Tuesday 5 January 2021

पोलिस भरतीचा निर्णय ! 'एसईबीसी'तील विद्यार्थ्यांना भरावे लागणार खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क; 'ईडब्ल्यूएस'चा उल्लेखच नाही



गृह विभागाच्या निर्णयात 'एसईबीसी' प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा आणि संबंधित पात्र विद्यार्थ्यांकडून वाढीव परीक्षा शुल्क भरून घ्यावे, असे आदेशात म्हटले आहे. मात्र, या आदेशात 'एसईबीसी' प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा 'ईडब्ल्यूएस'मधून विचार करावा, असा उल्लेख करण्यात आलेला नाही. गृह विभागाने संबंधित विभागाला पूर्वीच्या निर्णयाचे शुध्दीपत्रक काढण्याचेही आदेश दिले आहे.


 सोलापूर : पोलिस भरतीसंदर्भात 'एसईबीसी' प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करुन संबंधित विद्यार्थ्यांची पात्रता, वयोमर्यादा पाहून त्यांच्याकडून वाढीव परीक्षा शुल्क 15 दिवसांत भरुन घेतले जाणार आहे. त्यानंतर पोलिस महासंचालक कार्यवाहीचा अहवाल तत्काळ शासनास सादर करणार आहेत. तसे आदेश गृह विभागाने आज काढले. 


दरम्यान, हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम निर्णयाच्या तथा अंतरिम स्थगिती उठविण्याच्या अर्जावर अंतिम निकाल होईपर्यंत लागू राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.


गृह विभागाच्या आदेशानुसार... 


'एसईबीसी'चे आरक्षण न ठेवता भरती प्रक्रिया पार पाडावी 

'एसईबीसी'तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू करावी 

जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून करावा विचार 

'एसईबीसी'तून अर्ज केलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारावे 

वाढीव परीक्षा शुल्क ऑनलाइन भरुन घेण्यात येईल; 15 दिवसांत कार्यवाही पूर्ण करावी 

पोलिस महासंचालकांनी या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करुन शासनाला अहवाल सादर करावा.


गृह विभागाने 2019 मध्ये पोलिस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिध्द करण्यात आली. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने 'एसईबीसी' आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलिस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली. मात्र, आज गृह विभागाचे उपसचिव शिरीष मोहोड यांनी पोलिस भरतीच्या दृष्टीने आदेश काढले. दरम्यान, गृह, सार्वजनिक आरोग्य व मेडिकल विभागाअंतर्गत रिक्‍त पदांची भरती करण्यास वित्त विभागाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. त्यानुसार आता भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. 


मात्र, गृह विभागाच्या निर्णयात 'एसईबीसी' प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा आणि संबंधित पात्र विद्यार्थ्यांकडून वाढीव परीक्षा शुल्क भरून घ्यावे, असे आदेशात म्हटले आहे. मात्र, या आदेशात 'एसईबीसी' प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा 'ईडब्ल्यूएस'मधून विचार करावा, असा उल्लेख करण्यात आलेला नाही. गृह विभागाने संबंधित विभागाला पूर्वीच्या निर्णयाचे शुध्दीपत्रक काढण्याचेही आदेश दिले आहे.

पत्रकार दिन


महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित केला आहे. 

महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.


बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पञकार आहे. यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते. जुलै १८४० मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला**


भाषेत गोविंद कुंटे आणि भाऊ महाजन यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. 6 जानेवारी  1832 रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रकाशित झाला. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले


त्याचवेळी इंग्रजी  सत्ताधार्‍यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी ‘दर्पण’मध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात असे.


वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी सर्वसामान्यांमध्ये रुजलेली नसल्याने ‘दर्पण’ला सुरुवातीला मोठ्या संख्येने वर्गणीदार मिळाले नाहीत. मात्र ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. ब्रिटिश काळामध्ये वृत्तपत्र चालवणे आणि त्याला वाचक मिळवणे हे मोठे कठीण काम होते. मात्र याही काळात पदरमोड करून व कुठलेही नफ्याचे तत्व न स्वीकारता या काळामध्ये सुधारकांनी आपले वृत्तपत्र चालवले यामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण हे वृत्तपत्र अग्रणी होते. प्रत्यक्षामध्ये या काळातील वृत्तपत्रे ठराविक काळानंतर प्रसिद्ध केली जात असत. 


1832 मध्ये सुरू झालेले दर्पण हे वृत्तपत्र 1840 पर्यंत चालले


चालूघडामोडी



कोणत्या व्यक्तीची चौथे निवडणूक उपायुक्त म्हणून नेमणूक झाली?

(A) सुनील अरोरा

(B) ओम प्रकाश रावत

(C) अचल कुमार ज्योती

(D) उमेश सिन्हा✅



कोणत्या राज्याला AFSPA कायद्याच्या अंतर्गत ‘अशांत क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले?

(A) त्रिपुरा

(B) सिक्किम

(C) मेघालय

(D) नागालँड✅



 “नॅशनल पोलीस K-9 जर्नल” हे ‘______’ या विषयावरील देशातले पहिले प्रकाशन आहे.

(A) पोलीस श्वान✅

(B) पोलीस घोडे

(C) पोलीस उंट

(D) यापैकी नाही



 कोणत्या व्यक्तीला "बूल" कुमार म्हणून ओळखले जात होते?

(A) लेफ्टनंट कर्नल सुमित बक्षी

(B) कॅप्टन मोडकुर्ती नारायण मूर्ती

(C) कर्नल नरेंद्र✅

(D) मेजर हेमंत राज



 कोणत्या राज्यात ‘शूल्पनेश्वर वन्यजीवन अभयारण्य’ आहे?

(A) राजस्थान

(B) कर्नाटक

(C) गुजरात✅

(D) आंध्रप्रदेश



कोणत्या व्यक्तीने "विप्लवा तपस्वी: पीव्ही" या शीर्षकाचे पुस्तक लिहिले आहे?

