Saturday 28 September 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘कर’ या धातूपासून ‘मी करा’ या एकवचनी पद्यरूपाचे अनेकवचनी रीतिभूतकाळात रुपांतर कसे होईल. बरोबर पर्याय निवडा.

   1) आम्ही करू    2) मी करीन   
   3) मी करून    4) आम्ही करावे

उत्तर :- 1

2) पुढील शब्दाचे लिंग ओळखा. – पुरणपोळी

   1) स्त्रीलिंगी    2) पुल्लिंग   
   3) नपुंसकलिंगी    4) यापैकी नाही

उत्तर :- 1

3) षष्ठी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय खालीलपैकी कोणते आहेत ?

   1) ने, ए, ई, शी    2) ऊन, हून   
   3) त, ई, आ    4) चा, ची, चे

उत्तर :- 4

4) वाक्याचा प्रकार ओळखा. – ‘सर्वांनी शांत बसा.’

   1) संकेतार्थी    2) विध्यर्थी   
   3) संयुक्त    4) आज्ञार्थी

उत्तर :- 4

5) ‘एके दिवशी युध्द बंद झाल्याची बातमी येऊन धडकली,’ या वाक्यातील विधेय विस्तार कोणते ?

   1) धडकली    2) युध्द बंद झाल्याची    
   3) बातमी     4) येऊन, एके दिवशी

उत्तर :- 4

6) पुढीलपैकी मध्यमपदलोपी समास कोणता ?

   1) हसतमुख    2) पत्रव्यवहार   
   3) शोधग्राम    4) गृहसेवा

उत्तर :- 2

7) खालील चिन्हापैकी अर्धविराम कोणता ते ओळखा.

   1) ?      2) !     
   3) :      4) ;

उत्तर :- 4

8) शब्द बनणे किंवा सिध्द होणे याला काय म्हणतात ?

   1) शब्दबंध    2) शब्दार्थ   
   3) शब्दसाध्य    4) शब्दसिध्दी

उत्तर :- 4

9) दिलेल्या शब्दाचा ध्वन्यार्थ ओळखा.
     ‘थंड’

   1) गार      2) किनारा 
   3) आधात    4) गर्दी

उत्तर :- 2

10) ‘विहंग’ या शब्दाचा सध्या प्रचलित असणारा अर्थ :

   1) स्त्री      2) पक्षी     
   3) साप    4) आकाश

उत्तर :- 2

इराक भारताचा मुख्य तेल पुरवठादार देश

भारत सरकारच्या वाणिज्यिक गुप्तचर व सांख्यिकी महासंचालनालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, 2019-20 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत संयुक्त राज्ये अमेरिका या देशाकडून होणार्‍या कच्च्या तेलाच्या आयातीमध्ये 72 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

सध्या इराक, सौदी अरब, नायजेरिया आणि संयुक्त अरब अमिरात (UAE) हे भारताचे मुख्य कच्चे तेल पुरवठादार देश आहेत. पश्चिम आशियातल्या या पारंपारिक पुरवठादारांच्या पलीकडेही तेलाच्या खरेदीत विविधता आणण्याची योजना भारताने आखलेली असून आता अमेरिकेकडूनही तेलाची आयात केली जात आहे.

अन्य ठळक बाबी

🔸एप्रिल ते ऑगस्ट 2019 या कालावधीत अमेरिका या देशांनी सुमारे 4.5 दशलक्ष टन कच्चे तेलाचा पुरवठा भारताला केला.

🔸इराक हा देशाची कच्च्या तेलाची आवश्यकतेच्या जवळजवळ एक चतुर्थांश भाग पूर्ण करतो आणि तो देश भारताला तेल पुरवठा करणारा मुख्य देश आहे. इराकने एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत भारताला 21.24 दशलक्ष टन वजनी तेलाची विक्री केली.

🔸एप्रिल-ऑगस्ट 2019 या कालावधीत भारताने 91.24 दशलक्ष टन कच्च्या तेलाची आयात केली, जेव्हा की गेल्या वर्षी याच काळात हे प्रमाण 93.91 दशलक्ष टन एवढे होते.

🔸सौदी अरब हा देश पारंपारिकपणे भारताचा तेलासाठीचा सर्वोच्च स्रोत राहिला आहे, परंतु 2017-18 मध्ये त्याची जागा प्रथमच इराकने घेतली. सौदी अरब कडून भारताला 17.74 दशलक्ष टन कच्च्या तेलाचा पुरवठा झाला.

🔸अमेरिकेने मे महिन्यात आर्थिक निर्बंध घातल्यामुळे भारताने इराणकडून कच्च्या तेलाची आयात करणे थांबविलेले असून तेथून केवळ 2 दशलक्ष टन तेलाचीच आयात केली गेली.

🔸नायजेरियाने इराणची जागा घेत भारताकडे तेल पुरवठा करणार्‍या देशांमध्ये तिसरे स्थान मिळविले. एप्रिल-ऑगस्टमध्ये त्याने 7.17 दशलक्ष टन कच्च्या तेलाचा पुरवठा केला. त्यापाठोपाठ UAE (6.4 दशलक्ष टन) आणि व्हेनेझुएला (6.17 दशलक्ष टन) या देशांचा क्रम लागतो.

कलम 370 वरील याचिकांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून वेगळे घटनापीठ

◾️ जम्मू- काश्‍मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला कायदेशीर आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाल्या असून, यावर आता न्या. एन. व्ही. रामण्णा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे.

◾️सर्वोच्च न्यायालयानेच आज या घटनापीठाची स्थापना केली.

◾️ या घटनापीठामध्ये
📌 न्या. एस. के. कौल,
📌न्या. आर. सुभाष रेड्डी,
📌 न्या. बी. आर. गवई आणि
📌 न्या. सूर्यकांत यांचाही समावेश आहे. 

◾️या घटनापीठाची रीतसर सुनावणी ही 1 ऑक्‍टोबरपासून होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

◾️हे पाच सदस्यीय घटनापीठ केंद्र सरकारच्या 370 वे कलम रद्द करण्याच्या निर्णयाची घटनात्मक वैधता आणि त्यानंतर राष्ट्रपतींनी दिलेला आदेश याची पडताळणी करणार आहे.

◾️तत्पूर्वी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी 28 ऑगस्ट रोजी या संदर्भातील याचिकांची सुनावणी पाच सदस्यीय घटनापीठासमोर घेण्याचे निर्देश दिले होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भारतीय संघात रोहित शर्मा घेणार धोनीची जागा

📌महेंद्रसिंह धोनी भारतीय संघात खेळत नसताना, मर्यादीत षटकांच्या सामन्यात उप-कर्णधार रोहित शर्माच्या खांद्यावर आता मोठी जबाबदारी येणार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत ३ विजेतेपद मिळवली आहेत.

📌विराटच्या अनुपस्थितीत रोहितने भारतीय संघाचं नेतृत्व करत आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपलं नेतृत्व सिद्ध केलं आहे. यामुळे धोनीच्या अनुपस्थितीत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली रोहितने संघातील तरुण खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचं आणि मार्गदर्शन करण्याचं काम करावं अशी अपेक्षा करत आहेत.

📌“मैदानात काहीवेळा झटपट निर्णय घेण्याची आवश्यकता असते. रोहितने अशावेळी तरुण खेळाडूंशी बोलून, चर्चा करुन त्यांना मदत करावी अशी अपेक्षा आहे. संघामध्ये तुम्हाला समतोल राखायचा असतो. कर्णधाराला मदतीसाठी एका सिनीअर खेळाडूची गरज असते. धोनी संघात असताना कोहली आणि धोनी हे तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करायचे.

📌सध्या धोनी भारतीय संघात नसल्यामुळे रोहितने आपल्या अनुभवाचा फायदा संघातील तरुण खेळाडूंना करुन द्यावा असं सर्वांचं मत पडलं आहे.” संघ व्यवस्थापनातील सुत्राने IANS वृत्तसंस्थेशी बोलताना माहिती दिली._

इतिहास ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे

१)  १७७३ रेग्युलेटिंग अॅक्ट
२)  १८२२ कुळ कायदा
३)  १८२९ सतीबंदी कायदा
४)  १८३५ वृत्तपत्र कायदा
५)  १८५४ वूड्सचा शिक्षणविषयक खलिता
६)  १८५६ विधवा पुनर्विवाह कायदा
७)  १८५८ राणीचा जाहीरनामा
८)  १८५९ बंगाल रेंट अॅक्ट
९)  १८६० इंडियन पिनल कोड
१०) १८६१ इंडियन हायकोर्ट अॅक्ट

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

११)  १८७० आर्थिक विकेंद्रीकरण कायदा
१२)  १८७८ व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
१३)  १८८२ देशी वृत्तपत्र कायदा
१४)  १८८३ इलबर्ट बिल कायदा
१५)  १८८७ कुळ कायदा
१६)  १८९२ कौन्सिल अॅक्ट
१७)  १८९९ भारतीय चलन कायदा
१८)  १९०१ पंजाब लँड एलिनेशन कायदा
१९)  १९०४ भारतीय विद्यापीठ कायदा
२०)  १९०४ प्राचीन वस्तुजतन कायदा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

२१)  १९०४ सहकारी पतसंस्था कायदा
२२)  १९०९ मोर्ले मिंटो सुधारणा कायदा
२३)  १९१९ मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणाकायदा
२४)  १९१९ रौलेक्ट कायदा
२५)  १९३५ भारत सरकार कायदा
२६)  १९४४ राजाजी योजना
२७)  १९४५ वेव्हेल योजना
२८)  १९४५ त्रिमंत्री योजना
२९)  १९४७ माउंटबॅटन योजना
३०)  १९४७ भारतीय स्वातंत्र्याचा कायदा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

ब्रिटनच्या पंतप्रधानांचा संसदेत पुन्हा पराभव

✍ पक्षाच्या वार्षिक परिषदेसाठी संसदेचे कामकाज तीन दिवसांसाठी स्थगित करावे हा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा प्रस्ताव गुरुवारी खासदारांनी फेटाळल्याने जॉन्सन यांना आणखी एक धक्का बसला आहे. त्यामुळे ब्रेग्झिटपूर्वी जॉन्सन यांना संसदेत किती विरोध आहे हे स्पष्ट झाले आहे.

✍ पुढील आठवडय़ात जॉन्सन यांच्या कॉन्झव्‍‌र्हेटिव्ह पक्षाची वार्षिक परिषद होणार असून त्यासाठी संसदेचे कामकाज अल्पावधीसाठी स्थगित करावे ही जॉन्सन यांची सूचना खासदारांनी फेटाळली.

✍ जॉन्सन यांचा संसदेतील हा सातवा पराभव आहे.

✍ सर्व प्रमुख पक्षांच्या परिषदांच्या वेळी संसद अल्पावधीसाठी स्थगित केली जाते, मात्र ब्रेग्झिटमुळे खासदारांच्या मनात असलेल्या तणावाने आता परिसीमा गाठली आहे, त्यामुळेच विरोधी मतदान झाले आहे.

✍ जॉन्सन यांचा संसद पाच आठवडय़ांसाठी स्थगित करण्याचा निर्णय हा बेकायदेशीर असल्याचा निर्णय मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.

