Friday 5 January 2024

पुणे प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती


1. पुणे जिल्हा


जिल्हयाचे मुख्य ठिकाण - पुणे        

         क्षेत्रफळ - 15,643 चौ.कि.मी. 


लोकसंख्या - 94,26,959 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)


तालुके - 14 - जुन्नर, आंबेगांव, खेड (राजगुरूनगर), इंदापूर, शिरूर, मावळ (वडगाव), वेल्हे, पुणे शहर, दौंड, भोर, हवेली (पुणे), मुळशी (पौड), पुरंदर (सासवड), बारामती. 


सीमा - उत्तर व पूर्वेस अहमदनगर जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा आहे. आग्नेयेस सोलापूर तर वायव्येस ठाणे जिल्हा आहे. 


जिल्हा विशेष


 


'विधेचे माहेरघर' असे पुणे शहरास म्हणतात. याच ठिकाणी महात्मा ज्योतीबा फुल्यांच्या समाज-परिवर्तनाच्या कार्यास सुरुवात झाली. आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले, महर्षी धोंडो केशव कर्वे यासारख्या नररत्नाचे कर्तृत्व याच पुण्याने फुलविले. लोकमान्य टिळकांची ही कर्मभूमी होय. 


राष्ट्रकूट, राजवटीत या गावाचा पुनवडी नावाने उलेख केला जाई. 'पुण्य'या शब्दावरून 'पुणे' हे नाव पडले असावे, अशी एक उपपती मांडली जाते. 


देशातील सर्वात पहिले उपग्रह दळणवळण केंद्र जुन्नर तालुक्यात आर्वी येथे 1971 पासून कार्यरत अष्टविनायकापैकी (1) श्री विघ्नेश्वर, ओझर (2) श्री गणपती, राजणगांव (3) गिरजात्मक, लेण्याद्री (4) चिंतामणी, थेऊर (5) मोरेश्वर, मोरगाव या पाच अष्टविनायकाचे स्थान या जिल्हात आहे. 


महत्वाची स्थळे


 


पुणे - मुळा-मुठा नद्यांच्या संगमावर पुणे शहर आहे. शिवाजी महाराजांचे बालपण, पेशव्यांची राजधानी, शनिवारवाडा यांमुळे पुण्यास ऐतिहासिक महत्व आहे. पुण्यात शिक्षण विभागाचे संचालनालय, महाराष्ट्र राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तकनिर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुण्याजवळच्या मोसरी येथे राष्ट्रीय एड्स अनुसंधान संस्था. 


तसेच निगडी येथे 'अप्पूघर' हे करमणुकीचे केंद्र आहे. 


पिंपरी-चिंचवड - पिंपरी-चिंचवड, परिसरात अनेक उधोगधंदे आहेत. चिंचवड येथे श्री. मोरया गोसावी या सत्पुरुषाची समाधी आहे. स्कूटर, रिक्षा, मोटार, कृत्रिम धागा, पेनिसिलीन, रसायने इत्यादीचे कारखाने येथे आहेत. निगडी येथील 'अप्पूघर' हे एक करमणुकीचे केंद्र आहे. 


जुन्नर - जुन्नर जवळच सातवाहन काळातील शिवनेरी हा किल्ला आहे. येथेच शिवाजी महाराजाचा जन्म झाला. किल्यावर शिवाईदेवीची मंदिर आहे. जुन्नर गावात दादोजी कोंडदेवांचा वाडा होता. 


आळंदी - हे ठिकाण इंद्रायणीकाठी असू येथे श्री. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. 


देहू - हे इंद्रायणी नदीच्या काठावर असून संत तुकाराम महाराजाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते.


चाकण - येथील भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. कांद्यांची बाजारपेठ म्हणूनही चाकण प्रसिद्ध आहे. 


लोणावळा - हे थंड हवेचे ठिकाण आहे. येथून जवळच वळवण धरण, कार्ले-भाजे येथील कोरीव लेणी प्रेक्षणीय आहेत. नाविक प्रशिक्षण केंद्र व अनेक कारखाने येथे आहेत. 


जेजूरी - महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबांचे देवस्थान आहे. 


आर्वी - आर्वी हे जुन्नर तालुक्यात असून येथे 'विक्रम' हे उपग्रह दळणवळण केंद्र आहे. 


राजगुरूनगर - हुताम्मा राजगुरूंचे हे गाव आहे. 


भीमाशंकर - येथील शंकराचे मंदिर प्रसिद्ध आहे. येथे अभयारण्य आहे. 


उरुळी कांचन - येथे निसर्गोपचार केंद्र आहे. येथून जवळच भुलेश्वर हे यात्रेचे ठिकाण आहे. 


दौंड - दौंड हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे रेल्वे जंक्शन असल्यामुळे येथून लोहमार्गाने वेगवेगळ्या ठिकाणी जाता येते. 


वालचंदनगर - येथे साखर कारखान्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री तयार केली जाते. तसेच प्लॅस्टिकचा व वनस्पती तुपाचा कारखानाही येथे आहे. 


सासवड - हे पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे सोपानदेवीची समाधी आहे. जवळच पुरंदर किल्ला आहे. सासवडचा परिसर अंजीर, सीताफळ, डाळिंब, पेरु इत्यादींच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. 


भोर - हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे रंग, मेणकापड इत्यादींचे कारखाने आहेत. येथून जवळच भाटघर धरण व बनेश्वर ही सहलीची ठिकाणी आहेत. 


वेल्हे - हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथून जवळ राजगड व तोरणा हे किल्ले आहेत. 


वढू - येथे संभाजी महाराजांची समाधी आहे. 


पौंड - हे मुळशी तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथून जवळच मुळशी धरण आहे. 


पुणे प्रशासकीय विभागास पश्चिम महाराष्ट्र म्हटले जाते. 


1997 पासून पुणे येथे देशातील पहिली मुलींची सैनिक शाळा आहे. 


ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण प्रशिक्षण केंद्र पुणे जिल्ह्यातील मांजरी येथे चालविले जाते. 


पुणे नागरी संकुल हे देशातील आठव्या व राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचेनागरी संकुल आहे. 


राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (NARI), भोसरी (पुणे) 


महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मुख्यालय, पुणे 


राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणे 


महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे 


राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा (NCL), पुणे 


भारतीय कृषि उधोग प्रतिष्ठान, उरळी कांचन (पुणे) 


महाराष्ट्र विकास प्राधिकरण (यशदा), पुणे 


सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन, खडकवासला 


फिल्म अँड टेलिव्हीजन इन्स्टिट्यूट, पुणे 


नॅशनल डिफेन्स अकादमी, खडकवासला (पुणे)


 


2. सांगली जिल्हा


जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - सांगली  

               क्षेत्रफळ - 8,572 चौ.कि.मी. 


लोकसंख्या - 28,20,575 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)


तालुके - 10 - खानापूर, कवठे महाकाळ, वाळवे, तासगाव, जत, शिराळे, आतपाडी, पलूस, मिरज, कडेगाव. 


सीमा - उत्ततेस व ईशान्येस सोलापूर जिल्हा, उत्तरेस व वायव्येस सातारा जिल्हा, पूर्वेस कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्हा, पश्चिमेस रत्नागिरी जिल्हा, दक्षिणेस व नैऋत्येस कोल्हापूर जिल्हा असून दक्षिणेस कोल्हापूर पर्यंत कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्हा.


जिल्हा विशेष -


 


1 ऑगस्ट 1949 रोजी सातारा जिल्हाचे विभाजन करून उत्तर सातारा आणि दक्षिण सातारा असे दोन जिल्हे निर्माण केले. नंतर 23 नोव्हेंबर 1960 ला फेरफार करून दक्षिण सातारा जिल्ह्याचे रूपांतर सांगली जिल्ह्यात करण्यात आले. 


सांगली जिल्ह्याला कलावंताचा जिल्हा म्हणतात. 


हळद व द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध. रबी ज्वारीला या जिल्ह्यात 'शाळू'म्हणून ओळखले जाते. 


प्रमुख स्थळे


 


सांगली - शहराच्या मध्यभागी गणेशदुर्ग हा किल्ला असून येथील गणेशमंदिर प्रसिद्ध आहे. 


मिरज - येथील भुईकोट किल्ला व मिरासाहेब अवलियाचा दर्गा प्रसिद्ध आहे. 


औंदुबर - या गावात दत्तात्रय मंदिर असून हे मंदीर नरसिंह सरस्वती यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले. ब्राम्हण कुटुंबात 1304 मध्ये जन्माला आलेले हे संत संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. कृष्णा नदीच्या काठावर भवनेश्वरीचे मंदीर आहे. 


बहादूरवाडी - या गावात माधवराव पेशव्यांनी 1761 च्या सुमारास किल्ला बांधला. 


बेडग - ता. मिरजपासून 11 कि.मी. अंतरावर असलेले हे गाव अनेक मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. 


भोपाळगड - ता. खानपूरच्या दक्षिण पूर्वेस एक किल्ला असून तो शिवाजीच्या ताब्यात होता. 


भोसे - येथे दांडोबा महादेव गुफा प्रसिद्ध असून या गुहेत यादव राजा सिंघण यांचा शिलालेख आहे. 


देवराष्ट्र - हे गाव खानापूर तालुक्यातील असून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी होय. या गावात अनेक प्राचीन लेण्या आहे. 


कासबे दिग्रज - मिरज तालुक्यातील हे गाव पाच हिंदू मंदिरे व दोन जैन बस्तीसाठी प्रसिद्ध आहे. 


कुंडल - तासगाव तालुक्यातील या गावात हिंदूच्या लेण्या आहे. 


शिराळा - या तालुक्याच्या गावात देश-विदेशातील लोक नागपंचमीसाठी येथे येतात. 


मच्छिंद्रगड - कर्हाड तालुक्यातील उत्तरेस शिवाजीने हा किल्ला बांधला.


 


3.सातारा जिल्हा


जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - सातारा         

    क्षेत्रफळ - 10,480 चौ.कि.मी. 


लोकसंख्या - 30,03,922 (सन 2011 च्या जनगणनेनुसार) 


तालुके - 11 - खंडाळा, फलटण, वाई, माण, जावळी, लाख महाबळेश्वर, कोरेगांव, खटाव, सातारा, पाटण, कराड. 


सीमा - उत्तरेस पुणे जिल्हा, पूर्वेस सोलापूर जिल्हा, पश्चिमेस रत्नागिरी जिल्हा, दक्षिणेस सांगली जिल्हा असून वायव्येस रायगड जिल्हा आहे. 


जिल्हा विशेष -


 


रयत शिक्षण संस्थेच्या ज्ञानगंगेचा उदय याच जिल्ह्यात झाला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये कराड तालुक्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली 1924 मध्ये या शिक्षण संस्थेचे कार्यालय सातारा येथे नेण्यात आले. 


येथेच छत्रपती शाहूचा राज्यभिषेक 1708 मध्ये झाला. 


ऐतिहासिक शूरवीराचा जिल्हा. मराठा काळापासून या जिल्ह्याला लष्करी परंपरा लाभली आहे. 


प्रमुख स्थळे


 


सातारा - सातारा शहरामध्ये शिलाहार वंशातील राजा दूसरा भोज याने 1990 मध्ये 'अजिक्यतारा' हा किल्ला बांधला आहे. येथील छत्रपती वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे. जवळच सज्जनगड या किल्यावर समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे. 


महाबळेश्वर, पाचगणी - हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.महाबळेश्वर येथे महाबळेश्वराचे मंदीर. 


वाई - महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोषनिर्मिती मंडळाचे संपादकीय कार्यालय येथे आहे. 


पाटण - येथे 'शिवाजीसागर' हा जलाशय आहे. 


कर्हाड - एथे कृष्णामाईचे मंदीर व यशवंतराव चव्हाणांची समाधी आहे. 


औंध - औंधचे वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे. 


प्रतापगड - महाबळेश्वर तालुक्यात शिवरायांनी 1656 मध्ये या गडाची उभारणी केली. याच कडावर अफझलखानाचा वध झाला.


चाफळ - छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदासस्वामी याची भेट येथे झाली.


सज्जनगड - स्वामी समर्थ रामदास यांचे कार्यस्थान. यांच्या वास्तव्याने गडास 'सज्जनगड' असे नाव देण्यात आले आहे. 


म्हसवड - येथे 12 व्या शतकातील सिद्धनाथाचे मंदीर, कल्याणी चालुक्य राजा जगदेकमल्ला याचा शिलालेख मंदिरात आहे. 


माहुली - ता. सातारा पासून 5 कि.मी. अंतरावर पूर्वेस कृष्णा व वेन्ना या दोन नद्यांना संगम.


मसूर - ता. कराड येथे समर्थ रामदास स्वामींनी बांधलेले मारूतीचे मंदीर.


निगडी - समर्थ रामदासांचे समकालीन संत रघुनाथ (रंगनाथ) यांचे गाव.


 


4. कोल्हापूर जिल्हा


जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - कोल्हापूर        

     क्षेत्रफळ - 7,685 चौ. कि.मी.


लोकसंख्या - 38,77,015 (सन 2011 च्या जनगणनेनुसार) 


तालुके - 12 - शहुवाडी, हातकणगले, पन्हाळा, शिरोळ, करवीर, गगनबावडा, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, कागल, भुदगड (गारगोटी), राधानगरी.


सीमा - उत्तरेस सांगली जिल्हा, पूर्वेस व दक्षिणेस कर्नाटक राज्य, पश्चिमेस रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हे आहे. 


जिल्हा विशेष -


 


पुराणात अशी दंतकथा आहे कि महालक्ष्मीने हा परिसर आपल्या गदेने महापुरापासून वाचविला म्हणून या परिसरास 'करवीर' असे नाव पडले. दुसर्‍या एका दंतकथेनुसार एका टेकडीवर 'कोल्हासूर' नावाच्या दैत्याचा वध केला गेला यावरून कोल्हापूर हे नाव पडले. 


हा जिल्हा राजर्षी शाहुंची जन्मभूमी आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर याच जिल्ह्यातील आहेत. 


गुळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध. अतिशय प्राचीन महालक्ष्मीचे मंदीर, हे मंदीर राजा कर्णदेव यांनी बांधले. 


प्रमुख स्थळे


 


कोल्हापूर - महालक्ष्मी मंदीर, रंकाळा तलाव, नवीन राजवाडा व शालिनी पॅलेस ही प्रक्षणीय स्थळे आहेत. 'कुस्तीगिरांची पंढरी' म्हणून ओळखले जाते. 'खासबाग' हे कुस्तीचे प्रसिद्ध मैदान येथेच आहे. अलीकडे या शहरास कलानगरी म्हणून ओळखले जाते. 


पन्हाळा - पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण असून पर्यटन केंद्र म्हणून विकसित झाले आहे. येथे पन्हाळगड हा किल्ला आहे. 


राधानगर - हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून येथे अभयारण्य आहे. ते राधानगरी अभयारण्य म्हणून ओळखले जाते. 


बाहुबली - हे ठिकाण जैन धर्मियांचे एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. 


आजरा - (तालुका स्थळ) रावळनाथ व रामलिंग मंदिरे व एक पडका किल्ला तसेच बॉक्साईटचे साठे यासाठी हा भाग प्रसिद्ध. रामलिंग मंदीर त्याच्या निसर्गरम्यते मुळे लोकांचे आवडते ठिकाण.


आळते - (ता. हातकणगले) लाल रंग म्हणजे आळता तयार करण्यासंबंधी हे गांव मध्ययुगात प्रसिद्ध होते. आजही काही प्रमाणात आळत्याची निर्मिती येथे होते. गुहेतील शिवमंदिर प्रसिद्ध. ही मुळची जैन धर्मीय गुहा. 


इचलकरंजी - (हातकणगले ता.) हातमागावरील साडया व इतर कपड्यांसाठी हे शहर प्रसिद्ध म्हणून या गावास मँचेस्टर म्हणत. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर हे प्रसिद्ध शास्त्रीय गायक याच गावातले. शास्त्रीय संगीत क्षेत्रात या गावाने मोठे योगदान दिले आहेत. 


कणेरी - (करवीर ता.) लिंगायतांचे पीठ, कडसिद्धे श्वराचा मठ यासाठी हे गाव प्रसिद्ध इ.स. 12 व्या शंतकापासून या मठाला इतिहास आहे. 


पन्हाळ्याच्या पाटील कुटुंबाकडे असलेल्या ताम्रपटात या मठाचा उल्लेख आढळतो. 


बालिंगे - (कात्यायनी पार्क) (करवीरा ता.) कात्यायनी मंदीर व निसर्ग यासाठी प्रसिद्ध. कात्यायनीचे एवढे मोठे क्षेत्र महाराष्ट्रात दुसरे नाही.


ज्योतिबा - (ता. पन्हाळा) 1730 मध्ये ज्योतिबाचे मंदीर राणाजीराव शिंदेंनी बांधले. येथे मोठी यात्रा भरते. 


वडगाव - हे गाव हातकणगले या तालुक्यात असून येथे धनाजी घोरपडेंची समाधी आहे. 


नरसिंहांची वाडी - यास नरसोबाची वाडी म्हणून ओळखतात. दत्त मंदिरासाठी प्रसिद्ध. 


हुपरी - हे गाव हातकणगले या तालुक्यात असून हे गाव चांदी व चांदीच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहे. 


महत्वाचे


 


कोल्हापूर जिल्ह्यात शेंगाचे तेल गाळण्याचे कारखाने जयसिंगपूर, इचलकरंजी, वडगांव तेथे आहे.  


कोल्हापूर जिल्ह्यात पातळे विणण्याचे माग इचलकरंजीत आहेत.  


हातकणगले तालुक्यात हुपरी येथे चांदीचे दागिने तयार करतात. 


कोल्हापूर जिल्ह्यातून पुणे-बेंगलोर (4) हा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे.         


कोल्हापूर जिल्ह्यात हातकणगले या तालुक्यात पानमळे आहेत. 


कोल्हापुरी लोक बेंदराच्या सणाला बैलाची पुजा करतात. 


कोल्हापूर फेटा, चपला, पैलवान, गूळ इत्यादि बाबींसाठी प्रसिद्ध आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी व गगनबावडा तालुक्यात आश्रमशाळा आहेत. 


पन्हाळा किल्ला पन्हाळा तालुक्यात आहे. 


विशालगड किल्ला शाहूवाडी तालुक्यात आहे. 


सतीची समाधी विशालगड किल्ल्यावर आहे. 


राधानगरीचे धरण भोगावती नदीवर बांधले आहे. 


राधानगरीच्या धरणातील पाण्याच्या साठयाला लक्ष्मीसागर तलाव म्हणतात. 


शिवाजी विधापीठ कोल्हापूरला आहे. 


कोल्हापूरला खासबाग मैदान आहे. 


महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी औधोगिक वसाहत इचलकरंजीला आहे.


शालिनी पॅलेस कोल्हापूरला आहे. 


कोल्हापूर मालवण मार्ग हा गैबी खिंडीतून गेला आहे. 


कोल्हापूर मालवण हा मार्ग फोंडा घाटातून गेला आहे.


 


5. सोलापूर जिल्हा


जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - सोलापूर           

 क्षेत्रफळ - 14,895 चौ.कि.मी. 


लोकसंख्या - 43,15,527 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)


तालुके - 11 - करमाळे, बार्शी, माढे, माळशिरस, मोहोळ, पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, सांगोला, मंगळवेढे, अक्कलकोट. 


सीमा - उत्तरेस अहमदनगर व उस्मानाबाद जिल्हा, पूर्वेस उस्मानाबाद जिल्हा, पश्चिमेस सातारा जिल्हा, दक्षिणेस सांगली जिल्हा व कर्नाटक राज्य असून वायव्येस पुणे जिल्हा आहे. 


जिल्हा विशेष -


 


हातमाग चादरी, ज्वारीचे कोठार व विठ्ठलाचे मंदीर (पंढरपूर) यासाठी प्रसिद्ध. मुळेगांव येथे कोरडवाहु शेती संशोधन केंद्र 1933 पासून कार्यरत आहे. 


भारतास स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 1930 मध्ये एक अभूतपूर्व घटना सोलापूरच्या इतिहासात घडली. मे 1930 मध्ये ब्रिटीशांनी गांधीजींना अटक केल्यानंतर पोलीसाच्या गोळीबाराने प्रक्षुब्ध झालेल्या जनतेने शहरातील पोलीस व इंग्रज अधिकार्‍यांना पळवून लावले व तीन दिवस जिल्ह्याचा कारभार सभांळला. 


येथील मराठी लावणी सारस्वताचे एक लेणे ठरली आहे. 


प्रमुख स्थळे


 


सोलापूर - येथील चादरी 'सोलापुरी चादर' या नावाने विशेष प्रसिद्ध आहेत. 


पंढरपूर - पंढरपूर हे देशातील प्रमुख तिर्थक्षेत्रापैकी एक आहे. येथे महाराष्ट्राचे दैवत विठ्ठल-रुखमिणीचे मंदीर असून आषाढी व कार्तिकी एकादशीला लाखो लोक दर्शनाला येतात. 


अक्कलकोट - स्वामी समर्थ यांचे मोठे मंदीर. 


करमाळे - येथील भुईकोट किल्ला व अष्टकोनी विहीर प्रसिद्ध आहे. 


बेगमपुर - ता. मोहळ - येथे औरंगजेबाच्या मुलीची कबर आहे. 


ब्र्म्ह्पुरी - हे गाव मंगळवेढा या तालुक्यात येत असून येथे यादवकालीन सिद्धेश्वर मंदीर आहे. 


नान्नज - सोलापूरपासून 20 किमी. अंतरावर नान्नज हे ठिकाण वसले आहे. हरिणे व आकर्षक व दुर्मिळ अशा 'माळढोक' या पक्षांसाठी नान्नज येथील अभयारण्य प्रसिद्ध आहे. 


महत्वाचे


 


सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार म्हणतात.


चादरीसाठी प्रसिद्ध शहर म्हणजे सोलापूर होय. 


सोलापूर जिल्ह्यातून भीमा, सिना, माण, भोगावती, बोरी या नद्या वाहतात.


सोलापूर जिल्ह्यामध्ये औधोगिक वसाहती सोलापूर, कुर्डूवाडी, चिंचोळीयेथे आहे. 


सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख औधोगिक उत्पादने चादरी, हातमाग, तयार कपडे, तंबाखू, लोखंडी सामान हे आहेत. 


सोलापूर जिल्ह्यातील लोहमार्ग मुंबई-पुणे-सोलापूर-मद्रास(ब्रोडगेज), सोलापूर-गदग(मिटरगेज), मिरज-कुर्डूवाडी-लातूर(नॅरोगेज).वैराग हे धार्मिक स्थळ सोलापूर जिल्ह्यात आहे. 


सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पवित्र क्षेत्र आहे. 


सोलापूर जिल्ह्यातून गेलेले राष्ट्रीय हमरस्ते पुणे-सोलापूर-हैद्राबाद, सोलापूर-चित्रदुर्ग. 


चीन मधील युद्धकाळात 1938 ते 1942 या दरम्यान तेथे जाऊन रुग्णांची व गोरगरिबांची सेवा करणारे डॉ.व्दारकानाथ कोटणीस हे आंतराष्ट्रीय आदर्शव्यक्ती सोलापूरचे होत.

राज्यघटना प्रश्नसंच

1). देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ..... होय ?

1) राज्य विधिमंडळ  

2) कार्यकारी मंडळ    

*3) संसद ✅*

4) न्यायमंडळ


2).   योग्य विधान ओळखा?

 1)कुरबुडे हा कोकण रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे

 2) पानवठ हा पूल कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल आहे


1)1 बरोबर 

2) 2 बरोबर 

*3) दोन्ही बरोबर ✅*

4) दोन्ही चूक


 3).....…याला सहकाराचा जनक मानतात?