(A) एम. व्यंकय्या नायडू

(B) ए. कृष्ण राव✅

(C) A आणि B

(D) यापैकी नाही


1) महापौर पदाची जबाबदारी स्वीकारणारी देशातली सर्वात तरुण व्यक्ती कोण ठरली?

उत्तर : आर्या राजेंद्रन


2) पहिला ‘आंतरराष्ट्रीय महामारी सज्जता दिन’ साजरा कोणत्या तारखेला करण्यात आला?

उत्तर: 27 डिसेंबर 2020


3) “नौशेरा का शेर” म्हणून कोणत्या व्यक्तीला संबोधले जाते?

उत्तर : ब्रिगेडिअर मोहम्मद उस्मान


4) ‘ट्रायब इंडिया’याच्या उत्पादन यादीत समाविष्ट करण्यात आलेला मध कोणत्या प्रकाराचा आहे?

उत्तर: जायंट रॉक बी हनी


5) ‘सीड टू शेल्फ’ या संज्ञेचा अर्थ काय आहे?

उत्तर : शेतकरी आणि उत्पादक यांच्यातला दुवा


6) ‘ब्लू फ्लॅग’ कार्यक्रम कोणती संस्था राबविते?

उत्तर : फाउंडेशन फॉर एनव्हिरोनमेंटल एज्युकेशन


7) ‘पेडलंदरिकी इल्लू’ योजना कशासंबंधी आहे?

उत्तर : सर्व गरीबांसाठी घरे


8) ‘भसन चर’ बेट कोणत्या प्रदेशात आहे?

उत्तर : बांगलादेश


● आशियाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांची जागा कोणत्या व्यक्तीने घेतली?

उत्तर : झोंग शानशान


● नुकतीच कोणत्या देशाने फाशीची शिक्षा रद्द केली?

उत्तर : कझाकस्तान


● नव्या विधेयकानुसार, केंद्रीय सरकारने सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला परवानगी देण्याचे वय किती निश्चित केले आहे?

उत्तर : 21 वर्ष


● भारतीय भूदलाच्या ‘मानवी हक्क कक्ष’चे प्रथम प्रमुख म्हणून कोणत्या व्यक्तीची नेमणूक झाली?

उत्तर : मेजर जनरल गौतम चौहान


● दीपोर बील आर्द्रभूमी प्रदेश कोणत्या राज्यात आहे?

उत्तर : आसाम


● ‘डायमिडोफॉस्फेट’चे रासायनिक सूत्र काय आहे?

उत्तर : H4N2O2P


● हिमयुगात अस्तित्वात असलेल्या ‘लोकरीने आच्छादित असलेला गेंडा’ याचे अवशेष कोणत्या देशात सापडले?

उत्तर : रशिया


● चीनच्या पहिल्या मंगळ मोहीमेचे नाव काय आहे?

उत्तर : तियानवेन-1

ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस देण्यास ब्रिटनमध्ये सुरुवात.


🔶ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड -अ‍ॅस्ट्राझेनेका यांची कोविड प्रतिबंधक लस डायलिसिसवर असलेल्या एका ८२ वर्षीय रुग्णास देण्यात आली. याआधीच मान्यता दिलेल्या फायझर-बायोएनटेक लशीच्या मदतीने लसीकरणाची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे.


🔶ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस पहिल्यांदा या व्यक्तीस देण्यात आली. ब्रायन पिंकर असे या व्यक्तीचे नाव असून ऑक्सफर्ड विद्यापीठ रुग्णालयात ही लस देण्यात आली. राष्ट्रीय आरोग्य सेवेने लसीकरणाचा कार्यक्रम वेगाने सुरू केला असून ऑक्सफर्डची लस हे आता तेथील करोना विरोधी लढाईत दुसरे शस्त्र ठरले आहे. याआधी फायझर व बायोएनटेक यांच्या लशीस मान्यता देण्यात आली होती.


🔶मूत्रपिंड विकाराने डायलिसिसवर असलेल्या निवृत्त व्यवस्थापकास ऑक्सफर्डची लस देण्यात आली असून पिंकर यांनी सांगितले, की करोना विषाणूपासून संरक्षण मिळाले याचे समाधान आहे. पिंकर यांच्याव्यतिरिक्त तीन मुलांचा पिता असलेले शिक्षक ट्रेव्हर कोलेट व प्रा. अँड्रय़ू पोलार्ड यांना सोमवारी लस देण्यात आली. पोलार्ड हे बालरोगतज्ज्ञ असून ऑक्सफर्डची लस तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.


🔶ऑक्सफर्ड लस गटाचे संचालक व ऑक्सफर्ड लस चाचणीचे मुख्य संशोधक प्रा. पोलार्ड यांनी सांगितले, की ऑक्सफर्ड विद्यापीठाने अ‍ॅस्ट्राझेनेकासाठी तयार केलेली लस मिळाली हा अभिमानाचा क्षण आहे. आमच्या चमूने त्यासाठी बरेच कष्ट केले होते व आता ही लस जगात उपलब्ध होत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना तातडीने लस देणे गरजेचे आहे. कारण या रोगाच्या उच्चाटनात त्यांचा मोठा वाटा आहे. नव्या ऑक्सफर्ड लशीची वाहतूक व साठवणूक सोपी आहे. फायझरची लस उणे ७० अंश सेल्सियस तापमानाला ठेवावी लागते, त्यामुळे तिचा वापर सोपा नाही.

'युपीएससी'ची 8 ते 17 जानेवारीपर्यंत परीक्षा ! 'एमपीएससी'ची परीक्षा फेब्रवारीत?



आरक्षण बदलासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2020 मध्ये सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा, राज्य सेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्‍त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेसाठी जाहीरात काढली. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या 'एसईबीसी' आरक्षणास स्थगिती दिली.


 या पार्श्‍वभूमीवर आयोगाने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासप्रवर्गाचा दावा केलेल्या विद्यार्थ्यांनी आता खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) या प्रवर्गातून आरक्षण बदलावे, असे आदेश काढले आहेत. त्यासाठी 5 ते 15 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. 

सोलापूर : मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती कायम असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 'एसईबीसी' प्रवर्गातील उमेदवारांना आता खुल्या अथवा केंद्र सरकारच्या 'ईडब्ल्यूएस'चा पर्याय निवडण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे.


 दुसरीकडे 8 ते 17 जानेवारीदरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा जानेवारीअखेर अथवा 15 फेब्रुवारीपर्यंत होईल, अशी शक्‍यता सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी वर्तविली आहे.

 

आरक्षण बदलासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2020 मध्ये सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा, राज्य सेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्‍त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेसाठी जाहीरात काढली. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या 'एसईबीसी' आरक्षणास स्थगिती दिली. या पार्श्‍वभूमीवर आयोगाने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासप्रवर्गाचा दावा केलेल्या विद्यार्थ्यांनी आता खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) या प्रवर्गातून आरक्षण बदलावे, असे आदेश काढले आहेत. त्यासाठी 5 ते 15 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. 

 

राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर राज्यभर लॉकडाउन करण्यात आला. विद्यार्थ्यांना वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने आणि परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारने आयोगाच्या माध्यमातून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. कोरोनासंबंधीचे निर्बंध व नियमांचे पालन करुन परीक्षा घेण्याचे आयोगाने निश्‍चित केले आणि विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रही वितरीत केले. मात्र, मराठा समाजाचे आरक्षण स्थगित झाल्याने पुन्हा परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. 


आयोगाच्या प्रश्‍नपत्रिका अद्यापही जिल्ह्याच्या कोषागार कार्यालयातच पडून आहेत. दुसरीकडे हजारो विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपुष्टात आली असून त्यांच्यासमोर बेरोजगारीचा प्रश्‍न उभा ठाकला आहे. या पार्श्‍वभूमीवर आयोगाने 23 डिसेंबर 2020 च्या शासन निर्णयाचा आधार घेऊन परीक्षा घेण्याचे नियोजन सुरु केल्याचेही सांगण्यात आले.


 तत्पूर्वी, आयोगाने स्पर्धा परीक्षा देण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना यापुढे अधिकाधिक सहा संधी तर अनुसूचित जाती- जमातीतील विद्यार्थ्यांसाठी अमर्याद संधी असेल, असा निर्णय घेतला. तर उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारांना नऊ संधी देण्यात येतील, असेही स्पष्ट केले आहे. त्यानुसार पुढील काळात कार्यवाही केली जाणार आहे.

अंटार्क्टिकासाठी 40 वी भारतीय वैज्ञानिक मोहीम



भारताने अंटार्क्टिकासाठी 40 वी वैज्ञानिक मोहीम आयोजित केली आहे. भारतीय मोहीम देशाच्या चार दशकांच्या दक्षिणेकडील बर्फाळ प्रदेशातल्या वैज्ञानिक प्रयत्नांचे प्रतिक आहे. 40 व्या भारतीय अंटार्क्टिका मोहिमेचा प्रवास 5 जानेवारी 2021 रोजी गोव्याहून 43 सदस्यांसह सुरु झाला.


‘चार्टर्ड आईस’ श्रेणीचे ‘एमव्ही वॅसिली गोलोव्हिन’ हे जहाज 30 दिवसांचा प्रवास करून अंटार्क्टिकाला पोहोचेल. चमूला तिथे सोडल्यानंतर हे जहाज एप्रिल 2021 मध्ये भारतात परत येणार. परत येताना जहाज मागील फेरीतल्या चमूला परत घेऊन येणार.


अभ्यासले जाणारे विषय - हवामान बदल, भूगर्भशास्त्र, समुद्रातले निरिक्षण, विद्युत व चुंबकीय प्रवाह मोजमाप, पर्यावरणी देखरेखीसाठी चालू असलेल्या वैज्ञानिक प्रकल्पांना पाठबळ देण्यावर भर दिला आहे; अन्न, इंधन, तरतुदी आणि अतिरिक्त वस्तूंचे पुनर्वसन; आणि हिवाळ्यातल्या चमूला परत आणण्यावर भर दिला आहे.


पार्श्वभूमी


भारत सरकारने 1981 सालापासून ‘अंटार्क्टिका संशोधन’ हा एक प्रमुख राष्ट्रीय कार्यक्रम हाती घेतला आहे. पहिल्या फेरीमध्ये डॉ. एस.झेड. कासिम यांच्या नेतृत्वात 21 वैज्ञानिक आणि सहाय्यक कर्मचारी यांच्या पथकाचा समावेश होता.


या मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर, भारतीय अंटार्क्टिका कार्यक्रमाने आता अंटार्क्टिकामध्ये दक्षिण गंगोत्री, मैत्री आणि भारती अशी तीन कायमस्वरूपी संशोधन केंद्रे उभारली आहेत. आजपर्यंत, अंटार्क्टिकामध्ये मैत्री आणि भारती अशी दोन कार्यान्वित संशोधन केंद्रे आहेत.

राष्ट्रीय अंटार्क्टिक व महासागरी संशोधन केंद्र ‘नॅशनल सेंटर फॉर अंटार्क्टिक अँड ओशन रिसर्च’ पणजी (गोवा) येथे आहे.


अंटार्क्टिका खंड


अंटार्क्टिका पृथ्वीवरील दक्षिण ध्रुवाभोवतीचे हिमाच्छादित व पर्यावरण प्रदूषणमुक्त खंड आहे. ते जागतिक हवामानाचे नियंत्रक म्हणून ओळखले जाते. या खंडाचे क्षेत्रफळ 1.42 कोटी चौ. किमी. आहे. पृथ्वीवरील एकूण गोड्या जलसंसाधनांपैकी 70 टक्के जलसंसाधन अंटार्क्टिकावर हिमरूपात आहे.

स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यांचा कालावधी


1) आचार्य कृपलानी – 1947


2) पट्टाभी सितारामय्या – 1948-49


3) पुरुषोत्तमदास टंडन – 1950


4) जवाहरलाल नेहरु – 1951-54


5) यू. एन. धेबर – 1955-59


6) इंदिरा गांधी – 1959


7) नीलम संजीव रेड्डी – 1960–63


8) के. कामराज – 1964–67


9) निजलिंगअप्पा – 1968


10) जगजीवनराम – 1970–71


11) शंकर दयाळ शर्मा – 1972–74


12) देवकांत बरुआ – 1975-77


13) इंदिरा गांधी – 1978–84


14) राजीव गांधी – 1985–91


15) पी. व्ही नरसिंहराव – 1992–96


16) सिताराम केसरी – 1996–98


17) सोनिया गांधी – 1998 ते 2017


18) राहुल गांधी - 2017 पासून

महत्वाचे धातू आणि अधातु व त्याचे उपयोग


1. तांब्याचा उपयोग :

भांडी व विद्युत वाहक तार तयार करण्यासाठी. 


विद्युत विलेपनासाठी व तांब्याचे क्षार तयार करण्याकरिता.

तांब्यापासून तयार करण्यात येणारी संमिश्रे :

संमिश्र -  पितळ

धातू व प्रमाण - तांबे (60 ते 90 %) व जस्त (40 ते 10%)


उपयोग - भांडी तयार करण्याकरिता 


संमिश्र - ब्राँझ

धातू व प्रमाण - तांबे (81 ते 90%) व कथील (19 ते 10%)  


उपयोग - बेअरिंग, जहाजाची बांधणी, पुतळे, नाणी आणि पदके तयार करण्याकरिता 


संमिश्र - जर्मन सिल्व्हर  

धातू व प्रमाण - तांबे (50%), जस्त (25%) व निकेल (25%) 


उपयोग - हे संमिश्र उच्च प्रतीचे विद्युत रोधक आहे, म्हणून त्याचा उपयोग विद्युत रोधक उपकरणे तयार करण्याकरिता केला जातो. 


संमिश्र - बेल मेटल  

धातू व प्रमाण - तांबे (78%) व कथील (22%) 


उपयोग - घंटया, तास तयार करण्याकरिता 


संमिश्र - अॅल्युमिनीयम ब्राँझ

उपयोग - तांबे व अॅल्युमिनीयम भांडी तयार करण्याकरिता 


संमिश्र - गनमेटल  

धातू व प्रमाण - तांबे (88%) कथील (10%) व जस्त (2%) 


उपयोग - बंदुका व बॉयलरचे सुटे भाग व जस्त तयार करण्याकरिता



2. लोखंडाचे प्रकार व उपयोग :

लोखंडाचे तीन प्रकार पडतात. 


ओतीव लोखंड आणि बीड : झोतभट्टीमध्ये लोखंडाची धातुके वितळयानंतर त्यापासून लोहरस तयार होतो. हा लोहरस थंड झाल्यानंतर जे लोखंड तयार होते त्यास ओतीव लोखंड किंवा बीड असे म्हणतात. 


नरम किंवा घडीव लोखंड : ओतीव लोखंडाच्या उपयोग नरम लोखंड तयार करण्याकरिता केला जातो. 


पोलाद : ओतीव लोखंडापासून पोलाद तयार करण्याकरिता बेसिमर भट्टी किंवा विवृत भट्टीचा उपयोग केला जातो. 


लोखंडाचे संमिश्र आणि त्याचे उपयोग :

संमिश्र - स्टेनलेस स्टील

धातू - लोखंड, क्रोमीअम, कार्बन


उपयोग - तीक्ष्ण हत्यारे, भांडी सायकली व स्वयंचलीत वाहनाचे सुटे भाग व निकेल तयार करण्याकरिता 


संमिश्र - टंगस्टन स्टील  

धातू - लोखंड, टंगस्टन व कार्बन


उपयोग - जलद गतीने कापण्यासाठी वापरली जाणारी हत्यारे तयार करण्याकरिता.


संमिश्र - मॅगनीज स्टील

धातू - लोखंड व मॅगनीज 


उपयोग - कठीण खडकाला छिद्रे पाडणारी हत्यारे तयार करण्याकरिता. 


संमिश्र - क्रोमीअम स्टील

धातू - लोखंड व क्रोमीअम


उपयोग - बॉलबेअरिंग, रोलर बेअरिंग स्वयंचलीत वाहनाचे सुटे भाग व खडक फोडण्याकरिता वापरण्यात येणार्‍या यंत्राचा जबडा तयार करण्याकरिता.



3. अॅल्युमिनीअमचा उपयोग :

घरातील भांडी, वमानाचे भाग, फोटोफ्रेम तयार करण्याकरिता 


चॉकलेट, सिगारेट आदि वस्तूच्या आवरणाकरिता 


विद्युत वाहक तारा तयार करण्याकरिता. 


रुपेरी रंग तयार करण्याकरिता. 


अॅल्युमिनीयमपासुन तयार करण्यात येणारी संमिश्रे :

संमिश्र - ड्युरालयुनिम

धातू - अॅल्युमिनीयम, तांबे, मॅग्नेशियम व मॅगनीज 


उपयोग - हवाई वाहने, मोटारीचे साचे आणि आगगाडीचे भाग तयार करण्याकरिता. 


संमिश्र - मॅग्नेलियम

धातू - अॅल्युमिनीयम व मॅग्नेशियम


उपयोग - शास्त्रीय तराजूच्या दांडया, घरघुती उपकरणे व हवाई वाहने तयार करण्याकरिता. 


संमिश्र - अॅल्युमिनीअम ब्राँझ

धातू - तांबे, अॅल्युमिनीयम, लोखंड व कथील अॅल्युमिनीयम, कोबाल्ट.


संमिश्र - अल्किनो

धातू - अॅल्युमिनीयम, कोबाल्ट व निकेल 


उपयोग - विद्युत जनित्राकरिता लागणारे उच्च प्रतीचे चुंबक तयार करण्याकरिता.



4. जस्ताचे उपयोग :

लोखंड व पोलाद गंजू नये म्हणून त्यावर विलेपन करण्याकरिता. 


विद्युत घटामध्ये इलेक्ट्रोड म्हणून उपयोग केला जातो. 


धातूची संमिश्रे तयार करण्याकरिता.



5. पाराचा उपयोग :

हवादाबमापी आणि तापमापीमध्ये पार्‍याचा उपयोग करतात. 


बाष्पदीप तयार करण्याकरिता पार्‍याचा उपयोग करतात. 


आरसे तयार करण्याकरिता केला जातो.



6. सोडीयमचे उपयोग :

सोडीयम बाष्पदीपामध्ये सोडीयमचा उपयोग करतात.


उच्च तापमान दर्शक तापमापीमध्ये त्याचा उपयोग होतो.



7. मॅग्नेशियमचे उपयोग :

क्षणदिप्ती छायाचित्रणामध्ये मॅग्नेशियमचा उपयोग करतात. 


शोभेच्या दारूमध्ये.


धातूची संमिश्रे तयार करण्याकरिता. 


धातूची जोडकामे करण्याकरिता थमाईट मिश्रण तयार करण्यासाठी.



8. चांदीचा उपयोग :

दागिने तयार करण्याकरिता 


चांदी व पारा यापासून तयार झालेल्या मिश्रणाचा उपयोग दातांमधील पोकळी बुजविण्याकरिता केला जातो. 


छायाचित्रण, औषधे आणि अंकनशाई तयार करण्याकरिता. 


विद्युतविलेपन आणि रजत विलेपन तयार करण्याकरिता.



9. सोन्याचे उपयोग :

नाणी व दागिने तयार करण्याकरिता व संवेदनशील विद्युत उपकरणामध्ये विद्युतवाहक म्हणून या धातूचा उपयोग केला जातो.



10. शिशाचा उपयोग :

मुद्रण धातूचे खिळे तयार करण्याकरिता.  


दारूगोळा तयार करण्याकरिता.  


विद्युत घटात इलेक्ट्रोड तयार करण्याकरिता. 


विद्युत परीपथकात वितळतार करण्यास. 


अणुभट्टीतून न्युट्रॉन शोषक म्हणून भिंती तयार करण्याकरिता.    


डाग देण्याचा धातू व सहज


कृत्रिम वायू इंधने :- 


1) कोल गॅस – दगडी कोळशाच्‍या भंजक ऊर्ध्‍वपतनाने हा वायू मिळवितात. इंधन म्‍हणून व प्रकाशासाठी त्‍याचा उपयोग करतात. हा वायू विषारी आहे. यातील घटकांचे प्रमाण – हायड्रोजन (H2) (40% ते 50%) + मिथेन (CH4) (30% ते 35%) + कार्बन मोनॉक्‍साईड (CO) (5% ते 10%) + C2H + C2H2 (2% ते 4%) + नायट्रोजन N2 (6% ते 8%) + कार्बन डायॉक्साईड (1% ते 2%).


इंधन मूल्‍य – 1000 घन फूट (27 घन मीटर) वायूपासून 1000 कॅलरी उष्‍णता मिळते.


2) ऑईल गॅस – हा वायू केरोसीनचे भंजन करून मिळतो. प्रयोगशाळेत व लघुउद्योगात त्‍याचा वापर होतो.


3) पेट्रोल गॅस – पेट्रोलचे भंजन करून मिळवितात. त्‍यात प्रोपेन, ब्‍युटेन, इलिथीन आणि ब्‍युटीलीन यासारखे हायड्रोकार्बन असतात. घरगुती वापरासाठी इंधन म्‍हणून व प्रयोगशाळेत वापरतात.


4) वॉटर गॅस – CO आणि H2 हे याचे प्रमुख घटक आहेत. कार्बन मोनॉक्‍साईड (45%) + हायड्रोजन (45%) + N2 + Co2 + CH4 (10%) या वायूला ‘नील वायू’ असे म्‍हणतात. इंधनमूल्‍य 1000 घनफूट (27 घमी) वायूपासून 3560 कॅलरी उष्‍णता मिळते.


5) प्रोड्यूसर गॅस – CO + N2 यांच्‍या मिश्रणास प्रोड्यूसर गॅस म्‍हणतात. नायट्रोजन (65.3%) + कार्बन मोनॉक्‍साईड (34.7%) इंधनमूल्‍य 1000 घनफूट (27 घमी) वायूपासून 1130 कॅलरी उष्‍णता मिळते. काचनिर्मिती भट्टयांत या गॅसचा उपयोग करतात.

राजस्थानमध्ये ‘बर्ड फ्लू’चा इशारा



राजस्थानच्या झालावाड जिल्ह्य़ात मृत कावळ्यांमध्ये एका भयंकर विषाणूचे अस्तित्व आढळल्यानंतर, तसेच जयपूरसह इतर काही जिल्ह्य़ांत आणखी पक्षी मृत्युमुखी पडल्यानंतर राज्यात ‘बर्ड फ्लू’चा इशारा जारी करण्यात आला आहे.


पशुसंवर्धन विभागाने एक राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन केला असून, परिणामकारकरीत्या देखरेखीसाठी आपली पथके विविध जिल्ह्य़ांमध्ये पाठवली आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.


जयपूरमधील प्रसिद्ध जल महल येथे रविवारी ७ कावळे मृतावस्थेत आढळले. यामुळे राज्यात मृत्युमुखी पडलेल्या कावळ्यांची एकूण संख्या २५२ झाली आहे.


बर्ड फ्लू रोगामुळे झालेले मृत्यू प्रामुख्याने कावळ्यांमध्ये आढळले असून, त्यापैकी बहुतांश कोटा व जोधपूर विभागांतील आहेत, असे पशुसंवर्धन खात्याचे प्रधान सचिव कुंजीलाल मीणा यांनी रविवारी पत्रकारांना सांगितले.

‘हा विषाणू भयानक असून त्या संदर्भात आवश्यक ती मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. 


सर्व फील्ड अधिकारी आणि पोल्ट्री फार्म मालकांना दक्ष राहण्यास सांगण्यात आले आहे. प्रामुख्याने पाणथळ जागा, सांभर सरोवर आणि कायलादेवी पक्षी अभयारण्य यांच्यासह सर्व ठिकाणांवर परिणामकारक देखरेख सुनिश्चित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे राज्य स्तरावर एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे’, अशी माहिती मीणा यांनी दिली. झालावाड येथे २५ डिसेंबरला कावळ्यांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. त्यांचे नमुने भोपाळ येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हाय- सिक्युरिटी अ‍ॅनिमल डिसिझेस (निषाद) येथे पाठवण्यात आल्यानंतर बर्ड फ्लू विषाणू आढळला, असेही मीणा यांनी सांगितले.

कोची-मंगळुरू नैसर्गिक वायू पाईपलाईन प्रकल्प



पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 5 जानेवारी 2021 रोजी व्हिडीओ काँन्फरन्सद्वारे “कोची-मंगळुरू वायू पाईपलाईन प्रकल्प” देशाला समर्पित करणार आहेत.


ठळक बाबी


हा कार्यक्रम ‘वन नेशन वन गॅस ग्रिड’ निर्मितीच्या दिशेने ठरवलेला महत्वपूर्ण टप्पा आहे.

ही 450 किलोमीटर लांबीची पाईपलाईन गेल इंडिया लिमिटेड या कंपनीने तयार केली आहे. या संपूर्ण प्रकल्पाची अंदाजे किंमत सुमारे 3,000 कोटी रुपये इतकी होती.


दररोज 12 दशलक्ष मेट्रीक स्टँडर्ड क्यूबिक मीटर इतकी वाहतूक करण्याची याची क्षमता आहे.

पाईपलाईनद्वारे कोची (केरळ) येथील रिगॅसिफीकेशन टर्मिनल पासून एरनॅक्यूलम, थ्रीसूर, पलक्कड, मल्लपूरम, कोझिकोडी, कन्नूर आणि कासारगोड या जिल्ह्यांमधून जात मंगळुरू (कर्नाटकातला दक्षिण कन्नड जिल्हा) पर्यंत द्रव नॅचरल गॅस (LNG) नेला जाणार.


या पाईपलाईनमुळे घराघरांत पर्यावरण अनुकूल आणि परवडणारे इंधन पाईप नॅचरल गॅस स्वरूपात पुरविण्यात येणार असून वाहतूक क्षेत्राला काँम्प्रेस्ड नॅचरल गॅस मिळणार. तसेच या पाईपलाईनवरून जिल्ह्यांतील व्यावसायिक आणि औद्योगिक घटकांना नैसर्गिक वायूचा पुरवठा होणार. अशा स्वच्छ इंधनाच्या वापराने वायूप्रदूषणाला आळा बसून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत होणार.

वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशात ६०,००० बालकांचा जन्म, सर्वाधिक बालकांचा जन्म झालेल्या देशांमध्ये भारत अव्वल



भारतामध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जवळजवळ ६० हजार बालकांचा जन्म झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक बालकांचा जन्म होण्याच्या यादीमध्ये भारत अव्वल राहील असा अंदाज अधिक व्यक्त करण्यात आला होता. मुलांसंदर्भातील विषयांवर जगभरामध्ये काम करणाऱ्या युनिसेफ (युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड) या संस्थेने भारतामध्ये पहिल्याच दिवशी ६० हजार बालकांचा जन्म होईल असं म्हटलं होतं. 


तसेच जगभरामध्ये ३ लाख ७० हजार बालकांचा १ जानेवारी २०२१ रोजी जन्म होईल असंही युनिसेफने म्हटलेलं. मात्र यंदा भरतात वर्षाच्या पहिल्याच दिवशी जन्माला येणाऱ्या बालकांचे प्रमाण हे मागील वर्षीपेक्षा कमी आहे. मागील वर्षी म्हणजे १ जानेवारी २०२० रोजी भारतात ६७ हजाराहून अधिक बालकांचा जन्म झाला होता.


नवीन वर्षाच्या आगमानाआधीच १ जानेवारी रोजी सर्वाधिक बालकांचा जन्म कोणत्या देशांमध्ये होईल यासंदर्भातील अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार भारतात ५९ हजार ९९५ बालकांचा जन्म होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला. त्याचबरोबर चीन ३५ हजार ६१५, नायझेरिया २१ हजार ४३९, पाकिस्तान १४ हजार १६१, इंडोनेशिया १२ हजार ३३६, इथियोपिया १२ हजार ६, अमेरिका १० हजार ३१२, इजिप्त नऊ हजार ४५५, बांगलादेश नऊ हजार २३६ आणि डेमोक्रेटीक रिपब्लिक ऑफ काँगो आठ हजार ६४० बालकांचा जन्म होईल असं सांगण्यात आलं होतं. 


जगभरामध्ये १ जानेवारी जन्माला येणाऱ्या बालकांपैकी ५२ टक्के बालकं या दहा देशांमध्ये जन्माला येतील असं युनिसेफनं म्हटलं आहे.

यंदाच्या वर्षी जन्माला येणाऱ्या १४ कोटी बालकांचे सरासरी वयोमान हे ८४ वर्ष असेल असंही युनिसेफने म्हटलं आहे. भारतामधील बालकांचे सरासरी वयोमान हे ८० वर्षे ९ महिने इतकं असेल असंही यात नमूद करण्यात आलं आहे. तुलनात्मकरित्या सांगायचं झाल्यास यंदाच्या वर्षी जन्माला येणाऱ्या बलाकांची संख्या ही २०२० मध्ये करोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या संख्येपेक्षा ७८ पटींनी जास्त असणार आहे.

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्राकडे.


🔰वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्राने सांभाळावे, असा प्रस्ताव भारतीय हौशी कबड्डी महासंघाकडून देण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कबड्डी महासंघाचे सरकार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी दिली.


🔰तर येत्या 9 जानेवारीला भारतीय कबड्डी महासंघाची ऑनलाइन कार्यकारिणी समितीची बैठक होणार आहे. या सभेला पाटील आणि कार्यकारिणी सदस्य सचिन भोसले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.


🔰तसेच या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्राला राष्ट्रीय स्पर्धेच्या यजमानपदाविषयी भारतीय महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून विचारणा केली जात आहे.


🔰महाराष्ट्राला राष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद मिळाल्यास  मुंबई उपनगर आणि ठाणे या जिल्हा संघटनांनी आयोजनासाठी उत्सुकता दर्शवली आहे.

कोरोना लसीसाठी Co-WIN अ‍ॅपवर करावे लागणार रजिस्टर.


🔰भारतातील सर्व राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना लसीची ड्राय रन सुरू झाली आहे.


🔰दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड -19 लसीच्या वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी, डेटा ठेवण्यासाठी आणि लोकांना या लसीसाठी नोंदणी करण्यासाठी कोविन (Co-WIN App) नावाचे अ‍ॅप तयार केले आहे.


🔰दशातील नागरिक जे आरोग्य कर्मचारी नाहीत ते कोविन अ‍ॅपवर लससाठी स्वत: ची नोंदणी करु शकतात, ज्यासाठी त्यांना हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल स्टोअर वरून डाउनलोड करावे लागेल.


🔰तर यामुळे लसीकरण सुरू झाल्यानंतर ज्यांनी या अ‍ॅपवर आधीच नोंदणी केली आहे त्यांना लवकरात लवकर लस मिळेल.

भारताने बनवली जगातील पहिली ‘हॉस्पीटल ट्रेन’.


🔰भारतात एक खास ट्रेन सुरू होणार आहे जी संपूर्ण जगात कुठल्याही देशानं अद्याप सुरू केलेली नाही. भारतीय रेल्वेने जगातील पहिली ‘हॉस्पीटल ट्रेन’  बनवली आहे.


🔰भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्येच रुग्णालयातील सर्व सेवा उपलब्ध असणाऱ्या या ट्रेनचं नाव ‘लाइफलाइन एक्स्प्रेस’ असं ठेवण्यात आलं आहे.


🔰‘लाइफलाइन एक्स्प्रेस’ सध्या आसामच्या बदरपूर स्टेशनवर आहे. या ट्रेनमध्ये हॉस्पीटलमधील सर्व अत्याधुनिक सेवा, उपकरणं आणि डॉक्टरांची एक टीम तैनात आहे. 


🔰यात दोन अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर आणि पाच ऑपरेटिंग टेबलसह इतर सर्व सुविधा आहेत.तर विशेष म्हणजे, ‘लाइफलाइन एक्स्प्रेस’मध्ये  रुग्णांचा मोफत उपचार केला जाणार आहे.


🔰कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने याआधीच प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक पावलं उचललं आहेत. यात रेल्वे स्थानकांवर ऑटोमॅटीक तिकीट तपासणी यंत्र यासह अनेक सुविधांचा समावेश आहे.

चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे

 प्रश्न१) कोणत्या प्रदेशात पोंग धरण-तलाव आहे?

(A) अरुणाचल प्रदेश

(B) ल्हासा

(C) हिमाचल प्रदेश√√

(D) काठमांडू


प्रश्न२) कोणत्या शहरात आंतरराष्ट्रीय रोखे आयोग संघटना (IOSCO) आहे?

(A) दिल्ली

(B) माद्रिद√√

(C) पॅरिस

(D) बेसेल


प्रश्न३) कोणत्या सेवेसाठी “मिस कॉल सुविधा” सुरू करण्यात आली आहे?

(A) कार विषयक नोंदणी

(B) भूमी विषयक नोंदणी

(C) एलपीजी टाकी भरण्याविषयक नोंदणी√√

(D) यापैकी नाही


प्रश्न४) कोणत्या देशाने ‘राष्ट्रगीत’मधल्या शब्दामध्ये बदल केला?

(A) भारत

(B) अमेरिका

(C) चीन

(D) ऑस्ट्रेलिया√√


प्रश्न५) कोणत्या दिवशी संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) याचा स्थापना दिन साजरा केला जातो?

(A) 30 डिसेंबर

(B) 31 डिसेंबर

(C) 01 जानेवारी√√

(D) 02 जानेवारी


प्रश्न६) कोणत्या व्यक्तीने भारतीय पोलाद प्राधिकरण मर्यादित (SAIL) याचे नवीन अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला?

(A) शशांक प्रिया

(B) पुनीत कंसल

(C) हरिनंद राय

(D) सोमा मोंडल√√


प्रश्न७) कोणत्या अनुसूचित भारतीय उद्योग महासंघाने (CII) ‘पर्यटन’ क्षेत्राचा समावेश करण्याची मागणी केली आहे?

(A) पाचवी

(B) सहावी

(C) चौथी

(D) सातवी√√


प्रश्न८) कोणत्या राज्यात भारतातले पहिले परागणकर्ता उद्यान आहे?

(A) जम्मू व काश्मीर

(B) उत्तराखंड√√

(C) हिमाचल प्रदेश

(D) पंजाब


प्रश्न९) कोणत्या व्यक्तीला मध्यप्रदेश सरकारच्यावतीने ‘तानसेन सन्मान 2020’ देण्यात आला?

(A) शिव कुमार शर्मा

(B) हरिप्रसाद चौरसिया

(C) झाकीर हुसेन

(D) पं. सतीश व्यास√√


प्रश्न१०) कोणती व्यक्ती ‘त्रावणकोर रेडिओ’ची प्रथम इंग्रजी बातमीदार होती?

(A) शुभा जोशी

(B) इंदिरा जोसेफ वेन्नीयूर√√

(C) उत्तरा केळकर

(D) यापैकी नाही


प्रश्न१) ‘आशा-भारत’ योजनेचे पूर्ण नाव काय आहे?

(A) अफोर्डेबल सस्टेनेबल हाऊसिंग अरेंजमेंट

(B) अॅम्प्लिफाइड सस्टेनेबल हाऊसिंग अरेंजमेंट

(C) अफोर्डेबल सस्टेनेबल हाऊसिंग अॅक्सेलेरेटर√√

(D) यापैकी नाही


प्रश्न२) कोणत्या राज्यात ‘दिब्रू-सैखोवा राष्ट्रीय उद्यान’ आहे?

(A) मणीपूर

(B) मिझोरम

(C) आसाम√√

(D) त्रिपुरा


प्रश्न३) कोणत्या राज्यात पारादीप बंदर आहे?

(A) पश्चिम बंगाल

(B) अंदमान

(C) ओडिशा√√

(D) तामिळनाडू


प्रश्न४) कोणत्या राज्यात ‘शूल्पनेश्वर वन्यजीवन अभयारण्य’ आहे?

(A) राजस्थान

(B) कर्नाटक

(C) गुजरात√√

(D) आंध्रप्रदेश


प्रश्न५) कोणत्या ठिकाणी भारतातले सर्वोच्च उंचीवर हवामानशास्त्र केंद्र आहे?

(A) इटानगर

(B) लेह√√

(C) नवी दिल्ली

(D) कोलकाता


प्रश्न६) ‘इन पर्स्यूट ऑफ जस्टीस: अॅन ऑटोबायोग्राफी’ हे पुस्तक कोणत्या व्यक्तीचे आत्मचरित्र आहे?

(A) न्यायमूर्ती राजिंदर सचार√√

(B) न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे

(C) न्यायमूर्ती उदय यू. ललित

(D) न्यायमूर्ती अशोक भूषण


प्रश्न७) विमानातून खाली सोडता येऊ शकणाऱ्या स्वदेशी मालवाहू पेटीचे नाव काय आहे?

(A) आकाश-एनजी

(B) करंज-जी

(C) कलवरी-जी

(D) सहायक-एनजी√√


प्रश्न८) कोणती व्यक्ती येस बँकेचे नवे मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) आहे?

(A) महेश कृष्णमूर्ती

(B) निरंजन बनोडकर√√

(C) अतुल भेडा

(D) सुनील मेहता


प्रश्न९) कोणत्या व्यक्तीची "ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन्स अँड इम्युनायझेशन" या संस्थेच्या GAVI मंडळामध्ये एक सदस्य निवड झाली?

(A) अमित शाह

(B) राजनाथ सिंग

(C) डॉ. हर्ष वर्धन√√

(D) यापैकी नाही


प्रश्न१०) कोणत्या मंत्रालयाने “डिजिटल ओशन” अॅप तयार केले?

(A) पृथ्वी विज्ञान मंत्रालय√√

(B) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय

(C) रसायन व खते मंत्रालय

(D) यापैकी नाही


प्रश्न२१) कोणती व्यक्ती महापौर पदाची जबाबदारी स्वीकारणारी देशातली सर्वात तरुण व्यक्ती ठरली?

(A) आदित्य के.

(B) कांती पईकरा

(C) आर्या राजेंद्रन√√

(D) भार्नेश्वरी निर्मलकर


प्रश्न२२) कोणत्या तारखेला पहिला ‘आंतरराष्ट्रीय महामारी सज्जता दिन’ साजरा करण्यात आला?

(A) ३०डिसेंबर २०२०

(B) २९ डिसेंबर २०२०

(C) २८ डिसेंबर २०२०

(D) २७ डिसेंबर २०२०√√


प्रश्न२३) ‘पेडलंदरिकी इल्लू’ योजना कश्यासंबंधी आहे?

(A) सर्व गरीबांसाठी घरे(आंध्रप्रदेश)√√

(B) पहिल्या दोन बाळांच्या जन्मासाठी स्त्रियांना ४००० रुपयांचे रोख अनुदान

(C) योगदान-आधारित निवृत्तीवेतन प्रणाली

(D) वार्षिक १२ रुपयांच्या प्रीमियमसह अपघाती विमा


प्रश्न२४) कोणत्या प्रदेशात ‘भसन चर’ बेट आहे?

(A) बांगलादेश√√

(B) अंदमान

(C) निकोबार

(D) श्रीलंका


प्रश्न२५) अलीकडेच निधन झालेले सुनील कोठारी कोणत्या क्षेत्रामध्ये प्रसिद्ध होते?

(A) शास्त्रीय गायक

(B) वैज्ञानिक

(C) नृत्य-इतिहासकार√√

(D) पत्रकार


प्रश्न२६) कोणत्या संस्थेनी “न्युमोसील” या ब्रांड खाली स्वदेशी लस विकसित केली?

(A) सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया√√

(B) इंडियन असोसिएशन फॉर मेडिकल इन्फॉर्मेटिक्स

(C) AIIMS नवी दिल्ली

(D) भारतीय आरोग्य व्यवस्थापन संशोधन संस्था


प्रश्न२७) कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात भारताच्‍या पहिल्‍या चालकविरहित रेलगाडीचे उद्घाटन झाले?

(A) दिल्ली√√

(B) बंगळुरू

(C) कोलकाता

(D) चेन्नई


प्रश्न२८) कोणती व्यक्ती 'सुत्रनिवेदनाची सूत्रा – एक अणभव' हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहे?

(A) ए. कृष्ण राव

(B) डॉ. रूपा च्यारी√√

(C) श्रीपाद नाईक

(D) यापैकी नाही


प्रश्न२९) कोणत्या शहरात थोबल बहुउद्देशीय प्रकल्प आहे?

(A) कोहिमा

(B) दिसपूर

(C) इम्फाळ√√

(D) आगरतळा


प्रश्न३०) कोणती कंपनी घन-इंधनावर चालणाऱ्या रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी घेणारी पहिली भारतीय कंपनी ठरली?

(A) कोलिन्स एरोस्पेस

(B) एनआरसी एरोस्पेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

(C) स्कायरूट एरोस्पेस√√

(D) स्कंद एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...