Wednesday 30 June 2021

भारतातील जनक विषयी माहिती



    🔶भारताचे राष्ट्रपिता – महात्मा गांधी


    🔶आधुनिक भारताचे शिल्पकार – पं. जवाहरलाल नेहरू


    🔶भारतीय असंतोषाचे जनक – लोकमान्य टिळक


    🔶सथानिक स्वराज्य संस्थेचे जनक – लॉर्ड रिपन


    🔶राष्ट्रीय काँग्रेसचे जनक – अॅलन हयूम


    🔶हरितक्रांतीचे जनक – डॉ. स्वामीनाथन


    🔶चित्रपटसृष्टीचे जनक – दादासाहेब फाळके


    🔶राज्यघटनेचे जनक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर


   🔶धवलक्रांतीचे जनक – डॉ. कुरियन


    🔶वनमहोत्सवाचे जनक – कन्हैयालाल मुन्शी

Friday 25 June 2021

भारताच्या शाश्वत विकास उद्दिष्टांचा तिसरा निर्देशांक नीति आयोगाद्वारे जाहीर.

✔️ भारताच्या शाश्वत विकास उद्दिष्टांचा तिसरा निर्देशांक, आज नीति आयोगामार्फत जाहीर करण्यात आले.

✔️ या अहवालानुसार देशाचा निर्देशांक ६ अंकांनी वाढला आहे. २०१९ मध्ये तो ६० वर होता, तो आता २०२०-२१ मध्ये ६६ इतका  आहे.

✔️ पिण्याच्या पाण्याची स्वच्छता, सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था, रास्ते आणि स्वच्छ ऊर्जा या गोष्टींवर देशभरात झालेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे हा निर्देशांक वाढला आहे.

✔️महाराष्ट्रासह केरळ, हिमाचल प्रदेश, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, गोवा, कर्नाटक, उत्तराखंड आणि सिक्कीम या नऊ राज्यांनी सर्वाधिक समाधानकारक कामगिरी केली आहे.

✔️ २०१९ मध्ये सर्वाधिक चुरस असलेली १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश होते. ती संख्या २०२०-२१ मध्ये १२ वर गेली आहे.  

✔️ प्रत्येक राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या अंमलबजावणीनुसार भारताचा निर्देशांक तयार केला जातो.

✔️डिसेंबर २०१८ पासून सुरू करण्यात आलेला हा निर्देशांक उपक्रम, देशातील शाश्वत विकास उद्दिष्टांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठीचं एक मूलभूत साधन ठरले आहे.

✔️ यामुळे जागतिक शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये आपलं स्थान मिळवण्यासाठी विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील स्पर्धा वाढली आहे.

✔️राज्य आणि केंद्रशासित प्रदेश तसेच संयुक्त राष्ट्र संघटना, भारतातील सांख्यिकी आणि. कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय आणि मुख्य केंद्रीय मंत्रालयांशी विस्तृत चर्चा करून नीती आयोगाने हे निर्देशांक तयार केले आहेत.

Thursday 24 June 2021

अंकगणित प्रश्नसंच

Q1) चार अंकी मोठ्यात मोठी संख्या व चार अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज.

1) 10999✅ 

2) 11110 

3) 8888  

4) 8999 


Q2) 587, 678, 499, 591 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या तर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकांच्या संख्यांमधील फरक किती येईल?

1) 91 

2) 4 

3) 87 

4) 88✅ 


Q3) ज्यात 3 हा अंक नाही अशा दोन अंकी संख्या किती ?

1) 72✅

2) 80 

3) 79 

4) 81  


Q4) सर्वात मोठी दोन अंकी सम संख्या व सर्वात लहान दोन अंकी विषम संख्या यातील फरक किती?* 

1) 87✅

2) 88 

3) 89 

4) 90  


Q5) तीन अंकी दोन संख्येची बेरीज खाली दिलेली आहे. ती बेरीज कोणती आहे ?

1) 198 

2) 199 

3) 1999 

4) 1998✅


Q6) खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे.

1) सम संख्या + सम संख्या = सम संख्या   

2) विषम संख्या + विषम संख्या = सम संख्या 

3) सम संख्या x सम संख्या = सम संख्या 

4) विषम संख्या x विषम संख्या = सम संख्या✅  


Q7) तीन अंकी मोठ्यात मोठी सम संख्या कोणती?

1) 900 

2) 990 

3) 998✅  

4) 999 


Q8) पाच क्रमावर विषम संख्यांचे बेरीज 295 येते तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?

1) 60 

2) 61 

3) 62 

4) 63✅  


Q9) 7663 या संख्येतील 6 च्या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती?

1) 660 

2) 630 

3) 540✅ 

4) 450  


Q10) पहिल्या 30 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?

1) 15.5✅

2) 15 

3) 14.5 

4) 16.5 


important Questions 25


🎯01] हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?

👉🏻 बियास


🎯02] भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?

👉🏻 तिरुवनंतपुरम


🎯03] कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow’s Sanctuary) स्थापन्यात येणार आहे? 

👉🏻 मध्य प्रदेश


🎯04] कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.

👉🏻 औरंगाबाद


🎯05]  हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?

👉🏻 रांची


🎯06] फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

👉🏻 जळगाव


🎯07] मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?

👉🏻 लक्षद्वीप


🎯08] भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे? 

👉🏻 12 लाख चौ.कि.मी.


🎯09] नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?

👉🏻 दख्खनचे पठार


🎯10] महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे? 

👉🏻 मध्य प्रदेश


🎯11] महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत? 

👉🏻 उत्तर


🎯12]  परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?

👉🏻 निर्मळ रांग


🎯13] ‘V’ आकाराची दरी कशामुळे तयार होते?

👉🏻 नदीचे अपघर्षण


🎯14] दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे? 

👉🏻 Lignite



🎯15] बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

👉🏻 औरंगाबाद


🎯16] Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?

👉🏻 पाचगणी


🎯17] हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?

👉🏻 आसाम


🎯18] पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?

👉🏻 मणिपूर


🎯19] पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?

👉🏻 मरियाना गर्ता


🎯20] गोवरी’ कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?

👉🏻 राजस्थान


🎯21] घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?

👉🏻 दर्गा


🎯22] ग्रेट बॅरियर रीफ’ कोणत्या महासागरात आहे?

👉🏻 परशांत महासागर


🎯23] या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?

👉🏻 शक्र


🎯24]  कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?

👉🏻 गोदावरी


🎯25]   भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?

👉🏻 आसाम

चालू घडामोडी प्रश्न


१.   अ) भारताचे सार्वभौम पतमानांकन दोन वर्षांच्या कालावधीसाठी सध्या आहे त्याच  स्तरावर कायम राहील असे भाकीत स्टॅंडर्ड अँड पुअर क्रेडिट रेटिंग संस्थेने केली आहे.

ब). भारताचे सध्याचे सार्वभौम पतमानांकन BBB - (minus)आहे.


१) फक्त अ   

२).फक्त ब  

३) दोन्ही चुकीचे 

४) अ व ब दोन्ही बरोबर आहेत ✔️✔️


२. करोनाची सौम्य लक्षणं असलेल्या व लक्षणे नसलेल्या बाधित रुग्णांसाठी आयुष मंत्रालयाने कोणती बहुऔषधीयुक्त आयुर्वेदिक औषध वितरित करण्यात ठरविले आहे.

१) आयुष ६४   २. कोरोनील   ३. काबसुरा कुडीनिर

४. करोना बुटी.


 अ) फक्त १ आणि २

ब) फक्त १ आणि ३✔️✔️

क) फक्त १

ड) फक्त ४


३. 'नवसंशोधन दुत'  या नवीन उपक्रमासंबंधी खालील पैकी कोणती विधाने सत्य आहे/त.

अ). शाळांमध्ये नवं संशोधनाची संस्कृती रुजवण्यासाठी उपक्रम असेल.

ब). शाळेतील शिक्षक हे 'नवसंशोधन दुताची भूमिका घेणार

क). हा उपक्रम केंद्रिय शिक्षण मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे कडून निर्माण केले जाणार आहे.


१) फक्त अ

२) फक्त ब

३) सर्व विधाने बरोबर आहेत ✔️✔️

४) फक्त


४. नुकतेच RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी कविड -१९ दुसऱ्या लाटेमुळे घसरणाऱ्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी व उभारी देण्यासाठी किती कोटी रुपयांची आर्थिक उपाय योजना जाहिर केली आहे.

१) ४०,०००  

 २) ६०,०००  

 ३) ५०,००० ✔️

 ४) ३०,०००


५. महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच किती हजार कोटींची दीर्घकालीन कर्जरोखे विक्रीला काढली होती.

१)४०००.✔️

 २)३०००  

३)२०००. 

४) ५०००


1)कोणती भारतीय शैक्षणिक संस्था वा विद्यापीठ ‘QS जागतिक विद्यापीठांची मानांकन यादी 2020’ या क्रमवारीत भारतातले पहिल्या क्रमांकाचे ठरले?

(A) IIT मुंबई✅✅✅

(B) IIT मद्रास

(C) IIT दिल्ली

(D) IIT मंडी


 2)कोणी स्लोव्हाकिया या देशाच्या प्रथम महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली?

(A) मारिया रोको

(B) एड्रियाना कारेमब्यू

(C) डेनिएला हांतुचोवा

(D) जुझाना कापुतोवा✅✅✅



🌹📚🌹📚🌹📚🌹📚🌹📚



3)कोणती शैक्षणिक संस्था वा विद्यापीठ ‘QS जागतिक विद्यापीठांची मानांकन यादी 2020’ या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे?

(A) मॅसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी✅✅✅

(B) ऑक्सफर्ड विद्यापीठ

(C) मॅक्स प्लांक विद्यापीठ

(D) भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू


🌹📚🌹📚🌹📚🌹📚🌹📚


 4)कोणत्या सालापर्यंत ‘भारतमाला’ प्रकल्पाच्या अंतर्गत एकूण 35000 किलोमीटर लांबीच्या महामार्गांचे केले जाणार आहे?

(A) सन 2025

(B) सन 2022✅✅✅

(C) सन 2030

(D) सन 2035



5)राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने भारताला 5 भूकंपीय विभागांमध्ये विभागले आहे. कोणता क्षेत्र सर्वात उच्च जोखमीचा क्षेत्र मानला जातो जो अतीव तीव्रतेच्या भूकंपांना बळी पडतो?

(A) क्षेत्र 5✅✅✅

(B) क्षेत्र 1

(C) क्षेत्र 3

(D) क्षेत्र 2



🌹📚🌹📚🌹📚🌹📚🌹📚


6)भारतीय नौदलाच्या कोणत्या प्रकल्पाच्या अंतर्गत 6 पाणबुडी तयार करण्यासाठी भारत सरकारने जून महिन्यात 45 हजार कोटी रुपयांच्या खर्चाने प्रकल्पाची सुरुवात केली?

(A) प्रोजेक्ट 17A

(B) प्रोजेक्ट 75-I✅✅✅

(C) प्रोजेक्ट 71A

(D) प्रोजेक्ट 79-I



7)भारताने सॉलिड फ्युएल डक्टेड प्रणोदन समर्थित क्षेपणास्त्राचे चाचणी उड्डाण यशस्वीपणे पार पाडले. या क्षेपणास्त्राचे नाव काय आहे?

(A) कर्णजेट

(B) जेटएक्स

(C) जेट-ओ

(D) रामजेट✅✅✅


📚🌹📚🌹📚🌹📚🌹📚🌹


8) भारतीय प्राणीशास्त्रीय सर्वेक्षण (ZSI) आणि भारतीय वनस्पतीशास्त्रीय सर्वेक्षण (BSI) च्या प्रकाशनानुसार, 2017 साली वनस्पती आणि प्राण्यांच्या किती प्रजाती शोधल्या गेल्या?

