Sunday 30 August 2020

चालू घडामोडी वन लाइनर्स,. 30 ऑगस्ट 2020.


❇️ सुरेश रैना इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2020, युएई बाहेर पडला

❇️ दिल्ली सरकारने "स्वस्थ शरीर, आरोग्यदायी" फिटनेस मोहीम सुरू केली

❇️ उत्पल कुमार सिंग यांची लोकसभेच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे

❇️ स्टीफन मार्टिन यांनी आयरिश फुटबॉल असोसिएशनचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली

❇️ किरेन रिजिजूने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांसाठी पुरस्कार पैशात वाढ जाहीर केली

❇️ राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे पारितोषिक 7.5 लाखांवरून 25 लाखांवर गेले आहे

❇️ अर्जुन पुरस्काराचे पारितोषिक 1 5 लाखांवरून  5 लाखांवर गेले आहे

❇️ द्रोणाचार्य (एल) पुरस्कारासाठीचे पुरस्कार 5 लाखांवरून 15 लाखांवर गेले आहेत

❇️ द्रोणाचार्य (आर) पुरस्कारासाठी पारितोषिकाची रक्कम 5 लाखांवरून 10 लाखांवर गेली आहे

❇️ ध्यानचंद पुरस्काराचे पारितोषिक 5 लाखांवरून 10 लाखांवर गेले आहे

❇️ जम्मू-काश्मीरमध्ये पीएमकेएसवायसाठी 601.12 कोटी वार्षिक कृती योजना मंजूर

❇️ पीएमकेएसवाय: प्रधानमंत्री कृषी सिंचय योजना

❇️ जागतिक बँकेच्या व्यवसाय अहवालाचे प्रकाशन थांबविण्यास

❇️ सीआयएसएफने आपल्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांसाठी "पेन्शन कॉर्नर" अ‍ॅप लाँच केले

❇️ सीआयएसएफ: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल

❇️ आंध्र प्रदेश सरकार 11 सप्टेंबर रोजी वायएसआर आसारा योजना सुरू करणार आहे

❇️ एनआयटीआय आयोगाने एनडीसी – परिवहन उपक्रम एशिया (टीआयए) इंडिया घटक सुरू केले

❇️ एनडीसी: राष्ट्रीय निर्धारित योगदान

❇️ श्रीलंका क्रिकेटर थरंगा परानाविताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

❇️ बॅडमिंटनमधील जपानच्या प्रथम ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्याने अय्याका ताहाकाशी निवृत्तीची घोषणा केली

❇️ सेना प्रमुख एम. एम. नारावाने यांच्या हस्ते "राष्ट्रीय सुरक्षा आव्हाने: युवा विद्वानांचे दृष्टीकोन" या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

❇️ टेनिस डबल पेअर माइक ब्रायन आणि बॉब ब्रायन यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीची घोषणा केली

❇️ केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी कोची येथे राज्यातील प्रथम मरीन "म्ब्युलन्स "प्रतिष्ठान" चे उद्घाटन केले.

❇️ ज्येष्ठ असमिया लोक गायिका अर्चना महंता निधन

❇️ सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती ए.आर.  लक्ष्मणन निघून गेले

❇️ भारत मल्टी-स्पोर्ट ब्रिक्स गेम्स 2021 चे आयोजन करेल

❇️ उत्तर प्रदेश सरकारने एनआरआय युनिफाइड पोर्टल सुरू केले आहे

❇️ पीयूष गोयल यांनी "नॅशनल जीआयएस-सक्षम लँड बँक सिस्टम" अक्षरशः सुरू केली.

❇️ शिक्षक 2020 मध्ये सुधा पेणुली यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे

❇️ एनसीपीयूएलने नवी दिल्ली येथे "जागतिक उर्दू परिषद" आयोजित केली आहे

❇️ एनसीपीयूएल: नॅशनल कौन्सिल फॉर प्रमोशन उर्दू भाषेचे

❇️ केविन मेयर यांनी टिकटोकचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पद सोडले आहे

❇️ 14 वा भारत-सिंगापूर संरक्षण धोरण संवाद अक्षरशः पार पडला

❇️ डीईए, वित्त आणि यूएनडीपीआय मंत्रालयाने "टिकाऊ वित्त सहयोग" सुरू केले

❇️ डीईए: आर्थिक व्यवहार विभाग

❇️ यूएनडीपीआय: संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम भारत.

खुदीराम बोस


भारतातील सर्वात तरूण वयाचा क्रांतीकारक
स्मृतिदिन - ११-०८-१९०५

खुदीराम बोस  : भारतातील सर्वात तरूण वयाचा क्रांतीकारक म्हणून ओळखला जाणारा हा वीर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शहीद झाला. त्याचा जन्म बंगाल मधल्या मेदिनीपूर जिल्ह्यातल्या बहुवेनी या गावात दि. ३ डिसेंबर १८८९ ला झाला. त्याच्या लहानपणीच आई (लक्ष्मीप्रियादेवी) आणि वडील (त्रैलोक्यनाथ) यांचा मृत्यु झाल्याने त्याची मोठी बहीण अनुरूपादेवी आणि तिचे पती अमृतलाल यांनी पालनपोषण केले.

बंगाल प्रांताचे विभाजन करण्याचे ब्रिटीश सरकारने १९०३ साली निश्चित केले. सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजीची तीव्र लाट पसरली. खुदीरामलाही बंगालच्या फाळणीचा निर्णय अन्यायकारक वाटला, देशासाठी काहीतरी करावे असे सारखे वाटू लागल्याने त्याने सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला. सरकारच्या विरूद्ध आंदोलने करणाऱ्यांना पकडून कठोर शिक्षा देण्यात येऊ लागल्या. यात प्रमुख असणाऱ्या न्यायाधीश किंग्ज फोर्ड ला मारूनच सरकारचा विरोध करण्याचे पक्के करण्यात आले. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ या कादंबरीतील वंदे मातरम या गीताने लोकांमध्ये नव संजीवनी पसरविली.

यातच खुदीरामने किंग्ज फोर्ड ला मारण्याची जबाबदारी स्वीकारली. त्याचा सहकारी प्रफुल्ल चक्रवर्ती याच्या सहकाऱ्याने दि. ३० एप्रील १९०५ या दिवशी किंग्ज फोर्ड याच्या गाडीवर बाँब फेकून त्याला मारण्याचे निश्चित झाले. त्याप्रमाणे एक बाँब फेकण्यात आला. परंतु तो चुकून दुसऱ्याच एका गाडीवर फेकण्यात आल्याने त्या गाडीतील दोन महिला ठार झाल्या, किंग्ज फोर्ड मात्र बचावला.

घटनेच्या दुसऱ्या दिवशी खुदीराम पकडल्या गेला तर प्रफुल्लने अटकेपूर्वीच आत्महत्या केली. खुदीरामवर खटला भरण्यात आला. त्याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा शाबीत झाल्याने त्याला दि. ११-०८-१९०५ या दिवशी फासावर जावे लागले. सशस्त्र क्रांतीत बाँबचा उपयोग करणारा खुदीराम पहिला क्रांतीकारक ठरला.

गोपाल गणेश आगरकर:



जन्म : 14 जुलै 1856, करहाड तालुक्यातील टेंभू.
मृत्यू : 17 जून 1895,पुणे
1 जानेवारी 1880 – चिपळूणकर, टिळक व अगरकर ‘न्यू इंग्लिश स्कूल ’ची स्थापना केली.
1884 – डेक्कन एजुकेशन सोसायटी ची स्थापना.
बुद्धीप्रामान्यवाद, वैज्ञानिक द्रुष्टिकोण, एहिक जीवनाची स्मृधता यावर भर .
संस्थात्मिक योगदान :

1881 – लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या केसरीचे संपदकत्व .
15 आक्टोंबर 1888 – ‘सुधारक ’ साप्ताहिक.
गुलामांचे राष्ट्र या पुस्तकात हिन्दी लोकांचा आळशी वृत्तीची टीका.
स्त्रियांनी जकिते घातलीच पाहिजेत याविषयावर निबंध.
अकोल्यातल्या वर्हाघड समाचार या वर्तमान पत्रातून लेखन.
शेक्सपिअरच्या हॅल्मेट या नाटकाचे विकारविलासित या नावाने मराठी रूपांतर.
'डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस' हे पुस्तक.
हिंदुस्थानाचे राज्य कोणासाठी या निबंधात ब्रिटीशांच्या स्वार्थी वृत्तीवर टीका.
वैशिष्टे :

इष्ट असेल ते बोलणार......
राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्यला अधिक महत्व.
हर्बर्ट स्पेन्सरच्या सोशॉलॉजी व एथिक्स आणि जॉन मिलच्या ऑन लिबर्टी व सब्जेक्शन ऑफ वुमन या ग्रंथाचा प्रभाव.
बुध्दिप्रामाण्यवाद व व्यक्तीस्वातंत्र्य या दोन तत्वांना महत्व.
ऐहिक जीवन समृद्ध करावे, पारलौकिक जीवनाचा विचार करणे व्यर्थ, असे मत.
जिवंतपणी स्वतः ची प्रेतयात्रा पहावी लागलेले समाजसुधारक.

महादेव गोविंद रानडे :



जन्म - 18 जानेवारी 1842, निफाड (नाशिक).
मृत्यू - 16 जानेवारी 1901.
रानडे यांना हिन्दी अर्थशास्त्राचे जनक म्हणून संबोधले जात .
तसेच त्यांना पदवीधरांचे मुकुटमणी असेही म्हटले जात असे .
रानडे हे अक्कलकोटी राज्याचे कारभारी होते.
1886 - भारत सरकार अर्थसमितीचे सदस्य वित्तीय समितीवर नियुक्त होणारे पहिले भारतीय.
रानडे हे गोपाल कृष्ण गोखले यांचे गुरु होते .
त्यांना महाराष्ट्राच्या प्रबोधनाचे जनक म्हटले जात .
समाजसुधारकांसाठी सर्वांगीण प्रतिमान मांडणारे प्रज्ञावंत.
रानडे हे आर्थिक राष्ट्रवादी होते .
1887 - सामाजिक परिषद.
1890 - औद्योगिक परिषद.
त्यांना मराठी पत्रकारीतेचे जनक असेही म्हटले जात असे.
संस्थात्मिक योगदान :

1865 - विधवा विवाहोत्तेजक मंडळी (विष्णु पंडित) सहाय्य.
1867 - मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापनेत सहभाग.
1870 - सार्वजनिक सभा स्थापनेत सहभाग.
उद्दीष्ट - थंड गोला घेवून पडलेल्या समाजात विचार, संघटना व कृतीची सांगड घालण्यासाठी व्यासपीठ उभे केले.
वकृत्वोत्तेजक सभा - पुणे.
नगर वचन मंदिर - पुणे.
1875 वसंत व्याख्यान - माला (पुणे).
1882 - हुजूरपागा शाळा (पुणे).
31 ऑक्टोबर 1896 डेक्कन सभा.
1896 - हिंदू विडोज होम.
इन्फेक्शन डेसिजेस हॉस्पिटल स्थापन केले .
मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी, नाशिक.
पुना मार्कटाईल बँक, रशीम गिरणी, लवाद कोर्ट, पुणे रंगशाला यांच्या स्थापनेत सहभाग.
1889 - Industrial As Sociation Of Western India स्थापन.
रानडे यांनी केलेले लेखन :

इंदु प्रकाश (मासिक).
एकेश्र्वरनिष्ठांची कैफियत.
1874 - जबाबदार राज्यपद्धतीची मागणी करणारा अर्ज.
1888 - ऐजेस ऑन इंडियन इकॉनॉमिक्स.
मराठी सत्तेचा उदय.
मराठी पत्रकारितेचा पाया घातला.
निबंध - प्रजावृद्धीचे दुष्परिणाम, मराठा सत्याग्रहातील नाणी व चलन.
'तरुण शिकलेल्या लोकांची कर्तव्य' हा निबंध ज्ञानप्रसारक नियतकालिकात गाजला.
वैशिष्ट्ये :
ग. व. जोशी यांच्या सामाजिक व आर्थिक विचारांचा प्रभाव.
भारतात प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया घातला.
1873 - 11 वर्ष वयाच्या मुलीसोबत पुनर्विवाह.
पंचहौद मिशन प्रकरणी प्रायश्र्चित घेतले.
संमतीवय विधेयकास पाठिंबा.
इंडियन नॅशनल कॉग्रेसला पाठिंबा.
दारिद्र्यनिर्मूलनासाठी औद्योगीकरणाचा उपाय सुचवले.
'महाष्ट्राला पेशवाईनंतर आलेली प्रेतकळा उडवून सचेतन करण्याची काळजी आमरण वाहिनी.' टिळकांचे मत.

धोंडो केशव कर्वे



जन्म - रत्नागिरी, 18 एप्रिल 1858.
मृत्यू - 9 नोव्हेंबर 1962.
1942 - बनारस विद्यापीठाची डि. लिटू.
1958 - भारतरत्न. जन्मशताब्दी वर्ष.
कर्वे यांना महर्षि ही पदवी जनतेने दिली.
स्त्री शिक्षण हा यांच्या कार्याचा केंद्रबिंदू.
विधवविवाहासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला.
संस्थात्मक योगदान :

1893 - विधवा विवाहोत्तेजक मंडळी.
1 जानेवारी 1899 - अनाथ बालिका आश्रम.
1907 - हिंगणे महिला विद्यालय.
1910 - निष्काम कर्मकठ.
1916 - महिला विद्यापीठ, पुणे.
1916 - महाराष्ट्र ग्रामशिक्षण मंडल.
1 जानेवारी 1944 - समता संघ.
1945 - पुणे बलअध्यापक मंदिर, शिशुविहार.
1948 - जातींनीर्मुलन संघ.
1918 - पुणे - कन्याशाळा.
1960 - सातारा - बलमनोहर मंदिर.
वैशिष्टे :

मानवी समता - मासिक.
1893 - विधवेशी पुनर्विवाह.
1894 - पुनर्विवाहितांचा मेळावा.
1915 च्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष.
1928 - आत्मवृत्त या नावाचे आत्मचरित्र.
जपानमधील महिला विद्यापीठाची माहिती देणार्‍या पुस्तकावरून पहिले महिला विद्यापीठ स्थापन.
'अण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील चमत्कार' - आचार्य अत्रे.

राजर्षि शाहू महाराज :



जन्म - 16 जुलै 1874.
मृत्यू - 6 मे 1922.
एप्रिल 1919 भारतात बहुजन समाजाच्या उद्धराचे कार्य करणार्‍या कुर्मी क्षत्रिय महासभा या संस्थेच्या कानपूर येथे भरलेल्या 13 व्या अधिवेशनात महाराजांना 'राजर्षी' ही पदवी बहाल करण्यात आली.
महाराष्ट्रात त्यांच्या शेतकर्‍यांचा खरा राजा म्हणून गौरव केला गेला.
भारतातील वसतिगृहांचे आद्य जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो.
एक कल्याणकारी राजा.
संस्थात्मक योगदान :

ग्रामीण भागातून शहरी भागात शिकण्यास येणार्‍या विविध जातीधर्माच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जातीची वस्तीगृहे स्थापन केली.
1901 - मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना (कोल्हापूर).
नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वस्तीगृह उभारले.
1902 - राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवेमध्ये 5% राखीव जागा.
15 नोव्हेंबर 1906 - किंग एडवर्ड मोहमेडण एज्यु. सोसा. स्थापना.
1907 - मिस क्लार्क बोर्डिंग हाऊस ची स्थापना.
1911 - जाहीरनामा काढून 15% विद्यार्थ्यांना नादरी देण्याची घोषणा.
1911 - शिक्षक प्रशिक्षण व शिक्षकांसाठी मेरीट प्रमोशन योजना.
1917 - माध्यमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.
14 फेब्रुवारी 1919 - पाटील शाळा व त्याला जोडून तलाठी वर्ग सुरू केले.
लष्करी शिक्षणासाठी इन्फंन्ट्री स्कूल.
पुणे येथे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल.
जयसिंगराव घाटके टेक्निकल इन्स्टिट्यूड स्थापना.
1894 - बहुजन समाजातून तलाठयांच्या नेमणुका.
1917 - विधवा विवाहाचा कायदा.
1918 - आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा.
1918 - महार वतने रद्द करून जमिनी रयतवारी पद्धतीने दिल्या.
वेठबिगारी प्रथा कायद्याने बंद केली.
1920 - माणगाव अस्पृश्यता निवारण परिषदेचे आयोजन.
1895 - गुळाच्या व्यापारासाठी शाहूपुरी.
1899 - वेदोक्त प्रकरण - सत्यशोधक चळवळीचे ब्राह्यणोत्तर चळवळीत रूपांतर होण्यास करणीभूत.
यामुळे पुरोहितगिरी व ब्राम्हंणाच्या मक्तेदारीस शह.
1906 - शाहू स्पिनिंग अँड विव्हिंग मिलची स्थापना.
1907 - सरकारी तत्वावर कापड गिरणी मल्लविधेस प्रोत्साहन देण्यासाठी खासबाग कुत्स्यांचे मैदान.
1911 - सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापूर येथे स्थापन झाली.
1911 - भोगवती नदीवर राधानगरी धरण बांधले.
1912 - कोल्हापुरात सरकारी कायदा करून सरकारी चळवळीस प्रोत्साहन.
1916 - निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना.
1918 - कुलकर्णी वेतणे रद्द. तलाठी नेमले.
1918 - आर्य समाजाची शाखा स्थापन करून आर्य समाजाकडे राजाराम कॉलेज चालविण्यास दिले.
1919 - स्त्रियांना क्रूरपणे वागविन्यास प्रतिबंध करणारा कायदा.
1920 - घटस्फोटाचा कायदा. देवदासी प्रथा कायद्याने बंद.
1920 - हुबळी येथील ब्राह्येनेत्तर सामाजिक परिषदेचे आणि भावनगर येथील आर्य समाज परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.
कोल्हापूर शहरास 'वस्तीगृहांची जननी' म्हटले जाते.
ब्राम्ह्येणत्तर चळवळीचे नेतृत्व.
वैशिष्टे :

महात्मा फुले व सत्यशोधक समाजाचा प्रारंभ.
सामाजिक चळवळीच्या क्षेत्रातील म. फुले यांचे खरेखरे वारसदार.
जाती भेदास तीव्र विरोध, लोककल्याणकारी राज्य.
पददलित व मागास वर्गीयांची उन्नती हेच जीवन कार्य.
उदार विचार प्रणालीचा राजा.
राज्य सोडावे लागले तर बेहत्तर, पण मागासलेल्या प्रजेच्या सेवेचे व्रत सोडणार नाही.

कामगारांनो संघटित व्हा व आपले हक्क प्राप्त करून घ्या, हा संदेश. He Was a King But a Democratic King - भाई माधवराव बागल.

शाहू राजा नुसता मराठा नव्हता, तो नव्या युगातला सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष तो महाराष्ट्राच्या विकासाचा स्वाभाविक तरंग होतो. - वि. रा. शिंदे.

टीकाकारांकडून 'शुद्रांचा राजा' असा उल्लेख.

1857 च्या पूर्वीचे उठाव :



आप्पासाहेब भोसल्यांचा उठाव (1817 - 18)

गौड जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने उठाव केला.
बेतूर येथे इंग्रजी फौजेचा त्यांनी पराभव केला.
शीख राजा रनजीसिंहचे लढण्यासाठी मन वळविण्यासाठी प्रयत्न केला.
शेवटी इंग्रजांकडून पराभव पत्कारला.
हटकरांचा उठाव - मराठवाड्यात

नांदेड, परभणी व पैनगंगेच्या प्रदेशात 1800 - 1820 या काळात.
नेता - नौसोजी नाईक
प्रमुख ठाणे - नोव्हा
ब्रिटीशांनी उठाव मोडून काढला. 
खानदेशातील भिल्लाचा उठाव

भिल्लाची खानदेशात लूटमार.याला यशवंतराव होळकरची फूस होती.
नेते - काजरसिंग, भीमा नाईक, भागोजि नाईक, नेवश्य नाईक, कलुबाबा, दौलत नाईक, तंट्या भिल्ल
भिल्लणा वठणीवर आणण्यासाठी लॉर्ड एलफिन्स्टनने प्रयत्न केले.

खानदेशातील भिल्लाचा उठावाचे उपाय:
1825 मध्ये भिल्लाकरिता जमिनी देणे, वसाहती निर्माण करणे.
भिल्लाणा पोलिस दलात नोकर्‍या दिल्या. 
बंडखोर भिल्लाणा वठणीवर आणण्यासाठी इतर भिल्लाचा वापर केला.
काजरसिंग नाईकचा उठाव:

1875 च्या वेळी खानदेशात ब्रिटीशांविरुद्ध भिल्लाच्या उठावात नेतृत्व केले.
पूर्वी ब्रिटीशांच्या पोलिस दलात होता.
ब्रिटीशांचा 7 लाखाचा खजिना लुटला.
1858 च्या 'अंबापाणी' लढाईत भिल्लची ब्रिटीशांशी लढाई स्रियांचाही सहभाग होता.
-____________________________________

आचार्य विनोबा भावे



विचार, उच्चार व आचार या सर्वच बाबतीतील महात्मा गांधीजींचे सच्चे अनुयायी आणि ‘जय जगत’चा घोष करणारे भारतातील थोर आध्यात्मिक नेते !


भारतीय समाजाला एक नवी दिशा व प्रेरणा देणार्‍यांमध्ये विनोबा भावे हे एक महत्त्वाचे नाव आहे. विनोबाजींचा जन्म कुलाबा (रायगड) जिल्ह्यातील गागोदे या गावी झाला. त्यांना सांसारिक मोहापासून मुक्त होऊन अध्यात्माकडे वळायचे होते आणि आपले आयुष्य देशसेवेसाठीही वाहून घ्यायचे होते. हर तर्‍हेच्या बंधनातून मुक्त होऊन समाजाची सेवा करण्यासाठी अन्य कोणत्याही मार्गाकडे मन आकर्षित होऊ नये यासाठी त्यांनी आपली सगळी शैक्षणिक प्रमाणपत्रे चुलीत जाळून टाकली. इंटरची परीक्षा देण्यासाठी ते बडोद्याहून मुंबईला जाण्यासाठी निघाले खरे परंतु वाटेत सुरत स्टेशनवर ते उतरले व तेथून भुसावळमार्गे काशीला गेले. काशीला त्यांनी एका शाळेत नाममात्र वेतनावर इंग्रजी शिकवायला सुरुवात केली.


त्यानंतर ते गांधीजींना भेटण्यासाठी अहमदाबादला गेले. गांधीजी त्यांचा साधेपणा, संयम आणि सेवाभाव पाहून प्रभावित झाले. त्यांनी विनोबाजींना अहमदाबादमधल्या आश्रमातच राहायला सांगितले. पुढील काळात अहमदाबादेतील आश्रमातून ते एका वर्षाची सुट्टी घेऊन वाईला गेले. तेथे त्यांनी प्राज्ञ पाठशाळेत राहून धार्मिक संस्कृत ग्रंथांचा, वैदिक संस्कृतीचा अभ्यास केला.


१९२१ साली ते आपल्या काही सहकार्‍यांसोबत वर्ध्याला जाऊन पोहोचले. तेथे त्यांनी सेठ जमनालाल बजाज यांच्या साहाय्यानेसत्याग्रह-आश्रमाची स्थापना केली.  जमनालाल बजाजांनी विनोबाजींना आपले गुरू मानले होते. या आश्रमात प्रवेश करण्यासाठी लिंग, जात, धर्माचे कोणतेच बंधन नव्हते. विनोबाजींनी वर्ध्याजवळील पवनार येथे ‘परमधाम’ आश्रमाची स्थापना केली. येथे शेती, ग्रामोद्योग व ग्रामसफाई याबाबत प्रयोग केले जात असत.


केरळ प्रांतात वाईकोम नावाचे तीर्थस्थान आहे. येथील शंकराच्या मंदिरात जायचा रस्ता ब्राह्मणांच्या वस्तीतून जायचा. हा मार्ग ब्राह्मणांनी अस्पृश्यांसाठी शेकडो वर्षे बंद ठेवला होता. याविरुद्धच्या १९२४ मधील सत्याग्रहाचे नेतृत्व विनोबाजींनी केले.

 

स्वातंत्र्यलढ्यात १९३२ साली त्यांना अटक झाली. धुळे येथील जेलमध्ये त्यांनी गीतेवर प्रवचन द्यायला सुरुवात केली. जेलमध्येच ही प्रवचने साने गुरुजींनी लिहून घेतली व पुढे ती ‘गीता प्रवचने’ म्हणून प्रकाशित करण्यात आली. ‘गीताई’ या ग्रंथाद्वारे विनोबाजींनी गीतेचा मराठी अनुवाद केला. (सर्वसाधारण वाचकासह आध्यात्मिक साधक व सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनाच ‘गीताई’ आजही मार्गदर्शक ठरते आहे.) त्यांना गुजराती, बंगाली, उडिया, तेलुगू, कन्नड, मल्याळम्‌, उर्दू, अरबी, फ्रेंच आणि लॅटिन या भाषा अवगत होत्या. जीवनदृष्टी, अभंगव्रते, स्वराज्यशास्त्र असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले.


१७ ऑक्टोबर, १९४० पासून म. गांधींनी ब्रिटिश सरकारच्या धोरणाविरुद्ध वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात केली. यातील पहिले सत्याग्रही म्हणून गांधींजींनी विनोबा भावे यांची निवड केली होती. विनोबाजी कॉंग्रेसचे सच्चे कार्यकर्ते होते. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे कॉंग्रेसचे वार्षिक अधिवेशन भरले होते. या अधिवेशनाची सर्व पूर्वतयारी विनोबाजींच्याच नेतृत्वाखाली करण्यात आली होती.



स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ‘सर्वोदय समाजाची स्थापना केली. १९५१ साली त्यांची  अभूतपूर्व अशी ‘भूदान’ चळवळ सुरू झाली. या चळवळीचा प्रारंभ आंध्र प्रदेशातील नालगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली या गावातून झाला. यात त्यांनी श्रीमंत शेतकर्‍यांना आपल्या जमिनीचा काही हिस्सा भूमिहीन, हरिजन लोकांना दान करण्याचे आवाहन केले. हळूहळू त्यांनी चळवळीचा व्याप वाढवत नेला. आंध्र प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामीळनाडू, कर्नाटक, ओरिसा व महाराष्ट्र या सर्व राज्यांत भूदान चळवळीसाठी विनोबाजी पायी फिरले. सर्व राज्यांत त्यांना प्रचंड, सकारात्मक प्रतिसाद मिळाला. ग्रामदान, ग्रामराज्य, संपत्तीदान या संकल्पनांचाही त्यांनी चळवळीत अंतर्भाव केला. या अनोख्या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी शांततापूर्ण मार्गाने असंतुलित जमीन मालकीचा प्रश्न सोडवण्यात यश मिळवले. याचळवळीतून हजारो एकर जमीन त्यांनी भूमिहीनांना बहाल केली. ‘सब भूमि गोपाल की’ हा या चळवळीचा नारा होता.  दरम्यान आपल्या आध्यात्मिक, मानवतावादी विचारांच्या साहाय्याने चंबळच्या खोर्‍यातील दरोडेखोरांचे मतपरिवर्तनही केले. राजकीय कार्य, भूदान चळवळ या गोष्टी एकीकडे करत असतानाच समांतरपणे, सातत्याने चालू असलेली प्रखर आध्यात्मिक साधना हे त्यांच्या जीवनाचे मुख्य वैशिष्ट्य होय.


आचार्य विनोबाजींनी ऋग्वेदास, वेदान्तसुधा, गुरूबोधसार, भागवतधर्म प्रसार इत्यादी ग्रंथांच्या माध्यमातून आपले आध्यात्मिक विचार मांडले. तसेच त्यांनी ‘मधुकर’, ‘महाराष्ट्र धर्म’ या नियतकालिकांतूनही  लेखन केले. धर्म, अध्यात्म, राजकारण, देशभक्ती, मानवतावाद, सत्याग्रह, अहिंसा इत्यादी विषयांवरील लेखन त्यांनी नियतकालिकांतून केले. त्यांचे लेखन आणि आध्यात्मिक व राजकीय कार्य यांमुळे त्यांना जयप्रकाश नारायण, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांसारखे अनुयायी लाभले.


अशा या प्रतिभावंत, निश्चयी महात्म्याचे १५ नोव्हेंबर १९८२ रोजी निधन झाले. १९८३ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ (मरणोत्तर) पुरस्काराने गौरविण्यात आले.

साने गुरुजी


महाराष्ट्राच्या भावशक्तीचे प्रतीक असलेला राष्ट्रभक्त व जनतेसाठी अंत:करण पिळून लिहिणारा एकमेवाद्वितीय साहित्यिक !


साने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने ! त्यांचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून काही काळ नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वत:च्या उदाहरणातून स्वावलंबनाचे  धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील तत्त्वज्ञान मंदिरात त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.


१९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. या संदर्भात गुरुजी म्हणतात ‘शाळेत जे शिक्षण तुम्हाला घेता येत नाही, असे खरे विचारप्रवर्तक शिक्षण, मने बनविणारे, विचार दृढ करणारे शिक्षण हे मासिक तुम्हाला देणार आहे.’ शिक्षकांबद्दल ते म्हणत, ‘खरा शिक्षक तो की, ज्याच्याभोवती गुळाच्या ढेपेला ज्याप्रमाणे मुंगळे चिकटतात, तशी मुले गोळा होतात.’


त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वत: खादीचाच वापर करत असत. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. ‘कॉंग्रेस’ नावाचे साप्ताहिक, दुष्काळात शेतकर्‍यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील कॉंग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी कार्य, १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार, राष्ट्र सेवा दलाचे कार्य - या माध्यमातून त्यांनी राजकीय कार्य केले.  ‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांनी देशभक्तिपर कविता प्रसिद्ध केल्या. त्यातील ‘बलसागर भारत होवो’ सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने  त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.


‘बलसागर भारत होवो। विश्र्वात शोभूनी राहो।।

राष्ट्रार्थ प्राण हे उरले। मी सिद्ध मराया हो ।।’


या काव्यपंक्तींनी त्या काळात प्रेरणा निर्माण केली होती. आजही ही कविता तेवढीच परिणामकारक आहे.


समाजातील जातिभेद,अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसर्‍या पांडुरंगाला खर्‍या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले.


स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या माध्यमातून त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते.ते स्वत: तामीळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबर्‍या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो.मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. आजही त्यांच्या कविता सामाजिक कार्यकर्त्यांना प्रेरणा देतात, काही कविता शाळाशाळांतून प्रार्थना म्हणून म्हटल्या जातात. साने गुरुजींनी स्फुर्तिदायी कविता लिहिल्या, ‘श्यामची आई’ सारखी सार्वकालिक सर्वोत्कृष्ट कादंबरी लिहिली;  त्यांनी ‘स्त्री जीवन’ हा जात्यावरच्या ओव्यांचा संग्रहही लिहिला, तसेच ‘भारतीय संस्कृती’ या तत्त्वज्ञानात्मक ग्रंथाचे लेखनही केले. त्यांनी अन्य भाषांतील चांगल्या पुस्तकांचे मराठी भाषांतरही केले. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. ‘श्यामची आई’ ही सुप्रसिद्ध कादंबरीही त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित ‘गीता प्रवचने’ सुद्धा विनोबजींनी (धुळे येथील तुरुंगातच) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला.


साने गुरुजी हे अतिशय हळव्या मनाचे व्यक्तिमत्त्व होते. विनोबाजी त्यांना यथार्थतेने अमृताचा पुत्र म्हणत. स्वातंत्र्यासाठी त्यांनी पराकोटीचा त्याग करून , मनापासून प्रयत्न केले होते. स्वतंत्र देशाची सुंदर स्वप्ने त्यांनी पाहिली होती. ती स्वप्ने साकार करण्यासाठी ते कष्टही करत होते. पण त्यांचे आदर्श विचार, त्यांच्या कल्पनेतील भारत यांच्या विपरीत अनुभव त्यांना येऊ लागले. त्यांच्या संवेदनशील मनाला हा विरोधाभास सहन झाला नाही. मनाच्या हताश अवस्थेतच त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. म्हणूनच आचार्य अत्रे यांनी त्यांच्याबद्दल ‘मृत्यूचे चुंबन घेणारा कवी’ असे उद्गार काढले. ६० वर्षांनंतर आजही साधना हे साप्ताहिक त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चालविले जात आहे, तसेच आंतरभारती चळवळही त्यांचे अनुयायी पुढे नेत आहेत.

समार्ट मुंबईचे शिल्पकार!



नामदार जगन्नाथ तथा नाना शंकरशेठ यांचा, ३१ जुलै हा स्मृतिदिन. संस्कृत विषयातील शिष्यवृत्ती देणारे समाजसेवक म्हणून नाना महाराष्ट्रास माहीत आहेत पण, ते भारतीय रेल्वेचे जनक व आधुनिक मुंबईचे आद्य शिल्पकारही होते. नानांनी स्त्रीशिक्षण, पुनर्विवाह, सती बंदी व सोनापूर स्मशानभूमीस दिलेली जमीन तसेच आर्थिक सहकार्यातूनही समाजकार्य साधले. नानांच्या जीवनाचा बहुतांश हिस्सा या घडामोडींचा एक अविभाज्य घटक होता, हे अनेकांना माहीत नाही! नानांच्या सर्व कार्याचा विस्तृत वृत्तांत येथे मांडणे अशक्य आहे म्हणून, त्यांच्या १५१व्या स्मृतिदिनानिमित्त, त्यांच्या प्रेरणेतून घडलेल्या स्थापत्यविषयक कार्याचा हा आढावा.

मुंबईच्या आरंभापासून ते आजतागायत, 'व्यापार' हाच या शहराचा स्थायी स्वभाव बनून राहिला आहे. म्हणूनच मुंबईला 'सिटी ऑफ गोल्ड' किंवा देशाची 'आर्थिक राजधानी' असे म्हटले जाते. अठरा व एकोणिसाव्या शतकात मुंबईत झालेल्या घडामोडींना खूप महत्त्व आहे. त्या घडामोडीतूनच नानांच्या स्मृतीतील वैभवशाली चेहरा असलेली 'स्मार्ट मुंबई' निर्माण झाली.

१८व्या शतकाच्या पूर्वाधात, मुंबईसाठी सार्वजनिक सभागृहाची गरज ओळखून 'टाऊन हॉल' इमारतीचा प्रस्ताव राज्यपाल जोनाथन डंकनच्या राजवटीत मांडला गेला. या टाऊन हॉलचे बांधकाम सन १८२०मध्ये सुरू झाले व १८३३मध्ये पूर्ण झाले. ही भव्य इमारत इंग्रजांच्या सामर्थ्याचे पहिले प्रतीक म्हणून ओळखली जात असे. या इमारतीचा उपयोग त्या काळात अनेक कार्यासाठी केला गेला. यात कायदे मंडळाची बैठक, ‌मुंबई विद्यापीठाचा पदवीदान समारंभ एवढेच नव्हे तर १८६५ पासून १८७१ पर्यंत म्युनिसिपल कमिशनरला जागेच्या अडचणीमुळे जे. पी. मंडळाच्या सभादेखील याच हॉलमध्ये घ्याव्या लागत. या जागेतच एल्फिन्स्टन कॉलेज, मुंबई विद्यापीठ, विधिमंडळ व नगरपालिकेचा कारभार केला गेला. या सर्व घडामोडीत नानांचा प्रत्यक्ष सहभाग होता. सन १८३४ पासून एशियाटिक लायब्ररी येथे सुरू करण्यात आली. या लायब्ररीचा प्रथम सभासद होण्याचा मानही नानांनाच दिला गेला.

परदेशातील दळणवळण जहाजे व बोटीतून होत असे. पण देशांतर्गत दळणवळण सुलभ होऊन व्यापाराला गती यावी म्हणून मुंबईत १८४३ साली 'ग्रेट वेस्टर्न रेल्वे कंपनी' स्थापन केली. या समितीतील आद्य प्रवर्तकात नाना शंकरशेठ, जमशेठजी जीजीभाई व सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश अर्स्किन पेरी व इतर प्रवर्तक होते. या कंपनीच्या कार्यालयासाठी जागाही नानांनी त्यांच्या वाड्यात देऊ केली.

मुंबई-ठाणे रेल्वे लाइनचे काम सुरू असतानाच ब्रिटिश सत्तेचा उच्चांक दर्शवणारी दुसरी घटना म्हणजे आजची छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस ही इमारत होय. शे-सव्वाशे वर्षांपूर्वी, ज्या उद्देशाकरिता ही इमारत बनवली गेली तेच कार्य आजही चालते व जगातील सर्वोत्तम रेल्वे इमारत म्हणूनही तिची ओळख आहे. या इमारतीचे आराखडे फ्रेडिक विल्यम स्टीव्हन्स या ब्रिटिश आर्किटेक्टने, गॉथिक शैलीत बनवले होते. या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील कमानीत नानांचे स्मृतिशिल्प बसवण्यात आले आहे.

सन १८६४ मध्ये म्युनिसिपल अॅक्ट पास झाला. सुरुवातीस नगर शासनाचे काम गव्हर्नरच्यामार्फत चालत असे. मुंबई फोर्ट परिसरातील धनिकांनी मुंबई सेंट्रल, परळ व आजच्या सीएसटी स्टेशनच्या पुढे थेट भायखळ्यापर्यंत जागा घेऊन बंगले बांधण्यास सुरुवात केली. या दरम्यान फोर्ट परिसरात अनेक निवासी, नागरी व सरकारी इमारतींचे काम सुरू झाले.
पालिकेतील वाढलेल्या कामाचे महत्त्व लक्षात घेऊन तीन म्युनिसिपल कमिशनर नेमण्यात आले. त्यानुसार मुंबई नगरपालिकेचे पहिले कार्यालय गिरगावातील एका वाड्यात सुरू केले होते. त्यानंतर ऱ्हिदम हाऊस या इमारतीत हलवले. मंडळाच्या सभेसाठी जागा अपुरी पडत असल्याकारणाने हे कार्यालय १८६६-१८९२ पर्यंत आर्मी-नेव्ही या इमारतीत नेण्यात आले. पालिकेच्या वाढत्या कामाचा व्याप व भविष्यातील हालचालीचा वेध लक्षात घेऊन नाना व जमशेठजी जीजीभाईंनी पालिकेसाठी जागेचा शोध सुरू केला. मुंबईतील नागरिकांना पालिकेत येणे सोयीचे जावे म्हणून सर्वानुमते सीएसटी (VT) समोरील मोकळ्या जागेची निवड केली. ही जागा निवडण्यामागचे कारणही केवढे सयुक्तिक होते हे आजच्या परिस्थितीवरून समजून येते. यानंतर आराखडा बनवण्यासाठी योग्य वास्तुरचनाकाराचा शोध घेण्याचे काम सुरू झाले. नियोजित पालिकेच्या आराखड्याचे काम, रेल्वे स्थानक व परिसरातील इमारतींच्या बाह्य सौंदर्याशी साधर्म्य साधू शकेल, अशा वास्तुरचनाकारासच देण्यात यावे असा ठराव पालिकेतील नगरसेवकांनी पास केला. सरतेशेवटी हे काम स्टीव्हन्सलाच करावे लागले! १८८३-९३ या दरम्यान आर्किटेक्ट स्टीव्हन्स सरकारी नोकरीत नसल्याने इंग्लंडमध्येच आराखडे बनवून पाठवले होते. स्टीव्हन्सने पालिकेची इमारत पूर्णतः इटालियन गॉथिक शैलीत न बनवता त्यात भारतीय इस्लामी शैलीतील घुमट व मनोऱ्यांचाही वापर खुबीने केला आहे. या सर्व घडामोडींतून त्या काळातील नगरसेवकांकडे दूरदृष्टी व वास्तुसौंदर्यशास्त्राबद्दल असलेल्या जाणिवेची प्रचिती येते!
मुंबईच्या जडणघडणीत फक्त ब्रिटिश राज्यकर्तेच नव्हे तर, अनेक भारतीय समाजसुधारकांनी योगदान दिले आहे. अनेक धनिक, समाजकल्याणाच्या हेतूने सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, स्थापत्य व इतर माध्यमातून, सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत असत. या सामाजिक बांधिलकीतून समाजसेवेच्या विविध प्रथा निर्माण झाल्या.

नानांचा प्रत्यक्ष संबंध आलेल्या स्थापत्यविषयक नामावलीत ग्रँट मेडिकल कॉलेज, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, डॉ. भाई दाजी लाड संग्रहालय, जिजामाता उद्यान, मुंबई विद्यापीठ, एल्फिन्स्टन कॉलेज, नाना चौकातील भवानीशंकर देऊळ, जे. जे. हॉस्पिटलसारख्या सार्वजनिक हिताच्या इमारतींचा समावेश आहे. नानांनी एकनिष्ठेने देशबांधवांसाठी केलेल्या सेवेचे प्रतीक म्हणून ते हयात असतानाच पुतळ्याच्या रूपाने त्यांचे स्मारक उभारण्यात यावे अशा अर्थाचा ठराव प्रो. दादाभाई नवरोजी यांनी मांडला व तो सभेत पासही करून घेतला. दुर्दैवाने पुतळ्याचे काम नानांच्या हयातीत पूर्ण होऊ न शकल्यामुळे हा पूर्णाकृती पुतळा, नानांच्या समकालीनांचे पुतळे व तसबिरी ठेवण्यात आल्या आहेत, त्या टाऊन हॉल इमारतीच्या तळमजल्यावर बसवण्यात आला. म्हणूनच, नाना हेच खरे 'मुंबईचे अनभिषिक्त' सम्राट होते असा उल्लेख आचार्य प्र. के. अत्रेंनी केला होता, हे पटण्यासारखे आहे.

नानांनी समाजहिताच्या भावनेतून मुंबईसाठी केलेले कार्य स्मारकरूपातून सदैव स्मरणात रहावे असे मुंबईकरांना वाटणे साहजिक आहे. स्मारकाच्या जागेसाठी अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेने पुढाकार घेऊन व स्मारक समितीच्या सन्माननीय सदस्यांनी सुरेंद्रभाऊ वि. शंकरशेठ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. अॅड. मनमोहन चोणकर हे समितीचे सरचिटणीस आहेत. अॅड. चोणकरांनी नगरसेवक असताना स्मारकासाठी भूखंडाची मागणी महानगरपालिकेत मांडली. शहर प्रशासनाने, दि. २५ ऑगस्ट २०१४ रोजी सभागृहातील सर्व नगरसेवकांनी नाममात्र प्रतिवर्ष १ रु. भाड्याने, नाना शंकरशेठ स्मारक प्रतिष्ठान समितीस, वडाळा येथे १५०० चौ. मी. चा भूखंड देण्याचा ठराव मंजूर केला. सेना पक्षप्रमुख, महापौर, महानगरपालिका आयुक्त व सुधार ‌समिती सदस्यांनी सहकार्य केले. मुंबई महानगरपालिकेने, या स्मारकास नाममात्र दरात भूखंड देऊन सहकार्य केले. महाराष्ट्र सरकारनेही स्मारकाच्या यापुढील कार्यसिद्धीसाठी मोठ्या रकमेची आर्थिक मदत देऊन आपले कर्तव्य पूर्ण करावे, असे आवाहन मुंबईतील नागरिकांच्या वतीने या लेखाच्या माध्यमातून मी करू इच्छितो. आज घडत असलेल्या मुंबईचा चेहरा व वास्तुसौंदर्यशास्त्रीय ओळख पुढील पिढ्यांकरिता कशी राहील, हे सांगणे कठीण आहे. मुंबईचे आद्य शिल्पकार म्हणून गौरवलेल्या नानांच्या नियोजित इमारतीच्या अंतर्बाह्य आराखड्यातून त्यांच्या स्मृतीतील मुंबईचे प्रतिकात्मक साधर्म्य साधणारी वैशिष्ट्ये जर का अंतर्भूत करू शकलो तर ती खऱ्या अर्थाने वाहिलेली श्रद्धांजली ठरेल!

प्राचीन भारत इतिहास:

* वेद काल

०१. गुत्समद, विश्वमित्र, वामदेव, भारद्वाज, अत्री आणि वशिष्ट या ऋषींनी सुक्त अथवा मंत्रांची रचना केली आहे. लोपामुद्रा, घोष, शची आणि पौलोमी या प्रमुख ऋष्निया आहेत.
०२. आयुर्वेद हा ऋग्वेदाचा, धनुर्वेद हा यजुर्वेदाचा, गंधर्ववेद हा सामवेदाचा, शिल्पवेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे. सामवेद कौथुम, रणायानीय आणि जैमिनीय तीन शाखांमध्ये विभागलेला आहे.
०३. आचार्य अश्वनी कुमार, धन्वंतरी, बाणभट्ट, सुश्रुत, माधव, जीवन व लोलींबराज हे आयुर्वेदाचे रचनाकार आहेत.
०४. ऐतरेय व कौशित्की हे ऋग्वेदाचे दोन ब्राह्मण आहेत. तैत्तरीय हा कृष्ण यजुर्वेदाचा तर शतपथ हा शुक्ल यजुर्वेदाचा ब्राह्मण आहे. तांडव, पंचविश, सद्विश, छांदोग्य हे सामवेदाचे ब्राह्मण आहेत.
०५. आरण्यकामध्ये आत्मा. मृत्यू, जीवन यांचे वर्णन केलेले आहे.  ऐतरेय व कौशित्की हे ऋग्वेदाचे दोन आरण्यक आहेत. ऐतरेय आरण्यकाचे रचनाकार महिदास ऐतरेय आहेत. तैत्तरीय हा कृष्ण यजुर्वेदाचा आरण्यक आहे. सामवेद आणि अथर्ववेदाला आरण्यक नाही.
०६. ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, तैत्तरीय, ऐतरेय, छान्दोक्य, वृहदारण्यक, श्वेताश्वतर, कौशित्की, महानारायण इत्यादी प्रमुख उपनिषद आहेत.

* ऋग्वैदिक काळ

०७. ऋगवैदिककाळात गळ्यात 'निष्क', कानात 'कर्णशोभन' आणि कपाळावर 'कुंभ' नावाची आभूषणे परिधान केली जात.
०८. ऋगवैदिककाळात गाय, म्हैस, शेळ्या, घोडा, हत्ती आणि उंट या प्राण्यांचे आर्यांद्वारे पालन केले जात असे.
०९. ऋगवैदिककाळात भीषज चिकित्सेचे कार्य करीत असे.
१०. ऋगवैदिककाळात आर्य सूर्याची उपासना करीत असे. सूर्याला सविता मित्र, पूषण तसेच विष्णूचा अवतार मानले जात असे. सूर्याला देवतेचे नेत्र असे संबोधले जात असे.
११. ऋगवैदिककाळात अग्नीला देवतेचे मुख असे म्हटले जात असे. अग्नीला आर्यांचे पुरोहित असे मानले गेले आहे. आर्यांचा विचार होता कि यज्ञातील आहुती अग्नी देवतेपर्यंत पोहोचवीत असे. त्या काळात वरून देवतेला आकाश देवतेच्या रुपात पुजिले जात असे.
१२. ऋगवैदात उषा, सीता, पृथ्वी, अरण्यांनी, रात्री यांची आराधना देवीच्या रुपात केली गेली आहे. कृषी संबंधित देवी म्हणून सीतेचा उल्लेख गोमील गृह्य सूत्र तसेच परस्पर गृह्य सूत्रांमध्ये झाला आहे.
१३. ऋगवैदिककाळात व्यापाऱ्यांना 'पणि' म्हटले जात असे. हे लोक आर्यांच्या पाळीव पशूंची चोरी करत असत. 'पणि' लोकांपेक्षा जास्त हेटाळनी 'दस्यू' लोकांची होत असे. 'दस्यू' काळ्या रंगाचे, यज्ञ विरोधी व शिश्नदेवाचे पूजक होते.
१४. ऋगवैदिककाळात गाय ही अर्थव्यवस्थेचा कणा होती.
१५. ऋगवैदिककाळात गायीला 'अधन्या', युद्धाला 'गलिन्टी', पाहुण्यांना 'मोहन' आणि पुत्रीला 'दुहीन्ति' असे संबोधले जात असे.
१६. ऋगवैदात 'वशिष्ठ' यांना उर्वशीचा मानसपुत्र तसेच वरुणाच्या वीर्यातून एका मातीच्या घागरीतून जन्मलेला म्हटले जाते. अगस्त्य यांना सुद्धा मातीच्या घागरीतून जन्मलेला असे म्हटले जाते.
१७. बल्बुभ तसेच तरुक्ष द्वास हे सरदार होते. पुरोहितांना दानधर्म करून आर्य समाजात त्यांनी उच्च स्थान प्राप्त केले होते.
१८. ऋग्वेदात इंद्राचा सर्वात जास्त वेळेस उल्लेख केला आहे. त्याच्या खालोखाल वरुणाचा उल्लेख केलेला आहे. प्रजापतीचा उल्लेख आदी पुरुष म्हणून केलेला आहे. देवता हे त्याचेच वंशज होते.
१९. ऋग्वेदात राजाचा उल्लेख 'गोप्ता जनस्य' असा आहे. ऋग्वेदात भूमी अधिकाऱ्याला 'व्राजपति', सैन्य अधिकाऱ्याला 'ग्रामणी' आणि कुटुंबाच्या प्रमुखाला 'कुलूप' असे संबोधले जात असे.
२०. 'सोम' हा वनस्पतींचा देवता होता. सोम हे एक मादक पेयसुद्धा होते. ज्याच्या बनविण्याचा विधी ऋग्वेदात सांगितला आहे.

* उत्तर वैदिककाळ 

२१. उत्तर वैदिक कालीन साहित्य इसवी सन पूर्व ११०० ते ६०० या काळात रचलेले आहे. या काळात मातीचे चित्रित भांडी व लोखंडाच्या औजारांचा वापर केला जात असे. पूर्व वैदिक काळातील मुख्य धान्य बार्ली होते पण उत्तर वैदिक काळात मुख्य धान्य उत्पादन भात व गहू होते.
२२. उत्तर वैदिक काळात राजांनी राजसूय यज्ञ, अश्वमेध यज्ञ व वाजपेय यज्ञ करायला सुरुवात केली.
२३. उत्तर वैदिक काळात गोत्र परंपरा तसेच गोत्राच्या बाहेर लग्न करण्याची परंपरा सुरु झाली.
२४. उत्तर वैदिक काळाच्या साहित्यात तीन आश्रमांचा उल्लेख मिळतो. ब्रह्मचर्य, गृहस्थ व वानप्रस्थ. सन्यास आश्रमाचा स्पष्टपणे उल्लेख आढळत नाही.
२५.  उत्तर वैदिक काळात 'सोम' वनस्पती मिळेनासे झाल्याने. दुसऱ्या पेयांचा प्रयोग करण्यास सुरुवात झाली.
२६.  उत्तर वैदिक काळात सोने व चांदीचा उपयोग आभूषणे व भांडी बनविण्यासाठी केला जात असे. तर इतर धातूंचा वापर इतर उपकरणे बनविण्यासाठी केला जात असे.
२७.  उत्तर वैदिक काळात व्यापाऱ्यांनी आपआपले गट तयार केले होते. आर्यांच्याद्वारे समुद्रव्यापार सुद्धा केला जात असे. व्यापारासाठी निष्क, शतमान आणि कृष्णाल या मुद्रांचा वापर केला जात असे.
२८. उत्तर वैदिक काळात ऋग्वैदिक काळाच्या तुलनेत धर्माचे स्वरूप अधिकच जटील होत गेले. यज्ञात बळींचे तसेच पुरोहितांचे महत्व वाढत गेले. या काळात अनेक प्रकारचे यज्ञ केले जाऊ लागले.

कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान - अटल बिहारी वाजपेयी



वाजपेयी 3 वेळा भारताचे पंतप्रधान झाले.

ते पहिल्यांदा 1996 मध्ये पंतप्रधान झाले. मात्र, त्यांना बहुमत सिद्ध करता आले नाही.

यानंतर ते 1998 आणि 1999 मध्ये पंतप्रधान झाले आणि 2004 पर्यंत सत्तेवर होते. आपला कार्यकाळ पूर्ण करणारे वाजपेयी हे पहिले बिगर-काँग्रेसी पंतप्रधान ठरले.

📚 जवाहर लाल नेहरू सर्वाधिक काळ राहिले पंतप्रधान -

पंडित जवाहरलाल नेहरू, हे सर्वाधिक काळ देशाचे पंतप्रधान राहिले आहेत. ते तब्बल 16 वर्षे 286 दिवस पंतप्रधान पदावर कार्यरत होते.

तर दुसरा नंबर त्यांची मुलगी इंदिरा गांधी यांचा लागतो. त्या 15 वर्षे 350 दिवस देशाच्या पंतप्रधान होत्या.

📚 गलजारी लाल नंदा यांच्या नावावर सर्वात कमी काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम -

सर्वात कमी काळ भारताच्या पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम गुलजारी लाल नंदा यांच्या नावावर आहे.

लाल बहादुर शास्त्री यांच्या निधनानंतर ते 11 जानेवारी 1966 पासून ते 24 जानेवारी 1966 पर्यंत 13 दिवसांपर्यंत हंगामी पंतप्रधान होते.

यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतरही ते 27 मे 1964 ते 9 जून 1964 पर्यंत हंगामी पंतप्रधान होते.

पिके आणि त्यावरील रोग व किडी




✍️भात
खोडकिडा, लष्करी अळी, करपा,

✍️जवारी
खोडमशी , खोडकिडा, मावा, तुडतुडे, मिजमाशी,खडखड्या,

✍️बाजरी
केवडा,गोसावी,अरगट, भुंगे किंवा डाळी,

✍️गहू
तांबेरा, तुडतुडे, मावा. 

✍️बटाटा
बांगडी रोग, हुमणी,

✍️ भईमूग
टिक्का, तुडतुडे, हुमणी, वाळवी, फुलकिडे, पाने खाणारी अळी

✍️हरभरा
घाटीअळी, स्टंट, मर

✍️ऊस
कानी रोग,लोकरी मावा,

✍️ कापूस
लाल्या, करपा,बॊडअळी, पांढरी माशी, मावा, फूल किडे,

✍️मिरची
बोकड्या, चुराडा मुरडा,

✍️ सर्यफुल
केसाळ अळी, तुडतुडे, पांढरी माशी,

अल्टरनेरिया -  या रोगामुळे पानावर तांबेरा व ठिबके दिसतात.

❣️

भारतातील 9 प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिरे



जन्माष्टमीनिमित्त देशभरातील कृष्णा मंदिरांमध्ये खास प्रकारचे सौंदर्य पाहायला मिळते. प्रत्येक मंदिराचे स्वतःचे खास वैशिष्ट्य आहे. उत्तर भारत ते दक्षिण भारतात श्रीकृष्णाची सुंदर आणि विशाल मंदिरे आहेत. चला अशाच मंदिरांबद्दल जाणून घेऊया...

1. द्वारकाधीश मंदिर द्वारका, गुजरात : हे गुजरातमधील सर्वात प्रसिद्ध कृष्ण मंदिर आहे, त्याला जगत मंदिर म्हणून देखील ओळखले जाते. हे मंदिरही चार धाम यात्रेचा मुख्य भाग आहे. चार धमांपैकी हा पश्चिम धाम आहे.

हे मंदिर गोमती खाडीवर आहे आणि 43 मीटर उंचीवर हे मुख्य मंदिर आहे. या मंदिराला भेट दिल्याशिवाय गुजरातमधील तुमची यात्रा पूर्ण होणार नाही. जन्माष्टमीच्या काळात येथे उत्तम वातावरण असते. संपूर्ण मंदिर आतून आणि बाहेरून सुशोभित केलेले आहे.

2. श्री बांके बिहारी मंदिर, वृंदावन : भगवान श्रीकृष्णाने आपले बालपण वृंदावनात घालवले होते. हे सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिर देखील आहे. भगवान श्रीकृष्णाला बांके बिहारी असेही म्हणतात, म्हणूनच या मंदिराचे नाव श्री बांके बिहारी असे ठेवले आहे.

3. द्वारकाधीश मंदिर, मथुरा : हे मथुरामधील दुसरे सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे. जिथे भगवान कृष्णांच्या काळ्या रंगाच्या पुतळ्याची पूजा केली जाते. तथापि, येथे राधाची मूर्ती पांढरी आहे.

एक प्राचीन मंदिर असल्याने त्याची वास्तुकला देखील भारताच्या पुरातन वास्तूने प्रेरित केली आहे. इथे येऊन आपणास वेगळे वाटेल. जन्माष्टमीचा सण येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जन्माष्टमी दरम्यान येथील वातावरण बर्‍यापैकी नेत्रदीपक असते.

4. श्रीकृष्ण मठ मंदिर, उडुपी : हे कर्नाटकातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळही आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे खिडकीच्या नऊ छिद्रांमधून येथे देवाची पूजा केली जाते.

यामुळे दरवर्षी पर्यटकांचा ओघ कायम राहतो, परंतु जन्माष्टमीच्या दिवशी त्या ठिकाणचे सौंदर्य पाहून ते सुंदर बनते. संपूर्ण मंदिर फुले व दिवे यांनी सजलेले आहे. उत्सवाच्या दिवशी खूप गर्दी असते आणि दर्शन घेण्यासाठी तुम्हाला 3 ते 4 तास थांबावे लागेल.

5. जगन्नाथ पुरी, उड़ीसा : भगवान कृष्ण ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिरात आपला मोठा भाऊ बलराम आणि बहिण सुभद्रासमवेत बसले आहेत. जन्माष्टमीपेक्षाही वार्षिक रथ यात्रेदरम्यान सौंदर्य आहे. ही रथ यात्रा धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाची आहे. त्यात भाग घेण्यासाठी आणि जगन्नाथचा रथ ओढण्यासाठी जगभरातून भाविक पुरीला पोहोचतात.

दरवर्षी या रथयात्रेचे आयोजन केले जाते. यासाठी तीन प्रचंड रथ तयार आहेत. सर्वात पुढे बलराम जीचा रथ आहे, त्यानंतर बहिण सुभद्रा आणि भगवान कृष्ण यांचा रथ त्यांच्या रथात फिरतो.

6. बेट द्वारका मंदिर, गुजरात : गुजरातमधील द्वारकाधीश मंदिराखेरीज बेट द्वारका हे आणखी एक प्रसिद्ध मंदिर आहे. त्याचे नाव भद्य द्वारका असले तरी गुजराती भाषेत त्यास बेट द्वारका असे म्हणतात.

अर्पण म्हणजे भेट आणि भेट देखील. या दोन गोष्टींमुळे या शहराचे नाव पडले. वास्तविक असे मानले जाते की याच ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने त्याचा मित्र सुदामा भेटला. या मंदिरात कृष्णा आणि सुदामाच्या मूर्तींची पूजा केली जाते.

7. सांवलिया सेठ मंदिर, राजस्थान : हे गिरीधर गोपाळजींचे प्रसिद्ध मंदिर आहे. येथे ते व्यवसायाला देव बनविण्यास आपला व्यवसाय भागीदार बनवतात, ज्यांना त्यांच्या व्यवसायात अडचणी येत आहेत. त्यांनी एकदा येथे अवश्य  गेले पाहिजे चित्तौडगड, राजस्थान येथे भगवान श्रीकृष्णाचे मंदिर आहे, जे मीराबाईशी संबंधित आहे.

8. गुरुवायूर मंदिर, केरळ : या मंदिरात श्रीकृष्णाच्या बाल रूपांची पूजा केली जाते. याशिवाय भगवान विष्णूचे दहा अवतार देखील मंदिरात दर्शविले गेले आहेत. हे मंदिर दक्षिणेचे द्वारका आणि भुलोकाचे बैकुंठ या नावाने देखील ओळखले जाते.

9. भालका तीर्थ, गुजरात : सोमनाथ येथील भालकाचे मंदिर म्हणजे झाडाखाली ध्यान करणार्‍या श्रीकृष्णाला एका शिकारीने मृगच्या मायाजाने गोळ्या घालून ठार केले. येथूनच श्रीकृष्णाने पृथ्वी सोडली आणि स्वर्गात गेले. तसेच या जागेला हिरण, कपिला आणि सरस्वती नदीचा संगम म्हणतात. हे मंदिर वटवृक्षाखाली आहे ज्याखाली कान्हा बसला होता.

वाचा :- क्षय रोग (Tuberculosis- TB)



📌कषय रोग हा एक जिवाणुजन्य आजार आहे. क्षयरोग हा आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे. एके काळी हा रोग दुर्धर समजला जाई. सामान्यतः या आजाराला टीबी (ट्युुबरक्युलॉसिस) म्हणून ओळखले जाते. हा आजार 'मायकोबॅक्टेरिया' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे 'मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस' या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. यात मुख्यतः ७५% रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते.

📌इ.स.१८८२ साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला.त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक २४ मार्च रोजी मान्यता मिळाली.म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.ज्या व्यक्तीला क्षयरोग (टि.बी.) असेल तो माणूस बोलला, थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात आणि हवेद्वारे जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात व त्या निरोगी व्यक्तीला क्षय जंतूचा संसर्ग होतो.

📌परकार

✍️फफ्फुसाचा क्षयरोग

दूषित थुंकी (स्पुटम पॉसिटिव्ह)

अदूषित थुंकी (स्पुटम निगेटिव्ह)

📌फफ्फुसाव्यतिरिक्त इतर अवयवांचा

✍️गरंथीचा क्षय्ररोग ( लिम्फ नोड )

✍️हाडाचा व सांध्याचा क्षय्ररोग

✍️जनन व विसर्जन संस्थाचा क्षयरोरोग (जनायटो-युरिनरी ट्रॅक्ट )

✍️मज्जासंस्थेचा क्षय्ररोग (नर्व्हस सिस्टिम )

✍️आतडयाचा क्षय्ररोग

📌निदान

खकाऱ्याची तपासणी, एक्सरे, रक्ताच्या चाचण्या यांवरून या क्षयरोगाचे रोगनिदान केले जाते.

📌चाचण्या-

✍️खकाऱ्याची तपासणी-

वयस्कांमध्ये- सकाळचा खकारा निर्जंतुक बाटलीत घेतला जातो. तो काचपट्टीवर पसरवून त्यावर अल्कोहोलची प्रक्रिया करून चिकटवला जातो. त्यावर झिअल नेल्सन स्टेन या पद्धतीने पेशींना रंग देउन सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने निरीक्षण केले जाते. यामध्ये जर जीवाण् सापडले तर अशा रुग्णास थुंकी दूषित रुग्ण समजले जाते.

✍️लहान मुलांमध्ये- सकाळीच उपाशीपोटी अन्ननलिकेतून एनजीटी टाकून जठरातील द्रव निर्जंतुक बाटलीत घेतला जातो. तो काचपट्टीवर पसरवून त्यावर अल्कोहोलची प्रक्रिया करून चिकटवला जातो. त्यावर झिनलेन्स स्टेन या पद्धतीने पेशींना रंग देऊन सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने निरीक्षण केले जाते.

✍️मॉन्टुक्स टेस्टद्वारेही रोगाचे निदान केले जाते.

📌रक्ताच्या तपासण्या-

इएसआर- (एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट) यामध्ये रक्ताचा नमुना न गोठू देणाऱ्या द्रवाच्या सहाय्याने संकलित करून तो नलिकेमध्ये भरला जातो व त्या नलिकेवरील आकड्यांनुसार नोंद घेतली जाते. ही तपासणी विश्वासार्ह नाही, कारण इतर रोगांमध्येही ही तपासणी असामान्य असू शकते.

जाणून घ्या भारतातील सर्वात उंच गोष्टी



● सर्वात उंच वृक्ष :
➖ दवदार

● सर्वात उंच टॉवर :
➖ टी.व्ही. टॉवर

● सर्वात उंच शिखर :
➖  K-2 (8611 मिटर)

● सर्वात उंच धरण :
➖ भाक्रा नांगल धरण (740 फु.)

● सर्वात उंच दिपगृह :
➖ मबईजवळ

● सर्वात उंच धबधबा :
➖ गिरसप्पा (कर्नाटक) 960 फुट

● सर्वात उंच दिपगृह :
➖ मबईजवळ

● सर्वात उंच मिनार :
➖ कतुबमिनार (दिल्ली)

● सर्वात उंच पूल :
➖ चबळ पुल

General Knowledge

● ऑल इंडिया रेडिओच्या वार्ता सेवा विभागाच्या महासंचालक पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली?

उत्तर : जयदीप भटनागर

● महिला सक्षमीकरणासाठी कोणत्या राज्याने ITC, HUL आणि P&G या संस्थांसोबत सामंजस्य करार केला?

उत्तर : आंध्रप्रदेश

● ‘गांधीयन यंग टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन अवॉर्ड 2020’ हा पुरस्कार कोणत्या संस्थेला देण्यात आला?

उत्तर : भारतीय तंत्रज्ञान संस्था, खडगपूर

● HDFC बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर : शशिधर जगदीशन

● “स्वच्छ भारत रेव्होल्यूशन” या पुस्तकाचे संपादक कोण आहेत?

उत्तर : परमेश्वरन अय्यर

● ‘कोना कोना उम्मीद’ मोहीमेचा प्रारंभ कोणत्या बँकेनी केला?

उत्तर : कोटक महिंद्रा बँक

● जगातला सर्वात उंच रेल्वे पूल कुठे बांधण्यात येत आहे?

उत्तर : जम्मू व काश्मीर

● ‘खेलो इंडिया’योजनेच्या सर्वसाधारण परिषदेच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते?

उत्तर : किरेन रीजीजू

राष्ट्रीय हातमाग दिन: 7 ऑगस्ट



7 ऑगस्ट 2020 रोजी भारतात “राष्ट्रीय हातमाग दिन” साजरा करीत आहे.

✍️ हातमाग आणि
✍️हस्तकला क्षेत्राशी

▪️सबंधित सगळ्या लोकांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

▪️सहाव्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त वस्त्रोद्योग मंत्रालयाने कोविड-19 महामारी विचारात घेऊन गर्दी टाळण्यासाठी आभासी व्यासपीठाच्या माध्यमातून एक कार्यक्रम आयोजित केला.

▪️हातमाग क्षेत्र हे देशाच्या गौरवशाली सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे आणि देशातल्या उदरनिर्वाहाचा एक महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे.

▪️महिला सक्षमीकरणासाठी हे क्षेत्र महत्त्वाचे आहे कारण 70 टक्क्यांहून अधिक विणकर आणि संबंधित कामगार या महिला आहेत.

▪️1905 साली याच तारखेला सुरू झालेल्या स्वदेशी चळवळीच्या स्मृतिप्रीत्यर्थ 7 ऑगस्टची राष्ट्रीय हातमाग  म्हणून निवड झाली.

राज्यसेवा पूर्व परीक्षा चालू घडामोडी :- विविध घोषित वर्ष:-





📚  २०२४:-
• आंतरराष्ट्रीय उंटवंशीय वर्ष ( Camelids) (युनो)

📚 २०२३:-
• आंतरराष्ट्रीय भरड वर्ष (अन्न व कृषी संस्था )

📚 २०२२:-
• आंतरराष्ट्रीय मच्छीमार व मत्स्यसवर्धानाचे वर्ष (युनो)

📚 २०२१:-
• आंतरराष्ट्रीय शांतता आणि विश्वास वर्ष

📚 २०२०:-
• गतिशीलतेचे वर्ष केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)
• उंदरांचे वर्ष (चीन)
• परिचारिका आणि दाई वर्ष (जागतिक आरोग्य संघटना)
• वनस्पतींच्या आरोग्यासाठीचे आंतरराष्ट्रीय वर्ष (युनो)
• भारत-चीन सांस्कृतिक आणि जनतेतील आदानप्रदान वर्ष म्हणून जाहिर.(भारत- चीन दोन्ही देशांनी )
• कृत्रिम बुद्धीमत्तेचे वर्ष (तेलगंणा)

📚 २०१९:-
• आंतरराष्ट्रीय आदिवासी वर्ष (युनो)
• देशी भाषांचे आंतरराष्ट्रीय वर्ष (युनो)
• आंतरराष्ट्रीय नियमन वर्ष (युनो)
• रासायनिक मूलद्रव्यांच्या आवर्तसारणीचे वर्ष (युनो)
• पाण्याचे वर्ष (कर्नाटक)
• Year Of Next Of Kin ( भारतीय लष्कर)

📚 २०१८ :
• निरोगी बालक वर्ष (झारखंड)
• कर्तव्य बजावताना अपंगत्व आलेल्या सैनिकांचे वर्ष (भारतीय लष्कर)
• राष्ट्रीय तृणधान्य वर्ष (भारत सरकार )

📚 २०१८-१९ :-
• महिला सुरक्षा वर्ष (भारतीय रेल्वे )

📚 २०१७ :-
• आंतरराष्ट्रीय विकासासाठे शाश्वत पर्यटन वर्ष (युनो)
• व्हिजीट महाराष्ट्र वर्ष (महाराष्ट्र सरकार)
• सफरचंद वर्ष (जम्मू काश्मीर)
• भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांनी २०१७ हे सांस्कृतिक देवाण घेवाणीचे वर्ष म्हणून साजरे केले

निर्यात सज्जता निर्देशांक 2020’मध्ये गुजरात राज्य प्रथम क्रमांकावर.



◾️नीती आयोगाने (राष्ट्रीय परिवर्तन भारत संस्था) ‘निर्यात सज्जता निर्देशांक 2020’ (EPI 2020) जाहीर केला आहे. भारतातल्या राज्यांची निर्यात-बाबतची तयारी आणि कामगिरी यांचे परीक्षण करून आव्हाने आणि संधी ओळखणे, सरकारी धोरणाचा प्रभाव अधिक वाढवणे आणि सोयीचे नियमन संरचना तयार करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या पहिल्या अहवालाचा उद्देश आहे.

◾️राज्यांच्या एकूणच यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) - गुजरात, महाराष्ट्र आणि तमिळनाडू

◾️भपरिवेष्टित राज्यांच्या यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) - राजस्थान, तेलंगणा आणि हरयाणा

◾️हिमालयी राज्यांच्या यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) – उत्तराखंड, त्रिपुरा आणि हिमाचल प्रदेश

◾️कद्रशासित प्रदेशांच्या यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) – दिल्ली, गोवा आणि चंदीगड

⭐️इतर ठळक बाबी...

◾️हा निर्देशांक चार स्तंभावर आधारित आहे, ते आहेत - धोरण, व्यवसाय परीसंस्था, निर्यात परिसंस्था, निर्यात कामगिरी. यात 11 उप-स्तंभ आहेत.

◾️निर्यात वृद्धीसाठी प्रादेशिक कामगिरी उंचावण्यासाठी हा निर्देशांक राज्य सरकारांना मार्गदर्शक ठरणार आहे.
निर्यात वैविध्य, वाहतूक संपर्क आणि पायाभूत सुविधा या उप स्तंभाबाबत बऱ्याच भारतीय राज्यांनी चांगली कामगिरी केली आहे.

◾️या तीन स्तंभाबाबत भारतीय राज्यांचे सरासरी गुण 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहेत.साधारणपणे बहुतांश किनारी राज्यांनी उत्तम कामगिरी दर्शवली आहे.

महाराष्ट्रात सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे नेते.



1. देवेंद्र फडणवीस (भाजप) 
4 दिवस, 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर, 2019

2. पी के सावंत (काँग्रेस) -
10 दिवस, 24 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 1963

3. नारायण राणे (शिवसेना) -
259 दिवस, 1 फेब्रुवारी ते 17 ऑक्टोबर 1999

4. शिवाजीराव पाटील निलंगेकर (काँग्रेस) -
277 दिवस, 3 जून 1985 ते 6 मार्च 1986

5. मारोतराव कन्नमवार (काँग्रेस) - 370 दिवस, 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर1963

6. बाबासाहेब भोसले (काँग्रेस) - 377 दिवस, 21 जानेवारी 1982 ते 1 फेब्रुवारी 1983

भारतात 2036 साली स्त्रियांची संख्या अधिक असणार: राष्ट्रीय लोकसंख्या आयोग.



♒️आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाने 15 वर्षांसाठी लोकसंख्येचा अंदाज दर्शविणारा एक अहवाल तयार केला आहे. अहवालात वर्ष 2011 ते वर्ष 2036 मधील लोकसंख्येविषयी अंदाज दिला आहे.

♒️2011च्या लोकसंख्येच्या तुलनेत 2036 साली स्त्रियांची संख्या पुरुषांच्या तुलनेत अधिक असणार, असे अभ्यासातून दिसून आले आहे.

✴️अहवालातल्या ठळक बाबी...

♒️दशातले सरासरी लिंग गुणोत्तर (1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या) 2011 साली 943 होते. ते 2036 साली 957 होण्याची अपेक्षा आहे.

♒️2011च्या तुलनेत 2036 साली केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात वगळता अठरा राज्यांमधले लिंग गुणोत्तर वाढणार.
2036 साली दिल्ली केंद्रशासित प्रदेशात 899 एवढे सर्वात कमी लिंग गुणोत्तर असण्याचा अंदाज आहे. हे प्रमाण गुजरात आणि हरयाणामध्ये अनुक्रमे 900 आणि 908 राहणार.

♒️नवजात मृत्यु दर (IMR) 2031-35 पर्यंत 30 पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे, जी सर्व राज्यांमध्ये दिसून येणार.2036 पर्यंत भारताची लोकसंख्या 151.8 कोटी पर्यंत जाणार.

♒️एकूण जनन दर (TFR) 2011-15 या कालावधीमधील 2.34 वरून घटून 2031-35 या कालावधीत 1.72 होणे अपेक्षित आहे.वर्ष 15-24 या वयोगटातल्या तरुणांची संख्या 2036 पर्यंत 22.7 कोटी असणार, जे की 2036 मधील एकूण लोकसंख्येच्या 14.9 टक्के राहणार.

गुवाहाटी आणि उत्तर गुवाहाटी भागाला जोडणाऱ्या सर्वाधिक लांबीच्या रोपवे सेवेचे उद्घाटन.



❇️आसाम राज्यात ब्रम्हपुत्र नदीच्या पात्राला पार करणाऱ्या देशातल्या सर्वाधिक लांबीच्या रोपवे सेवेचे उद्घाटन करण्यात आली आहे.

‼️ठळक बाबी..

❇️ती सेवा गुवाहाटी आणि उत्तर गुवाहाटी या दोन भागांना जोडते.

❇️तो 1.8 किलोमीटर लांबीचा मार्ग आहे.
ती सेवा गुवाहाटीचे कचरी घाट आणि उत्तर गुवाहाटीचे डोल गोविंदा मंदिर या ठिकाणांदरम्यान कार्यरत आहे.
रोपवे सेवेमुळे प्रवासाचा वेळ कमी होण्यासोबतच राज्यातल्या पर्यटन क्षेत्राला चालना देखील मिळणार.

‼️बरह्मपुत्र नदी विषयी...

❇️आशियातली ही एक प्रमुख नदी तिबेटमध्ये उगम पावून ईशान्य भारतातून वाहत जाऊन पुढे बांगला देशात गंगा नदीला मिळते. नदीची एकूण लांबी 2900 किलोमीटर आहे. हिमालयाच्या कैलास पर्वतश्रेणीत चेमा-युंगडुंग या हिमनदीतून ब्रह्मपुत्र उगम पावते.

❇️बरह्मपुत्र नदीला तिबेटमध्ये त्सांगपो, भारताच्या अरुणाचल प्रदेशात दिहांग, आसाममध्ये ब्रह्मपुत्रा तर बांगला देशात जमुना असे म्हणतात. चिनी लोक हिला या-लू-त्सांगपू चिअँग या नावाने ओळखतात.

खासगीरीत्या उत्पादित पिनाका क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी.



🔰 2020 रोजी भारतीय भुदलाने पोखरणच्या चाचणी क्षेत्रात खाजगी क्षेत्रातल्या कंपनीने देशातच तयार केलेल्या सहा ‘पिनाका’ क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली.

🔰भारतात पहिल्यांदाच, इकॉनॉमिक एसप्लोझिव्ह लिमिटेड (EEL) या खासगी कंपनीने ‘पिनाका’ क्षेपणास्त्र तयार केले आहे. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत संरक्षण संशोधन विकास संस्थेनी (DRDO) कंपनीला पिनाकाक्षेपणास्त्राच्या निर्मितीचे कंत्राट दिले होते.

🔰आता शस्त्रास्त्रे आणि क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी संरक्षण दलाला आयुध निर्मिती मंडळ (ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड) या संस्थेवर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.

🔴पिनाका क्षेपणास्त्र...

🔰पिनाका क्षेपणास्त्र प्रणाली ही संरक्षण संशोधन विकास संस्थेनी (DRDO) विकसित केलेली स्वदेशी बनावटीचे ‘मल्टी बॅरेल’ क्षेपणास्त्र प्रणाली आहे.

🔰ह जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे गाइडेड क्षेपणास्त्र आहे.‘पिनाका मार्क 1’ची मारक क्षमता 40 किलोमीटर, तर ‘पिनाका मार्क 2’ची मारक क्षमता 75 किलोमीटरपर्यंत आहे.

मध्यप्रदेश नव्या राष्ट्रीय भरती संस्थेच्या परीक्षेमार्फत नोकरी देणारा पहिला राज्य असणार.



❄️नव्या राष्ट्रीय भरती संस्था (NRA) मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत मिळणाऱ्या गुणांच्या आधारावर सरकारी नोकरी देण्याची घोषणा मध्यप्रदेश सरकारने केली आहे. असा निर्णय घेणारा हा देशातला पहिला राज्य ठरला.

🔴पार्श्वभूमी...

❄️कद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय भरती संस्था (NRA) याची स्थापना करण्याला मान्यता दिली आहे. केंद्र सरकारमधले सचिव दर्जाचे अधिकारी संस्थेचे अध्यक्ष असणार. सरकारी आणि सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातल्या अराजपत्रित पदांसाठी NRA मार्फत एक सामाईक पात्रता परीक्षा घेतली जाणार.

