Friday 1 January 2021

एमपीएससी मंत्र : ऐतिहासिक घटनांचे शताब्दी वर्ष : २०२०


✔️ स्वातंत्र्यपूर्व भारतातील पहिल्या सार्वजनिक निवडणुका, असहकार आंदोलन आणि गांधीजींच्या हाती स्वातंत्र्यलढय़ाची सूत्रे, भारतीय उद्योग जगतात असोचॅमची स्थापना, मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजचे अलिगड मुस्लीम विद्यापीठात रूपांतर अशा आधुनिक भारताच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणाऱ्या घटनांचे शताब्दी वर्ष म्हणून २०२० या वर्षांकडे पाहता येईल.


✳️ पहिल्या सार्वजनिक निवडणुका : १९२० ➖


✅ नगरपालिका, जिल्हा मंडळ अशा स्थानिक मंडळांमध्ये पूर्णपणे लोकप्रिय नियंत्रण असावे, प्रांतीय शासनात अंशत: जबाबदार सरकारची स्थापना करावी, केंद्रीय कायदेमंडळाचा विस्तार करून तेथे भारतीयांना अधिक प्रतिनिधित्व द्यावे, प्रांतातील लोकप्रिय शासनावरील भारत सचिवाचे नियंत्रण कमी करावे या १८१८च्या माँटफर्ड अहवालातील शिफारशींना १९१९च्या भारत सरकार कायद्यात कायदेशीर रूप देण्यात आले आणि त्यानुसार प्रांतात दुहेरी शासन (अर्थात प्रांतिक शासन आणि केंद्रीय शासन) पद्धतीचा प्रारंभ झाला. प्रारंभापासूनच या कायद्याला पुरेसे सहकार्य मिळाले नसले तरीही भारतातील पहिली निवडणूक १९२० साली झाली आणि १९२१ ते १९३७ या कालावधीत नऊ प्रांतांमध्ये दुहेरी शासन चालले. बंगालमध्ये मात्र १९२४ ते १९२७ आणि मध्य प्रांतात १९२४ ते १९२६ या काळात दुहेरी शासन नव्हते.


✳️ असहकार चळवळ ➖


✔️ १९१९ मध्ये संमत करण्यात आलेल्या जुलमी रौलट कायद्यामुळे झालेल्या जालियानवाला बाग हत्याकांड तसेच खिलाफत वादावरील इंग्रजांची भूमिका, पंजाबमधील लष्करी कायदा आणि त्यानंतर पंजाबमधील घटनांची चौकशी करण्यासाठी सरकारने केलेली हंटर आयोगाची नियुक्ती ही केवळ लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी केलेली क्लृप्ती आहे असे लक्षात आल्यामुळे १ ऑगस्ट १९२० रोजी गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलनाची औपचारिक सुरुवात झाली. त्याच दिवशी १ ऑगस्टच्या पहाटे लोकमान्य टिळक कालवश झाल्याने त्यांच्या मृत्यूचा दुखवटा व आंदोलनाची सुरुवात देशभरातील जनतेने हरताळ पाळून केली. सप्टेंबर १९२० मध्ये कोलकत्ता येथे खास अधिवेशन बोलावून राष्ट्रीय काँग्रेसने असहकाराचा कार्यक्रम अंगीकारला. डिसेंबर १९२० मधील राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात सरकारी पदव्यांचा त्याग करणे, कायदे मंडळ, न्यायालये, शिक्षण संस्था, परकीय माल यावर बहिष्कार टाकणे तसेच शिस्त राखणे, राष्ट्रीय शिक्षण संस्थांना संरक्षण, खादीचा वापर अशा मार्गाचा वापर करून असहकार आंदोलनाचा मार्ग निश्चित केला. १९२१ मध्ये असहकार चळवळीत जवळजवळ ३०००० लोक तुरुंगात गेले, परंतु चळवळीदरम्यान उत्तर प्रदेशातील चौरीचौरा येथे लोकांनी एका पोलीस चौकीला आग लावली त्यात अनेक पोलीस जळून मृत्युमुखी पडल्यामुळे अहिंसक मार्गाने चालणाऱ्या चळवळीला गालबोट लागले आणि गांधीजींनी या घटनेचा निषेध म्हणून ही चळवळ मागे घेतली. गांधीजींच्या या निर्णयावर अनेकांनी टीकाही केली परंतु तत्कालीन एकूण परिस्थिती पाहता आम जनतेची चळवळ दडपून टाकणे सरकारला अवघड नव्हते. जाळपोळीचे निमित्त होऊन जर ही चळवळ दडपली गेली असती तर जनतेची चळवळ दडपली जाऊ शकते असा निष्कर्ष निघाला असता तसेच जवळपास दीड वर्ष चाललेल्या चळवळीमुळे जनतेच्या सहनशीलतेचा अंत होत आला होता त्यामुळे गांधीजींनी कठोर आत्मसंयमाशिवाय सत्याग्रहाचा प्रयोग होऊ शकत नाही असे स्पष्ट करून जनतेला रचनात्मक कार्य करण्याचा निर्देश देऊन चळवळ मागे घेतली.


🏢 अलिगड मुस्लीम विद्यापीठ ➖ 


✔️ इस्लाममधील सामाजिक दुष्प्रवृत्ती असणाऱ्या पीर प्रथेला विरोध, गुलामांची प्रथा इस्लामविरोधी आहे अशा आपल्या आधुनिक विचारांचा प्रसार ‘तहजीब उल अखालाक’ या पत्रिकेतून करणाऱ्या सर सय्यद अहमद खान यांनी १८७५ साली मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज सुरु केले. तेथे पाश्चात्त्य विज्ञानाबरोबरच मुस्लीम धर्माचेही शिक्षण दिले जात होते. याच कॉलेजचे रूपांतर १९२० साली अलिगड मुस्लीम विद्यापीठात झाले. या विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त एक टपाल तिकीटही जारी करण्यात आले आहे. सध्या या ठिकाणी उर्दू, अरबी आणि पर्शियन भाषांवर तसेच इस्लामिक साहित्यावर संशोधन केले जात असल्यामुळे संपूर्ण इस्लामिक जगाबरोबर भारताच्या सांस्कृतिक संबंधांना नवी ऊर्जा मिळत आहे. शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी या विद्यापीठातर्फे सध्या ‘ब्रिज कोर्स’ सुरू करण्यात आला आहे.


02 January 2021 Current Affairs


Q.1. रिवर क्रूज 'ब्रह्मपुत्र मुकुता' का उद्घाटन किस राज्य में किया गया है ?

Ans. असम


Q.2. किसे विश्व संगीत समारोह में तानसेन सम्मान से सम्मानित किया गया है ?

Ans. प. सतीश व्यास


Q.3. रक्षा मंत्रालय ने किस रक्षा कंपनी को 'ग्रीन चैनल का दर्जा' दिया है ?

Ans. L&T डिफेंस


Q.4. महाराष्ट्र के किस आदिवासी शहर ने 'मिनी महाबलेश्वर' का टैग अर्जित किया है ?

Ans. जौहर


Q.5. ग्लोब सॉकर अवार्डस में प्लेयर ऑफ़ द सेंचुरी पुरस्कार किसने जीता है ?

Ans. क्रिस्टियानो रोनाल्डो


Q.6. प्रतिष्ठित इंजीनियर पुरस्कार 2020 से किसे सम्मानित किया गया है ?

Ans. वी. के. यादव


Q.7. किस बैंक ने खुदरा ग्राहकों को लोन देने के लिए डिजिटल लेंडिंग प्लेटफ़ॉर्म शुरू किया है ?

Ans. बैंक ऑफ़ बडौदा


Q.8. केंद्र सरकार ने किसे अगले छः महीने के लिए अशांत क्षेत्र घोषित किया है ?

Ans. नागालैंड


Q.9. किस देश ने 'फाइव आइज' के पांच देशों वाले गठबंधन में शामिल होने के संकेत दिए हैं ?

Ans. जापान


Q.10. भारत के सबसे ऊंचे मौसम विज्ञान केंद्र का उद्धाटन कहाँ किया गया है ?

Ans. लेह

सिंहगड इन्स्टिट्युट ची प्लेसमेंट मध्ये उत्तुंग झेप


 देशातील विविधनामांकित कंपनीत सिंहगड संस्थेतील विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत आहेत. सिंहगड संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी माहिती तंत्रज्ञान सेवा, व्यापाराभिमुख प्रणाली सेवा आणि आउंटसोर्सिंग सेवा पुरवठा या क्षेत्रात काम करण्याची संधी प्राप्त झाली असल्याची माहिती प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. जयप्रकाश पितांबरे यांनी माहिती दिली.

“टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस” या उद्योग समूहातील सर्वाधिक बाजार मुल्यांकन असलेली व्यापारी संस्था आहे. २००७-०८ या आर्थिक वर्षात ११६,३०८ कर्मचारी, ४७ देशातील कार्यालये आणि ५.७ अब्ज अमेरिकी डॉलर वार्षिक उत्पन्न असलेली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टी.सी.एस.) कंपनी आहे. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी व्यापारी संस्था म्हणून “टीसीएस” चा उल्लेख केला जातो.


“टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस” या कंपनीत सिंहगड संस्थेत अंतीम वर्षात( २०२१)मध्ये अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या “टीसीएस” कंपनीकडून ऑनलाईन मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या मुलाखतीतून कंपनीत आवश्यक असलेली शैक्षणिक गुणवत्ता, उपयुक्त ज्ञान, शिस्त या सर्व गोष्टींवर “टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस” या कंपनीतील मुलाखत घेणारे अधिकारी प्रभावित झाले. कंपनीत आवश्यक असलेले सर्व गुण सिंहगड संस्थेतील विद्यार्थ्यांकडे दिसुन आल्याने सिंहगड मधील ३८२ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड करण्यात आली. त्यामधील ३२७ विद्यार्थ्यांची “टीसीएस नॅशनल काॅलिफायर टेस्ट” (एन क्यु टी) परिक्षेमधुन निवड झाली आहे तसेच ५५ विद्यार्थ्यांची “टीसीएस कोड विटा” परिक्षेमधुन निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक वर्गातून अभिनंदन होत आहे.


भविष्यातील आधुनिक तंत्रज्ञानाची गरज लक्षात घेऊन सिंहगड संस्था विद्यार्थ्यांना अपेक्षित शैक्षणिक सुविधा व नवीन मुल्यवर्धित कार्यशाळा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व औद्योगिक तंत्रज्ञानाशी अनुसरून शिक्षण देत आहे. याशिवाय सिंहगड संस्थेच्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग व प्लेसमेंट यांचा स्वतंत्र विभाग आहे. यामुळे विद्यार्थ्यांना कंपनीत आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाची माहिती देऊन प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळेच आज सिंहगड संस्थेमधील विद्यार्थी “टीसीएस” सारख्या नामांकित कंपनीत निवडला जात आहे.
“टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस” या कंपनीत निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेतील सर्व पदाधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

देशात १०५ वाघांचा मृत्यू; महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर



व्याघ्रसंवर्धसाठी आटोकाट प्रयत्न होत असतानाच मागील वर्षी देशात १०५ वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात वाघांची राजधानी मानल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. ६१ टक्के वाघांचे मृत्यू हे प्रकल्प व अतिसंरक्षित भागात झाल्याने हा चिंतेचा विषय मानला जात आहे.


भारतात २०१८मध्ये करण्यात आलेल्या व्याघ्रगणना सर्वेक्षणात भारतातील वाघांची संख्या वाढल्याची नोंद करण्यात आली होती. यामध्ये देशात सुमारे २ हजार ९६७ वाघ असल्याची नोंद झाली. ही संख्या जगभरातील एकूण व्याघ्रसंख्येच्या सुमारे ७५ टक्के आहे. त्यामुळे व्याघ्रसंवर्धनात केलेल्या कामांना यश आले होते. पण, २०२०मध्ये देशात १०५ वाघांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाने दिली आहे. यात मध्य प्रदेशात सर्वाधिक २९, तर महाराष्ट्रात १६ मृत्यू झाले आहेत. ६४ वाघांचे मृत्यू देशातील विविध भागातील व्याघ्रप्रकल्प व अतिसंरक्षित भागात झाले आहेत. त्यात शिकारीच्या घटनांचादेखील समावेश आहे. महाराष्ट्रात १६पैकी नऊ मृत्यू हे प्रकल्प व अतिसंरक्षित भागात झाले आहेत. त्यामुळे आता प्रकल्प व अतिसंरक्षित भागात करडी नजर ठेवण्याची गरज प्रतिपादित केली जात आहे.


२०२०मधील व्याघ्रमृत्यू


मध्य प्रदेश २९


महाराष्ट्र १६


कर्नाटक १२


तामिळनाडू ८


उत्तर प्रदेश ८



देशातील वाघांचे पाच वर्षांतील मृत्यू -


वर्ष मृत्यू


२०१६ -१२१

महत्वपूर्ण भारतीय संविधान के Question answer



🔲 किस अधिनियम द्वारा भारत में प्रांतों को स्वायत्तता प्रदान की गई थी

Ans- भारत सरकार अधिनियम, 1935✅✅


🔲 शासन की एकात्मक पद्धति का लाभ हैं

Ans- दृढ़ राज्य✅✅


🔲 जिस संविधान सभा द्वारा भारत के संविधान का अधिनियम किया गया, उसके सदस्य थे

Ans- विभिन्न प्रांतों की विधान सभाओं द्वारा निर्वाचित✅✅


🔲 भारतीय संविधान में आपात उपबंध कहां से लिए गए हैं

Ans- भारत सरकार अधिनियम,1935✅✅


🔲 भारत की संविधान सभा किसके कहने पर बनाई गई थी

Ans- कैबिनेट मिशन✅✅


🔲 भारत का संविधान सभा का अध्यक्ष कौन था

Ans- डाॅ. राजेन्द्र प्रसाद✅✅


🔲 भारतीय संविधान की प्रस्तावना में किस प्रकार के न्याय की बात कही गई हैं

Ans- सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय की बात की गई हैं।✅✅


🔲 सविधान की प्रस्तावना में भारत को किस रूप में घोषित किया गया हैं

Ans- एक प्रभुसत्तासंपन्न, समाजवादी, पंथनिरपेक्ष, लोकतांत्रिक गणराज्य✅✅


🔲 भारत पूर्ण संप्रभु लोकतांत्रिक गणतंत्र कब बना

Ans- 26 नवंबर, 1949✅✅


🔲 सविधान की उद्देशिका का संशोधन कितनी बार किया गया था

Ans- एक बार✅✅


🔲 भारतीय संविधान में ‘संघीय’ शब्द का प्रयोग कहां पर हुआ हैं

Ans- संविधान में कही नही✅✅


🔲 भारतीय संविधान के अनुच्छेद 1 में यह घोषणा की गई हैं, कि ‘‘इंडिया अर्थात भारत’’ ……… हैं

Ans- राज्यों का संघ✅✅


🔲 किस अनुच्छेद में इंडिया को भारत भी कहा गया हैं

Ans- अनुच्छेद 1✅✅


🔲 भारत में किस प्रकार का संघवाद देखा जाता हैं

Ans- संघ बनाकर राज्यों का गठन करना✅✅


🔲 भारतीय संविधान कब लागू हुआ

Ans- 26 जनवरी, 1950✅✅


🔲 भारतीय संविधान की रचना के समय संविधान सभा का संविधानिक सलाहकार कौन था

Ans- बी.एन.राव✅✅


🔲 सरकार की किस प्रणालि में द्विसदन पद्धति एक अनिवार्य लक्षण हैं

Ans- संघीय प्रणाली✅✅


🔲 भारत एक कैसा देश हैं

Ans- लोकतंत्र✅✅


🔲 भारत में, एकल नागरिकता की अवधारणा अपनाई गई हैं

Ans- इंग्लैड से✅✅


🔲 सविधान का कौन सा भाग नागरिकता के प्रावधानों से संबंधित हैं- 

Ans- II ✅✅


🔲 भारतीय संवाद निकट हैं

Ans- कनाडा कें✅✅


🔲 भारतीय संविधान ने भारतीय महासंघ की योजना किसके संविधान से ली थी

Ans- कनाडा✅✅


🔲 भारत के संविधान का निर्माता किसे माना जाता हैं

Ans- बी.आर. अंबेडकर✅✅

मराठी व्याकरण - भाषेतील रस



रसाचा शब्दश: अर्थ ‘चव’ किंवा ‘रुची’ असा आहे. व्यवहारात गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट व कडू असे सहा रस आहेत. या सहा रसांमुळेच आपणास पदार्थांची गोडी किंवा चव कळते. यालाच आपण रसास्वाद म्हणतो.


साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंत:करणातील भावना उद्दीपित होतात व रसानिर्मिती होते.


मानवी मनात काही भावना कायमच्या वास करीत असतात उदा. प्रेम करण्याची, रागावण्याची, हसण्याची, दु:खाची, पराक्रमांची इ. या मनातील ‘स्थिर’ व ‘शाश्वत’ भावनांनाच काव्यशास्त्रात ‘स्थायीभाव’ असे म्हणतात.


साहित्य कृतीच्या वाचनाने ‘स्थायी भाव’ जागृत होतात व रसनिर्मिती होते.


१) स्थायीभाव - रती


रसनिर्मिती – शृंगार


हा रस कुठे आढळतो - स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणाच्या वर्ननातुन


उदा – डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहु नका.


२) स्थायीभाव – उत्साह


रसनिर्मिती - वीर


हा रस कुळे आढळतो - पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनात


उदा. ‘शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’


३) स्थायीभाव –शोक


रसनिर्मिती – करुण


हा रस कुठे आढळतो - दुख, वियोग, संकट यांच्या वर्णनात


उदा – आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी!


४) स्थायीभाव – क्रोध


रसनिर्मिती – रौद्र


हा रस कुळे आढळतो – क्रोध, चीड किंवा रागाचे वर्णन


उदा – मनिषाच्या त्या वर्तनाकडे आई डोळे वटारून पाहत होती.


५) स्थायीभाव – हास


रसनिर्मिती – हास्य


हा रस कुठे आढळतो - विसंगती, असंबध्द भाषण, विडंबन,चेष्टा यांच्या वर्णनात.


उदा – मानसीच पेपर लिहिताना लक्ष विचलित होऊ नये म्हणून रश्मी बरोबर अडीच तास आठ दिवस भजी तळत बसायची.


६) स्थायीभाव – भय


रसनिर्मिती- भयानक


हा रस कुळे आढळतो - युद्ध, मृत्यु, खून, सूड, राक्षस, स्मशान इ. च्या वर्णनात.


उदा. तो गुरासारखा ओरडला त्याचे सारे रक्त उलथे पालथे झाले व त्याने जोरात किंकाळी फोडली.


७) स्थायीभाव – जुगुप्सा


रसनिर्मिती – बीभत्स


हा रस कुठे आढळतो - किळस, वीट, तिटकारा इ. च्या वर्णनात.


उदा – मुंबईचा कामगार चाळीतल्या दहा बाय बाराच्या घरात, कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी, ओकारी आणणाऱ्या दुर्गधीत आयुष्यभर खितपत पडलेला असतो.


८) स्थायीभाव – विस्मय


रसनिर्मिती- अदभुत


हा रस कुठे आढळतो - आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनात


उदा – असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.


९) स्थायीभाव – शम (शांती)


रसनिर्मिती – शांत


हा रस कुळे आढळतो - परमेश्वर विषयक भक्ती भाव असलेली गांणी किंवा वातावरणात.


उदा – सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनि तेजाकंडे प्रभू आमच्या ने जीवंना !

विविध राज्यांचे नवीन नियुक्त झालेले मुख्य न्यायाधीश


👤 ज के माहेश्वरी : सिक्कीम उच्च न्यायालय


👤 ए के गोस्वामी : आंध्रप्रदेश उच्च न्यायालय


👤 पकज मित्तल : जम्मू व कश्मीर आणि लदाख उच्च न्यायालय


🙎‍♀ हिमा कोहली : तेलंगणा उच्च न्यायालय


👤 मोहम्मद रफिक : मध्यप्रदेश उच्च न्यायालय


👤 आर एस चौहान : उत्तराखंड उच्च न्यायालय


👤 एस मुरलीधर : ओडिशा उच्च न्यायालय


👤 सजीब बँनर्जी : मद्रास उच्च न्यायालय .

शनिवारच्या कोरोना लसीकरणाच्या ड्राय रनसाठी राज्यातल्या पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड.


🔰 कोरोना लसीकरणाचा ड्राय रन उद्या देशभर होणार असून त्यासाठी राज्यातल्या पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. 


🔰 कद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल याबाबत घेतलेल्या व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरणासाठी कशाप्रकारे तयारी करायची याबाबत मार्गदर्शन केल्याचं त्यांनी सांगितलं.


🔰 ड्राय रनसाठी एकाच जिल्ह्यातली तीन आरोग्य केंद्रं निवडली आहेत. तीनही  ठिकाणच्या प्रत्येकी २५ जणांना लसीकरणासाठी निवडलं जाईल. मात्र प्रत्यक्षात लस टोचली जाणार नाही. पण त्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याप्रमाणे सर्व तयारी केली जाणार आहे. 


🔰 परत्यक्ष लसीकरणाच्या दृष्टीनं काही उणिवा राहिल्या असतील तर त्या दूर करण्याच्या दृष्टीनं या ड्रायरनचा मोठा उपयोग होईल, असं टोपे यांनी सांगितलं.


🔰 लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा यासोबत प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तिनं कक्ष केले जातील. 


🔰 पण्यातलं जिल्हा रुग्णालय औंध, प्राथमिक आरोग्य केंद्र मान, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातलं जिजामाता रुग्णालय, नागपूर जिल्ह्यातलं डागा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय कामटी, नागपूर महापालिकेचं शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, जालना जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय अंबड, बदनापूर तालुक्यातलं शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंदूरबार जिल्हा रुग्णालय नंदूरबार, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे आणि नवापूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसीकरणाचा ड्राय रन होणार आहे.

आजपासून काय बदलणार.


🔰नवीन धनादेश देय पद्धती : रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्देशानुसार वाणिज्यिक बँका ‘पॉझिटिव्ह पे सिस्टिम’ लागू करत आहेत. ५०,००० रुपयांवरील व्यवहारासाठी धनादेशाबरोबर संबंधितांनी खाते क्रमांक, आयएफसी कोड, खातेदाराचे नाव व संपर्क क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे.


🔰सपर्करहित एटीएम कार्ड मर्यादा : ‘इन्सर्ट’नंतर ‘स्वाईप’ पद्धतीद्वारे व्यवहार करण्यासाठी एटीएम कार्डना चुंबकीय पट्टीची अनिवार्यता २०२० मध्ये अंमलात आली. सुरक्षिततेच्या दृष्टीने यापुढचे पाऊल म्हणून संपर्करहित एटीएम कार्ड संबंधित ‘पीओएस’च्या एक इंच अंतरावरून कार्यान्वित करून व्यवहार करता येणार आहे. एटीएम कार्ड तसेच यूपीआयद्वारे सध्या असलेली २,००० रुपयांची मर्यादा ५,००० रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.


