Thursday 10 October 2019

तुम्हाला माहीत आहे का ? देशातील घडलेल्या महत्वपूर्ण प्रथम घटना

• देशातील पहिली संत्रा वायनरी.
:- सावरगाव (नागपूर).

• देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन.
:- पुणे.

• देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात.
:- अरुणाचल प्रदेश.

• देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ.
:- नागपूर.

• देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य.
:- महाराष्ट्र.

• देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य.
:- महाराष्ट्र.

• देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी.
:- चैन्नई.

• देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय.
:- ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे).

• देशातील पहिले दूरदर्शन केंद्र.
:- दिल्ली.

• देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र.
:- पुणे.

• देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य.
:- कर्नाटक.

• देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प.
:- ताडोबा (चंद्रपूर).

• देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य.
:- हिमाचलप्रदेश.

• देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली.
:- बंगलोर.

• देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य.
:- महाराष्ट्र.

• देशातील पहिला घन कचर्यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे.
:-  पुणे.

• देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य.
:- सिक्किम.

• देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य.
:- महाराष्ट्र.

• देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी.
:-  पुणे.

• देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव.
:- गरिफेमा.

• देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर .
:- झारखंड.

• देशातील पहिले ई – गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य .
:- महाराष्ट्र.

• देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य .
:-  त्रिपूरा.

• देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर.
:- सुरत.

• देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य .
:- आंध्रप्रदेश.

• देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य.
:-  तामिळनाडू.

• देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक.
:-  बंगळूर.

• देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य.
:- आंध्रप्रदेश.

• देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य.
:-  महाराष्ट्र.

• देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प.
:- कांडला (गुजरात).

• देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य.
:- प.बंगाल.

• देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अक्ट (RTS) पास करणारे राज्य.
:-  मध्यप्रदेश.

• देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ.
:- राज्यस्थान.

• देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र.
:- हडपसर (पुणे).

• देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य.
:- हरीयाणा.

• देशातील पहिले स्त्री बटालियन.
:- हडी राणी (राजस्थान).

• देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई – बँकीग सेवा देणारे राज्य.
:- महाराष्ट्र.

• देशातील पहिले ई – पंचायत सुरु करणारे राज्य.
:- महाराष्ट्र.

• देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य.
:-  दिल्ली.

• देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा.
:- नदिया (प.बंगाल).

• देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य.
:-  महाराष्ट्र.

• देशातील पहिला खासगी विमानतळ.
:-  दुर्गापूर (प.बंगाल).

• देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले.
:- दिल्ली.

• देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ.
:- वापी (गुजरात).

• देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य.
:- उत्तराखंड.

• देशातील पहिले जैव – सांस्कृतिक पार्क.
:- भुवनेश्वर.

• देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य.
:- आंध्रप्रदेश.

• देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प.
:- आळंदी.

• देशातील पहिले सॅटेलाईट शहर.
:- पिलखूआ (उत्तरप्रदेश).

• देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज.
:- काटेवाडी.

• देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य.
:- महाराष्ट्र.

• देशातील पहिला निर्मल जिल्हा.
:- कोल्हापूर.

• देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली.
:- भुसावळ – आजदपूर.

• देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी.
:- मुंबई.

• देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संख्येत मतदान अनिवार्य करणारे राज्य.
:- गुजरात.

चालू घडामोडी प्रश्नसंच

📌39 व्या जागतिक कवी परिषदेचे उद्घाटन ____ येथे झाले.

(A) भोपाळ
(B) नवी दिल्ली
(C) भुवनेश्वर✅✅✅
(D) आग्रा

📌भारताच्या मदतीने कोणत्या देशात उभारण्यात आलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा 8 ऑक्टोबर रोजी पेट्रोलियम व नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला?

(A) मंगोलिया✅✅✅
(B) कंबोडिया
(C) लाओस
(D) व्हिएतनाम

📌उत्सवाच्या वेळी वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कोणत्या संस्थेने ‘हरित फटाके’ विकसित केले?

(A) IIT कानपूर
(B) CSIR✅✅✅
(C) IISc बेंगळुरू
(D) IIT खडगपूर

📌भारताने कोणत्या शेजारच्या देशात कोस्टल सर्व्हिलन्स रडार यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) श्रीलंका
(B) बांग्लादेश✅✅✅
(C) मालदीव
(D) पाकिस्तान

📌संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना दिली जाणारी आर्थिक मदत चार पट वाढविण्यास मान्यता दिली. हा निधी _ अंतर्गत देण्यात येणार.

(A) आर्मी बॅटल कॅज्युएलिटीज
वेलफेयर फंड✅✅✅
(B) राष्ट्रीय संरक्षण कोष
(C) लष्कर केंद्रीय कल्याण कोष
(D) यापैकी नाही

📌21 ऑक्टोबर 2019 रोजी _ सर्व महिला असलेल्यांचा स्पेसवॉक आयोजित करणार आहे.

(A) युरोपियन स्पेस एजन्सी (ESA)
(B) जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (JAXA)
(C) NASA (नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिसट्रेशन)✅✅✅
(D) ISA (इस्त्राएल स्पेस एजन्सी)

📌UNESCO ने आदिवासी लोकांसाठीचे राजदूत म्हणून __ यांची नेमणूक केली.

(A) कॅमेरून डायझ
(B) युना किम
(C) मिली बॉबी ब्राउन
(D) यलिट्झा एपारीसिओ✅✅✅

📌जागतिक अधिवास दिन _ या दिवशी साजरा केला जातो.

(A) 9 ऑगस्ट✅✅✅
(B) 9 ऑक्टोबर
(C) 6 ऑक्टोबर
(D) 8 ऑक्टोबर

नक्की सोडवा, सराव 20 प्रश्नउत्तरे

1. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे.

 पंचगंगा

 भोगावती

 कोयना

 वारणा

उत्तर : भोगावती

2. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी खनिज तेलाचे उत्पादन केले जाते?

 मुंबई हाय

 कोल्हापूर

 चंद्रपूर

 नाशिक

उत्तर : मुंबई हाय

3. जगातील सर्वात लांब सागरी कालवा कोणता?

 सुएझ कालवा

 पनामा कालवा

 राजस्थान कालवा

 कील कालवा

उत्तर : सुएझ कालवा

4. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत सौरऊर्जेचे रूपांतर कोणत्या उर्जेत होते.

 यांत्रिक ऊर्जा

 रासायनिक ऊर्जा

 गतिज ऊर्जा

 चुंबकीय ऊर्जा

उत्तर : रासायनिक ऊर्जा

5. वित्त आयोगाची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणास आहेत?

 उपराष्ट्रपती

 वित्त मंत्री

 संसद   

 राष्ट्रपती

उत्तर : राष्ट्रपती

6. ‘कमीजास्त’ शब्दाचा समास ओळखा.

 वैकल्पिक व्दंव्द

 समहार व्दंव्द

 इयरेतर व्दंव्द

 अव्ययीभाव

उत्तर : वैकल्पिक व्दंव्द

7. थायरॉक्झीन या संप्रेरकाच्या निर्मितीसाठी कोणता खनिजपदार्थ आवश्यक आहे?

 मॅग्नेशियम

 लोह

 फॉस्फोरस

 आयोडीन

उत्तर : आयोडीन

8. खालीलपैकी ध्वनीच्या तीव्रतेचे एकक कोणते?

 मीटर/सेकंद

 अर्ग

 फॅदम

 डेसिबल

उत्तर : डेसिबल

 

9. यवतमाळ जिल्ह्यातील वणी हे ठिकाण कोणत्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे.

 दगडी कोळसा

 संगमरवर

 बॉक्साईट

 तांबे

उत्तर : दगडी कोळसा

10. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करते?

 राष्ट्रपती

 मुख्यमंत्री

 विधानसभा अध्यक्ष

 लोकसभा सभापति

उत्तर : राष्ट्रपती

11. शुद्ध शब्द ओळखा

 इस्पित

 ईस्पित

 ईस्पीत

 ईस्पिता

उत्तर : ईस्पित

12. यातील ‘नामाचा’ शब्द ओळखा.

 लिहितो

 श्रीमंत

 मुलगा

 तर

उत्तर : मुलगा

13. विरुद्धार्थी शब्द ओळखा.

 जलxपाणी

 थंडxगरम

 पवनxवारा

 रवीxसूर्य

उत्तर : थंडxगरम

14. भूतकाळातील वाक्य कोणते?

 किती छान आहे हे

 किती सुंदर होता तो मोर

 काय सुंदर अक्षर आहे तिचे

 यापैकी नाही

उत्तर : किती सुंदर होता तो मोर

15. आम्ही रोज क्रिकेट खेळतो. भूतकाळ करा.

 आम्ही रोज क्रिकेट खेळू

 आम्ही रोज क्रिकेट खेळतो

 आम्ही रोज क्रिकेट खेळणार

 यापैकी नाही

उत्तर : यापैकी नाही

16. वाक्यात पुढे येणार्‍या दर्शक सर्वनामाशी निगडीत संबंधित असणार्‍या सर्वनामांना —– सर्वनामे म्हणतात.

 संबंधी

 दर्शक

 प्रश्नार्थक

 सामान्य

उत्तर : संबंधी

17. ‘स्वरसंधी’ ओळखा.

 तट्टिका

 यशोधन

 प्रश्नार्थक

 सामान्य

उत्तर : प्रश्नार्थक

18. काळ ओळखा ‘मधुने लाडू खाल्ला आहे’

 भूतकाळ

 भविष्यकाळ

 वर्तमानकाळ

 रिती भूतकाळ

उत्तर : वर्तमानकाळ

19. ‘लहान मुलांनापासून वृद्ध माणसांपर्यंत’ शब्द समूहाबद्दल एक शब्द सांगा.

 आजनभाऊ

 अनुयायी

 अतिथी

 आबाल वृद्ध

उत्तर : आबाल वृद्ध

20. ‘सकाळाची रंग तुझा पावसाळी नभापरि’ वाक्यातील अलंकार ओळखा.

 उपमा

 उत्प्रेक्षा

 व्यतिरेक

 अतिशयोक्ती 

उत्तर : उपमा

साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार

◾️2018 साठी साहित्याचा नोबेल
पुरस्कार
     📌पोलिश लेखिका ओल्गा टोकार्झुक आणि

◾️ 2019 मधील नोबेल पुरस्कार

   📌ऑस्ट्रियाचे लेखक पीटर हॅण्डके यांना जाहीर झाला आहे.

◾️स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये स्विडीश अकादमीने आज (10 ऑक्टोबर) याची घोषणा केली.

◾️ मागील वर्षी लैंगिक छळाच्या प्रकरणामुळे 2018 च्या साहित्याच्या नोबेल पुरस्काराची घोषणा स्थगित केली होती.

🌸 साहित्याच्या नोबेल पुरस्कारशी संबंधित गोष्टी 🌸

◾️ 1901 पासून 2017 पर्यंत 110 नोबेल पुरस्कार देण्यात आले आहेत.

◾️114 साहित्यिकांना सन्मानित करण्यात आलं आहे.

◾️सर्वाधिक इंग्लिश भाषेसाठी (23 वेळा) साहित्याचा नोबेल देण्यात आला आहे.

◾️साहित्याचा नोबेल चार वेळा दोन साहित्यिकांना संयुक्तरित्या देण्यात आला आहे.

📌1914,
📌1918,
📌1935,
📌1940,
📌1941,
📌1942 आणि
📌1943 मध्ये
याची घोषणा झाली नाही.

◾️ब्रिटीश पत्रकार रुडयार्ड किपलिंग (तेव्हा 41 वर्ष) हे साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण साहित्यिक ठरले.

◾️ त्यांना 1907 मध्ये 'जंगल बुक'साठी हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यांचा जन्म मुंबईत झाला होता.

◾️तर साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळवणारे सर्वात ज्येष्ठ साहित्यिक या ब्रिटनच्या डोरिस लेसिंग (88 वर्ष) होत्या. त्यांना 2007 मध्ये हा पुरस्कार मिळाला.

◾️14 लेखिकांचा साहित्याच्या नोबेल पुरस्काराने सन्मान झाला आहे.

◾️नोबेल मिळवणाऱ्या स्वीडिश लेखिका सेलमा लेगरलोफ या पहिल्या साहित्यिका होत्या, त्यांना 1909 मध्ये हा पुरस्कार प्रदान केला होता.

◾️ भारतातील बंगाली साहित्यिक रविंद्रनाथ टागोर यांना 1913 मध्ये 'गीतांजली' या काव्य संग्रहासाठी नोबेल पुरस्कार देण्यात आला.

◾️नोबेल पुरस्कार मिळवणारे टागोर हे भारतातीलच नाही तर आशियातील पहिले व्यक्ती होते.

◾️मागील वर्षी लैंगिक छळाचा प्रकरणामुळे 2018 चा साहित्याच्या नोबेलची घोषणा अकादमीने स्थगित केली होती.

◾️त्यामुळे यंदा साहित्याचा नोबेल पुरस्कार दोन साहित्यिकांना देण्यात आला.

डेन्मार्कमध्ये ‘C40 जागतिक महापौर शिखर परिषद 2019’ आयोजित

👉 डेन्मार्क या देशाची राजधानी कोपेनहेगन येथे 9 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर 2019 या काळात ‘C40 जागतिक महापौर शिखर परिषद 2019’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

👉 कार्यक्रमात शाश्वत, आरोग्यदायी, अनुकूल अश्या आणि सर्वसमावेशक भविष्यासाठी आवश्यक असलेल्या ठळक हवामानविषयक उपाययोजनांना वेग देऊन जगभरातली ‘C40’ समूहातली शहरे आपली बांधीलकी कशी दर्शवित आहेत याचे प्रदर्शन प्रस्तुत करणार आहेत.

❇️ C40 समुहाबद्दल :

▪️‘C40 शिखर परिषद’ पहिल्यांदा सन 2005 मध्ये लंडन (ब्रिटन) येथे भरविण्यात आली होती.

▪️हा समूह सन 2005 मध्ये ऑक्टोबर महिन्यात तयार करण्यात आला.

▪️समूहाचे सचिवालय लंडन (ब्रिटन) येथे आहे.

▪️‘C40’ समूह हा हवामानातल्या बदलांशी लढा देण्यासाठी आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन आणि हवामानविषयक जोखीम कमी करणार्‍या शहरी कृतींवर लक्ष केंद्रित करते, ज्यामुळे शहरी नागरिकांचे आरोग्य, त्यांचे कल्याण आणि आर्थिक संधींमध्ये वाढ होण्यास मदत होते.

▪️‘C40 शहरे’ या समूहात आज जगभरातल्या अग्रेसर असलेल्या 94 शहरांचा समावेश आहे, जे 700 दशलक्षाहून अधिक नागरिकांचे आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या एक चतुर्थांश भागाचे प्रतिनिधित्व करतात.

▪️‘C40 जागतिक महापौर शिखर परिषद’ अग्रेसर असलेली शहरे, व्यवसाय आणि नागरिकांची जागतिक युती तयार करते, जी पृथ्वीला आवश्यक असलेल्या मूलगामी आणि महत्वाकांक्षी हवामानविषयक कृतींवर भर देते.

▪️‘C40’ शहरांचे महापौर स्थानिक पातळीवर 4 नोव्हेंबर 2016 रोजी लागू झालेल्या हवामानविषयक पॅरिस कराराची महत्वाकांक्षी उद्दीष्टे पूर्ण करण्यास वचनबद्ध आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

लिथिअम-आयन बॅटरीच्या संशोधनासाठी तीन शास्त्रज्ञांना नोबेल जाहीर

◾️ रॉयल स्विडिश अकॅडमीकडून आज रसायन शास्त्रातील नोबेलची घोषणा करण्यात आली.

◾️ हा पुरस्कार अमेरिका, ब्रिटन आणि जपानमधील तीन शास्त्रज्ञांना विभागून देण्यात येणार आहे.

◾️लिथिअम-आयन बॅटरीच्या संशोधनासाठी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

  📌जॉन बी. गुडइनफ,
  📌एम. स्टॅनली व्हायटिंघम आणि
  📌अकिरा योशिनो अशी या
तीन नोबेल पुरस्कार जाहीर झालेल्या रसायन शास्त्रज्ञांची नावे आहेत.

◾️लिथिअम-आयन बॅटरीमुळे इलेक्ट्रॉनिक्स उपकरांच्या विश्वात क्रांती झाली आहे.

◾️या बॅटरीमध्ये मोठ्या प्रमाणावरील ऊर्जा छोट्या स्वरुपात साठवून ठेवता येते. या बॅटरीच्या संशोधनामुळे कार, लॅपटॉप, मोबाईल फोन्स आणि इतर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे हे पोर्टेबल झाली आहेत.

◾️नोबेल समितीने या पुरस्काराबाबत म्हटले की, १९७० मधील तेल संकट हे लिथिअम-आयन बॅटरीच्या संशोधनाचे मूळ आहे.

◾️तेव्हा व्हायटिंघम यांनी जीवाश्म इंधनमुक्त ऊर्जा निर्माण करण्याचे तंत्र विकसित करण्याचे ध्येय ठेवले होते. या बॅटरीने आपल्या जीवनात क्रांती आणली आहे.

📌९ लाख १८ हजार अमेरिकन डॉलर, 📌एक गोल्ड मेडल असे रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे स्वरुप आहे.

◾️१० डिसेंबर रोजी नॉर्वेतील स्टॉकहोम आणि ओस्लो येथे हे नोबेल पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

गोवर

गोवर हा विषाणुजन्य आजार आहे. या आजारात एक्झॅन्थम या नावाने ओळखले जाणारे पुरळ त्वचेवर येतात. गोवर हा रुबेला, पाच दिवसाचा गोवर किंवा हार्ड मीझल्स या नावानेसुद्धा ओळखला जातो.
वर्णन : गोवर हा जगभर आढळणारा आजार आहे. सध्याच्या गोवर लसीकरणाच्या प्रथेआधी दर दोन किंवा तीन वर्षानी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात गोवराची साथ येत असे. एक वर्षाआड येणारी लहान गोवराची साथ ही सामान्य बाब होती. तान्ह्या मुलापासून ते आठ महिन्यापर्यंतच्या मुलामध्ये गोवराविरुद्ध नैसर्गिक प्रतिकार शक्ती असते. ही प्रतिकारशक्ती मातेच्या गर्भाशयातील पेशींमधून मुलास मिळालेली असते.

माणसाला कोणत्याही वयात एकदा गोवर होऊन गेला की त्याला तो पुढच्या आयुष्यात परत होत नाही.

◾️कारण आणि लक्षणे

गोवराचे कारण पॅरामिक्झोव्हायरस नावचा विषाणू. अति संसर्गजन्य प्रकारातील हा विषाणू आहे. ज्यास गोवर झाला आहे त्याचा खोकला, शिंका यातून विषाणू पसरतो. ८५% गोवर या प्रकारे पसरतो. एकदा गोवराच्या विषाणूचा संसर्ग झाला की आठ ते पंधरा दिवसात विषाणूचा संसर्ग झालेल्या ९५% व्यक्तींना गोवर होतो. गोवराची लक्षणे दिसण्यापूर्वी तीन ते पाच दिवस गोवर विषाणूचा संसर्ग झालेला असतो. नंतरच्या चार दिवसात गोवराचे पुरळ अंगावर येण्यास प्रारंभ होतो.

गोवराचे पहिले लक्षण म्हणजे ताप, नाक वाहणे , डोळे तांबडे होऊन डोळ्यातून पाणी येणे आणि खोकला. काहीं दिवसात तोंडामध्ये गालाच्या आतील बाजूस पुरळ उठतात. ते वाळूच्या आकाराचे पांढरे पुरळ तांबूस उंचवट्यावर असतात. या पुरळांस कॉप्लिक पुरळ असे म्हणतात. हे गोवराचे नेमके लक्षण आहे. घसा सुजतो, तांबडा होतो आणि खवखवतो.

◾️उपचार

गोवरावर नेमके उपचार नाहीत. उपचार रुग्णास आराम वाटावा यासाठी केले जातात. इतर जीवाणू संसर्ग झाल्यास प्रतिजैविके देण्यात येतात. ताप उतरण्यासाठी असिटॅमिनोफेन देण्यात येते. गोवर झालेल्या लहान मुलाना कधीही अ‍ॅस्पिरिन देऊ नये

◾️प्रतिबंध

गोवराचा प्रतिबंध लसीने उत्तम प्रकारे करता येतो. गोवराची लस गोवराच्या विषाणूपासून बनवलेली आहे. गोवराच्या विषाणूवरील सर्व प्रथिने शिल्लक असल्याने लस दिल्यानंतर शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होते. भविष्यकाळात गोवराच्या विषाणूबरोबर संपर्क आल्यास शरीर विषाणूचा त्वरित प्रतिकार करते.. वयाच्या १५ महिन्यापूर्वी बालकाची प्रतिकारशक्ती पुरेशी निर्माण न झाल्याने गोवराची लस १५ महिन्यानंतर देण्यात येते. या वयात लस टोचल्यास तयार होणारी प्रतिकार शक्ती दीर्घकाळ टिकते.

गर्भवती महिलाना गोवराची लस देऊ नये. याचे कारण गर्भारपणात गोवराची लस दिल्यास जन्मलेल्या बळास गोवर होण्याची शक्यता असते.

रवीचंद्रन अश्विनने केली विश्वविक्रमाची बरोबरी; घेतले जलद 350 बळी; मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी

♻️ टीम इंडियाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

♻️ अश्विनने कसोटीत सर्वात वेगवान 350 गडी बाद करण्याची कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातून अश्विनने जोरदार पुनरागमन केलं आहे. पहिल्या डावात त्याने सात विकेट्स घेत आपल्या विकेट्सची संख्या 349 वर पोहोचवली होती.

♻️ आज दुसऱ्या डावात पहिली विकेट घेत अश्विनने भारताकडून वेगवान 350 विकेट घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. 66 व्या सामन्यात त्याने 350 विकेट घेतल्या आहेत. यासह त्यानं श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनचा विश्वविक्रमाची बरोबरी केली.

♻️ भारताकडून अनिल कुंबळेने 77 सामन्यात 350 विकेट तर हरभजन सिंहने 83 सामन्यात 350 विकेट्स घेतल्या होत्या.

♻️ श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने 66 व्या कसोटीत 350 वा गडी बाद केला होता. कसोटीमध्ये 800 गडी बाद करणारा मुरलीधरन जगातील एकमेव गोलंदाज आहे.

♻️ कसोटीत पाच विकेट घेण्याची कामगिरी अश्विनने आतापर्यंत 27 वेळा केली आहे. याशिवाय सात वेळा 10 गडी बाद करण्याची कमालही त्यानं केली आहे.

♻️ याचबरोबर जलद 250 आणि 300 बळी घेण्याचा विश्वविक्रम देखील अश्विनच्याच नावावर आहे.

पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण होऊन आज १०६ वर्षे पूर्ण

♻️ जगातील मानवनिर्मित आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण होऊन आज १०६ वर्षे पूर्ण झाली.

♻️ १९१३ साली आजच्याच दिवशी अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांनी व्हाइट हाऊसमधून टेलिग्राफ सिग्नलच्या माध्यमातून या कालव्याचे उद्घाटन केले. असे असले तरी ३ ऑगस्ट १९१४ रोजी कालव्यामधून जाहजांची वाहतूक सुरु झाली. या कालव्यामुळे अटलांटिक व पॅसिफिक महासागर जोडले गेले.

♻️ कालव्याच्या अटलांटिक किनाऱ्यावर कोलोन तर पॅसिफिक किनाऱ्यावर पनामा ही बंदरे आहेत. पनामा कालव्याची लांबी ८० किमी आणि रुंदी १८० ते ३३० किमी आहे.

♻️ या कालव्यामुळे अमेरिकेच्या अटलांटिक व पॅसिफिक किनाऱ्यामधील अंतर कमी झालेले आहे. पनामा कालव्यामुळे संयुक्त संस्थाने, ऑस्ट्रेलिया, संयुक्त संस्थाने ते जपान हे अंतर कमी झाले आहे.

♻️ जाणून घेऊयात आधुनिक अभियांत्रिकी शास्त्राचा सर्वोत्कृष्ट नमूना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पनामा कालव्याबद्दलच्या खास गोष्टी...

>
पनामा कालवा हा मध्य अमेरिकेच्या पनामा देशामधील एक कृत्रिम कालवा आहे. हा कालवा अटलांटिक महासागराच्या कॅरिबियन समुद्राला प्रशांत महासागरासोबत जोडतो.

>
पनामा कालवा जगातील सर्वात महत्त्वाच्या व वर्दळीच्या जलमार्गांपैकी एक आहे. हा कालवा वापरणाऱ्या जहाजांची वार्षिक संख्या १९१४ साली १००० होती तर २००८ पर्यंत ही संख्या १४,७०२ पर्यंत पोचली होती. २००८ सालापर्यंत एकूण ८.१५ लाख जहाजांनी पनामा कालव्याचा वापर केला होता.

>
ह्या कालव्याच्या बांधणीसाठी अनेक नैसर्गिक व कृत्रिम तलावांचा वापर करण्यात आला. हे तलाव समुद्रसपाटीपासून सुमारे २६ मी उंच असल्यामुळे पनामा कालव्यामध्ये दोन्ही बाजूंना बंदिस्त बांध (लॉक्स) बांधले आहेत. ह्या बांधांमध्ये अनुक्रमे पाणी सोडत आत शिरणाऱ्या जहाजांना वर चढवले जाते. कालव्यामधून बाहेर पडणाऱ्या जहाजांसाठी उलटी क्रिया करून खाली उतरवले जाते. सध्याच्या घडीला ह्या बांधांची रूंदी ११० फूट आहे. पनामा कालव्याची एकूण लांबी ७७.१ किमी (४८ मैल) आहे.

>
अमेरिकन स्थापत्य अभियांत्रिकी संघटनेने पनामा कालव्याचा आपल्या जगातील सात नव्या आश्चर्यांपैकी एक असल्याचे सांगत या कालव्याचा आधुनिक युगातील आश्चर्यांच्या यादीमध्ये समावेश केला आहे.

>
पनामा कालवा बांधण्यापूर्वी प्रशांत महासागरामधून अटलांटिक महासागरात पोचण्यासाठी बोटींना दक्षिण अमेरिका खंडाला वळसा घालून धोकादायक मेजेलनच्या सामुद्रधुनीमधून प्रवास करावा लागत असे. मध्य युगापासून हा प्रवास टाळण्यासाठी मानवनिर्मित कालव्याची कल्पना मांडली जात होती.

>
पनामाचे मोक्याचे स्थान व अरूंद भूमीचा पट्टा पाहता येथेच हा कालवा काढणे सहजपणे शक्य होते. रोमन साम्राज्याचा राजा पहिला कार्लोस याने १५३४ साली ह्या कालव्यासाठी पाहणी करण्याचे आदेश दिले होते. १८५५ साली अमेरिकेने पनामा कालव्याचा प्रस्ताव मांडला. ह्याच काळात सुवेझ कालव्याचे निर्माण करण्यात फ्रेंचांना यश मिळाल्यामुळे पनामा कालव्याच्या बांधकामाबद्दल स्थापत्यकारांना हुरूप आला.

>
११८१ साली फ्रान्सने पनामा कालव्याचे बांधकाम हाती घेतले. परंतु सुमारे २८ कोटी अमेरिकन डॉलर खर्च केल्यानंतर हा उपक्रम दिवाळखोरीत निघाला व १८९० साली काम थांबले.

>
पुढील १३ वर्षे अमेरिकेने अनेक पाहण्या व अभ्यास केले. अखेर १९०४ साली राष्ट्राध्यक्ष थियोडोर रूझवेल्टच्या नेतृत्वाखाली अमेरिकेने ह्या कालव्याचे हक्क विकत घेतले व बांधकाम पुन्हा सुरू झाले. अनेक अडचणींचा सामना करीत अमेरिकन अभियंत्यांनी १९१४ साली कालव्यामधून जाहजांची वाहतूक सुरु झाली. १९९९ सालापर्यंत पनामा कालव्याचा ताबा अमेरिकेकडेच होता.

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...