Friday 13 September 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे राज्यशासन’ या शब्दसमूहाला खालील योग्य शब्द सांगा.

   1) सावकारशाही    2) राजेशाही   
   3) सामंतशाही      4) जमीनदारशाही

उत्तर :- 3

2) खालीलपैकी शुध्द शब्द कोणता ?
   1) आध्यात्मिक      2) अध्यात्मिक   
   3) आध्यात्मीक      4) अधात्मिक

उत्तर :- 1

3) मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला आहे ?

   1) क्‍      2) ण्‍      3) ळ      4) क्ष्‍
उत्तर :- 3

4) पुनर् + जन्म हा कोणत्या संधीयुक्त शब्दाचा विग्रह आहे ?

   1) पुर्नजन्म    2) पूर्ण जन्म    3) पुनर्जन्म    4) पुनर्जम्न

उत्तर :- 3

5) अचूक विधाने निवडा.

   अ) शब्द आणि पद हे एकसारखेच आहे.
   ब) शब्दापासून पदे बनतात.
   क) पदापासून शब्द बनतात.
   1) फक्त अ अचूक  2) फक्त अ आणि क अचूक
   3) फक्त ब अचूक    4) फक्त क अचूक

उत्तर :- 3

https://t.me/CompleteMarathiGrammar

6) खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. – ज्याने हे भांडण उरकले, तो माघार घेईल.

   1) दर्शक सर्वनाम    2) संबंधी सर्वनाम   
   3) आत्मवाचक सर्वनाम    4) पुरुषवाचक सर्वनाम

उत्तर :- 2

7) ‘झाड पाडले’ या वाक्यात ‘पाडले’ या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

   1) संयुक्त क्रियापद    2) प्रयोजक क्रियापद
   3) अनियमित क्रियापद    4) शक्य क्रियापद

उत्तर :- 2

8) ‘मला बोलवत नाही’ अधोरेखित शब्दाचा क्रियापद प्रकार ओळखा.

   1) प्रयोजक      2) शक्य     
   3) सहाय्यक      4) अकर्तृक

उत्तर :- 2

9) पर्यायी उत्तरांतील ‘अवधिवाचक कालवाचक क्रिया – विशेषण’ कोणते ?

   1) दिवसेंदिवस थंडी वाढतच गेली      2) पक्षीण क्षणोक्षणी पडत होती
   3) नेहमी त्यांचे असेच असते      4) तो कैकवेळा सांगूनही आला नाही

उत्तर :- 3

10) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. – कोंडिबा झाडाखाली शांत झोपला होता.

   1) केवलप्रयोगी      2) क्रियाविशेषण   
   3) शब्दयोगी अव्यय    4) नाम

उत्तर :- 3

प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीत पुन्हा ‘सम-विषम

📌नवी दिल्ली प्रचंड प्रमाणात वाढलेले वायू प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री यांनी शुक्रवारी विविध उपाययोजनांची घोषणा केली.

📌 त्यात प्रामुख्याने खासगी वाहनांसाठी योजनेची पुन्हा अंमलबजावणी केली जाणार आहे.

📌 येत्या ४ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत वाहनांवर निर्बंध आणणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.

📌सम-विषम योजनेनुसार, ज्या वाहनांचा नोंदणी क्रमांक सम आहे ती वाहने केवळ सम तारखेलाच, तर ज्या वाहनांची नोंदणी क्रमांक विषम आहे ती वाहने केवळ विषम तारखेलाच रस्त्यावर चालवता येऊ शकतील.

📌 विषम क्रमांकांच्या गाड्या ५, ७, ११, १३, आणि १५ तारखेला रस्त्यांवर धावू शकतील, तर सम क्रमांकांच्या गाड्या ४, ६, ८, १२ आणि १४ तारखेला रस्त्यांवर धावू शकणार आहेत.

📌 या योजनेची विस्तृत माहिती नागरिकांना लवकरच सांगितली जाईल, असे केजरीवाल यांनी सांगितले.

📌याआधी सन २०१६ मध्ये जानेवारी आणि एप्रिल महिन्यात केजरीवाल सरकारने दिल्लीमध्ये सम-विषम योजनेची अंमलबजावणी केली होती.

📌नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना तेव्हा प्रत्येकी दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला होता.

📌शिवाय दुचाकी आणि महिला वाहनचालकांना या नियमातून सूट देण्यात आली होती. दिल्लीमधील प्रदूषणाची पातळी ११ महिने कमी असते, मात्र नोव्हेंबरमध्ये ती कमालीची वाढते.

📌कारण या महिन्यात शेजारच्या पंजाब, हरयाणा या राज्यांमध्ये पिकांची कापणी केल्यानंतर उरलेले भुसकट मोठ्या प्रमाणात जाळले जाते.

📌त्यामुळे दिल्लीच्या आकाशात अक्षरश: धुराचे ढग दाटून येतात. या प्रदूषणामुळे दिल्ली शहर गॅस चेंबर बनते, असे केजरीवाल यांनी सांगितले.

📌केंद्र सरकार तसेच पंजाब आणि हरयाणा राज्य सरकारे भुसकट जाळण्याचे प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांना दिल्ली सरकार शक्य ती सर्व मदत करेल, असेही केजरीवाल म्हणाले. 

📌सात कलमी कृती कार्यक्रम प्रचंड प्रमाणात वाढलेले वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी शुक्रवारी सम-विषम योजनेसह सात कलमी कृती कार्यक्रमाची घोषणा केली. त्यामध्ये प्रदूषणरोधक मास्कचे मोठ्या प्रमाणात वाटप करणे, रस्ते झाडण्यासह रस्त्यांवर पाणी शिंपडणे, वृक्ष लागवड आणि शहरातील प्रदूषणयुक्त प्रमुख १२ ठिकाणी विशेष योजना राबवणे या उपाययोजनांचा समावेश आहे.

📌या व्यतिरिक्त दिवाळीमध्ये फटाक्यांचा वापर करू नये, असे आवाहन नागरिकांना करताना केजरीवाल म्हणाले की, दिवाळीच्या पूर्वसंध्येला सरकारतर्फे लेझर शोचे आयोजन केले जाईल.

बी. एन. युगंधर यांचे निधन

🔰माजी प्रशासकीय अधिकारी आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांचे वडील बी. एन. युगंधर यांचे शुक्रवारी दुपारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.

🔰सन १९६२च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या युगंधर यांनी

🔰दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या कार्यकाळात पंतप्रधान कार्यालयात सेवा बजावली होती.

🔰मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीचे संचालक म्हणून देखील त्यांनी काम केले होते.

🔰युगंधर यांनी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयात सचिव पदाची जबाबदारी पार पाडली होती.

🔰नियोजन आयोगाचे सदस्य असताना त्यांनी अपंगत्वाचा मुद्दा नियोजनामध्ये समाविष्ट करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

🔰आयएएस अधिकाऱ्यांमध्ये युगंधर हे अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व होते

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून पद्म पुरस्कारांसाठी नऊ महिला खेळाडूंची शिफारस


 
◾️नवी दिल्ली :  सहा वेळची जागतिक अजिंक्यपद विजेती बॉक्सर मेरी कोमची केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून यंदाच्या पद्मविभूषण पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. भारतरत्ननंतर देशातल्या दुसऱ्या सर्वोच्च पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेली मेरी कोम ही पहिली महिला खेळाडू ठरली आहे.

मेरी कोमसह यंदा 9 महिला खेळाडूंची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करण्यात आली आहे. त्यात जागतिक सुवर्णविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचं नाव पद्मभूषण पुरस्कारासाठी सुचवण्यात आलं आहे. स्वित्झर्लंडच्या बेसिलमध्ये नुकत्याच झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूनं पहिल्यांदाच भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. हैदराबादच्या या सुवर्णकन्येला 2015 साली पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता.

याशिवाय क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, पैलवान विनेश फोगाट, टेबल टेनिसपटू  मनिका बत्रा, भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, नेमबाज सुमा शिरुर, गिर्यारोहक ताशी आणि नुंगशी मलिक या जुळ्या बहिणींची पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

36 वर्षांची मेरी कोम पद्मविभूषण पुरस्काराचा मान मिळवणारी एकूण चौथी तर पहिली महिला क्रीडापटू ठरणार आहे. याआधी 2007 साली ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद, 2008 साली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सर एडमंड हिलरी यांना पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

विक्रमी सहा वेळा जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा जिंकणाऱ्या मणिपूरच्या सुपरमॉम मेरी कोमला 2013 साली पद्मभूषण तर 2016 साली पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

पद्म पुरस्कारासाठी शिफारस झालेल्या या सर्व खेळाडूंची नावं पद्म पुरस्कार समितीकडे पाठवली जाणार आहेत. त्यातून प्रजासत्ताक दिनाआधी पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात येईल.

अरुणाचल प्रदेश : चीन सीमेवर प्रथमच भारतीय लष्कर करणार मोठा युद्धाअभ्यास



🔺 पाच हजार जवानांसह वायुसेनेचाही असणार सहभाग

◾️भारतीय लष्कराकडून वायुसेनेबरोबर चीनच्या सीमेवर ऑक्टोबर महिन्यात मोठा युद्धाअभ्यास केला जाणार आहे. भारतीय सेनेच्या एकमेव ’17 – माउंटन स्ट्राइक कोर’चे पाच हजार जवान अरूणाचल प्रदेशात होणाऱ्या या मोठ्याप्रमाणावरील युद्धाअभ्यासात सहभागी होणार आहेत. चीनच्या सीमेवर भारतीय सेनेचा हा पहिलाच युद्धाअभ्यास असणार आहे. या ठिकाणी युद्धजन्य परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी जवानांना तैनात केले जाणार आहे.

यासाठी नवनिर्मित ’17 – माउंटन स्ट्राइक कोर’ कडून पाच ते सहा महिन्यांपासून ईस्टर्न कमांड अंतर्गत तयारी केली जात आहे. सेनेच्या सुत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार युद्धाअभ्यासात तेजपूरमधील 4 कोर तुकड्यांना सेनेच्या रक्षणासाठी एका अतिउच्च ठिकाणी तैनात केले जाणार आहे. यामध्ये ’17 – माउंटन स्ट्राइक कोर’ च्या अडीच हजारपेक्षा जास्त जवानांना वायुसेना युद्धाअभ्यासासाठी एअरलिफ्ट करणार आहे. या युद्धाअभ्यासादरम्यान स्ट्राइक कोरचे जवान, 4 कोरच्या जवानांवर हवाई हल्ला करणार आहेत.

ANI Digital


Indian Army troops along with Air Force will carry out a massive war game in Arunachal Pradesh in October where Forces will be deployed to practice real war-like situation on Eastern Front

१०:४२ म.पू. - ११ सप्टें, २०१९

या युद्धाअभ्यासासाठी वायुसेना पश्चिम बंगालमधील बगदोगरा येथून सैनिकांना एअरलिफ्ट करणार आहे. यासाठी वायुसेना सी-17 ग्लोबमास्टर, सी-130 जे सुपर हरक्युलिस आणि एएन-32 या विमानांचा वापर करणार आहे. ज्यामुळे लवकरात लवकर युद्ध क्षेत्राच्या ठिकाणी सैन्य तैनात करता येणार आहे.

याशिवाय या युद्धाअभ्यासात ’17 – माउंटन स्ट्राइक कोर’ च्या हॉवित्झर तोफांबरोबर रणगाडे आणि लष्कराच्या लढाऊ तुकड्यांचा शस्त्रसज्जतेसह समावेश असणार आहे. या युद्धाअभ्यासाचे आयोजन चीन बरोबर पर्वतीय क्षेत्रात युद्धासाठी ’17 – माउंटन स्ट्राइक कोर’ ला अधिक सक्षम बनवण्यासाठी केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

MPSC अध्यक्षपदी सतीश गवई यांची नियुक्ती.

प्रभारी अध्यक्ष पदावरून चंद्रशेखर ओक निवृत्त. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्य आणि प्रभारी अध्यक्ष पदावरून चंद्रशेखर ओक  आज निवृत्त झाले असून आयोगाच्या अध्यक्ष पदावर निवृत्त अतिरिक्त मुख्यसचिव सतीश गवई यांची नियुक्ती राज्य सरकारने केली आहे.

    राज्य सरकारच्या सेवेतून 2 वर्षापूर्वी चंद्रशेखर ओक निवृत झाल्यानंतर त्याची लोकसेवा आयोगाच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली  होती. शिवाय अध्यक्ष पदाचा प्रभारी अध्यक्ष पदाची सुत्रही  सोपविण्यात आली होती. आयोगाच्या घटनेत कमीत  कमी 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण होत पर्यन्त कार्यरत राहु शकतात अशी तरतूद आहे. ओक यांना 15 सप्टेंबर रोजी 62 वर्ष पूर्ण होत असल्याने आणि पुढील दोन दिवस सुट्टी असल्याने आज शासनातर्फे ओक यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. आयोगात मिळालेल्या 15 महिन्याच्या कालावधीनंतर ओक आज निवृत झाले असून त्यांनी आपल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.   

लवकरच चलनात येणार 550 रुपयांचं नवीन नाणं

◾️श्री गुरु नानक देव यांच्या 550 व्या प्रकाश पर्वाची जय्यत तयारी सुरु आहे. श्री गुरु नानक देव यांच्या जयंती पर्वानिमित्त केंद्र सरकारकडून 550 रुपयांचं नवीन नाणं जारी करण्यात येणार असल्याची माहिती शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे प्रमुख भाई गोविंदसिंग यांनी दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शीख समुदायाकडून सरकारचे कौतूक करण्यात येत आहे.

◾️केंद्र सरकारला 550 रुपयांच्या नवीन नाण्याच्या डिझाईनसाठी संत शिरोमणी कमेटीने मंजूरी दिली आहे. श्री बेर साहेब सुल्तानपुर लोधी येथे 12 नोव्हेंबर रोजी गुरु नानक यांच्या 550 व्या जयंती मोहत्सवामध्ये केंद्र सरकार या नवीन नाण्याचे अनावरण करण्यात येणार

🔘असे असेल नवीन 550 रुपयांचे नाणे🔘

◾️श्री गुरु नानक देव यांच्या जयंती पर्वानिमित्त केंद्र सरकारकडून 550 रुपयांचं नवीन नाण्यावर प्रथम गुरुद्वारा श्री बेर सुल्तानपूर लोधी यांचा फोटो लावण्याचे शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने सुचवले आहे.

◾️केंद्र सरकारने या नाण्यावरील एका बाजुला गुरुनानक देवजी यांचे जन्मस्थान नानकाना साहिब गुरुद्वाराचा फोटो छापण्याचे ठरवले आहे.

◾️हे नाणे बनवण्यासाठी 50 टक्के लोखंड आणि 40 टक्के तांब्याचा वापर करण्यात येणार आहे. हे नाणे आकाराने 10 रुपयांच्या नाण्यापेक्षा मोठे असेल.

सराव प्रश्नमालिका 13/9/2019

1. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे केली?
सिंगापूर
टोकिओ
रंगून
बर्लिन

● उत्तर - सिंगापूर

2. इंडिया इंडिपेंडन्स लीगची (भारतीय स्वातंत्र्य संघाची) स्थापना कोणी केली?
सुभाषचंद्र बोस
राशबिहारी बोस
जगन्नाथराव भोसले
कॅप्टन मोहन सिंग

● उत्तर - राशबिहारी बोस

3. ……… या संतांचे गुरू जनार्दन स्वामी होते?
संत ज्ञानेश्वर
संत एकनाथ
संत तुकाराम
संत नामदेव

● उत्तर - संत एकनाथ

4. ज्ञानेश्वर महाराजांचा ग्रंथ कोणता?
ज्ञानेश्ररीची शुध्द प्रत
भावार्थ रामायण
मनाचे श्लोक
ज्ञानेश्वरी
● उत्तर - ज्ञानेश्वरी

5. पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युध्दात अतिशुरपणे दीर्घकाळ कोण लढले?
तात्या टोपे
राणी लक्ष्मीबाई
शिवाजी महाराज
नानासाहेब पेशवे

● उत्तर - तात्या टोपे

6. भारतात आल्यानंतर गांधीजीनी पहिली चळवळ कोठे घडवून आणली?
बाडोंली
खेडा
चंपारण्य
चौरीचौरा

● उत्तर - चंपारण्य

7. पुणे समाचार हे दैनिक कोणी सुरू केले?
बाबा पद्मजी
गो.ग. आगरकर
शि.म. परांजपे
श्रीधर व्यंकटेश केतकर

● उत्तर - श्रीधर व्यंकटेश केतकर

8. अक्कलकोटच्या युवराजांना शिकवण्यासाठी सरकारने कोणाची नेमणूक केली हाती?
नाना जगन्नाथ शंकरशेठ
बाळशास्त्री जांभेकर
विष्णूशास्त्री पंडित
विष्णूबुवा ब्रह्मचारी

● उत्तर - बाळशास्त्री जांभेकर

9. खालीलपैकी योग्य जोडी कोणती?
बार्डोली सत्याग्रह - सरदार वल्लभभाई पटेल
असहकार चळवळ - लोकमान्य टिळक
चंपारण्य सत्याग्रह - गो.कृ.गोखले
रामकृष्ण मिशन द्यानंद सरस्वती

● उत्तर - बार्डोली सत्याग्रह - सरदार वल्लभभाई पटेल

10. र्इष्ट असेल ते बोलणार,  साध्य असेल ते करणार हे कोणत्या नियतकालिकाचे ब्रीदवाक्य?
केसरी
मराठा
ज्ञानोदय
सुधारक (गो.ग आगरकर)

● उत्तर - सुधारक (गो.ग आगरकर)

नुकत्याच आलेल्या ग्लोबल रँकिंग 2020 च्या टॉप - 300 मध्ये भारतातील एकाही विद्यापीठाच्या नावाचा समावेश नाही

◾️2012 नंतर ही पहिली क्रमवारी आहे ज्यात टॉप 300 मध्ये भारतातील एकही विद्यापीठ नाही. परंतू भारताने ओवरऑल रँकिंगमध्ये 2018 च्या तुलनेत आपली क्रमवारी सुधारली आहे, यंदा या क्रमवारीत भारतीय विद्यापीठाची संख्या जास्त आहे.

◾️2018 साली या यादीत 49 संस्थांना स्थान मिळाले होते. तर यंदा 56 संस्थाना स्थान मिळाले आहे. परंतू याच यादीत चीनच्या विद्यापीठांची संख्या जास्त आहे.

◾️चीनचे Tsinghua विद्यापीठ ग्लोबल रँकिंगमध्ये 23 व्या स्थानी आहे तर Peking 24 व्या स्थानी.

◾️ही रँकिंग टाइम्स हायर एज्युकेशनची वर्ल्ड यूनिवर्सिटी रँकिंग 2020 आहे. ही रँकिंग शैक्षणिक संस्थाचे प्रदर्शन आणि शैक्षणिक स्तर यावर आधारित असते. यात 92 देशांच्या एकूण 1,300 विद्यापीठांचा समावेश आहे.

🔘 कोणतीही आहेत सर्वश्रेष्ठ विद्यापीठ 🔘

◾️मागील चार वर्षांपासून यूनिवर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड पहिल्या स्थानी आहे. यंदा देखील तीच यूनिवर्सिटी पहिल्या स्थानी आहे. अशियातील फक्त 2 विद्यापीठ सर्वश्रेष्ठ यादीत वरच्या क्रमांकावर आहेत, परंतू त्या देखील चीनमधील आहेत.

🔶 टॉप 5 विद्यापीठे 🔶

1. यूनिवर्सिटी ऑफ ऑक्‍सफोर्ड (ब्रिटेन)

2. कॅलिफोर्निया इंस्‍टिट्यूट ऑफ टेक्‍नोलॉजी (अमेरिका)

3. यूनिवर्सिटी ऑफ कैम्ब्रिज (ब्रिटेन)

4. स्‍टँडफोर्ड यूनिवर्सिटी (अमेरिका)

5. मेसाचुसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अमेरिका)

टॉप - 500 मध्ये भारतीय विद्यापीठांना स्थान -

◾️टॉप - 300 मध्ये भारतीय विद्यापीठांनी आपले स्थान निर्माण केले नसले तरी टॉप - 500 मध्ये भारतातील 6 विद्यापीठांनी स्थान मिळवले आहे.

◾️यात इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, रोपड पहिल्या 350 मध्ये आहे. तर इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरु टॉप 500 मध्ये आहे. IIT दिल्ली, IIT खडकपूर आणि जामिया मिल्लिया सह काही विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे.

Latest post

महाराष्ट्राचा भूगोल

दख्खनवरील पठारे ------------------------------------------------------------ ----------------------- अ.क्र. पठार. जिल्हा. ------------------...