❄️दरवर्षी साधारणपणे, 1.25 लक्ष सरकारी नोकऱ्यांसाठी 2.5 कोटी इच्छुक उमेदवार विविध परीक्षा देतात. मात्र, आता एकाच सामाईक पात्रता परीक्षेमुळे या उमेदवारांना एकदाच ही पात्रता परीक्षा द्यावी लागणार आणि ती उत्तीर्ण झाल्यावर त्यानंतर ते यापैकी कोणत्याही एका भरती समितिकडे किंवा एकाच वेळी विविध समित्यांकडे उच्चस्तरीय परीक्षा देण्यासाठी अर्ज सादर करु शकणार.

🔴परीक्षेची ठळक वैशिष्ट्ये....

❄️सामाईक पात्रता परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाणार.पदवी, 12 वी उत्तीर्ण आणि दहावी उत्तीर्ण अशा पातळ्यांसाठी वेगवेगळ्या सामाईक पात्रता परीक्षा असणार, जेणेकरुन विविध पातळ्यांवर वेगवेगळी भरती प्रक्रिया करता येणार.सामाईक पात्रता परीक्षा प्रमुख 12 भारतीय भाषांमध्ये घेतली जाणार.

सन्याला पहिले 50 लाख डोस देण्याचा मोदी सरकारचा विचार.



🔶भारत सरकार करोना लस खरेदी करण्याचा विचार करत असून पहिल्या टप्प्यात 50 लाख डोस खरेदी  करण्यासंबंधी चर्चा सुरु आहे.

🔶कद्र सरकारकडून करोना लस मिळण्याचा पहिला मान करोना योद्धा, भारतीय सैन्य आणि विशिष्ट श्रेणीतील लोकांना दिला जाण्याची शक्यता  आहे.

🔶कद्र सरकारचं संपूर्ण लक्ष लसीचं पुरवठा साखळी आणि वितरणावर आहे.

🔶कद्र सरकार मोठ्या प्रमाणात लसीचं वितरण करण्याची योजना आखत आहे. जेणेकरुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत करोना लस पोहोचावी.

🔶वर्षाअखेर किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला करोना लस उपलब्ध होईल अशी अपेक्षा सध्या व्यक्त केली जात आहे.

बेटी बचाव बेटी पढाओ योजना :



सुरुवात - 22 जानेवारी 2015

दूत - साक्षी मलिक 

बाल लिंगगुणोत्तर सुधारणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून मुलींच्या सबलीकरणाला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  हरियाणा येथील पानिपत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या योजनेचे उद्घाटन करण्यात आले.
  'बेटा बेटी एकसमान' हा आपला मंत्र असला पाहिजे असे सांगत लिंग भेदभाव संपुष्टात आणला पाहिजे.
  हरियाणातील बाल लिंगगुणोत्तर परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे या योजनेच्या उद्घाटनासाठी हरियाणाची निवड करण्यात आली.
  यात 10 वर्षाखालील मुलींचे बँक खाते उघडावे लागते.
  भारतीय टपाल खात्याच्या वतीने तयार करण्यात आलेल्या 'बेटी बचाओ बेटी पढाओ' टपाल तिकिटेही काढण्यात आली.
  सध्या भारतातील 100 जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर लागू.

महाराष्ट्रातील निवड करण्यात आलेले जिल्हे (लिंगगुणोत्तर दर)

   जिल्हा - 2001 - 2011

1) बीड - 894 - 807
2) जळगाव - 880 - 842
3) अहमदनगर - 884 - 452
4) बुलढाणा - 908 -  855
5) औरंगाबाद - 890 - 858
6) वाशिम - 918 - 863
7) कोल्हापूर - 839 - 863
8) उस्मानाबाद - 894 - 867
9) सांगली - 867 - 851
10) जालना - 903 -870

सकन्या समृद्धी योजना २०१६



* १ हजार रुपयाच्या किमान रकमेसह सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडता येते.

* हे खाते मुलीच्या जन्मापासून केवळ १० वर्षापर्यंतच उघडता येते. एका वर्षामध्ये या खात्यात किमान हजार रुपये किंवा अधिकाधिक १.५० लाख जमा करता येतात.

* एक पालक आपल्या केवळ दोन मुलीकरता हे खाते उघडू शकतो, आणि दोघींच्या खात्यात एक वर्षात १.५० लाख यापेक्षा अधिक रक्कम भरता येणार नाही.

* मात्र दुसऱ्यांदा जुळ्या मुली झाल्यास तिसऱ्या मुलीकरता हे खाते उघडले जाऊ शकते. मुलगी २१ वर्षे झाल्यावर हे खाते परिपक्व होते.

* तथापी १८ वर्षानंतर आवशक्यता असल्यास ५०% रक्कम काढता येईल, ही योजना मुलीच्या शिक्षणाचा खर्च आणि लग्नाचा खर्च घेऊन तयार करण्यात आली.

* या योजनेसाठी मुलीचे खाते काढताना मुलीचा जन्माचा दाखला, ओळखपत्र, निवासी पत्र, इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

* खात्याच्या परिपक्वतेनंतर जमा झालेली रक्कम संबंधित मुलीच्या मालकीची होते. भारतात हे खाते कुठेही काढता येते.

* वयाच्या १० वर्षानंतर मुलगी स्वतः आपले खाते हाताळू शकते. किमान एक हजार रुपये दरवर्षी न भरू शकल्यास त्या वर्षासाठी ५० रुपये दंड आकाराला जाईल, मात्र दंडाच्या रकमेसह १४ वर्षापर्यंत कधीही हे खाते पुन्हा सुरु करण्याची तरतूद आहे.

पराथमिक कृषि सहकारी पतसंस्था



(Primary Agricultural Credit Co-Operatives)

प्राथमिक कृषि सहकारी पतसंस्था सहकारी त्रि-स्तरीय रचनेच्या सगळ्यात खालच्या स्तरावर ग्रामीण भागात कार्य करतात.

🎯सथापना -

गावातील 10 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन या सहकारी पतसंस्थेची स्थापना करू शकतात.
  गरीब शेतकर्‍यांनाही संस्थेला सभासद होता यावे यासाठी सदस्यत्व शुल्क/प्रवेश शुक्ल नाममात्र ठेवले जाते.तसेच या संस्था अमर्यादित जबाबदारीच्या तत्वावर (Unlimited liability) स्थापना केल्या जातात. म्हणजेच, ती संस्था अपयशी ठरल्यास तिची देणी (Liabilities) देण्याची पूर्ण जबाबदारी सदस्यांवर असते.

🎯कार्ये -

ही संस्था प्रत्यक्ष ग्रामीण जनतेच्या संपर्कात येते. त्यांच्या ठेवी स्वीकारते व त्यांना कर्जे देते. कर्जे मुख्यत: अल्प मुदतीचे व मुख्यत: कृषीसाठी दिले जाते. मात्र सावकाराच्या तावडीत सापडू नये म्हणून खावटी कर्जे सुद्धा दिली जातात.ही संस्था ग्रामीण जनता व दुसर्‍या बाजुला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यात दुव्याचे काम करते.

🎯भांडवल उभारणी -

स्व-स्वामित्व निधी - सदस्यत्व फी, भागभांडवल व राखीव निधी.ठेवी - सदस्य तसेच, बिगर सदस्यां कडून मिळविलेल्या.कर्जे - जिल्हा मध्येवर्ती सहकारी बँकेकडून मिळालेली.

🎯विस्तार -

भारतात मार्च 2010 मध्ये विविध राज्यांमध्ये मिळून सुमारे 95,633 प्राथमिक कृषि सह. संस्था कार्य करीत होत्या. त्यांची एकूण सदस्य संख्या त्यावेळी सुमारे 1.32 कोटीपेक्षा जास्त असून त्यांनी 26,245 कोटी रुपयांच्या ठेवी गोळा केल्या होत्या.

🎯महाराष्ट्रातील विस्तार -

31 मार्च 2010 रोजी महाराष्ट्रात 21,392 प्राथमिक कृषि सह.पतसंस्था होत्या आणि त्यांची सभासद संख्या 149 लाख होती. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका



🎯सवरूप -

जि.म.स. बँक ही सहकारी संरचनेच्या मधल्या टप्प्यावर कार्य करते. ती जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्थांचा संघ (federation) असते व जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करते.प्रकार - जि.म.स. बँकेचे दोन प्रकार आहेत - शुद्ध सहकारी संघ (Co-Op. Banking Union) :- या प्रकारात जि.म.स. बँकेचे सदस्यत्व फक्त प्राथमिक सहकारी संस्थांनाच देण्यात येते. हरियाणा, पंजाब, राजस्थान, ओरिसा आणि केरळ या राज्यांमध्ये असा प्रकार आहे.मिश्र मध्य. सहकारी बँका (Mixed Central Co-Op-erative Banks) :- या प्रकारच्या बँकेचे सदस्यत्व सहकारी संस्था तसेच, व्यक्तींना सुद्धा खुले असते. इतर सर्व राज्यातील जि.म.स. बँका या प्रकारच्या आहेत.

🎯कार्ये -

जिल्हा मध्य. सह. बँकेचे प्राथमिक कार्य जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी संस्थांना कर्जपुरावठा करणे हे आहे. मात्र काही कर्जे व्यक्तींना सुद्धा दिली जाऊ शकतात.नियमांनुसार, या बँका व्यापारी कारणांसाठी (Commercial Purposes) कर्जपुरवठा करीत नाही. मात्र सध्या (फेब्रुवारी 2010) 372 जि.म.सह. बँकांपैकी 75 बँकांना रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँक व्यवसायाचा परवाना दिला आहे.या बँका शहरी भागातून ठेवी गोळा करून त्या ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात.

🎯भांडवल उभारणी -

स्वस्वामित्व निधी - यात सहकारी संस्थांनी पुरविलेले भागभांडवल व राखीव निधीचा समावेश होतो.ठेवी - सहकारी संस्था तसेच व्यक्तींच्या.कर्जे - शिखर बँक, इतर बँका यांकडून मिळालेली.प्राथमिक सह. संस्थांनी जिल्हा म.स. बँकेमध्ये ठेवलेला आपल्याकडील अतिरिक्त निधी.

🎯विस्तार -

भारतात मार्च 2010 मध्ये 370 जि.म.स. बँका होत्या. त्यांच्या एकूण ठेवी त्यावेळी 1,27,600 कोटी रुपये इतक्या होत्या.महाराष्ट्रात मार्च 2010 अखेर 31 जि.म.स. बँका होत्या. त्यांचे सभासद एकूण 1,48,360 इतके होत्या, तर ठेवी 44,278 कोटी रुपये इतक्या होत्या.

परधानमंत्री मातृ वंदना योजना



ही योजना केद्र सरकारचे महिला व बाल विकास मंत्रालय विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे.

वाटा - या योजनेसाठी राज्य शासन 40% आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. उर्वरित 60%  निधीची तरतूद केंद्र सरकारद्वारे होणार आहे.

योजनेची सुरुवात - 1 जानेवारी 2017 पासून

उद्देश - देशातील माता व बालकांचे आरोग्य सुदृढ राखून माता व बालमृत्यु रोखणे.

अंमलबजावणी अधिकारी - राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक तथा आरोग्य सेवांचे आयुक्त हे राज्य पातळीवरील समन्वय अधिकारी असतील.

▪️योजनेचा लाभ -

ही योजना केवळ पहिल्याच अपत्यासाठी व शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेत नोंदणी झालेल्या महिला व स्तनदा माता ज्यांची गर्भधारणा दिनांक 01.01.2017 रोजी अथवा तद्नंतर झाली असेल अशाच पात्र महिलांना पहिल्या जिवीत अपत्यासाठी लागू असून लाभाची 5,000/- (पाच हजार रुपये) रक्कम तीन टप्यात संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) च्यामाध्यमातून थेट जमा करण्यात येणार आहे.

ही योजना पुर्वी युपीए कार्यकाळात 2010 मध्ये कार्यन्वीत करण्यात आली होती. हया योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अमरावती व भंडारा जिल्हाचा समावेश करण्यात आला होता. त्यावेळी ही योजना इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना या नावाने चालू होती. परंतु, योजनेस पुर्णपणे प्रसिध्दी न दिल्यामुळे ही योजना अपयशी ठरली होती.

‘व्हॅट’अधिनियमात सुधारणा



व्यवसाय सुलभतेच्या धोरणांतर्गत ‘महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम-२००२’ नुसार ऐच्छिक नोंदणी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून अनामत रक्कम घेण्याची तरतूद रद्द करण्यासाठी अधिनियमामध्ये तांत्रिक सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली.

राज्यात वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी १ जुलै २०१७ पासून सुरू झाली आहे. मात्र, सहा वस्तूंवर मूल्यवर्धित कराची (व्हॅट) आकारणी होत आहे. यामध्ये खनिज तेल, पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू, विमानाचे इंधन, मद्य यांचा समावेश आहे. मूल्यवर्धित कराची आकारणी फक्त या सहा वस्तूंवरच होत असल्याने महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम २००२ या अधिनियमाची व्याप्ती आता खूपच मर्यादित झाली आहे. या अधिनियमातील तरतुदीनुसार, व्यापाऱ्याची एका वर्षांतील उलाढाल १० लाखांपेक्षा अधिक असल्यास नोंदणी दाखला घेणे अनिवार्य आहे. मात्र, ही मर्यादा पार करण्याआधीच एखाद्या व्यापाऱ्यास ऐच्छिक नोंदणी करण्याची सवलतदेखील त्यात दिली आहे. अशी नोंदणी करताना, संबंधित व्यापाऱ्यास २५,००० रुपये अनामत रक्कम जमा करणे अनिवार्य आहे. ही रक्कम संबंधित व्यापाऱ्याला तीन वर्षांनंतर परत करण्यात येते. मात्र, वस्तू व सेवा कर (जीएसटी) अधिनियमातील तरतुदीनुसार, ऐच्छिक नोंदणीसाठी अनामत रक्कम घेतली जात नाही. त्यामुळे, ‘जीएसटी’ व ‘व्हॅट’बाबतच्या या दोन्ही अधिनियमातील तरतूद सुसंगत करण्यासाठी या अधिनियमात असलेली ऐच्छिक नोंदणीसाठी अनामत रक्कम जमा करण्याची अट रद्द करण्यात आली आहे. व्यापार सुलभतेसाठी ही सुधारणा पोषक ठरेल, असे राज्य सरकारचे मत असल्याचे सांगण्यात आले.

मूल्यवर्धित कर अधिनियमातील तरतुदीनुसार, नोंदणी अर्ज दाखल करतानाच व्यापाऱ्याने बँकेच्या चालू खात्याचा तपशील सादर करणे अनिवार्य होते. व्यापाऱ्याकडील प्रलंबित थकबाकी वसूल करण्यासाठी हा तपशील आवश्यक असतो. व्यापार सुलभतेसाठी ही तरतूद महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियमांतर्गत २५ एप्रिल २०१८ रोजीच्या अधिसूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या निर्णयानुसार व्यापाऱ्याने नोंदणी दाखला प्राप्त झाल्यानंतर विहित मुदतीत स्वत:च्या चालू बँक खात्याचा तपशील राज्याच्या वस्तू व सेवा कर विभागाच्या संकेतस्थळावर सादर करणे गरजेचे आहे. तसेच विहित मुदतीत तपशील सादर न करणाऱ्या व्यापाऱ्यांचा नोंदणी दाखला रद्द करण्याची सुधारणाही या अधिनियमात करण्यास मान्यता देण्यात आली.

राष्ट्रीयकृत बैंक आणि त्यांची कार्यालय



अलाहाबाद बैंक - कोलकाता

• बैंक ऑफ इंडिया - मुंबई

• बैंक ऑफ महाराष्ट्र - पुणे

• केनरा बैंक - बैंगलोर

• सेंट्रल बैंक ऑफ इंडिया - मुंबई

• कॉरपोरेशन बैंक - मंगलौर

• देना बैंक - मुंबई

• इंडियन बैंक - चेन्नई

• इंडियन ओवरसीज बैंक - चेन्नई

• ओरिएंटल बैंक ऑफ कॉमर्स - नवी दिल्ली

• पंजाब नेशनल बैंक - नवी दिल्ली

• पंजाब एंड सिंध बैंक -- नवी दिल्ली

• सिंडिकेट बैंक - मणिपाल

• यूको बैंक - कोलकाता

• यूनियन बैंक ऑफ इंडिया - मुंबई

• यूनाइटेड बैंक ऑफ इंडिया - कोलकाता

• विजया बैंक - बैंगलोर

• आंध्रा बैंक - हैदराबाद

• बैंक ऑफ बड़ौदा - मुंबई

सटेट बँक ऑफ़ इंडिया मधे सहकारी बँकांचे विलीनीकरण

कद्रीय मंत्रिमंडळाने भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये त्याच्या सहकारी बँकांचे विलीनीकरण करण्यासाठी मंजूरी दिलेली आहे. याशिवाय, नव्याने स्थापन झालेल्या भारतीय महिला बँक ला सुद्धा SBI मध्ये विलीन केले जाईल.

SBI च्या सहा सहकारी बँका आहेत, त्यामध्ये

🔰सटेट बँक ऑफ हैदराबाद,

🔰सटेट बॅंक ऑफ बिकानेर अँड जयपूर,

🔰सटेट बँक ऑफ पटियाला,

🔰सटेट बँक ऑफ म्हैसूर,

🔰सटेट बँक ऑफ त्रावणकोर,

🔰सटेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर

⬆️⬆️या आहेत⬆️⬆️

🏧SBI विलिनीकरणाचे फायदे🏧

💰विलीनीकरण झाल्यानंतर,

🔝🔝🔸बकिंग क्षेत्रात अग्रेसर SBI हे जगातील टॉप-50 बँकांच्या यादीमध्ये प्रविष्ट होणार.🔸🔝🔝

💰ससाधने जमवण्यासाठी एकल कोषागार असणार आणि मोठ्या प्रमाणात कुशल संसाधनांच्या पायाचे योग्य वितरण केले जाणार.

💰SBI मध्ये अवलंबले जाणारे नवीन तंत्रज्ञान हे सहकारी बँकेच्या सर्व ग्राहकांना समानरूपाने उपलब्ध होणार.

💰तयाच्या उपकंपन्या सोबत SBI भागभांडवल बाजारात प्रचंड कमाई करू शकणार. अशा प्रकारे तो फायदा सर्व भागभांडवल धारकांना देखील होणार.

💰विलीनि‍करणानंतर SBI ची एकूण मालमत्ता रु. 37 लाख कोटी (37 ट्रिलियन रुपयांवर) पोहोचणार.यामुळे SBI चे 50 कोटी पेक्षा अधिक ग्राहक होणार,

🏧आणि  22,500 शाखा आणि 58,000 ATM उपलब्ध होणार.🏧

 🏧💸SBI विलिनीकरणाचे तोटे💸🏧

💰या विलीनि‍करणानंतर , बँकेच्या प्रशासनाला कर्मचारी एकत्रीकरण आणि शाखा सुसूत्रीकरण संबंधित काही गंभीर आव्हानांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

⛔️अनेक कर्मचारी सहकारी संघ या विलीनि‍करणाच्या विरोधात आहेत.⛔️

🏧💸SBI च्या विलीनीकरणाआधी💸🏧

💰SBI मध्ये पूर्वीचे विलीनीकरण निरोगी असल्याचे सिद्ध झाले आहे.

🔰2008 मध्ये, स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र आणि 2010 मध्ये, स्टेट बँक ऑफ इंदोर चे विलीनीकरण करण्यात आले होते.

🔰विलीनीकरण होण्याच्या आधी SBI च्या 7 सहकारी बँका होत्या.

तीन वार्षिक योजना



कालावधी: इ.स. १९६६ - इ.स. १९६९तिसऱ्या योजनेच्या अपयशामुळे ि निर्माण झालेल्या आर्थिक अस्थैर्यामुळे सरकारला चौथी योजना सुरू करता आली नाही. हि सुटी १ एप्रिल,१९६६ ते ३१ मार्च, १९६९ दरम्यान राहिली. या सुट्टीच्या कालावधीत सरकारने तीन वार्षिक योजना राबवल्या ज्यांचे उद्दिष्ट स्वावलंबन हे होते.

१) पहिली वार्षिक योजना (१९६६-६७) १९६६ च्या खरीप हंगामात सरकारने हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा वापर केला. ६ जून १९६६ मध्ये रुपयाचे ३६.५ टक्क्यांनी अवमूल्यन घडवण्यात आले.

२) दुसरी वार्षिक योजना (१९६७-६८) हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानामुळे व पुरेशा मान्सूनमुळे अर्थव्यवस्थेची परिस्थिती सुधारण्यास सुरवात झाली. १९६७-६८ मध्ये अन्नधान्यांचे उच्चांकी उत्पादन झाले.

३) तिसरी वार्षिक योजना (१९६८-६९) अन्नधान्य उत्पादन व किमती स्थिरावल्या. व्यवहारतोल सुधारला व चौथी योजना सुरु करण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली.

४ थी पंचवार्षिक योजना



कालावधी: इ.स. १९६९ - इ.स. १९७४

प्रतिमान ःॲलन एस. मान आणि अशोक रुद्र प्राधान्य : स्वावलंबन घोषवाक्य : स्थैर्यसह आर्थिक वाढ मॉडेल : Open Consistency Model खर्च : प्रस्तावित खर्च- १५,९०० कोटी रु., वास्तविक खर्च- १५,७९९ कोटी रु. योजनेचे उपनाव: गाडगीळ योजना प्रकल्प : १. DROUGHT PRONE AREAS PROGRAMME (DPAP) (1973) २. Small Farmer Development Agency (SFDA) ३. बोकारो पोलाद प्रकल्प (रशियाच्या मदतीने) (१९७२) ४. SAIL (Steel Authority of India Ltd) (१९७३)

महत्वपूर्ण घटना १. आर्थिक केंद्रीकरण रोखण्यासाठी MRTP Act-1969 हा कायदा संमत करण्यात आला. २. जुलै १९६९ मध्ये १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. ३. अग्रणी बँक योजना सुरु करण्यात आली. -1969 ४. विमा महामंडळाची स्थापना (१९७३) ५. १९७२-७३ मध्ये पहिल्यांदा भारताचा व्यापार तोल अनुकूल होता. ६. Foreign Exchange Regulation Act-1973

मूल्यमापन : काही प्रमाणात अपयश आले. करणे- १) बांगलादेश मुक्ती युद्ध - १९७१ २) १९७३ चे पहिला तेलाचा झटका (Oil Shocks)

पाचवी पंचवार्षिक योजना (1974–1978)



रोजगार, दारिद्र्य निर्मूलन आणि न्याय यावर ताण देण्यात आला. या योजनेत कृषी उत्पादन आणि स्वयंपूर्णतेवर भर देण्यात आला. १ 197 88 मध्ये नवनिर्वाचित मोरारजी देसाई सरकारने ही योजना नाकारली.  १९५५ मध्ये विद्युत पुरवठा कायदा लागू करण्यात आला ज्यायोगे केंद्र सरकार वीज निर्मिती व प्रसारात प्रवेश करू शकली. प्रथमच इंडियन नॅशनल हायवे सिस्टम सुरू करण्यात आले आणि वाढती रहदारी सामावून घेण्यासाठी अनेक रस्ते रुंदीकरण करण्यात आले. पर्यटनाचा विस्तारही झाला.

🌿🌿🌺लक्ष्य वाढ 5.6%
   आणि वास्तविक वाढ 4.8%
यशस्वी Rhikvicas दर 4.4 आणि यश दर 4.9% या योजनेसाठी.

सहाव्या पंचवार्षिक योजना (1980-1985)



सहाव्या योजनेत आर्थिक उदारीकरणाची सुरूवात देखील झाली. नेहरूवादी योजनेचा हा शेवट होता आणि इंदिरा गांधी या काळात पंतप्रधान होत्या. सहावी योजना दोनदा तयार केली गेली.
जनता पार्टीने (१९७३ ते १९८३ या कालावधीत) 'अखंड योजना' तयार केली. परंतु १ 1980 in० मध्ये स्थापन झालेल्या इंदिराच्या नवीन सरकारने ही योजना रद्द केली आणि नवीन सहावी पंचवार्षिक योजना (1985) सुरू केली.
  आता जनता पक्षाच्या दाखल्याची जागा पुणे नेहरू मॉडेलने घेतली. या टप्प्यावर यावर जोर देण्यात आला की केवळ अर्थव्यवस्थेचा विस्तार करून ही समस्या सोडविली जाऊ शकते.त्यामुळे सहाव्या पंचवार्षिक योजनेस सहाव्या योजना देखील म्हणतात. लोकसंख्या रोखण्यासाठी कुटुंब नियोजन देखील वाढविण्यात आले. चीनच्या कठोर आणि बंधनकारक एक मुलाच्या धोरणासारखे नाही, भारतीय धोरण सक्तीच्या धोक्यावर अवलंबून नव्हते.
  भारतातील श्रीमंत भागात कौटुंबिक नियोजनाने कमी संपन्न क्षेत्रापेक्षा वेगाने दत्तक घेतले, ज्यांनी जास्त जन्म दर जारी केला. यात प्रथमच आधुनिकीकरण हा शब्द वापरला गेला. रोलिंग प्लॅनची   संकल्पना आली. हे सर्वप्रथम गुन्नर मर्दलने त्यांच्या ‘एशियन ड्रामा’ या पुस्तकात दिले होते. भारतात अंमलबजावणी करण्याचे श्रेय "प्रोफेसर डी.डी. लकडावाला" यांना दिले जाते.

लक्ष्य वाढ : 5.2% 
      आणि वास्तविक वाढ : 5.4%

ब्राम्हो समाज व त्याची स्थापना



धार्मिक व सामाजिक सुधारणांच्या युगाला राजा राममोहन रॉय यांच्या कार्यापासूनच खर्‍या अर्थाने सुरवात झाली राजा राममोहन रॉय यांचा जन्म 22 मे 1772 रोजी राधानगर (बंगाल) येथे झाला.

 विद्यार्थीदशेत असताना इंग्रजी संस्कृत, अरबी, आणि फार्सी, या भाषा चा त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यांनी बंगालमध्ये इंग्रजी राजवट कशी स्थिर झाली हे प्रत्यक्ष पाहिले.

 ब्रिटिशांचे अनेक गुण भारतीय विचारवंतांना अंतर्मुख करु लागले होते. आपल्या समाजातील रुढी, परंपरा व अंधश्रध्दा यामुळे भारतीय समाजाची अधोगती झाली आहे, याची जाणीव रॉय यांना होती. त्यांनी काही काळ ईस्ट इंडिया कंपनीत नोकरीपण केली होती त्या काळात ख्रिश्चन मिशनर्‍यांचे कार्य त्यांनी अगदी जवळून पाहिले होते. हिंदू धर्मातील एकेश्र्वरवाद, मुर्तिपूजा, आणि जातिभेद, समाजाच्या प्रगतीतील प्रमुख अडथळे आहेत. असे त्यांचे मत होते. त्यामुळे भारतीय समाजाला जागृत करावयाचे असेल तर या अनिष्ट रुढी आणि परंपरांचा त्याग केला पाहिजे असा प्रसार रॉय यांनी सुरु होता. सतीची चाल बंद करण्याचा प्रयत्न रॉय यांनी केला. अर्थात हे काम सोपे नव्हते शतकानुशतकांचा धर्माचा पगडा समाजातील उच्चवर्णियांवर होता. स्वार्थी भटभिक्षुकांची समाजावर फार जबरदस्त पकड होती. पती निधनानंतर विधवा स्त्रीने स्वत:च्या मृत पतिसमवेत जाळून घेणे म्हणजे सती जाणे आणि हाच धर्म मानला जात होता. संवाद कौमुदी नावाच्या पाक्षिकातून त्यांनी सतीच्या अमानुष पध्दतीवर कडाडुन टिका केली. रॉयसारख्या लोकांचा पाठिंबा असल्यामुळे बेंटिंकने 1829 साली सतीबंदीचा कायदा केला सतीच्या रुढीप्रमाणे बालविवाह, कन्याविक्रय आणि बहुपत्नित्वाची पध्दती समाजासाठी लांच्छानास्पद असल्याचे मत रॉय यांनी मांडले होते.

▪️ब्राम्हो समाजाची स्थापना :

त्या सुमारास ख्रिस्ती मिशनर्‍यांनी हिंदू धर्मावर प्रखर हल्ले होते. हे हल्ले परतवून हिंदू धर्म व संस्कृती यांचे संरक्षण करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या बुरसटलेल्या धर्मकल्पना हिंदूंनी फेकून दिल्या पाहिजेत असे रॉय यांना वाटत होते. हिंदू धर्माची मूळ बैठक वेदांताच्या तत्वज्ञानावर आहे हे ओळखून रॉय यांनी वैदिक विचारसरणीचा पुरस्कार केला. वेदांत सूत्रावरील शांकर भाष्याचे बंगाली भाषेत त्यांनी रुपांतर केले. अनेक उपनिषदांचे बंगाली भाषेत त्यांनी रुपांतर केले. वेदांत सार नावाचा ग्रंथ लिहून वेदांचे तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. केवळ ग्रंथ लिहून व वृत्तपेतातून लेखन करुन धार्मिक व सामाजिक सुधारणा होणार नाहीत याची त्यांना जाणीव होती. म्हणून त्यांनी 1828 मध्ये ब्राम्होसमाज स्थापन केला. तेव्हा ब्राम्हो समाजाला असंख्य अनुयायी मिळाले. या समाजाचा प्रसार बंगाल बाहेर इतर प्रांतातही झाला होता.

अलाहाबादचं नाव यापुर्वीही 'प्रयागराज'चं होतं, 444 वर्षांपूर्वी अकबर बादशहानं बदललं



उत्तर प्रदेशची संगम नगरी असलेल्या अलाहाबाद शहराचे नाव बदलण्याच्या निर्णयाला योगींच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून अलाहाबाद शहर प्रयागराज नावाने ओळखले जाईल. मात्र, 444 वर्षांपूर्वीही या स्थानकाचे नाव प्रयागराज असेच होते. त्यावेळी, अकबर बादशहाने या स्थानकाचे नाव बदलून अलाहाबाद असे ठेवले. त्यानंतर पुन्हा या अलाहाबादचे नाव प्रयागराज बनले आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाने अलाहाबाद शहराचे नाव प्रयागराज करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या शहराला पहिलेच नाव मिळाले आहे. योगी आदित्यनाथ यांच्या या निर्णयामुळे संत समाज आनंदी झाला आहे. पण, विरोधकांनी या नाव बदलाला आपला विरोध दर्शवला होता.
इतिहास तज्ञ्ज्ञांच्यामते अकबरनामा, आईने अकबरी आणि अन्य मुगलकालीन इतिहासाच्या पुस्तकांमध्ये अकबरने सन 1574च्या जवळपास प्रयागराज येथे किल्ल्याची पायाभरणी केल्याचे म्हटले आहे. अकबरने येथे नवीन नगर बसवले होते. त्याचे नाव अलाहाबाद ठेवण्यात आले. त्यापूर्वी या शहराला प्रयागराज नावानेच ओळखले जात. तसेच मानचरितमानस या ग्रंथातही अलाहाबादचा उल्लेख प्रयागराज असाच आहे. प्राचीन काळात संगम नदीच्या पाण्याने राजे-महाराजांचा येथे अभिषेक करण्यात येत होता. तर, वाल्मिकी 'रामायण'मध्येही याचा उल्लेख आहे. वनवासाला जातेवेळी श्रीराम यांनी प्रयाग येथील ऋषी भारद्वाज यांच्या आश्रमाल भेट दिली होती.

प्रभू श्रीराम जेव्हा श्रृंग्वेरपूर येथे पोहोचले होते, तेव्हा तेथेही प्रयागराज हाच उल्लेख आला होता. सर्वाच प्राचीन आणि सत्यवचन असलेल्या मत्यपुराणच्या 102 ते 107 या अध्यायातही या तिर्थाच्या महात्म्याचा उल्लेख आहे. प्रयाग हे प्रजापतीचे क्षेत्र असून येथे गंगा आणि जमुना या नद्या वाहत असल्याचे या अध्यात सांगतिले आहे.

कोहिनूर' हिऱ्याचा किस्सा... जाणून घ्या, भारताकडून इंग्रजांकडे गेला कसा?



जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा इंग्रजांनी जबरदस्तीने नेला होता की त्यांना तो भेट म्हणून देण्यात आला होता. हा प्रश्न सामान्य ज्ञानासाठी नेहमीच विचारला जातो. मात्र आता या प्रश्नाचं कोडं लवकरच उलघडणार आहे. भारताचा कोहिनूर हिरा हा इंग्रजांनी जबरदस्तीने नेला होता, असा खुलासा भारतीय पुरातत्त्व विभागाने केला आहे. नऊ वर्षांच्या महाराजा दुलिप सिंह यांच्यासोबत करण्यात आलेल्या तहानुसार त्यांनी कोहिनूर हिरा हिसकावून नेला असल्याची माहिती आरटीआय अंतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पुरातत्त्व विभागाने दिली आहे.

महाराज रणजित सिंह यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला कोहिनूर हिरा भेट म्हणून दिला होता, हा सरकारचा दावा पुरातत्व विभागाच्या खुलाशामुळे आता खोटा ठरला आहे. एप्रिल 2016 मध्ये सरकारने सर्वोच्च न्यायालयात कोहिनूर हिऱ्यासंबंधी माहिती दिली होती. लाहोरच्या महाराजांनी कोहिनूर हिरा इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाच्या ताब्यात दिला होता, असे पुरातत्त्व विभागाने म्हटले आहे. तसेच अँग्लो-शीख युद्धाच्या खर्चाची भरपाई म्हणून रणजित सिंह यांच्या नातलगांनी स्वेच्छेन कोहिनूर हिरा इंग्रजांना दिला होता, असे सरकारने एका जनहित याचिकेला उत्तर देताना सांगितले होते.

सामाजिक कार्यकर्ते रोहित सबरवाल यांनी आरटीआय दाखल करून कोणत्या आधारावर कोहिनूर हिरा इंग्रजांना दिला होता?, असा प्रश्न विचारला होता. त्यांच्या या प्रश्नाला आता भारतीय पुरातत्त्व विभागाने उत्तर दिले आहे. कोहिनूर हिऱ्याची माहिती मागवण्यासाठी कोणाकडे अर्ज करायचा यासंदर्भात मला काहीही माहिती नव्हते. म्हणून मी तो अर्ज पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला. पंतप्रधान कार्यालयाने तो अर्ज एएसआयकडे पाठवला, असे रोहित सबरवाल यांनी सांगितले. रोहित यांच्या प्रश्नाला उत्तर देताना नोंदीनुसार लाहोरमध्ये लॉर्ड डलहौसी आणि महाराजा दुलिप सिंह यांच्यात 1849 साली कथित करार झाला असल्याचं सांगितलं. लाहोरच्या महाराजांनी इंग्लंडच्या महाराणीकडे कोहिनूर हिरा सोपवला होता. परंतु दुलिप सिंह यांच्या इच्छेनुसार तो इंग्रजांकडे सोपवला नव्हता, हेच स्पष्ट होत आहे. कारण करार झाला त्यावेळी दुलिप सिंह केवळ 9 वर्षांचे होते, असे एएसआयने रोहित सबरवाल  यांना पाठवलेल्या उत्तरात सांगण्यात आले आहे.

चंद्रशेखर आझाद


(जन्म: २३ जुलै १९०६-मृत्यु: २७ फेब्रुवारी १९३१)
.
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
.
चंद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतीकारक होते. रामप्रसाद बिस्मिल यांच्या मृत्युनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोशिएशन या क्रांतीकारी संघटनेची हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोशिएशन या नवीन नावाखाली पुनर्बाधणी केली. त्याचप्रमाणे त्यांना भगतसिंग यांचे गुरु मानले जाते.
.
 जन्म आणि बालपण:
चंद्रशेखर यांचा जन्म २३ जुलै १९०६ ला सध्याच्या अलीराजपुर जिल्ह्यातील भावरा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सीताराम तिवारी आणि आईचे नाव जगरानी देवी होते. त्यांचे पूर्वज कानपूर जवळच्या बदरखा गावात राहत होते. जगरानी देवी ह्या सीताराम यांच्या तिसर्या पत्नी होत्या. त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ते भावरा गावी स्थलांतरीत झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा गावातच झाले. मात्र नंतर आईच्या इच्छेनुसार ते वाराणसीमधील संस्कृत शाळेत गेले. डिसेंबर १९२१ मध्ये महात्मा गांधीनी सुरु केलेल्या असहकार आंदोलनात तेव्हाच्या १५ वर्षे वयाच्या चन्द्रशेखरने सहभाग घेतला. त्यासाठी त्याला अटक सुद्धा झाली होती. तेव्हा न्यायालयात चंद्रशेखरने आपले आडनाव आझाद असल्याचे नोंदवले. तेव्हापासून ते आझाद आडनावाने ओळखले जाऊ लागले.
.
मृत्यु:
२७ फेब्रुवारी १९३१ ला अलाहाबादमधील अल्फ्रेड पार्क येथे सुखदेव राज या क्रांतीकारकाला भेटायला गेले असताना एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांना वार्ता दिली. पोलिसांनी मैदानाला वेढा घातला आणि चंद्रशेखर व पोलिसांमध्ये गोळीबार झाला. त्यांनी एकहाती तीन पोलिसांना मारले मात्र त्यांच्याजवळील बंदुकीच्या गोळ्या संपत आल्यामुळे शेवटच्या गोळीने त्यांनी स्वत:ला मारून घेतले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाचे नाव चंद्रशेखर आझाद मैदान असे ठेवण्यात आले.

ताराबाई शिंदे (१८५०-१९१०)



 ह्या महाराष्ट्रातील एक स्त्रीवादी लेखिका व सत्यशोधक समाजाच्याकार्यकर्त्या होत. १८८२ साली प्रसिद्ध झालेल्या स्त्री-पुरुष तुलना या पुस्तकाच्या त्या लेखिका होत.

ताराबाई ह्या बुलढाणा येथील रहिवासी होत्या. त्यांचे वडील बापुजी हरी शिंदे हे एक जमीनदार होते. ते सत्यशोधक समाजाचे सभासद होते.ताराबाई शिंदे यांचे भाऊ, रामचंद्र हरी शिंदे जोतिबांच्या कॉन्ट्रक्टिंग कंपनीत भागीदार होते. त्यामुळे ताराबाईंच्या घरात सुरुवातीपासूनच स्त्री-पुरुष समानतेचे वातावरण होते.


ताराबाईंनी आपल्या पुस्तकात विधवा-विवाहास उच्च वर्णीयांनी केलेली मनाई, केशवपनासारख्यादुष्ट रूढी, तसेच पुरुषांना अनेक लग्न करण्याची असलेली मुभा या सर्व प्रश्नांवर टीका केलेली दिसते. तत्कालीन महाराष्ट्रातील स्त्री समाजसुधारक म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थिती देखील सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात योगदान दिले.त्यानी स्त्री यांच्या शोषणा विरोधात दिलेला लढा हा सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेस चालना देणारा होता.

राष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना


.
०१. ब्रिटिश अधिकाऱ्यांतही व्हाइसरॉय लॉर्ड डफरिन, ए. ओ. ह्यूमसारखे लोक यांनी भारतात सुराज्य निर्माण व्हावे, दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भडका उडू नये, त्यांच्या अभिव्यक्तीला एक सनदशीर साधन मिळावे, हिंदी लोकांना स्वायत्ततेचे हक्क प्राप्त व्हावेत असे वाटत होते.
०२. सर्व देशाचे प्रतिनिधित्व करणारी एखादी अखिल भारतीय राजकीय संस्था निर्माण झालेली नव्हती. ती स्थापन करण्यात ए.ओ. हयूम या सेवा निवृत्त सनदी अधिकाऱ्याने सर विल्यम वेडरबर्न व सर हेन्री कॉटन या दोन सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्याचेही सहकार्य घेतले.
०३. राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन पुण्यास भरविण्याचे ठरले होते. पण पुण्यास फार मोठया प्रमाणावर प्लेगची साथ झाली. त्यामुळे ते २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईच्या गोवालिया टॅंकजवळील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये ते भरविण्यात आले. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे या पहिल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. सर्व भारतातून एकूण ७२ प्रतिनिधी राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनास हजर होते.
०४. त्यामध्ये दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, न्या के. टी. तेलंग, दिनशा वाच्छा, वीर राघवाचार्य, पी. आनंद चार्लू, गंगाप्रसाद वर्मा, न्या. रानडे, बद्रुद्दीन तय्यबजी, रा. गो. भांडारकर, एस्. सुब्रमण्यम् अय्यर, दिवाणबहादूर रघुनाथराव, केशव पिल्ले, एन्. जी. चंदावरकर, गो. ग. आगरकर  इ. हिंदी नेत्याचा समावेश होता.
०५. कॉग्रेसचे पुढील अधिवेशन २८ डिसेंबर १८८६ राजी कलकत्ता येथे भरवण्यात यावेत असे ठरले. यानंतर ए.ओ. हयूम आणि राणी व्हिक्टोरिया यांना धन्यवाद देऊन सभा बरखास्त करण्यात आली. राष्ट्रसभेचे सुरुवातीचे स्वरुप कार्यपध्दती मवाळच होती.

भारतातील सर्वात पहिल्या महिला :


.
@राजदूत -विजयालक्ष्मी पंडित
@मेयर -अरूणा अासफअली
@काँग्रेस अध्यक्षा -अॅनी बेझंट
@चित्रपट अभिनेत्या -देविकाराणी
@न्यायाधिश -फातिमा बीबी
@युनोच्या आमसभेच्या अध्यक्षा -विजयालक्ष्मी पंडित
@महापौर -सुलोचना
@स्पीकर -सुशीला नायर
@एव्हरेस्ट काबीज करणारी -बचेंद्री पाल
@मुस्लीम राज्यकर्ता -रझिया सुलतान
@क्रांतीकारक-भिकाई कामा
@राज्यपाल -सरोजनी नायडू
@पंतप्रधान -इंदिरा गांधी
@मुख्यमंत्रीसुचेता कृपलानी (यु.पी)
@आय.ए.एस -आण्णा राजम जार्ज

मारिएक लुकास रिसनेवेल्ड यांनी ‘आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2020’ जिंकला.



🔰2020 वर्षासाठीचा ‘आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक’ नेदरलॅंडच्या लेखिका आलेल्या 29 वर्षीय मारिएक लुकास रिसनेवेल्ड यांना दिला जाण्याचे जाहीर झाले आहे. बुकर पारितोषिक मिळवणाऱ्या त्या सर्वात कमी वयाच्या लेखक ठरल्या आहेत.

🔰नदरलॅंडमधल्या ग्रामीण भागातल्या एका धार्मिक शेतकरी कुंटुबाच्या कहाणीवर आधारित “द डिसकंफर्ट ऑफ ईवनिंग’ या पुस्तकासाठी त्यांना हा पारितोषिक दिला गेला आहे. पारितोषिकाची 50 हजार पौंड रक्कम लेखिका आणि अनुवादक मिशेल हचिंसन यांच्यात विभागून दिली जाणार आहे.

‼️आतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक....

🔰हा ब्रिटनमध्ये (UK) दिला जाणारा आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार आहे. ‘मॅन ग्रुप’ या संस्थेतर्फे दिला जाणारा हा पुरस्कार इंग्रजी भाषेत प्रकाशित होणार्‍या कल्पित साहित्यासाठी तसेच किंवा सामान्यत: इंग्रजी भाषेत भाषांतरित केल्या गेलेल्या साहित्यासाठी कोणतेही राष्ट्रीयत्व असलेल्या जिवंत लेखकाला दिला जातो.

🔰मन बुकर पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर जून 2004 मध्ये या आंतरराष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली. 2005 साली पहिला पुरस्कार दिला गेला. पन्नास हजार पौंडांचा हा पुरस्कार असून तो लेखक व अनुवादक यांच्यात समानरूपाने वाटला जातो.

जगातील सगळ्यात मोठं ‘अटल टनल’ तयार



🔰 १० हजार फुट लांब असलेला जगातिल सगळ्यात लांब रोड टनल अखेर भारतात तयार झाला आहे.

🔰 हा टनेल तयार करण्यासाठी १० वर्षांचा कालावधी लागला आहे. रोहतांग येथे तयार करण्यात आलेल्या बोगद्याचं नाव ‘अटल टनल’ आहे.

🔰 माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरून या बोगद्याचे नाव ठेवलं आहे.

🔰 जयाची लांबी ८.८ किलोमीटर इतकी आहे. १०, १७१ फुटांवर अटल रोहतांग टनेल तयार करण्यात आलं आहे उंच टनेल आहे. या टनेलमुळे मनाली ते लेह हे अंतर ४६ किलोमीटरनं कमी झाले आहे.

🔰 समुद्रसपाटीपासून जवळपास १२ हजार फुटांच्या उंचीवर साकारण्यात येणारा हा बोगदा जगातील सर्वात मोठा ट्रॅफिक टनल मानला जात आहे.

बँकांची वसुली ; 'गुगल पे' वापरासाठी लागणार शुल्क



🔰आतापर्यंत 'गुगल पे'च्या वापरासाठी एकही रुपया आकारला जात नव्हता. आता मात्र अॅक्सिस बँकेसह काही खासगी बँकांनी गुगल पेसाठी दरमहा २० व्यवहार झाल्यानंतर पुढील सर्व व्यवहारांसाठी पैसे आकारायला सुरुवात केली आहे.


🔰आतापर्यंत 'गुगल पे'च्या वापरासाठी एकही रुपया आकारला जात नव्हता. आता मात्र अॅक्सिस बँकेसह काही खासगी बँकांनी गुगल पेसाठी दरमहा २० व्यवहार झाल्यानंतर पुढील सर्व व्यवहारांसाठी पैसे आकारायला सुरुवात केली आहे. तीन रुपयांपासून ते मोठ्या व्यवहारांना १० रुपयांपर्यंत दर आकारण्यात येत आहे. यामुळे असंख्य ग्राहकांना आता 'गुगल पे' वापरण्यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. बँकांनी महिन्याला २० व्यवहारांची मर्यादा ठेवली असून हे व्यवहार चार-पाच दिवसांतच पूर्ण होतात. उरलेले दिवस जे व्यवहार होतील त्यावर अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. गुगल पे आणि बँकांकडून यासंबंधी ग्राहकांना कोणत्याही सूचना दिल्या जात नसल्याने नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे. यामुळे आता गुगल पेसारख्याच पण मोफत सेवा देणाऱ्या इतर पर्यायांकडे वळण्याशिवाय पर्याय नाही.

Latest post

चालू घडामोडी :- 18 मार्च 2024

◆ दिव्यांग तिरंदाज व अर्जुन पुरस्कार मिळवणारी शीतल देवी यांची भारतीय निवडणुक आयोगाची राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्व म्हणून निवड केली. ...