🔰वहॉट्सअ‍ॅपचे मर्यादित भ्रमणध्वनी व्यासपीठ :अ‍ॅण्ड्रॉईडच्या ओएस ४.०.३ तसेच आय फोनच्या आयओएस ९ मंच सुसज्ज असलेल्या मोबाइलवरून व्हॉट्सअ‍ॅपची सुविधा घेता येणार नाही. तसेच निवडक संख्या असलेल्या केएआय २.५.१ तंत्रज्ञानावरील फोनवरही ही संदेश वहन यंत्रणा काम करू शकणार नाही.


🔰लण्डलाईन-मोबाइल कॉलसाठी आता शून्य : स्थिर पद्धतीच्या (लँडलाईन) दूरसंपर्क माध्यमाद्वारे भ्रमणध्वनीवर केले जाणाऱ्या कॉलसाठी आता (एसटीडीप्रमाणे) क्रमांकाआधी शून्य लावावा लागेल. यामुळे दूरसंचार क्रमांकाच्या भाऊगर्दीत सुसूत्रता येईल, असा दूरसंचार विभागाचा दावा आहे.


🔰यपीआय व्यवहार देय : यूपीआयद्वारे होणारे निधी व्यवहारांसाठी आता वाढीव किंमत मोजावी लागेल. अ‍ॅमेझॉन पे, गूगल पे, फोन पेसारख्या देय मंचावरून होणाऱ्या निधी हस्तांतरण रकमेबरोबर काही प्रमाणात शुल्क द्यावे लागेल.


🔰वाहन खरेदी महागडी : प्रवासी तसेच एसयूव्ही वाहनांच्या किंमत १ जानेवारी २०२१ पासून वाढत आहेत. विदेशी विनिमय चलनातील फरक तसेच वाहनांसाठी लागणाऱ्या सुटय़ा भागांच्या किंमती अप्रत्यक्ष करामुळे वाढल्याने वाहनांच्या एकूण किंमती ३ ते ५ टक्क्य़ांपर्यंत वाढल्या आहेत. अनेक कंपन्यांची त्यांही ही दरवाढीची मात्रा १ जानेवारीपासून लागू करत असल्याचे जाहीर केले आहे.


🔰एलपीजी सिलिंडर गॅस किंमत : स्वयंपाकासाठीच्या गॅस सिलिंडरच्या किंमती नव्या वर्षांच्या पहिल्या महिन्यापासून वाढणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या किंमतीतील लक्षणीय बदलापोटी गॅस वितरक कंपन्या त्यांच्या सिलिंडरच्या किंमती सातत्याने बदलत असतात. नव्या वर्षांलाही ही परंपरा कायम राहणार आहे.

मुकेश अंबानींना मागे टाकत चीनचे बॉटल वॉटर किंग शानशान बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती.


🔰चीनचे के झोंग शानशान हे एक असे श्रीमंत व्यक्ती आहेत ज्यांचा माध्यमांमध्ये खूपच कमी प्रमाणात उल्लेख होतो. मात्र, शानशान यांनी विविध क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. पत्रकारिता, मशरुमची शेती आणि हेल्थ केअर या क्षेत्रात त्यांचं चीनमध्ये मोठ नाव आहे. हेच शानशान आता आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. भारताचे मुकेश अंबानी आणि चीनचे जैक मा आणि इतर श्रीमंतांना मागे टाकत त्यांनी हे स्थान पटकावलं आहे.


🔰बलूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सनुसार, शानशान यांची एकूण संपत्ती ७०.९ अब्ज डॉलरपासून ७७.८ अब्ज डॉलरच्या जवळपास आहे. याप्रकारे शानशान जगातील ११ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. शानशान यांनी ही संपत्ती खूपच कमी वेळेत कमावली आहे, जो स्वतःच एक विक्रम आहे. काही काळापर्यंत चीनच्या बाहेर जगात त्यांच्याबद्दल खूपच कमी लोकांना माहिती होती.


🔰६६ वर्षीय शानशान यांचा राजकारणात हस्तक्षेप नाही त्यामुळे त्यांची ‘लोन वोल्फ’ अशीही ओळख बनली आहे. त्यांनी विविध क्षेत्रात चांगलं यश मिळवलं आहे. चीनची लस बनवणारी कंपनी बीजिंग वंताई बायोलॉजिकल फार्मेसी इंटरप्रायझेसला त्यांनी एप्रिल महिन्यांत अधिग्रहित केलं. त्यानंतर काही महिन्यांनंतर बाटलीबंद पाणी तयार करणारी कंपनी नोंग्फू स्प्रिंग देखील ताब्यात घेतली. त्यानंतर या कंपनीला त्यांनी बाजारातील मोठी कंपनी बनवलं. शेअर बाजारात नोंग्फूचे शेअर १५५ टक्क्यांनी वाढले आहेत. तर वंताईच्या शेअरमध्ये २ हजार टक्के वाढ झालेली पहायला मिळाली.

जपान तयार करतोय जगातील पहिलं ‘लाकडी सॅटलाइट

🔰अमेरिकेच्या ‘नासा’ या अवकाश संशोधन केंद्राच्या माहितीनुसार अवकाशात सध्या 5 लाखांहून अधिक निरुपयोगी तुकडे पृथ्वीभोवती घिरट्या घालत आहेत.


🔰तर यातील अनेक तुकडे हे अतिशय वेगानं फिरत असून यातून सॅटलाइट आणि उपग्रहांचं नुकसान होऊ शकतं. या निरुपयोगी तुकड्यांमुळे अवकाशातील आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रालाही धोका निर्माण झाला आहे.


🔰तसेच 2023 सालापर्यंत अवकाशातील निरुपयोगी उपकरणांच्या अडचणीवर मात करण्यासाठी जपानची क्योटो यूनिव्हर्सिटी आणि कंस्ट्रक्शन कंपनी Sumitomo Forestry एकत्र आले आहेत.


🔰तर येत्या काळात ‘लाकडी सॅटलाइट’ तयार करण्यासाठी जपान प्रयत्न करत आहे.

जपानने अंतराळातील प्रदुषणावर मात करण्यासाठी लाकडी सॅटलाइट तयार करण्यावर काम सुरू केलं आहे.


🔰तापमानात होणारे बदल आणि सूर्याच्या प्रखर किरणांना झेलू शकेल इतक्या क्षमतेचा सॅटलाइट तयार करण्यात येत आहे.

तसेच यासाठी पृथ्वीवरील विविध परिस्थितींमध्ये लाकडाचे परिक्षण केले जात आहे.

लाकडी सॅटलाइट त्यांचं अवकाशातील काम पूर्ण झाल्यानंतर पृथ्वीवर परतत असताना पूर्णपणे जळून राख होतील आणि त्याचे कोणतेही अवशेष अवकाशात राहणार नाहीत, यावर संशोधन केलं जात आहे.

Pfizer-BioNTech लसीच्या आपत्कालिन वापराला WHO कडून मंजुरी


🔰जागतिक आरोग्य संघटनेने फायजर-बायोटेक (Pfizer-BioNTech) लसीच्या आपत्कालिन वापरासाठी परवानगी दिली आहे.

तर या निर्णयामुळे अनेक देशांसमोरील लसीच्या आयात आणि वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.


🔰बरिटनने 8 डिसेंबरला लसीच्या वापरासाठी सर्वात आधी परवानगी दिली होती. त्यानंतर अमेरिका, कॅनडा आणि युरोपिअन युनिअन देशांनीही लसीच्या आपत्कालिन वापराला परवानगी दिली होती.


🔰करोना व्हायरसचा फैलाव सुरु झाल्यापासून आपत्कालिन वापरासाठी परवानगी मिळालेली फायजर-बायोटेक ही पहिलीच करोना प्रतिबंधक लस असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

Latest post

चालू घडामोडी :- 26 एप्रिल 2024

◆ दरवर्षी 26 एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिवस जगभरात साजरा केला जातो. ◆ बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार...