Monday, 12 December 2022

MPSC मुख्य परीक्षा पास झालं नाही तरी नोकरी! राज्य सरकार मोठा निर्णय घ्यायच्या तयारीत

पुणे, 11 डिसेंबर : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जे विद्यार्थी एमपीएससीची पूर्व परीक्षा पास होतील, मात्र मुख्य परीक्षा पास होऊ शकणार नाहीत, आता अशा विद्यार्थ्यांनाही नोकरीत प्राधान्य देण्याचा सरकारचा विचार सुरू आहे. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील? 

' जे विद्यार्थी  एमपीएससी परीक्षेची तयारी करून पुर्व परीक्षा पास होतात पण मुख्य परिक्षा पास होऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून जी हजारो पदे कंत्राटी पद्धतीवर भरली जातात त्यामधे प्राधान्य देण्याचा विचार आहे.  यामुळे सरकारचाही पैसाही वाचेल आणि तरुणांना योग्य मोबदला देखील मिळेल. ज्यांनी अशापद्धतीचे नोकर भरती कंत्राट घेतलेले असते तो कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही. त्यांना व्यवस्थित पगार देखील मिळत नाही. जर अशा पद्धतीने भरती झाल्यास अनेक प्रश्न सुटतील. मात्र हा फक्त केवळ एक विचार आहे. याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून घेतला जाईल' असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Basic Concepts of Economics :

🔶व्यापारतोल (Balance of Trade) :-

व्यापारतोल (BOT) म्हणजे एका वर्षातील देशाच्या आयात वस्तूंची एकूण किंमत आणि देशाच्या निर्यात वस्तूंची एकूण किंमत यांमधील फरक होय.व्यापारतोलात फक्त वस्तूूच्या आयात-निर्यातीतून निर्माण होणा-या येणी व  देणीचा समावेश असतो.


🔶व्यवहार तोल  (Balance of Payment) :-

व्यवहारतोल (BOP) म्हणजे एका देशाने इतर सर्व देशांशी केलेल्या सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थित मांडलेले रेकॉर्ड असते.

व्यवहारतोलात वस्तूंशिवाय सेवांच्या देवाण-घेवाणीतून तसेत कर्जे व गुंतवणुकीच्या व्यवहारांतून निर्माण होणा-या येणी आणि देणी यांचाही समावेश असतो.


🔶रुपयाची परिवर्तनियता :-

जगातील चलनेमध्ये परस्परांमध्ये विनिमयक्षम असतात. म्हणजे एका चलनाची अदलाबदल इतर चलनामध्ये करता येते.   मात्र विविध सरकारे चलनाच्या विनिमयावर विविध बंधने/नियंत्रणे/मर्यादा टाकत असतात.


🔶 व्यवहारतोलाच्या चालू व भांडवली खात्यांवरील शेष/तुटीची तुलना 

 

चालू खात्यावरील शेष हा भांडवली खात्यावरील तुटी एवढा असावा किंवा चालू खात्यावरील तूट ही भांडवली खात्यावरील शेष एवढी असावी.




🔶अंदाजपत्रक :- 

" पुढील आर्थिक वर्षाच्या शासकीय जमा-खर्चाच्या कायदेमंडळापुढे विचारार्थ ठेवावयाच्या प्राथमिक स्वरुपातील योजनांचा व शिफारसींचा समावेश ज्या कागदपत्रांत केला असतो त्यास बजेट किंवा अंदाजपत्रक म्हणतात."१९२१ च्या अॅकवर्थ समितीच्या शिफारसीनुसार १९२४ पासून रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळा मांडला जातो.


पोस्टमन, MTS, मेलगार्ड व पोलीस भरतीला नेहमी प्रश्न येणारे..


● महाराष्ट्राविषयी माहिती ●


▪️  महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.


▪️महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.


▪️महाराष्ट्राची राजधानी - मुंबई उपराजधानी  - नागपूर.


▪️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६.


▪️ महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.


▪️ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.


▪️  महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.


▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे. विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.


▪️ विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.


▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.


▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.


▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.


▪️  महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.


▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे


▪️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.


▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.


▪️महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.


▪️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.


▪️  महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.


▪️  भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.


▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.


▪️  महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.


▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.


▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.


▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.


▪️पढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.


▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.


▪️  परवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.


▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.


▪️ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.


▪️  औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.


▪️पणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.


▪️  महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.


▪️ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.


▪️ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.


▪️विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.


▪️  विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.


▪️ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.


▪️ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.


▪️सत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.


▪️ सत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.


▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.


▪️ सत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.


▪️बरह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.


▪️  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.


▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.


▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.


▪️पणे ही पेशव्यांची राजधानी आहे.


▪️ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.


▪️  आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.


▪️ मबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात


▪️यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.


▪️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.


▪️नशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.


▪️महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.


▪️शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.


▪️ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.


▪️शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.


▪️ जञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.


▪️तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.


▪️भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.


▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.

▪️रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

पोलीस भरती प्रश्नसंच

 १) महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा म्हणून ओळख असलेला जिल्हा कोणता ? 

👉🏿उत्तर ----------- - कोल्हापूर


२) महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेला जिल्हा कोणता ?

👉🏿 उत्तर ------------- औरंगाबाद


३) विदर्भातील ............. जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.?

👉🏿 उत्तर ------------- गोंदिया


४) महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी ............. या जिल्ह्यात चालते. 

👉🏿उत्तर ------------- रत्नागिरी


५) महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ? 

👉🏿उत्तर ------------- गोंदिया


६) महाराष्ट्राचे पठार ............. या खडकाने बनलेले आहे.

👉🏿 उत्तर ------------- बेसॉल्ट

▶️


७) महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला .....................म्हणून ओळखतात.

👉🏿 उत्तर ------------- सह्याद्री


८) महाराष्ट्रातील ............... जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे. 

👉🏿 उत्तर ------------- मुंबई


९) महाराष्ट्रातील ............... या जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

👉🏿 उत्तर ------------- रत्नागिरी


१०) महाराष्ट्रात ................... या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. 

👉🏿 उत्तर ------------- गडचिरोली


११) महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा कोणता ?

👉🏿 उत्तर ----------- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.


१२) महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा कोणता ? 

👉🏿 उत्तर ----------- वर्धा.


१३) महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता आणि कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाला ?

👉🏿 उत्तर ---------- प्रवरानगर, जिल्हा अहमदनगर.


१४) भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या कोणत्या राज्यात आहेत ? 

👉🏿 उत्तर ------------- महाराष्ट्रात


 १५) महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना कोणत्या जिल्यात आहे ?

👉🏿 उत्तर ------------ नाशिक


१६) महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता ? 

👉🏿 उत्तर ----------- अहमदनगर.


१७) भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?

👉🏿 उत्तर ------------- रायगड


१८) महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस ................ येथे पडतो.

 👉🏿 उत्तर ----------- आंबोली (सिंधुदुर्ग)


१९) पंढरपूर हे शहर .............. या नदीकाठी आहे. आणि त्या नदीलाच महाराष्ट्राची काशी म्हणतात.

👉🏿 उत्तर -------------- भीमा


२०) कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात ?

👉🏿 उत्तर ------------- गोदावरी


२१) कोणत्या नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते ?

👉🏿 उत्तर ----------- प्रवरा


२२) गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात ................येथे आहेत ? 

👉🏿 उत्तर ----------- वज्रेश्वरी


२३) जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यात आहे ? 

👉🏿 उत्तर - बुलढाणा


२४) बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते ? 

👉🏿 औरंगाबाद


प्रश्न मंजुषा



१.  भारतात १९७४ मध्ये सर्वप्रथम दगडी कोळशाचे उत्पादन कोठे घेण्यात आले ?


१. राणीगंज व विरभूम✅

२. झरिया व खेत्री

३. ब्राम्हणी व देवगढ 

४. बोकारो व राजमहाल


२. स्वयंपाकाच्या गँसचे (एल.पी.जी) प्रमुख घटक कोणते ?


१. मिथेन व आयसो मिथेन

२. ईथेन व आयसो ईथेन 

३. ब्युटेन व आयसो ब्युटेन ✅

४. प्रोपेन व आयसो प्रोपेन



३.  अमेरिकेच्या जपानवरील दुस-या बाँम्बहल्याबाबत शहर,  बाँम्ब, विमान व त्याच्या पायलटचे नाव अनुक्रमे काय होते ?


१. हिरोशिमा, लिटिल बाँय, बाँकस्कार, चार्लस स्विनी

२. नागासाकी, फँट मँन, इनोला गे, पाँल तिब्बेट्स

३. हिरोशिमा, लिटिल बाँय, इनोला गे, पाँल तिब्बेट्स

४. नागासाकी, फँट मँन, बाँकस्कार, चार्लस स्विनी ✅



५.  जोड्या लावा :

अ. हेन्री बेक्केरेल।     १. पहिल्या अणु चाचणीचा जनक


ब. आँटो हाँन।         २. पहिल्या अणुभट्टीची बांधणी


क. एन्रिको फर्मी।     ३. किरणोत्सारितेचा शोध


ड. ओपेनहायमर।     ४. केंद्रकीय विखंडनाचा शोध


१. अ-३, ब-४, क-२, ड-१ ✅

२. अ-३, ब-२, क-४, ड-१

३. अ-१, ब-४, क-२, ड-३

४. अ-१, ब-२, क-४, ड-३



६.  भारतात विकसित झालेले 'तेजस' हे काय आहे ?


१. पायदळ लढाऊ विमान 

२. हलके लढाऊ विमान ✅

३. वैमानिकरहित लक्ष्य विमान 

४. जेट ट्रेनर




७.  राष्ट्रीय सुरक्षा व रणनितीबद्दल प्रशिक्षण देणारी देशातील एकमेव संस्था कोणती ?