*1)रॉबर्ट ओवेन*✅

2)रॉबर्ट हूक

3)मायकेल ओवेन

4)यापैकी नाही


4).आपल्या कुठल्या पुस्तकात गांधीनी क्रांतिकारकांची 'वाट चुकलेले देशभक्त' अशी संभावना केली ? 

1)हिंद स्वराज संघ

2)हिंदुस्‍थान स्‍वराज्‍य संघ

*3)हिंद स्वराज✅*.

4)यापैकी नाही


 5).भारतातून .....हे वृत्त जाते?

*1)कर्कवृत्त*✅

2)मकरवृत्त

3)विषुववृत्त

4)कोणतेही जात नाही


 6).महाराष्ट्र शासन कोणत्या शहरात 'भाषा भवन' बांधत आहे? 

1)औरंगाबाद

2)नाशिक

3)पुणे

*4)मुंबई✅*


 7).भारतातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोठे आहे? 

1)नागपूर

*2)आर्वी✅*

3)अहमदाबाद

4)चंद्रपूर


 8).अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

1)सरस्वती

2)यमुना

*3)शरयू*✅

4)घंडक


9).भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? 

 *1) सरदार वल्लभभाई पटेल✅*

 2)जी. बी. पंत

 3) जी. एल. नंदा

 4)लाल बहादूर शास्त्री


 10).लोकसभेचे पिता ..... यांना म्हणतात? 

 1)अनंतसांणम

 2) झिकीर हुसैन

 3) बासमम

 *4) मावळणकर*✅

पठाराची स्थानिक नावे


खानापूरचे पठार – सांगली


पाचगणीचे पठार – सातारा


औंधचे पठार – सातारा


सासवडचे पठार – पुणे


मालेगावचे पठार – नाशिक


अहमदनगरचे पठार – नगर


तोरणमाळचे पठार – नंदुरबार


तळेगावचे पठार – वर्धा


गाविलगडचे पठार – अमरावती


बुलढाण्याचे पठार – बुलढाणा


यवतमाळचे पठार – यवतमाळ


कान्हूरचे पठार – अहमदनगर


कास पठार – सातारा


मांजरा पठार – लातूर, उस्मानाबाद


काठी धडगाव पठार – नंदुरबार


जतचे पठार – सांगली


आर्वी पठार – वर्धा, नागपुर


चिखलदरा पठार – अमरावती.


▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

महाराष्ट्र जिल्हावार-पर्वत, डोंगर, टेकड्या, डोंगररांगा

💢 जिल्हा ➡️➡️ पर्वत डोंगर टेकड्या डोंगररांगा 💢


🎇मुंबई मुंबई उपनगर - ⛰⛰पाली, अंटोप हिल, शिवडी,खंबाला, मलबार हिल.


🎇 रायगड - ⛰⛰रत्नागिरी,सिंधुदुर्ग,सह्यण्द्री,


🎇 धुळे - ⛰⛰धानोरा, व गाळण्याचे डोंगर.


🎇नाशिक - ⛰⛰सह्यान्द्री, गाळणा, साल्हेर, मुल्हेर,वणी,चांदवड,सातमाळा,


🎇 पुणे -⛰⛰ सह्यान्द्री,हरिश्चंद्र,शिंगी,तसुबाई,पुरंदर,ताम्हिनी,अंबाला,


🎇 सांगली -⛰⛰ आष्टा,होणाई,शुकाचार्य,कामलभैरव, बेलगबाद, आडवा,मुचींडी,दंडोबा.


🎇 सोलापूर -⛰⛰ महादेव,बालाघाट, शुकाचार्य,


🎇 जालना - ⛰⛰अजिंठ्याची रांग,जाबुवंत,


🎇 हिंगोली - ⛰⛰अजिंठ्याची रांग, हिंगोलीचे पठार.


🎇 लातूर - ⛰⛰बालाघाटचे डोंगर,


🎇 बीड -  ⛰⛰बालाघाटचे डोंगर


🎇 अकोला - ⛰⛰गाविलगड,अजिंठाचे


🎇 अमरावती -⛰⛰ सातपुडा, गाविलगडच्या रांगा,पोहऱ्याचे व चिरोडीचे डोंगर.


🎇 वर्धा - ⛰⛰रावनदेव, गरमासुर, मालेगाव, नांदगाव, ब्राह्मणगाव टेकड्या.


🎇 भंडारा - ⛰⛰अबागडचे डोंगर, गायखुरी व भिमसेन टेकड्या,


🎇 चंद्रपूर -⛰⛰ परजागड व चांदूरगडचे, चिमूर व मुल टेकड्या.


🎇 ठाणे -  ⛰⛰सह्यान्द्री


🎇 जळगाव -⛰⛰ सातपुडा, सातमाळा, अजिंठा, शिरसोली, हस्तीचे डोंगर.


🎇 नंदुरबार -⛰⛰ सातपुडा व तोरणमाळचे डोंगर.


🎇 अहमदनगर -⛰⛰ सह्यान्द्री,कळसुबाई,अदुला,बाळेश्वर,हरिश्चंद्र डोंगर,


🎇 सातारा -⛰⛰ सह्यान्द्री,परळी,बनमौली,महादेव, यावतेश्वेर, मेंढोशी, आगाशिव, औध,


🎇 कोल्हापूर - ⛰⛰सह्यान्द्री, पन्हाळा, उत्त्तर व दक्षिण, दुधगंगा, चिकोडी रांग.


🎇 औरंगाबाद - ⛰⛰अजिंठा, सातमाळा, सुरपलायान,


🎇 परभणी - ⛰⛰उत्तरेस अजिंठ्याचे डोंगर, दक्षिणेस बालाघाट रांग.


🎇 नांदेड - ⛰⛰सातमाळा, निर्मल,मुदखेड,बलाघाटचे डोंगर,


🎇 उस्मानाबद -⛰⛰ बालाघाट, तुळजापूर, व नळदुर्ग डोंगर


🎇 यवतमाळ - ⛰⛰अजिंठ्याचे डोंगर व पुसदच्या टेकड्या.


🎇 बुलढाणा - ⛰⛰अजिंठ्यचे डोंगर.


🎇वाशीम - ⛰⛰अजिंठ्याचे डोंगर


🎇 नागपूर - ⛰⛰सतपुड्याचे डोंगर, गरमसूर,महादागड, पिल्कापर टेकड्या,


🎇 गोदिया -⛰⛰ नवेगाव, प्रतापगड, चिंचगड, व दरकेसाचे डोंगर.


🎇 गडचिरोली -⛰⛰ चरोळी,टिपागड,सिर्कोडा,सुरजागड,भामरागड,चिकियाला डोंगर.


महाराष्ट्रातील हवामान

महाराष्ट्रातील हवामान विशिष्टपूर्ण आहे. याचे कारण त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. महाराष्ट्रात मान्सून वाऱ्यामुळे पाऊस मिळतो.


महाराष्ट्राच्या हवामानाचे स्वरूप -


कोकण -

कोकणचे हवामान उष्ण, दमट, सम, प्रकारचे आहे. कोकणची सखल किनारपट्टी अरबी समुद्रास अगदी जवळ असल्याने वर्षभर वर्षभर तो प्रदेश फार उष्नही व फार थंडही नसतो.


सह्यान्द्री -

समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतशी हवा थंड होते. म्हणून सह्यान्द्रीच्या घाटमाथ्यावर उन्हाळ्यत देखील तेथील हवामान थंड असते. हिवाळ्यात मात्र कडाक्याची थंडी असते. म्हणून या भागातील हवामान थंड व आद्र असते.


महाराष्ट्र पठार -

महाराष्ट्राच्या पठारावर उष्ण,विषम,व कोरडे आहे. या भागात मार्च ते मे या काळात बरीच उष्णता असते. म्हणजेच उन्ह्याळातील व हिवाळ्यातील तापमानातच बरीच तफावत असल्याने पठारावरील हवामान हे विषम आहे.


महाराष्ट्रातील ऋतू -

महाराष्ट्रात साधारणपणे उन्हाळा-मार्च ते मे, पावसाळा -जून ते सप्टेम्बर, हिवाळा - ऑक्टोबर ते फेब्रूअरी, हे तीन मुख्य ऋतू आहेत.


उन्हाळा -

२१ मार्चनंतर उत्तर गोलार्धात सूर्यकिरणे लंबरूप पडण्यास प्रारंभ होतो तसेच दिनमानाच्या कालही वाढते.

महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान सुमारे १६' ते २२' दरम्यान असल्याने या काळात तापमानात वाढत जाते. कोकण किनार पट्टीत अरबी समुद्राच्या सानिध्यामुळे खरे व मतलई वारे यांचा फायदा मिळतो. तर दख्खनचे पठार हे सह्यन्द्री पर्वतामुळे

अरबी समुद्रापासून अलग झालेले असते. यामुळे कोकण व पठार यावरील बरीच तफावत आहे.


कोकणामध्ये दैनिक कमाल तापमान कक्षा ३०' ते ३३' सें च्या दरम्यान असते. मराठवाड्यात ३० ते ३५ सें तापमान असते. तर विदर्भामध्ये ४२ ते ४३ सें च्या आसपास असते.


हवेचा दाब व वारे -

उन्हाळ्यात असे तापमान वाढत गेल्यास साहजिकच हवेचा दाब कमी कमी होत जातो. आणि कोकण किनारपट्टीत समभार रेषा समांतर होत जातात. एप्रिल मे महिन्यात जसजसा उन्हाळा कडक होत जातो तसतसा समभार रेषा जवळजवळ येऊ लागतात आणि वायुभार उतार तीव्र होत जातो. अरबी समुद्रावरील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे वाहू लागतात. आणि वायुभर उतार तीव्र होत जातो. अरबी समूद्रवरील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे वाहू लागतात व किनारपट्टीवर दुपारच्या कडक उन्हानंतर आरोह प्रकारचा पाऊस पडतो. तर मराठवाडा आणि विदर्भात उन्हाळ्याच्या शेवटच्या कालखंडात धुळीची वादळे निर्माण होतात.


पर्जन्य -

हिवाळ्यामध्ये वायव्य भारतात तयार झालेल्या जास्त दाबाचा पट्टा सूर्य कर्कवृत्ताकडे असल्याने हळूहळू दक्षिणेकडे सरकतो. एप्रिल महिन्यात हा जास्त दाबाचा पट्टा भारताच्या दक्षिण भागात असतो. व त्याचा बराचसा प्रदेश सागरावारही असतो. वायव्य भारतात दाबाचा प्रदेश असतो. परंतु तो अजूनही कमजोरच असतो. दाबाच्या प्रदेशाकडून

जास्त दाबाच्या प्रदेशाकडून लागतात. ते एप्रिल व मी महिन्यात महाराष्ट्रच्याही भागावरून वाहत जाऊन पाऊस देतात. यावेळेस आंब्याचा बहर असतो. म्हणून या पावसाला आंबेसरी

असे म्हणतात.


महाराष्ट्र मान्सूनची संकल्पना -


सर्वसाधारणपणे मान्सूनचे आगमन हि अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. उन्हाळ्यात भूभाग

व जलभाग तापणे हे मान्सून चे तंत्र आहे. हे भारतीय उपखंडाचे वैशिष्ट्य आहे. सर्वसामान्यपणे महाराष्ट्रात जो पाऊस पडतो. त्यापैकी सुमारे ८५% पाऊस नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून मिळते. पावसाळ्यात चार महिन्याच्या कालावधीत कोकण आणि सह्यन्द्री पर्वतरांगेत भरपूर पाऊस पडतो. त्यामानाने मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस पडतो. महाराष्ट्राच्या पूर्व भागात अजून पावसाचे प्रमाण वाढत जाते. त्याचे कारण विदर्भ हा प्रदेश बंगालच्या उपसागरावरील मान्सून वाऱ्याच्या शाखेत येतो त्या भागात आगस्ट आणि सप्टेंबर या दरम्यान पाऊस पडतो.

कोकणात २५० ते ३०० सें मी पाऊस पडतो. घाठ्माठ्यावरील आंबोली येथे सर्वात जास्त

म्हणजे ७०७ से मी पूस कोसळतो. तर महाबळेश्वरला ५९४ एवढा पाऊस पडतो. माथेरानच्या पठारावर पावसाचे प्रमाण ४९३ से मी आहे. सह्यांद्रीच्या पूर्वेकडे म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या भागाकडे ५० ते ६० सें मी पाऊस पडतो. तसेच हा प्रदेश अनिश्चित स्वरूपाचे आहे. म्हणून या भागाला अवर्षणग्रस्त प्रदेश म्हटले जाते.

मराठवाड्यात ६० ते ८० सें मी एवढे पर्जन्य आहे. विदर्भात पावसाचे प्रमाण वाढत जाते. विदर्भात पश्चिमेकडून पूर्वेस पावसाचे प्रमाण वाढत जाते. पश्चिम विदर्भात ७५ ते ९० सें मी पाऊस पडतो. तर पूर्व विदर्भात ९० ते १५० से मी इतका पाऊस पडतो. विदर्भातील गाविलगडच्या डोंगरात पावसाचे प्रमाण वाढत जाते. तेथील थंड हवेच्या चिखलदरा या ठिकाणी १५० सें मी एवढा पाऊस पडतो.


ऑक्टोंबर संक्रमणाचा महिना -

या महिन्यात प्रखर सूर्यप्रकाश असतो. आणि हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण भरपूर असल्याने उकाडा अनुभवास येतो.


हिवाळा -

मान्सून संपल्यावर वाऱ्याचा काळ संपल्यावर नोवेंबरपासून खऱ्या अर्थाने हिवाळा चालू होतो. हिवाळ्यात सरासरी मासिक तापमानाचा विचार केला तर असे आढळते कि बऱ्याचशा रेषा पश्चिम पूर्व दिशेने असून त्या एकमेकास समांतर आहेत. हिवाळ्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडतो.


महाराष्ट्रात हिवाळ्यात संपूर्ण खानदेश, नाशिक जिल्हा, बराचसा अहमदनगर पुण्यातील जुन्नर घोडेगाव,राजगुरुनगर, शिरूर,पुणे,हवेली, तालुके. विदर्भात अमरावती जिल्ह्याच्या धारणी,चिखलदरा, तसेच वरुड नागपूर भंडारा, चंद्रपूर या भागात किमान तापमान १० सें ते १२.५ सें एवढे असते. महाराष्ट्राच्या उर्वरित भागात म्हणजे दक्षिण महाराष्ट्र बऱ्याच प्रमाणात मराठवाडा व पश्चिम विदर्भ व पूर्व विदर्भात नागपूर जिल्ह्याचा दक्षिण भाग वर्धा, गोंदिया, भंडारा,चंद्रपूरच्या उत्तर भागात किमान तापमान १२.५ व १५ सें दरम्यान आहे.


महाराष्ट्रातील वार्षिक पर्जन्याचे वितरण -


जास्त पर्जन्याचा प्रदेश - महाराष्ट्रातील कोकण आणि सह्यान्द्री डोंगरावर आणि डोंगराच्या पायथाचा प्रदेश या भागात ३०० ते ६०० इतका पाऊस पडतो. मध्यम पर्जन्याचा प्रदेश- सह्यान्द्रीच्या भागात, तर नाशिक,पुणे,सातारा,सांगली, या जिल्ह्याचा पश्चिम भाग गोंदिया, गडचिरोली, या भागात ३०० ते २०० से मी पाऊस पडतो. मध्यम ते कमी पर्जन्याचा प्रदेश - चन्द्रपूर, यवतमाळ,वर्धा, या भागात मध्यम पर्जन्य पडते. तर मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि सोलापूर, अहमदनगर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्याचा भागात तसेच पश्चिम विदर्भातील सर्व जिल्हे या भागात कमी पर्जन्य होते.

प्रश्न सराव


 देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते.
1. गुजरात
2. सिक्किम
3. आसाम
4. महाराष्ट्र

भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे

  भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले.
1.दिल्ली
2. महाराष्ट्र
3. आंध्र प्रदेश
4. चंदिगढ

 ............. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते.
1. मध्य प्रदेश
2. राजस्थान
3. सिक्किम
4. गुजरात

 महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो.
1.02
2.06
3.07
4.05
कृष्णा , सावित्री, कोयना, वेण्णा ,गायत्री

 अरवली पर्वत राजस्थानमध्ये असून हा पर्वत अतिप्राचीन म्हणजेच सर्वात जुना पर्वत आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये मही व लूनी ह्या दोन नद्या उगम पावतात. लुनी ही नदी पुढे कच्छच्या आखातात गायब होते. अरवली पर्वताच्या ............. भागात बनारसी नदी उगम पावते.
1. उत्तर
2. दक्षिण
3. मध्य
4. पूर्व

 भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल?
1.  ग्वाल्हेर
2. इंदौर
3.  दिल्ली
4.  या पैकी नाही

 मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले?
1. अमर शेख
2. अण्णाभाऊ साठे
3. प्र. के.अत्रे
4. द.ना.गव्हाणकर

 पुढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती?
1. धुळे -गाळणा डोंगर
2. नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर
3. औरंगाबाद -वेरूळ डोंगर
4. हिंगोली -हिंगोली डोंगर

अ. सर्वच बरोबर 
ब. 1, 2बरोबर
क. 3, 4बरोबर
ड. सर्वच चूक

  खालील पैकी  कोणते राज्य  भारताच्या  पुर्व किनाऱ्यावर  वसलेले  नाही ?
1. महाराष्ट्र 
2. तामिळनाडु
3. आंध्रप्रदेश
4. पश्चिमप्रदेश

  सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात?
1. नर्मदा व तापी
2. तापी व गोदावरी
3. कृष्णा व गोदावरी
4. कृष्णा व पंचगंगा

 कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो.
1. महानदी त्रिभुज प्रदेश
2. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश
3. गोदावरी त्रिभुज प्रदेश
4. कृष्णा त्रिभुज प्रदेश

 खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता.
1. मुगल ए आझम
2. किसान का नाम
3. आलम आरा
4. राजा हरिश्चंद्र

 भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले.
1. चेन्नई
2. कोलकत्ता
3. चंदिगड
4. मुंबई

 मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे.
1. पैठण
2. सोयगाव
3. औरंगाबाद
4. नांदेड

 नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे.
1. सह्याद्री
2. गाविलगड
3. सातमाळा
4. सातपुडा

*पाकिस्तान' हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला*
*1) बँरिस्टर जीना*
*2) सर सय्यद अहमद*
*3) मुहम्मद इकबाल*
*4) रहमत खान*✅
*खालील पैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता*
*1) दामोदर चाफेकर*
*2) विनायक सावरकर*
*3) अरविंद घोष*
*4) भगतसिंग*✅
:
*दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता..........असते.*
1)80%
2)90%
3)100%✔✔
4)1000%
*:
*दुर्बिणीसारख्या प्रकाशकीय उपकरणातील क्षेत्राभिंग व नेत्रभिंग यांच्या जोडणीतून काय आकारते?*
1)वस्तूभिंग
2)संयुक्त नेत्रभिंग✔✔✔
3)विशालक
4)वरीलपैकी एकही नाही
:
*कोंडा न काढलेल्या धान्यातून लोह व .............मिळते.*
1)जीवनसत्व
2)कॅल्शियम✔✔✔
3)मॅग्नेशियम
4)लोह
:
*19 ऑगस्ट हा दिवस............दिन म्हणून साजरा केला जातो.*
1)जागतिक मानसिक आरोग्य दिन
2)जागतिक पशु दिन
3)आंतरराष्ट्रीय ऊर्जा दिन
4)यापैकी नाही✔✔✔
*
*19 ऑगस्ट हा जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून साजरा केला जातो*
[
*1986 साली स्थापन झालेले सत्येंद्रनाथ बोस राष्ट्रीय मूल विज्ञान केंद्राचे मुख्यालय.........या ठिकाणी आहे.*
1)कोलकाता✔✔✔
2)वाराणसी
3)नार्वे
4)बेंगळुरू
:
*वैज्ञानिक संशोधनाच्या संघटन व निर्देशनासाठी वैज्ञानिक संशोधन व प्राकृतिक संसाधनाशी संबंधित मंत्रालयाची स्थापना करणारा............हा जगातील पहिला देश आहे.*
1)अमेरिका
2)जर्मनी
3)नार्वे
4)भारत✔✔✔:


*...........या भारतीय शास्त्रज्ञाने क्रिस्टलोग्राफीच्या क्षेत्रामध्येही महत्वपूर्ण संशोधन केले.*
1)चंद्रशेखर व्यंकटरमण✔✔
2)जगदिश्चंद्र बोस
3)मेघनाद साहा
4) पी सी रे
:
*वस्तूमधील गुरुत्वबल हे त्याच्या.........असते.*
1)वस्तुमानाशी व्यस्तानुपाती
2)आकारमानाशि व्यस्तानुपाती
3)अंतराच्या वर्गाशी समानुपाती
4)वस्तुमानाशी समानूपाती✔✔
*:
*उकळत्या पाण्याला सतत उष्णता दिली असता...........*
1)त्याचे तापमान कमी होते
2)त्याचे तापमान वाढत जाते
3)त्याच्या तापमानात बदल होत नाही✔✔✔
4)यापैकी नाही:

सराव प्रश्न


 1. देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते.

1. गुजरात🚩

2. सिक्किम

3. आसाम

4. महाराष्ट्र



भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे


 2. भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले.

1.दिल्ली🚩🚩

2. महाराष्ट्र

3. आंध्र प्रदेश

4. चंदिगढ


 3............. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते.

1. मध्य प्रदेश

2. राजस्थान🚩

3. सिक्किम

4. गुजरात


4. महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो.

1.02

2.06

3.07

4.05🚩

 कृष्णा , सावित्री, कोयना, वेण्णा ,गायत्री


 5. अरवली पर्वत राजस्थानमध्ये असून हा पर्वत अतिप्राचीन म्हणजेच सर्वात जुना पर्वत आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये मही व लूनी ह्या दोन नद्या उगम पावतात. लुनी ही नदी पुढे कच्छच्या आखातात गायब होते. अरवली पर्वताच्या ............. भागात बनारसी नदी उगम पावते.

1. उत्तर

2. दक्षिण

3. मध्य

4. पूर्व🚩


 6.) भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल?_



 ज) ग्वाल्हेर_📚✍🏻


ग) इंदौर


ता) दिल्ली


प) या पैकी नाही


 7. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले?

1)अमर शेख

2)अण्णाभाऊ साठे✅

3)प्र. के.अत्रे

4)द.ना.गव्हाणकर


 8. पुढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती? 


1)धुळे -गाळणा डोंगर 


2)नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर 


3)औरंगाबाद -वेरूळ डोंगर 


4)हिंगोली -हिंगोली डोंगर 



1)सर्वच बरोबर ✅✅



2)1, 2बरोबर 



3)3, 4बरोबर 



4)सर्वच चूक


 9.  खालील पैकी  कोणते राज्य  भारताच्या  पुर्व किनाऱ्यावर  वसलेले  नाही ?


(1)  महाराष्ट्र ✌️🚩


(2)  तामिळनाडु 


(3)  आंध्रप्रदेश 


(4)  पश्चिमप्रदेश


 10. सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात?


१) नर्मदा व तापी🚩🚩

२) तापी व गोदावरी

३) कृष्णा व गोदावरी

४) कृष्णा व पंचगंगा


 11. कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो.

1. महानदी त्रिभुज प्रदेश

2. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश🚩

3. गोदावरी त्रिभुज प्रदेश

4. कृष्णा त्रिभुज प्रदेश


 12. खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता.

1. मुगल ए आझम

2. किसान का नाम🚩🚩

3. आलम आरा

4. राजा हरिश्चंद्र


 13. भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले.

1. चेन्नई

2. कोलकत्ता🚩🚩

3. चंदिगड

4. मुंबई


 14. मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे.

1. पैठण

2. सोयगाव

3. औरंगाबाद🚩🚩

4. नांदेड


 15. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे.

1. सह्याद्री

2. गाविलगड

3. सातमाळा

4. सातपुडा🚩🚩


 नांदूर मधमेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे.

उत्तर पक्षी

महत्वाचे प्रश्नसंच

 पाकिस्तान' हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला

1) बँरिस्टर जीना

2) सर सय्यद अहमद

3) मुहम्मद इकबाल

4) रहमत खान✅


खालील पैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता

1) दामोदर चाफेकर

2) विनायक सावरकर

3) अरविंद घोष

4) भगतसिंग✅

:

दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता..........असते.

1)80%

2)90%

3)100%✔️✔️

4)1000%

:

दुर्बिणीसारख्या प्रकाशकीय उपकरणातील क्षेत्राभिंग व नेत्रभिंग यांच्या जोडणीतून काय आकारते?

1)वस्तूभिंग

2)संयुक्त नेत्रभिंग✔️✔️✔️

3)विशालक

4)वरीलपैकी एकही नाही

:

कोंडा न काढलेल्या धान्यातून लोह व .............मिळते.

1)जीवनसत्व

2)कॅल्शियम✔️✔️✔️

3)मॅग्नेशियम

4)लोह

:

19 ऑगस्ट हा दिवस............दिन म्हणून साजरा केला जातो.

1)जागतिक मानसिक आरोग्य दिन

2)जागतिक पशु दिन

3)आंतरराष्ट्रीय ऊर्जा दिन

4)यापैकी नाही✔️✔️✔️


19 ऑगस्ट हा जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून साजरा केला जातो


1986 साली स्थापन झालेले सत्येंद्रनाथ बोस राष्ट्रीय मूल विज्ञान केंद्राचे मुख्यालय.........या ठिकाणी आहे.

1)कोलकाता✔️✔️✔️

2)वाराणसी

3)नार्वे

4)बेंगळुरू

:

वैज्ञानिक संशोधनाच्या संघटन व निर्देशनासाठी वैज्ञानिक संशोधन व प्राकृतिक संसाधनाशी संबंधित मंत्रालयाची स्थापना करणारा............हा जगातील पहिला देश आहे.*

1)अमेरिका

2)जर्मनी

3)नार्वे

4)भारत✔️✔️✔️:


...........या भारतीय शास्त्रज्ञाने क्रिस्टलोग्राफीच्या क्षेत्रामध्येही महत्वपूर्ण संशोधन केले.*

1)चंद्रशेखर व्यंकटरमण✔️✔️

2)जगदिश्चंद्र बोस

3)मेघनाद साहा

4) पी सी रे

:

वस्तूमधील गुरुत्वबल हे त्याच्या.........असते.

1)वस्तुमानाशी व्यस्तानुपाती

2)आकारमानाशि व्यस्तानुपाती

3)अंतराच्या वर्गाशी समानुपाती

4)वस्तुमानाशी समानूपाती✔️✔️


उकळत्या पाण्याला सतत उष्णता दिली असता...........

1)त्याचे तापमान कमी होते

2)त्याचे तापमान वाढत जाते

3)त्याच्या तापमानात बदल होत नाही✔️✔️✔️

4)यापैकी नाही:


टेस्ट ट्यूब बेबी technique चा विकास........या शास्त्रज्ञांनी केला.

1)मॅक्स डेलब्रक आणि सॉलव्हेडर

2)दुवे ख्रिश्चन आणि जॉर्ज एमिल

3)रॉबर्ट एडवर्ड आणि सेपटो✔️✔️✔️

4)यापैकी नाही


राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नसंच

 1)"जय जवान जय किसान' ही घोषणा

ह्यांनी......दिली.(कृषी सेवक AR P1 2018)

A. लालबहादूर शास्त्री

C. गुलजारीलाल नंदा

B. जवाहरलाल नेहरू

D. मोरारजी देसाई


उत्तर : लालबहादूर

शास्त्री


2) भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षात सुरू करण्यात आले?

(नगरपरिषद प्र.सं.पूर्व परीक्षा PRELIM - 3_P7 2018)


A. 1937

B. 1939

C. 1941

D. 1942

उत्तर : 1942


3)आर्य समाजाची स्थापना कुणी केली ?

(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P6 - 2018)

B. स्वामी विवेकानंद

D. स्वामी दयानंद सरस्वती

A. लाला लजपत राय

C. श्री ओरबिंदो

उत्तर : स्वामी दयानंद सरस्वती


4)"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि

तो मी मिळवणारच" हे घोषवाक्य कोणी म्हटले?

(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)


A. बद्रुदीन तैय्यबजी

C. विनायक दामोदर सावरकर

B. बाळ गंगाधर टिळक

D. दादाभाई नौरोजी

उत्तर : बाळ गंगाधर टिळक



5)खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्राशी संबंधित नाही?(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P2 2018)


A. कुचीपुडी

B. लावणी

C. तमाशा

D. पोवाडा


उत्तर : कुचीपुडी


6)जय जवान जय किसान' या घोषवाक्याची रचना ......... द्वारे केली गेली. (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)

A. बिपिन चंद्र पाल

B. लालबहादूर शास्त्री

C. जवाहरलाल नेहरू

D. विनोबा भावे


उत्तर : लालबहादूर शास्त्री


7)भारत छोड़ो चळवळ........साली सुरू करण्यात आली होती? (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 - 2018)

A. 1930

B. 1919

C. 1942

D. 1945


उत्तर : 1942


8) बॉम्बे येथे 'आर्य समाजाची' स्थापना कोणी केली होती ?(कृषी सेवक KS - P5 -2019)

A. ज्योतिबा फुले

B. दयानंद सरस्वती

C. मुळ शंकर

D. एम. जी. रानडे


उत्तर : दयानंद सरस्वती


Q.1 व्यावसायिक बँकांच्या दुसर्‍या राष्ट्रीयीकरणात ___ बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.


1. 4

2. 5

3. 6 ✅

4. 8



Q2) वायदा बाजार आयोग खालीलपैकी कोणता बाजार (Market) स्वतंत्रपंणे नियंत्रित करतो?

1.म्युच्युअल फड  

2.वस्तू विनिमय  ✅

3.भागभांडवल बाजार

4.परकीय चलन बाजार



Q3.12 जुलै 1982 रोजी एआरडीसीमध्ये विलीनीकरण करण्यात आले ?


1.आरबीआय 

 2.नाबार्ड  ✅

3. एक्झिम बँक

4. वरीलपैकी काहीही नाही



Q4)एअरटेल पेमेंट्स बँकेने भारतीय शेतकरी आणि लघु व मध्यम उद्योगांसाठी खास प्रकारच्या पेमेंट सोल्यूशन्स विकसित करण्यासाठी कोणत्या कंपनीशी हातमिळवणी केली आहे?


1.पेपल

2.मास्टरकार्ड  ✅

3.व्हिसा

4.मेझॉन



Q5.ऑपरेशन ट्विस्ट कोणत्या बँकेची सरकारी सिक्युरिटीज खरेदी करणे व विकणे हे आहे?


1.आरबीचा  ✅

2.एसबीआय

 3.एचडीएफसी

 4.BoB



Q6.सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार एमएसएमई क्षेत्राने जीडीपीमध्ये किती टक्के वाटा उचलला आहे?


1. 25%

2.29%  ✅

3.32%

4. 36%



Q7)भारत सरकारच्या कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागांतर्गत नाफेडने लॉकडाऊनमध्ये डाळी व तेलबिया खरेदी केली. नाफेडची स्थापना कोणत्या तारखेला झाली?


1.2 ऑक्टोबर 1958  ✅

2.2 ऑक्टोबर 1968

3.2 ऑक्टोबर 1978

4.2 ऑक्टोबर 1988



Q.8 राज्य सरकारांचा महसूल वगळता खालील स्त्रोतांकडून महसूल उठविला जातो?


1. करमणूक कर

2. खर्च कर

3.कृषी होय  ✅

4.जमीन महसूल



Q9. वित्तीय तूट म्हणजे काय?


1.नवीन चलन नोटा छापणे

2.थकित चलनासह नवीन चलन बदलणे

3.सार्वजनिक खर्चाची संख्या सार्वजनिक खर्च  ✅

4.. सार्वजनिक खर्चापेक्षा जास्त सार्वजनिक उत्पन्न


Q10. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी खालील दिवशी कार्यरत झाले:

1.1 मार्च, 1944 

2.1 मार्च, 1945

3.1 मार्च, 1946

4.1 मार्च, 1947 ✅



Q11.भांडवळाच्या सेंद्रिय संरचनेची संकल्पना............ याने मांडली.

1.मार्शल  

2.जे.एस.मिल 

3.कार्ल मार्क्स  ✅

4.अॅडम स्मिथ 



Q12.भारतातील खालीलपैकी कुठल्या राज्यात सोयाबीनचे सर्वात जास्त उत्पादन होते?

1.उत्तरप्रदेश 

2.बिहार 

3.राजस्थान 

4.मध्यप्रदेश ✅



Q13) 1971 पर्यंत SDR चे मूल्य याच्या समान होते:

1.एक औंस सोने  

2.एक पौंड सोने

3.एक यू.एस. डॉलर  ✅

4.एक ब्रिटिश पौंड 



Q14)न्यू डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष म्हणून के.व्ही. कामथ यांची जागा कोण घेणार?


1.मिशेल टेमर

2.मार्कोस प्रडो ट्रोयझो  ✅

3. सर्जिओ मोरो

4. दिलमा 



Q15) तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

1) नंदुरबार ✅


 १) पुढे दिलेल्या पदांचा उतरता क्रम लावा? 

अ) राष्ट्रपती    
ब) भारतरत्न सन्मान मिळालेल्या व्यक्ती      
क) उपपंतप्रधान                    ड) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश

१) अकबड   ✅✅
२) डअकब    
३) अडबक   
४) अ ब क ड

 २. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या महाविद्यालयात गणिताचा प्राध्यापक म्हणून नोकरी केली? 

 एलफीन्स्टन
 एस.एन.डी.टी.
 फर्ग्युसन ✅✅
 विलिंग्टन

 ३) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग (Indian Institute of Remote Sensing) ही संस्था कोणत्या व्यापक संस्थेचा भाग आहे? 

 १)  ISRO✅✅
 २)  GSI
 ३)  DAE
 ४)  CSIR

 ४) अणुऊर्जा प्रकल्प आणि राज्यांच्या योग्य जोडया जुळवा. 

          प्रकल्प                     राज्य
         1) कल्पक्कम    अ) तमिळनाडू
         2) काक्रापार    ब) गुजरात
         3) रावतभाटा    क) महाराष्ट्र
         4) नरोरा        ड) राजस्थान
                               इ) उत्तर प्रदेश
 1) 1-अ, 2-ब, 3-ड, 4-इ ✅✅           2) 1-अ, 2-ड, 3-इ, 4-क
3) 1-अ, 2-इ, 3-ड, 4-ब     
4) 1-ब, 2-क, 3-ड, 4-अ

 ५)  तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते ?  

 A) जळगाव 
 B) नाशिक  
 C) नंदूरबार ✅✅
 D) धुळे 

 ६) भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे ? 

अ. बिहार
ब. कर्नाटक
क, तेलंगणा
ड. मध्यप्रदेश

 A) फक्त अ, ब, क  ✅✅
 B) फक्त अ, ब, ड  
 C) फक्त ब, क, ड  
 D) फक्त अ, क, ड

 ७)योग्य कथन/कथने ओळखा. 

अ. राज्याच्या महाअधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करतात.
ब. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक राज्यपाल करतात.
क. उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची नियुक्ती राज्यपाल करतात. * 

 A) फक्त अ  
 B) फक्त अ, ब  ✅✅
 C) फक्त अ, क 
 D) वरील सर्व 

 ८) खालीलपैकी केंव्हा मुख्य माहिती आयुक्तास किंवा माहिती आयुक्तांना त्यांच्या पदावरून दूर करण्यात येईल ? 

अ. पंतप्रधान यांनी राष्ट्रपती यांचेकडे शिफारस केल्यावरून
ब. राष्ट्रपतींच्या आदेशावरून सर्वोच्च न्यायालयाने निर्देश केल्यानंतर
क. शाबीत झालेल्या गैरवर्तनाच्या किंवा असमर्थतेच्या कारणास्तव
ड. उच्च न्यायालयाने पदावरून दूर केले पाहिजे, असा अभिप्राय दिल्यानंतर राष्ट्रपतीच्या आदेशाद्वारे

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ? 

 A) फक्त अ 
 B) वरील सर्व  
 C) क आणि ड 
 D) ब आणि क ✅✅

 ९) महाराष्ट्रातील प्रसिद्ध ' यावलीचा संग्राम '  पुढीलपैकी कोणत्या प्रदेशात आणि कुठल्या राष्ट्रीय चळवळीशी संबंधित होता? 

१) वऱ्हाड -सविनय कायदेभंग 

२) मराठवाडा -चले जाव 

३) पश्चिम महाराष्ट्र - चले जाव 

४) वऱ्हाड - चले जाव ✅✅


 10) ठाणे जिल्ह्यातील घोलवड येथील —– लोकप्रिय आहेत. 

 1) आंबे
 2) चिकू ✅✅
 3) द्राक्ष
 4) नारळ

 ११) 1916 राष्ट्रीय काँग्रेस चे   अधिवेशन खालीलपैकी कोठे पार पडले? 

१) लाहोर

२) पुणे 

३) कोलकाता

४) यापैकी नाही -लखनौ ✅✅

 12) कोणत्या राज्यात कोविड-19 विषयी जागृती करण्यासाठी ‘मिशन फतेह’ अभियान चालविले जात आहे? 

(A) गुजरात
(B) पंजाब ✅✅
(C) जम्मू व काश्मीर
(D) राजस्थान

 १३) अनियततापी प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ? 

A. रक्त गोठलेले असते
B. रक्त थंड असते
C. शरीराचे तापमान बाहेरच्य तापमानानुसार बदलत राहते✅✅
D. शरीराचे तापमान स्थिर असते

 14) ब्रिटिशांनी भारतात ताग उद्योग सुरू केला कारण :, 

(a) त्यांना ताग उद्येग गाबद्दल आकर्षण होते 
(b)भारतीय उद्योग धंध्यांचा विकास करणे 
(c) भारतीयांना रोजगार मिळवून देणे .
(d) वाढती मागणी होती व अधिक नफा मिळवणे .

A. (a) फक्त
B. (a) आणि (b)फक्त
C. (a)' (b) आणि (c) फक्त
D. (a) आणि (d) फक्त ✅✅


 15) . दलहस्ती उर्जा निर्मीती उर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ? 

A. चिनाब ✅✅
B. कृष्णा
C. पेन्नार
D. कावेरी


* 16) जागतिक वृत्तपत्र स्वतंत्र निर्देशांक 2020 नुसार भारताचे स्थान कितवे आहे?** 

  ✅भारताचा क्रमांक 142 वा 


Random Question:

1. महाराष्ट्रत मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे?

1⃣पणे ✅

2⃣नागपुर

3⃣औरंगाबाद

4⃣कोल्हापूर


2. मुंबईचे अनाभिषितक सम्राट कोणास म्हटले जात असे?

1⃣जगन्नाथ शंकरशेठ✅ 2⃣फिरोझशहा मेहता

3⃣नया. तेलंग

4⃣बहराम मलबारी


3. आधुनिक लोकशाही राज्याचाच राजकीय, सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील सर्वस्पर्शी कार्यक्रम ह्या शब्दांत .............. यांनी मार्गदर्शन तत्वांचा गौरव केलेला आहे?

1⃣प. जवाहरलाल नेहरू

2⃣हदयनाथ 

3⃣कझरू✅

4⃣सरदार वल्लभभाई पटेल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर


4. गंगा नदी मैदानी (सखल) प्रदेशात -------- जवळ प्रवेश करते.

1⃣रद्रप्रयाग

2⃣ऋषिकेश✅

3⃣अलाहबाद

4⃣गाढवाल


5. १९९९- २००० या वर्षामध्ये शेतमालाची किंमत निर्देशांक किती होता.

1⃣१८०.०

2⃣१३७.२✅

3⃣११०.०

4⃣१२०.५


6. भारतात सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी होते?

1⃣बॉम्बे हाय

2⃣दिग्बोई

3⃣अकलेश्वर✅

4⃣बरौनी


7. ग्रँट मेडिकल कॉलेज केव्हा सुरू झाले?

1⃣१८२४

2⃣१८४५✅

3⃣१८४८

4⃣१८५३


8. ………… वॄक्षापासून तयार होणाया गोंदास मागणी आहे.

1⃣खर ✅

2⃣कसूम

3⃣कडोल

4⃣शलार्इ


9. भाक्रा नांनगल प्रकल्प………… नदिवर आहे.

1⃣कष्णा

2⃣दामोदर

3⃣अलमाटी

4⃣सतलज✅


10. संविधानाच्या सरनाम्यामधील स्वातंत्र्य समता व बंधुता ही तत्वे कशातून घेण्यात आलेली आहे?

1⃣अमेरिकन राज्यक्रांती

2⃣रशियन राज्यक्रांती

3⃣नहरू रिपोर्ट

4⃣फरेंच राज्यक्रांती✅


1) मसुली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यातआहे

➡️उत्तराखंड


2) गीताजंली एक्सप्रेस कोणत्या स्थानकादरम्यान धावते

➡️मबई-कोलकाता


3) चेतक एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावते

➡️उदयपूर-दिल्ली


4) राजधानी एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावते

➡️नवी दिल्ली - मुंबई सेंट्रल


5) उडिसा राज्यातील रुलकेला येथे कोणता कारखाना आहे

➡️पोलादाचा


6) गुजरात राज्यातील सोनगड येथे कोणता कारखाना आहे

➡️कागदाचा


7) झारखंड राज्यातील सेंद्री कशासाठी प्रसिध्द आहे

➡️खत प्रकल्प


8) हिमाचल प्रदेशातील कोणते देशातील पहिले व सर्वाधिक उंच धरण आहे

➡️भाक्रा


9) भारतातील बहुसंख्य लोकांचे प्रमुख अन्न कोणते 

➡️तांदुळ


10) राजस्थानमध्ये कालव्याच्या पाणीपुरवठ्यामुळे कोणत्या पिकाचे उत्पादन प्रचंड प्रमाणावर वाढले आहे

➡️गहु

इतिहास सरावप्रश्न

 📌भारत आणि चीन यांनी कोणत्या वर्षी पंचशील करारावर सह्या केल्या ?

⚪️ 1953

⚫️ 1955

🔴 1954 ✅✅✅

🔵 1957




📌 खालीलपैकी कोणता राजकीय पक्ष संयुक्त महाराष्ट्र समितीत सहभागी झाला नाही ?

⚪️ हिंदू महासभा

⚫️ महाराष्ट्रातील राष्ट्रीय काँग्रेस पक्ष ✅✅✅

🔴 शड्यूल्ड कास्ट्स पक्ष

🔵 जनसंघ



📌 कॉमन विल" व "न्यू इंडिया" ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली ?

⚪️ दादाभाई नौरोजी

⚫️ बकिमचंद्र चटर्जी

🔴 लाला लजपतराय

🔵 ऍनी बेझंट ✅✅✅



📌26 जुलै 1862 ला इंग्लंडच्या राणीने दिलेल्या परवानगीनुसार देशात खालीलपैकी कोणते उच्चन्यायालय सुरू झाले नाही ?

⚪️ मबई

⚫️ कोलकाता

🔴 अलाहाबाद ✅✅✅

🔵 मद्रास



📌 वत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा 1878 कोणी मंजूर केला ?

⚪️ लॉर्ड लिटन ✅✅✅

⚫️ लॉर्ड रिपन

🔴 लॉर्ड कर्झन 

🔵 लॉर्ड डफरीन


📌 राष्ट्रीय काँग्रेसचे "राष्ट्रीयीकरण करणारी शक्तिशाली संस्था" असे वर्णन 1891 च्या भाषणात कोणत्या नेत्याने केले ?

⚪️ वयोमेशचंद्र बॅनर्जी

⚫️ पी. आनंद चार्लु ✅✅✅

🔴 लोकमान्य टिळक

🔵 फिरोजशहा मेहता



📌 विनायक दामोदर सावरकरांना "स्वातंत्र्यवीर" ही उपाधी खालीलपैकी कोणी दिली होती?

⚪️परल्हाद केशव अत्रे✅✅✅अचूक उत्तर

⚫️महात्मा गांधी

🔴सनापती बापट

🔵शकरराव चव्हाण

राणी लक्ष्मीबाई

महाराणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर

टोपणनाव:मनू

जन्म:नोव्हेंबर १९, इ.स. १८३५

काशी, भारत

मृत्यू:जून १७, इ.स. १८५८

झाशी, मध्य प्रदेश

चळवळ:१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध

प्रमुख स्मारके:ग्वाल्हेर

धर्म:हिंदू

वडील:मोरोपंत तांबे

आई:भागीरथीबाई तांबे 

पती:गंगाधरराव नेवाळकर

अपत्ये:दामोदर (दत्तकपुत्र)


लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, (नोव्हेंबर १९, इ.स.१८३५ - जून १७, इ.स. १८५८) या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ.स. १८५७च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरूद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. यांच्या शौर्याने यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले.


बालपण


लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका तांबे होते. यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला होता.


व्यक्तिमत्त्व


धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणार्‍या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत नानासाहेब पेशवे, जयाजी शिंदे व लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातील प्रत्येक विद्येत प्रावीण्य मिळविले. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणार्‍या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या.


वैवाहिक जीवन


इ.स. १८४२ मध्ये त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेंव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झाशीच्या प्रजाजनांत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले.


दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांस पसंत नसल्याने मिळालेल्या वेळेचा उपयोग लक्ष्मीबाईंनी स्वत्त्व जपण्यासाठी केला. त्यांनी आपला रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी नियमित सुरू ठेवली.


गंगाधरराव नेवाळकर व लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला परंतु तीन महिन्याचा असताना तो मृत्यू पावला. मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधररावही या गोष्टीने दुःखी झाले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे दामोदर असे नाव ठेवले. इ.स. १८५३ मध्ये गंगाधररावांचे निधन झाले.


झाशी संस्थान खालसा


पूर्वीपासून झाशीच्या ब्रिटिशांशी असणार्‍या मैत्रीपूर्ण संबंधांवरून राणी लक्ष्मीबाईंना ईस्ट इंडिया कंपनीद्वारे ब्रिटिश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही असे वाटत होते. त्यासाठी लक्ष्मीबाई स्वतः ईस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत होत्या. या पत्रव्यवहारातून त्यांनी कंपनी सरकारचा अन्याय, बेकायदेशीरपणा आणि खोडसाळपणा उघड केला. एका पत्रात त्यांनी झाशी संस्थान खालसा केले, तर पूर्ण हिंदुस्थानातील लोकांना हळहळ वाटेल. परिणामी हिंदुस्थानातील लोकांना ब्रिटिशांबद्दल भरवसा, विश्वास वाटेल का?, अशी शंका व्यक्त करून कंपनीला एक प्रकारचे आव्हान दिले. कंपनी सरकारच्या बेजबाबदार अनैतिक कृत्यांनी व कंपनीच्या अधिकाराला आव्हान देणाचे धारिष्ट्य करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई या देशातील पहिल्या काही व्यक्तींमधील एक होत्या.


परंतु हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतलेलाच असल्याने झाशी संस्थानही खालसा करण्यात आले. १३ मार्च, इ.स. १८५४रोजी झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झांशी संस्थान ब्रिटिश सरकारांत विलीन करण्यात आले. त्या वेळीच स्वाभिमानी राणीने माझी झाशी देणार नाही असे स्फूर्तिदायक उद्गार काढले.


झाशी खालसा झाल्यावर लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले. राणी लक्ष्मीबाईंना पदच्युत झाल्याचा अपमान सहन करीत काही काळ शांत बसावे लागले होते.


इ.स. १८५७चे स्वातंत्र्ययुद्ध


इ.स. १८५७ चा उठाव हा पूर्ण हिंदुस्थानात झाला. त्याप्रमाणे ५ जून, १८५७ ला झाशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ ३५ शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या. पुढे २२ जुलै, इ.स. १८५७ ला ब्रिटिशांनी राणींना झाशीची अधिकारसूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या, परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता. मनुष्यबळ नव्हते आणि खजिनाही रिकामाच होता. प्रजेच्या मनात असुरक्षितता, भविष्याबद्दल भीती होती. परंतु तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने परिस्थिती हाताळली. जुन्या विश्र्वासातील लोकांना परत बोलावून त्यांना काही अधिकाराची पदे दिली. दिवाण लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री, तर प्रत्यक्ष वडिलांना - मारोपंत तांब्यांना - खजिनदार केले. लक्ष्मणरावांचा भाऊ, मुलगा तसेच मुन्सफ, भोलानाथ, आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे व शस्त्रास्त्रांच्या जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकूरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळविले. राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या २२ तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मितीही सुरू केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणार्‍या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. परकीयांविरुद्ध लढण्याची तयारी करीत असतानाच राणींनी प्रजेचा स्वाभिमान, निष्ठा वाढवण्याचा व आनंद जपण्याचा प्रयत्न केला. दानशूर, श्रद्धाळू व दयाळू लक्ष्मीबाईंनी थंडीत कुडकुडणार्‍या हजार-दीड हजार गरीबांना, साधू-संन्याशांना उबदार कपड्यांचे वाटप केले. स्वतःबरोबर प्रजेच्या श्रद्धा जपणार्‍या राणीने गोवध बंदी सुरू केली. रंगपंचमीसारखा सण साजरा करून स्त्रियांसाठी हळदी-कुंकवासारखे धार्मिक कार्यक्रम त्यांनी किल्ल्यावर केले.


अशा प्रकारे प्रशासन, सैन्य व कल्याणकारी कामे यांची चोख व्यवस्था लावून स्वराज्य असल्याचा विश्र्वास राणी लक्ष्मीबाईंनी जनतेत निर्माण केला. प्रजेला मुक्त मनाने आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी, त्यांच्या कलेची जोपासना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी झाशीमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग घडवून आणले. मराठी भाषिकांसाठी रासक्रीडा, चित्रलेखा, बाणासूर इ. नाटके योजली. स्वतःही नाटकांचा आनंद घेतला. एक स्थिर, सुरक्षित, समृद्ध व सुसंस्कृत राज्य घडवण्याचा प्रयत्न राणी लक्ष्मीबाईंनी केला. यामुळे राणी आणि झाशीतील प्रजा यांच्यातील नाते दृढ झाले.


दरम्यान २१ मार्च, इ.स. १८५८ ला सकाळीच सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झाशीजवळ आला. त्याने राणींस नि:शस्त्र भेटीस यावे किंवा युद्धास तयार राहावे असे कळविले. ब्रिटिशांनी केलेल्या विश्र्वासघातामुळे, अन्यायामुळे ‘भारतात विदेशी शासन नकोच’ अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्याचे नाकारले. त्याच वेळी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्यास सुचविले.


उत्तम प्रतीचा सेनानी आणि कर्तबगार राजकारणी असणार्‍या ह्यू रोजने झाशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजुबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळविला. त्या टेकड्यांवर तोफा चढवल्या. २-३ दिवस झाशीची बाजू अभेद्य होती. घनगर्ज भवानीशंकर, कडक बिजली या तोफा आपल्या नावाप्रमाणे कार्यरत होत्या. घौसखान याने तर तोफेमधून असा मारा केला, की त्यामुळे दोन शिवमंदिरे वाचली. या गोष्टीसाठी आजही झाशीतील लोक त्याला धन्यवाद देतात. युद्धाच्या ९ व्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफ बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारे पाडली. ही खिंडारे बुजवण्यासाठी रातोरात काम केले गेले. त्या वेळी चुना, दगड, विटा यांची ने-आण करण्याचे काम स्त्रियांनी केले होते हे विशेष.


शेवटी ब्रिटिशांना फितुरांनीच साथ दिली. झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहीरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा व्हायचा, ती विहीर आणि जिथे दारुगोळा तयार व्हायचा, तो कारखाना, ही दोन ठिकाणे इंग्रजांनी उद्ध्वस्त केली. अशा स्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणार्‍या मदतीवर होती. त्याप्रमाणे ३१ मार्चला तात्या टोपेंचे सैन्य आले. परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.


राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावरच लढण्याचे आवाहन केले. एवढेच नाही तर ‘रणांगणात तुम्हाला मृत्यू आला, तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन’ असे आश्र्वासन दिले. राणीचे डावे-उजवे हात असणारे खुदाबक्ष आणि घौसखान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडल्यावर मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत, सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याचा निर्णय अंमलात आणला. संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती, की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य, शौर्य, आवेश पाहून ह्यू रोजही थबकला. तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन लक्ष्मीबाईंना परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकार्‍यांशी लक्ष्मीबाईंनी चर्चा केली आणि निर्णयानुसार रातोरात त्यांनी झाशी सोडले. सतत ११ दिवस राणींनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले. लढाईचा साक्षीदार ह्यूज रोजनेही म्हटले की ‘राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती.’


या पराभवानंतर राणी पेशव्यांबरोबर ग्वाल्हेरला गेली. तेथेही स्वस्थ न बसता लक्ष्मीबाईंनी आपल्या सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैन्यांमध्ये फिरून, सैनिकांची चौकशी करीत, इंग्रजांना रोखण्यासाठी कशा प्रकारे मोर्चे बांधणी करावी याविषयी त्यांनी चर्चा केली. याच वेळी १७ जून इ.स. १८५८ रोजी सकाळीच ब्रिटिश अधिकारी स्मिथ सैन्यासह ग्वाल्हेरच्या अगदी जवळ येऊन पोहोचला. त्याने त्वरित हल्ला चढवला. लक्ष्मीबाईंनी रणांगणात धाव घेतली. लक्ष्मीबाई तलवारीचे सपसप वार करीत समोर येणार्‍या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या. आवेगाने, विजेसारख्या तळपणार्‍या राणींकडे पाहून त्यांचे सैन्यही त्वेषाने लढले. इंग्रज अधिकारी स्मिथचे सैन्य मागे हटणारच होते, त्याच वेळी नव्या दमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली. दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर राणींचा निभाव लागला नाही. परिस्थिती ओळखून त्या काही स्वारांनिशी बाहेर पडल्या. थोडे पुढे जाताच एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा अडला. नेहमीचा घोडा शेवटच्या लढाईत त्यांच्याबरोबर नव्हता. काही केल्या घोडा ओढा ओलांडत नव्हता. तिथे इंग्रजांशी लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्‍तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. त्यांचा डाव्या कुशीतही तलवार घुसली, परंतु पुरूषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज ओळखू शकले नाही. ते पुढे निघून गेले. घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या सेवकाने एका मठात आणले. परंतु त्यांची उपचार करण्याची इच्छा नव्हती. आपला देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्या सेवकाने त्यांना मुखाग्नी दिला. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी मरण स्वीकारले आणि अशाप्रकारे एका शूर राणीला रणांगणात वीरमरण आले.

भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प



🔶मचकुंदी प्रकल्प 

मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मिती.


🔶शरीशैलम प्रकल्प

आंध्र प्रदेश कृष्ण नदीवर मुख्य उद्देश वीजनिर्मिती.


🔶बियास प्रकल्प

पंजाब, हरियाना व राजस्थान यांचा संयुक्त प्रकल्प. यामध्ये बियास सतलज जोड कालवा व बियास नदीवरील पोंग येथील धरणाचा समावेश होतो.


🔶भाक्रा-नानगल

पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान व हरियाना यांचा संयुक्त प्रकल्प. सतलज नदीवर हिमाचल प्रदेशात ' भाक्रा व पंजाब मध्ये नानगल अशी दोन धरणे भारताची सर्वात मोठी बहुददेशीय योजना. भाक्रा हे देशातील सर्वात उंच धरण आहे. उंची २२६ मीटर.


🔶दामोदर खोरे योजना

पश्चिम बंगाल व विभाजनापूर्वी बिहारमधील संयुक्त प्रकल्प. जलसिंचन, वीजनिर्मिती, पूरनियंत्रण, इत्यादी, या प्रकल्पाचे व्यवस्थापन दामोदर खोरे महामंडळ तर्फे केले जाते. अमेरिकेतील प्रसिद्ध टेनेसी व्हाली च्या धर्तीवर रचना.


🔶फराक्का योजना 

हि योजना पश्चिम बंगालमध्ये राबविली जात असून या योजनाअंतर्गत गंगा नदीवर फराक्का येथे व भागीरथी नदीवर जांगीपूर येथे धरणे बांधली आहेत. हुगळी नदीचा प्रवाह कायम राखणे व कोलकाता बंदराची व्यवस्था राखणे हे या योजनेमागचे उद्देश आहेत.


🔶हिराकूड 

प्रकल्प ओरिसा राज्यात आहे. संबळपूरजवळ महानदीवर जगातील सर्वाधिक लांबीचे धरण बांधले जाते. धरणाची लांबी २५.४०  कि मी आहे.


🔶चबळ योजना

हि मध्य प्रदेश व राजस्थान ची संयुक्त योजना असून या योजनेंतर्गत चंबळ नदीवर रानाप्रतापसागर व जवाहरसागर कोटा दोन धरणे राजस्थान व गांधीसागर हे धरण मध्य प्रदेशात बांधले आहे. मुख्य उद्देश वीजनिर्मिती आहे.


🔶उकाई प्रकल्प

तापी नदीवरील गुजरात राज्यातील बहुद्देशीय प्रकल्प होय.


🔶कोसी प्रकल्प

विभाजनापूर्वी बिहार व नेपाळ सरकारची संयुक्त संस्था. गंडकी नदीवर वाल्मिकी नदीवर धरण.

दामोदर नदी

✔️ बिहार आणि प. बंगाल राज्यांतील खनिजसमृद्ध प्रदेशातून वाहणारी गंगेची उपनदी. लांबी सु. ६२५ किमी. जलवाहनक्षेत्र २०,७०० चौ.किमी.


✔️  ही छोटा नागपूर पठारातील रांची पठारावर पालामाऊ जिल्ह्याच्या तोरी परगण्यात रांचीपासून ५६ किमी., रांची–लोहारडागा रस्त्यावरील कुरू गावाच्या पूर्व ईशान्येस १६ किमी. वर, समुद्रसपाटीपासून सु. ६१० मी. उंचीवर उगम पावते. 


✔️ तिचा दुसरा उगमप्रवाह हजारीबाग जिल्ह्यातील तोरी–समारिया रस्त्यावरील बालुमाथ गावाच्या दक्षिणेस सु. ३ किमी. वरून निघून पहिल्या मुख्य प्रवाहाला सु. २० किमी. वर मिळतो.


✔️  सरुवातीला दामोदर सु. ४२ किमी. डोंगराळ भागातून वाहते. नंतर ती पठारावरील विभंगद्रोणीतून करणपुरा व रामगढ कोळसाक्षेत्रांतून सु. ७५ किमी. पूर्वेकडे गेल्यावर ईशान्येस सु. २३ किमी. जाते व पुन्हा सामान्यतः पूर्वेकडे वाहू लागते.


✔️ बोकारो कोळसाक्षेत्रातून आलेली गोमिया व उत्तरेकडून आलेली कोनार यांचा संयुक्त प्रवाह तिला गोमिया व बेर्मो यांदरम्यान मिळतो. 


✔️जमुनिया व इतरही अनेक प्रवाह तिला दोन्ही बाजूंनी येऊन मिळतात.

गोंद्या आला रे .....



कालच्या दिवशी १८९७ साली पुण्यात एक प्रतिशोधाचे धगधगते अग्निकुंड पेटले. त्यात जुलमी ब्रिटिश अधिकारी रँड याचा वध तर झालाच, पण पुणेकर जनतेवर झालेल्या अत्याचाराचा प्रतिशोध म्हणून रँडवर ही कारवाई करणारे तीन युवा क्रांतिकारक चाफेकर बंधू यांनीही फाशीच्या तक्तावर चढून आत्माहुती दिली.

त्यांच्या या बलिदानाने साऱ्या देशात खळबळ उडाली. चाफेकर बंधू अमर झाले.

वासुदेव, दामोदर व बाळकृष्ण हे तिघे चाफेकर बंधू मुळचे कोकणातले. त्यांचे कुटुंब पुण्याजवळ चिंचवडला स्थायिक झाले. तिथेच त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध जनजागृतीचे कार्य सुरू केले.

ते लोकमान्य टिळकांच्या संपर्कात आले व त्यांच्या कार्याला दिशा व गती लाभली. १८९7मध्ये प्लेगच्या साथीने पुण्यात अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रँडला भारतात पाचारण केले.

रँडने रोग निवारण करण्याच्या उपायांची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली. हे करताना त्याने सामाजिक पायदंड पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला. यामुळे चाफेकर बंधूच्या मनात ब्रिटिशाविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. या साऱ्याचा सूड घेण्याची व रँडचा वध करण्याची योजना त्यांनी तयार केली.

त्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सव भारतातही साजरा करण्यात येत होता. सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. तसेच मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते.

याच संधीचा फ़ायदा घेत दामोदर चाफेकर यांनी गणेश खिंडीत पाळत ठेवली व २२ जून १८९७ च्या मध्यरात्री रँडच्या घोडागाडीवर चढून जवळून गोळ्या झाडल्या. रँड काही काळ कोमात राहिला व ३ जुलै १८९७ रोजी मरण पावला.

याचवेळेस दामोदराचा  भाऊ बाळकृष्णाने रॅड सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या.

चाफेकर बंधू निसटण्यास यशस्वी झाले तरी नंतर, तिघाही भावांना पकडण्यात आले. दामोदराला मुंबईत अटक झाली व १८ एप्रिल १८९८ रोजी त्यास येरवडा तुरुंगात फासावर चढवण्यात आले. त्यापाठोपाठ वासुदेवाला ८ मे १८९९ व बाळकृष्णाला १६ मे १८९९ रोजी फासावर चढवण्यात आले, व तीनही चापेकर बंधू हुतात्मा झाले.

तीन सख्ख्या भावांनी एकाच वेळी स्वातंत्र्य लढ्यास बलिदान करण्याची जगातील ही बहुधा पहिली व एकमेव घटना!

पहिली पंचवार्षिक योजना




कालावधी:-1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956

प्रतिमान:- हेरॉड डोमर

योजना

🔴दामोदर प्रकल्प(झारखंड व पश्चिम बंगाल)

🔴भाक्रा नांगल(हिमाचल प्रदेश व पंजाब)

🔴कोसी प्रकल्प (बिहार)

🔴हिराकुड योजना( ओडिशा महानदीवर)

🔴सिंद्री खत कारखाना(झारखंड)

🔴HMT बंगलोर

🔴चित्तरंजन इंजिन कारखाना

🔴हिंदुस्थान अँटिबायोटिक (पूणे)

1952:- समुदाय विकास कार्यक्रम

1952:- भारतीय हातमाग बोर्ड

1953:-खादी व ग्रामोद्योग बोर्ड

1955:- SBI स्थपना

1955:-ICICI स्थापना

👉राष्ट्रीय उत्पन्न 18 टक्के वाढ

👉दरडोई उत्पन्न 11 टक्के वाढ

👉किंमत निर्देशांक 13 टक्के ने कमी

वृद्धी दर

संकल्पित👉2.1%

साध्य👉3.6%


दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1882 मध्ये ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले होते. त्यामुळे, आजचा दिवस महाराष्ट्रात ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो.

- आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे प्राथमिक शिक्षण पोंभुर्ले या गावी झाले. त्यानंतर, ते मुंबईत आले.
मुंबईत आल्यावर जांभेकरांनी बापू छत्रे यांच्या निवासस्थानी राहून अध्ययन सुरू केले.
- बाँम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवण्याइतपत ज्ञान मिळवले.
- 1834 मध्ये मुंबईतल्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये पहिले एतद्देशीय व्याख्याते म्हणून जांभेकरांची नियुक्ती झाली.
- 6 जानेवारी 1832 मध्ये दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुरूवात जांभेकरांनी केली आणि या वृत्तपत्राच्या संपादकपदाची धुरा त्यांनी सांभाळली.
- अवघ्या 20 व्या वर्षी त्यांनी दर्पणच्या संपादकपदाची मोठी जबाबदारी पेलली.
- बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन केले.
- जांभेकरांनी समाजातील वर्णव्यवस्था, स्त्री दास्य, अस्पृश्यता, बालविवाह, जातीभेद इत्यादी गोष्टींवर त्यांनी आवाज उठवला, वृत्तपत्रांतून लिखाण केले. त्यामुळे, त्यांना आद्य समाजसुधारक ही म्हटले जाऊ लागले.
- मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन आणि ग्रीक या तब्बल 10 भाषांचे ज्ञान बाळशास्त्री जांभेकरांना होते.
- या भाषांसोबतच, विज्ञान, भूगोल, गणित आणि सामान्य ज्ञान या विषयांचे त्यांना खोलवर ज्ञान होते.
- बाळशास्त्री यांनी प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख आणि ताम्रपट यांच्यावर शोधनिबंध लिहिले.
- मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी त्यांनीच पहिल्यांदा वाचकांच्या हाती दिली होती.
- बाळशास्त्री यांनी सुरू केलेले दर्पण हे वृत्तपत्र साडेआठ वर्षे चालले. त्यानंतर, 1840 मध्ये जुलै महिन्यात या वृत्तपत्राचा शेवटचा अंक प्रसिद्ध झाला.
- 1840 मध्ये जांभेकरांनीच 'दिग्दर्शन' या मराठीतील पहिल्या मासिकाची सुरूवात केली होती. या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी जवळपास 5 वर्षे काम पाहिले होते.

● ग्रंथसंपदा
शून्यलाब्दी, सारसंग्रह, हिंदुस्थानचा इतिहास, इंग्लंडचा इतिहास, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास, लोकहितवादी, लक्ष्मीज्ञान, जातीभेद, भिक्षुक, गीतातत्व, भरतखंडपर्व, कलियुग, ऐतिहासिक गोष्टी पानिपत लढाई, लंकेचा इतिहास

चालू घडामोडी :- 05 जानेवारी 2024

◆ एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी डॉ. माधव कुसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ सुखविंदर सिंग यांनी हिमाचल प्रदेशमध्ये राष्ट्राच्या पहिल्या-वहिल्या रिपोर्ट आणि मीटिंग व्यवस्थापन पोर्टलचे उद्घाटन केले.

◆ CCRAS आणि NCISM ने आयुर्वेद संशोधन पुढे नेण्यासाठी 'SMART 2.0' चे अनावरण केले.

◆ राम मंदिराच्या सन्मानार्थ छत्तीसगडमध्ये 22 जानेवारीला ड्राय डे घोषित करण्यात आला.

◆ मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी दरमहा रु. 3,000 ची वर्धित YSR पेन्शन कनुका वितरित केली.

◆ जम्मू-काश्मीर सरकारने मदरसा बोर्डाच्या स्थापनेचा प्रस्ताव देण्यासाठी मसुदा समिती स्थापन करण्यास मान्यता दिली.

◆ NHAI आणि NRSC, ISRO अंतर्गत, विस्तृत टराष्ट्रीय महामार्ग जाळ्यासाठी "ग्रीन कव्हर इंडेक्स" तयार करण्यासाठी आणि अहवाल देण्यासाठी 3 वर्षांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.[NRSC मुख्यालय :- हैद्राबाद]

◆ दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन मैदनावर कसोटी क्रिकेट चा सामना जिंकणारा रोहित शर्मा पाहिला आशियाई कर्णधार ठरला आहे.

◆ भारत देशाच्या क्रिकेट संघाने सर्वात वेगवान कसोटी विजय मिळवण्याचा विश्वविक्रम नोंदविला आहे.

◆ केपटाऊन येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका या देशा सोबत खेळवण्यात आलेला कसोटी क्रिकेट सामना इतिहासातील सर्वात कमी चेंडूचा सामना ठरला आहे.

◆ रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ रश्मी शुक्ला(1988 IPS Batch) या महाराष्ट्र राज्याच्या पाहिल्या महिला पोलिस महासंचालक ठरल्या आहेत.

◆ महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक पदी नियुक्ती झालेल्या रश्मी शुक्ला यांना 2005 साली उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक मिळाले होते.

◆ रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र-2 योजना राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.

◆ महाराष्ट्र सरकारने 2021-22 ते 2025-26 कालावधीत रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र-2 योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ देशातील पहिली मुलींची सैनिकी शाळा उत्तर प्रदेश या राज्यात सुरु होणार आहे.

◆ उत्तरप्रदेश येथील वृंदावन येथे राजनाथ सिंह यांच्या हस्ते देशांतील पाहिल्या मुलीच्या सैनिकी शाळेचे उद्घाटन झाले आहे.

◆ सध्या देशात 33 सैनिकी शाळा असून केंद्र सरकारने देशभरात 100 नविन सैनिकी शाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ राष्ट्रिय जिमन्यास्टिक स्पर्धा भुवनेश्वर येथे पार पडली.

◆ महाराष्ट्र राज्यातील शिवडी न्हावासेवा सागरी सेतूला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे.

◆ शिवडी-न्हावासेवा देशातील सर्वात लांबीचा सागरी सेतू आहे.

◆ डेव्हिड चसक टेनिस स्पर्धा फेब्रुवारी 2024 मध्ये पाकिस्तान या देशात होणार आहे.

◆ केंद्रीय नवीन आणि नविकरण ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार पवन उर्जा निर्मितीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे.

◆ केंद्रीय नवीन आणि नविकरण ऊर्जा मंत्रालयाच्या माहिती नुसार सौर ऊर्जा निर्मितीत भारत जगात 5व्या क्रमांकावर आहे.

◆ केंद्र सरकारने 2030 सालापर्यंत 500 GW वीजनिर्मिती अपारंपारिक स्रोता पासून करण्याची घोषणा केली आहे.

◆ इंडीया रेटिंग आणि रिसर्च  ने भारताचा 2024 मध्ये GDP वाढीचा अंदाज 6.7 टक्के वर्तविला आहे.

◆ हिमाचल प्रदेश या राज्यातील हट्टी समुदयाला अनुसूचित जमाती ST चा दर्जा देण्यात आला आहे.

◆ विराट कोहली, गिल, मोहम्मद शमी ICC वनडे क्रिकेटर ऑफ द इयर 2023 साठी नामांकित करण्यात आले.

◆ जालन्यातील निकेश मदारे या दृष्टीहीन शिक्षकाने महात्मा गांधींवर पीएचडी मिळवली आहे.

◆ ओडिशातील सात उत्पादनांना 'जीआय' मानांकन :- 1] लांजिया सौरा चित्रशैली, 2] डोंगरिया कौंध नक्षीदार शाल, 3] खजूर गूळ यांसह, 4] ढेंकनाल येथील मगजी हा खाद्यपदार्थ, 5] मयूरभंज येथील काई चटणी, 6] नयागड कांतेईमुडी वांगी, 7] कालाजीरा तांदूळ

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Latest post

चालू घडामोडी :- 26 एप्रिल 2024

◆ दरवर्षी 26 एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिवस जगभरात साजरा केला जातो. ◆ बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार...