Monday 14 October 2019

रासायनिक सूत्र (Chemical Formula)

✶ साधारण नमक ➠ NaCl
✶ बेकिंग सोडा ➠ NaHCO₃
✶ धोवन सोडा ➠ Na₂CO₃·10H₂O
✶ कास्टिक सोडा ➠ NaOH
✶ सुहागा ➠ Na₂B₄O₇·10H₂O

✶ फिटकरी➠ K₂SO₄·Al₂(SO₄)₃·24H₂O
✶ लाल दवा ➠ KMnO₄
✶ कास्टिक पोटाश ➠ KOH
✶ शोरा ➠ KNO₃
✶ विरंजक चूर्ण ➠ Ca(OCl)·Cl

✶ चूने का पानी ➠ Ca(OH)₂
✶ जिप्सम ➠ CaSO₄·2H₂O
✶ प्लास्टर ऑफ पेरिस ➠ CaSO₄·½H₂O
✶ चॉक ➠ CaCO₃
✶ चूना-पत्थर ➠ CaCO₃

✶ संगमरमर ➠ CaCO₃
✶ नौसादर ➠ NH₄Cl
✶ लाफिंग गैस ➠ N₂O
✶ लिथार्ज ➠ PbO
✶ गैलेना ➠ PbS

✶ लाल सिंदूर ➠ Pb₃O₄
✶ सफेद लेड ➠ 2PbCO₃·Pb(OH)₂
✶ नमक का अम्ल ➠ HCl
✶ शोरे का अम्ल ➠ HNO₃
✶ अम्लराज ➠ HNO₃ + HCl (1 : 3)

✶ शुष्क बर्फ ➠ CO₂
✶ हरा कसीस ➠ FeSO₄·7H₂O
✶ हॉर्न सिल्वर ➠ AgCl
✶ भारी जल ➠ D₂O
✶ प्रोड्यूशर गैस ➠ CO + N₂

✶ मार्श गैस ➠ CH₄
✶ सिरका ➠ CH₃COOH
✶ गेमेक्सीन ➠ C₆H₆Cl₆
✶ नीला कसीस ➠ CuSO₄·5H₂O
✶ ऐल्कोहॉल ➠ C₂H₅OH

✶ मण्ड ➠ C₆H₁₀O₅
✶ अंगूर का रस ➠ C₆H₁₂O₆
✶ चीनी ➠ C₁₂H₂₂O₁₁
✶ यूरिया ➠ NH₂CONH₂
✶ बेंजीन ➠ C₆H₆
✶ तारपीन का तेल ➠ C₁₀H₁₆

राफेल विमानाची वैशिष्ट्ये

1. राफेलला प्रत्येत मोहिमेवर पाठवता येऊ शकते.

2. 60 हजार फुटांपर्यंत हे विमान उड्डाण करू शकतं. तसंच याची इंधन क्षमता 17 हजार किलो आहे.
हे विमान एका मिनिटात 60 हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकतं. याची इंधन क्षमता 17 हजार किलो आहे

3. मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणूनही हे विमान ओळखलं जातं. तसंच वेगवेगळ्या हवामानात हे विमान काम करू शकतं.

4. यामध्ये स्काल्प मिसाईल आहे, जे हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे.

5. राफेलची मारक क्षमता 3 हजार 700 किलोमीटरपर्यंत आहे, तर स्काल्पची रेंज 300 किलोमीटर आहे.

6. राफेल विमानाचा वेग 2,223 किलोमीटर प्रति तास आहे.

7. हे अँटी शिप हल्ल्यापासून अणुबॉम्ब हल्ल्यापर्यंत, क्लोज एअर सपोर्ट आणि लेजर डायरेक्ट लॉन्ग रेंज मिसाईल अॅटॅकमध्येही अव्वल आहे.

8. राफेल विमान 24 हजार 500 किलोपर्यंत वजन घेऊन जाऊ शकतं आणि 60 तासांचं अतिरिक्त उड्डाणही करु शकतं.

चालू घडामोडी प्रश्नसंच 15/10/2019

📌कोणत्या केंद्रीय सरकारी रुग्णालयाने ‘कायाकल्प पुरस्कार 2018-19’ जिंकला?

(A) जवाहरलाल स्नातकोत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था (JIPMER), पुडुचेरी

(B) वैद्यकीय शिक्षण व संशोधन स्नातकोत्तर संस्था (PGIMER), चंदीगड

(C) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), दिल्ली✅✅✅

(D) इंदिरा गांधी प्रादेशिक आरोग्य व वैद्यकीय विज्ञान संस्था (NEIGRIHMS), शिलांग

📌2019 या वर्षी आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिनाची संकल्पना काय होती?

(A) रिड्यूस डिझास्टर डॅमेज टू क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर अँड डिसरप्शन ऑफ बेसिक सर्व्हिसेस✅✅✅

(B) रिड्यूसींग डिझास्टर इकनॉमिक लॉसेस

(C) होम सेफ होम

(D) लिव्ह टू टेल: राईसिंग अवेयरनेस, रिड्यूसींग मोर्टेलिटी

📌_____ येथे भारत आपले पहिले ऑलम्पिक हॉस्पिटॅलिटी हाऊस उभारणार आहे.

(A) पॅरिस
(B) बिजींग
(C) टोकियो✅✅✅
(D) लंडन

📌‘धर्म गार्डियन 2019’ विषयी खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे?

I) ‘धर्म गार्डियन’ हा वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आहे जो 2015 या सालापासून भारतात घेतला जातो.

II) ‘धर्म गार्डियन’ हा भारत, रशिया आणि जापान या देशांच्या दरम्यानचा तिरंगी लष्करी सराव आहे.

(A) केवळ I
(B) केवळ II
(C) I आणि II दोन्ही
(D) यापैकी एकही नाही✅✅✅

📌पृथ्वीच्या वातावरणामधला आयनोस्फीयर या थराचा अभ्यास करण्यासाठी NASAने पाठवविलेल्या उपग्रहाचे नाव काय आहे?

(A) ICON✅✅✅
(B) SEO
(C) IONO
(D) INO

📌भारत आणि _ या देशांच्या नौदलांचा ‘2019 कोऑर्डिनेटेड पेट्रोल (CORPAT)’ नावाचा सागरी सराव आयोजित केला गेला.

(A) ऑस्ट्रेलिया
(B) बांग्लादेश✅✅✅
(C) चीन
(D) मालदीव

📌पृथ्वीवरील कार्बनच्या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी आयोजित केल्या गेलेल्या जागतिक संशोधनपर कार्यक्रमाचे नाव काय आहे?

(A) कार्बन रिसर्च प्रोग्राम
(B) डीप कार्बन ऑब्जर्व्हेटरी✅✅✅
(C) कार्बन अर्थ प्रोग्राम
(D) कार्बन फॉर अर्थ

📌कोणते राज्य सरकार राज्यामधील मुलींच्या सक्षमीकरणासाठी कन्याश्री विद्यापीठाची स्थापना करणार आहे?

(A) केरळ
(B) पश्चिम बंगाल✅✅✅
(C) ओडिशा
(D) आसाम

प्रार्थना समाजाची स्थापना व तत्त्वज्ञान

🌸दादोबा पांडूरंग व डॉ. आत्माराम पांडूरंग यांच्या पुढाकाराने ३१ मार्च १८६७ मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापन करण्यात आला. प्रार्थना समाजाचे तत्त्वज्ञान पुढीलप्रमाणे होते.

🌸परमेश्वर एक असून तो विश्वाचा निर्माता आहे. तो निराकार आहे. तो दयाळू आहे. तो सर्वांवर प्रेम करतो.

🌸सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहेत. या मार्गानेच गेल्यानंतर तो प्रसन्न होतो.

🌸प्रार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही, मात्र प्रार्थनेमुळे आध्यात्मिक उन्नती होते.

🌸परमेश्वर अवतार घेत नाही. त्याने कोणताही धर्मग्रंथ लिहिला नाही.

🌸मूर्तिपूजा परमेश्वरास मान्य नाही.

🌸सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. म्हणूनच सर्वांनी बंधुत्त्वाच्या भावनेने एकमेकांशी व्यवहार करावा.

🔶प्रार्थना समाजाचे कार्य🔶

🌺प्रार्थना समाजाने अस्पृश्यता निर्मूलन, स्त्रीशिक्षण, विधवा विवाह, आंतरजातीय विवाह इत्यादी क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली. श्री. आर. जी. भांडारकर व न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे हे प्रार्थना समाजाचे मुख्य आधारस्तंभ होते.

🌺न्या. रानडे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करुन भारतीय जनतेत राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार केला. त्यांनी विधवा विवाह मंडळ स्थापन केले.

🌺ना. म. जोशी यांनी “सोशल सर्व्हिस लीग” स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले.

🌺देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी “सर्व्हंटस ऑफ इंडिया सोसायटी” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निर्मूलनच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.

🌺अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निवारणाच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.

🌺प्रार्थना समाजाच्या वतीने पंढरपूर येथे “अनाथ बालकाश्रम” काढण्यात आला. समाजाच्या गरजेच्या दृष्टीने ही भरीव कामगिरी होती.

🌺मुलींच्यासाठी स्वतंत्र शाळा सुरु केल्या. “आर्य महिला समाज” ही स्त्रियांसाठी कार्य करणारी संस्था चालू करण्यात आली.

🌺४ मे १८७३ रोजी प्रार्थना समाजाने “सुबोध पत्रिका” हे त्यांचे मुखपत्र सुरु केले होते. या मुखपत्रातून सामाजिक व राजकीय विचार मांडले जात होते.

🌺मजुरांच्यासाठी पहिली रात्रशाळा मुंबईमधील चेऊलवाडी येथे भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांच्या पुढाकाराने इ. स. १८७६ मध्ये काढण्यात आली होती. त्यानंतर मुंबईच्या इतर भागात देखील रात्रशाळा काढण्यात आल्या.

🌺इ. स. १८९० रोजी मुंबईतील मदनपुरा येथे अस्पृश्यांसाठी शाळा काढण्यात आली.

🌺इ. स. १८७६-७७ च्या दुष्काळाच्या वर्षी प्रार्थना समाजाने दुष्काळ पीडितांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले होते. अशा रीतीने प्रार्थना समाजाने एक भरीव सामाजिक कार्य केल्याचे आढळते.

🌺प्रार्थना समाजाची तत्वे पटवून देण्यासाठी, या समाजाबद्दल लोकांना असलेल्या निरनिराळ्या शंकाचे निरसन करण्यासाठी न्या. रानडे यांनी “एकेश्वरनिष्ठांची कैफियत” हा विचार प्रवर्तक ग्रंथ लिहीला.

🔶प्रार्थना समाजाच्या कार्याचे मूल्यमापन🔶

🌺प्रार्थना समाजाला चांगले नेतृत्व लाभूनही ठराविक शहरापुरतेच त्याचे कार्य पोहचू शकले. त्याचे कारण म्हणजे त्यातील सुधारक मिशनऱ्यांचे अनुकरण करीत होते. त्यामुळे हिंदूना त्यांच्या कार्याविषयी कधीच आपुलकी वाटली नाही.

दहावी पंचवार्षिक योजना

कालावधी : 1 एप्रिल,2002 ते 31 मार्च, 2007

मुख्यभर : शिक्षण व प्राथमिक शिक्षण

गांधीवादी प्रतिमान

सर्वसामान्य विकासाचे धोरण.

प्राधान्य देण्यात आलेले क्षेत्र :

1. ऊर्जा-25%

2. सामाजिक सेवा-22.8%

3. कृषि व ग्रामीण विकास-20%

4. वाहतूक-14.8%

अपेक्षा वृद्धी दर : 8%

प्रत्यक्ष वृद्धी दर : 7.8%

योजनेची लक्ष्ये :

1. GDP च्या वाढीच्या दराचे लक्ष्य- प्रतिवर्षी 8%

2. दरिद्रय रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण 2007 पर्यंत 21% तर 2012 पर्यंत 11% पर्यंत कमी करणे. Telegram MPSCUnacademy

3. 2001 ते 2011 या दशकातील लोकसंख्या वाढीचा दर 16.2% पर्यंत कमी करणे.

4. साक्षरतेचे प्रमाण 2007 पर्यंत 75% पर्यंत तर 2012 पर्यंत 80% पर्यंत वाढविणे.

5. माता मृत्यू प्रमाण (MMR) 2007 पर्यंत दर हजारी 45 पर्यंत तर 2012 पर्यंत दर हजारी 28 पर्यंत कमी करणे.

6. बाळमृत्यू प्रमाण (IMR)2007 पर्यंत दर हजारी 45 पर्यंत तर 2012 पर्यंत दर हजारी 28 पर्यंत कमी करणे.

7. 2003 पर्यंत सर्व मुले शाळेत हजर तर 2007 पर्यंत सर्व मुलींना 5 वर्षाचा शालेय अभ्यासक्रम पूर्ण करावा, हे साध्य करणे.

8. 2012 पर्यंत सर्व खेड्यांना शाश्वत स्वच्छ पेयजल पुरवठा.

9. 2007 पर्यंत सर्व मोठ्या प्रदूषित नद्यांची स्वच्छता. Telegram MPSCUnacademy

योजनेत सुरू करण्यात आलेल्या योजना :

1. सामाजिक सुरक्षा प्रायोगिक योजना : (social security pilot scheme) (23 जानेवारी 2014)

2. वंदे मातरम योजना : (9 फेब्रुवारी 2014 )

3. राष्ट्रीय कामगार अन्न योजना : (national food for work programme) (14 नोव्हेंबर 2004)

4. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना : (National Rural Employment Guarantee scheme) (2 फेब्रुवारी 2004)

5. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान : (jawaharlal Nehru National Urban Renewal Mission : JNNURM) (3 डिसेंबर 2005)

योजनेची फलनिष्पती :

1. दहाव्या योजनेदरम्यान 7.6% एवढी सरासरी वर्षीक वृद्धी दर प्राप्त झाला.

2. उद्योग व सेवा या अर्थव्यवस्थांच्या दोन प्रमुख क्षेत्रांमध्ये दहाव्या योजनेदरम्यान प्राप्त करण्यात आलेली वृद्धी दर जवळजवळ साध्य झाला.

3. कृषि क्षेत्र 4% वार्षिक वृद्धीचे लक्ष्य होते. साध्य प्राप्त आकड्यांनुसार केवळ 2.13% एवढा वृद्धी दर प्राप्त झाला.

4. सध्य प्राप्त आकड्यांनुसार या योजनेत चालू किमतीची गुंतवणूक दर जीडीपीच्या 30.8% राहिला, त्याचे लक्ष्य 28.41% एवढे होते.

5. योजना कालावधीत चलन वाढीचा दर सरासरी 5% ठेवण्याचे लक्ष्य होते. मात्र प्रत्यक्षात तो 5.1% एवढा ठरला.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘तिने भिका-याला पैसा दिला’, हे वाक्य क्रियापदांच्या कोणत्या प्रकारातील आहे ?

   1) विधानपूरक      2) फक्त सकर्मक      3) व्दिकर्मक    4) उभयविध

उत्तर :- 3

2) अ) त्याचे वागणे त्याच्या बोलण्याच्या बरोबर विरुध्द होते.
    ब) सभेतील मतदानाच्या वेळी तिने ठरावाविरुध्द मत नोंदवले.
          या दोन वाक्यातील अव्यये कोणती आहेत ?

   1) शब्दयोगी व क्रियाविशेषण    2) क्रियाविशेषण अव्यय व शब्दयोगी
   3) दोन्ही शब्दयोगी      4) दोन्ही क्रियाविशेषण अव्यये

उत्तर :- 2

3) वाघ माझ्यासमोरून गेला – या वाक्यातील अव्ययाचा प्रकार निवडा.

   1) उभयान्वयी अव्यय    2) शब्दयोगी अव्यय   
   3) क्रियाविशेषण अव्यय    4) केवलप्रयोगी अव्यय

उत्तर :- 2

4) ‘देह जावो अथवा राहो | पांडूरंगी दृढ भावो’
      या संतवचनात .................... या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे.

   1) विकल्पबोधक    2) न्यूनत्वबोधक      3) कारणबोधक    4) उद्देशबोधक

उत्तर :- 1

5) खालील किती शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यये आहे.

     ऊं, ॲ:, अरेरे, अयाई, अगाई, हाय

   1) पाच        2) चार        3) सर्व      4) तीन

उत्तर :- 3

6) योग्य पर्याय निवडा.
     काव्यात ......................... विशेष महत्त्व असते.

   1) व्यंगार्थाला    2) लक्ष्यार्थाला   
   3) वाच्यार्थाला    4) अभिधा

उत्तर :- 1

7) पुढीलपैकी वेगळा गट ओळखा.

   1) मंगल – अमंगल    2) जबाबदार – बेजबाबदार   
   3) तक्रार – विनातक्रार    4) होकारार्थी – सकारार्थी

उत्तर :- 4

8) दिलेल्या पर्यायातून पुढील शब्दासाठी विरुध्दार्थी शब्द कोणता ? – ‘भंजक’

   1) भयाण    2) भंगूर     
   3) विध्वंसक    4) निर्माता

उत्तर :- 4

9) ‘ऐकावे जनाचे, करावे मनाचे’ या म्हणीचा अर्थ –

   1) सर्वांचे ऐकूणच काम करावे    2) सर्वांशी चर्चा करावी
   3) काही करण्यापूर्वी लोकांना विचारावे  4) सर्वांचा विचार घ्यावा पण स्वत:ला योग्य वाटेल तेच करावे

उत्तर :- 4

10) अचूक वाक्प्रचाराचा पर्याय सुचवा : अंग टाकणे

   1) पत्करणे    2) झाकणे   
   3) लपविणे    4) रोडावणे

उत्तर :- 4

20 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे 15/10/2019


1.कोणाचा जन्मदिन ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो?

 बालकवी ठोंबरे

 कुसुमाग्रज

 राम गडकरी

 बालगंधर्व

उत्तर : कुसुमाग्रज

 2. सन 2014 ची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कोणी जिंकली?

 श्रीलंका

 भारत

 ऑस्ट्रेलिया

 बांग्लादेश

उत्तर :श्रीलंका

 3. उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणास आहेत?

 राष्ट्रपती

 राज्यपाल

 अॅटर्नी जनरल

 सरन्यायाधिश

उत्तर :राष्ट्रपती

 4. घटनेच्या कितव्या कलमानुसार जम्मू आणि काश्मिरला खास दर्जा देण्यात आल आहे?

 360

 368

 369

 370

उत्तर :370

 5. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील सदस्यांची संख्या किती आहे?

 238

 250

 78

 288

उत्तर :78

 6. खालीलपैकी कोणाकडून लोकसभा सदस्यांना शपथ दिली जाते?

 पंतप्रधान

 भारताचे सरन्यायाधिश

 लोकसभा सभापती

 राष्ट्रपती

उत्तर :राष्ट्रपती

7. खालीलपैकी कोणती संस्था स्थानिक स्वराज्य संस्था नाही?

 नगरपालिका

 महानगरपालिका

 कटक मंडळ

 राज्य परिवहन महामंडळ

उत्तर :राज्य परिवहन महामंडळ

 8. गावात घडलेल्या गुन्ह्यासंबंधीची कागदपत्रे कोण तयार करतो?

 तलाठी

 कोतवाल

 ग्रामसेवक

 पोलिस पाटील

उत्तर :पोलिस पाटील

 9. महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते आहे?

 पोलीस महानिरीक्षक

 पोलीस महासंचालक

 पोलीस आयुक्त

 अपर पोलीस महासंचालक

उत्तर :पोलीस महासंचालक

 10. खालीलपैकी कोणास ‘स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक’ असे म्हटले जाते?

 लॉर्ड रिपन

 लॉर्ड लिटन

 लॉर्ड डफरीन

 लॉर्ड कर्झन

उत्तर :लॉर्ड रिपन

 11. ‘संवादकौमुदी’ या पाक्षिकातुन सतीच्या अनिष्ट रूढीविरुद्ध लिखाण कोणी केले?

 राजा राममोहन रॉय

 महात्मा ज्योतीबा फुले

 ईश्वरचंद्र विद्यासागर

 स्वामी दयानंद सरस्वती

उत्तर :राजा राममोहन रॉय

 12. मंडालेच्या तुरुंगात असतांना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला?

 आर्टिक होम इन दी वेदाज

 गीतारहस्य

 ओरायन

 प्रतियोगीता सहकार

उत्तर :गीतारहस्य

 13. खालीलपैकी कोणता मुगल सम्राट शेवटचा आहे?

 अकबर

 बाबर

 जहांगीर

 औरंगजेब

उत्तर :औरंगजेब

 14. एका संख्येमध्ये त्या संख्येच्या 1/5 मिळविल्यानंतर मूळ सख्या व येणारी संख्या यांचे गुणोत्तर प्रमाण किती राहील?

 6:5

 1:2

 5:2

 5:6

उत्तर :5:6

 15. अशी संख्या सांगा जिच्यामध्ये 19 वेळा बेरीज मिळवली असता येणारी संख्या 420 राहील?

 19

 20

 21

 15

उत्तर :21

 16. एक घर 2250 रु. विकल्यामुळे एका व्यक्तीस 10% तोटा सहन करावा लागला. त्यात 8% नफा मिळविण्यासाठी घर कितीला विकावे लागेल?

 2700 रु.

 2500 रु.

 2000 रु.

 यापैकी नाही

उत्तर :2700 रु.

 17. मधुने इंग्रजीत 60 पैकी 42, गणितात 75 पैकी 57, मराठीत 80 पैकी 56 आणि शास्त्रात 50 पैकी 32 गुण मिळविले तर तिचा कोणता विषय सर्वात चांगला आहे.

 इंग्रजी

 गणित

 शास्त्र

 मराठी

उत्तर :गणित

 18. 38 मुलींच्या वर्गात 6 मुली गैरहजर होत्या, उरलेल्या पैकी 12.50 टक्के मुली गृहकार्य करण्यास विसरल्या तर किती मुलींनी गृहकार्य केले?

 28

 24

 32

 36

उत्तर :28

 19. 2000 रु. द.सा.द.शे. 10% दराने 3 वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढव्याज यांच्यातील फरक किती?

 50 रु.

 67 रु.

 62 रु.

 57 रु.

उत्तर :62 रु.

 20. 21 मीटर त्रिजेच्या वर्तुळावर मैदानात 5 फेर्‍या मारल्यास एकूण किती अंतर तोडले जाईल?

 210 मी.

 132 मी.

 660 मी.

 105 मी.

उत्तर :660 मी.

मुंबईतील 'या' 3 वास्तूंना युनेस्कोचा पुरस्कार


⚡ मुंबईतील फ्लोरा फाउंटन, नेसेट एलियाहू सिनागोग, आवर लेडी ऑफ ग्लोरी चर्च आणि अहमदाबादमधील विक्रम साराभाई लायब्ररी आणि इंडियन इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अशा भारतातील चार हेरिटेज वास्तूंना युनेस्कोचा यंदाचा एशिया-पॅसिफिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

💁‍♂ सांस्कृतिक वारसा स्थळांचं जतन व संवर्धनासाठी युनेस्कोकडून दरवर्षी पुरस्कार दिले जातात.

👀 *16 वास्तूंना पुरस्कार* : यंदा भारत, भूतान, चीन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील 16 वास्तूंना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

👍 या पुरस्कारासाठी 14 देशांमधून 57 वास्तूंची नोंदणी करण्यात आली होती. त्यातून या 16 वास्तू निवडण्यात आल्या आहेत.

अर्थशास्त्राचं नोबेल मिळवणारे अभिजित बॅनर्जी आहेत तरी कोण, जाणून घ्या

अमर्त्य सेन यांच्यानंतर अर्थशास्त्रातला नोबेल मिळवणारे दुसरे भारतीय अर्थशास्त्रज्ञ

🔸भारतीय वंशाचे अभिजित बॅनर्जी यांना २०१९ चा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. जगातलं दारिद्र्य दूर व्हावं यासाठी ‘अब्दुल लतिफ जमील पॉव्हर्टी अॅक्शन लॅब’च्या माध्यमातून प्रयत्न केल्याबद्दल बॅनर्जी यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. 

 हा पुरस्कार तिघांना विभागून देण्यात आला आहे. अभिजित यांच्याबरोबरच त्यांची पत्नी इस्थर डफलो आणि सहकारी मायकल क्रेमर या या तिघांनाही अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जागतिक दारिद्र्य दूर करण्यासाठी प्रायोगिक दृष्टिकोनातून काम करणाऱ्यांचा हा गौरव असल्याचे नोबेल पुरस्कार समितीने म्हटले आहे. जाणून घेऊयात कोण आहेत अभिजित बॅनर्जी…

🔸अभिजित बॅनर्जी यांचा जन्म २१ फेब्रवारी १९६१ रोजी कोलकात्यामध्ये झाला.

🔸कोलकत्ता येथील सेंटर फऑर स्टडीज इन सोशल सायन्समध्ये अभिजित यांची आई निर्माला या प्राध्यापक होत्या. तर वडील दिपक हे कोलकात्यामधील प्रेसिडेन्सी महाविद्यालयामधील अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख होते.

🔸सध्या ते अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (एमआयटी) फोर्ड फाऊण्डेशन इंटरनॅशनलचे प्राध्यापक म्हणून काम करतात.

🔸अभिजित हे ‘अब्दुल लतिफ जमील पॉव्हर्टी अॅक्शन लॅब’चे संस्थापक आहेत. इस्थर डफलो आणि सेंडील मुल्लीनाथन यांच्या सोबतीने बॅनर्जी यांनी या संस्थेची स्थापना केली आहे. गरिबीवर मात करण्यासाठी काय करता येईल यासंदर्भातील संसोधन ही संस्था करते.

🔸अभिजित यांनी १९८१ साली आपली अर्थशास्त्रमधील बीएस पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनातर त्यांनी १९८३ साली जवाहरलाल नेहरु विद्यापिठामधून एमएची पदवी घेतली. त्यानंतर १९८८ साली ते पीएचडी करण्यासाठी हार्वर्ड विद्यापिठात गेले.

🔸हार्वर्ड विद्यापीठ आणि प्रिन्सटॉन विद्यापिठामध्ये प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर आता ते मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतात.

🔸विकासावादी अर्थव्यवस्था हा अभिजित यांचा कोअर सबजेक्ट आहे. अर्थव्यवस्थेशी आधारित विविध घटकांचा तिच्यावर कसा परिणाम होतो याचा त्यांनी अभ्यास केला आहे.

🔸२००४ साली त्यांना अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अॅण्ड सायन्सची फेलोशीप मिळाली.

🔸आर्थिक क्षेत्रातील संसोधनासाठी २००९ साली त्यांना इन्फोसेस पुरस्काराने गौरवण्यात आले.

🔸२०१२ मध्ये अभिजित यांना ‘पूअर इकनॉमिक्स’ या पुस्तकासाठी सह-लेखक एस्तेर ड्यूफलो यांच्यासमवेत ‘जेरल्ड लोब अवॉर्ड’ सोहळ्यात विशेष पुरस्कार मिळाला.

🔸२०१३ मध्ये संयुक्त राष्ट्राचा सरचिटणीस बान की-मून यांनी २०१५ नंतरची विकास उद्दिष्टांसंदर्भात काम करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तज्ञांच्या समितीमध्ये अभिजित यांनी नियुक्ती केली होती.

🔸२०१९ मध्ये त्यांनी एक्सपोर्ट-इंपोर्ट बँक ऑफ इंडियामार्फत आयोजित एका कार्यक्रमात सामाजिक धोरणांची पुन:बांधणी या विषयावर एक लेक्चर दिले होते.

🔸अभिजित यांनी एमएयटीमध्ये प्राध्यापिका असणाऱ्या डॉ. अरुंधती बॅनर्जी यांच्याबरोबर लग्न केले. हे दोघेही बालपणापासून मित्र होते. या दोघांना २० फेब्रुवारी १९९१ रोजी पुत्ररत्न प्राप्ती झाली. मात्र नंतर अभिजित आणि अरुंधती यांचा घटस्फोट झाला. २०१६ साली त्यांचा एकुलता एक मुलगा कबीर याचा आकस्मिक मृत्यू झाला.

🔸अभिजित यांनी त्यांची सहकारी मायकल क्रेमर यांच्यासोबत २०१५ साली लग्न केले. मात्र त्याआधीपासूनच ते एकत्र राहत होते. २०१२ साली त्यांना एक मुलगा झाला. त्यानंतर तीन वर्षांनी ते लग्न बंधनात अडकले.

अभिजित यांनी लिहिलेली पुस्तके

१)Volatility And Growth

२)Understanding Poverty

३)Making Aid Work. Cambridge: MIT Press

४)Poor Economics: A Radical Rethinking of the Way to Fight Global Poverty

५)Handbook of Field Experiments, Volume 1

६)Handbook of Field Experiments, Volume 2

७)A Short History of Poverty Measurements

अभिजित यांना अब्दुल लतिफ जमील पॉव्हर्टी अॅक्शन लॅबसाठी मिळालेली संस्था करते काय

अभिजित आणि त्यांच्या सहकाऱ्यांने स्थापन केलेली ही संस्था म्हणजे एक संसोधन केंद्र आहे. येथे जगातील गरिबीवर मात करण्यासाठी काय करता येईल याबद्दल विज्ञानाचा आधार घेऊन संशोधन केले जाते. ही संस्था देशभरातील अनेक सरकार, सेवाभावी संस्था, स्वयंसेवक आणि वेगवेगळ्या संस्थांच्या सोबतीने गरिबी हटवण्यासंदर्भात काय काय करता येईल याबद्दलचे काम करते. २०१८ पर्यंत ४०० दशलक्ष लोकांनी या संस्थेशी संबंधित कामाचा फायदा झाला आहे.

2020 टोकियो ऑलम्पिकसाठी भारत प्रथमच ऑलम्पिक आतिथ्यगृह उघडणार

- टोकियो (जापान) या शहरात होणार्‍या ‘2020 उन्हाळी ऑलम्पिक’ स्पर्धेदरम्यान भारतीय खेळाडूंना आणि काही विशेष अतिथिंच्या सुविधेसाठी ऑलम्पिकच्या इतिहासात भारताने प्रथमच ‘इंडिया हाऊस’ या नावाने एका ऑलम्पिक आतिथ्यगृहाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे.

▪️आस्थापनेबद्दल

- आरिआके या ठिकाणी उघडण्यात येणाऱ्या इंडिया हाऊसच्या जवळ चार खेळांचे आयोजन स्थळसुद्धा होणार आहे.

- JSW ग्रुप या उद्योग समूहाच्या सहकार्याने भारतीय ऑलम्पिक संघ (IOA) ही सुविधा उभारणार आहे.

- ऑलम्पिकमध्ये भाग घेणार्‍या अनेक देशांचे स्वतःचे आतिथ्यगृह आहेत, पण एखाद्या देशाने आपला सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करण्याची ही पहिली वेळ ठरणार आहे. यामध्ये भारतीय संस्कृती, कला, पाककृती आणि योग प्रदर्शन या बाबींचा समावेश असणार आहे.

- इंडिया हाऊसमध्ये भारतीय पाहुणचाराबरोबरच भारतीय संघाचे ऑलम्पिकमधले प्रदर्शन आणि भारतीय संघाचा अधिकृत पोशाख याचेही प्रदर्शन घडविले
जाणार. त्याचबरोबर ऑलम्पिक पदक विजेत्या खेळाडूंचा विशेष सन्मान देखील IOA करणार आहे.

- इंडिया हाऊसमध्ये भारतीय खेळाडूंबरोबरच सर्वसामान्य लोकसुद्धा या हाऊसमध्ये येऊ शकणार आहेत. सकाळच्या सत्रात सर्वसामान्यांसाठी हे हाऊस उघडे ठेवण्यात येणार आहे. यादरम्यान योग प्रदर्शनाबरोबरच देशाने विविध खेळात केलेल्या विक्रमांचेही प्रदर्शन केले जाणार आहे.

Latest post

चालू घडामोडी :- 17 मार्च 2024

◆ काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे. ◆ 2025 मध्ये चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान ...