Thursday 8 August 2019

🌺🌺 प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना भारतरत्न 🌺🌺

🔰माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आज (8 ऑगस्ट 2019 गुरूवार) देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान पुरस्कार 'भारत रत्न' देण्यात आला.,
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि जनसंघाचे नेते नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार बहाल केला.

🔰 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

🔰 या पुरस्कारासाठी दि. 25 जानेवारी 2019  या तिघांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती.

🔴प्रणव मुखर्जी

🔰 प्रणव मुखर्जी यांचा जन्म 11 डिसेंबर 1935 रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला.

🔰 ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसशी संबंधित आहेत.
त्यांनी भारताचे अर्थमंत्री,परराष्ट्रमंत्री तसेच संरक्षणमंत्री म्हणून काम केले.

🔰 भारतीय राजकारणामधील अमूल्य सेवेसाठी त्यांना भारत सरकारने इ.स. 2008 साली पद्मविभूषण पुरस्कार दिला. 

🔰 त्यांनी 25 जुलै 2012 ते 25 जुलै 2017 पर्यंत भारताचे 13 वे राष्ट्रपती म्हणून काम केले.

🔴नानाजी देशमुख

🔰 हिंगोली जिल्ह्य़ातील कडोली येथे 11 ऑक्टोबर 1916 रोजी त्यांचा जन्म झाला.

🔰 नानाजी देशमुख हे सामाजिक कार्यकर्ते होते. तसेच शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण स्वावलंबन या क्षेत्रात त्यांनी काम केले.

🔰 नानाजी देशमुख हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते होते.

🔰 राज्यसभेचे सदस्यही होते.

🔰 1999 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले

🔰 त्यांनी आणीबाणीत उजव्या आणि डाव्या पक्षांना समान राजकीय कार्यक्रम देण्यात आणि इंदिरा गांधींविरोधात संघटित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

🔰 जनता सरकारचा प्रयोग अपयशी ठरल्यानंतर मात्र राजकारणातून बाहेर पडून त्यांनी ग्रामीण भारत स्वयंपूर्ण व्हावा, यासाठी स्वत:ला झोकून दिले.

🔰 चित्रकूट येथे त्यांनी भारतीय संस्कृती आणि शिक्षण या बाबतीत मोठे कार्य केले होते.

🔰 27 फेब्रुवारी 2010 रोजी वयाच्या 95 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

🔴भूपेन हजारिका

🔰 त्यांचा जन्म 8 सप्टेंबर 1926 रोजी आसामच्या साडिया येथे झाला.

🔰 भूपेन हजारिका यांनी आसामात चित्रपट संगीतकार, गायक, गीतकार आणि दिग्दर्शक म्हणून कार्य केले.

🔰 आसामीबरोबरच हिंदी आणि बंगाली चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले होते.

🔰 चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च अशा ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने तसेच पद्म किताबानेही त्यांचा गौरव झाला होता.

🔰 ‘इप्टा’पासून कलाजीवनाचा प्रारंभ केलेले हजारिका अनेक सामाजिक आंदोलनातही सहभागी होते.

🔰 2004 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा कडून गुवाहाटीत उभे राहिले परंतु निवडून येऊ शकले नाही.

🔰 5 नोव्हेंबर 2011 रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांचे मुंबईत निधन झाले.

🍀भारत रत्न पुरस्कार

🔰 सुरुवात: 1954

🔰 राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कारची  शिफारस पंतप्रधान करतात.

🔰 पुरस्काराच्या एक बाजूला पिंपळाच्या पानावर सूर्याची प्रतिमा व देवनागरीत कोरलेला भारतरत्‍न हा शब्द तर एक बाजूला भारताचे राजचिन्ह असते.

🔰 हा पुरस्कार रोख स्वरूपात देत नाहीत..'हा पुरस्कार ज्या व्यक्तींना मिळाला आहे, त्यांच्या नावाआधी भारतरत्‍न हा शब्द उपाधीसारखा वापरायची मुभा नाही.

🔰 भारतरत्न पुरस्काराने आजवर 48 जणांना सन्मानित करण्यात आले आहे.

🔰 यापूर्वी 2015 मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

🔰 आत्तापर्यंत हजारिका आणि देशमुख यांच्यासह 14 जणांना मरणोत्तर भारतरत्नने गौरविण्यात आले आहे.

🔰 सुरुवातीला भारतरत्न मरणोत्तर देण्याची तरतूद नव्हती. मात्र, त्यानंतर 1955 पासून मरणोत्तरही या सन्मानाने सन्मानित केले जाऊ लागले.

🔰 सेवा, कला, साहित्य, विज्ञान व विश्वशांती, मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रांतील लोकांना, सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना, हा पुरस्कार देतात.

🔰 2014 मध्ये वरील क्षेत्रांबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारात स्थान देण्यात आले

🔰 प्रथम पुरस्कारविजेते(1954):
1) सर्वपल्ली राधाकृष्णन
2) चक्रवर्ती राजगोपालचारी
3) डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण

​​🇮🇳फोर्ब्जच्या यादीतही पी.व्ही.सिंधूची बाजी🇮🇳

🅾' फोर्ब्ज'ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगभरातील महिला खेळाडूंची यादी प्रसिद्ध केली.

🅾 त्यात स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू तेराव्या स्थानी आहे.

🅾 या यादीत स्थान मिळवणारी ती एकमेव भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

🅾सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगातील १५ महिला खेळाडूंची यादी फोर्ब्जनं प्रसिद्ध केली आहे.

🅾 त्यात अमेरिकेची दिग्गज टेनिस स्टार सेरेना विल्यम्स अव्वल स्थानी आहे. फोर्ब्जनं २०१९ या वर्षासाठी जाहीर केलेल्या यादीनुसार, सिंधूची कमाई ५५ लाख डॉलर (जवळपास ३८ कोटी ८६ लाख ८७ हजार रुपये) इतकी आहे.

🅾 सेरेना ही पहिल्या स्थानी आहे. तिची कमाई २९.२ दशलक्ष डॉलर आहे.

🅾  दुसऱ्या स्थानी जपानची नाओमी ओसाका आहे. ओसाकाची एकूण कमाई २४.३ दशलक्ष अमेरिकी डॉलर आहे.

🅾एंजेलिक कर्बर तिसऱ्या स्थानी असून, तिची कमाई ११.८ दशलक्ष अमेरिकी डॉलर इतकी आहे.

✅✅एका ओळीत सारांश,9 ऑगस्ट 2019✅✅

🌹🌳🌴दिनविशेष🌴🌳🌹

👉8 ऑगस्ट रोजी भारताने या दिनाचा 77 वा वर्धापन दिन साजरा केला - ऑगस्ट क्रांती दिन.

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉RBIचा नवा रेपो दर - 5.40%.

👉RBIचा नवा रिव्हर्स रेपो दर - 5.15%.

👉RBIचा नवा बँक दर - 5.65%.

👉RBIचा नवा मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी (MSF) दर - 5.65%.

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉8 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था (NISE) आणि या जागतिक संघटनेच्या दरम्यान कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्यासंदर्भात करार झाला - संयुक्त राष्ट्रसंघ औद्योगिक विकास संस्था (UNIDO).

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉“भारतरत्न” हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेले भारताचे तेरावे राष्ट्रपती - प्रणव मुखर्जी.

👉7 ऑगस्ट रोजी निधन झालेले ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेता - जे. ओम प्रकाश.

🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹

👉‘फोर्ब्ज’च्या सर्वाधिक कमाई करणार्‍या जगभरातल्या महिला खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवणारी एकमेव भारतीय महिला खेळाडू - बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू(55 लाख डॉलरसह तेराव्या स्थानी).

👉‘फोर्ब्ज’च्या सर्वाधिक कमाई करणार्‍या जगभरातल्या महिला खेळाडूंच्या यादीत प्रथम स्थान - टेनिसपटूसेरेना विल्यम्स (अमेरीका).

👉24 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात होणार्‍या ‘AASF एशियन एज ग्रुप चँपियनशिप 2019’ या स्पर्धेचे ठिकाण - बेंगळुरू (कर्नाटक).

👉दोन समांतर संस्थांची निवड करून दिशानिर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल 8 ऑगस्ट रोजी या जागतिक संस्थेनी भारतीय तिरंदाजी संघाची (AAI) सदस्यता निलंबित केली – वर्ल्ड आर्चरी.

🌹🌳🌴राज्य विशेष🌴🌳🌹

👉महाराष्ट्रासाठी असलेल्या मुख्य निवडणूक अध‍िकारी कार्यालयाऐवजी हा स्वतंत्र विभाग निर्माण करण्यास आणि त्यासाठी नवीन 128 पदे निर्माण करण्यास 7 ऑगस्टला झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली - राज्य निवडणूक विभाग.

🌹🌳🌴विज्ञान व तंत्रज्ञान🌴🌳🌹

👉ब्रिटनच्या या विद्यापीठातल्या वैज्ञानिकांनी जगातले जाडीने सर्वात पातळ (0.47 नॅनोमीटर) सोने (2-डी पदार्थ) तयार केले आहे जे मानवी बोटाच्या नखापेक्षा दहा लक्ष पटीने कमी जाडीचे किंवा फक्त दोन अणूच्या जाडीचे आहे – लीड्स विद्यापीठ.

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉ज्या दराने बँकांना RBIकडून कर्ज दिले जाते - रेपो दर.

👉विविध बँकांच्या RBIमध्ये जमा असलेल्या पैश्यावर बँकांना मिळणारा व्याज दर - रिव्हर्स रेपो दर.

👉भारतीय जलतरण महासंघ (SFI) याचे स्थापना वर्ष – सन 1948.

👉अखिल भारतीय काँग्रेस परिषदेच्या मुंबई अधिवेशनात 'भारत छोडो' हा ठराव संमत झाला तो दिवस - 8 ऑगस्ट 1942.

👉संयुक्त राष्ट्रसंघ औद्योगिक विकास संस्था (UNIDO) – स्थापना वर्ष: 1966 (17 नोव्हेंबर); मुख्यालय: व्हिएन्ना, ऑस्ट्रिया.

👉आशिया जलतरण महासंघ (AASF) – स्थापना वर्ष: 1978; मुख्यालय: मस्कट, ओमान.

👑👑प्रधानमंत्री मोदी के द्वारा घोषित योजनाएं👑👑

▪️1. प्रधानमंत्री जनधन योजना
Ans 28 अगस्त 2014

▪️2. डिजिटल इंडिया
Ans 21 अगस्त 2014

▪️3. मेक इन इण्डिया
Ans 25 सितम्बर 2014

▪️4. स्वच्छ भारत मिशन
Ans 2 अक्टूबर 2014

▪️5. सांसद आदर्श ग्राम योजना
Ans 11 अक्टूबर 2014

▪️6. श्रमेव जयते -
Ans 16 अक्टूबर 2014

▪️7. जीवन प्रमाण (पेंशन भोगियों के लिए)
Ans 10 नवम्बर 2014

▪️8. मिशन इंद्र धनुष (टीकाकरण)
Ans 25 दिसम्बर 2014

▪️9. नीति (NITI) आयोग -
Ans 1 जनवरी 2015

▪️10. पहल (प्रत्यक्ष हस्तांतरण)
Ans 1 जनवरी 2015

▪️11. हृदय(समृध्द सांस्कृतिक विरासत संरक्षण व कायाकल्प)
Ans 21जनवरी 2015

▪️12. बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ
Ans 22 जनवरी 2015

▪️13. सुकन्या समृद्धि योजना
Ans22 जनवरी 2015

▪️14. मृदा स्वास्थय कार्ड
Ans 19 फरवरी 2015

     15. प्रधानमंत्री कौशल विकास
Ans 20 फरवरी 2015

▪️16. प्रधानमंत्री जीवन ज्योति
Ans 9 मई 2015

▪️17. प्रधानमंत्री सुरक्षा बीमा
Ans 9 मई 2015

▪️18. अटल पेंशन योजना -
Ans 9 मई 2015

▪️19. उस्ताद(usttad)(अल्पसंख्यक कारीगर)
Ans 14 मई 2015

▪️20. कायाकल्प (जन स्वास्थ)
Ans 15 मई 2015

▪️21. डीडी किसान चैनल -
Ans26 मई 2015

▪️22. स्मार्ट सिटी मिशन , सबके लिए आवास योजना
Ans25 जून 2015

▪️23. दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योति योजना
Ans 25 जुलाई 2015

🌹🌳भारतीय रिझर्व्ह बॅंकेचा नवा रेपो दर - 5.40%🌴🌳🌹

👉7 ऑगस्ट 2019 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) रेपो दरात 35 बेसिस पॉईंटची (0.35 टक्क्यांची) कपात करीत नवा रेपो दर 5.40 टक्के एवढा निश्चित केला.

👉RBIच्या सहा सदस्यीय वित्तीय धोरण समितीने (MPC) हा निर्णय घेतला.

👉रिव्हर्स रेपो दर 5.15 टक्के इतका करण्यात आला आहे.

👉पूर्वी रेपो दर 5.75 टक्के होता.

👉सप्टेंबर 2010 नंतरचा सर्वात कमी दर होता. त्यानंतर RBIने तीन वेळा रेपो दर 0.75 टक्के केला.

👉 रेपो दर कमी केल्यामुळे गृह, वाहन आणि अन्य कर्जे स्वस्त होण्याची शक्यता आहे.

🌹🌳🌴रेपो दर🌴🌳🌹

👉रेपो दर म्हणजे ज्या दराने बँकांना RBIकडून कर्ज दिले जाते.

👉बँका याच पैशातून ग्राहकांना कर्ज पुरवठा करत असतात.

👉रेपो दर कमी झाल्यास बँकांना मिळणारे कर्ज स्वस्त होतात.

👉अर्थातच, गृह कर्ज आणि वाहन कर्जासह इतर कर्जांवरील हप्ते स्वस्त किंवा महाग होऊ शकतात.

🌹🌳🌴रिव्हर्स रेपो दर🌴🌳🌹

👉रिव्हर्स रेपो दर म्हणजे विविध बँकांच्या RBIमध्ये जमा असलेल्या पैश्यावर बँकांना मिळणारा व्याज होय.

👉रिव्हर्स रेपो दराच्या माध्यमातून RBI बाजारपेठेतल्या कॅश लिक्विडी म्हणजेच रोखच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवू शकते.

👉बाजारात खूप रोख रक्कम असल्यास RBI रिव्हर्स दरामध्ये वाढ करत असते.

👉जेणेकरून बँका जास्त व्याज मिळविण्यासाठी स्वताःकडील जास्तीत-जास्त रोख रक्कम RBIमध्ये जमा करतील.

🌹🌳🌴भारताने UNISA या वैश्विक करारनाम्यावर स्वाक्षरी केली🌴🌳🌹

👉दिनांक 7 ऑगस्ट 2019 रोजी सिंगापूर “कन्व्हेंशन ऑन मिडीयेशन” या नावाने ओळखल्या जाणार्‍या ‘मध्यस्थीमधून तयार झालेल्या आंतरराष्ट्रीय तंटा निवारण करार विषयक संयुक्त राष्ट्रसंघाची परिषद’ (UNISA) यावर भारतासह संयुक्त राष्ट्रसंघ आमसभेच्या 46 सदस्यांनी सिंगापूरमध्ये स्वाक्षर्‍या केल्या. यावर अमेरीका आणि चीन या देशांनीही स्वाक्षर्‍या केल्या.

👉20 डिसेंबर 2018 रोजी मध्यस्थीमधून तयार झालेल्या आंतरराष्ट्रीय तंटा निवारण करार विषयक संयुक्त राष्ट्रसंघाची परिषद (UN Convention on International Settlement Agreements -UNISA) स्वीकारले गेले.

👉हा वैश्विक करारनामा अंमलात आणण्यासाठी आता केवळ तीन सदस्य देशांच्या स्वाक्षर्‍या हव्या आहेत.

👉या कराराच्या अंमलबजावणीमुळे व्यवसाय करणे अधिकाधीक सुलभ होण्यास मदत होणार.

👉 कॉर्पोरेट क्षेत्रातले तंटे सोडविण्यासाठी मध्यस्थींची गरज ओळखली गेली आहे.

👉2005 साली चेन्नईत भारताचे पहिले मध्यस्थी केंद्र स्थापन केले गेले.

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...