Sunday 31 January 2021

बांबर्डे येथील ‘मायरिस्टीका स्वम्प्स’ आता जैविक वारसा क्षेत्र


🔰सिंधुदुर्ग जिल्ह्यतील बांबर्डे येथील ‘मायरिस्टीका स्वम्प्स’ हे जैविक वारसा क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती वन मंत्री संजय राठोड यांनी दिली. ‘मायरिस्टीका स्वम्प्स’ या प्रजातीकरिता जैविक वारसा क्षेत्र घोषित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.


🔰बांबर्डे येथील ग्रामपंचायत हेवाळे हद्दीतील २.५९ हेक्टर क्षेत्र ‘मायरिस्टीका स्वम्प्स’जैविक विविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रामध्ये ‘मायरिस्टीका’ या दुर्मिळ प्रजाती वृक्ष असून स्थानिक लोक या वृक्ष प्रजातीला देवराई संबोधतात व अनेक पिढय़ांपासून या प्रजातीचे करत आहेत. निसर्गाच्या संवर्धनासाठी कार्यरत आंतरराष्ट्रीय संघटनेने (आययूसीएन-इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झरवेशन ऑफ नेचर) ‘मायरिस्टीका’ प्रजाती ही दुर्मिळ व नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या जैविक वारसा क्षेत्रास महत्त्व प्राप्त झाले आहे. या क्षेत्रामध्ये या वृक्षासह विविध वृक्ष व वन्यप्राणी यांचा वावर असून ‘मायरिस्टीका’ या वृक्ष प्रजातीचे संरक्षण व जतन होणे गरजेचे आहे. भविष्यात या प्रजातीवर संशोधन होवू शकेल. त्यासाठी हे क्षेत्र जैविक वारसा स्थळ घोषित करण्यात आले आहे. जैवविविधतेच्या संसाधनांचे संवर्धन व शाश्वत असा विकास घडवून आणणे व त्यातून मिळणाऱ्या अनुषंगिक फायद्यांचे न्याय्य व समान वाटप करणे हा जैवविविधता कायदा आणि नियमांचा मुख्य उद्देश आहे. त्या अनुषंगाने बांबर्डे येथील ‘मायरिस्टीका स्वम्प्स’ हे जैविक वारसा क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.


🔰राज्यातील चौथे जैविक वारसा क्षेत्र

शासनाने आतापर्यंत ग्लोरी अल्लापली, लांडोरखोरी जळगाव व गणेशखिंड पुणे हे क्षेत्र जैविक वारसा क्षेत्र म्हणून घोषित केले होते. जैविक विविधता वारसा स्थळ म्हणून घोषित होणारे बांबर्डे येथील ‘मायरिस्टीका स्वम्प्स’ हे राज्यातील चौथे स्थळ ठरले आहे.

आर्थिक सर्वेक्षण 2020-21



▪️कद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांनी 29 जानेवारी 2021 रोजी संसदेत ‘आर्थिक सर्वेक्षण 2020-21’ सादर केले. त्याचे ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:


▪️आर्थिक वर्ष 2021-22 यामध्ये भारताचा वास्तविक GDP 11 टक्क्यांनी वाढणार आणि सांकेतिक GDP दर 15.4 टक्क्यांनी वाढणार, असा अंदाज आहे.


▪️आर्थिक वर्ष 2020-21 यामध्ये भारताचा GDP वृद्धि दर उणे 7.7 टक्के राहणार, असा अंदाज आहे.


▪️आर्थिक वर्ष 2020-21 यामध्ये जोखीम न घेतल्यामुळे आणि कर्जाची मागणी घटल्यामुळे बँक कर्जात घट झाली.


▪️खाद्यपदार्थांच्या वाढलेल्या किंमतीमुळे वर्ष 2020 मध्ये महागाईचा दर चढा राहिला. मात्र डिसेंबर 2020 मध्ये महागाई दर रिझर्व्ह बॅंकेच्या 4+/-2 टक्क्यांच्या श्रेणीत घसरून 4.6 टक्के राहिला.


▪️बाह्य क्षेत्राने विकासाला आवश्यक पाठबळ दिले. वर्षाच्या पहिल्या सहामाहीत चालू खात्यात शिल्लक GDPच्या अंदाजे 3.1 टक्के होती.


▪️GDP गुणोत्तर म्हणून बाह्य कर्ज सप्टेंबर 2020च्या अखेरच्या तुलनेत 21.6 टक्क्यांपर्यंत वाढले. मार्च 2020 च्या शेवटी ते 20.6 टक्के होते.


▪️आर्थिक वर्ष 2020-21 यामध्ये भारत गुंतवणूकीचे प्राधान्य केंद्र म्हणून कायम राहिला. देशात निव्वळ FII (विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार) ओघ नोव्हेंबर 2020 मध्ये 9.8 अब्ज डॉलर या सार्वकालीन उच्चांकी स्तरावर पोहचला. वर्ष 2020 मध्ये उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये भारत एकमेव देश होता जिथे इक्विटी FPI ओघ आला.


▪️आर्थिक वर्ष 2020-21 च्या सहामाहीत सरकारी वापरामुळे आर्थिक वाढ 17 टक्क्यांनी होने अपेक्षित आहे.


▪️आर्थिक वर्ष 2020-21 यासाठी कृषी क्षेत्राचा विकास दर 3.4 टक्के राहणार असा अंदाज आहे.

आर्थिक वर्ष 2020-21 दरम्यान उद्योग आणि सेवा क्षेत्रात अनुक्रमे 9.6 टक्के व 8.8 टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज आहे.


▪️आर्थिक वर्ष 2021 याच्या पहिल्या सहामाहीत चालू खाते खाते अधिशेष एकूण देशांतर्गत उत्पादन (GDP) याच्या 3.1 टक्के आहे.


▪️भारतीय संदर्भात, विकासामुळे कर्जाच्या धारण क्षमतेस चालना मिळते, परंतु कर्ज स्थिरतेमुळे विकासाला गती मिळत नाही.


▪️सार्वजनिक आरोग्यावरील खर्च GDPच्या 1 टक्क्यांवरून 2.5 ते 3 टक्क्यांपर्यंत वाढत असताना, आरोग्य सेवांवरील सार्वजनिक खर्च 65 टक्क्यांवरून 35 टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे.


▪️एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत भारताची व्यापारी तूट 57.5 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी कमी झाली आहे.


▪️एप्रिल ते डिसेंबर 2020 मध्ये व्यापारी मालची निर्यात 15.7 टक्क्यांनी घटून 200.8 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी झाली आहे.


▪️सप्टेंबर 2020 अखेर भारताचे बाह्य कर्ज 556.2 अब्ज अमेरिकन डॉलर इतके होते.


▪️आतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याने 'विश्व सौर बँक' आणि 'एक सूर्य एक विश्व एक ग्रिड' असे दोन नवीन उपक्रम सुरू केले आहेत.


▪️2020-21 या आर्थिक वर्षादरम्यान (प्रथम आगाऊ अंदाज) कृषी (आणि सहाय्यक काम) क्षेत्राच्या स्थिर दरात 3.4 टक्के वाढ दिसून आली.


▪️पतप्रधान पीक विमा योजनेत वर्षाकाठी 5.5 कोटी शेतकर्‍यांच्या विम्यांचा समावेश करण्यात आला आहे.


▪️आर्थिक वर्ष 2020-21 याच्या पहिल्या सहामाहीत भारताच्या सेवा क्षेत्रात जवळपास 16 टक्के घट झाली.

शक्ती कायदा:-



● महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर जलद करवाई करता यावी आणि लवकरात लवकर गुन्हेगाराला शिक्षा देता यावी यासाठी महाराष्ट्र सरकार दोन कायदे करणार आहे.

● आंध्र प्रदेशच्या 'दिशा' कायद्याच्या धर्तीवर 'शक्ती' नावाचे हे दोन कायदे असतील. राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेलं हे विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडलं जाणार आहे.

● महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कारवाई करता यावी, यासाठी प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ (महाराष्ट्र अमेंडमेंट) ॲक्ट 2020 आणि स्पेशल कोर्ट ॲड मशिनरी फॉर इंप्लिमेंटेशन ऑफ महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ 2020 अशी दोन विधेयकं विधिमंडळासमोर मांडण्यात येणार आहेत.

● सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण अध्यक्षतेखाली यासाठी एक उपसमिती नेमण्यात आली होती. या समितीमध्ये अनिल देशमुख, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड या मंत्र्यांचा समावेश होता


● प्रस्तावित 'शक्ती' कायद्यानुसार :-


• महिला अत्याचारांच्या प्रकरणात 21 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल करुन खटला चालवून आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे. महिलांवरील अॅसिड हल्ले आणि बलात्कारासारखे गुन्हे अजामीनपात्र करण्यात येणार आहेत.


• इतकंच नाही तर महिलांचा जर ई-मेल, इलेक्ट्रॉनिक मीडियातून किंवा मेसेजद्वारे छळ करण्यात आला तसंच त्यांच्यावर जर कुणी आक्षेपार्ह कमेंट केली तर त्यासाठीही कडक शिक्षा होणार आहे.


• हे सगळे गुन्हे अजामीनपात्र असतील


• बलात्कार प्रकरणी, Rarest of rare प्रकरणात फाशीच्या शिक्षेचीही तरतूद ठेवण्यात आली आहे.


• आपल्याच ओळखीच्या व्यक्तीने बलात्कार केल्यास जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप आणि दंडाची तरतूद करण्यात आलीय.


• 16 वर्षांपेक्षा कमी असलेल्या मुलींवर अत्याचार झाल्यास गुन्हेगाराला मरेपर्यंत जन्मठेप होऊ शकते.


• सामूहिक बलात्कारप्रकरणी 20 वर्ष कठोर जमठेपेची तरतूद किंवा मरेपर्यंत जन्मठेप आणि 10 लाख रुपये दंड किंवा मृत्युदंडाची तरतूद असेल


• 12 वर्षाखालील मुलीवर अत्याचार झाल्यास मरेपर्यंत कठोर जन्मठेपेची शिक्षा आणि दहा लाख रुपये दंड


• महिलांवर पुन्हा पुन्हा अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा दिली जाऊ शकते.


• अॅसिड हल्ल्याप्रकरणी किमान 10 वर्षांची किंवा मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आणि पीडित व्यक्तीला दंडाची रक्कम द्यावी लागेल


• अॅसिड फेकण्याचा प्रयत्न केल्यास 10 ते 14 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो


• महिलेचा कोणत्याही पद्धतीने छळ केल्यास किमान 2 वर्ष तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंड होऊ शकतो


• सोशल मीडिया, मेल, मेसेज, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या माध्यमातून महिलांवर कमेंट करणे, धमकी देणे, चुकीची माहिती पसरवणे यासाठी पण शिक्षेची तरतूद या प्रस्तावित कायद्यांत करण्यात आलीये.


● याचबरोबर फौजदारी प्रक्रियेमध्येही या कायद्याअंतर्गत काही बदल सुचवले गेलेत.


•  तपासाचा कालावधी दोन महिन्यांवरून 15 दिवसांचा केला आहे.


•  खटला चालवण्याचा कालावधी दोन महिन्यांवरून 30 दिवसांचा केला गेलाय.


•  अपील करण्याचा कालावधी सहा महिन्यांवरून 45 दिवसांवर आणण्यात आलाय.


•प्रक्रियांमध्ये बदल करत असतानाच इतरही व्यवस्थांमध्ये म्हणजे न्यायालयीन, पोलीस आणि सामाजिक व्यवस्थांतही काही प्रस्ताव सूचवण्यात आलेत.


•  36 अनन्य विशेष न्यायालयं स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे.


•  प्रत्येक घटकामध्ये महिला आणि लहान मुलांवरील गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी जिल्हा अधीक्षक किंवा आयुक्तालयात विशेष पोलीस पथक, ज्यामध्ये किमान एका महिला अधिकाऱ्याचा समावेश असेल, असं नेमण्याचंही प्रस्तावित आहे.


• पीडितांना मदत आणि सहकार्य करण्यासाठी सेवाभावी संस्थांना अधिसूचित करण्याचाही प्रस्ताव आहे.

भारतीय संविधानाबद्दल 10 महत्वाच्या गोष्टी....



भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली.म्हणून जाणून घेऊयात संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी...


 १. २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो? 


२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती.


 २. संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?


- संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.


३. कसं लिहीलं गेलं संविधान?


-आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं. यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याी जबाबदारी त्यांना देण्यात आली. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.


४. संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते?


-२९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीनं आपल्या कामकाजास सुरुवात केली. जवाहरलाल नेहरू,अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला आहे.


 ५. संविधान सभचे अध्यक्ष कोण होते?


-९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती गठीत करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. पुढं ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले.


६. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?


-फाळणीनंतर संविधान सिमितीच्या संदस्यांची संख्या २९२ झाली. समितीच्या ११ बैठका झाल्या. त्या १६५ दिवस चालल्या. समितीच्या १९ उपसमित्या जलद कामकाजाच्या दृष्टीनं कार्यरत होत्या. त्यात मसुदा समिती होती. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. या मसुदा समितीच्या ४४ सभा झाल्या.


 ७. आपल्या संविधानात किती परिशिष्टे आहेत?


- भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.


 ८. भारतीय संविधान कधी लागू करण्यात आलं?


-२६ जानेवारी, १९५० रोजीच भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला.


 ९. संविधानात कोणाचं हस्तलेखन आहे?


- भारताचे संविधान बनून तयार होत होते. पण संविधान हे हस्तलिखीत असावं अशी नेहरुंची इच्छा होती. बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी ६ महिने लागले.


१०.संविधानाच्या पानांवर नक्षीकाम कोणी केलं?


-आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती. तसंच प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे.

महाराष्ट्रातील अभयारण्ये



नरनाळा – अकोला

टिपेश्वर -यवतमाळ

येडशी रामलिंग – उस्मानाबाद

अनेर – धुळे, नंदुरबार

अंधेरी – चंद्रपूर


औट्रमघाट – जळगांव

कर्नाळा – रायगड

कळसूबाई – अहमदनगर

काटेपूर्णा – अकोला

किनवट – नांदेड,यवतमाळ


कोयना – सातारा

कोळकाज – अमरावती

गौताळा औट्रमघाट – औरंगाबाद, जळगांव

चांदोली – सांगली, कोल्हापूर

चपराला – गडचिरोली


जायकवाडी – औरंगाबाद

ढाकणा कोळकाज – अमरावती

ताडोबा – चंद्रपूर

तानसा – ठाणे

देऊळगांव रेहेकुरी – अहमदनगर


नवेगांव – भंडारा

नागझिरा – भंडारा

नांदूर मध्यमेश्वर -नाशिक

नानज – सोलापूर

पेंच – नागपूर


पैनगंगा – यवतमाळ, नांदेड

फणसाड – रायगड

बोर – वर्धा

बोरीवली(संजय गांधी) – मुंबई

भिमाशंकर – पुणे, ठाणे

यशवंतराव चव्हाण: आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार



◾️आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 35 वी पुण्यतिथी.


◾️ महाराष्ट्रातील राजकारणाला सुयोग्य दिशा देण्याचे आणि समतोल व जातिभेदरहीत राजकारणाचा वारसा देण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे. 


◾️यशवंतरावांची ग्रंथसंपदा

आपले नवे मुंबई राज्य, ॠणानुबंध, कृष्णाकाठ, भूमिका, विदेश दर्शन, सह्याद्रीचे वारे, युगांतर.


◾️यशवंतरावांचे आयुष्य रेखाटणारी पुस्तके: आधुनिक महाराष्ट्र के शिल्पकार, आमचे नेते यशवंतराव, कृष्णाकाठचा माणूस, घडविले त्यांना माऊलीने, नवमहाराष्ट्राचे शिल्पकार, मुलांचे यशवंतराव चव्हाण, यशवंतराव : इतिहासाचे एक पान, यशवंतराव : एक इतिहास.


◾️यशवंतरावांचे आर्थिक विचार

यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्व इत्यादीशी निगडीत आहेत.


🔺यशवंतरावांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी


◾️ यशवंतरावांना भाषण, संगीत आणि भजन-कीर्तनाची आवड होती. त्यांनी अनेक वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिके पटकावली. 

◾️तयांनी सालसेत येथे सत्याग्रहात भाग घेतला होता. 


◾️ यरवडा तुरुंगात असताना आचार्य भागवत, एस.एम.जोशी यांच्याशी त्यांची ओळख झाली. तेथेच त्यांना राजकीय, सामाजिक प्रश्नांची जाणीव झाली.


◾️ 1930 साली महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केल्यानंतर त्यांनी त्यामध्ये भाग घेतला


◾️ 1932 साली त्यांना पहिला तुरुंगवास घडला. या कारावासात मार्क्सवादाशी विचारांशी त्यांचा परिचय होऊन काँग्रेसमधील रॉयपंथीय गटाशी त्यांचे संबंध वाढले.

◾️ दसऱ्या महायुद्धाच्या वेळी यशवंतराव चव्हाणांना रॉय यांनी घेतलेली युद्धविषयक भूमिका अमान्य झाली. 

◾️1942 साली छोडो भारत आंदोलनात ते सहभागी झाले


◾️1946 साली मुंबई प्रांताच्या विधिमंडळाच्या निवडणुकीत ते सातारा मतदार संघातून निवडून संसदीय चिटणीस झाले.


◾️1948 साली त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या चिटणीसपदावर नियुक्ती झाली.1952 ला ते स्थानिक स्वराज्य व पुरवठा खात्याचे मंत्री झाले


◾️1 नोव्हेंबर 1956 ला द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले व 1960 साली संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले.


◾️ 1962-66 या काळात ते भारताचे संरक्षणमंत्री, 1966-70 गृहमंत्री, 1970-74 पर्यंत अर्थमंत्री व 1974 साली परराष्ट्रमंत्री बनले.


◾️ यशवंतराव चव्हाण यांनी 25 नोव्हेंबर 1984 रोजी जगाचा निरोप घेतला.


संयुगाचे नाव रेणुसूत्रे Chemical Name



पाणी(हायड्रोजन ऑक्साइड) H2O Hydrogen Oxide


अमोनिआ NH3 Ammonia


हायड्रोक्लोरिक आम्ल HCl Hydrochloric Acid


सल्फ्युरिक आम्ल H2SO4 Sulphuric Acid


कार्बनडाय ऑक्साइड CO2 Carbon Dioxide


सोडिअम ब्रोमाइड NaBr Sodium Bromide


कॅल्शिअम ऑक्साइड CaO Calcium Oxide


मॅग्ननोशीअम वलोराइड MgCl2 Magnesium chloride


पोटॉशीअम नायट्रेट KNO3 Potassium Nitrate


पोटॉशीअम कार्बोनेट K2CO3 Potassium Carbonate


पोटॉशीअम क्लोराइड Kcl Potassium Chloride


अमोनिअम सल्फेट (NH4)2SO4 Ammonium Sulphate


सोडिअम फॉस्फेट Na3PO4 Sodium Phosphate


अॅल्युमिनिअम क्लोराइड AlCl3 Aluminium Chloride


अॅल्युमिनिअम हायड्रॉंक्साइड Al(OH)3 Aluminium Hydroxide


कॅल्शिअम कार्बोनेट CaCO3 Calcium Carbonate


अमोनिअम हायड्रॉंक्साइड NH4OH Ammonium Hydroxide


सोडिअम बायकार्बोनेट NaHCO3 Sodium Bicarbonate


हायड्रॉंब्रोमीक आम्ल HBr Hydrotropic Acid


नायट्रीक आम्ल HNO3 Nitric Acid


हायड्रोजन सल्फाइड H2S Hydrogen Sulphide


कार्बोनिक आम्ल H2CO3 Carbonic Acid


फॉस्पोरिक आम्ल H3PO4 Phosphoric Acid


सोडिअम हायड्रॉंक्साइड NaOH Sodium Hydroxide


पोटॉशीअम क्लोरेट KOH Potassium Chlorate


चुनखडी (शाहाबाद) CaCO3 Calcium Chlorate


पोटॉशीअम क्लोरेट KClO3 Potassium Chlorate


पोटॉशीअम परमँगनेट KMnO4 Potassium Permanganate


मॅगनीजडाय ऑक्साइड MnO2 Manganese dioxide


मॅग्नोशीअम ऑक्साइड MgO Magnesium Oxide


झिंक सल्फेट ZnSO4 Zinc Sulphate


झिंक क्लोराइड ZnCl2 Zinc Chloride

मिथेन CH4 Methane


सिल्व्हर नायट्रेट AgNO3 Silver Nitrate


सोडिअम नायट्रेट NaNO3 Sodium Nitrate


सोडिअम सल्फेट NaSO4 Sodium Sulphate


जिपसम (कॅल्शिअम सल्फेट) CaSO4 Gypsum (Calcium Sulphate)


इपसम(मॅग्नेशिअम सल्फेट) MgSO4

 Epsom (Magnesium Sulphate)


कॉपर सल्फेट (मोरचूद) CuSO4 Copper Sulphate


चुन्याची निवळी (कॅल्शिअम हायड्रॉंक्साइड) Ca(OH)2 Calcium Hydroxide


मीठ/ कॉमन सॉल्ट / सोडिअम क्लोराइड) NaCl Common Salt (Sodium Chloride)


सोडाअश/ सोडिअम कार्बोनेट Na2CO3 Sodium Carbonate

कोरोना काळात विविध राज्यांकडून अ‍ॅप्स लाँच करण्यात आली होती , त्यापैकी काही महत्त्वाची अ‍ॅप्स


◾️ आरोग्य सेतु : केंद्र सरकार

◾️ कोरोना कवच : केंद्र सरकार

◾️ टस्ट युवरसेल्फ गोवा : गोवा 

◾️टस्ट युवरसेल्फ पुद्दुचेरी : पुद्दुचेरी

◾️ कोविड-१९ क्वारंटाईन मॉनिटर : तमिळनाडू

◾️ कवारंटाईन वॉच : कर्नाटक 

◾️कोरोना वॉच : कर्नाटक 

◾️ कोवा पंजाब : पंजाब

◾️ जीओके डायरेक्ट : केरळ

◾️ महाकवच : महाराष्ट्र

◾️ कवच : छत्तीसगढ

◾️ कोविड केअर : अरुणाचल प्रदेश

◾️ जन सहायक : हरियाणा

◾️ दिल्ली कोरोना : दिल्ली 

◾️ आयुष कवच : उत्तर प्रदेश

◾️ जीवन सेवा : दिल्ली

भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प



🔶मचकुंदी प्रकल्प 

मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मिती.


🔶शरीशैलम प्रकल्प

आंध्र प्रदेश कृष्ण नदीवर मुख्य उद्देश वीजनिर्मिती.


🔶बियास प्रकल्प

पंजाब, हरियाना व राजस्थान यांचा संयुक्त प्रकल्प. यामध्ये बियास सतलज जोड कालवा व बियास नदीवरील पोंग येथील धरणाचा समावेश होतो.


🔶भाक्रा-नानगल

पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान व हरियाना यांचा संयुक्त प्रकल्प. सतलज नदीवर हिमाचल प्रदेशात ' भाक्रा व पंजाब मध्ये नानगल अशी दोन धरणे भारताची सर्वात मोठी बहुददेशीय योजना. भाक्रा हे देशातील सर्वात उंच धरण आहे. उंची २२६ मीटर.


🔶दामोदर खोरे योजना

पश्चिम बंगाल व विभाजनापूर्वी बिहारमधील संयुक्त प्रकल्प. जलसिंचन, वीजनिर्मिती, पूरनियंत्रण, इत्यादी, या प्रकल्पाचे व्यवस्थापन दामोदर खोरे महामंडळ तर्फे केले जाते. अमेरिकेतील प्रसिद्ध टेनेसी व्हाली च्या धर्तीवर रचना.


🔶फराक्का योजना 

हि योजना पश्चिम बंगालमध्ये राबविली जात असून या योजनाअंतर्गत गंगा नदीवर फराक्का येथे व भागीरथी नदीवर जांगीपूर येथे धरणे बांधली आहेत. हुगळी नदीचा प्रवाह कायम राखणे व कोलकाता बंदराची व्यवस्था राखणे हे या योजनेमागचे उद्देश आहेत.


🔶हिराकूड 

प्रकल्प ओरिसा राज्यात आहे. संबळपूरजवळ महानदीवर जगातील सर्वाधिक लांबीचे धरण बांधले जाते. धरणाची लांबी २५.४०  कि मी आहे.


🔶चबळ योजना

हि मध्य प्रदेश व राजस्थान ची संयुक्त योजना असून या योजनेंतर्गत चंबळ नदीवर रानाप्रतापसागर व जवाहरसागर कोटा दोन धरणे राजस्थान व गांधीसागर हे धरण मध्य प्रदेशात बांधले आहे. मुख्य उद्देश वीजनिर्मिती आहे.


🔶उकाई प्रकल्प

तापी नदीवरील गुजरात राज्यातील बहुद्देशीय प्रकल्प होय.


🔶कोसी प्रकल्प

विभाजनापूर्वी बिहार व नेपाळ सरकारची संयुक्त संस्था. गंडकी नदीवर वाल्मिकी नदीवर धरण.

२०१९ मधील प्रादेशिक पुरस्कार एकाच ठिकाणी



🔴 लता मंगेशकर पुरस्कार:-

🔰२०१९:- उषा खन्ना

🔰२०१८;-विजय पाटील (राम लक्ष्मण )

🔰२०१७:- पुष्पा पागधरे


🔴जनस्थान पुरस्कार:-

🔰२०१९;-वसंत डहाके.

🔰२०१७;- डॉ विजया राज्याध्यक्ष

🔰२०१५:- अरुण साधू


🔴राजश्री शाहू पुरस्कार:-

🔰२०१९:- अण्णा ह्जारे

🔰२०१८:- पुष्पा भावे

🔰२०१७ :- डॉ रघुनाथ माशेलकर


🔴 पण्यभूषण पुरस्कार :-

🔰२०१९:-डॉ. गो. ब देगलूरकर

🔰२०१८:- प्रभा अत्रे 

🔰२०१७ :-डॉ.के.एस.संचेती


🔴 जञानोबा -तुकाराम पुरस्कार :-

🔰२०१९:- म.रा.जोशी

🔰२०१८;-डॉ. किसन महाराज साखरे 

🔰२०१७ :-ह.भ.प.निवृती महाराज वक्ते

🔰२०१६:-डॉ. उषा माधव देशमुख


🔴 चतुरंग प्रतिष्ठान (जीवन गौरव पुरस्कार)

🔰२०१८ :-सुहास बाहुळकर

🔰२०१७ :- डॉ.गो.ब देगलूरकर

🔰२०१६ :- सदाशीव गोरसकर


🔴 यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान (राष्ट्रीय पुरस्कार )

🔰२०१८:- डॉ. रघुरामन राजन

🔰२०१७:- डॉ. मनमोहन शर्मा 

🔰२०१६:- नंदन निलकेणी


🔴 यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान (राज्यस्तरीय पुरस्कार)

🔰२०१९:- एन.डी. पाटील


🔴 कसुमाग्रजराष्ट्रीय साहित्य पुरस्कार:-

🔰२०१८:- वेद राही

🔰२०१७ :-प्रा.डॉ.एच.एस. शिवप्रकाश

🔰२०१६ :- विष्णू खरे


🔴 वही शांताराम जीवनगौरव पुरस्कार :-

🔰२०१९:- श्रीमती सुषमा शिरोमणी

🔰२०१८:- विजय चव्हाण

🔰२०१७ :- विक्रम गोखले


🔴वही शांताराम विशेष योगदान पुरस्कार :-

🔰२०१९:- भरत जाधव

🔰२०१८:- मृणाल कुलकर्णी 

🔰२०१७ :- अरुण नलावडे


🔴 राजकपूर जीवनगौरव पुरस्कार :-

🔰२०१९:- वामन भोसले

🔰२०१८:- श्याम बेनेगल

🔰२०१७ :-सायरा बानो


🔴राजकपूर विशेष योगदान पुरस्कार:-

🔰२०१९:- परेश रावल

🔰२०१८:- राजकुमार हिरानी 

🔰२०१७ :- जॅकी श्राॅप


🔴नटवर्य प्रभाकर पणशिकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार:-

🔰२०१८:- जयंत सावरकर

🔰२०१७ :-बाबा पार्सेकर

🔰२०१६:-लीलाधर कांबळी


🔴सगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार :-

🔰२०१८ :-विनायक थोरात 

🔰२०१७ :-निर्मला गोगटे

🔰२०१६:-चंद्रकांत उर्फ चंदू डेगवेकर


🔴विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार :-

🔰२०१८:- बशीर कमरुद्दिन मोमीन 

🔰२०१७:- मधुकर नेराळे

🔰२०१६  :- राधाबाई कारभरी खाडे(नाशिककर)


🔴 टिळक पुरस्कार (राष्ट्रीय पत्रकारीता):-

🔰२०१९:-संजय गुप्ता 

🔰२०१८:- सिद्धार्थ वरदराजन

🔰२०१७ :- के. सिवन


🔴लोकमान्य टिळक सन्मान:-

🔰२०१९:- बाबा कल्याणी

🔰२०१८:- डॉ. के. सिवन

🔰२०१७ :-आचार्य बाळकृष्ण


🔴लोकमान्य टिळक जीवन पत्रकारिता पुरस्कार (माहिती व जनसंपर्क महासंचांलनालय)

🔰२०१८:-पंढरीनाथ सावंत

🔰२०१७:-रमेश पतंगे ( दैनिक दिव्य मराठीचे स्तंभलेखक)

🔰२०१६:-विजय फणशीकर (दैनिक हितवादचे संपादक )

🔰२०१५:- उत्तम कांबळे


🔴वि.दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार :-

🔰२०१८:- महेश एल कुंजवार

🔰२०१७ :-मारुती चितमपल्ली


🔴 विष्णुदास भावे पुरस्कार:-

🔰२०१८ :- डॉ .मोहन आगाशे

🔰२०१७ :- मोहन जोशी

🔰२०१६ :- जयंत सावरकर


🔴 भीमसेन जोशी पुरस्कार :-

🔰२०१९;-अरविंद पारीख

🔰२०१८:- पंडीत केशव गिंडे

🔰२०१७ :- माणिक भिडे

🔰२०१६ :- बेगम परविन रुसताना


🔴 धन्वतरी पुरस्कार:-

🔰२०१८:- डॉ.सुल्तान प्रधान 

🔰२०१७ :- डॉ. नागेश्वर रेड्डी

🔰२०१६ :- सुधांशू भट्टाचार्य


🔴 नागभूषण पुरस्कार:-

🔰२०१८:- विजय बारसे

🔰२०१७:- शिरीष देव


🔴 चतुरंग जीवन गौरव पुरस्कार :-

🔰२०१९:-सय्यद भाई


🔴 तन्वीर सन्मान पुरस्कार 

🔰२०१९:- नसरूद्दीन शहा

महाराष्ट्र जिल्हावार-पर्वत, डोंगर, टेकड्या, डोंगररांगा


💢 जिल्हा ➡️➡️ पर्वत डोंगर टेकड्या डोंगररांगा 💢


🎇मबई मुंबई उपनगर - ⛰⛰पाली, अंटोप हिल, शिवडी,खंबाला, मलबार हिल.


🎇 रायगड - ⛰⛰रत्नागिरी,सिंधुदुर्ग,सह्यण्द्री,


🎇 धळे - ⛰⛰धानोरा, व गाळण्याचे डोंगर.


🎇नाशिक - ⛰⛰सह्यान्द्री, गाळणा, साल्हेर, मुल्हेर,वणी,चांदवड,सातमाळा,


🎇 पणे -⛰⛰ सह्यान्द्री,हरिश्चंद्र,शिंगी,तसुबाई,पुरंदर,ताम्हिनी,अंबाला,


🎇 सांगली -⛰⛰ आष्टा,होणाई,शुकाचार्य,कामलभैरव, बेलगबाद, आडवा,मुचींडी,दंडोबा.


🎇 सोलापूर -⛰⛰ महादेव,बालाघाट, शुकाचार्य,


🎇 जालना - ⛰⛰अजिंठ्याची रांग,जाबुवंत,


🎇 हिंगोली - ⛰⛰अजिंठ्याची रांग, हिंगोलीचे पठार.


🎇 लातूर - ⛰⛰बालाघाटचे डोंगर,


🎇 बीड -  ⛰⛰बालाघाटचे डोंगर


🎇 अकोला - ⛰⛰गाविलगड,अजिंठाचे


🎇 अमरावती -⛰⛰ सातपुडा, गाविलगडच्या रांगा,पोहऱ्याचे व चिरोडीचे डोंगर.


🎇 वर्धा - ⛰⛰रावनदेव, गरमासुर, मालेगाव, नांदगाव, ब्राह्मणगाव टेकड्या.


🎇 भडारा - ⛰⛰अबागडचे डोंगर, गायखुरी व भिमसेन टेकड्या,


🎇 चद्रपूर -⛰⛰ परजागड व चांदूरगडचे, चिमूर व मुल टेकड्या.


🎇 ठाणे -  ⛰⛰सह्यान्द्री


🎇 जळगाव -⛰⛰ सातपुडा, सातमाळा, अजिंठा, शिरसोली, हस्तीचे डोंगर.


🎇 नदुरबार -⛰⛰ सातपुडा व तोरणमाळचे डोंगर.


🎇 अहमदनगर -⛰⛰ सह्यान्द्री,कळसुबाई,अदुला,बाळेश्वर,हरिश्चंद्र डोंगर,


🎇 सातारा -⛰⛰ सह्यान्द्री,परळी,बनमौली,महादेव, यावतेश्वेर, मेंढोशी, आगाशिव, औध,


🎇 कोल्हापूर - ⛰⛰सह्यान्द्री, पन्हाळा, उत्त्तर व दक्षिण, दुधगंगा, चिकोडी रांग.


🎇 औरंगाबाद - ⛰⛰अजिंठा, सातमाळा, सुरपलायान,


🎇 परभणी - ⛰⛰उत्तरेस अजिंठ्याचे डोंगर, दक्षिणेस बालाघाट रांग.


🎇 नांदेड - ⛰⛰सातमाळा, निर्मल,मुदखेड,बलाघाटचे डोंगर,


🎇 उस्मानाबद -⛰⛰ बालाघाट, तुळजापूर, व नळदुर्ग डोंगर


🎇 यवतमाळ - ⛰⛰अजिंठ्याचे डोंगर व पुसदच्या टेकड्या.


🎇 बलढाणा - ⛰⛰अजिंठ्यचे डोंगर.


🎇वाशीम - ⛰⛰अजिंठ्याचे डोंगर


🎇 नागपूर - ⛰⛰सतपुड्याचे डोंगर, गरमसूर,महादागड, पिल्कापर टेकड्या,


🎇 गोदिया -⛰⛰ नवेगाव, प्रतापगड, चिंचगड, व दरकेसाचे डोंगर.


🎇 गडचिरोली -⛰⛰ चरोळी,टिपागड,सिर्कोडा,सुरजागड,भामरागड,चिकियाला डोंगर.

आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती...



🔶 मानवी डोक्याचे वजन ?

→   १४०० ग्रॅम.

 

🔶 सामान्य रक्तदाब ? 

→   १२०/८० मि. मी. पा-याची उंची. 


🔶 शरीरातील सर्वात मोठी पेशी ?

→   न्यूरॉन. 


🔶 लाल रक्त पेशींची संख्या ?

→   पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.

→   स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी. 


🔶 शरिरातील एकूण रक्त ? 

→   ५ ते ६ लीटर.

 

🔶सर्वात लहान हाड ? 

→   स्टेटस ( कानाचे हाड ) 


🔶 सर्वात मोठे हाड ?

→   फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड ) 


🔶 लाल रक्तपेशींचा जीवनकाळ ?

→   १२० दिवस. 


🔶 पांढरा-या रक्तपेशींचा संख्या ? 

→   ५००० ते १०००० प्रति घ. सेमी. 


🔶पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ ? 

→   २ ते ५ दिवस. 


🔶 रक्तातील प्लेटलेट्स माऊंट ?

→   २ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी. 


🔶हिमोग्लोबिनचे प्रमाण ?

→   पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी. 

→   स्त्रिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी. 


🔶 हरदयाचे सामान्य ठोके ? 

→   ७२ ते ७५ प्रति मिनिट. 


🔶 नाडी दर (पल्स रेट) ?

→   ७२ प्रतिमिनिट. 


🔶 सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी ?

→   थायरॉईड ग्रंथी. 


🔶 सर्वात मोठा स्नायू ?

→   ग्लुटियस म्याक्सीमस. 


🔶एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या ?

→   ६३९.


🔶 रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या ?

→   मोनोसाईटस - ३ ते ८%. 

→   बेसोफिल्स - ०.५%. 

→   लिम्फोसाईटस - २० ते २५%. 

→   न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%. 


🔶शरीराचे तापमान ? 

→   ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन. 


🔶परौढांमधील दातांची संख्या ?

→   ३२.


 🔶लहान मुलांमधील दातांची संख्या ?

→   २० दूधाचे दात. 


🔶 सर्वात पातळ त्वचा ? 

→   पापणी (कंजक्टायव्हा)

हायकोर्टाच्या पहिल्या महिला न्यायधीश : अॅना चंडी..


🔥अना चंडी केरळ राज्यात कायद्याची पदवी घेणाऱ्या पहिल्या मल्याळी महिला मानल्या जातात.


🔥सन 1959 मध्ये त्या केरळ हायकोर्टाच्या पहिल्या महिला न्यायधीश बनल्या.

स्त्रीवादी विचारांच्या अॅना चंडी यांनी महिलांच्या अधिकारांसाठीआवाज उठवला.

काही काम फक्त बायकांचीच आहेत या पारंपारिक विचारसरणीला बदलण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. 


🔥पत्नीच्या कमाईने पतीच्या आत्मसन्मानाला धक्का लागेल या विचारांचं त्यांनी खंडन केलं,

त्यांनी आपल्या 'श्रीमती' या मासिकाव्दारे महिलांसाठी आरक्षणाची

मागणी केली.


🔥करळात 1920-30 या काळात महिलांचं शिक्षण आणि आर्थिक अधिकार या विषयांवर काम होत होतं. पण अॅना यांनी महिलांचा आपल्या शरीरावर पूर्णतः अधिकार

असावा आणि महिलांना आपण कधी आई बनावं हे ठरवण्याचा अधिकार मिळावा अशी मागणी केली.

लोकपाल


🔰 पहिले लोकपाल:-पिनाकी चंद्र घोष


📚 गर न्यायिक सदस्य:- अर्चना रामसुंदर, दिनेश कुमार जैन, महेंद्रसिंग, इंद्रजित प्रसाद गौतम


📚 नयायिक सदस्य:- दिलीप भोसले, प्रदीप कुमार मोहंती, अजयकुमार त्रिपाठी, अभिलाषा कुमारी


✅ लोकपाल निवड समिती:-

1)पंतप्रधान

2)सरन्यायाधीश

3)लोकसभा अध्यक्ष

4)लोकसभा विरोधी पक्षनेते

5)कायदेतज्ज्ञ


✅ लोकपाल पात्रता


1)सर्वोच्च न्यायालयचे निवृत्त मुख्य सरन्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश

2)भ्रष्टाचार विरोधी धोरण,सार्वजनिक प्रशासन,दक्षता,विमा बँकिंग याबाबत किमान 25 वर्षे अनुभव


✅ अध्यक्ष अपात्रता


- 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेली व्यक्ती

- लाभाचे पद धारण करणारी व्यक्ती

- संसद व विधिमंडळ सदस्य

- अपराधी दोषी


✅ कार्यकाल


5 वर्ष किंवा वयाच्या 70 वर्ष पर्यंत जो अगोदर  संपेल तो

- पगार

अध्यक्षाला सरन्यायाधीश प्रमाणे

सदस्य ला न्यायाधीश प्रमाणे


✅ लोकपाल कायदा 2013


- राज्यसभा:-17 डिसेंबर 2013

- लोकसभा:-18 डिसेंबर 2013

- राष्ट्रपती:-1 जानेवारी 2014

- अंमल:-16 जानेवारी 2014


- रचना: 1 अध्यक्ष व जास्तीत जास्त 8 सदस्य

महानगरपालिका


ज्या मोठ्या शहराची लोकसंख्या तीन लाखांहून अधिक असते तेथील नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेचे रूपांतर यथावकाश महानगरपालिका या वरच्या दर्जाच्या संस्थेत केले जाते.

महानगरपालिकेला इंग्रजीत म्युनिसिपल कॉर्पोरेशन, मध्य प्रदेश राज्यात नगर पालिका निगम आणि अन्य हिदी भाषक राज्यांत नगर निगम म्हणतात. महानगरपालिका या लांबलचक शब्दाऐवजी मराठीत या संस्थेचा उल्लेख महापालिका या सुटसुटीत नावाने होतो. इ.स. २०१६पर्यंत, महाराष्ट्रातील खालील शहरांत महानगरपालिका अस्तित्वात आल्या आहेत :-


🔰 महाराष्ट्रातील २७ महानगरपालिका 🔰


▪️--अकोला महानगरपालिका

▪️--अमरावती महानगरपालिका

▪️--अहमदनगर महानगरपालिका

▪️--उल्हासनगर महानगरपालिका

▪️--औरंगाबाद महानगरपालिका

▪️--कल्याण-डोंबिवली महानगरपालिका

▪️--कोल्हापूर महानगरपालिका

▪️--चंद्रपूर महानगरपालिका

▪️--जळगाव महानगरपालिका

▪️--ठाणे महानगरपालिका

▪️--धुळे महानगरपालिका

▪️--नवी मुंबई महानगरपालिका

▪️--नागपूर महानगरपालिका

▪️--नांदेड-वाघला महानगरपालिका

▪️--नाशिक महानगरपालिका

▪️--पनवेल महानगरपालिका

▪️--परभणी महानगरपालिका

▪️--पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

▪️--पुणे महानगरपालिका

▪️--भिवंडी-निजामपूर महानगरपालिका

▪️--मालेगाव महानगरपालिका

▪️--मीरा-भायंदर महानगरपालिका

▪️--बृहन्मुंबई महानगरपालिका

▪️--लातूर महानगरपालिका

▪️--वसई-विरार महानगरपालिका

▪️--सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका

▪️--सोलापूर महानगरपालिका

जगातील खनिज संपत्ती व उत्पादन करणार्‍या देशांबद्दल माहिती

🔴  खनिज संपत्ती उत्पादन करणारे देश


✔️कोळसा दगडी(उत्पादन):- चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन


✔️ कोळसा दगडी(वापर करणारे):- चीन, अमेरिका, भारत, रशिया.


✔️अभ्रक:- भारत, द.आफ्रिका, घाना.


✔️ क्रोमियस:-द.आफ्रिका, रशिया, र्होडेशिया, फिलिपाईन्स.


✔️जस्त:- अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पेरु.


✔️टिन:- मलेशिया, जर्मनी, चीन, बोलीव्हीया, रशिया, बेल्जियम.


✔️टंगस्टन:- चीन, द.कोरिया, रशिया.


✔️तांबे:- अमेरिका, झाम्बिया, चिली, झाईरे, भारत.


✔️तेल, खनिज:- रशिया, कुवेत, अमेरिका, इरान, सौदी अरेबिया, इराक, कतार.


✔️निकेल:- कॅनडा, अमेरिका, न्यू कॅलिडोंनिया.


✔️बॉक्साईट:- ऑस्ट्रेलिया, जमैका, गिनी, फ्रांस, भारत.


✔️सोने:- द.आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.


✔️युरेनियम:- द.आफ्रिका, झायरे, कॅनडा, भारत.


✔️पारा:- इटली, स्पेन, अमेरिका.


✔️मंगल (मॅगनीज):- रशिया, द.आफ्रिका, ब्राझिल.


✔️ लोहखनिज(साठे):- अमेरिका, कॅनडा, ब्राझिल, भारत, रशिया.


✔️लोहखनिज (उत्पादन):- रशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका.


✔️ शिसे:- ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, स्पेन, रशिया.

एकूण २२ भाग आणि १२ परिशिष्टे

● भाग I  कलम १ ते ४ संघराज्य व त्यांचे राज्य क्षेत्र ●


भाग II कलम ५ ते ११  नागरिकत्व 


भाग III कलम १२ ते ३५ मूलभूत अधिकार 


भाग IV कलम ३६ ते ५१ राज्याचे मार्गदर्शक तत्वे 


भाग IVA कलम ५१ A मूलभूत कर्त्यव्ये

भाग V कलम ५२ ते १५१ केंद्र सरकार (संघराज्य)


भाग VI कलम १५२ ते २३७ राज्य सरकार 


भाग VII 7 वी घटनादुरुस्ती रद्द


भाग VIII कलम२३९-२४२ केंद्रशासित प्रदेश क्षेत्र


भाग IX कलम २४३-२४३O पंचायतराज 

– ग्रामपंचायत , पंचायत समिती , जिल्हा परिषद


– नगर पंचायत 

भाग IX A कलम २४३P – २४३ZG  नगरपालिका


भाग IX B  कलम ZH – कलम ZT  सहकारी संस्था


भाग X  कलम २४४-२४४A  अनुसूचित जाती व जमातीप्रदेश /क्षेत्र, आदिवासी क्षेञ


 भाग XI  कलम २४५ – २६३  केंद्र – राज्य संबंध 


 भाग XII  कलम २६४-३००A  महसुल – वित्त, मालमत्ता, करार व फिर्याद


 भाग XIII  कलम ३०१-३०७  व्यापार, वाणिज्य आणि आंतरराज्य संबंध


 भाग XIV  कलम ३०८-३२३  केंद्र आणि राज्यांतर्गत सेवा, प्रशासकीय लोकसेवा आयोग


 भाग XIV A  कलम ३२३A, ३२३B  न्यायाधिकरण


 भाग XV  कलम ३२४-३२९A  निवडणूक आयोग


 भाग XVI कलम ३३०-३४२   अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय साठी आणि अँग्लो इंडियन्स साठी विशेष सोयी


 भाग XVII   कलम ३४३-३५१  कार्यालयीन भाषा


 भाग XVIIII  कलम ३५२-३६०  आणीबाणी विषयक तरतुदी


 भाग XIX  कलम ३६१-३६७  संकीर्ण


 भाग XX  कलम ३६८ संविधान दुरुस्ती बाबत 


 भाग XXI  कलम ३६९-३९२  अस्थायी, संक्रमाणि आणि विशेष तरतुदी


 भाग XXII  कलम ३९३-३९५  संक्षिप्त रूपे, प्रारंभ आणि 

बीबी का मकबरा

◾️हा मोगल सम्राट औरंगजेबचा मुलगा, आजम शहा याने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे. 


◾️औरंगाबाद येथे बांधलेल्या एका भव्य महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानी (दिलरास बानो बेगम) हिची कबर आहे.


◾️ बीबी का मकबरा यास सन्मानाने मराठवाड्याचा ताजमहाल म्हणतात.


◾️आजम शाहने 1679  मध्ये बांधला. हा लाल आणि काळ्या दगडांबरोबर, संगमरवर आणि काही पांढऱ्या मातीपासून बनविलेला आहे. या मिश्रणास स्टको प्लॅस्टर (Stucco Plaster) असे म्हणतात.


◾️मधोमध बेगम राबियाची कबर आहे. कबरीच्या चारही बाजूने संगमरवरी जाळ्या बसवल्या आहेत. त्या कबरीवर छतांच्या खिडक्यांतून दिवसा सूर्याची किरणे आणि रात्री चंद्र प्रकाश पडेल, अशी रचना केली आहे मकबऱ्याच्या घुमटाला संगमरवरी दगड वापरला आहे.


◾️राबिया दुर्रानीची कबर 28 नोव्हेंबर 1951 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली


(बांधकामाच्या तारखेबद्दल संभ्रम आहे)

साक्षरतेमध्ये केरळचा पहिला नंबर तर महाराष्ट्र सहाव्या स्थानी

✔️ देशात साक्षरतेमध्ये केरळने पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. तर आंध्र प्रदेश हे राज्य देशात साक्षरतेमध्ये सर्वात पिछाडीवर आहे.


✔️आंध्र प्रदेशात साक्षरतेचे प्रमाण 66.4 टक्के आहे. बिहारपेक्षाही आंध्र प्रदेश साक्षरतेमध्ये मागे आहे. बिहारमध्ये साक्षरतेचे प्रमाण 70.9 टक्के आहे.


🔰आकडेवारी काय सांगते?


✔️ नशनल स्टॅटिस्टिकल ऑफीसने शिक्षणासंदर्भातील रिपोर्ट जाहीर केला. त्यातून ही माहिती समोर आली आहे. 


✔️साक्षर राज्यांमध्ये महाराष्ट्र सहाव्या स्थानावर आहे. महाराष्ट्रात एकूण साक्षरतेचे प्रमाण 84.8 टक्के आहे. 


✔️ परुष आणि महिला साक्षरतेच्या प्रमाणात तब्बल 12.3 टक्क्यांचे अंतर आहे. पुरुष 90.4 टक्के तर महिला 78.4 टक्के साक्षर महिला आहेत. 


✔️ पहिल्या पाच सर्वाधिक साक्षर राज्यांमध्ये केरळ, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि आसाम या राज्यांचा नंबर लागतो.


✔️ दरम्यान, साक्षरतेचे प्रमाण कमी असलेल्या शेवटच्या पाच राज्यांमध्ये उत्तर प्रदेश,तेलंगण, बिहार, राजस्थान आणि आंध्र प्रदेश ही राज्ये आहेत.

विविध योजना -

1) प्रधानमंत्री जन-धन योजना — 28 ऑगस्ट 2014

2) मेक इन इंडिया — 25 सप्टेंबर 2014

3) स्वच्छ भारत मिशन — 2 ओक्टोबर 2014

4) संसद आदर्श ग्राम योजना — 11 ऑक्टोबर 2014

5) श्रमेव जयते — 16 ऑक्टोबर 2014 

6) जीवन प्रमाण पत्र योजना — 10 नोव्हेंबर 2014

7) मिशन इंद्रधनुश — 25 डिसेंबर 2014

8) नीती आयोग ची सुरूवात — 1 जानेवारी 2015

9) पहल  योजना — 1 जानेवारी 2015 

10) बेटी बचाओ , बेटी पाढाओ योजना — 22 जानेवारी 2015

11) सुकन्या समृद्धी योजना — 22 जानेवारी 2015 

12) मृदा स्वास्थ्य कार्ड — 19 फेब्रुवारी 2015 

13) प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना — 20 फेब्रुवारी 2015 

14) प्रधानमंत्री जीवन ज्योती याजना — 9 मे 2015

15) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना — 9 मे 2015

16) अटल पेन्शन योजना — 9 मे 2015

17) उस्ताद योजना — मे 2015

18) कायाकल्प योजना — मे 2015

19) D D किसान वाहिनी — मे 2015

20) डिजिटल इंडिया — 1 जुलै 2015

पक्षांतरबंदी कायदा

◾️ ५२व्या घटनादुरुस्तीअन्वये इ.स. १९८५ साली पक्षांतरबंदी कायदा करण्यात आला. 


◾️यामध्ये लोकसभा व राज्य विधीमंडळातील सदस्यांना पक्षांतराच्या आधारे अपात्र ठरविण्याची तरतूद करण्यात आली आहे. 


◾️तसेच यासंदर्भात विस्तृत असे १०वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले आहे. 


◾️पक्षांतरबंदी कायद्याचा प्रमुख हेतू पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सदस्याने पक्षातच राहिले पाहिजे आणि पक्षाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे हा होता.


◾️या कायद्यान्वये एखाद्या सभागृहाच्या स्वतंत्र निवडून आलेल्या सदस्याने जर अशा निवडणुकीनंतर कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो गृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो. 


◾️तसेच सभागृहात पदग्रहण केल्यानंतर सहा महिन्यंच्या कालावधीनंतर जर नामनिर्देशित सदस्याने कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो त्या सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो.


◾️ तया सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार सभागृहाचा अध्यक्ष/सभापती यांना आहे. 


‼️ पण २/३ पेक्षा जास्त सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही.

महाराष्ट्रातील पर्वत शिखरे

📌 महाराष्ट्र पठार निर्मिती ही   🌋जवालामुखीच्या  उद्रेकामुळे झालीआहे


📌 गरम पाण्याचे झरे हे ज्वालामुखी उद्रेकाचे पुरावे देतात


📌 यातूनच सहयाद्री पर्वतरांग तयार झाली जी प्रमुख पश्चिम वाहिनी आणि पुर्व वहिनी नद्यांची जलविभाजक बनली.


📌 महाराष्ट्र मध्ये सह्याद्री ची उंची ही उत्तरे कडून दक्षिणेकडे कमी कामी होत जाते


🔰 महाराष्ट्रातील प्रमुख पर्वत शिखरे 🔰


  🎇 कळसुबाई  1,646 मी अहमदनगर


  🎇 साल्हेर 1,567 मी नाशिक


  🎇 महाबळेश्वर 1,438 मी सातारा


  🎇 हरिश्चंद्रगड 1,424 मी अहमदनगर

  

  🎇 सप्तश्रृंगी 1,416 मी नंदुरबार


  🎇 तोरणा 1,404 मी पुणे 


  Trick 👇👇

🏆 कसा मी हसतो अत्रे तिला विचारतो 🏆


  🌸 क  = कळसुबाई

  🌸 सा  = साल्हेर

  🌸 मी  = महाबळेश्वर

  🌸 हा   = हरिश्चंद्रगड

  🌸 स   =सप्तश्रृंगी

  🌸 तो   = तोरणा

  🌸 अ  =  अस्तंभा

  🌸  तर  =  त्र्यंबकेश्वर

  🌸 तिला =  तौला

  🌸 वि    = विराट

  🌸 चा    = चिखलदरा

जाणून घ्या देशातील 10 अस्वच्छ शहरे

नागरी स्वच्छता अभियानातील कामगिरीत सातत्य राखत महाराष्ट्राने या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये देशात सर्वाधिक चार, तर अन्य विभागांतील 13 असे एकूण 17 पुरस्कार मिळवून ‘हॅट्ट्रिक’ साधली आहे. 


तर दुसरीकडे सर्वाधिक अस्वच्छ शहरांच्या यादीत अव्वल दहापैकी सहा शहरे बिहारमधील असल्याची माहिती समोर आली आहे. 


🛑 10 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या सर्वात अस्वच्छ शहरांची यादी


🔟 अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये दहाव्या स्थानी आहे बिहारमधील साहारसा हे शहर.


9️⃣ बिहारमधीलच बिहार शरीफ शहर नवव्या स्थानी आहे. 


8️⃣ आठव्या स्थानी आहे नागालँण्डमधील दिमापूर एमसी हे शहर. 


7️⃣ अरुणाचल प्रदेशमधील इटानगर हे या यादीमध्ये सातव्या स्थानी आहे. 


6️⃣ मघालयमधील शिलाँग शहर अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये सहाव्या स्थानी आहे. 


5️⃣ अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये पाचव्या स्थानी आहे परसा बाजार. हे शहर बिहारमध्ये आहे.


4️⃣ चौथ्या स्थानी बिहारमधील भागलपूर शहर आहे.


3️⃣ तिसऱ्या स्थानी पंजाबमधील अबोहार शहर आहे. 


2️⃣ दसऱ्या स्थानी बिहारमधील बक्सर शहर आहे.


1️⃣ सर्वात अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये बिहारमधील गया शहर अव्वल स्थानी आहे.


✅ विशेष : अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये अव्वल दहामध्ये महाराष्ट्रातील एकही शहर नाही आहे.

विभक्ती

नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रीयापादशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात. त्यांना विभक्ती म्हणतात.


वाक्यातील एकमेकांशी असलेले संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या विकारांना विभक्ती म्हणतात. 

शब्दांना जी अक्षरे जोडली जातात, त्यांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात.

जी काही क्रिया घडलेली असते, ती सांगितलेली असते. म्हणून वाक्यातील क्रियापद सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यपद मानले जाते. त्या मानाने इतर पदे 


असतात. यावरून विभक्ती व विभक्तीचे अर्थ याबद्दल साधारणपणे असे म्हणतात.


विभक्त्यार्थ दोन प्रकार 


१) कारकार्थ - कारक व कारकार्थ

२) उपपदार्थ - कर्ता, करण, कर्म


विभक्तीची आठ नावे


१) प्रथमा 

२) द्वितीया 

३) तृतीया 

४) चतुर्थी  

५) पंचमी 

६) षष्ठी 

७) सप्तमी  

८)  संबोधन 


विभक्तीतीचे प्रत्यय - नी, ट, चा


विभक्ती  -  (एकवचन)  -  (अनेकवचन)


१) प्रथमा  -  प्रत्यय नाही  -  प्रत्यय नाही       

२) द्वितीया  -  स, ला, ते  -  स, ला, ना, ते    

३) तृतीया  -  ने, ए, शी  -  नी, शी, ही     

४) चतुर्थी  -  स, ला, ते  -  स, ला, ना, ते     

५) पंचमी  -  ऊन, हून  -  ऊन, हून     

६) षष्ठी  -  चा, ची, चे  -  चे, च्या, ची   

७) सप्तमी  -  त, ई, आ  -  त, ई, आ   

८) संबोधन  -  प्रत्यय नाही  -  नो


विभक्तीतील रूपे


विभक्ती  -  (एकवचन)  -  (अनेकवचन)


१) प्रथमा -  फूल  -  फुले 

२) द्वितीया  -  फुलास, दुलाला  -  फुलांस, फुलांना

३) तृतीया  -  फुलाने, फुलाशी  -  फुलांनी, फुलांशी

४) चतुर्थी  -  फुलास, फुलाला  -  फुलांस, फुलांना

५) पंचमी  -  फुलातून, फुलाहून  -  फुलांतून, फुलांहून

६) षष्ठी  -  फुलाचा, फुलाची, फुलाचे  -  फुलांचा, फुलांची, फुलांचे

७) सप्तमी  -  फुलात  -  फुलांत

८) संबोधन  -  फुला  -  फुलांनी


भारतीयांकडून प्रभावी हायड्रोजन उत्क्रांतीसाठी कार्यक्षम व स्वस्त असे उत्प्रेरक विकसित.

🔰बगळुरू येथील सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्सेस (CENS) या केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागांतर्गत असलेल्या स्वायत्त संस्थेच्या संशोधकांनी ‘पॅलाडिअम Pd(II)’ आयन-युक्त नव्या प्रकारचे कॉर्डिनेशन पॉलिमर (COP) संश्लेषित केला आहे, जो H-अ‍ॅडसॉरप्शन आणि बेनेझ टेट्रामाईन (BTA) यांच्या सक्रीय स्थळांचा स्रोत म्हणून कार्य करतो. 


🔰दोन्ही मिळून द्वीमितीय (2D) Pd(BTA) पत्र्याच्या माध्यमातून H-बंध परस्परसंवाद निर्माण करतात. संशोधकांनी द्वीमितीय 2D Pd(BTA) पत्रा देखील तयार केला आहे.


🔰हायड्रोजन (H2) इव्होल्यूशन रिअॅक्शन (HER) यासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रो उत्प्रेरकाची कार्यक्षमता मुख्यत्वे त्याचा टिकाऊपणा, इलेक्ट्रोकेमिकल अभिक्रियेची क्षमता कमीतकमी करण्यावर आणि संश्लेषण (उत्पादन) याच्या किंमतीवर अवलंबून असते. 


🔰उद्योगांमध्ये वापरण्यात येणारे प्लॅटीनम (Pt) / कार्बन (C) कार्यक्षम उत्प्रेरक आहेत, परंतु ते किंमतीत महाग आहेत आणि दीर्घकाळ वापरल्यास मेटल आयनवर काम करीत नाहीत. त्यातच पृथ्वीवर प्लॅटीनम धातूचे साठे अल्प आहेत.


🔴या शोधाचे महत्व...


🔰हवामानातले बदल यांच्या विरोधात असलेल्या लढ्यासाठी जीवाश्म इंधनांऐवजी पुढील पिढीचे कमी कार्बनयुक्त इंधन म्हणून हायड्रोजन ओळखले जाते. इंधन म्हणून हायड्रोजनच्या वापराचे भवितव्य हायड्रोजन तयार करण्यासाठी पाण्याचे इलेक्ट्रोकेमिकल विभाजन सुलभ करण्यासाठी लागणाऱ्या कार्यक्षम इलेक्ट्रोकॅटिलिस्टच्या रचनेमध्ये आहे.


🔰हायड्रोजन तयार करण्यासाठी पाण्याचे विभाजन करण्याचे कार्यक्षम साधन विकसित करणे हा या शोधामागचा हेतु आहे.

अशुद्ध शब्द - शुद्ध शब्द

1) चाह - चहा 

2) छपर - छप्पर 

3) जागार - जागर 

4) जागर्त - जागृत 

5) ज्यादुगार - जादूगार 

6) जीज्ञासू - जिज्ञासू 

7) ज्योस्त्ना - ज्योत्स्ना 

8) तिर्थरूप - तीर्थरूप 

9) त्रीभूवन - त्रिभुवन 

10) ततसम - तत्सम 

11) जागतीक - जागतिक 

12) हूंकार - हुंकार 

13) हिंदू - हिंदु 

14) हारजित - हारजीत

15) तरून - तरुण 

16) तांत्रीक - तांत्रिक 

17) तरका - तारका 

18) बंकेश्वर - त्र्यंबकेश्वर 

19) थाठ - थाट 

20) थेरला - थोरला 

21) दिर्घ - दीर्घ 

22) दाण - दान 

23) दागीना - दागिना 

24) दक्षीणा - दक्षिणा 

25) दूसरा - दुसरा 

26) दिलगीरी - दिलगिरी 

27) दरारोज - दररोज 

28) दिर्घोद्योग - दीर्घोदयोग 

29) दत्पर - दप्तर 

30) धिकार - धिक्कार 

31) धण - धन 

32) धनूष्य - धनुष्य 

33) धुर्त - धूर्त 

34) धोपटर्माग - धोपटमार्ग 

35) ध्यानधारना - ध्यानधारणा 

36) धारीष्ट - धारिष्ट 

37) नोर्झर - निर्झर

38) नीष्कारण - निष्कारण

39) नियूक्त - नियुक्त

T20 World Cup 2021 चे यजमानपद भारताकडेच

🔰T20 World Cup 2021 चे यजमानपद भारताकडेच राहणार असल्याची माहिती मिळत आहे. पुढील दोन वर्षांत होणाऱ्या दोन ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धाच्या आयोजनाविषयीचा निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्यकारी मंडळाची शुक्रवारी बैठक झाली.


🔰वहिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत २०२१ आणि २०२२च्या टी-२० विश्वचषकाच्या यजमानपदाबद्दल निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २०२१चा टी-२० विश्वचषक भारतातच होणार असून २०२२चा टी-२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येणार असल्याचे वृत्त टाईम्सनाऊने दिले आहे. याशिवाय २०२१मध्ये न्यूझीलंडमध्ये होणारा महिला वन डे विश्वचषकदेखील पुढे ढकलण्यात आला आहे.


🔰महिलांचा २०२१ एकदिवसीय विश्वचषक तसेच पुरुषांचे पुढील दोन टी-२० विश्वचषक यांच्या आयोजनाविषयी या बैठकीत चर्चा झाली. ऑस्ट्रेलियातील ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२०मध्ये होणारा टी-२० विश्वचषक पुढे ढकलण्यात आल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया २०२१च्या यजमानपदासाठी आग्रही होते. त्यामुळे भारताला २०२१ऐवजी २०२२च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळू शकते असे बोलले जात होते. पण अखेर २०२१च्या टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भारताकडेच कायम असून २०२२चा टी-२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येणार आहे.

खाडी

🟢 नदी जेथे समुद्राला जाऊन मिळते, तेथील पाण्याच्या साठ्याला खाडी असे म्हणतात. 


🟢 भरतीचे पाणी नदीच्या मुखामध्ये जिथपर्यंत येते त्या भागास “खाडी”असे म्हणतात. कोकणचा किनारा अनेक खाड्यांनी बनलेला आहे.


▪️कधीकधी किनाऱ्याचा सखल भूभाग खचून किंवा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यानेसुद्धा समुद्री खाडी तयार होते. 


▪️खाडी जर बऱ्यापैकी मोठी असेल तर तिला आखात म्हणतात.


▪️बगालचा उपसागर हा देखील एका अखाताचाच प्रकार आहे.


▪️महाराष्ट्राच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्याला अशा अनेक खाड्या आहेत. तिथली बहुतेक बंदरे खाडीच्या आश्रयाने बनली आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


🛑 खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडील क्रम खालीलप्रमाणे आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


१) डहाणूची खाडी, जि. ठाणे


२) दातीवऱ्याची खाडी, जि. ठाणे


३) वसईची खाडी, जि. ठाणे


४) धरमतरची खाडी, जि. रायगड


५) रोह्याची खाडी, जि. रायगड


६) राजापुरीची खाडी, जि. रत्नागिरी


७) बाणकोटची खाडी, जि. रत्नागिरी


८) दाभोळची खाडी, जि. रत्नागिरी


९) जयगड, जि. रत्नागिरी


१०)विजयदुर्ग, जि. सिंधुदूर्ग


११)तेरेखोलची खाडी, सिंधुदूर्ग


ओझोन चे संरक्षण कवच

🔰 वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो. 


🔰ओझोन  वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे  सजीवांसाठी फार महत्त्वाचे आहे. 


🔰सर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. ही 

किरणे ओझोन वायू शोषून घेतो. त्यामुळे पृथ्वीवरील  सजीवांचे रक्षण होते. 


🔰वातानुकूलन यंत्रे, रेफ्रिजरेटर्स यांमध्ये हवा थंड  करण्यासाठी वापरला जाणारे 

📌 कलोरोफ्लुरोकार्बन्स तसेच  

📌 कार्बन टेट्राक्लोराईड हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यास  ओझोनच्या थराचा नाश होतो.  


🔰ओझोनचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे यासाठी  १६ सप्टेंबर हा दिवस जगभर ‘ओझोन संरक्षण दिन’  म्हणून मानला जातो.

प्रश्नमंजुषा

Q.1..... बँक राष्ट्रीयीकरण दिवस म्हणून ओळखला जातो.

1 १९ जुलै √√√√

2 ३१ आॅक्टोबर

3  २३ एप्रिल

4 १ व ३


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.2 NRHM ची सुरुवात .......या वर्षी करण्यात आली.

1  २००७

2  २००४

3  २००५√√√√√√

4  २०१३


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.3  भारतातील बेकारीसाठी खालीलपैकी कोणते कारण महत्त्वाचे नाही 

1  कामगारांची वाढती संख्या

2  अयोग्य तंत्रज्ञान 

3  प्रभावी मागणीची      

कमतरता 

4  कामगारांसाठी संरक्षित कायदा√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.4...... मध्ये सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न गणना करण्यात आली?

1  १९४८-४९

2  १९३१-३२√√√√

3  १९११-१२

4  १८६७-६८


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.5  खालीलपैकी कोणती घटना पंचवार्षिक योजना चालु असताना घडली नाही?

1   चलन निश्चलीकरन 

2   रुपयाचे अवमूल्यन√√√√

3   १ व २  दोन्ही घडले 

4  १ व २ दोन्ही घडले नाही


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.6  रिझर्व्ह बँकेच्या पत नियंत्रणाचे दैनंदीन वापराचे साधन कोणते?

1   बँकदर

2  रोख राखीव प्रमाण

3  वैधानिक रोखता प्रमाण

4  रेपो आणि रेव्हर्स रेपो व्यवहार√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.7  खाद्याबाबतच्या आवडी व अग्रक्रम स्थिर असताना उत्पन्न वाढत असताना अन्नावरील प्रत्यक्ष खर्च जरी वाढत असला तरी उत्पन्नापैकी अन्नावर केलेल्या खर्चाचे प्रमाण कमी होते हे सांगणारा नियम म्हणजे......... होय.

1  "से" चा बाजार विषयक नियम

2  उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम

3  एंजल चा नियम√√√√√

4  फिलिप्स वक्ररेषा


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.8  १८६७ मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न.... तर दरडोई उत्पन्न..... इतके होते.

1  २० कोटी व ३४० रुपये वार्षिक

2  २४० कोटी व २० रुपये वार्षिक

3  ३४० कोटी व २० रुपये वार्षिक √√√√√√

4  ३४० कोटी वार्षिक व २०  रुपये मासिक


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.9 पहिल्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी....... मध्ये वाढ झाली नाही?

1  अन्नधान्य उत्पादन

2  राष्ट्रीय उत्पन्न 

3  दरडोई उत्पन्न

4  किमतीचा निर्देशांक√√√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.10  भारत निर्माण योजनेमध्ये पुढील पैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही?

अ. ग्रामीण शिक्षण

ब. ग्रामीण आरोग्य

क. ग्रामीण पाणीपुरवठा

ड. ग्रामीण रस्ते

1   अ आणि ब  √√√√√

2   ब आणि क

3   क आणि ड

4  अ आणि ड


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.11  खालीलपैकी कोणते घटक १९६६-१९६९ दरम्यान भारतातील नियोजन खंडित होण्यास कारणीभूत होते? 

1  चीन -भारत युध्द

2  भारत पाकिस्तान संघर्ष 

3  आर्थिक मंदी

4  राजकीय अस्थिरता √√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.12  तीव्र मंदी दूर करण्यासाठी सरकारने मुद्दाम घडवून आणलेली तेजीची/ चलन वाढची परिस्थिती म्हणजे ....... होय.

1  मुद्रा अवपात

2  मुद्रा संस्फीती√√√√√

3  स्टगफ्लेशन

4  स्टगनेशन


📖📖📖📖📖📖📖📖📖


[Q.13  भारत सर्वाधिक निर्यात कोणत्या राष्ट्राला करतो?

1  यु एस ए √√√√√√  

2  यु के  

3  चीन   

4  सिंगापूर


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.14 १९६९ च्या १४ बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला खालीलपैकी कोणाचा विरोध होता?

अ इंदिरा गांधी 

ब  मोरारजी देसाई

क जयप्रकाश नारायण

ड  रिझर्व्ह बँक 

1  अ आणि क 

2  ब आणि  ड√√√√√√

3  ब आणि  क

4  क आणि ड


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.15  तिसऱ्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी...... मध्ये घट झाली नाही.

1  अन्नधान्य उत्पादन

2  राष्ट्रीय उत्पन्न

3  परकीय चलन साठा

4  किमतीचा निर्देशांक√√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.16  भारतात मध्यवर्ती   बँकेची शिफारस कोणी केली नव्हती? 

1   हिल्टन यंग आयोग

2   चेंबर्लिन आयोग

3   फौलर समिती

4   मॅकलेगन समित✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.17  ........ ही कंपनी 'मोती' या नावाने युरिया उत्पादन करते.

1  राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर ली.

2  मद्रास फर्टिलायझर ली.

3  हिंदुस्थान फर्टिलायझर ली.√√√√√√√

4  वरील सर्व


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.18 राष्ट्रसभेकडून कोणत्या वर्षी राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली होती?

1  १९४६

2  १९३८√√√√√

3  १९२९

4  १९२५


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.19 सरकारच्या तुटीच्या अर्थभरणाचा खालीलपैकी कोणता स्रोत नाही?

1  रिझर्व्ह बँकेकडून व व्यापारी बँकेकडून कर्ज घेणे

2  नवीन चलन निर्मिती

3  स्वतःच्या रोख रकमेतून पैसे काढणे

4  जमा झालेले महसूल√√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.20 प्रत्येक कार्यक्रमाचे ज्यामध्ये मूल्यमापन केले जाते ते..... अंदाजपत्रक होय.

1  रोख

2  बहुआयामी

3  शून्याधारीत√√√√√

4  यापैकी नाही


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.21 सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिध्दांत कोणी मांडला?

1 प्रो पिकॉक व प्रो वाईजमन√√√√√√

2 प्रो पिगु

3 डॉ मार्शल

4 वरील पैकी नाही


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.22 अप्रत्यक्ष करांचा समाजावर... परिणाम होत?

1  पुरोगामी

2  न्याय्य 

3  प्रतिगामी√√√√√√

4  प्रमाणशीर


📖📖📖📖📖📖📖📖


1). महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला ?

⚫️ लतिका घोष ☑️

⚪️ सरोजिनी नायडू

⚪️ कष्णाबाई राव

⚪️ उर्मिला देवी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


2). पहिल्या कर्नाटक युद्धानंतर कोणत्या तहानुसार फ्रेंचांनी इंग्रजांना मद्रास दिले ?

⚫️ अक्स-ला-चॅपेलचा तह ☑️

⚪️ पॉंडेचेरीचा तह

⚪️ मगलोरचा तह

⚪️ परिसचा तह

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



3). १८५७ च्या उठावाचा बिहारमधील प्रमुख नेता कोण होता ?


⚪️ खान बहादूर खान

⚫️ कवरसिंग ☑️

⚪️ मौलवी अहमदुल्ला

⚪️ रावसाहेब

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



4). डलहौसीने झाशी संस्थान केव्हा खालसा केले. ?

⚪️ १८४९

⚪️ १८५१

⚫️ १८५३ ☑️

⚪️ १८५४

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


5). १९०९ मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी कोणते वृत्तपत्र प्रकाशित केले. ?

⚪️ फरी इंडिया

⚪️ नया भारत

⚪️ फरी प्रेस जर्नल

⚫️ लीडर ☑️

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



6) १८५७च्या उठावाबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा. ?

अ] उठावकर्त्यांना विशिष्ट राजकीय उद्दिष्ट नव्हते.

ब] झीनत महल हिने स्वतःच्या सुरक्षेसाठी इंग्रजांशी बोलणी केली.


⚪️ फक्त अ

⚪️ फक्त ब

⚫️ वरील दोन्ही ☑️

⚪️ वरीलपैकी एकही नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



7). खाली दिलेल्या भारताच्या व्हॉइसरॉय यांचा योग्य कालक्रम लावा. ?

अ] लॉर्ड कर्झन

ब] लॉर्ड चेम्सफर्ड

क] लॉर्ड हार्डिंग्स II

ड] लॉर्ड आयर्विन


पर्याय

⚫️ अ-ब-क-ड ☑️

⚪️ अ-क-ब-ड

⚪️ क-अ-ब-ड

⚪️ अ-ड-क-ब

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



8). विधान :- अ] १९२९ चा बालविवाह कायदा हा शारदा कायदा म्हणून प्रसिद्ध आहे. ?

स्पष्टीकरण:-  ब] उमा शंकर सारडा यांनी हा कायदा केंद्रीय कायदेमंडळात मांडला. ?

पर्याय

⚫️ फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ☑️

⚪️ फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.

⚪️ अ बरोबर आणि ब चूक

⚪️ अ चूक आणि ब बरोबर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



9. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये भारतीयांना स्थान मिळाले ?

⚪️ भारत सरकारचा कायदा १९३५

⚪️ भारत सरकारचा कायदा १९१९

⚫️ भारत कौन्सिल कायदा १९०९ ☑️

⚪️ भारत कौन्सिल कायदा १८९२

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


10). मानवजातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर. ही घोषणा कोणी दिली ?

⚪️ सहदरण आय्यपन 

⚫️ नारायण गुरु ☑️

⚪️ हदयनाथ कुंजरू 

⚪️ टी.एम. नायर

Mpsc pre exam samples questions

1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?

 A. 1 ते 14 वयोगट

 B. 6 ते 14 वयोगट✍️

 C. 1 ते 18 वयोगट

 D. 5 ते 14 वयोगट.

____________________

2) "आरोग्य म्हणजे केवळ रोग किंवा अशक्तता यांचा अभाव नव्हे तर शारीरिक, मानसिक व सामाजिक सुस्थिती होय,'' असे कोणी म्हटले?

 A. महात्मा गांधी

 B. हर्बर्ट स्पेन्सर

 C. थॉमस वुड✍️

 D. जागतिक आरोग्य संघटना.


____________________


3) भारत सरकारने _ पासून मौखिक पोलीओ कार्यक्रमासोबत इंजेक्शनद्वारा लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला.

 A. 1 नोव्हेंबर, 2011

 B. 30 नोव्हेंबर, 2015 ✍️

 C. 1 जानेवारी, 2016

 D. 26 फेब्रुवारी, 2017.


______________________


4) बलवंतराय मेहता समितीने त्री-सूत्री पद्धतीमध्ये ज्या शिफारशी मांडल्या त्यांना 'पंचायत राज'' असे कोणी संबोधीले ?

 A. महात्मा गांधी

 B. डॉ. राजेंद्र प्रसाद

 C. पंडित जवाहरलाल नेहरू✍️

 D. बलवंतराय मेहता.


____________________


5) खालीलपैकी कोणती योजना बालकांवरील लैंगिक अत्याचार, बलात्कार आणि अॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्यांचे पुनर्वसन व अर्थसाहाय्य करण्यासाठी सुरू केली आहे?

 A. माझी कन्या भाग्यश्री योजना 

 B. बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ योजना 

 C. मनोधैर्य योजना ✍️

 D. जीवनोन्नती योजना.


____________________


6) देवदासींच्या उदरनिर्वाहाकरीता महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती योजना सुरू केली आहे ?

 A. स्वाधार योजना

 B. राज्य गृह योजना 

 C. मातृत्व सहयोग योजना

 D. निर्वाह अनुदान योजना.✍️


____________________


7) भारताची जनगणना 2011 च्या आकडेवारीनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात (दर हजारी) अर्भक मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे?

 A. पश्चिम बंगाल

 B. बिहार 

 C. उत्तर प्रदेश

 D. मध्य प्रदेश.✍️


____________________


8) 73वी घटनादुरुस्ती ही महिलांसाठी महत्वाची मानली जाते कारण त्यानुसार :

 A. संघटित क्षेत्रात काम करणा-या स्त्रियांना 3 ऐवजी 6 महिने मातृत्व रजा मिळाली.

 B. कामावर होत असलेल्या शोषणाची तक्रार केल्यास महिलेला खास संरक्षण देण्यात येते. 

 C. पंचायतीत एकूण संख्येच्या एक तृतीयांश जागा स्त्रियांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक केले. ✍️

 D. लग्नाच्या संमतीसाठी वयाची किमान मर्यादा वाढविण्यात आली.


____________________


9) 1969 साली सुरू झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेचा (NSS) उद्देश काय आहे? 

 A. सहयोगातून शिक्षण

 B. सेवेतून उत्कृष्टता

 C. कल्याणातून शिक्षण

 D. सेवेतून शिक्षण.✍️


____________________


10) खालीलपैकी कोणत्या उद्देशाने 'माझी कन्या भाग्यश्री' ही योजना सुरू केली?

(a) मुलींचा जन्मदर वाढविणे.

(b) मुलींच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे.

(c) मुलींना शिक्षण देणे.

(d) बालविवाहास प्रतिबंध करणे.


पर्यायी उत्तरे :

 A. फक्त (a)

 B. (a) आणि (c)

 C. (a), (b) आणि (c)

 D. (a), (b), (c) आणि (d). ✍️

ग्राहक संरक्षण कायदा, 2019 लागू

• ' संरक्षण कायदा, 2019' 20 जुलै 2020 पासून लागू झाला. हा नवीन कायदाग्राहकांना सक्षम करेल आणि आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणास मदत करेल.



📚 या कायद्यातील प्रमुख तरतुदी 


• या कायद्यात ग्राहकांच्या हक्कांना प्रोत्साहन, संरक्षण देऊन ग्राहक संरक्षणाचीअंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची स्थापनाकरण्याचा समावेश आहे. 


• केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन तपासणे आणितक्रारी / खटला चालवणे, असुरक्षित वस्तू व सेवा परत मागवणे, अन्यायकारकव्यापार पद्धती बंद करवणे व दिशाभूल करणार्‍या जाहिरातींवर दंड आकारणे आदीअधिकार देण्यात येतील. 


• ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील अनुचित व्यापार रोखण्यासाठीचे नियमही या कायद्यांतर्गतसमाविष्ट आहेत.


• या कायद्यांतर्गत प्रत्यके ई-कॉमर्स घटकाला वस्तू परत केल्यास, परतावा, वस्तूबदलून घेतली असल्यास, वारंटी आणि गॅरंटी, वस्तूची डिलेव्हरी आणि शिपमेंट, देयकाचे प्रकार, तक्रार निवारण पद्धती, देयक प्रदान पद्धती, देयक पद्धतीचीसुरक्षितता, परताव्यावरील शुल्क या सर्व बाबींची माहिती द्यावी लागणार आहे. 


• ग्राहकांना वस्तू घेतानाच तपशील समजून घेण्यासाठी वस्तू कोणत्या देशातील आहे, याची माहिती द्यावी लागणार आहे. 


• ई-कॉमर्स कंपन्यांना ग्राहकांच्या तक्रारीची पोहोच 48 तासांत द्यावी लागेल आणि याकायद्यानुसार पोहोच मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत तक्रारीचे निवारण करावेलागणार आहे. 


• नवीन कायदा उत्पादनाच्या उत्तरदायित्वाची संकल्पना आणतो आणि नुकसानभरपाईच्या कोणत्याही दाव्यासाठी, वस्तू उत्पादक, उत्पादन सेवा प्रदाता आणिउत्पादन विक्रेता यांना आपल्या कार्यकक्षेत आणतो.


• नवीन कायद्यांतर्गत ग्राहक आयोगामधील ग्राहक विवाद निवाडा प्रक्रिया सुलभकरण्याची तरतूद आहे, ज्यात राज्य व जिल्हा आयोगाचे सबलीकरण करण्याचासमावेश आहे.


• नवीन कायद्यात मध्यस्थीसंदर्भात पर्यायी विवाद निराकरण यंत्रणेची तरतूद केलीआहे. यामुळे निवाडा प्रक्रिया सुलभ होईल.


• ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या नियमांनुसार 5 लाख रुपयांपर्यंतच्या तक्रारीसाठीकसलेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तक्रारी दाखलकरण्याची तरतूद आहे.


• केंद्रीय ग्राहक संरक्षण व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण खात्याच्या मंत्र्यांच्याअध्यक्षतेखाली केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण नियमांची तरतूद करण्यात आलीआहे. 


• यात राज्यमंत्री उपाध्यक्ष असतील आणि विविध क्षेत्रांतील 34 सदस्यांचासमावेश असेल.

नेत्रयोग (Eye Disease)

 १) रंग आंधळेपणा (Colour Blindness):

अनुवांशिक व बरा न होणारा रोगसर्व रंग दिसतात. मात्र, त्यातील फरक जाणवून येत नाही. विशेषतः लाल व हिरवा रंगातील फरक समजून येत नाही . फक्त पुरुषांनाच होतो.


२) मोतीबिंदू (Cataract)

डोळ्यातील प्रथिनांच्या रंगातील बदलामुळे नेत्रभिंग धूसर किंवा अस्पष्ट बनतो, कमी प्रकाशात चांगले तर जास्त प्रकाशात कमी दिसते. उपाय: भिंगारोपण, बहिरवर्क भिंगाचे रोपण केले जाते. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यावर कधी कधी नवीन बसविलेल्या भिंगाच्या मागे पुन्हा मोतीबिंदू तयार होते. यासाठी काही महिने ते काही वर्षे असा कालावधी असू शकतो. YAG लेसर वापरून हा द्वितीयक मोतीबिंदू काढता येतो.


३) काचबिंदू (Glaucoma):

हि व्यथा वयाच्या ४० ते ५० वर्षाच्या दरम्यान होते. नेत्रजलाच्या निचऱ्यामध्ये बिघाड झाल्यास ते डोळ्यात साठू लागते. त्यामुळे डोळ्याच्या आतील दाब (अंतर्दाब) वाजवीपेक्षा जास्त वाढतो व डोळा टणक बनतो. त्यामुळे बुबुळ घासले गेल्याने काचेसारखे चकचकीत होते. म्हणून त्याला काचबिंदू असे म्हणतात. काचबिंदूची परिणीती आंधळेपणात होऊ शकते. डोळ्याचा अंतर्दाब टोनोमीटरच्या साहाय्याने मोजला जातो.


४) शुष्कता (Xerophtalmia/xerosis):

व्हिटॅमिन ए च्या अभावामुळे होतो. डोळे कोरडे पडून पुढे रातांधळेपणा होऊ शकतो.


५) डोळे येणे (Conjuctivitis)

विषाणूच्या संसर्गामुळे होणारा रोग डोळे लाल होऊन खूप लागतात व चिकट पाणी येते.


६) खुपरी (Trachoma)

संसर्गजन्य रोग, घाणेरडया वस्तीत, दूषित हवेत, दूर व धुळीत राहणाऱ्यांना होतो. प्रथम पापण्यांचा आतील भाग खरखरीत होतो व नंतर त्यावर साबुदाणाच्या आकाराचे उंचवटे येतात. डोळ्याच्या उघटझापीमुळे ते बुबुळावर घासले गेल्याने बुबुळावर फुले पडतात. त्यामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते.


७) रांजणवाडी (Meibomian Cyst)

पापण्यांच्या केसांच्या मुळाशी असलेल्या सूक्ष्मस्रावक ग्रंथींमधून नेहमी एक प्रकारचा चिकट द्रव बाहेर पडत असतो.

या ग्रंथी धूलिकण, केसातील कोंडा इत्यादी कारणांमुळे बंद झाल्यास द्रव बाहेर न पडल्याने सुजतात. त्यालाच रांजणवाडी असे म्हणतात.


विविध राज्यांनी मुलींसाठी सुरु केलेल्या योजना

🔰 राजश्री योजना : राजस्थान 


🔰 कन्याश्री योजना : पश्चिम बंगाल 


🔰 भाग्यलक्ष्मी योजना : कर्नाटक


🔰 लाडली लक्ष्मी योजना : मध्य प्रदेश 


🔰 पख अभियान : मध्य प्रदेश 


🔰 लाडली : दिल्ली व हरियाणा


🔰 मख्यमंत्री लाडली योजना : उत्तर प्रदेश 


🔰 मख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना : बिहार


🔰 किशोरी शक्ति योजना : ओडिशा 


🔰 ममता योजना : गोवा 


🔰 सरस्वती योजना : छत्तीसगढ


🔰 माझी कन्या भाग्यश्री योजना : महाराष्ट्र


🔰 नदा देवी कन्या योजना : उत्तराखंड .

देशभरात विशेष पल्स पोलिओ अभियान.....

राष्ट्रीय लसीकरण दिवसाची सुरुवात 17 जानेवारीपासून होणार होती. मात्र 16 जानेवारीपासून कोविड-19 लसीकरण अभियान सुरु झाल्याने पोलिओ लसीकरण मोहिमेला स्थगिती दिली. 


भारताच्या राष्ट्रपती कार्यालयाशी सल्लामसलत करून आरोग्य मंत्रालयाने पोलिओ लसीकरण दिन 31 जानेवारीपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला. 


हा दिवस राष्ट्रीय लसीकरण दिवस किंवा पोलिओ संडे म्हणून देखील ओळखला जातो.


🎯 महत्त्वाच्या बाबी : 


• 0 ते 5 वर्षांच्या मुलांना पोलिओ ड्रॉप्स दिले जातील.


• 31 जानेवारीपासून सुरु होणारे अभियान 2 फेब्रुवारीपर्यंत चालणार.


• ज्या रविवारी लसीकरण अभियान सुरु होते, त्या दिवसाला राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून मानले जाते.


• 1995 पासून जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लोबल पोलिओ निर्मूलन उपक्रमाच्या पुढाकाराने भारताने पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम सुरू केला.


• पोलिओ लसीकरण अभियान वर्षातून दोनदा आयोजित केला जातो.


• कोविड-19 संकटाच्या काळात पोलिओ लसीकरण अभियान राबवण्यात येत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना लसीकरण शिबिरात न घेण्याचा सल्ला दिला आहे.

भारताची पहिली स्वदेशी 9 mm मशीन पिस्तूल विकसित

डीआरडीओ आणि भारतीय लष्कराने संयुक्तपणे देशाची पहिली स्वदेश निर्मित 9 mm मशीन पिस्तूल विकसित केले आहे.


इन्फंट्री स्कूल, महू आणि डीआरडीओच्या शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्था(एआरडीई), पुणे यांनी हे पिस्तूल विकसित केले आहे.


पिस्तूलाचे नाव “अस्मि” असे ठेवण्यात आले आहे

IMP QUESTION

१)  भारताच्या कोणत्या माजी पंतप्रधनाचां उल्लेख आधुनिक भारताचे चाणक्य असा केला जातो.

१. चरणसिंग

२. व्ही.पी.सिंग

३. अटलबिहारी वाजपेयी

४. पी.व्ही.नरसिंहराव🔶


२) सचिन तेंडूलकरने आपले १०० वे शतक कोणत्या मैदानवर झळ\कावले होते.

१. वानखेडे स्टेडीयम

२. ईडन गार्डन

३. लॉर्डस

४. शेर- ए - बांगला स्टेडीयम🔶


३) २०१८ च्या प्रारंभी कोणत्या राज्यात राष्ट्रीय कर्करोग संस्था स्थापन करण्यात आली.

१. राजस्थान

२. पंजाब

३. हरियाणा🔶

४. हिमाचल प्रदेश


४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात आपले पहिले भाषण खालीलपैकी कोणत्या वर्षी दिले होते.

१. ऑक्टोंबर १४🔶

२. ऑक्टोंबर १५

३. ऑगस्ट १४

४. सप्टेंबर १४


५)  खालीलपैकी भारताच्या कोणत्या पंतप्रधनांनी संसदेत मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची घोषणा केल्यानंतर त्याला देशव्यापी विरोध झाला होता.

१. राजीव गांधी

२. व्ही.पी. सिंग🔶

३. चौथरी चरणसिंग

४. चंद्रशेखर


६) १९८३ मध्ये कन्याकुमारी ते दिल्लीतील राजघाटापर्यंत पदयात्रा काढणारे नेते खालीलपैकी कोण आहे?

१. चंद्रशेखर

२. लालकृष्ण अडवाणी🔶

३. रामविलास पासवान

४. व्ही. पी.सिंग


७) सर डॉन ब्रॅडमॅन यांच्यानंतर कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात जलद २५ शतक झळकवणारा दुसरा फलंदाज ------------ हा आहे.

१. विराट कोहली

२. महेला जयवर्धने

३. केन विल्यम्सन

४. स्टीव्ह स्मिथ🔶


८)  ------------- हा देश ऑस्ट्रेलीया समुहाचा ४३ वां सदस्य देश ठरला.

१. चीन

२. पाकिस्तान

३. भारत🔶

४. ब्राझील


९)  युनेस्को द्वारा ----ते ------ पर्यंत युनेस्को वारसा सप्ताह साजरा केला जातो.

१. १४ ते २० नोव्हेंबर

२. २० ते २४ नोव्हेंबर

३. १९ ते २५ नोव्हेंबर🔶

४. ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर


१०) जागतिक व्यापार संघटनेने २०१९ या वर्षापासून ------- हा दिवस जागतिक कापूस दिवस म्हणून घोषित केले.

१. ७ ऑक्टोंबर🔶

२. १५ ऑक्टोंबर

३. ६ नोव्हेंबर

४. २६ नोव्हेंबर


११) अवयवदानात परिणामकारक चळवळ उभी करणाऱ्या ----------------- या राज्याला केंद्र सरकरने सर्वोत्तम राज्याचा दर्जा दिला.

१. गुजरात🔶

२. महाराष्ट्र

३. तामिळनाडू

४. आंध्र प्रदेश


१२) बाळाच्या नैसर्गिक संगोपनासाठी आणि आईच्या दुधाचे महत्व लक्षात घेऊन ---------- शहरामध्ये पहिलीह्युमन मिल्क बँक स्थापन करण्यात येणार आहे.

१. पुणे

२. नागपूर

३. औरंगाबाद

४. नाशिक🔶

 

१३)  ग्रीनपीस इंडिया नावाच्या स्वयंसेवी संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार ………….हे शहर भारतातील सर्वात प्रदूषित शहर आहे

१.      झरिया🔶

२.      धनबाद

३.      नोएडा

४.      गाज़ियाबाद – उत्तर प्रदेश

 


१४) 6 जानेवारी 2020 रोजी किसान विज्ञान कॉंग्रेस कोठे आयोजित केली गेली होती? 

१. नवी दिल्ली

२. बंगळुरू🔶

३. पुणे

४. मुंबई

 


१५) राज्यातील दुष्काळावर कायमस्वरूपी मात करता यावी म्हणून सर्व नदी खोऱ्यांचे एकत्रीकरण करण्यासाठी शासनाने जल आराखडा तयार केला आहे. असा एकात्मिक जल आराखडा तयार करणारे ............ देशातील पहिले राज्य ठरले.

१.     केरळ

२.     तामिळनाडू

३.     महाराष्ट्र

४.     आंध्र प्रदेश🔶


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत प्राप्त आंतरराष्ट्रीय पुरस्कार

🏆 ऑर्डर ऑफ अब्दुल्लाझिझ अल सौद 

🔰 दश : सौदी अरेबिया


🏆 सटेट ऑर्डर ऑफ गाझी आमीर अम्मानुल्लाह खान 

🔰 दश : अफगाणिस्तान 


🏆 गरँड कॉलर ऑफ दी स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार 

🔰 दश : पॅलेस्टाईन


🏆 ऑर्डर ऑफ झायेद 

🔰 दश : संयुक्त अरब अमिरात 


🏆 सियोल शांती पुरस्कार 

🔰 दश : दक्षिण कोरिया


🏆 य एन चँपियन्स ऑफ द अर्थ 

🔰 सस्था : संयुक्त राष्ट्र 


🏆 गलोबल गोलकीपर पुरस्कार 

🔰 सस्था : बिल और मेलिंडा गेट्स फाउंडेशन


🏆 किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसां

🔰 दश : बहरीन


🏆 निशान इज्जुद्दीन पुरस्कार

🔰 दश : मालदीव


🏆 ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू 

🔰 दश : रशिया


🏆 लीजन ऑफ मेरिट

🔰 दश : अमेरिका .

भूकंप

🔰भूकंप लहरी : 


» ज्या वेळी भूकंप होतो, त्या वेळी 

   भूकवचात मोठय़ा प्रमाणात हालचाली 

   होतात व मोठय़ा प्रमाणात कंप निर्माण 

   होतात. यांनाच ‘भूकंप लहरी’ असे 

   म्हणतात.


🔰नाभी (Focus) : 


» भूकंप झाल्यावर भूकवचातील ज्या 

   स्थानापासून उगम पावून सर्वदूर 

   पसरतात, त्या स्थानास भूकंप केंद्र किंवा 

   नाभी म्हणतात.


🔰 अधीकेंद्र (Epicentre) : 


» नाभीच्या अगदी वर क्षितिजाजवळच्या 

   लंब रेषेवर पृथ्वीच्या पृष्ठभागावर जो 

   बिंदू मिळतो, त्याला ‘अधीकेंद्र’ असे 

   म्हणतात. भूकंपकेंद्रापासून निघणाऱ्या 

   भूकंप लहरींचा सर्वात अधिक प्रभाव 

   अधीकेंद्राच्या निकट दिसून येतो. 

   अधिकेंद्रापासून जसजसे अंतर वाढत 

   जाते, तसेतसे भूकंपाची तीव्रता कमी 

   कमी होत जाते.


🔰 भूकंप अधिलेख (Seismogram):-

     

» भूकंप लहरींचा अभ्यास भूकंप            

   अभिलेखांवरून करता येतो. भूकंप 

   लहरींचे तीन प्रकार पडतात-  प्राथमिक 

   लहरी, दुय्यम लहरी, भूपृष्ठ लहरी.


🔰 भूकंप लहरींचे प्रकार :- 


■ प्राथमिक लहरी (P waves) : 


» प्राथमिक लहरींचा वेग इतर सर्व 

   लहरींपेक्षा जास्त असतो. 


» प्राथमिक लहरी या स्थायुरूप व द्रव्यरूप 

   पदार्थावरून प्रवेश करू शकतात. 


» प्राथमिक लहरी या ध्वनी लहरींप्रमाणे 

   असतात. 


» यात कणांचे कंपन लहरींच्या संचरण 

   दिशेने घडून येते.


■ दुय्यम लहरी (S waves) : 


» दुय्यम लहरी या प्रकाश लहरींप्रमाणे 

   असून यात कणांचे कंपन संचरण 

   दिशेशी समलंब दिशेने घडून येते. 


» दुय्यम लहरी या घनपदार्थापासून जाऊ 

   शकतात; परंतु द्रवरूप पदार्थातून त्या 

   जाऊ शकत नाहीत. 


» सर्व साधारणपणे त्यांचा वेग प्राथमिक 

   लहरींच्या वेगापेक्षा निम्मा असतो.


■ भूपृष्ठ लहरी (L waves) : 


» भूपृष्ठ लहरी या भूपृष्ठांवरूनच सागरी 

   लहरींप्रमाणे प्रवाहित होतात. 


» सर्व भूकंप लहरींमध्ये भूपृष्ठ लहरी या 

   अधिक विनाशक असतात. 


» भूपृष्ठांवरून अधिक खोलवर या लहरी 

   प्रवास करू शकत नाही. 


» भूपृष्ठ लहरी पृथ्वीपासून आरपार न 

   जाता पृथ्वीगोलाला फेरी मारतात. 


» भूकंप अभिलेखावर या लहरींची नोंद 

   सर्वात शेवटी होते.


🔰 रिश्टर स्केल (Richter Scale) : 


» अमेरिकन भूकंप शास्त्रज्ञ चार्ल्स रिश्टर 

   यांनी १९३५ साली भूकंपाच्या लहरींची 

   तीव्रता मोजण्यासांठी रिश्टर प्रमाण 

   शोधून काढले. 


» याच्या साह्य़ाने भूकंपाच्या तीव्रतेची 

   सातत्याने नोंद केली जाते. याच्या कक्षा 

   एक ते नऊ या दरम्यान असतात.


🌍 भूकंपाचे जागतिक वितरण 

     

■पॅसिफिक महासागराचा पट्टा : 


» जगातील ६५% भूकंप प्रदेश पॅसिफिक 

   महासागराच्या सभोवतालच्या पट्टय़ात 

   आढळतो. 


» याला प्रशांत महासागरातील पट्टा किंवा 

   अग्निकंकण (Rings of Fire) असे 

   म्हणतात. 


» यात इंडोनेशिया, फिलिपाइन्स, जपानची 

   बेटे, कामचटका द्वीपकल्प व पूर्व 

   सबेरियातील काही भाग येतो. 


» भूकंपाचा हा पट्टा उत्तर अमेरिकेत 

   आल्प्सपासून रॉकीज पर्वत दक्षिण 

   अमेरिकेत अँडीज पर्वताला अनुसरून 

   पुढे अंटाक्र्टिका खंडापर्यंत गेलेला आहे. 


» या भागातच असलेल्या जपानच्या हांशू 

   बेटांवर जगातील सर्वात जास्त विद्धंसक 

   भूकंप होतात.


■ मध्य अटलांटिक पट्टा  : 


» या पट्टय़ात अटलांटिक महासागरातील 

   मध्य अटलांटिक रिझ आणि 

   रिझजवळील काही बेटांचा समावेश 

   होतो. 


» येथे सर्वसाधारणपणे मध्यम तीव्रतेच्या 

   भूकंपाची नोंद झालेली आहे.


■ भूमध्य सागरीय पट्टा : 


» या पट्टय़ाचा विस्तार अटलांटिक 

   महासागरातील जलमग्न पर्वतरांगेपासून 

   होऊन भूमध्य समुद्राभोवती पसरलेला 

   आहे.

एकात्मिक व संघराज्यीय प्रणाली

◆एकात्मिक प्रणाली


1. ब्रिटन

2. फ्रांस

3. जपान

4. चीन

5. इटली

6. बेल्जियम

7. नॉर्वे

8. स्वीडन

9. स्पेन


◆संघराज्यीय प्रणाली


1. अमेरिका

2. स्वित्झर्लंड

3. ऑस्ट्रेलिया

4. कॅनडा

5. रशिया

6. ब्राझील

7. अर्जेंटिना


Latest post

चालू घडामोडी :- 17 मार्च 2024

◆ काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे. ◆ 2025 मध्ये चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान ...