Thursday 13 June 2024

G7 बद्दल माहिती

🔖सौदीने तेल 300% महाग केले होते आणि 1973 मध्ये G7 ची स्थापना हालचाल सुरू झाली

📌 इस्रायल आणि अरब राष्ट्रांमध्ये युद्ध झाले. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी इस्रायलच्या मदतीसाठी 18 हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली. पॅलेस्टाईनचे समर्थन करणारे सौदी अरेबियाचे 'किंग फैसल' अमेरिकेच्या या निर्णयामुळे चांगलेच संतापले. केवळ अमेरिकेलाच नव्हे तर इस्रायलला पाठिंबा देणाऱ्या सर्व पाश्चिमात्य देशांना धडा शिकवण्याची योजना त्यांनी आखली.

📌 फैसल यांनी तेल उत्पादक देशांची संघटना ओपेकची बैठक बोलावली. हे देश तेल उत्पादनात कमालीची कपात करतील, असा निर्णय घेण्यात आला. याचा परिणाम असा झाला की 1974 पर्यंत जगात तेलाचा तुटवडा निर्माण झाला.

📌 तेलाच्या किमती 300% वाढतात. त्याचा सर्वात मोठा परिणाम अमेरिका आणि त्याच्या श्रीमंत सहकारी देशांवर झाला आहे. आर्थिक संकट येते. महागाई गगनाला भिडू लागली आहे.

📌 वर्षी 1975 मध्ये तेलाच्या वाढत्या किमतींमुळे त्रस्त जगातील 6 श्रीमंत देश एकत्र आले. ते त्यांचे हित जोपासण्यासाठी एक संघटना तयार करतात. याला 'ग्रुप ऑफ सिक्स' म्हणजेच G6 असे म्हणतात. यामध्ये अमेरिका, जर्मनी, जपान, इटली, ब्रिटन आणि फ्रान्स यांचा समावेश होता. 1976 मध्ये कॅनडात सामील झाल्यानंतर ही संघटना G7 बनली.

🔖 सोव्हिएत रशियाचे विघटन झाले तेव्हा त्याचाही G7 मध्ये समावेश होता, मग तो का काढला गेला..

📌1975 मध्ये G7 ची स्थापना झाली तेव्हा तो शीतयुद्धाचा काळ होता. एका बाजूला सोव्हिएत युनियन आणि त्याला पाठिंबा देणारे देश होते. ज्यांनी मिळून वॉर्सा नावाने एक गट तयार केला. याला विरोध करण्यासाठी फ्रान्स, इटली, पश्चिम जर्मनी (त्यावेळी जर्मनीचे दोन भाग झाले होते), अमेरिका, ब्रिटन, जपान आणि कॅनडा हे डावे विरोधी पाश्चात्य देश एका व्यासपीठावर आले.एकत्र बसून त्यांच्या हितसंबंधांशी संबंधित आर्थिक मुद्द्यांवर चर्चा करणे आणि सोव्हिएत रशियाचा मुकाबला करणे हा त्यांचा उद्देश होता.

📌G7 संघटनेचा दुसरा टप्पा 1998 मध्ये सुरू होतो. सोव्हिएत रशियाचे अनेक तुकडे झाले. शीतयुद्ध संपले होते. तेव्हाच रशियाचा त्यात समावेश झाला. यावेळी रशियाचे अध्यक्ष बोरिस येल्त्सिन होते. त्यावेळी रशियाचे धोरण अमेरिका आणि पाश्चात्य देशांच्या समर्थनात होते.

📌रशिया G7 मध्ये सामील झाल्यानंतर त्याचे नाव G8 झाले. रशियाने 2014 मध्ये क्रिमियामध्ये घुसखोरी केल्यानंतर त्याला संघटनेतून काढून टाकण्यात आले होते.

🔖 G7 चे कार्य काय आहे-

📌 7 संघटनेच्या पहिल्या बैठकीत सौदीने सुरू केलेल्या तेलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी योजना तयार करण्यात आली. तसेच त्यावेळी विनिमय दराचे संकट सुरू झाले होते. याचा अर्थ अमेरिकेने डॉलरचे मूल्य सोन्यापासून डी-लिंक केले होते. जगात सोन्याऐवजी डॉलरचे वर्चस्व वाढवण्यासाठी अमेरिकेने हे केले. तथापि, यामुळे इतर देशांसाठी आर्थिक समस्या सुरू झाल्या.

दरम्यान, पाश्चात्य देशांना आर्थिक स्तरावर धोरणे बनवण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे वाटले. जेणेकरून ते त्यांचे व्यवसाय आणि व्यापाराचे प्रश्न आपापसात सोडवू शकतील.

तेव्हापासून सातत्याने दरवर्षी या संघटनेच्या बैठका होतात. हे देश जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतात.

👉👉 👉 2022 मध्ये झालेल्या G7 बैठकीत सर्व सात देशांनी युक्रेन युद्धामुळे रशियावर आर्थिक निर्बंध लादण्याची घोषणा केली होती. त्याच वेळी, गेल्या वर्षी चीनला त्याच्या कर्जाच्या सापळ्याविरुद्ध इशारा देण्यात आला होता.

🔖G 7 GDP मधील वाटा-

अमेरिका -24.4%

जापान -4.7%

जर्मनी-4.1%

ब्रिटेन-3.3%

● फ्रांस-2.8%

कनाडा-2.1%

● इटली-2.0%

20 महत्त्वाचे CSAT सराव प्रश्न उत्तरे

1. सन 1996 हे लिपवर्ष आहे. 1 जानेवारी 1996 रोजी सोमवार असेल तर 1 जानेवारी 1997 रोजी कोणता वार येईल?

 शुक्रवार

 मंगळवार

 गुरुवार

 बुधवार

उत्तर : बुधवार



 2. राधा व रमा या बहिणी आहेत. सरला व विमला याही बहिणी आहेत. सरलाचे वडील हे रमाचे भाऊ आहेत तर विमला ही राधाची कोण?

 मावस बहीण

 पुतणी

 भाची

 आत्या

उत्तर :भाची



 3. K हा J चा भाऊ आहे. M ही K ची बहीण आहे. P हा N चा भाऊ आहे. N ही J ची मुलगी आहे. S हा M चा बाप आहे. तर P चा काका कोण?

 K

 J

 N

 S

उत्तर :K



 4. आर्या याच जन्म 18 ऑक्टोबर 1993 रोजी झाला. त्यावर्षी गांधी जयंतीचा वार शनिवार होता. तर आर्याचा आठव्या वाढदिवसाच्या दिवशी कोणता वार येईल?

 गुरुवार

 बुधवार

 सोमवार

 रविवार

उत्तर :गुरुवार



 5. खालील मालिकेत 8 नंतर 18 ही संख्या किती वेळा आली आहे?

 818881881811818181881888111818181181881

 9 वेळा

 10 वेळा

 11 वेळा

 8 वेळा

उत्तर :10 वेळा



 6. खालील गटामध्ये जोड अक्षरे शब्द किती आहेत?

 ग्रह, कृपा, कृषी, तंत्र, गृह, क्रम, कृती, क्षमा.

 पाच

 सात

 आठ

 वरील सर्व

उत्तर :पाच



 7. खुर्ची म्हटले की पुढीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे?

 लाकूड

 हात

 बैठक

 पॉलिश

उत्तर :बैठक



 8. गुलाबाला बटाटा म्हटले, बटाट्याला गुळ म्हटले, गुळाला आंबा म्हटले आणि आंब्याला गवत म्हटले तर खालीलपैकी मानवाने तयार केलेली वस्तु कोणती?

 आंबा

 गुळ

 बटाटा

 गवत

उत्तर :आंबा



 9. इंग्रजी वर्णमालेतील क्रमांक 25, 19 आणि 5 ही अक्षरे जुळवून एक शब्द तयार होतो, तर त्या शब्दातील शेवटचे अक्षर कोणते?

 E

 W

 S

 R

उत्तर :S



 10. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा?

 7497:5255:111:?

 312

 121

 393

 101

उत्तर :393



 11. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा?

 6:38::7:?

 51

 52

 50

 48

उत्तर :51



 12. सतीशचे 15 वर्षापूर्वी वय 30 होते तर तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल?

 10

 15

 25

 30

उत्तर :15



 13. 4312 म्हणजे NICE व 756 म्हणजे PRO तर 75312 म्हणजे काय?

 PICEP

 CEPRJ

 PIRCE

 PRICE

उत्तर :PRICE



 14. विसंगत शब्द शोधा.

 जव (सातू)

 कापूस

 तांदूळ

 गहू

उत्तर :कापूस



 15. जर डॉक्टरांनी तुम्हाला चार गोळ्या दर अर्ध्या तासाने एक याप्रमाणे घ्यायला सांगितल्या तर त्या सर्व संपण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल?

 2 तास

 अडीच तास

 1 तास

 दिड तास

उत्तर :दिड तास



 16. जर WINTER=2391420518 तर COTTON=?

 31520201514

 31515202014

 32520152014

 31420151520

उत्तर :31520201514



 17. सायंकाळी 5:30 पासून रात्री 8:30 पर्यंत मिनिटकाटा तासकाट्याला किती वेळा ओलांडून जाईल?

 तीन वेळा

 दोन वेळा

 चार वेळा

 पाच वेळा

उत्तर : दोन वेळा



 18. पाच बगळे पाच मासे पाच मिनिटात खातात, तर एक बगळा एक मासा किती मिनिटात खाईल?

 1

 25

 5

 15

उत्तर :5


 19. एक वस्तु रु. 750 ला खरेदी केली व रु. 840 ला विकली तर शेकडा नफा किती झाला?

 12

 15

 18

 20

उत्तर :12



 20. घड्याळात 13 वाजून 35 मिनिटे झाली आहेत, तर आरशात पाहिले असता किती वाजल्यासारखे दिसेल?

 9 वाजून 25 मिनिटे

 10 वाजून 35 मिनिटे

 11 वाजून 20 मिनिटे

 यापैकी नाही

उत्तर : यापैकी नाही

विषय : :- बुद्धिमत्ता चाचणी खास MPSC साठी


1)एक षटकोनाच्या शिरोबिंदूवर A,B,C,D,E,F असे सहा लोक षटकोनाच्या केंद्राकडे तोंड करून गप्पा मारत बसलो आहेत.जर F आणि C यांनी जागा आपापसात बदलल्या तर C आणि A यांच्यामध्ये कोण असेल?

1)  B

2) E

3) F

4) D

उत्तर :  पर्याय 4



            E            C


    B                            A


            F            D


✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️ 


2) महेशचे वय राहुलच्या वयाच्या निमपट आहे.5 वर्षांनंतर राहुलचे वय त्याच्या वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल.त्याच्या वडिलांचे आजचे व य 55 वर्षे असेल तर महेशचे  आजचे वय किती असेल?

1)45

2)30

3)25

4)15

ऊत्तर : D


स्पष्टीकरण


समजा राहुलचे वय =x 

पाच वर्षानंतर राहुलचे वय =x+5


वडिलांचे आजचे वय =55

पाच वर्षांनंतर वडिलांचे वय =60


दिलेल्या माहितीवरून 

x + 5= 60-25

 x= 30

महेशचे वय  = राहुलच्या निमपट   

महेशचे वय = 30/2

                =15



3) TRANSFER , RTRANSF, FRTRAN , NFRTR ____ ?

1) RNFR

2) RFRT 

3) RNFRT

4) FRTNR


उत्तर : पर्याय 1


स्पष्टीकरण 👇👇👇

क्रमाने प्रत्येक पुढील पदात शेवटचे अक्षर प्रथम ठेवले आहे व यानुसार पदात येणारे शेवटचे अक्षर कमी केले आहे 

T R A N S F R  =  R T R A N S F 


*4)   एका सांकेतिक भाषेत जर CLUSTER   म्हणजे xOfHgVi तर CHERRY म्हणजे काय असेल?*

1) xSuIia

2) XsVIiB

3)xSvIiB

4)xSViIA

उत्तर: पर्याय 3✅✅✅


स्पष्टीकरण 👇👇👇👇

A B C D E F G H I J K L M 

Z Y X W V U T S R Q P O N 

C H E R R Y

   👇

x S v   I  i   B 



5) जर EARTH चा संकेत 30 782 असेल ALPHA चा  संकेत 06520 व END चा संकेत 314 असेल तर PATENT चा संकेत काय असेल?

1) 508378

2) 503881 

3) 503871

4) 508318


 उत्तर : पर्याय 4✅✅✅

स्पष्टीकरण 👇👇

 जर 

E =3 ,A = 0  ,R = 7 ,T = 8, H = 2 ,D =4

E=3,  N =1 , D =4

P A T E N T 

5   0  8 3 1 8

🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮

6). खाली दिलेल्या संकेतांचा अभ्यास करा .त्यावरून शब्दाचे सांकेतिक रुप पर्यायातून निवडा.

A      B.     C      D.     E 

●.      ∆.    ®.   #.    *


TABLE = ?


1)∆#*∆●

*2)*●∆∆*✅✅✅

3)●##∆*

4)®●∆®*


7) एका सांकेतिक भाषेत RACER ही अक्षरे S(1) D(2)S अशी लिहली तर त्याच सांकेतिक भाषेत NUMBER  हा शब्द कसा लिहाल?

1) 4 5 N C 2 S

2) O V N C (2) S

3) O 5 N C 2 S

4) O V N C F S


उत्तर : पर्याय 3✅✅


स्पष्टीकरण👇👇


          स्वर :           A     ,E,     I,    O ,  U 

स्वरांचा क्रम :          1       2     3     4    5 

Alphabets मध्ये क्रम : 1,5, 9, 15 ,21

R - S

A - (1)

C - D

E - (2)

R - S

👇👇👇👇👇

N - O

U - 5

M - N

B - C 

E - 2

R -S




8)   आगगाडीला विमान म्हंटले,विमानाला जहाज म्हंटले ,जहाजाला समुद्र म्हंटले,समुद्राला रस्ता म्हंटले ,रस्त्याला सायकल म्हंटले , तर जहाज कोठे हाकारली जातील?

1) रस्ता ✅✅✅✅

2) समुद्र 

3) सायकल

4) विमान


9)खालील प्रश्नमालीका पहा . प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?


3, 10, 29, 66  ?


1)125

2) 126

3) 127✅✅✅

4)136


स्पष्टीकरण 👇👇👇👇


1घन +2 = 01+2=3 

2घन +2=8+2=10

3घन+2=27+2=29

4घन+2=64+2=66

5घन+2=125+2=27


10) एक जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार  असेल ?


1) सोमवार

2) मंगळवार✅✅✅

3) बुधवार 

4) गुरुवार


स्पष्टीकरण 👇👇👇


सहा वर्षाचे सहा दिवस व लीप वर्षाचा एक दिवस आशा सात दिवसानी तो वार पार पुढे जाईल


1जानेवारी 2002     मंगळवार

1जानेवारी 2003     बुधवार

1जानेवारी 2004     गुरुवार 

                                         लीप वर्ष

1जानेवारी 2005     शनिवार

1जानेवारी 2006     रविवार

1जानेवारी 2007     सोमवार

1जानेवारी 2008     मंगळवार



एक करडीत 5 फुले आहेत.त्यात 23 सोडून सर्व लाल ,25 सोडून सर्व पांढरी ,22 सोडून सर्व पिवळी ,18 सोडून सर्व निळी तर 20 सोडून सर्व गुलाबी फुले आहेत .तर त्या करडीत एकूण किती फुले आहेत?


उत्तर

23+25+22+18+20=108

108 ÷4=27


नगरपरिषद

🔹नगरपरिषदेचे स्वरूप 


* महाराष्ट्रात नागरपरिषदांची संख्या २२१ एवढी आहे. महाराष्ट्र शासनाच्या कायद्याने नगरपरिषदासाठी एकच कायदा आहे.

* या कायद्याप्रमाणे किमान २५ हजार लोकसंख्या असलेले क्षेत्र हे नागरी क्षेत्र म्हणून जाहीर केले जाते.

* लोकसंख्येनुसार नागरी क्षेत्राचे तीन वर्ग केले जातात. एक लाखाहून अधिक लोकसंख्या - अ वर्ग, चाळीस हजाराहून जास्त पण एक लाखाहून कमी लोकसंख्या - ब वर्ग, चाळीस हजार किंवा त्याहून कमी लोकसंख्या क वर्ग नगरपरिषद असे आहे.

* जर प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणे व धार्मिक स्थळे असतील पण रहिवाशाची संख्या कमी असेल तर त्या ठिकाणी पर्यटक संख्या जास्त येत असेल तर त्या ठिकाणी लोकसंख्येची अट न लावता नगरपरिषद स्थापन केलेल्या आहेत. जसे महाबळेश्वर माथेरान, पन्हाळा, पाचगणी, चिखलदरा या ठिकाणी नगरपरिषदा आहेत.


📚नगरपरिषदेची रचना 

* शहरातील लोकसंख्येनुसार नगरपरिषदेच्या सभासदांची संख्या ठरविण्यात आलेली आहे. जसे अ वर्ग नगरपरिषद कमीतकमी ३८ व जास्तीतजास्त ६५ सभासद असते. ब वर्ग नगरपरिषदेत २३ ते ३७ सभासद, क वर्ग नगरपरिषदेत १७ ते २३ सभासद असतात.

* नगरपरिषदेच्या सदस्यांची निवड शहरातील लोकांकडून प्रौढ मताधिकार पद्धतीने केली जाते. इमावसाठी २७% जागा राखीव, तर अनुसूची जाती व जमाती त्यांच्या लोकांवर सभासदसंख्या अवलंबून असते.

* नगरपरिषदेचा कार्यकाळ ५ वर्षाचा असतो. राज्यशासनाला नगरपरिषद बरखास्त करण्याचा अधिकार आहे.


📚नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष 

* नगरपरिषदेतील निर्वाचित सदस्य आपल्यातून एकाची अध्यक्षपदी निवड करतात ही निवड साध्या बहुमताने होते.

* ठरलेल्या आरक्षणानुसार त्यांची निवड केली जाते. नगराध्यक्षांचा कार्यकाळ ५ वर्षाचा असतो. सदस्यांमधून उपनगराध्यक्षाची निवड होते.

* उपनगराध्यक्षाला बरखास्त करण्यासाठी २/३ बहुमताने ठराव मंजूर करून घ्यावा लागतो आणि त्याची निवड झाल्यापासून ६ महिन्यापर्यंत असा ठराव मांडता येत नाही.

* नगरपरिषद बरखास्त करण्याचा अधिकार राज्यशासनास आहे जर गैरवर्तन व भ्रष्टाचार यासारख्या गोष्टी आढळून आल्यास अशी कारवाई केली जाते.


🔹समित्या 

* नगरपरिषदेची स्थायी समिती आणि सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा व जलनिस्साणारन, नियोजन व विकास या विषयासाठी पाच समित्या असतात.

* प्रत्येक समिती आपल्या विषयाचा कार्यक्रम तयार करणे व त्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवते.

* स्थायी समिती ही सर्व समितीच्या कार्यात महत्वाचे कार्य करते. नगराध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो.

* विषय समित्या आणि स्थायी समित्या हे जे निर्णय घेतात त्याला नगरपरिषदेच्या सभेची मान्यता लागते.


📚मख्य अधिकारी

* मुख्य अधिकारी हा नगर परिषदेचा मुख्य प्रशासक असतो. त्याची नेमणूक राज्य शासनामार्फत होते. नगरपरिषदेचा अर्थसंकल्प तो तयार करतो. तसेच हिशेब व दफ्तार ठेवतो.


📚नगरपरिषदेची कार्ये, उत्पन्नाची साधने, नियंत्रण 

* नगरपरिषदेच्या कार्याची विभागणी आवश्यक कार्ये आणि ऐच्छिक कार्ये अशी केलेली असते. आवश्यक कार्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, रस्ते, पूल यांचे बांधकाम, सांडपाणी व कचरा यांची विल्हेवाट, पशुवैद्यक केंद्रे, प्रसाधनगृहे, शौचायल अशा विविध कामांचा समावेश होतो.

* उत्पन्नाच्या साधनांच्या बाबतीत कर, इमारती व जमिनीवरील कर, घरपट्टी, पाणीपट्टी, व्यवसाय कर, नाट्यगृहे, चित्रपट गृहे, जाहिरात कर, यात्रा कर, इत्यादी नगरपरिषदेची उत्पन्नाची साधने आहेत.

* नागरी स्थानिक संस्थांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा प्रत्येक घटकराज्यात आहे व महाराष्ट्रात राज्यशासनास, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नागरी संस्थावर आलेले आहे.


भारतीय अर्थव्यवस्था :दारिद्र्य

अर्थ :

⚫️ जीवनाच्या किमान मूलभूत गरजा ( अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य इ.)  भागविता न येण्याची परिस्थिती म्हणजे दारिद्र्य होय . जेव्हा समाजाचा एक मोठा गट जीवनाच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी अपयशी ठरतो , तेव्हा अशा स्थितीला  ' जन दारिद्र्य ' असे म्हणतात . अशा वेळी दारिद्र्य ही एक सामाजिक समस्या बनते.

⚫️ दारिद्र्याची संकल्पना एक सापेक्ष संकल्पना आहे , ज्यामध्ये दारिद्र्याची कल्पना चांगल्या जीवन स्तराच्या  ऐवजी निम्न जीवन स्तराच्या  आधारावर करण्यात येते.  भारतातही दारिद्र्याच्या व्याख्येच्या आधार उच्च जीवन ऐवजी  निम्न जीवन स्तरच मानण्यात येतो

दारिद्रय निर्मूलनासाठी धोरणे व कार्यक्रम (Policies and programmers towards poverty alleviation) :

भारताच्या घटनेत तसेच पंचवार्षिक योजनांमध्ये सामाजिक न्याय हे सरकारच्या विकास धोरणांचे प्राथमिक उद्दीष्टय असल्याचे सांगण्यात आले आहे.
बहुतेक सर्व धोरणांमध्ये दारिद्रय निर्मूलनावर भर देण्यात आलेला आहे व त्या अनुषंगाने सरकारने विविध डावपेचांचा स्विकार करण्यात आलेला आहे.
दारिद्रय निर्मूलनासाठी सरकारने त्री-आयामी दृष्टीकोनाचा स्विकार केला आहे.

अ) वृद्धीधारीत दृष्टिकोन,

ब) दारिद्रय निर्मूलन कार्यक्रम, आणि

क) किमान मूलभूत सुविधांची तरतूद.

अ) वृद्धीधारित दृष्टिकोन (Growth-oriented Approach) –

हा दृष्टिकोन अशा अपेक्षेवर आधारलेला आहे की, आर्थिक वृद्धीचे परिणाम (जिडीपी व दर डोई जीडीपीतील वेगवान वृद्धी) समाजाच्या सर्व गटांपर्यंत पसरतील, तसेच गरीब जनतेपर्यंत झिरपत जातील.
1950 च्या दशकात व 1960 कया दहकाच्या सुरुवातीपर्यंत नियोजनाचा मुख्य भर याच दृष्टीकोनावर आधारित होता. त्यामागे असा विचार होता की, निवडक प्रदेशांमध्ये वेगवान औधौगिक विकास आणि हरित क्रांतीच्या माधमातून कृषि विकास घडवून आणल्यास न्यून-विकसित प्रदेशांना तसेच समाजातील मागास आणल्यास गटांना त्याचा फायदा प्राप्त होईल.
मात्र, एकंदरीत वृद्धी आणि कृषि व उधोग क्षेत्रातील वृद्धी अपेक्षित वेगाने होऊ शकली नाही. दुसर्‍या बाजूला, लोकसंख्येच्या विस्फोटामुळे दर डोई उत्पन्नातील वाढ अत्यल्प ठरली. हरित क्रांतीमुळे प्रादेशिक तसेच वैयक्तिक विषमतेत भरच पडली. भू-सुधारणा यशस्वी होऊ शकल्या नाही. त्यामुळे आर्थिक वृद्धीचे फायदे गरीब जनतेपर्यंत झिरपून पोहचले नाहीत.

ब) दारिद्रय निर्मूलन कार्यक्रम (Poverty Alleviation Programmers PAPs) –

वृद्धीधारीत दृष्टीकोनाला पर्याय म्हणून धोरण निर्मात्यांनी दारिद्र्यावर प्रत्यक्ष हल्ला करण्यासाठी दारिद्रय निर्मुलन कार्यक्रमांच्या राबवणुकीचार भर देण्यास सुरुवात केली. सामाजिक मालमत्ता निर्माण करण्याच्या प्रक्रियेदरम्यान कामाची निर्मिती करून गरीब जनतेसाठी उत्पन्नसृजक रोजगार निर्माण करता येईल, हा मागील विचार होता.
या दृष्टीकोनाचा अवलंब अल्प प्रमाणात तिसर्याच योजनेदरम्यान करण्यात आला, व त्यानंतर टप्प्याटप्याने त्याचा विस्तार करण्यात आला. अशा दारिद्रय निर्मुलन कार्यक्रमांचे तीन प्रकार पडतात-
स्वयंरोजगाराचे कार्यक्रम: उदा. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना.
मजुरी रोजगार कार्यक्रम: उदा. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना.
स्वयंरोजगार व मजुरी रोजगारांचे एकत्रीकरण असलेल्या योजना: उदा. स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना.

क) किमान मूलभूत सुविधांची तरतूद (Provision of minimum basic amenities) –

या दृष्टिकोनात जनतेला किमान मूलभूत सुविधा उपलब्ध करून देऊन दरिद्रयाचा प्रश्न हाताळण्याचा समावेश होतो.

सामाजिक उपभोगाच्या गरजांवर (उदा. अनुदानित दराने अन्नधान्य पुरवठा, शिक्षण व आरोग्य सोयी, पाणी पुरवठा व स्वच्छता इ.) सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून जनतेचे राहणीमान उंचवता येऊ शकते, या कल्पनेचा भारत हा जगात अग्रेसर देश असल्याचे मानले जाते.

या दृष्टीकोना अंतर्गत कार्यक्रमांच्या आधारे रोजगार निर्मिती करणे, गरिबांच्या उपभोगात भर घालणे व शिक्षण-आरोग्यात सुधारणा होणे, या बाबी अपेक्षित आहेत.

गरिबांच्या अन्न व पोषणाचा दर्जा सुधारण्यासाठी पुढील तीन प्रमुख कार्यक्रम राबविले जात आहेत.
सार्वजनिक वितरण व्यवस्था
एकात्मिक बाल विकास योजना
राष्ट्रीय मध्यान्न आहार योजना
वरील उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी राबविण्यात येणार्यान योजनांमध्ये पुढील योजनांचा समावेश होतो-

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना
प्रधानमंत्री ग्रामोदय योजना
भारत निर्माण योजना
इंदिरा आवास योजना
ग्रामीण गरीबांना शहरी सेवांचा पुरवठा (PURA)

तसेच, सरकारने काही विशिष्ट गटांना मदत करण्यासाठी विशेष सामाजिक सुरक्षेच्या योजना सुरू केल्या आहेत.
उदा. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम (NSAP), ज्यांतर्गत ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजना’ चालविली जाते.

राज्यसेवा पूर्व साठी शेवटच्या आठवड्यात strategy काय असावी-



सर्वप्रथम तुमचा आधीपासून महिन्याभरापासून ज्या planning ने अभ्यास चालू आहे त्याच नियोजनाद्वारे अभ्यास चालू ठेवा, शेवटच्या आठवडा आहे म्हणून सगळे विषय पुन्हा करण्याचं असाध्य नियोजन करू नका. 


✳️ CSAT बद्दल:-


CSAT चा दिवसाला एक Question पेपर time लावून solve करून त्याचे analysis करा.(वेळ दुपारी ३ ते ५ च असू द्या)

शक्यतो आयोगाच्या पूर्वीच्या Question पेपरवरच भर द्या.

गणिते सोडविण्यासाठी गेल्या दोन वर्षांच्या  गट-ब पूर्व व मुख्य परीक्षेच्या पेपरचा सुद्धा वापर करा.

गणिताचे फॉर्म्युले, logics एका पेजवर separately काढून ठेवा आणि त्यांची वेळोवेळी उजळणी करा. 


✳️ GS बद्दल:-


संपूर्ण GS पुन्हा आठवडाभरात संपवण्याच्या  मागे लागू नका, त्याऐवजी स्वतः चा अभ्यास check करायचा असेल तर PYQ सोडवा.

असे topics जे की फक्त पुर्वलाच आहेत आणि तुमचे वाचायचे राहिले आहेत तर ते वाचून काढा जसे की :- Ancient history, World geography.

रात्री जेवल्यानंतर एक तास रिलॅक्सेशन म्हणून current affairs वाचा.

पेपरच्या आदिच्या दिवशी काय वाचायचे आहे त्याची एक यादी तयार करा:-

जसे की:-

1. CSAT फॉर्म्युले व logics.

2. तयार केलेल charts:-Constitutional non constitutional bodies.

3. जनगणना च्या notes.

4. Constitution चे महत्त्वाचे  articles.

5. World geography Maps.



✳️ काही महत्वाच्य‍ा गोष्टी:-

नवीन काही वाचू नका, जे काही आधी वाचले आहे तेच वाचा.

Daily अभ्यास 9 ते 10 तास खूप झाला, परीक्षा आली आहे म्हणून खूप अवाजवी असा अभ्यास करायला जावू नका कारण लक्षात ठेवा ही परीक्षा फक्त अभ्यासाचीच नाही तर तुमच्या संयमाची व आत्मविश्वासाची पण आहे.

स्वतःचे झोपण्याचे खाण्या-पिण्याचे एक चांगले routine असू द्या.

रात्री जागणे, दिवसा झोपणे, बाहेरचे खाणे या गोष्टी टाळाच.

Group discussion पेक्षा Self study वर च भर द्या.

स्वतःच्या अभ्यासाची हुशारीची इतरांबरोबर तुलना करू नका.

अनावश्यक व दडपण आणणार्‍या गोष्टींची चर्चा टाळा व अशा लोकांपासून पण दूर राहा जसे की पेपर कसा असेल, पेपरच्या आधीच cut off किती असेल, जागा वाढतील का वगैरे वगैरे..



येणाऱ्या राज्यसेवा पूर्व साठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा.💐


संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नसंच

Q.1..... बँक राष्ट्रीयीकरण दिवस म्हणून ओळखला जातो.

1 १९ जुलै √√√√

2 ३१ आॅक्टोबर

3  २३ एप्रिल

4 १ व ३


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.2 NRHM ची सुरुवात .......या वर्षी करण्यात आली.

1  २००७

2  २००४

3  २००५√√√√√√

4  २०१३


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.3  भारतातील बेकारीसाठी खालीलपैकी कोणते कारण महत्त्वाचे नाही 

1  कामगारांची वाढती संख्या

2  अयोग्य तंत्रज्ञान 

3  प्रभावी मागणीची      

कमतरता 

4  कामगारांसाठी संरक्षित कायदा√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.4...... मध्ये सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न गणना करण्यात आली?

1  १९४८-४९

2  १९३१-३२√√√√

3  १९११-१२

4  १८६७-६८


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.5  खालीलपैकी कोणती घटना पंचवार्षिक योजना चालु असताना घडली नाही?

1   चलन निश्चलीकरन 

2   रुपयाचे अवमूल्यन√√√√

3   १ व २  दोन्ही घडले 

4  १ व २ दोन्ही घडले नाही


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.6  रिझर्व्ह बँकेच्या पत नियंत्रणाचे दैनंदीन वापराचे साधन कोणते?

1   बँकदर

2  रोख राखीव प्रमाण

3  वैधानिक रोखता प्रमाण

4  रेपो आणि रेव्हर्स रेपो व्यवहार√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.7  खाद्याबाबतच्या आवडी व अग्रक्रम स्थिर असताना उत्पन्न वाढत असताना अन्नावरील प्रत्यक्ष खर्च जरी वाढत असला तरी उत्पन्नापैकी अन्नावर केलेल्या खर्चाचे प्रमाण कमी होते हे सांगणारा नियम म्हणजे......... होय.

1  "से" चा बाजार विषयक नियम

2  उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम

3  एंजल चा नियम√√√√√

4  फिलिप्स वक्ररेषा


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.8  १८६७ मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न.... तर दरडोई उत्पन्न..... इतके होते.

1  २० कोटी व ३४० रुपये वार्षिक

2  २४० कोटी व २० रुपये वार्षिक

3  ३४० कोटी व २० रुपये वार्षिक √√√√√√

4  ३४० कोटी वार्षिक व २०  रुपये मासिक


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.9 पहिल्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी....... मध्ये वाढ झाली नाही?

1  अन्नधान्य उत्पादन

2  राष्ट्रीय उत्पन्न 

3  दरडोई उत्पन्न

4  किमतीचा निर्देशांक√√√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.10  भारत निर्माण योजनेमध्ये पुढील पैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही?

अ. ग्रामीण शिक्षण

ब. ग्रामीण आरोग्य

क. ग्रामीण पाणीपुरवठा

ड. ग्रामीण रस्ते

1   अ आणि ब  √√√√√

2   ब आणि क

3   क आणि ड

4  अ आणि ड


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.11  खालीलपैकी कोणते घटक १९६६-१९६९ दरम्यान भारतातील नियोजन खंडित होण्यास कारणीभूत होते? 

1  चीन -भारत युध्द

2  भारत पाकिस्तान संघर्ष 

3  आर्थिक मंदी

4  राजकीय अस्थिरता √√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.12  तीव्र मंदी दूर करण्यासाठी सरकारने मुद्दाम घडवून आणलेली तेजीची/ चलन वाढची परिस्थिती म्हणजे ....... होय.

1  मुद्रा अवपात

2  मुद्रा संस्फीती√√√√√

3  स्टगफ्लेशन

4  स्टगनेशन


📖📖📖📖📖📖📖📖📖


[Q.13  भारत सर्वाधिक निर्यात कोणत्या राष्ट्राला करतो?

1  यु एस ए √√√√√√  

2  यु के  

3  चीन   

4  सिंगापूर


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.14 १९६९ च्या १४ बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला खालीलपैकी कोणाचा विरोध होता?

अ इंदिरा गांधी 

ब  मोरारजी देसाई

क जयप्रकाश नारायण

ड  रिझर्व्ह बँक 

1  अ आणि क 

2  ब आणि  ड√√√√√√

3  ब आणि  क

4  क आणि ड


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.15  तिसऱ्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी...... मध्ये घट झाली नाही.

1  अन्नधान्य उत्पादन

2  राष्ट्रीय उत्पन्न

3  परकीय चलन साठा

4  किमतीचा निर्देशांक√√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.16  भारतात मध्यवर्ती   बँकेची शिफारस कोणी केली नव्हती? 

1   हिल्टन यंग आयोग

2   चेंबर्लिन आयोग

3   फौलर समिती

4   मॅकलेगन समित✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.17  ........ ही कंपनी 'मोती' या नावाने युरिया उत्पादन करते.

1  राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर ली.

2  मद्रास फर्टिलायझर ली.

3  हिंदुस्थान फर्टिलायझर ली.√√√√√√√

4  वरील सर्व


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.18 राष्ट्रसभेकडून कोणत्या वर्षी राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली होती?

1  १९४६

2  १९३८√√√√√

3  १९२९

4  १९२५


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.19 सरकारच्या तुटीच्या अर्थभरणाचा खालीलपैकी कोणता स्रोत नाही?

1  रिझर्व्ह बँकेकडून व व्यापारी बँकेकडून कर्ज घेणे

2  नवीन चलन निर्मिती

3  स्वतःच्या रोख रकमेतून पैसे काढणे

4  जमा झालेले महसूल√√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.20 प्रत्येक कार्यक्रमाचे ज्यामध्ये मूल्यमापन केले जाते ते..... अंदाजपत्रक होय.

1  रोख

2  बहुआयामी

3  शून्याधारीत√√√√√

4  यापैकी नाही


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.21 सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिध्दांत कोणी मांडला?

1 प्रो पिकॉक व प्रो वाईजमन√√√√√√

2 प्रो पिगु

3 डॉ मार्शल

4 वरील पैकी नाही


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.22 अप्रत्यक्ष करांचा समाजावर... परिणाम होत?

1  पुरोगामी

2  न्याय्य 

3  प्रतिगामी√√√√√√

4  प्रमाणशीर


📖📖📖📖📖📖📖📖



◾️कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत भारताची राजधानी कोलकाता येथून दिल्ली येते नेण्यात आली ?


A. लॉर्ड डलहौसी

B. लॉर्ड रिपन

C. लॉर्ड कर्झन

D. लॉर्ड हार्डिंग II ☑️



◾️रपया नावाचे नाणे भारतात प्रथम जारी करणारे कोण होते?


A. अकबर

B. अलेक्झांडर लोदी

C. शेरशाह सुरी ☑️

D. बल्बन


◾️मट्टूर धरण - कोणत्या नदीवर बांधले आहे?


A. कृष्णा

B.कावेरी☑️

C. नर्मदा

D. तुंगभद्रा



◾️राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना कधी केली?


A. 1815

B. 1812

C. 1828 ☑️

D. 1830



 ◾️नॉर्वे ची राजधानी कोठे आहे?


A. ओस्लो ☑️

B. पेरिस

C. वॉर्न

D. लिस्बन.


1. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोझरी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

1) अकोला

2) अमरावती

3) बुलढाणा

4) औरंगाबाद



2. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते ?

1) वेबनाड (केरळ)

2) पुलीकत (आंध्रप्रदेश)

9) चिल्का (ओरिसा)

4) लोणार (महाराष्ट्र)



3. जगातील लोकसंख्येत भारताचा क्रमांक कितवा आहे ?

1) प्रथम

2) द्वितीय

3) तृतीय

4) चतुर्थ



4. जर्मनी या देशाची राजधानी कोणाती आहे ?

1) बर्लीन

2) वॉन

3) ओस्लो

4) टोकियो



5. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?

1) अमेझॉन

2) नाईल

3) मिसिसीपी

4) सिंधू



6. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?

1) सिंह

2) वाघ

3) हती

4) चित्ता



7. ‘पोंगल’ हा सण कोणत्या राज्यात उत्साहाने साजरा केला जातो ?

1) आंध्रप्रदेश

2) तामिळनाडू

3) केरळ

4) गोवा



8. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते ?

1) सिक्कीम

2) गोवा

3) केरळ

4) पंजाब



9. अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली ?

1) लोकमान्य टिळक

2) नाना पाटील

3) वासूदेव बळवंत फडके

4) विनायक दामोदर सावरकर



10. सर्वोच्च न्यायलयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात ?

1) 58 व्या वर्षापर्यंत

2) 60 व्या वर्षापर्यंत

3) 62 व्या वर्षापर्यंत

4) 65 व्या वर्षापर्यंत



11. राज्यघटनेमधील कोणते कलम घटनादुरुस्तीशी संबंधीत आहे ?

1) कलम 368

2) कलम 370

3) कलम 371

4) कलम 343



12. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली ?

1) 1 मे 1960

2) 1 मे 1961

3) 1 मे 1962

4) 1 मे 1956



13. जिल्हा परिषदेचा प्रमुख अधिकारी कोण असतो ?

1) जिल्हाधिकारी

2) मुख्य कार्यकारी अधिकारी

३) जिल्हा परिषद अध्यक्ष

4) जिल्हा पोलीस निरिक्षक



14. पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतो ?

1) राज्यशासन

2) जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी

3) जिल्हा पोलीस अधिक्षक व पोलीस उपअधिक्षक

4) मुख्य कार्यकारी अधिकारी वा उपमुख्य कार्यकारी अधिकारी



15. जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे ?

1) न्युर्याक

2) लंडन

3) वॉशिंग्टन

4) टोकियो



16. ‘पॉवर्टी ॲण्ड अनब्रिटीश रूल इन इंडिया’ हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहीला ?

1) मनमोहन सिंग

2) दादाभाई नौरोजी

3) बाबासाहेब आंबेडकर

4) राजाराममोहन राय



17. खालीलपैकी कोणते जीवनसत्व निकोप दृष्टीसाठी आवश्यक आहे ?

1) अ जीवनसत्व

2) ब जीवनसत्व

3) क जीवनसत्व

4) ड जीवनसत्वं



18. मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो ?

1) अ जीवनसत्व

2) ब जीवनसत्व

3) क जीवनसत्व

4) ड जीवनसत्व



19. सर्वयोग्य दाता कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस म्हणतात ?

1) A+

2) B+

3) C+

4) 0+



20. डॉट्स (DOTS) ही उपचारपद्धत कोणत्या रोगासाठी वापरतात ?

1) कुष्ठरोग

2) क्षयरोग

3) पोलिओ

4) कर्करोग



21. उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर लोपार कोणत्या जिल्ह्यात आहे ?

1) अकोला

2) बुलडाणा

3) यवतमाळ



22. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते ?

1) गुरुशिखर

2) माऊंट एव्हरेस्ट

3) कळसुबाई

4) धुपगड



23. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण अंबोली हे कोणत्या जिल्हयात आहे ?

1) रत्नागिनी

2) रायगड

4) सिंधुदुर्ग



24. सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिले आहेत ?

1) 35

2) 36

3) 34

4) 37



25) गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे ?

1) त्र्यंबकेश्वर

2) महाबळेश्वर

3) अमरकंटक

4) भीमाशंकर



26. भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे ?

1) दारणा

2) प्रवरा

3) वैतरणा

4) भोगावती



27. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

1) सिंधुदुर्ग

2) रायगड

3) सातारा

4) नागपूर



28. नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे ?

1) हरिण

2) काळवीट

3) वाघ

4) मोर



29. महाराष्ट्रात संरक्षण साहित्य बनविण्याचा कारखाना कोठे आहे ?

अ.ओझर (नाशिक) ब. खडकी (पुणे)

क. रसायणी-पनवेल (रायगड) ड. अंबाझरी (नागपूर)

1) फक्त अ ठिकाणी

2) फक्त व ठिकाणी

3) अ, ब, क ठिकाणी

4) अ, ब, ड ठिकाणी



30. मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे ?

1) नांदेड

2) औरंगाबाद

3) परभणी

4) लातूर



31. H1N1 हा विषाणू कोणत्या रोगाशी संबंधित आहे ?

1) एड्स

२) सार्स

3) स्वाईन फ्ल्यू

4) हिवताप



32. विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला ?

1) आईन्स्टाईन

2) एडिसन

3) ग्राहम बेल

4) अलेक्झांडर बेल



33. ऑर्निर्थालॉजी शास्त्र कशासी संबधीत आहे ?

1) जीवाणूंचा अभ्यास

2) पक्षी अभ्यास

3) फुलांचा अभ्यास

4) हाडांचा अभ्यास



34. CH4 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूची आहे ?

1) मिथेन

2) इथेन

3) ब्युटेन

4) प्रोपेन



35. ‘काविळ’ हा रोग कोणत्या मानवी अवयवांशी संबंधीत आहे ?

1) जठर

2) यकृत

3) आतडे

4) फुफ्फुस



36. मीठाचे रासायनिक नाव काय आहे ?

1) सिल्व्हर ब्रोमाईड

2) सोडीयम क्लोराईड

3) कॅल्शीशम सल्फाईड

4) पोटॅशियम नायट्रेट



37. प्रकाश वर्ष के कशाचे एकक आहे ?

1) प्रकाशाची तीव्रता

2) अंतर

3) ध्वनी तीव्रता

4) उष्णता



38. भारताच्या नौदल प्रमुखास काय संबोधतात ?

1) जनरल

2) अॅडमिरल

3) चीफ मार्शल

4) ब्रिगेडीयर



39) कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाणारे कवी कोण ?

1) कृष्ण केशव दामले

2)राम गणेश गडकरी

3) वि.वा.शिरवाडकर

4) प्रल्हाद केशव अत्रे



40) नेमबाजी खेळाशी संबंधित नसलेला खेळाडू कोणता ?

1) अंजली वेदपाठक

2) अपर्णा पोपट

3) जसपाल राणा

4) अभिनव बिंद्रा



41. सचिन तेंडूलकरने दत्तक घेतलेले डोणजा हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे ?

1) बीड

2) परभणी

3) उस्मानाबाद

4) औरंगाबाद



42. 1857 च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले ?

1) तात्या टोपे

2) झाशीची राणी लक्ष्मीबाई

3) नानासाहेब पेशवे

4) कुवरसिंह



43. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण ?

1) इंग्रज

2) डच

3) पोर्तुगीज

4) फ्रेंच



44. आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात ?

1) महात्मा फुले

2) न्यायमुर्ती रानडे

3) दादोबा तर्खंडकर

4) राजा राममोहन राय



45. अमृतानुभव या ग्रंथाची रचना कोणी केली ?

1) संत तुकाराम

2) संत ज्ञानेश्वर

3) संत एकनाथ

4) संत नामदेव



46. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ?

1) अण्णाभाऊ साठे

2) विनोबा भावे

3) कर्मवीर भाऊराव पाटील

4) क्रांतिसिंह नाना पाटील



47. उज्वला योजना ही भारत सरकारची योजना कशाशी संबंधित आहे ?

1) LED दिवे

2) गोबर गॅस

3) LPG गॅस

4) गरोदर माता



48. महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ?

1) प्रविण दिक्षित

2) राकेश मारिया

3) सतिश माथूर

4) यापैकी नाही



49. स्वच्छ भारत अभियानाची सदिच्छा दूत म्हणून कोणत्या नायिकेची निवड करण्यात आली आहे ?

1) विद्या बालन

2) प्रियंका चोप्रा

3) दिपिका पदुकोन

4) अनुष्का शर्मा



50) महाराष्ट्राचे सध्याचे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ?

1) मुकुल रोहतगी

2) नसिम झैदी

3) नीला सत्यनारायण

4) जे.एस. सहारिया



1) पद्मश्री

51. भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कॉम्प्युटर तयार केला ?

1) इनॅक

2) परम

3) आ.बी.एम.

4) डेल



52. अँड्रॉईड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम ही खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित आहे ?

1) मायक्रोसॉफ्ट

2) गुगल

3) अॅपल

4) यापैकी नाही



53. श्री. शरद पवार यांना नुकतेच कोणत्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?

1) पद्मश्री

2) पद्मविभूषण

3) पद्मभूषण

4) भारतरत्न



54. रिओ ऑलिम्पिक 2016 च्या स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक कोणी जिंकले ?

1) पी.व्ही.सिंधू

2) दिपा मलिक

3) साक्षी मलिक

4) सायना नेहवाल



55. सन 2016 -17 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेचा विजेता संघ कोणता ?

1) मुंबई

2) कर्नाटक

3) राजस्थान

4) गुजरात



56. रिझर्व बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत ?

1) रघुराम राजन

2) उर्जित पटेल

3) बी.सुब्बाराम

4) यापैकी नाही



57. नवीन 2000 रुपयांच्या नोटेच्या मागच्या बाजूस कशाचे चिन्ह आहे ?

1) महात्मा गांधी

2) मंगळयान

3) चंद्रयान

4) यापैकी नाही



58. डिजीटल व्यवहारांना चालना देण्यासाठी भारत सरकारने कोणते अॅप सुरु केले ?

1) पे-टीएम

2) पैसा

3) मोबीक्युक

4) भीम



59.14 वे प्रवासी भारतीय दिवस संमेलन कोठे आयोजित करण्याम आले होते ?

1) नवी दिल्ली

2) नोएडा

3) अहमदाबाद

4) बेंगलोर



60) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक कोणत्या गडावर झाला ?

1) शिवनेरी

2) रायगड

3) राजगड

4) सिंहगड



उत्तरे 

1 – 2, 2 – 3, 3 – 2, 4 – 1, 5 – 2, 6 – 2, 7 – 2,

8 – 2, 9 – 4, 10 – 4, 11 – 1, 12 – 1, 13 – 2,

14 – 2, 15 – 3, 16 – 2, 17 – 1, 18 – 4, 19 – 4,

20 – 2, 21 – 2, 22 – 3, 23 – 4, 24 – 2, 25 – 1,

26 – 2, 27 – 2, 28 – 4, 29 – 4, 30 – 3, 31 – 3,

32 – 2, 33 – 2, 34 – 1, 35 – 2, 36 – 2, 37 – 2,

38 – 2, 39 – 3, 40 – 2, 41 – 3, 42 – 3, 43 – 3,

44 – 4, 45 – 2, 46 – 3, 47 – 3, 48 – 3, 49 – 4,

50 – 4, 51 – 2, 52 – 2, 53 – 2, 54 – 3, 55 – 4,

56 – 2, 57 – 2, 58 – 4, 59 – 4, 60 – 2.

राज्यसेवा पुर्व साठी अर्थव्यवस्था या विषयाची तयारी कशी करावी?

 ✳️ राज्यसेवा Prelims मध्ये अर्थव्यवस्था या विषयावर 15 प्रश्न विचारले जातात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे Syllabus मध्ये Mention केलेल्या घटकावरतीच ते प्रश्न विचारले जातात.


 थोडक्यात Economy मध्ये Predictability आहे. MPSC ने अर्थव्यवस्थेच्या Syllabus मध्ये 5 मुख्य घटक दिलेले आहेत.


1. लोकसंख्या

2.दारिद्र व बेरोजगारी

3. शाश्वत विकास

4. समावेशन

5. सामाजिक क्षेत्र सुधारणा

6.नियोजन व जमीनसुधारणा ( Syllbus मध्ये Mention नाही पण प्रश्न येतो.


यातील पहिल्या 3 घटकांची आपण आज सविस्तर चर्चा करू.


♦️1. Demography म्हणजेच लोकसंख्या -


या घटकवरती 1-2 प्रश्न हमखास विचारले जातात.


यामध्ये आपल्याला लोकसंख्येचा

 संख्यात्मक( लिंग गुणोत्तर, साक्षरता दर, घनता इ) आणि गुनात्मक( माता मृत्युंदर, बालक, शिशु मृत्यूदर इ). अनुषंगाने अभ्यास करावा लागतो.                 

  लोकसंख्या संक्रमणाच्या अवस्था चांगल्या करून ठेवा.

भारतातील लोकसंख्या धोरणे उदा. 1976 आणि 2000 याचा उपघटकनुसार Detailed मध्ये Study करून घ्या.      

लोकसंख्या हा घटक तुम्हाला भूगोलामध्ये पण कमी येऊ शकतो so चांगला करून घ्या.


Source - देसले सर भाग 2 हा यासाठी सर्वोत्तम source राहील.

अगदी रट्टा मारून टाका😊. 

   

♦️2. दारिद्र्य व बेरोजगारी -

 किमान 2 प्रश्न या घटकावरती विचारले जातात. यामध्ये दारिद्र्य व बेरोजगारीचा अर्थ, प्रकार,महत्वाच्या व्याख्या, दारिद्र्य निर्मूलणासाठी नेमलेल्या समित्या आणि त्यानी केलेल्या शिफारशी चांगल्या करून ठेवा.

रंगराजन, तेंडुलकर, लकडवाला या तीन समित्या आयोगाच्या लाडक्या आहेत. त्या आपल्या पण लाडक्या व्हायला पाहिजेत मथीतार्थ त्या चांगल्या करा 😊.

त्यांनी सांगितलेली आकडेवारी त्यानुसार सर्वाधिक दारिद्र्य कोणत्या राज्यात आहे, महाराष्ट्राचे किती? या बाबी पण clear करून ठेवा.

दारिद्र्य व बेरोजगारी निर्मूलणासाठी सरकारने विविध योजना सुरु केल्या आहेत. त्यावरती आयोग हमखास प्रश्न विचारतो.

देसले सर भाग 2 मधून चांगल्या करून ठेवा.                      

 Multidimetional Poverty Index ( MPI) - MPI चे 3 आयाम, त्याचे 10 निर्देशक वव्यवस्थित करून घ्या. त्याच्या Vulnerable, Multidimetionally Poor, Severly Multidimetionally Poor याच्या Categorization वरती आयोग प्रश्न विचारत आहे. लक्षात ठेवा.

देसले सरांच्या पुस्तकात व्यवस्थित दिल आहे.


संदर्भग्रंथ - देसले सर भाग 1 आणि कोळंबे सर.    


♦️3. शाश्वत विकास -


1972 च्या Stockholm परिषदेपासून सुरु झालेला Sustainable Developement चा प्रवास अगदी पॅरिस करारापर्यंत येऊन थांबतो. 1987 चा Montreal प्रोटोकॉल  त्याच्या Provisions,1992 ची वसुंधरा परिषद त्यामधून बाहेर आलेले वेगवेगळे करार, त्यामधील बंधनकारक असलेले, नसलेले, त्यातील तरतुदी अभ्यासाव्यात, Kyoto Protocol चा सविस्तर अभ्यास करावा.

त्यानंतर येतो यामधील सर्वात IMP घटक MDG & SDG - 2000-2015 या कालावधीसाठी आपण MDG लागू केले होते. त्याची उत्पत्ती, त्याचे उद्दिष्टे, टार्गेट्स, Indicators इ. क्रमाने लक्षात ठेवावी लागतील. हेच SDG च्या बाबतीत देखील लागू होते. इथून मागे आयोगाने MDG आणि SDG वरती जास्त Deep मध्ये प्रश्न विचारले नाहीत इथून त्यातील प्रत्येक Target वरती Detailed मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. So 1-17 या क्रमाने SDG आणि प्रत्येक SDG मध्ये सांगितलेल्या Provisions पाठ करून टाका.


✳️ 1.समावेशन (Inclusion )-


यावरती किमान 2 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात.


समावेशन म्हणजे समाजातील विविध घटकांना मुख्य प्रवाहात आणणे. ते वित्तीय, सामाजिक व प्रादेशिक या माध्यमातून करता येऊ शकते. Mpsc यावरती योजनाच्या Angle ने प्रश्न विचारते.

उदा. वित्तीय समावेशनाच्या योजना - प्रधानमंत्री जन धन योजना, प्रधानमंत्री सुरक्षित विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी/ कर्मयोगी मानधन योजना Universal Basic Income इ. यामध्ये आयोग सामाजिक व प्रादेशिक समावेशनाच्या Angle ने जास्त प्रश्न विचारत नाही तरीही त्यासाठी कोणत्या समित्या नेमण्यात आल्या होत्या त्यांच्या शिफरसी, काही विशेष तरतूद उदा. Special Catrgory Status आपण बघून घ्यायला पाहिजेत.

 या सर्व योजना आणि इतर बाबी देसले सर भाग 2 मध्ये व्यवस्थित दिल्या आहेत.                           


✳️ 2. सामाजिक क्षेत्र सुधारणा ( Social Sector Initiative )-  

        

अर्थव्यवस्थेमधील जी सामाजिक क्षेत्रे आहेत. त्यावरती किमान 2 प्रश्न हमखास विचारले जातात.

यामध्ये शिक्षण, आरोग्य, बालक, महिला, वृद्ध, अपंग, backward classess इ. घटकांवरती प्रश्न विचारले जातात.

वरील घटकंसाठी सुरु करण्यात आलेल्या योजना, राबवण्यात येणारे उपक्रम, विविध घोरणे, वरील घटकंसाठी करण्यात आलेल्या विशेष तरतुदी इ वरती आयोग प्रश्न विचारते. यावर्षी National Child Labour Project, राष्ट्रीय युवा धोरण यावरती प्रश्न विचारण्यात आला होता.

या Topic साठी तुम्ही आयोगाने MPSC mains पेपर 3 मधील HR-HRD  या घटकावरती आयोगाने योजनावरती जे प्रश्न विचारले आहेत ते 21000 book मधून एकदा बघून घ्या. त्यातील बरेच प्रश्न repeat होत आहेत. 


या Topic साठी देसले सर भाग 2 हेच पुस्तक read करायला हवं.


✳️ 3.नियोजन व जमीनसुधारणा -


थेट Syllabus मध्ये उल्लेख नाही पण आयोग हमखास प्रश्न विचारताना दिसत आहे. म्हणून आपल्याला पण याचा Compulsory अभ्यास करावा लागेल.यावरती  1-2 प्रश्न विचारले जातात.


पंचवार्षिक योजना कालावधी, वृद्धी दराची उद्दिष्टे, अपेक्षित व साध्य दर , प्रतिमान, विशेष भर कशावर होता, त्या योजनेमध्ये कोणते प्रकल्प, कोणत्या योजना सुरु झाल्या इ. चा बारकाईने अभ्यास करून ठेवा.देसले /कोळंबे सरांच्या पुस्तकात याचा Chart दिला आहे तो चांगला करा.               

नियोजनासाठी भारतात अस्तित्वात असलेल्या Institutions उदा. नियोजन आयोग, NITI आयोग याचा Chart स्वरूपात Study करून ठेवा.    


 जमीनसुधारणा या घटकवरती सुद्धा या अनुषंगाने प्रश्न विचारला जातो त्यासाठी कोळंबे सरांच्या HR- HRD पुस्तकातील ग्रामीण विकास घटकातील जमीन सुधारणा हा Topic करा. प्रश्न याच्या बाहेर जाणार नाही. इथून पाठीमागील सर्व प्रश्न cover होतात. यावरती आलेले Pyq पण बघून घ्या. फायदा होईल.


2020 च्या Prelims मध्ये राष्ट्रीय उत्पन्न या घटकावर Gdp/Gnp च्या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न घटक पण read करावा लागेल. कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये तो चांगला दिला आहे.

       

♦️नोट -


 Economy मध्ये 2-3 प्रश्न हे Out of box असतात.(उदा. Missing Women,Usa - India डॉलर मॅचिंग अनुदान प्रकल्प इ.)त्यामध्ये जास्त काही करता येत नाही आपले Logic आणि Out of box Study यावरतीच आपल्याला ते Tackle करावे लागतात. जेवढं आपल्या हातात आहे. त्यावरती 100% Command मिळवण्याचा प्रयत्न करा. मग Marks नक्कीच भेटतील.             


समाप्त..

Combine पूर्व ची घोडदौड...

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,


 ✳️ आज आपण कम्बाईन पूर्व परीक्षेसंदर्भात सविस्तरपणे चर्चा करणार आहोत.


✳️ परत्येकाच्या अभ्यासानुसार प्रत्येकाचे स्ट्रॉंगपॉईंट आणि विक पॉईन्ट असतात.

 त्यानुसार आपण कुठल्या विषयांमध्ये स्ट्रॉंग आहोत किंवा कुठल्या विषयांमध्ये विक आहोत हे ओळखून आपले स्वतःचे रणनीती असली पाहिजे.

 कारण जेव्हा तुम्ही स्वतः नियोजन करताना ते नक्कीच यशस्वी होण्याचे मार्ग असतात.

 बस झाले आता सल्ले, बस झाले आता व्हिडिओ पाहून, बस झाले आता फुकटचे सल्ले घेऊन, जरा स्वतःचे डोकं वापरा.

  स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा.

 जर तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केला असेल तर निश्चितच मार्क्स येणार.

 जो प्रामाणिकपणे करणार नाही त्याचं पुढं काय होतं हे सर्वांनाच ठाऊक आहे.


✳️ तयामुळे तुम्ही तुमचे स्वतःचे नियोजन करा.

 माझ्या माहितीप्रमाणे,

 पुढील विषय मार्क मिळवून देणारे आहेत

 जसे की राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल आणि विज्ञान.

 इतिहासाविषयी पण आपण बोलणार आहोत

 आणि शेवटचा उरतो करंट अफेयर्स आणि  गणित आणि बुद्धिमत्ता.


 1. राज्यशास्त्र-

 राज्यशास्त्र असा विषय, की सर्वजण म्हणतात यामध्ये खूप मार्क मिळतात खूप सोपा आहे

 पण मित्रांनो यामध्ये खुप काही गोष्टी फॅक्च्युअल प्लस कन्सेप्ट तुमच्या जोपर्यंत क्लियर होत नाहीत तोपर्यंत मार्क येत नाहीत.

 राज्यशास्त्र च्या बाबतीत लक्ष्मीकांत सरांचे पुस्तक एक संजीवनी ठरते.

 एवढं मोठं पुस्तक पाहून बर्‍याच जणांना घाम फुटतो.

 मग काही जणांना अडचण वाटते

 त्यांच्यासाठी रंजन कोळंबे सरांचे हे पुस्तक आहे.

 यामध्ये खूप पाठांतराचा भाग असल्यामुळे

 कन्फ्युजन वाढण्याचे चान्सेस खूप असतात

 उदाहरणार्थ आणीबाणीला घ्या

 राष्ट्रपती च्या ऐवजी संसद किंवा संसदेच्या ऐवजी राज्य सरकार किंवा राज्य सरकारच्या ऐवजी राज्यपाल अशी शाब्दिक गफलत केली जाते.

 ह्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे

 जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी व्यवस्थित कराल

 निश्चितच मार्क मध्ये वाढ होईल.


 2.भूगोल-

 कम्बाईन पूर्व साठी साधारणता महाराष्ट्राच्या भूगोल वर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात.

 हा एक सोपा विषय आणि तुलनेने सर्वात जास्त म्हणजे पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा विषय असं बघून आपण पाहिलं पाहिजे. 

 स्टेट बोर्डाची पुस्तके पाचवी ते बारावी पर्यंत

 आणि सोबत सौदी सरांचे किंवा कुठंलेही एक पुस्तक व्यवस्थित पाठ केले पाहिजेत.

 ह्या गोष्टी जरी व्यवस्थित केल्या तर निश्चितपणे 15 पैकी तुम्हाला तेरा ते 11-12 मार्क पडू शकतात.


 3.अर्थशास्त्र-

 यासंदर्भात देसले सरांचं किंवा कोळंबे सरांचे कुठले एक पुस्तक व्यवस्थित रित्या करणे गरजेचे आहे.

 अर्थशास्त्राच्या संदर्भात  मागील एक पोस्ट शेअर केली होती

 ती पुन्हा चाळी तर निश्चितच फायदा होईल.


 4.विज्ञान-

 इथं score करायला बऱ्याच लोकांना जड जाते. 

 साधारणता सायन्स बॅकग्राऊंड विद्यार्थी यामध्ये लीड घेऊ शकता, पण बाकीच्यांनी पण घाबरायचं कारण नाही.

 कारण विज्ञाना मधले काही ठराविक टॉपिक केले तर निश्चित मार्का मध्ये वाढ होऊ शकते.

 जसे की प्राण्यांचे वर्गीकरण etc..

 बायलॉजी या विषयावर एक साधारणत जास्तीत जास्त प्रश्नांचा कल दिसतो.

 तुलनेने फिजिक्स आणि केमिस्ट्री यावर कमी प्रश्न असतात.

 त्या पद्धतीने तुमचं नियोजन असायला हवं.

इथं प्रश्न solving वर जास्त काम करा..


 5. इतिहास-

 सध्याचा ट्रेंड पाहता इतिहासावर तुलनेने सोपे प्रश्न विचारले जात आहेत.

 पण याचा अर्थ असा नव्हे की इतिहास सोपा आहे.

 तुम्हांला ठराविक टॉपिक व्यवस्थित रित्या करावे लागतात तर आणि तरच त्यामध्ये मार्गामध्ये वाढ होऊ शकते. अन्यथा सोपे प्रश्नांमध्ये पण तुमची गफलत होऊ शकते.

 इतिहासाच्या संदर्भात राम सरांनी एक पीडीएफ शेअर केलेली आहे की कठारे सरांचे पुस्तक कशा संदर्भात कशा पद्धतीने वाचावे.

 त्या पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केला तर निश्चित इतिहासामध्ये मार्क मिळू शकतात.


 6. चालू घडामोडी-

 यासंदर्भात एक वार्षीकी पुस्तक किंवा मग परिक्रमा.

 वारंवार रिव्हिजन करणे.

 आणि पाठांतर करणे.

 कारण चालू घडामोडी हा असा विषय आहे

 दोन ते तीन वेळा रिविजन केल्या तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो.


अश्या रीतीने प्रत्येक विषयावर startegy आखली तर नक्कीच तुम्ही 60+ मार्क्स घेऊ शकतात..

लोकसंख्याविषयक महत्वाचे

1. जनगणना - गृह मंत्रालयांतर्गत

2. जनगणना प्रारंभ - 1872

3. जनगणना आयुक्त पद निर्मिती - 1881

4. जनगणना अधिनियम - 1948

5. कुटुंब नियोजन कार्यक्रमास सुरुवात - 1952

6. जन्म - मृत्यू नोंदणी अधिनियम - 1969

7. राष्ट्रीय लोकसंख्या आयोग स्थापना - 1993

8. पहिले लोकसंख्या धोरण - 1976

9. दुसरे लोकसंख्या धोरण - 2000


🔶 लोकसंख्या विषयक सिद्धांत


1. माल्थसचा लोकसंख्याविषयक सिद्धांत

- प्रबंधाचे नाव - An essay on the principles of Population


लोकसंख्या "भूमितीय पद्धतीने" (2,4,6,8.....) वाढते , तर अन्नधान्य उत्पादन "अंकगणितीय पद्धतीने"(1,2,3,4....) वाढते.


आजचे प्रश्नसंच

                                          

1)भारतातील तिसरी किसान रेल्वे कोणत्या दोन शहरादरम्यान सुरू झाली आहे.?

1) आंध्रप्रदेश ते नवी दिल्ली ☑️

2) अनंतपुर ते नवी दिल्ली

3) महाराष्ट्र ते बिहार

4) मुंबई ते पंजाब


🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅


 2)गुपकर ठराव हा कोणत्या राज्याशी संबधित आहे.?

1) हिमाचल प्रदेश

2) जम्मू काश्मीर ☑️

3) राजस्थान

4) गुजरात


🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅


 3)इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र कोणत्या ठिकाणी आहे.?

1) मुंबई

2) भोपाळ

3) नवी दिल्ली ☑️

4) लखनौ


🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅


4)कर भरण्यासाठी चेहऱ्याची ओळख वापरणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे.?

1) डेन्मार्क

2) अमेरिका

3) थायलंड

4) सिंगापूर ☑️


🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅


 5)नुकतेच निधन झालेले महेश कनोडीया हे कोणत्या भाषेतील गायक आहेत.?

1) गुजराती ☑️

2) हिंदी

3) तमिळ

4) भोजपुरी


🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅


6) एंडोरा हा देश आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा कितवा सदस्य देश बनला आहे.?

1) 189 वा

2) 190 वा ☑️

3) 191 वा

4) 192 वा


🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅


7)सुशील कुमार सिंघल यांची कोणत्या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.?

1) व्हिएन्ना

2) झेक गणराज्य

3) सोलोमन ☑️

4) ऑस्ट्रिया


🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅


 8)2020-21 मध्ये पंतप्रधान ग्राम सडक  योजनेच्या अमंलबजावणीत कोणता जिल्हा सर्वोत्तम ठरला आहे.?

1) रायपुर

2) नर्मदा

3) वर्धा

4) मंडी 


🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅


9) साद हरिरी यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदी निवड झाली आहे.?

1) लेबनान ☑️

2) सायबेरिया

3) सीरिया

4) कुवेत


🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅


10)कोणी भारतातील प्रथम क्रमांकाचे उच्च दर्जाचे खादी वैश्विक फुटवेअर सुरू केले आहे.?

1) स्मुर्ति ईराणी

2) नितीन गडकरी ☑️

3) पियूष गोयल

4) राजनाथ सिंह


🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅


 11)लंडन येथील रेम्बो चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेल्या त्रिज्या या चित्रपटाच्या दिग्दर्शक कोण आहेत.?

1) अक्षय इंडीकर ☑️

2) आदित्य सरपोतदार

3) रवी जाधव

4) सुरेश संबाल


🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅


12)जोगिंदर युद्ध स्मारक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे.?

1) नथुला (सिक्कीम)

2) बुमला (अरुणाचल प्रदेश) ☑️

3) जोजीला (जम्मू काश्मीर)

4) रोहताग (हिमाचल प्रदेश)


🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅


13) दारिद्र्य रेषेखालील मुलींशी संबधित असलेली भाग्यलक्ष्मी योजना ही कोणत्या राज्याशी संबधित आहे.?

1) ओडिसा

2) गुजरात

3) कर्नाटक ☑️

4) महाराष्ट्र


🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅


 14)लेऑन ल्युक मेंडीसा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे.?

1) हॉकी 

2) धावपटू 

3) नेमबाजी

4) बुध्दिबळ ☑️


🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅 


15) नियोजन आयोगाने शिक्षण प्रणालीतील सुधारणांचा शोध घेण्यासाठी  स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत.?

1) राजीव कुमार ☑️

2) मनोज सिन्हा

3) अजय संचेती

4) अवनिश कुमार


🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅


पंकज अडवाणी या  बिलियर्ड्सपटूने आतापर्यंत आय.बी.एस.एफ.चँम्पियनशिप किती वेळा जिंकली आहे ?

  *उत्तर*   २२ वेळा

  


महान्यायवादी यांच्याविषयी संपूर्ण माहिती


 👉कद्र सरकार आणि राष्ट्रपती यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी भारतीय कलम 76 नुसारच एक महान्यायवादयाचे पद निर्माण केलेले आहे.

👉हा महान्यायवादी भारत सरकारचा वकील म्हणून देखील काम करतो.

👉या महान्यायवादयाला अनेक वैधानिक स्वरूपाची कार्ये पार पाडावी लागतात. त्यामुळे महान्यायवादयाला प्रथम कायदा अधिकारी तसेच हे पद राजकीय स्वरूपाचे म्हणून ओळखले जाते.


🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

अशा महान्यायवादयाची नेमणूक पुढीलप्रमाणे केली जाते.

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸


🔸- 1 ) नेमणूक

* महान्यायवादयाची नेमणूक देशाचे राष्ट्रपती करतात.

* महान्यायवादयाला आपले पदग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतीसमोर विशिष्ट स्वरुपात शपथ घ्यावी लागत असते.

* राष्ट्रपतीच्या मते अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तीचीच नेमणूक महान्यायवादी पदासाठी केली जाते.


🔸- 2 ) पात्रता


* भारतीय घटना कलम 76 नुसार महान्यायवादी पदावर नियुक्ती होणार्‍या व्यक्तीच्या अंगी पुढील पात्रता आवश्यक आहे.

* ती व्यक्ति भारताचा नागरिक असावी.

* त्याचे वय 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.

* त्यांनी देशाच्या उच्च न्यायालयात 5 वर्षे न्यायाधीश म्हणून/उच्च न्यायालयात 10 वर्षे वकील म्हणून काम केलेले असावे.

* संसदेने वेळोवेळी कायदा करून विहित केलेल्या अटी त्याने पूर्ण केलेल्या असाव्यात.

* सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या पात्रता त्याच्या अंगी असाव्यात.


🔸- 3 ) कार्यकाल


* भारतीय राज्यघटनेत महान्यायवादयाचा तसा कार्यकाल ठरविलेला नाही.

* परंतु त्याचे निवृत्ती वय 65 वर्षे ठरवून दिलेले आहे. याचाच अर्थ असा की, महान्यायवादी वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत आपल्या अधिकारपदावर कार्य करू शकतो असे असले रती महान्यायवादी मुदतपूर्व आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो.

* याशिवाय त्याने घटनेचा भंग केला असेल किंवा घटनाविरोधी कृत्य केले असेल तरच त्याच्यावर संसदेमध्ये महाभियोगाचा खटला चालवून राष्ट्रपती त्याला पदच्युत करतात.


🔸- 4 ) वेतन व भत्ते


* महान्यायवादयाला दरमहा रुपये 90,000/- वेतन प्राप्त होते. त्याशिवाय त्याच्या पदाला साजेल व शोभेल अशा सर्व सुविधांनी युक्त त्याला निवास्थान मोफत दिले जाते.

* शासकीय कामासाठी देशी विदेशी प्रवास त्याला मोफत असतो.

* एकदा निश्चित झालेले त्याचे वेतन कोणीही कपात करू शकत नाही. परंतु राष्ट्रपतीने आर्थिक आणीबाणी लागू केली तर तेवह्या मात्र त्याच्या वेतनात कपात केली जाते.

* महान्यायवादयाचे वेतन हे देशाच्या संचित निधीतून दिले जाते.

* निवृत्त झाल्यानंतरही त्याला निवृत्ती वेतन प्राप्त करण्याचा अधिकार आहे.


🔸- 5 ) अधिकार व कार्ये

* राष्ट्रपतीने मागितलेल्या कायदेशीर बाबीच्या बाबतीत सल्ला देणे.

* केंद्र सरकारच्या बाजूने न्यायालयात उपस्थित राहून कायदेविषयक मत मांडणे.

* संसदेच्या दोन्ही सभागृहात उपस्थित राहून तेथील चर्चेमध्ये भाग घेणे.

* महान्यायवादयाला खाजगी वकिली देखील करता येते. परंतु एखाद्या खटल्यामध्ये एक पक्ष केंद्र सरकारचा असेल तर केंद्र सरकारच्या बाजूने युक्तिवाद करावा लागतो.

* योग्य न्यायासाठी उच्च न्यायालयातील खटला सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करणे.


केशवानंद भारती खटला :- संपुर्ण नक्की वाचा...

🔘 राज्यशास्त्र Imp घटक


🔸केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य (१९७३) या खटल्यात स्वातंत्र्यानंतर लगेचच सरकार आणि न्यायसंस्था यांच्यात, सरकारी धोरण आणि त्याचे घटनात्मक कायदेशीर स्पष्टीकरण याविषयी संघर्ष झाला. 


🔸घटनेची चौकट आणि संसदेचे कायदे करण्याचे अधिकार या विषयातली मतभिन्नता हे या संघर्षाचे प्रमुख कारण होते. 


🔸राज्यघटना ही सरकारी समाज सुधारणेच्या धोरणातील मोठा अडथळा आहे, असे चित्र सरकारतर्फे रंगवले गेले. 


🔸ससदेचे कायदे करण्याचे अधिकार अमर्याद आहेत, का राज्यघटनेचा त्यावर अंकुश आहे? 


🔸या विषयावर शंकरी प्रसाद विरुद्ध भारत सरकार (१९५२) सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान सरकार (१९५२) आणि गोरखनाथ विरुद्ध पंजाब सरकार (१९६७) हे महत्त्वाचे खटले लढले गेले. 


🔸गोरखनाथ खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, की *घटनेतील मूलभूत अधिकारांना (Fundamental Rights) बाधा येणारा कुठलाही कायदा किंवा घटनादुरुस्ती करावयाचा अधिकार संसदेला नाही.* 


🔸या पार्श्वभूमीवर १९६३ मध्ये केरळ जमीन सुधारणा कायद्याला केशवानंद भारती खटल्यामध्ये आव्हान दिले गेले. 


🔸या *खटल्यासाठी १३ न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन* केले गेले. 


🔸 सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील हे सर्वांत मोठे खंडपीठ होते. या खंडपीठाने ८०० पानी निकालपत्रात* महत्त्वपूर्ण निर्णय दिला, की 

' संसदेला घटनेच्या गाभ्याला धक्का लावता येणार नाही'.


🔸ससदेला घटनादुरुस्ती करावयाचा पूर्ण अधिकार आहे; परंतु या अधिकारात संसद घटनेचे मूलभूत स्वरूप बदलू शकत नाही. याचा अर्थ असा, की घटनादुरुस्ती अधिकारामध्ये घटनेचे मूळ स्वरूप बदलणे अंतर्भूत नाही.


🔸 सर्वोच्च न्यायालय राज्यघटनेचे संरक्षक आणि विश्‍लेषक असल्यामुळे घटनादुरुस्ती किंवा कायदा राज्यघटनेच्या मूलभूत स्वरूपाला बाधक आहे किंवा नाही हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने स्वत-कडे ठेवला. म्हणजेच राज्यघटनेचा काही भाग भविष्यकाळातल्या सर्व संसद सदस्यांना बंधनकारक आहे असं स्पष्ट केलं. 


🔸या बंधनकारक भागाची व्याख्या सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केली नाही; परंतु सर्वोच्च न्यायालयानं नंतर इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण (१९७५), मिनर्वा मिल विरुद्ध भारत सरकार (१९८०), आय. आर. कोहेली विरुद्ध तमिळनाडू सरकार (२००७) या खटल्यांमध्ये राज्यघटनेच्या मूलभूत स्वरूप संकल्पनेवर शिक्कामोर्तब केलं. 


🔸कशवानंद भारती खटल्यानं सर्वोच्च न्यायालयाने आपले राज्यघटनेच्या विश्‍लेषणाचे अंतिम अधिकार अबाधित ठेवून देशामध्ये लोकशाहीला धोका पोचणार नाही याची जनतेला खात्री दिली. *म्हणूनच या निर्णयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.*

मूलभूत अधिकार/हक्क :


🔰भारतीय राज्यघटनेच्या तिसर्‍या प्रकरणात 14 ते 35 या कलमामध्ये मूलभूत हक्काविषयी माहिती आहे.


❤️घटनेनुसार नागरिकांचे मूलभूत अधिकार सुरूवातीस 7 होते मात्र 44 व्या घटना दुरूस्ती (1978) नुसार संपत्तीचा मूलभूत अधिकार रद्द करून तो कायदेशीर अधिकार केला आहे.


🔰महणून सध्या 6 अधिकार आहेत.

❤️1. समतेचा अधिकार = कलम 14 ते 18.

🔰2. स्वातंत्र्याचा अधिकार = कलम 19 ते 22.

❤️3. शोषणाविरुद्धचा अधिकार = कलम 23 ते 24.

🔰4. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार = कलम 25 ते 28.

❤️5. संस्कृती व शिक्षणाचा अधिकार = कलम 29-30.

🔰6. न्यायालयीन संरक्षणाचा अधिकार – कलम 32 .


राज्यसेवा प्रश्नसंच

Ques. आगराच्या जामा मस्जिदिचे निर्माण कोणी केले आहे? 

A. अकबर ने

B. शाहजांह ने

C. जहाँआरा ने ✅

D. जहांगीर ने


 Ques. कोणत्या शिख गुरुने फारसी भाषेत जफरनामा लिहला आहे? 

A. यापैकी कोणीच नाही

B. गुरू नानक

C. गुरू अंगद देव 

D. गुरु गोविंद सिंह✅



 Ques. गुरु नानक चा जीवन परिचय कोणत्या शिख गुरु ने लिहला आहे? 

A. गुरू तेग बहादुर सिंह ने

B. गुरू अंगद देव ने

C. गुरु अर्जुन देव ने ✅

D. गुरू गोविंद सिंह ने


 Ques. औरंगजेब च्या शाशन काळात बंगाल चा नवाब कोण होता? 

A. मुर्शीद कुली खाँ   ✅

B. मंसुर अली खान

C. मीर कासीम

D. अलवर्दी खान


१) भारतीय राज्यघटनेत नमुद मुलभूत कर्तव्यामध्ये नमुद आशय अंतर्भूत असला तरी खालील विधानांमधील काही शब्द विशेषत्वाने नमुद नाहीत ते जादाचे नमुद केले आहेत अशी खालीलपैकी कोणती विधाने आहेत ?

अ) राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व देशातील कायद्याचा आदर करणे.

ब) स्त्रियांच्या व बालकांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणा-या प्रथांचा त्याग करणे

क) सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे रक्षण करणे.

ड) आठव्या वर्गापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करणे.

   1) अ, क 

   2) ब    

   3) ड   

   4) सर्व 


उत्तर :- 4


२) मार्गदर्शक तत्त्वे शासनाकडून केलेल्या अपेक्षा आहेत. तर मुलभूत कर्तव्ये .................... च्या अपेक्षा आहेत.

1) मंत्रीमंडळ    

2) जनता      

3) प्रतिनिधी    

4) सर्वोच्च न्यायालय


उत्तर :- 2


३) योग्य क्रम निवडा.

अ) भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे

ब) सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे

क) नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे

ड) संविधानाचा सन्मान करणे


1) अ, ड, क, ब    

2) ड, अ, क, ब    

3) ड, ब, अ, क    

4) ड, अ, ब, क



उत्तर :- 2


४) खालीलपैकी भारतीय नागरिकाचे कोणते मुलभूत कर्तव्य नाही  ?


1) देशाचे संरक्षण करणे                

2) नियमित कर भरणे 

3) सहा ते 14 वर्षा दरम्यानचे अपत्य किंवा पाल्य यास शिक्षणाच्या संधी देणे

4) एकही नाही


उत्तर :- 2


५) राज्यघटनेत मुलभूत कर्तव्यांचा केलेला समावेश लोकशाहीच्या यशासाठी कसा लाभदायक आहे ?

अ) जेव्हा राज्यघटना सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे उद्दिष्ट बाळगते तेव्हा नागरिकांनी किमान शिस्त पाळली पाहिजे.

