Friday 30 June 2023

स्पर्धा मंच प्रश्नोत्तर सराव


🔸१) वर्ध्याजवळच महात्मा गांधींनी वसविलेले 'सेवाग्राम' आहे. सेवाग्रामचे नाव पूर्वी .... असे होते. 

- शेगाव


🔹२) जमनालाल बजाज केंद्रीय ग्रामोद्योग अणुसंधान संस्था कोठे आहे?

- वर्धा


🔸३) जगाच्या इतिहासात सर्वांत मोठे धर्मांतर एकाच दिवशी आणि तेही शांततामय मार्गाने नागपूर येथे घडून आले. कोणत्या दिवशी ? 

- १४ ऑक्टोबर, १९५६


🔹४) 'नागझिरा' हे वन्यप्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ? 

- गोंदिया


🔸५) थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे म्हैसमाळ हे स्थळ औरंगाबाद जिल्ह्यात आहे; तर हीच ओळख असलेले जव्हार हे स्थळ .... जिल्ह्यात आहे.

- पालघर


🔸१) इ. स. १९४६ मध्ये स्थापन झालेली व नंतरच्या काळात 'आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट' म्हणून ख्यातनाम झालेली

संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे?

- पुणे


🔹२) इ. स. १९७४ मध्ये स्थापन झालेली 'वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट' राज्यात कोठे आहे? 

- मांजरी (पुणे)


🔸३) पुण्यातील शनिवारवाडा बांधण्याचे श्रेय कोणत्या पेशव्यास द्यावे लागेल?

- पहिला बाजीराव पेशवा 


🔹४) पुण्याजवळ .... येथे 'स्व. राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान' विकसित होत आहे. 

- हिंजेवाडी


🔸५) इ. स. पूर्व पहिल्या शतकापासून सध्याच्या जुन्नर जवळच्या .... येथून घाटमाथा व तळकोकण यांच्यामध्ये व्यापार व दळणवळण चालत होते. 

- नाणे घाट


🔸१) उत्तर कोंकणी भाषेच्या .... या बोलीवर उर्दूचा प्रभाव आढळतो.

- बाणकोटी


🔹२) भौगोलिक निकटत्वामुळे मराठीच्या ..... या उपभाषेवर किंवा बोलीवर काहीसा गुजरातीचाही ठसा आढळतो.

- खानदेशी


🔸३) मराठीच्या .... या बोलीस किंवा उपभाषेस अहिरांची भाषा म्हणून 'अहिराणी' असेही म्हणतात.

- खानदेशी


🔹४) सन १८८१. मध्ये विकसित करण्यात आलेले व आता 'फिरोजशहा मेहता उद्यान' म्हणून ओळखले जाणारे मुंबई येथील उद्यान पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते ?

- हँगिंग गार्डन


🔸५) मुंबई येथील 'हुतात्मा चौक' म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात होता ?

- फ्लोरा फाऊंटन

भिल्लांचे उठाव



०१. १८१८ मध्ये ब्रिटिशांनी खानदेश ताब्यात घेतला. भिल्लांची वस्ती विशेषतः याच भागात असल्याने भिल्लांच्या मनात इंग्रजाबद्द्ल द्वेष निर्माण झाला. त्यामुळे त्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. त्रिंबकजी डेंगळे, भिल्ल नाईक, दसरत व धानजी, हरिया (हिरा), निहाल, सेवाराम सोनार (घिसाडी), भागोजी नाईक, खर्जासिंग, भीमा नाईक, उचेतसिंग पवार यांनी या उठावाचे नेतृत्व केले.


०२. त्रिंबकजी ढेंगळे हा दुसऱ्या बाजीरावचा मित्र व मराठा सरदार होता. दुसऱ्या बाजीरावच्या पराभवानंतर डेंगळेला ठाण्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तेथून तो पळाला व त्याने भिल्लांना इंग्रजांविरुद्ध बंड करण्यास चिथविले. त्याने उठावाची सूत्रे त्याचे पुतणे गोदाजी व महिपा डेंगळे यांच्यावर सोपविली. तत्कालीन कलेक्टर कॅप्टन ब्रिग्जने उठावाचा बंदोबस्त करण्यासाठी भिल्लांचे मुडदे पाडले व डोंगरातील वाटघाटांवर सैन्य ठेऊन त्यांची रसद बंद केली.


०३. पण याउलट मुंबईचा गवर्नर माउंट एल्फिन्सटन याने मात्र भिल्लांना पेन्शन व काम देऊन त्यांचा बंदोबस्त केला.त्यांची वेगळी तुकडी उभारून आडमाळावर त्यांना तैनात केले. नादीरसिंह या भिल्ल डाकुस त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीनेच पकडण्यात आले.


०४. नोकऱ्या देऊनही भिल्ल थंड झाले नाहीत. त्यांनी उठाव सुरूच ठेवला. इंग्रजांनी भिल्लांच्या बंदोबस्तासाठी त्यांना माफी देण्याची घोषणा केली. यावेळी भिल्लाचे नेतृत्व सातमाळ्याचा भिल्ल नाईक करत होता. कॅप्टन ब्रिग्ज ने भिल्ल नाईकास पकडून त्याला फाशी दिली यासोबत शेख सादुल्ला यास कठोर शिक्षा केली.


०५. डसरत व धानजी हे लासूरच्या भिल्लांचे प्रमुख होते. त्यांनी १८२० मध्ये विशेषतः सातपुडा प्रदेशात गावे व घरे बेचिराख करण्याचे सत्र चालविले. त्यांच्या टोळीत शेख दुल्ला हा पेंढारी सामील झाला. मेजर मोरीन याने १०० मैलांवरील महत्वाच्या जागा जिंकल्याने दक्षिण भिल्लांच्या प्रमुखाना शरणागती पत्करावी लागली.


०६. १८२२ मध्ये सातमाळ्याचा हरिया व सातपुड्याचा निहाल भिल्ल यांनी भिल्लांच्या उठावाचे नेतृत्व केले. यांच्या काळात अंदाधुंदी, बलात्कार व शोषणास मर्यादा राहिल्या नाहीत. यावेळी कॅप्टन रॉबिन्सन याने भिल्लांना यशस्वीरित्या दडपले.


०७. १८२५ मध्ये सेवाराम सोनारच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला. यावेळी राजकीय नेत्यांनीसुद्धा याला पाठींबा दिला. सेवारामने साताराच्या राजाच्या नावाने बनावट पत्रे तयार केली व ती राजाच्या आदेशानुसार बागलान तालुक्यातील भिल्लांना वाटली. ही पत्रे भिल्लांनी उठाव करण्यासंदर्भातील होती.


०८. त्यानुसार भिल्लांनी लुटालूट केली. त्यांनी उतारपूरवर हल्ला केला व तेथील लुट मुरली महाल या किल्ल्यात ठेवली. लेफ्टनंट औट्रम याने यातील काही लुट परत मिळविली व सेवाराम व त्याच्या सहकाऱ्यांना पकडले. सेवारामबाबत औट्रम ने मवाळ भूमिका घेतली व भिल्लांच्या जमिनी परत दिल्या.


०९. १८२८ पर्यंत भिल्लांचे उठाव कमी झाले पण संपले नव्हते. पानिपतच्या लढाईत मरण पावलेल्या पवारांचा पणतू उचेतसिंग पवार याने धारच्या पवारांकडून गादी मिळविण्यासाठी भिल्लांना सोबत घेऊन दोन वेळा हल्ला केला होता. दोन्ही वेळेस तो पराभूत झाला.


१०. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात भिल्ल लोकांनी कोनारराव याच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरुद्ध बंड केले. पण सुसूत्रता नसल्याने इंग्रजांना बंड दडपून टाकणे सोपे ठरले.


११. काजरसिंग नाईक याने १८७५ च्या वेळी खानदेशात ब्रिटीशांविरुद्ध भिल्लाच्या उठावात नेतृत्व केले. तो पूर्वी ब्रिटीशांच्या पोलिस दलात होता. त्याने ब्रिटीशांचा ७ लाखाचा खजिना लुटला. १८५७ च्या अंबापाणी लढाईत भिल्लची ब्रिटीशांशी लढाई झाली. यात स्रियांचाही सहभाग होता.

महत्त्वाचे प्रश्नोत्तरे


१) खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते सांगा.

अ) भारतीय भूमिपृष्ठाचा तोल दक्षिण कातळाने (डेक्कन ट्रॅपने ) सांभाळला आहे. या दक्षिण कातळावरच्या महाराष्ट्र प्रदेशाने भारताच्या राष्ट्रीय जीवनाला असाच भक्कम आधार दिलेला आहे.

ब) अतिप्राचीन काळच्या इतिहासाचा कानोसा घेतला नाही तरी गेल्या सहस्त्रकातील महाराष्ट्राची जडणघडण त्याचे मोठेपण सांगून जाते. 

क) या हजार वर्षांत महाराष्ट्राची अस्मिता विविध अंगांनी संपन्न होत गेलेली आहे. 

१. फक्त अ योग्य 

२. फक्त ब योग्य 

३. फक्त क योग्य 

४. वरील सर्व योग्य 

उत्तर : ४. वरील सर्व योग्य 


२) महाराष्ट्राची भूमी याबद्दल खालीलपैकी कोणती विधान योग्य आहे ते सांगा.

अ) महाराष्ट्राची भूमी थंड झालेल्या लाव्हाच्या थरांची बनलेली आहे. 

ब) सुमारे नऊ कोटी वर्षापूर्वी घडलेल्या नैसर्गिक उद्रेकाने ही घटना घडली असे भूगूर्भशास्त्र सांगते.

१. विधान : अ योग्य 

२. विधान : ब योग्य 

३. वरील दोन्ही विधान योग्य 

४. वरील दोन्ही विधान अयोग्य 

उत्तर : १. विधान : अ योग्य 

[ब) सुमारे सात कोटी वर्षापूर्वी घडलेल्या नैसर्गिक उद्रेकाने ही घटना घडली असे भूगूर्भशास्त्र सांगते.]


३) खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते सांगा.

अ) सह्याद्रीच्या पूर्वेकडील जमीन मात्र सावकाश सपाटीकडे जाणारी आहे. 

ब) या पठाराच्या प्रदेशाला देश महणतात. 

क) देशावरील जमिनीचा पोत आणि कस यांत फार विविधता आहे.

१. फक्त अ व ब योग्य

२. फक्त ब व क योग्य 

३. फक्त अ व क योग्य 

४. वरील सर्व विधान योग्य 

उत्तर : ४. वरील सर्व विधान योग्य 


४) खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते सांगा.

अ) वऱ्हाड-खानदेशकडची काळी जमीन आणि सांगली-सोलापूरकडची मळईची जमीन सुपीक आहे.

ब) नगर-सोलापूरकडाची जमीन बव्हंशी कोरडी, रूक्ष आणि परिणामी नापीक, कोकणच्या मानाने देशावरची शेती अधिक बरकतीची आहे.

क) एकंदरीत पाहता महाराष्ट्रातील लोकांना शेतीभाती पिकविण्यासाठी फार मेहनत करावी लागते.

१. फक्त अ योग्य 

२. फक्त ब योग्य 

३. फक्त ब व क योग्य 

४. फक्त अ व क योग्य 

उत्तर : ३. फक्त ब व क योग्य 

[अ) वऱ्हाड-खानदेशकडची काळी जमीन आणि सातारा-कोल्हापूरकडची मळईची जमीन सुपीक आहे.]


५) खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते सांगा.

१. भूमीच्या वैशिष्ट्यांबरोबर सृष्टी आणि हवामान यांतही विविधता निर्माण होणे स्वाभाविक आहे. 

२. पावसाचे प्रमाण सर्वत्र भिन्नभिन्न असल्यामुळे महाराष्ट्राला अर्थातच एकजिनसी रूप नाही.

३. वरील दोन्ही योग्य 

४. वरील दोन्ही अयोग्य 

उत्तर : ३. वरील दोन्ही योग्य 


६) कितव्या शतकात उद्योतनसूरी या जैन ग्रंथकाराने कुवलय माला नामक ग्रंथात रेखलेली मराठ्यांची प्रतिमा आजही यथातथ्य वाटते ?

१. सहाव्या 

२. सातव्या 

३. आठव्या 

४. नवव्या 

उत्तर : ३. आठव्या 


७) खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ते सांगा.

अ) मराठे कलहप्रिय अभिमानी असलेल्या प्रसंग ओढवल्याशिवाय ते लढायला बाहेर पडत नाहीत.

ब) मूलत: शांतपणे शेतीभाती करणारा हा शेतकरी समाज आहे. 

क) वायव्य आशियातल्या टोळ्यांप्रमाणे क्रूर लांडगेतोड करीत आक्रमण करणे, प्रचंड नरमेध आणि विध्वंस करणे मराठ्यांच्या स्वभावात नाही. 

ड) वैऱ्याचा सूड घ्यावा, स्वातंत्र्य आणि स्वाभिमान यांचे रक्षण करावे आणि अन्यायाचा प्रतिकार करावा ही मराठ्यांची जीवनमूल्ये आहेत.

१. फक्त अ व ब अयोग्य 

२. फक्त ब व क अयोग्य 

३. फक्त अ व ड अयोग्य 

४. फक्त क व ड अयोग्य 

उत्तर : २. फक्त ब व क अयोग्य 

[ब) मूलत: शांतपणे शेतीभाती करणारा हा कृषीवेल समाज आहे. 

क) ईशान्य आशियातल्या टोळ्यांप्रमाणे क्रूर लांडगेतोड करीत आक्रमण करणे, प्रचंड नरमेध आणि विध्वंस करणे मराठ्यांच्या स्वभावात नाही.]


८) खाली काही सातवाहन बद्दल कोणती विधान योग्य आहे ते सांगा.

१. ख्रिस्ती कालगणनेच्या सुरवातीच्या काळात गोदातीरावरील प्रतिष्ठान म्हणजेच आताचे पैठण या ठिकाणाहून राज्य करणार्‍या सातवाहन राजघराण्यापासून महाराष्ट्राच्या इतिहासाची संगती सहजपणे लावला येते.

२. सातवाहन हे पहिले महाराष्ट्रीय राज्यकर्ते.

३. सातवाहनांनंतर पश्चिम महाराष्ट्रात त्रैकूटक, भांदकचे वाकाटक, चालुक्य, मान्यखेटचे राष्ट्रकूट आणि देवगिरीचे यादव हि राजघराणी विशेषत्वाने नावारूपास आली.

४. वरील सर्व योग्य

उत्तर : ४. वरील सर्व योग्य 

मुघल साम्राज्य TRICK


⚔️🛡 मघल साम्राज्य सुरवात हे पानिपत युद्धापासून झाली


⚔️🛡 बाबर(1526 -1530)

   मुघल साम्राज्याचा पहिला राजा याचे वडील फरगणा(ताशकंद) चे शासक होते ताशकंद हे आताच्या उजबेकिस्तान ची राजधानी आहे


   ⚔️🛡वाडीलानंतर बाबर हा शासक बनला त्याने भारतावर 5 आक्रमण केली 

   

⚔️🛡 21एप्रिल 1526 इब्राहिम लोधी vs बाबर असे पानीपत पहीले युद्ध झाले यामध्ये बाबर ने लोधी चा पराभव  केला आणि भारतात मुघल साम्राज्य सुरवात झाली.


⚔️🛡हुमायून - बाबर चा मुलगा शासक बनला.


⚔️🛡 अकबर(1556 1605)- हुमायून चा मोठा मुलगा याच्या वेळी दुसरे पानिपत युद्ध झाले मोहमद अली सहा आणि अकबर(14 वर्षे वय) मध्ये अकबर ने जिंकले.


⚔️🛡जहांगीर (1605-1627)अकबर मृत्यू नंतर  त्याने बांगला चे फारशी शेक अफगाण यांच्या विधवा पत्नी सोबत विवाह केला


⚔️🛡शाहजहान-  जहांगीर पुत्र


⚔️🛡पत्नी अंजुमन बानो (https://t.me/joinchat/AAAAAE45LHMMDnm5USFiuw)(मुमताज) मृत्यू नंतर ताजमहाल ची निर्मिती केली(20 वर्षे)


⚔️🛡तयाने दख्खन 4 प्रांत निर्माण केले   ...1) खानदेश 2)बेरार 3)तेलंगाणा 4)दोलताबाद आणि दख्खन शाशक म्हणून पुत्र औरंगजेब ला नेमले.


⚔️🛡औरंगजेब(1658-1707)

या काळातच शिवाजीमहाराज यांनी स्वतंत्र राज्य निर्माण केले 


⚔️🛡डान्स, दारू ,गाणे यावर त्याने बंदी घातली.


⚔️🛡बहादुर शहा जाफर(1707-1712)

वय 70 वर्षे होते यामुळेच शासन करणे जमले नाही आणि यापासून मुगल साम्राज्य लयास जाऊ लागले 


⚔️🛡Trick - भाईसाब (BHAISAB)🛡⚔️

 

    🏝 "I "बद्दल फ़क्त "J "हे अक्षर वापरा🏝

ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले उठाव :

ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले उठाव :
संन्याशाचा उठाव :  1765-1800 - बंगाल शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक
चुआरांचा उठाव : 1768 - बंगाल-मिजापूर जिल्हा जगन्नाथ घाला
हो जमातीचे बंड : 1820 - छोटा नागपूर व सिंगभूम
जमिनदारांचा उठाव : 1803 - ओडिशा जगबंधू
खोंडांचा उठाव : 1836 - पर्वतीय प्रदेश दोरा बिसाई
संथाळांचा उठाव : 1855 - कान्हू व सिंधू
खासींचा उठाव : 1824 - आसाम निरतसिंग
कुंकिंचा उठाव : 1826 - मणिपूर
दक्षिण भारतातील उठाव  -
पाळेगारांचा उठाव : 1790 - मद्रास
म्हैसूरमधील शेतकर्‍यांचा उठाव : 1830 - म्हैसूर
विजयनगरचा उठाव : 1765 - विजयनगर
गोरखपूरच्या जमिनदारांचा उठाव : 1870 - गोरखपूर
रोहिलखंडातील उठाव : 1801 - रोहिलखंड
रामोश्यांचा उठाव : 1826 - महाराष्ट्र उमाजी नाईक व बापू त्र्यंबकजी सावंत
भिल्ल व कोळ्यांचा उठाव : 1824
केतूरच्या देसाईचा उठाव : 1824 - केतूर
फोंडा सावंतचा उठाव : 1838
भिल्लाचा उठाव : 1825- खानदेश
दख्खनचे दंगे : 1875- पुणे,सातारा,महाराष्ट्र शेतकरी
__________________________________

नाशिक प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती



1. नाशिक जिल्हा


जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - नाशिक      

       क्षेत्रफळ - 15,530 चौ.कि.मी.


लोकसंख्या - 61,09,052 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)


तालुके - 15 - नसहिक, बागलाण (सटाणा), मालेगांव, सुरगणा, पेठ, कळवण, दिंडोरी, चांदवड, नांदगांव, निफाड, येवले, इगतपुरी, सिन्नर, त्रंबकेश्वर, देवळा. 


सीमा - उत्तरेस घुळे जिल्हा, पूर्वेस जळगांव जिल्हा, पश्चिमेस ठाणे जिल्हा, दक्षिणेस अहमदनगर जिल्हा असून आग्नेयेस औरंगाबाद जिल्हा, ईशान्येस धुळे जिल्हा, वायव्येस गुजरात राज्यातील डांग व सूरत हे दोन जिल्हे.


जिल्हा विशेष -


हा जिल्हा महाराष्ट्रातील पाच व गुजरातमधील दोन जिल्हयांनी वेढला आहे. निफाड व लासलगाव परिसर कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध. द्राक्षांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. देशातील पहिले मातीचे धरण नाशिक जिल्हातील गंगापूर येथे गोदावरी नदीवर बांधण्यात आले आहे. 


नाशिक शहर हे तापी व गोदावरी या नधांच्या खोर्‍यात वसलेल्या दख्खन पठाराचा भू-भाग आहे. गोदावरी काठी वसलेले हे शहर एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. येथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो.


प्रमुख स्थळे


नाशिक - येथेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह 2 मार्च 1930 ला केला. नाशिक (ओझर) येथे मिग विमानाचा कारखाना व सिक्युरिटी प्रेस आहे. 


महाराष्ट्र राज्य पोलिस अकॅडमी ही संस्था नाशिक येथे आहे. 


त्र्यंबकेश्वर - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक गणले जाणारे त्र्यंबकेश्वर हे स्थळ नाशिक जिल्ह्यातच आहे. 


मालेगाव - पेशव्याचे सरदार नारोशंकर यांनी बांधलेला भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. 


येवले - तात्या टोपे यांचे जन्मगाव आहे. डॉ. आंबेडकरांनी येथेच आपला धर्मांतराचा निर्णय जाहीर केला होता. 


सापुतरा - निसर्गरम्य स्थळ व थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे. 


भगूर - स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान. 


नांदूर - मध्यमेश्वर - भरतपुर नावाचे अभयारण्य येथेच आहे. 


भोजापूर - खडकात कोरलेले खंडोबाचे मंदिर. 


देवळाली - सैन्याचे प्रशिक्षण केंद्र, थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध. 


गंगापूर - गोवर्धन म्हणून सातवाहन शिलालेखात उल्लेखलेले हे ठिकाण. 


सप्तश्रुंगी - साडेतीन पीठापैकी एक पीठ. मोठ्या संख्येने येथे लोक दर्शनाले येतात. 


सिन्नर - यादव साम्राज्याची सुरुवातीची राजधानी व 9 व्या शतकातील व 12 व्या शतकातील मंदिरासाठी प्रसिद्ध. 


दिंडोरी - शिवाजी व मोगल यांच्यात झालेल्या युद्धासाठी प्रसिद्ध. 


निलगिरीपासून कागदनिर्मिती - इगतपुरी (नाशिक)


महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (MERI)- नाशिक 


महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी - नाशिक 


चलनी नोटा, पोस्ट कार्ड व तिकिटे छापण्याचा कारखाना - नाशिक 


नाशिक प्रशासकीय विभागास उत्तर महाराष्ट्र म्हंटले जाते. 


नाशिक जिल्ह्यात सातमाळा म्हणून ओळखल्या जाणार्‍या डोंगररांगांनाच औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठ्याच्या डोंगररांगा असे म्हटले जाते.


नाशिक जिल्ह्यात वाहणार्‍या सर्व नधा नाशिक जिल्ह्यातच उगम पावतात. एकही नदी दुसर्‍या जिल्ह्यातून प्रवेश नाही. हे आगळे वैशिष्ट्य आहे. 


भारातातील पहिले मातीचे धरण गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यात गंगापूर येथे बांधण्यात आले आहे. 


2. धुळे जिल्हा


जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - धुळे           

     क्षेत्रफळ - 8,063 चौ.कि.मी. 


लोकसंख्या - 20,48,781 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)


तालुके - 4 - शिंदखेड, साक्री, धुळे, शिरपूर.


सीमा - उत्तरेस नंदुरबार जिल्हा व मध्य प्रदेशचा मेवाड जिल्हा, पूर्वेस जळगाव जिल्हा, पश्चिमेस नंदुरबार जिल्हा व गुजरात राज्य, दक्षिणेस नाशिक जिल्हा आहे. 


जिल्हा विशेष -


पूर्वी जळगाव आणि धुळे मिळून खानदेश हा एक जिल्हा होता. या जिल्ह्याचे मुख्यालय धुळे येथे होते. पुढे 1961 ला पश्चिम खानदेशाला धुळे जिल्हा असे नाव देण्यात आले. 


प्रमुख स्थळे


धुळे - नकाणे तलाव व डेडरगाव तलाव ही सहलीची केंद्रे आहेत. 


शिरपूर - धुळे जिल्ह्यातील शेतीमालाची मोठी बाजारपेठ. शिरपूरमधील बालाजी मंदिर प्रेक्षणीय आहे. 


दोंडाईचे - मिरचीच्या व्यापारासाठी दोंडाईचे विशेष महत्वाचे आहे. येथे स्टार्चचा कारखाना आहे. 


3. नंदुरबार जिल्हा


जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - नंदुरबार             


क्षेत्रफळ - 5,034 चौ.कि.मी. 


लोकसंख्या - 16,46,171 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)


तालुके - 6 - नंदुरबार, अक्कलकुवा, तळोदे, नवापुर, शहादे, धडगांव (अक्राणी).


सीमा - उत्तरेस गुजरात व मध्य प्रदेश, पूर्वेस धुळे जिल्हा व मध्य प्रदेश, पश्चिमेस गुजरात राज्य, दक्षिणेस धुळे जिल्हा आहे. 


जिल्हा विशेष -


धुळे जिल्ह्याचे विभाजन करून 1 जुलै 1998 ला नंदुरबार या नव्या जिल्ह्याची निर्मिती झाली. या जिल्ह्यात आदिवासीचे प्रमाण जास्त असल्यामुळे या जिल्ह्यास आदिवासी जिल्हा म्हणून ओळखतात. 


सातपुडा पर्वतरांगामुळे हा जिल्हा गुजरात व मध्यप्रदेशापासून वेगळा झाला. 


या जिल्ह्यात भिल ही आदिवासी जमात केंद्रीय झाली आहे. एकूण लोकसंख्येशी असलेले आदिवासींचे प्रमाण लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्याचा आदिवासींच्या संदर्भात राज्यात प्रथम क्रमांक लागतो.


प्रमुख स्थळे


नंदुरबार - येथे 1942 च्या स्वातंत्र्य आंदोलनात छातीवर गोळ्या झेलणार्‍या बालक्रांतिकारक शिरीषकुमारचे स्मारक आहे. 


प्रकाशे - येथील केदारेश्वर व संगमेश्वर मंदिरे प्रसिद्ध आहेत. यालाच दक्षिण काशी म्हणतात. 


धडगाव - हे अक्राणी तालुक्याचे मुख्य ठिकाण असून तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. 


तोरणमाळ - प्राचीन मांडू घराण्याची राजधानी. निसर्गरम्य ठिकाण. 


भारतामध्ये पहिल्यांदाच फेब्रुवारी 2006 मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील नवापुर तालुक्यात बर्ड फ्ल्यू या विषाणूजन्य (एच-5, एन-1) आजाराची कोंबड्यांना लागण झाली. 


नंदुरबार जिल्ह्याच्या निर्मिती आधी धुळे जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जात होता. परंतु आता आदिवासींची 60 टक्के लोकसंख्या असलेला नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. 


तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यात आहे. 


महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणजे नंदुरबार होय. 


धुळे जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार हा जिल्हा अस्तित्वात आला आहे. 


महाराष्ट्रातील सोने शुद्धीकरण कारखाना शिरपूर (धुळे)


4. जळगाव जिल्हा


जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - जळगाव         

    क्षेत्रफळ - 11,765 चौ.कि.मी 


लोकसंख्या - 42,24,442 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)


तालुके - 15 - चोपडा, यावल, अमळनेर, एरंडोल, रावेर, पाचोरा, जळगांव, भुसावळ, मुक्ताईनगर (एदलाबाद), पारोळा, भडगांव, जामनेर, चाळीसगांव, धरणगांव, बोदवड. 


सीमा - उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस बुलढाणा जिल्हा व मध्य प्रदेश, पश्चिमेस धुळे जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा असून नैऋत्येस नाशिक जिल्हा आहे.


जिल्हा विशेष -


पूर्वी खानदेश नावाने ओळखल्या जाणार्‍या प्रदेशाचे पूर्व खानदेश व पश्चिम खानदेश असे दोन भाग करण्यात आले होते. त्यापैकी पूर्व खानदेश भागाला आज जळगाव जिल्हा म्हणून संबोधले जाते. जळगावला केळीचे कोठार, अजिंठ्याचे प्रवेश व्दार म्हणून ओळखले जाते.


प्रमुख स्थळे -


जळगांव - या शहरास अजिंठ्याचे प्रवेशव्दार म्हणून ओळखले जाते. 


अंमळनेर - साने गुरुजींनी येथे शिक्षणप्रसार व समाजसेवेचे कार्य केले आहे. 


भुसावळ - महत्वाचे रेल्वे जंक्शन आणि जवळच पोकरी येथे औष्णिक विधुत केंद्र आहे. 


चाळीसगांव - प्राचीन भारतीय गणिती भास्कराचार्य यांनी आपला लीलावती हा ग्रंथ याच गावी लिहिला असे म्हटले जाते. 


जामनेर - येथे वनस्पती तुपाचा व खताचा कारखाना आहे. 


चांगदेव - येथे तापी व पूर्णा या दोन नधांचा संगम आहे. 


पाल - सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण व वंनोध्यान पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. 


कोथमी हे धार्मिक स्थळ जळगाव जिल्ह्यात आहे. 


उत्तर महाराष्ट्र विधापीठ जळगाव येथे आहे. 


पोकरी दीपनगर औष्णिक वीज केंद्र जळगाव या जिल्हयात आहे. 


महाराष्ट्रातील केळीच्या बागा जळगाव जिल्ह्यात आहेत. 


पाटणादेवी वंनोधान जळगाव जिल्हयात आहे.


जळगाव जिल्ह्यामध्ये केली संशोधन केंद्र यावल येथे आहे. 


यावल अभयारण्य जळगाव जिल्ह्यात आहे. 


चांगदेवगाव हे धार्मिक स्थळ जळगाव जिल्ह्यात आहे.


 


5. अहमदनगर जिल्हा


जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - अहमदनगर       

     क्षेत्रफळ - 17,048 चौ.कि.मी. 


लोकसंख्या - 45,43,083 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)


तालुके - 14 - कोपरगाव, आकोले, संगमनेर, श्रीगोंदे, श्रीरामपूर, राहुरी, अहमदनगर, शेवगाव, पारनेर, नेवासे, पाथर्डी, कर्जत, जामखेड (महाल), राहता. 


सीमा - उत्तरेस नाशिक व औरंगाबाद जिल्हा, पूर्वेस बीड व उस्मानाबाद जिल्हा, पश्चिमेस पुणे व ठाणे जिल्हा, दक्षिणेस सोलापूर जिल्हा आहे.


जिल्हा विशेष -


अहमदनगर हे शहर सन 1418 मध्ये मलिक अहंमद यांनी बसविले. मलिक हमदच्या नावावरून ते अहमदनगर म्हणून ओळखले जावू लागले. हे निजामशाही राजधानीचे शहर म्हणून ओळखतात. 


शहराच्या चारही बाजूंनी खंदक असलेला भुईकोटा किल्ला इतिहासात प्रसिद्ध आहे. याच किल्ल्यात कैदेत असताना पंडित नेहरू यांनी'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ लिहिला. 


साखर कारखान्यांचा जिल्हा, खर्डे येथील भुईकोट किल्ला मराठ्यांच्या शेवटच्या विजयाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध. जामखेड तालुक्यातील चोंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म.

या जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे मोसंबी फळाचे संशोधन केंद्र आहे.


प्रमुख स्थळे


अहमदनगर - शहरातील भुईकोट किल्ला व चांदबिबीचा महाल ही ऐतिहासीक स्थळे प्रसिद्ध आहेत. येथे लष्कराचा वाहन संशोधन व विकास विभाग आहे. सैन्याचे रणगाडा प्रशिक्षण केंद्र येथे आहे. 


अकोले - येथील अगस्तिऋषींचा आश्रम प्रसिद्ध आहे. 


प्रवरानगर - देशातील पहिला सहकारी साखर कारखाना येथेच उभा राहिला.


नेवासे - येथेच संत ज्ञांनेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' सांगितली. 


राहुरी - महात्मा फुले कृषी विधापीठ याच ठिकाणी आहे. 


शनि-शिंगणापुर - शनि-शिंगणापुर हे नेवासे तालुक्यात आहे. येथील शनिमंदिर प्रसिद्ध आहे. या गावातील कोणत्याही घराला दरवाजे-कडया नाहीत हे आगळे-वगळे वैशिष्ट्य होय.


राळेगण सिद्धी - थोर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या परिश्रमातून या खेड्याचा कायापलट झाला. संपूर्ण व्यसनमुक्त असलेले हे गाव सामाजिक वनीकरण, कुटुंब कल्याण व शिक्षणक्षेत्रात आघाडीवर आहे. 


शिर्डी - साईभक्ताचे श्रद्धास्थान 


सिद्धटेक - येथील गणपतीस श्रीसिद्धीविनायक म्हणून संबोधले जाते. 


भंडारदारा - अकोले तालुक्यात प्रवारा नदीवर 'भंडारदरा' हे धरण बांधण्यात आले आहे. निसर्गरम्य परिसरामुळे हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांचे आकर्षणस्थळ बनले आहे.

सामान्यज्ञान प्रश्नोत्तरे इतिहास (भारत)(History)

*1. १८५७ च्या उठावाच्या वेळी झाशी येथे कोणाचे राज्य होते?*

राणी लक्ष्मीबाई 

पेशवे नानासाहेब ✅

बहादूरशहा जफर

ईस्ट इंडिया कंपनी


*2. न्यायमूर्ती रानडे यांनी कोणत्या उद्देशाने सामाजिक परिषदेची स्थापना केली?*

राजकीय प्रश्नावर चर्चा करण्याकरिता 

सामाजिक प्रश्नाला राजकीय व्यासपीठ मिळवून देण्याकरिता ✅

सामाजिक प्रश्नावर चर्चा करण्याकरिता

भारतीय लोकांच्या आर्थिक प्रश्नाचा अभ्यास करण्याकरिता 


*3. खालीलपैकी ............. येथे १८५७ चा उठाव झाला नव्हता?*

अलाहाबाद 

दिल्ली

मद्रास ✅

रामनगर


*4. ……… या संतांचे गुरू जनार्दन स्वामी होते?*

संत ज्ञानेश्वर 

संत एकनाथ ✅

संत तुकाराम

संत नामदेव


*5. १९१९ मध्ये सातारा जिल्याह्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?*

कर्मवीर वि.रा. शिंदे 

कर्मवीर भाऊराव पाटील ✅

छत्रपीत शाहू महाराज

भास्करराव जाधव


*6. सत्तीची चाल बंद व्हावी म्हणूण बंगाल प्रांतात कोणी आंदोलन सुरु केले होते?*

राजा राममोहन रॉय ✅ 

ईश्वरचंद्र विद्यासागर

व्दारकाप्रसाद टागोर

केशवचंद्र सेन


*7. इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी होती?*

लोकमान्य टिळक 

महात्मा गांधी

गोपाळ हरी देशमुख ✅

न्यायमूर्ती रानडे


*8. साता-याचा राजा प्रतापसिंहाने आपला वकील म्हणून इंग्लंडला कोणास पाठविले होते?*

रंगो बापूजी ✅

तात्या टोपे

अजीमुल्ला खान

अहमदशहा 


*9. मद्रास येथे होमरूल लीगची स्थापना कोणी केली?*

लोकमान्य टिळक 

गोपाळ कृष्ण गोखले

डॉ. अॅनी बेझंट ✅

सरोजिनी नायडू


*10. कोणत्या राज्यात नामदेवांची अनेक मंदिरे आहेत?*

मध्य प्रदेश 

बिहार

पंजाब ✅

गुजरात

संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नसंच

1.पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात अतिशूरपणे दीर्घकाळ कोण लढले?

तात्या टोपे
राणी लक्ष्मीबाई
शिवाजी महाराज
नानासाहेब पेशवे
उत्तर : तात्या टोपे

2. महात्मा गांधी राजकीय गुरु कोणाला मानत होते?

महादेव गोविंद रानडे
लिओ टॉलस्टॉय
दादाभाई नौरोजी
गोपाळ कृष्ण गोखले
उत्तर : गोपाळ कृष्ण गोखले

3. कोणती युवती क्रांतीकारी युवती होती?

सरोजिनी नायडू
प्रितीलता वडडेदार
इंदिरा गांधी
राणी लक्ष्मीबाई
उत्तर : प्रितीलता वडडेदार

4. संस्थानाचे विलीनिकरण कोणी केले?

पंडित नेहरू
विनोबा भावे
साने गुरुजी
सरदार पटेल
उत्तर : सरदार पटेल

5. पुणे करार महात्मा गांधी व —– यांच्यात झाला होता?

डॉ. आंबेडकर
लॉर्ड आयर्विन
बॅ. जिना
पंडित नेहरू
उत्तर : डॉ. आंबेडकर

6. ‘अभिनव भारत’ या संघटनेची स्थापना कोणी केली?

स्वा.सावरकर
बटूकेश्वर दत्त
रासबिहारी घोष
भुपेंद्रनाथ दत्त
उत्तर : स्वा.सावरकर

7. आझाद हिंद सेना कोणी स्थापन केली?

सुभाषचंद्र बोस
रासबिहारी बोस
कॅ. भोसले
कर्नल धिल्लन
उत्तर : रासबिहारी बोस

8. झाशीचा दत्तक वारसा कोणी नामंजूर केला?

लॉर्ड कॅनिंग
लॉर्ड डलहौसी
लॉर्ड बेटिंग
लॉर्ड मेयो
उत्तर : लॉर्ड डलहौसी

9. भारतात तार आणि सुधारीत टपालसेवा कोणी सुरू केली?

लॉर्ड डलहौसी
लॉर्ड बेटिंग
लॉर्ड रिपन
लॉर्ड मेयो
उत्तर : लॉर्ड डलहौसी

10. वृत्तपत्रांवर बंदी घालणारा कायदा कोणत्या साली पारित झाला?

1 एप्रिल 1878
मार्च 1905
मार्च 1978
एप्रिल 1994
उत्तर : 1 एप्रिल 1878

11. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोण?

लॉर्ड रिपन
लॉर्ड मॅकॉले
लॉर्ड मेयो
लॉर्ड विलीग्टन
उत्तर : लॉर्ड रिपन

12. भारतातील पहिला रेल्वेमार्ग खालीलपैकी कोणता?

मुंबई ते ठाणे
मुंबई ते दिल्ली
कल्याण ते ठाणे
मुंबई ते पुणे
उत्तर : मुंबई ते ठाणे

13. 1857 च्या उठावातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण?

मंगल पांडे
तात्या टोपे
कूंवरसिंह राणा
कर्नल आयरे कूट
उत्तर : कूंवरसिंह राणा

14. जालियनवाला बाग कोठे आहे?

पटियाळा
दिल्ली
अमृतसर
अलाहाबाद
उत्तर : अमृतसर

15. खिलाफत चळवळीचे अध्यक्ष कोण होते?

सर सय्यद अहमद खान
मौलाना अली महंमद
आगाखान
महात्मा गांधी
उत्तर : महात्मा गांधी

16. त्रिपुरा येथील राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते?

नेताजी सुभाषचंद्र बोस
जवाहरलाल नेहरू
मोतीलाल नेहरू
मौलाना आझाद
उत्तर : नेताजी सुभाषचंद्र बोस

17. मुस्लिम लीगची स्थापना कोणी केली?

नबाब सलीमुल्ला
आगाखान
बॅ. महंमद जीना
मौलाना आझाद
उत्तर : नबाब सलीमुल्ला

18. मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले?

सेनापती बापट
बी.सी.दत्त
मोहन रानडे
पं. जवाहरलाल नेहरू
उत्तर : बी.सी.दत्त

19. 1857 चे स्वातंत्र्यसमर व मॅझिनीचे लेखक कोण?

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर
सच्छिंद्रनाथ सन्याल
नानासाहेब पेशवे
तात्या टोपे
उत्तर : स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर

20. ‘बंदीजीवन’ कोणी लिहिले?

सच्छिंद्रनाथ सन्याल
बंकिमचंद्र चटर्जी
व्योमेशचंद्र बॅनर्जी
महात्मा गांधी
उत्तर : सच्छिंद्रनाथ सन्याल


महत्त्वाचे प्रश्नसंच


1. भारतीय संविधानाने भारताचे वर्णन —– केले आहे.

संघराज्य
विधानमंडळ
राज्यांचा संघ
विधान परिषद
उत्तर : राज्यांचा संघ

2. कोलकाता उच्चन्यायालयाचे अधिकार क्षेत्र —— या संघराज्य क्षेत्रात विस्थारित केलेले आहे.

दिल्ली
अंदमान-निकोबार बेटे
पौंडेचेरी
दीव व दमण
उत्तर : अंदमान-निकोबार बेटे



3. ग्रामपंचायतीचा पंचांची निवडणूक —– पद्धतीने होते.

प्रत्यक्ष मतदान
अप्रत्यक्ष मतदान
प्रौढ मतदान
प्रौढ पुरुष मतदान
उत्तर : प्रौढ मतदान

4. गोगलगाय —– या संघात मोडते.

मोलुस्का
आर्थोपोडा
इकायनोडमार्ट
नेमॅटोडा
उत्तर : मोलुस्का

5. संतृप्त हायड्रोनकार्बनमधील दोन कार्बन अणूंमध्ये —– असतो.



एकेरी बंध
दुहेरी बंध
तिहेरी बंध
यापैकी एकही नाही
उत्तर : एकेरी बंध

6. —– हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे.

शुक्र
बुध
मंगळ
पृथ्वी
उत्तर : बुध

7. ‘स्पीड पोस्ट’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

मुल्क राज आनंद
शोभा डे
अरुंधती राय
खुशवंत सिंग
उत्तर : शोभा डे

8. नियोजित आलेवाडी बंदर —— जिल्ह्यात आहे.

सिंधुदुर्ग
ठाणे
रत्नागिरी
रायगड
उत्तर : ठाणे

9. —– शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात.

मुंबई
बंगलोर
कानपूर
हैदराबाद
उत्तर : बंगलोर

10. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्त्रियांसाठी किती जागा राखीव असतात?

01
02
03
यापैकी एकही नाही
उत्तर : यापैकी एकही नाही

11. भारतातील संसदीय व्यवस्थेचा —— हा केंद्रबिंदु आहे.

मुख्यमंत्री
महाधीवक्ता
पंतप्रधान
महान्यायवादी
उत्तर : पंतप्रधान



12. 10 kg वस्तुमान असलेला पदार्थ जमिनीपासून 10 मी. उंच नेला. त्याठिकाणी गुरुत्वीय त्वरण 9.8 असेल, तर त्या पदार्थाला प्राप्त झालेली स्थितिज ऊर्जा किती?

9800 J
980 J
98 J
9.8 J
उत्तर : 980 J

13. ‘संवाद कौमुदी’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?

राजा राममोहन रॉय
केशव चंद्र सेन
देवेंद्रनाथ टागोर
ईश्वरचंद्र विद्यासागर
उत्तर : राजा राममोहन रॉय

14. ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

डॉ. बी.आर. आंबेडकर
वि.रा. शिंदे
महात्मा जोतिबा फुले
भास्करराव जाधव
उत्तर : वि.रा. शिंदे

15. खालीलपैकी कोणत्या खेळाशी कविता राऊत हे नाव जोडले आहे?

अॅथलेटिक्स
कुस्ती
क्रिकेट
स्विमींग
उत्तर : अॅथलेटिक्स

16. कोणत्या प्राण्याला ‘राष्ट्रीय वारसा’ हा दर्जा भारत सरकारने बहाल केला?

हत्ती
वाघ
सिंह
हरिण
उत्तर : हत्ती

17. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराने वयाची —— वर्षे पूर्ण केलेली असावीत.

21
25
30
35
उत्तर : 35

18. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज्य पद्धती —– साली सुरू झाली.

1 मे 1960
1 मे 1961
1 मे 1962
1 मे 1965
उत्तर : 1 मे 1962



19. सध्या महाराष्ट्राचा विधानसभेत —– सभासद संख्या आहे.

78
238
250
288
उत्तर : 288

20. खालीलपैकी कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे?

CO२
H२S
SO२
NH३
उत्तर : NH३



 प्र.१ हवामान बदल कमी करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावण्याच्या उद्देशाने राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाचे नाव बदलून 'पर्यावरण व हवामान बदल मंत्रालय' ठेवण्याच्या प्रस्तावाला कोणत्या राज्याने नुकतेच मान्यता दिली?

1.महाराष्ट्र ✔️
2.उत्तर प्रदेश
3.गुजरात
4.मध्य प्रदेश

 प्र.२ हवामान, पाऊस, पूर यावर वास्तविक-वेळ माहिती आणि सतर्कतेसाठी कोणत्या राज्याने मेघासंदेश अॅप व वरुणमित्र वेब पोर्टल सुरू केले?

१.मध्य प्रदेश
२.कर्नाटक ✔️
३.ओडिशा  ‌‌
४. पश्चिम बंगाल


 प्र३. संरक्षण मंत्रालयाने "मेक इन इंडिया" उपक्रमाला चालना देण्यासाठी स्थानिक पुरवठादारांकडून किती वस्तू खरेदी करण्यास मान्यता दिली?

१.12
२.16
३.26 ✔️
४. 22



प्र.४ नेव्हीमध्ये महिला अधिकार्‍यांना सेवानिवृत्तीसाठी किती महिन्यांत कायमस्वरूपी कमिशन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत?

१.8 महिने
२.3 महिने ✔️
३.6 महिने
४.12 महिने


 प्र.५ ड्रायव्हिंग लायसन्स अॅपला नाव द्या, जे सरकारने नुकतेच सादर केले आहे?

१.जी-यात्रा
२.सारथी ✔️
३.स्पॉटिफाई
४.मी-परिवाहन

 प्र.६ जपानच्या मदतीने पूर्ण केलेला पैठण (जयकवाडी) जलविद्युत प्रकल्प नदीवर आहे ?

१. गंगा
२. कावेरी
३.नर्मदा
४.गोदावरी ✔️


प्र.७  रेडक्लिफ लाइन ही एक सीमा आहे ?

१.भारत आणि पाकिस्तान ✔️
२.भारत आणि चीन
३.भारत आणि म्यानमार
४.भारत आणि अफगाणिस्तान


 प्र.८. त्रिपिताक ही पवित्र पुस्तके आहेत ?

१.बौद्ध ✔️
२.हिंदू
३.जैन
४.वरीलपैकी नहीं


 प्र.९ तुलसीदास, रामचरितमानस यांचे लेखक खालील पैकी कोणत्या शासकाचे समकालीन होते?

१.अकबर ✔️
२.हुमायूं
३.शाहजहां
४. शेरशाह सुरी



 प्र. १० हसणारा गॅस म्हणजे काय?

१. नायट्रस ऑक्साईड ✔️
२.कार्बन मोनॉक्साईड
३.सल्फर डाय ऑक्साईड ४.हायड्रोजन पेरोक्साइड





 प्र.११ सिनेमाच्या विकासातल्या सेवांसाठी सर्वोच्च पुरस्कार कोणाच्या नावावर दिला जातो?

१.राज कपूर
२.दादा साहेब ✔️
३.मीना कुमारी
४.अमिताभ बच्चन


स्पष्टीकरण:- 1969 या वर्षीपासून या पुरस्काराला सुरुवात झाली आहे. पहिलं पुरस्कार देवकी राणी यांना देण्यात आले आहे


 प्र.१२जगातील पहिला बायनरी अंक संगणक कोणी बनविला: झेड 1 ...?

१.कोनराड झुसे ✔️
२.केन थॉम्पसन
३.लन ट्यूरिंग
४.जॉर्ज बुले



 प्र.१३ खालीलपैकी कोणती जागा चिकनकारी कार्यासाठी प्रसिद्ध आहे, जी भरतकामाची पारंपारिक कला आहे?

१.लखनौ ✔️
२.हैदराबाद
३.जयपूर
४.म्हैसूर



 प्र.१४ पुढीलपैकी कोणता इंग्रजी चित्रपट हिंदीमध्ये डब केला गेला?

१.अलादीन ✔️
२.युनिव्हर्सल सोल्जर
३.वेग
४.लोह माणूस


Q.15  जागतिक यकृत दिन २०१९ ची  थिम काय होती ?

➡️ Love Your Liver and Live Longer



🟣 : ब्रिटीश गव्हर्नर जनरल 'मॉडर्न इंडिया मेकर' म्हणून ओळखले जातात?

1⃣ लॉर्ड कॅनिंग
2⃣ लॉर्ड डलहौसी✅✅✅
3⃣ लॉर्ड कर्झन
4⃣ लॉर्ड माउंटबॅटन

___________________________
 🟤 भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते?

1⃣ मौलाना अबुल कलाम
2⃣ एम. ए. जिन्ना
3⃣ बद्रुद्दीन तायबजी✅✅✅
4⃣ रहीमतुल्ला एम सयानी

___________________________
🔴 पढीलपैकी कोणत्या वर्षात ब्रिटीश कारभाराची राजधानी कलकत्ता ते
दिल्ली येथे स्थानांतरित झाली?

1⃣ 1911✅✅✅
2⃣ 1857
3⃣ 1905
4⃣ 1919

___________________________
🟠 खालीलपैकी कोणते कार्यक्रम-वर्ष संयोजन चुकीचे आहे?

1⃣ चौरी चौरा - 1922
2⃣ भारत सोडा - 1942
3⃣ दांडी मार्च - 1931✅✅✅
4⃣ बगालचे विभाजन - 1905

___________________________
🟢भारत स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.?

1⃣ जवाहरलाल नेहरू
2⃣ राजेंद्र प्रसाद
3⃣ सी राजगोपालाचारी
4⃣ ज.बी.कृपलानी✅✅✅



.  सोन्याच्या निर्देशांक बनवताना सोन्यात काय मिसळतात. ?

A. चांदी
B. *तांबे ☑️*
C.  पितळ
D. कांस्य

  'ऑरोजिन ऑफ स्पेसीज'' चे लेखक कोण आहेत?

A. कार्ल मार्क्स
B. लैमार्क
C. *चार्ल्स डार्विन ☑️*
D. मेंडले


 *997.  'लेडी विथ द लैप' म्हणून कोणाला ओळखले जाते?

A. *फ्लोरेंन्स नाईटिंगेल ☑️*
B. मदर टेरेसा
C. अ‍ॅनी बेसेंट
D.  सरोजिनी नायडू


 'दास कँपिटल 'चे निर्माता कोण आहेत?

A. दांते
B. रुसो
C. लाश्की
D. *कार्ल्स मार्क्स ☑️*


 कापूस/ कपास  उत्पादक देश कोणता आहे?

A.  भारत
B. *चीन ☑️*
C. U.S.A
D.  कॅनडा




  फुटबॉलचा 'काळा मोती' कोणाला म्हटले जाते.?

A. *पेले*
B. मॅराडोना
C.. इयान थॉर्पे
D. आंद्रे अगासी


  बांगलादेश कोणत्या वर्षी स्वतंत्र झाला?

A. 1970
B. *1971 ☑️*
C. 1972
D. 1974


  सर्वात मोठा प्राणी /पशू मेळावा कोठे आयोजित केला जातो?

A. उज्जैन
B. *सोनपूर (बिहार) ☑️*
C. बनारस
D. भागलपूर


  'वन पँरीस  टू इंडिया ’चे लेखक कोण आहेत?

A.  नीरद.  सी. चौधरी
B.  *ई.  एम फॉस्टर ☑️*
C. चार्ल्स डिकेन्स
D. शेक्सपियर


 कोलकाता शहराचे शिल्पकार कोण होते?

A. जाँब  चारनाँक
B. एस.  के.  मुखर्जी
C. अहमद लाहोरी
D. जार्ज स्टीफन




💥 महाराष्ट्रात पहिला लोह - पोलाद प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आला?
1) मुंबई
2) चंद्रपूर
3) नागपूर
4) ठाणे

उत्तर :- 2
चंद्रपूर


💥 भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात एकवटली आहे ?
1) 9.36%
2) 9.48%
3) 9.27%
4) 9.28%

उत्तर :- 4
 9.28 टक्के


💥 बांग्लादेशातून वाहणारा गंगेचा प्रवाह
' मेघना ' या नावाबरोबर ........ या नावानेही ओळखला जातो.
1) शारदा
2) बियास
3) काली
4) पद्मा

उत्तर - 4

पद्मा


💥 उडणारी खार व भुंकणारे हरीण यांसारखे प्राणी असलेले ' भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान ' कोणत्या राज्यात आहे ?
1) महाराष्ट्र
2) गोवा
3) आसाम
4) हिमाचल प्रदेश


उत्तर :- 2
         गोवा राज्यात आहे.

💥 सर्यफूलाच्या उत्पादनात कोणत्या राज्याचा देशात पहिला क्रमांक लागतो?
1) मध्यप्रदेश
2) गुजरात
3) कर्नाटक
4) उत्तरप्रदेश


उत्तर - 3

 कर्नाटक

💥 ' नलसरोवर ' हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात वसले आहे ?
1) महाराष्ट्र
2) गुजरात
3) राजस्थान
4) ओरिसा

उत्तर :- 2
           गुजरात

( आलेला प्रश्न राज्यसेवा परीक्षा )

 💥 1909 चा ' मोर्ले - मिंटो सुधारणा कायदा ' पास होण्यासाठी भारत सेवक समाजाच्या वतीने इंग्लंड ला गेलेली व्यक्ती कोण होती ?
:-
1) न्या. रानडे
2) दादाभाई नौरोजी
3) फिरोजशहा मेहता
4) गोपाळ कृष्ण गोखले


उत्तर :- 4
        गोपाळ कृष्ण गोखले

💥 आपल्या मृत्युनंतर केशवपन करणार नाही अशी आपल्या पत्नीकडून शपथ घेणारे समाज सुधारक कोण ?
1) गोपाळ गणेश आगरकर
2) लोकहितवादी
3) न्यायमूर्ती रानडे
4) गोपाळ कृष्ण गोखले

उत्तर :- 1
         गोपाळ गणेश आगरकर


💥 ' शिमगा ' ह्या सणाला देशातील बीभत्स सणांच्या यादीत प्रथम क्रमांक देऊन त्यावर प्रखर टीका करणारे निर्भिड समाज सुधारक कोण  ?
1) गोपाळ गणेश आगरकर
2) लोकहितवादी
3) न्यायमूर्ती रानडे
4) गोपाळ कृष्ण गोखले


उत्तर :- 1
         गोपाळ गणेश आगरकर


💥 पढील पैकी कोणत्या समाज सुधारकांनी ईश्वराचे अस्तित्व मान्य केले नाही. परंतु त्यांचा उल्लेख " देव न मानणारा देवमाणूस " असा केला जातो.?
1) लोकहितवादी
2) महात्मा फुले
3) सुधारक
4) गोपाळ कृष्ण गोखले


उत्तर :- 3
           सुधारक
        ( गोपाळ गणेश आगरकर )

💥 महर्षी कर्वे यांनी 3 जून 1916 मधे स्थापन केलेल्या पहिल्या महिला विद्यापीठासाठी त्यांना कोठून प्रेरणा मिळाली होती ?
1) इंग्लंड विमेन्स युनिव्हर्सिटी
2) कॅनडा  विमेन्स युनिव्हर्सिटी
3) ऑस्ट्रेलिया विमेन्स युनिव्हर्सिटी
4) जपान विमेन्स युनिव्हर्सिटी


उत्तर :- 4
         जपान विमेन्स युनिव्हर्सिटी वर आधारित पुस्तक त्यांनी वाचले होते व याच प्रकारची स्त्रियांसाठी स्वतंत्र असे विद्यापीठ भारतात देखील असावे ह्या विचारातून पुढे भारतातील पहिले स्वतंत्र महिला विद्यापीठ पुणे येथे स्थापन झाले.

ह्या विद्यापीठाचे सुरुवातीचे नाव:-
" भारतवर्षीय महिला विद्यापीठ " असे होते.
पुढे ते ( SNDT महिला विद्यापीठ ) ह्या नावाने ओळखले जाऊ लागले......
आता ह्याचे मुख्यालय हे मुंबई ला आहे हेही येथे लक्षात ठेवावे....

💥( ISRO - इस्रो ) ची स्थापना केव्हा करण्यात आली.?
( Indian Space Research Organization )
1) 26 August 1961
2) 15 August 1969
3) 14 August 1979
4) 14 October 1969

उत्तर :- 2
        मुख्यालय - बंगळूरू


💥 ( DRDO - संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली.?
1) 1969
2) 1980
3) 1958
4) 1979

उत्तर :- 3
        1958 मध्ये झाली

💥 पढील पैकी कोणत्या व्हायरस चा शोध सर्वप्रथम लागला ?
1) पोलिओ
2) HIV
3) TMV
4) HTLV

उत्तर :- 3
         ( TMV )


💥 पक्षांद्वारे होणाऱ्या ' परागणाला '
 ( Pollination ) काय म्हणतात ?
1) हाइड्रोफिली
2) एन्टोमोफिली
3) एम्ब्रिओफिली
4) ऑर्निथोफिली

उत्तर :- 4
         ऑर्निथोफिली


यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या?

अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला.

ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न  भीमजी पारेख ता गुजराती व्यक्तीने केला.

क  हुगळी येथे बंगाली  भाषेचे व्याकरण 1778 ला छापले गेले.

वरीलपैकी कोणते विधान/ने  योग्य आहे/आहेत?

1  फक्त  अ

2  फक्त  ब  व क

3  फक्त  ब

4  वरील सर्व✅🙏


 1780 साली जेम्स हिकी याने दि बेंगोल गॅझेट नावाचे भारतातील पहिले वृत्तपत्र सुरू केले ते इंग्रजी भाषेतील......... होते?

1  दैनिक

2  साप्ताहिक✅🙏

3  मासिक

4  त्रैमासिक


 दि कलकत्ता गॅझेट कोणत्या साली सुरू करण्यात आले?

1    1782

2    1784✅🙏

3    1781

4    1783


 वृत्तपत्र व साल याबाबतची  अयोग्य जोडी ओळखा?

अ   दि बॉम्बे कुरियर   1790

ब   दि बॉम्बे  गॅझेट    1792✅

क  द कलकत्ता क्रॉनिकल  1786

ड  द मद्रास कुरियर   1788


अ.  1813 च्या चार्टर अॅक्ट नुसार ईस्ट इंडिया कंपनीची व्यापाराची मक्तेदारी संपुष्टात आली

ब.  1824 ला भारतीय सुती  कापडाच्या आयातीवर 67.5 टक्के इतका कर आकारला जात होता

क  भारतीय मलमलीच्या कापडावर 35% इतका कर आकारला जात होता 

वरील पैकी चुकीचे विधान कोणते आहे ते ओळखा?

1 फक्त अ

2 फक्त ब

3. ब आणि क

4   फक्त क✅🙏


 कमिटी ऑफ सर्किट खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे,,?

A   विल्यम बेंटिक

B   लोर्ड कॉर्नवॉलीस

C   वॉरन हेस्टींग✅🙏

D   लॉर्ड क्लाइव्ह


 सर सय्यद अहमद खान यांना सर ही पदवी कोणी बहाल केली?

1 मुस्लिम जनता

2 मुस्लिम खलिफा

3 ब्रिटिश प्रशासन✅🙏

4. यापैकी नाही


हेन्री डेरोझिओ यांच्या विषयी खालील विधाने विचारात घ्या?

अ. ते पुरोगामी विचाराचे होते.

ब. ते महिलाच्या हक्कांचे पुरस्कर्ते होते.

वरीलपैकी योग्य असलेली विधाने कोणती ?

1. फक्त अ

2. फक्त ब

3. फक्त अ आणि ब✅🙏

4. वरीलपैकी एकही नाही


 हेन्री डेरोझिओ यांनी सुरु केलेली तरुण बंगाल चळवळ विषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?

अ. त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेतले.

ब. ही चळवळ राजा राममोहन राय यांच्या पेक्षाही आधुनिक आहे.

1. फक्त अ

2. फक्त ब✅🙏

3. फक्त अ, ब

4. दोन्ही नाहीत


 तत्त्वबोधिनी सभा खालीलपैकी कोणी स्थापन केली ?

1. राजाराम मोहन राय

2. द्वारकानाथ टागोर

3. देवेंद्रनाथ टागोर✅🙏

4. रवींद्रनाथ टागोर


तत्त्व बोधिनी पत्रिका” हे खालीलपैकी काय होते ?

1. बंगाली मासिक✅🙏

2. बंगाली साप्ताहिक

3. संस्कृत मासिक

4. संस्कृत साप्ताहिक


 खालीलपैकी कोणते पुस्तक देवेंद्रनाथ टागोर यांनी लिहिले ?

अ. ब्रम्ह धर्म

ब. ब्राम्हो धर्म  विजम

1. फक्त अ

2. फक्त ब

3. फक्त अ, ब✅🙏

4.  दोन्ही नाहीत


 नियामक कायदा १७७३ विषयी खालील विधाने विचारात घ्या.

अ. बंगालच्या गव्हर्नरला “बंगालचा गव्हर्नर जनरल” बनविण्यात आले.

ब. त्याला मदत करण्यासाठी पाच सदस्यीय “कार्यकारी परिषद” बनविण्यात आले.

1. फक्त अ✅🙏

2. फक्त ब

3. फक्त अ, ब

4. दोन्ही नाहीत



*वेद भाष्य भूमिका हा ग्रंथ कोणी लिहिला?*

*उत्तर स्वामी दयानंद सरस्वती*

🦋


जैन तत्वज्ञानाचा असा दावा आहे की जग निर्माण आणि राखून ठेवलेले आहे?

अ) सार्वभौम कायदा.🍫🍫

ब) सार्वभौम सत्य.

क) सार्वभौम विश्वास.

ड) सार्वभौमिक आत्मा.



प्रश्न 1.अलेक्झांडर ने जेव्हा प्राचीन भारतावर आक्रमण केले त्यावेळी मगध साम्राज्यचा राजा कोण होता?

1)चंद्रगुप्त मौर्य

2)महापदमानंद

3)धनानंद✅✅

4)कालअशोक



2.तुघलक वंशाचा संस्थापक कोण?

1)मोहम्मद तुघलक✅✅

2)फिरोज तुघलक

3)जल्लाउद्दीन तुघलक

4)गाझी मलिक


खालील पैकी कोणत्या राजाने गंगैकोड हे बिरुद स्वतःस लावून घेतले?

1)पहिला राजराजा

2)दुसरा राजराजा

3)पहिला राजेंद्र✅

4)दुसरा राजेंद्र


4.चंद्रगुप्ताने धनानंदचा कसा पराभव केला याचे सविस्तर वर्णन कोणत्या ग्रंथात आहे?

1)इंडिका

2)अर्थशास्त्र

3)मुद्रा राक्षस✅

4)यापैकी नाही


5 सिंधू संस्कृतीतील अति दक्षिणेकडे असलेले ठिकाण कोणते?

1)उज्जैन

2)लोथल

3)आलमगिरपूर

4)दायामाबाद✅



6 गायत्री मंत्र हा कोणत्या वेदामध्ये आहे?

1)ऋग्वेद✅✅

2)यजुर्वेद

3)सामवेद

4)अथर्ववेद



7 खालील विधाने पाहा.

अ)युआन श्वान्ग हा यात्री चंद्रगुप्त द्वितीय च्या काळात भारतात आला होता

ब)फाहिआण हा यात्री हर्षवर्धन च्या काळात भारतात आला होता


M)फक्त अ बरोबर ब चूक.

P)फक्त ब बरोबर अ चूक

S)दोन्ही विधाने बरोबर✅✅

C)दोन्ही विधाने चूक.



8.राज्याचे सप्ताअंग हा सिद्धांत कोणी दिला आहे?


1)समुद्रगुप्त

2)मॅगेस्थिनस

3)चंद्रगुप्त

4)विष्णुगुप्त✅



खालील महाजनपदांचा उत्तेरकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा.

A. कंभोज B. गांधार C. अश्मक D. अवंती

1)A,B,C,D

2)A,B,D,C✅

3)B,A,D,C

4)B,A,C,D


कोणत्या युद्धाने दिल्लीच्या सुल्तानशाहीचा आरंभ झाला?

ऊत्तर= तराई चे द्वितीय युद्धाने


तराई चे पाहिले युद्ध कधी व कोनाकोणामध्ये झाले?

उत्तर = 1191

            पृथ्वीराज चौहान (विजयी) वि मोहम्मद घोरी (पराभूत)


🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁


शिक्षण हा समाज क्रांतीचा पाया आहे, असे कोण म्हणाले???


A】 कर्मवीर भाऊराव पाटिल🎂🎁

B】 अण्णाभाऊ साठे

C】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

D】 पेरियार रामास्वामी



🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁


शाक्य दंडपाणी आणि यशोधरा यांचे नाते काय???

A】 सासरा - सुन

B】 मित्र - मैत्रीण

C】 भाऊ - बहिण

D】 बाप - मुलगी🎂



🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁


भागवत गीता म्हणजे दूसरे तिसरे काही नसून बौद्धांच्या धर्म ग्रंथातील चोरी आहे असे कोणी म्हटले???

A】 प्रबोधनकार ठाकरे

B】 अण्णाभाऊ साठे

C】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर🎂

D】 शाहू महाराज

 

🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁



विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांचे एम.ए चे शिक्षण केंव्हा पूर्ण झाले???

A】 १९१४

B】 १९१५🎂

C】 १९१६ 

D】 १९१७


🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁


भगवान बुध्द यांनी प्रथम किती लोकांना धम्मदीक्षा दिली???

A】 पाच🎂

B】 दोन

C】 सात

D】 तीन


🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁


मुक्ता साळवे ही कोणाची विद्यार्थिनी होती???

A】राष्ट्रपिता फुले

B】 केळूसकर गुरूजी

C】 सावित्रीआई फुले🎂

D】 फातिमा शेख


🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁


१०】 शहाजी राजे यांच्या वडिलांचे नाव काय???

A】 रामजी

B】 संताजी

C】 लहुजी

D】 मालोजी🎂


🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁


पुणे करार केंव्हा झाला ?

 24 सप्टेंबर 1932




समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स



1) ब्राह्मो समाज —- 1828 —— राजाराम मोहन रॉय

2) आदी ब्राह्मो समाज —— 1865 —--- देवेंद्रनाथ टागोर

3) भारतीय ब्राह्मो समाज —--- 1865 —— केशवचंद्र सेन

4) तरुण ब्राह्मो समाज —— 1923----वि.रा.शिंदे

5) प्रार्थना समाज —--- 1867 —— आत्माराम पांडुरंग तर्खडकर

6) आर्य समाज —— 1875 —— स्वामी दयानंद सरस्वती

7) आर्य समाज शाखा कोल्हापूर —--1918--- शाहू महाराज

8) आर्य महिला समाज —— 1889 —— पंडिता रमाबाई

9) सत्यशोधक समाज —-1873----महात्मा फुले

10) सत्यशोधक समाज कोल्हापूर —— 1911---- शाहू महाराज

11) सार्वजनिक समाज —— 1872----आनंदमोहन बोस

12) नवविधान समाज —--1880--- केशवचंद्र सेन

13) भारत सेवक समाज---1905---- गोपाळ कृष्ण गोखले

14) भारत कृषक समाज —--1955---- पंजाबराव देशमुख


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 2)

15) डेक्कन एजुकेशन सोसायटी —- 1884- —--आगरकर,टिळक,चिपळूणकर

16) डेक्कन सभा —— 1893 —— न्या.म.गो.रानडे

17) डेक्कन रयत शिक्षण संस्था —-1916---- शाहू महाराज

18) रयत शिक्षण संस्था —-1919---- कर्मवीर भाऊराव पाटील

19) श्री शिवाजी शिक्षण संस्था —-1932--- पंजाबराव देशमुख

20) मनवधर्म सभा —— 1844----दादोबा पांडुरंग तर्खडकर

21) परमहंस सभा —— 1849---- दादोबा पांडुरंग /ईश्वरचंद्र विद्यासागर

22) ग्यानप्रसारक सभा —— 1848 —- दादोबा पांडुरंग

23) मद्रास महाजन सभा —— 1884 —— पी.आनंद चार्लू / सुब्रमण्यम अय्यर

24) हिंदू महासभा —- 1915 —— मदन मोहन मलविय

25) वृद्धांसाठी संगत सभा —— वि.रा.शिंदे

26) वकतरीत्वा उत्तेजक सभा —--न्या.म.गो.रानडे

27) सार्वजनिक सभा —-1870---- ग.वा.जोशी


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 3)

28) ग्रँट मेडिकल कॉलेज —1838--जगन्नाथ शंकर सेठ

29) ग्रँट मेडिकल सोसायटी —1852--भाऊ दाजी लाड

30) बंगाल असियाटीक सोसायटी--1784 —विलीयम जोन्स 

31) असियाटीक सोसायटी —1789--विलीयम जोन्स

32) बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी —1822— जगन्नाथ शंकर सेठ

33) सायन्तिफिक सोसायटी — 1862— सर सय्यद अहमद खान

34) मोहमदम लिटररी सोसायटी —1863— नवाब अब्दुल लतीफ

35) ट्रॅन्स्लेशन सोसायटी — 1864— सर सय्यद अहमद खान

36) लंडन इंडियन सोसायटी — 1865— दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी

37) थेओसोफिकॅल सोसायटी — 1875— मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट

38) मराठा एजुकेशन सोसायटी — 1901— शाहू महाराज

39) इंडियन होमरूल सोसायटी — लंडन —1905 —श्यामजी कृष्ण वर्मा

40) पीपल्स एजुकेशन सोसायटी —1945— बाबासाहेब आंबेडकर

41) किंग एड्वर्ड मोहमद्न एजुकेशन सोसायटी —1906— शाहू महाराज


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 4)

42) निष्काम कर्ममठ —1910— महर्षी धो.के.कर्वे

43) निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे

44) हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले

45) महारष्ट्राचे चे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील

46) हिंदुस्तान चे मार्टिन लुथर किंग — राजाराम मोहन रॉय 

47) महारष्ट्रा चे मार्टिन लुथर किंग — महात्मा फुले

48) अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी) — 1923— वि.रा.शिंदे

49) पवनार आश्रम (वर्धा) —1921— विनोबा भावे

50) अनाथ बालिका आश्रम —1899— महर्षि धो.के.कर्वे

51) विक्टोरीया अनाथाश्रम —- महात्मा फुले

52) विक्टोरीया मराठा बोर्डींग —1901— शाहू महाराज 

53) सेवा समिती — 1910— हृदयनाथ कुंझर

54) सेवा सदन — वि.रा.शिंदे

55) पूना सेवा सदन — रमाबाई रानडे

56) शारदा सदन मुंबई —1889 — पंडिता रमाबाई

57) मुक्ती सदन केडगाव —1898— पंडिता रमाबाई 

58) कृपा सदन, प्रीती सदन —- पंडिता रमाबाई


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 5)

59) केसरी — लोकमन्या टिळक

60) महारष्ट्र केसरी —— पंजाबराव देशमुख

61) महारष्ट्र धर्म —- विनोबा भावे

62) अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह —- पंजाबराव देशमुख

63) पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — साने गुरुजी

64) नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — बाबासाहेब आंबेडकर

65) पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —- एस.एम.जोशी

66) कुसाबाई शी पुनार्वीवाह केला (1874) —- विष्णू शास्त्री पंडित

67) गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) —- महर्षी धो.के.कर्वे

68) स्वतहाच्या मुलीचा पुनार्वीवाह करवून दिला —— रा.गो.भांडारकर

69) विधवा विवाह उत्तेजक मंडळी —- (1893) ——  महर्षी धो.के.कर्वे

70) पुनार्वीवाह उत्तेजक मंडळी (1865) —- न्या.म.गो.रानडे

71) विधवा विवाह पुस्तक —- विष्णू शास्त्री पंडित

72) विधवा विवाहाचा कायदा व पुनार्वीवाह कायदेशीर मान्यता (1917) — शाहू महाराज

73) आंतर जातीय विवाहास मान्यता कायदा (1918) — शाहू महाराज


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 6)

74) मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी —--नाशिक —- न्या.म.गो.रानडे

75) देशी व्यापार उत्तेजक मंडळी —(1882)

तलाठी सराव प्रश्नपत्रिका


1)) गडी *गावरानात* गुरे घेउन गेला आहे. अधोरेखित शब्द कोनत्या प्रकारात येतो?

१) सामासिक शब्द✔️

२) अभ्यस्त शब्द

३) तत्सम शब्द

४) तद्भव शब्द


2) पर्यायातील " तोळवा " या शब्दाचा समानार्थी नसलेले शब्द कोनता?

१) धष्टपुष्ट शरिर

२) तोष✔️

३) लंबक

४) तुळई


3) ' हेमाने दारापुढे सुंदर रांगौळी काढली. या वाक्यातील अव्यय प्रकार ओळखा?

१) शब्दयोगी अव्यय✔️

२) उभयान्वयी अव्यय

३) क्रियाविशेशन अव्यय

४) केवलप्रयोगी


4) पुढील वाक्याचा प्रयोग सांगा.

" पारीजातकाची योजना करनारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे."

१) कर्तरी प्रयोग✔️

२) कर्मनी प्रयोग

३) भावे प्रयोग

४) संकिर्ण प्रयोग


5) " भाकरी " हा शब्द मराठीत कोनत्या भाषेतुन आला आगे?

१) कानडी✔️

२) डच

३) पोर्तुगीज

४) अरबी


6) हल्ली *सज्जन मित्र* मिळने कठीन झाले आहे. अधोरेखित शब्दाचा विशेषन प्रकार ओळखा.

१) साधित विशेषन

२) नामसाधित विशेषन✔️

३) अविकारी विशेषन

४) परिनाम दर्शक विशेशन


7) ' घरी ' या शब्दाची विभक्ती कोनती?

१) षष्ठी

२) प्रथमा

३) द्वितिया

४)सप्तमी✔️


8) मुलांनी शिस्तित चालावे.प्रयोग ओळखा.

१) कर्मनी

२) अकर्मक कर्तरी

३) भावे✔️

४) सकर्मक कर्तरी


9) ' गजानन ' या शब्दाचा समास ओळखा.

१) तत्पुरुष

२) बहुव्रिही✔️

३) द्विगु

४) मध्यमपदलोपी


10) ' जो अभ्यास करील तो उत्तीर्ण होइल ' वाक्याचा प्रकार ओळखा.

१) केवल वाक्य

२) संयुक्त वाक्य

३) मिश्रवाक्य✔️

४) आज्ञार्थी वाक्य


11) 'लक्ष्मीकांत ' या शब्दाचा समास ओळखा.

१) बहुव्रिही✔️ 

२) कर्मधार्य

३) तत्पुरुष 

४) अव्ययीभाव


12) कपिलाषष्ठीचा योग येणे या वाक्याचा अर्थ ओळखा.

१) अत्यंत उत्सुक असने

२) जबाबदारी स्विकारने

३) दुर्मिळ संधी मिळने✔️

४) माघार घेने


13) कवितेचे रस किती आहेत?

१) चार

२) पाच

३) नऊ✔️

४) सात


14) " भाटी " शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्द कोनता.

१) भट

२) भाट

३) कुत्रा

४)बोका✔️


15) खालीलपैकी दंततालव्य वर्ण कोनता.

१) ज्

२) र

३) ग

४) म्


16) खालील संयुक्त वाक्य कोनत्या प्रकारचे आहे

" सगळे काही त्याला माहित आहे, पण लक्षात कोन घेतो?

१) न्युनत्वबोधक✔️

२) परिनामबोधक

३) विकल्पबोधक

४) समुच्तयबोधक


17) " र् " या व्यंजनाची जोडाक्षरे लिहन्याच्या किती पद्धती आहेत.

१) पाच 

२) चार✔️

३) एक

४) तिन


18) खालील शब्दातुन " कटक " या अर्थाचा शब्द कोनता?

१) युद्ध✔️

२) सैन्य

३) राजा

४) सेनापती


19) समानार्थी शब्द ओळखा. " *अभिनिवेश* "

१) जोम✔️

२) अभिनय

३) प्रवेश 

४) अभियान


20) ---- Yamuna is ---- tributary of the gangas.

1) The , A✔️

2) no article ,a

3) The , an

4) The, the


21) I met him ----- accident during my visit ------ Mumbai.

1) in , to

2) by ,to✔️

3) on,in

4) an,in


22) Use correct word in the sentence .

We ------ obey our parents.

1) should

2) will

3) can

4) must✔️


23) The meaning of beech--

1) sea shore

2) a tree✔️

3) an animal

4) a vegetable


24) choose the correct word from the following.

1) commutes

2) committee✔️

3) committing

4) committee


25) The important thing is ------ listen ------ them and change our ways.

1) to , to✔️

2) to, for

3) to, with

4) to, no article


26) Select the correct meaning of the word " error"

1) wrong

2) true

3) incorrect

4) mistake✔️


27) महाराष्ट्रात एकुण किती जिल्हा परिषदा आहेत?

१) ३६

२) ३४✔️

३) ३५

४) ३३


२८) वातावरनात ऑक्सीजन वायुचे प्रमान किती टक्के असते?

१) २३%

२) ४०%

३) ९८%

४) २१%✔️


२९)़मलेरिया आणि डास यांच्यातील संबंध कोन्या शास्त्रज्ञाने स्पष्ट केला?

१) लुई पाष्चर

२) रोनॉल्डरॉस✔️

३) बेनडेर

४) डिओडर श्वान


३०) मानवी नाडीचे प्रती मिनीट किती ठोके पजतात?

१) ७२✔️

२) ६०

३) ४०

४) ३०


३१) टंगस्टन धातू किती अंश तापमानास वितळतो?

१) २०००°

२) १०००°

३) ३०००°✔️

४) १५००°


३२) कोनत्या रोगाचा प्रसार पान्यामार्फत होतो?

१) काविळ

२) अतिसार

३) विषमज्वर

४) यापैकी सर्व✔️


३३) नॉनस्टीक भांड्यावर कशाचा थर असतो?

१)टेफ्लॉन✔️

२) जिप्सम

३) इथिलीन

४) फॉक्झिन


३४) मानवी शरीरात पान्याचे प्रमान किती असते?

१) ६५%✔️

२) ८०%

३) ६०%

४) ४०%


३५) मानवी़ शरिरातील सर्वात मोठी ग्रंथी कोनती?

१) यकृत✔️

२) किडनी 

३) फुफ्फुस

४) र्हदय


३६) भारताचे गवर्नर जनरल केंव्हापासुन व्हॉइसरॉ़य म्हनुन ओळखले जाउ लागले?

१) १८५५

२) १८५६

३) १८५७

४) १८५८✔️


३७) सत्यशौधक समाजाचे मुखपत्र कोनते?

१) सुधारक

२) केसरी

३)दिनबंधू✔️

४) प्रभाकर


३८) डॉ.आंबेडकरांनी मनुस्मृतिचे दहन कोठे केले?

१) नाशिक 

२) मुंबई

३) रत्नागिरी

४) महाड✔️


३९)पुन्याचा प्लेग कमिशनर रँड याची हत्या १८९७ मध्ये कोणी केली?

१) वासुदेव बळवंत फडके

२) अनंत कान्हेरे

३) दामोदर हरीचाफेकर✔️

४) सुरेंद्र बोस


४०) सह्याद्रीच्या पुर्वेकडील प्रदेश काय म्हनुन ओळखला जातो?

१) अति पर्जन्याचा प्रदेश

२) पर्जन्य छायेचा प्रदेश✔️

प्रश्न मंजुषा

1 ) जेटस्ट्रीम चे गुणधर्म खाली दिलेले  आहेत त्यातील योग्य विधानांचा पर्याय निवडा.


अ) ते दोन्ही गोलार्धातील वेगवान पश्चिमी वाऱ्यांच्या दरम्यान आढळतात.

ब) ते विषुववृत्ताच्या तसेच ध्रुवाजवलील भागात आढळतात.

क) हे वातावरणाच्या खालच्या थरात आढळतात.

ड) यांचा भूपृष्ठवरील पर्जन्यावर प्रभाव पडत नाही.


पर्याय- 

1 ) अ आणि ब   2) ब आणि क

3 ) अ आणि क  4) ब आणि ड


Ans:-1


2) खालील पैकी कोणत्या महिन्यात विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा 5 अंशांनी उत्तरेकडे सरकतो ? 

  

पर्याय - 

1 ) सप्टेंबर     2 ) डिसेंम्बर

3 ) जून          4 ) मार्च


Ans:-3


3 ) एल निनो वर्षी खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर कमी वायूदाबाचा प्रदेश निर्माण होतो ?


पर्याय - 

1 ) अटलांटिक  2 ) पॅसिफिक

3 ) हिंदी           4 ) आर्क्टिक 


Ans:-1


4 ) द्वीपगिरी काय आहे ? 


पर्याय - 

1 ) वाळवंटी प्रदेशात वाऱ्याच्या खणण कार्यामुळे तयार झालेला भुआकार.

2 ) वाऱ्याच्या भरण कार्यामुळे तयार झालेला भुआकार.

3 ) नदीच्या भरण कार्यामुळे तयार झालेला भुआकार.

4 ) हिमनदीच्या भरण कार्यामुळे तयार झालेला आहे .


Ans:-1



5 ) दिवसातील सर्वाधिक तापमान ...............या वेळेत असतं. 

 

पर्याय - 

1 )सकाळी 11 ते 12

2 ) दुपारी 12 ते 1 

3 ) दुपारी 1 ते 2 

4 ) दुपारी 2 ते 3


Ans:-4


6)मुस्लिमांसाठी स्वतंत्र देश असावा ही कल्पना रहमत चौधरी ने कोणत्या पुस्तकात मांडली होती?

अ) NOW ऑफ NEVER

ब)BROKEN WINGS

क)THE WAY OUT

ड)NOTA

Ans:-1


7)पाकिस्तान ची घटना लिहण्यास मदत करणारे भारतीय कोण होते?

अ)जगन्नाथ मिश्रा

ब)अमीर अली

क)गफार खान

ड)नारायण पंडित

Ans:-1


8)बंगालच्या द्वितीय विभाजनावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता?

अ)मिंटो 2रा

ब)कर्झन

क)माउंटबॅटन

ड)वेव्हल

Ans:-3


9) मला जर मारायचे असेल तर गोळी घालून मारा कुत्र्यासारखे फासावर लटकवून नका असे उद्गार कोणी काढले होते ?

अ)तात्या टोपेे 

ब)भगतसिँग 

क)अनंत कान्हेरे 

ड)नोटा


Ans:-1

 १०) खालीलपैकी कोणी 1857 च्या उठावाचे वर्णन हे हिंदूंनी ख्रिश्चना विरुद्ध केलेले ते एक बंड होते असा केला आहे?

अ)स.सेन

ब)अशोक मेहता

क)T. R. होल्म्स

ड)OTRAM


Ans:-1

तलाठी भरती जिल्हा निवड

🛑मुलांनो लक्ष द्या...
जास्त जागेवर जास्त cutoff तेव्हा लागतो जेव्हा other ठिकाणी जागा नसतात..आणि फक्त एका जागेवर जागा असतात.

2019 मध्ये फक्त रत्नगिरी मध्ये जागा होते बाकी ठिकाणी नाही..

आता जास्त जागा वर भरायच तरी 5 option आहेत..अस होणार नाही की 5 पण जिल्ह्यात high जाईल cutoff

भ्रमात राहू नका..शेवटी तुम्ही कमी जागेवर अर्ज करून येणारे अर्ज ची संख्या कमी करू पाहत आहेत पण तुम्ही मुलांचा अभ्यास कमी नाही करू शकत ना...
बाकी नेहमी प्रमाणेच सांगेन

ऐकावे जनाचे करावे मनाचे

Top 5 district for boys

रायगड
Open - 32
EWS - 6
Obc - 18
SC -10
ST -10

पुणे
Open - 46
EWS - 11
Obc - 27
SC -15
ST - 07

अहमदनगर
Open - 28
EWS - 09
Obc - 16
SC -10
ST -05

बीड
Open - 23
EWS - 11
Obc - 15
SC -13
ST - 06

सोलापूर
Open - 21
EWS - 11
Obc - 15
SC -12
ST -07

Thursday 29 June 2023

प्रश्न मंजुषा


कोणता धूमकेतू नोव्हेंबर व डिसेंबर 2013 मध्ये पृथ्वीच्या सर्वात जवळून गेला?

 A) आयकिया सेकी 

 B) हेलीस 

 C) टेम्पेल 

 D) आयसॉन ✅




योग्य कथन/कथने ओळखा.(a) महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे बल्लारपूर येथे आहेत.(b) खापरखेडा हे जलविद्युत केंद्र नाही.पर्यायी उत्तरे :

 A) कथन (a) बरोबर, कथन (b) चुकीचे 

 B) कथन (a) व कथन (b) दोन्ही बरोबर ✅

 C) कथन (a) व कथन (b) दोन्ही चुकीची 

 D) कथन (a) चुकीचे, कथन (b) बरोबर 




जो अल्गोरिदम माहिती साठा/भंडारातील माहिती किंवा संक्रमित माहिती क्रिप्टोग्राफीचे तंत्र वापरुन कुटबद्ध करतो आणि लपवुन ठेवतो, त्याला काय म्हणतात?

 A) फायरवॉल 

 B) रुटकिट 

 C) सायफर  ✅

 D) पिवर टेक्स्ट 



'लखिना' काय भूषविते ?

 A) स्त्रियांच्या क्रीडास्पर्धात लक्षणीय काम करणा-या स्त्रीला मिळणारे पारितोषिक.  

 B) भारताची सर्वात अलीकडील सॅटेलाइट मोहीम.  

 C) लेह-लडाख मधील संरक्षण विभागाचे अधिष्ठापन. 

 D) महाराष्ट्रात रूजू केलेली प्रशासकीय पद्धत.  ✅


कोणत्या  राज्यात  100% विद्दुतीकरणं  ( ग्रामीण भाग ) झालेला आहे? 

1) कर्नाटक ✅

2)  महाराष्ट्र 

3)  पंजाब 

4) हरियाणा 


भंडारदरा  धरणास......... नावाने  ओळखले  जाते?. 

1) विल्सन  बंधारा  2) येसाजी कंक  3) यशवन्त  सागर  जलाशय  4) लाइड  धरण. 


1)  फक्त  2 

2)  फक्त  4

3) फक्त   3

4)  फक्त  A✅


सन  2011 च्या  लोकसंख्या  जनगणने नुसार   महाराष्टत  साक्षरते ची  टक्के वारी  किती  होती?. 

1)  0.478  2) 0.743  3) 0.8291 4) 0.7981.


1) केवळ  2 बरोबर 

2) केवळ  4 बरोबर 

3) केवळ  1 बरोबर 

4)  केवळ  3 बरोबर ✅


 भारतामध्ये   सर्वाधिक  दूध  उत्पादनाचे  राज्य  आहे?. 

1) ओरिसा  2) हिमाचल  प्रदेश  3) उत्तर प्रदेश  4)  अरुणाचल  प्रदेश. 


1)  1 किंवा 2 बरोबर 

2) फक्त 2 बरोबर ✅

3)  1, 2, 3 बरोबर 

4) फक्त  4 


गरमसुर  डोंगर  कोणत्या  जिल्हात आहे?. 

1) चंद्रपूर  2)  वर्धा  3) अमरावती  4)  नागपूर


1)  फक्त  2 

2) फक्त  3 बरोबर 

3)  फक्त  1 बरोबर 

4)  फक्त  4 बरोबर ✅


खलीलपैकी  कोणता  राष्ट्रीय  मार्ग  महाराष्ट्र  राज्यात  सुरु  होऊन  महाराष्ट्र  राज्यात संपतो?. 

1)  राष्ट्रीय  महामार्ग  क्र.  16 

2) राष्ट्रीय  महामार्ग  क्र.  17

3) राष्ट्रीय महामार्ग  क्र.  50 

4) राष्ट्रीय महामार्ग  क्र.  43 


1)   फक्त  2 ✅

2) फक्त  4

3) फक्त  3

4)  फक्त  1


.2019चा जनस्थान पुरस्कार कोणाला मिळाला आहे

१.डॉ विजय राज्याध्यक्ष

२.अरूण साधू

३.वसंत डहाके📚📚

४.यापैकी सर्व



 भारताची राजधाधी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटीश गव्हर्नर जनरलचे नाव सांगा. ?*

1) लाँर्ड हार्डिग्ज 📚📚

2) लाँर्ड रिपन 

3) लाँर्ड चेम्सफोर्ड 

4) लाँर्ड लिटन




दाशराज्ञ युद्ध पुढीलपैकी कोणात घडले होते ?

 A) पुरोहित व विश्वामित्र 

 B) विश्वामित्र व भरत जमात 📚📚

 C) सुदास व वशिष्ठ 

 D) पुरु व विश्वामित् 



भौगोलिक, राष्ट्रीय सीमा व कालमर्यादा निरर्थक ठरत आहेत कारण 

 A) संवाद तंत्रज्ञान 

 B) नवी संवाद क्रांती 📚📚

 C) माहिती संप्रेषण तंत्रज्ञान 

 D) डिजिटल टूल्स 


 


पहिल्या भारतीय अमेरिकन ज्यांची अमेरिकेच्या सिनेटवर निवड झाली आहे?

  1.कमला शिरीन 

 2. कमला हॅरीस 📚📚

  3.राधा नारायण 

  4.मृणालिनी रॉय




विकासाची क्षमता खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून असते ?

 A) व्यापाराची दिशा 

 B) आयात व्यापार 

 C) व्यापाराचे आकारमान 📚📚

 D) वरीलपैकी एकही नाही 



संगणक तंत्रज्ञानामुळे लोक याही बाबतीत व्यापार करू लागले

 A) वस्तू व सेवा 

 B) मानवी साधन संपत्ती 

 C) नैसिर्गिक साधन संपत्ती  

 D) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चलन 📚




जेव्हा मधमाशी एका फुलानंतर दुस-या फुलास भेट देते, तेव्हा कोणती प्रक्रिया होते ?

 A) परागीकरण 📚📚📚

 B) फलन 

 C) पुनरुत्पादन 

 D) वरीलपैकी सर्व  




परिच्छेदास सुयोग्य नावं निवडा. * 

 A) निर्यात प्रोत्साहन 

 B) संवाद तंत्रज्ञान 

 C) संवादक्रांती 

 D) परकीय व्यापार आणि आर्थिक विकास 📚📚



9.भारतातील ताजमहल ह्यावर कशाने परिणाम झाला

 A) तीव्र पर्जन्य 

 B) आम्ल पर्जन्य 📚📚

 C) सतत पर्जन्य 

 D) सूक्ष्म पर्जन्य 




.कार्बन डायऑक्साइडची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन _______ हे बनते

 A) HCO3 (aq) 

 B) H2CO3 (aq) 📚📚

 C) H2CO2 (aq) 

 D) H3CO3 (aq) 




लैंगिक पुनरुत्पादन तेव्हाच यशस्वी झाले असे म्हणता येईल, जेव्हा

 A) परागकण अचूकपणे कुक्षीवर पडतील 

 B) परागनलिका बीजकोषात पोहचेल 

 C) फळांमध्ये बीजधारणा होईल 📚📚

 D) जैविक घटक परागीकरणात सहभागी असेल 



टोंबोलो आणि पुळण ही भूरूपे ___ च्या कार्याशी संबंधित आहेत. 

 A) वारा 

 B) सागरी लाटा 📚📚

 C) हिमनदी  

 D) भूमिगत पाणी


सिरॉसिस हा विकार अतिमधप्राशनामुळे कोणत्या अवयवास होतो?

1) फुफ्फुस

2)यकृत

3)लघुआंत्र✅

4)जठर


रोगावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये याची काळजी घेणे याला.............ही संज्ञा आहे.

1)सॅनीटेशन

2)हायजीन

3)पूर्वप्रतिरक्षा (Prophylaxis)✅

4)यापैकी नाही



.............ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रवते.

1)लालोत्पादक ग्रंथी

2)स्वादुपिंड

3)जठरग्रंथी

4)यकृत✅


खालीलपैकी कोणता गुणसूत्रीय आजार X-गुणसूत्रामुळे होतो?

1)गलगंड

2)रंगअंधत्व✅

3)हाशीमोटो आजार

4)यापैकी नाही



आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्त्रोत कोणते?

1)कर्बोदके✅

2)प्रथिने

3)मेद

4)जीवनसत्वे



खालीलपैकी...........हे स्नायू ऊतींचे महत्वाचे कार्य गणले जाते.

1)हालचाल✅

2)समन्वय

3)इंद्रिय समन्वय

4)स्त्रवन



*मानवी मूत्राचा (Urine) pH किती असतो?*

1)4 - 4.5

2)7.5 - 9

3)9 -10

4)5.5 - 7✅



रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्तिथी म्हणजे.........

1)धमणिकाठिण्यता

2)परिहृदयरोग

3)अतीलठ्ठपणा

4)उच्चताण✅




धमनिकाठिण्यता हा रोग.........मुळे उद्दभवतो.

1)कुपोषण

2)अतिपोषण✅

3)अधोपोषण

4)यापैकी नाही

ग्रंथी (Glands).

🎇 मानवी शरीरात जे रासायनिक नियंत्रण🧪 ठवण्याचे काम होते ते काम ग्रंथीच्या मार्फत होते


🎇 गरंथी या दोन प्रकारच्या असतात

1)अंतः स्रावी ग्रंथी (Endocrine Gland)

2)बाह्यस्रावी ग्रंथी (Exocrine Gland)


🎇अंतः स्रावी ग्रंथी 

या संप्रेरके(Harmon's)स्रावतत


🎇बाह्यस्रावी ग्रंथी

 या. विकारे(Enzymes)स्रावतत


🎇अतः स्रावी ग्रंथी यांना कोणतेही कोणतीही नलिका नसते ते आपला स्राव थेट रक्तात सोडतात(Ductless Gland)

🎇 बाह्यस्रावी ग्रंथी यांना मात्र नलिका असतात


🌸 ❗️अंतः स्रावी ग्रंथी❗️ 🌸

      

         🍀 खलीलप्रमाणे आहेत🍀


🎇 पीनल ग्रंथी (Pineal Gland)

    🎯आपल्या मेंदूतील ही सर्वात छोटी ग्रंथी आहे.

   🎯सप्ररकामुळे उशीरा पौगाड अवस्था येते


🎇 पियूषिका ग्रंथी (Pituitary Gland)

     🎯ही ग्रंथी मेंदूमध्ये असते 

     🎯गरंथी शरीरातील इतर ग्रंथीवर नियंत्रण ठेवते


🎇 अवटू ग्रंथी(Thyroid Gland)

   🎯 चयापचय क्रियेवर नियंत्रण ठेवते


🎇 स्वादुपिंड (Pancreas) 

    🎯ही ग्रंथी अंत:स्त्राधी व बाह्यस्त्रावी दोन्हीही कामे करते(अपवाद)

    🎯इन्सुलिनचे प्रमाणाचे नियंत्रण करते(H)

    🎯ट्रीपसिन, लायपेज आणि अमायलेज यांचे पचन करते(E)


🎇 अधिवृक्क ग्रंथी(Adrenal gland)

     🎯भीतीदायक वातावरण व भावनिक प्रसंगी काम करते (Emergency Hormone)

     🎯मीठ प्रमाण नियंत्रण करते


🎇  अंडाशय(Ovary)

    🎯सत्रियांमध्ये आढळून येते

    🎯प्रोजेस्टेरोन(गर्भधारणा मदत)

    🎯इस्ट्रोजन (गर्भाशयाचा विकास) करते


🎇 वृषण ग्रंथी(Testis)

   🎯टेस्टोस्टेरोन हार्मोन्स स्रावते पुरुषांच्या त आढळते पुरुषत्व विकास होतो

अन्नपचन प्रक्रिया

🌿सजीवाने अन्न ग्रहन केल्यापासून ते उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकण्याच्या अवस्थेपर्यंत अन्नावर घडणार्‍या संपूर्ण प्रक्रियेला अन्नाची पचन क्रिया असे म्हणतात.

🌿अन्न पचण्याची प्रक्रिया चालू असतांना त्या अन्नात या अवयवांकडून अनेक स्त्राव सोडले जातात.

🌿या स्त्रावामध्ये विकरे, आम्ल, उत्प्रेरक, यांचा समावेश होते.

🌿या स्त्रावामुळे अन्नातील जटिल घटकांचे सुलभ घटकात रूपांतर होते. ज्यामुळे अन्न पचण्यास सुलभ जाते.

🌿खाल्लेले अन्न पचविण्याच्या क्रियेत खालील अवयवांचा महत्वाचा सहभाग असतो. अन्नपचनाची प्रक्रिया खालीलप्रकारे पाडली जाते.  



1. अंग पदार्थ – मुख व गुहा

👉सत्राव – लाळ  

👉विकर – टायलिन

👉माध्यम – अल्पांशाने

👉मळ अन्न पदार्थ – पिष्टमय पदार्थ  

👉करिया आणि अंतिम – शर्करा (माल्टोज)


2. अंग पदार्थ – जठर

👉सत्राव – हायड्रोक्लोरिक

👉माध्यम – आम्ल, अॅसिड  

👉मळ अन्न पदार्थ – प्रथिने  

👉करिया आणि अंतिम – जंतुनाशक


3. अंग पदार्थ – जठररस  

👉सत्राव – पेप्सीन,रेनीन

👉माध्यम – आम्ल

👉मळ अन्न पदार्थ – प्रथिने, दूध

👉करिया आणि अंतिम – सरल प्रथिने (पेप्टोन), व्हे मध्ये रूपांतर


4. अंग पदार्थ – लहान आतडे

👉सत्राव – पित्तरस

👉माध्यम – अल्कली

👉मळ अन्न पदार्थ – प्रथिने व मेद

👉करिया आणि अंतिम – मेदाचे विघटन व अन्न जंतूनाशक करणे.


5. अंग पदार्थ – स्वादुपिंडरस  

👉विकर – ट्रिप्सीन, अमायलेझ, लायपेझ

👉माध्यम – अल्कली, अल्कली

👉मळ अन्न पदार्थ – प्रथिने(पेप्टोन), पिष्टमय पदार्थ, मेद

👉करिया आणि अंतिम – अमिनोआम्ल, शर्करा व ग्लुकोज, मेदाम्ल व ग्लिसरॉल


6. अंग पदार्थ – आंत्ररस

👉विकर – इरेप्सीन, इनव्हरटेझ, लायपेझ

👉माध्यम – अल्कली

👉मळ अन्न पदार्थ – प्रथिने, शर्करा, मेद  

👉करिया आणि अंतिम – अमिनोआम्ल, ग्लुकोज, फ्रूटोज व माल्तैझ, मेदाम्ल व ग्लिसरॉल.

दत्तक विधान नामंजूर - लॉर्ड डलहौसीने

🖍 दत्तक विधान नामंजूर या तत्वाचा हा शोधकर्ता नव्हता.

🖍  या तत्वांचा प्रथम पुरस्कार हा ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाकडे जातो. 

🖍  1834 मध्ये कंपनीच्या संचालकांनी घोषणा केली होती की पुत्र नसल्यास दत्तक घेण्याचा अधिकार देणे म्हणजे आमची ही विशेष कृपा आहे.

 

  या आदेशांवरून सर्वप्रथम खालसा झालेली राज्ये. 

  मांडवी राज्य :- 1839 

  कुलाबा व जालौर :- 1840 

  सुरतच्या नवाबाचे राज्य :- 1842 



🖍 वयपगत सिध्दांतानुसार विलीन झालेले प्रथम            संस्था म्हणजेच सातारा होय व शेवटचे संस्थान म्हणजेच नागपुर होय.

डलहौसीने पुढील राज्ये खालसा करून ती इंग्रजी राज्यात विलीन केली.

  सातारा :- 1848 

  जैतपूर व संबलपूर :- 1849 

  पंजाब :- 1849 

 ओरछा :- 1849 

 भागत /बघाट :- 1850 

 उदयपूर :- 1852 

 झांसी :- 1853 

 नागपूर :- 1854 

 करौली :- 1855 

🖍  इ. स. 1852 :- ब्रम्हदेश हा इंग्रजी राज्यात विलीन केला गेला. 

🖍  इ. स. 1853 :- तैनाती फौजेची बाकी म्हणुन त्याने हैद्राबदच्या निजामाकडून वऱ्हाड प्रांत घेतला.

🖍  इ. स. 1855 :- याने तंजावरच्या राजाची राजा ही पदवी रद्द केली. 

🖍  इ. स. 1856 :- गैरव्यवहार व अव्यवस्था या कारणाखाली याने औंधच्या नवाबाचे राज्य खालसा केले. 

🖍  इ. स. 1856 :- याने अवधचा नवाब वाजिद अली शाह यास सत्तात्याग करण्यास सांगितले परंतु नवाबाने नकार दिला तेव्हा ‘प्रशासन’ हा मुद्दा बनवून त्याने अवधचे विलीनीकरण केले. 

🖍  पशवा बाजीराव दुसरा याचे दत्तक पुत्र धोंडोपंत उर्फ नानासाहेब यांची वार्षिक 8 लक्ष रूपयांची पेन्शन तसेच पेशवा ही पदवीदेखील डलहौसीने रद्द केली. तसेच नानासाहेबांना बिठूर जहागीर सोडण्याचाही हुकूम दिला गेला. 

🖍 कर्नाटकच्या नवाबाला मिळत असलेली 8 लक्ष प्रती वर्ष ही पेंन्शन याने बंद केली. 

🖍  बादशहा बहादुरशहा याची पदवी रद्द करण्याचा डलहौसीचा प्रयत्न मात्र असफल ठरला.


वाचा :- सविस्तरपणे



⚔️ आप्पासाहेब भोसल्यांचा उठाव (1817 – 18)
▪️गौड जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने उठाव केला
▪️बतूर येथे इंग्रजी फौजेचा त्यांनी पराभव केला.
▪️शीख राजा रनजीसिंहचे लढण्यासाठी मन वळविण्यासाठी प्रयत्न केला.
▪️शवटी इंग्रजांकडून पराभव पत्कारला.

⚔️ हटकरांचा उठाव – मराठवाड्यात
▪️नांदेड, परभणी व पैनगंगेच्या प्रदेशात 1800 – 1820 या काळात.
▪️नता – नौसोजी नाईक
▪️परमुख ठाणे – नोव्हा
▪️बरिटीशांनी उठाव मोडून काढला. 

⚔️ खानदेशातील भिल्लाचा उठाव
▪️भिल्लाची खानदेशात लूटमार.याला यशवंतराव होळकरची फूस होती.
▪️नते – काजरसिंग, भीमा नाईक, भागोजि नाईक, नेवश्य नाईक, कलुबाबा, दौलत नाईक, तंट्या भिल्ल
▪️भिल्लणा वठणीवर आणण्यासाठी लॉर्ड एलफिन्स्टनने प्रयत्न केले.

⚔️ खानदेशातील भिल्लाचा उठावाचे उपाय:
▪️1825 मध्ये भिल्लाकरिता जमिनी देणे, वसाहती निर्माण करणे.
▪️भिल्लाणा पोलिस दलात नोकर्‍या दिल्या. 
▪️बडखोर भिल्लाणा वठणीवर आणण्यासाठी इतर भिल्लाचा वापर केला.

⚔️ काजरसिंग नाईकचा उठाव:
▪️1875 च्या वेळी खानदेशात ब्रिटीशांविरुद्ध भिल्लाच्या उठावात नेतृत्व केले.
▪️पर्वी ब्रिटीशांच्या पोलिस दलात होता.
▪️बरिटीशांचा 7 लाखाचा खजिना लुटला.

कंपनीच्या राज्यसत्तेत गाजलेले बंगालचे गव्हर्नर जनरल



भारतात समुद्रमार्गे येणारे यूरोपियन


लॉर्ड क्लाईव्ह (1756 ते 1772) :-


भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवण्याची महत्वपूर्ण कामगिरी लॉर्ड क्लाईव्हने केली. लॉर्ड क्लाईव्हच्या काळातील घटना. 


🛑प्लासिचे युद्ध :- 


जून 1757 रोजी प्लासीच्या मैदानात सिराजउदौला व कंपनीच्या सेनेत युद्ध झाले. या युद्धात लॉर्ड क्लाईव्हने सिराजउदौलाचा पराभव करून बंगालवर ताबा मिळविला. 


🛑बक्सरची लढाई :- 


बंगालचा नवाब मीरकासीम, आयोद्धेच नवाब शुजाउदौला व दिल्लीचा बादशहा शहाआलम यांचा सन 1764 मध्ये बक्सर येथे कंपनीच्या सेनेने पराभव केला. 


🛑अलाहाबादचा तह:-


बक्सरच्या युद्धानंतर ऑगस्ट 1765 मध्ये लॉर्ड क्लाईव्हने अलाहाबाद येथे मोघल बादशहा शहाआलम सोबत तह केला. या तहानुसार बंगाल प्रांतात दुहेरी राजकीय व्यवस्था सूरु झाली. 


सर वॉरन हेस्टिंग(सन 1772 ते 1773) :-


सर वॉरन हेस्टिंगने बंगाल प्रांतात न्यायविषयक सुधारणा केल्या व विल्यम जोन्सच्या सहकार्याने सन 1783 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालच्या संस्थेची स्थापना केली. भारतातील पहिले वृत्तपत्र *बंगाल गॅझेट* (1781) याच काळात सुरू झाले. 


लॉर्ड कॉर्नवॉलीस(1786 ते 1793) :-


लॉर्ड कॉर्नवॉलीसला भारतीय प्रशासकीय सेवेचा व कायमधारा पद्धतीचा जनक असे सुद्धा म्हणतात. 


 लॉर्ड वेलस्ली (1798 ते 1805) :-


लॉर्ड वेलस्लीला तैनाती फौजेचा जनक म्हणतात. त्याने तैनाती फौजेच्या माघ्यमातून भारतात कंपनी सत्तेचा विस्तार केला. 


तैनाती फौजेच्या ही कल्पना सर्वप्रथम सन 1899 मध्ये निझामाने स्विकारली. 

सन 1802 मध्ये दुसर्‍या बाजीरावने वसईच्या तहातंर्गत तैनाती फौजेचा स्विकार केला. 


 मार्क्विस ऑफ हेंस्टीग्ज* (सन 1813 ते 1823) :-


मार्क्विस ऑफ हेस्टिंगने नेपाळवर स्वारी करून हिमालयातील तराईचा विस्तृत प्रदेश, कुमाऊम गढवाल व सिक्किम प्रांत, सिमला, नैनीताल व मसूरी सारखी थंड हवेची ठिकाणे जिंकून कंपनीच्या साभ्राज्यात सामील केली. 


जून 1818 मध्ये एलफिन्स्टनच्या सेनेने कोरेगावाच्या लढाईत बाजीराव पेशव्याच्या सेनेचा निर्णायक पराभव करून पेशवेशाही खालसा केली. 


लॉर्ड विल्यम बेंटीक (1823 ते 1833) :-


लॉर्ड विल्यम बेंटिकने सन 1829 मध्ये सती प्रथा बंद कायदा पास केला. 

भारतीय लोकांच्या शिक्षणाकरिता इंग्रजी भाषा ही शिक्षणाचे माध्यम राहील असे जाहीर केले.

जमीन सुधारणा पद्धती


⭕️♦️⚠️ कायमधारा पद्धती

♦️लागू :- 1793.

♦️प्रांत :- बंगाल,बिहार,ओरिसा, बनारस व उत्तर कर्नाटक.

♦️ प्रमाण :- 19% प्रदेशात कायमधारा.

♦️ संबंधित अधिकारी :- कॉर्नवाॅलीस (जॉन शोअर समिती).

♦️ महसूल वाटप :-शासन,जमीनदार, शेतकरी.



⭕️♦️⚠️ रयतवारी पद्धती

♦️लागू :- 1820.

♦️प्रांत :- मुंबई, मद्रास, आसाम.

♦️ प्रमाण :- 51% प्रदेशात रयतवारी.

♦️ संबंधित अधिकारी :-

               थॉमस मन्रो-मद्रास.  

               एल्फिन्स्टन-मुंबई.

♦️ महसूल वाटप :-शासन व रयत.



⭕️♦️⚠️ महालवारी पद्धत

♦️लागू :- 1822.

♦️प्रांत :- (उत्तर प्रदेश), पंजाब, आग्रा, अवध.

♦️ प्रमाण :- उर्वरित 30% प्रदेशात महालवारी.

♦️ संबंधित अधिकारी :- होल्ट मॅकेन्झी.

♦️ महसूल वाटप :- शासन,जमीनदार,

 कूळ व प्रत्यक्ष जमीन कसणारा.


⭕️♦️⚠️मौजेवारी पध्दती - लॉर्ड एलफिन्स्टन.

⭕️♦️⚠️लिलाव/बोली पद्धत - वॉरन हेस्टींग.

खोती पद्धत


🔹खोतांच्या प्रशासन पद्धतीला खोती असे म्हणत.


🔸खोत हा ब्रिटीश भारतातील गावचा एक प्रशासकीय अधिकारी असे.


🔹 तो गावातील शेतसारा गोळा करून सरकारला देत असे.


🔸 खोत शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार असाही होतो.


🔹खोती पद्धत बहुतांशी 

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि 

सिंधुदुर्ग येथे आढळून येत होती. 


🔸खोती पद्धतीने शेतकऱ्यांचे कमालीचे शोषण होत होते. 


🔹कळांनी जमीन कसायची आणि ७५ टक्के वाटा सावकारांना द्यायचा, अशी ही अन्यायकारक पद्धत होती.


🔺 ही एक प्रकारची वेठबिगारीच होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खोती पद्धतीला नष्ट करण्यासाठी लढा दिला व ही पद्धत समाप्त केली.


🔸 तयांनी इ.स. १९०५ ते १९३१ या काळामध्ये पेण, वाशी, पोलादपूर, चिपळूण, माणगाव, महाड, खेड, तळा, रोहा इत्यादी गावांत अनेक सभा घेतल्या. 


🔹तयानंतर खोतांना हादरा देण्यासाठी कोकणातील १४ गावच्या शेतकऱ्यांनी १९३३ ते १९३९ पर्यंत संप पुकारला होता.


🔸शतकरी नेते नारायण नागू पाटील हे या संपाचे नेतृत्व करत होते. 


🔹शतकऱ्यांच्या या लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साथ दिली. 

त्यावेळी झालेल्या केसेस लढण्यासाठी बाबासाहेब स्वतः शेतकऱ्यांच्यावतीने न्यायालयात उभे राहिले होते.


📚 खोतांचे अधिकार 📚


🔸एका खोताकडे अनेक गावांचे अधिकार असत. गावातील सर्वाधिक अधिकार हे खोताकडे असत. 


🔹खोत या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार असाही होतो. 


🔸खोताचे हक्क हे वंशपरंपरेने चालत असत. खोताकडे घाटावरील देशमुख आणि देशपांडे यांप्रमाणे काही अधिकार होते.


🔹भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर खोताचे अधिकार नष्ट झाले. तरी काही प्रमाणात गावातील त्याचा मान किंवा वजन तसेच राहिले.


🔺कोकणातील बहुतांशी खोत घराण्याची आडनावे ही सर किंवा प्रभू या उपसर्गाने सुरु होतात.


➡️ उदा. सरदेशपांडे, सरदेसाई, सरपोतदार, सरजोशी, प्रभुदेसाई इ.


हिंदुस्तानातील १८५७ चा उठाव


 🔺हिंदुस्तानच्या इतिहासात १८५७ च्या उठावाइतकी वादग्रस्त घटना दुसरी कोणती नसेल असे वाटते. १८५७ सालापासून काहीजणांनी याला शिपायाचे बंड असे म्हटले आहे.


📚१८५७ च्या उठावाची विविध कारणे


१. राजकीय,सामाजिक,धार्मिक कारणे , राजकीय कारणे 


* तैनाती फौजेची पद्धतीचे दुष्परिणाम - आपले साम्राज्य उभे करताना इंग्रजांनी फोडा व झोडा या तत्वाचा नेहमीच अवलंब केला. क्लाइव्ह, हेस्टिंग, अधिकारयाची नीती - अनीती याचा फारसा विधिनिषेध पाळला नाही. त्यातच इंग्रजांची भेदनिती, त्यांचा व्यापारी साम्राज्यवाद, त्यांची शस्त्रास्त्रे व संस्कृतीचे सामर्थ्य यांचे रहस्य अनेक हिंदी राजेराजवाड्यांना उमजूनच आले नाही.

* डलहौसीचे आक्रमक साम्राज्यवादी धोरण

सामाजिक कारणे 

* हिंदी लोकांना रानटी समजले जाई

* हिंदू संस्कृतीवर संकट आल्याची भावना

* हजारो सरंजामदार व सैनिक बेकार बनले.

धार्मिक कारणे 

* तिसरे संकट धर्मावर आले.

* समाजसुधारणावादी धोरणाची प्रतिक्रिया


२. आर्थिक, लष्करी कारणे 


आर्थिक कारणे


* हस्तव्यवसाय व कारागिरी बुडाली.

* इंग्रजी भांडवलाकडून होणारी पिळवणूक

* शेतकरी व जमीनदार यांचा असंतोष व बेकारी


लष्करी कारणे 


* हिंदी शिपायांना मिळणारी अन्यायी वागणूक - लष्करी मोहिमात इंग्रज अधिकारी प्रथम हिंदी शिपायांची फौज आघाडीवर धाडत. लढाई होऊन पहिल्या हल्ल्यात अनेक हिंदी शिपाई मारले गेले की, मग गोरी फौज पुढे सरकत असे त्यामुळे हिंदी शिपायांची जीवितहानी मोठी होई व शेवटी विजयश्रीची माळ गोऱ्यांच्या गळ्यात पडे. हा सर्वच प्रकार हिंदी शिपायांना संतापजनक वाटत होता.

* हिंदी शिपायाविरुध जाचक निर्बंध - १८०६ साली मद्रास आर्मीतील हिंदू शिपायावर गंध न लावण्याची व दाढी न राखण्याची सक्ती करण्यात आली. १८२४ साली बर्मी आर्मीतील हिंदू शिपायावर समुद्र पर्यटनाची सक्ती करण्यात आली. जातीत येण्यासाठी त्यांना अनेक धार्मिक विधी करावे लागले होते. अपुरा पगार, व भत्ता याबद्दल बंडाळ्या केल्या होत्या.


३. तात्कालिक कारण


हिंदी शिपायांना जी काडतुसे दिली जात त्यांना गाईची व डुकराची चरबी लावलेली असते. हि बातमी १८५७ च्या उठावास तात्कालिक कारण ठरली. काडतुसांच्या वापरासाठी ती प्रथम तोंडाने तोडावी लागत असे. साहजिकच त्यावरील चरबी शिपायांच्या तोंडात जात असे. व गाईला हिंदू पवित्र मानत असत. तर डुकराला मुसलमान अपवित्र मानतात. त्यामुळे हिंदू व मुसलमान शिपाई संतप्त झाले. अशाप्रकारे शिपायांचा त्यावर विश्वास बसला नव्हता. त्यांचा क्रोध वाढत गेला. या असंतोषाचा पहिला उद्रेक १० मे १८५७ रोजी मीरत येथील छावणीत झाला. शिपायांच्या बंडाची पहिली ठिणगी तेथे पडली.


राष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना


♦️बरिटिश अधिकाऱ्यांतही व्हाइसरॉय लॉर्ड डफरिन, ए. ओ. ह्यूमसारखे लोक यांनी भारतात सुराज्य निर्माण व्हावे, दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भडका उडू नये, त्यांच्या अभिव्यक्तीला एक सनदशीर साधन मिळावे, हिंदी लोकांना स्वायत्ततेचे हक्क प्राप्त व्हावेत असे वाटत होते.


♦️ सर्व देशाचे प्रतिनिधित्व करणारी एखादी अखिल भारतीय राजकीय संस्था निर्माण झालेली नव्हती. ती स्थापन करण्यात ए.ओ. हयूम या सेवा निवृत्त सनदी अधिकाऱ्याने सर विल्यम वेडरबर्न व सर हेन्री कॉटन या दोन सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्याचेही सहकार्य घेतले.


♦️राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन पुण्यास भरविण्याचे ठरले होते. पण पुण्यास फार मोठया प्रमाणावर प्लेगची साथ झाली. त्यामुळे ते २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईच्या गोवालिया टॅंकजवळील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये ते भरविण्यात आले. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे या पहिल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. सर्व भारतातून एकूण ७२ प्रतिनिधी राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनास हजर होते.


♦️तयामध्ये दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, न्या के. टी. तेलंग, दिनशा वाच्छा, वीर राघवाचार्य, पी. आनंद चार्लू, गंगाप्रसाद वर्मा, न्या. रानडे, बद्रुद्दीन तय्यबजी, रा. गो. भांडारकर, एस्. सुब्रमण्यम् अय्यर, दिवाणबहादूर रघुनाथराव, केशव पिल्ले, एन्. जी. चंदावरकर, गो. ग. आगरकर  इ. हिंदी नेत्याचा समावेश होता.


♦️कॉग्रेसचे पुढील अधिवेशन २८ डिसेंबर १८८६ राजी कलकत्ता येथे भरवण्यात यावेत असे ठरले. यानंतर ए.ओ. हयूम आणि राणी व्हिक्टोरिया यांना धन्यवाद देऊन सभा बरखास्त करण्यात आली. राष्ट्रसभेचे सुरुवातीचे स्वरुप कार्यपध्दती मवाळच होती.

सामान्य विज्ञान इयत्ता 10 वी :




1 Joule = 107 अर्ग

फटक्यामध्ये रासायनिक ऊर्जा साठविलेली असते.

ऊर्जा अक्षय्यतेचा नियम सांगतो की, ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा नष्ठही करता येत नाही. केवळ तिचे एका प्रकारातून दुसर्यार प्रकारात रूपांतर करता येते.

कार्य करण्याचा दर म्हणजे शक्ती होय. तसेच एकक कालात केलेले कार्य म्हणजे शक्ती होय.

SI प्रणालीत शक्तीचे एकक वॅट आहे.

१ वॅट = १ ज्युल/से = 1 N – m/s तसेच 1 HP = 746 वॅट

माध्यमातून प्रक्षोभाचा जो आकृतीबंध प्रवास घडतो त्या आकृतिबंधास ‘तरंग’ असे म्हणतात.

यांत्रिक तरंग दोन प्रकारचे असतात. १) अनुतरंग (longitudinal wave), २) अवतरंग (transverse wave)

ध्वनीचा कोरड्या हवेतील वेग 00से तापमानाला 332 मी/से. आहे.

ज्या ध्वनी तरंगाची वारंवारता २० Hz पेक्षा कमी किंवा २०,००० Hz पेक्षा जास्त असते असे ध्वनी माणसाला ऐकू येत नाहीत. त्याला अवश्राव्य ध्वनी म्हणतात.

प्रकाशाचा वेग 3 x 108 m/s आणि ध्वनीचा वेग ३४० m/s आहे.

ध्वनीलहरींचे परावर्तन होऊन 1/10 सेकंदानंतर त्या आपल्या कानावर पडल्यास मूळ आवाज पुन्हा ऐकू येतो. हाच प्रतिध्वनी होय.

प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी किमान १७ मी. अंतर असणे आवश्यक आहे.

वटवाघूळ उच्च वारंवारतेचा ध्वनी निर्माण करतात. या ध्वनीला श्रव्यातीत ध्वनी असे म्हणतात.

प्रतिध्वनीचे तत्व SONAR पद्धतीत वापरतात.

SONAR- Sound Navigation And Ranging System

पाण्यामध्ये ध्वनीचा वेग १४१० m/s आहे तर समुद्राच्या पाण्यात हाच वेग १५५० m/s आहे. लोखंडामध्ये ध्वनीचा वेग सुमारे ५१०० m/s आहे.

ध्वनीच्या तीव्रतेचे एकक डेसिबल (decibel) हे आहे. लघुरूपात डेसिबल हे dB असे लिहितात.

नकोसा वाटणारा ध्वनी म्हणजे कुरव होय.

पाण्याचे तापमान ४°से. पेक्षा कमी झाले असता पाणी वैशिष्टपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखविते.



सर्वसामान्य मानवी डोळा त्यावर ताण न देता वस्तु स्पष्ट पाहण्याचे किमान अंतर म्हणजे २५ सेंमी होय.

निकटदृष्टीता फक्त जवळच्या वस्तु स्पष्ट दिसतात. अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरुन या दृष्टीदोषाचे निराकरण करता येते.

दूरदृष्टीता – नेत्रगोल उभट होण्याने निर्माण होतो. लांबच्या वस्तु नीटपणे दिसू शकतात. बहिर्वक भिंगाचा चष्मा वापरुन हा दोष दूर करता येतो.

अबिंदुकता – एकाच प्रतलातील क्षितीज समांतर रेषा व क्षितीज लंब रेषा यांच्या प्रतिमा वेगवेगळ्या प्रतलात तयार होतात. या दोषाला अबिंदुकता असे म्हणतात. दंडगोल भिंगाचा चष्मा वापरुन दूर करतात.

वृद्ध दृष्टीता – निकट बिंदूचे डोळ्यापासूनचे अंतर वयाबरोबर वाढते. निकटबिंदूच्या डोळ्यापासून मागे सरण्याला वृद्धदृष्टीता असे म्हणतात.

बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरुन वृद्धदृष्टीता दूर करता येते.

जेव्हा अबिंदुकता आणि निकटदृष्टीता किंवा दूरदृष्टीता असे दोन दोष असतील तेव्हा त्यांना घालविण्यासाठी तीन अंक दिलेले असतात.

साध्या सूक्ष्मदर्शकाला विशालक असेही म्हणतात. रत्नाची पारख करण्यासाठी व त्यातील दोष शोधण्यासाठी जव्हेरी याचा उपयोग करतात.

संयुक्त सूक्ष्मदर्शक हा नेत्रिका व पदार्थभिंग अशा दोन बहिवक्र भिंगाचा बनलेला असतो.

अपवर्तन होताना पांढर्या  प्रकाशाचे त्याच्या घटक रंगात अपस्करण होऊन पांढर्या. वस्तूंच्या रंगीत प्रतिमा तयार होतात. त्याला वर्णीय विपयन असे म्हणतात.

वस्तु दूर केल्यानंतरही १/१६ सेकंदापर्यंत प्रतिमेची दृष्टीपटलावरील ठसा तसाच राहतो. दृष्टिपटलावरील संवेदना टिकणे या परिणामाला दृष्टीसातत्य असे म्हणतात.

दंडाकार पेशी प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात आणि मेंदुस प्रकाशाच्या तेजस्वितेची किंवा अंधुकतेची माहिती पुरवितात.


आजमितीस ११९ मूलद्रव्ये ज्ञात आहेत, त्यापैकी ९२ निसर्गात आढळतात.

१८६९ मध्ये दिमित्री इव्हानोविच मेंडेलिव्ह या रशियन रसायनशास्त्रज्ञाने आवर्त सारणी मांडली.

त्याच्या मतानुसार मूलद्रव्यांचे गुणधर्म तसेच त्यांच्या संयुगाची रेणुसूत्रे व गुणधर्म त्याचे अणु भाराचे आवर्तीफल असतात.

१९१३ मध्ये हेंरी मोस्ले याने असे शोधून काढले की मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म त्याचे अणुवस्तुमान हा नसून त्याचा अणु Z हा आहे.

आधुनिक आवर्तसारणीलाच आवर्तसारणीचे दीर्घरूप असे म्हणतात.

आधुनिक आवर्तसारणीमध्ये सात आडव्या ओळी आहेत त्यांना आवर्त म्हणतात. आठरा उभे स्तंभ आहेत त्यांना गण म्हणतात.

मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन संरूपणाआधारे आवर्तसारणीची विभागणी एस-खंड, पी-खंड, दी-खंड आणि एक-खंड अशा चार खंडामध्ये केली जाते.

इलेक्ट्रॉन संरूपणाच्या आधारे मूलद्रव्याचे प्रसामान्य, निष्क्रिय, संक्रमण आणि अंतस्थ संक्रमण मूलद्रव्ये असे चार प्रकार होतात.

पॅराफीनमेण हे विधूत दुर्वाहक आहे. विधुत वहनासाठी चांदी ही मेणापेक्षा १०२४ पटीने अधिक परिणामकारक आहे.

अणू व रेणू विधुतदृष्टया उदासिन असतात.

ज्या पदार्थाचे जलीय द्रावण विधुत प्रवाहाचे वहन करू शकते त्याला विधुत अपघटनी पदार्थ असे म्हणतात. जे द्रावण विधुत प्रवाहाचे वहन करू शकत नाही त्याला विधुत अनपघटनी पदार्थ असे म्हणतात.

ग्लुकोज, युरिया, साखर, अल्कोहोल हे अपघटनी आहेत.

धनाग्रीकरण (Anodizing) प्रक्रिया ही विधुत अपघटनाचे उपयोजन आहे. या प्रक्रियेचा उपयोग अॅल्युमिनिअमचा पृष्टभाग गंजरोधक आणि क्षरणरोधक करण्यासाठी होतो.

दोन किंवा अधिक पदार्थांच्या समांग मिश्रणाला द्रावण असे म्हणतात.

‘पार्याअमध्ये तांबे’ हे द्रवामध्ये स्थायू या प्रकारचे द्रावण आहे.

शुद्ध पाणी हे नैसर्गिक द्रावक आहे.

लिंबाचा रस चवीला आंबट असून त्याने तिला निळा लिटमस कागद तांबडा होतो.

सोडबायकार्बनचे द्रावण हाताला गुळगुळीत लागते. त्याने तांबडया रंगाचा लिटमस कागद निळा होतो कारण हे द्रावण अल्कधर्मी (Basic) आहे.

जो पदार्थ पाण्यात विरघळला असता H+ आयन देतो त्याला आम्ल म्हणतात.

जो पदार्थ पाण्यात विरघळला असता OH- आयन देतो त्याला आम्लारी म्हणतात.

रेणुवस्तुमान म्हणजे 12c हा संदर्भ अणू धरून व्यक्त केलेले सापेक्ष वस्तुमान होय.

पदार्थाचे वस्तुमान ग्रॉममध्ये व्यक्त केल्यास त्याची अंकीय किंमत पदार्थाच्या रेणूवस्तुमानएवढी असते. त्याला ग्रॅम मोल म्हणतात.

पदार्थाचे जे वजन हायड्रोजनच्या १.००८ वजनी, ऑक्सीजनच्या ८ भाग वजनी किंवा क्लोरीनच्या ३५.५ भाग वजनी या प्रमाणात संयोग पावते त्याळा पदार्थाचा सममूल्यभार म्हणतात.

HCL चा सममूल्यभार ३६.५u आहे.

आम्लारीचे जे वजन एक सममूल्यभार हायड्रोक्झिल गट विस्थापित करतो. त्या वजनास आम्लारीचा सममूल्यभार असे म्हणतात.

धातू संयुगाची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन धातूंची हायड्रोक्साइडस तयार होतात. प्रथम गटाच्या धातूच्या हायड्रोक्साइडच्या जलीय द्रावणाला अल्कली आणि इतर धातूच्या हायड्रोक्साइडला आम्लारी म्हणतात.

ज्या द्रवणाची संहती अचूक माहीत असते त्या द्रावणाला प्रमाणित द्रावण म्हणतात.

एक लीटर द्रावणामध्ये किती ग्रॅम सममूल्यभार द्राव्य विरघळले आहे हे दर्शविणारी संख्या म्हणजे त्या द्रावणाची प्रसामान्यता होय.

HCI च्या एक लीटर द्रावणात ३६.५ ग्रॅम HCI असल्यास त्या द्रावणाची प्रसामान्यता 1N असते. HCI च्या एक लीटर द्रावणात ३.६५ ग्रॅम HCI असल्यास त्या द्रावणाची प्रसामान्यता 0.1 N होईल.

प्रसामान्यता (N) = द्राव्याचे ग्रॅममधील वजन /ग्रॅम सममूल्य भार × लीटर मधील आकारमान

दोन किंवा अधिक पदार्थाच्या समांग मिश्रणाला द्रावण म्हणतात.


कुलोमचा नियम: होण प्रभारीत पदार्थांच्या दरम्यान निर्माण होणारे विधुतबल (F) हे त्या दोन प्रभारांच्या (Q1 Q2 ) गुणाकाराच्या सामानुपाती असून त्यांच्यातील अंतराच्या ® वर्गाशी व्यस्तानूपूर्ती असते.

स्थिर प्रभारामुळे घडणार्याच भौतिक परिणामाला स्थितीक विधुत असे म्हणतात, तर गतिमान प्रभारामुळे घडणार्याि भौतिक परिणामाला धारा विधुत असे म्हणतात.

धातूंमध्ये मुक्त इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असल्याने ते सुवाहक आहेत.

काही पदार्थाच्या बाबतीत मूळ केंद्रकाशी इलेक्ट्रॉन भक्कम बलाने बद्ध असल्याने त्यांच्यात मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. त्यांना विसंवाहक म्हणतात.

काही पदार्थ सर्वसाधारण परिस्थितीत विसंवाहक असतात. परंतु विशिष्ठ परिस्थितीत ते सुवाहक बनतात. अशा पदार्थांना आर्धवाहक म्हणतात. जर्मेंनिअम, गॅलीअम, इ.

इलेक्ट्रॉनची धातुमधील गती एखाधा रेणुच्या गतीप्रमाणे यादृच्छिक असते.

जेव्हा प्रभार कमी विभवावरून त्यापेक्षा जास्त विभवावर स्थानांतरीत होतो तेव्हा विधुत क्षेत्राच्या विरुद्ध कार्य करावे लागते. या दोन्ही पातळीवरील विभवातील फरकास विभवांतर असे म्हणतात.

कूलोम हे विधूतप्रभाराचे SI एकक आहे. हे ‘C’ या चिन्हाने दर्शवितात.

व्होल्ट हे विभवांतराचे SI एकक आहे. V ने दर्शवितात.

‘अॅम्पियर’ हे विधुतधारा मोजण्याचे SI एकक आहे. ‘A’ ने दर्शवितात.

वाहकाची लांबी जितकी जास्त तितका त्याचा रोध जास्त असतो.

तांबे हा धातू सुवाहक असतो तसेच नायक्रोम व कान्स्टन्टन धातूच्या संमिश्रांचा रोध जास्त असल्याने विधुत इस्त्रीमध्ये तांब्याऐवजी नायक्रोमचे कुंडल वापरतात.

डायोड व थर्मिस्टर ओहोमच्या नियमाचे पालन करीत आहे.

पारा या धातूचा रोध 4.2k तापमानास शुन्यापर्यंत कमी होतो.

अशा पदार्थांना अतिवाहक असे म्हणतात. अतिवाहकाच्या बाबतीत जसजसे तापमान कमी कमी होत जाते तस तसा रोधही कमी होत जातो. एका विशिष्ट तापमानास हा रोध शून्य होतो. या तापमानास क्रांतिक तापमान असे म्हणतात. (TC)

परिपथामधील रोध जर एकसर पद्धतीने जोडले असतील तर परिपथातील प्रत्येक भागातून सारखी विधूतधारा जाईल.

तारेमधून निर्माण होणारी उष्णता – 1) तारेमधुन वाहणारी विधूतधारा, 2) तारेचा रोध. 3) तारेतून विधुतधारा वाहाण्याचा कालावधी या बाबींवर अवलंबून असते.

४.१८ ज्युल = १ कॅलरी.

विधूत ऊर्जा निर्मितीच्या दारांस विधुत शक्ति असे म्हणतात.

शक्ति हे ज्युल/सेकंद या एककात मोजतात यालाच वॅट (w) म्हणतात.   

विधूतधारेच्या औष्मिक परिणामाचे अनेक व्यावहारिक प्रयोग आहेत. उदा. विधुत दिवा, विजेची शेगडी, इस्त्री, गिझर, इ.

वितळतार ही शिशासारख्या कमी द्रवनांक असलेल्या संमिश्राची बनविलेली असते.

‘लोडस्टोन’ नैसर्गिक चुंबक या नावाने ओळखले जाते.

जी विधुतधारा आपले परिमाण व दिश ठराविक समान कालावधीनंतर बदलते. त्यास प्रत्यापूर्वी धारा (AC) असे म्हणतात. ती दोलयमान (oscillating) आहे.

विधुत घटापासून तयार होणार्या  अदोलयमान धारेस दिष्ट धारा किंवा D.C. म्हणतात.

दिष्ट धारा एकाच दिशेने वाहते तर प्रत्यावर्ती धारा आवर्ती पद्धतीने एकाच चक्रात उलट दिशेने वाहते.

भारतात AC ची प्रत्येक 1/100 सेकंदामद्धे दिशा बदलते. म्हणजेच त्यांची वारंवारिता ५० चक्रे प्रति सेकंद असते.

प्रत्यावर्ती धारेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे विधुत शक्तीचे लांब अंतरापर्यंत फार घट न होता पारेषण करता येते.

भारतामध्ये धनाग्र तार व ऋणग्र तार यामधील विधुत विभवांवर २२० व्होल्ट असते.

विधुत ऊर्जा व चुंबकत्व यांमधील परस्पर संबंध एच.सी. ओरस्टेड या शास्त्रज्ञाने प्रथम दर्शविला.

अनेक गोलाकार वेढयांचे कुंडल गुंडाळून तयार होणार्याव चितीस नालकुंतल असे म्हणतात.

जे उर्जास्त्रोत एकदा वापर केल्यानंतर नष्ट होतात व पुनर्वापारसाठी उपलब्ध होऊ शकत नाहीत त्यांना ‘नवीकरण अयोग्य’ उर्जा स्त्रोत म्हणतात. उदा. लाकूड, गोवर्याअ, लकडी कोळसा, दगडी कोळसा, केरोसीन, गॅस, डिझेल, पेट्रोल, नैसर्गिक वायु इंधने या प्रकारात मोडतात.

ज्या ऊर्जास्त्रोताचे त्यांच्या अंगभूत क्षमतेने नवीकरण होते आणि चक्रीय क्रमाने थोडया कलावधीत ज्यांचे पुनरुत्पादन होऊ शकते अशा ऊर्जा स्त्रोतांना नवीकरण योग्य ऊर्जा स्त्रोत असे म्हणतात. उदा. पवन ऊर्जा, लाटांपासून मिळणारी ऊर्जा, भूगर्भ औष्मिक ऊर्जा, वाहत्या पाण्यापासून मिळणारी ऊर्जा, सौर ऊर्जा, जैविक वस्तूसंचय ऊर्जा हे नवीकरणक्षम ऊर्जा स्त्रोत आहे.

पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील गुरुत्वाकर्षनामुळे लाटांची निर्मिती होते.

काही विशिष्ट परिस्थितीत भूगर्भाच्या अंतर्गत भागातील उष्णता ऊर्जेचा स्त्रोत होऊ शकते या उर्जेस भूगर्भ-औष्मिक उर्जा असे म्हणतात. 

वितळणार्या् खडकांना मॅग्मा असे म्हणतात.

दार्जिलिंग मध्ये १८९७ साली उभारलेले व १३० केव्ही वीज देणारे विधुत संयंत्र हे भारतातील पहिले जलविधुत केंद्र आहे.


सूर्याचा अंतर्भागातील अनिशय तप्त असून तेथील तापमान सुमारे २×१०७ ०C इतके असते. अंतर्भागातील तापमानामुळे हायड्रोजन केंद्राकचे तेहे सतत हेलियम केंद्रात एकत्रीकरण होत असते. या प्रक्रियेला केन्द्रकिय सम्मीलन प्रक्रिया असे म्हणतात.

सूर्यापासून पृथ्वीला 1.8 × 1011 mw इतकी उर्जा मिळते

सौर कुकर सौर बंब, सौर शुष्कक, सौरपंप आणि सौर घट  यांना और उर्जा उपकरणे असे म्हणतात.

भांडयाचा बाहयपृष्ठभाग काळ्या रंगाने रंगविला जातो. सौर कुकरच्या अंतर्भागात 1000 से. ते 1400 से इकडे तापमान वाढू शकते.

आधुनिक सौर घट सिलिकॉनपासून बनविलेले असतात.

नैसर्गिकरित्या आढळानार्यान युरेनियमची तीन समस्थनिके आहेत. 234U,235U, 238U यापैकी युरेनियम -238 हे ९९% पेक्षा जास्त प्रमाणात आढळते.

भारतामध्ये जलद प्रजनक क्रियाधानी (fast breeder reactor) कल्पक्कम येथे उभारली आहे.


केंद्रकीय एकत्रीकरण (Nuclear fusion) प्रक्रियेत दोन लहान केंद्रकाच्या एकत्रीकरणामुळे ऊर्जा निर्माण होते.

निसर्गात: समुद्राच्या पाण्यात ड्युटेरॉन सापडते. समुद्राच्या एक घनमीटर पाण्यातील सर्व ड्युटेरॉन एकत्र झाले तर 12 x 109 k. Joule एवढी ऊर्जा  तयार होते.

जैविक रूपांतर प्रक्रियेत आंबवणे या प्रक्रियेचा समावेश होतो. याला किन्वन असेही म्हणतात.

प्रणीजन्य व वनस्पतीजन्य पदार्थाचे विनोक्सिश्वसन करणारे सूक्ष्मजीव पाण्याच्या सानिध्यात सहज विघटन घडवून आणतात व वायूंचे मिश्रण तयार  होते. त्या वायूस जैवायू असे म्हणतात.

जैववायुमध्ये मिथेन, कार्बनडायॉक्साईड, हायड्रोजन, हायड्रोजन सल्फाईड यांचे मिश्रण असते.

जैववायुमध्ये मिथेनचे प्रमाण 80% असल्याने ते एक उत्तम इंधन असून धूर न करता जळते.

इथेनॉल, जैवडिझेल, जैवायू यांचा जैव इंधनामध्ये समावेश होतो.

बायोडिझेल सोयाबीन व मका यांच्या बियांपासून बनविले जाते. भारतामध्ये जाथ्रोफा (वन एरंड). करंजा व नागचंपा या वनस्पतींच्या बियांपासून मिळविलेल्या तेलाचा बायोडिझेल निर्मितीसाठी उपयोग होतो.

कोळसा, पेट्रोलियम नैसर्गिक वायू हि जीवाश्म इंधनाची उदाहरणे आहेत.

नैसर्गिक वायूंमध्ये मुख्यत: मिथेन वायू आढळतो.

लाकडामध्ये सेल्युलोज (C6H10O5)n हा मुख्य घटक आहे.

कार्बन उपलब्धतेच्या चढत्या श्रेणीनुसार पीट, लीग्राईट, बीट्यूमिनस, अॅन्थ्रेसाईट हे कोळशाचे चार मुख्य प्रकार आहेत.

गॅसोलीन, केरोसीन, डिझेल, फ्यूएल ऑइल इ. द्रव इंधनाचे प्रमुख प्रकार आहेत.

कृत्रिम वायु इंधनामध्ये कोल गॅस, ऑइल गॅस, पेट्रोल गॅस, वॉटर गॅस आणि प्रोड्यूसर गॅस यांचा समावेश होतो.

प्रोड्यूसर गॅस कार्बनमोनक्साईड (३०%) नायट्रोजन (६०%) व अन्य वायू (१०%) यांचे मिश्रण असते.

इंधनाचे कॅलरीमूल्य व प्रज्वलनांक हे दोन वैशिष्टपूर्ण गुणधर्म आहेत.

हायड्रोजनचे कॅलरीमूल्य सर्वात जास्त आहे. हायड्रोकार्बनपैकी मिथेनचे कॅलरीमूल्य सर्वात जास्त आहे.

लाकूड हे कार्बोहायड्रेटचे जटिल संयुग आहे.

एल.पी.जी. मध्ये ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे दोन्ही द्रवरूप स्वरुपात असतात.

कार्य करण्यासाठी साठविलेली क्षमता म्हणजे ऊर्जा होय.

एखादी वस्तु तिच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा संरूपणामुळे कार्य करू शकते, तेव्हा तिच्यामध्ये स्थितीज ऊर्जा आहे असे म्हंटले जाते.

गुरुत्व स्थितीज ऊर्जा आणि प्रत्यास्थी स्थितीज ऊर्जा ही यांत्रिक ऊर्जेची दोन  रुपे आहत.

एखाधा चल वस्तूला तिच्या गतीमुळे प्राप्त होणारी ऊर्जा म्हणजेच गतीज ऊर्जा होय.

ही गतीज ऊर्जा KE = ½ mv2 या सूत्राणे दर्शवितात.

SI पद्धतीत ऊर्जेचे एकक न्यूटन मिटर आहे. याला ज्युल असे म्हटले जाते.

CGS पद्धतीत डाईन सेमी म्हणजेच अर्ग हे एकक वापरतात.

Latest post

चालू घडामोडी :- 17 मार्च 2024

◆ काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे. ◆ 2025 मध्ये चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान ...