Saturday 14 May 2022

current_affairs_Notes

#current_affairs_Notes

Q1) कोणती आदिवासी जात ‘अनामलाई व्याघ्र प्रकल्प’ येथे वास्तव्यास आहे?
उत्तर :- पुलियार

Q2) कोणत्या संस्थेने ‘ग्लोबल टास्क फोर्स ऑन पॅनडेमीक रिस्पॉन्स’ याची स्थापना केली?
उत्तर :-  यूएस चेंबर ऑफ कॉमर्स

Q3) कोण ‘मॅड्रिड ओपन 2021’ या टेनिस स्पर्धेत महिला एकेरी गटाची विजेती ठरली?
उत्तर :- आर्यना सबलेन्का

Q4) कोणत्या संस्थेने ‘ई-संजीवनी ओपीडी’ उपक्रमाचा प्रारंभ केला?
उत्तर :- आर्म्ड फोर्स वेटेरन डॉक्टर्स

Q5) कोणत्या शहराने ‘नाइट फ्रँक प्राइम ग्लोबल सिटीझ इंडेक्स Q1 2021’ या यादीत प्रथम क्रमांक पटकावला?
उत्तर :-  शेन्झेन

Q6) कोणत्या संकल्पनेखाली 2021 या वर्षी ‘जागतिक रेडक्रॉस व रेड क्रिसेंट दिवस’ साजरा करण्यात आला?
उत्तर :- अनस्टॉपेबल

Q7) ‘द बेंच’ या बाल पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर :- मेघन मर्केल

Q8) कोणत्या दिवशी सीमा रस्ते संघटना (BRO) याचा स्थापना दिवस साजरा केला जातो?
उत्तर :- 7 मे

Q9) कोणत्या राज्यात लसींच्या दृष्टीपलीकडील वितरणासाठी प्रायोगिक तत्वावर ड्रोन यंत्राचा वापर करण्याची सशर्त परवानगी मिळाली?
उत्तर :- तेलंगणा

Q10) शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींना प्रमाणपत्राचे वाटप करण्याकरिता शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींचे सशक्तीकरण विभागाकडून वापरल्या जाणाऱ्या संकेतस्थळाचे नाव काय आहे?
उत्तर :- युनिक डिसेबिलिटी आयडी

महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्न संच

महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्न संच★

1] वाक्यप्रकार ओळखा. - सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही .
उत्तर = संयुक्त वाक्य

2]'मी' देशाची पंतप्रधान झाले तर !' या वाक्याचा प्रकार ओळखा.
उत्तर = उद्गारार्थी

3] लता मंगेशकरांची जुनी गाणी मंत्रमुग्ध करतात - या वाक्यातील ध्वन्यार्थ ओळखा.
उत्तर = मनावर जादू होणे

4] वाक्याच्या क्रियापदाच्या रुपावरुन खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार होत नाही ?
उत्तर = संयुक्तार्थी

5] नियमित व्यायाम केला तर शरीर निरोगी राहतो ? या वाक्याचा प्रकार ओळखा.
उत्तर = मिश्र

6] काय ही गर्दी ! विधानार्थी वाक्य करा.
उत्तर = गर्दी खूप आहे.

7] खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
वाक्य - 'देवा, सर्वांना सुखी ठेव'
उत्तर = आज्ञार्थ

8] ज्या क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो तर अशा क्रियापदाला कोणते क्रियापद म्हणतात ?
उत्तर = स्वार्थ

9] 'ऊ-आख्यात' वरून क्रियापदाचा कोणता अर्थ ओळखतात ?
उत्तर = आज्ञार्थ

10] ..................ही मांसाहारी वनस्पती आहे.
उत्तर = घटपर्णी

11] मधमाश्यांच्या वसाहतीत................. मधमाशी सर्वात मोठी असते.
उत्तर = राणी

12] गुणसूत्रे ही DNA आणि ................यांनी बनलेली असतात.
उत्तर = प्रथिने

13] स्त्रियांमध्ये ................. तर पुरुषांमध्ये .... असते.
उत्तर = डिंवग्रंथी , वर्षण

14] आपल्याला माहिती असलेल्या पेशींमध्ये .............. अंडे ही सर्वात मोठी पेशी आहे.
उत्तर =शहामृगाचे

15] ...............स्नायू गोलाकार व गुळगुळीत असतात,
उत्तर =अनैच्छिक

16] शरीरातील हाडे.................... एकमेकांना जोडलेली असतात.
उत्तर = अस्थिबंधनाने

17] .................... या जनकपेशींच्या हुबेहूब प्रतिकृती असतात.
उत्तर = कन्यापेशी

18] माणसाच्या पेशींमध्ये............... गुणसूत्रे असतात.
उत्तर = 46

19] लहान आतड्याची लांबी ............. मीटर असते.
उत्तर = सहा

20] सिता 10 वस्तु 15 रू. ला खरेदी करून 12 वस्तु 20 रू ला विकते तर तिला किती रूपये नफा किंवा तोटा होईल.
उत्तर = 11.11%

21] 12 पुस्तके विकल्यानंतर 2 पुस्तकांच्या खरेदीकिंमतीमुवढा नफा होतो. तर शेकडा किती?
उत्तर = 20%

22 ]एका वस्तूची विक्री किंमत ही खरेदी किंमतीच्या निम्मे आहे. तर शेकडा नफा किंवा तोटा किती होईल?
उत्तर = 50%

23]दुकानदाराने पुस्तकाच्या 1000 प्रति 9999 रुपयांना विकल्पानंतर  899 रु. नफा होतो तर, प्रत्येक पुस्तकाची खरेदी किंमत किती?
उत्तर = 9.10 रुपये.

24]40 टक्के नफा घेऊन 40 पुस्तके विकल्यास 40 रूपये फायदा होतो तर खरेदीची किंमत किती?
उत्तर = 100

25] एका वस्तूची किंमत 20 टक्क्यांनी वाढली असता विक्री 20 टक्के कमी होते, तर त्या विक्रेत्यास फायदा की तोटा झाला?
उत्तर = 4 टक्के तोटा

26] 5 रु. ला 2 पेन प्रमाणे 50 रु. ला किती पेन येतील?
उत्तर = 20

27] एक घोडा 9 टक्के तोटा सहन करून 455 रु. विकला तर मूळ किंमत किती?
उत्तर = 500

28] खरेदी रु. 2000, विक्री रु. 2400 आहे, तर शेकडा नफा किती?
उत्तर = 20%

29] एका व्यापाऱ्याने वस्तूची किंमत 20  टक्क्याने वाढविली व नंतर 10  टक्के सूट दिली, तर किती टक्के त्यात नफा झाला ?
उत्तर = 8%

30] 'दीनबंधु' हे साप्ताहिक कोणी सुरू केले?
उत्तर = कृष्णराव भालेकर

31] खालील पैकी कोणता ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला नाही ?
उत्तर =शिवभारत

32] महाराष्ट्रात दलित पँथर ची स्थापना किती साली झाली
उत्तर = मे १९७२

33]हैद्राबाद संस्थानातील रझाकार संघटनेचा प्रमुख कोण होता ?
उत्तर =कासीम रझवी

34]खालील पैकी कोणता समाज सुधारक अल्पजीवी ठरला ?
उत्तर = विष्णुबुवा ब्रह्मचारी

35]भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला ?
उत्तर = वि रा शिंदे

36] अहमदनगरची स्थपणा अहमद निझामशहा याने मध्ये केली
उत्तर = 1490

37]स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय ?
उत्तर = व्यंकटेश भगवानराव खेडगीकर

38] श्री गुरु गोविंदसिंघजी यांचा जन्म कोठे झाला ?
उत्तर = पाटणा

39] दक्षिण भारतावर सर्वप्रथम कोणत्या राजाने आक्रमण केले ?
उत्तर = अलाउद्दीन खिलजी

40]रेशीम उत्पादनात भारतात _राज्य अग्रेसर आहे .
उत्तर = बिहार

41] अंबाबरवा अभयारण्य समुद्रसपाटीपासून _फूट उंचीवर आहे
उत्तर = 2300

42]गेंडा या प्राण्यासाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान काझीरंगा राज्यात आहे
उत्तर = आसाम

43]गडचिरोली जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत ?
उत्तर = 12

44]लाख शेती सुरु करण्यासाठी कोणती झाडे उपयुक्त आहेत ?
उत्तर - १ व २

45]मोडकसागर हे धरण कोणत्या जिल्यात आहे ?
उत्तर - ठाणे

46]महाराष्ट्रात______________ नदी ला सर्वात जास्त उपखोरी आहेत
उत्तर - गोदावरी.

मराठी साहित्यीक व त्यांची टोपणनावे

मराठी साहित्यीक व त्यांची टोपणनावे 🎯

१) संत नामदेव - नामदेव, दाम शेट्टी, शिंपी
२) संत एकनाथ - एकनाथ, सूर्यनारायण पंत
३)  संत ज्ञानेश्वर - ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी
४) संत रामदास - नारायण सूर्याजीपंत ठोसर
५) संत गाडगे महाराज - डेबूजी झिंगाराजी जानोरकर
६) कवी मोरोपंत - मोरोपंत रामचंद्र पराडकर
७) लोक हितवादी - गोपाळ हरी देशमुख
८) कवी अनिल - आत्माराम रावजी देशपांडे
९) अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर
१०) आरतीप्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर
११) केशवकुमार - प्रल्हाद केशव अत्रे
१२) केशवसुत - कृष्णाजी केशव दामले
१३) तुकडोजी महाराज - माणिक बंडोजी ठाकूर
१४) गोविंदाग्रज/ बाळकराम - राम गणेश गडकरी
१५) कवी  गोविंद- गोविंद त्रिंबक दरेकर
१६) कवी ग्रेस - माणिक गोडघाटे
१७) कवी गिरीष - शंकर केशव कान्हेटकर
१८) बालकवी/ निसर्गकवी - त्रिंबक बापूजी ठोंबरे
१९) कवी बी - नारायण मुरलीधर गुप्ते
२०) माधव ज्युलियन - माधव त्रिंबक पटवर्धन
२१) कवी दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे
२२) महाराष्ट्र कवी - यशवंत दिनकर पेंढारकर
२३) साहित्यसम्राट -  न. ची. केळकर
२४) गीतरामायणकार - ग. दी. माडगूळकर
२५) वि. दा. करंदीकर - विनायक दामोदर करंदीकर
२६) रानकवी - ना. धो. महानोर
२७) मराठीचे जॉन्सन - विष्णू शास्त्री चिपळूणकर
२८) मराठी भाषेचे पाणिनी/ मराठी भाषा व्याकरणकार - दादोबा पांडुरंग तर्खडकर
२९) कुसुमाग्रज - वि. वा. शिरवाडकर
३०) मराठी भाषेचे शिवाजी - विष्णू शास्त्री चिपळूणकर.

इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

🟣   इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये  🟣

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले

◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन

◾️“हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे” – भारतमंत्री बर्कनहेड

◾️स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे ”लढऊ हिंदू धर्म”असे वर्णन- भगिनी निवेदिता

◾️राजा राममोहन राय यांच्या सतीविरोधी लढ्याबद्दल ‘मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक’ असी प्रशांश – बेंथम

◾️“मुर्शिदाबाद हे शहर लंडन शहराइतकेच धनसंपन्न होते” – लॉर्ड क्लाइव्ह

◾️“प्रत्येक वर्षाला कॉंग्रेसचे होणारे तीन दिवसाचे अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा तमाशाच आहे.” अश्विनीकुमार दत्त.

◾️” भुंकत राहणारे परंतु चावा घेण्यास कचरणारे श्वान किंवा दात नसलेला कागदी वाघ.” असे कॉंग्रेसचे वर्णन – अश्विनीकुमार दत्त.

◾️” कॉंग्रेस हि एक महान रोगाने पछाडलेली संघटना आहे” – अरविंद घोष

◾️” आम्ही आमच्या जोरावर भारताला जिंकून घेतले आहे आणि स्वतःच्या जोरावर तो आमच्या ताब्यात ठेऊ ” – लॉर्ड एल्गिन

◾️” टिळकांना कारावासाची शिक्षा दिल्याबद्दल संपूर्ण राष्ट्र रडत आहे “- सुरेंद्रनाथ बनर्जी

◾️” बंगालच्या विभाजनाची घोषणा आमच्यावर बॉम्ब गोळ्याप्रमाणे कोसळली. बंगालची फाळणी म्हणजे आमच्या अस्मितेला हेतुपुरस्पर सरकारने दिलेला धका आहे.” – सुरेंद्रनाथ बनर्जी

◾️” कोणतेही हक्क आपणास भिक मागून मिळत नसतात ते तीव्र आंदोलन करून राज्यकर्त्यांकडून हिसकून घेतले पाहिजेत.” – लाला लजपतराय

◾️‘कर्झनची तुलना औरंगजेबशी’ – गोखले
‘ रॅडची(Rand) तुलना अफजलखानाशी ‘ – लोकमान्य टिळक

◾️” आम्हाला न्याय हवा आहे भिक नको” – दादाभाई नौरोजी

◾️“बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष हे बंगालचे नेते कॉंग्रेसला पुढे खेचण्याचा प्रयत्न करीत होते तर फिरोजशाह मेहता व दिनशा वाच्छा कॉंग्रसला मागे खेचत होते.”- आचार्य जावडेकर

◾️“लखनौच्या करारातूनच पाकिस्तानच्या मागणीची पायाभरणी झाली” – डॉ. मुजुमदार

◾️” कोणत्याही परिणामांचा थोडाही विचार न केलेला करार म्हणजे लखनौ करार.”
– गारेट ब्रिटीश इतिहासकार.

◾️” अनी बेझंट यांना स्थानबद्ध करून सरकारने अनेक बेझंट निर्माण केले आहेत.” – लॉर्ड मॉनटेग्यु

◾️क्रांतीकारकांना ‘वाट चुकलेले तरुण’ असे अनी बेझंट यांनी संबोधले.

◾️“गांधीजी राष्ट्रीय आंदोलन मोठ्या जोमाने सुरु करतात, काही काळ या आंदोलनाचे नेतृत्व कुशल रीतीने सांभाळतात; परंतु शेवटी आंदोलन यशस्वी होत असतानाच आपल्या ध्येयाचा विचार न करता ते मधूनच पळ काढतात.” – चित्तरंजन दास.

◾️” एका वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची घोषणा करणे म्हणजे एखाद्या लहान मुलाने बोलण्यासारखे आहे.” – सुभाषचंद्र बोस यांची गांधीजींवर टीका.

◾️“देवाने माझे उर्वरित आयुष्य वि. दा. सावरकरांना द्यावे” – वि. रा. शिंदे

◾️“हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायही नव्हे” टिळकांची मॉटेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावरील टीका.

◾️“भारतीय विणकरांना मरणाची अवकळा प्राप्त झाली आहे. व्यापार उद्योगाच्या संपूर्ण इतिहासात असे उदाहरण सापडणार नाही. 
भारतीय विणकरांची अस्थींमुळे जणू भारतीय मैदानी प्रदेशाला एकप्रकारची स्मशानकळा आली आहे.” विल्यम बेंटिक

◾️इंग्लंडकडे जाणाऱ्या भारतीय संपत्तीचे वर्णन ” लक्ष्मी विलायतेला चालली.” लोकहितवादी

◾️असहकार चळवळ तहकूब केल्याच्या घटनेचे ‘नॅशनल कॅलॅमिटी’ वर्णन सुभाषचंद्र बोस यांनी केले.

◾️सुभाषचंद्र बोस यांनी दांडी यात्रेची तुलना नेपोलियनने एल्बाहून परतल्यावर पॅरिसकडे केलेल्या संचालनाशी केली.

◾️“जर ब्रिटीशांनी स्वराज्याचा हक्क फक्त मुस्लिमांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही, फक्त राजपुतांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही किंवा हिंदुमधील कनिष्ठ वर्गालाच फक्त स्वराज्य बहाल केले तरी त्यासाही माझा प्रत्यवाह नाही” – लोकमान्य टिळक

◾️खान अब्दुल गफार खान यांचे वर्णन “हिंदूंच्या प्रभावाखाली असणारे आणि लढाऊ पाठांनांच्या खच्चीकरणाचे प्रमुख” असे वर्णन – महम्मद आली जिना

◾️1857 चा उठाव हा कामगार सैनिकांचा भांडवलशाही विरुद्ध व जमिंदरांविरूद्धचा उठाव होता – कार्ल मार्क्स.

डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि विविध ग्रंथ

🟢 डॉ बाबासाहेब आंबेडकर 🟢

✍विविध ग्रंथ:-

◾️प्रॉब्लम ऑफ रुपी

◾️अनहीलेशन ऑफ कास्ट

◾️थॉट्स ऑन पाकिस्तान

◾️कास्ट इन इंडिया

◾️द अन टचेबल्स

◾️रानडे गांधी जिना

◾️रिडल्स ऑफ हिंदुझम

◾️फेडरेशन वार्सेस फ्रीडम

◾️स्टेट अँड मायणारीटीझ.

दर्पण

🟢दर्पण🟢

❇️सुरुवात:- 6 जानेवारी 1832

▪️बाळशास्त्री जांभेकर

▪️सुरुवातीला पाक्षिक होते

▪️4 मे 1832:-साप्ताहिक झाले

▪️अर्धा मजकूर मराठी व अर्धा इंग्रजी असे

❇️चालक:-रघुनाथ हरिश्चंद्र व जनार्धन वासुदेव

▪️जवळपास 9 वर्ष चालले

▪️आकार:-19 × 11.5 इंच

✍देशकाल स्तिथी चे ज्ञान देण्यासाठी सुरू केले.

तापी नदी

🔴तापी नदी🔴

🔳उगम:- मूलताई(मध्य प्रदेश)

🔳लांबी:-724 किमी

❇️महाराष्ट्र:-208 किमी

📌उपनद्या:-

❇️उजवीकडून:-

🔳 बाकी   गोमाई  गुळी

🔳सुकी अरुणावती

❇️डावीकडून:-

🔳पांझरा   बोरी   गिरणा   वाघूर

🔳पूर्णा भोगावती.

बंकिमचन्द्र चट्टोपाध्याय

🟢 बंकिमचन्द्र चट्टोपाध्याय 🟢

🔺स्मृतिदिन

◾️जन्म :- 27 जून 1838

◾️मृत्यू :- 8 एप्रिल 1894

◾️भारताचे राष्ट्रीय गीत 'वन्दे मातरम्' यांचीच रचना आहे.

◾️हे गीत अनेक क्रांतिकारकांसाठी प्रेरणादायी ठरले

◾️शिक्षणसमाप्ति नंतर बंगाल मध्ये डिप्टी मजिस्ट्रेट म्हणून नियुक्ती झाली, काही कालावधीनंतर बंगाल सरकार चे सचिव बनले.

◾️त्यांना रायबहादुर आणि सी. आई. ई. या पदव्या इंग्रजांनी दिल्या

◾ आनंदमठ मधील "वंदे मातरम" हे गीत प्रसिद्ध आहे.

◾️उल्लेखनीय कार्य :-

दुर्गेशनन्दिनी
कपालकुण्डला
देवी चौधुरानी
आनन्द मठ
वन्दे मातरम्.

छत्रपती शाहू महाराज खालील वृत्तपत्र ला त्यांनी आर्थिक मदत केली.

🟢 छत्रपती शाहू महाराज 🟢

✍खालील वृत्तपत्र ला त्यांनी आर्थिक मदत केली.

◾️जागरूक:-वालचंद कोठारी

◾️कैवारी:-दिनकरराव जवळकर

◾️मूकनायक:-बाबासाहेब आंबेडकर

◾️हंटर:-खंडेराव बागल

◾️राष्ट्रविर:-शामराव देसाई

◾️तेज:-दिनकरराव जवळकर

◾️प्रबोधन:-केशवराव ठाकरे

◾️ब्राम्हणेतर:-व्यंकटराव गोडे

◾️डेक्कन रयत:-वालचंद कोठारी

◾️जागृती:-भगवंत पाळेकर

◾️विजयी मराठा:-श्रीपतराव शिंदे.

मानवधर्म सभा

🟢मानवधर्म सभा🟢

◾️स्थापना:-22 जून 1844

◾️ठिकाण:-सुरत

◾️पुढाकार:-दादोबा तर्खडकर व दुर्गाराम मंचाराम

🔺सहभाग:-

◾️दिनमनी शंकर

◾️दामोदरदास

◾️दलपत राम भागूबाई

🔺प्रार्थना दिवस:-रविवार

🔺तत्वे:-

◾️ईश्वर एकच असून पूज्य व निराकार आहे

◾️जातिभेद पाळू नये

◾️प्रत्येकाला विचार करण्याचे स्वंतत्र आहे.

संयुक्त महाराष्ट्र पार्श्वभूमी

🟢संयुक्त महाराष्ट्र पार्श्वभूमी🟢

♦️1938:-

◾️रामराव देशमुख यांनी वऱ्हाड वेगळा प्रांत करावा असा ठराव मांडला.

♦️1939:-

◾️नगर साहित्य संमेलन मध्ये मराठी भाषिक एक प्रांत करावा असे ठरले.

♦️1940:-

◾️वाकणकर यांनी गाडगीळ व पटवर्धन यांच्या मदतीने संयुक्त महाराष्ट्र चा नकाशा तयार केला.

♦️1941:-

◾️रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन झाली.

♦️1942:-

◾️टी जे केदार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरवण्यात आली.

समानार्थी शब्द

📚 समानार्थी शब्द🇨🇮📚

काक - कावळा, वायस, एकाक्ष 

किरण - रश्मी, कर, अंशू 

काळोख - तिमिर, अंधार, तम 

कलंक - बट्टा, दोष, डाग, काळिमा 

करुणा - दया, माया, कणव, कृपा कसब - कौशल्य, प्राविण्य, नैपुण्य, खुबी

कर्तबगार - कार्यक्षम, दक्ष, कुशल, निपुण 

कुरूप - विद्रूप, बेढब, विरूप 

कोमल - मृदु, हळवा, मऊ, नाजुक 

खग - शकुंत, पक्षी, व्दिज, अंडज,
पाखरू 

खजिना - द्रव्य, कोष, भांडार, तिजोरी 

खच - गर्दी, दाटी, रास खट्याळ - खोडकर, व्दाड.

२७ जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –

🟡 २७ जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –

🔶 १९९६ - अर्थतज्ञ द. रा. पेंडसे यांना ’महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चा ’चिंतामणराव देशमुख पुरस्कार’ जाहीर

🔶 १९९१ - युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.

🔶 १९७७ - जिबुटी (Dijbouti) ला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

🔶 १९५४ - अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युतकेंद्र (क्षमता: ५००० किलो वॅट) रशियातील मॉस्कोजवळ ओब‍निन्स्क येथे सुरू झाले.

🔶 १९५० - अमेरिकेने कोरियन युद्धात आपले सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला.

🟡 जन्मदिवस / जयंती / वाढदिवस –

🔶 १९३९ - राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा’ – संगीतकार (मृत्यू - ४ जानेवारी १९९४)

🔶 १९१७ - खंडेराव मोरेश्वर ऊर्फ ’खंडू’ रांगणेकर – आक्रमक डावखुरे फलंदाज (मृत्यू - ११ आक्टोबर १९८४)

🔶 १८८० - हेलन केलर – अंध व मूकबधीर असुनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका, राजकीय कार्यकर्त्या व शिक्षिका (मृत्यू - १ जून १९६८)

🔶 १८७५ -  दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ ’कवी दत्त’ (मृत्यू - १३ मार्च १८९९)

🔶 १८६४ - शिवराम महादेव परांजपे – ’काळ’ कर्ते, विद्वान, वक्ते, लेखक, स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार (मृत्यू - २७ सप्टेंबर १९२९)

🔶 १८३८ - बंकिमचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार. त्यांनी लिहिलेल्या ’आनंदमठ’ या कादंबरीत ’वंदे मातरम’ हे गीत असून या गीताने स्वातंत्र्यलढ्यातील सहभागींना प्रेरणा मिळाली. (मृत्यू - ८ एप्रिल १८९४)

🔶 १५५० - चार्ल्स (नववा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू - ३० मे १५७४)

🔶 १४६२ - लुई (बारावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू - १ जानेवारी १५१५)

🟡 मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन –

🔶 २००८ - फील्ड मार्शल सॅम माणेकशा (जन्म: ३ एप्रिल १९१४)

🔶 २००० - द. न. गोखले – शिक्षणतज्ञ व चरित्रकार.

🔶 १९९८ - होमी जे. एच. तल्यारखान – गांधीवादी नेते, सिक्‍कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार (जन्म - ९ फेब्रुवारी १९१७)

🔶 १९९६ - अल्बर्ट आर. ब्रोकोली – ’जेम्स बाँड’ पटांचे निर्माते (जन्म - ५ एप्रिल १९०९)

🔶 १८३९ - महाराजा रणजितसिंग – शिख साम्राज्याचे संस्थापक (जन्म - १३ नोव्हेंबर १७८०)

🔶 १७०८ - धनाजी जाधव – मराठा साम्राज्यातील सेनापती (जन्म - १६५०)

   🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

Latest post

महाराष्ट्राचा भूगोल

दख्खनवरील पठारे ------------------------------------------------------------ ----------------------- अ.क्र. पठार. जिल्हा. ------------------...