१. नँशनल डिफेन्स काँलेज, न्यू दिल्ली✅ 

२. नँशनल डिफेन्स अँकँडमी, खडकवासला पुणे

३. राष्ट्रीय इंडियन मिलिटरी काँलेज, डेहराडून

४. इंडियन मिलिटरी अँकँडेमी, डेहराडून




८.  जगातील पहिला इलेक्ट्रानिक संगणक कोणी तयार केला ?


१. हरमन होलोरिथ

२. हाँवर्ड एकेन✅

३. थिओडोर मँमन

४. के.आर. पोर्टर



९.  भारतात इंटरनेट सेवा खाजगी व्यक्तींना उपलब्ध करून देण्यास सुरूवात केव्हा पासून झाली ?


१. १५ आँगस्ट १९९३

२. १५ आँगस्ट १९९५✅

३. १५ आँगस्ट १९९७

४. १५ आँगस्ट १९९९



१०.  योग्य विधान निवडा :


१. इंटरनेट हे जगातील संगणकाच्या जाळ्यांचे जाळे आहे.

२. इंटरनेटचे कोठेही मुख्यालय नाही.

३. इंटरनेटचे मध्यवर्ती व्यवस्थापन संयुक्त राष्ट्रसंघामार्फत चालविले जाते.✅

४. इंटरनेटचे भविष्यकालिन कोणतेही धोरण नाही.




११.  जोड्या लावा :


अ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर।           १. बँगलोर


ब. इस्रो सँटलाईट सेंटर।         २. अहमदाबाद


क. सतिष धवन स्पेस सेंटर।               ३. थुंबा 


ड. स्पेस अँप्लिकेशन सेंटर।             ४. श्रीहरीकोटा


१. अ-३, ब-२, क-३, ड-१

२. अ-२, ब-१, क-३, ड-४

३. अ-३, ब-१, क-४, ड-२✅

४. अ-२, ब-३, क-४, ड-१



१२.  पुणे येथील सी-डँक या संस्थेने सुपर काँम्प्युटरचा शिक्षण, संशोधन, व्यापार, इ.क्षेत्रात वापर जनसुलभ व्हावा यासाठी निर्माण केलेल्या  भारताच्या पहिल्या कमी किमतीच्या सुपर काँम्प्युटरचे नाव काय आहे ?


१. परम आनंद

२. परम अनंत✅

३. परम सुलभ 

४. परम तेज



१३.  १९३३ मध्ये स्थापन झालेल्या इंडियन नँशनल एअरवेज ने भारतात सर्वप्रथम हवाई सेवा कोणत्या दोन शहरांदरम्यान सुरू केली ?


१. कलकत्ता - हावडा

२. मुंबई - दिल्ली

३. कराची - लाहोर✅

४. मुंबई - ठाणे


१४.  पुणे येथील 'आयुका' या संस्थेमध्ये कोणत्या विषयांवरील संशोधन केले जाते ?

अ. अँस्ट्राँनाँमी।       ब. अँस्ट्राँलाँजी।          क. अँस्ट्रोफिजिक्स


१. अ आणि ब

२. ब आणि क

३. अ आणि क✅

४. अ, ब, आणि क



१५.  'मिसाईल वुमेन' (missile women) म्हणून कोणास ओळखले जाते ?


 उत्तर : श्रीमती टेसी थाँमस यांना missile woman तसेच 'अग्निपूत्री' म्हणून ओळखले जाते. 

त्या अग्नि-४ या क्षेपणास्त्राच्या प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होत्या. त्याची पहिली चाचणी १५ नोव्हेंबर २०११ रोजी ओडिशा किना-याजवळील व्हिलर बेटावरून घेण्यात आली.

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️


1) इंग्रज शासन काळात कोणते क्षेत्र अफीम उत्पादनसाठी प्रसिद्ध होते? 


A. उत्तरप्रदेश

B. महाराष्ट्र

C. केरल

D. बिहार ✅


◾️सरुवातीस पुर्तगाली चीन बरोबर व्यापार करत नंतर ब्रिटिश करत


* औषधशास्त्रात अफूचा वापर जास्त होत


2) 18व्या शतकात बंगालमधे वस्त्र उद्योगाचे पतन होण्याचे काय कारण होते? 


A. ब्रिटन द्वारा वस्त्र उद्योगावर बंदी मुळे

B. स्थानिक जनते द्वारा कंपनीच्या विरोधामुळे

C. ब्रिटन ला निर्यात केलेल्या मालाला असलेल्या जास्त करामुळे ✅

D. यापैकी काही नाही



 3) नीळ शेतकरयाच्या दुर्दशेवर लिहलेल्या' नील दर्पण' या नाटकरुपी पुस्तकाचे लेखक कोण होते? 


A. लाला लाजपत राय

B. राजा राममोहन राय

C. रवींद्रनाथ टैगोर

D. दीनबंधु मित्र ✅


◾️परथम नाटक 'नीलदर्पण' (ढाका, 1860)


* तपस्विनी 1863

* सधवार एकादशी - 1866

* लीलावती - 1867

* जमाई बारिक- 1872

* कमलकामिनी'-1873



 4) इंग्रजानी प्रथम कॉफ़ीच्या बागा कुठे लावल्या? 


A. वायनाड ✅

B. कुर्ग 

C. नीलगिरि 

D. चिकमंगलूर 


◾️अरेबियन देशातून बाबा बूदान यांनी कॉफीचे काही बी कमरेला बांधून चोरून आणले व म्हैसूर (केरळ) प्रांतात शेती केली


 5) भारतामधे इंग्रजाच्या काळात प्रथम जनगणना कोणाच्या कार्यकाळात झाली? 


A. लॉर्ड डलहौजी

B. लॉर्ड मिंटो

C. लॉर्ड कर्जन

D. लॉर्ड मेयो ✅



◾️कार्यकाल 1869 ते 1872

जनगणना सुरु 1872

 


1) क्षयरोगावर उपचारांसाठी ‘प्रेटोमनाईड’ हे औषध कोणत्या कंपनीने तयार केले?

उत्तर : मायलान


2) एशियामनी कडून दिला जाणारा ‘2019 सालाची एकूणच उत्कृष्ट कंपनी’ हा सन्मान कोणत्या कंपनीला मिळाला?

उत्तर : TCS


3) "गर्ल, वुमन, अदर" या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत?

उत्तर : बर्नार्डिन इव्हारिस्टो


4) जागतिक अन्न दिन कधी साजरा केला जातो?

उत्तर : 6 ऑक्टोबर


5) ‘इंडिया मोबाइल कॉंग्रेस-2019’ ही सभा कुठे आयोजित करण्यात आली?

उत्तर : नवी दिल्ली


6) 2019 या वर्षीचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार कोणी जिंकला?

उत्तर : अभिजीत बॅनर्जी


7) जागतिक विद्यार्थी दिन कधी साजरा केला जातो?

उत्तर : 15 ऑक्टोबर


8) 2019 सालाचा बुकर पुरस्कार कोणी जिंकला?

उत्तर : मार्गारेट अ‍ॅटवुड आणि बर्नार्डिन इव्हारिस्टो


9) ‘लोटस-HR’ हे कशाशी संबंधित आहे?

उत्तर : जलशुद्धीकरण


10) ‘बियॉन्ड 2020: ए व्हिजन फॉर टुमारोज इंडिया’ पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

उत्तर : डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम


प्रश्न :-१- हिवाळी(शीतकालीन) आॕलिम्पिक स्पर्धांची सुरवात कोणत्या वर्षापासून  झाली ?


१) १८९६

२) १९४८

३) १९२८

४) १९२४✅

〰️〰️〰️〰️📕🔹📕〰️〰️〰️〰️

प्रश्न :-२- आॕलिम्पिक म्युजियम कोठे आहे ?


 १) चीन

२) स्वित्झर्लंड✅

३) रशिया

४) यूरोप

〰️〰️〰️〰️📕🔹📕〰️〰️〰️〰️

प्रश्न :-३- 'बनाना किक'हा शब्द कोणत्या खेळा संबंधित आहे ?


 १) टेबल टेनिस

२) व्हाॕकी

३) फुटबाॕल✅

४) कबड्डी

〰️〰️〰️〰️📕🔹📕〰️〰️〰️〰️

प्रश्न :-४- 'ग्राउंड स्ट्रोक' हा शब्द कोणत्या खेळा संबंधित आहे ?


१) टेबल टेनिस✅

२) व्हाॕकी

३) डाॕज बाॕल

४) बेसबाॕल

〰️〰️〰️〰️📕🔹📕〰️〰️〰️〰️

प्रश्न :-५- 'अमेरिका कप'हा  कोणत्या खेळा संबंधितआहे ?


१) टेबल टेनिस

२) व्हाॕली बाॕल

३) बास्केट बाॕल✅

४) बेसबाॕल

〰️〰️〰️〰️📕🔹📕〰️〰️〰️〰️

प्रश्न :-६- 'चायना कप' हा  कोणत्या खेळा संबंधितआहे ?


१) जिम्नास्टिक✅

२) पोलो

३) गोल्फ

४) शतरंज

〰️〰️〰️〰️📕🔹📕〰️〰️〰️〰️

प्रश्न :-७- गोळा फेक मैदानामध्ये फेक प्रदेशाचा वर्तुळातील कोण किती अंश असतो ?


१) ३५.६५°

२) ४०°

३) ३४.९२°✅

४) ४५°

〰️〰️〰️〰️📕🔹📕〰️〰️〰️〰️

प्रश्न :-८- सवाई मानसिंह स्टेडियम कोठे आहे ?


१) जयपूर✅

२) कोलकत्ता

३) मुंबई

४) विशाखापट्टन

〰️〰️〰️〰️📕🔹📕〰️〰️〰️〰️

प्रश्न :-९- अष्टांग योग चे प्रथम अंग कोणते आहे ?


१) आसन

२) प्राणायाम

३) नियम

४) यम✅

〰️〰️〰️〰️📕🔹📕〰️〰️〰️〰️

प्रश्न :-१०- 'अंजली भागवत'ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?


