Wednesday 19 February 2020

जानेवारी 2020 चा घाऊक किंमत निर्देशांक.


 
सर्व वस्तूंसाठीच्या घाऊक किंमत निर्देशांकात जानेवारी 2020 मध्ये आधीच्या महिन्याच्या तुलनेत 0.1 टक्के वाढ होऊन तो 122.8 वरून 122.9 (तात्पुरती आकडेवारी)वर पोहोचला.

चलनफुगवटा....

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा वार्षिक दर जानेवारी 2020 मध्ये 3.1 टक्के राहिला. आधीच्या महिन्यात तो 2.59 टक्के(तात्पुरती आकडेवारी)  आणि जानेवारी 2019 मध्ये तो 2.76 टक्के होता.

प्राथमिक वस्तू...

या गटाच्या निर्देशांकात 1.1 टक्क्याने घसरण होऊन तो 147.2 (तात्पुरती आकडेवारी) झाला. त्या आधीच्या महिन्यात तो 148.8 होता.

अन्न घटकाच्या निर्देशांकात आधीच्या महिन्याच्या तुलनेत 1 टक्क्याने घसरण होऊन तो 160.8 झाला.

‘खाद्येतर’ घटकाच्या निर्देशांकात 1.4 टक्के घसरण होऊन तो 132.1 पर्यंत खाली आला.

‘खनिजे’ घटकाच्या निर्देशांक 7.2 टक्के घट होऊन तो 142.6 झाला.

‘कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू’ घटकाच्या निर्देशांकात 2.7 टक्के वाढ हाऊन तो आधीच्या महिन्याच्या 88.3 झाला.

इंधन आणि वीज

या गटाच्या निर्देशांकात 1.4 टक्के वाढ होऊन तो 102.7 राहिला.

उत्पादित वस्तू
या गटाच्या निर्देशांकात 0.4 टक्के वाढ होऊन ते 118.5 झाला.

अन्नधान्य आधारित घाऊक किंमत निर्देशांक..

अन्नधान्य आधारित घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर घसरून जानेवारी 2020 मध्ये तो 10.12 टक्के झाला. डिसेंबर 2019 मध्ये तो 11.05 टक्के होता.

पद्मविभूषण पुरस्कार जिंकणारी मेरी कॉम पहिली महिला खेळाडू

🔹 तरनजितसिंग संधू यांची अमेरिकेत भारताचे नवे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या श्रीलंकेमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून कार्यरत आहेत.

🔸 पश्चिम बंगाल सीएएविरूद्ध ठराव संमत करणारे चौथे राज्य ठरले.हिवाळी अधिवेशनात संसदेने नागरिकत्व दुरुस्ती कायदा संमत केला. परंतु बरीच राज्ये या कायद्याला विरोध करीत आहेत. या कायद्याच्या विरोधात पहिला ठराव संमत करणारे केरळ हे पहिले राज्य ठरले. केरळनंतर पंजाब, राजस्थान पश्चिम बंगाल असा क्रम लागतो.

🔹कोलकत्ता येथे हुगळी नदीवर भारताची पहिली अंडरवॉटर मेट्रो बांधली जात आहे

🔸 ओडिशाच्या कोणार्क येथे राष्ट्रीय पर्यटन परिषद आयोजित करण्यात आली आहे

जगातील पहिले योग विद्यापीठ

- भारताबाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ अमेरिकेत चालू वर्षात संशोधनासह स्वतःचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करणार आहे. या अभ्यासक्रमासाठी एप्रिलपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती विद्यापीठ अधिकाऱयांनी दिली आहे.
- विवेकानंद योग विद्यापीठ 50 लाख डॉलर्सच्या अर्थसंकल्पासह लॉस एंजिलिस शहरात उभारण्यात आले आहे.
- केस वेस्टर्न विद्यापीठातील प्राध्यापक श्रीनाथ यांना योग विद्यापीठाशी संबंधित महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर भारतीय योगगुरु एच.आर. नागेंद्र याचे अध्यक्ष असतील. अभ्यासक्रम ऑगस्ट 2020 पासून सुरू होणार आहे.
- विद्यापीठाने योगवर आधारित उच्चशिक्षण उपलब्ध करण्यासाठी नोव्हेंबर 2019 मध्ये ब्युरो फॉर प्रायव्हेट पोस्टसेकंड्री एज्युकेशन, कॅलिफोर्नियाकडून अधिकृत मान्यता प्राप्त केल्याच्या तीन महिन्यांमध्येच ही घोषणा केली आहे.
-  ‘वायु’ची संकल्पना नासाचे माजी वैज्ञानिक नागेंद्र यांचीच आहे. नागेंद्र हे मागील 4 दशकांपासून योगप्रसार तसेच त्याच्या शिक्षणासाठी कार्यरत आहेत.
- भारतात 2002 मध्ये पहिले योग विद्यापीठ स्थापन करण्यात आले होते. त्यानंतरच नागेंद्र यांनी योगवर आधारित उच्चशिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ सुरू करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता.
- विद्यापीठामुळे अमेरिकेतील हजारो योगशिक्षकांना मदत मिळणार असल्याचे विधान विद्यापीठाच्या संचालक मंडळाचे सदस्य प्रेम भंडारी यांनी केले आहे

विठ्ठल रामजी शिंदे ऊर्फ महर्षी शिंदे

( जमखिंडी, २३ एप्रिल, इ.स. १८७३ - २ जानेवारी, इ.स. १९४४) हे मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक व लेखक होते.

जीवनसंपादन

शिंदे यांनी पुण्याच्या फर्गुसन कॉलेजमधून बी.ए.ची पदवी मिळवली. कायद्याच्या शिक्षणाचे प्रथम वर्ष उत्तीर्ण केल्यावर ते एल्एल.बी. परीक्षेकरिता मुंबईला गेले.तेथे ते प्रार्थना समाजातदाखल झाले. १८ ऒक्य़ोबर, इ.स. १९०६ रोजी महर्षी शिंदे यांनी ‘'डिप्रेस्ड क्लास मिशन’' या संस्थेची स्थापना केली. त्यांनी इ.स. १९२८ साली पुणे येथे शेतकरी परिषद भरवली.

🌺 लेखन 🌺

शिंदे यांनी वेगवेगळ्या कालखंडात रोजनिशी लिहिली. पहिल्यांदा १८९८ मध्ये फर्ग्युसन कॉलेजात शिकत असताना, मग १९०१-३ या काळात इंग्लंडमध्ये धर्मशिक्षण घेत असताना, व त्यानंतर कायदेभंग सहभागाबद्दल शिक्षा झाल्यानंतर १९३० साली येरवडा तुरुंगात असताना त्यांनी रोजनिशींचे लेखन केले आहे. याशिवाय १९२८ साली शिंदे यांनी 'ब्राह्मसमाज शतसांवत्सरी सफर' नावाची रोजनिशी लिहिली आहे. या चारही रोजनिशीत महर्षी शिंदे यांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते.

पहिल्या तीन रोजनिशींचे संपादन १९७९ साली गो. मा. पवार यांचे असून 'ब्राह्मसमाज शतसांवत्सरी सफर' या नावाच्या चौथ्या रोजनिशीचे संपादन रणधीर शिंदे यांचे आहे.

वि.रा. शिंदे यांच्या आत्मपर लिखाणाचे अनेक खंड प्रकाशित झाले आहेत. पहिल्या खंडात ’भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न : संशोधन आणि चिंतन’ हे लेखन आहे. दुसर्‍या खंडात महर्षी श‌िंदे यांच्या चार रोजनिशींचा समावेश असून, 'माझ्या आठवणी व अनुभव' हे पावणे ४०० पानी आत्मचरित्र व काही प्रवासवर्णने आहेत.

आत्मचरित्र

'माझ्या आठवणी व अनुभव' नावाचे हे आत्मचरित्र तीन भागांत विभागले असून पहिल्या भागात त्यांनी आपला जीवनवृत्तान्त सांगितला आहे. तर उर्वरित भागात शिंदे यांच्या ब्राह्मसमाज, प्रार्थना समाज, डिप्रेस्ड क्लासेस मिशन या सामाजिक व राजकीय कार्याचे विवेचन आहे. लहानपणी त्यांच्या घरी अनेकजण येत. त्यात साधू, रामदासी, संन्यासी व सिद्ध येत. त्यांचे लहानपणाचे अनुभव मोठे हृदयस्पर्शी आहेत. आपल्या वाड्यात सर्व शाळासोबती कसे जमत असत व त्यातून धांगडधिंग्याचा जिमखाना कसा बनत असे, हे ते सांगतात. शेतकरी चळवळी व परिषदांचे वृत्तान्त या आत्मनिवेदनात आहेत

दुसऱ्या मतदारसंघातूनही करता येणार मतदान

◾️तुम्ही राहताय मुंबई, ठाण्यात किंवा पुण्यात, तुम्ही मतदारही तिथलेच आहात; पण मतदानाच्या दिवशी काही कारणाने चेन्नई, बेंगळुरू, किंवा दिल्लीत आहात. अशा वेळी तुमचे मतदान हुकणार हे निश्चित.

◾️मात्र, मतदारांना अशा स्थितीत त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक आयोगाने पावले टाकण्यास सुरुवात केली असून, या कामी 'आयआयटी मद्रास'चे सहकार्य घेण्यात येत आहे.

◾️आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग मतदानासाठी करणारा हा प्रकल्प सध्या तरी संशोधन-विकासाच्या पातळीवर आहे.

◾️ ब्लॉक चेनप्रणालीचा वापर त्यासाठी करण्यात येत आहे.

◾️विशिष्ट आयपी क्रमांक असलेले कम्प्युटर, विशिष्ट इंटरनेट, बायोमेट्रिक यंत्रणा, वेब कॅमेरा अशा सगळ्या सामग्रीनिशी हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती वरिष्ठ निवडणूक उपायुक्त संदीप सक्सेना यांनी दिली

◾️. या यंत्रणेतून मतदाराची खात्री पटली की त्याला ई-मतपत्रिका दिली जाईल.

◾️त्याद्वारे मतदाराला मतदान करता येईल. मतमोजणीपूर्व टप्प्यावर अशा मतांमध्ये काही फेरफार करण्यात आलेले नाहीत ना, याची खातरजमा करण्यात येईल, अशी माहिती सक्सेना यांनी दिली.

🔰'घरच्या घरी मतदान नव्हे'

◾️'ही सुविधा प्रत्यक्षात आल्यानंतर मतदारांना ठराविक वेळेत, विशिष्ट ठिकाणी जाऊन मतदान करता येईल.

◾️ही सुविधा सर्वत्र आणि सर्वकाळ उपलब्ध नसेल. बाहेरून मतदान याचा अर्थ घरी बसून मतदान असा नव्हे. त्यासाठी ठराविक ठिकाणी जावेच लागेल,' असे सक्सेना यांनी स्पष्ट केले.

🔰कशी असेल प्रणाली?

◾️- 'टू-वे ब्लॉक चेन रिमोट व्होटिंग' ही यंत्रणा कार्यान्वित होणार

◾️- मतदार ओळखपत्रासह 'मल्टि लेअर आयटी सिस्टीम'च्या आधारे मतदाराची ओळख पटवली जाणार

◾️- बायोमॅट्रिक प्रणाली, वेब कॅमेरा यांचा उपयोग करता येणार

◾️- मतदाराची ओळख पटल्यानंतर 'ब्लॉक चेन पर्सनलाइज्ड' सिस्टीमद्वारे ई-मतदारपत्रिका मतदारापुढे येईल.

◾️- मतदान झाल्यानंतर त्याबाबत एक 'हॅशटॅग' कोड तयार होईल. त्यानंतर संबंधित मतदान गुप्त असल्याबाबत मतदाराची खात्री पटू शकेल.

◾️- असे मतदान करण्यासाठी मतदाराला मतदानापूर्वी अर्ज करावा लागणार आहे.

◾️- ही यंत्रणा अद्याप विकसित होत असून, ती प्रत्यक्षात येण्यास कालावधी आहे.

➖➖➖➖➖

2018-19 या वर्षाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा:-

📚शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या 2018-19 या वर्षाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा करण्यात आली (State sports awards) आहे.

📚यात कुस्तीमहर्षी पंढरीनाथ तथा आण्णासाहेब पठारे यांना शिवछत्रपती जीवन गौरव राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला आहे.

📚तर 5 जणांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.यात-

•युवराज खटके, सांगली (अॅथलेटिक्स)
• बाळासाहेब आवारे, बीड (कुस्ती)
• नितीन खत्री, पुणे (तायक्योंदो)
•जगदीश नानजकर, पुणे (खो-खो)
•अनिल बंडू पोवार, कोल्हापूर (पॅरा अॅथलेटिक्स) यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार दिला जाणार आहे.

📚तर शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची (खेळाडू गट) यादी जाहीर करण्यात आली आहे. यात कबड्डी खेळात पुरुष गटातून रिशांक देवाडिगा आणि गिरीष इरनक तर महिला गटातून सोनाली शिंगटे हिला पुरस्कार जाहीर झाला आहे.

📚 कुस्ती खेळासाठी राज्य क्रीडा पुरस्कार अभिजित कटके याला दिला जाणार (State sports awards) आहे.

📚त्याशिवाय साहसी गटात चौघांना राज्य क्रीडा पुरस्कार मिळणार आहे. यात खाडी पोहणे यासाठी प्रभात कोळी आणि शुभम वनमाली यांना पुरस्कार दिला जाणार आहे.

📚तर गिर्यारोहणासाठी अपर्णा प्रभूदेसाई आणि सागर बडवे यांना राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

📚तर स्वप्निल पाटील (जलतरण), पार्थ हेंद्रे (जलतरण), सायली पोहरे (जलतरण) या तिघांना दिव्यांग खेळाडू गटातील राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाले आहेत. तर जयदीपकुमार सिंह याला ज्युदो आणि वैष्णवी सुतार हिला टेबल टेनिस खेळासाठी पुरस्कार दिला जाणार (State sports awards) आहे

पंतप्रधान मोदींनी केली राम मंदिराबाबत आणखी एक मोठी घोषणा

राम मंदिराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजून एका मोठ्या निर्णयाची रविवारी घोषणा केली.भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टकडे 67 एकर जमीन हस्तांतरीत करण्यात येईल अशी घोषणा मोदींनी केली आहे. वाराणसी येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली.

तसेच अनेक वर्षांपासून वादग्रस्त जमीन म्हणून ओळखळी जाणारी अयोध्येतील राम जन्मभूमीची 67 एकर जमीन केंद्र सरकारच्या ताब्यात होती. जोपर्यंत या जागेचा वाद मिटत नाही तोपर्यंत ही जमीन केंद्राच्या ताब्यात राहिल, असा आदेश याबाबत सुप्रीम कोर्टाने दिला होता.

आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानेच रामजन्मभूमीचा वाद संपुष्टात आल्याने ही सर्व जमीन राम मंदिराच्या उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या  ‘रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ला देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.तर या संपूर्ण जागेवर आता भव्य राम मंदिराची स्थापना करण्यात येईल असे मोदींनी म्हटले आहे.

बेंगळुरूमध्ये दक्षिण भारतातले पहिले ‘भारतीय बँकनोट’ संग्रहालय..

कर्नाटक राज्याच्या बेंगळुरू या शहरात प्रेस्टीज फाल्कन टॉवर्स या ठिकाणी “म्यूजियम ऑफ इंडियन पेपर मनी” या बँकनोटांच्या संग्रहालयाचे उद्घाटन उद्योजक रेझवान रझाक ह्यांच्या हस्ते करण्यात आले. हे देशातले द्वितीय तर दक्षिण भारतातले पहिले ‘भारतीय बँकनोट’ संग्रहालय आहे. पहिल्या संग्रहालयाची भारतीय रिझर्व्ह बँकेनी मुंबईत स्थापना केलेली आहे.

संग्रहालयाची वैशिष्ट्ये...

ब्रिटिशांना ‘भारत छोडो’ असा संदेश मिळाला होता अश्या स्वातंत्र्यपूर्व युगात चलनात असलेल्या नोटा, ‘जय तेलंगणा’ या राजकीय संदेशाला अनुसरून असलेल्या नोटा, 1000 रुपयांची नोट अश्या सर्व बँकनोटांचा समावेश या नव्या संग्रहालयात करण्यात आला आहे.ब्रिटीश राजवटीआधीच देशात विकसित झालेल्या कागदी नोटांनी भरलेल्या या संग्रहालयात गेल्या 20 वर्षांच्या कालावधीतल्या 700 हून अधिक कलाकृती संग्रहित करण्यात आल्या आहेत.

सर्वात जुनी नोट म्हणजे 1812 साली प्रसिद्ध झालेली नोट होय. तसेच पोर्तुगीज सरकारने गोव्यामध्ये 1924 मध्ये प्रसिद्ध केलेल्या रु. 50 आणि रु. 500 इतके मूल्य असलेल्या नोटा देखील ठेवण्यात आल्या आहेत.तिथे 10,000 रुपये इतके उच्च मूल्य असलेली पूर्वीची नोट देखील प्रदर्शनात ठेवली गेली आहे.

लष्करातील महिलांना मिळणार कायमस्वरुपी नियुक्ती


सर्वोच्च न्यायालयाने लष्करातील महिला अधिकाऱ्यांसाठी मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने महिलांना कायमची पोस्टिंग देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

महिलांना कायमस्वरूपीची पोस्टिंग मिळाली पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे. केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

महिलांना कायमची पोस्टिंग दिल्यास त्याचा शत्रू राष्ट्र लाभ घेऊ शकतो. तसेच पुरुषांनाही त्यांना आदेश देण्यात अडचणी येऊ शकतात, असा युक्तिवाद मोदी सरकारने केला होता.

2010 ला दिल्ली उच्च न्यायालयाने महिला अधिकाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला होता. त्याला मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने हा उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. तसेच ही याचिका फेटाळून लावली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर मोदी सरकारने तो अद्याप लागू केलेला नाही. उच्च न्यायालयाने 9 वर्षांनंतर केंद्रासाठी नवीन धोरण उपलब्ध करून दिले आहे.

विदेश सेवा संस्थेला ‘स्वराज’ यांचे नाव

🔰 माजी विदेशमंत्री आणि भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त दिल्ली येथील अनिवासी भारतीय केंद्राला सुषमा स्वराज भवन हे नाव देण्यात येणार आहे. याचबरोबर राजधानीतील विदेश सेवा संस्थेचे सुषमा स्वराज इन्स्टीटय़ूट ऑफ फॉरेन सर्व्हिस असे नामकरण करण्यात येणार आहे. विदेशमंत्री म्हणून स्वराज यांनी दिलेले योगदान पाहता केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे.

🔰 माजी विदेशमंत्री स्वराज यांच्या अतुलनीय योगदानासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विदेश मंत्रालयाने गुरुवारी दिली आहे. माजी विदेश मंत्र्यांच्या दशकांची सार्वजनिक सेवा आणि त्यांच्या वारशाला सन्मान देत 14 फेब्रुवारी रोजी त्यांच्या पहिल्या जयंतीपूर्वी ही घोषणा केली जात असल्याचेही विदेश मंत्रालयाने सांगितले आहे.

🔰 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या कार्यकाळात स्वराज यांना विदेशमंत्रिपद देण्यात आले होते. विदेशात राहत असलेल्या भारतीयांच्या मदतीकरता त्यांनी उचललेल्या पावलांचे प्रचंड कौतुक झाले होते. स्वराज लोकांशी ट्विटच्या माध्यमातून संपर्कात असायच्या आणि त्यांनी याच माध्यमातून लोकांच्या अडीअडचणी सोडविल्या होत्या. 6 ऑगस्ट 2019 रोजी स्वराज यांचे निधन झाले होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

इंदूर बनणार ‘सायलेंट सिटी ऑफ इंडिया

◾️'इंदूरमधील वाढत्या ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत.

◾️शहराला 'सायलेंट सिटी ऑफ इंडिया' बनवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली असून, मुंबईच्या धर्तीवर शहरात ठिकठिकाणी 'स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल' यंत्रणा बसविण्यात येणार आहे,' अशी माहिती रविवारी जिल्हाधिकारी लोकेशकुमार जाटव यांनी दिली.

◾️'इंदूरला ध्वनी प्रदूषणमुक्त करायचे असून, मार्च २०२१ पर्यंत भारतातील सायलेंट सिटी म्हणून नावारूपाला आणायचे आहे.

◾️मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठासह परिसरातील वृद्धाश्रम, रुग्णालये, शैक्षणिक संस्था यांसह महत्त्वाच्या ३९ ठिकाणी 'शांती क्षेत्र' घोषित करण्यात येणार आहे. या ठिकाणी मोठे हॉर्न, बँड, डिजे वाजविण्यास बंदी असेल.

◾️नागरिकांनी सरकारी वाहनांनी प्रवास करावा, यासाठी वाहनांची संख्या वाढविण्यात येणार आहे; तसेच जे वाहनचालक सिग्नलपाशी विनाकारण हॉर्न वाजवतील, अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर 'स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल' उभारण्यात येणार आहेत.'

◾️या यंत्रणेंतर्गत सिग्नल डेसिबल मीटरने जोडण्यात येतील. सिग्नलला सतत हॉर्न वाजवल्

2020-21 या वर्षापासून RBIचे लेखा वर्ष आणि सरकारचे वित्त वर्ष एकच असणार.

🔸भारतीय रिझर्व्ह बँकेचे लेखा वर्ष (अकाउंटिंग ईयर) आणि भारत सरकारचे वित्त वर्ष (फायनॅनष्यल ईयर) 2020-21 या वर्षापासून एकच करण्याची शिफारस समितीने केली आहे.

🔸सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे लेखा वर्ष 1 जुलै ते 30 जून असून, वित्त वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असे आहे. या निर्णयानुसार, दोनही वर्षे जुळविल्यास रिझर्व्ह बँकेला अंतरिम लाभांश देण्याची गरज पडणार नाही.

🔸भारतीय रिझर्व्ह बँक

🔸भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारत सरकारने स्थापना केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे.

🔸RBIची स्थापना दिनांक 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आली. त्याचे मुख्य कार्यालय मुंबई (महाराष्ट्र) येथे आहे. RBIचे 1949 साली भारत सरकारद्वारे राष्ट्रीयीकरण गेले आहे.

🔸RBI वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण जाहीर करते.

🔸भारतीय रिझर्व बँकेचे
प्रमुख उद्देश - भारतीय चलनी नोटांची छपाई गरजेनुसार करणे, भारताचा FDI प्रवाह (गंगाजळी) राखणे, भारताची आर्थिक स्थिती राखणे, भारतीय चलन आणि पत यांचे रक्षण करणे.

🔸RBIने शैली आणि दृष्टीकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या ‘दि प्राॅब्लम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्यूशन’ या पुस्तकातून घेतले.

🔸सर ओस्बॉर्न स्मिथ हे RBIचे पहिले गव्हर्नर (1 एप्रिल 1935 ते 30 जून 1937) होते. सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे पहिले भारतीय मूल निवासी गव्हर्नर (तिसरे गव्हर्नर) दि. 11 ऑगस्ट 1943 रोजी या पदावर विराजमान झाले.

🔸वर्तमानात, शक्तीकांत दास गव्हर्नर आहेत. बी. पी. कानुंगो, एन. एस. विश्वनाथन, महेश कुमार जैन आणि मायकल पात्रा असे चार डेप्युटी गव्हर्नर आहेत.

General Knowledge

▪ ‘काशी महाकाल एक्सप्रेस’ नावाची तिसरी कॉर्पोरेट पॅसेंजर रेलगाडी कोणत्या मार्गावर धावणार?
उत्तर : वाराणसी-इंदौर

▪ ‘फिरते मधमाशा पालनगृह’ हा उपक्रम कोणत्या मंत्रालयाचा आहे?
उत्तर : सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय

▪ ‘भारतीय नौदल अकादमी’ कुठे आहे?
उत्तर : केरळ

▪ कोणत्या शहरात ‘राष्ट्रीय सेंद्रिय खाद्य’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले?
उत्तर : नवी दिल्ली

▪ कोणती व्यक्ती पंधराव्या वित्त आयोगाने नेमलेल्या ‘संरक्षण व अंतर्गत सुरक्षा गट’चे अध्यक्ष आहे?
उत्तर : एन. के. सिंग

▪ खादी व ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यालय कुठे आहे?
उत्तर : मुंबई

▪ ‘भारतीय नौदल जलविज्ञान विभाग’ याचे कार्यालय कुठे आहे?
उत्तर : देहरादून

▪ कोणते मंत्रालय ‘स्कूल हेल्थ अँड वेलनेस अम्बॅसडर’ उपक्रम राबवत आहे?
उत्तर : आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय

▪ 'जागतिक युनानी दिन' कधी साजरा केला जातो?
उत्तर : हकीम अजमल खान

▪ ‘खेलो इंडिया’ अभियानाच्या अंतर्गत राष्ट्रीय हिवाळी खेळांचे आयोजन कुठे केले जाणार आहे?
उत्तर : गुलमर्ग

महत्त्वाचे प्रश्नसंच


केंद्रीय प्रशासकीय न्यायपीठ (CAT) याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. केंद्रीय प्रशासकीय न्यायापीठाचे मुख्य पीठ दिल्लीत आहे.

2. वर्तमानात, CATचे 10 नियमित पिठे आणि 4 चक्रिय पिठे आहेत.

दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा:

(A) केवळ (1)✅✅
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2)

♻️♻️
जागतिक बँकेच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. जागतिक बँकेकडून कर्ज घेणारा पहिला देश फ्रान्स हा होता.

2. भारत जागतिक बँकेकडून कर्ज घेणारा सर्वात मोठा प्राप्तकर्ता आहे.

दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही✅✅
(D) ना (1), ना (2)

👍♻️
‘संप्रिती-9’ हा भारत आणि ______ या देशांच्या दरम्यानचा संयुक्त सैन्य सराव आहे.
(A) बांगलादेश✅✅
(B) म्यानमार
(C) युगांडा
(D) ताजिकिस्तान

♻️♻️
____ येथे ‘वन्य प्राण्यांच्या स्थलांतरण करणाऱ्या प्रजातींचे संवर्धन (CMS)’ विषयक करारनाम्याची 13 वी पक्षीय परिषद (COP) याचे उद्घाटन करण्यात आले.
(A) नवी दिल्ली
(B) गांधीनगर✅✅✅
(C) हैदराबाद
(D) चेन्नई

♻️♻️
पंधराव्या वित्त आयोगाने ‘कृषी निर्यात संदर्भात उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती’ नेमली. या गटाचे अध्यक्ष कोण आहेत?
(A) राधा सिंग
(B) सुरेश नारायणन
(C) जय श्रॉफ
(D) संजीव पुरी👍✅✅

♻️♻️♻️
_________ येथे ‘प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा’ विषयक चौथी राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली.
(A) नागपूर
(B) उदयपूर👍✅✅
(C) भोपाळ
(D) नवी दिल्ली

♻️♻️
मृदा आरोग्य कार्ड योजनेच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. ही योजना फेब्रुवारी 2014 मध्ये लागू केली गेली.

2. 2015 हे वर्ष आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष म्हणून साजरे करण्यात आले.

3. योजनेच्या अंतर्गत दरवर्षी शेतकर्‍यांना मृदा आरोग्य कार्डाचे वाटप केले जाते.

दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा:

(A) (1) आणि (2)
(B) (2) आणि (3)
(C) केवळ (2)👍✅✅
(D) (1), (2) आणि (3)

♻️♻️✅
कोणत्या देशाने पुढील तीन वर्षांसाठी ‘वन्य प्राण्यांच्या स्थलांतरण करणाऱ्या प्रजातींचे संवर्धन (CMS)’ विषयक संयुक्त राष्ट्रसंघाच्या मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले?
(A) ब्राझील
(B) दक्षिण आफ्रिका
(C) भारत✅✅✅
(D) जर्मनी

♻️♻️
"वैश्विक ध्येये 2030 साध्य करण्यासाठी रस्ता सुरक्षा’ विषयक तिसरी उच्च स्तरीय वैश्विक परिषद’ _______ येथे झाली.
(A) जापान
(B) ब्राझील
(C) दक्षिण आफ्रिका
(D) स्टॉकहोम✅✅✅

♻️♻️
आशियातला सर्वात दीर्घ दुहेरी बोगदा असलेला झोजिला बोगदा ______ या राज्यात आहे.
(A) जम्मू व काश्मीर✅✅✅✅✅
(B) हिमाचल प्रदेश
(C) सिक्किम
(D) अरुणाचल प्रदेश

Latest post

महाराष्ट्राचा भूगोल

दख्खनवरील पठारे ------------------------------------------------------------ ----------------------- अ.क्र. पठार. जिल्हा. ------------------...