(A) 539✅✅✅

(B) 739

(C) 639

(D) 439



9) कोणते कण हृदयरोग आणि श्वसनाच्या आजाराला कारणीभूत ठरणार्‍या PM2.5 या प्रदूषकाच्या वर्गामधील सर्वात मोठे घटक आहे?

(A) कार्बन डाय ऑक्साइड

(B) नायट्रोजन✅✅✅

(C) मिथेन

(D) सल्फर डाय ऑक्साईड


📚🌹📚🌹📚🌹📚🌹📚🌹


10) स्पेनमधील सेव्हिले विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शहरी सांडपाण्यामधून बहुतेक प्रदूषके शोषून घेणारा पदार्थ शोधून काढला. त्या पदार्थाचे नाव काय आहे?

(A) Na-माईका-4

(B) CL-माईका-4

(C) N4-माईका-4

(D) C18-माईका-4✅✅✅

चालू घडामोडीचे प्रश्न व उत्तरे

 ● कोरोना काळात भारत सरकारच्या वंदे भारत मिशन अंतर्गत काय करण्यात आले ?

उत्तर : परदेशात  अडकलेल्या भारतीयांची सुटका.  


● उत्तराखंडमध्ये कोणत्या संस्थेने वॉटर स्पोर्ट्स अँड ऍडव्हेंचर इन्स्टिटयूट ची स्थापना केली.   

 उत्तर :  भारत-तिबेट सीमा पोलीस 


● कोणत्या कार्यक्रमात मोदींनी इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्ह हा प्रस्ताव मांडला ? 

उत्तर : पूर्व आशिया शिखर परिषद 


● 'अन्नपूर्णा पर्वतशिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?   

उत्तर : प्रियानक मोहिते.  


● कोणत्या कंपनीच्या कोळसा गॅसिफिकेशन युरिया साठी केंद्र सरकारने अनुदान मंजूर केले आहे. 

उत्तर : तलचर फर्टिलायझर्स लिमिटेड 


● रासायनिक शस्त्रास्त्र प्रतिबंध मंडळाचे बाह्य लेखा परीक्षक कोण ? 

उत्तर : जी. सी. मुर्मू 


● संयुक्त राष्ट्र संघाच्या कोणत्या परिषदेच्या मंडळांवर भारताची निवड करण्यात आली आहे. 

उत्तर : आर्थिक व सामाजिक 


● चिराग प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे. 

उत्तर : छत्तीसगड


 कोणत्या प्रक्षेपण स्थळावरून ‘क्रू-२’ मोहीम अंतराळात सोडण्यात आली?

उत्तर :-  केनेडी एलसी-३९ए


कोणत्या योजनेच्या अंतर्गत मालमत्ता कार्ड वितरणास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरंभ केला?

उत्तर :- सुधारित तंत्रज्ञानासह ग्रामीण भागातील खेड्यांचे सर्वेक्षण आणि मानचित्रण (SVAMITVA)


 केआरआय नानगाला (४०२) नामक लढाऊ पाणबुडी _ या देशाची आहे.

उत्तर :-  इंडोनेशिया नौदल


कोणत्या मंत्रालयाने सरकारमध्ये फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर (FOSS) याला स्वीकारण्याच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी ‘#FOSS4GOV इनोव्हेशन चॅलेंज’ जाहीर केले?

उत्तर :- इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय


 ‘आंतरराष्ट्रीय माहिती व दळणवळण तंत्रज्ञानातील मुली दिन २०२१’ याची संकल्पना काय आहे?

उत्तर :- कनेक्टिंग गर्ल्स, क्रिएटिंग ब्राइटर फ्युचर्स


कोण अमेरिकेच्या न्याय विभागाचे सहाय्यक महान्यायवादी (अटर्नी जनरल) या पदावर नियुक्ती झालेली पहिली भारतीय वंशाची व्यक्ती ठरली?

उत्तर :- वनिता गुप्ता


 कोणत्या राज्यात नीती खोरे आहे?

उत्तर :-  उत्तराखंड


कोणत्या दिवशी जगभरात ‘शांतीसाठी बहुपक्षीयवाद व मुत्सद्दीगिरी याचा आंतरराष्ट्रीय दिन’ साजरा करण्यात येतो?

उत्तर :- २४ एप्रिल


 कोणत्या दिवशी ‘जागतिक आवाज दिन’ साजरा करतात?

उत्तर :- १६ एप्रिल


कोणत्या संस्थेने ‘स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट २०२१’ हा अहवाल प्रकाशित केला?

उत्तर :- संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या निधी


 ‘वरुण’ ही _ या देशांच्या नौदलांदरम्यान होणारी संयुक्त युद्ध कवायत आहे.

उत्तर :- भारत आणि फ्रान्स


कोणत्या व्यक्तीने भारताचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली?

उत्तर :- नुदलापती वेंकटा रामणा


अलीकडेच महावीर जयंती साजरी करण्यात आली आहे. महावीर जैन धर्माचे कितवे तीर्थंकार होते?

उत्तर :- २४ वे


चीनच्या मंगळ ग्रहावर पाठविलेल्या पहिल्या रोव्हरचे नाव काय आहे?

उत्तर :-  झुरॉंग


 कोणत्या देशात मारीब शहर आहे?

उत्तर :- येमेन


शास्त्रीय गायक राजन मिश्रा यांचे निधन झाले आहे; त्यांचे _ घरान्याशी संबंध होते.

उत्तर :- बनारस घराना


 कोणत्या ठिकाणी कोवलून द्वीपकल्प आहे?

उत्तर :- हाँगकाँग


कोणत्या मंत्रालयाने ‘ग्रामीण आरोग्य सांख्यिकी अहवाल’ प्रसिद्ध केला?

उत्तर :- आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय


 २०२२ सालापर्यंत ई-इंधन तयार करण्यासाठी पोर्श आणि सीमेन्स एनर्जी या कंपन्यांनी मान्य केलेल्या प्रकल्पाचे नाव काय आहे?

उत्तर :- हारू ओनी प्रकल्प


कोणत्या संस्थेने ‘इंडिया एनर्जी डॅशबोर्ड्स व्हर्जन २.०’ नामक एका डिजिटल मंचाचे उद्घाटन केले?

उत्तर :- नीती आयोग



 कोणत्या देशाने ‘डिफेन्डर-युरोप २१’ नामक संयुक्त सैन्य कवायतीचे आयोजन केले?

उत्तर :- अमेरिका


लंडनच्या ‘ब्रँड फायनान्स इन्शुरन्स १०० २०२१ ’ अहवालानुसार, ___ जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात बळकट विमा ब्रांड आणि जगातील दहाव्या क्रमांकाचा सर्वात मौल्यवान विमा ब्रँड म्हणून अस्तित्त्वात आले.

उत्तर :-  जीवन विमा महामंडळ


 कोणत्या संस्थेने ‘ग्लोबल फॉरेस्ट गोल्स रिपोर्ट २०२१’ प्रकाशित केला?

उत्तर :- संयुक्त राष्ट्रसंघ


भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ‘सेंट्रल बँक्स अँड सूपरवायजर्स नेटवर्क फॉर ग्रीनिंग फायनॅनशीयल सिस्टम’ (NGFS) या आंतरराष्ट्रीय जाळ्याचा एक भाग बनली; NGFS याचे मुख्यालय कुठे आहे?

उत्तर :- पॅरिस


 कोणत्या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा करतात?

उत्तर :- ०१ मे


‘कॅरेन बंडखोर गट’ हा _ देशातील सर्वात जुना बंडखोर गट आहे.

उत्तर :- म्यानमार


 कोणत्या संस्थेने “MACS १४०७” नामक एक नवीन सोयाबीन वाण विकसित केले?

उत्तर :- आघरकर रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे आणि भारतीय कृषी संशोधन परिषद


कोणत्या व्यक्तीची अॅक्सिस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर तीन वर्षांसाठी नियुक्ती झाली?

उत्तर :- अमिताभ चौधरी


कोणत्या संस्थेने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी श्वास / SHWAS आणि आरोग / AROG या दोन योजना लागू केल्या आहेत?

उत्तर :- SIDBI


कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ साजरा करतात?

उत्तर :- ०१ मे

भारतीय घटनेतील प्रमुख कलमे

भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.


कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती


कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे


कलम १४. - कायद्यापुढे समानता


कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा


कलम १८. - पदव्या संबंधी


कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार


कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी


कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार.


कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना


कलम ४४. - समान नागरी कायदा


कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण


कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन


कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग


कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे


कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती


कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक


कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता


कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही


कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ


कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग


कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती


कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता


कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग


कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक


कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार


कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ


कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार


कलम ७६. - भारताचा महान्यायवादी


कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल


कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य


कलम ७९ - संसद


कलम ८० - राज्यसभा


कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील


कलम ८१. - लोकसभा


कलम ८५. - संसदेचे अधिवेशन


कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते


कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो


कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही


कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो


कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या


कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक


कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार


कलम १२४. - सर्वोच न्यायालय


कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.


कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात


कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक


कलम १५३. - राज्यपालाची निवड


कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ


कलम १५७. - राज्यपालाची पात्रता


कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)


कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती


कलम १७०. - विधानसभा


कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग


कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक


कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार


कलम २१४. - उच्च न्यायालय


कलम २३३. - जिल्हा न्यायालय


कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये


कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार


कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी


कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार


कलम २८०. - वित्तआयोग


कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा


कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग


कलम ३२४. - निवडणूक आयोग


कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा


कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा


कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती


कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी


कलम ३५६. - राज्य आणीबाणी


कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी


कलम ३६८. - घटनादुरुस्ती


कलम ३७०. - जम्मू-काश्मीर ला खास सवलती


कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे


कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता


ग्रामपंचायत माहिती


– “खेड्याकडे चला” असा संदेश महात्मा गांधी यांनी दिला. खेडे हि सक्षम व स्वयंपूर्ण झाली पाहिजे यासाठी ‘ग्रामस्वराज्य’ संकल्पना महात्मा गांधी यांनी मांडली.


– त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वात शेवटचा स्टार म्हणजे ग्रामपंचचायत  हा होय.


– भारतातीतील राज्यघटनेच्या कलम ४० मध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख आढळतो


– महाराष्ट्रात ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ५ नुसार गावस्तरावर ग्रामपंचायतीची स्थापना केली जाते.


– एखाद्या ठिकाणी ग्रामपंचायत निर्माण करण्याच्या किंवा रद्द करण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो.


– पंचायत राज हा विषय राज्यसूची मध्ये येतो.


– देशातील पहिली ग्रामपंचायात२ ऑक्टोबर १९५९ ला राजस्थानातील नागोरी येथे स्थापन करण्यात आली.


– ग्रामपंचायत हि ग्रामसभेची कार्यकारी समिती आहे.


– संपूर्ण देशात सर्वात सक्षम ग्रामपंचायती राजस्थान राज्यात आहे.


– महाराष्ट्रामध्ये २८,००० पेक्षा अधिक ग्रामपंचायती अस्तित्वात आहेत.


– महाराष्ट्रातील सर्वात जुनी ग्रामपंचायत सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर.


– महाराष्ट्रातील सर्वात मोठी व सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत सोलापूर जिल्हातील ‘अकलूज’ हि आहे.


– महाराष्ट्रातील विविध विकासयोजना राबविणारी पहिली ग्रामपंचायत अहमदनगर जिल्ह्यातील ‘हिवरे बाजार हि होय.


– महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ग्रामपंचायती सातारा जिल्ह्या मध्ये आहे. ( १४०० पेक्षा अधिक )


– भारतामध्ये सर्वात जास्त ग्रामपंचायती उत्तरप्रदेशा मध्ये आहे.


– ७३ व्य घटनादुरुस्तीनुसार पंचायतराज ला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला.


– ७३ व्या घटना दुरुस्तीमध्ये अव्यये पहिल्या ग्रामपंचायत निवडणुका एप्रिल १९९५ ला पार पडल्या.

महाराष्ट्रातील महानगरपालिका


🔶 कोकण प्रशासकीय विभाग🔶 

1. बृहन्मुंबई महानगरपालिका

2. ठाणे महानगरपालिका

3. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका

4. मीरा-भाईंदर महानगरपालिका

5. भिवंडी-निजामपूर महानगर पालिका

6. नवी मुंबई महानगर पालिका

7. उल्हास नगर महानगरपालिका

8.  पनवेल महानगरपालिका

9.वसई-विरार महानगरपालिका


🔶 पणे प्रशासकीय विभाग 🔶

1. पुणे महानगरपालिका

2. पिंपरी -चिंचवड महानगरपालिका

3. सोलापूर महानगरपालिका

4. कोल्हापूर महानगरपालिका 

5. सांगली-मिरज-कुपवाडा महानगरपालिका


🔶 नाशिक प्रशासकीय विभाग 🔶

1. नाशिक महानगरपालिका

2. मालेगाव महानगरपालिका

3. अहमदनगर महानगरपालिका

4. धुळे महानगरपालिका

5. जळगाव महानगरपालिका


🔶 औरंगाबाद प्रशासकीय विभाग 🔶

1. औरंगाबाद महानगरपालिका

2. परभणी महानगरपालिका

3. लातूर महानगरपालिका

4. नांदेड - वाघाळा महानगरपालिका


🔶अमरावती प्रशासकीय विभाग 🔶

1. अमरावती

2. अकोला


 🔶 नागपूर प्रशासकीय विभागात 🔶

1. नागपूर

2. चंद्रपूर

चालू घडामोडी व सामान्य ज्ञान प्रश्न & उत्तर


 2017 मध्ये विम्बल्डन महिला एकेरी विजेते कोण आहे?

(अ) सेरेना विल्यम्स

(ब) एलेना वेस्निना

(क) व्हिनस विल्यम्स

(ड) गरबाइन मुगुरुझा✔️✔️


 समुद्राचा रंग निळा का दिसत असतो?

(अ) प्रकाशाच्या विखुरल्यामुळे✔️✔️

(ब) प्रकाशाच्या अपवर्तनामुळे.

(क) प्रकाशाच्या परावर्तनामुळे.

(ड) वरील सर्व कारणांमुळे


22. Why does the color of the ocean appear blue?

(a) Due to scattering of light.✔️✔️

(b) due to refraction of light.

(c) due to reflection of light.

(d) Because of all of the above.


 ध्वनी तरंग ____च्या माध्यमातून प्रवास करू शकत नाहीत?

(अ) घन 

(ब) द्रव 

(क) वायू 

(ड) निर्वात ✔️✔️


 वनस्पति तेलापासून वनस्पती तूप तयार करण्यासाठी कोणता गॅस वापरला जातो?

(अ) हायड्रोजन✔️✔️

(ब) नायट्रोजन

(क) इथिलीन

(ड) कार्बन डाय ऑक्साईड


अनुवांशिकतेचे जनक शास्त्रज्ञ कोणाला म्हणतात?

(अ) राबर्ट हुक

(ब) चार्ल्स डार्विन

(क) ह्यूगो डि व्रीस

(ड) ग्रेगर मेंडल✔️✔️


भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते?

(अ) मणिपूर

(ब) सिक्किम✔️✔️

(क) ओरिसा

(ड) अरुणाचल प्रदेश


कोणत्या राज्य सरकारने साखर फटाक्यांच्या आयात किंवा विक्रीला दंडनीय गुन्हा घोषित केला आहे?

(अ) हरियाणा✔️✔️

(ब) पंजाब

(क) आसाम

(ड) महाराष्ट्र



ओडिशा सरकारने कोणत्या फर्राटा धावपटूची(Ferrata runner) पदोन्नती जाहीर केली?

(अ) दुती चंद✔️✔️

(ब) राजपाल सिंग

(क) मिहिर शर्मा

(ड) देवांश खंडेलवाल


पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या नव्या संचालकपदाची जबाबदारी कोणी घेतली?

(अ) अभय चौधरी✔️✔️

(ब) राजपाल सिंग

(क) मिहिर शर्मा

(ड) देवांश खंडेलवाल


भारतीय क्रिकेट संघाचा नवीन पोशाख प्रायोजक कोण बनला आहे?

(अ) RELIANCE

(ब) LIKY

(क) PUB

(ड) MPL ✔️✔️ 


महाराष्ट्र राज्य सरकारने लॉकडाउन कालावधी किती काळ वाढविला आहे?

(अ) 30 नोव्हेंबर✔️✔️

(ब) 15 नोव्हेंबर

(क) 20 नोव्हेंबर

(ड) 25 नोव्हेंबर


पंजाबनंतर आता कोणत्या राज्य सरकारने कृषी विधेयकाविरूद्ध दुरुस्ती विधेयक मंजूर केले?

(अ) पंजाब

(ब) राजस्थान✔️✔️

(क) आसाम

(ड) महाराष्ट्र


सेशेल्स (Seychelles) देशाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाला निवडले गेले आहे?

(अ) डोनाल्ड सिंह

(ब) वेवल रामकाळवान✔️✔️

(क) ब्रशले रॉय

(ड) शोएब खान


नुकत्याच फ्रान्समध्ये झालेल्या अलेक्सिस वेस्टिन आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत कोणत्या भारतीय बॉक्सरने सुवर्ण पदक जिंकले आहे?

(अ) राजपाल सिंग

(ब) अमित पंघाल आणि संजीत✔️✔️

(क) मिहिर शर्मा

(ड) देवांश खंडेलवाल


देशाच्या राजधानीत खुल्या सिगारेट आणि बिडींच्या विक्रीवर सरकारने पूर्ण बंदी कधीपासून जाहीर केली आहे?

(अ) 07 डिसेंबर

(ब) 05 डिसेंबर

(क) 08 डिसेंबर

(ड) 01 डिसेंबर✔️✔️


अदानी समूहाला पुढील 50 वर्षांसाठी कोणते विमानतळ दिले गेले आहे?

(अ) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ लखनऊ

(ब) चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ लखनऊ✔️✔️

(क) इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ लखनऊ

(ड) महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ लखनऊ


हे लक्षात ठेवा :- शाश्वत विकास १७ ध्येये



१. सर्व प्रकारच्या गरिबीचे निर्मूलन करणे.


 २. भूक संपवणे, अन्न सुरक्षा व सुधारित पोषणआहार उपलब्ध करून देणे आणि शाश्वत शेतीला प्राधान्य देणे.


३. आरोग्यपूर्ण आयुष्य सुनिश्चित करणे व सर्व वयोगटातील नागरिकांचे कल्याण साधणे.


४. सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करणे.


५. लिंगभावाधिष्ठित समानता व महिला आणि मुलींचे सक्षमीकरण साधणे.


६. पाण्याची व स्वच्छतेच्या संसाधनाची उपलब्धता सुनिश्चित करणे.


७. सर्वाना अल्पखर्चीक विश्वासार्ह, शाश्वत आणि आधुनिक ऊर्जा साधने उपलब्ध करून देणे.


८. शाश्वत, सर्वसमावेशक आर्थिक वाढ आणि उत्पादक रोजगार उपलब्ध करणे.


९.पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करणे, सर्वसमावेशक आणि शाश्वत औद्योगिकीकरण करणे आणि कल्पकतेला वाव देणे.


१०. विविध देशांमधील असमानता दूर करणे.


११. शहरे आणि मानवी वस्त्या, अधिक समावेशक, सुरक्षित, संवेदनशील आणि शाश्वत करणे.


१२. उत्पादन आणि उपभोगाच्या पद्धती शाश्वत रूपात आणणे.


१३. हवामान बदल आणि त्याच्या दुष्परिणामांना रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे.


१४. महासागर व समूहांचे संवर्धन करणे तसेच त्यांच्याशी संबंधित संसाधनांचा शाश्वतपणे वापर करणे.


१५.परिस्थितिकीय व्यवस्थांचा (Ecosystem) शाश्वत पद्धतीने वापर करणे. वनाचे शाश्वत व्यवस्थापन, वाळवंटीकरणाशी मुकाबला करणे, जमिनीचा कस कमी होण्याची प्रक्रिया आणि जैवविविधतेची हानी रोखणे.


१६. शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाजव्यवस्थांना प्रोत्साहन देणे. त्यांची शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल निश्चित करणे, सर्वाची न्यायापर्यंत पोहोच स्थापित करण्यासाठी विविध पातळ्यांवर परिणामकारक, उत्तरदायी आणि सर्वसमावेशक संस्था उभ्या करणे.


१७. चिरस्थायी विकासासाठी वैश्विक भागीदारी निर्माण व्हावी यासाठी अंमलबजावणीची साधने विकसित करणे.

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.



💐 गौतम बुद्धांना कोणत्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली ?

🎈गया.( बोधगया ) 


💐गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती कोणत्या पौर्णिमेला झाली ?

🎈वशाख पौर्णिमा.


💐 गौतम बुद्धांचे पहिले प्रवचन कोठे झाले ?

🎈सारनाथ.


💐 गौतम बुद्धांनी प्रथम किती लोकांना दीक्षा दिली ?

🎈पाच.


💐 बौद्ध धम्मातील त्रिरत्ने कोणती ?

🎈बद्ध,धम्म,संघ.


💐 तरिपिटक या बौद्ध धम्मग्रंथाचे किती भाग पाडण्यात आले आहे ?

🎈तीन.


💐जगामध्ये दु:ख आहे हे कोणी सांगितले ?

🎈गौतम बुद्ध.


💐 गौतम बुद्धांचे पत्नीचे नाव काय होते ?

🎈यशोधरा.


💐 गौतम बुद्धांचे मुलाचे नाव काय होते ?

🎈राहूल.


💐 'लाईट ऑफ एशिया' म्हणून कोणाला ओळखले जाते ?

🎈तथागत गौतम बुद्ध.

ऑलिम्पिकसाठी जपानमधील १० हजार प्रेक्षकांना परवानगी



📚टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेसाठी जपानमधील १० हजार प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहता येईल, असे स्थानिक संयोजन समिती आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) सोमवारी स्पष्ट केले.


📚सर्व ऑलिम्पिक स्टेडियममध्ये प्रेक्षकक्षमतेच्या ५० टक्के आणि जास्तीत जास्त १० हजार प्रेक्षकांना हजर राहता येईल, असे संयोजकांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक संयोजन समिती, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती, आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती, जपान सरकार आणि टोक्यो महानगर सरकार यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.


📚ऑलिम्पिकपासून प्रेक्षकांना दूर ठेवावे, अशी सूचना जपानमधील प्रख्यात वैद्यकीय सल्लागार डॉ. शिगेरू ओमी यांनी केली होती. करोना साथीच्या काळात ऑलिम्पिकच्या आयोजनावरही त्यांनी टीका केली होती. २३ जुलैपासून टोक्योमध्ये ऑलिम्पिकला प्रारंभ होणार आहे. या स्पध्रेसाठी परदेशी प्रेक्षकांना मज्जाव करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वीच घेण्यात आला आहे.


📚३६ ते ३७ लाख तिकिटे जपानमधील नागरिकांसाठी उपलब्ध आहेत, असे संयोजन समितीने स्पष्ट केले आहे. प्रेक्षकांना परवानगी देण्याच्या निर्णयास पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनीही अनुकूलता दर्शवली आहे. ‘‘आणीबाणी असली तरी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये हजर राहण्यासाठी काही नियम शिथिल केले जातील. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य असेल,’’ असे सुगा यांनी म्हटले आहे.

न्यायमूर्ती संजय यादव: अलाहाबाद उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायधीश.



🔰राष्ट्रपती राम नाथ कोविन्द यांनी उत्तरप्रदेश राज्यासाठीच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश या पदावर न्यायमूर्ती संजय यादव यांची नियुक्ती केली.


🔰भारतीय संविधानाचे कलम 217(1) भारताच्या राष्ट्रपतीला उच्च न्यायालयाचे न्यायधीश नियुक्त करण्याचा अधिकार प्रदान करते.


🔴भारतीय उच्च न्यायालय...


🔰भारताच्या राज्यघटनेत नमूद कलम क्र. 214 अन्वये प्रत्येक घटकराज्याला एक उच्च न्यायालय असेल किंवा एक किंवा दोन राज्यांसाठी मिळून एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे.


🔰सध्या देशात 25 उच्च न्यायालये (नव्या आंध्रप्रदेश उच्च न्यायालयामुळे) कार्यरत आहेत. याशिवाय प्रत्येक राज्यामध्ये विभागीय पातळीवर खंडपीठे निर्माण करण्यात आली आहेत. उच्च न्यायालयात एक मुख्य न्याय‍धीश आणि राष्ट्रपतीच्या आदेशानुसार ठरविण्यात आलेल्या संख्येनुसार इतर न्याय‍धीश असतात. उच्च न्यायालयातल्या सर्वोच्च न्यायधिशांची नेमणूक करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे.


🔰कवळ दिल्ली या केंद्रशासित प्रदेशासाठी स्वतंत्र उच्च न्यायालय आहे.


🔰महाराष्ट्राचे उच्च न्यायालय मुंबई येथे असून त्याची महाराष्ट्रात पणजी (गोवा), नागपूर, औरंगाबाद अश्या तीन ठिकाणी तीन खंडपीठे आहेत

येडियुरप्पाच कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कायम’ .



🔰कर्नाटकमधील नेतृत्वबदलाच्या चर्चेला भाजपचे राष्ट्रीय सरचिटhणीस (कर्नाटकचे प्रभारी) अरुण सिंह यांनी गुरुवारी पूर्णविराम दिला. बी. एस. येडियुरप्पा हे मुख्यमंत्री आहेत, ते उत्तम काम करीत आहेत आणि तेच मुख्यमंत्रिपदी कायम राहणार असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले.


🔰करोनाच्या काळात केवळ येडियुरप्पाच नव्हे तर राज्यातील मंत्री, पक्ष आणि प्रत्येकानेच उत्तम कामगिरी केली आहे. उच्चस्तरीय बैठकीत येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असे सिंह यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.


🔰मख्यमंत्र्यांसह भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कतील यांची उचलबांगडी करण्याबाबत सुरू असलेली चर्चा अफवा आहे. येडियुरप्पांना हटविण्यासाठी कर्नाटकमधील सत्तारूढ भाजपमधील एक गट सक्रिय आहे, अशी जोरदार चर्चा सुरू होती.

INS चक्र’ पाणबुडी रशियाला परतली.



⏺भारतीय नौदलाची अण्वस्त्र हल्ले करू शकणारी ‘INS चक्र’ ही एकमेव पाणबुडी रशिया देशाकडे परत पाठविण्यात आली आहे.


⏺ही पाणबुडी 2012 साली रशियाकडून भाडेकरारवर घेण्यात आली होती. संपूर्णपणे रशियन बनावटीची असलेली ही पाणबुडी 10 वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्वावर घेण्यात आली होती. अण्वस्त्र क्षमता असलेली रशियाकडून घेण्यात आलेली ही भारताची दुसरी पाणबुडी होती.


☑️‘INS चक्र’ची वैशिष्ट्ये ...


⏺‘INS चक्र’ ही रशियाच्या बनावटीची अकुला श्रेणीची पाणबुडी आहे.

ही पाणबुडी पाण्याच्या पृष्ठभागावर न येता जवळपास 100 दिवस पाण्याखाली राहू शकते.


⏺या पाणबुडीत 1 हजार हॉर्सपॉवर एवढी ताकद असलेले इंजिन आहे, त्यामुळे ती ताशी 30 नॉटीकल मैल एवढ्या प्रचंड वेगाने धावू शकते.‘INS चक्र’ चालवण्यासाठी साधारणतः 30 अधिकारी आणि त्यांच्या सोबत 70 हून अधिक सहाय्यकांची गरज लागते.


☑️भारतीय नौदलाविषयी...


⏺भारतीय नौदल ही भारतीय सशस्त्र दलाची सागरी शाखा आहे आणि भारताचे राष्ट्रपती हे या दलाचे कमांडर-इन-चीफ (प्रमुख) आहेत. भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते.


⏺छत्रपती राजा शिवाजी भोसले यांना भारतीय नौदलाचे संस्थापक मानले जाते. ‘शं नो वरुण’ (संस्कृत) हे या दलाचे घोषवाक्य आहे. 1612 साली ईस्ट इंडिया कंपनीने जहाजांच्या रक्षणासाठी ‘मरीन’ शाखा उघडली. त्यानंतर, 1934 साली ब्रिटीशांनी ‘रॉयल इंडियन नेव्ही’ या दलाची स्थापना केली. 1950 साली दलाला वर्तमान नाव प्राप्त झाले.


⏺1971 साली भारत-पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा दिवस म्हणजेच 4 डिसेंबर ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

परधानमंत्री जन धन योजना.



ही भारताची एक आर्थिक क्षेत्राची वित्तीय समावेशन योजना आहे ज्याद्वारे,बॅंक बचत व जमा खाते,प्रदान, जमा करणे विमा व पेन्शन या आर्थिक सेवा एकाच परवडणाऱ्या रितीने हाताळता येतात.याचे विमोचन पंतप्रधान नरेंद्र मोदीद्वारे २८ ऑगस्ट २०१४ ला करण्यात आले.[१] त्यांनी या योजनेची घोषणा आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या प्रथम भाषणात दि. १५/०८/२०१४ ला केली होती.


🔰आर्थिक मंत्रालयाद्वारे चालित या योजनेत उद्घाटनाच्याच दिवशी १.५ करोड खाती उघडण्यात आलीत.[२][३] गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने याची नोंद घेतली. त्यांनी दिलेल्या प्रमाणपत्रात ते म्हणतात:


🔰एकाच आठवड्यात म्हणजे २३ ते २९ ऑगस्ट २०१४ या दरम्यान,भारतीय बॅकांद्वारे सुमारे १,८०,९६,१३० इतकी खाती उघडण्यात आलीत.जून २०१६ पर्यंत हा आकडा २२० लाख ईतका पोचला व याद्वारे रु. ३८४.११ लाख इतके या योजनेत जमा करण्यात आलेत..


🔰जन धन योजना आधारस्तंभ:-


जन धन योजनेअंर्तगत सहा आधारस्तंभ निवडण्यात आले असून या सहा विषयांमध्ये व्यापक वित्तीय समावेशन करायचे आहे सहा विषय दोन टप्प्यामध्ये विभागले आहेत


🔰पहिला टप्पा -( १४ ऑगस्ट २०१५ पर्यंत )


१) बँकिंग सुविधापर्यॅंत वैश्विक पोहोच  


२) ६ महिन्यापर्यंत ५,०००रुपयापर्यंतची अधिकर्ष सुविधा देणारे, १ लाख रुपयांच्या अपघाती विम्याची सुविधा असणारे रूपे कार्ड देणारे ,


   रूपे किसान कार्ड देणारे ' बॅंकखाते '


३) ' वित्तीय साक्षरता कार्यक्रम '


🔰दसरा टप्पा ( १५ऑगस्ट २०१५ ते १५ ऑगस्ट २०१८)


४) ओव्हरड्राफ्ट खात्यामधील बुडालेल्या कर्जासाठी 'पतहमी निधी ची उभारणी


५) सूक्ष्म विमा


६) असंघटीत क्षेत्रासाठी स्वालंबनसारख्या 'पेन्शन योजना '


Tuesday 22 June 2021

47 वी जी-7 शिखर परिषद



❗️11 जून ते 13 जून 2021 या कालावधीत ब्रिटनच्या कॉर्नवॉल या शहरात 47 वी जी-7 शिखर परिषद संपन्न झाली.


❗️वर्तमानात ब्रिटनकडे ‘जी-7’ समूहाचे अध्यक्षपद आहे.


☀️जी-7 (ग्रुप ऑफ सेव्हन) विषयी..


❗️1975 साली प्रथम फ्रान्स, जर्मनी, जपान, ब्रिटन, इटली आणि अमेरिका या सहा देशांनी जी-6 समूहाची स्थापना केली. पुढे 1976 साली कॅनडा यात सामील झाले आणि समूहाचे नाव ‘जी-7’ समूह हे पडले.


❗️सन 1997 ते सन 2014 या काळात, या गटात रशियाचा समावेश होता आणि त्यामुळे हा ‘ग्रुप ऑफ एट’ म्हणून ओळखला जात होता. म्हणूनच 2014 साली याची पुनर्रचना झाली असून ते स्थापना वर्ष आहे.


❗️आतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मार्गदर्शक तत्वानुसार, या समूहाच्या सदस्यत्वासाठी उच्च निव्वळ राष्ट्रीय संपत्ती आणि उच्च मानव विकास निर्देशांक असणे आवश्यक आहे. या गटातल्या प्रगत अर्थव्यवस्थांची एकत्रित संपत्ती निव्वळ जागतिक संपत्तीच्या 58% आहे.

विसा वूडसॅट उपग्रह: जगातील पहिला लाकडी उपग्रह.


🔰2021 वर्षाच्या अखेरपर्यंत, युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) ही संस्था पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेत जगातील पहिला लाकडी उपग्रह पाठविणार आहे. तयार करण्यात आलेल्या “विसा वूडसॅट (WISA WOODSAT)” असे नाव देण्यात आले आहे.


🔰अतराळयानासाठी प्लायवुडसारख्या लाकडी साहित्याची उपयोगिता तपासण्यासाठी पाहिलांडाच असा प्रयोग केला जात आहे. उष्णता, थंडी, निर्वात आणि किरणोत्सर्ग अश्या भीषण परिस्थितीत लाकडी सामग्री कितपत टिकाव धरून ठेवू शकते याविषयीचा हा प्रयोग आहे.


🔴ठळक बाबी...


🔰जगातील पहिला लाकडी उपग्रह न्यूझीलँड देशातून रॉकेट लॅब कंपनीच्या ‘इलेक्ट्रॉन’ प्रक्षेपकाने अंतराळात सोडला जाणार आहे.


🔰हा उपग्रह 10 x 10 x 10 सें.मी. एवढ्या आकाराचा नॅनो श्रेणीतील उपग्रह आहे.

त्याची रचना आणि निर्मिती फिनलँड देशाच्या शास्त्रज्ञांनी केली.


🔰पलायवुडपासून बनविलेला उपग्रह पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेत सुमारे 500-600 कि.मी. उंचीवर ठेवला जाणार आहे.

केबल टीव्ही नेटवर्कच्या नियमांमध्ये दुरुस्ती


🔰“केबल टीव्ही नेटवर्क नियम 1994” यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी 17 जून 2021 रोजी केंद्रीय सरकारने अधिसूचना जाहीर करून विविध दुरदृष्य वाहिन्यांद्वारे प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांच्या संदर्भातील नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी “केबल टीव्ही नेटवर्क नियम 1995” यामधील तरतुदींनुसार कायदेशीर यंत्रणा उभारायचा निर्णय घेतला.


🔰तसेच, विविध प्रसारकांच्या स्व-नियामक संस्थांची केंद्रीय सरकारकडे नोंदणी करण्याची पद्धत देखील कार्यरत करण्यात आली आहे.


🔰वर्तमानात, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने 900 याहून अधिक वाहिन्यांना परवानगी दिली आहे. या सर्व वाहिन्यांना केबल टीव्ही नेटवर्क नियमामध्ये आखून दिलेली कार्यक्रम आणि जाहिरात यासंबंधी संहिता पाळणे अनिवार्य आहे.


🔴पार्श्वभूमी..


🔰सध्या नागरिकांच्या दुरदृष्य कार्यक्रम अथवा जाहिराती संहिता नियमांच्या उल्लंघनाशी संबंधित तक्रारी सोडविण्यासाठी आंतर-मंत्रालयीन समितीच्या स्वरूपातील संस्थात्मक यंत्रणा अस्तित्वात आहे. त्याचप्रमाणे, तक्रारींचे निवारण करण्यासाठी, विविध प्रसारकांनी त्यांच्या प्रणालीच्या अंतर्गत स्व-नियामक यंत्रणा विकसित केल्या आहेत.


🔰परंतु, तक्रार निवारण संरचना अधिक मजबूत करण्यासाठी कायदेशीर यंत्रणा उभारण्याची गरज भासू लागली होती. काही प्रसारकांनी, त्यांच्या संघटना किंवा संस्थांना कायदेशीर मान्यता देण्याची विनंती केली होती. तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील “कॉमन कॉज विरुध्द भारत सरकार आणि इतर” या 2000 या वर्षीच्या खटल्यामधील आदेशात तक्रार निवारणासाठीच्या केंद्रीय सरकारच्या विद्यमान यंत्रणेबाबत समाधान व्यक्त करतानाच तक्रार निवारण यंत्रणेला औपचारिक स्वरूप देण्यासाठी योग्य नियमांचा आराखडा तयार करण्याचा सल्ला दिला होता.

बोत्सवाना देशामध्ये जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा सापडला.



🔰आफ्रिका खंडाच्या पूर्व भागात वसलेल्या बोत्सवाना देशामध्ये जगातील सर्वात मोठ्या हिऱ्यांमध्ये गणना होणारा एक हिरा सापडला आहे. हा हिरा ज्वानेंग खाणीत सापडला.


🔴हिऱ्याची वैशिष्ट्ये...


🔰हा हिरा जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा ठरला आहे.


🔰हिरे शोधणाऱ्या देबस्वाना कंपनीने हा हिरा 1098 कॅरेट वजनाचा असल्याचे स्पष्ट केले आहे.


🔰हिऱ्याची लांबी 73 मिलीमीटर, रुंदी 52 मिलीमीटर आणि जाडी 27 मिलीमीटर आहे.


🔴इतर बाबी...


🔰या हिऱ्याची विक्री झाल्यास त्यापैकी 80 टक्के रक्कम ही सरकारच्या तिजोरीमध्ये जाईल.


🔰दक्षिण आफ्रिकेमध्ये 1095 साली जगातील सर्वात मोठा हिरा (3106 कॅरेट) सापडला होता.


🔰जगातील दुसरा सर्वात मोठा हिरा (1109 कॅरेट) 2015 साली बोत्सवानामध्येच सापडला होता. त्याला “लेसेडी ला रोना” असे नाव देण्यात आले.

हिंद-प्रशांत क्षेत्रातील स्थिरतेसाठी भारत-इटली-जपान यांची भागीदारी.



🗯भारत, इटली आणि जपान ही राष्ट्रे हिंद-प्रशांत क्षेत्रात शांतता राखण्यासाठी आणि तेथील स्थिरतेसाठी एकत्र आली आहेत.


🗯या त्रिपक्षी भागीदारीसाठी 18 जून 2021 रोजी करार करण्यात आला.  


♦️जपान देश..


🗯जपान हा पूर्व आशियामधला एक द्वीप-देश आहे. जपानच्या पश्चिमेला जपानचा समुद्र, चीन, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया व रशिया, उत्तरेला ओखोत्स्कचा समुद्र व दक्षिणेला पूर्व चीन समुद्र व तैवान आहेत. टोकिओ हे देशाचे राजधानी शहर आहे आणि जपानी येन हे राष्ट्रीय चलन आहे.


🗯आशिया खंडाच्या पूर्व किनाऱ्यालगत, तैवान बेट आणि कूरील बेटे यांच्या दरम्यान लहानमोठ्या बेटाच्या तीन चंद्रकोरी मालिका तयार झाल्या आहेत. यांनाच पुष्कळ वेळा ‘तोरण बेटे’ म्हणून संबोधण्यात येते. या तोरण बेटांत चार मोठ्या व इतर 3400 बेटांचा समावेश होतो. ही सर्व बेटे मिळूनच जपान देश झाला आहे. जपानच्या अतिपूर्वेकडील स्थानामुळे जपानला “उगवत्या सूर्याचा देश” असे संबोधण्यात येते


♦️इटली देश..


🗯इटली हे यूरोपच्या दक्षिणेकडील, आल्प्सपासून भूमध्य समुद्रात शिरलेले, बुटासह पायाच्या आकाराचे प्रजासत्ताक राष्ट्र आहे. हा देश यूरोप व आफ्रिका यांना जवळजवळ जोडणारा दुवा आहे. त्याच्यामुळे भूमध्य समुद्राचे दोन भाग पडतात. इटलीच्या सरहद्दी वायव्येकडे फ्रान्स, उत्तरेकडे स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया आणि ईशान्येकडे यूगोस्लाव्हिया यांच्याशी संलग्न आहेत. इटलीची राजधानी रोम आहे. इटलीमघ्ये युरो / लिरा हे अधिकृत चलन आहे.

देशाच्या विविध भागात पाच ‘दिव्यांगता क्रिडा केंद्र’ स्थापन केले जाणार..



🌄दशातील दिव्यांग लोकांमधील खेळाविषयीची आवड आणि त्यांनी पॅराऑलिम्पिक खेळांमध्ये केलेली उत्तम कामगिरी लक्षात घेता, केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने देशाच्या विविध भागात पाच 'दिव्यांगता क्रिडा केंद्र' यांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.


🌄कद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी यांच्या संदर्भात घोषणा केली असून त्यापैकी एक केंद्र अहमदाबाद या शहरात उभारण्यात येणार असल्याचे निश्चित केले.


🌄गजरात राज्याच्या जामनगर येथे 20 जून 2021 रोजी सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग व्यक्ती सशक्तीकरण विभागाच्या योजनेच्या अंतर्गत दिव्यांगजनांना सहाय्यक ठरणाऱ्या उपकरणांच्या वितरणासाठी आयोजित केलेल्या ‘सामाजिक सशक्तीकरण शिबिर’ यामध्ये ही घोषणा करण्यात आली.


🌄शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या अंतर्गत केंद्रीय सरकारने गुजरात राज्यासाठी 8.06 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला असून त्याचा लाभ 2808 लाभार्थ्यांना होणार आहे.

महाराष्ट्र सरकारचे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे ‘बीड प्ररूप’..



⛳️परशासकीय खर्च आणि 10 टक्के नफा अशी मर्यादा कंपन्यांसाठी तर उर्वरित निधी शेतकरी व राज्य सरकारकडे, अशा प्रकाराचा पीक विमा प्ररूप बीड जिल्ह्यात राबविण्यात आला होता. त्याचा यशस्वीपणा पहाता संपूर्ण महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी व्हावी असा प्रस्ताव केंद्रीय सरकारकडे महाराष्ट्र सरकारने पाठविलेला आहे.


🥏परधानमंत्री पीक विमा योजनेचे ‘कप अँड कॅप’ प्ररूप (बीड प्ररूप)...


⛳️शतकरी, राज्य आणि केंद्रीय सरकारने पीकविमा कंपनीकडे विमा हप्ता म्हणून एक हजार कोटी रुपये जमा केल्यास, दहा टक्के प्रशासकीय खर्च आणि दहा टक्के नफा याप्रमाणे दोनशे कोटी रुपये कंपनीने ठेवावे. कमी नुकसान झाल्यास चारशे कोटींचा परतावा शेतकऱ्यांना करावा. उर्वरित चारशे कोटी रुपये विमा कंपनीने सरकारकडे जमा करावे. हा पैसा पुढे शेतकरी हिताच्या योजनांवर खर्च केला जाईल. दीड हजार कोटी रुपये भरपाई द्यावी लागत असल्यास अशावेळी अकराशे कोटी रुपये कंपन्यांनी द्यावे. उर्वरित चारशे कोटी रुपये राज्य सरकार भरपाई म्हणून देईल.


🥏पार्श्वभूमी...


⛳️महाराष्ट्र राज्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेत गेल्या 5 वर्षांत विमा कंपन्यांना हप्त्यापोटी 23 हजार 180 कोटी रुपये दिले. या कंपन्यांनी केवळ 15 हजार 622 कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे दावे मंजूर केले. राज्य सरकारने कप अँड कॅप प्ररूप प्रस्तावित केले आहे, ज्यात विमा कंपन्यांना 20 टक्क्यांपेक्षा जास्त नफा घेता येणार नाही, तसेच जमा केलेल्या प्रीमियमच्या जास्तीत जास्त 10 टक्के जोखीम असेल.


⛳️कद्रीय सरकारने 2016 साली प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा प्रारंभ केला. फेब्रुवारी-2020 मध्ये योजनेत काही महत्त्वपूर्ण बदल करून ती ‘पंतप्रधान पीक विमा योजना 2.0’ या नावाने सादर केली. कर्जदार शेतकऱ्यांसाठी अनिवार्य असलेली ही योजना त्यांच्यासाठी ऐच्छिक बनविणे, योजनेंर्तगत विमा कंपन्यांची नियुक्ती एकेका हंगामाऐवजी सलग तीन वर्षांसाठी करणे असे महत्त्वाचे बदल करण्यात आले.


⛳️महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात खरीप-2020च्या हंगामापासून राबवलेल्या प्ररूपची राज्यातच नव्हे तर देशपातळीवरदेखील विशेषत्वाने दखल घेतली गेली आहे.


⛳️बीड हा सातत्याने दुष्काळग्रस्त असलेला जिल्हा पीक विमा उतरवण्याबाबत देशात अव्वल आहे. खरीप-2020च्या हंगामासाठी बीड जिल्ह्याकरता निविदा सादर करण्यासाठी एकही विमा कंपनी पुढे आली नाही. पर्जन्यमान सरासरीपेक्षा बरेच कमी, त्यामुळे पीक विमा कंपन्यांचे होणारे नुकसान, हे त्यामागील कारण होते. त्यामुळे केंद्रीय सरकारच्या मदतीने महाराष्ट्र सरकारने जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीस सलग तीन वर्षांसाठी करारबद्ध केले.


⛳️करारानुसार, एकूण गोळा झालेल्या पीक विमा हप्ता रकमेच्या तुलनेत देय नुकसान भरपाई 110 टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास उर्वरीत भरपाई देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल. तसेच देय भरपाईचे प्रमाण कमी असल्यास विमा कंपनीकडे शिल्लक रकमेपैकी 20 टक्के रक्कम कंपनीने स्वतःकडे ठेवून उर्वरीत 80 टक्के रक्कम राज्य सरकारला परत करणे अनिवार्य असेल. त्यामुळे विमा कंपनीच्या अतिरिक्त नफेखोरीलाही आळा घातला. बीड जिल्ह्यासाठी विशेष बाब म्हणून घेतलेला हा निर्णय राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही लागू करण्याचा प्रस्ताव नुकताच राज्य सरकारने केंद्रीय सरकारकडे पाठविला आहे.

धोकादायक ‘सकरमाउथ’ मासा हरिपूरमध्ये कृष्णा नदीत आढळला


🔰सांगलीत मच्छीमारांमध्ये चिंता

सांगली : नदीतील माशांच्या प्रजोत्पत्तीला धोका ठरणारा मांसाहारी सकरमाउथ मासा हरिपूर येथे कृष्णा नदीत आढळला आहे. दीड फूट लांबीचा वेगळाच दिसणारा या माशाला हेलिकॉप्टर फिशही म्हटले जाते. हौशींच्या घरातील काचेच्या मच्छ्यालयात शोभिवंत म्हणून आढळणारा हा मासा कृष्णेच्या पात्रात आढळल्याने मच्छीमारांची चिंता वाढली आहे.


🔰हरिपूर येथील विकास नलावडे या मच्छीमाराला कृष्णा नदीच्या पात्रामध्ये मासेमारी करताना सकरमाउथ कॅटफिश आढळून आला. पावसाळा सुरू झाल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदीमध्ये मासेमारीचा मोसम सुरू झाला आहे. लालसर पाण्यात अनेक प्रकारचे मासे सध्या सापडत आहेत, मात्र सकरमाउथचे दर्शन झाल्याने धोक्याची घंटा वाजली आहे.


🔰सकरमाउथ कॅटफिशमुळे कृष्णा नदीतल्या माशांना मोठा धोका निर्माण झाला आहे. सकरमाउथ कॅटफिश मांसाहारी असतो. त्यामुळे पाण्यातल्या इतर माशांना तो खातो. त्यामुळे येथील जलीय जीवांसमोर धोका निर्माण झाला आहे. सकरमाउथ कॅटफिश वेगवेगळ्या रंगात उपलब्ध असतो.


🔰सकरमाउथ कॅटफिश या नावाने ओळखला जाणारा मासा प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेतील अ‍ॅमॅझॉन नदीमध्ये आढळतो. मात्र आता उजनी जलाशयामध्येही याचा आढळ दिसून येत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये उत्तर प्रदेशातील रमना गावात गंगा नदीत आणि नोव्हेंबरमध्ये तो मध्य प्रदेशातील िभड येथील सिंधू नदीत आढळला होता, अशी माहिती जाणकारांकडून मिळाली.

जास्तीत जास्त मुलं असणाऱ्या पालकांना आमदाराकडून मिळणार एक लाखांचं रोख बक्षीस



🔰मिझोरमममधील एका मंत्र्याने सर्वाधिक आपत्य असणाऱ्या पालकांना एक लाख रुपयांची रोख रक्कम बक्षीस म्हणून जाहीर केली आहे. सर्वाधिक मुलं असणाऱ्या पालकांना हे बक्षीस देण्यामागील हेतू हा मिझो समाजाची लोकसंख्या वाढावी असा आहे. बक्षीसासाठी पात्र ठरणारे पालक हे या नेत्याच्या मतदारसंघामधील असावेत अशी अट घालण्यात आली आहे.


🔰मिझोरमचे क्रीडा मंत्री रॉबर्ट रोमाविया रोयटे यांनी ही बक्षीस योजना सुरु केली आहे. मात्र ही घोषणा करताना किती मुलं असणाऱ्यांना गृहित धरलं जाणार आणि कोणाला नाही याबद्दलची माहिती देण्यात आलेली नाही. एकीकडे देशातील अनेक राज्यांमध्ये लोकसंख्या नियंत्रणासंदर्भातील कायद्याची मागणी केली जात असतानाच मिझोरममध्ये अशी घोषणा करण्यात आलीय.


🔰रविवारी पार पडलेल्या फादर्स डेनिमित्त बोलताना रोयटे यांनी आपल्या मतदारसंघासाठी ही योजना जाहीर केली. सर्वाधिक आपत्य असणाऱ्या पालकांना आपण एक लाख रुपये रोख बक्षीस देणार आहोत, असं रोयटे यांनी सांगितलं. ही योजना फक्त अझवल पूर्व-२ या रोयटे यांच्या मतदारसंघापुरती लागू असेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच बक्षीसास पात्र असणाऱ्या व्यक्तीला प्रमाणपत्र आणि ट्रॉफी सुद्धा दिली जाणार असल्याचं रोयटे यांनी सोमवारी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

सीड मिनीकीट’ कार्यक्रमाचा प्रारंभ



🥏2 जून 2021 रोजी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्यावतीने ‘सीड मिनीकीट’ कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अंतर्गत जास्त उत्पादन देणार्‍या डाळी व तेलबिया पिकांच्या वाणांचे बियाणे शेतकऱ्यांमध्ये वितरित केले जात आहेत.


🎾ठळक बाबी....


🥏राष्ट्रीय बियाणे महामंडळ (NCS), NAFED आणि गुजरात राज्य बियाणे महामंडळ या संस्था शेतकऱ्यांना ‘सीड मिनीकीट’ पुरवित आहेत.


🥏या कार्यक्रमाला राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत भारत सरकारकडून संपूर्णपणे वित्तपुरवठा केला जातो.

‘सीड मिनीकीट’चे वाटप 15 जून 2021 पर्यंत सुरू राहील, जेणेकरून खरीप पेरणी होण्यापूर्वी बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतील.


🥏डाळींच्या 20,27,318 सीड मिनीकिट, सोयाबीनच्या 8 लक्ष सीड मिनीकिट आणि शेंगदाण्याच्या 74 हजार सीड मिनीकिट शेतकऱ्यांना मोफत देण्यात येतील.

पार्श्वभूमी


🥏कद्रीय सरकार राज्यांच्या सहकार्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत डाळी व तेलबिया यांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. 2014-15 या आर्थिक वर्षापासून डाळी व तेलबियांचे उत्पादन वाढविण्यावर नव्याने भर देण्यात आला आहे. त्या प्रयत्नांना चांगले परिणाम मिळाले आहेत.


🥏तलबियांचे उत्पादन 2014-15 या आर्थिक वर्षातील 27.51 दशलक्ष टनांवरून 2020-21 या आर्थिक वर्षात अंदाजे 36.57 दशलक्ष टनांपर्यंत वाढले आहे, तर डाळींचे उत्पादन याच कालावधीत 17.15 दशलक्ष टनांवरून 25.56 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचले आहे.

SDG इंडिया निर्देशांक आणि डॅशबोर्ड 2020-21.



♒️नीती आयोगाने (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया) 3 जून 2021 रोजी भारताच्या शाश्वत विकास ध्येये (SDG) निर्देशांकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित केली.


🅾️ठळक बाबी....


♒️नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी 'SDG इंडिया इंडेक्स अँड डॅशबोर्ड 2020–21: पार्टनरशिप्स इन द डिकेड ऑफ अॅक्शन' या शीर्षकाच्या अहवालाचे प्रकाशन केले.

तिसर्‍या आवृत्तीत 17 ध्येये, 70 लक्ष्ये आणि 115 निर्देशांकाचा समावेश आहे.


🅾️निष्कर्ष...


♒️2019 साली दहा राज्ये / केंद्रशासित प्रदेश आघाडीच्या श्रेणीतली (दोनहीसह 65-99 दरम्यान गुण) आहेत. 2020-21 या वर्षात आणखी बारा राज्ये / केंद्रशासित प्रदेश या श्रेणीत येत आहेत. उत्तराखंड, गुजरात, महाराष्ट्र, मिझोरम, पंजाब, हरयाणा, त्रिपुरा, दिल्ली, लक्षद्वीप, अंदमान व निकोबार बेटे, जम्मू व काश्मीर आणि लडाख यांनी (दोनहीसह 65 आणि 99 दरम्यान गुण) आघाडीच्या श्रेणीत स्थान पटकावले आहे.


♒️दशाच्या एकूण SDG गुणात 6 अंकांनी सुधारणा होऊन हे गुण वर्ष 2019 मधील 60 वरून 2020-21 या वर्षात 66 वर पोहोचले आहे.


♒️करळ राज्य एकूण 100 गुणांपैकी 75 गुण मिळवून SDG प्राप्त करण्यासंबंधीच्या प्रगतीमध्ये अग्रेसर आहे. त्याखालोखाल तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो.


♒️झारखंड, बिहार आणि आसाम या राज्यांनी याबाबतीत सर्वात कमकुवत कामगिरी केली आहे.


🅾️पार्श्वभूमी...


♒️डिसेंबर 2018 या महिन्यात प्रथम प्रकाशित करण्यात आलेला हा निर्देशांक देशातील शाश्वत विकास ध्येयांसंबंधी प्रगतीवर लक्ष ठेवण्याचे प्राथमिक साधन बनले आहे आणि त्याचबरोबर जागतिक उद्दिष्टांवर मानांकने प्रदान करून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील स्पर्धेला चालना दिली आहे.


♒️2030 SDG कार्यसूची साध्य करण्याच्या प्रवासाचा एक तृतीयांश प्रवास भारताने पूर्ण केला असून निर्देशांकाच्या अहवालाची ही आवृत्ती भागीदारीचे महत्त्व अधोरेखित करते.


🅾️शाश्वत विकास ध्येये (SDGs) विषयी...


♒️2015 सालासाठी ठरविण्यात आलेली सहस्त्राब्द विकास ध्येये (MDGs) यांपासून 2030 सालासाठी शाश्वत विकास ध्येये (SDGs) विकसित झाली आहेत. 2000 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहस्त्राब्द (मिलेनियम) शिखर परिषदेनी ठरविलेल्या 2015 सालासाठीच्या सहस्त्राब्द विकास ध्येये (MDGs) यामध्ये 18 लक्ष्यांसह आठ आंतरराष्ट्रीय विकास ध्येयांची एक सूची होती. हा जगभरातल्या आव्हानांना सोडविण्यासाठी केला गेलेला प्रथम आणि एकमात्र वैश्विक प्रयत्न होता.


♒️शाश्वत विकास ध्येये (SDGs) ही 17 ध्येये, 169 लक्ष्ये आणि 306 राष्ट्रीय निर्देशकांची एक सार्वत्रिक सूची आहे, जे मानवी कल्याणासाठी 2030 सालापर्यंत कोणीही विकासाच्या दृष्टीने मागे राहणार नाही या उद्देशाने मोठ्या यशासाठी विकासात्मक कृतींचे नियोजन करण्यास आणि सुव्यवस्थित करण्यासाठी मदत करतात.


♒️सप्टेंबर 2015 मध्ये झालेल्या ऐतिहासिक संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेच्या शिखर परिषदेत 193 सदस्य राष्ट्रांनी अंगिकारलेल्या आणि दि. 1 जानेवारी 2016 रोजी लागू झालेल्या “ट्रान्सफॉर्मिंग अवर वर्ल्ड: द 2030 एजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट” या पुढाकाराचा हा एक भाग आहे.


♒️सन 2030 साठीची शाश्वत विकास ध्येये (SDGs)....


ध्येय 1: दारिद्र्याचे संपूर्ण उच्चाटन

ध्येय 2: शून्य उपासमार (उपासमार थांबवणे, अन्न सुरक्षा आणि सुधारित पोषक आहार साध्य करणे आणि शाश्वत शेतीस प्रोत्साहन देणे)

ध्येय 3: सर्वांसाठी निरोगी आरोग्य आणि सर्व वयोगटातील सर्वांसाठी कल्याणाचा प्रचार करणे

ध्येय 4: सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण (सर्वसमावेशक आणि न्याय गुणवत्तापूर्ण शिक्षण सुनिश्चित करणे आणि सर्वांसाठी आजीवन शिक्षण संधींचा प्रचार करणे)

ध्येय 5: स्त्री-पुरुष समानता (लैंगिक समानता प्राप्त करणे आणि सर्व महिला व मुलींना सशक्त करणे)

ध्येय 6: सर्वांसाठी स्वच्छ पाणी आणि स्वच्छता

ध्येय 7: सर्वांसाठी स्वस्त, विश्वासार्ह, शाश्वत आणि स्वच्छ ऊर्जा

ध्येय 8: सर्वांसाठी सभ्य काम आणि आर्थिक वाढ (सतत, सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक वाढ, पूर्णकाळ आणि उत्पादनक्षम रोजगार तसेच सभ्य कामांना प्रोत्साहन देणे)

ध्येय 9: उद्योग, नवकल्पना आणि पायाभूत सुविधा (लवचिक अश्या पायाभूत संरचना तयार करणे, सर्वसमावेशक आणि शाश्वत औद्योगिकीकरणास आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणे)

ध्येय 10: असमानता कमी करणे (देशांच्या आतमधील आणि देशांदरम्यान असलेली असमानता कमी करणे)

ध्येय 11: शाश्वत शहरे आणि मानवी वस्ती

ध्येय 12: शाश्वत उपभोग आणि उत्पादन

ध्येय 13: हवामानविषयक कार्य (हवामानातील बदल आणि त्यांचे परिणाम टाळण्यासाठी त्वरित कारवाई करणे)

ध्येय 14: जलजीवन (शाश्वत विकासासाठी महासागर, समुद्र आणि सागरी स्त्रोतांचे संवर्धन आणि सातत्यपूर्ण वापर)

ध्येय 15: थल जीवन (जमिनीवर पर्यावरणविषयक व्यवस्थे.

अरुण कुमार मिश्रा: राष्ट्रीय मानवी हक्क आयोग (NHRC) याचे नवीन अध्यक्ष..



🗾भारताचे राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांची भारताच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोग (NHRC) याच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे.


⛺️राष्ट्रीय मानवी हक्क आयोग विषयी...


🗾‘मानवी हक्क संरक्षण कायदा 1993’ अन्वये राष्ट्रीय मानवी हक्क आयोग व राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करण्यात आले आहेत. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगास या कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी विशेष अधिकार प्रदान केले गेले आहेत.


🗾राष्ट्रीय वा राज्य मानवी आयोग स्वत:देखील मानवाधिकार उल्लंघनाची दखल घेऊन कारवाई करु शकतात. याबाबतच्या विविध तक्रारीचे निवारण करणे, गुन्हेगारास इतर कायद्यांतर्गत न्यायालयाद्वारे शिक्षा व्हावी यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे काम आयोग करीत असते. मानवी हक्क म्हणजे काय, त्यांचे स्वरूप, त्यांचे उल्लंघन झाल्यास तक्रार करण्याची पध्दत, मानवी हक्क आयोगाचे अधिकार या सार्‍यांबाबत या कायद्यात विवेचन करण्यात आले आहे.


🗾सयुक्त राष्ट्रसंघ महासभेने स्वीकृत केलेल्या नागरी, राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक अधिकारांच्या आंतरराष्ट्रीय जाहिरनाम्यांमध्ये व इतरही आंतरराष्ट्रीय जाहिरनाम्यातील भारतीय केंद्र सरकारने मान्य केलेले सर्व अधिकार, ज्यांना भारतीय संविधान व विविध कायद्यात मान्यता दिली गेली आहे आणि ज्यांची अंमलबजावणी भारतीय न्यायालये करु शकतात, असे सर्व अधिकार मानवी हक्क समजले जातात.


⛺️मानवी हक्कांविषयी....


🗾मानवी हक्क (किंवा मानवी अधिकार / मानवाधिकार) हे प्राणी जगतातल्या मानवाचे मूलभूत हक्क आहेत. मानवी हक्क हे जागतिक असून सर्वांना समान असतात. हे हक्क उपजत असतात किंवा कायदेशीर असू शकतात. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय व मानवी हक्क समिती ह्या दोन संस्था जागतिक स्तरावर मानवी हक्कांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करतात.


🗾मानवी हक्कांचे वैश्विक घोषणापत्र (Universal Declaration of Human Rights -UDHR) हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने दिनांक 10 डिसेंबर 1948 रोजी पॅरिस येथे स्वीकारलेले घोषणापत्र आहे. सर्व मानवांच्या जन्मसिद्ध मानवाअधिकारांची पहिली जागतिक अभिव्यक्ती म्हणून या घोषणापत्राकडे पाहण्यात येते. त्यात एकूण 30 कलमे आहेत. घोषणापत्र आज जगातील 500 हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. या घोषणापत्रावर आधारित "मानवी हक्कांचे आंतरराष्ट्रीय विधेयक" याला 1976 साली आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्वरूप प्राप्त झाले.

इब्राहिम रईसी यांची इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड



शिया धर्मगुरू असणारे इब्राहिम रईसी यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे..


इराणमध्ये सध्याचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांचा राष्ट्राध्यक्षपदावरचा कालावधी संपल्यामुळे इराणमध्ये इराणध्ये काल 18 जून रोजी राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. 19 जून रोजी त्याचे निकाल जाहीर झाले.


इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ 4 वर्षांचा असतो. एका व्यक्तीला जास्तीत जास्त दोनवेळाच म्हणजे 8 वर्षेच राष्ट्राध्यक्षपदी राहाता येते. सध्याचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी 2013 पासून इराणचे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांची या पदावरती 8 वर्षे पूर्ण झालेली आहेत.


कोण आहेत इब्राहिम रईसी?


• 60 वर्षीय इब्राहिम रईसी न्यायपालिकेचे प्रमुख आहेत. त्यांना कट्टरपंथी मानलं जातं.

1979 साली झालेल्या क्रांतीनंतर ते न्यायपालिकेत कार्यरत आहेत. त्यातील बहुतांश काळ ते सरकारी वकील होते. 

• 1988 साली इराणमध्ये राजकीय कैद्यांना आणि असंतुष्ट लोकांना सामूहिक मृत्युदंड सुनावला गेला होता. हा निर्णय घेणाऱ्या विशेष आय़ोगात ते सहभागी होते. तेव्हा ते तेहरानच्या इस्लामिक रिव्होल्यूशन कोर्टात डेप्युटी प्रॉसिक्युटर होते.

• मशदाद शहरातील आठवे शिया इमाम रेजा यांच्या पवित्र दर्ग्याचे ते संरक्षकही होते.   •इराणमध्ये सर्वोच्च नेत्याची नियुक्ती 

किंवा पदच्युती करू शकणाऱ्या परिषदेचेही ते सदस्य आहेत.


शाश्वत विकासात स्थान घसरले; नेपाळ, भूटानही भारताच्या पुढे



संयुक्त राष्ट्रांनी २०१५ मध्ये ठरविलेली शाश्वत विकासाची उद्दीष्टये (SDG) गाठण्यात भारताचा वेग कमी पडत असून या यादीत गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताचे स्थान दोन अंकांनी घसरले आहे. 


सध्या १९३ देशांच्या यादीत भारताचे स्थान ११७ क्रमांकावर आहे. भारताचा पर्यावरण अहवाल २०२१ प्रसिद्ध झाला आहे. यानुसार, भारताचे स्थान दोन क्रमांकांनी घसरले आहे. भूक आणि अन्न सुरक्षा (एसडीजी २), लिंग समानता (एसडीजी ५) आणि दर्जेदार पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक औद्योगिकीकरण आणि संशोधन (एसडीजी ९) ही उद्दीष्ट्ये साध्य करण्यात भारताला फारसे यश न आल्याने स्थान घसरल्याचे अहवालात म्हटले आहे. एकूण १०० पैकी भारताचे ६१.९ गुणांक आहेत. 


भूतान, नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश या चार आशियाई देशांचे स्थान भारताच्या आधी आहे


संयुक्त राष्ट्रांनी सर्व सदस्य देशांना २०३० पर्यंत साध्य करण्यासाठी काही निश्चित उद्दीष्ट्ये दिली आहेत. 


ही आहेत १७ उद्दिष्ट्ये

१. गरीबी निर्मूलन, २. भूकेची समस्या मिटविणे, ३. चांगले आरोग्य, ४. दर्जेदार शिक्षण, ५.लिग समानता, ६.शुद्ध पाण्याची उपलब्धता आणि सांडपाण्याची व्यवस्था, ७. शुद्ध ऊर्जा, ८. आर्थिक विकास आणि रोजगार, ९. उद्योग, संशोधन आणि पायाभूत विकास, १०. असामनता कमी करणे, ११. शहरांचा शाश्वत विकास, १२. स्रोतांचा योग्य वापर

जीवांचे संरक्षण, १६. शांतता, न्याय आणि सशक्त संस्था आणि १७. उद्दीष्ट्य साध्य करण्यासाठी सक्षम जागतिक भागीदारी

अनुप चंद्र पांडे: भारतीय निवडणूक आयोगाचे (ECI) नवीन निवडणूक आयुक्त



🚨राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अनुप चंद्र पांडे यांची भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) निवडणूक आयुक्त या पदावर नियुक्ती केली. विधी व न्याय मंत्रालयाच्या विधी विभागाने 8 जून 2021 रोजी यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली.


🚨अनुप चंद्र पांडे ज्या दिवसापासून पदभार स्वीकारतील त्या दिवसापासून ही नियुक्ती लागू राहील. ते उत्तरप्रदेश संवर्गाचे निवृत्त IAS अधिकारी आहेत.


🚨वर्तमानात, सुशील चंद्र हे 13 एप्रिल 2021 पासून भारतीय निवडणूक आयोगाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. तर राजीव कुमार हे आयोगाचे एक निवडणूक आयुक्त आहेत.


⭕️भारतीय निवडणूक आयोग (ECI) विषयी


🚨भारतीय निवडणूक आयोग (ECI) ही एक स्वायत्त व अर्ध-न्यायिक संस्था आहे. आयोगाला घटनात्मक दर्जा प्रदान करण्यात आला आहे. आयोगाची स्थापना दिनांक 25 जानेवारी 1950 रोजी झाली.


⭕️घटनात्मक तरतुदी


🚨कलम 324: ही तरतूद आयोगाच्या कार्यप्रणालीविषयी आहे. आयोगावर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती तसेच संसदेची लोकसभा आणि राज्यसभा तसेच राज्याच्या विधानसभा निवडणुका घेण्याची जबाबदारी असते.


🚨कलम 325: संसद आणि राज्य विधानसभेच्या सदस्यांच्या निवडणुकीसाठी प्रत्येक प्रादेशिक मतदारसंघासाठी एक सार्वत्रिक निवडणूक होणार. धर्म, वंश, जात किंवा लैंगिकतेच्या आधारावर निवडणूक चालवली जाणार.


🚨कलम 326: लोकसभा आणि राज्याच्या विधानसभांसाठी निवडणुकीच्या आधारावर प्रौढ मताधिकारांच्या संदर्भात आहे.


🚨कलम 327: निवडणुकीच्या संदर्भात प्राधान्य देण्यासाठी संसदेला अधिकार देते.


🚨कलम 328: निवडणुकीच्या संदर्भात कायदे तयार करण्याचे अधिकार राज्य विधानसभेला देते.


🚨कलम 329: निवडणुकीच्या प्रकरणांमध्ये न्यायालयाचा हस्तक्षेप प्रतिबंधित करते.

संविधानानुसार, उमेदवाराला मनाई करण्यास आयोगाला शक्ती आहे, जर ती व्यक्ती निवडणुकीचा खर्च नोंदविण्यात अपयशी ठरणार.


⭕️आयोगाची संरचना आणि जबाबदारी


🚨आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त असतात. निवडणूक आयुक्त हे भारतीय निवडणूक आयोगाचे सदस्य आहेत, ज्यांना राष्ट्रीय व राज्य पातळीवर निवडणूक घेण्याचे अधिकार आहेत.


🚨निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली आचारसंहिता पाळणे प्रत्येक राजकीय पक्ष, उमेदवारांसाठी बंधनकारक असते. यालाच ‘आदर्श आचारसंहिता’ (Model Code of Conduct –MCC) म्हणून देखील ओळखले जाते. आदर्श आचारसंहिता हे निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या आचरणासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारा तयार केलेली मार्गदर्शके आहेत.

Sunday 20 June 2021

आयझॅक हर्जोग: इस्राएलचे 11 वे राष्ट्राध्यक्ष...


📀आयझॅक हर्जोग यांची इस्राएल देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदावर निवड झाली आहे.


📀आयझॅक हर्जोग इस्राएलचे 11 वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. ते देशाचे मावळते राष्ट्राध्यक्ष रेयूव्हन रिव्हलिन यांच्याकडून राष्ट्राध्यक्ष पदाचा भार स्वीकारतील.


🕹इस्राएल देश...


📀इस्राएल हा पश्चिम आशियातील नवोदित ज्यू-राष्ट्र आहे. देशाच्या सीमा उत्तरेला लेबाननशी, पूर्वेला जॉर्डनशी व सिरियाशी, दक्षिणेला व पूर्वेला ईजिप्तशी आणि पश्चिमेला गाझा पट्टीशी भिडल्या आहेत.


📀इस्राएल हे सार्वभौम लोकसत्ताक राज्य आहे परंतु या देशाचे संविधान लिहिलेले नाही. देशातील राज्यव्यवस्था 1950च्या कायद्याप्रमाणे, सरकारी धोरणानुसार चालत असून क्रमाक्रमाने काही मूलभूत कायदे अंमलात आणून कालांतराने ते देशाच्या संविधानात समाविष्ट करावयाचे आहेत.


📀इस्राएली लोकसभेला ‘नेसेट’ म्हणतात. 18 वर्षावरील इस्राएली नागरिक राष्ट्राध्यक्षाची निवड करतात. राष्ट्राध्यक्ष पदाची मुदत पाच वर्षांकरिता असून तो सामान्यत: पुन्हा एकदाच निवडणुकीस पात्र असतो.

Monday 7 June 2021

भारताच्या शाश्वत विकास उद्दिष्टांचा तिसरा निर्देशांक नीति आयोगाद्वारे जाहीर.

✔️ भारताच्या शाश्वत विकास उद्दिष्टांचा तिसरा निर्देशांक, आज नीति आयोगामार्फत जाहीर करण्यात आले.

✔️ या अहवालानुसार देशाचा निर्देशांक ६ अंकांनी वाढला आहे. २०१९ मध्ये तो ६० वर होता, तो आता २०२०-२१ मध्ये ६६ इतका  आहे.

✔️ पिण्याच्या पाण्याची स्वच्छता, सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था, रास्ते आणि स्वच्छ ऊर्जा या गोष्टींवर देशभरात झालेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे हा निर्देशांक वाढला आहे.

✔️महाराष्ट्रासह केरळ, हिमाचल प्रदेश, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, गोवा, कर्नाटक, उत्तराखंड आणि सिक्कीम या नऊ राज्यांनी सर्वाधिक समाधानकारक कामगिरी केली आहे.

✔️ २०१९ मध्ये सर्वाधिक चुरस असलेली १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश होते. ती संख्या २०२०-२१ मध्ये १२ वर गेली आहे.  

✔️ प्रत्येक राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या अंमलबजावणीनुसार भारताचा निर्देशांक तयार केला जातो.

✔️डिसेंबर २०१८ पासून सुरू करण्यात आलेला हा निर्देशांक उपक्रम, देशातील शाश्वत विकास उद्दिष्टांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठीचं एक मूलभूत साधन ठरले आहे.

✔️ यामुळे जागतिक शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये आपलं स्थान मिळवण्यासाठी विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील स्पर्धा वाढली आहे.

✔️राज्य आणि केंद्रशासित प्रदेश तसेच संयुक्त राष्ट्र संघटना, भारतातील सांख्यिकी आणि. कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय आणि मुख्य केंद्रीय मंत्रालयांशी विस्तृत चर्चा करून नीती आयोगाने हे निर्देशांक तयार केले आहेत.

Saturday 5 June 2021

पंचायत राज संदर्भातील समित्या


1) व्ही आर राव (1960)
🔴विषय - पंचायत सांख्यिकी सुसूत्रता समिती

2) एस डी मिश्रा (1961)
🔵विषय - पंचायत राज आणि सहकारी संस्था

3) व्ही ईश्वरण (1961)
🟣विषय - पंचायत राज प्रशासन

4) जी आर राजगोपाल (1962)
🟠विषय - न्याय पंचायती संदर्भात अभ्यासगट

5) आर आर दिवाकर (1963)
🟢विषय - ग्रामसभेसंदर्भात

6) एम राजा रामकृष्णय्या (1963)
🟡विषय - पंचायत राज संस्थेच्या अंदाजपत्रक संदर्भात अभ्यासगट

7) के संथानम (1963)
🟤विषय - पंचायत राज अर्थविषयक अभ्यास गट

8) के संथानम (1965)
🟣विषय - पंचायत राज निवडणूक संदर्भात

9) आर के खन्ना (1965)
⚫️विषय - पंचायत राज लेखापरीक्षणसंबंधी अभ्यासगट

10) जी रामचंद्रन (1966)
⚪️विषय - पंचायत राज प्रशिक्षण संदर्भात

11) श्रीमती दया चोबे (1976)
🔴विषय - समुदाय विकास आणि पंचायत राज

जागतिक पर्यावरण दिन


🔰जागतिक पर्यावरण दिन हा जगभर जून ५ रोजी पाळला जाणारा दिवस आहे

🔰 जागतिक पर्यावरण दिन का साजरा केला जातो ? 2021 ची थीम काय आहे?

1974 पासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस साजरा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर दरवर्षी एक थीम ठरवून जगभरातली सरकारं, उद्योग, विविध संस्था पर्यावरणाशी संबंधित त्या विषयासाठी प्रयत्न करत असतात.

🔰 या वर्षीची थीम काय आहे?
2021 वर्षासाठीची थीम आहे इकोसिस्टीम रिस्टोरेशन (Ecosystem Restoration). म्हणजे परिसंस्थेची हानी रोखत तिचं संतुलन भरून काढण्याचे प्रयत्न करणं.

गोपीनाथ मुंडे यांच्यावरील टपाल तिकिटाचे प्रकाशन

🔰तळागाळातील सर्व घटकांचे लोकनेते : नड्डा
मुंबई : दिवंगत ज्येष्ठ भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे हे केवळ एका समाजाचे नेते नसून तळागळातील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व करणारे लोकनेते होते. त्यामुळे देशातल्या वंचित, गरीब जनतेच्या विकासासाठी कार्य करणे, हीच मुंडे यांच्यासाठी खरी श्रद्धांजली असेल, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी गुरुवारी केले.

🔰मुंडे यांच्या सातव्या पुण्यातिथीनिमित्ताने भारत सरकारच्या टपाल विभागाकडून त्यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाचा गौरव म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते टपाल पाकिटाचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी दूरसंचार खात्याचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, रावसाहेब दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आदींनी ऑनलाइनच्या माध्यमातून सहभाग घेतला होता.

🔰केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर गरीब जनतेसाठी, त्यांच्या कल्याणासाठी संघर्ष केला. संसदेच्या सभागृहातही त्यांनी सातत्याने गरीब, वंचित घटकांच्या विकासासाठी आवाज उठविला.

🔰गोपीनाथ मुंडे हे लोकनेते व लोकनायक होते. सत्तेविरोधात संघर्ष करतो तोच खरा नेता असतो हे त्यांनी वारंवार त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

भारत के प्रमुख राष्ट्रीय उद्यान


◆ राजस्थान
╰──────╯
1. केवला देवी राष्ट्रीय उद्यान
2. रणथ्मभोर राष्ट्रीय पार्क
3. सरिस्का राष्ट्रीय उद्यान
4. डैजर्ट राष्ट्रीय पार्क
5. दर्रा राष्ट्रीय पार्क
6. घना पक्षी राष्ट्रीय पार्क
7. केवला देवी राष्ट्रीय पार्क
8. ताल छापर अभ्यारण्य
9. माउंट आबू वाईल्ड लाइफ सैंचुरी

◆ मध्य प्रदेश
╰──────╯
1. कान्हा राष्ट्रीय पार्क
2. पेंच राष्ट्रीय पार्क
3. पन्ना राष्ट्रीय पार्क
4. सतपुड़ा राष्ट्रीय पार्क
5. वन विहार पार्क
6. रुद्र सागर झील राष्ट्रीय पार्क
7. बांधवगढ नेशनल पार्क
8. संजय नेशनल पार्क
9. माधव राष्ट्रीय पार्क
10. कुनो नेशनल पार्क
11. माण्डला प्लांट फौसिल राष्ट्रीय पार्क

◆अरुणाचल प्रदेश
╰─────────╯
1. नामदफा राष्ट्रीय पार्क

◆ हरियाणा
╰─────╯
1. सुलतानपुर राष्ट्रीय पार्क
2. कलेशर राष्ट्रीय पार्क

◆ उत्तर प्रदेश
╰──────╯
1. दूदवा राष्ट्रीय पार्क
2. चन्द्रप्रभा वन्यजीव विहार

◆ झारखंड
╰─────╯
1. बेतला राष्ट्रीय पार्क
2. हजारीबाग राष्ट्रीय पार्क
3. धीमा राष्ट्रीय पार्क

◆ मणिपुर
╰─────╯
1. काइबुल लाम्झो राष्ट्रीय पार्क
2. सिरोही राष्ट्रीय पार्क

◆ सिक्किम
╰─────╯
1. खांचनजोंगा राष्ट्रीय पार्क

◆ त्रिपुरा
╰───╯
1. क्लाउडेड राष्ट्रीय पार्क

◆ तमिलनाडु
╰──────╯
1. गल्फ आफ मनार राष्ट्रीय पार्क
2. इन्दिरा गांधी ( अन्नामलाई ) राष्ट्रीय पार्क
3. प्लानी हिल्स राष्ट्रीय पार्क
4. मुकुरूथी नेशनल पार्क
5. गुनीडे नेशनल पार्क

◆ ओडिसा
╰─────╯
1. भीतरगनिका राष्ट्रीय पार्क
2. सिंमली राष्ट्रीय पार्क
3. नन्दनकानन राष्ट्रीय चिड़ीयाघर
4. चिल्का झील अभयारण्य

◆ मिजोरम
╰─────╯
1. माउन्टेन राष्ट्रीय पार्क
2. मुरलेन राष्ट्रीय पार्क
3. फांगपुई नेशनल पार्क
4. डाम्फा अभ्यारण्य

◆ जम्मू-कश्मीर
╰───────╯
1. दाचीग्राम राष्ट्रीय पार्क
2. सलीम अली राष्ट्रीय पार्क
3. किस्तवाड़ राष्ट्रीय पार्क
4. हैमनिश नेशनल पार्क
5. जैव मण्डल रीजर्व , श्रीनगर

◆ पश्चिम बंगाल
╰───────╯
1. सुन्दरवन राष्ट्रीय पार्क
2. बुक्सा राष्ट्रीय पार्क
3. जलधपारा राष्ट्रीय पार्क
4. गोरूवारा राष्ट्रीय पार्क
5. सिंघालिला राष्ट्रीय पार्क
6. नियोरा वैली नेशनल पार्क

◆ असम
╰───╯
1. मानस राष्ट्रीय पार्क
2. काजीरंगा राष्ट्रीय पार्क
3. नामेरी राष्ट्रीय पार्क
4. राजीव गांधी ओरांग पार्क
5. डिब्रूगढ़ शेखोवाल राष्ट्रीय पार्क

◆ आंध्र प्रदेश
╰──────╯
1. कसरू ब्रह्मानंदा रेड्डी नेशनल पार्क
2. इन्दिरा गाँधी प्राणी विज्ञान पार्क
3. मरूग

Latest post

महाराष्ट्राचा भूगोल

दख्खनवरील पठारे ------------------------------------------------------------ ----------------------- अ.क्र. पठार. जिल्हा. ------------------...