ब) राज्याच्या आणि व्यक्तींच्या कल्याणासाठी नागरिकांनी कर्तव्ये मान्य केली पाहिजेत.

क) ही कर्तव्ये मुलभूत हक्कांना पूरक आहेत.

ड) समावेशनामुळे सुसंस्कृत समाजातील नागरिकामध्ये नागरी जाणीव विकसित होईल.

 वरील विधानांपैकी कोणते बरोबर आहे / आहेत ?


1) अ      

2) ब, क     

3) अ, ब, क

 4) सर्व


उत्तर :- 4



६) कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला ?

1) 45 वी घटना दुरुस्ती      

2) 46 वी घटना दुरुस्ती

3) 42 वी घटना दुरुस्ती      

4) 44 वी घटना दुरुस्ती


उत्तर :- 3


७) भारतीय राज्यघटनेचे कलम ‘51अ’ कशा संबंधी आहे ?

1) मूलभूत कर्तव्ये    

2) मूलभूत हक्क    

3) मार्गदर्शक तत्त्वे    

4) राष्ट्रपती


उत्तर :- 1


८) घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश ........................ च्या शिफारशीवरून करण्यात आला.

1) वल्लभभाई पटेल समिती  

2) कृपलानी समिती  

3) सरकारिया आयोग  

4) स्वर्ण सिंग समिती


उत्तर :- 4


९) भारतीय राज्यघटनेतील व्यक्तीच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे ?

1) फ्रान्स      

2) यु.एस.ए.    

3) यु.एस.एस.आर    

4) यु.के.


उत्तर :- 3


१०) मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा.

अ) मूलभूत कर्तव्ये नागरिकांना शिक्षित करण्याची भूमिका बजावतात.

ब) हक्क कर्तव्यांसोबत निगडित असलेच पाहिजेत.

क) कर्तव्ये स्वत:हून लागू होत नाहीत.

ड) अशा प्रकारची कर्तव्ये साधारणत: पाश्चात्य उदारवादी देशांच्या राज्यघटनेत आढळतात.

         वरीलपैकी कोणते विधान / विधाने चुकीची आहेत ?


1) अ, क      

2) ब, ड      

3) ब, क, ड    

4) ड


उत्तर :- 4


१) इन्टरनॅशनल युनियन फॉर द काँझर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस तर्फे सादर झालेल्या वर्ल्ड काँझर्वेशन स्ट्रॅटेजीत 

     ब्रंटलँडच्या अहवालात सन 1980 मध्ये चिरंतन विकास ही संज्ञा सर्वप्रथम वापरली गेली त्या अहवालाचे शीर्षक काय होते ?

 

   1) आपले उत्तम भवितव्य   

   2) आपले अंधारलेले भवितव्य

   3) आपले सामुदायिक भवितव्य   

   4) आपले असाधारण भवितव्य


उत्तर :- 3


२) आंतरराष्ट्रीय विकास संस्था ............................... करते.

   अ) ग्रामीण पायाभूत सुविधासाठी वित्तपुरवठा 

   ब) ठिबक सिंचनासाठी वित्तपुरवठा

   क) बाजारपेठ सुविधांसाठी वित्तपुरवठा    

   ड) निर्यातीकरिता वित्तपुरवठा


  1) अ, क   

  2) अ, ब आणि क     

  3) अ, ड    

  4) ब 


उत्तर :- 1


३) BPO सेवा या ....................... सेवांच्या उपघटक आहेत.


   1) व्यापारी    

    2) संगणक उत्पादन    

   3) माहिती व तंत्रज्ञान संबंधित  

   4) संशोधन व अभियांत्रिकी


उत्तर :- 3


४) आर्थिक विकास आणि पर्यावरण यांमधील संबंध दर्शविणा-या प्रमेयाचे नाव काय ?

   1) पर्यावरणीय फिलिप्स वक्र गृहितक 

   2) पर्यावरणीय मार्शल वक्र गृहितक

   3) पर्यावरणीय पिगू वक्र गृहितक     

   4) पर्यावरणीय कुझनेट्स वक्र गृहितक


उत्तर :- 4


५) स्त्री सक्षमीकरण म्हणजे काय ?

   1) स्त्रियांची सामाजिक – आर्थिक स्थिती सुधारणे.   

   2) स्त्रियांच्या साक्षरतेचे प्रमाण सुधारणे.

   3) स्त्रियांना रोजगारसंधी पुरविणे. 

   4) स्त्रियांचा आर्थिक सहभाग वाढविणे.


उत्तर :- 1


६) निरंतर विकास ही संकल्पना प्रथम कुठे मांडण्यात आली ?

   1) वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रेटेजी   

   2) रियो वसुंधरा परिषद

   3) क्वेटो परिषद   

   4) वरीलपैकी  नाही


उत्तर :- 1


७) 2000 साली स्वीकारलेल्या सहस्त्रक विकास उद्दिष्टांमध्ये याचा समावेश आहे :

   अ) दारिद्रय आणि उपासमारीचे निर्मूलन.    

   ब) प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण.

   क) सर्वांना विनामूल्य आणि सुरक्षित पेयजल.  

  ड) पर्यावरण निरंतता


   1) अ फक्त  

  2) अ, ब, ड   

  3) क फक्त  

  4) वरील सर्व


उत्तर :- 2


८) चलन संख्यामान सिध्दांतातील समीकरण :

     MV = PT ........................... म्हणून संबोधले जाते.


   1) रॉबर्टचे समीकरण  

  2) मार्शलचे समीकरण

  3) केनेसियनचे समीकरण    

  4) फिशरचे समीकरण


उत्तर :- 3


९) प्राथमिक सहकारी पतसंस्थांना खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक असते :

   अ) त्या त्या खेडयातील रहिवासी असणारे किमान दहा किंवा त्यापेक्षा अधिक सदस्य आवश्यक असतात.

   ब) या पतसंस्थांचे खेळते भांडवल हे सदस्यांकडून आकारलेले शुल्क किंवा ठेवींच्या स्वरूपात असावे.

   क) या पतसंस्था शेतक-यांना सवलतीच्या दरात कर्ज देतात.    

   ड) या पतसंस्था फक्त लहान शेतक-यांना कर्ज देतात.


   1) अ, ड    

  2) ब, क व ड  

  3) अ, ब व क   

  4) वरील सर्व


उत्तर :- 1


१०) भारताच्या बी.पी.ओ. सेवांचे दोन मुख्य ग्राहक ............................. आहेत.

अ) अमेरिका   ब) जपान      क) जर्मनी    ड) पश्चिम युरोप

   1) अ आणि ड  

  2) अ आणि क    

   3) ब आणि ड  

  4) क आणि ड


उत्तर :- 3


१) खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळते ?

   1) एका विशिष्ट धर्माच्या उत्तेजनासाठी : अनुच्छेद – 26 कर देण्याचे स्वातंत्र्य

   2) धार्मिक व्यवहारांच्या व्यवस्थापनाचे : अनुच्छेद – 27 स्वातंत्र्य

   3) ठराविक शैक्षणिक संस्थामध्ये धार्मिक : अनुच्छेद – 28 शिक्षण किंवा धार्मिक उपासनांना उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य

   4) शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा : अनुच्छेद – 29 आणि त्याचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क


उत्तर :- 3


२) ‘कायद्यापुढील समानता’ (Equality before Law) हा नियम अनिर्बंध नाही. त्याबाबतीत घटनात्मक आणि अन्य अपवाद 

     आहेत. खालीलपैकी कोणते अनुच्छेद 14 ला अपवाद आहेत ?

   अ) भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काही विशेष हक्क आहेत.

   ब) संसद सदस्य आणि राज्याच्या विधीमंडळाचे सदस्य यांच्याविरुध्द त्यांनी संसदेत अथवा राज्य विधीमंडळात केलेल्या भाषणाबद्दल कोणत्याही न्यायालयात खटला चालविता येत नाही.

   क) परदेशी दूत आणि राजनीतीज्ञ यांना फौजदारी दाव्याबाबत विशेष हक्क नाहीत तर केवळ दिवाणी दाव्याबाबत आहेत.

   ड) अनुच्छेद 31 – C हा अनुच्छेद 14 ला अपवाद आहे.

   1) अ, ब आणि क   

   2) ब, क आणि ड   

   3) अ, ब, क आणि ड 

   4) अ, ब आणि ड


उत्तर :- 4


१९८३) भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे ?

   1) तिस-या भागात   

   2) पहिल्या भागात  

   3) चौथ्या भागात   

   4) दुस-या भागात

उत्तर :- 3


१९८४) भारत सरकार अधिनियम, 1935 मधील ‘सूचनापत्राचा’ समावेश 1950 च्या भारतीय संविधानात कसा केला आहे ?

   1) मूलभूत हक्क    

  2) मार्गदर्शक तत्त्वे  

  3) मूलभूत कर्तव्ये   

  4) केंद्र सूची

उत्तर  :- 2


५) भारतीय राज्यघटनेच्या IV थ्या विभागात 42 व्या घटनादुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणती उपकलमे समाविष्ट करण्यात आली?

   अ) कलम 39 – समान न्याय आणि मोफत कायदेविषयक सहाय्य

   ब) कलम 43 – उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांना सहभाग

   क) कलम 48 – पर्यावरणात सुधारणा आणि जंगले व वन्यजीव यांचे संरक्षण

 1) फक्त अ    

2) फक्त ब आणि क   

3) फक्त अ आणि क    

4) वरील सर्व


उत्तर :- ४



६) पुढील दोन पैकी कोणते विधान बरोबर आहे ?

   अ) भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 23 मध्ये “प्रदूषण मुक्त, स्वच्छ पर्यावरणाची” हक्क अंतर्भूत आहे.

   ब) जर असे पर्यावरण धोक्यात आले तर नागरिकांना संविधानाच्या कलम 34 खाली ते दूर करण्यास्तव हक्क असेल.

   1) अ  

    2) ब   

   3) दोन्ही    

  4) एकही नाही


उत्तर :- 4


७) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावरील मर्यादा आहेत :

   अ) देशाची सुरक्षा  

   ब) न्यायालयांचा अवमान

   क) बदनामी     

   ड) भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता


   1) फक्त अ, ब, क  

   2) फक्त अ, क, ड 

   3) फक्त अ, ब, ड 

   4) वरील सर्व


उत्तर :- 4


८) कोणत्या घटनादुरुस्तीनुसार अनु. जाती / जमाती आणि इतर मागास वर्गासाठी खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत 

1) 92 व्या   

2) 93 व्या    

3) 94 व्या  

4) 95 व्या


उत्तर :- 2


९) स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारामध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याच्या अधिकाराचा समावेश ................. व्या घटनादुरुस्तीने  करण्यात आला.

   1) 97   

   2) 96    

  3) 95     

  4) 94

उत्तर :- 1


१०) खालील विधाने विचारात घ्या :

   अ) ‘राज्य हे सहा वर्षापासून ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देईल’ हा त्यांचा मूलभूत हक्क आहे.

 ब) ‘जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या आपल्यास अथवा पाल्यास त्याच्या सहाव्या वर्षापासून ते चौदाव्या  वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे’ हे त्याचे मूलभूत कर्तव्य आहे.

   क) ‘राज्य हे बालकांचे  वय सहा वर्षाचे होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करील’ हे मार्गदर्शक तत्त्व आहे.

          वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे ?


   1) अ आणि ब    

  2) ब आणि क   

  3) अ आणि क  

  4) वरील सर्व


उत्तर :- 4



१) केंद्राकडून राज्यांना होणारे वाढते साधनसामग्री हस्तांतर ........................... दर्शवते.


   अ) राज्य व केंद्र यामध्ये वाढते एकत्रीकरण   

   ब) राज्याचे केंद्रावर असहाय्य अवलंबन

   क) राज्यांनी महसुल उभारणीत केलेले दुर्लक्ष

   1) अ, ब आणि क 

   2) अ आणि ब    

   3) ब आणि क   

   4) फक्त क


उत्तर :- 2


२) राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक या शिखर संस्थेची स्थापना खालील कारणामुळे करण्यात आली :

   1) कृषी पुनर्रचीत पतपुरवठा विकास मंडळाचा (ARDC) पतपुरवठयातील सहभाग कार्यक्षम नव्हता.

   2) राष्ट्रीय सहकारी विकास मंडळास (NRDC) निर्धारित उद्देश साध्य करता आले नाहीत.

   3) कृषी पतपुरवठा विभाग(ACD)   वाढीवर मागणीनुसार पुरवठा करण्यास असमर्थ होता.

   4) वरीलपैकी नाही.    

उत्तर :- 1


३) देशाच्या आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवण्याचे काम कायदेमंडळाच्या कोणत्याही समितीला करावे लागते ?


   अ) लोकलेखा समिती     

   ब) अंदाज समिती    

   क) सार्वजनिक उद्योग समिती    

   ड) वरील सर्व

   वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहे ?

   1) फक्त अ   

  2) अ आणि ब फक्त  

  3) ब आणि क फक्त   

  4) ड फक्त


उत्तर :- 4


४) मानव विकास निर्देशकांचे (HDI) मूलभूत तीन घटक पुढीलपैकी कोणते  ?

   1) जन्माच्या वेळचे अपेक्षित आयुर्मान प्रौढ साक्षरता दर – स्थूलशिक्षण प्रवेश दर आणि दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पादन

   2) आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरणातील खर्च

   3)दारिद्रय रेषेखालील लोकसंख्या, दारिद्रय रेषेवरील लोकसंख्या आणि निवासाची व्यवस्था.

   4) सरासरी आयुर्मान, प्रौढ साक्षरता दर आणि राष्ट्रीय उत्पन्न

उत्तर :- 1


५) उच्च शक्ती पैसा म्हणजे काय ?

   अ) मध्यवर्ती बँकेकडील बँकाचा राखीव निधी    

   ब) बँकांची सर्व कर्जे आणि उचल

   क) बँकांनी धारण केलेला पैसा        

   ड) लोकांच्या हातातील पैसा आणि मध्यवर्ती बँकेकडील राखीव निधी, बँकाकडील अतिरीक्त राखीव निधी. 


   1) अ आणि ब  

  2) ब फक्त   

  3) क आणि ड    

  4) ड फक्त


उत्तर :- 4


६) सहकारी क्षेत्राचे प्रमुख उद्दिष्ट कोणते ?

   1) उद्योगांना वित्तीय मदत पुरविणे.     

   2) आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांच्या कल्याणाचे महत्तीकरण करणे.

   3) शेतीला पतपुरवठा करणे.   

   4) ग्राहकांचे हितसंबंध जोपासणे.


उत्तर :- 2


७) खालीलपैकी कोणते सार्कचे उद्दिष्ट नाही ?

   1) दक्षिण पूर्व आशियातील लोकांच्या कल्याणाला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या राहणीमानाच्या गुणवत्तेत वाढ करणे.

   2) प्रदेशातील आर्थिक व सामाजिक वृध्दी आणि सांस्कृतिक विकासाला गती देणे.

   3) दक्षिण आशियातील देशांच्या एकत्रित स्वावलंबनास प्रोत्साहन देणे व आणखी मजबूत बनविणे.

   4) एकमेकांचा परस्पर विश्वास, समज आणि अधिमूल्यनात भर घालणे.


उत्तर :- 1


२०८८) जननी सुरक्षा योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ?

   1) प्रसुतीकाळातील मृत्यू आणि नवजात बालकांचे मृत्यू रोखणे.    

   2) जन्मदर कमी करणे.

   3) मातांची काळजी घेणे.         

   4) नवजात बालकांचे मृत्यूदर रोखणे.


उत्तर :- 1


९) 1980 च्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय होते ?

   1) ग्रामीण युवकांना स्वयम रोजगारासाठी बीज भांडवलाचा पुरवठा करणे.

   2) ग्रामीण युवकांना स्वयम रोजगारासाठी प्रशिक्षणाच्या सुविधा पुरविणे.

   3) ग्रामीण भागातील गरीब लोकांना रोजगाराच्या संधी पुरविणे.

   4) सुशिक्षित बेरोजगारांना तांत्रिक मदत करणे.


उत्तर :- 3


१०) 2011 च्या जनगणनेतील आकडेवारीवरून साक्ष्ररतेच्या प्रमाणानुसार पुढील जिल्ह्यांचा क्रम लावा.

   अ) नागपूर  

   ब) मुंबई शहर    

  क) मुंबई उपनगर   

  ड) अकोला


  1) अ, ब, ड, क    

 2) क, अ, ब, ड   

 3) ब, क, ड, अ   

 4) ब, क, अ, ड


उत्तर :- 2


🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿


इतिहास प्रश्नसंच

१. युरोपियन सत्तांनी भारतात स्थापन केलेल्या पहिल्या वाखारींसंदर्भात योग्य जोड्या जुळवा.

अ) पोर्तुगीज             १) कोची
ब) डच                      २) मछलीपट्टनम
क) ब्रिटीश                ३) सुरत
ड) डेन्स                    ४) चिंचोसा

        अ   ब   क   ड
   A.  ३   ४   २   १
   B.  ४   २   ३   १
   C.  १   २   ३   ४ ✔
   D.  २   १   ३   ४

२. १८१३ च्या सनदी कायद्यानुसार खालीलपैकी कोणती विधान / विधाने बरोबर आहेत ?

अ) कंपनीचा भारतातल्या व्यापाराचा एकाधिकार समाप्त केला.
ब) ख्रिश्चन मिशानरींना भारतात धर्मप्रसार करण्याची परवानगी देण्यात आली.
क) दरवर्षी १ लाख रुपये शिक्षणावर खर्च करण्याची तरतूद करण्यात आली.
ड) भारतासाठी बिशप व कंपनीच्या इतर तीन प्रांतांसाठी आर्चबिशपची नेमणूक करण्यात आली.

   A. अ केवळ
   B. अ आणि ब
   C. अ ब आणि क
   D. वरील सर्व ✔

३. खालीलपैकी ब्रिटीश संसदेने केलेल्या कोणत्या कायद्यानुसार नियामक मंडळाची (Board of Control) स्थापना करण्यात आली ?

   A. नियामक कायदा १८७३
   B. पिट्स इंडिया कायदा ✔
   C. सनदी कायदा १८१३
   D. सनदी कायदा १८३३

४. वॉरेन हेस्टींग्जसंबंधी खालील विधाने लक्षात घ्या.

अ) 'कलेक्टर' या पदाची निर्मिती केली.
ब) दुहेरी शासनव्यवस्था लागू केली.
क) बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनला.
ड) चार्ल्स विल्किंस च्या गीतेच्या इंग्रजी अनुवादाला प्रस्तावना लिहिली.

   A. ब बरोबर
   B. ब,क आणि ड बरोबर
   C. क आणि ड बरोबर
   D. अ,क आणि ड बरोबर ✔

५. १८०२ रोजी 'वसई' येथे झालेल्या तहात दुसऱ्या बाजीरावाने तैनाती फौजेचा स्वीकार केला. त्यावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता ?

   A. वॉरेन हेस्टींग्ज
   B. वेलस्ली ✔
   C. डलहौसी
   D. कॉर्नवॉलिस

६. आपण श्रीकृष्णाचे अवतार आहोत असे जाहीर करणाऱ्या कोणत्या व्यक्तीने पंजाबमध्ये 'अहमदिया' आंदोलन सुरु केले ?

   A. सर सय्यद अहमदखान
   B. लियाकत अली
   C. खाफार खान
   D. मिर्झा गुलाम अहमद ✔

७. खालीलपैकी कोणाच्या मते १८५७ चा उठाव म्हणजे सुसंकृतपणा(ब्रिटीश) व रानटीपणा यांमधील झगडा होता ?

   A. व्ही. ए. स्मिथ
   B. सर जॉन लॉरेन्स
   C. टी. आर. होल्म्स ✔
   D. सायमन फ्रेजर

८.
अ) गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म १८५६ मध्ये टेंभू(कराड) येथे झाला.
ब) १८८८ मध्ये सुधारक हे वृत्तपत्र मराठी व इंग्रजी भाषेमध्ये सुरु केले.
क) कर्वे प्रकरणामध्ये आगरकर व टिळक यांना १०१ दिवस तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.

खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

   A. फक्त अ
   B. अ आणि ब ✔
   C. वरीलपैकी एकही नाही
   D. वरील सर्व

९. खालीलपैकी कोणी नाग महिला नेत्या 'गायदिन लियू' यांना 'राणी' हि पदवी देऊन सन्मानित केले ?

   A. सुभाषचंद्र बोस
   B. महात्मा गांधी
   C. पंडित नेहरू ✔
   D. सरदार पटेल

१०) 'इंडिया डिव्हायडेड' या पुस्तकाचे लेखन कोणी केले ?

   A. स्वातंत्र्यवीर सावरकर
   B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
   C. डॉ. राजेंद्रप्रसाद ✔
   D. सर सय्यद अहमदखान

११. ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या काराघृहात ठेवले होते ?

   A. ठाणे
   B. अंदमान
   C. मंडाले
   D. एडन ✔

१२. खालीलपैकी कोणत्या संस्थांची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली होती ?

अ) ज्ञान प्रसारक मंडळी
ब) बॉम्बे असोशिएशन
क) लंडन इंडियन असोशिएशन
ड) ईस्ट इंडिया असोशिएशन

   A. अ,ब आणि क फक्त
   B. ब,क आणि ड फक्त
   C. अ,ब आणि ड फक्त
   D. अ,ब,क आणि ड ✔

१३.भारतात रेल्वे चे जाळे उभारण्या करिता लोर्ड डलहौसीने नियोजन केले कारण

अ) भारताच्या अंतर्गत भागातून निर्यातीसाठी कच्चा माल मिळविण्यात सहजता यावी
ब) ब्रिटीश भांडवली गुंतवणुकीवर नफा कमाविण्याकरिता मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी
क) भारतात सहज व स्वस्त वाहतूक उपलब्ध व्हावी याकरिता

   A. अ फक्त
   B. अ आणि ब फक्त ✔
   C. ब आणि क फक्त
   D. अ,ब आणि क

१४. सर अॅलन ह्युम यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय संघटना स्थापन करण्या साठी प्रयत्न का केला ?

अ) ते विचाराने उदारमतवादी होते
ब) त्यांना भारतीय लोकांबद्दल तळमळ होती
क) त्यांना भारतीय लोकांना सन्मानाने वागवे, असे वाटत होते
ड) त्यांना भारतीयांना प्रशासनात सहभाग द्यावा, असे वाटत होते

   A. अ आणि ब फक्त
   B. अ आणि क फक्त
   C. अ,ब आणि क
   D. वरील तिन्ही पर्याय अयोग्य आहेत ✔

१५. भारतातला स्वातंत्र्य देण्याबद्दल ब्रीतीशांच्या धोरणात बदल झाला कराण -

अ) ब्रिटनमध्ये झालेले सत्तांतर
ब) भारतात राष्ट्रावादास आलेले उधाण
क) द्वितीय जागतिक महायुद्धाचा परिणाम

   A. अ आणि ब फक्त
   B. बआणि क फक्त
   C. अ आणि क फक्त
   D. अ,ब, आणि क ✔

१६. खालीलपैकी कोणत्या सुधारणांवर महाराष्ट्रात ई.स. १८४९ मध्ये स्थापना झालेल्या ‘परम हंस’ मंडळीचा भर होता ?

अ) जातीबंधाने तोडणे
ब) विधवा पुनर्विवाह
क) स्त्री शिक्षण
ड) मूर्तीपूजा बंदी

   A. अ फक्त
   B. अ आणि ब फक्त
   C. अ,ब आणि क फक्त
   D. वरील तिन्ही पर्याय अयोग्य ✔

१७. हिंदुस्तान सरकारच्या १९३५ कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार केली ?

अ) मुडीमन समिती आणि तिचा अहवाल
ब) सायमन कमिशन
क) नेहरू रीपोर्ट
ड) बॅरीस्टर जिन्नांचे १४ मुद्दे

   A. अ,ब आणि क
   B. ब,क आणि ड
   C. अ,ब आणि ड
   D. अ,ब,क आणि ड ✔

१८. १९०६ च्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या कलकत्ता अधिवेशनात अध्यक्ष पदावरून बोलताना दादाभाई नौरोजी यांनी ‘स्वराज्य’ शब्द उघडपणे वापरला आणि ह्या अधिवेशनात

अ) राष्ट्रगीत म्हणून ‘वंदेमातरम्’ पहिल्यांदाच गायले गेले
ब) संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित करण्यात आला
क) मवाळ मार्ग चा स्वीकार करण्यात आला
ड) बॅरीस्टर जिन्ना भारतीय राष्ट्रीय सभेच्या कार्यात सहभागी झाले

   A. अ आणि ब
   B. क आणि ड
   C. ब आणि क ✔
   D. अ आणि ड

१९. अयोग्य जोडी निवडा

   A. श्रीधरलू नायडू - वेद समाज
   B. राजा राममोहन रॉय - आत्मीय सभा
   C. रवींद्रनाथ टागोर – तत्वबोधिनी सभा ✔
   D. शिवनारायण अग्निहोत्री – देव समाज

२०. अस्पृश्यांना ‘लष्करात व पोलिसात’ नोकऱ्या मिळाव्यात म्हणून सासवड च्या सभेत कोणी मागणी केली ?

अ) शिवराम जानबा कांबळे
ब) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
क) अॅड. बि.सी. कांबळे
ड) गोपाळबुवा वलंगकर

   A. अ फक्त ✔
   B. ब फक्त
   C. क आणि ड
   D. ड फक्त

२१. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही ?
   A. नीळ
   B. भात फक्त
   C. गहू फक्त
   D. भात व गहू ✔

२२. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उदयास कोणत्या बाबी कारणीभूत ठरल्या ?

अ) पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव व राष्ट्रीय भावनेचा उदय.
ब) भारतीय नागरी सेवा परीक्षेसाठी वयोमर्यादा २१ वरून १९ वर्षे पर्यंत खाली आणणे.
क) लॉंर्ड लिटनच्या लोकप्रिय बाबी.

   A. अ आणि ब ✔
   B. ब आणि क
   C. अ आणि क
   D. अ,ब आणि क

२३. पुढील कोणत्या सामाजिक-धार्मिक चळवळी मुंबईत स्थापन झाल्या नाहीत ?

   A. परमहंस मंडळी व रहनुमाई मझ्द्दासान सभा
   B. प्रार्थना समाज व आर्य समाज
   C. इंडियन सोशल कॉन्फरन्स व सोशल सर्विस लीग
   D. वरील तीन्हीतील कोणताही पर्याय योग्य नाही ✔

२४. ‘श्रीपती शेषाद्री प्रकरण’ ज्या समाजसुधारकाशी संबंधित होते. त्यांचे नाव ओळखा.

   A. जगन्नाथ शंकर शेठ
   B. बाळशास्त्री जांभेकर ✔
   C. भाऊ दाजी लाड
   D. छत्रपती शाहूमहाराज

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...