Sunday 16 August 2020

विज्ञान :- शरीरात हिमोग्लोबिन वाढवायचे कसे ?



मानवी शरीरात रक्तातील लाल पेशींमध्ये असणारे हिमोग्लोबिन रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक असते. म्हणजेच हिमोग्लोबिन कमी झाले की, शरारीतील रक्ताचा पुरवठा देखील योग्य रित्या होत नाही. असे होऊ नये म्हणून अशा वेळी डॉक्टरच आपल्याला काय खावे? खाऊ नये? याबाबत सांगतात. त्यावर एक नजर...

1. *बीट* : याच्या सेवनाने व्हिटॅमिन सी आणि लोह अशा दोन्ही गोष्टी  मिळतात. याने शरीरातील रक्ताचे प्रमाण देखील वाढत वाढते.

2. *पालक* : यामध्ये मोठ्या प्रमाणात लोहाचे प्रमाण असते. याने शरीरातील हिमोग्लोबिन चांगलेच वाढू शकते.

3. *अंडी* : यामुळे शरीराला लोह मिळते तसेच अनेक पोषक घटक यात असतात.

4. *सुकामेवा* : सुकामेव्यातील अंजीर, जर्दाळू , बदाम, काळ्या मनुका, खारीक अशा अनेक ड्रायफ्रुट्समधून लोह मिळते.

5. *मासे* : कोळंबी, सुरमई, बांगडा असे मासे आहारातून जरूर खा. ज्यामुळे शरीराला मुबलक लोह मिळते.

6. *डाळिंब* : यामध्ये लोहासोबत कॅल्शियम, प्रोटिन्स, फायबर आणि इतर अनेक व्हिटॅमिन्स असतात.

ज्या लोकांना आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवायचे आहे त्यांनी आहारात वरील पदार्थांचा समावेश करून आहारातील लोहाचे प्रमाण वाढवायला हवे.

महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न उत्तरे



▪️ कोणत्या संस्थेनी 'सुरक्षित दादा-दादी आणि नाना-नानी अभियान' चालवले आहे?
उत्तर : नीती आयोग

▪️ कोणत्या राज्य सरकारने राज्यात ‘बिरसा हरित ग्राम योजना’ लागू केली?
उत्तर : झारखंड

▪️ 2020 साली आंतरराष्ट्रीय सुइणी दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : मिडवाइव्ज विथ विमेन: सेलिब्रेट, डेमोनस्ट्रेट, मोबिलाईज, युनाइट

▪️ कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनी “लॉस्ट अॅट होम” या शीर्षकाचा अहवाल प्रकाशित केला?
उत्तर : संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF)

▪️ कोणत्या राज्य सरकारने 'आयुष कवच-कोविड' या नावाचे मोबाइल अॅप तयार केले?
उत्तर : उत्तरप्रदेश

▪️ कोणती कंपनी ‘आयसोलेटेड नॉट अलोन’ नावाने एक मोहीम चालवीत आहे?
उत्तर : अॅव्होन

▪️ कोणत्या सरकारने राज्यात मुख्यमंत्री शहरी रोजगार गॅरंटी योजना लागू करण्याचा निर्णय घेतला?
उत्तर : हिमाचल प्रदेश

▪️ कोणत्या व्यक्तीची आर्मी ट्रेनिंग कमांडचे नवे कमांडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर : लेफ्टनंट जनरल राज शुक्ला

▪️ IBRD यामध्ये अमेरिकेचे प्रतिनिधी म्हणून कोणत्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली?
उत्तर : अशोक मायकेल पिंटो

▪️ 2020 साली जागतिक अस्थमा दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : इनफ अस्थमा डेथ्स

▪️ ‘शिवाजी इन साउथ ब्लॉक: द अनरिटन हिस्टरी ऑफ प्राउड पीपल’ हे शीर्षक असलेले पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर : गिरीश कुबेर

▪️ कोण ‘फेड कप हार्ट’ पुरस्कारासाठी नामांकित झालेले प्रथम भारतीय ठरले?
उत्तर : सानिया मिर्झा

▪️ ‘द रूम व्हेयर इट हॅपन्ड: ए व्हाइट हाऊस मेमोरी’ हे शीर्षक असलेले पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर : जॉन बोल्टन

▪️ ‘एक राष्ट्र एक रेशनकार्ड’ योजनेच्या अंतर्गत कोणते राज्य समाविष्ट करण्यात आले नाही?
उत्तर : छत्तीसगड

▪️ 2020 साली जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : जर्नलिजम विदाउट फियर ऑर फेवर

▪️ कोणती संस्था ‘भारतईमार्केट’ या नावाने ई-कॉमर्स बाजारपेठ तयार करणार आहे?
उत्तर : अखिल भारतीय व्यापारी महासंघ (CAIT)

▪️ परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी चालविलेल्या अभियानाचे नाव काय आहे?
उत्तर : वंदे भारत मिशन

▪️ कोणत्या व्यक्तीला ‘UNESCO/ग्युईलेर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राइज 2020’ हा पुरस्कार देण्यात आला?
उत्तर : जिनेथ बेदोया लिमा

▪️ कोणत्या राज्य सरकारने “CMAPP” अॅप तयार केले?
उत्तर : आंध्रप्रदेश

▪️ कोणत्या देशाच्या नेत्याला रशिया सरकारच्या वतीने ‘द्वितीय विश्वयुद्ध स्मारक युद्ध पदक’ देऊन गौरविण्यात आले?
उत्तर : उत्तर कोरिया

▪️ कोणत्या मंत्रालयाने 49 वनोपज उत्पादनांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केली?
उत्तर : आदिवासी कल्याण मंत्रालय

▪️ कोणत्या व्यक्तीची येस बँकेच्या मुख्य जोखीम अधिकारी पदावर नेमणूक झाली?
उत्तर : नीरज धवन

▪️ जमिनी रॉय कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
उत्तर : चित्रकला

▪️ कोणत्या काश्मिरी उत्पादनाला GI टॅग प्राप्त झाले?
उत्तर : केसर

▪️ 2020 साली वसंत ऋतूतला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला गेला?
उत्तर : 2 मे

▪️ कोणते राज्य नागरिकांना मोफत आणि रोखविरहित विमा हप्ता प्रदान करणारे पहिले राज्य ठरले?
उत्तर : महाराष्ट्र

▪️ कोणत्या भारतीय संस्थेनी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी सिम्युलेशन कोड विकसित केले?
उत्तर : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम

▪️ कोण इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इंस्टीट्यूट फॉर सेमी-अरीड ट्रॉपीक्स या संस्थेचे नवे महासंचालक आहेत?
उत्तर : जॅकलिन डी’अरोस हगेस

▪️ NASA संस्थेच्या मंगळ हेलिकॉप्टरचे नाव काय आहे?
उत्तर : इंजेन्यूटी

▪️ कोणती दूरदर्शन मालिका जागतिक स्तरावर सर्वाधिक बघितला जाणारा कार्यक्रम ठरला?
उत्तर : रामायण
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

नदीने तयार केलेल्या सीमा



              🔰  गोदावरी नदी 🔰

◾️ अहमदनगर-औरंगाबाद

◾️ जालना-बीड

◾️ बीड-परभणी

             🔰 भीमा नदी 🔰


◾️ पणे-सोलापूर

◾️ पणे-अहमदनगर

             🔰 कष्णा नदी 🔰

◾️सांगली-कोल्हापूर

             🔰 नीरा नदी 🔰

◾️पणे-सोलापूर

◾️पणे-सातारा

पंचायत राज संदर्भातील समित्या



1) व्ही आर राव (1960)
✅विषय - पंचायत सांख्यिकी सुसूत्रता समिती

2) एस डी मिश्रा (1961)
✅विषय - पंचायत राज आणि सहकारी संस्था

3) व्ही ईश्वरण (1961)
✅विषय - पंचायत राज प्रशासन

4) जी आर राजगोपाल (1962)
✅विषय - न्याय पंचायती संदर्भात अभ्यासगट

5) आर आर दिवाकर (1963)
✅विषय - ग्रामसभेसंदर्भात

6) एम राजा रामकृष्णय्या (1963)
✅विषय - पंचायत राज संस्थेच्या अंदाजपत्रक संदर्भात अभ्यासगट

7) के संथानम (1963)
✅विषय - पंचायत राज अर्थविषयक अभ्यास गट

8) के संथानम (1965)
✅विषय - पंचायत राज निवडणूक संदर्भात

9) आर के खन्ना (1965)
✅विषय - पंचायत राज लेखापरीक्षणसंबंधी अभ्यासगट

10) जी रामचंद्रन (1966)
✅विषय - पंचायत राज प्रशिक्षण संदर्भात

11) श्रीमती दया चोबे (1976)
✅विषय - समुदाय विकास आणि पंचायत राज

राष्ट्रीयकृत बैंक आणि त्यांची कार्यालय.



अलाहाबाद बैंक - कोलकाता

• बैंक ऑफ इंडिया - मुंबई

• बैंक ऑफ महाराष्ट्र - पुणे

• केनरा बैंक - बैंगलोर

• सेंट्रल बैंक ऑफ इंडिया - मुंबई

• कॉरपोरेशन बैंक - मंगलौर

• देना बैंक - मुंबई

• इंडियन बैंक - चेन्नई

• इंडियन ओवरसीज बैंक - चेन्नई

• ओरिएंटल बैंक ऑफ कॉमर्स - नवी दिल्ली

• पंजाब नेशनल बैंक - नवी दिल्ली

• पंजाब एंड सिंध बैंक -- नवी दिल्ली

• सिंडिकेट बैंक - मणिपाल

• यूको बैंक - कोलकाता

• यूनियन बैंक ऑफ इंडिया - मुंबई

• यूनाइटेड बैंक ऑफ इंडिया - कोलकाता

• विजया बैंक - बैंगलोर

• आंध्रा बैंक - हैदराबाद

• बैंक ऑफ बड़ौदा - मुंबई

शेतमालासाठी देशव्यापी एकच बाजारपेठ



🔸आत्मनिर्भर भारत योजने’अंतर्गत देशातील अल्पभूधारक आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी 11 घोषणा केल्या.शेती क्षेत्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 1 लाख कोटी रुपयांचे साह्य़ केले जाणार आहे.

🔸तर शिवाय, जीवनावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा केली जाणार असून शेतीमालाच्या आंतरराज्यीय विक्रीलाही परवानगी देण्यासाठी केंद्रीय स्तरावर कायदा केला जाणार असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली.

🔸तसेच जेव्हा अन्नधान्याचा तुटवडा होता तेव्हा हा कायदा केला गेला. आता शेतमालाला रास्त दर मिळण्यासाठी, या क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी, स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी जीवनावश्यक वस्तू कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज आहे, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले.

🔸हगाम सुरू होण्यापूर्वी शेतीमालाला किमान निश्चित दर देण्याची हमी मिळाली तर शेतीमालाच्या किमतीबाबत असलेली अनिश्चितता कमी होईल, अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठीही कायदा केला जाणार आहे.

🔸अन्नप्रक्रिया उद्योग, निर्यातदार, मोठे शेतीमाल विक्रेते यांच्याकडून शेतकऱ्यांना किमतीची हमी मिळाली तर शेतकऱ्याला उत्पन्नाची हमी मिळू शकेल.शेतकऱ्यांच्या आर्थिक फायद्यासाठी शेतीमालाच्या आंतरराज्य विक्रीलाही परवानगी दिली जाणार असून त्यासाठी केंद्र कायदा करेल.

🔸शती हा विषय राज्यांच्या अखत्यारीत असला तरी, आंतरराज्य हा विषय केंद्राच्या अखत्यारीत असल्याने असा कायदा करण्यात अडचण येणार नाही.

🔸नव्या कायद्यामुळे शेतकऱ्यावर फक्त त्याच्या जवळच्याच कृषिबाजारात शेतीमाल विकण्याचे बंधन राहणार नाही. शिवाय, ई-विक्रीलाही प्रोत्साहन दिले जाणार असून त्यांना फक्त आडत्यांनाच माल विकावा लागणार नाही.

वर्ष 2015-2020 या कालावधीत जंगलतोडीचे प्रमाण कमी झाले



संयुक्त राष्ट्रसंघाच्या खाद्यान्न व कृषी संघटनेनी (FAO) 'ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्स अॅसेसमेंट रिपोर्ट, 2020' अहवाल प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी वर्ष 1990 ते वर्ष 2020 या कालावधीत 236 देश आणि प्रांतांमध्ये असलेल्या वनांच्या संबंधित स्थितीचा अभ्यास केला गेला आहे.

अहवालातल्या ठळक बाबी

🔸गल्या 30 वर्षांत सुमारे 178 दशलक्ष हेक्टर जंगले नष्ट झाली आहेत. शाश्वत व्यवस्थापनाच्या वाढीमुळे जंगले नष्ट होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. वर्ष 2015-2020 या कालावधीमध्ये जंगले नष्ट होण्याचे प्रमाण अंदाजे 10 दशलक्ष हेक्टर (mha) पर्यंत घसरले आहे, जे वर्ष 2010-2015 या कालावधीमध्ये 12 दशलक्ष हेक्टर एवढे होते.

🔸जगले नष्ट होण्याचे प्रमाण कालांतराने कमी झाल्याचे दिसून आले आहे. जंगले नष्ट होण्याचे प्रमाण वर्ष 1990 ते वर्ष 2000 या दशकात वार्षिक 7.8 दशलक्ष हेक्टर एवढे होते, तर हे प्रमाण वर्ष 2000 ते वर्ष 2010 या दशकात वार्षिक 5.2 दशलक्ष हेक्टर आणि वर्ष 2010 ते वर्ष 2020 या दशकात वार्षिक 4.7 दशलक्ष हेक्टर एवढे होते.

🔸जगातले एकूण वनक्षेत्र 4.06 अब्ज हेक्टर (bha) आहे, जे एकूण भूभागाच्या 31 टक्के आहे. हे क्षेत्र प्रति व्यक्ती 0.52 हेक्टर इतके आहे.

🔸जगातल्या वनक्षेत्राचे सर्वात मोठे प्रमाण उष्णकटिबंधीय (45 टक्के) आहे आणि त्यानंतर बोरियल, समशीतोष्ण आणि उपोष्णकटिबंधीय वनांचे प्रमाण आहे.

🔸जगातले 54 टक्क्यांपेक्षा जास्त वनक्षेत्र केवळ रशिया, ब्राझील, कॅनडा, अमेरिका आणि चीन या पाच देशांमध्ये आहे.

🔸खडानुसार आकडेवारीनुसार, वर्ष 2010 ते वर्ष 2020 या कालावधीत आफ्रिकेमध्ये सर्वाधिक जंगलतोड झाली, ज्याचा दर वार्षिक 3.9 दशलक्ष हेक्टर एवढा होता. त्याच्या पाठोपाठ दक्षिण अमेरिकेचा (2.6 दशलक्ष हेक्टर) क्रमांक लागतो. या काळातच आशिय, ओशनिया आणि युरोप यात सर्वाधिक वनक्षेत्र वाढले.

अम्फान चक्रीवादळ



◾️ पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील काही दिवसांमध्ये भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील राज्यांच्या किनारी भागाला अम्फान (Amphan) चक्रीवादळाचा फटका बसू शकतो असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

◾️दशातील आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या वादाळाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

◾️शनिवारी (१६ मे २०२०)
अंदमान-निकोबारसहीत लक्षद्वीपमध्ये चक्रवादळासहीत जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

◾️याचबरोबर ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील काही भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळण्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.

◾️बगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तयार झालेल्या अम्फान चक्रवादळाचा सर्वाधिक फटका पूर्वेकडी राज्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी दक्षिण, पश्चिम आणि उत्तरेकडील काही भागांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस येण्याची दाट शक्यता आहे.

◾️काही भागामध्ये धुळीची वादळेही उठतील असं अंदाज वर्तवण्यात येत आहे.

रेशन कार्डाच्या नियमामध्ये बदल


◾️कद्र सरकारनं रेशन कार्डसंबंधी एका नियमात बदल केला आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा कोट्यवधी लाभार्थ्यांना मिळण्याची शक्यता  आहे.

◾️रशन कार्डाला आधार क्रमांकाशी जोडण्याची अंतिम तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

◾️आता सप्टेंबरपर्यंत रेशन कार्डाला आधार क्रमांकाला जोण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. सोमवारी सरकारनं यासंदर्भातील निर्णय जाहीर केला.

◾️तसंच आधार क्रमांक जोडला नसेल तरी रेशन कार्डधारकाला धान्य मिळत राहणार असल्याचंही सरकारनं सांगितलं.

◾️रशन कार्डाला आधार क्रमांक न जोडल्यास रेशन कार्ड रद्द करण्यात येण्याच्या वृत्तावर स्पष्टीकरण देताना सरकारनं ही माहिती दिली.

◾️सरकारनं आता आधार क्रमांक रेशन कार्डाला जोडण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.

पेशी


__________________________________
            🔰 आदिकेंद्रकी पेशी 🔰
__________________________________
◾️ सपष्ट दिसणारे केंद्रक व पेशीअंगके नसतात त्यांना आदिकेंद्रकी पेशी असते म्हणतात

◾️ आदिकेंद्रकी पेशी आकाराने खूप लहान असतात

◾️या पेशीतील केंद्रकांच्या मध्ये आवरण नसते व  पेशींच्या मध्ये एकच गुणसूत्रांची जोडी असते

◾️यामध्ये तंतुकणिका नसतात परंतु परंतु रायबोझोम चे कण असतात

📌 उदाहरण जिवाणू ,सायानोबॅक्टरिया ,मायक्रोप्लाजमा
__________________________________
.             🔰दृश्यकेंद्रकी पेशी 🔰
__________________________________
◾️या पेशींच्या मध्ये स्पष्ट दिसणारे केंद्रक आणि पेशीअंगके असतात त्या पेशींना दृश्यकेंद्रकी पेशी असे म्हणतात

◾️दश्यकेंद्रकी पेशी आकाराने मोठे असतात यामध्ये स्पष्ट दिसणारे केंद्र व केंद्र की द्रव असते

◾️या पेशी मध्ये गुणसूत्रांच्या अनेक जोड्या असतात

◾️या पेशी अति विकसित असतात

📌उदाहरणत आमीबा , स्पायरोगायरा, वनस्पती , प्राणी
 
___________________________________

Current Affairs Online Test Series

चालू घडामोडी प्रश्नसंच



⚡️‘द डेथ ऑफ जीसस’ या शीर्षकाखालील पुस्तकाचे लेखक कोण आहे?
A)जे. एम. कोएट्जी
B)अझर नाफीसी
C)रानिया ममौन
D)मार्कस झुसाक
📌उत्तर:- जे. एम. कोएट्जी

⚡️कोणत्या राज्यात ‘प्रग्याम’ अॅप सादर केले गेले?
A)छत्तीसगड
B)मध्यप्रदेश
C)झारखंड
D)पश्चिम बंगाल
📌उत्तर:- झारखंड

⚡️कोणत्या दिवशी ‘राजस्थान राज्य दिन’ साजरा केला जातो?
A)29 मार्च
B)30 मार्च
C)31 मार्च
D)1 एप्रिल
📌उत्तर:-30 मार्च

⚡️कोणत्या संस्थेनी ‘सनराइज’ मोहीमेची घोषणा केली?
A)नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन
B)भारतीय अंतराळ संशोधन संस्था
C)ब्ल्यु ऑरिजिन
D)स्पेसएक्स
📌उत्तर:-नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन

⚡️कोणत्या मंत्रालयाने ‘स्ट्रेन्डेड इन इंडिया’ संकेतस्थळ कार्यरत केले?
A)परराष्ट्र मंत्रालय
B)पर्यटन मंत्रालय
C)नागरी उड्डयण मंत्रालय
D)गृह मंत्रालय
📌उत्तर:-पर्यटन मंत्रालय

⚡️कोणती आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था भारताच्या ‘NIIF फंड ऑफ फंड्स’ यामध्ये 100 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार आहे?
A)आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
B)जागतिक बँक
C)आशियाई विकास बँक
D)युरोपिय बँक
📌उत्तर:-आशियाई विकास बँक

⚡️कोणत्या संस्थेनी ‘कोरोनटाइन’ आणि ‘सेफ’ अ‍ॅप तयार केले?
A)भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास
B)भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली
C)भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई
D)भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर
📌उत्तर:-भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई

⚡️कोणत्या संस्थेनी ‘कामराजर पोर्ट लिमिटेड’ ही संस्था अधिग्रहित केली?
A)रिलायन्स पोर्ट्स
B)अदानी पोर्ट्स
C)मुंबई पोर्ट ट्रस्ट
D)चेन्नई पोर्ट ट्रस्ट
📌उत्तर:-चेन्नई पोर्ट ट्रस्ट

⚡️कोणत्या देशात ‘शुआखेवी जलविद्युत प्रकल्प’ आहे?
A)नॉर्वे
B)जॉर्जिया
C)इटली
D)फ्रान्स
📌उत्तर:-जॉर्जिया

⚡️कोणत्या बँकेनी ‘एन्कासू’ नावाने भारतातले पहिले प्रीपेड कार्ड सादर केले?
A)करुर वैश्य बँक
B)इंडसइंड बँक
C)ICICI बँक
D)HDFC बँक
📌उत्तर:-करुर वैश्य बँक


................ हा उत्तर अमेरिक आणि दक्षिण अमेरिक यांना जोडणारा महामार्ग आहे.

⚪️ टरान्स कॅनेडियन हायवे
⚫️ गरँड ट्रंक महामार्ग 
🔴 पन अमेरिकन महामार्ग  ✔️
🔵 सटुअर्ट महामार्ग


भारतात कोणत्या साली भोपाळ दुर्घटना झाली?

⚪️१९८०
⚫️१९१५
🔴१९४७
🔵१९८४✔️

रक्तागोठाण्यासाठी कोणत्या जीवनास्सात्वाचा उपयोग होतो?

⚪️ क✔️
⚫️ अ
🔴 ड
🔵 ब


तांबे व जस्त यांच्या मिश्रीणातून कोणता धातू तयार होतो?

⚪️ टिन
⚫️ पितळ✔️
🔴 शिसे
🔵 पारा
@mahavishwaofficial

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्माचा स्वीकार केव्हा केला?

⚪️ जलै १९५१
⚫️ म १९५३
🔴 म १९५५
🔵 ऑक्टोबर १९५६✔️

५०० मिली /१०० × ४ = किती टन ?

⚪️ ०.००२२
⚫️ ०.२२
🔴 २.२०
🔵 ०.०२२✔️

लॉर्ड कर्झनला औरंगजेबाची उपमा कुणी दिली?

⚪️ सरेंद्रनाथ बॅनर्जी
⚫️ दादाभाई नवरोजी
🔴 फिरोशहा मेहता
🔵 गोपाळ कृष्ण गोखले✔️


भारतीय राज्यघटनेच्या ................ कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेत आहे?

⚪️१९ ते २२✔️
⚫️३१ ते ३५
🔴२२ ते २४
🔵३१ ते ५१

कोणत्या घटना दुरुतीनुसार संविधानामध्ये मुलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला?

⚪️३२ साव्या
⚫️३९ साव्या
🔴४२ साव्या✔️
🔵४४ साव्या

स्वातंत्र्याच्या कोणत्या शहराची प्रथमच नियोजनबध्द रचना करण्यात आली?

⚪️चदीगड  ✔️
⚫️नवी दिल्ली
🔴नवी मुंबई
🔵अमृतस

'या' देशांनाही 15 ऑगस्टला मिळाले होते स्वातंत्र्य!



15 ऑगस्टच्या दिवशी केवळ भारतच नव्हे, तर हे इतर काही देशही स्वतंत्र झाले होते. आज अशाच देशांबद्दल माहिती पाहुयात...

● भारत (India) : ब्रिटीशांच्या राजवटीपासून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.

● बहरीन (Bahrain) : 15 ऑगस्ट 1971 ला बहरीन ब्रिटनपासून स्वतंत्र झाले होते.

● दक्षिण कोरिया (South Korea) : 15 ऑगस्ट 1945 ला यूएस आणि सोव्हिएत फोर्सेजने दक्षिण कोरियाची जपानपासून मुक्तता केली होती.

● उत्तर कोरिया (North Korea) : 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या तावडीतून उत्तर कोरिया मुक्त झाले होते.

● कांगो (Congo) : आफ्रिकेतील हा देश 15 ऑगस्ट 1960 ला फ्रान्सच्या राजवटीतून मुक्त झाला होता. नंतर रिपब्लिक ऑफ कांगो तयार झाला.

● लिकटेंस्टीन (Liechtenstein) : 15 ऑगस्ट 1866 ला हा देश जर्मनीपासून स्वतंत्र झाला आणि 1940 सालापासून तो 15 ऑगस्टला  आपला स्वतंत्रता दिवस म्हणून साजरा करतो.
संकलन ➖ राम कवले & तुषार शिरगीरे

मोहनचंद शर्मा, नरेश कुमार यांना सातव्यांदा शौर्य पदक





बाटला हाऊस चकमकीत २००८ मध्ये मारले गेलेले दिल्लीचे पोलीस निरीक्षक मोहन चंद शर्मा यांना सातव्यांदा मरणोत्तर शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे.

१९ सप्टेंबर २००८ रोजी बाटला हाऊस चकमक झाली होती त्यात गंभीर जखमी झाल्यानंतर शर्मा यांचा उपचारावेळी मृत्यू झाला होता.

 बाटला हाऊस येथे लपलेल्या पाच दहशतवाद्यांना पकडण्यासाठी ते पथकासह गेले होते. २००९ मध्ये त्यांना अशोकचक्र देऊन गौरवण्यात आले त्यानंतरही अनेकदा त्यांना राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात आले होते. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शौर्यपदके जाहीर करण्यात आली आहेत.

 केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सहायक कमांडंट नरेश कुमार यांनाही काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद विरोधी मोहिमेत सातव्यांदा शौर्य पदक मिळाले आहे. शौर्य पदकात जम्मू-काश्मीर पोलिसांना एकूण ८१ तर केंद्रीय राखीव पोलीस दलास ५५ पदके जाहीर झाली आहेत.

एकूण ९२६ पदके जाहीर करण्यात आली. त्यात शौर्य पदके, विशेष सेवा व इतर पदकांचा यात समावेश आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांना २३ शौर्य पदके मिळाली असून दिल्ली पोलिसांना १६, महाराष्ट्र १४, झारखंड १२ या प्रमाणे पदके मिळाली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सहायक कमाडंट कुमार हे काश्मीरमध्ये दहशतवाद विरोधी पथकात काम करीत होते. त्यांनाही गौरवण्यात आले आहे.

हैदराबादच्या राष्ट्रीय पोलीस अकादमीचे संचालक व आयपीएस अधिकारी अतुल कारवाल यांना दुसऱ्यांदा गौरवण्यात आले आहे. ५५ शौर्यपदकांपैकी ४१ जम्मू-काश्मीरला, १४ नक्षलविरोधी कारवायांसाठी छत्तीसगडला मिळाली आहेत. सीमा सुरक्षा दलाचे सहायक कमांडंट विनय प्रसाद यांना मरणोत्तर शौर्यपदक जाहीर झाले आहे.

हवाई दलातील विंग कमांडर विशाक नायर यांनाही शौर्यचक्र जाहीर करण्यात आले आहे. लष्करातील लेफ्ट. कर्नल कृष्णसिंह रावत, मे. अनिल अरस व हवालदार आलोककुमार दुबे यांनाही शौर्यचक्र जाहीर करण्यात आले आहे.

● महात्मा गांधी



- जन्म: 2 ऑक्टोबर 1869, मृत्यू: 30 जानेवारी 1948
- 1893 ते 1915 दक्षिण आफ्रिकेत (21 वर्षे)
- 1915 वयाच्या 45 व्या वर्षी भारतात परतले

● चंपारण्य सत्याग्रह (बिहार) 1917
- पहिला सविनय कायदेभंग
- स्थानिक नेता राजकुमार शुक्ल

● अहमदाबाद गिरणी कामगारांचा लढा (गुजरात) 1918
- पहिला भूक हरताळ
- कापड गिरणी मालकांविरोधात

● खेडा सत्याग्रह (गुजरात) 1918
- पहिले असहकार आंदोलन
- सरकारविरोधी

● असहकार चळवळ

- काँग्रेसचे कोलकत्ता अधिवेशन ( सप्टेंबर 1920) आराखडा मंजूर
- माहिती संकलन वैभव शिवडे यांने केले आहे.
- काँग्रेसचे नागपूर अधिवेशन (डिसेंबर 1920) काँग्रेसची मान्यता
- चौरीचौरा घटना (16 एप्रिल 1922) असहकार चळवळ स्थगित

● दांडी यात्रा

- मिठाचा कायदा मोडण्यासाठी
- 79 अनुयायांची पहिली तुकडी, 14 महाराष्ट्रायीन नेत्यांचा समावेश
- 12 मार्च ते 5 एप्रिल 1930 दांडीयात्रा, अंतर 240 मैल
- 6 एप्रिल 1930 मिठाचा कायदा मोडला

● वैयक्तिक सत्याग्रह
- 14 व 16 सप्टेंबर 1940 काँग्रेसच्या मुंबई बैठकीत घोषणा
- 13 ऑक्टोबर 1940 वर्धा येथे विनोबा भावे यांना पहिले वैयक्तिक सत्याग्रही
- पंडित नेहरू दुसरे वैयक्तिक सत्याग्रही

● चले जाव
- काँग्रेसचे मुंबई अधिवेशनात 8 ऑगस्ट 1942 रोजी ठराव मंजूर
- महत्त्वाच्या नेत्यांना अटक झाल्यामुळे भूमीगत स्वरूप प्राप्त


‘सार्थक’: भारतीय तटरक्षक दलाचे चौथे गस्ती जहाज



13 ऑगस्ट 2020 रोजी भारतीय तटरक्षक दलाच्या ‘सार्थक’ नामक गस्ती जहाजाचे जलावतरण करण्यात आले.

🔴जहाजाची वैशिष्ट्ये आणि इतर ठळक बाबी

🔸तटरक्षक दलासाठी बनविण्यात येणाऱ्या पाच गस्ती जहाजांच्या मालिकेतले हे चौथे गस्ती जहाज आहे.

🔸गोवा शिपयार्ड लिमिटेड या सार्वजनिक कंपनीने या जहाजाची रचना आणि बांधणी स्वदेशी तंत्रज्ञानाने केली आहे.

🔸जहाजात अत्याधुनिक अशी नौकानयन आणि संचार साधने, संवेदक आणि यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत.

🔸105 मीटर लांबी असलेल्या या जहाजाचे वजन 2350 टन असून जहाजाला 9100 किलोवॅटची दोन इंजिन आहेत, ज्या माध्यमातून 6000 नॉटीकल मैलांपर्यत 26 नॉटस गति प्राप्त केली जाऊ शकते.

🔸शोध आणि तपास कार्यासाठी ट्वीन-इंजिन हेलिकॉप्टर, चार हायस्पीड बोट आणि एक शिडाचे जहाज वाहून नेण्याची क्षमता या जहाजामध्ये आहे. समुद्रातल्या तेल गळतीमुळे होणाऱ्या प्रदुषणाला रोखण्यासाठी नियंत्रण प्रदुषण प्रतिसाद साधने वाहण्याची जहाजाची क्षमता आहे.

🔸भारतीय तटरक्षक दल वर्षभर कार्यरत राहणारे स्वदेशी तंत्रज्ञान सामील करुन घेण्यात आघाडीवर आहे. सार्थक जहाजात 70 टक्के स्वदेशी तंत्रज्ञान आहे, यामुळे जहाजबांधणी उद्योगाला चालना मिळाली असून ‘आत्मनिर्भर भारताच्या’ दिशेने मोठी झेप घेतली गेली आहे. हे जहाज विशेष आर्थिक क्षेत्राची गस्त, सागरी सुरक्षा आणि भारतीय तटरक्षक दलाच्या राष्ट्रहितासंबंधीच्या इतर कर्तव्यांची पूर्ती करणार.

भारतीय तटरक्षक दलाविषयी

🔸भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलानंतर तटरक्षक दल सर्वात छोटे सशस्त्र सैन्यदल आहे. दिनांक 18 ऑगस्ट 1978 रोजी भारतीय तटरक्षक दलाची स्थापना झाली.

🔸सागरी आर्थिक क्षेत्रांची सुरक्षा, किनारी सुरक्षा, समुद्री सुरक्षा, समुद्री पर्यावरण संरक्षण या भारतीय तटरक्षक दलाच्या जबाबदार्‍या आहेत. दलाकडून अवैध कारवाया, दहशतवाद, अवैध शस्त्रास्त्र व्यापार, अवैध मानवी व्यापार मासेमारी, तस्करी, अंमली पदार्थांचा व्यापार इत्यादी रोखण्यासाठी कार्यवाही केली जाते.

साहित्य अकादमी पुरस्कार 2019



- सात कवितासंग्रह, सहा कथासंग्रह, तीन निबंध, एक कथेतर गद्य आणि एक आत्मचरित्र अशा पाच साहित्य प्रकारांना 2019 चा साहित्य पुरस्कार देण्यात आला आहे.
- मराठी साहित्यासाठी आसाराम लोमटे, लक्ष्मण माने आणि वासुदेव सावंत हे तिघे परीक्षक होते.
- नेपाळी भाषेतील पुरस्कार जाहीर झालेला नाही.
- मराठीसह 23 भाषांतील साहित्य पुरस्कारांची अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवासराव यांनी घोषणा केली.
- एक लाख रुपये स्मृतीचिन्ह असे स्वरूप असलेल्या या पुरस्काराचे 25 फेब्रुवारी रोजी दिल्लीत वितरण होणार आहे.

काव्यसंग्रह
- फुकनचंद्र बसुमतारी (खाइ आथुमनिफ्राय-बोडो),
- नंदकिशोर आचार्य (छीलते हुए अपने को- हिंदी),
- कुमार मनीष अरविंद (जिनगीक ओरिआओन करैत- मैथिली),
- नीलबा खांडेकर (द वर्ड्स-कोंकणी),
- व्ही. मधुसुदनन नायर (अचन पिरन्ना वीदू- मल्याळम),
- अनुराधा पाटील (कदाचित अजूनही- मराठी),
- पेन्ना- मधुसुदन (प्रज्ञाचक्षुषम् -संस्कृत)

कादंबरी
- जयश्री महंत (चाणक्य- आसामी),
- बेरिल थंगा (ई अमादी अदुनगीगी ईठत-मणिपुरी),
- चो. धर्मन (सूल- तमिळ),
- बंदी नारायण स्वामी (सेप्ताभूमी- तेलुगु)

कथा
- अब्दुल अहद हाजिनी (अख याद अख कयामत- काश्मिरी),
- तरुण कांति मिश्र (भास्वती- ओडिया),
- किरपाल कजाक (अंतहिन-पंजाबी),
- रामस्वरूप किसान (बारीक बात- राजस्थानी),
- काली चरण हेम्ब्रम (सिसिरजली- संताली),
- ईश्वर मूरजाणी (जीजल- सिंधी)

निबंध
- चिन्मय गुहा (घुमेर दरजा थेले- बाड्ला),
- ओम शर्मा जद्रंयाडी (बंदरालता दर्पण- डोंगरी),
- रतिलाल बोरीसागर (मोजमा रें वुं रे!- गुजराती),

कथेतर गद्य
- शशी थरूर (अ‍ॅन एरा ऑफ डार्कनेस- इंग्रजी),
- शाफे किडवई (सवनेह ए सर सैयद- उर्दू- चरित्र),
- विजया (कुडी एसारू- कन्नड- आत्मचरित्र)


"सिंधू"च्या चर्चेवर भारत आणि पाकिस्तानची चकमक वाढली



🔷 Indus Water Treaty 🔷

🔶पतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांनी 19 सप्टेंबर 1960 रोजी सिंधू नदी पाणी वाटप करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

🔶जागतिक बँकेच्या मध्यस्थीने हा करार झाला होता.

🔶या संदर्भातील वाद तंटे सोडवण्यासाठी सिंधू आयोगाची स्थापना करण्यात आली.

🔶करारानुसार बियास , रावी आणि सतलज या तीन पूर्वेकडील नद्यांचे पाणी भारतात विनाअट वापर करू शकणार.

🔶पश्चिमेकडील नद्यांतून भारताला एकूण पाण्यापैकी 20 टक्के पाणी उपलब्ध आहे.

🔶सिंधू, चिनाब आणि झेलम या तीन पश्चिमेकडील नद्यांचे पाणी पाकिस्तान प्राधान्याने वापरू शकणार.

🔶भारत या पश्चिमेकडील नद्यांवर 3.6 दशलक्ष एकर फूट इतक्या पाणी साठवणीच्या सुविधा बांधू शकतो.

🔴 सिंधू नदी 🔴

🔷ही दक्षिण आशियामधील एक प्रमुख नदी आहे.

🔷तिबेट , भारत व पाकिस्तान मधून वाहणारी नदी.

🔷उगम - मानसरोवर , तिबेट.

🔷मख - अरबी समुद्र, कराची.

🔷उपनद्या - गिलगिट , काबुल , सतलज , बियास , चिनाब , झेलम , रावी.

भारतीयांकडून प्रभावी हायड्रोजन उत्क्रांतीसाठी कार्यक्षम व स्वस्त असे उत्प्रेरक विकसित



🔸बगळुरू येथील सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्सेस (CENS) या केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागांतर्गत असलेल्या स्वायत्त संस्थेच्या संशोधकांनी ‘पॅलाडिअम Pd(II)’ आयन-युक्त नव्या प्रकारचे कॉर्डिनेशन पॉलिमर (COP) संश्लेषित केला आहे, जो H-अ‍ॅडसॉरप्शन आणि बेनेझ टेट्रामाईन (BTA) यांच्या सक्रीय स्थळांचा स्रोत म्हणून कार्य करतो. दोन्ही मिळून द्वीमितीय (2D) Pd(BTA) पत्र्याच्या माध्यमातून H-बंध परस्परसंवाद निर्माण करतात. संशोधकांनी द्वीमितीय 2D Pd(BTA) पत्रा देखील तयार केला आहे.

🔸हायड्रोजन (H2) इव्होल्यूशन रिअॅक्शन (HER) यासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रो उत्प्रेरकाची कार्यक्षमता मुख्यत्वे त्याचा टिकाऊपणा, इलेक्ट्रोकेमिकल अभिक्रियेची क्षमता कमीतकमी करण्यावर आणि संश्लेषण (उत्पादन) याच्या किंमतीवर अवलंबून असते. उद्योगांमध्ये वापरण्यात येणारे प्लॅटीनम (Pt) / कार्बन (C) कार्यक्षम उत्प्रेरक आहेत, परंतु ते किंमतीत महाग आहेत आणि दीर्घकाळ वापरल्यास मेटल आयनवर काम करीत नाहीत. त्यातच पृथ्वीवर प्लॅटीनम धातूचे साठे अल्प आहेत.

या शोधाचे महत्व

🔸हवामानातले बदल यांच्या विरोधात असलेल्या लढ्यासाठी जीवाश्म इंधनांऐवजी पुढील पिढीचे कमी कार्बनयुक्त इंधन म्हणून हायड्रोजन ओळखले जाते. इंधन म्हणून हायड्रोजनच्या वापराचे भवितव्य हायड्रोजन तयार करण्यासाठी पाण्याचे इलेक्ट्रोकेमिकल विभाजन सुलभ करण्यासाठी लागणाऱ्या कार्यक्षम इलेक्ट्रोकॅटिलिस्टच्या रचनेमध्ये आहे.

🔸हायड्रोजन तयार करण्यासाठी पाण्याचे विभाजन करण्याचे कार्यक्षम साधन विकसित करणे हा या शोधामागचा हेतु आहे.

खदीराम बोस:-



स्मृतिदिन - 11 ऑगस्ट 1905

◾️भारतातील सर्वात तरूण वयाचा क्रांतीकारक

◾️(बंगाली ক্ষুদিরাম বসু (लेखी) क्षुदीराम बसु (उच्चारी - खुदीराम बोशू) : भारतातील सर्वात तरुण वयाचा क्रांतिकारक म्हणून ओळखला जाणारा हा वीर वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी शहीद झाला.

◾️ तयाचा जन्म बंगाल मधल्या मेदिनीपूर जिल्ह्यातल्या बहुवेनी या गावात दि. 3 डिसेंबर 1889 ला झाला.

◾️ खदीराम  व प्रफुल्ल चाकी यांनी किंग्ज फोर्ड ला मारण्याची जबाबदारी स्वीकारली

◾️30 एप्रिल 1905 या दिवशी खुदीरामचा सहकारी प्रफुल्ल चाकी याने किंग्ज फोर्ड याच्या गाडीवर एक बॉंब फेकला, परंतु तो चुकून दुसर्‍याच एका गाडीवर पडला. त्या गाडीतील दोन महिला ठार झाल्या, किंग्ज फोर्ड मात्र बचावला.

◾️घटनेच्या दुसर्‍या दिवशी खुदीराम पकडले गेले तर प्रफुल्लने अटकेपूर्वीच आत्महत्या केली.

◾️खदीराम यांच्यावर खटला भरण्यात आला

◾️11 ऑगस्ट 1908 या दिवशी फासावर जावे लागले.

🔺 सशस्त्र क्रांतीत बॉंबचा उपयोग करणारे खुदीराम बोस हे पहिले क्रांतिकारक ठरले.

🔴 1908 साली खुदीराम बोस ह्यांना फाशी दिल्यानंतर लोकमान्य टिळकांनी खालील 2 लेख लिहिले होते-

1. "हे उपाय टिकाऊ नाहीत"
2. "देशाचे दुर्दैव"

बौद्ध धर्म


• गौतम बुद्ध हे महावीरांच्या समकालीन होते.

• बुद्धांचा जन्मा कपीलवस्तुजवळ लुंबीनी या ठिकाणी
राजघराण्यात झाला.

• बुद्धांचे वडील शुद्दोधन तर आई महामाया होती. आई बुद्धांच्या जन्माच्या 7 व्या दिवशी वारली.

• बुद्धांचा सांभाळ गौतमी मावशीने केला. यावरून त्यांचे नाव गौतम

• ' यशोधरा' सोबत बुद्धांचा विवाह झाला आणि राहुल हा त्यांचा पुत्र होय.

• बुद्धांच्या घोड्याचे नाव ' कथक', तर सारथी ' छन्न '.

• गया, सारनाथ, लुंबिनी, कुशीनगर, श्रावस्थी, संकास्य, राजग्रह, वैशाली ही अष्टमहास्थाने बुद्धांशी संबंधित आहेत.

• मध्य जावा इन्डोनेशियामधील शैलेंद्र शासकांद्वारे निर्मित बोरोबुदुरचा बौद्ध स्तुप जगातील सर्वात मोठा स्तुप होय.

• बुद्धांनी त्यांचा पहिला उपदेश ' सारनाथ' या ठिकाणी दिला.

• वयाच्या ४७ व्या वर्षी ' कुशीनगर' या ठिकाणी बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले.

• बौद्ध धर्मात आत्म्याच्या परिकल्पनेसही तिलांजली देण्यात आली आहे.

• 12 व्या शतकापर्यंत बौद्धधर्म भारतामधून जवळपास समाप्त झाला.

• बुद्धांच्या मृत्यूनंतर बौद्ध धर्म अनेक पंथात विभागला पैकी हिनयान व महायान है प्रमुख आहेत.

• बौद्ध धर्माचे नवे रूप ' वज्रयान' नावाने ओळखले जाऊ लागले.

काकोरी कट (Kakori conspiracy)



◾️9 ऑगस्ट 1925

◾️लखनौ ते सहारनपूर दरम्यान काकोरी

◾️सहभाग:- चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, मन्मथनाथ गुप्ता, अशफाक उल्लाखान, राजेंद्रनाथ लाहिडी, रोशनलाल इत्यादी क्रांतिकारक अग्रणी होते. (एकून 10 जणांचा समावेश)

◾️बरिटिशांच्याविरुद्ध सशस्त्र लढा देण्याच्या हेतूने काकोरी (उत्तर प्रदेश) येथे घडवून आणलेला प्रसिद्ध क्रांतिकारी कट.

◾️सरकारी पोस्ट कार्यालयांमध्ये जमा झालेला पैसा रेल्वे मार्गाने जाणार असल्याची माहिती क्रांतिकारकांना मिळाली

◾️लखनौ ते सहारनपूर मार्गावर लखनौपासून आठ मैल अंतरावर असलेल्या काकोरी या गावाजवळ सशस्त्र क्रांतिकारकांनी रेल्वे थांबवून त्यातील खजिना लुटावा अशी योजना आखली.

◾️ 9 ऑगस्ट 1925 रोजी क्रांतिकारक सरकारी खजिना घेऊन जाणाऱ्या रेल्वेच्या डब्यात जाऊन बसले. रेल्वे आडवळणी अशा काकोरी स्थानकाजवळ येताच त्यांनी साखळी ओढून रेल्वे थांबविली

◾️रामप्रसाद बिस्मिल यांनी चैन खेचुन रेल्वे थांबवली

◾️कवळ दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही नियोजित लूट यशस्वी केली. या घटनेलाच ‘काकोरी कट’ असे म्हणतात.

◾️या कटात जवळपास 8000 रुपये लुटले

◾️काकोरी खटल्याचे कामकाज एप्रिल १९२७ पर्यंत चालले.

◾️यामधील रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्लाखान, रोशनलाल व राजेंद्रनाथ लाहिडी यांना फाशी दिली

◾️कारस्थानांमध्ये सहभागी असलेले चंद्रशेखर आझाद ब्रिटिशांना गुंगारा देऊन भूमिगत राहिले.

◾️सशस्त्र क्रांती करण्याच्या उद्देशाने चंद्रशेखर आझाद यांनी ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोशिएशनʼ या जुन्या संस्थेचे ‘हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोशिएशनʼ असे नामकरण करून क्रांतिकार्य चालू ठेवले.

प्रदीप कुमार जोशी यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती


शिक्षणतज्ज्ञ प्रदीपकुमार जोशी यांची शुक्रवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.
पदिप कु.जोशी सध्या आयोगात सदस्य आहेत.
 शुक्रवारी यूपीएससीचे अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे अरविंद सक्सेना यांच्यानंतर ते काम करतील.
» छत्तीसगड आणि मध्य प्रदेश लोकसेवा आयोगचे अध्यक्ष असलेले जोशी मे 2015 मध्ये यूपीएससीमध्ये सदस्य म्हणून रुजू झाले.
» यूपीएससीच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ 12 मे 2021 पर्यंत असेल.

भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) - श्री. गिरीशचंद्र मुर्मू
 » 8 ऑगस्ट 2020 गिरीशचंद्र मुर्मू यांनी भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक  म्ह्णून शपथ घेतली.
» राष्ट्रपतींसमोर त्यांनी पदाची शपथ घेतली.
» गिरीशचंद्र मुर्मू यांचा कार्यकाळ 20 नोव्हेंबर 2024 पर्यंत असेल.
» 14 वे

» २०२१ ची २०-२० विश्वचषक स्पर्धा भारतात होणार
» तर २०२२ ची ऑस्ट्रेलियामध्ये होईल(*२०२० ची स्पर्धा पुढे ढकलली आहे)
» २०२३ च्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचं यजमानपदही भारताकडे आहे

इलेक्ट्रिक वाहन धोरण-दिल्ली
» नोंदणी फी व रोड टॅक्स मधून सवलत
» २०२४ पर्यंत एकूणपैकी २५% वाहने इलेक्ट्रिकवरील वाहने असतील.

चंद्रगुप्त पहिला



- गुप्त साम्राज्याचा संस्थापक मानला जातो. महाराज श्रीगुप्त यांनी स्थापलेल्या गुप्त राज्याचे साम्राज्य करण्यात चंद्रगुप्त यांचे मोठे योगदान आहे. टेलीग्राम चॅनेल व्हीजेएस ईस्टडी.
- चंद्रगुप्त हा महाराज घटत्कोच यांचा पुत्र होता. श्रीगुप्त व घटत्कोच यांना महाराज किताब होता तर चंद्रगुप्त ने स्वता:ला महाराजाधिराज म्हणवले.
- चंद्रगुप्तने आपल्या कार्यकालात अनेक स्वता:च्या नावाने अनेक मोहरा काढल्या ज्या त्याच्या कार्यकालातील त्याचा प्रभाव दर्शावतात. चंद्रगुप्त पहिल्याचा कार्यकाल साधारणपणे इस ३२० ते ३३५ होता व हा काल भारतीय संस्कृतीचा सुवर्ण काळ मानला जातो  .
- चंद्रगुप्त ने अनेक जनपदांना आपल्या अधिपत्याखाली आणले. प्रयाग, साकेत मगध ही भारतातील महत्त्वाची राज्ये गुप्त साम्राज्याच्या अधिपत्याखाली आली .
- वैशालीच्या लिच्छवी राज्याशी वैवाहिक संबंध प्रस्थापित करणे ही चंद्रगुप्ताच्या जीवनातील मह्त्त्वाची घटना आहे. तत्कालीन राजकीय जीवनात वैशालीचे लिच्छवी घराणे अत्यंत सामर्थ्यसंपन्न समजले जाई.
- लिच्छवीची राजकन्या कुमारदेवीशी त्यांचा विवाह झाला  . या वैवाहिक संबंधामुळे चंद्रगुप्त यांचे महत्त्व वाढले. राजकीय सामर्थ्य व प्रतिष्ठेत वाढ झाली. चंद्रगुप्ताने लिच्छवीच्या मदतीने मगध प्रदेश जिंकून घेतला. नंतर प्रयाग,अयोध्या,बिहार हे प्रदेश त्याने जिंकले. त्याने स्वतःचा राज्यभिषेक करून घेतला. टेलीग्राम चॅनेल व्हीजेएस ईस्टडी.
- चंद्रगुप्त पहिला व कुमारदेवी यांची प्रतिमा असलेली नाणी तसेच दुसऱ्या बाजुवर सिंहावर बसलेली दुर्गा व त्या खाली 'लिच्छवी’ असे अंकित केले आहे. चंद्रगुप्त प्रथम व कुमारदेवीचा पुत्र म्हणजे समुद्रगुप्त होय.

UNICEF चा “जागतिक लोकसंख्या अहवाल”



- संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (UNICEF) यांचा “जागतिक लोकसंख्या अहवाल” प्रसिद्ध करण्यात आला आहे.

- अहवालात असे म्हटले आहे की 2027 सालापर्यंत जगातला सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून भारत चीनला मागे टाकणार.

- UNICEFने यावर ‘वर्ल्ड डेटा लॅब’ बरोबर काम केले. 1 जानेवारी 2020 रोजी जन्मलेल्या बाळांच्या संख्येचा अंदाज UNच्या ‘जागतिक लोकसंख्या अंदाज (2019)’ याच्या अद्ययावत पुनरावृत्तीवर आला आहे.

▪️इतर ठळक बाबी

- नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2020 रोजी अंदाजे 67,385 नवजात बाळ भारतात जन्मले जो की एक विक्रम झाला आहे.

- त्या दिवशी जगात जन्मलेल्या अंदाजे 392,078 बाळांपैकी 17% भारतात जन्माला आली. यांपैकी एक चतुर्थांश नवजात बाळ ही दक्षिण आशियामध्ये जन्माला आली आहेत.

- 1 जानेवारी 2020 या दिवशी चीनमध्ये 46 हजार 229 बाळांनी जन्म घेतला. तर नायजेरियात 26 हजार 039, पाकिस्तानात 13 हजार 020, इंडोनेशियात 13 हजार 020, अमेरिकेत 10 हजार 452 बाळांचा जन्म झाला.

- 2020 साली जगातल्या पहिल्या बाळाचा जन्म फिजी देशात झाला.

- 1 जानेवारी 2020 रोजी जागतिक लोकसंख्या अंदाजे 7,621,018,958 वर पोहचली. याचा अर्थ गेल्या वर्षीच्या काळापासून ही अंदाजे वाढ 77,684,873 ने झाली आहे. वाढीचा दर 1.03% असण्याचा अंदाज आहे.

- जानेवारी 2020 मध्ये जगभरात प्रत्येक सेकंदाला 4.3 जन्म आणि 1.9 मृत्यू अपेक्षित आहेत.

- आतापर्यंतच्या दशकात जागतिक लोकसंख्या 8.6 अब्जपर्यंत वेगाने वाढेल अशी संयुक्त राष्ट्रसंघाचा अंदाज आहे. अंदाज असा आहे की 2050 साली हा आकडा 9.8 अब्ज आणि 2100 साली 11.2 अब्जपर्यंत पोहोचेल.

- जवळजवळ निश्चित आहे की जागतिक लोकसंख्या काही वर्षातच 8 अब्जांवर जाणार, जी 1975 सालापासून दुप्पट असणार.

- गेल्या तीन दशकांत जगात नवजात बाळाच्या जगण्याच्या प्रमाणात उल्लेखनीय प्रगती झाली आहे आणि जगभरात वयाच्या पाच वर्षापूर्वी मृत्यूमुखी पडणार्‍यांची  संख्या निम्म्याहून कमी झाली आहे.

- बालमृत्यू ही भारतातली सार्वजनिक आरोग्यासाठीची एक मोठी चिंता आहे आणि जन्माच्या वेळी मृत्यूमुखी पडणार्‍या नवजात बाळांची संख्या जवळजवळ 0.76 दशलक्ष होती आणि सुमारे 3.5 दशलक्ष बाळ अकाली जन्मले.

गिफेन वस्तू (Giffen Goods)




🔰 हलक्या, निकृष्ट आणि कनिष्ठ दर्जाच्या वस्तू म्हणजे गिफेन वस्तू. गिफेन वस्तूंबाबतची संकल्पना ब्रिटिश संख्याशास्त्रज्ञ सर रॉबर्ट गिफेन यांनी प्रथम मांडली.

🔰 गिफेन वस्तू या संकल्पनेत एखाद्या वस्तूची किंमत घटल्यास उपभोक्ता त्या वस्तूच्या मागणीत वाढ करण्याऐवजी घट करतो; याउलट, त्या वस्तूची किंमत वाढल्यास मागणीत घट करण्याऐवजी वाढ करतो, यालाच गिफेनचा विरोधाभास असे म्हणतात.

🔰 उदा., केकच्या तुलनेत ब्रेड; गव्हाच्या तुलनेत ज्वारी व बाजरी; शुद्ध तुपाच्या तुलनेत वनस्पती तूप; नामांकित (Branded) कपड्यांच्या तुलनेत जाडेभरडे कपडे; नामांकित चप्पल, बूट यांच्या तुलनेत साध्या चप्पल, बूट; शुद्ध सोन्याच्या दागिन्यांच्या तुलनेत बेन्टेक्सचे दागिने इत्यादी. गिफेन वस्तू ही संकल्पना वस्तूच्या भौतिक गुणवत्तेपेक्षा उत्पन्नाशी निगडीत आहे.

🔰 उदा., बाजारात पाव स्वस्त झाल्यावर गरीब लोक त्याची मागणी वाढवण्याऐवजी कमी करून वाचणारा पैसा दुसऱ्या पर्यायी वस्तूंवर (उदा., केक इत्यादी) खर्च करतात.

🔰 गिफेन वस्तू या संकल्पनेमुळे मागणीच्या सिद्धांताची बाजू भक्कम झाल्याचे दिसते. निकृष्ट दर्जाच्या वस्तू किंवा गुणवत्ताधारक वस्तू या बाबी उपभोक्ताच्या उत्पन्नानुसार ठरतात. या वस्तूंच्या किमतींचे त्यांच्या मागणीवर धनात्मक व ऋणात्मक हे दोन्ही परिणाम दिसून येतात.

🔰 गिफेन वस्तूंचा उपभोक्ता वर्ग त्या त्या देशातील दारिद्र्य, गरिबी यांची वास्तव स्थिती दर्शवितो. शासनाला विकसननीती तसेच कल्याणकारी नीती बनविताना अथवा राबविताना या संकल्पनेचा मार्गदर्शक म्हणून उपयोग होतो.

🔰 गिफेन वस्तूंच्या बाबतीत उपभोक्त्याच्या उत्पन्नाचा उपभोगावरील परिणाम आकृतीच्या साह्याने स्पष्ट करता येतो. यासाठी उपभोक्त्याची उत्पन्नरेषा अथवा अंदाजपत्रकीय रेषा, समवृत्ती-वक्र आणि उपभोक्त्याचा उपभोग-वक्र या सैद्धांतिक साधनांचा उपयोग करता येतो.

मिझोरममध्ये जागतिक दर्जाच्या “तेंझाल गोल्फ रिसॉर्ट” प्रकल्पाचे उद्‌घाटन



🔸4 ऑगस्ट 2020 रोजी केंद्रीय संस्कृती व पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रल्हादसिंह पटेल यांच्या हस्ते मिझोरममधील “तेंझाल गोल्फ रिसॉर्ट” प्रकल्पाचे आभासी पद्धतीने उद्‌घाटन करण्यात आले. हा प्रकल्प भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या ‘स्वदेश दर्शन’ योजनेच्या अंतर्गत तयार केला जात आहे.

🔸सवदेश दर्शन-ईशान्य सर्कीट अंतर्गत, नवीन पर्यावरणपूरक पर्यटनाच्या एकात्मिक विकासासाठी स्वदेशी दर्शन-ईशान्य विभागातल्या मिझोरमच्या तेंझाल आणि साऊथ झोटेच्या सेर्शिप व रीक जिल्ह्यात 92.25 कोटी रुपये किमतीचा हा प्रकल्प मंजूर करण्यात आला. त्यापैकी 64.48 कोटी रुपये तेंझाल येथील गोल्फ कोर्ससह विविध घटकांसाठी मंजूर करण्यात आले आहेत.

प्रकल्पाचे वैशिष्ट्ये

🔸तझाल येथील गोल्फ कोर्सची रचना कॅनडामधील अव्वल क्रमांकाची गोल्फ कोर्स वास्तुविशारद कंपनी म्हणून ओळख असलेल्या ग्रॅहॅम कूक अँड असोसिएट्स यांनी केली आहे.

🔸एकूण क्षेत्रफळ 105 एकर असून 18 होल सह गोल्फचे मैदान 75 एकर क्षेत्रफळावर आहे.

🔸अमेरिकेतील रेन बर्ड यांची स्वयंचलित स्प्रिंकलर सिंचन प्रणाली आहे.

🔸आतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांसाठी याची रचना केली गेली आहे. तेथे जागतिक दर्जाचे सायबेरियन पाईन लाकूड वापरून 30 पर्यावरणपूरक बांबूच्या झोपड्या, उपहारगृह खुल्या हवेतले फूड कोर्ट, स्वागतकक्ष आणि प्रतीक्षागृह इत्यादी सुविधा आहेत.

पार्श्वभूमी

🔸बहुतेक देशांच्या तुलनेत भारतात हवामानविषयक परिस्थिती अधिक अनुकूल असल्याने भारतात गोल्फ पर्यटनाची प्रबल क्षमता आहे. देशातील नयनरम्य निसर्गस्थळे आणि एकमेवाद्वितीय अशी आतिथ्य सेवा देखील भारतातील गोल्फ पर्यटन क्षेत्रात पूरक ठरत आहे. आज भारतामध्ये एकूण 230 हून अधिक गोल्फ कोर्स आहेत. भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय देशातील गोल्फ पर्यटनाच्या विकासासाठी उत्प्रेरक आणि सक्रीय समर्थक म्हणून काम करण्याचे प्रयत्न करीत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक गोल्फ कोर्स भारतामध्ये आहेत आणि भारतात आयोजित केलेल्या गोल्फ स्पर्धाही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करतात. गोल्फ पर्यटनातील वाढती रुची ओळखून आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उत्पादन म्हणून गोल्फ पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन मंत्रालय एक व्यापक आणि समन्वित आराखडा तयार करीत आहे.

स्वदेश दर्शन योजनेविषयी

🔸भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने देशात पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘प्रसाद’ (Pilgrimage Rejuvenation and Spiritual Augmentation Drive -PRASAD) आणि ‘स्वदेश दर्शन योजना’ सन 2014-15 मध्ये सुरू केली. देशात विषय आधारित पर्यटन सर्किट (circuit) प्रकल्प विकसित करण्याच्या उद्देशाने ‘स्वदेश दर्शन’ योजना सुरू केली गेली आहे.

🔸या योजनेच्या अंतर्गत विकासासाठी आतापर्यंत 15 पर्यटन परिक्रमांची (circuit) ओळख पटविण्यात आलेली आहे. ते आहेत - बुद्धीष्ट सर्किट, ईशान्य सर्किट, तीर्थंकार सर्किट, सागरकिनारा सर्किट, हिमालय सर्किट, कृष्ण सर्किट, वाळवंट सर्किट, पर्यावरण सर्किट, वन्यजीवन सर्किट, आदिवासी सर्किट, ग्रामीण सर्किट, सूफी सर्किट, आध्यात्मिक सर्किट, रामायण सर्किट आणि वारसा सर्किट.

व्यवसायिक पातळीवर भूजलाचा वापर करण्याबाबत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या कठोर अटी



🔸राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (NGT) व्यवसायिक पातळीवर भूजलाचा वापर करण्याबाबत कठोर अटी निश्चित केल्या आहेत. त्याखालीलप्रमाणे आहेत,

🔸पर्यावरण-विषयक दुष्प्रभावाच्या मूल्यांकनाशिवाय व्यवसायिक संस्थांना भूजल वापरण्याची परवानगी नाही.

🔸परवानगी घेण्यात आलेल्या मर्यादेपर्यंतच पाण्याचा उपसा केला जावा आणि संपूर्ण क्रिया निरीक्षणाखाली असली पाहिजे.

🔸सबंधित प्राधिकरण 3 महिन्यांत सर्व अत्यधिक वापर, गंभीर आणि निम-गंभीर क्षेत्रांसाठी पाणी व्यवस्थापन योजना तयार करणार.

🔸परतिबंधित करणे आणि खटला भरणे अशाप्रकारच्या कारवाईची अंमलबजावणी करण्यात अयशस्वी ठरणाऱ्यावर कारवाई केली जावी.

ठळक बाबी

🔸NGTने भूजलाचा उपसा करण्यासाठी सर्वसामान्य परवानगी देण्यावर विशेषतः बंदी घातली आहे

🔸अधिकृत अंदाजानुसार, 89 टक्के भूजलाचा वापर शेतकर्‍यांकडून होत आहे आणि केवळ पाच टक्के उद्योगांकडून, तर उर्वरित घरगुती वापरासाठी आहे.

🔸भगर्भातल्या विहिरीपैकी 54 टक्क्यांची पातळी खाली गेली आहे आणि 2022 सालापर्यंत 21 शहरांमध्ये भूजल संपण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (NGT) विषयी

🔸राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (NGT) हे ‘NGT अधिनियम-2010’ अंतर्गत स्थापन करण्यात आले आहे. पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन या संबंधित कोणत्याही कायदेशीर अधिकाराच्या अंमलबजावणीसह इतर नैसर्गिक स्रोतांच्या संरक्षणाशी संबंधित प्रकरणांची प्रभावीपणे आणि वेगाने विल्हेवाट लावण्यासह पर्यावरणविषयक वाद हाताळण्यासाठी आवश्यक कौशल्य असलेले हे एक विशेष मंडळ आहे.

पद्म पुरस्कार 2019



- प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ११२ जणांना पद्म पुरस्कार जाहीर केले
- यामध्ये ४ पद्म विभूषण, १४ पद्म भूषण आणि ९४ पद्मश्री पुरस्कार सामील आहेत.
- यात २१ माहिला तर ११ हे अप्रवासी भारतीय, परदेशी नागरिक आहेत. ३ मान्यवरांना मरणोत्तर तर एका तृतीय पंथीय व्यक्तीस पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.
- या ११२ जणांच्या पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील ११ मान्यवरांचा समावेश करण्यात आला आहे .यात २ पद्म विभूषण,१ पद्म भूषण तर ८ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.

पद्मविभूषण (४)
- शिवशाहीर बलवंत मोरेश्वर पुरंदरे: कला:महाराष्ट्र
- तीजन बाई;लोकगायिका ; छत्तीसगड
- इस्माईल ओमर गुलेह, (परदेशी नागरिक):सार्वजनिक सेवा:डीजीबोटी
- अनिल कुमार नाईक: उद्योग : महाराष्ट्र

पद्मभूषण - (१४)
- डॉ. अशोक कुकडे :मेडीसीन,आरोग्यसेवा: महाराष्ट्र

पद्मश्री -(९४)
- मनोज वाजपेयी:-कला -चित्रपट:-महाराष्ट्र
- दिन्यार कॉन्ट्रैक्टर:-कला-रंगमंच :-महाराष्ट्र
- सुदाम काटे:-मेडीसीन :-महाराष्ट्र
- वामन केंद्रे :कला :-महाराष्ट्र
- रवींद्र कोल्हे/स्मिता कोल्हे:-आरोग्यसेवा: महाराष्ट्र
- शंकर महादेवन, कला-गायक :-महाराष्ट्र
- नगीनदास संगवी:-साहित्य ,शिक्षण:-महाराष्ट्र
- शब्बीर सय्यद :-समाजसेवा :-महाराष्ट्र

आंतराष्ट्रीय सौर युती (ISA) उपक्रमाचा विस्तार



🔸आतराष्ट्रीय सौर युती (ISA) याचा लाभ संपूर्ण जगाला मिळावा या उद्देशाने जगव्यापी विस्ताराच्या दृष्टीने ‘ISA कार्यचौकटी’मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे.

🔸दरुस्तीच्या प्रस्तावानुसार, उष्णप्रदेशापलीकडील देशांसह संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय गटाचे सर्व 192 सदस्य आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात.

आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA)

🔸परिस हवामान कराराच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकार आणि फ्रांस सरकार यांच्यावतीने सुरू करण्यात आलेला एक जागतिक उपक्रम आहे. भारतात गुडगावमधील राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थान (NISE, गवलपहारी) येथे ISA चे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे. ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-सरकारी संस्था आहे.

🔸पतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रांस राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलंड यांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी केली. आतापर्यंत 121 संभाव्य सदस्य देशांपैकी 81 देशांनी ISAच्या कार्यचौकटीच्या संदर्भात करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यापैकी 58 देशांनी त्यास मान्यता दिली आहे.

🔸या उपक्रमाच्या अंतर्गत भारत आणि स्वीडन या देशांनी आपल्या इतर भागीदारांसोबत उद्योग रुपांतरणाची नोंद ठेवण्यासाठी एका नवीन नेतृत्व गटाची स्थापना केली आहे. हा उपक्रम सरकारी आणि खासगी क्षेत्रासोबत एकत्रित काम करून कमी कार्बन उत्सर्जनाचे मार्ग शोधून काढण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहे.

जागतिक हिरोशिमा दिवस



💁‍♂ इतिहासातील काळा दिवस :

◾️6 ऑगस्ट 1945 हा मानवाच्या इतिहासातील अतिशय दुर्दैवी, काळा दिवस आहे.

◾️ मित्र राष्ट्रांनी जपानमधील एक संपन्न शहर हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब टाकून सार्‍या जगाला स्तब्ध केले.

◾️या बॉम्बचा प्रभाव एवढा जबरदस्त होता की, तीन लाख वस्तीचे हे शहर क्षणात नष्‍ट झाले. या दुर्दैवी घटनेला आज 75 वर्षे पूर्ण होत आहेत.
त्यानिमित्ताने या घटनेची ही आठवण..

💣 विध्‍वंसाची झलक दाखविणारा ‘लि‍टल बॉय’ :
जवळजवळ 4 हजार किलोग्रॅम वजनाच्या या बॉमची लांबी 3 मीटर आणि व्यास 71 सेंटीमीटर होता.

◾️ हिरोशिमावर टाकलेला बॉम्ब हा युरेनियम गन टाईप अ‍ॅटोमिक बॉम्ब होता.

◾️ तयाचा स्फोट हिरोशिमा शहराच्या 2000 फूट उंचावर झाला. त्यात शहराचा पाच चौ. मैल एवढा भाग नष्ट पावला.

👉 या दोन्ही शहरांत मरण पावलेल्या लोकांतील निम्मे लोक हे बॉम्ब टाकलेल्या दिवशीच मरण पावले.

◾️तयानंतरच्या महिन्यात अनेक जण भाजलेल्या जखमांमुळे, उत्सर्जित किरणाच्या आजारामुळे, अन्य जखमा, अपुरा आहार व आजार यामुळे मृत्यू पावले.

📍 जगात अणुवस्त्र चाचण्या सुरूच :

▪️ हिरोशिमा, नागासाकी शहरांवरील हल्ल्यानंतरही जगात 2 हजारांहून अधिक आण्विक शस्त्रांच्या चाचण्या झाल्या.
▪️ 1945 ते 1980 या काळात जगातील 500 हून अधिक ठिकाणी वातावरणातील आण्विक शस्त्रांच्या चाचण्या घेण्यात आल्या.
▪️ चाचणी घेणाऱ्या देशांमध्ये अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान व उत्तर कोरिया या देशांचा समावेश आहे.

👀 जगभरातील कोणत्या देशांकडे किती अण्वस्त्र :
1⃣ रशिया : 6800 अण्वस्त्र
2⃣ अमेरिका : 6600 अण्वस्त्र
3⃣ फरान्स : 300 अण्वस्त्र
4⃣ *चीन** : 270 अण्वस्त्र
5⃣ बरिटन : 215 अण्वस्त्र
6⃣ पाकिस्तान : 130-140 अण्वस्त्र
7⃣ भारत : 120-130 अण्वस्त्र
8⃣ इस्रायल : 80 अण्वस्त्र
9⃣ उत्तर कोरिया : 10-20 अण्वस्त्र

संरक्षण मंत्रालयाचे ‘संरक्षण सामग्री उत्पादन व निर्यात विस्तार धोरण 2020’



"आत्मनिर्भर भारत मोहीम" याच्या अंतर्गत देशाला संरक्षण सामग्री उत्पादन क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याला चालना देण्यासाठी विविध घोषणा करण्यात आल्या.

देशाला संरक्षण तसेच अंतराळ विज्ञान क्षेत्रात जगात अव्वल देशांच्या यादीत भारताचे नाव समाविषतः करण्याच्या उद्देशाने, संरक्षण मंत्रालयाने ‘संरक्षण सामग्री व निर्यात विस्तार धोरण 2020’ याची रचना केली आहे.

हे संरक्षण मंत्रालयाचे महत्त्वाचे मार्गदर्शक दस्तऐवज असून त्यायोगे संरक्षण सामुग्री क्षेत्रात स्वयंपूर्ण होणे आणि निर्यात वाढवणे ही उद्दिष्टे साकार करण्याचे उद्दिष्ट आहे.

📚 धोरणाची उद्दिष्टे...

2025 सालापर्यंत एकूण 1 लक्ष 75 हजार कोटी रुपयांची उलाढाल करण्याचे उद्दिष्ट गाठणे, ज्यात उड्डयन तसेच संरक्षण सामग्री व सेवा क्षेत्राचा वाटा 35,000 कोटी रुपयांचा असणार.

सशस्त्र दलांना उत्तम दर्जाची उत्पादने पुरविण्यासाठी, उड्डयन, नौदलासाठी जहाज बांधणी तसेच संरक्षण क्षेत्रात गतिमानता, मजबूतीकरण व स्पर्धात्मकता आणण्यासाठी संरक्षण उद्योग विकसित करणे.

आयात केलेल्या परदेशी मालावर विसंबून न रहाता स्वदेशी संरचना आणि उत्पादने विकसित करीत मेक इन इंडिया मोहिमेचा पुरस्कार करणे.

संरक्षण सामुग्री निर्यात करून जगाच्या संरक्षण मूल्य साखळीचा हिस्सा बनणे.
संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी वातावरण तयार करून नवनिर्मितीला पुरस्कृत करणे, भारतीय बौद्धिक संपदेची मालकी तयार करणे तसेच मजबूत आणि स्वयंपूर्ण संरक्षण उद्योगाला चालना देणे.विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलेल्या बाबी

खरेदीतली सुधारणास्वदेशीकरण आणि एमएसएमई वा स्टार्टअप उद्योगांना आधार देणेसंसाधनांचे योग्य वाटपगुंतवणूक, थेट परकीय गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभीकरण यांना प्रोत्साहननवनिर्मिती, संशोधन आणि विकाससंरक्षण क्षेत्रातले सार्वजनिक उपक्रम (DPSUs) आणि आयुध उत्पादन मंडळ  (OFB)गुणवत्ता हमी आणि चाचणीकरीता पायाभूत सुविधानिर्यातीला प्रोत्साहन.

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाचे कायद्यात रंपांतर



- नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता याचं कायद्यात रूपांतर झालं आहे.
- 12 डिसेंबर 2019 रोजी राष्ट्रपतींनी या विधेयकावर स्वाक्षरी केली.
- लोकसभेनंतर राज्यसभेतही या विधेकाला मंजुरी देण्यात आली आहे.
- राज्यसभेत विधेयकाच्या बाजूनं 125 तर, विरोधात 105 मतं पडली.
- धार्मिक छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक 2019 मध्ये करण्यात आली आहे.

Que: या दुरूस्तीचा फायदा कोणाला होणार नाही ?
- श्रीलंकेतील तामिळ, म्यानमारमधील मुस्लीम तसेच, पाकिस्तानातील मुस्लिमांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या विधेयकाचा लाभ मिळणार नाही.

Que: देशातील कोणत्या भागाला हे लागू नाही ?
- ही दुरुस्ती घटनेच्या सहाव्या अनुसूचित समाविष्ट केलेल्या आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांतील आदिवासी भागांना, तसेच बंगाल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन, 1873 मध्ये अधिसूचित केलेल्या भागांना लागू असणार नाही.

Que: कोणत्या अटींमध्ये बदल करण्यात आले आहेत ?
- सध्या कोणत्याही परदेशी व्यक्तीला भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी भारतामध्ये कमीत कमी 11 वर्ष राहणं आवश्यक आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामध्ये ही अट शिथिल करून ती 5 वर्ष करण्यात आली आहे. यासाठी भारतीय नागरिकत्व कायदा, 1955 मध्ये काही बदल करण्यात आलेत. ज्यामुळे भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करणाऱ्यांना कायदेशीररीत्या सोयीचं पडेल.

रॅमन मॅगसेसे पुरस्कार



- फिलीपाईन्सचे तिसरे राष्ट्रपती रॅमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ 1957 पासून हा पुरस्कार दिला जातो.
- हा पुरस्कार आशिया खंडाचा नोबेल म्हणून ओळखला जातो.
- या पुरस्काराची सुरूवात न्यूयॉर्कमधील राॅफेलर भावंडांनी केली आहे.
- 2009 पासून पुरस्कार सहा प्रकारात सरकारी सेवा, समाजकार्य, साहित्य, पत्रकारिता, शांतता, अंतरराष्ट्रीय संबंध इ. क्षेत्रात कार्य करणारे व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.

● भारतीय पुरस्कारार्थी

- विनोबा भावे (नेतृत्व 1958): पहिले भारतीय
- चिंतामण देशमुख (शासकीय सेवा 1959)
- अमिताभ चौधरी (पत्रकारिता 1961): पहिले पत्रकार
- मदर तेरेसा (शांतता 1962): पहिली भारतीय महिला
- अंशू गुप्ता & संजीव चतुर्वेदी (स्थलांतरितांचे नेतृत्व 2015)
- बेझवाडा विल्सन (मानवी हक्क 2016)
- टी. एम. कृष्णा (कर्नाटक संगीत 2016)
- भरत वटवाणी ( प्रतिष्ठेसह आरोग्य स्वच्छता काम 2018)
- सोनम वांगचुक (समुदाय विकासासाठी शिक्षण 2018)
- रविश कुमार (पत्रकारिता 2019): दुसरे पत्रकार, पुरस्कार प्राप्त सहावे पत्रकार

● 2019 चे पुरस्कारार्थी

- रवीश कुमार (भारतीय पत्रकार)
- को स्वे विन (म्यानमारचे पत्रकार)
- अंगखाना नीलापजीत (थायलंडच्या मानवी हक्क कार्यकर्त्या)
- रेमुंडो पुजांतो कैयाब (फिलीपीन्सचे संगीतकार)
- किम जाॅग की (द. कोरियाचे सामाजिक कार्यकर्ते)


66 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2019




- राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात 
- हस्ते उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

- सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा: अंधाधून
- सर्वोत्कृष्ट पॉप्युलर सिनेमा: बधाई हो
- सामाजिक मुद्यावर भाष्य करणारा सर्वोत्कृष्ट सिनेमा- पॅडमॅन
- सर्वोत्कृष्ट अभिनेता: आयुषमान खुराना (अंधाधून) आणि विक्की कौशल (उरी)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- कीर्ति सुरेश (महानती, तेलुगू)
- सर्वोत्कृष्ट टेलीग्राम चॅनल एमपीएससी हब
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : शिवानंद किरकिरे (चुंबक)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : सुरेखा सीकरी (बधाई हो)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - आदित्य धर (उरी: द सर्जिकल स्ट्राइक)
- सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक - सुधाकर रेड्डी यकंती (नाळ)
- सर्वोत्कृष्ट बालकलाकार - श्रीनिवास पोकळे (नाळ)
- सर्वोत्कृष्ट गायक - अरिजीत सिंह (पद्मावत)
- सर्वोत्कृष्ट गायिका- बिंदू मालिनी
- सर्वोत्कृष्ट गीत : बिंते दिल (पद्मावत)
- सर्वोत्कृष्ट टेलीग्राम चॅनल एमपीएससी हब
- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - संजय लीला भंसाली (पद्मावत)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - शाश्वत सचदेवा (उरी)
- सर्वोत्कृष्ट साउण्ड डिझाइन: बिश्वदीप दीपक (उरी)
- बेस्ट फिल्म क्रिटिक: ब्ले जानी आणि अनंत विजय
- बेस्ट लिरिक्स- नितिचारमी (कन्नड फिल्म)
- मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट: उत्तराखंड
- बेस्ट स्पेशल इफेक्ट्स: 'KGF' आणि 'Awe'
- सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक : क्रूति महेश मिद्या (पद्मावत (घूमर गाणं))
- सर्वोत्कृष्ट संवाद - तारीख (बंगाली)

नॉन फिक्शन फिल्म

- स्पेशल मेन्शन अवॉर्ड- महान हुतात्मा- सागर पुराणिक
- ग्लो वॉर्म इन ए जंगल- रमण दुंपाल
- लड्डू- समीर साधवानी आणि किशोर साधवानी
- बेस्ट नरेशन - मधुबनी- द स्टेशन ऑफ कलर
- आवाज- दीपक अग्निहोत्री, उर्विजा उपाध्याय
- बेस्ट टेलीग्राम चॅनल एमपीएससी हब
- बेस्ट म्यूजिक फिल्म- ज्योति- डायरेक्टर केदार दिवेकर
- बेस्ट ऑडियोग्राफी चिल्ड्रन ऑफ द सॉइल- बिश्वदीप चटर्जी
- बेस्ट लोकेशन साउंड- द सिक्रेट लाइफ ऑफ फ्रॉग्स- अजय बेदी
- बेस्ट सिनमॅटॉग्राफी- द सिक्रेट लाइफ ऑफ फ्रॉग्स - अजय बेदी आणि विजय बेदी
- बेस्ट बीट डायरेक्शन- आई शपथ- गौतम वजे
- बेस्ट फिल्म ऑन फॅमिली व्हॅल्यू- चलो जीते हैं- मंगेश हडावले
- बेस्ट टेलीग्राम चॅनल एमपीएससी हब
- बेस्ट शॉट फिक्शन फिल्म- कासव- आदित्य सुभाष जंभाळे
- सोशल जस्टिस फिल्म- व्हाय मी- हरीश शाह
- सोशल जस्टिस फिल्म- एकांत- नीरज सिंह
- बेस्ट इन्वेस्टिगेटिव फिल्म- अमोली- जॅसमिन कौर आणि अविनाश रॉय
- बेस्ट स्पोर्ट्स फिल्म- स्विमिंग थ्रू द डार्कनेस- सुप्रियो सेन
- बेस्ट एज्युकेशनल फिल्म- सरला विरला- एरेगोडा
- बेस्ट फिल्म ऑन सोशल इशू- ताला ते कूंजी- शिल्पी गुलाटी
- बेस्ट एनवायरमेन्टल फिल्म- द वर्ल्ड्स मोस्ट फेमस टायगर- सुबिया नालामुथु
- बेस्ट प्रमोशनल फिल्म- रीडिस्कवरिंग जाजम- अविशान मौर्य आणि क्रिती गुप्ता
- बेस्ट आर्ट्स अँड कल्चरल फिल्म- बुनकर: द लास्ट ऑफ द वाराणसी वीवर्स- सत्यप्रकाश उपाध्याय
- बेस्ट डेब्यू नॉन-फीचर फिल्म ऑफ ए डायरेक्टर- फलूदा- साग्निक चटर्जी
- बेस्ट नॉन-फीचर फिल्म (शेयर्ड)- सन राइज - विभा बख्शी
- फिचर फिल्म इन मराठी - भोंगा
- नाॅन फिचर फिल्म दिग्दर्शन - गौतम वझे (आईशप्पथ)
- बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर - स्वानंद किरकिरे (चुंबक)


जागतिक अन्न पुरस्कार 2020



- भारतीय-अमेरिकन मृदा शास्त्रज्ञ डॉ. रतन लाल यांना ११ जून रोजी जागतिक अन्न पुरस्कार २०२० जाहीर झाला आहे. माहिती वैभव शिवडे
- डॉ. रतन लाल यांना हा पुरस्कार नैसर्गिक संसाधनांचे रक्षण आणि हवामानातील बदल कमी करणाऱ्या खाद्यपदार्थाच्या उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात आला आहे.
- हा पुरस्कार विजेते ते आठवे भारतीय ठरले आहेत.
- भारतीय भात आणि पिकांचे अवशेष जाळण्याच्या प्रक्रिया तातडीने थांबवण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. माहिती वैभव शिवडे
- त्यांनी मृदा संवर्धनासाठी राबवलेल्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा फायदा ५०० दशलक्ष पेक्षा अधिक अल्पभूधारक शेतकऱ्यांना झाला आहे.

● डॉ.रतन लाल

- जन्म : ५ सप्टेंबर १९४४) (कर्याल, पश्चिम पंजाब-सध्या पाकिस्तान)
- शिक्षण : Bsc Agr (१९६३ पंजाब कृषी विद्यापीठ), Msc (Soils) (१९६५-भारतीय कृषी संशोधन संस्था), PhD (Soils) (१९६८- ओहिओ स्टेट युनिव्हर्सिटी)
- ते सध्या ओहियो राज्य विद्यापीठातील अन्न, कृषी आणि पर्यावरण शास्त्र महाविद्यालयामध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.
- ओहियो विद्यापीठातील 'कार्बन मॅनेजमेंट अँड सिक्वेस्ट्रेशन सेंटर'चे संस्थापक तसेच संचालक आहेत. माहिती वैभव शिवडे.
- त्यांनी नायजेरियातील आंतरराष्ट्रीय उष्णकटिबंधीय संस्था येथे संशोधन सुरू केले.
- २००७ मध्ये IPCC ला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला त्यावेळी रतन लाल IPCC चा भाग होते

● पुरस्काराबद्दल

- सुरुवात: १९८७
- पुरस्कार देणारी संस्था : वर्ल्ड फूड प्राईझ फाऊन्डेशन, आयोवा
- स्वरूप-२.५ लाख अमेरिकन डॉलर
- कृषी क्षेत्रातील नोबेल म्हणून ओळखला जातो.

● मागील वर्षीचे विजेते

- २०१९ सायमन ग्रूट (नेदरलँड)
- नोबेल पुरस्कार विजेते नॉर्मन बोरलॉग (हरित क्रांतीचे जनक) यांनी या पुरस्काराची निर्मिती केली.
- पहिले विजेते : एम.एस.स्वामिनाथन (१९८७)

● पुरस्कार मिळवणारे भारतीय

- एम. एस. स्वामिनाथन (१९८७)
- वर्गीज कुरियन (१९८९)
- गुरुदेव खुश (१९९६)
- बी. आर. बारवाले (१९९८)
- सुरिंदर के. वासल (२०००)
- मोडदुगु विजय गुप्ता (२००५)
- संजय राजाराम (२०१४)
- रतनलाल (२०२०)

मंगलप्रभात लोढा: देशातील सर्वात श्रीमंत बांधकाम व्यावसायिक



- भाजपाचे आमदार, मुंबई भाजपाचे अध्यक्ष  आणि बांधकाम व्यावसायिक मंगलप्रभात लोढा हे देशातील सर्वात श्रीमंत बांधकाम व्यावसायिक ठरले आहेत.
- लोढा यांच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न ३१ हजार ९३० कोटी रूपये इतके झाले आहे.
- हुरुन रिपोर्ट आणि ग्रोही इंडियाने सोमवारी ‘ग्रोही हुरुन इंडिया रीयल एस्टेट रिच लिस्ट २०१९" जारी केली. या यादीमध्ये लोढा यांना पहिलं स्थान देण्यात आलं आहे. गेल्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये लोढा यांनाच पहिलं स्थान देण्यात आलं होतं.
- लोढा यांच्यानंतर डिएलएफचे उपाध्यक्ष राजीव सिंग यांना दुसरं स्थान देण्यात आलं आहे. २५ हजार ८० कोटी रूपयांच्या वार्षिक उत्पन्नासहित ते दुसऱ्या स्थानावर आहेत. गेल्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या यादीत त्यांना तिसरं स्थान देण्यात आलं होतं.
- एम्बेसी समुहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र विरवानी यांना या यादीत तिसरं स्थान देण्यात आलं आहे. त्यांच्याकडे २४ हजार ७५० कोटी रूपयांच्या एकूण उत्पन्न आहे.
- निरंजन हिरानंदानी यांना १७ हजार ३० कोटी रूपयांच्या एकूण उत्पन्नासह चौथं, चंदू रहेजा यांना १५ हजार ४८० कोटी रूपयांच्या एकूण उत्पन्नासह पाचवं आणि विकास ओबेरॉय यांना १३ हजार ९१० कोटी रूपयांच्या एकूण उत्पन्नासह सहावं स्थान देण्यात आलं आहे.
- बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या देशातील १०० मोठ्या व्यावसायिकांचं एकूण उत्पन्न २ लाख ७७ हजार कोटी रूपये इतकं आहे. या वर्षी बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या ६ कंपन्यांनी २ हजार कोटी रूपयांची तर अन्य २० कंपन्यांची १ हजार कोटी रूपयांची विक्री केली.
- लोढा कुटुंबीयांचे ३१ मार्चपर्यंत एकूण ४० प्रकल्प सुरू होते. गेल्या वर्षभरात लोढा कुटुंबीयांच्या एकूण उत्पन्नात १८ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर राजीव सिंग याच्या एकूण उत्पन्नात गेल्या वर्षभरात तब्बल ४२ टक्क्यांची वाढ झाली आहे.

भारतरत्न पुरस्कार



1954✍️ सी राज गोपालाचारी
                   सर्वपल्ली राधाकृष्णन
                   चंद्रशेखर वेंकटरमन

1955✍️ भगबान दास
                   M विस्वसरैया
                   जवाहर लाल नेहरू

1957✍️ गोविन्द बल्लभ पंत

1958✍️ धोन्दो केसब कर्वे

1961✍️विपिन चंद्र रॉय
                   पुरुषोत्तम दास टंडन

1962✍️डॉक्टर राजेंद्र प्रसाद
   
1963✍️ जाकिर हुसैन
                   पाण्डुरंग काने

1966✍️ लाल बहादुर शास्त्री
                 
1971✍️इदिरा गांधी

1975✍️ वी वी गिरी

1976✍️ क कामराज

1980✍️ मदर टेरेसा

1983✍️ विनोबा भावे

1987✍️खान अब्दुल गफ्फार खा

1988✍️रामचंद्रन

1990✍️ नल्सन मंडेला
                   डॉ भीमराव अंबेडकर

1991✍️ बल्लभ भाई पटेल
                   मोरार जी देसाई
                   राजीव गांधी

1992✍️ सत्यजीत रे
                   अबुल कलाम आजाद
                   जहाँगीर रतन टाटा

1997✍️अरुणा आसफ अली
                    गुलजारी लाल नंदा
                    Apj अब्दुल कलाम

1998✍️ MS सुबुलक्ष्मी
                   C सुब्रमण्यम

1999✍️ जय प्रकाश नारायण
                   अमर्त्य सेन
                   रवि शंकर
                   गोपीनाथ वोरदोलई

2001✍️ विस्मिल्ला खान
                    लता मंगेशकर

2008✍️भीमशेन जोशी

2014✍️ CNR राव
                   सचिन तेंदुलकर

2015✍️ मदन मोहन मालवीय
                   अटल बिहारी वाजपेयी

2019 ✍️भपेन हजारिका
                    प्रणव मुखर्जी
                    नानाजी देशमुख

आत्तापर्यंतचे वित्त

🟢 

🟥 पहिला     ➖ 1951  ➖ क. सी. नियोगी
🟧 दसरा       ➖ 1956 ➖ क. संथानम
🟨 तिसरा      ➖1960 ➖ ए. के. चंदा


🟩 चौथा        ➖1964 ➖ पी.व्ही.राजमन्नावर
🟦 पाचवा      ➖1968 ➖ महावीर त्यागी
🟪 सहावा      ➖1972  ➖ क. ब्रह्मानंद रेड्डी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

⬛️ सातवा      ➖ 1977 ➖ J. M. शेलार
⬜️ आठवा     ➖ 1983 ➖ यशवंतराव चव्हाण
🟫 नववा       ➖ 1987 ➖ एन पी के साळवे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🟥 दहावा      ➖ 1992 ➖ क सी पंत
🟧 अकरावा  ➖ 1958 ➖ ए. एम. खुश्रो
🟨 बारावा     ➖ 2002 ➖ C. रंगराजन

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🟩 तरावा       ➖2007 ➖ विजय केळकर
🟦 चौदावा     ➖2013 ➖ वाय व्ही. रेड्डी
🟥 पधरावा    ➖ 2017 ➖ एन. कसे सिंग

महाराष्ट्रातील नद्यांचा संगम व तेथील महत्त्वाची स्थळे



🔸परवरा नदी व मुला नदी  -  नेवासे, 
     अहमदनगर

🔸मळा व मुठा नदी - पुणे

🔸गोदावरी व प्राणहिता  -  सिंगेचा,
     गडचिरोली

🔸तापी व पूर्णानदी - श्रीक्षेत्र चांगदेव
     तिर्थक्षेत्र, जळगाव

🔸कष्णा व वेष्णानदी -  माहुली,
     सातारा

🔸तापी व पांजरानदी - मूडवद, धुळे

🔸कष्णा व पंचगंगा - नरसोबाची वाडी,
     सांगली

🔸कष्णा व कोयना -  कराड, सातारा

🔸गोदावरी व प्रवरा  - टोके,
    अहमदनगर

🔸कष्णा व येरळ -  ब्रम्हनाळ, सांगली.



राज्यातील शाळा ‘गुगल क्लासरुम’ वर भरणार; महाराष्ट्र देशातील पहिलंच राज्य





📚 सध्या शाळा बंद असतानाही विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे म्हणून राज्यातील शाळा ‘गुगल क्लासरूम’च्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी शासनाने गुगलबरोबर करार केला आहे.

👨🏻‍💻 *गूगल क्लासरूमने काय होणार?*

▪️या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोठेही, कधीही शिकता येऊ शकेल.
▪️ विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याबरोबरच शिक्षक या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सराव घेऊ शकतील.
▪️ विद्यार्थ्यांना प्रकल्प देऊन त्यांचे मूल्यमापनही करू शकतील.
▪️ आतापर्यंत सुमारे दीड लाख शिक्षकांनी या माध्यमाचा वापर करण्यासाठी नोंदणी केली आहे.
▪️ गरामीण भागातील विद्यार्थ्यांनाही यामुळे दर्जेदार शिक्षणाची संधी मिळेल.
▪️ कोरोना संकटात शिक्षणासाठी डिजिटल क्रांतीचा योग्य वापर करून संधीत रूपांतर  झाले आहे.

🗣️ "सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी आणि शिक्षणातील दरी कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन महाराष्ट्राला शिक्षणातील सर्वात प्रगतीशील राज्य बनविण्याचे आमचे लक्ष्य आहे",असे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितले.

👥 या प्रकल्पाचे गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, गुगलचे भारतातील विक्री प्रमुख संजय गुप्ता यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.

चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे




Q1) कोणत्या व्यक्तीला 2020 या वर्षासाठी ‘ग्रामोदय बंधु मित्र’ पुरस्कार देण्यात आला?
उत्तर :-  सुधा मूर्ती

Q2) कोणत्या व्यक्तीची मॉरिटानिया देशाच्या पंतप्रधान पदावर निवड झाली?
उत्तर :- मोहम्मद औल्द बिलाल

Q3) कोणत्या अरब देशाने इस्रायलसोबत केलेल्या अब्राहम कराराला सहमती दिली?
उत्तर :- संयुक्त अरब अमिराती

Q4) कोणत्या देशाने “अ‍ॅरो-2” नामक लक्ष्यभेदी आंतररोधी क्षेपणास्त्राची चाचणी घेतली?
उत्तर :-  इस्त्रायल

Q5) कोणती व्यक्ती ‘अवर ओन्ली होम: ए क्लायमेट अपील टू द वर्ल्ड’ या शीर्षकाच्या पुस्तकाचे लेखक आहे?
उत्तर :- दलाई लामा

Q6) कोणत्या व्यक्तीची कोविड-19 लसीविषयीच्या प्रशासनासंबंधी नेमण्यात आलेल्या राष्ट्रीय तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर :- डॉ. व्ही. के. पॉल

Q7) कोणत्या राज्याच्या राजकीय गटांकडून संपूर्ण राज्य संविधानाच्या सहावी अनुसूची किंवा 371 या कलमाखाली आणले जावे अशी मागणी होत आहे?
उत्तर :-अरुणाचल प्रदेश

Q8) कोणत्या संस्थेनी स्वदेशी “AUM (एयर यूनिक-मॉनिटरिंग) फोटॉनिक यंत्रणा” तयार केली?
उत्तर :-  वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन केंद्र

Q9) कोणत्या संस्थेनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित असलेला "पारदर्शक करपद्धती - प्रामाणिकाचा सन्मान" यासाठीचा एक डिजिटल मंच तयार केला?
उत्तर :- केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळ

Q10) कोणत्या देशाने अमेरिकेसोबत F-16 विमानांच्या खरेदी करारावर स्वाक्षरी केली?
उत्तर :- तैवान



१९९१ च्या नरसिंहम समितीच्या शिफारशी



आर्थिक व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी एम. नरसिंहम यांनी  1991 मध्ये खालील शिफारसी केल्या.

१. या समितीने पुढील पाच वर्षांत कायदेशीर तरलता प्रमाण (एसएलआर) 38. cent टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत तरलतेचे प्रमाण कमी करण्याची शिफारस केली.

२. या समितीने निर्देशित कर्ज कार्यक्रम रद्द करण्याची शिफारस केली.

This. या समितीच्या मते व्याज दर बाजार दलांनी निश्चित केले पाहिजेत. व्याजदराच्या निर्धारणात रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप करू नये.

This. या समितीने बँकांची लेखा प्रणाली सुधारण्याबाबतही सांगितले.

This. या समितीने बँकांच्या कर्जाची वेळेवर पुनर्प्राप्ती करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापनेवर जोर दिला.

Nara. नरसिंहम समितीने बँकांच्या पुनर्रचनेवरही भर दिला. या समितीनुसार or किंवा banks आंतरराष्ट्रीय बँका, or किंवा १० राष्ट्रीय बँका आणि काही स्थानिक बँका आणि काही ग्रामीण बँका एका देशाच्या आत असाव्यात.

Branch. या समितीने शाखा परवाना रद्द करण्याची शिफारस केली.

Nara. नरसिंहम समितीने आपल्या देशात परकीय बँकिंगला प्रोत्साहन देण्याची शिफारस केली.

This. या समितीने बँकांवरील दुहेरी नियंत्रण रद्द करण्याची शिफारस केली.

यापूर्वी वित्त मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेचे बँकांकडून नियंत्रण होते. केवळ रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखालीच बँकांचे नियंत्रण करावे, अशी सूचना नरसिंहम समितीने केली.

तिसरी पंचवार्षिक योजना



☀️कालावधी:1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966

☀️भर:-कृषी व मूलभूत उद्योग

1962 ला संरक्षण व विकास केला

☀️प्रतिमान:-महालनोबिस व सुखमाय चक्रवर्ती

✍️राजकीय घडामोडी:-

1962👉भारत चीन युद्ध

1962👉गोवा मुक्त

1963👉नागालँड

योजना

🔘1964-65:-सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम

🔘1965:-कृषी मूल्य आयोग स्थापन

अद्यक्ष:-प्रो.दांतवाला

शिफारस:-एल के झा समिती

1965👉भारतीय अन्न महामंडळ

1964👉IDBI स्थापन

1964👉UTI स्थापन

✍️सर्वाधिक अपयशी योजना


भारतीय क्रांतिकारी संघटना.



🅾️वयायाम मंडळ
– चाफेकर बंधू  ( १८९६ )

🅾️अनुशीलन समिती
– ज्ञानेंद्रनाथ बोस ( १९०१ ) मिदनापुर

🅾️अभिनव भारत( पुणे )
– वि .दा .सावरकर  ( १९०२ )

🅾️इडिया हाऊस
– श्यामजी कृष्णा वर्मा ( १९०४ )

🅾️सवदेश बांधव समिती
– अश्विनीकुमार दत्त ( १९०५ )

🅾️अभिनव भारत( लंडन)
– वि. दा. सावरकर ( १९०६ )

🅾️इडियन इंडिपेंडस लिग
– तारकानाथ दत्त ,अमेरिका, १९०७

🅾️अनुशीलन समिती
– विरेंद्रकुमार घोष - भूपेंद्र दत्त
                  १९०७ ( ढाका )

🅾️भारत माता सोसायटी
– अजितसिंह आंबाप्रसाद (१९०७ )

🅾️गदर पार्टी
– लाला हरदयाळ ( १९१३ )

🅾️इडियन इंडिपेंडस लिग
– लाला हरदयाळ - विरेंद्र चट्टोपाध्याय ( १९१४ ) ( बर्लिन )

🅾️इडियन इंडिपेंडस लिग
– राज महेंद्र प्रताप ( १९१५ ) काबूल

🅾️हिन्दुस्थान रिपब्लिकन असोशिएशन
– सचिंद्रनाथ संन्याल ( १९२४ )

🅾️नौजवान सभा
– भगतसिंग ( १९२६ ) (लाहोर)

🅾️हिन्दुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोशियशन
– चंद्रशेखर आझाद (१९२८)

🅾️इडियन इंडिपेंडन्स लिग( *टोकियो* )
– रासबिहारी बोस (१९४२)

🅾️आझाद हिंद सेना
– रासबिहारी बोस (१९४२) टोकियो

विभक्ती



नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रीयापादशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात. त्यांना विभक्ती म्हणतात.

वाक्यातील एकमेकांशी असलेले संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या विकारांना विभक्ती म्हणतात.
शब्दांना जी अक्षरे जोडली जातात, त्यांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात.
जी काही क्रिया घडलेली असते, ती सांगितलेली असते. म्हणून वाक्यातील क्रियापद सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यपद मानले जाते. त्या मानाने इतर पदे

असतात. यावरून विभक्ती व विभक्तीचे अर्थ याबद्दल साधारणपणे असे म्हणतात.

विभक्त्यार्थ दोन प्रकार

१) कारकार्थ - कारक व कारकार्थ
२) उपपदार्थ - कर्ता, करण, कर्म

विभक्तीची आठ नावे

१) प्रथमा
२) द्वितीया
३) तृतीया
४) चतुर्थी 
५) पंचमी
६) षष्ठी
७) सप्तमी 
८)  संबोधन

विभक्तीतीचे प्रत्यय - नी, ट, चा

विभक्ती  -  (एकवचन)  -  (अनेकवचन)

१) प्रथमा  -  प्रत्यय नाही  -  प्रत्यय नाही     
२) द्वितीया  -  स, ला, ते  -  स, ला, ना, ते   
३) तृतीया  -  ने, ए, शी  -  नी, शी, ही   
४) चतुर्थी  -  स, ला, ते  -  स, ला, ना, ते   
५) पंचमी  -  ऊन, हून  -  ऊन, हून   
६) षष्ठी  -  चा, ची, चे  -  चे, च्या, ची 
७) सप्तमी  -  त, ई, आ  -  त, ई, आ 
८) संबोधन  -  प्रत्यय नाही  -  नो

विभक्तीतील रूपे

विभक्ती  -  (एकवचन)  -  (अनेकवचन)

१) प्रथमा -  फूल  -  फुले
२) द्वितीया  -  फुलास, दुलाला  -  फुलांस, फुलांना
३) तृतीया  -  फुलाने, फुलाशी  -  फुलांनी, फुलांशी
४) चतुर्थी  -  फुलास, फुलाला  -  फुलांस, फुलांना
५) पंचमी  -  फुलातून, फुलाहून  -  फुलांतून, फुलांहून
६) षष्ठी  -  फुलाचा, फुलाची, फुलाचे  -  फुलांचा, फुलांची, फुलांचे
७) सप्तमी  -  फुलात  -  फुलांत
८) संबोधन  -  फुला  -  फुलांनी

@Marathi_Vyakran

काही समानार्थी म्हणी



📔आधी शिदोरी मग जेजूरी - आधी पोटोबा मग विठ्ठोबा
 
📒आवळा देऊन कोहळा काढणे - पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा
 
📕कडू कारले तुपामध्ये तळले - कुत्र्याचे शेपूट नळीत घातले
 
📗साखरेत घोळले तरी कडू ते कडूच - तरी वाकडे ते वाकडेच
 
📘कामा पुरता मामा - ताकापुरती आजी
 
📙काखेत कळसा गावाला वळसा - तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी
 
📓करावे तसे भरावे - जैसी करणी वैशी भरणी
 
📔खाई त्याला खवखवे - चोराच्या मनात चांदणे
 
📒खाण तशी माती - बाप तसा बेटा
 
📕आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी - मानेला गळू, पायाला जळू
 
📗गाढवापुढे वाचली गीता अन - नळी फुंकले सोनारे इकडून
 
📘काळाचा गोंधळ बरा - गेले तिकडे वारे
 
📙घरोघरी मातीच्या चुली - पळसाला पाने तीनच
 
📓चोरावर मोर - शेरास सव्वाशेर
 
📔जशी देणावळ तशी खानावळ - दाम तसे काम
 
📒पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या
 
📕नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस
 
📗नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाही, बडा घर पोकळ वासा
 
📘बलाफुलाची गाठ पडणे - कावळा बसायला आणि फाटा तुटायला
 
📙पी हळद अन हो गोरी - उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
 
📓वराती मागून घोडे - बैल गेला अन झोपा केला
 
📕वासरात लंगडी गाय शहाणी - गावंढया गावात गाढवीण सवाशीण 

---------------------------------------

नाबार्ड



National Bank for Agriculture and Rural Development

▪️शरी. बी. शिवरामन यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीनुसार 'NABARD Act, 1982' संमत करून एक वैधानिक संस्था म्हणून  12 जुलै 1982 रोजी स्थापना

♦️ मख्यालय : मुंबई

▪️सथापनेवेळी नाबार्डचे अधिकृत भांडवल रु. 100 कोटी होते. यामध्ये सुधारणा होऊन  31 मार्च 2015 रोजी ते रु 5 हजार कोटी  झाले.

▪️यामध्ये भारत सरकारचा वाटा 99.6 टक्के, तर भारतीय रिझर्व्ह बँकेचा (RBI) वाटा 0.4 टक्के आहे.

▪️ अग्रक्रम क्षेत्र कर्जाचे (कृषी क्षेत्रासाठी 18 टक्के) उद्दिष्ट प्राप्त करू न शकणार्‍या बँका उर्वरित कर्जांची रक्कम नाबार्डकडे  ग्रामीण पायाभूत विकास निधीत (Rural Infrastructure Development Fund : RIDF) जमा करतात.

▪️नाबार्ड RIDF मधून राज्य शासनांना व केंद्रशासित प्रदेशांना कृषी क्षेत्र, सामाजिक क्षेत्र यांसारख्या बाबींसाठी कर्जे देते.

भारताचे मानचिन्हे



◾️ 22 जुलै 1947 रोजी संविधानसभेने भारताच्या राष्ट्रध्वजाला मान्यता दिली व हा राष्ट्रध्वज 14 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्राला समर्पित करण्यात आला..

◾️राष्ट्रध्वजाचा आकार 3:2 या प्रमाणात असतो..

◾️ घटना समितीने 24 जानेवारी 1950 रोजी जन गण मन या गीताला राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली..

◾️ जन गण मन हे गीत गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी रचले आहे..

◾️सविधान सभेने वंदेमातरम या गीतालासुद्धा राष्ट्रगीताचा दर्जा बहाल केला आहे..

◾️ वदेमातरम हे प्रसिद्ध बंगाली कवी बकीमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीमधून घेण्यात आले आहे..

◾️भारताचे बोधचिन्ह सारनाथ येथील अशोक स्तंभावरील सिंहाच्या प्रतिकृतीवरून घेण्यात आले आहे..

◾️ या बोधचिन्हात मंडूकोपनिषदातील सत्यमेव जयते हे वाक्य अंतर्भूत करण्यात आले आहे..

अखेर रशियात करोना व्हायरसच्या लसीला मंजुरी, पुतिन यांनी मुलीला दिला लसीचा डोस



◾️रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने करोना व्हायरसच्या आजारावर विकसित करण्यात आलेल्या लसीला मंजुरी दिली आहे. कुठल्याही सरकारच्या आरोग्य मंत्रालयाची मंजुरी मिळवणारी ही जगातील पहिली लस ठरली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या लसीची मंजुरी दिल्याची माहिती दिली. माझ्या मुलीला सुद्धा याच लसीचा डोस देण्यात आला असे पुतिन यांनी सांगितले. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे.

👮‍♀रशियाच्या गामालिया इंस्टिट्यूट ऑफ अ‍ॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने ही लस विकसित केली आहे. दोन महिन्यापेक्षा कमी कालावधीत या लसीच्या मानवी चाचण्या झाल्या आहेत. लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासण्यासाठी अंतिम फेजच्या क्लिनिकल चाचण्या सुरु राहणार असल्या तरी सर्वसामान्यांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

👮‍♀अमेरिका, चीन, ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स या देशांच्या आधी रशियाला करोना व्हायरसवरील लसीची निर्मिती करायची होती. त्या दृष्टीने रशियाकडून जोरदार प्रयत्न सुरु होते. सप्टेंबर आणि ऑक्टोंबरपासून या लसीची निर्मिती करण्याचा रशियाचा मानस आहे. रशियात राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या अध्यक्षतेखाली लस निर्मितीबद्दल एक बैठक पार पडली होती. त्या बैठकीत रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन एकच गोष्ट म्हणाले होते कि, “करोना व्हायरसवर आपण जी लस बनवू, त्याबद्दल आपल्याला पूर्ण खात्री असली पाहिजे तसेच काळजीपूर्वक, संतुलन ठेवून आपल्याला करोनावर लसीची निर्मिती करायची आहे.”

प्रा. (डॉ.) प्रदीपकुमार जोशी: केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष



🔸केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य, प्रा. (डॉ) प्रदीपकुमार जोशी यांनी 7 ऑगस्ट 2020 रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अध्यक्षपदाची  शपथ घेतली. आयोगाचे मावळते अध्यक्ष अरविंद सक्सेना यांनी जोशी यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

🔸परा. जोशी यांनी 12 मे 2015 रोजी सदस्य म्हणून UPSC आयोगामध्ये प्रवेश केला. यापूर्वी जोशी त्यांनी छत्तीसगड लोकसेवा आयोग आणि मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाचे अध्यक्षपद भूषवले. त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (NIEPA) याचे संचालक म्हणूनही काम पाहीले. ते आर्थिक व्यवस्थापन क्षेत्रातले एक नामवंत तज्ज्ञ आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) विषयी

🔸कद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ही भारताची केंद्रीय निवड संस्था आहे. हा एक संवैधानिक आयोग आहे. ही संस्था अखिल भारतीय सेवा तसेच केंद्रीय सेवेच्या गट 'अ' व गट 'ब' कर्मचाऱ्यांची निवड करण्याकरीता जबाबदार आहे. ही संस्था 'कर्मचारी, लोक तक्रारी आणि निर्वाहभत्ता मंत्रालयातल्या कर्मचारी व प्रशिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली येतो.

🔸सस्थेची स्थापना दिनांक 1 ऑक्टोबर 1926 रोजी झाली. आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि दहा सदस्य असतात. त्यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती यांच्याकडून केली जाते. UPSC च्या अध्यक्ष पदाची नियुक्ती भारताच्या संविधानातली कलम 316 च्या उपखंड (1) अन्वये केली जाते.

देशातील पहिली किसान रेल्वेगाडी धावली, शेतकऱ्यांना असा होणार फायदा फक्त शेतकऱ्यांसाठी ही ट्रेन धावेल


🎓भारतीय रेल्वेने एक महत्वाचं पाऊल उचललं आहे. आज भारतीय रेल्वेमार्फत किसान रेल्वेगाडीची सुरुवात करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुक्रवार या किसान रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मंत्री छगन भुजबळही उपस्थित होते.

🎓या रेल्वेतून फळ आणि पाले-भाज्यासारख्या सामानाची नेआण करण्यात येणार आहे. जाणून घेऊयात ही ट्रेन नेमकी काय आहे आणि याचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार…

🎓📚 कठून कुठपर्यंत? 👇👇🎓

🎓किसान रेल्वे गाडी महाराष्ट्र ते बिहार या राज्यात धावणार आहे. महाराष्ट्रातील देवळाली स्थानकातून सकाळी ११ वाजता ही रेल्वे रवाना होणार आणि बिहारच्या दानापुर स्थानकापर्यंत जाणार आहे.

✅ वशिष्ट्ये काय? 👇👇

🎓किसान रेल्वे गाडीत रेफ्रिजरेटेड कोच लावण्यात आले आहेत. १७ टनपर्यंत माल वाहून नेहण्याची क्षमता या ट्रेनमध्ये आहे. याचं डिजायनही हटके आहे. कपूरथला येथील रेल्वे कारखान्यातून या रेल्वेच्या बोगी तयार करण्यात आल्या आहेत. यामधील कंटेनर फ्रीजसारखे असतील. ही रेल्वे म्हणजेच चालते फिरते कोल्ड स्टोरेज असणार आहे. या रेल्वेगाडीत शेतकऱ्यांच्या पालेभाज्या, भळे, मासे, मांस आणि दूधासारख्या पदार्थांना ठेवण्यात येणार आहे.

🎓महाराष्ट्र-बिहार या मार्गावर किसान रेल्वेगाडी आठवड्यातून एकदा धावेल. महाराष्ट्रातील नाशिकमधील देवळाली स्थानकातून सकाळी ११ वाजता रवाना होणार आहे. दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.४६ वाजता पटनाजवळील दानापुर स्थानकात पोहचेल. या रेल्वेगाडीला महाराष्ट्रातून बिहारमध्ये पोहचण्यासाठी ३२ तासांचा कालवधी लागणार आहे.

✅ कोणत्या स्थानकावर थांबणार? – 👇

🎓दवळाली ते दानापुर या स्थानकादरम्यान एक हजार ५१९ किमी ट्रेन धावेल. देवळाली स्थानकातून निघाल्यानंतर नाशिक रोड, मनमाड, जळगांव, भुसावळ, बुरहानपुर, खंडवा, इटारसी, जबलपुर, सतना, कटनी, मणिकपुर, प्रयागराज, पं दीनदयाल उपाध्याय नगर आणि बक्सर या स्थानकावर थांबणार आहे.

धोनीपाठोपाठ सुरेश रैनाचीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती.



🔰धोनीपाठोपाठ भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना यानंदेखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सुरेश रैनानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरूनच आपली निवृत्ती जाहीर केली आहे.

🔰2018 मध्ये रैना आपला अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. तर 2015 मध्ये तो अखेरचा कसोटी सामना खेळला.

🔰रनाच्या निवृत्तीपूर्वीच भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यानंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. त्याच्या निवृत्तीच्या घोषणेच्या काही वेळातच रैनानंही आपल्या निवृत्तीची घोषणा केली.

🔰रनानं आतापर्यंत भारतासाठी 18 कसोटी सामने, 226 एकदिवसीय सामने आणि 78 टी-20  सामने खेळले आहेत. तर त्याच्या नावावर एकदिवसीय सामन्यांमध्ये 5,615 धावा आहेत.

‘बीसीसीआय’चे ‘अर्थलक्ष्य’.



🔰‘सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ’ असा रुबाब असणारे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आर्थिक अडचणीत नाही, असा दावा अध्यक्ष सौरव गांगुलीने नुकताच केला होता. सध्या करोना साथीच्या कठीण कालखंडातही लोकप्रिय इंडियन प्रीमियर लीगद्वारे (आयपीएल) तीनशे कोटी रुपयांहून अधिक ‘अर्थलक्ष्य’प्राप्तीची योजना ‘बीसीसीआय’ने आखली आहे.

🔰चिनी मोबाइल कंपनी विवोशी संबंध तोडल्यानंतर येत्या ७२ तासांत ‘बीसीसीआय’चे अर्थभरारी स्पष्ट होऊ शकेल, असा क्रिकेटवर्तुळातील जाणकारांचा अंदाज आहे. ‘बीसीसीआय’ने विवोच्या जागी शीर्षक प्रायोजक ठरवताना तीनशे कोटी रुपयांचे लक्ष्य आखले आहे. शीर्षक प्रायोजकाच्या शर्यतीत अ‍ॅमेझॉन, बायजू, ड्रीम ११, अनअ‍ॅकॅडमी, इंडिया इंक शर्यतीत आहेत.

🔰मार्चपासून क्रिकेट स्थगित असल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचे प्रायोजक बायजूचे काही प्रमाणात पैसे वाचले आहेत. परंतु हा आकडा आश्चर्यकारक भरारी घेऊ शकेल, अशी ‘बीसीसीआय’ला अपेक्षा आहे. याचप्रमाणे अधिकृत सहप्रायोजकांचा आकडा तीनवरून पाचपर्यंत वाढवताना प्रत्येकी ४० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे करार डिसेंबपर्यंत चार महिन्यांसाठीच आहेत. मंडळाने आपले पत्ते अद्याप खुले केले नसले तरी आर्थिक अडचणीच्या काळातही भारतीय क्रिकेट जागतिक क्रीडा क्षेत्राचे लक्ष वेधू शकेल.

वडिलोपार्जित संपत्तीवर मुलींना समानाधिकार.



🔰हिंदू वारसा ‘सुधारणा’ कायदा २००५ अमलात येण्याच्या आधी वडिलांचा मृत्यू झाला असेल तरी अविभक्त  हिंदू कुटुंबातील वडिलोपार्जित संपत्तीवर मुलींना मुलांइतकाच समानाधिकार (समदायित्व) राहील, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला आहे.

🔰सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने मंगळवारी सांगितले की, ९ सप्टेंबर २००५ पूर्वी जन्मलेल्या मुलींनाही वडिलोपार्जित संपत्तीवर समान हक्क आहे. कारण वडिलोपार्जित संपत्तीवर अधिकार हा जन्मापासून मिळत असतो. सुधारित कायद्यातील कलम ६ अन्वये मुलींना वडिलोपार्जित संपत्तीतील समान हक्कांपासून वंचित ठेवता येणार नाही. त्यांना पूर्वलक्ष्यी प्रभावाने हे हक्क लागू आहेत. त्यामुळे याबाबतची प्रलंबित प्रकरणे सहा महिन्यात निकाली काढावीत.

🔰हिंदू वारसा हक्क कायदा पहिल्यांदा १९५६ मध्ये अमलात आला होता. त्यात वडिलोपार्जित मालमत्तेत मुलींना समान अधिकार देणारी सुधारणा २००५ मध्ये करण्यात आली होती. ती पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होते असे स्पष्ट करण्यात आले.

🔰परकाश विरुद्ध फुलवती (२०१५) व दानम्मा अ‍ॅट सुमन सुरपूर विरुद्ध अमर (२०१८) या प्रकरणात न्यायालयांनी विरोधाभासी निकाल दिले होते. प्रकाश विरुद्ध फुलवती (२०१५) प्रकरणात न्या. अनिल दवे व न्या. ए.के.गोयल यांचा समावेश असलेल्या न्यायापीठाने सांगितले की, सुधारित कायद्यातील वारसा हक्क हे जिवंत वारसा हक्क कर्त्यांच्या जिवंत असलेल्या मुलींना त्या केव्हा जन्मल्या याचा विचार न करता ९ सप्टेंबर २००५ पासून लागू होतात.

🔰पर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होत नाहीत. दानम्मा अ‍ॅट सुमन सुरपूर विरुद्ध अमर (२०१८) या खटल्यात न्या. ए.के.सिक्री व न्या. अशोक भूषण यांनी म्हटले होते की, २००१ मध्ये वडील वारलेल्या दोन मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेत सारखाच हक्क आहे. तो हक्क पूर्वलक्ष्यी लागू होतो. हे परस्पर विरोधी निकाल होते.

संरक्षण क्षेत्रातल्या सार्वजनिक आधुनिकीकरण प्रकल्प तसेच नवीन पायाभूत सुविधांचे उद्घाटन.



🔰संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते 10 ऑगस्ट 2020 रोजी ‘आत्मनिर्भर भारत’ सप्ताहाच्या अंतर्गत संरक्षण क्षेत्रातले सार्वजनिक उपक्रम तसेच दारुगोळा निर्मिती मंडळ (OFB) यांच्या अंतर्गत येणाऱ्या सुविधांचे आधुनिकीकरण तसेच नवीन पायाभूत सुविधांचे डिजीटल माध्यमातून उद्घाटन करण्यात आले.

🔴आधुनिकीकरण उपक्रमाच्या अंतर्गत,

🔰ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथील पिनाक रॉकेट कॉम्प्लेक्स येथे पिनाक आणि इतर अग्निबाणासाठी लागणाऱ्या विस्तारीत गरजांच्या पूर्ततेसाठी अत्याधुनिकीकरण करण्यात आले आहे.

🔰OLF देहरादून याच्या अत्याधुनिकीकरणामुळे टी-90 रणगाड्यांच्या अत्याधुनिक ऑप्टोइलेक्ट्रॉनिक घटकांची निर्मिती होणार.

🔰भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) या कंपनीने उत्पादनासाठी पूर्णपणे स्वदेशी ‘मरीच’ एकात्मिक सुविधा तयार केली आहे, DRDOने विकसित केलेल्या टॉर्पेडो-भेदी संरक्षण प्रणालीचे मरीचसोबत एकत्रीकरण आणि चाचणी केली आहे.

🔰हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) या कंपनीने ‘500 वे AL-31FP ओव्हरहाल्ड इंजिन’ भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द केले आहे, जे Su-30MKI या लढाऊ विमानात बसविण्यात येणार आहे. हे कोरापुट विभागाने तयार केले आहे.

🔰BEML लिमिटेडने बेंगळुरु येथे नवीन पायाभूत सुविधानिर्माण अंतर्गत औद्योगिक संरचना केंद्र उभे केले आहे. भारतातले अशाप्रकारचे हे पहिलेच केंद्र आहे.

🔰गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजीनियर्स या कंपनीने सध्या सुरु असलेल्या P17A प्रकल्पाच्या उत्पादन गरजा पूर्ण करण्यासाठी राजा बागान डॉकयार्ड येथे सुविधा विस्तार केला.

🔰कोंकरस-एम, इनवार, आकाश, अस्त्र क्षेपणास्त्रांसाठी आवश्यक असलेल्या स्वदेशी विकसित युद्धसामुग्रीचे उत्पादन व चाचणी करण्यासाठी संरक्षण क्षेत्रात नवीन पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. ही सुविधा मॉड्यूलर असल्याने वाढीव सुधारणांसह भविष्यातल्या सर्व क्षेपणास्त्र आयुधांना पुरवली जाणार.

🔴पार्श्वभूमी...

🔰पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाचे आवाहन केले आहे. हा ‘5-I’ सूत्री कार्यक्रम आहे - हेतू (Intent), समावेश (Inclusion), गुंतवणूक (Investment), पायाभूत सुविधा (Infrastructure) आणि नवोन्मेष (Innovation). संरक्षण क्षेत्राने या क्षेत्राच्या विकासासाठी अनेक पुढाकार घेतले आहे.

भारतीयांकडून प्रभावी हायड्रोजन उत्क्रांतीसाठी कार्यक्षम व स्वस्त असे उत्प्रेरक विकसित.



🔰बंगळुरू येथील सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्सेस (CENS) या केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागांतर्गत असलेल्या स्वायत्त संस्थेच्या संशोधकांनी ‘पॅलाडिअम Pd(II)’ आयन-युक्त नव्या प्रकारचे कॉर्डिनेशन पॉलिमर (COP) संश्लेषित केला आहे, जो H-अ‍ॅडसॉरप्शन आणि बेनेझ टेट्रामाईन (BTA) यांच्या सक्रीय स्थळांचा स्रोत म्हणून कार्य करतो.

🔰दोन्ही मिळून द्वीमितीय (2D) Pd(BTA) पत्र्याच्या माध्यमातून H-बंध परस्परसंवाद निर्माण करतात. संशोधकांनी द्वीमितीय 2D Pd(BTA) पत्रा देखील तयार केला आहे.

🔰हायड्रोजन (H2) इव्होल्यूशन रिअॅक्शन (HER) यासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रो उत्प्रेरकाची कार्यक्षमता मुख्यत्वे त्याचा टिकाऊपणा, इलेक्ट्रोकेमिकल अभिक्रियेची क्षमता कमीतकमी करण्यावर आणि संश्लेषण (उत्पादन) याच्या किंमतीवर अवलंबून असते.

🔰उद्योगांमध्ये वापरण्यात येणारे प्लॅटीनम (Pt) / कार्बन (C) कार्यक्षम उत्प्रेरक आहेत, परंतु ते किंमतीत महाग आहेत आणि दीर्घकाळ वापरल्यास मेटल आयनवर काम करीत नाहीत. त्यातच पृथ्वीवर प्लॅटीनम धातूचे साठे अल्प आहेत.

🔴या शोधाचे महत्व...

🔰हवामानातले बदल यांच्या विरोधात असलेल्या लढ्यासाठी जीवाश्म इंधनांऐवजी पुढील पिढीचे कमी कार्बनयुक्त इंधन म्हणून हायड्रोजन ओळखले जाते. इंधन म्हणून हायड्रोजनच्या वापराचे भवितव्य हायड्रोजन तयार करण्यासाठी पाण्याचे इलेक्ट्रोकेमिकल विभाजन सुलभ करण्यासाठी लागणाऱ्या कार्यक्षम इलेक्ट्रोकॅटिलिस्टच्या रचनेमध्ये आहे.

🔰हायड्रोजन तयार करण्यासाठी पाण्याचे विभाजन करण्याचे कार्यक्षम साधन विकसित करणे हा या शोधामागचा हेतु आहे.

परीक्षा रद्द करण्याचा अधिकार राज्यांना नाही.



🔰अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा अधिकार राज्य सरकारांना नाही. पदवी देण्याचा अधिकार फक्त विद्यापीठ अनुदान आयोगाला असताना राज्ये परीक्षा रद्द कशी करू शकतात, असा सवाल महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात केला.

🔰कठलीही पदवी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून दिली जात असेल आणि आयोगाने परीक्षा घेण्याचा आदेश दिला असेल तर, परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आयोगाच्या आदेशाविरोधात जाणारा ठरतो. परीक्षा झाली नाही तर पदवीही मिळणार नाही, असा कायदाच आहे, असा युक्तिवाद मेहता यांनी केला. त्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत विद्यापीठ अनुदान आयोगाचा आदेश रद्दबातल करता येतो का, याचे स्पष्टीकरण देण्याचे निर्देश न्या. अशोक भूषण, न्या. आर. सुभाष रेड्डी आणि न्या. एम. आर. शहा यांच्या पीठाने मेहता यांना दिले.

🔰महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात निवेदन सादर केले असून करोनामुळे अंतिम वर्षांच्या परीक्षा घेणे शक्य नसल्याची माहिती न्यायालयाला दिली आहे. याआधीच्या सुनावणीत महाराष्ट्राने राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने विविध कुलगुरूंशी चर्चा केल्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे निवेदन दिले होते.

🔰११ जुलै रोजी ऑनलाइन व ऑफलाइन लेखी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारी विद्यापीठांना कळवण्यात आला असल्याचे दिल्ली सरकारच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. दोन्ही राज्य सरकारांच्या निवेदनावर उत्तर देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळ मागून घेतला आहे. पुढील सुनावणी १४ ऑगस्ट रोजी होणार आहे.

अंदमान आणि निकोबारमध्ये ऑप्टिकल फायबर प्रकल्प सुरू.



🔰अंदमान व निकोबारमधील सागराखाली उभारण्यात आलेल्या ‘ऑप्टिकल फायबर प्रोजेक्ट’चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. यामुळे अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील ब्रॉडबँड सेवेचा वेग वाढणार आहे.

🔰३० डिसेंबर २०१८ मध्ये पंतप्रधान मदी यांनी २३१२ कि.मी. अंतराच्या सागरांतर्गत ऑप्टिकल फायबर प्रोजेक्टची पायाभरणी केली होती. त्यामुळे चेन्नई, अंदमान व निकोबर बेटे एकमेकांशी इंटरनेटने जोडली जाणार आहेत. चेन्नई ते पोर्ट ब्लेअर, पोर्ट ब्लेअर ते लिट्ल अंदमान, पोर्ट ब्लेअर ते स्वराज द्वीप या प्रमाणे इंटरनेट सेवा जोडली जाणार असून अंदमान निकोबार भागात आजपासून इंटरनेट सेवा मोठय़ा प्रमाणात सुरू झाली आहे.

🔰१२२४ कोटींचा हा प्रकल्प असून पोर्ट ब्लेअरशिवाय स्वराज द्वीप (हॅवलॉक) लाँग आयलंड,रंगाट, लिटल अंदमान,कमोरटा, कार निकोबार व ग्रेटर निकोबार ही ठिकाणे जोडली जाणार आहेत.

🔰पतप्रधानांनी सांगितले, आधुनिक दूरसंचार जोडणीचा फायदा अंदमान व निकोबार बेटांना होईल. देशातील सर्व दूरसंचार पुरवठादार कंपन्या तेथे सेवा देऊ शकतील. ऑप्टिकल फायबरने अंदमान निकोबारला इतर देशांशी इंटरनेटने जोडण्याची सोय मिळणार आहे. पोर्ट ब्लेअरला इंटरनेटचा वेग सेकंदाला ४०० गिगॅबाइट असून इतर बेटांवर इंटरनेटचा वेग सेकंदाला २०० जीबी आहे.

१०१ शस्त्रे व लष्करी उपकरणांना आयातबंदी- संरक्षणमंत्री राजनाथ सिंह.



🔰2014 साली जाहीर करण्यात आलेल्या ‘मेक इन इंडिया’ योजनेचा उद्देश स्वदेशी संरक्षण उद्योग विकसित करण्याचा होता, मात्र ही योजना लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरली.

🔰सरक्षण क्षेत्रातील 101 शस्त्रे व लष्करी उपकरणांना आयातबंदी करण्याची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची घोषणा ही ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने मोठे पाऊल असून ते वरील विचारसरणीला अनुसरूनच आहे.

🔰अशी बंदी हे एक प्रकारे उदारीकरणापूर्वीच्या ‘लायसन्स परमिट राज’कडे परत जाणे आहे; मात्र संरक्षण उद्योगाकडून आलेल्या तीव्र प्रतिक्रियांमुळे सरकारला गुंतागुंतीच्या अशा संरक्षण उद्योग क्षेत्रात हस्तक्षेप करणे भाग पडले आहे.

🔰आता काही वस्तूंचा ‘व्यापारबंदी यादीत’ समावेश करून आणि देशांतर्गत खरेदीसाठी अर्थसंकल्पात वेगळी तरतूद करून सरकारने स्वदेशी उद्योगाला संदेश दिला आहे.

लॉकडाउन मध्ये 13 पुस्तके लिहून काढली- मिझोरामचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई.



🔰मिझोरामचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी लॉकडाउनच्या कालावधीमध्ये चक्क 13 पुस्तके लिहून काढली आहेत.

🔰करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये पिल्लई यांनी पुस्तके आणि कविता लिहिल्या आहेत.

🔰मार्च महिन्यापासून आतापर्यंत पिल्लई यांनी 13 पुस्तके लिहिली आहेत. यामध्ये इंग्रजी आणि मल्याळम भाषेतील कविता संग्रहाचाही समावेश आहे.

🔰पिल्लई हे मागील तीन दशकांपासून लिखाण करत आहेत. त्यांचे पहिले पुस्तक 1983 मध्ये प्रकाशित झालं होतं.

🔰राज्यपाल पदावर नियुक्त होण्याआदी त्यांची 105 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी आतापर्यंत एकूण 121 पुस्तके लिहिली आहेत.

गिरीश चंद्र मुर्मू: 14 वे नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG).



🔰भारताचे 14 वे नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) म्हणून गिरीश चंद्र मुर्मू यांची नेमणूक करण्यात आली आहे. ही नियुक्ती राजीव मेहऋषी यांच्या जागी करण्यात आली.

🔴भारतीय CAG बाबत...

🔰भारतीय नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) हे भारतीय संविधानाच्या कलम 148-151 अन्वये स्थापन केलेले पद असून एक प्राधिकारी आहे, जो शासनाकडून मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य मिळविणारी विभागे व प्राधिकरण यांच्या समावेशासह भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्या सर्व जमा व खर्चाचे लेखापरिक्षण करतो. याशिवाय, CAG सरकारी मालकीच्या कंपन्यांचे बाह्य लेखापरिक्षक आहेत आणि सरकारी कंपन्यांचे पूरक लेखापरीक्षण करतात.

🔰भारतीय शासन पदावलीमध्ये CAG 9 व्या स्थानी आहे आणि त्यांना भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासमान दर्जा प्राप्त आहे. पंतप्रधानांच्या शिफारशीनंतर CAG ची नेमणूक भारतीय राष्ट्रपतींकडून केली जाते.

ऑगस्ट महिन्यात करोनानं तोडले सर्व विक्रम; जगातील सर्वाधिक रुग्णवाढ भारतात



🔰दिवसेंदिवस जभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर दुसरीकडे भारतातही गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. दरम्यान, करोनाचा सतत वाढणारा प्रादुर्भाव आता चिंतेचा विषय ठरत आहे. ऑगस्ट महिन्यात भारतात आतापर्यंत करोनाचे सर्वाधिक रुग्ण समोर आले आहेत.

🔰अमेरिका आणि ब्राझीलपेक्षाही ही संख्या अधिक आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांमध्येच भारत करोनाबाधितांच्या सर्वाधिक रुग्णसंख्येमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला. तर शुक्रवारीही भारतात करोनाचे ६० हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले आणि तब्बल ९२६ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

🔰ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या ६ दिवसांमध्ये देशात ३ लाख २८ हजार ९०३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर अमेरिकेत सहा दिवसांमध्ये ३ लाख २६ हजार १११ रुग्णांची नोंद झाली. कर ब्राझीलमध्ये २ लाख ५१ हजार २६४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. २ ऑगस्ट, ३ ऑगस्ट, ५ ऑगस्ट आणि ६ ऑगस्ट रोजी जगातील सर्वाधिक रुग्णांची नोंद भारतात झाली. तर गुरूवारीच देशातील करोनाबाधितांच्या संख्येनं २० लाखांचा टप्पा पार केला.

कद्र सरकारनं ३७० कलम रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरचं विभाजन करून केंद्र शासित प्रदेश केला.



🔰 त्यानंतर गिरीश चंद्र मुर्मू यांची
राष्ट्रपतींनी जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालपदी नियुक्ती केली होती.

🔰मर्मू यांची कॅगपदी (Comptroller and Auditor General of India ) नियुक्ती केली आहे.

🔰गजरात केडरचे आयएएस अधिकारी असलेल्या जी.सी. मुर्मू यांनी २९ऑक्टोबर २०१९ रोजी उपराज्यपालपदाची सूत्रे हाती घेतली होती.

🔰उपराज्यपाल पदीचा कारभार हाती घेण्यापूर्वी मुर्मू वाणिज्य मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत होते.

🔰नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना जी.सी. मुर्मू हे प्रधान सचिव म्हणून कार्यरत होते.

🔰कगचा कार्यकाळ सहा वर्षांचा आहे. मात्र, या पदासाठी निवृत्तीचं वय ६५ वर्ष असून, मुर्मू हे केवळ पाच वर्षच पदावर राहू शकतात.

🔰 कग हे घटनात्मक पद असून, केंद्र आणि राज्य सरकारांच्या खात्यांचं लेखा परिक्षण करण्याची जबाबदारी कॅगवर असते.

🔰पर्व नयाब राज्यपाल गिरीष चंद्र मूर्मू   जागी आता मनोज सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कलम 370 काय आहे ?



🔰जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेल्या कलम 370 वरून राजकीय नेते आणि पक्षांमध्ये वाकयुद्ध रंगलं आहे.अनेक दिवसांनी कलम 370 चा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे.कलम 370 मध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत, त्यांचा संभाव्य फायदा आणि तोटा काय आहे, हे खाली विस्तृतपणे देण्यात आले आहे.
कलम 370 मधील प्रमुख मुद्दे
.
1) कलम 370 लागू झाल्यामुळे जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळाला आहे. म्हणजेच हे राज्य विशेष स्वायत्तता असलेले राज्य आहे.
.
2) कलम 370 मधील तरतुदीअंतर्गत संसदेला जम्मू-काश्मीरसाठी फक्त संरक्षण, विदेश आणि दळणवळणाशी संबंधित प्रकरणांमध्येच कायदा बनवण्याचा अधिकार आहे.
.
3) इतर कायदे लागू करण्यासाठी त्यांना राज्य सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे.
.
4) या विशेष अधिकारामुळे राष्ट्रपतींना राज्याची घटना बरखास्त करण्याचादेखील अधिकार नाही.
5) कलम 370 मुळेच जम्मू-काश्मीरवर 1976 चा शहरी भूमी कायदा लागू होत नाही. याचाच अर्थ जम्मू-काश्मीरचा रहिवासी नसणारा व्यक्ती जमीन खरेदी करूशकत नाही.
.
6) एवढेच नाही तर ज्या महिलेने इतर राज्यातील मुलाशी लग्न केले असेल, तर तोसुद्धा येथे जमीन खरेदी करू शकत नाही.
.
7) याशिवाय ज्यामध्ये देशात आर्थिक आणीबाणी लावण्याची तरतूद आहे ते भारतीय घटनेचे कलम 360 देखील जम्मू-काश्मीरवरलागू होत नाही.
.
8) भारतातील सर्व राज्यांमध्येलागू होणारे कायदेसुद्धा या राज्यात लागू होऊ शकत नाहीत.
.
9) जम्मू-काश्मीर विधानसभेचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. तसेच, इतर राज्यांमध्ये हा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. कलम 370 द्वारे करण्यात आलेली ही विशेष तरतूद आहे.
.
10) पाकिस्तानने 26 ऑक्टोबर 1947 रोजी काश्मीरवर हल्ला केला होता. त्यानंतर राजा हरिसिंह यांनी भारताला मदत मागितली होती आणि त्यानंतर कलम370 अस्तित्वात आले.
.
11) 50 दशकाच्या सुरुवातीपासून भाजप पक्ष कलम 370 च्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आला आहे. जम्मू-काश्मीर पूर्णपणे एकीकृत व्हावे, असे त्यांना वाटते.समर्थनात केले जाणारे तर्क
कलम 370 कायम ठेवण्याच्या बाजूने बोलायचे झाल्यास या कलमामुळे जम्मू-काश्मीरच्या लोकांना त्यांच्या सोयीनुसार त्यांचे हित आणि कायदे निश्चितकरण्याचा अधिकार मिळतो. केंद्रसरकारच्या दबावातून मुक्त होऊन ते स्वत:साठी आपल्या गरजांनुसार कायदा तयार करू शकतात.
.
* भारत आणि जम्मू-काश्मीर यांच्यात झालेल्या करारांनुसार या राज्याला भारताशी जोडणारा हा कायदा आहे. याचाच उल्लेख करत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सांगितले होते की, कलम 370 ची कायम चुकीचीव्याख्या होत आलेली आहे.
.
* या कायद्यांतर्गत इतर राज्यातील लोकांना जम्मू-काश्मीरात नोकरी मिळवण्याचा अधिकार नाही. राज्याच्या शासकीय सेवादेखील केवळ जम्मू-काश्मीरच्या उमेदवारांसाठीच आहेत. यामुळे राज्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी सुरक्षित राहतात.
.
* जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेल्या कलम 370 मुळे दहशतवादाला खतपाणी मिळत आहे. या कलमाअंतर्गत पाकिस्तानी नागरिक जम्मू-काश्मीरच्या महिलेशी लग्न करून काश्मीरचे नागरिकत्व पत्करू शकतो. अशा रीतीने पाकिस्तानी दहशतवाद्यांनाही काश्मीरचे नागरिकत्व सहज मिळते.
.
* जम्मू-काश्मीरमध्ये माहितीचा अधिकार आणि शिक्षणाचा अधिकार यासारखे कायदे लागू होत नाहीत. कलम 370 मुळे तेथील नागरिक या कायद्यांच्या लाभांपासून वंचित राहत आहेत. तेथे माहिती अधिकार कायदा केवळ केंद्र सरकारच्या कार्यालयांसाठीच लागू होतो.
.
* जम्मू-काश्मीर राज्यातील अल्पसंख्याकांच्या हितांसाठीभारत सरकार कलम 370 अंतर्गत काहीच करू शकत नाही. तथापि, अल्पसंख्याकांच्
या हितांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जम्मू-काश्मीर सरकारवर लावला जात आहे.

‘शाश्वत विकास निर्देशांक (SDG) 2020’ याच्या यादीत भारत 117 व्या क्रमांकावर



🔸सयुक्त राष्ट्रसंघांकडून ‘शाश्वत विकास अहवाल 2020’ प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात 2020 सालाचा अद्ययावत ‘शाश्वत विकास निर्देशांक (SDG)’ प्रसिद्ध करण्यात आला आहे.

🔸‘शाश्वत विकास निर्देशांक 2020’ मधील 166 देशांच्या या यादीत भारताचा 117 वा क्रमांक लागतो आहे.

🎯इतर ठळक बाबी

🔸‘शाश्वत विकास निर्देशांक 2020’ मधील यादीत स्वीडन हा देश प्रथम क्रमांकावर आहे.

🔸यादीत प्रथम दहामध्ये स्वीडन देशाच्या पाठोपाठ डेन्मार्क, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, नॉर्वे, ऑस्ट्रिया, झेक प्रजासत्ताक, नेदरलँड आणि एस्टोनिया या देशांचा क्रम लागतो आहे.

🔸भारताचे शेजारी देश, बांग्लादेश आणि पाकिस्तान ही अनुक्रमे 109 आणि 134 व्या क्रमांकावर आहेत.

🔸भारताने दारिद्र्य निर्मूलन, स्वच्छ पेयजल आणि स्वच्छता, सभ्य काम आणि आर्थिक वाढ तसेच हवामानविषयक कार्य अश्या क्षेत्रांमध्ये अधिक प्रगती केली आहे.

🔸SDG 13 म्हणजेच हवामानविषयक कार्य या क्षेत्रांमध्ये भारताने आपले ठरविलेले ध्येय साध्य केले आहे.

शाश्वत विकास ध्येये (SDGs) बाबत

🔸2015 सालासाठी ठरविण्यात आलेली सहस्त्राब्द विकास ध्येये (MDGs) यांपासून 2030 सालासाठी शाश्वत विकास ध्येये (SDGs) विकसित झाली आहेत. 2000 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहस्त्राब्द (मिलेनियम) शिखर परिषदेनी ठरविलेल्या 2015 सालासाठीच्या सहस्त्राब्द विकास ध्येये (MDGs) यामध्ये 18 लक्ष्यांसह आठ आंतरराष्ट्रीय विकास ध्येयांची एक सूची होती. हा जगभरातल्या आव्हानांना सोडविण्यासाठी केला गेलेला प्रथम आणि एकमात्र वैश्विक प्रयत्न होता.

🔸शाश्वत विकास ध्येये (SDGs) ही 17 ध्येये, 169 लक्ष्ये आणि 306 राष्ट्रीय निर्देशकांची एक सार्वत्रिक सूची आहे, जे मानवी कल्याणासाठी 2030 सालापर्यंत कोणीही विकासाच्या दृष्टीने मागे राहणार नाही या उद्देशाने मोठ्या यशासाठी विकासात्मक कृतींचे नियोजन करण्यास आणि सुव्यवस्थित करण्यासाठी मदत करतात.

🔸सप्टेंबर 2015 मध्ये झालेल्या ऐतिहासिक संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेच्या शिखर परिषदेत 193 सदस्य राष्ट्रांनी अंगिकारलेल्या आणि दि. 1 जानेवारी 2016 रोजी लागू झालेल्या “ट्रान्सफॉर्मिंग अवर वर्ल्ड: द 2030 एजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट” या पुढाकाराचा हा एक भाग आहे.

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...