जागतिक स्नूकर स्पर्धा : अडवाणी-मेहता जोडीला विश्वविजेतेपद

◾️ सांघिक प्रकाराच्या अंतिम सामन्यात थायलंडवर मात

◾️भारताच्या पंकज अडवाणी आणि आदित्य मेहता जोडीने आव्हानात्मक थायलंडच्या संघाचा पराभव करीत बुधवारी ‘आयबीएसएफ’ जागतिक स्नूकर स्पर्धेतील सांघिक विजेतेपदावर नाव कोरले.

◾️ अडवाणीच्या खात्यावर हे २३वे जागतिक जेतेपद जमा झाले आहे. तंदुरुस्तीमुळे भविष्यापुढे प्रश्नचिन्ह उभ्या राहिलेल्या आदित्यचे हे पहिलेवहिले विश्वविजेतेपद ठरले.

◾️ ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद बिलियर्ड्स स्पध्रेसाठी जाण्यापूर्वी अडवाणी आठवडय़ाभरासाठी भारतात येणार आहे.

कलावरी क्लासची अद्ययावत पाणबुडी आयएनएस खंडेरी ही आज भारतीय नौदलात समाविष्ट होणार आहे.

◾️केंद्रीय संरक्षणंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ही पाणबुडी नौदलात समाविष्ट केली जाईल. भारतीय नौदलाकडील ही दुसरी कलावरी क्लासची पाणबुडी आहेत.

🔵 या पाणबुडीची वैशिष्ट्ये 🔵

◽️आयएनएस खंडेरी
◾️लांबी 67.5 मीटर
◽️उंची 12.3 मीटर
◾️वजन 1565 टन

🔺11 किलोमीटर लांबीची पाईप फिटींग
🔺60 किलोमीटर लांबीची केबल फिटींग आहे 
🔺हाय टेन्साईल स्ट्रेन्थ, त्यामुळे अधिक खोलवर सक्षमपणे सक्रीय राहणार 
🔺सलग 45 दिवस पाण्यात राहण्याची क्षमता 
🔺स्टील्थ टेक्नोलॉजीमुळे रडारला हुलकावणी देण्याची क्षमता 
🔺कोणत्याही हवामानात काम करण्याची क्षमता 
🔺350 मीटर खोलवरून शत्रूला हेरण्याची क्षमता 
🔺 आयएनएस खंडेरीत 360 बॅटरी सेल्स 
🔺प्रत्येक बॅटरी सेलचे वजन 750 किलो 
🔺 पाणबुडीत दोन 1250 केडब्ल्यू डिझेल इंजिन 
🔺या जोरावर 6500 नॉटीकल मैल(12000 किमी) अंतर कापणे शक्य 
🔺 सर्वोच्च वेग 22 नॉटस् इतका 
🔺 सर्व अभेद्य चाचण्यांवर पाणबुडी सक्षम 
🔺त्यामुळे सायलेंट किलर अशी पाणबुडीची गणना 
🔺आयएनएस खंडेरीत अनेक अद्ययावत शस्रे 
🔺 पाणबुडीतील आतला आवाज बाहेर न येण्याचे तंत्रज्ञान 
🔺 त्यामुळे शत्रुला सुगावा लागणे कठिण 
🔺 सुरूंग अंथरण्याचीही पाणबुडीची क्षमता 
🔺आयएनएस खंडेरीत दोन पेरिस्कोप आहेत 
🔺 खंडेरीत 6 टॉरपिडो ट्युब्स, एका वेळी 12 टॉरपिडो डागण्याची क्षमता

ब्लॅक होल (कृष्ण विवर) :-

• सप्टेंबर 2019  मध्ये .................... फंडामेंटल फिजिक्समध्ये ......... किंवा ........ हा पुरस्कार देण्याची देण्याची घोषणा करण्यात आली. ब्लॅक होलची (कृष्णविवर) जगातील पहिली प्रतिमा तयार करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.----------- टीमच्या एकूण 347 वैज्ञानिकांनी हे कार्य यशस्वीरित्या पूर्ण केले आणि ब्लॅक होल सारख्या अदृश्य शरीराची प्रतिमा जगासमोर सादर केली. ---------- 2019 रोजी इव्हेंट होरायझन टेलीस्कोप संघाने ---------(-------) नावाच्या आकाशगंगा (गॅलेक्सी) मध्ये असलेल्या ब्लॅक होलची प्रतिमा प्रकाशित केली.

