Thursday 14 November 2019

ई-गव्हर्नन्स : २२ वे राष्ट्रीय संमेलन

ई- गव्हर्नन्सचे राष्ट्रीय संमेलन आठ व नऊ ऑगस्ट रोजी मेघालयची राजधानी शिलाँग येथे पार पडले. हे संमेलन ईशान्य भारतात प्रथमच आयोजित करण्यात आले होते.

नव्या सरकारमधील पहिल्या १०० दिवसांच्या कार्यकाळातील उपक्रमांचा एक भाग म्हणून या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

ईशान्येकडील राज्यांचा विकास मंत्रालयाचे राज्यमंत्री आणि प्रधानमंत्री कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण व निवृत्तिवेतन, सौर ऊर्जा विभाग व अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह हे या संमेलनाचे अध्यक्ष होते.

‘डिजिटल इंडिया : प्रावीण्याकडून यशाकडे’ हा या संमेलनाचा मुख्य विषय होता.

या संमेलनात २८ राज्ये व आठ केंद्रशासित प्रदेशांमधून सुमारे ५०० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.

या संमेलनाची सांगता नऊ ऑगस्ट रोजी शिलाँग जाहीरनाम्याच्या स्वीकृतीने करण्यात आली.

विषय : महाराष्ट्र राज्य भूगोल प्रश्नसंच स्पष्टीकरण....

प्र.१) खालीलपैकी पुणे विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे ?

अ) मावळ
ब) जुन्नर
क) अहमदनगर
ड) मेढा

उत्तर : ब) जुन्नर हा तालुका पुणे विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका आहे.

प्र.२) महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता ?

अ) खोपोली
ब) कोयना
क) वैतरणा
ड) वरीलपैकी नाही.

उत्तर : ब) कोयना जलविद्युत प्रकल्प....

प्र.३) महाराष्ट्र राज्यात कापसाच्या पिकासाठी सर्वात मोठी बाजारपेठ कोणत्या ठीकाणी आहे ?

अ) अमरावती
ब) जळगाव
क) अकोला
ड) यवतमाळ

उत्तर : क) महाराष्ट्र राज्यात कापसाच्या पिकासाठी सर्वात मोठी बाजारपेठ  अकोला या ठीकाणी आहे.

प्र.४) सुसरी हे धरण कोणत्या जिल्ह्यातील आहे ?

अ) जळगाव
ब) नंदुरबार
क) नांदेड
ड) औरंगाबाद

उत्तर : ब) सुसरी हे धरण नंदुरबार जिल्ह्यात आहे.

प्र.५) देहू हे धार्मिक ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे ?

अ) संत ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थळ
ब) संत तुकाराम महाराज समाधीस्थळ
क) संत एकनाथ महाराज समाधीस्थळ
ड) संत चोखामेळा महाराज समाधीस्थळ

स्पष्टीकरण : देहू हे धार्मिक स्थळ संत तुकाराम महाराज समाधीस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थळ आणि गाव सुद्धा देहूच आहे.

प्र.६) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास 'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाते ?

अ) नाशिक
ब) अहमदनगर
क) कोल्हापूर
ड) पुणे

उत्तर : क) कोल्हापूर

प्र.७) सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या किती आहे ?

अ) ११,२०,५४,६६६
ब) ११,२३,७४,३३३
क) १२,३३,७५६,५४२
ड) २१,११,३३,६६६

उत्तर : ब)  ११,२३,७४,३३३ : सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या ११,२३,७४,३३३ईतकी आहे.

प्र.८) महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांची संख्या किती आहे ?

अ) २९ जिल्हे
ब) ३४ जिल्हे
क) ३६ जिल्हे
ड) ३८ जिल्हे

उत्तर : क) ३६ जिल्हे
स्पष्टीकरण : सन २०११ च्या जणगणनेनुसार प्राथमिक निष्कर्षांनुसार भारतात एकूण ६४० जिल्हे होते, त्यांपैकी ३५ जिल्हे महाराष्ट्र राज्यात होते,  आता ०१ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन 'पालघर' या नवा जिल्ह्याची निर्मिती करण्यात आल्यामुळे राज्यातील जिल्ह्यांची संख्या आता ३६ इतकी झाली आहे.

प्र.९) दगडी कोळशाचे साठे लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य देशात कितव्या स्थानावर आहे ?

अ) दुसर्या
ब) चौथ्या
क) सातव्या
ड) नवव्या

उत्तर : महाराष्ट्रात देशातील एकूण दगडी कोळशाच्या साठ्यांच्या ३ % टक्के साठे आहेत, दगडी कोळशाचे साठे लक्षात घेता महाराष्ट्र राज्य देशात सातव्या स्थानावर आहे.

प्र.१०) उसाच्या उत्पादनात महाराष्ट्र राज्य कितव्या स्थानावर आहे ?

अ) पहिल्या
ब) दुसर्या
क) तीसर्या
ड) चौथ्या

उत्तर : उसाच्या उत्पादनात महाराष्ट्र देशात दुसर्या स्थानावर असला तरी साखरेच्या उत्पादनात मात्र प्रथम स्थानावर आहे.

शांघाय सहकार्य संघटना (Shanghai Cooperation Organisation)

🚦पार्श्वभूमी : चीन, कझाकस्तान, किर्गिझस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान या देशांनी मिळून १९९६मध्ये ‘शांघाय–५’ या संघटनेची स्थापना केली होती.

🚦त्यानंतर १५ जून २००१ रोजी उझबेकिस्तान हा या संघटनेत सामील झाला. त्यानंतर संघटनेचे नाव ‘शांघाय सहकार्य संघटना’ (SCO) किंवा ‘शांघाय करार’ असे ठेवण्यात आले.

🚦युरोप आणि रशिया या दोन्ही खंडांतील देशांच्या सहभागाने बनलेली अशी ही (युरेशियन) राजकीय, आर्थिक आणि लष्करी संघटना होय.
           
🚦USSR च्या विघटनानंतर वॉर्सा करार रद्द झाला, त्यानंतर पश्चिमी गटाच्या नाटो या संघटनेला शह देण्यासाठीच शांघाय सहकार्य संघटनेची स्थापना झाली.

🎯सदस्य :-

🚦वरील सहा देश अधिक भारत आणि पाकिस्तान या देशांनी जून २०१७ साली या संघटनेत सामील

🎯निरीक्षक सदस्य :-

🚦अफगाणिस्तान, बेलारूस, इराण आणि मंगोलिया  

🎯संवाद भागीदार देश :-

🚦अझरबैजान, कंबोडिया, नेपाळ, श्रीलंका आणि टर्की हे सहा देश

🎯निरीक्षक संघटना :-

🚦संयुक्त राष्ट्र आमसभा, युरोपियन युनियन, आशियान ही संघटना,  राष्ट्रकूल परिषद आणि इस्लामिक सहकार्य परिषद या संघटनांमध्ये शांघाय सहकार्य संघटनेला निरीक्षक म्हणून प्रवेश देण्यात आला आहे.

🚦एकत्रित लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या एकचतुर्थांश इतकी होते. 

🎯रचना :-

🚦राष्ट्रप्रमुखांची समिती ही निर्णय घेणारी सर्वोच्च समिती आहे. शासकीय प्रमुखांची समिती ही निर्णय घेणारी दुसऱ्या क्रमांकाची समिती आहे.

🎯सचिवालय :- बिजिंग

🚦दहशतवादी, फुटीरतावादी आणि अतिरेक्यांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी शांघाय सहकार्य संघटनेने क्षेत्रीय दहशतवादविरोधी समिती निर्माण केली आहे. या समितीचे मुख्य कार्यालय ताश्कंद येथे आहे.

🚦एप्रिल २००६ साली क्षेत्रीय दहशतवादविरोधी समिती स्थापन.

🚦ऑक्टोबर २००७ मध्ये सामूहिक सुरक्षा संघटना स्थापन.

🚦एक लष्करी गट म्हणून काम करणार नसल्याचे या संघटनेने स्पष्ट केले आहे.

विषय : चालू घडामोडी प्रश्नावली स्पष्टीकरण

प्र.१) यंदाच्या प्रतिष्ठित हिंदी रत्न पुरस्कारासाठी निवड झालेल्या प्रसिद्ध पत्रकाराचे नाव काय आहे?
अ) बोरिया मुजुमदार 
ब) रामबहादूर राय ✅
क) रुबिका लियाकत    
ड) स्वेता सिंग

स्पष्टीकरण: यंदाच्या प्रतिष्ठित हिंदी रत्न पुरस्कारासाठी निवड झालेल्या प्रसिद्ध पत्रकाराचे नाव रामबहादूर राय आहे.

प्र.२) संगीत अकादमीकडून दिल्या जाणाऱ्‍या ‘संगीत कलानिधी’ सन्मानासाठी २०१९ या वर्षासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे?
अ) एम. एस. शीला    
ब) राजकुमार भारती    
क) एस. सौम्या ✅    
ड) सीता नारायणन

स्पष्टीकरण : संगीत अकादमीकडून दिल्या जाणाऱ्‍या ‘संगीत कलानिधी’ सन्मानासाठी २०१९ या वर्षासाठी एस. सौम्या यांची निवड करण्यात आली आहे.

प्र.३) ‘डिफएक्सपो इंडिया’ याची २०२० मध्ये होणारी ११ वी द्विवार्षिक आवृत्ती पहिल्यांदाच .............. येथे आयोजित करण्यात आली आहे.
अ) भोपाळ, मध्यप्रदेश    
ब) लखनौ, उत्तर प्रदेश ✅
क) कोची, केरळ 
ड) चेन्नई, तामिळनाडू

स्पष्टीकरण : ‘डिफएक्सपो इंडिया’ याची २०२० मध्ये होणारी ११ वी द्विवार्षिक आवृत्ती पहिल्यांदाच लखनौ, उत्तर प्रदेश येथे आयोजित करण्यात आली आहे.

प्र.४) भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने राष्ट्रपतींना राज्याचे राज्यपाल नियुक्त करण्याचा अधिकार दिला आहे
अ) कलम १४५    
ब) कलम १५५ ✅
क) कलम १६५ 
ड) कलम १७५

स्पष्टीकरण : भारतीय राज्यघटनेच्या कलम १५५ कलमाने राष्ट्रपतींना राज्याचे राज्यपाल नियुक्त करण्याचा अधिकार दिला आहे.

प्र.५) कझाकिस्तानच्या ‘प्रेसिडेंट चषक’ मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी मिळवले?
अ) शिव थापा  ✅
ब) विजेंदर सिंग
क) मेरी कोम    
ड) अखिल कुमार

स्पष्टीकरण : कझाकिस्तानच्या ‘प्रेसिडेंट चषक’ मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक शिव थापा यानी मिळवले.

प्र.६) भारतात कारगिल युद्ध ............ या नावानेदेखील ओळखले जाते.
अ) ऑपरेशन किंग    
ब) ऑपरेशन धरोहर
क) ऑपरेशन वतन    
ड) ऑपरेशन विजय ✅

स्पष्टीकरण : भारतात कारगिल युद्ध ऑपरेशन विजय या नावानेदेखील ओळखले जाते.

प्र.७) ‘आफ्रिका करंडक २०१९’ फुटबॉल स्पर्धेचा विजेता कोण आहे?
अ) सेनेगल    
ब) अल्जेरिया ✅
क) इजिप्त    
ड) दक्षिण आफ्रिका

स्पष्टीकरण :  ‘आफ्रिका करंडक २०१९’ फुटबॉल स्पर्धेचा विजेता अल्जेरिया आहे.

प्र.८) भारताच्या ६४ व्या ग्रँडमास्टरचे नाव काय आहे?
अ) प्रितू गुप्ता   ✅  
ब) पेंटला हरिकृष्ण
क) विजित गुजराती    
ड) अभिधान

स्पष्टीकरण : भारताच्या ६४ व्या ग्रँडमास्टरचे नाव प्रितू गुप्ता आहे.

प्र.९) ऐतिहासिक सफदरजंग कबर कुठे आहे?
अ) पुणे    
ब) लखनौ      
क) दिल्ली ✅      
ड) सुरत

स्पष्टीकरण : ऐतिहासिक सफदरजंग कबर दिल्ली येथे आहे.

प्र.१०) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) .......... याचे पूर्ण सदस्यत्व तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.
अ) वेस्ट इंडीज    
ब) डेन्मार्क क्रिकेट
क) झिंबाब्वे क्रिकेट    ✅
ड) केनिया क्रिकेट

स्पष्टीकरण : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) झिंबाब्वे क्रिकेट  याचे पूर्ण सदस्यत्व तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.

आजचे प्रश्न 15/11/2019

भारतीय भू-बंदरे प्राधिकरण (LPAI) याचे नवे अध्यक्ष कोण आहेत?

(A) आदित्य मिश्रा✅✅
(B) नवीन महाजन
(C) रवी जैन
(D) दिलीप शर्मा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या IIT संस्थेनी दिव्यांग लोकांसाठी ‘अराइज-ए स्टँडिंग व्हीलचेयर’ तयार केली?

(A) IIT जोधपूर
(B) IIT मुंबई
(C) IIT मद्रास✅✅
(D) IIT दिल्ली

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या भारतीय वंशाच्या संशोधकाला ऑस्ट्रेलियाच्या सरकारचा ‘अर्ली करिअर रिसर्चर ऑफ द इयर 2019’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे?

(A) मोहित बंथीया
(B) सी. सी. जैन
(C) नीरज शर्मा✅✅
(D) हेमंत विजय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 27 व्या ‘एझुथाचन पुरस्कारम 2019’ या पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली?

(A) रितू कालरा
(B) निर्मला मेहता
(C) ममता कल्यानी
(D) आनंद✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 अमेरिका आणि बांग्लादेश यांच्यातला ‘CARAT 2019’ नावाचा सागरी सराव बांग्लादेशाच्या कोणत्या शहरात आयोजित केला गेला आहे?

(A) ढाका
(B) खुल्ना
(C) चित्तागोंग✅✅
(D) कोमिला

भारत - पाकिस्तानदरम्यान कर्तारपूर कॉरिडोर खुला करण्यात आला आहे. ही ती जागा आहे जिथे गुरुनानकांनी आपल्या आयुष्याची शेवटची 18 वर्षं घालवली होती.


✍गुरुनानकांच्या आयुष्यातल्या तीन महत्त्वाच्या टप्प्यांच्या दृष्टीने त्यांचं जन्मस्थान ननकानासाहिब (पाकिस्तान), सुलतानपूर लोधी (भारत) आणि कर्तारपूर या शहरांना विशेष महत्त्व आहे.

✍ननकाना साहिब
गुरुनानकांचं हे जन्मस्थळ आज पाकिस्तानात आहे.
✍सुलतानपूर लोधी
गुरुनानकांच्या आयुष्यातलं हे दुसरं महत्त्वाचं ठिकाण असं म्हणता येईल. भारतातल्या या जागी त्यांनी जवळपास 14-15 वर्षं घालवली. त्यांच्या वास्तव्याशी संबंध असलेल्या 5 महत्त्वाच्या जागा इथे आहेत.
✍बेबे नानकी यांचं घर
इथे गुरूनानक यांची बहीण आपले पती जय रामजी यांच्यासोबत राहत असे. इथली पाणपोई आजही सुरू आहे. घराच्या पहिल्या मजल्यावर गुरू ग्रंथ साहिब ठेवण्यात आलाय आणि तिथे एक संग्रहालयही आहे.
✍गुरुद्वारा हट साहिब
नानकी यांचे पती जय रामजी यांनी सुलतानपूर लोधीमधल्या एका गुरुद्वारामध्ये गुरुनानक देव यांची नियुक्ती केली होती. त्याच ठिकाणी आज हा गुरुद्वारा हट साहिब आहे.
✍गुरुद्वारा बेर साहिब
या ठिकाणी गुरुनानक ध्यानधारणा करायचे. इथे असलेलं एक बोराचं झाड गुरूनानक यांनी लावलं असल्याचं शीख समुदायाची धारणा आहे.
✍गुरुद्वारा संत घाट
ना हिंदू - ना मुस्लिम हा संदेश गुरुनानक यांनी इथेच दिला होता.
✍सुलतानपूर लोधी नावाची ही जागा भारतातल्या पंजाबमधील कपूरथलाजवळ आहे. इथल्या नवाब दौलत लोधी यांच्याकडे गुरूनानकांनी कामही केल्याचं मानलं जातं. त्यांच्या मुलांचा जन्मही इथेच झाला.
✍कर्तारपूर गुरुद्वारा
कर्तारपूर साहिब पाकिस्तानात असलं तरी ते भारतापासून फक्त साडेचार किलोमीटरवर आहे.
शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक 1522मध्ये कर्तारपूरला आले होते, असं मानलं जातं. आपल्या आयुष्याची शेवटची 18 वर्षं त्यांनी इथेच घालवली.

✍प्रकाश पर्व म्हणजे काय आणि कसं साजरं केलं जातं?
गुरुनानक यांचा जन्मदिवस शीख समुदायात 'प्रकाश पर्व' म्हणून साजरा केला जातो.

राफेलप्रकरणी फेरविचार याचिकांवर आज निर्णय

🔰फ्रान्सच्या दसॉल्ट अ‍ॅव्हीएशन कंपनीकडून राफेल जेट विमाने खरेदी करण्याच्या मुद्दय़ावर मोदी सरकारला  निर्दोषत्व बहाल करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिकांवर सर्वोच्च न्यायालय गुरुवारी निकाल  जाहीर करणार आहे.

🔰दसॉल्ट कंपनीकडून ही विमाने खरेदी करण्याच्या करारात पूर्वीच्या कराराच्या तुलनेत जास्त रक्कम खर्च झाली असून सगळी निर्णय प्रक्रियाच सदोष होती असा  आरोप काँग्रेससह विरोधकांनी केला होता.

🔰फ्रान्सच्या दसॉल्ट अ‍ॅव्हीएशन कंपनीकडून ३६ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याची निर्णय प्रक्रिया सदोष होती तसेच पूर्वीच्या करारापेक्षा आताच्या करारातच जास्त पैसा खर्च करण्यात आला असा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या बाजूने निकाल दिला होता.

🔰१४ डिसेंबर २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाने राफेल विमानांच्या ५८ हजार कोटी रुपयांच्या करारातील गैर प्रकारांच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळल्या होत्या. त्यावर माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी व वकील-कार्यकर्ते प्रशांत भूषण यांनी निकालावर फेरविचार करण्याची मागणी एका याचिकेतून केली होती. याशिवाय वकील विनीत धंधा, आपचे वकील संजय सिंह यांनीही फेरविचार याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर सरन्यायाधीश  रंजन गोगोई, न्या. एस.के.कौल, न्या. के.एम जोसेफ हे गुरुवारी निकाल देणार आहेत.

नवीन राष्ट्रीय जल धोरण तयार करण्यासाठी मिहिर शहा समितीची स्थापना...

🔰नवीन राष्ट्रीय जल धोरण तयार करण्याच्या उद्देशाने जल सुधारणांचे विश्लेषण आणि त्याचा मसुदा तयार करण्यासाठी भारत सरकारने मिहिर शहा यांच्या नेतृत्वात दहा सदस्य असलेली एक उच्चस्तरीय समिती नेमली. केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाने 11 नोव्हेंबर 2019 रोजी याबद्दल घोषणा केली.

🔴समिती व त्याची कार्ये :-

🔰मिहिर शहा हे पूर्वीच्या नियोजन आयोगाचे (आताचे NITI आयोग) माजी सदस्य आणि एक जल तज्ज्ञ आहेत. समितीत इतर सदस्यांमध्ये माजी जलसंपदा सचिव शशी शेखर आणि केंद्रीय भूजल मंडळाचे माजी अध्यक्ष ए. बी. पंड्या यांच्यासह दहा लोक आहेत.

🔰केंद्रीय जल आयोग (CWC) आणि केंद्रीय भूजल मंडळ (CGWB) या दोनही संस्थांच्या कार्यांचा आढावा घेण्याचे काम या समितीकडे सोपविण्यात आले आहे.

🔰समिती या दोनही मंडळांचे लक्ष नसलेल्या मुद्द्यांना ओळखून त्याबाबत असलेल्या तफावतीचे विश्लेषण करणार आहे.

🔴धोरणाबाबत..

🔰भारत सरकारचे केंद्रीय जलसंपदा मंत्रालय राष्ट्रीय जल धोरण तयार करीत असते. धोरण उपलब्ध जलसंपत्तीचे नियोजन आणि त्यांचे संवर्धन आणि कार्यक्षमपणे वापर अश्या मुद्द्यांना लक्षात घेवून तयार केले जाते. सप्टेंबर 1987 मध्ये भारताने पहिले राष्ट्रीय जल धोरण अवलंबले होते. पुढे सन 2002 आणि नंतर सन 2012 मध्ये त्याचे पुनरावलोकन करण्यात आले आणि त्यात सुधारणा करण्यात आली.

🔰राष्ट्रीय जल धोरण वैश्विक तापमानवाढीचा सामना करण्यासाठी तयार केलेल्या ‘हवामानातले बदल विषयक राष्ट्रीय कृती योजना’ (NAPCC) याच्या अंतर्गत चालविलेल्या आठ मोहिमांपैकी एक आहे. पाण्याचा वापर 20 टक्क्यांनी कार्यक्षमपणे वाढविले हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे.

या आहेत जगातील 10 श्रीमंत महिला


1) लिलिएन बेटनकोर्ट :

जगातील सर्वात प्रसिद्ध सौंदर्य प्रसाधनांचं  उत्पादन करणाऱ्या लॅारिअल कंपनीच्या मालक असलेल्या लिलिएन यांचं उत्पन्न 44.3 अब्ज डॅालर इतकं होतं.

2) एलिस वॅाल्टन :

अमेरिकेतील प्रसिद्ध वॅालमार्ट स्टोअरच्या मालक असलेल्या एलिस यांचं उत्पन्न 33.8 अब्ज डॅालर इतकं आहे.

3) जॅकलिन मार्स :

अमेरिकेतील सर्वात श्रीमंत गुंतवणूकदार म्हणून मार्स यांची ओळख आहे. मार्स यांचं उत्पन्न 27 अब्ज डॅालर इतकं आहे.

4) मारिया फ्रँका फिसोलो :

मारिया या इटलीमध्ये राहाणारे अब्जाधीश आहेत. युरोपमधीलच नाही तर जगभरातील सर्वात प्रसिद्ध फेरेरो चॅाकलेट्स आणि मिठाई कंपनीच्या त्या मालक आहेत. त्यांचं उत्पन्न 25.2 अब्ज डॅालर आहे.

5) सुसॅन क्लेटन :

जर्मनीतील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून सुसॅन यांची ओळख आहे. बीएमडब्लू आणि अल्टाना या नामवंत कंपनीच्या त्या गुंतवणूकदार आहेत. त्यांचं उत्पन्न 20.4 अब्ज डॅालर आहे.

6) लॅारेन पॅावेल जॅाब्स :

सामाजिक संस्थांच्या लॅारेन कार्यकर्त्या आहेत. अ‍ॅपल कंपनीचे मालक स्टिव्ह जॅाब्स यांच्या लॅारेन पत्नी आहेत. त्यांच उत्पन्न 20 अब्ज डॅालर आहे.

7) जिना रिनेहार्ट :

ऑस्ट्रेलियातील सर्वात श्रीमंतांपैकी एक असलेल्या जिना हॅंकॅाक या कंपनीच्या मालक आहेत. त्यांचं उत्पन्न 15 अब्ज डॅालर आहे.

8) अ‍ॅबगेल जॅान्सन :

अ‍ॅबगेल जॅान्सन या अमेरिकेच्या बिझनेस वुमन आहेत. फिडेलिटी या कंपनीच्या त्या मालक असून त्यांच उत्पन्न 14.4 अब्ज डॅालर इतकं आहे.

9) आयरिस फॅान्टबोना :

आयरिस यांचं स्थान जगातील श्रीमंतांच्या यादीत 101 क्रमांकावर असून लॅटिन अमेरिकेतील श्रीमंतांमध्ये त्या पाचव्या स्थानावर आहेत. त्यांचं उत्पन्न 13.7 अब्ज डॅालर इतकं आहे.

10) बिट हेसिटर : 

जर्मनीच्या अब्जाधीशांपैकी एक असलेल्या बिट किराणा माल सवलतीत मिळवून देणाऱ्या 'अल्दि' या सुपरमार्केटच्या मालक आहेत. त्यांचे उत्पन्न 13.6 अब्ज डॅालर इतके आहे.

Latest post

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती

०१) महाराष्ट्रातील नेहरू स्टेडियम कोठे आहे ? - पुणे. ०२) अँल्युमिनियम हा धातू कोणत्या खनिजापासून तयार केला जातो ? - बाॅक्साईट. ०३) डाॅ.पंजाब...