 १) टेनिस

२) जिम्नास्टिक

३) रायफल शुटिंग✅

४) अॕथेलॕटिक्स

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव घटना


🖌गांधीजींनी भारतातील पहिला सविनय कायदेभंगाचा प्रयोग कोठे केला?

- चंपारण्य 


🖌गांधीजींनी भारतातील पहिले उपोषण कोठे केले?

- अहमदाबाद गिरणी लढा 


🖌गांधीजींनी भारतातील पहिला असहकाराचा प्रयोग कोठे केला?

- खेडा सत्याग्रह


🖌गांधीजींनी आपल्या कोणत्या पहिल्या जनव्यापक चळवळीत पहिल्यांदाच सत्याग्रह या तत्वाचा वापर केला?

- असहकार चळवळ


🖌गांधीजींनी अन्यायाचा विरुद्ध त्यांचा जीवनातील पहिला सत्याग्रह हा कोठे केला?

- 1906 रोजी नाताळ येथे


🖌गांधीजींनी सर्वप्रथम राष्टध्वजाबाबत त्यांची कल्पना ही कोणत्या पेपरमध्ये लेख लिहुन मांडली?

- यंग इंडिया 


🖌गांधीजींनी भारतात सत्याग्रह आश्रम हा कोठे स्थापन केला?

- साबरमती


🖌गांधीजी राष्ट्रीय कांग्रेस चे अध्यक्ष असलेले प्रथम व एकमेव अधिवेशन कोणते?

- 1924 चे बेळगाव अधिवेशन


🖌गांधीजींनी स्त्रियांना सर्वप्रथम संपुर्ण भारतीय स्वातंत्र्य संग्रामात कोणत्या चळवळीने आणले?

- सविनय कायदेभंग चळवळ


🖌गांधीजींचे भारतातील पहिले चरित्र हे कोणी लिहिले?

- अवंतिकाबाई

इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचे


 


◾️राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे :-◾️


▶️ 1885 – मुंबई – ओमेशचंद्र बॅनर्जी – राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन


▶️ 1886 – कलकत्ता – दादाभाई नौरोजी


▶️ 1887 – मद्रास – बद्रुद्दीन तय्यबजी – पहिले मुस्लिम अध्यक्ष


▶️ 1888 – अलाहाबाद – सर जॉर्ज युल – पहिले स्काटिश अध्यक्ष


▶️ 1889 – मुंबई – सर विल्यम वेडरबर्ग – पहिले इंग्रज अध्यक्ष


▶️ 1896 – कलकत्ता – रहेमतुल्ला सयानी – या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायले गेले.


▶️ 1905 – बनारस – गोपाल कृष्ण गोखले – हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले.


▶️ 1906 – कलकत्ता – दादाभाई नौरोजी – या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला.


▶️ 1907 – सूरत – राशबिहारी बोस – राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली.


▶️ 1915 – मुंबई – लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा – या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला.


▶️ 1916 – लखनौ – अंबिकाचरण मुजूमदार – या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला.


▶️ 1917 – कलकत्ता – डॉ. अॅनी बेझंट – राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला.


▶️ 1920 – कलकत्ता(विशेष) – लाला लजपत रॉय – या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला.


▶️ 1920 – नागपूर – सी. राघवाचारी – या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.


▶️ 1924 – बेळगांव – महात्मा गांधी – महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले.


▶️-1925 – कानपूर – सरोजिनी नायडू – राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा.


▶️ 1927 – मद्रास – एम.ए. अंसारी – सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला.


▶️ 1928 – कलकत्ता – मोतीलाल नेहरू – नेहरू रिपोर्टला मान्यता देण्यात आली.


▶️ 1929 – लाहोर– पं. जवाहरलाल नेहरू – संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव व महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.


▶️ 1931 – कराची – सरदार पटेल – मूलभूत हक्काचा ठराव पास करण्यात आला.


▶️ 1936 – फैजपूर – जवाहरलाल नेहरू – ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन आणि शेतकरी व कामगारांच्या हिताचे ठराव पक्के करण्यात आले.


▶️ 1938 – हरिपुरा – सुभाषचंद्र बोस –


▶️1939 – त्रिपुरा – सुभाषचंद्र बोस –


▶️1940 – रामगढ – अब्दुल कलाम आझाद – वैयक्तिक सत्याग्रहाची घोषणा करण्यात आली.


▶️1940 – मुंबई – मौ. अबूल आझाद – चलेजाव आंदोलनाची घोषणा.


▶️1946 – मिरत – जे. बी. कृपलानी –


▶️1947 – दिल्ली – डॉ. राजेंद्रप्रसाद – भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे पहिले अधिवेशन


इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये



◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले


◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन


◾️“हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे” – भारतमंत्री बर्कनहेड

◾️सवामी दयानंदाच्या आर्य समाजाचे ”लढऊ हिंदू धर्म”असे वर्णन- भगिनी निवेदिता


◾️राजा राममोहन राय यांच्या सतीविरोधी लढ्याबद्दल ‘मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक’ असी प्रशांश – बेंथम


◾️“मुर्शिदाबाद हे शहर लंडन शहराइतकेच धनसंपन्न होते” – लॉर्ड क्लाइव्ह


◾️“प्रत्येक वर्षाला कॉंग्रेसचे होणारे तीन दिवसाचे अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा तमाशाच आहे.” अश्विनीकुमार दत्त.


◾️” भुंकत राहणारे परंतु चावा घेण्यास कचरणारे श्वान किंवा दात नसलेला कागदी वाघ.” असे कॉंग्रेसचे वर्णन – अश्विनीकुमार दत्त.


◾️” कॉंग्रेस हि एक महान रोगाने पछाडलेली संघटना आहे” – अरविंद घोष


◾️” आम्ही आमच्या जोरावर भारताला जिंकून घेतले आहे आणि स्वतःच्या जोरावर तो आमच्या ताब्यात ठेऊ ” – लॉर्ड एल्गिन


◾️” टिळकांना कारावासाची शिक्षा दिल्याबद्दल संपूर्ण राष्ट्र रडत आहे “- सुरेंद्रनाथ बनर्जी


◾️” बंगालच्या विभाजनाची घोषणा आमच्यावर बॉम्ब गोळ्याप्रमाणे कोसळली. बंगालची फाळणी म्हणजे आमच्या अस्मितेला हेतुपुरस्पर सरकारने दिलेला धका आहे.” – सुरेंद्रनाथ बनर्जी


◾️” कोणतेही हक्क आपणास भिक मागून मिळत नसतात ते तीव्र आंदोलन करून राज्यकर्त्यांकडून हिसकून घेतले पाहिजेत.” – लाला लजपतराय


◾️‘कर्झनची तुलना औरंगजेबशी’ – गोखले
‘ रॅडची(Rand) तुलना अफजलखानाशी ‘ – लोकमान्य टिळक

◾️” आम्हाला न्याय हवा आहे भिक नको” – दादाभाई नौरोजी


◾️“बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष हे बंगालचे नेते कॉंग्रेसला पुढे खेचण्याचा प्रयत्न करीत होते तर फिरोजशाह मेहता व दिनशा वाच्छा कॉंग्रसला मागे खेचत होते.”- आचार्य जावडेकर


◾️“लखनौच्या करारातूनच पाकिस्तानच्या मागणीची पायाभरणी झाली” – डॉ. मुजुमदार


◾️” कोणत्याही परिणामांचा थोडाही विचार न केलेला करार म्हणजे लखनौ करार.”
 – गारेट ब्रिटीश इतिहासकार.


◾️” अनी बेझंट यांना स्थानबद्ध करून सरकारने अनेक बेझंट निर्माण केले आहेत.” – लॉर्ड मॉनटेग्यु


◾️करांतीकारकांना ‘वाट चुकलेले तरुण’ असे अनी बेझंट यांनी संबोधले.


◾️“गांधीजी राष्ट्रीय आंदोलन मोठ्या जोमाने सुरु करतात, काही काळ या आंदोलनाचे नेतृत्व कुशल रीतीने सांभाळतात; परंतु शेवटी आंदोलन यशस्वी होत असतानाच आपल्या ध्येयाचा विचार न करता ते मधूनच पळ काढतात.” – चित्तरंजन दास.


◾️” एका वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची घोषणा करणे म्हणजे एखाद्या लहान मुलाने बोलण्यासारखे आहे.” – सुभाषचंद्र बोस यांची गांधीजींवर टीका.


◾️“देवाने माझे उर्वरित आयुष्य वि. दा. सावरकरांना द्यावे” – वि. रा. शिंदे


◾️“हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायही नव्हे” टिळकांची मॉटेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावरील टीका.


◾️“भारतीय विणकरांना मरणाची अवकळा प्राप्त झाली आहे. व्यापार उद्योगाच्या संपूर्ण इतिहासात असे उदाहरण सापडणार नाही.
भारतीय विणकरांची अस्थींमुळे जणू भारतीय मैदानी प्रदेशाला एकप्रकारची स्मशानकळा आली आहे.” विल्यम बेंटिक


◾️इग्लंडकडे जाणाऱ्या भारतीय संपत्तीचे वर्णन ” लक्ष्मी विलायतेला चालली.” लोकहितवादी

◾️असहकार चळवळ तहकूब केल्याच्या घटनेचे ‘नॅशनल कॅलॅमिटी’ वर्णन सुभाषचंद्र बोस यांनी केले.

◾️सभाषचंद्र बोस यांनी दांडी यात्रेची तुलना नेपोलियनने एल्बाहून परतल्यावर पॅरिसकडे केलेल्या संचालनाशी केली.

◾️“जर ब्रिटीशांनी स्वराज्याचा हक्क फक्त मुस्लिमांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही, फक्त राजपुतांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही किंवा हिंदुमधील कनिष्ठ वर्गालाच फक्त स्वराज्य बहाल केले तरी त्यासाही माझा प्रत्यवाह नाही” – लोकमान्य टिळक


◾️खान अब्दुल गफार खान यांचे वर्णन “हिंदूंच्या प्रभावाखाली असणारे आणि लढाऊ पाठांनांच्या खच्चीकरणाचे प्रमुख” असे वर्णन – महम्मद आली जिना


◾️1857 चा उठाव हा कामगार सैनिकांचा भांडवलशाही विरुद्ध व जमिंदरांविरूद्धचा उठाव होता – कार्ल मार्क्स


फॉरवर्ड ब्लाॕक पक्ष



◾️सभाषचंद्र बोस यांनी 1939 च्या त्रिपुरा कॉग्रेस अधिवेशनात अध्यक्षपदी विराजमान होवुनही गांधीजींसोबत झालेला सुप्त संघर्षामुळे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर 3 मे 1939 रोजी  फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली .


◾️ फॉरवर्ड ब्लॉकच्या स्थापनेची घोषणा करताना कलकत्त्यामधे बोस म्हणाले की, 


◾️"जे कोण सामील होत आहेत, त्यांनी कधीही पाठ दाखवुन पळुन जाऊ नये आणि आणि आपले बोट कापुन रक्ताने त्यावर सही करुन तारणपत्र भरावे."


◾️या भावपुर्ण आव्हानाला प्रतिसाद देत "सतरा" तरुण मुलींनी पुढे येवुन तारण फॉर्मवर सह्या  केल्या.


➡️ पक्षाचे उद्दीष्ट -


◾️कॉंग्रेसमधील सर्व डाव्या पक्षांना एकत्रित करणे आणि कॉंग्रेसमध्ये पर्यायी नेतृत्व विकसित करणे हे होते. 


🔹अध्यक्ष -उपाध्यक्ष


◾️बोस फॉरवर्ड ब्लॉकचे अध्यक्ष आणि एस.एस. कवीशर त्याचे उपाध्यक्ष झाले.


◾️जनच्या शेवटी मुंबईत फॉरवर्ड ब्लॉक कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली  त्या परिषदेत फॉरवर्ड ब्लॉकची घटना आणि कार्यक्रम मंजूर झाला. 


◾️जलै 1930 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक समितीची घोषणा केली.


🔺तयात 

अध्यक्ष - सुभाषचंद्र बोस,

उपाध्यक्ष- एस.एस. कविशर 

सरचिटणीस- लाल शंकरलाल 

सचिव- पंडित बी त्रिपाठी आणि मुंबईचे खुर्शेद नरिमन .


◾️आध्र प्रदेश-अन्नपुर्ना

◾️मबई- सेनापती बापट, हरी विष्णू

◾️कामथ तामिळनाडू- पासमोन यू. मुथुरमलिंगम

◾️बिहारमधील - शील भद्र यागी हे प्रमुख सदस्य होते. 


➡️मुखपत्र-फार्वड ब्लॉक


➡️"नागपुर-पहिली परिषद "


◾️20-22 जून 1940 रोजी फॉरवर्ड ब्लॉकने नागपुरात पहिली अखिल भारतीय परिषद घेतली.


◾️परिषदेने फॉरवर्ड ब्लॉकला समाजवादी राजकीय पक्ष म्हणून घोषित केले आणि 22 जूनची तारीख ही फॉरवर्ड ब्लॉक पक्षाने स्थापनेची तारीख मानली. 


◾️बरिटीश राजवटीविरूद्ध संघर्षाचा आग्रह धरला आणि परिषदेने 'ऑल पावर टू द इंडियन पीपल' हा ठराव संमत केला. याच वेळी पक्षाचे अध्यक्ष म्हणून सुभाषचंद्र बोस यांची निवड झाली आणि एच.व्ही. कामथ सरचिटणीस म्हणून निवडले गेले.


मान्सूनचे स्वरूप



अ) मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल

ब) पर्जन्यक्षमप्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण

क) मान्सूनचा खंड

ड) मान्सूनचे निर्गमन


▪️अ) मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल


या घटकाची माहिती  आपण भाग 2 मध्ये बघितली आहे आता समोरची माहिती 👇 👇 👇 👇


▪️ब) पर्जन्यक्षमप्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण


1) आर्द काल व शुष्क काल

- सर्वसामान्य माणसाच्याया दृष्टीने मान्सून म्हणजे पाऊस असाच निगडित आहे.

- अर्थात मान्सूनचा पाऊस कधीच सातत्याने पडत नाही तर तो अधून मधून पडतो .

- आर्द कालाच्या  पाठोपाठ शुष्क काल येतो  


2) पाऊसाचे  वितरण

- बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या उष्ण कठीबंधीय आवरतामूळे भारतीय मैदानी प्रदेशात पाऊस पडतो .

- नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या अरबी समुद्राच्या शाखेमुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीला पाऊस मिळतो .

-  पश्चिम घाटांमुळें पडणारा हा पाऊस प्रतिरोध पर्जन्याचा असतो . 

- पश्चिम किनारपट्टीजवळींल विषुववृत्तीय जेट स्ट्रीमच्या स्थानावर पश्चिम किनारपट्टीवरील पाऊस अवलंबून असतो .

 

3) मान्सून द्रोणी  व आवर्ताचा संबंध

- बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या उष्ण कटिबंधीय अवरताची वारंवारिता दरवर्षी बदलत असते .

- आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभावन  पट्याच्या स्थानावर आवर्ताचा मार्ग अवलंबून असते ; याला भारतीय मौसम science मध्ये `मान्सून द्रोणी' ( mansoon trough) म्हणतात . ज्याप्रामाने मान्सून द्रोणीचा आस आंदोलीत होत जातो त्याप्रमाने  आवर्ताचा मार्गही बदलतो . त्यामुळे पाऊसाची तीव्रता दरवर्षी पडणार्या वितरणामध्ये फरक असतो.

- पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व व ईशान्यकडे तर भारतीय मैदानावर व द्विकल्पाच्या उत्तर भागात वायव्येकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी-कमी होत जाते.


क) मान्सूनचा खंड

- नैऋत्य मान्सूनच्या काळात पाऊसात साधारणपणे खंड पडतो. हा खंड बऱ्याच वेळा एक वा दोन आठवडे किंवा आणखी काही आठ्वडेही असू शकतो .यालाच मान्सूनमधील खंड असे म्हणतात.


🔹पाऊस न पडण्याची अनेक कारणे पुढीलप्रमाणे ....


- पाऊस घेऊन येणारे उष्ण काठिबंधीय आवार्ते वारंवार निर्माणन न झाल्याने अश्या प्रकारचा खण्ड पडतो . 

- उत्तर भारतात मान्सून द्रोणीच्या स्थानामुळे पाऊस पडत नाही.

- भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर वारे वाहत असतील तर पश्चिम किनारपट्टीवर पाऊस येत नाही.

 - पश्चिम राजस्थानात वातावरणाच्या भिन्न स्तरावर तापिय परिस्तितीमुळे पाऊस पडत नाही . 

- तापमानाच्या विपरीततमुळे घेऊन जाणार्या वाऱ्याना उंचीवर जाता येत नाही .


ड) मान्सूनचे निर्गमन

- वायव्य भरतामधून सप्टेंबरमध्ये मान्सूनचे निर्गमन होते . द्विकल्पाच्या दक्षिण भागमधून मध्य ऑक्टोबरला  मान्सूनचे निर्गमन होते .

- मान्सूनचे निर्गमन होत असताना बंगालच्या उपसगरावरून वारे वाहतात .बाष्प गोळा व ईशान्य मान्सून वारे म्हणून तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पाऊस देतात.

_____________________________________

पुणे करार


डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी


डॉ बाबासाहेब अांबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात पुणे येथे झालेला समझौता (करार)


पुणे करार हा महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राजकीय नेत्यांमध्ये २४ सप्टेंबर इ.स. १९३२ रोजी झाला. दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात हा त्याचा मुख्य मुद्दा होता. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित मदनमोहन मालवीय, मुकुंद रामराव जयकर, सी. राजगोपालाचारी आदींच्या सह्या आहेत. हा करार "आंबेडकर-गांधी करार", "गांधी-आंबेडकर करार", "ऐरवडा करार" या नावांनीही ओळखला जातो.




करारनाम्याच्या अटी


पुणे करारातील अटी खालीलप्रमाणे आहेत.


१) प्रांतिक विधान सभेत साधारण निवडणूक क्षेत्रातील जागांपैकी दलित वर्गासाठी १४८ राखीव जागा ठेवण्यात येतील. राखीव जागांची प्रांतानुसार विभागणी खालीलप्रमाणे होती:


२) या जागांची निवडणूक संयुक्त पद्धतीद्वारे केली जाईल. दलित वर्गाच्या सदस्यांची नावे त्या निवडणूक क्षेत्राच्या यादीमध्ये नोंदविलेली असतील, त्यांचे एक मंडळ नेमणूक करून बनविले जाईल. हे मंडळ प्रत्येक राखीव जागेसाठी दलित वर्गातील चार उमेदवारांचे पॅनल निवडेल. ही निवडपद्धती एकमतीय आधारावर होईल. अशा प्राथमिक निवडीमध्ये ज्या चार सदस्यांना सर्वाधिक मते मिळतील ते साधारण निवडणूक क्षेत्राचे उमेदवार समजले जातील.


३) केंद्रीय कार्यकारणीमध्ये दलित वर्गाचे प्रतिनिधित्व वरील दोन प्रकारे होईल.


४) केंद्रीय कार्यकारिणीमध्ये दलित वर्गाच्या राखीव जागांची संख्या १८% असेल.


