Wednesday 1 June 2022

सात बेटांचे शहर: मुंबई


🎯 महाराष्ट्रातील मुंबई हे शहर सात बेटांनी बनलेले आहे.

🎯 पूर्वी मुंबई येथे सात लहान-मोठ्या आकाराची बेटे अस्तित्वात होती.

🎯 या बेटांच्या मधील खाडी व खाजणात भराव घालून त्यांचे एकत्रीकरण करण्यात आले व आत्ताचे मुंबई नगर अस्तित्वात आले.

☑️ मुंबईची सात बेटे खालीलप्रमाणे

1) माहीम (Mahim)
2) वरळी (Worli)
3) परळ (Parel)
4) माझगाव (Mazgaon)
5) मुंबई (Bombay)
6) कुलाबा (Calaba)
7) छोटा कुलाबा (म्हातारीचे बेट - Old Woman's Island)

🎯 एकसंघ मुंबईची निर्मिती

☑️ या बेटांदरम्यानचा समुद्र फारच उथळ होता व ठिकठिकाणी खाजणे होती.

☑️ ओहोटीच्या वेळी बराचसा भाग उघडा पडत असे. 

☑️ जेराल्ड इंजिनिअर (१६७०-७७) या मुंबईच्या दुसऱ्या ब्रिटिश गव्हर्नरने या सात बेटांमधील खाड्या बुजविण्याचा व समुद्र हटविण्याचा कार्यक्रम हाती घेतला.

☑️ त्याच्यानंतर तो टप्पा-टप्प्याने राबविला जाऊन या सात बेटांचे एकत्रीकरण होऊन मुंबई बेटाची निर्मिती झाली.

☑️ मुंबई बेटावर पूर्व व पश्चिम भागांत नैर्ऋत्य-ईशान्य दिशेत पसरलेले व एकमेकांस समांतर असलेले दोन कमी उंचीचे खडक आहेत.

☑️ त्यांपैकी बेटाच्या पश्चिम भागातील खडक मलबार पॉईंट पासून वरळी पर्यंत पसरला आहे.

☑️ या खडकाची मलबार हिल येथील समुद्र सपाटीपासून उंची ५५ मीटर असून तेच मुंबईतील सर्वोच्च ठिकाणी आहे.

☑️ दुसरा खडक बेटाच्या पूर्व भागात साधारण डोंगरीपासून शीवपर्यंत तुटकतुटक पसरलेला आहे.

☑️ या खडकामुळे व नरीमन पॉईंटच्या भूशिरामुळे त्याच्या पूर्व बाजूवर असलेल्या मुंबई बंदराचे खुल्या सागरापासून संरक्षण झालेले आहे.

☑️ या दोन्ही खडकांतर्गत मलबार, खंबाला, वरळी, पाली, गिल्बर्ट, शिवडी, ॲंटॉप इत्यादी लहानलहान टेकड्या आहेत.

☑️ या दोन्ही खडकांदरम्यानचा प्रदेश सपाट असून मलबार हिल व नरीमन पॉईंटच्या दरम्यान बॅक बे हा उथळ समुद्रभाग आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा : 2022 .


◆ CSAT Qualified झाल्यामुळे आता GS ला जास्त महत्व प्राप्त झाले आहे. परंतु ज्यांचे CSAT अगोदरच व्यवस्थित नव्हते त्यांनी याकडे दुर्लक्ष करू नका.

◆  काही विद्यार्थ्यांच्या मते मागील काही परीक्षेत चालू घडामोडी ची काठिण्य पातळी वाढली आहे. तर माझ्या मते विद्यार्थी जे चालू घडामोडी साठी पुस्तक/मासिक वाचत असतात आणि त्यातून जर परीक्षेत प्रश्न नाही आले तर ते थेट प्रश्नांची काठिण्य पातळी वाढली असं म्हणतात. कारण त्या Q चा Source त्यांच्या जवळ नसतो. आणि मुख्यतः आपण विद्यार्थी मासिक/ News Paper खूप वाचतो परंतु आपल्याला जे गरजेचे आहे ते आपण करत नाहीत म्हणजे आपण कधी MCQ ची प्रॅक्टिसचं करत नाहीत. त्यामुळे तो विषय आपल्याला अवघड किंवा त्या विषयाची काठिण्य पातळी वाढली असे वाटते.

◆ आता आपण सर्व विद्यार्थीच आहोत , चालू घडामोडी चे प्रश्न वयक्तिक मला तरी कधी अवघड गेले नाहीत . 15 ते 16 प्रश्नांपैकी हमखास मला मागील परीक्षेत 12 ते 13 मार्क मिळत आले आहेत .माझा  इथे सांगण्याचा उद्देश एकच आहे तो म्हणजे आपण चालू घडामोडी कडे खूप दुर्लक्ष करत असतो. परीक्षा जवळ आली की 1 वर्षाचे 12 मासिक एकदाच गोळा करतोत आणि वाचत बसतोत. ही चुकीची पद्धत आहे.

◆ मागील काही आयोगाचे पेपर बघून आपल्याला असे दिसते की किमान आपण परीक्षेच्या अगोदरचे 2 वर्षाचे तरी चालू घडामोडी चांगले करावे म्हणजे आपल्याला  अपेक्षित मार्क मिळतील....

◆ 21 ऑगस्ट ला होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी किमान आपण जानेवारी 2021 पासून चे चालू घडामोडी चांगले केलेच पाहिजे . [ त्या अगोदरचेही काही केले तर उत्तमच ] .

◆ या वर्षी 🔥GS ला किमान 120 चे टार्गेट 🔥ठवा आणि त्यानुसारच अभ्यास करा. अभ्यास हा व्यवस्थित प्लॅन/Schedule नेच करा , काहीही वाचून मार्क मिळत नाहीत.

💐 सर्वांना शुभेच्छा 💐

Latest post

चालू घडामोडी :- 17 मार्च 2024

◆ काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे. ◆ 2025 मध्ये चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान ...