामसभासाठी ग्रामसभेस उपस्थित असलेल्या सभासदापैकी एकाची बहूमताने अध्यक्ष म्हणून निवड करावी लागते. [ सन १९५९ चा अधिनियम क्रमांक ३ ]
अध्यक्षस्थानी असलेल्या व्यक्तीने ग्रामसभेची संपूर्ण बैठक पार पडेपर्यंत बैठकीचे नियमन करावे लागते. सुरुवातीस विषय पत्रिकेतील विषयांची यादी सर्वांना वाचून दाखवावी लागते. विषयास सुसंगत असा प्रश्न विचारण्याचा अधिकार ग्रामसभा सदस्यांना आहे. अशा सर्व प्रश्नांची उत्तरे अध्यक्षाने तोंडी दयावी लागतात. विषयाचे स्वरूप लक्षात घेऊन एखादया सभासदास चर्चा करण्यास किती वेळ द्यावयाचा हे ठरविण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे. विषय पत्रिकेत नमुद केलेल्या विषयाशिवाय इतर विषयावर अध्यक्षांच्या परवानगी शिवाय चर्चा करता येत नाही.
🔴राज्य घटनेत करण्यात आलेला बदल🔴
७३ व्या घटना दुरुस्ती कायदयाने “पंचायती” या शिर्षकाखाली “भाग ९-अ” हा नवा भाग राज्य घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये कलम २४३ ते कलम २४३-ओ अशी कलमे समाविष्ट केलेली आहेत. याशिवाय या कायदयाने राज्य घटनेला ११ वे परिशिष्ट जोडले असून त्यामध्ये पंचायत राज संस्थाच्या अधिकार कक्षेत येणाऱ्या विषयांची माहिती दिली आहे.
७३ व्या घटना दुरुस्तीने पंचायत राज्यांची स्थापना करण्याचे बंधन प्रत्येक राज्यावर घातले आहे. त्यामुळे पंचायत राज्याची स्थापना ही आता राज्याची “घटनात्मक जबाबदारी” ठरली आहे. राज्य घटनेच्या २४३-बी या कलमान्वये राज्यामध्ये ग्राम, मध्य व जिल्हा स्तरावर पंचायतीची स्थापना करता येईल. मात्र ज्या राज्यांची लोकसंख्या वीस लाखांपेक्षा कमी असेल अशा राज्यात मध्यस्तरावरील पंचायतीची स्थापना केली नाही तरी चालेल, अशी सवलत देण्यात आली आहे.
🔴घटना दुरुस्तीचा मुख्य उद्देश🔴
पंचायत राज्य संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त करून देणे हा ७३ व्या घटना दुरुस्ती कायदयाचा मुख्य उद्देश होता. या घटनादुरुस्तीमुळे पंचायत राज्य संस्थांना घटनात्मक संरक्षण मिळाले आहे. याचाच अर्थ असा की, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याप्रमाणे पंचायत राज्यालाही राज्य घटनेची मान्यता मिळाली आहे. या घटनादुरुस्तीमुळे राज्य सरकारे आता पंचायत राज्य संस्थांच्या बाबतीत पूर्वीप्रमाणे हस्तक्षेप व मनमानी करू शकत नाहीत. पंचायत राज्य संस्थांच्या निवडणूका घेणे किंवा त्यांना अधिकार देणे या गोष्टी आता राज्य सरकारच्या मर्जीवर पूर्वीप्रमाणे अवलंबून राहीलेल्या नाहीत. बऱ्याचशा वेळा राज्यामध्ये शासन करणाऱ्या राजकीय पक्षांना निवडणूक घेण्याकरीता अनुकूल परिस्थिती नसल्यास, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना मुदतवाढ देऊन निवडणुका पुढे ढकलल्या जात असत. महाराष्ट्रात एकेकाळी निवडणुकींना मुदतवाढ देऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणुका तब्बल १२ वर्षानंतर घेण्यात आल्या होत्या. आता दर पाच वर्षांनी निवडणुका घेण्याचे बंधन घालण्यात आले आहे. घटना दुरुस्तीमुळे राज्य घटनेमध्ये ज्याकाही तरतूदी असतील त्यांचे पालन करणे राज्य सरकारांना बंधनकारक आहे.
1 ते 2 प्रश्न Fix असतातच यावर
🌸 भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी 🌸
👉🏻 ससदीय शासन पद्धती : इंग्लंड
👉🏻 मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड
👉🏻 मलभूत हक्क : अमेरिका
👉🏻 नयायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका
👉🏻 नयायालय पुनर्विलोकन : अमेरिका
👉🏻 कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड
👉🏻 सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड
👉🏻 कायदा निर्मिती : इंग्लंड
👉🏻 लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड
👉🏻 ससदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया
👉🏻 सघराज्य पद्धत : कॅनडा
👉🏻 शष अधिकार : कॅनडा
प्रश्नमंजुषा
🔴 १९३५ च्या कायद्याने-------% जनतेला मतदानाचा अधिकार मिळाला.
१) ५
२) १०✅
३) १५
४) २०
_______________________
🟠 सांप्रदायिक निवडणुकीचे जनक असे कोणाला संबोधतात?
१) लॉर्ड कर्झन
२) लॉर्ड मिन्टो✅
३) मोंटेग्यु
४) चेम्सफर्ड
_______________________
🟡 ---------- च्या चार्टर कायद्यानुसार नागरी सेवकांसाठी खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येवू लागले
१) १८५८
२) १८११
३) १८६१
४) १८३३ ✅
___________________
🟢 १८३३ च्या चार्टर कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नर जनरल ला भारताचा गव्हर्नर जनरल असे संबोधण्यात आले भारताचे प्रथम गव्हर्नर जनरल ----------------- हे होते
१) विल्यम बेंटिक ✅
२) वॉरन हेस्टीग्ज
३) रोबर्ट क्लाइव्ह
४) लॉर्ड कोर्नवालीस
_______________________
🔵 १७७३ च्या रेग्युलेटिंग कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नर ला गव्हर्नर जनरल असे संबोधण्यात येवू लागले पहिले गव्हर्नर जनरल ------------- हे होते
१) विल्यम बेंन्टीक
२) वॉरन हेस्टीग्ज ✅
३) रोबर्ट क्लाइव्ह
४ लॉर्ड कोर्नवालीस
_______________________
🟣 भारतात देशी वृत्तपत्रांना खरा प्रारंभ कधी आणि कोणाच्या काळात झाला?
१) मार्क्विस ऑफ हेस्टीग्ज ✔️✔️
२) लॉर्ड वेलस्ली
३) लॉर्ड मिंटो
४) लॉर्ड विल्यम बेंटिक
_______________________
⚫️ भारतात पोलीस खात्याची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?
१) वॉरन हेस्टींग्ज
२) विल्यम कॅरी
३) लॉर्ड विल्यम बेंटिक
४) चार्ल्स बॅबेज
५) लॉर्ड कॉर्नवालीस ✅
_______________________
⚪️ बरिटीश नागरी सेवेची सुरवात
कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?
१) रोबर्ट हुक
२) जॉन स्नोव
३) लॉर्ड कॉंर्नवालीस ✅
४) रॉबर्ट कोच
_______________________
🟤 भारतीय सनदी सेवांचा जनक कोणत्या गव्हर्नर जनरलला म्हणतात?
१)फ्रँकेल
२)लॉर्ड कर्झन
३) रिकेट्स
४) लॉर्ड कॉंर्नवालीस ✅
___________________
🔴 भारतीय नागरिकांना उच्च पदे आणि इंग्रजी शिक्षण कोणत्या गव्हर्नर जनरलने दिले?
१) एम.डब्लू.beijerinck1
२) लॉर्ड विल्यम बेंटीक ✅
३) जे.एच. वॉलकर
४)लॉर्ड मिंटो
___________________
गटविकास अधिकारी (B.D.O) बद्दल संपूर्ण माहिती
गटविकास अधिकारी (B.D.O) बद्दल संपूर्ण माहिती
· पंचायत समितीचा सचिव गटविकास अधिकारी असतो.
· गटविकास अधिकार्याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते तर त्याची नेमणूक महाराष्ट्र शासन करते.
· गटविकास अधिकारी हा वर्ग 1 व वर्ग 2 दर्जाचा अधिकारी असतो.
· गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी असतो.
· गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी असतो.
· गटविकास अधिकार्यावर नजिकचे नियंत्रण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्याचे असते.
· गटविकास अधिकारी हा पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो.
· पंचायत समितीचे अंदाजपत्रक गटविकास अधिकारी तयार करतो.
· पंचायत समितीस मिळणार्या अनुदानातील रकमा काढण्याचे व त्यांचे वाटप करण्याचे अधिकार गटविकास अधिकार्याला आहेत.
· पंचायत समितीच्या वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचार्यांच्या रजा मंजूर करण्याचा अधिकार गटविकास अधिकार्याला आहेत.
· पंचायत समितीचा खर्च गटविकास अधिकार्याच्या संमतीने करावा लागतो.
· पंचायत समितीचा अहवाल गटविकास अधिकारी सी.ई.ओ.कडे पाठवीत असतो.
· पंचायत समितीच्या कार्याची यशस्वीता गटविकास अधिकार्यावर अवलंबून असते.
· गटविकास अधिकार्याला शिक्षा करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तास असतो.
· पंचायत समिती व जिल्हा परिषद यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो.
· राज्यशासन व पंचायत समिती यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो.
दुहेरी राज्यव्यवस्था
✅ ०१. १६ ऑगस्ट १७६५ मध्ये अलाहाबादच्या तहानुसार सम्राट शहाआलमने बंगाल, बिहार,ओरिसाचे दिवाणीचे (कर, वसूल, करणे) अधिकार कंपनीला दिले. बंगालच्या नबाबने फेब्रुवारी १७६५ मध्ये निजामतीचे (लष्करी, फौजदारी, न्यायनिवाडा) अधिकार कंपनीकडे दिले. परंतु राज्यकारभारची व सुव्यवस्थेची जबाबदारी बंगालच्या नबाबकडेच राहिली. त्यामुळे कंपनीच्या हाती निजामती आणि दिवाणीचे अधिकार केंद्रित झाले.
✅ ०२. पंरतू प्रत्यक्षात संपूर्ण राजकीय सत्ता कंपनीने स्वत:कडे घेतली नाही. कारण ब्रिटिश संसदेचे कंपनीवरी नियंत्रण व हस्तक्षेपाची त्यासोबतच अंतर्गत बाहय शत्रु यांची कंपनीला भीती वाटत होती. भारतात राज्य कारभार करण्यासाठी भारतीय शासनपध्दतीची माहिती असणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नव्हता. बंगालवर कंपनीने पूर्ण अधिकार बसवला असता तर एतद्देशीय सत्ताधीशानी कंपनीशी संघर्ष सुरु केला असता व बंगाल इंग्रजांना पचू दिला नसता.
✅ ०३. म्हणून लॉर्ड क्लाईव्हने दुहेरी राज्यव्यवस्था सुरु केली कंपनीने दिवाणी करवसुली वन्यायदान अधिकार नबाबाकडे ठेवला व्यापार सैन्य, परराष्ट्र, व्यवहार आणि खजिना इ. महत्वाची कार्ये कंपनीने स्वत:कडे ठेवली अशा प्रकारे नबाब आणि कंपनी यांच्यात सत्ता विभागली गेली म्हणूनच तिला दुहेरी राज्यव्यस्था असे म्हणतात. या कार्यासाठी बंगालच्या नबाबला ५३ लाख रुपयांची पेन्शन देण्यात आली. १७६५-१७७२ या काळात बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात होती.
✅०४. परंतु या दुहेरी राज्यव्यव्यस्थेत राज्याची सत्ता व जबाबदारी यांची फारकत करण्यात आली होती. ही गंभीर चूक होती. राज्यात दुष्काळ पडला तरी सामान्य जनतेचा विचार न करता कंपनी निर्दयीपणे जमीन महसूल गोळा करीत असे व प्रचंड संपत्ती मिळवीत असे. त्यामुळे कोटी माणसे अन्नान्न करुन तडफडून मेली. बंगालमध्ये स्मशानकळा पसरली.
✅ ०५. या व्यवस्थेमुळे गोंधळ व भ्रष्टाचार निर्माण झाल्याने १७७२ मध्ये वॉरन हेस्टिंग्जने बंद केली. शेवटी इंग्रज सरकारने कंपनीच्या कारभाराची चौकशी करुन तिच्यावर नियंत्रण प्रस्थपित करणारा रेग्युलेंटिग अॅक्ट पास केला. (१७७३)
✅ ०६. वॉरेन हेस्टीन्ग्जने सरकारच्या मालकीची सर्व जमीन असते, या भूमिकेतून जमीन महसूल व्यवस्था पद्धतीत बदल करून महसूल रकमेचा लिलाव करण्याची पद्धत लागू केली. रोबर्ट क्लाइव्ह महसूल रकमेचा वार्षिक लिलाव करीत असे. वॉरेन हेस्टीन्ग्जने हा लिलाव पंचवार्षिक केला. परंतु त्याने पुन्हा वरशील लिलाव पद्धती आणली.
सराव प्रश्नसंच
1) आर्थिक आणीबाणी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार लागते ?
अ) कलम ३५२
ब) कलम ३५६
क) कलम ३६०
ड) कलम ३६२
=======================
उत्तर............ क) कलम ३६०
=======================
२) ४४ व्या घटनादुरुस्तीने कलम ३५२ मधील कोणती तरतूद बदलण्यात आली ?
अ) युद्ध
ब) परकीय आक्रमण
क) अंतर्गत अशांतता
ड) वरीलसर्व
==========================
उत्तर......... क) अंतर्गत अशांतता
==========================
३) कोणतेही विधेयक (धनविधेयक सोडून) विधान परिषद किती दिवस विलंब करू शकते ?
अ) दोन महिने
ब) तीन महिने
क) चार महिने
ड) सहा महिने
=====================
उत्तर....... क) चार महिने
=====================
४) भारतात कोणत्या केंद्रशाशीत प्रदेशाला स्वतःचे उच्च न्यायालय आहे ?
अ) चंडीगड
ब) लक्षद्वीप
क) दिल्ली
ड) महाराष्ट्र
=====================
उत्तर..... क) दिल्ली
=====================
५) कनिष्ठ न्यायालयावर देखरेख करण्याचा अधिकार कुणाला आहे ?
अ) उच्च न्यायालय
ब) सर्वोच्य न्यायालय
क) दोन्ही
ड) यापैकी नाही
========================
उत्तर........ अ) उच्च न्यायालय
========================
६) कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते ?
अ) कलम १३
ब) कलम ३२
क) कलम २२६
ड) यापैकी नाही
=====================
उत्तर....... क) कलम २२६
=====================
७) केंद्र व राज्य यांच्यातील संबधावर प्रकाश टाकण्यासाठी १९८३ मध्ये कोणत्या आयोगाची नेमणूक करण्यात आली ?
अ) राजमन्नार आयोग
ब) सच्चर आयोग
क) सरकारिया आयोग
ड) व्ही. के. सिंग
==========================
उत्तर....... क) सरकारिया आयोग
==========================
८) राज्य घटनेतील कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ?
अ) कलम २८०
ब) कलम २८२
क) कलम २७५
ड) कलम २८४
=====================
उत्तर....... अ) कलम २८०
=====================
९) आंतरराज्जीय नदी विवाद सोडविण्यासाठी राज्य घटनेत कोणत्या कलमाची तरतूद करण्यात आली आहे ?
अ) कलम २६१
ब) कलम २६२
क) कलम २६३
ड) कलम २६४
=====================
उत्तर....... ब) कलम २६२
=====================
१०) निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार राज्यघटनेत आहे ?
अ) कलम ३२४
ब) कलम ३२५
क) कलम ३२६
ड) कलम ३२७
=====================
उत्तर........ अ) कलम ३२४
=====================
११) खालीलपैकी कोणती समिती निवडणुका सुधारनांशी संबंधित नाही ?
अ) संथानाम समिती
ब) वांछू व गोस्वामी समिती
क) तारकुंडे समिती
ड) गोपालकृष्णन समिती
========================
उत्तर....... अ) संथानाम समिती
========================
१२) राष्टीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
अ) पाच वर्षे
ब) सहा वर्षे
क) तीन वर्षे
ड) दोन वर्षे
=====================
उत्तर........ अ) पाच वर्षे
=====================
१३) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होते ?
अ) उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश
ब) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश
क) उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश
ड) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश
=====================
उत्तर...... पर्याय (ड)
=====================
१४) आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते ?
अ) केंद्र सरकार
ब) राज्य सरकार
क) जिल्हाधिकारी
ड) निवडणूक आयोग
========================
उत्तर....... ड) निवडणूक आयोग
========================
१५) कलम १६९ नुसार विधानपरिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला असतो ?
अ) केंद्र
ब) राज्य
क) दोन्ही
ड) यापैकी नाही
=====================
उत्तर.......... ब) राज्य
=====================
सोडवा :- महत्त्वाचे प्रश्न
1)अति मद्य सेवनामुळे ….. या जीवनसत्वाचा अभाव निर्माण होवून पेलाग्रा हा विकार जडतो.
बी-1 👈
बी-5
बी-7
बी-2
2)पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात?
पाणलोट
शेततळी
मालगुझरी 👈
जोहड
3)जगातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेचे उद्घाटन कोठे झाले आहे?
जर्मनी👈
जपान
फ्रान्स
रुस
4)सलाबत खानचा मकबरा हे कोणाचे वास्तविक नाव आहे?
आलमगीर
ताहीराबाद
भुईकोट किल्ला
चाँदबिबी महल 👈
5)समुद्रातील ……. या प्राण्यामुळे मोती मिळतात.
सी-लिली
ऑयस्टर 👈
स्टिंग रे
यापैकी नाही
6)डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी …… येथे झाला.
नागपूर
आंबवडे
महू 👈
जबलपूर
7)राऊस सार्कोमा (RVS) या विषाणूमुळे ….. हा रोग उद्भवतो?
एड्स
कृष्ठरोग
कर्करोग 👈
हिवताप
8)जगातील सर्वात कॅशलेस व्यवहार कोणता देश करतो?
बेलारूस
बेल्जियम 👈
फ्रान्स
कॅनडा
9)‘विद्वान’ चे स्त्रीलिंगी रूप कोणते?
विद्या
विद्वानिण
विदुषी 👈
विधवा
10)…. संस्था क्रांतिकारी राष्ट्र्वादाशी संबंधित होती.
अभिनव भारत 👈
होमरूल लीग
बॉम्बे असोसिएशन
यापैकी नाही
11)खालीलपैकी कोणाला ऑलम्पिक पदक मिळालेले नाही?
मेरी कोम
दिपा कर्मारकर 👈
कर्नाम मल्लेश्वरी
साक्षी मलिक
12)पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान ….. आहे.
राहुरी
पेडगाव
चोंडी 👈
राशिन
13)पहिल्या भारतीय अमेरिकन ज्यांची अमेरिकेच्या सिनेटवर निवड झाली आहे?
कमला शिरीन
कमला हॅरीस 👈
राधा नारायण
मृणालिनी रॉय
14)राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या गृहाचे सदस्य भाग घेत नाहीत?
विधानपरिषद 👈
लोकसभा
राज्यसभा
विधानसभा
15)‘थंडा फराळ करणे’ या वाक्य प्रचाराचा अर्थ काय?
भरपेट फराळ करणे
फराळ करणे
थंड जेवण करणे
उपाशी रहाणे 👈
16)स्वच्छ भारत अभियानाचे घोष वाक्य.
एक कदम स्वच्छता की ओर 👈
हमारा भारत स्वच्छ भारत
हम स्वच्छ भारत स्वच्छ
स्व्च्छताही उन्नती है
17)आंतरराष्ट्रीय महिला दिन …… हा आहे?
१० आॅगस्ट
१६ सप्टेंबर
८ मार्च 👈
११ डिसेंबर
18)नागराज मंजुळे या दिग्दर्शकाचा खालीलपैकी कोणता चित्रपट नाही?
दुनियादारी 👈
सैराट
पिस्तुल्या
फँड्री
19)आशियाई विकास बँक चे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?
दिल्ली
ढाका
मनिला 👈
कोलंबो
20)सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती?
इंफाळ
कोहिमा
गंगटोक 👈
आगरतळा
संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नसंच
1). महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला ?
⚫️ लतिका घोष ☑️
⚪️ सरोजिनी नायडू
⚪️ कष्णाबाई राव
⚪️ उर्मिला देवी
2). पहिल्या कर्नाटक युद्धानंतर कोणत्या तहानुसार फ्रेंचांनी इंग्रजांना मद्रास दिले ?
⚫️ अक्स-ला-चॅपेलचा तह ☑️
⚪️ पॉंडेचेरीचा तह
⚪️ मगलोरचा तह
⚪️ परिसचा तह
3). १८५७ च्या उठावाचा बिहारमधील प्रमुख नेता कोण होता ?
⚪️ खान बहादूर खान
⚫️ कुंवरसिंग ☑️
⚪️ मौलवी अहमदुल्ला
⚪️ रावसाहेब
4). डलहौसीने झाशी संस्थान केव्हा खालसा केले. ?
⚪️ १८४९
⚪️ १८५१
⚫️ १८५३ ☑️
⚪️ १८५४
5). १९०९ मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी कोणते वृत्तपत्र प्रकाशित केले. ?
⚪️ फरी इंडिया
⚪️ नया भारत
⚪️ फरी प्रेस जर्नल
⚫️ लीडर ☑️
6) १८५७च्या उठावाबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा. ?
अ] उठावकर्त्यांना विशिष्ट राजकीय उद्दिष्ट नव्हते.
ब] झीनत महल हिने स्वतःच्या सुरक्षेसाठी इंग्रजांशी बोलणी केली.
⚪️ फक्त अ
⚪️ फक्त ब
⚫️ वरील दोन्ही ☑️
⚪️ वरीलपैकी एकही नाही
7). खाली दिलेल्या भारताच्या व्हॉइसरॉय यांचा योग्य कालक्रम लावा. ?
अ] लॉर्ड कर्झन
ब] लॉर्ड चेम्सफर्ड
क] लॉर्ड हार्डिंग्स II
ड] लॉर्ड आयर्विन
पर्याय
⚫️ अ-ब-क-ड ☑️
⚪️ अ-क-ब-ड
⚪️ क-अ-ब-ड
⚪️ अ-ड-क-ब
8). विधान :- अ] १९२९ चा बालविवाह कायदा हा शारदा कायदा म्हणून प्रसिद्ध आहे. ?
स्पष्टीकरण:- ब] उमा शंकर सारडा यांनी हा कायदा केंद्रीय कायदेमंडळात मांडला. ?
पर्याय
⚫️ फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ☑️
⚪️ फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
⚪️ अ बरोबर आणि ब चूक
⚪️ अ चूक आणि ब बरोबर
9. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये भारतीयांना स्थान मिळाले ?
⚪️ भारत सरकारचा कायदा १९३५
⚪️ भारत सरकारचा कायदा १९१९
⚫️ भारत कौन्सिल कायदा १९०९ ☑️
⚪️ भारत कौन्सिल कायदा १८९२
10). मानवजातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर. ही घोषणा कोणी दिली ?
⚪️ सहदरण आय्यपन
⚫️ नारायण गुरु ☑️
⚪️ हदयनाथ कुंजरू
⚪️ टी.एम. नायर
कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो?
⚪️ कावीळ
⚪️ विषमज्वर
⚪️ अतिसार
⚫️ वरील सर्व ☑️
देवी या रोगावर कोणत्या शास्त्रज्ञाने लस शोधून काढली?
⚫️ एडवर्ड जेन्नर ☑️
⚪️ लई पाश्चर
⚪️ शयाम विल्मुट
⚪️ कार्ल स्टिनर
विद्यूत शक्ती _ मध्ये मोजतात. ?
⚪️ वॉल्ट
⚪️ कल्वीन
⚫️ वॅट ☑️
⚪️ कलरी
ढगांचा गडगडात वीज चमकल्यानंतर थोड्यावेळाने ऐकू येतो; कारण
⚪️ ढग आकाशात खूप उंचावर असतात.
⚪️ परकाश व आवाजाची गती समान असते
⚫️ प्रकाशाची गती ध्वनीच्या गतीपेक्षा जास्त असते ☑️
⚪️ धवनीची गती प्रकाशाच्या गती पेक्षा जास्त आहे
तुमच्या शरीराची स्थितिज ऊर्जा कमीत कमी असते, जेव्हा तुम्ही _
⚪️ खर्चीवर बसलेले असता
⚪️ जमिनीवर बसलेले असता
⚫️ जमिनीवर झोपलेले असता ☑️
⚪️ जमिनीवर उभे असता
वटवाघूळ उडत असताना _ ध्वनी निर्माण करतात.?
⚪️ लघु वारंवारतेचा
⚫️ उच्च वारंवारतेचा ☑️
⚪️ मध्यम वारंवारतेचा
⚪️ यापैकी नाही
कोणते पाणी सर्वात स्वच्छ जल म्हणून ओळखले जाते?
⚪️ विहिरीतील
⚪️ नळाचे
⚪️ तलावाचे
⚫️ पावसाचे ☑️
कुष्ठरोगाच्या जिवाणूंचा शोध कोणत्या शास्त्राज्ञाने लावला?
⚫️ डॉ. हॅन्सन ☑️
⚪️ डॉ. रोनॉल्ड
⚪️ डॉ. बेरी
⚪️ डॉ. निकेल्सनू
७ कि.मी. = डेकामीटर ?
⚪️ ७०
⚫️ ७०० ☑️
⚪️ ७०००
⚪️ ०.७००
खालीलपैकी कोणते औषध क्षयरोगासाठी वापरतात?
⚫️ स्ट्रेप्टोमायसिन ☑️
⚪️ पनिसिलिन
⚪️ डप्सॉन
⚪️ गलोबुलिन
............... या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते. ?
⚪️ सातारा
⚪️ कोल्हापूर
⚫️ कराड ☑️
⚪️ महाबळेश्वर
महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली ................ आहे. ?
⚪️ भीमा
⚫️ गोदावरी ☑️
⚪️ कष्णा
⚪️ वनगंगा
योग्य जोडया लावा. ?
धरण जलाशयाचे नाव
अ) कोयना i) शहाजी सागर
ब) भाटघर ii) शिवसागर
क) माणिकडोह iii) ऑथर सरोवर
ड) भंडारदरा iv) येसाजीकंक
अ ब क ड
⚪️ i iv ii iii
⚪️ i iii ii iv
⚪️ iv iii ii i
⚫️ *ii iv i iii ☑️*
महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ?
⚪️ वशिष्ठी
⚪️ तापी
⚫️ भीमा ☑️
⚪️ उल्हास
खालील कोणत्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नदीने विशिष्टपणे अर्धवर्तुळाकार आकार घेतल्याने नदीचे तसे नाव पडले आहे ?
⚪️ दहू
⚪️ आळंदी
⚫️ पंढरपूर ☑️
⚪️ नाशिक
‘लवासा’ प्रकल्प पुणे जिल्ह्यातील ............ नदीच्या खोऱ्यात उभारला जात आहे. ?
⚪️ चद्रभागा
⚪️ मळा-मुठा
⚫️ मोसे ☑️
⚪️ कष्णा
पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावर .............. वसलेले आहे. ?
⚪️ कराड
⚪️ पढरपूर
⚪️ औदुंबर
⚫️ नरसोबाची वाडी ☑️
हिमालयातील नद्यांच्या संदर्भात खाली दिलेल्या विधानांचा विचार करा. ?*
अ) त्यांची झीज करण्याची क्षमता प्रचंड आहे.
ब) त्या नद्या बारमाही आहेत.
क) या नद्यांनी मोठया प्रमाणात ‘घळयांची’ निर्मिती केलेली नाही.
ड) बहुतेक नद्यांचा उगम हिमालयाच्या वरच्या भागात आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीची आहेत ?
⚪️ फक्त अ, ब
⚫️ फक्त क ☑️
⚪️ अ, ब, क, ड
⚪️ अ, ब, ड
योग्य जोडया लावा. ?
नदी उपनदी
अ) भीमा i) वैनगंगा
ब) गोदावरी ii) कोयना
क) कृष्णा iii) इंद्रायणी
ड) तापी iv) गिरणा
अ ब क ड
⚫️ iii i ii iv ☑️
⚪️ ii iv i iii
⚪️ ii i iii iv
⚪️ iii ii i iv
खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही ?
⚪️ इद्रावती
⚪️ परवरा
⚫️ इंद्रायणी ☑️
⚪️ दधना
पदार्थाच्या नुकत्याच सापडलेल्या सहाव्या अवस्थेचे नाव काय आहे ?
⚫️ बोस – आईनस्टाईन कंडनसेट ☑️
⚪️ फर्मआयोनिक कंडनसेट
⚪️ एरिक – कॅटरले कंडनसेट
⚪️ कार्नेल टर्मस् कंडनसेट
धातूंचे क्षरण थांबविण्यासाठी खालील पध्दतींपैकी अयोग्य पध्दत कोणती ?
अ) गॅल्व्हॉनायझिंग – लोखंड/स्टील यांवर जस्ताचा थर लावणे.
ब) टायनिंग – कथिलचा थर लावणे (कलई करणे).
क) ॲनोडायझिंग – विद्युत अपघटनाव्दारे तांबे किंवा ॲल्युमिनीअमवर ऑक्साईडचा पातळ थर लावणे.
⚪️ फक्त अ
⚫️ फक्त ब ☑️
⚪️ फक्त क
⚪️ वरीलपैकी एकही नाही
खालीलपैकी कोणते क्षार हे डी.एन.ए. मध्ये असतात. ?
अ) एडीनीन – A
ब) गुआनीन – G
क) थायमिन – T
ड) साइटोसीन – C
⚪️ अ, ब
⚫️ अ, ब, क ☑️
⚪️ ब, क, ड
⚪️ अ, ब, क, ड
वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर म्हणजे कोणती भौतिक राशी होय ?*
⚪️ चाल
⚪️ घनता
⚪️ जडत्व
⚫️ त्वरण ☑️
खालीलपैकी कोणता मूलद्रव्य पहिल्या महायुध्दात हत्यार म्हणून वापरण्यात आला होता. ?*
⚫️ मिथेन ☑️
⚪️ कलोरीन
⚪️ फलोरीन
⚪️ आयोडीन
. अ). ज्या भौतिक राशी व्यक्त करताना परिमाण आणि दिशा दोघांची आवश्यकता असते त्या राशींना आदिश राशी असे म्हणतात. ?
ब). ज्या भौतिक राशी व्यक्त करताना फक्त दिशेची आवश्यकता असते त्या भौतिक राशींना सदिश राशी असे म्हणतात.
वरीलपैकी सत्य विधान / विधाने कोणते ?
⚪️ फक्त अ
⚪️ फक्त ब
⚪️ अ, ब दोन्ही
⚫️ एकही नाही ☑️
धातूबद्दल खालील विधानांचा विचार करा. ?
अ). धातू मूलद्रव्य इलेक्ट्रॉन देऊन धन आयन प्राप्त करतात.
ब). धातू मूलद्रव्य इलेक्ट्रॉन घेऊन ऋण आयन प्राप्त करतात.
क). आधुनिक आवर्तसारणीत धातू मूलद्रव्य डाव्या बाजूला व मध्यभागी आहेत.
ड). टेक्नेशिअम हा सर्वांत पहिला कृत्रिम मूलद्रव्य आहे.
⚫️ अ, क, ड बरोबर ☑️
⚪️ अ, क बरोबर
⚪️ ब, क बरोबर
⚪️ अ, ब, क, ड बरोबर
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
अ). हिपॅरीन - रक्त शरीरात गोठू नये म्हणून असणारे रसायन आहे.
ब). हिस्टामाइन - सूल आल्यानंतर तिथे स्त्रवणारे रसायन आहे.
⚪️ अ योग्य
⚪️ ब योग्य
⚫️ दोन्ही योग्य ☑️
⚪️ दोन्ही अयोग्य
खालील विधाने वाचा, योग्य पर्याय निवडा. ?
अ). एक किलोग्रॅम म्हणजे पॅरीस येथील आंतरराष्ट्रीय मोजमाप कार्यालयातील 90% प्लॅटीनम, 10% इरिडीयम या मिश्रधातूचा 39 मि.मी. उंची व व्यास असणा-या ठोकळयाचे वजन होय.*
ब). एक किलोग्रॅम म्हणजे 4° c तापमानात सामान्य वायूदाबाला 1 लिटर पाण्याचे वजन होय.
⚫️ अ, ब दोन्ही ☑️
⚪️ फक्त अ
⚪️ फक्त ब
⚪️ एकही नाही
खालील विधानांचा विचार करा. ?
अ). चांदीपेक्षा सोन्याची तन्यता जास्त आहे.
ब). चांदीपासून 8,000 फूट लांबीचा तार काढता येतो.
क). चांदीनंतर तांबे दुसरा आणि सोने तिसरा विजेचा सर्वोत्तम वाहक आहे.
ड). चांदी हा मानवासाठी विषारी नाही आणि आपण जेवण डेकोरंटमध्ये चांदीचा वापर करू शकतो.
⚫️ ब, क, ड बरोबर अ चूक ☑️
⚪️ अ, ब, क, ड बरोबर
⚪️ अ, ब, ड बरोबर
⚪️ वरीलपैकी नाही
पोलीस भरती प्रश्नसंच
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते?
1. बिहार
2. उत्तर प्रदेश
3. राजस्थान🎯
4. महाराष्ट्र
भारतातील सर्वात लांब नदी कोणती?
1. कोयना
2. गोदावरी
3. यमुना
4. गंगा🎯
२०११ ची लोकसंख्या जि किर्वी लोकसंख्या गणना होती?
1. १६ वी
2. १५ वी🎯
3. १८ वी
आशियातील एकमात्र ठिकाण जेथे सौर तलावाचे निर्माण होत आहे, ते कोठे आहे?
1. भूज (गुजरात)🎯
2. कच्छ (गुजरात)
3. मुत्पनडल (तामिळनाडू)
4. मणिकरण (हिमाचल प्रदेश
पवन उर्जा निर्मितीत आघाडीवर असलेले राज्य कोणते?
1. तामिळनाडू🎯
2. उत्तर प्रदेश
3. महाराष्ट्र
सर्वात जास्त कुपोषित बालके असलेले राज्य कोणते?
1. बिहार
2. मध्यप्रदेश🎯
3. राजस्थान
4. महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यापूर्वी आपले राज्य कोणते प्रांत म्हणून ओळखले जात होते?
1. मुंबई प्रांत🎯
2. मराठवाडा प्रांत
3. कोकण प्रांत
4. विदर्भ प्रांत
विधानसभेच्या सभासदांची संख्या किती असते?
1. २५०
2. २६७
3. २८८🎯
4. २४०
चिखलदरा पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
1. अमरावती🎯
2. अहमदनगर
3. नाशिक
4. सातारा
महादेव डोंगररांगांमुळे भीमा नदीचे खोरे कोणत्या नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झालेले आहे?
1. गोदावरी
2. गंगा
3. कोयना
4. कृष्णा🎯
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
1. रायगड🎯
2. पुणे
3. औरंगाबाद
4. सातारा
प्रसिद्ध गुळाची बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे?
1. कोल्हापूर🎯
2. जालना
3. अकोला
4. धर्माबाद
देवगड पवनऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्हात आहे?
1. सातारा
2. सांगली
3. सिंधुदुर्ग🎯
4. बीड
मुंबई विद्यापीठाची स्थापन केव्हा झाली?
1. सन १८५७🎯
2. सन १९४८
3. सन १८६०
4. सन १९२५
खालीलपौकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही.
1) वज्रेश्वरी🎯
2) राजवाडी
3) आसवली
4) उन्हेरे
महाराष्ट्राविषयी माहिती
• महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.
• महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
• महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी - नागपूर.
• महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६.
• महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.
• महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.
• महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
• महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.
• विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.
• महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.
• महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.
• महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
• महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
• महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे
• महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
• महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
• महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.
• महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.
• महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.
• भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.
• भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.
• महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.
• महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.
• भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
• महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.
• पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.
• गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.
• प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.
• गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.
• जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.
• औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
• पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
• महाराष्ट्रातील नायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.
° कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.
• कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.
• विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.
• विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.
• महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.
• विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.
• संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.
• संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.
• राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.
• संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.
• ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.
• यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.
• महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.
• महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.
• पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.
• कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.
• आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.
• मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात
• यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.
• महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.
• नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.
• महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.
• शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.
• महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.
• शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.
• ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.
• तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.
• भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.
• महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.
• रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.
Latest post
Daily Top 10 News : 21 March 2023
1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 मार्च 2023 रोजी नवी दिल्ली येथे ग्लोबल मिलेट्स (श्री अण्णा) परिषदेचे उद्घाटन केले. ते याप्रसंगी उपस्थितां...
-
1) नाव मिळवणे. अर्थ :- कीर्ती मिळविणे. वाक्य :- शालान्त परीक्षेत जिल्ह्य़ात प्रथम येऊन सुप्रियाने नाव मिळविले. 2) रक्ताच...
-
1. राष्ट्रीय महामार्ग (NH) 44 - पर्वीचे नाव NH 07 - लांबी 3745 km - राज्ये: जम्मू आणि काश्मीर (श्रीनगर), पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प...
-
घटना दुरुस्ती कायदा 📌जुलै २०१८ मध्ये राज्यसभेच्या मान्यतेनंतर ११ ऑगस्ट २०१८ रोजी त्याचे १०२व्या घटना दुरुस्ती कायद्यामध्ये रूपांतर झाले....