५) उमेदवारांच्या पॅनलच्या प्राथमिक निवडीची व्यवस्था (केंद्रीय व प्रांतीय कार्यकारिणीसाठी, ज्यांचा वर उल्लेख केला आहे.) पहिल्या दहा वर्षानंतर समाप्त होईल. दोन्हीही पक्षाच्या आपापसातील संमतीने खालील कलम सहा नुसार त्याकालावधीपूर्वी देखील समाप्त केला जाऊ शकेल.


६) प्रांतीय व केंद्रीय कार्यकारिणीत दलितांच्या जागांचे प्रतिनिधित्व जसे एक व चार मध्ये दिले आहे, ते दोन्हीही संबंधितपक्षांद्वारे आपापसांत समझोता होऊन त्यास हटविण्यासाठी निर्णय घेतला जाईल, तोपर्यंत अंमलात येईल. .


७) केंद्रीय व प्रांतिक कार्यकारिणीच्या निवडणुकीसाठी दलितांच्या मतदानाचा अधिकार लेथियन कमीटीच्या अहवालाप्रमाणे असेल.


८) दलित वर्गाच्या प्रतिनिधधींना स्थानिक निवडणुका व सरकारी नोकरीत अस्पृश्य असल्याने अयोग्य ठरविले जाता कामा नये. दलितांच्या प्रतिनिधित्वास (संख्येने) पुरे करण्यासाठी सर्व तऱ्हेचे प्रयत्न केले जातील व सरकारी नोकऱ्यांमध्ये ठरवून दिलेली शैक्षणिक योग्यता त्यांच्याकडे असल्यास त्यांची नेमणूक केली जाईल.


९) सर्व प्रांतांत शैक्षणिक अनुदान देऊन दलितांच्या मुलाबाळांसाठी शैक्षणिक सोयी पुरविल्या जातील. त्यासाठी योग्य त्या रकमेची तरतूद केली जाईल. इत्यादी समझोत्याच्या अटी 'गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट'मध्ये सामील करण्यात आल्या.


१०) वरील निवडणुकीबाबत व सरकारी नोकरीबाबत अस्पृश्याना योग्य जागा मिळाव्या म्हणून शक्य तितका प्रयत्न केला जाईल. मात्र सरकारी नोकरीकरिता शिक्षणाच्या ज्या अटी सरकारने लावल्या त्या पूर्ण झाल्या पाहिजेत.

इत्यादी अटींना संमती देण्यात आली. त्यानंतर म. गांधींनी संत्र्याचा रस पिऊन, आपला प्राणांतिक उपवास सोडला

स्नायू संस्था (Muscular System)

मानवी स्नायू संस्था पुढील तीन स्नायूंपासून बनलेली असते.

अस्थी स्नायू,
मृदू स्नायू आणि
हृदय स्नायू.

🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀

🌷स्नायूंमुळे आपल्या शारीरिक हालचाली घडून येतात.
शरीराला मजबुती देऊन आकार नियंत्रित ठेवतात तसेच रक्ताचे वहन संपूर्ण शरीरात करतात.

🌷मानवी शरीरात एकूण 400 स्नायू असतात. प्रौढ मनुष्याच्या शरीरात एकूण 639 स्नायू असतात.
पुरुषांच्या एकूण वजनाच्या तुलनेत 40% तर स्त्रियांच्या एकूण वजनाच्या तुलनेत 30% स्नायूंचे वजन असते.

🌷हे स्नायू हाडांशी किंवा इतर स्नायूंशी जोडलेले असतात. स्नायू संस्थेतील स्नायू स्नायुतंतूच्या लांब पेशींपासून बनलेले असतात.

🌷या पेशींमध्ये संकोची प्रथिन (Contractile Protein) असते व त्या प्रथिनांमुळेच स्नायूंचे आकुंचन-प्रसरण घडून येते.

🌷हे संकोची प्रथिन अकँटीन आणि मायोसीन या तंतूपासन बनलेले असते.
स्नायूंच्या अभ्यासाच्या शास्त्राला Myology असे म्हणतात.
स्नायूंचे तीन प्रकार आहेत.

🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷

🌷🌷1) हृदय स्नायू (Cardiac Muscles):🌷🌷

🌷हृदय स्नायू अनैच्छिक स्नायूंचा (Involuntary Muscles) प्रकार असून त्यांच्या कार्यावर आपल्या मनाप्रमाणे नियंत्रण ठेवता येत नाही.

🌷हृदयाचे कार्य स्वायत्त चेतासंस्थेमार्फत नियंत्रित केले जाते त्या प्रक्रियेला सायन्स मोड असे म्हणतात.

🌷आपल्या शरीरातील सर्वात कार्यक्षम स्नायू म्हणून हृदय स्नायूंना ओळखले जाते.
हृदयाचे स्नायू हृदयाच्या आकुंचन – प्रसारणाचे कार्य घडवून आणतात.

🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀

🌷🌷2) मृदू स्नायू (Smooth Muscles):🌷🌷

🌷हे स्नायू शरीरात अस्थींना जोडलेले नसतात. म्हणून यांना मृदू स्नायू किंवा अंककाली स्नायू (Nonskeletal Muscle) म्हणतात.

🌷 या स्नायूंच्या कार्यावर आपण मनाप्रमाणे नियंत्रण ठेवू शकत नाही. म्हणून त्यांना अनैच्छिक स्नायू म्हणतात.

🌷सूक्ष्मदर्शकाखाली या स्नायूंचे निरीक्षण केल्यास त्यांच्या पृष्ठभागावर गडद आणि फिकट पट्टे आढळून येत नाहीत म्हणून त्यांना अपट्टकी स्नायू (Non Straited Muscles) असेही म्हणतात.

🌷अनैच्छिक स्नायूंच्या पेशी चकती प्रमाणे तसेच एक केंद्रकीय असतात.
मृदू स्नायूंचे कार्य स्वायत्त चेतासंस्थेमार्फत नियंत्रित केले जाते.

उदा: अन्ननलिका, स्वास नलिका, डोळ्यातील परीतारिका, मूत्रवाहिनी, रक्तवाहिन्या, आतडे, जठर, फुप्फुसे, श्वासपटलाचे स्नायू इत्यादी.

🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🍀🌷🍀🌷

🌷🌷2) मृदू स्नायू (Smooth Muscles): 🌷🌷

🌷हे स्नायू शरीरात अस्थींना जोडलेले नसतात. म्हणून यांना मृदू स्नायू किंवा अंककाली स्नायू (Nonskeletal Muscle) म्हणतात.

🌷या स्नायूंच्या कार्यावर आपण मनाप्रमाणे नियंत्रण ठेवू शकत नाही. म्हणून त्यांना अनैच्छिक स्नायू म्हणतात.

🌷सूक्ष्मदर्शकाखाली या स्नायूंचे निरीक्षण केल्यास त्यांच्या पृष्ठभागावर गडद आणि फिकट पट्टे आढळून येत नाहीत म्हणून त्यांना अपट्टकी स्नायू (Non Straited Muscles) असेही म्हणतात.

🌷अनैच्छिक स्नायूंच्या पेशी चकती प्रमाणे तसेच एक केंद्रकीय असतात.
मृदू स्नायूंचे कार्य स्वायत्त चेतासंस्थेमार्फत नियंत्रित केले जाते.

उदा: अन्ननलिका, स्वास नलिका, डोळ्यातील परीतारिका, मूत्रवाहिनी, रक्तवाहिन्या, आतडे, जठर, फुप्फुसे, श्वासपटलाचे स्नायू इत्यादी.

🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷

🌷🌷3) अस्थी स्नायू (Skeletal Muscles):🌷🌷

🌷हे स्नायू शरीरात अस्थींना दोन्ही बाजूंनी जोडलेले असतात म्हणून त्यांना अस्थी स्नायू किंवा कंकांली स्नायू (Skeletal Muscle) म्हणतात.

🌷या स्नायूंच्या कार्यावर आपण मनाप्रमाणे नियंत्रण ठेऊ शकतो. म्हणून यांना ऐच्छिक स्नायू (Voluntary Muscles) असे म्हणतात.

🌷सूक्ष्मदर्शकाखाली या स्नायूंचे निरीक्षण केल्यास त्यांच्या पृष्ठभागावर गडद आणि फिकट पट्टे आढळून येतात म्हणून यांना पट्टकी स्नायू  (Straited Muscles) म्हणतात.

🌷ऐच्छिक स्नायूंच्या पेशी लांबट, दंडाकृती, अशाखीय तसेच बहुकेंद्रकी असतात.
उदा. हात, पाय, इत्यादीमधील स्नायू.

🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🌷

🌷शरीरातील सर्वात मोठा स्नायू ग्लूटीअस मॅक्सिमस (Gluteus maximus) आहे.

🌷हा मांडीच्या हालचालींसाठी आवश्यक असलेला स्नायू आहे.

🌷पाय पसरणे, पाय फिरवणे, मांडी घालणे अशा प्रकारचे कार्य ग्लूटीएस मॅक्झिमस मुळे शक्य होतात.

🌷 सर्वात लहान स्नायू स्टेपीडीएस (Stepedius) आहे. तो कानातील स्टेप्स या हाडांची हालचाल प्रमाणापेक्षा जास्त होऊ देत नाही.

🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🍀🌷

रक्त



👉लाल रक्त पेशी
(आरबीसी किंवा एरथ्रोसाइट्स),

👉पांढर्‍या रक्त पेशी
(ल्युकोसाइट्स) आणि

👉बिंबिका
(प्लेटलेट्स किंवा थ्रोम्बोसाइट्स)

▪️यांनी बनलेला व गुंतागुंतीची (जटिल) रचना असलेला जैविक द्रव पदार्थ आहे.

▪️रक्ताचा मुख्य घटक पाणी आहे.
▪️रक्त हा एकमेव द्रव उती आहे.

▪️रक्तामध्ये लाल रक्तपेशींचे प्रमाण सर्वाधिक असते. या पेशींमधील हिमोग्लोबिन या घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसते.

▪️हिमोग्लोबिनमुळे प्राणवायू आणि कार्बन डायॉक्साइड रक्तात विरघळू शकतात आणि त्यांचे वहन करणे सुलभ बनते.

▪️पांढर्‍या रक्त पेशींमुळे संसर्गाला प्रतिबंध होतो तर बिंबिकांमुळे रक्ताची गुठळी होण्यास मदत होते.

🟤 पष्ठ्वंशी प्राण्यांचे रक्त तांबड्या रंगाचे असते.

▪️ सधिपाद प्राणी आणि मृदुकाय प्राण्यांच्या रक्तामध्ये प्राणवायू वहनानासाठी हिमोग्लोबिनऐवजी हिमोसायनिन असते.


मानवी रक्ताचे घटक

मानवी शरीरामध्ये शरीराच्या आठ टक्के वजनाएवढे रक्त असते.

रक्ताची सरासरी घनता १०६० प्रतिकिलो/घन मीटर. ही घनता शुद्ध पाण्याच्या १००० किलो/ घन मीटरच्या जवळपास आहे.

एका प्रौढ व्यक्तीच्या शरीरात सुमारे पाच लिटर (१.३ गॅलन) रक्त असते.

रक्तामध्ये रक्तद्रव आणि रक्त पेशी असतात.

🛑 रक्तपेशीमध्ये

👉एरिथ्रोसाइटस- लाल रक्तपेशी;
👉लयूकोसाइट्स- पांढर्‍या रक्त पेशी , आणि
👉थरॉंबोसाइट्स- बिंबिका किंवा रक्तकणिका असतात.

▪️घनफळाच्या दृष्टीने रक्तामध्ये

👉४५% लाल रक्तपेशी आणि
👉५४.३% रक्तद्रव वा
👉०.७% पांढर्‍या रक्त पेशी असतात.

▪️रक्त सांद्रतेचे द्रायुगतिकीच्या दृष्टीने कमीतकमी जागेतून वाहती ठेवण्याच्या दृष्टीने अनुकूलन झाले आहे. सूक्ष्म केशवाहिन्यांमधून पेशी आणि रक्तद्रव सुलभपणे वाहतो.

▪️तांबड्या रक्तपेशीमधील हिमोग्लोबिन जर रक्तद्रव्यामध्ये असते,तर रक्ताच्या वाढलेल्या सांद्रतेमुळे हृदयाभिसरण संस्थेवर ताण पडला असता.


रक्तवाहिन्या 

बंद पद्धतीच्या अभिसरण संस्थेमध्ये तीन प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात.

१. धमन्या,
२. केशिका आणि
३. शिरा.


धमन्या

धमन्या (Arteries) शरीराच्या विविध अवयवांकडे रक्त वाहून नेतात. यांच्या भिंती जाड असतात. धमन्या शरीरात खोल भागात असतात. त्यांची भित्तिका स्थितिस्थापक असते. सर्व घमन्यांमधून प्राणवायुयुक्त रक्त वाहते. फुप्फुस धमनीत मात्र विनॉक्सिजनित रक्त असते. धमन्यांमधील रक्त दाबयुक्त असते. महाधमनी अनेक स्नायुमय लहान धमन्यांमध्ये विभागलेली असते. स्नायुमय धमनीपासून निघालेल्या लहान धमन्यांना धमनिका म्हणतात.

केशिका

(capillaries) या अत्यंत बारीक एकस्तरीय पातळ भिंती असलेल्या नलिका आहेत. धमनिका आणि शिरिका याना जाळ्याच्या स्वरूपात जोडण्याचे काम करतात. शरीरपेशींशी यांचा प्रत्यक्ष संबंध असतो. केशिकामुळे संप्र्रके, अवशिष्ट पदार्थ, अन्नधटक,कार्बन डाय ऑक्साइड अशा पदार्थांचे उतीबरोबर देवाणघेवाण करण्याचे कार्य होते.

शिरा

शिरांच्या (veins) भिंती पातळ असतात. त्या विविध अवयवाकडून हृदयाकडे रक्त वाहून नेतात. अनेक शिरिकांच्या जोडण्यामधून शिरा तयार होतात. शिरिका त्वचेलगत असून कमी स्नायुयुक्त आणि स्थितिस्थापक असतात. फुप्फुस शिरांव्यतिरिक्त सर्व शिरांमधून विनॉक्सिजनित रक्त वाहते. धमन्यांमध्ये रक्त पुढे ढकलण्यासाठी झडपा असतात. शिरांमधून रक्त हृदयाकडे नेण्यात स्नायूंचा मोठा वाटा आहे. स्नायूंच्या हालचालींमुळे शिरांमधील रक्त हृदयाकडे ढकलले जाते.


चेतापेशी


प्राण्यांच्या चेतासंस्थेतील पेशी. या विद्युत स्वरूपात माहिती साठवून ठेवतात, ती इकडून तिकडे पाठवतात व माहितीवर प्रक्रियासुद्धा करतात.

एका सर्वसाधारण चेतापेशीचे तीन अवयव असतात मुख्य शरीर (सोमा),चेतातंतू आणि चेताक्ष. चेतापेशीचा विकास होत असतानाच्या अवस्थेमध्ये चेतातंतू आणि चेताक्ष, हे वेगवेगळे दाखवता येत नाहीत त्या अवस्थेमध्ये त्यांना एकत्रितपणे "चेतागर्भ" असे म्हणतात. चेतातंतू हे नावाप्रमाणेच तंतूमय असतात आणि ते चेतापेशीच्या मुख्य शरीराला जोडलेले असतात. त्यांची लांबी शेकडो मायक्रोमिटर एवढी असू शकते. चेतातंतू हे एकसलग नसतात, त्यांचे अनेक ठिकाणी विभाजन झालेले असते, अशा विभाजनामुळे त्यांचा आकार एखाद्या वृक्षासारखा दिसतो. चेताक्ष हा चेतापेशीच्या मुख्य शरीराला जोडलेला दंडगोलाकार भाग असतो. मुख्य शरीर आणि चेताक्षाच्या जोडणीच्या जागेला चेताधार म्हणतात. चेताक्षाची लांबी मनुष्यामध्ये जास्तीत-जास्त १ मीटर एवढी असू शकते (इतर काही प्राण्यांमध्ये याहीपेक्षा लांब चेताक्ष सापडतात). चेतापेशीच्या मुख्य शरीराला अनेक चेतातंतू जोडलेले असतात, परंतू चेताक्ष एकच असतो. अर्थात या एकाच चेताक्षाच्या शेकडो शाखा असू शकतात. एका चेतापेशीच्या दुसरीशी असलेल्या विद्युत जोडणीला "चेतन बिंदू" असे म्हणतात. चेतापेशींमधील संदेशवहन चेतन बिंदू मार्फत होते, सहसा एका चेतापेशीच्या चेताक्षातून दुसरीच्या चेतातंतू मध्ये हे संदेश पाठवले जातात. अर्थात या नियमाला काही अपवाद आहेत, उदाहरणार्थ काही चेतापेशींमध्ये चेतातंतू नसतात तसेच काहींमध्ये चेताक्ष नसतो, अशा परिस्थिती मध्ये "चेताक्ष ते चेताक्ष" किंवा "चेतातंतू ते चेतातंतू" अशी जोडणी असू शकते.



♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️

चेतासंस्था या नावाचा उगम चेता पासून आहे. चेता म्हणजे दंडगोलाकार तंतूंचा जुडगा. हा जुडगा मेंदू आणि मज्जारज्जूमधील दुवा आहे. चेता
 विभाजित होऊन शरिराच्या प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचते. इजिप्शियन, ग्रीक, आणि रोमन संशोधकानी चेता प्रत्यक्ष पाहिलेल्या होत्या. त्यातील सूक्ष्म रचना त्याना ठाऊक नव्हती. सूक्ष्मदर्शकाचा शोध लागल्यानंतर चेता अनेक तंतूनी बनलेली असते हे समजले. हे तंतू चेतापेशींच्या अक्षतंतूंचे होते. अक्षतंतूभोवती गुंडाळलेली पटले आणि पटलामध्ये अधून मधून खंड (फॅसिकल) असतात हे सूक्ष्मदर्शकाखाली दिसत असे. अक्षतंतूंचा उगम पेशीपासून होतो. पण बहुतांश पेशी मेंदू, मज्जारज्जू आणि गुच्छिकेमध्ये स्थित आहेत. मध्यवर्ती चेतासंस्था हा चेतासंस्थेमधील सर्वात मोठा भाग आहे. मेंदू आणि मज्जारज्जू असे त्याचे ढोबळ दोन भाग करता येतात. पाठीच्या कण्यातील मज्जा पोकळीमध्ये मज्जारजू असतो. मेंदू मात्र कवटीमध्ये असतो, मध्यवर्ती मज्जासंस्थेवर तीन आवरणे असतात. त्याना मस्तिष्क पटल असे म्हणतात. चर्ममय बाह्य चिवट आवरणास दृढावरण असे म्हणतात. मेंदूचे संरक्षण कवटीमुळे आणि मज्जारज्जूचे मणक्यामुळे होते.
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


चेतापेशी :
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
चेतापेशी इतर पेशीपासून सहज वेगळ्या ओळखता येतात. त्या परस्परांशी अनुबंधाद्वारे जोडलेल्या असतात. चेतापेशीमधील अनुबंध म्हणजे एका पेशीच्या पेशीपटलामधून दुसऱ्या पेशीमधील पटलामध्ये त्वरित होणारे संदेश वहन. हे वहन रासायनिक किंवा विद्युत भाराच्या स्वरूपात असते. बहुतेक चेतापेशीना एक किंवा अनेक प्रवर्ध (पेशीपासून निघालेला लांब भाग) निघतात. सर्वात लांब प्रवर्धास अक्षतंतू असे म्हणतात. हा प्रवर्ध शरीरामध्ये लांबपर्यंत विस्तारलेला असतो. अक्षतंतू प्रवर्ध इतर हजारो पेशीशी अनुबंधाने जोडलेले असतात. अनेक अक्षतंतू एकत्र येऊन बनलेली चेता(नर्व्ह)च्या स्वरूपात शरीरभर स्नायू किंवा अवयवापर्यंत गेलेली असते.

मानवी चेतासंस्थेमध्ये शेकडो प्रकारच्या चेतापेशी असतात. प्रत्येक पेशीची रचना आणि कार्यांमध्ये विविधता आहे. यांमधील संवेदी चेतापेशी प्रकाश व ध्वनि संवेदना ग्रहण करतात. प्रेरकचेतापेशी स्नायू आणि ग्रंथीना संदेशाद्वारे उत्तेजित करतात. बऱ्याच प्राण्यांमध्ये बहुतेक संवेदी चेतापेशी संदेश ग्रहण करून ते संदेश इतर चेतापेशीकडे पाठवतात.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

सहयोगी पेशी:
▪️♦️▪️♦️▪️♦️▪️♦️▪️♦️▪️♦️
सहयोगी पेशीमध्ये चेतापेशीचे एकही कार्य होत नाही. सहयोगी पेशी चेतापेशीना आधार देतात, अंतर्गत स्थिरता आणतात आणि संदेश वहन प्रक्रियेमध्ये मदत करतात. चेतापेशीच्या अक्षतंतूवर असणारे मायलिन आवरण सहयोगीपेशीपासून बनलेले आहे. एका अंदाजानुसार मानवी मेंदूमध्ये एकूण सहयोगी पेशींची संख्या चेपापेशींइतकी असावी. त्यांची संख्या मेंदूच्या विविध भागात आवश्यकतेनुसार कमी अधिक आहे. सहयोगी पेशींचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे चेतापेशीना आधार देणे, त्यांचे पोषण करणे, विद्युतरोधी आवरण, परजीवींचा नाश आणि मृत चेतापेशी नष्ट करणे, वगैरे.. अक्षतंतूंच्या मार्गिकेचे कार्य केल्याने अक्षतंतू विविक्षित भागापर्यंत सुलभपणे पोहोचतात. मध्यवर्ती चेतासंस्थेतील ऑलिगोडेंड्राइट आणि परीघवर्ती चेतासंस्थेतील श्वान पेशींच्या मेद पटलाचे आवरण अक्षतंतूभोवती गुंडाळलेले असते. या आवरणास मायलिन असे म्हणतात. अक्षतंतूमधून होणारे विद्युत रासायनिक संवेद वहन सुरळीत व्हावे यासाठी मायलिन हे विद्युत विरोधी आवरण कार्य करते. काहीं आजारात मायलिन आवरण नष्ट झाल्यास अक्षतंतूमधून येणाऱ्या आणि जाणाऱ्या संवेदामध्ये गंभीर परिणाम होतात. कशेरुकी(पृष्ठवंशी) प्राण्यामधील चेतासंस्था कशेरुकी सजीवांमधील चेतासंस्थेचे दोन भाग होतात. मध्यवर्ती चेतासंस्था आणि परीघवर्ती चेता संस्था.
▪️♦️▪️♦️▪️♦️▪️♦️▪️♦️▪️♦️

मध्यवर्ती चेतासंस्था

परीघवर्ती चेतासंस्था
▪️▪️▪️🔺🔺🔺▪️▪️▪️🔺🔺🔺
परीघवर्ती मज्जासंस्था हे समुदायवाचक नाव आहे. ही मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या बाहेर असते. अक्षतंतूंच्या जुडग्याना चेता असे म्हणतात. चेता हा परीघवर्ती मज्जासंस्थेचा भाग आहे. परीधवर्ती संस्थेचे दोन भाग आहेत. कायिक (सोमॅटिक) आणि आंतरांगिक (व्हिसरल) . कायिक भागामधील चेता त्वचा, सांधे, आणि स्नायू यांच्यापर्यंत गेलेल्या असतात. कायिक संवेदी चेतापेशी मेरुरज्जूमधून निघणाऱ्या मेरुचेतामधील अधर बाजूस असलेल्या गुच्छ्तिकेमध्ये असतात. आंतरांगिक भागापासून रक्तवाहिन्या, आणि उदरपोकळीमधील ग्रंथी पर्यंत चेता गेलेल्या असतात. आंतरांगिक चेता संस्थेचे आणखी दोन सिंपथॅटिक (अनुकंपी तंत्रिका तंत्र) आणि पॅरासिंपथॅटिक असे आणखी दोन भाग असतात. कशेरुकी – पृष्ठवंशी प्राण्यांची चेता संस्था करड्या आणि श्वेत भागामध्ये विभागली जाते. जरी करड्या भागास ‘ग्रे मॅटर’ असे संबोधले जात असले तरी हा करडा रंग फोर्मॅलिनच्या द्रावणात ठेवलेल्या मेंदूचा आहे. प्रत्यक्षात जीवित मेंदूच्या छेदाचा बाह्य भाग गुलाबी किंवा फिकट तपकिरी दिसतो. या भागात चेतापेशीमधील पेशीकाय मोठ्या प्रमाणात असतात. श्वेत भागात मायलिन अक्षतंतूचे प्रामाण अधिक असते. मायलिन आवरणामुळे या भागास श्वेत रंग येतो. श्वेत भागात परिघवर्ती चेता, मेंदूचा अंतर्गत भाग आणि मेरुरज्जूचा अंतर्गत भाग असतो. मेंदू आणि मेरुरज्जूच्या करड्या भागात चेतापेशींचे समूह असतात. मेंदूच्या बाह्यक करडे तर अंतर्भाग श्वेत रंगाचा असतो. शरीरशास्त्राच्या सोयीसाठी चेतापेशींच्या मेंदूतील समूहास ‘केंद्रक’ (न्यूक्लियस) म्हणण्याची पद्धत आहे. मध्यवर्ती चेतासंस्थेबाह्य पेशीसमूहास गुच्छिका म्हणतात. या नियमास काहीं अपवाद केले आहेत.

🔺🔺🔺▪️▪️▪️🔺🔺🔺🔺▪️▪️

प्रतिक्षेपी क्रिया

सर्वात चेतनी परिपथ म्हणजे प्रतिक्षेप चाप किंवा प्रतिक्षेप कमान. या परिपथामध्ये संवेदी चेतापेशी पासून आवेग सुरू होतो आणि प्रेरक चेतापेशीद्वारे स्नायूमध्ये किंवा ग्रंथीमध्ये संपतो. अगदी सोपे प्रतिक्षेपी चापाचे उदाहरण म्हणजे स्वयंपाक करताना बसलेला तव्याचा चटका. चटका बसणे आणि त्वरित हात भाजणाऱ्या वस्तूपासून लांब जाणे प्रतिक्षेपी चापाद्वारे होते. चापाचा प्रारंभ संवेदी चेतापेशीद्वारे सुरू होतो. त्वचेमध्ये संवेदी चेतापेशींची असंख्य टोके आहेत. त्यामध्ये दाब, वेदना, उष्णता, थंडी असे विविध संवेद चेतापेशीद्वारे मध्यवर्ती चेतासंस्थेकडे नेले जातात. उष्णतेमुळे चेतामध्ये आवेग उत्पन्न होण्यासाठी ठरावीक क्षमतेचा संवेद असावा लागतो. अक्षतंतूमध्ये कोणताही संवेद निर्माण होत नाही या स्थितीस स्थिर स्थिति (रेस्टिंग पोटेंशियल) म्हणतात. अशा स्थिर स्थितेमध्ये अक्षतंतूच्या बाहेर घन आयनांची संख्या अधिक आणि ऋण आयनांची संख्या अक्षतंतूमध्ये अधिक असते. अक्षतंतूची विद्युत स्थिति अशावेळी ऋण ७० मिलिव्होल्ट एवढी असते. (-७० मिलिव्होल्ट) स्थिर स्थिति भार राखण्यासाठी अक्षतंतूच्या पटलामधून सोडियमचे आयन पेशीबाहेर वा पोटॅशियम आयन पेशीमध्ये आयन चॅनल मधून येतात वा जातात. पेशीतील अंतर्भाग संवेद वहन होत नाही अशा वेळेस ऋण70 मिलिव्होल्ट असण्याचे कारण म्हणजे पेशीमधील प्रथिने. प्रथिनांचा आयन भार ऋण असतो. सर्व ऋण आयन भार संतुलित करतील एवढे घन आयन पेशीमध्ये कधीही नसतात.

संवेद उत्पन्न होण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोडियम आयन पेशीमध्ये आणि पोटॅशियम आयन बाहेर जाण्याची गरज असते. कोणताही संवेद आला म्हणजे नेहमीचे सोडियम पोटॅशियम आयनांचे पेशीमधील प्रमाण बदलते. आतील आयन भार -७० मिलिव्होल्ट वरून +३५ मिलिव्होल्ट झाला म्हणजे अक्षतंतू उत्तेजित झाला असे म्ह्णण्याची पद्धत आहे. +मिलिव्होट हे “क्रिया आयन भार” “ॲ क्शन पोटेंन्शियल” आहे. एकदा क्रिया आयन भार +३५ मिलिव्होल्ट झाला म्हणजे त्याचे अक्षतंतूच्या ध्रुवतेनुसार वहन होते. संवेदी अक्षतंतू संवेद मध्यवर्ती चेतासंस्थेकडे तर प्रेरक अक्षतंतूतर्फे योग्य त्या अवयवाकडे, स्नायूकडे किंवा ग्रंथीकडे पाठविला जातो.

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

हृदय (Heart)






स्थान : मानवी हृदय हे उरोभागात दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये आणि छातीच्या हाडाच्या मागे स्थित असते. ते तंतोतंत मध्यभागी नसून काहीसे तिरकस आणि डावीकडे असते.

◾️वजन :
पुरुष – ३४० ग्रॅम्स
स्त्री – २५५ ग्रॅम्स

◾️कार्य :
हृदय हे रक्तभिसरण संस्थेचे महत्वाचे इंद्रिय आहे आकुंचन व प्रसारणाद्वारे रक्ताचे संपूर्ण शरीरात अभिसरण घडवून आणणे, हे त्याचे प्रमुख कार्य आहे.
हृदय हा एक स्नायूंचा पंप (Muscular Pump) आहे. त्याची पंपिंग क्षमता (Pumping Capacity) 0.2 HP इतकी असते.
हृदयाचा आकार साधारणपणे त्रिकोणाकृती असून त्याचे आकारमान हाताच्या मुठीएवढे असते, ते हृत्स्नायू (Cardiac Muscles) नी बनलेले असते आणि त्यावर ह्रद्यावरण (Pericardium) हे संरक्षणात्मक दुहेरी आवरण असते.

◾️हृदयाची रचना:
मानवी हृदयात एकूण चार कप्पे व पाच झडपांचा समावेश होतो. वरच्या बाजूस दोन अलिंद व खालच्या बाजूस दोन निलय असे कप्पे असतात. अशा रीतीने चार कप्प्यांमध्ये
१) डावी कर्णिका/अलिंद (Left Autrium)
२) उजवी कणिका/ अलिंद (Right Autrium)
3) डावी जवनिका /निलय (Left Ventricle)
४) उजवी जवनिका/ निलय (Right Ventricle)
यांचा समावेश होतो.
अलिंदांच्या भिंती पातळ असतात, तर निलय जाड भिंतीची बनलेली असतात. वरची दोन अलिंदे एका पातळ स्थायुमय पटलाने विभक्त झालेली असतात. त्यास अंतरकालिंदी पट (Inter -Artrial Septum) असे म्हणतात. खालची दोन निलये मात्र जाड अंतरनिलयी पटलाने (Inter-Ventricular Septum) विभागलेली असतात.
उजव्या अलिंदात पुढील तीन रक्तवाहिन्यांद्वारे ऑक्सिजनविरहित रक्त आणले जाते.
१) ऊर्ध्व शिरारक्त गुहा (Superior Vena Cava),
२) अधोशीरा रक्त गुहा (Inferior Vena Cava) आणि
३) परिमंडली शिरानाल (Coronary Sinus)
उजवे अलिंद आणि उजवे निलय यांमधील रक्तप्रवाह त्रिदली झडपांच्या (Tricuspid Valve) च्या साहाय्याने नियंत्रित केले जाते.
उजव्या निलयाच्या वरील भागाकडून फुफ्फुस धमनी (Pulmonary Artery) निघते.
उजव्या अलिंदातून उजव्या निलयात आलेले ऑक्सिजनयुक्त रक्त तिच्यामार्फत फुफ्फुसांकडे वाहून नेले जाते.
डाव्या अलिंदात फुफ्फुस शिरांची (Pulmonary Veins) चार रंध्रे उघडतात, त्यांद्वारे ऑक्सिजनयुक्त रक्त फुफ्फुसांकडून डाव्या अलिंदात आणले जाते.
डावे अलिंद आणि डावे निलय यांच्यातील रक्तप्रवाह द्विदली (Bicuspid) किंवा मिट्रल झडप (Mitral Valve) च्या साहाय्याने नियंत्रित केले जाते.
डाव्या निलयाच्या वरच्या आतील भागापासून एक प्रमुख धमनी निघते, जिला महाधमनी (Aorta) असे म्हणतात. डाव्या अलिंदातून डाव्या निलयामध्ये आलेले ऑक्सिजनयुक्त रक्त तिच्यामार्फत शरीराच्या विविध अवयवांना पुरविले जाते.
हृयाच्या स्नायूंना परिहृद धमनी (Coronary Artery) द्वारे रक्त पुरविले जाते.
हृदयातील झडपांमुळे रक्त एकाच दिशेने प्रवाहित केले जाते.

◾️हृदयाची कार्यपद्धती :
अलिंदांचे व निलयांचे लयबद्ध आकुंचन व प्रसरण सतत होत असते. (Rhythmic Contraction And Relaxation Of the Auricles And Ventricles)
मात्र अलिंद व निलय एकाच वेळी आकुंचन किंवा प्रसरण पावत नाही. ज्यावेळी अलिंदे आकुंचन पावलेली असतात त्यावेळी निलये मात्र प्रसरण पावलेली असतात. त्याचप्रमाणे, ज्यावेळी निलये आकुंचन पावलेली असतात त्यावेळी अलिंदे प्रसरण पावलेली असतात.
हृदयाच्या आकुंचनाला Systole म्हणतात, तर हृदयाच्या प्रसारणाला Diastole म्हणतात.

◾️हृदयाचे ठोके (Heart Beats):
हृदयाचे एकदा आकुंचन व प्रसरणाचे एकचक्र म्हणजे हृदयाचा एक ठोका होय.
एका ठोक्यासाठी ०.८ सेकंद लागतात.
प्रौढ व्यक्तींमध्ये – ६० ठोके / मिनिट
झोपेत असताना – ५५ ठोके / मिनिट लहान मुलांमध्ये – १२०-१६० ठोके/ मिनिट
हृदयाच्या ठोक्यांची सुरुवात (Origin Of heart Beat) – ठोक्याची सुरुवात उजव्या कर्णिकेवरील Sino-Auricular node (S-A Node) मध्ये होते. त्याला pacemaker असे म्हणतात.
हृदयाच्या ठोक्यांचा दर अनियंत्रित असेल तर तो नियंत्रित करण्यासाठी Pacemaker नावाचेच इलेक्ट्रिक यंत्र शरीरात त्वचेखाली बसवतात.
ठोके मोजण्यासाठी Sthethescope वापरला जातो.
ठोक्यांच्या स्पंदनांचा आलेख काढण्यासाठी ECG (Electro Cardio Gram) चा वापर केला जातो. अनियमित ठोक्यांच्या निदानासाठी
1) ECG – ठोक्यांच्या स्पन्दनांचा आलेख
2) CT Scan – Computerised Tomography
3) MRI – Magnetic Resonance Imaging

◾️रक्तदाब (Blood Pressure) :
रक्तदाब Sphygmo manometer मध्ये मोजतात.
साधारण रक्तदाब (Normal B.P.) = 120/80 mm Of Hg असतो. तर हृदयाच्या प्रसरणाच्या वेळी तो 80 mm of Hg असतो.
उच्च रक्तदाब (High B.P.) = 160/95 mm of Hg पेक्षा जास्त
कमी रक्तदाब (Low B.P.) = 100/60 mm of Hg पेक्षा कमी रक्तवाहिन्यांमधील रक्तदाब उतरत्या क्रमाने पुढीलप्रमाणे असतो.
धमनी -केशवाहिन्या – शिरा / नीला
रक्तभिसरणाचा मार्ग: शरीरात हृदयाच्या एका ठोक्यादरम्यान हृदय रक्ताभिसरणाच्या दोन क्रिया घडवून आणते ; १) फुफ्फुस रक्तभिसरण २) देह रक्तभिसरण

१) फुफ्फुसी रक्तभिसरण (Pulmonary Circulation)
या क्रियेमध्ये ऑक्सिजनविरहित रक्त हृदयाकडून फुफ्फुसांकडे नेले जाते व ते जेथे ऑक्सिजनयुक्त झाल्यावर परत हृदयाकडे आणले जाते.
या क्रियेत पुढील टप्पे येतात: शरीराच्या सर्व भागाकडून  उजव्या अलिंदात आलेले ऑक्सिजनविरहित रक्त ->उजव्या निलयामध्ये ->तेथून फुफ्फुस धमन्यांद्वारे फुफ्फुसांकडे उच्च दाबाने पोहोचविले जाते -> फुफ्फुसांमध्ये वायूंची अदलाबदल होऊन रक्त ऑक्सिजनयुक्त बनते -> ऑक्सिजनयुक्त रक्त फुफ्फुस शिरांद्वारे हृदयाच्या डाव्या अलिंदाकडे

२) देह रक्ताभिसरण (Systemic Circulation)
या क्रियेमध्ये ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयाकडून शरीराच्या सर्व पेशींकडे पोहोचविले जाते आणि पेशींकडून ऑक्सिजनविरहित आणि कार्बन डायॉकसाईडयुक्त रक्त जमा केले जाऊन ते हृदयाकडे परत आणले जाते.
या क्रियेत पुढील टप्पे येतात:
डाव्या अलिंदात जमा झालेले ऑक्सिजनयुक्त रक्त -> डाव्या निलयात उतरते -> जात भिंतींचे डावे निलय उच्च दाबाने त्यास महाधमनीत पाठवते -> तेथून ते शरीराच्या सर्व पेशींकडे पोहोचविले जाते->तेथे वायूंची अदलाबदल होते आणि ऑक्सिजनविरहित रक्त उर्ध्व आणि अधोशिरांद्वारे उजव्या अलिंदात जमा होते.

◾️Heart Surgery:
पहिले हृदय प्रत्यारोपण (1st Human-ti-Human Heart Transplant) 3 डिसेंबर 1967 मध्ये दक्षिण आफ्रिकेत ख्रिश्चन बर्नार्ड यांनी Groote Schuur Hospital येथे घडवून आणले.
भारतातील पहिले हृदयाचे सफल प्रत्यारोपण डॉ. पी. वेणुगोपाल यांनी घडवून आणले.
भारतातील पहिली Open Heart Surgery – Christian Medical Collage, Vellore (1959)येथे घडवून आणण्यात आली.

◾️हृदयरोग (Heart Diseases):
जन्मतःच हृदयात दोष असणे (Congenital heart disease)-
जन्मतःच हृदयात दोष असणाऱ्या मुलांना Blue Baby असे म्हणतात. कारण, त्यांचे ओठ, नखे तसेच, त्वचा निळसर रंगाची बनते.

Latest post

महाराष्ट्रातील घाट आणि ठिकाण

1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर 4) हनुमंते घाट - कोल्हापुर...