या पुरस्कारांतर्गत या संघाला 3 मिलियन अमेरिकी डॉलर ची बक्षीस  देण्यात आले आहे. ही प्रतिमा आकारास आणणारया टीमचे नेतुत्व --------- या महिलेने केले होते. ---------- दुर्बिणीने (EHT) हे छायाचित्र काढलं आहे. EHT ही एक दुर्बिण नसून ------- दुर्बिणींचा संच आहे.

• ब्लॅक होल(कृष्णविवर):-

* उघड्या डोळ्यांना 'न दिसू शकणाऱ्या' या कृष्णविवराचा व्यास ----------- किमीचा आहे आणि आकार पृथ्वीच्या तीस लाख पट मोठा.

* ------- दीर्घिकेत (गॅलेक्सी) जवळपास दहा दिवस ही प्रतिमा स्कॅन करण्यात आली.

* हे कृष्णविवर आपल्या संपूर्ण सूर्यमालेच्या आकाराहूनही मोठे आहे

राष्ट्रीय पुरस्कार:-

• यश चोप्रा मेमोरियल पुरस्कार ( ५ वा) :-
२०१८ :- आशा भोसले

•  हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार:-
२०१८ :- खैय्याम

• पी. सी. चंद्रा पुरस्कार
२०१९:- डॉ. देवी प्रसाद

• सरस्वती पुरस्कार
२०१८:- डॉ. के. शिवा रेड्डी
२०१७:- सितांशू यशचंद्र

•  बिहारी पुरस्कार :-
२०१८:- मनीषा कुलश्रेष्ठ
२०१७:- विजय वर्मा

• व्यास सन्मान:-
२०१८:- लीलाधर जुग्डी
२०१७:- ममता कालीया

• इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार
२०१७:- टी.एम. कृष्णा

• रविंद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार:-
२०१८:- राणादास गुप्ता

• उत्कृष्ट संसद सभासद पुरस्कार
२०१७:- भृतहरी मेहता
२०१६:- दिनेश त्रिवेदी

• जी.डी. बिर्ला पुरस्कार :-
२०१८:- राजीव कुमार वर्षाने
२०१७:- डॉ. राजन शंकर नारायन

• सरला पुरस्कार
२०१८ :- शत्रुघ्न पांडव

• शलाका सन्मान:-
२०१७-१८:- जावेद अख्तर

शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 2019

● नवी दिल्लीत एका आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल 2019 या वर्षासाठी ‘शांती स्वरूप भटनागर पुरस्कार’ या पुरस्कारांचे वाटप करण्यात आले.

● वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) या संस्थेच्यावतीने दिल्या जाणार्‍या या प्रतिष्ठित पुरस्कारांच्या विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत-👇👇

• जैवशास्त्र : डॉ. कायारत साई कृष्णन
(IISER, पुणे); डॉ. सौमेन बसक
(NII, नवी दिल्ली)

• रसायनशास्त्र : डॉ. राघवन बी. सुनोज
(IIT, मुंबई); डॉ. तपस कुमार माजी (JNCASR, बेंगळुरू)

• भु-शास्त्र, वातावरण, महासागर आणि ग्रहशास्त्र : डॉ. सुबिमल घोष (IIT, मुंबई)

• अभियांत्रिकी विज्ञान : माणिक वर्मा (मायक्रोसॉफ्ट रिसर्च इंडिया, बेंगळुरू)

• गणितीशास्त्र : डॉ. दिशांत मयूर भाई
पंचोली (IMS, चेन्नई);
डॉ. नीना गुप्ता (ISI, कोलकाता)

• वैद्यकीयशास्त्र : डॉ. धीरज कुमार
(ICGEB, नवी दिल्ली); डॉ. मोहम्मद जावेद अली (एल.व्ही. प्रसाद आय इंस्टीट्यूट, हैदराबाद)

• भौतिकशास्त्र : डॉ. अनिंदा सिन्हा (IISc, बेंगळुरू);  डॉ. शंकर घोष (TIFR, मुंबई)

● पुरस्काराविषयी :-

• वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे संस्थापक डॉ. शांती स्वरूप भटनागर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विविध विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या भारतीय व्यक्तींना दिला जाणारा वार्षिक पुरस्कार आहे. 1958 साली पहिल्यांदा हा पुरस्कार दिला गेला.

• वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) कडून दिला जाणारा हा पुरस्कार जैवशास्त्र, रसायनशास्त्र, भुमी, वातावरण, महासागर आणि ग्रहशास्त्र, अभियांत्रिकी विज्ञान, गणितशास्त्र, वैद्यकीयशास्त्र, भौतिकशास्त्र या विभागांमध्ये दिला जातो

16 वर्षीय ग्रेटा थनबर्ग 'राईट लाईव्हलीहूड' पुरस्कार जाहीर #

16 वर्षीय ग्रेटा थनबर्ग हिला राजकीय स्तरावर हवामान बदलाविषयी तातडीने पावले उचलण्यासाठी प्रेरणा दिल्याबद्दल 'राईट लाईव्हलीहूड' या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

या पुरस्काराला 'प्रतिनोबेल किंवा पर्यायी नोबेल' म्हणून ओळखले जाते.

नोबेल शांतता पुरस्कारासाठीही ग्रेटाला नामांकन देण्यात आले आहे.

4 डिसेंबरला म्हणजेच नोबेल पारितोषिक वितरणाच्या सहा दिवस आधी स्टॉकहोम येथे हा पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

ग्रेटा थनबर्गने स्वतःची ओळख 16 वर्षांची पर्यावरणप्रेमी कार्यकर्ता असा करून दिला आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी तिने गेल्या वर्षी म्हणजेच 2018 साली ऑगस्ट महिन्यात स्वीडनच्या संसदेसमोर आंदोलन सुरू केले होते.

त्यानंतर तिने शुक्रवारी सतत आंदोलने केली आहेत, त्यामुळे वर्षभरात कितीतरी शुक्रवार ती शाळेतही जाऊ शकलेली नाही.

ग्रेटाच्या आंदोलनाला “फ्रायडेज फॉर द फ्युचर” असे नाव मिळाले असून हे आंदोलन विविध देशांमध्ये पोहोचले आहे.

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ

व्यापारी आणि स्वयं-रोजगारप्राप्त लोकांसाठीच्या राष्ट्रीय पेंशन योजनेलाही प्रारंभ.

शेतकऱ्यांचे जीवन सुकर करण्यासाठीच्या प्रयत्नातला आणखी एका महत्वाच्या योजनेचा प्रधानमंत्री किसान मान धन योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झारखंडची राजधानी रांची येथे प्रारंभ केला. या योजनेअंतर्गत 60 वर्षाच्या पाच कोटी छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना दरमहा 3,000 रुपये पेंशनद्वारे त्यांचे जीवन सुरक्षित करण्यात येणार आहे.

व्यापारी आणि स्वयं रोजगार असलेल्या व्यक्तींसाठीच्या राष्ट्रीय पेंशन योजनेचा प्रारंभही पंतप्रधानांनी केला.

या व्यक्ती आणि व्यापाऱ्यांना वयाच्या 60 व्या वर्षीपासून किमान दरमहा 3,000 रुपये पेंशन या योजनेद्वारे मिळणार आहे.
सुमारे 3 कोटी छोट्या व्यापाऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.

‘जनतेच्या आकांक्षांची पूर्तता करणारे भक्कम सरकार’ असे आश्वासन निवडणुकीच्या वेळी दिले होते.नवे सरकार स्थापन झाल्यानंतर देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबाला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळेल.

सध्या देशातल्या सुमारे साडेसहा कोटी शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यात 21 हजार कोटीपेक्षा जास्त रुपये जमा करण्यात आले आहेत. झारखंडमधल्या 8 लाख शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यात सुमारे 250 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. विकासाला आमचे प्राधान्य आहे आणि कटिबद्धताही, याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. प्रत्येक भारतीयाला सामाजिक सुरक्षेचे कवच देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

ज्यांना अतिशय गरज आहे अशांना सरकार मदतीचा हात देत आहे. गेल्या मार्चपासून अशाच पद्धतीची पेंशन योजना देशातल्या असंघटीत क्षेत्रातल्या कोट्यवधी कामगारांसाठी सुरू आहे.

32 लाख कामगारांपेक्षा जास्त कामगार श्रमयोगी मानधन योजनेत सहभागी झाले आहेत. 22 कोटी पेक्षा जास्त जण प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेत सहभागी झाले आहेत. त्यापैकी 30 लाख लाभार्थी केवळ झारखंडमधले आहेत. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 44 लाख गरीब रुग्णांना लाभ झाला असून त्यापैकी 3 लाख झारखंडमधले आहेत.

सर्वांना सक्षम बनविण्यासाठी पंतप्रधानांनी आज देशभरातल्या आदिवासी बहुल भागात 462 एकलव्य आदर्श शाळांचा प्रारंभ केला. त्या भागातल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर दर्जेदार शिक्षण पुरविण्यावर या शाळांमध्ये लक्ष केंद्रीत करण्यात येईल.

या एकलव्य शाळा, आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे माध्यम म्हणून काम करण्याबरोबरच क्रीडा, कौशल्य विकास सुविधाही उपलब्ध करतांनाच स्थानिक कला आणि संस्कृतीचे जतनही यामध्ये करण्यात येणार आहे. या शाळांत प्रत्येक आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये सरकार दरवर्षी एक लाख रुपयापेक्षा जास्त खर्च करणार आहे.

IMDच्या ‘जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता क्रमवारीता 2019’मध्ये भारत 44 व्या क्रमांकावर

स्वित्झर्लंडच्या IMD संस्थेचा भाग असलेल्या ‘वर्ल्ड कॉम्पिटीटिव्हनेस सेंटर’ या विभागाकडून ‘जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता क्रमवारीता 2019’ या शीर्षकाखाली जागतिक स्पर्धात्मकतेच्या बाबतीत एक यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

व्यवसाय, सरकारी आणि व्यापक समाजातल्या आर्थिक परिवर्तनासाठी एक मुख्य चालक ठरणार्‍या डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास आणि त्यांचे अन्वेषण करण्यासाठी 63 राष्ट्रांची क्षमता आणि तत्परता यांचे मूल्यमापन करते.

अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करण्यासाठी, अभ्यासात तीन घटकांना विचारात घेतले जाते:
(i) ज्ञान - नवीन तंत्रज्ञान समजून घेण्याची आणि शिकण्याची क्षमता; (ii) तंत्रज्ञान - नवीन डिजिटल क्षेत्राच्या नवकल्पना विकसित करण्याची क्षमता; आणि (iii) भविष्यातली तत्परता - आगामी विकासासाठीची तयारी.

या यादीत यंदा भारताने चार स्थानांची प्रगती दाखवीत 44 वे स्थान प्राप्त केले आहे. भारताने ज्ञान आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब व शोध घेण्यासाठी भविष्यातल्या तयारीच्या बाबतीत विशेष सुधारणा केली आहे. दूरसंचार क्षेत्रातल्या गुंतवणुकीच्या बाबतीत भारताने प्रथम स्थान मिळविले.

अन्य ठळक बाबी

🔸संयुक्त राज्ये अमेरिका (USA) ही जगातली सर्वाधिक डिजिटल स्पर्धात्मक अर्थव्यवस्था आहे.

🔸अमेरिकेच्यापाठोपाठ पुढे सिंगापूर (2), स्वीडन, डेन्मार्क, स्वित्झर्लंड, नेदरलँड्स, फिनलँड, हाँगकाँग SAR, नॉर्वे आणि कोरिया प्रजासत्ताक या देशांचा प्रथम 10 मध्ये क्रम लागतो.

🔸अमेरिका आणि स्वीडन हे देश ज्ञाननिर्मिती, तंत्रज्ञानाच्या विकासासाठी प्रोत्साहनपूर्ण वातावरणाची निर्मिती आणि अभिनव कल्पनांचा अवलंब करण्याची तयारी यांच्यात संतुलित दृष्टीकोन ठेवतात. सिंगापूर, डेन्मार्क आणि स्वित्झर्लंड एक किंवा दोन घटकांना प्राधान्य देतात.

🔸हॉंगकॉंग SAR, कोरिया प्रजासत्ताक, तैवान आणि चीन यासारख्या अनेक आशियाई अर्थव्यवस्थांनी 2018 सालाच्या तुलनेत यंदा लक्षणीय प्रगती दर्शविलेली आहे. या सर्व अर्थव्यवस्थांनी त्यांच्या तांत्रिक पायाभूत सुविधांमध्ये आणि त्यांच्या व्यवसायातील चपळाईमध्ये उल्लेखनीय प्रगती दर्शविलेली आहे.

🔸भारत आणि इंडोनेशिया या देशांनी अनुक्रमे चार आणि सहा स्थानांनी झेप घेतली असून, प्रतिभा, प्रशिक्षण आणि शिक्षण तसेच तांत्रिक पायाभूत सुविधांचा विस्तार अश्या बाबतीत सकारात्मक परिणाम अनुभवले.

🔸मध्य-पूर्व प्रदेशामध्ये, संयुक्त अरब अमिरात आणि इस्त्राएल हे प्रमुख प्रादेशिक डिजिटल केंद्र म्हणून कायम राहिले.

🔸लॅटिन अमेरिकेत मेक्सिको आणि कोलंबिया केवळ या देशांनीच या वर्षी प्रगती दर्शविलेली आहे.

अरुणाचलप्रदेशात पर्यटन प्रकल्प

केंद्र सरकार प्रणीत ‘स्वदेश दर्शन’ योजनेतंर्गत मुख्यमंत्री पेमा खांडू व राज्य पर्यटनमंत्री के.जे.अल्फोन्स यांनी अरुणाचल प्रदेश राज्यातील दोन ईशान्य पर्यटन प्रकल्पांचे उद्‌घाटन केले.

या दोन्ही प्रकल्पांना केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने वर्ष २०१५ मध्येच मंजुरी दिली होती.

🔰 भालुकपोंग-बोम्दील-तवांग प्रकल्प -
          या प्रकल्पात गृहनिर्माण, शौचालय बांधणी यांसारखी पायाभूत कामे करण्यात आली आहेत.

आता सोरंग माठ, त्यात त्सो व सेला सरोवर, थीन्ग्बू व ग्रेन्खा गरम पाण्याचे झरे यासारख्या ठिकाणी विविध सुविधा करण्यात येणार आहेत.

🔰नाफरा-संगदूपोटा-जीरो-येम्चा प्रकल्प -
          या प्रकल्पाअंतर्गत पर्यटनास अनुकूल असणाऱ्या विविध विविध नगरांमध्ये हस्तकला बाजार, गिर्यारोहण उपक्रम, मोठमोठी वाहनतळे, हेलिपॅड अशा सुविधा देण्यात येणार आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...